शिवसेनेची अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक, अधिकाऱ्यांना धारेवर धरले
झोपडपट्टी भागात राहणाऱ्या ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर आज शिवसेनेने धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अदानी कंपनीकडून झोपडपट्टीतील छोटे रूम व पहिला माळ्यावर असलेल्या खोल्यांना मीटर देणे बंद करण्यात आले होते. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींनंतर शिवसेनेने पुढाकार घेत बीकेसी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीच्या सीईओ कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल […]
आयटी कंपनीत लैंगिक छळ; आणखी गुन्हे उघड होणार
एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि सात महिलांचा विनयभंग करणाऱ्या आयटी कंपनीतील ‘त्या’ टोळीकडून तरुण-तरुणींवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता, असे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, या गुह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून एसआयटीमार्फत सखोल चौकशी सुरू आहे. नाशिकच्या मुंबई नाका भागात बहुराष्ट्रीय आयटी कंपनी आहे. हे नोकरीचे ठिकाण नव्हे तर लैंगिक व मानसिक छळाचा अड्डा झाल्याचे […]
मुंबईत एफडीएकडून 90 लिटर असुरक्षित दूध साठा नष्ट
मुंबईकरांना शुद्ध दूध मिळावे याकरिता अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) विशेष मोहिम हाती घेतली. मुंबईत असुरक्षित व निकृष्ट दूध येऊ नये याकरिता एफडीएने शहराच्या सर्व टोल नाक्यांवर फिल्डींग लावली होती. यावेळी एका दिवसात 11 हजार लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला. त्यामधील निकृष्ट साठा सील करून तो उत्पादकांकडे माघारी पाठविण्यात आला. तर 90 लीटर […]
केटीएमच्या बाइक्स 40 हजारांनी महागल्या
हिंदुस्थानात केटीएमच्या बाइक्स खरेदी करणे महाग झाले आहे. केटीएम 390 रेंजच्या किमतीत कंपनीने वाढ केली आहे. कंपनीने 390 एडवेंचर एक्स आणि 390 डय़ूकच्या किमतीत 40 हजारांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी जीएसटीमध्ये झालेल्या बदलामुळे बाइक्सच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. केटीएम एडवेंचर एक्सची किंमत आता 3.43 लाख रुपये एक्स शोरूम झाली आहे. ही बाइक […]
शालेय मुलांसाठी आयडियलचे कबड्डी स्पर्धात्मक उन्हाळी शिबीर
आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या वतीने उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय मुलांसाठी कबड्डी स्पर्धात्मक प्रशिक्षण शिबीर मुंबई शहर व उपनगरमधील विविध विभागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर पूर्णपणे मोफत कबड्डी उपक्रमाचा शुभारंभ कुर्ला-पश्चिम येथील गांधी मैदानात 25 एप्रिलपासून होईल. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक ओळख करून देत दुखापतीच्या भयाचे निराकरण करण्याचादेखील उद्देश आहे. माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते, बीपीएड […]
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेतील कुख्यात मानवी तस्कर व सेक्स स्कँडल्सचा सूत्रधार जेफ्री एपस्टिनशी संबंधित फाइल्स चर्चेत आहे. या फाईल्समध्ये अनेक दिग्गजांच्या नावाचा उल्लेख आहे. याप्रकरणातील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टिनशी असलेल्या संबंधांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आता त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी देखील जेफ्री एपस्टिनशी […]
हिंदुस्थानी बॉक्सर्सचा सुवर्ण प्रहार, चार खेळाडूंची सुवर्ण पदकांवर झडप
