SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
...

जोगेश्वरीत घरगुती सिलिंडरचा साठा जप्त

सांताक्रूझ (पूर्व) येथील उपनिबंधक शिधावाटप (ड परिमंडळ) कार्यालयाच्या पथकाने जोगेश्वरी पूर्व परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा साठा जप्त केला. लजीज शिक कबाब हॉटेलमध्ये घरगुती वापराचे गॅस सिलिंडर साठवून त्याचा व्यावसायिक वापर केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कायदेशीर कारवाई करून शिधावाटप अधिकारी हरीश पटेल यांनी अंबोली पोलीस ठाण्यात […]

सामना 30 Mar 2026 8:09 am

डबेवाले आजपासून सहा दिवस सुट्टीवर

मुंबई आणि उपनगरांमध्ये काम करणाऱया चाकरमान्यांना अगदी वेळेत जेवणाचे डबे पोहोचवणारा ‘मुंबईचा डबेवाला’ सोमवारपासून सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळे पुढील सहा दिवस ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती डबेवाला संघटनेकडून देण्यात आली आहे. मुंबईचा डबेवाला गेल्या अनेक वर्षांपासून न चुकता […]

सामना 30 Mar 2026 8:06 am

हत्येच्या गुन्ह्याचा खटला गोगलगायीच्या गतीने! सत्र न्यायालयाचे ताशेरे; आरोपीला जामीन

हत्येच्या गंभीर गुन्ह्याच्या तपासातही गांभीर्य न दाखवणारे पोलीस आणि सरकारी पक्षावर सत्र न्यायालयाने कडक ताशेरे ओढले. मागील पाच वर्षांपासून हत्येचा खटला प्रलंबित आहे. एकीकडे पोलिसांच्या तपासात विविध त्रुटी असताना खटलादेखील गोगलगायीच्या गतीने सुरू आहे, अशा स्पष्ट शब्दांत ताशेरे ओढत न्यायालयाने वाकोला येथील हत्येच्या प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर केला. वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 जून 2019 […]

सामना 30 Mar 2026 8:03 am

एकाच दिवसात 4 ग्रीन कॉरिडॉर

मुंबई वाहतूक पोलिसांनी रविवारी मुंबईच्या चारही दिशांना ग्रीन कॉरिडॉर केले. ग्रीन कॉरिडॉर केल्याने लिव्हर, हृदय, किडनी हे अवयव वेळेत रुग्णालयात पोहचवले. वाहतूक पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. सकाळी महावीर जैन रुग्णालय ठाणे ते अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई हे 3 किलो मीटरचे अंतर अवघ्या चार मिनिटांत पार केले. त्याचप्रमाणे महावीर जैन रुग्णालय ठाणे ते रिलायन्स […]

सामना 30 Mar 2026 8:01 am

ई-गव्हर्नन्समध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वोत्तम, मुख्यमंत्र्यांनी केला मनीषा म्हैसकर यांचा सत्कार

राज्य सरकारच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत सर्व विभागात 186.75 गुणांसह सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वोत्तम ठरला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित सोहळ्यात विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. ई-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमात उत्कृष्ट कार्य केलेल्या विभागांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उपक्रमात […]

सामना 30 Mar 2026 8:00 am

Iran War –नवनियुक्त नेते मोजतबा खामेनी यांचा लिखित मेसेज, इराकने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मानले आभार

मध्य पूर्वेतील युद्धात दिवसागणिक नवनवीन घडामोडी घडत, हे युद्ध अधिक चिघळताना दिसत आहे. अशातच आता इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी एका लिखित संदेशाद्वारे, अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या युद्धात दिलेल्या पाठिंब्याबद्दल इराकच्या जनतेचे आभार मानले आहेत, असे इराणी प्रसारमाध्यमांनी रविवारी सांगितले. माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांची २८ फेब्रुवारी रोजी युद्धाच्या सुरुवातीलाच एका हवाई हल्ल्यात […]

सामना 30 Mar 2026 7:59 am

माजी डीजीपींविरोधात समन्स

म्हाडा घोटाळ्याशी संबधित तक्रार दाखल करूनही गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणारे अधिकारी सत्र न्यायालयाच्या रडारवर आले आहेत. कथित घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल न केल्याने मुंबई सत्र न्यायालयाने माजी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात समन्स जारी करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी 2017 मध्ये म्हाडातील घोटाळय़ाप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांनी केलेल्या आरोपानुसार […]

सामना 30 Mar 2026 7:57 am

तलासरीजवळ वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात; 21 जण जखमी

तलासरीजवळील डोंगरी येथे आज संध्याकाळी वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात झाले. त्यात 21 जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. या अपघातात सहा जण गंभीर तर 16 किरकोळ जखमी असून वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात झाल्याने लग्नात विघ्न निर्माण झाले आहे. डहाणू तालुक्यातील आंबोली येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन टेम्पो तलासरी तालुक्यातील डोंगरी येथे जात होता. […]

सामना 30 Mar 2026 7:48 am

विजयपत सिंघानिया अनंतात विलीन

देशातील आघाडीची टेक्स्टाईल कंपनी ‘रेमंड’ला ‘द कम्प्लिट मॅन’ची ओळख बनवणारे उद्योगपती व रेमंडचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी 3 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीवर त्यांचा मुलगा व रेमंडचे विद्यमान अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी मुखाग्नी दिला. यावेळी सिंघानिया कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाज मोदी यांनी विजयपत सिंघानिया […]

सामना 30 Mar 2026 7:45 am

हे करून पहा –सतत तोंड येतंय का?

तोंड येणे म्हणजेच तोंडात उष्णेतेचे पह्ड येणे. हे सहसा गंभीर नसतात, पण ते वारंवार येत असतील तर ते शरीरातील काहीतरी बिघाडांचे लक्षण आहे. शरीरातील पोषक तत्त्वांचा अभाव आणि पचनसंस्थेतील बिघाड या दोन्ही गोष्टी यासाठी कारणीभूत असू शकतात. यावर उपाय म्हणून कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास जंतू मरतात आणि जखम लवकर भरते. पह्डावर मध किंवा […]

सामना 30 Mar 2026 7:29 am

असं झालं तर…सतत मोबाईलचे स्टोरेज फुल्ल होतंय…

तुमच्या मोबाईलचे स्टोरेज सतत फुल्ल होत असेल तर ही समस्या सोडवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्सचा वापर करा. सर्वात आधी स्टोरेजमधील पॅशे डेटा क्लिअर करा. डिलीट केलेला पंटेंट ट्रश किंवा बिनमध्ये 30 दिवसांपर्यंत राहतो. तिथूनही तत्काळ डिलीट करा. मेमरी वाचवण्यासाठी क्लाऊड स्टोरेजचा वापर करा. मोबाईलमध्ये अनेकदा एकाच पह्टोचे किंवा फाईलचे अनेक डय़ुप्लीकेट्स असतात. फाईल्ससारखे गुगल अॅप वापरून […]

सामना 30 Mar 2026 7:28 am

Iran War –इराणने केलेल्या हल्ल्यात कुवेतमधील हिंदुस्थानी कामगाराचा मृत्यू

मध्य पूर्वेतील युद्ध आता महिना उलटून गेल्यानंतरही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. अशावेळी हे युद्ध अधिक चिघळत असून, नुकतेच इराणने केलेल्या हल्ल्यामध्ये हिंदुस्थानी कामगाराचा मृत्यू झाला आहे. कुवेतमधील एका वीज प्रकल्पावर इराणने केलेल्या हल्ल्यात या हिंदुस्थानी कामगाराचा मृत्यू झाला आहे. प्रकल्पातील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती आखाती देशाच्या वीज मंत्रालयाने सोमवारी दिली. कुवेत […]

सामना 30 Mar 2026 7:27 am

सबालेंकाने मियामीचे विजेतेपद राखले, जेतेपदाच्या लढतीत गॉफला हरवत ‘सनशाइन डबल’ पूर्ण

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या एरिना सबालेंकाने मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून आपली दमदार कामगिरी कायम राखली. अंतिम सामन्यात तिने अमेरिकेच्या कोको गॉफला 6-2, 4-6, 6-3 अशा फरकाने पराभूत केले. या विजयासह सबालेंकाने ‘सनशाइन डबल’ पूर्ण करत कारकीर्दीत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला. इगा स्विटेक हिच्यानंतर ‘सनशाइन डबल’ साध्य करणारी सबालेंका ही पहिली खेळाडू ठरली […]

