मुंबई विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगो विमानाचे पंख एकमेकांना घासले, मोठा अपघात टळला
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. धावपट्टीवर टॅक्सींग दरम्यान एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना घासले. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही आणि दोन्ही विमानांमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान (फ्लाइट AI 2732) मुंबईहून कोईम्बतूरला जाण्यासाठी उड्डाणाच्या तयारीत होते आणि […]
अजितदादांच्या अस्थींचे पंढरपुरातील चंद्रभागा नदीत विसर्जन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. या दुखद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहेत. मंगळवारी अजितदादांच्या अस्थी पंढरपुर येथे आणण्यात आल्या होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर रथामध्ये अस्थी कलश व अजितदादांचा फोटो ठेवून बाल वारकऱ्यांसह नेते मंडळी समवेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते […]
बारामती येथील विमानत अपघातात मृत्युमुखी पडलेलेल्या फ्लाईट अटेन्डेंट पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पिंकीच्या कुटुबिंयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले व या कठीण प्रसंगी शिवसेना त्यांच्या समवेत ठामपणे उभी आहे, असा विश्वास त्यांना दिला. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी […]
L&T Mumbai Open 2026 –दर्जा सेमेनिस्तजा, लानलाना तारारुडी, हॅनी वंदीविकल यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५ के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत एकेरीत दर्जा सेमेनिस्तजा, लानलाना तारारुडी, हॅनी वंदीविकल, इरी शिमिजू, लिली टाग्गीर, फेंग्रान तियान यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. हिंदुस्थानच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती, सहजा यमलापल्ली, वैष्णवी आडकर, माया […]
डीडब्ल्यूजे कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संचालक संकेश घाग याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. मात्र या आरोपीला पोलिसांनी व्हिआयपी ट्रिटमेंटमध्ये चिपळूण शहरातील प्रसिद्ध अशा हॉटेलमध्ये जेवायले नेले. पोलीस आरोपीच्या बाजूला बसून जेवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावरून सर्वसामान्यांना लाठी आणि आरोपीला मटणाची वाटी असं चित्र पहायला मिळत आहे. […]
Video आदित्य ठाकरे यांनी घेतली पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट
बारामती येथील विमानत अपघातात मृत्युमुखी पडलेलेल्या फ्लाईट अटेन्डेंट पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पिंकीच्या कुटुबिंयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले व या कठीण प्रसंगी शिवसेना त्यांच्या समवेत ठामपणे उभी आहे, असा विश्वास त्यांना दिला. आदित्य ठाकरे यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची […]
हिंसाचाराच्या छायेत असलेल्या आणि राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या मणिपूर राज्याला अखेर नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. मणिपूरमध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली होती, ज्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता साधारण एका वर्षानंतर राज्यात पुन्हा सरकार स्थापन […]
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांना रोखण्यात आले. यावरून संसदेत गदारोळ झाला. सरकार विरोधी पक्षांचे ऐकत नाही, विरोधी पक्षांना बोलण्यास देत नाही, याचा विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच राहुल गांधी याबाबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहिले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी […]
Solapur News : सिद्धेश्वर तलावात अभियांत्रिकी विद्यार्थी बुडून मृत्युमुखी ; १८ तासांनी सापडला मृतदेह
फलटण तालुक्यातील तरुणाचा तलावात बुडून मृत्यू सोलापूर : सिद्धेश्वर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणाचा रविवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. तब्बल १८ तासांनंतर सोमवारी सकाळी दहा वाजता सुरंजन शेंडगे याचा मृतदेह पाण्यात मिळून आला. सुरंजनच्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न [...]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवत, राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठी अनियमितता असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दावा केला की, पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेअंतर्गत जाणीवपूर्वक जिवंत नागरिकांना कागदोपत्री मृत दाखवून त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जात आहेत. ममता बॅनर्जी यांनी या […]
Pandharpur News : पंढरपुरात शहर पोलिसांची 105 वाहनांवर कारवाई : 57हजारांचा दंड वसूल
पंढरपूर पोलिसांची विशेष वाहतूक मोहीम पंढरपूर : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पंढरपूर शहर पोलिसांनी रविवारी विशेष मोहीम राबवली. यामध्ये १०५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून ५७ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ [...]
वाटद जिल्हापरिषद गटात शेतकऱ्यांवर लादण्यात येणारी एमआयडीसी, जिंदाल कंपनीकडून होणारे प्रदूषण, जिंदाल कंपनीला जमिनी देऊनही गावात बेरोजगारी वाढली, जयगड बंदराचा विकास, संकटात सापडलेली मच्छिमारी, बंदारावरील अस्वच्छता, जयगड परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न आणि खराब रस्ते या विषयांना सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात चांगलीच फोडणी दिल्याने परिसरात वातावरण तापले आहे. जनतेला आता मूलभूत […]
Solapur News : अजित दादांचा अस्थिकलश पाहताच फुटला अश्रूचा बांध
अजितदादा पवार यांना सोलापूरकरांची श्रद्धांजली सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजितदादांच्या अस्थिकलस सोमवारी दुपारी जुनी मिल येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आणण्यात आला. यावेळी अस्थि दर्शनासाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती. [...]
Sangli Crime: चिखलगोठण येथील दोन कुटुंबात मारामारी, 2 जखमी
चिखलगोठण मारामारी प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा तासगाव : तासगांव तालुक्यातील चिखलगोठण येथे झालेली भांडणे मिटवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या मारामारीत दोघे जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील सातजणा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी उज्वला हणमंत पवार रा. चिखलगौठण यांनी हणमंत हरीभाऊ पवार रा. [...]
Sangli News : कृष्णा कॅनॉलजवळ टेम्पोची धडक, ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
पलूस-आमणापूर रस्त्यावर दुर्दैवी अपघात पलूस : पलूस-आमणापूर रस्त्यावर कृष्णा कॅनॉलजवळ भरधाव दूध वाहतूक करणाऱ्या चारचाकी टेम्पोच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पलूस [...]
Sangli News : सांगलीत देवगड हापूसची धडाकेबाज एन्ट्री ; डझनाला ६,१०० रुपयांचा विक्रमी भाव
सांगलीत देवगड हापूस आंबा दाखल सांगली : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा देवगड हापूस आंबा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सांगलीत दाखल झाला असून पहिल्याच सौद्यात विक्रमी दर मिळाल्याने आंबा व्यापारी व ग्राहकांमध्ये [...]
गद्दारांना धडा शिकवा आणि राजापूरात भगवा फडकवा, शिवसेना नेते विनायक राऊत यांचे आवाहन
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि राजापूर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवा आणि गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी केले.राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारात ते सहभागी झाले होते. आज राजापूर तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जूवाटी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दिनेश जैतापकर जूवाटी पंचायत समिती गणाचे […]
Sangli News : शेतकऱ्याचा वीज शॉकने मृत्यू, कंत्राटी कर्मचारी व अभियंत्यावर गुन्हा
कंठी येथे ब्री फेज कनेक्शनमुळे शेतकऱ्याचा मृत्यू जत : जत तालुक्यातील कंठी येथे शेतात पहलेल्या ब्री फेज कनेक्शनच्या विद्युत वाहक तारेला स्पर्श होवून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी जत येथील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यासह, कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या [...]