मंगोलियाच्या रिंगमध्ये हिंदुस्थानच्या महिला मुष्टियोद्ध्यांनी अक्षरशः वर्चस्व गाजवत सुवर्णाचा पाऊस पाडला. मीनाक्षी हुड्डा आणि प्रीती पवार यांच्या नेतृत्वाखाली चार खेळाडूंनी अंतिम फेरी जिंकत चार सुवर्ण पदकांवर झडप घातली. या कामगिरीमुळे महिलांनी चार सुवर्णांसह दहा पदकांची कमाई करत आपला दबदबा अवघ्या जगाला दाखवून दिला आहे. हिंदुस्थानच्या महिला 4 सुवर्णांसह 16 पदकांसह पदक तालिकेत नंबर वनला पोहोचल्या […]
ठाण्याच्या लोकमान्य, सावरकरनगरात बेवारस वाहनांची उचलबांगडी; अतिक्रमणे हटवून फुटपाथ मोकळे
रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्ष बेकायदा उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची ठाणे पोलिसांच्या अतिक्रमण विभागाने उचलबांगडी केली आहे. ठाणे पालिकेचे अतिक्रमण पथक, वाहतूक विभाग यांनी विशेष मोहीम राबवत जवळपास १९ बेवारस वाहने जप्त केली आहेत. ही अतिक्रमणे हटवून नागरिकांसाठी फुटपाथ मोकळे करण्यात आले. लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये होत असलेली वाहतूककोंडी सोडविण्यासाबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या दालनात नुकतेच एका बैठकीचे […]
मोटरमन चक्क स्टेशनच विसरला; लोकल दोन किमी पुढे धावली, भाईंदर स्थानकावर उडाली घाबरगुंडी
विरारहून दादरच्या दिशेने धडधडत निघालेली लोकल भाईंदर स्थानकात न थांबता चक्क दोन किमी पुढे धावली. गाडी थांबवायला मोटरमन विसरल्याने भाईंदर स्थानकात उतरण्यासाठी दरवाजात रेटारेटी करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. नेमके काय झाले कुणालाच कळेना. अखेर पुढे जाऊन लोकल थांबवल्यानंतर प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारत पायपीट करत परतीचा प्रवास केला. या धक्कादायक प्रकाराची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी […]
हे करून पहा –पंख्याचा खूप आवाज येतोय…
पंख्याच्या आवाजाची अनेक कारणे आहेत. सामान्य कारणे म्हणजे सैल स्क्रू, वाकलेले ब्लेड किंवा मोटर घर्षण. धूळ साचणे आणि दीर्घकाळ साफसफाईचा अभाव यामुळेदेखील पंख्याचा आवाज येतो. तसेच बॅलन्स बिघडून खडखड आवाज होतो. प्रथम सर्व फिटिंग्ज तपासा. हलके स्क्रू घट्ट करा. धूळ-घाण जमा झाल्याने पंख्याची ब्लेड खराब होतात. ब्लेडला कोरडय़ा किंवा हलक्या ओल्या कपडय़ाने स्वच्छ करा. मोटरमध्ये […]
राजस्थान-बंगळुरू यांच्यात होणारा सामना कोण जिंकणार यापेक्षा एकच प्रश्न सर्वांच्या मनात वादळासारखा घोंगावतोय, वैभव सूर्यवंशी आज काय करणार? कोणत्या गोलंदाजाला लक्ष्य करणार? आणि किती चेंडूत आपली अर्धशतकी आतषबाजी साजरी करणार? अवघ्या हिंदुस्थानात वैभव सूर्यवंशीची फलंदाजी सर्वांची पहिली पसंत ठरू लागलीय. त्यामुळे साऱ्यांनाच वैभव शोची उत्सुकता लागलीय. राजस्थानच्या या धडाकेबाज सलामीवीराने यंदाच्या स्पर्धेत पहिल्याच चेंडूपासून हल्ला […]
पावसाळा सुरू होण्यास अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना प्रशासनाकडून पावसाळापूर्व कामे कमालीची संथगतीने सुरू आहेत. नालेसफाई रखडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबई तुंबण्याचा धोका आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या या हलगर्जीपणाविरोधात शिवसेना आज सभागृहात चांगलीच आक्रमक झाली. पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज पालिका सभागृहात पावसाळापूर्व कामांसंदर्भात निवेदन केले. पावसाळा तोंडावर आला तरी पावसाळापूर्व […]