सामना 30 Mar 2026 7:16 am

दोन वर्षांची बंदी अपुरी, आयपीएलमधील माघारीवर गावसकरांचा हल्ला

आयपीएलमधून शेवटच्या क्षणी नाव मागे घेणाऱया खेळाडूंवर कडक शब्दांत टीका करत बीसीसीआयला सध्याच्या शिक्षा पद्धतीचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिग्गज हिंदुस्थानी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दिला आहे. आयपीएलला पाठ दाखवणाऱया खेळाडूंना दोन वर्षांचा बंदी कालावधी पुरेसा नसल्याचे मत व्यक्त करत शिक्षा अधिक गंभीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. बंदीचा धाकच नाही दोन वर्षांचा बंदी कालावधी हा […]

सामना 30 Mar 2026 7:09 am

जवानांच्या हाती येणार ‘प्रहार’ मशीन गन

अदानी डिफेन्सकडून लष्कराला 2,000 मशीन गन सुपूर्द : 1 किमी अंतरावरून शत्रूंना ठार मारण्यास सक्षम वृत्तसंस्था/ग्वाल्हेर लष्कराची मारक क्षमता वाढवण्यासाठी एका प्रमुख संरक्षण कंपनीने शनिवारी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत उत्पादित केलेल्या 2,000 ‘प्रहार’ लाईट मशीन गनची (एलएमजी) पहिली तुकडी भारतीय लष्कराला सुपूर्द केली. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने ग्वाल्हेर येथील आपल्या स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्समध्ये ही शस्त्रs [...]

तरुण भारत 30 Mar 2026 7:05 am

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 30 मार्च 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे आर्थिक – बच्चे कंपनीच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस प्रसन्न वातावरणात जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, […]

सामना 30 Mar 2026 7:02 am

प.बंगालमध्ये काँग्रेसचे 284 उमेदवार जाहीर

भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात प्रदीप प्रसाद वृत्तसंस्था/कोलकाता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रदीप प्रसाद यांना उमेदवारी देऊन पक्षाने लढत अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरून पक्षाच्या पुनरागमनाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. ते [...]

तरुण भारत 30 Mar 2026 7:00 am

आठ भारतीय खलाशी इराणमधून मायदेशी

तीन महिन्यांच्या कैदेनंतर घरवापसी वृत्तसंस्था/नवी दिल्ली मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्ध आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणमध्ये अटकेत असलेले उर्वरित आठ भारतीय खलाशी आता मायदेशी परतले आहेत. हे खलाशी संयुक्त अरब अमिरातीस्थित ‘एमटी व्हॅलियंट रोअर’ या टँकरवर असताना 8 डिसेंबर 2025 रोजी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या तावडीत सापडले होते. इराणने या [...]

तरुण भारत 30 Mar 2026 7:00 am

बाजारावरील टांगती तलवार कायम?

जागतिक भूराजकीय संघर्षाच्या धगधगत्या ज्वाला आणि अनिश्चिततेच्या धुक्यात हरवलेला वित्त बाजार सध्या एखाद्या थरारक चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखा भासू लागला आहे, जिथे प्रत्येक नवा दिवस गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी घेऊन येतो. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने केवळ सीमाच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेचा पायाच हादरवून सोडला असून, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाची टांगती तलवार बाजाराच्या मानेवर सतत फिरत आहे. [...]

तरुण भारत 30 Mar 2026 7:00 am

डोनाल्ड ट्रम्पविरोधी आवाज बुलंद

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविरोधात जनता रस्त्यावर : न्यूयॉर्कपासून लंडन-युरोपपर्यंतही ट्रम्प यांना सत्तेवरून हटवण्याची मागणी तीव्र वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा आणि इराणविरुद्धच्या युद्धाचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘नो किंग्स’ रॅलीसाठी अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये आणि युरोपच्या अनेक भागांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत आंदोलक विविध मुद्यांवर आपला संताप व्यक्त [...]

तरुण भारत 30 Mar 2026 7:00 am

होर्मुझ मार्ग खुला करण्याची चावी ठरणार 7 बेटं

इराणचे आहे नियंत्रण : अमेरिकेचे सैन्य करणार कब्जा इराणमध्ये युद्ध सुरु झाल्यापासून होर्मुझ सामुद्रधुनी सातत्याने चर्चेत आहे. इराणच्या सैन्याचे या भागावर नियंत्रण आहे. तर या सागरी मार्गाला जागतिक व्यापारासाठी खुला करण्याचा दबाव अमेरिकेवर आहे. याचदरम्यान अमेरिकेचे हजारो सैनिक पश्चिम आशियात दाखल झाले आहेत. अमेरिकेचे हे सैनिक उत्तर पर्शियन उपसागातील इराणच्या खार्ग बेटावर कब्जा करण्याचा प्रयत्न [...]

तरुण भारत 30 Mar 2026 7:00 am

दोघांचे चेहरे लक्षात ठेवा!

शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना ठरविले जबाबदार : इराणकडून छायाचित्रे जारी मिनाबच्या ‘शजरे तैयर्ब’ गर्ल्स स्कूलवरील हल्ल्यासाठी इराणने अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे. भारतातील इराणच्या दूतावासाने एक्सवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांची छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांचा गुन्हा लक्षात ठेवावा. कमांडर ली आर. टेट आणि कार्यकारी अधिकारी [...]

तरुण भारत 30 Mar 2026 7:00 am

पाकचे माजी लष्करप्रमुख कमर बाजवा यांचे निधन

वृत्तसंस्था/इस्लामाबाद पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे. ते महिनाभरापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल होते. घरातील बाथरूममध्ये घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाजवा यांच्या कुटुंबीयांनी इस्लामाबाद पोस्टला त्यांच्या निधनाची बातमी दिली. बाजवा यांनी 2016 ते 2022 या [...]

तरुण भारत 30 Mar 2026 7:00 am

दोन दहशतवाद्यांना पंजाबमधून अटक

गेल्या 5 वर्षांपासून मजूर म्हणून वावर : मूळचे पाकिस्तानी असल्याचा संशय वृत्तसंस्था/मालेरकोटला पंजाब आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत पंजाबमधील मालेरकोटला येथे दोन संशयित पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली. पोलीस सूत्रांनुसार, संशयितांची ओळख अब्बू गाबा हुरैरा आणि उस्मान अशी पटली आहे. त्यांना शनिवारी शेरवानी कोटे गावात ताब्यात घेतल्यापासून कसून चौकशी केली जात आहे. हे संशयित गेल्या [...]

तरुण भारत 30 Mar 2026 7:00 am

डिजिटल कूटनीतीत भारताचे यश

कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील कुटनिती आणि मुत्सद्देगिरीची तत्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता आपल्या डिजिटल डिप्लोमसी म्हणजे गणकीय कूटनीतीद्वारे कृतीमध्ये आणत आहेत. अलीकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांनी मिळविलेले यश अद्भुत आहे तसेच ते त्यांच्या प्रगल्भ दूरदृष्टीवर सुद्धा आधारलेले आहे. त्यांच्या डिजिटल डिप्लोमसीचे अनेक पैलू आहेत, पदर आहेत ते बारकाईने समजून घेतले पाहिजेत. प्रगत माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग ताणतणाव [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:30 am

माणसाच्या स्वभावाप्रमाणे त्याच्या हातून सर्व कर्मे घडत असतात

अध्याय पाचवा भगवंत म्हणाले की, संयमी पुरुष फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या खात्रीने त्याविषयी उदासीन राहतो. त्याला कर्माच्या श्रेयाची अपेक्षा नसते, त्यामुळे त्याचे कुणी कौतुक केल्यास त्याच्याबद्दल प्रेम अथवा त्याची कुणी दखल न घेतल्यास त्याच्याबद्दल राग, द्वेष, मत्सर असे काही त्याला वाटत नाही. तो [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:30 am

युद्धात राजकारण, निवडणुकीत सत्ताकारण, जनता हवालदिल!