ये नया हिंदुस्थान है! ये घर में घुसेगा भी और मारेगा भी! धुरंदर 2 चा जबरदस्त टीझर प्रदर्शित
रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या धुरंदर या सिनेमाने जगभरात खळबळ माजवली होती. सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग मार्च महिन्यात येणार असल्याचे त्याच वेळी चित्रपटाच्या शेवटी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे चाहते आतुरतेने दुसऱ्या भागाची वाट पाहत होते. अखेर आज प्रेक्षकांना आज दुसऱ्या भागाची झलक पाहायला मिळाली. आज धुरंदरच्या दुसऱ्या भागाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला […]
Kolhapur News : ‘चांगभलं’च्या जयघोषात काळभैरीची पालखी डोंगरावर
लाखो भाविकांच्या उपस्थितीत काळभैरी पालखी मिरवणूक गडहिंग्लज : लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असणाऱ्या काळभैरीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात शाली, पैरीच्या नावानं चांगभलं असे म्हणत पी दयाकच्या गजरात गुलालाची उथळण करत ग्रामदैवत काळभैरीची पालखी सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येवून डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. [...]
Kolhapur News : निपाणी-मुरगूड मार्गावर दुचाकी ट्रॅक्टरला धडक, तरुण ठार
निपाणी येथे दुचाकी अपघात, मित्र गंभीर जखमी निपाणी : निपाणी-मुरगूड मार्गावर हॉटेल आस्वाद समोर चाललेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसल्याने अर्जुनी ता. कागल येथील तरुण जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. प्रकाश सदाशिव मिसाळ (वय [...]
IND Vs PAK –पाकिस्तानची पुढची पिढी बरबाद होईल…कपिल देव यांनी मोहसीन नक्वींना फटकारलं
टी20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. 15 फेब्रुवारीला सामना होणार होता. मात्र, पाकिस्तान सरकारने हिंदुस्थानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने क्रिकेट जगतातलं वातावरण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. हिंदुस्थानचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही पाकिस्तान सरकारल खडे बोल सुनावत सावधगिरीचा इशारा दिला आहे. माध्यम प्रतिनीधींशी बोलताना कपिल देव यांनी पाकिस्तान […]
भाजप मोठ्या प्रमाणात SIR मध्ये फेरफार करण्याची तयारी करत आहे –अखिलेश यादव
एसआयआर प्रक्रियेवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप मोठ्या प्रमाणात एसआयआरमध्ये फेरफार करण्याची तयारी करत आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे एका कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत. अखिलेश यादव म्हणाले आहेत की, “राज्यभरातून फॉर्म ७ बाबतचे अहवाल येत आहेत आणि […]
कणकवलीत वीजपुरवठा खंडित; संतप्त व्यापाऱ्यांची वीज उपकेंद्रावर धडक
महावितरणच्या शहरातील वीज उपकेंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला होता. मात्र, जाहीर वेळ संपल्यानंतरही वीजपुरवठा सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. अखेर संतप्त व्यापाऱ्यांनी थेट महावितरणच्या वीज उपकेंद्रावर धडक देत उपकार्यकारी अभियंता संदीप पाटील व सहाय्यक अभियंता ओंकार स्वामी यांना जाब विचारला. शहरातील वीजपुरवठा सोमवारी […]
Kolhapur News : कर सल्लागाराकडून ५८ लाखांची फसवणूक ; जीएसटी नंबरवर जादा खरेदी दाखवून गंडा
कागलमध्ये कर सल्लागारावर ५८ लाखांची फसवणूक प्रकरण कागल : इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाच्या जीएसटी नंबरचा वापर करून कर सल्लागाराने व्यावसायिकाची ५८ लाख ८१ हजार रुपयाची फसवणूक केली. शैलेश सुभाष जाधव (वय ३७ रा. नंगीवली चौक, मंगळवार पेठ) यानी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात [...]
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून (India-US Trade Deal) आता देशातील राजकारण तापू लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या कराराच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “सरकारने या कराराबाबत देशासमोर स्पष्टीकरण द्यावे. तसेच एक अधिकृत पत्रकार परिषद घ्यावी आणि ठरवलेले (Curated) प्रश्न न घेता […]
Ratnagiri News : लोकआग्रहास्तव जुवाठी गणातून प्रकाश भिवंदे निवडणूकीच्या रिंगणात
जुवाठी पांयत समितीमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राजापूर : गेली 25 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात काम करताना जनतेला बरोबर घेऊन पांयत समिती गणात अनेक विकास कामे मार्गी लावणारे भाजपो निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश भिवंदे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव [...]
उद्योजक प्रकाश गायकवाड यांना पितृशोक
देवगड / प्रतिनिधी देवगड येथील सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश गायकवाड यांचे वडील वेताळराव यशवंत गायकवाड (८०) यांचे मंगळवारी सकाळी सोलापूर- अकलुज बागेचीवाडी येथील मूळ निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.’आण्णा’ या नावाने ते सुपरिचित होते. ते प्रगतशील शेतकरी होते. पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकारी गीता गायकवाड यांचे ते [...]
नवी मुंबई विमानतळाला नरेंद्र मोदींचे नाव देऊनच दाखवा, हर्षवर्धन सपकाळ यांचे भाजपला आव्हान
हा देश मुठभर लोकांचा किंवा उद्योगपतींचा नाही तर सर्वसामान्यांचा आहे पण भूमिपुत्रांचा गळा आवळण्यासाठी भांडवलदार आसुसलेले आहेत, दोन गुजराती विकत आहेत तर दोन खरेदी करत आहेत असे चित्र देशात आहे. आता तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली भांडवलदार रायगडच्या उंबरठ्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेची ही निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आहे, आपली परंपरा कायम राखण्यासाठी एकसंध रहा आणि काँग्रेस मविआच्या […]
Kolhapur News : कोल्हापूर सर्किट बेंचचा विस्तार; लवकरच नवीन डिव्हिजन आणि सिंगल बेंच सुरू होणार
न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये यांनी तिसऱ्या सिंगल बेंचचा कार्यभार स्वीकारला कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये तिसरे सिंगल बेंच सोमवारपासून (दि. २) सुरू झाले. तिसऱ्या सिंगल बेंचचा न्यायमूर्ती म्हणून एम. एम. साठ्ये यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. दरम्यान, लवकरच आणखी एक डिव्हिजन बेंच [...]