प्रशांत डिंगणकर यांच्या ‘मनबाधा’ पुस्तकाचे प्रकाशन प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीतील लघु नाट्यगृहात सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या हस्ते झाले. ‘‘हे पुस्तक एका साधकाचा आध्यात्मिक प्रवास आहे,’’ असे गौरवोद्गार या वेळी शेलार यांनी काढले. स्वामीराज प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या सोहळ्याला लेखक प्रवीण दवणे, अशोक नायगावकर, डॉ. महेश केळुसकर, गझलनवाझ […]
नियमांचे उल्लंघन करत निवडणूक जिंकल्याचा आरोप करण्यात आलेले चांदीवली विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. चांदीवली विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम तपासण्याचे आदेश हायकोर्टाने दिले असून या ईव्हीएमची लवकरच तपासणी केली जाणार आहे. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचे आढळल्यास लांडेंना आमदारकीला मुकावे लागणार आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
शिवसेनेच्या शिव संचार सेनेच्या वतीने आयोजित ‘संचार समिट 2026’ आज पार पडले. यावेळी टेलिकॉम, फिनटेक आणि डिजिटल कॉमर्स क्षेत्रातील धुरिणांचा सुसंवाद घडवण्यात आला. तसेच शिव संचार सेनेच्या वतीने एका वेबसाईटचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेबसाईटवर बेरोजगार तरुणांना दळणवळण क्षेत्रात रोजगाराची संधी एका क्लिकवर विनामूल्य उपलब्ध होणार […]
बारावी परीक्षेचा निकाल 86.48 टक्के
राज्याच्या परीक्षा निकालात प्रथमच 13.03 टक्क्यांची वाढ बेंगळूर : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार 9 रोजी जाहीर झाला. संपूर्ण राज्याभरातून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 86.48 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या म्हणजेच 2025 च्या तुलनेत 2026 मध्ये निकालात 13.03 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच यंदा बारावी [...]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 10 एप्रिल 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहे आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे आर्थिक – आधीच्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी […]
ममता बॅनर्जी यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण मालमत्ता 15.37 लाख असल्याचे जाहीर वृत्तसंस्था/कोलकाता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भवानीपूर विधानसभा जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या मालमत्ता आणि संपत्तीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मालमत्ता गेल्या पाच वर्षांत वाढण्याऐजी कमी [...]
ट्रम्प यांचा नाटो देशांना इशारा
होर्मुझ सामुद्रधुनीसंबंधी योजना देण्याची मागणी स्थिती बिकट होर्मुझ सामुद्रधुनी मुक्त करण्यासाठी अमेरिकेला नाटो सदस्यांचे साहाय्य हवे नाटो सदस्य देशांचा अद्याप युद्धात उतरण्याचा निर्णय नाही. परिणामी कोंडी इस्लामाबादमध्ये आजपासून होणाऱ्या शांतता चर्चेच्या फलनिष्पत्तीसंबंधी शंका वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीचे भवितव्य अद्यापी स्थिरस्थावर झालेले नसतात, आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नाटो संघटनेचे युरोपियन सदस्य [...]
भारतात ‘ईव्ही’ वाहन विक्रीत मोठी वाढ
किरकोळ विक्री 24 टक्क्यांनी वधारुन 24.52 लाख युनिट्सच्या घरात वृत्तसंस्था/नवीदिल्ली आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून आता बाजारात इलेक्ट्रिक वाहने म्हणजेच ईव्ही विकल्या जात आहेत. त्याचबरोबर, हळूहळू लोकही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास पसंती देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील ईव्हीची किरकोळ विक्री 24.6 टक्क्यांनी वाढून 24.52 लाख [...]