ट्रम्प आणि नेतान्याहू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दोस्त असले तरी मोदी सरकार या प्रश्नी ठोस भूमिका घेऊ शकत नाही, त्याला घेता येत नाही. कारण या इंधन संकटाने भारताचीच आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. इराण, रशियाला दुखावता येत नाही. ते सांगतील त्या किमतीत तेल, गॅस घ्यावा लागेल. आणि या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:30 am

टांगलेलं बालपण…तुटलेली माणुसकी

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना केवळ एक गुन्हा नाही; ती प्रत्येक बापाच्या छातीत धस्स करणारी वेदना आहे. ज्या हातांनी लेकरांना उचलून चालायला शिकवलं, त्याच हातांनी त्या चिमुकल्या जीवांना त्याने दोरीने बांधून टांगलंही. कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. एखादा सर्वसामान्य बाप, जो दिवसभर कष्ट करून घरी येतो आणि आपल्या मुलीच्या हसण्यात [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:30 am

बिहार मुख्यमंत्री पदाचे घोंगडे भिजतच, नितिश यांच्या मुलासाठी जेडीयूची फिल्डिंग; भाजपच्या गोटात चिंता

बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी राजीनामा देऊन महिना उलटला आहे. मुख्यमंत्री पदाचे हे घोंगडे भिजतच असून, मुख्यमंत्री कोण होणार? याकडे लक्ष लागले आहे. 5 मार्चपासून अद्याप रिक्त असलेल्या या जागेवर भाजपने दावा केला असला तरी जेडीयू आमदार आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. जेडीयूचे आमदार श्याम रजक म्हणाले की, निशांतमध्ये मुख्यमंत्री बनण्याचे सर्व गुण आहेत. ते […]

सामना 30 Mar 2026 6:23 am

पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा

राज्यात उष्णतेच्या लाटेपाठोपाठ आता वादळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. सोमवारपासून पुढील पाच दिवस बहुतांश भागांत वादळी वाऱयासह पाऊस तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वादळी पावसाबाबत प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील दोन आठवडे राज्यात […]

सामना 30 Mar 2026 6:23 am

मुंबईन जिंकला 14 वर्षानंतर सलामीचा सामना

केकेआरवर 6 विकेट्सनी विजय : रोहित शर्मा-रिकल्टन ठरले विजयाचे हिरो वृत्तसंस्था/मुंबई रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून पराभूत केले. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 4 गडी गमावून 220 धावा केल्या. यानंतर विजयासाठीचे टार्गेट एमआयने 19.1 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. विशेष म्हणजे, मुंबईने आपल्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी धावांचा [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:10 am

गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे ‘महानेत्रम’, खासगी सीसीटीव्ही नेटवर्कचीही मदत घेणार

मुंबईसह राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी ‘महानेत्रज्ञ’ ही सीसीटीव्ही प्रणाली विकसित करण्यात येत आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या सीसीटीव्ही नेटवर्कसोबत सार्वजनिक जागेवर लावलेल्या खासगी सीसीटीव्हीच्या नेटवर्कचीही मदत घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाच्या भविष्यातील योजनांची विधिमंडळात माहिती दिली. त्यानिमित्ताने अनेक नव्या विषयांवर नव्याने प्रकार पडला आहे. […]

सामना 30 Mar 2026 6:09 am

चेन्नई-राजस्थान यांची आज पहिली लढत

आयपीएल 19 : रवींद्र जडेजा-संजू सॅमसनसाठी भावनिक लढत, विजयी प्रारंभ करण्यास दोन्ही संघ उत्सुक वृत्तसंस्था/गुवाहाटी संजू सॅमसन हा आज राजस्थान रॉयल्सविऊद्धच्या एका भावनिक लढतीसाठी सज्ज झाला आहे. राजस्थान रॉयल्स हा तो संघ आहे ज्याचे त्याने एका दशकाहून अधिक काळ नेतृत्व केले आणि ज्याला त्याने घडवले. मात्र आता तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. त्याच वेळी [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:05 am

ब्रिटनची अॅथलिट रँड कालवश

वृत्तसंस्था/लंडन ब्रिटनची महिला अॅथलिट मेरी रँड हिचे वयाच्या 86 व्या वर्षी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती ब्रिटनची पहिली महिला अॅथलिट म्हणून ओळखली जाते. 1964 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी रँडने महिलांच्या लांबउडी प्रकारात सुवर्णपदक तसेच पेन्थेलॉनमध्ये रौप्य पदक आणि 4100 मी. महिलांच्या रिलेत कांस्यपदक मिळविले होते. वयाच्या 17 व्या वर्षी तिने [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:00 am

साबालेंकाचे सलग दुसरे जेतेपद

वृत्तसंस्था/मियामी (अमेरिका) मियामी महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत बेलारुसच्या टॉप सिडेड आर्यना साबालेंकाने अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात साबालेंकाने चौथ्या मानांकित कोको गॉफचा 6-2, 4-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. साबालेंकाने मियामी टेनिस स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्याचा पराक्रम केला आहे. [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:00 am

धोनी दोन आठवडे आयपीएलमध्ये खेळणार नाही

चेन्नई : भारताचा माजी कर्णधार तसेच चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख खेळाडू महेंद्र सिंग धोनीला स्नायु दुखापतीची समस्या सुरू झाल्याने तो शनिवारपासून सुरू झालेल्या 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध होवू शकणार नाही, असे चेन्नई संघाच्या व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले. धोनीच्या पोटरीचा स्नायू ताणल्याने त्याला गेल्या काही दिवसांपासून वारंवार वेदना जाणवत आहेत. [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:00 am

आजचे भविष्य ३० मार्च २०२६

मेष : चुकीचा निरोप मिळाल्याने दिवस खराब जाण्याची शक्यता वृषभ : फावल्या वेळेचा सदुपयोग करणे शिकून घ्याल. मिथुन : मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी योग, ध्यान करा कर्क : सतत अर्थपुरवठा होत राहील, रिकाम्या वेळेत जिमला जा सिंह : जेव्हा गरज असेल तेव्हा मदतीला कोणीही नसेल. कन्या : भावनाविवशतेने एखादा आजार स्वत:हून ओढवून घ्याल तुळ : आयुष्य [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:00 am

मर्सिडीजच्या अँटोनेलीचे सलग दुसरे जेतेपद

वृत्तसंस्था/सुझुका, जपान इटलीचा 19 वर्षीय मर्सिडीज ड्रायव्हर किमी अँटोनेलीने सलग दुसऱ्यांदा फॉर्म्युला वन शर्यत जिंकताना येथे झालेल्या जापनीज ग्रां प्रि शर्यतीचे जेतेपद पटकावले. मॅक्लारेनच्या ऑस्कर पियास्ट्रीने दुसरे तर फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने तिसरे स्थान मिळविले. अँटोनेली व पियास्ट्री यांच्यात 13.7 सेकंदाचे अंतर होते. मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने चौथे, मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने पाचवे, फेरारीच्या लेविस हॅमिल्टनने सहावे, अल्पाईनच्या [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:00 am

मेरी कोम व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेशाच्या विचारात

वृत्तसंस्था/नवी दिल्ली ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि सहा वेळा विश्वविजेती ठरलेली भारतीय बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने रविवारी सांगितले की, ती व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरलेल्या या 43 वर्षीय खेळाडूची हौशी गटातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीची वयोमर्यादा आता संपली [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:00 am

दक्षिण आफ्रिका महिला संघाची विजयी सलामी

सामनावीर कायला रेनेकेचा शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार, न्यूझीलंडवर 2 गड्यांनी मात वृत्तसंस्था/ख्राईस्टचर्च (न्यूझीलंड) वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी कायला रेनेकेने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या विजयी षटकाराच्या जोरावर दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंडचा 2 गड्यांनी पराभव करत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या [...]

तरुण भारत 30 Mar 2026 6:00 am

ट्रम्प यांच्याविरोधात जनतेचे बंड! 80 लाख लोक उतरले रस्त्यावर!! इराण युद्ध आणि महागाईमुळे अमेरिकेत आंदोलनाचा वणवा 3,300 ठिकाणी निदर्शने

इराणविरुद्ध युद्ध सुरू करून संपूर्ण जगाला ऊर्जा संकटात ढकलणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेसह युरोप आणि दक्षिण आशियातील काही देशांमध्ये लाखो लोकांनी तीव्र निदर्शने केली. अमेरिकेमध्येच ट्रम्प यांच्याविरोधात जनता संतप्त झाली असून ट्रम्प यांना लोकांनी विदूषक म्हणत फलक झळकावले. अमेरिकेतील 50 राज्यांमधील एक-दोन नव्हे तर 3,300 शहरांमध्ये ‘नो किंग्स रॅली’मध्ये उतरून 80 लाखांपेक्षा जास्त […]

सामना 30 Mar 2026 5:30 am

पाकिस्तानात स्मार्ट लॉकडाऊन; दुकाने, महामार्ग बंद, लग्न सोहळ्यांवर बंदी

इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवडय़ामुळे पाकिस्तानपुढे ऊर्जा संकट उभे राहिले आहे. यावर उपाय म्हणून पाकिस्तान सरकारने देशात दोन दिवसांचा ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दुकाने, महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून लग्न समारंभांवरही बंदी घालण्यात येणार आहे. आठवडय़ातून दोन दिवस हा लॉकडाऊन असेल. त्याचा कालावधी शनिवारी मध्यरात्री ते रविवारी मध्यरात्रीपर्यंत असेल. शरीफ […]