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून (Trade Deal) शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. हा करार म्हणजे हिंदुस्थानातील ७० टक्के लोकसंख्येवर झालेला सर्वात मोठा प्रहार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या करारामुळे हिंदुस्थानी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होईल, अशी भीती टिकैत यांनी व्यक्त केली. X […]
विरोधी पक्षांना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत अध्यक्षांवर कागदपत्रे फेकली. कागदपत्रे फेकणाऱ्या काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदारासह आठ विरोधी खासदारांचे पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या निलंबनाबाबत संताप […]
मंत्री बावनकुळे यांनी अर्थसंकल्पातील शेतकरी, महिला व गावासाठी मांडले मुद्दे
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील ईट, येनेगुर, आपसिंगा व ढोकी येथे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार बसवराज पाटील, संघटन मंत्री संजय कौडगे, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या समवेत उपस्थित होतो. या जाहीर सभांमध्ये बावनकुळे यांनी राज्यातील महायुती सरकारने आमलात आणलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत उपस्थितांना संबोधित केले. विशेषतः मुख्यमंत्री सौर वहिनी योजना माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प, तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना ही सरकारची सामाजिक बांधिलकी दर्शवणारी योजना असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. यासोबतच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामधून शेतकरी, महिला, युवक, लघुउद्योग व पायाभूत सुविधांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी या देशाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक मजबूत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांच्या समवेत केलेल्या प्रवासादरम्यान धाराशिव जिल्ह्यातील निवडणूक प्रचाराची सद्यस्थिती, संघटनात्मक ताकद व कार्यकर्त्यांचा उत्साह याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील प्रत्येक गट व गणामध्ये महायुतीला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता मोठ्या बहुमताने जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार असल्याची ठाम ग्वाही यावेळी त्यांना दिली. महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने दाखवलेला विश्वास हा आगामी निवडणुकीत निर्णायक विजयात परिवर्तित होईल, यात कोणतीही शंका नाही. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य, अनिल काळे तसेच जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला भगिनी आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान
मुरूम (प्रतिनिधी)- राज्यांतील गुणी, कर्तव्यनिष्ठ व समाजाभिमुख शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सन्मान शिर्डी येथे रविवार (ता. 1) रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्षक हे समाजाची भावी पिढी घडविणारे खरे शिल्पकार असून, त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव व्हावा, या उद्देशाने बी दि चेंज फाउंडेशनतर्फे दरवर्षी या राज्य स्तरावरील पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यावेळी कर्नल सुनील राजदेव, माजी सैनिक अधिकारी अरुण भंडारे, अभिनेत्री सौ. निवेदिता पगार, क्विरिप्लायचे सीईओ ऋषिकेश खैरनार, एम्स अकॅडमीचे संचालक सुधाकर शृंगारे, अमृत रोहोम, संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे, विश्वस्त अभिषेक तुपे आदींच्या हस्ते डॉ. सुधीर पंचगल्ले यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला. मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील योगदानातून आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल राज्य आदर्श शिक्षक 2026 या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, नगर शिक्षण विकास मंडळ संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक डॉ. सतीश शेळके, माजी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. महेश मोटे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. शिवपुत्र कनाडे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन
वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित् वाशी व भूम तालुक्यातील विविध माध्यामिक व उच्च माध्यामिक विद्यालयात कर्मवीर मामासाहेबांचे विचार आजचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कळावेत म्हणून कर्मवीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्याचे सुरुवात अजिंक्य मा. व उच्च माध्यमिक शाळा वाशी येथून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक कदम यांच्या व्याख्यानाने झाली. याप्रसंगी संस्थापक व सेवा निवृत्त शिक्षक एस एल पवार अध्यक्षस्थानी होते. तर महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्य डॉ कदम सर यांनी मामांचे जीवन व त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकला. दुसरे पुष्प गुंफण्याचा योग प्रा शामसुं दर डोके यांना आला त्यांनी मौजे गिरवली ता भूम येथील लोकसेवा हायस्कूल मध्ये मामांचे विचार व त्यांचे विविध प्रसंग सांगून मामांचा संदेश विद्यार्थापर्यंत पोहोच विण्याचे काम केले याप्रसंगी संस्थापक व अध्यक्ष व्यंकटराव मोटे हे अध्यक्षस्थानी होते तर महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफण्याचे काम डॉ विश्वास चौधरी यांनी तेरखेडा येथील गणेश विद्यालयात केले तर अध्यक्षस्थानी कोकाटे सर उपमुख्याध्यापक होते तर वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते. व्याख्यानमालेचे चौथे पुष्प तेरखेडा येथील सुबोध विद्यालयात प्रा शामसुंदर डोके यांना गुंफण्याचा योग आला तर अध्यक्षस्थानी कुरवलकर सर होते. या उपक्रमासाठी प्राचार्य यांनी आठ टीम तयार केल्या आहेत.त्या टीम दोन्ही तालुक्यात जावून मामांचे विचार घेवून जाण्याचा संदेश दूत म्हणून काम करत आहेत .या उपक्रमाचे नियोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शामसुंदर डोके संयोजक म्हणून काम पहात आहेत.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीची राष्ट्रीय एकता शिबीरासाठी निवड
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अग्रमानांकित अशा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय घटना घडली आहे. महाविद्यालयाची रासेयो विभागाची स्वयंसेविका सावळे गौरी विजय बी.ए. प्रथम वर्ष हिची दि. 3 फेब्रुवारी 2026 ते 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित राष्ट्रीय एकता शिबिरासाठी निवड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातून झालेली ही निवड तरुणाईच्या सामाजिक जाणीवेला आणि राष्ट्रभक्तीच्या मूल्यांना अधोरेखित करणारी आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता समाजाशी नाते जोडतात. राष्ट्राची विविधता समजून घेतात आणि एकात्मतेचे मूल्य आत्मसात करतात. गौरी साळवे हिची निवड ही तिच्या कार्यतत्परतेची, नेतृत्वगुणांची आणि सामाजिक बांधिलकीची पावती मानली जात आहे. विविध राज्यांतील स्वयंसेवकांसोबत संवाद साधत देशाच्या सांस्कृतिक वैविध्यातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचा अनुभव घेण्याची संधी तिला या शिबिरातून मिळणार आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. संदीप देशमुख, सह. मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता साखरे, डॉ. स्वाती जाधव आणि डॉ. अवधूत नवले यांनी गौरी सावळे हिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. शीला स्वामी यांची सोलापूर विद्यापीठाच्या एनएसएस अभ्यास मंडळावर निवड
मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. शीला स्वामी यांची नुकतीच सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याचे पत्र विद्यापीठाकडून कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांच्याकडून प्राप्त झाले आहे. स्वामी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्तरावर विविध प्रकारच्या समित्या व उपक्रमांमध्ये उत्कृष्ट सहभाग नोंदवला आहे. त्यांनी जिल्हा समन्वयक, सल्लागार व एनएसएस कार्यक्रमाधिकारी म्हणून सर्वोत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक डॉ. सतीश शेळके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुभाष हुलपल्ले आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील जनतेनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुरूम (प्रतिनिधी)- केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असे पर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. आत्ता सरकारने लखपती दीदी ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी तयार झाले असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प करावा. देशातील आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असून दिवसा आणि रात्री वीजपुरवठा करून शेती सुजलाम सुफलाम होणार असून ग्रामीण भागातील जनतेनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. उमरगा-लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ तालुक्यातील कोराळ मोड वर सोमवारी दि. 2 फेब्रुवारी रोजी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री बसवराज पाटील, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगावे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मुरूमचे नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, रामकृष्णपंत खरोसेखर, दिलीप भालेराव, संताजी चालुक्य, प्रकाश आष्टे, माधव पवार, रशीद शेख, कैलास शिंदे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन पनुरे, बलभीमराव पाटील आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या 55 योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या भागत येणार आहेत.जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ओबीसी, एस.सी., बंजारा, मराठा समाजाच्या कल्याणासाठी कमळा समोरील बटन दाबून विकासाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देशातील नरेंद्र मोदी सरकारने एक लाख कोटी रुपये महाराष्ट्र राज्याला देणार असून उमरगा तालुक्यातुन गेलेला राष्ट्रीय महामार्ग हाय स्पीड हायवेला जोडला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या नदी नाल्यातील वाहून जाणारे पाणी फिरवून आणून शेतकरी बांधवांना देणार आहोत. सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार असून, नव्याने स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवून ग्रामीण भागाचा कायापालट करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते शरण पाटील यांनी केले. त्यानीं महसूल विभागाच्या वतीने चालवलेल्या शेत रस्ते योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत झाली असल्याचे सांगितले. या वेळी माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले की, धाराशिव, लातूर हे दोन भावंडे आहेत. या जिल्ह्यात परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीचा अध्यक्ष बसवनार असून, पक्षाच्या आदेशानुसार शरण पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन सर्व सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असल्याचे ते म्हणाले. या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुती सरकार मोठ्या ताकदीने काम करीत असल्याचे सांगितले. राज्यात व केंद्रात मोठी विकासाची पर्वणी होत आहे. पायाभूत सुविधेसाठी बारा लाख कोटी निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 21 टीएमसी हक्काचे पाणी आणण्यासाठी महायुती सरकारने निर्णय घेतले. सात टीएमसीला मंजुरी मिळाली आहे. हे पाणी रामदऱ्यात येणार आहे. तिथून तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यात हे पाणी येणार आहे. तुळजापूर देवी मंदिर विकासासाठी दोन हजार कोटी मंजूर झाले आहेत. शिर्डीच्या धर्तीवर विकास होणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शौकत पटेल यांनी केले. सभेपुर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 61 रक्तदात्यांचे रक्तदान
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील गेल्या 25 वर्षापासून सर्वसामान्य ग्राहकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरतपणे अर्थसहाय्य व मनोबल देणारी पतसंस्था म्हणून अग्रेसर असणारी आणि गरजू रुग्णांसाठी ब्लड बँक म्हणून अशी वेगळी ओळख असणारी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने संस्थेच्यावतीने दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संस्थेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. संस्थेचे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे 25 वे वर्ष आहे. संस्थेने आजवर अनेक रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले आहे. आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये 61 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन नारायण नन्नवरे, व्हा.चेअरमन श्रीकांत भोजने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सज्जन जाधव, संचालक राजेंद्र माळी, संजय व्हटकर, श्रीकांत देशमाने, शिवाजी गायकवाड, संतोष इंगळे, रवींद्र ताटे यांच्यासह संस्थेचे सभासद खातेदार ठेवीदार बहुसंख्य संख्येने हजर होते. संस्थेने आजपर्यंत अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवून सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला आहे. यावेळी संस्थेच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. शिबिरास सोलापूर येथील मल्लिकार्जुन रक्तपेढीचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अभिजित म्हेत्रे, अश्विनी तांबे, सुनील शेरेकर, तानाजी फुलसुंदर, भागवत गुंड, जावेद शेख, श्रीनिवास मुळे, गणेश ठेले, आशिष भोजने, तुषार डोंगरे, अशपाक सय्यद, मधुकर साळवे, प्रवीण मोरे, सुरज जगताप यांनी परिश्रम घेतले.