10 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक
वृत्तसंस्था/कोलंबो श्रीलंकेच्या नौदलाने गुरुवारी तामिळनाडूच्या 10 मच्छिमारांना आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा (आयएमबीएल) पार करणे आणि श्रीलंकेच्या जलक्षेत्रात मासेमारी केल्याप्रकरणी अटक केली आहे. रामनाथपुरम जिल्ह्याचे रहिवासी असलेले हे सर्व मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. धनुष्कोडी आणि तलाईमन्नार दरम्यानच्या जलक्षेत्रात ते मासेमारी करत होते. अभियानादरम्यान श्रीलंकेच्या नौदलाच्या गस्त पथकाने या मच्छिमारांच्या नौकांना रोखले.श्रीलंकेच्या नौसैनिकांनी या नौकांना वेढा घेत [...]
हिजबुल्ला नेत्याचा साहाय्यक ठार
वृत्तसंस्था/तेल अवीव इस्रायलने लेबेनॉनवर केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासेम याचा पुतण्या अली युसुफ हरशी हा ठार झाला आहे, असे प्रतिपादन इस्रायलकडून करण्यात आले आहे. गुरुवारी बैरुतवर हिजबुल्लाच्या तळांवर इस्रायलने 10 मिनिटांमध्ये 100 विमान हल्ले केले. त्यामुळे हाहाकार उडाला आहे. यामुळे इराणही भडकला असून त्याने इस्रायलला धडा शिकविण्याची धमकी दिली. इस्रायलच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लानेही इस्रायलवर काही [...]
चीनमधील युवा मातापित्यांचा नव्या अप्रोचसह प्रयोग सद्यकाळात चीनच्या अनेक घरांमध्ये आईवडिल स्वत:च्या मुलांच्या पालनपोषणाची नवी पद्धत अवलंबित आहेत. याला रिव्हर्स पॅरेंटिंग नावाने ओळखले जाते. चीनच्या युवा पिढींदरम्यान हा प्रकार लोकप्रिय होतोय. आदेश देणे किंवा मोठ्या संदेशाऐवजी ते मुलांच्या भूमिकेत उतरत आहेत. रिव्हर्स पॅरेंटिंगची ही नवी पद्धत चीनमधील युवा मातापित्यादरम्यान लोकप्रिय होतेय. रिव्हर्स पॅरेंटिंगचा विचार अत्यंत [...]
संपकरी कर्मचाऱ्यांवर हरियाणामध्ये लाठीमार
गुरुग्राममध्ये तणावाची परिस्थिती : 20 हून अधिक जण जखमी, पोलिसांच्या कृतीविषयी नाराजी वृत्तसंस्था/गुरुग्राम हरियाणातील गुरुग्रामच्या मानेसरमध्ये कलम 163 लागू असूनही, गुरुवारी हजारो संपकरी कर्मचारी जमल्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याप्रसंगी चेंगराचेंगरी झाली. तसेच या आंदोलनात 20 हून अधिक कर्मचारी जखमी झाले. एकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव [...]
सिक्कीममध्ये अडकलेल्या 135 पर्यटकांची सुटका
हिमवृष्टी-भूस्खलनानंतर लष्कराकडून मदतकार्य वृत्तसंस्था/नवी दिल्ली सिक्कीममध्ये मुसळधार हिमवृष्टी होत असताना भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. लाचेनमध्ये जवळपास 1,000 पर्यटक अडकले असून, त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लष्कराने एकूण 135 अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली आहे. उत्तर भारतातील तीन पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे एप्रिल महिन्यातही हिवाळ्यासारखे वातावरण जाणवत आहे. गेल्या 20 दिवसांपासून राजस्थानमधील बदलत्या [...]