सामना 30 Mar 2026 5:25 am

मुंबईतील 2640 म्हाडा घरांची लॉटरी, आजपासून अर्ज नोंदणी 15 मे रोजी सोडत

म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाने मुंबईतील 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीसाठी उद्या, सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज करता येणार असून 15 मे रोजी सकाळी 11 वाजता लॉटरी काढली जाणार आहे. मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे अनेक जण स्वस्तात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची […]

सामना 30 Mar 2026 5:22 am

युद्धामुळे अर्थव्यवस्था मंदावली, महागाई आणखी भडकणार; केंद्राचा धक्कादायक अहवाल

अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. युद्धाचा भडका आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशातील उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणाम झाल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. देशांतर्गत उत्पादनावरील खर्च वाढल्यामुळे येत्या काही काळात महागाई आणखी भडकण्याची भीती आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मार्च 2026चा मासिक आर्थिक […]

सामना 30 Mar 2026 5:22 am

रूपाली चाकणकरांना समन्स, खरातचे राजकीय कनेक्शन एसआयटीच्या रडारवर

भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱया भोंदूबाबा अशोक खरात याचे राजकीय साथीदार आता एसआयटीच्या रडारवर आले आहेत. त्याच्या एजंटांची चौकशी करण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलविले आहे. दरम्यान, खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढविली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. […]

सामना 30 Mar 2026 5:20 am

जमिनीवरचं युद्ध भडकणार! अमेरिकेचे साडेतीन हजार सैनिक आखातात दाखल

सौदी अरबमधील अमेरिकेच्या हवाई तळावर इराणने हल्ला करून अब्जावधी डॉलर किमतीची विमाने उद्ध्वस्त केली. त्यानंतर इराण-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र होण्याची भीती आहे. अमेरिकेने हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आखाती देशांमध्ये 3,500 पेक्षा जास्त अतिरिक्त सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले असून 2,500 मरीन सैनिकांसह सज्ज असलेले अमेरिकेची ‘यूएसस त्रिपोली’ ही अत्याधुनिक युद्धनौका आखाती देशांमधील युद्धक्षेत्रात दाखल झाली आहे. […]

सामना 30 Mar 2026 5:18 am

दिल्ली डायरी –काँग्रेसचे ‘आसाम बचाओ’ यशस्वी होईल का?

>> नीलेश कुलकर्णी आसाममध्ये भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने ‘आसाम बचाओ’चा नारा दिला आहे. भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी राहुल गांधी हे गौरव गोगोईंच्या साथीने प्रयत्न करत आहेत. प्रियंका गांधीही निवडणूक प्रभारी म्हणून आहेतच. मात्र काँग्रेसपुढे त्यांच्या पक्षात लागलेली मोठी गळती कशी रोखायची हा मोठा प्रश्न उभा आहे. प्रादेशिक अस्मितेला कुरवाळत काँग्रेसने ‘आसाम बचाओ’चा नारा दिला असला […]

सामना 30 Mar 2026 5:05 am

विज्ञान रंजन –सागर पातळीखालचे प्रदेश

>> विनायक पृथ्वीवर जिथे जिथे मानव किंवा प्राण्यांची वस्ती आहे त्या जागा 75 टक्के सागरी पाण्याच्या पातळीपेक्षा दोन-चार ते शेकडो मीटर उंच असलेल्या भूभागावर आहेत. अगदी मुंबईतल्या, पहिल्या देशी रेल्वेच्या, मुंबईतील उपनगरी स्टेशनांवर, ती जागा समुद्राच्या पातळीपासून, (सी-लेव्हलपासून) किती उंचीवर आहे ते नोंदलेलं आढळतं. मुंबईकडून मध्य रेल्वेच्या ट्रेनमधून कर्जत किंवा कसाऱयाकडे जाताना, स्टेशनच्या नावांच्या पाट्या […]

सामना 30 Mar 2026 5:00 am

जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलिंडर द्या! लोढा यांचे छगन भुजबळांना पत्र

मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच गॅस सिलिंडर द्या, अशी मागणी राज्याचे काwशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण झाला आहे. लोढांच्या मागणीला ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेने आक्षेप घेतला आहे. ‘लोढा एकाच समाजाचा उदोउदो करतात. त्यांनी फक्त जैन मंदिरांसाठी गॅसची मागणी […]

सामना 30 Mar 2026 4:50 am

अमृता फडणवीस म्हणाल्या…खरातवर आधीच कारवाई व्हायला हवी होती

भोंदूबाबा खरातवर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. तसे झाले असते तर बऱयाच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक पीडित महिला उद्ध्वस्त होण्यापासून वाचल्या असत्या, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मांडले. अशोक खरात प्रकरण खूपच भयानक आहे. त्यातून बऱयाच गोष्टी बाहेर येणार आहेत. कोणत्याही बाबावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे योग्य नाही. […]

सामना 30 Mar 2026 4:45 am

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा

मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा (एमएनएलयू) चौथा दीक्षान्त सोहळा शनिवारी पार पडला. विधी शिक्षणातील शैक्षणिक प्रवास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा हा संस्मरणीय क्षण ठरला. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमातील 255 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, एल.एल.एम.ए मेडिएशन आणि एमबीए या अभ्यासक्रमाचा समावेश होता. तसेच बीए एलएलबी (ऑनर्स) या अभ्यासक्रमातील 199 विद्यार्थ्यांचा […]

सामना 30 Mar 2026 4:12 am

सिंधुदुर्गनगरीत उलगडले गूढ कातळशिल्पांचे!

‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या तेरावा मासिक कार्यक्रम दत्तराज सोसायटीच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी ‘गूढ कातळशिल्पांचे’ या विषयावर सादरीकरण केले. विविध कातळशिल्पांची छायाचित्रे आणि माहितीच्या आधारे त्यांनी पुरातत्वशास्त्र, मानवी उत्क्रांती, प्रागैतिहासिक काळ याची ओळख करून दिली. अश्मयुगीन मानवाच्या कलेचा प्रथम आविष्कार असलेली शैलचित्रे किंवा गुहाचित्रे आणि पाषाणकला (रॉक आर्ट) याची […]

सामना 30 Mar 2026 4:10 am

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, १२ जखमी

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर आज सायंकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी वाहनात एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते. […]

सामना 30 Mar 2026 12:32 am

अटकेनंतर नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक झाल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. अटकेच्या काही तासांनंतरच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, ‘जेन-झी’ आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 77 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने ओली यांच्यासह […]

सामना 29 Mar 2026 11:34 pm

प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू, शूटिंगदरम्यान घडली दुर्घटना

प्रसिद्ध बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचा पश्चिम बंगालमधील दिघा येथे समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही भीषण दुर्घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राहुल बॅनर्जी सध्या लोकप्रिय बंगाली मालिका ‘भोले बाबा पार करेगा’ मध्ये मुख्य भूमिका साकारत होता. यासाठी संपूर्ण शूटिंग युनिट दिघाजवळील तळसरी येथे […]

सामना 29 Mar 2026 8:48 pm

कोयत्याच्या हल्ल्यात ओवळीयेतील महिलेचा मृत्यू

संशयित पिता–पुत्र ताब्यात सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये गावातील मधलीवाडी येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाने अखेर हिंसक वळण घेत, कोयत्याने केलेल्या हल्ल्यात 65 वर्षीय सरस्वती सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (वय 61) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ [...]