तुळजापूर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न; 87 विषयांवर सखोल चर्चा
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगर परिषदेची नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह पहिली सर्वसाधारण सभा सोमवार दि. 2 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तब्बल तीन तास चाललेल्या या सभेत एकूण 87 विषयांवर चर्चा करण्यात आली. काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. तर उर्वरित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे ही पहिलीच सभा खेळीमेळीच्या व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. सभेत भवानी रोडवर दुचाकी वाहतूक बंद करून लोखंडी गेट स्थलांतर, कुंभारवाडा येथील भवानी तीर्थकुंड परिसरात गाळे विकसित करणे, नळदुर्ग रोड पाईपलाईन लिलाव प्रक्रिया, नळदुर्ग रोडवरील न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बसवणे, मंगळवार पेठेतील खंडोबा मंदिरासमोरील खोली जागेत गाळे उभारणे, पांडुरंग नगर व गवते प्लॉटिंगमध्ये खोली जागा विकसित करणे, तुळजापूर खुर्द येथे सार्वजनिक शौचालय बांधणे, भवानी रोडवरील नाल्यांची दुरुस्ती व नवीन नाली बांधकाम, कचरा डेपो स्थलांतर या मुद्द्यांवर चर्चा झाली. याशिवाय छत्रपती शिवाजी चौक ते दीपक चौक (घाटशिर रोड) वाहनतळ प्रवेश व पोलीस संकुल ते शिवाजी चौक वाहने बाहेर काढणे अशी वाहतूक व्यवस्था करणे, श्री तुळजाभवानी मंदिरासमोर आरो प्लांट उभारून उत्पन्नवाढ, मंगळवार पेठ रस्ता रुंदीकरण, प्रभाग क्र. 11 मधील जुन्या व्यायामशाळेचे नूतनीकरण, मुख्याधिकारी कक्ष नूतनीकरण, घाटशिळ रोड स्मशानभूमी येथे संरक्षण भिंत व पाणी टाकी, छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण आदी विषयांचा समावेश होता. नगरपरिषदेच्या मालमत्तांचे चतुर्थ वार्षिक फेरमूल्यांकन करून कर आकारणी, नगररचना अधिनियम 1966 नुसार आरक्षण भूसंपादन, बांधकाम परवाना सुरक्षा अनामत रक्कम वाढ, गुंठेवारी मुदतवाढ, मोकाट जनावरे, श्वान व वराह पकडून निर्बिजीकरण व लसीकरण यावरही चर्चा झाली. या सभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सूचना मांडल्या. गाळ्यांवरील फिक्स डिपॉझिट कायम ठेवणे, शहरातील आरक्षित जागांची मोजणी करून नोंद घेणे अशा सूचना करण्यात आल्या. सभेचे कामकाज सभा अधीक्षक प्रफुल्लता बरूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिले.
केंद्र व राज्य सरकारच्या योजना जि. प. माध्यमातून ग्रामीण भागात येणार- महसूलमंत्री बावनकुळे
भूम (प्रतिनिधी)- राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेपर्यंत, विशेषतः समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प असून, 2047 पर्यंत धाराशिव जिल्हा विकसित जिल्हा म्हणून नावारूपाला येणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर ईट सर्कलसह परिसराचाही सर्वांगीण विकास केला जाईल, असे आश्वासन त्यांनी ईट येथे झालेल्या भाजपच्या भव्य प्रचारसभेत दिले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने लखपती दीदी योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना पाच लाख रुपयांपर्यंत कोणताही व्यवसाय किंवा रोजगार सुरू करण्यासाठी बिनव्याजी अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 55 योजना, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 44 योजना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते विकास योजना आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासकामे म्हणजे विकासाची “चार चाकी गाडी” असून ती वेगाने पुढे जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. भूम तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी एकूण तीन तर पंचायत समितीसाठी सहा उमेदवार रिंगणात असल्याचे सांगण्यात आले. इट जिल्हा परिषद गटातून वर्षा गीते, सुक्ता सर्कलमधून धनश्री हापटे आणि पाथरूड गटातून सिताराम वनवे हे उमेदवार विकासाची सुसाट गाडी असल्याचे सांगत, पंचायत समितीचे विजयी उमेदवार हे या गाडीचे “पॅसेंजर” असतील, असे वक्तव्य करण्यात आले. इट, सुक्ता व पाथरूड परिसराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल, असे आश्वासनही मंत्री महोदयांनी दिले. मात्र, याचवेळी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत असल्याचे चित्र सभेनंतर चर्चेत आले आहे. भूम तालुक्यात एकूण पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गण असताना मंत्री महोदयांच्या भाषणात फक्त तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणनांचाच उल्लेख व विकासाचा शब्द देण्यात आला. उर्वरित वालवड, माणकेश्वरसह इतर गट व गणांच्या विकासाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उरलेले गट व गण वाऱ्यावर सोडायचे का, अशी भावना काही कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. याशिवाय, ज्या तीन जिल्हा परिषद गटांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, त्यापैकी दोन उमेदवार आयत्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करून थेट तिकीटधारक झाले आहेत. त्या त्या गटांतील जुने, निष्ठावंत व वरिष्ठ भाजप कार्यकर्ते यांना विश्वासात न घेतल्याची नाराजी दबक्या आवाजात व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर इट येथे भव्य सभा आयोजित करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सभेसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे राज्य भाजपा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब शिरसागर भूम तालुका अधक्ष संतोष सुपेकर संजय कोडगे समरजीतसिंग ठाकूर जाहीर चौधरी ज्ञानेश्वर गीते पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूम शहर सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी यशवंत थोरात यांची निवड
भूम (प्रतिनिधी)- भूम शहर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2026 च्या अध्यक्षपदी नगरसेवक यशवंत थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शिवजयंती महोत्सवाच्या कमिटी निवडीसाठी नुकतीच कल्याण स्वामी मठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश मस्कर, नगरसेवक रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, सत्येंद्र मस्कर, नगरसेवक रामराजे कुंभार, अजय मस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कमिटीचे निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी रामराजे कुंभार, अजय बाबुराव शेंडगे, खजिनदार निलेश भोळे, पांडू हूरकुडे, सचिन भोळे, सचिव पदी ऋतिक वीर, बालाजी गाडे, अमित मस्कर, प्रवीण शेंडगे, सहसचिव पदी अनिकेत ठाकरे, शंकर शेंडगे, वैभव भोळे, राहुल पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच मिरवणूक प्रतिनिधी म्हणून प्रतीक मस्कर, आदित्य भोळे, राहुल शेळके, राहुल भोळे, राहुल शेंडगे, दिनेश मस्कर, कृष्णा गुळमे, सिद्धार्थ गाडे, रोहित खोसे, अक्षय डीसले, अश्वजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी युवक व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Ratnagiri News : मतदारांकडून मिळतोय विजयाचा विश्वास –दिनेश जैतापकर
दिनेश शांताराम जैतापकर जुवाठी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेतून निवडणूक लढवणार राजापूर : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे तत्व नजरेसमोर ठेवून जनसामान्यांच्या सेवेसाठी आणि या विभागाच्या विकासासाठी जुवाठी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपण निवडणूक लढवित असल्याचे उमेदवार दिनेश शांताराम [...]