योगी परब्रह्मसुखाशी एकरूप झालेला असतो
अध्याय पाचवा विरक्त पुरुष विषयातून सुख मिळते ह्या कल्पनेशी कधीही सहमत होत नसल्याने ते त्यांचा त्याग करतात. विषयांवर मात करण्यासाठी जसं आयुष्य वाट्याला येईल तसं जगण्याची सवय करून घेणं फार महत्त्वाचं असतं. ज्यांना आत्मज्ञान झालंय त्यांना हे नेहमीच शक्य होतं. वाट्याला येईल तसं आयुष्य न कुरकुरता जगणे हे योग्याचे प्रमुख लक्षण आहे. प्रयत्ने मरणापूर्वी ह्या [...]
देशातील हा न्याय निवाडा पहिल्यांदाच झालेला आहे. जनतेचे आपण रक्षक आहोत याचे भान अधिकाऱ्यांनी विसरता कामा नये. प्रत्येक ठिकाणी जनतेला न्याय देण्यासाठी रेवती उभी राहू नाही शकत. परंतु या संपूर्ण घटनेतून धाडस म्हणजे रेवती आणि रेवती म्हणजे धाडस, असेच समीकरण होईल. मिळनाडूतील तुतीकोरीन जिह्यातील सथानकुलम पोलीस स्थानकातील नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मदुराई न्यायालयाने फाशीची शिक्षा [...]
भारतात प्रथमच ज्येष्ठ लोकांसाठी म्हणजेच साठ वर्षांची वयोमर्यादा पार केलेल्या वृद्धांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला. 29 जानेवारी रोजी सादर केलेला केरळचा अर्थसंकल्प अत्यंत मार्गदर्शक व देशाच्या पातळीवर आदर्शवत ठरणारा आहे. इतर राज्यांनीही याचे अनुकरण करायला हरकत नाही. कसंख्येमध्ये आपण युवकांची संख्या अधिक असल्याने युवकांचा देश किंवा लोकसंख्येचा लाभांश (डेमोग्राफीक डिव्हीडंड) असे आपण म्हणत होतो. आता [...]
ऑनरकिलिंगविरोधी ‘इव नम्मव्वा’ विधेयक
गेल्या महिन्यात कर्नाटक विधिमंडळात ऑनरकिलिंग विरोधी विधेयक पारित करण्यात आले आहे. या कायद्याला ‘इव नम्मव्वा’ (हा आमचा) असे नाव दिले आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आता कायद्याचे संरक्षण मिळणार आहे. मेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेले युद्ध मध्य-पूर्वेतील परिस्थितीचे परिणाम वेगवेगळ्या देशांच्या आर्थिकतेवरही जाणवू लागले आहेत. गॅस सिलिंडरच्या टंचाईने तर हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. युद्धविरामानंतर [...]
अजय-अतुलच्या मुलाखतीने गाजला ‘पार्ले कट्टा’चा शतकमहोत्सवी सोहळा
मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात स्वतंत्र स्थान निर्माण केलेला ‘पार्ले कट्टा’चा शतकमहोत्सवी सोहळा विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात नुकताच साजरा झाला. सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या रंगतदार मुलाखतीमुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांमधील दुवा ठरलेल्या ‘पार्ले कट्टा’ची सुरुवात 1 डिसेंबर 2007 रोजी झाली. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी विलेपार्ले येथील साठे उद्यानात भरणाऱया […]
शेवटच्या चेंडूवर लखनौ विजयी : केकेआरच्या पदरी पुन्हा पराभव : सामनावीर मुकुल चौधरीची तुफानी फटकेबाजी वृत्तसंस्था/कोलकाता लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल-2026 मध्ये आपला सलग दुसरा विजय मिळवला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात लखनौने कोलकाता नाईट रायडर्सला 3 गडी राखून पराभूत केले. लखनौ संघाला विजयासाठी शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज होती आणि 7 गडी बाद झाले होते. [...]