तरुण भारत 29 Mar 2026 8:45 pm

आम्ही नक्कीच जिंकणार आणि तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवणार; अभिषेक बॅनर्जींचा भाजपवर घणाघात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. “आगामी निवडणुकीत आम्ही केवळ विजयच मिळवणार नाही, तर भाजपला बंगालमधून बाहेरचा रस्ता दाखवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दक्षिण २४ परगणा येथे आयोजित एका भव्य जाहीर सभेत बोलताना त्यांनी भाजपवर तिखट शब्दांत टीका केली. अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर […]

सामना 29 Mar 2026 8:32 pm

Jalna News –जालना जिल्ह्यातील धावड्यात थरार! ५ तासांच्या रेस्क्यूनंतर बिबट्या अखेर जेरबंद

जालन्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावात आणि परिसरात शुक्रवारी सकाळी बिबट्याच्या दर्शनाने प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, वन विभाग आणि रेस्क्यू टीमने अत्यंत शिताफीने आणि तब्बल ५ तासांच्या अथक परिश्रमानंतर या बिबट्याला सुखरूप जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण मोहिमेत बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नाही. जालना उत्तर प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या भोकरदन नियतक्षेत्रातील धावडा गावालगत आज, […]

सामना 29 Mar 2026 8:27 pm

भाजप आणि अकाली दलाच्या सरकारनेच पंजाबच्या घराघरांत नशा पोहोचवला –अरविंद केजरीवाल

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि शिरोमणी अकाली दलावर कडाडून हल्ला चढवला आहे. “पंजाबमध्ये अमली पदार्थांचे जाळे पसरवण्यास भाजप आणि अकाली दलाचे सरकारच जबाबदार असून, त्यांच्या काळातच पंजाबच्या घराघरांत नशा पोहोचवला गेला,” असा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आयोजित एका जाहीर सभेत ते […]

सामना 29 Mar 2026 8:20 pm

नेपाळमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी, ५ वी पर्यंतच्या परीक्षाही रद्द; बालेन सरकारचा मोठा निर्णय

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारने शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सरकारने १०० कलमी सुधारणा आराखडा सादर केला असून, शिक्षण सोपे करणे, विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे आणि शैक्षणिक संस्थांमधून राजकारणाचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे. शाळा-महाविद्यालयांतील राजकीय संघटनांवर बंदी बालेन […]

सामना 29 Mar 2026 8:11 pm

Ratnagiri News –संगमेश्वर-फुणगुस मार्गावर गॅस पाईपलाईनसाठी रात्री उत्खनन

​ संगमेश्वर-फुणगुस मार्गावर सध्या गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सुरू असलेल्या बेसुमार उत्खननने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता सुरू असलेल्या या कामामुळे परिसरातील अंतर्गत रस्ते रात्रीच्या वेळी अचानक बंद केले जात आहेत. यामुळे ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, संतापलेला लोकभावनांचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. ​गेल्या काही […]

सामना 29 Mar 2026 8:02 pm

West Bengal Election 2026 –काँग्रेसकडून २८४ उमेदवारांची यादी जाहीर, बहरामपूरमधून अधीर रंजन चौधरी रिंगणात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारीआपल्या २८४ उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसने अनेक दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भवानीपूर मतदारसंघातून प्रदीप प्रसाद यांना उमेदवारी देऊन मोठे आव्हान उभे केले आहे. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी आपल्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच बहरामपूरमधून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. […]

सामना 29 Mar 2026 8:02 pm

IPL 2026 –मुंबईच्या संघात अल्लाहला स्थान, एकही सामना न खेळता आयपीएल जिंकलेला हा खेळाडू आहे तरी कोण?

आयपीएल 2026 च्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यात एका नव्या खेळाडूची चर्चा रंगली आहे. अफगाणिस्तानचा 20 वर्षीय युवा फिरकीपटू अल्लाह मोहम्मद गझनफर याने आज मुंबई इंडियन्ससाठी आपले आयपीएल पदार्पण केले. विशेष म्हणजे, ज्या केकेआर संघाविरुद्ध तो आज खेळत आहे, त्याच संघाचा तो गेल्या हंगामात भाग होता. कोण आहे अल्लाह गझनफर? […]

सामना 29 Mar 2026 7:51 pm

IPL 2026 –मुंबईचा धक्कादायक निर्णय, वर्ल्डकप विजेता कॅप्टन सूर्यकुमार यादव चक्क ‘इम्पॅक्ट प्लेयर’

आयपीएल 2026 च्या हंगामातील मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या पहिल्याच सामन्यात एक मोठा निर्णय पाहायला मिळाला. हिंदुस्थानला टी-20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याला मुंबई इंडियन्सने थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये न ठेवता ‘इम्पॅक्ट सब’ म्हणून राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान दिले आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक […]

सामना 29 Mar 2026 7:45 pm

Ratnagiri News –पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल साठा जाहिर करा, ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सद्यस्थितीत सर्व पेट्रोल, डिझेल आणि गॅस इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेतली. पुरेसा इंधन पुरवठा असल्याचे सांगण्यात येत असूनही ग्राहक पेट्रोलसाठी रांगा लावून असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली.पेट्रोल पंपावर साठा जाहिर करा, अशी मागणी करण्यात आली. पेट्रोल पंपवर साठ्याबद्दल सुस्पष्ट फलक […]

सामना 29 Mar 2026 7:44 pm

Ratnagiri News –सोनवी पूलाची एक मार्गीका मार्च अखेर पर्यंत सुरु करण्याचे आश्वासन फोल

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होणे म्हणजे एक चेष्टेचा विषय झाला आहे. गेली सतरा वर्षे राज्य आणि केंद्र सरकारकडून हा महामार्ग पूर्ण करण्याच्या नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. नवीन तारखांचे एकही आश्वासन अद्याप पाळले गेले नसताना जन आक्रोश समितीने संगमेश्वर येथे ११ जानेवारी रोजी केलेल्या जोरदार रास्ता रोको आंदोलना दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाने संगमेश्वर […]

सामना 29 Mar 2026 7:40 pm

ओली यांच्यानंतर नेपाळचे माजी ऊर्जा मंत्री दीपक खडका यांना अटक, मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई

नेपाळमधील राजकीय वर्तुळात सध्या खळबळ माजली असून, भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू असलेल्या मोठ्या मोहिमेत आता माजी ऊर्जा मंत्री दीपक खडका यांना अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या आरोपाखाली नेपाळच्या तपास यंत्रणांनी ही धडक कारवाई केली आहे. माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर आता खडका यांच्या अटकेमुळे नेपाळच्या राजकारणात मोठी उलथापालथ […]

सामना 29 Mar 2026 7:36 pm

आरे-वारे समुद्रात दोन पर्यटक बुडाले; पालघर येथील एकाचा मृत्यू

रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असू एकाला स्थानिक ग्रामस्थ आणि येथील पोलिस पाटील आदेश कदम यांनी वाचवत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. संतोष शशिकांत भानुशाली (पालघर), असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर सुयोग राजेश भानुशाली (विरार), असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. […]

सामना 29 Mar 2026 7:28 pm

युद्धखोर नेत्यांची प्रार्थना देव स्वीकारणार नाही; पोप लिओ यांची नाव न घेता ट्रम्प यांच्यावर टीका

जगावर महायुद्धाचे सावट गडद होत असतानाच, कॅथोलिक धर्मगुरू पोप लिओ यांनी रविवारी जागतिक नेत्यांना अत्यंत कडक शब्दांत फटकारले आहे. “जे नेते स्वतः युद्धाची ठिणगी टाकतात आणि रक्ताचा खेळ खेळतात, त्यांच्या प्रार्थना देव कधीही स्वीकारणार नाही,” असे विधान पोप यांनी केले आहे. पोप यांनी आपल्या भाषणात कोणाचेही थेट नाव घेतले नसले तरी, त्यांचा रोख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […]

सामना 29 Mar 2026 7:22 pm

Ratnagiri News –वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत आंबेड खुर्द येथील वृद्धाचा मृत्यू

मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने धडक दिल्याने एका ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. शांताराम तानु येल्ये असे मृत वृद्धाचे नाव आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज रविवारी सकाळी १० च्या सुमारास आंबेड-भंडारवाडी येथील सुरंग बोगद्याजवळ घडली. शांताराम येल्ये हे रेल्वे रूळ ओलांडत असताना किंवा रुळाच्या कडेने जात […]

सामना 29 Mar 2026 7:20 pm

श्री तुळजाभवानी देवीला वेदांत कुलकर्णी यांनी केली सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण

तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर येथे आज सकाळी पाथरी, जिल्हा परभणी येथील श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी देवीच्या चरणी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण केली. वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांनी आज सकाळी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी देवीच्या चरणी अर्पण केली. या प्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 6:15 pm

Ratnagiri News –दापोली बाजारपेठेतील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा ;२०२६ च्या कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात

दापोली शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेले श्री हनुमान मंदीर हे शहरवासीयांसह तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे अशा या येथील मंदिरात श्री देव मारुती व श्री देव शंकर ट्रस्ट फंड बाजारपेठ दापोली यांच्या वतीने या मंदिरात वर्षभरात विविध प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमांमधील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा हा विशेष सोहळा […]

सामना 29 Mar 2026 6:14 pm

तिरंदाज श्रवण, स्वराज आणि अवनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