युरोप कृषी अभ्यास दौऱ्यासाठी पत्रकार रणदिवे यांची निवड
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने युरोपमधील कृषी अभ्यास दौऱ्यासाठी पत्रकार धनंजय रणदिवे यांची निवड झाली आहे. 16 फेब्रुवारी रोजी कृषी अभ्यासकांची टीम युरोपला रवाना होणार आहे. कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून या संदर्भात माहिती दिली आहे. यावर्षी युरोप मधील कृषी अभ्यास दौऱ्यात फ्रान्स, जर्मनी, स्वीर्झलँड, नेदरलँड आदी देशातील अत्याधुनिक शेती, नविन तंत्रज्ञान, याद्वारे केली जाणारी शेती याची माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये धान्य पीक शेती, आधुनिक दुग्धशाळा, स्थानिक तज्ञांशी चर्चा, द्राक्ष बाग, वाईन प्रक्रीया पाहणी, बागायती संशोधन केंद्र पाहणी, दूध प्रक्रिया संस्थांना भेटी, पर्वतीय दुग्धशाळा भेटी, चराई पद्धत, उंच प्रदेशातील पशूपालन, चीज प्रक्रिया केंद्र पाहणी, होहेनहाइम विद्यापीठ संधोधन केंद्र भेट (जर्मनी), दुग्ध संशोधन शेत व पारंपारिक दुग्धशाळा भेट, आल्समीट फूल बाजार, आधुनिक हरितगृह, मत्स्यपालन प्रकल्प पाहणी, बागायती इनोन्हेशन सेंटर आदींची पाहणी राहणार आहे. युरोप दौरा 16 ते 27 फेब्रुवारी असा 12 दिवसांचा राहणार आहे.या निवडीबद्दल रणदिवे यांचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, कृषी सह संचालक पूनम खटावकर, जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे, उपाधीक्षक आसलकर आदींनी कौतुक केले आहे.
मतदान व मतमोजणीदरम्यान जिल्ह्यात कलम 163 लागू
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक च्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,या दृष्टीने जिल्ह्यात मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार जिल्ह्यात दि.7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान व दि.9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,2023 चे कलम 163 अन्वये आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, उमेदवारांचे मंडप,सर्व दुकाने,मोबाईल, कॉर्डलेस फोन,पेजर,वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके,सर्व प्रकारचे फेरीवाले तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर खाजगी वाहनांना मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात नियुक्त अधिकारी व कर्मचारी वगळता पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध राहील. मात्र,मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार या आदेशातून वगळण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत व मतमोजणी केंद्राच्या 200 मीटरच्या आत संबंधित पक्षाच्या उमेदवारांचे निवडणूक चिन्हांचे प्रदर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी/ कर्मचारी तसेच मतदानासाठी आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणालाही वैध ओळखपत्राशिवाय प्रवेश करता येणार नाही. हा आदेश निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाहीत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने हे आदेश 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी व 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणीच्या दिवशी सकाळी 6 वाजेपासून मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमलात राहणार आहेत.
तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर, आज आपसिंगा (ता. तुळजापूर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस (आय) आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. विकासाचा ठोस लेखाजोखा सभेला संबोधित करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून परिसरात झालेल्या विकासकामांची माहिती जनतेसमोर मांडली. त्यांनी प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर प्रकाश टाकला: पायाभूत सुविधा: रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज प्रश्नांची केलेली सोडवणूक लोककल्याण: आरोग्य सुविधा, शिक्षण आणि ग्रामविकासासाठी राबवलेले प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मूलभूत सोयी आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम महिला सक्षमीकरण: ग्रामीण भागातील महिलांच्या उन्नतीसाठी घेतलेले ठोस निर्णय “आम्ही केवळ आश्वासनांचे राजकारण करत नाही, तर प्रत्यक्ष कामाच्या जोरावर मते मागत आहोत. आमचे उमेदवार निवडून आल्यावर जनतेच्या अडचणीच्या वेळी कायम उपलब्ध राहून सेवा करतील,“ असे ठाम प्रतिपादन खासदार निंबाळकर यांनी यावेळी केले. आघाडीचे अधिकृत उमेदवार या सभेच्या माध्यमातून सिंदफळ गट आणि गणांमधील उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला सौ. विश्रांती संजय शितोळे (अधिकृत उमेदवार, सिंदफळ जिल्हा परिषद गट)श्रीमती सविता अरविंद नवगिरे (अधिकृत उमेदवार, सिंदफळ पंचायत समिती गण) सौ. सोनाली यशपाल सिरसट (अधिकृत उमेदवार, आपसिंगा पंचायत समिती गण) ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांचे हक्क यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सदैव कटिबद्ध राहिला आहे. भविष्यातही न्याय आणि लोकहितासाठी हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी उमेदवारांनीही पारदर्शक कारभार आणि प्रामाणिक लोकसेवेची ग्वाही मतदारांना दिली.या सभेस शिवसैनिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंभारीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मांडला विकासाचा लेखाजोखा
तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस आय आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाली. या सभेमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विरोधकांचा समाचार घेतला आणि आघाडीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. विकासाचा ठोस रिपोर्ट कार्ड सादर सभेत बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या काही वर्षांत परिसरात झालेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रामुख्याने खालील पाणी व रस्ते: ग्रामीण भागातील रस्ते आणि पाणीपुरवठा योजनांचे सक्षमीकरण शिक्षण व आरोग्य: आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि दर्जेदार शिक्षण शेतकरी व युवा: शेतकऱ्यांसाठी मूलभूत सोयी-सुविधा आणि तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी राबवलेल्या योजना. “आम्ही केवळ पोकळ आश्वासने देत नाही, तर प्रत्यक्ष कामांचे राजकारण करतो. आजवर केलेल्या विकासाच्या जोरावरच आणि जनतेच्या विश्वासावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत,“ असे ठाम प्रतिपादन खासदार निंबाळकर यांनी यावेळी केले. उमेदवारांचा विजयी निर्धार या सभेचे आयोजन प्रामुख्याने खालील उमेदवारांच्या प्रचारार्थ करण्यात आले होते: सौ. रुपाली विजय डोंगरे सौ. सोनाली किरण डोंगरे सुरेश शिवाजीराव कोकरे या उमेदवारांनीही जनतेशी संवाद साधताना, निवडून आल्यानंतर प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार आणि लोकहितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. जनतेचा उदंड प्रतिसाद ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि युवकांचे भवितव्य यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. हीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या सभेस मोठ्या संख्येने शिवसैनिक, काँग्रेसचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. सभेतील जनसमुदाय पाहता कुंभारी परिसरात महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
हॉकी वर्ल्डकपही खेळला; आता T-20 World Cup मध्ये धमाका करण्यासाठी 42 वर्षीय खेळाडू सज्ज
ICC T20 World Cup 2026 सात फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व संघ सध्या कसून सराव करत आहेत. 20 संघ विजेतपेदासाठी एकमेकांना भिडणार आहेत. या 20 संघांमध्ये इटली हा एकमेव देश आहे, जो पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकपमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. इटलीचा समावेश ग्रुप सी मध्ये असून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सारखे तगडे संघ या […]
अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डीलवर स्वाक्षरी, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. “पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या प्रचंड दबावाखाली आहेत आणि याच दबावापोटी त्यांनी हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावर (US Trade Deal) स्वाक्षरी केली आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यादी लोकसभेत राहुल गांधी यांनी डोकलामचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्मण झालं. […]
Chiplun News : सावर्डे पंचायत समिती गणात शिवसेनेचे उमेदवार युवराज राजेशिर्के मैदानात
सावर्डे गणातील मतदारांपर्यंत पोहोचून युवराज राजेशिर्के यांचे प्रभावी प्रचार चिपळूण : सावर्डे पंचायत समिती गणातील निवडणूक लढत यावेळी अधिकच रंगतदार होत असताना शिवसेनेने अनुभवी आणि जनाधार असलेले नेतृत्व म्हणून युवराज राजेशिर्के यांना मैदानात उतरवले आहे. राजेशिर्के यांनी यापूर्वी पंचायत समिताच्या उपसभापतीपदी जबाबदारी यशस्वीपणे [...]