धाराशिव (प्रतिनिधी)- धारशिव जिल्हा धनुर्विध्या संघटनेचे तिरंदाज श्रवण जमादार, स्वराज जाधव आणि अवनी घोडके यांची विविध वयोगटातून राष्ट्रीय धनुर्विध्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली भारतीय धनुर्विध्या महासंघाच्या वतीने दिल्ली येथे घेण्यात आलेल्या खेलो इंडिया ट्रायबल्स अर्चरी स्पर्धा निवड चाचणीत श्रवण जमादार याने कंपाऊंड प्रकारात केलेल्या दमदार कांगिरितून रायपुर (छत्तीसगड) येथे होत असलेल्या खेलो इंडिया अर्चरी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले आहे. महाराष्ट्र धनुर्विध्या संघटनेच्या अधिपत्याखाली सोलापूर जिल्हा धनुर्विध्या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय धनुर्विध्या स्पर्धेतून कंपाऊंड धनुर्धर स्वराज जाधव आणि अवनी घोडके यांची 10 वर्ष वयोगटातून नुमबुरू (आंध्र प्रदेश) येथे होत असलेल्या राष्ट्रीय धनुर्विध्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. दरम्यान धारशिव जिल्हा धनुर्विध्या संघटनेच्या वतीने धनुर्धर श्रवण जमादार, स्वराज जाधव, अवनी घोडके यांना जिल्हा संघटनेचे सचिव प्रविण गडदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी धारशिव जिल्हा धनुर्विध्या संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर, तांत्रिक समिती सचिव कैलास लांडगे, यशोदीप कदम आदींसह धनुर्धर, पालकांची मोठ्या प्रमाणात उपास्तिथी होती.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 6:12 pm

पंतप्रधानांनी ७ विमानतळांचे उद्घाटन केले, त्यापैकी ६ बंद पडले; अखिलेश यादव यांची भाजपवर टीका

“निवडणुका जवळ आल्या की भाजप केवळ उद्घाटनांचा धडाका लावते, पण प्रत्यक्षात त्या सुविधा जनतेच्या कामाला येत नाहीत. पंतप्रधानांनी थाटामाटात ७ विमानतळांचे उद्घाटन केले होते. परंतु सत्य हे आहे की, त्यातील ६ विमानतळ आता बंद पडले आहेत,” अशा बोचऱ्या शब्दांत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशमधील दादरी येथे आयोजित एका […]

सामना 29 Mar 2026 6:11 pm

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गोवा गुटखा मोठ्या प्रमाणात वाहतूक करताना पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करून धमकी दिल्याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 48 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दि. 27 मार्च 2026 रोजी सकाळी 9.12 वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग बायपास रोडवरील निसर्ग हॉटेलजवळ पोलीस कर्मचारी शासकीय कामकाज करत असताना संशयास्पद आयशर टॅम्पो (क्र. एमएच 16 सीडी 2395) आढळून आला. तपासणी केली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानव आरोग्यास घातक असलेला गोवा गुटखा मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जात असल्याचे उघड झाले. सदर वाहनातून 50 मोठ्या गोण्या गुटख्याच्या जप्त करण्यात आल्या. यासोबतच आयशर टॅम्पो, एक स्विफ्ट कार आणि तीन मोबाईल फोन असा एकूण 48,42,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी संजय सुभाष जगताप (रा. वानेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), सचिन परमेश्वर पवर (रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड), सतीश तुकाराम सोंडगे (रा. गवळवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि मिट्टू उर्फ इंद्रजितसिंग रणजितसिंग ठाकूर (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी वाहन कारवाईसाठी ताब्यात घेत असताना आरोपींनी गाडी अडवून “गाडी सोडून दे, नाहीतर तुला बघतो” अशी धमकी देत पोलिसांना शासकीय कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर काही इसमांनी आरोपींना चिथावणी देत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी फिर्यादी दत्तात्रय माणिकराव कुंभार (वय 41) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. 28 मार्च 2026 रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 132, 223, 274, 275, 123, 45, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 59 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलिसांकडून सुरू आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 6:11 pm

यात्रा काळात एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल येरमाळा, शिंगणापूर, तुळजापूर, पंढरपूर यात्रेसाठी 206 जादा बस

धाराशिव (प्रतिनिधी)- चैत्री यात्राकाळ लक्षात घेऊन धाराशिव विभागात राज्य परिवहन महामंडळाने व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी केली असून भाविकांच्या सोयीसाठी तब्बल 206 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आदेशान्वये विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे. येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेसाठी स्वतंत्र 151 जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये धाराशिव आगारातून 30, तुळजापूर 31, उमरगा 10, परंडा 20, भूम 30 आणि कळंब आगारातून 30 बसेसचा समावेश आहे. तसेच चैत्री पंढरपूर, शनि शिंगणापूर व तुळजापूर यात्रांसाठी स्वतंत्र 55 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. यात धाराशिव 10, तुळजापूर 12, उमरगा 5, कळंब 12, भूम 10 आणि परंडा 6 बसेसचा समावेश आहे. चैत्री पंढरपूर-शिंगणापूर यात्रा 27 मार्च 2026 ते 1 एप्रिल 2026 दरम्यान होणार असून तुळजापूर-येडेश्वरी येरमाळा यात्रा 1 एप्रिल ते 5 एप्रिल 2026 दरम्यान पार पडणार आहे. मुख्य दिवस 2 एप्रिल (पौर्णिमा) व 3 एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. यात्राकाळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन, अतिरिक्त फेऱ्या, चालक-वाहकांची उपलब्धता तसेच यांत्रिक तपासणी यावर विशेष भर देण्यात आला आहे. विभागीय वाहतूक अधिकारी व यांत्रिक विभाग यांच्यात समन्वय साधून सर्व बसेस सुरक्षित आणि वेळेवर धावतील याची दक्षता घेतली जात आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 6:11 pm

IPL 2026 –वानखेडेवर रंगणार MI vs KKR मध्ये थरार, हेड टू हेडमध्ये कोणता संघ पुढे?

आयपीएल 2026 च्या दुसऱ्या सामन्यात पाचवेळा विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स संघ आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर तीनवेळा चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला भिडणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. पहिल्या लढतीत विजय मिळवून अनेक वर्षांपासून सुरू झालेली पराभवाची परंपरा मोडण्याचा प्रयत्न मुंबईचा असेल तर कोलकात्याचा संघही विजयाने श्रीगणेशा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. वानखेडे […]

सामना 29 Mar 2026 6:00 pm

नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेची नोंद, नागरिकांमध्ये घबराट

नेपाळमध्ये भूकंपाचे सत्र सुरूच असून शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी मोजली गेली आहे. या धक्क्यांमुळे राजधानी काठमांडूसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडले. नेपाळच्या नॅशनल अर्थक्वेक मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूपासून सुमारे ८० किमी ईशान्येला असलेल्या सिंधुपालचोक जिल्ह्यातील नुल्थाला […]

सामना 29 Mar 2026 5:59 pm

सौरउर्जा प्रकल्पाचे काम तत्काल थांबवा

भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील गट नंबर 114 गायरान जमीन मागासवर्गीय लोक कसून उपजीविका भागवत असलेल्या जमीनीवर सुरु असलेले सौरउर्जा प्रकल्पाचे बेकायदेशीर काम सुरु करण्यात आले असुन सदरील अनाधिकृत पणे सुरू करण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी तहसील कार्यालयासमोर दि. 30 रोजी पासुन धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे प्रशासनास दिलेल्या निवेदनास असे म्हटले आहे की मौजे बन्हाणपुर, ता. भुम, जि. धाराशिव येथील सर्व्हे नं. 114 मधील क्षेत्र 13 हे. 89 आर इतकी जमीन ही गायरान (सार्वजनिक) जमीन आहे. सदर जमीन ही गावातील सर्व मागासवर्गीय अनुसूचित जाती मधील नागरीकांची सामोहिक मालमत्ता असुन अनेक वर्षापासुन गावातील शेतकरी पशुपालक तसेच मागासवर्गीय समाजातील कुटुंबिय आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती व जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर करीत आहे. मात्र सदर गायरान जमीनीवर सध्या सौरउर्जा प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करतांना गावातील नागरीकांची कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही. तसेच ग्रामसभेची अधिकृत परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे गावातील गरीब कुटुंबाच्या उपजिविकेवर मोठा परिणाम होत आहे. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 चे कलम 38,53,63 नुसार गायरान जमीन ही सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असते, अशा जमीनीचा वापर बदलण्यासाठी शासनाच्या अनेक विभागाच्या परवानग्या घ्याव्या लागतात व ग्रामसभेचा ठराव आवश्यक असतो. तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 नुसार गावातील सार्वजनिक मालमत्तेबाबत ग्रामसभेचा निर्णय बंधनकारक असतो. परंतू ग्रामसभा न घेता व ग्रामसभेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देता ग्रामसभा घेतल्याचे दर्शवून खोटया स्वाक्षऱ्या करून खोटे नाहरकत प्रमाणपत्र तयार केले आहे .त्याच प्रमाणे भारत सरकारच्या विविध शासन निर्णयानुसार गायरान जमीनीचा वापर करतांना गावातील पारंपारिक वापर, जनावरांची चाराई व गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह याचा विचार बंधनकारक आहे. आमच्या गावामध्ये जनावरे चारण्यासाठी अशा प्रकारची कुठलीही जमीन नाही. सदर सौरउर्जा प्रकल्पाचे काम सखोल चौकशी होईपर्यंत तात्काळ बंद करण्यात यावे. या संपुर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन जबाबदार अधिकारी व संबंधीत व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. गायरान जमीनीवरील मागासवर्गीय कुटुंबाचे पारंपारिक हक्क कायम ठेवण्यात यावे. एम.एस.ई. बी. या विभागाने खाजगी कंपनीला भाडेतत्वावर दिलेली गायरान जमीनीची चौकशी करण्यात यावी. यासाठी आधार बहुउद्देशीय संघटना व बऱ्हाणपूर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे प्रशासनास दिलेल्या निवेदनावर आधार बहुउद्देशीय सामाजिक संघटना संस्थापक अभिमान मिसाळ,मा. सरपंच शंकर मिसाळ, माजी ग्रा.प सदस्य नाथा मिसाळ, विलास मिसाळ सुर्यकांत मिसाळ, अशोक वारे, अकूंश मिसाळ, दिपक मिसाळ, सतिश मिसाळ, खंडू मिसाळ, अतुल मिसाळ, यांच्या सह नागरिकांनी मागणी केली आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:53 pm

विनोदी शैलीत समाजजीवनाचे कथकथनात चित्रण स्व. अजितदादा पवार साहित्यनगरी

धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात दुपारी कथाकथन सत्र पार पडले. कधी खुमासदार विनोदी शैलीत तर कधी समाजजीवनाचे विदारक चित्रण करणाऱ्या कथाकथनाने साहित्यप्रेमींना खिळवून ठेवले. डॉ. सत्यशिला तौर (जालना) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन सत्रात प्रा.सुरेश पाटील (अंबाजोगाई) व स्वाती कान्हेगावकर (नांदेड) यांचा सहभाग होता. मंचावर स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती. डॉ. सत्यशीला तौर यांनी वलांडा ही कथा सादर केली. समाजातल्या प्रथेमुळे कथेची नायिका सासुरवास आणि अंधश्रद्धेची बळी ठरते. पण शिकलेल्या गावातली मुलगी तिला भोंदू बाबाच्या फोलपणा बद्दल सांगते. तेव्हा तिला तिची चूक कळते. आणि अंधश्रद्धेचा विचार ओलांडून ध्रुपदा नवीन विचार स्वीकारते. अशी कथा सांगून समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार केला. प्रा. सुरेश पाटील यांनी, निरोप या कथेत गुरु-शिष्य यांचे नाते सांगणारी कथा, मित्रप्रेम आणि शिक्षणाचा संघर्ष मांडला. प्रा. स्वाती कान्हेगावकर यांनी शेवग्याच्या शेंगा या कथेतून ग्रामीण स्त्रीच्या कष्टाची, जिद्दीची आणि मुलांसाठी जीवाचे रान करणाऱ्या आईचे चित्रण मांडले. ही आई परिस्थिती पुढे झुकत नाही. मुलाला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करूनही नियती मुलाला हिरवते. पण शेवग्याच्या झाडात आपल्या मुलाला पाहत झाडाचे संगोपन करते. असा कथेचा आश्य होता. कथाकथन सत्राचे सुत्रसंचालन अविनाश ताटे यांनी केले. तर आभारप्रदर्शन बालाजी तांबे यांनी केले.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:53 pm

मंदिर परिसरात चोरीचा प्रयत्न उधळला; महिला रंगेहात पकडली

तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सतर्क सुरक्षा यंत्रणेच्या दक्षतेमुळे चोरीचा प्रयत्न आज उधळण्यात आला. निंबाळकर दरवाजा ते राजे शहाजी महाद्वार परिसरातील पाटीलवाडा येथे घडलेल्या या घटनेत एका महिलेला रंगेहात पकडण्यात आले आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथील सुरेखा वाडकर या महिला भाविकांची पर्स व दागिने चोरी करण्याचा प्रयत्न सरोज पवार या महिलेकडून करण्यात येत होता. यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक प्रतीक धनके आणि लहू बोंदर यांनी संशयास्पद हालचाली लक्षात घेत तत्काळ कारवाई करत संबंधित महिलेला रंगेहात पकडले. यानंतर पकडलेल्या महिलेला मंदिर पोलिस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर यांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिला तुळजापूर पोलिस स्टेशन येथे पाठविण्यात आले. या कारवाईदरम्यान सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार, प्रतीक दिवाणजी, सुरक्षा पर्यवेक्षक बिभीषण माने, योगेश फडके तसेच मंदिर संस्थानचे इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:52 pm

नवतेजस्विनी महोत्सवात महिला उद्योजकतेची झेप; दोन दिवसांत 7 लाखांहून अधिक विक्री

धाराशिव (प्रतिनिधी)- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त ‌‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प‌’ अंतर्गत उस्मानाबाद क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ येथे दि.27 ते 29 मार्च 2026 दरम्यान ‌‘नवतेजस्विनी महोत्सव‌’ उत्साहात सुरू आहे.या महोत्सवाचे उद्घाटन दि.27 मार्च रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात जिल्ह्यातील स्वयंसहाय्य महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री स्टॉल उभारण्यात आले असून एकूण 42 स्टॉल्सचा सहभाग आहे.गावरान तूप,अंडी,वर्मी कंपोस्ट खत, दुग्धजन्य पदार्थ,मसाले,पापड, कुरडई,शेवया,मनुके,शोभेच्या वस्तू, मूर्ती,फ्लॉवर पॉट,रेडीमेड कपडे, धान्य व कडधान्य अशा विविध उत्पादनांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी धाराशिवकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली. विशेषतः गावरान अंडी, साजूक तूप, काळा मसाला,जात्यावरच्या डाळी, विविध प्रकारच्या शेवया आणि इतर खाद्यपदार्थांना नागरिकांची मोठी पसंती मिळाली. या दोन दिवसांत सुमारे 7 लाख 12 हजार रुपयांची विक्री झाल्याने महिला बचतगटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे दिसून आले. हा महोत्सव महिला बचतगटांसाठी हक्काची बाजारपेठ ठरत असून, अशा प्रकारचे प्रदर्शन वर्षातून किमान दोन ते तीन वेळा आयोजित करावे, अशी मागणी स्टॉलधारक महिलांनी व्यक्त केली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक सबलीकरणाची संधी मिळत असून त्यांच्या उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळत आहे.दि. 29 मार्च 2026 रोजी या महोत्सवाचा समारोप होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून महिला बचतगटांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर (माविम) यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:52 pm