Ratnagiri News : खेर्डी पंचायत समिती गणात डोअर टू डोअर प्रचारातून उमेश खताते यांची आघाडी
खेर्डीत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रभावी प्रचार चिपळूण : ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उमेश खताते यांनी खेर्डी पंचायत समिती गणात राबवलेला डोअर टू डोअर प्रचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विकासाभिमुख विचार, सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवरील ठोस भूमिका यामुळे खताते यांना [...]
लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी डोकलामचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारची चांगलीच भंबेरी उडाली होती. त्यानंतर संसदेत मंगळवारीही गदारोळ सुरूच होता. विरोधी पक्षांना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत अध्यक्षांवर कागदपत्रे फेकली. कागदपत्रे फेकणाऱ्या काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदारासह आठ विरोधी खासदारांचे पूर्ण […]
Ratnagiri News : ग्रामीण विकासासाठी मैदानात उतरले अभिजीत गुरव, “सर्वांगिण विकास हा ध्यास”
धोपेश्वर पंचायत समिती गणातून अभिजीत गुरव यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास राजापूर : ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास हाच ध्यास घेऊन आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आलो आहोत. माझ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी आपण धोपेश्वर पंचायत [...]
Karad News : कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक
राज्याचे उपमुख्यमंत्री कराडमध्ये; स्व. यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली कराड : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी येथील प्रीतिसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. श्रीमती पवार यांच्या भेटीने भावनिक वातावरण निर्माण झाले होते. मदत व पुनर्वसन [...]
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामगिरीला मानाचा पुरस्कार सातारा : इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स आणि ई प्लस इंटेलेक्चुअल मीडिया ही एक नामांकित कंपनी असून त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या [...]
Satara News : सातारा शहरात शहापूर माध्यमातून सकाळचा पाणीपुरवठा बंद
शहापूर पाणी उपसा केंद्र बंद सातारा :सातारा शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी शहापूर माध्यमातील वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने शहापूर येथील पाणी उपसा केंद्र बंद होते. परिणामी शहापूर माध्यमातील पाणी साठवण टाकीस पुरेशी [...]
Ratnagiri News : पडवे जि.प. गटाचा विकास ठाकरे शिवसेना, महाविकास आघाडीच करु शकते : सचिन बाईत
२४ तास उपलब्ध उमेदवार म्हणून सचिन बाईतांची ओळख गुहागर :आमदार भास्कर जाधव यांच्यामार्फत रस्त्याची कामे मंजूर झाली त्यामधील ९० टक्केपेक्षा जास्त कामे पडवे जि. प. गटामध्ये पूर्णत्वास गेली आहेत. यामुळे या गटाचा विकास केवळ ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीच करू शकते, असे [...]
लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्याने गदारोळ; विरोधकांचा जोरदार गोंधळ, सभागृहाचे कामकाज तहकूब
लोकसभेत मंगळवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्यामुळे सभागृहात तीव्र गदारोळ झाला. पीठासीन अधिकारी कृष्णा प्रसाद तेन्नेटी यांनी राहुल गांधींना बोलण्याची संधी न देता पुढील वक्त्यांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली. यामुळे समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनीही भाषण करण्यास नकार दिला. विरोधी पक्षातील खासदार राहुल गांधींच्या समर्थनार्थ सभागृहाच्या वेलमध्ये […]
Ratnagiri News : केवळ युती सरकारच असगोली जि. प. गटाचा विकास करू शकते : संतोष जैतापकर
असगोली जि. प. गटाची निवडणूक हायव्होल्टेज गुहागर : असगोली जिल्हा परिषद गटातील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. अंजनवेल, वेलदूर, रानवी या गावाला आरजीपीपीएल कंपनीकडून मिळणारा करही थांबला आहे. यामुळे या गटाचा विकास रखडला असून केवळ युती सरकारच [...]
बारामती येथे 28 तारखेला झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर 29 तारखेला बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. मात्र, या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी सुमारे 20 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबई तकने याबाबत वृत्त दिले आहे. […]
Solapur News : वाळू तस्करी प्रकरणातील फरारी आरोपी अण्णा पाटील अखेर टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात
वाळू तस्कर व धोकादायक गुन्हेगारावर टेंभुर्णी पोलिसांची प्रभावी कारवाई टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शिराळ येथे राहणार अण्णासाहेब उर्फ अण्णा दिगंबर पाटील वय 34 वर्ष त्यांच्यावर वाळूचे संदर्भात दोन गुन्हे त्यामध्ये महसूल चे अधिकारी व कर्मचारी यांच्या वर हल्ला व खुणाचा [...]
पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शासन निर्णय जारी
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. अजित पवार यांचे बारामतीत एका विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही होते. त्यांच्या पश्चात ही […]
Solapur News : दक्षिण सोलापूर एनटीपीसी येथे सुजन संगम मेळावा उत्साहात
युवक, विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी एनटीपीसीचा सुजन संगम मेळावा दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी परिसरातील औष्णिक विद्युत प्रकल्प ( एनटीपीसी ) येथे सुजन संगम मेला उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी एनटीपीसीचे क्षेत्रीय कर्मचारी निदर्शक ई. सत्य फणी कुमार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परियोजना प्रमुख सोलापूर [...]