ग्रामीण जनतेसाठी सुलभ सेवा : ई-गव्हर्नन्समुळे धाराशिव प्रशासन अधिक गतिमान

धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे यश केवळ एक क्रमांक नसून,जिल्ह्यातील प्रशासनात विशेषतः महसूल विभागात झालेल्या डिजिटल परिवर्तनाचे द्योतक आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.महसूल विभाग हा थेट ग्रामीण नागरिकांशी निगडित असलेला अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे.जमीन नोंदी,शेत रस्ते,विविध प्रमाणपत्रे,तक्रारींचे निराकरण अशा अनेक बाबींमध्ये नागरिकांना या विभागाशी सतत संपर्क साधावा लागतो.अशा वेळी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवा सुलभ,जलद आणि पारदर्शक झाल्याने नागरिकांचा वेळ,श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचत आहे. धाराशिव जिल्ह्यात विकसित करण्यात आलेल्या ‌‘डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड‌’ प्रणालीमुळे विविध शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले आहे.यामुळे महसूल प्रशासनाला योजनांची अंमलबजावणी,प्रगती आणि पाठपुरावा अधिक प्रभावीपणे करता येत आहे.निर्णय प्रक्रियेला वेग मिळाल्याने नागरिकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना शक्य होत आहेत. ‌‘कल्पवृक्ष स्मार्ट जीआर‌’ प्रणाली ही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.शासन निर्णय, परिपत्रके आणि कायदे यांची अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने कामकाज अधिक अचूक आणि सुसंगत झाले आहे.यामुळे निर्णय घेताना होणाऱ्या त्रुटी कमी होऊन प्रशासनातील पारदर्शकता वाढली आहे. ग्रामीण भागाशी थेट संबंध असलेली ‌‘जीवनरेखा‌’ प्रणाली ही या डिजिटल परिवर्तनाची एक महत्त्वाची कडी ठरली आहे.शेत रस्त्यांची गट नंबर व सर्वे नंबरनिहाय नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे जलद निराकरण शक्य झाले आहे.यामुळे शेती उत्पादन,वाहतूक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.महसूल विभागाच्या कामकाजात यामुळे अधिक सुसूत्रता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. तसेच ‌‘तुळजाई चॅटबॉट‌’ या उपक्रमामुळे ग्रामीण नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती घरबसल्या मिळू लागली आहे.संजय गांधी योजना,पुरवठा विभाग, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या सेवांची माहिती काही क्षणांत मिळत असल्याने नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होत आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे ‌‘पेपरलेस कार्यालय‌’ संकल्पना प्रत्यक्षात येत असून फाइलांची हालचाल वेगवान झाली आहे. महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक,उत्तरदायी आणि वेळेत पूर्ण होऊ लागले आहे.यामुळे नागरिकांच्या कामांना विलंब न होता सेवा वितरण अधिक विश्वासार्ह बनले आहे. या सर्व उपक्रमांच्या यशामागे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनीही अत्याधुनिक तंत्रज्ञान,विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता चा वापर वाढवून प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांनी या डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे. एकूणच, ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनले आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ सेवा देण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असून,भविष्यातील सुशासनाचा मजबूत पाया म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:51 pm

गाव खेड्यातील झगमगाटामध्ये ग्रामीण जीवन बदलत गेले -प्रा.गंगाधरराव हिंगोले स्व. अजितदादा पवार साहित्यनगरी

धाराशिव (प्रतिनिधी)- गाव खेड्यातील झगमगाटामध्ये ग्रामीण जीवन बदलत गेले. शहरे वाढत गेली आणि गावे बकाल झाली असे मत सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.गंगाधरराव हिंगोले यांनी व्यक्त केले. शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात दुपारी बदलते ग्रामीण जीवन या विषयावर प्रा.हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला. यावेळी ते बोलत होते. परिसंवादात सुप्रसिद्ध वक्ते कमलाकर कांबळे प्रा.डॉ.कैलास इंगळे (छत्रपती संभाजीनगर) यांनी सहभाग नोंदवला. प्रा.हिंगोले म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासन मोठमोठ्या योजना राबवित आहे पण त्या गरजू पर्यंत पोहचत नाहीत. असेही त्यांनी सांगितले. परिसंवादात कमलाकर कांबळे यांनी ग्रामीण भागातील चित्र बदलत असल्याचे सांगून आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल फोन आणि दारात दुचाकी आल्या असल्याचे सांगितले. मराठवाडा मागास म्हणून ओळखला जात असला तरी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात प्रगत आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांनी लिहिते व्हावे. लोकांच्या हिताचे लेखन करावे, असेही त्यांनी सांगितले प्रा.डॉ.इंगळे यांनीही बदलत्या ग्रामीण जीवनशैलीवर भाष्य करताना पारंपरिक शेतीत आधुनिक तंत्रज्ञाना ने मोठा बदल झाला असल्याचे सांगून श्रेष्ठ नोकरी आणि कनिष्ठ शेती अशी विचारधारा ग्रामीण भागात वाढली असल्याचे सांगितले. परिसंवादाचे सुत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले. आभार राजकुमार मेंढेकर यांनी मानले.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:51 pm

इंदापूर येथील अजित पवार गटाच्या कार्यक्रमातील बॅनरवरून सुनेत्रा पवार, अजित पवारांसह पक्ष श्रेष्टींचे फोटो बेपत्ता

माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहोळा कार्यक्रम पार पडला. या कार्यालयातील बॅनरवरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यासह पक्ष श्रेष्ठीचे फोटो बेपत्ता असल्याचे पहावयास मिळाले. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघांतील इंदापुर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि […]

सामना 29 Mar 2026 5:45 pm

साक्षी बुरकुलेला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

पहिल्‍या खेलो इंडिया ट्रायबल स्‍पर्धेत यवतमाळच्‍या साक्षी बुरकुलेने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून दिवस गाजविला. वेटलिफ्टिंगच्‍या ८६ किलो गटात सर्वाधिक एकूण १५० किलो वजन पेलून साक्षी बुरकुलेने पर्दापणातच सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स २०२६ चा भाग म्हणून छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित महिलांच्या ८६ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. पंडित […]

सामना 29 Mar 2026 5:39 pm

War Crisis –पश्चिम आशियातील संकटाचा सामना करण्यासाठी, नागरी विमानन मंत्रालय सज्ज

पश्चिम आशियातील संघर्षाचा विमान कंपन्यांवरील परिणाम कमी करण्यासाठी नागरी विमानन मंत्रालय विविध पर्यायांचा शोध घेत आहे. यामध्ये जेट इंधनावरील कर कमी करण्याबाबत राज्य सरकारांशी चर्चा करण्याचाही समावेश आहे. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या आणि अमेरिका, इस्रायल व इराण यांचा समावेश असलेल्या पश्चिम आशियातील अशांततेमुळे, तेलाच्या वाढत्या किमती आणि हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे भारतीय विमान कंपन्यांचा परिचालन […]

सामना 29 Mar 2026 5:35 pm

भाजप सत्तेत आल्यास तुमचं मांसाहार करणंही बंद करेल; निवडणूक सभेत ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता धार चढली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. “जर भाजप सत्तेत आली, तर ते लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही बंधनं आणतील आणि तुम्हाला मांसाहार करण्यापासून रोखतील,” असा दावा ममता बॅनर्जी यांनी एका जाहीर सभेत केला आहे. उत्तर दिनाजपूर येथील चोप्रा येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना ममता […]

सामना 29 Mar 2026 5:34 pm

ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ मिळाले- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचा उदघाटन सोहळा उत्साहात स्व. अजितदादा पवार साहित्यनगरी

धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शिक्षक आमदार विक्रम काळे सातत्याने करत आहेत. त्यामुळे विक्रम काळे हे स्व. वसंतराव काळे यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने ते चालवीत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. धाराशिव तालुक्यातील पळसप येथे शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे उदघाटन रविवारी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.सुरेश सावंत, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, मसापचे संमेलनाध्यक्ष प्रा. फ.म. शहाजिंदे, स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, प्राचार्य अनिल काळे, अनुराधा काळे, शुभांगी काळे, व्यंकट बेद्रे, चंद्रकांत बिराजदार, हेमंत जाधव, दत्तात्रय पवार, रमेश बिराजदार, बी. एन. केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथदिंडीने साहित्यनगरी दुमदुमली. तर ग्रंथप्रदर्शनाला साहित्यरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याचे उद्घाटन डॉ. घ. ना. पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रप्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याचे उद्घाटन साहित्यिक राजेंद्र अत्रे यांच्या हस्ते रसिकांची पावले थबकली. मातृभाषा हीच ज्ञान भाषा झाली पाहिजे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी, स्व. आमदार वसंतराव काळे यांनी जीवन मूल्यांची शिकवण दिली असल्याचे सांगून मराठवाड्यात त्यांनी विचारांचे जाळे निर्माण केले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी, संमेलन आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात, संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत म्हणाले की, बॅरिस्टर सावरकर यांनी 1938 साली साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून मातृभाषा हीच ज्ञान भाषा झाली पाहिजे असा आग्रह धरला होता असे सांगितले. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी तर आभारप्रदर्शन बालाजी इतबारे यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत लिखित अनुभवाचे बोल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास मराठवाड्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह साहित्यिक, कवी, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:21 pm

भर पावसात जम्मूच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅराथॉनला उदंड प्रतिसाद, मुख्यमंत्री झाले धावपटूंमध्ये सहभागी

जम्मूमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनने शनिवारी शहराला एक नवीन ओळख देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या ऐतिहासिक मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला आणि स्वतः सहभागी होऊन लोकांचा उत्साह वाढवला. मॅरेथॉनला मौलाना आझाद स्टेडियममधून सुरुवात झाली, जिथे सकाळपासूनच धावपटूंचा उत्साह स्पष्टपणे दिसत होता. या कार्यक्रमात केवळ जम्मू आणि काश्मीरमधीलच नव्हे, तर देशभरातील […]

सामना 29 Mar 2026 5:20 pm