‘प्रायव्हसी’शी तडजोड नको; Meta आणि WhatsApp ला सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले
देशाचे सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत यांनी व्हॉट्सॲप आणि मेटा (Meta) च्या डेटा शेअरिंग धोरणावरून कंपन्यांना चांगलेच फटकारले आहे. युझर्सची प्रायव्हसी महत्त्वाची असून, त्यांच्या अधिकारांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यासंदर्भात न्यायालयाने दोन्ही कंपन्यांना एक लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रात “आम्ही युझर्सचा डेटा कोणात्याही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करणार […]
Gold Silver Rate –सोने चांदीतील मोठ्या घसरणीनंतर आता बुल रन सुरू? एका दिवसात किमतीत तुफानी वाढ
गेल्या पाच व्यापार दिवसांपासून सततच्या घसरणीनंतर आता सोने आणि चांदीच्या किमतीत एका दिवसात जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळे अखेर सोन्याचांदीच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. वायदे बाजार मंगळवारी सुरू होकाच चांदीच्या भाव २१,००० रुपयांपेक्षा जास्त वाढले. तर सोन्याच्या किमती ५,००० रुपयांनी वाढल्या. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण होत होती. परंतु मंगळवारी ही […]
‘भाजपने पुन्हा शेतकऱ्यांवर वार केला’, हिंदुस्थान–अमेरिका व्यापार करारावर अखिलेश यादवांचे गंभीर सवाल
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार करारावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया देत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या करारामुळे शेतकरी, शेती आणि सर्वसामान्य जनता मोठ्या संकटात सापडेल, असा आरोप त्यांनी केला. भाजपने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर वार केल्याचे अखिलेश यादव म्हणाले. अखिलेश यादव यांनी सांगितले की, भाजप सरकार कोणत्या दबावाखाली हे […]
Mira-Bhayandar Municipal Corporation –भाजपला मराठीच वावडं! मीरा-भाईंदरच्या महापौरपदी परप्रांतीयच
महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिक निवडणुकांची रणधुमाळी काही दिवसांपूर्वी पार पडली. “मराठी महापौर” या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेसह मीरा-भाईंदर महानगरपालिकेत धुमश्चक्री झालेली पाहायला मिळाली. परप्रांतीय महापौर नकोच, अशी मराठी एकीकरण समीतीची ठाम मागणी होती. मात्र, आता मराठी एकीकरण समीतीचा विरोध डावलून मराठी द्वेष्ट्या भाजपने मीरा-भाईंदर महानगरपालिकेत डिंपल मेहता यांना महापौरपदी बसवलं आहे. त्यामुळे मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली […]
मंदिरांवर घाला घालणाऱ्या चौकडीला अटक
गोकाक-सौंदत्तीतीलमंदिरेलक्ष्य: 9 लाखांचामुद्देमालहस्तगत: चारमंदिरेफोडल्याचीकबुली बेळगाव : जिल्ह्यातील मंदिरांना लक्ष्य बनविणाऱ्या एका चौकडीला कुलगोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 8 लाख 84 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोकाक व सौंदत्ती तालुक्यातील चार मंदिरे फोडल्याची कबुली या चौकडीने दिली आहे. बिराप्पा हणमंतप्पा कत्ती (वय 36), बसवराज भीमाप्पा तळवार (वय 35) दोघेही राहणार इटनाळ, [...]
अर्थसंकल्पीय अधिवेशन बेळगावात भरवा
सभापतीहोरट्टीयांचामुख्यमंत्र्यांनासल्ला बेळगाव : अर्थसंकल्पीय अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णविधानसौधमध्ये भरविण्याचा सल्ला विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सोमवारी एक पत्र पाठविले असून अर्थसंकल्पीय अधिवेशन बेळगावात भरविण्याचा ऐतिहासिक निर्णय का घेऊ नये? या माध्यमातून प्रादेशिक असमानता दूर करण्यासाठी का पुढाकार घेऊ नये? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सोमवारी सभापती होरट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना [...]
कॅम्प येथील पंधरा लाखांच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा
दोनमहिलांनाअटक, चोरीचामुद्देमालजप्त: दुसऱ्यामहिलेने2 लाख80 हजाररुपयाचेदागिन्यांवरउचललेहोतेकर्ज बेळगाव : खानापूर रोड, कॅम्प येथील एका शिक्षिकेच्या घरातील चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. घरकाम करणाऱ्या महिलेसह तिला मदत करणाऱ्या आणखी एका महिलेलाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 28 जानेवारी रोजी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर [...]
पुन्हा ट्रम्प यांची एक घोषणा अन् पडलेला रुपया वधारला; व्यापार कराराचे जगभरात परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा केली. त्याचे जगभरात परिणाम दिसून येत आहे. तसेच ट्रम्प यांच्या घोषणेनंतर रात्रीच गिफ्ट निफअटीमध्ये तब्बल एक हजार रुपयांची वाढ दिसून आली. तसेच मंगळवारी शेअर बाजार मजबूतीसह सुरू झाला आणि बाजारात तेजी दिसून आली. तसेच सोन्या-चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच अनेक महिन्यांपासून […]
डेहराडूनमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; तिघांचे मृतदेह सापडले, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू
उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. हिमाचल परिवहन मंडळाची प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीमध्ये कोसळली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिकविना वेतन कसे देता?
मनपा आरोग्य स्थायी समिती बैठकीत प्रश्न उपस्थित : विविध विषयांवर चर्चा, अनेक ठराव मंजूर, अधिकाऱ्यांना धारेवर धरून कडक शब्दात सूचना बेळगाव : स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन 7 महिन्यांपासून बायोमेट्रिकविना कोणत्या आधारे देत आहात. सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक का घेत नाही?. यापुढे सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी रजिस्टरद्वारे न घेता बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात यावी. शहर स्वच्छ [...]
उमेदवाराला बदनाम करण्यासाठी बेकायदा पिस्तूलचा खेळ
सांगलीयेथीलतरुणांचीकबुली: महाराष्ट्रजिल्हापरिषदनिवडणुकीचीपार्श्वभूमी बेळगाव : गेल्या आठवड्यात लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली येथील दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. मिरज तालुक्यातील युवक बेकायदा शस्त्र घेऊन बेळगावात कशासाठी आले होते? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी माळमारुती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एका [...]
रेल्वे अर्थसंकल्पामध्ये कर्नाटकासाठी भरीव तरतुदी
बेळगाव : रेल्वे अर्थसंकल्पामध्ये कर्नाटक राज्यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता 7748 कोटी रुपयांच्या तरतुदी करण्यात आल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात रेल्वेचा विकास होणार आहे. सध्या राज्यामध्ये अंदाजे 52 हजार 950 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी [...]
देशाच्या समृद्धीसाठी अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करा
रिअरअॅडमिरलविक्रममेननयांचेप्रतिपादन: व्हीटीयूचा25 वादीक्षांतसोहळा: एकूण8702 पदवीधरसन्मानित बेळगाव : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मनुष्याला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अभियंत्यांनी प्रयत्न करावेत. हवामान बदलापासून आरोग्य सुविधा सुधारण्यापर्यंत सर्वच ठिकाणी तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. त्यामुळे अभियांत्रिकी ज्ञानाचा योग्य वापर करून देशाची समृद्धी साधावी, असे विचार कर्नाटका नावल विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल विक्रम मेनन यांनी मांडले. विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी [...]
>> विजय जोशी निवडणुकीत सरपंच पदाच्या निकषासाठी अडसर ठरणाऱ्या तिसऱ्या अपत्यामुळे निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता पाहून बापानेच 6 वर्षाच्या मुलीचा खून केल्याचे समोर आले आहे. अंगात हैवान संचारलेल्या निर्दयी बापाने मुलीला तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरा जवळील कॅनॉलमध्ये फेकून खून केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर बोधन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून मुखेड तालुक्यातील केरूर […]
शिवप्रतिष्ठानतर्फे धारकऱ्यांसाठी भंडाऱ्याचे आयोजन
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने भंडारा म्हणजेच तुळजा भवानीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या लोहगड ते भीवगडमार्गे राजमाची व एकवीरा आई अशा मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या धारकऱ्यांच्यावतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले रोड येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ईश्वरपूर येथील शिवप्रतिष्ठानचे सरसेनापती अशोकराव वीरकर यांनी [...]
मध्य प्रदेशातील चित्रकूट आयएएस अधिकारी पुलकित गर्ग यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलीला, सिया हिला, सरकारी अंगणवाडी केंद्रात दाखल केले आहे. सरकारी शिक्षण व्यवस्थेबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशानेच हा निर्णय घेतल्याचे गर्ग यांनी स्पष्ट केले आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत पुलकित गर्ग म्हणाले की, “आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. सरकारी शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता सातत्याने […]
राज्यातील बालमृत्यू दरात लक्षणीय घट
गेल्या दहा वर्षांतील सर्वेक्षणानुसार 55 टक्क्यांनी घट : आरोग्य विभागाची उल्लेखनीय कामगिरी : बालकांची काळजी घेण्याच्या कालावधीत वाढ बेळगाव : राज्यात गेल्या दहा वर्षांत (2013 ते 2023) बालमृत्यू दरात तब्बल 55 टक्क्मयांनी घट झाली आहे. ही माहिती आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. 2013 साली राज्यातील बालमृत्यू दर प्रति हजार जन्मांमागे 31 इतका होता. तो 2023 [...]
व्हीबी-जी राम जी रद्द करून मनरेगा लागू करण्याची मागणी
बेळगाव : केंद्र सरकारने मनरेगा योजना रद्द करून त्याठिकाणी व्हीबी-जी राम जी योजना जारी केली आहे. या योजनेमुळे कामगारांवर अन्याय होणार असून, काम करणे मुश्कील बनणार आहे. तसेच ही योजना केंद्राच्या मर्जीप्रमाणे राबविण्यात येणार असून एकप्रकारे केंद्राचे गुलाम असल्यासारखे कामगारांना वागणूक मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने व्हीबी-जी राम जी योजना रद्द करून मनरेगा पूर्वीप्रमाणे जारी [...]
कणबर्गीतील जमीन वादासंबंधी पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : कणबर्गी येथील एका जमीन वादासंबंधी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. तेथील सात शेतकऱ्यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. कणबर्गी येथील 1 एकर 26 गुंठे व 39 गुंठे या दोन जमिनीसंबंधी न्यायालयाने तेरा जणांची नावे दाखल करण्यासंबंधी आदेश दिला आहे. मात्र, आपल्याला फसवून केवळ पाच [...]
हिंदुस्थान आणि अमेरिकेत झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे शेअर बाजार रॉकेट बनले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने मोठी झेप घेतली आहे. अमेरिकेने हिंदुस्थानी वस्तूंवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणण्याचे मान्य केल्याने गुंतवणूकदारांमध्ये उतासाहाचे वातावरण आहे. मंगळवारी बाजारात उघडताच 30 शेअर्सचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स तब्बल 3,656.74 अकांनी उसळून […]
अगसगे प्राथमिक कन्नड-मराठी शाळा नूतन इमारतीचे बांधकाम संथगतीने
केपीसीसीसदस्यमलगौडापाटीलयांच्याकडूनपाहणी-कंत्राटदारालासूचना वार्ताहर/अगसगे अगसगे येथील प्राथमिक कन्नड व मराठी शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची कामे संथगतीने सुरू होती. याची दखल घेऊन आमदार व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी भेट देऊन कंत्राटदाराला काम तीव्र गतीने सुरू करण्याची सूचना केली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या फंडामधून तीन मजली सुसज्ज इमारत बांधण्यासाठी सुमारे [...]
वडगाव-येळ्ळूर क्रॉस बसथांब्याची दयनीय अवस्था
दुरुस्तीकडेदुर्लक्ष, वाहनेआतप्रवासीबाहेर: बसथांब्यालानाछप्परनाआसनव्यवस्था बेळगाव : वडगाव-येळ्ळूर क्रॉसमधील बसथांब्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. बसथांब्यामध्ये आसन व्यवस्था नसून छप्पर नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर बसथांब्यामध्ये नागरिक आपली वाहने पार्किंग करून जात आहेत. यामुळे गाड्या बसथांब्यामध्ये तर प्रवासी बाहेर असे काहीसे चित्र दिसून येत आहे. यासाठी [...]
शिवरायांची मूर्ती मिरवणूक अमाप उत्साहात
आंबेवाडीत न भूतोन भविष्यती मिरवणुकीने नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले : हजारोंच्या संख्येने शिवभक्त मिरवणुकीत सहभागी वार्ताहर/हिंडलगा आंबेवाडी येथे सिंहासनाधिष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी अनगोळ येथून भव्य मिरवणुकीने छत्रपती शिवरायांच्या जयजयकारात दि. 1 रोजी उत्साहात आणण्यात आली. मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगव्या साड्या व पारंपरिक वेशभूषा करून शेकडो शिवप्रेमींनी सहभाग दर्शविला. [...]
खानापूर शहरांतर्गत रस्त्याचे मार्किंग पूर्ण
तहसीलदारांकडेलवकरचअहवालदेणार: नागरिक-आंदोलनकर्त्यांचीमोठ्याप्रमाणातउपस्थिती खानापूर : खानापूर शहरांतर्गातील रस्त्याचे मार्किंग सोमवारी आयोजित करण्यात आले होते. यासाठी सकाळी 10.30 वाजता भूमापन अधिकारी एम. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवस्मारक चौक ते जांबोटी क्रॉस दरम्यान असणाऱ्या आर. एस. क्रमांक 95/अ, 95/ब, 96/0, 96/5, 51, 49, 48, 97, 95 व 96 या मालमत्ता क्षेत्रांच्या सीमा चिन्हांकन आणि मोजणी प्रक्रिया सोमवारी करण्यात [...]
स्मारकांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची गरज
जिल्ह्यात96 प्राचीनमंदिरे, स्मारके: सर्वाधिकसौंदत्तीतालुक्यात58 तरखानापूरतालुक्यात40 स्मारके बेळगाव : गदग जिल्ह्यातील लक्कुंडी येथे खजिना सापडला आहे. यानंतर खजिन्याचा शोध घेणाऱ्यांच्या नजरा बेळगाव जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक स्थळांकडे लागल्या आहेत. खजिन्याच्या आशेने जमिनी उत्खनन करण्याची कामे सुरू आहेत. मात्र अशा मालमत्तांच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने पुढे येणे गरजेचे आहे. पुरातत्व विभागाकडून जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे, किल्ले व स्मारकांचे [...]
Pankaja Munde News –पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे हेलिकॉप्टरने निघाल्या होत्या. यादरम्यान ही घटना घडली. निवडणूक प्रचारासाठी पंकजा मुंडे आज लातूर दौऱ्यावर आहेत. यासाठी त्या संभाजीनगरवरून हेलिकॉप्टरने प्रवास करणार […]
आंबेडकरनगर, मरगाई मंदिर परिसरातील पथदीप, हायमास्टची मनपाकडून दुरुस्ती
बेळगाव : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 51 मध्ये येणाऱ्या आंबेडकरनगर, मरगाई मंदिर अनगोळ येथील पथदीप आणि हायमास्ट गेल्या 15 दिवसांपासून बंद पडले होते. त्यामुळे नागरिकांना अंधारातून वाट शोधावी लागत होती. ही बाब लक्षात येताच नगरसेवक श्रीशैल कांबळे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केल्याने मंगळवारी परिसरातील बंद पडलेले पथदीप व हायमास्ट सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त [...]

28 C