मुस्लिम मतांसाठी 1 हजार कोटींची डील, तृणमूल काँग्रेसचा भाजपवर आरोप
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मिळणारी मुस्लिम मते पह्डण्यासाठी एक हजार कोटींची डील झाल्याचा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसने आज केला. आरोपाचा पुरावा म्हणून तृणमूलच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत एक व्हिडिओ दाखवला. बंगालमध्ये ‘प्रतिबाबरी’ उभारण्याची घोषणा करणारे हुमायू कबीर यांचा हा व्हिडीओ असून त्यात ते एक हजार कोटी मिळणार असल्याचे सांगत आहेत. भाजपचे एक मुख्यमंत्री […]
राजस्थान-आरसीबी सामना चुरसपूर्ण ठरण्याचीअपेक्षा
पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल, विराट कोहली-देवदत्त पडिक्कल यांच्या कामगिरीवर लक्ष वृत्तसंस्था/गुवाहाटी आज शुक्रवारी गुवाहाटी येथे जेव्हा राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे दोन ‘फॉर्म’मध्ये असलेले संघ आमनेसामने येतील तेव्हा हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. यशस्वी जैस्वाल व वैभव सूर्यवंशी यांच्या स्फोटक सुऊवातीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स यावेळी आपला दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न [...]
आजचे भविष्य शुक्रवार, १० एप्रिल २०२६
मेष : मन शांत ठेवण्यासाठी एकांतात वेळ घालवाल. वृषभ : रिकामा वेळ रचनात्मक करण्याचा प्रयत्न कराल मिथुन : जमेल तेवढ्याच कामाचे वचन द्या, ताण नको कर्क : कामाची पद्धत बदला, फावल्या वेळेत ध्यान करा सिंह : प्रवासाची संधी शोधाल, आर्थिक अडचणीवर मात. कन्या : आपल्या मुलांकडून गर्व करण्यासारखे काम तूळ : रागावर नियंत्रण ठेवा, मेहनत, [...]
ऑफ-बिट…‘आयपीएल’मधील अपेक्षाभंग…
इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्याच आठवड्यात उत्कंठावर्धक सामने, काही अनपेक्षित निकाल आणि काही कमी धावसंख्येचे सामने असं सर्व काही पाहायला मिळालंय…आतापर्यंत विविध संघांमधील काही खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलेलं असलं, तरी मोठी प्रतिष्ठा आणि उत्तम कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या हंगामात उतरलेले काही क्रिकेटपटू मात्र आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरलेत…कामगिरीचं मूल्यमापन करण्याच्या दृष्टीनं हा काळ [...]
टी-20 प्रकारात कार्डोसोचा नवा विश्वविक्रम
ब्राझीलच्या लॉरा कार्डोसोचे चार धावांत 9 बळी वृत्तसंस्था/गॅबोरोन ब्राझीलची महिला क्रिकेटपटू लॉरा कार्डोसोने टी-20 प्रकारात नवा विश्वविक्रम नोंदविला आहे. येथील बोट्सवाना क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या महिलांच्या बीसीए कलहारी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात वेगवान गोलंदाज कार्डोसोने आपल्या तीन षटकांमध्ये 4 धावांच्या मोबदल्यात 9 गडी बाद करण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे. टी-20 प्रकारातील पुरूष किंवा [...]
भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांना दहा पदके
वृत्तसंस्था/उलानबातार 2026 च्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी ऐतिहासिक कामगिरी करताना एकूण 10 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय महिला संघातील प्रत्येक मुष्टीयोद्ध्याने किमान एक पदक मिळविले असल्याची माहिती संघाचे प्रमुख प्रशिक्षक सॅन्टीयागो निव्हा यांनी दिली. भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनचे [...]
पी.व्ही. सिंधू , एचएस प्रणॉय उपउपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/बिजिंग निंगबो ऑलिम्पिक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 2026 च्या आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधू आणि एचएस प्रणॉय यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या माजी विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने मलेशियाच्या वाँग चींगचा 15-21, 21-11, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. सिंधूला या सामन्यातील [...]
जलतरणातील नवीन आशा……. रुबन रोचा
जलतरण खेळात एक नवीन नाव उदयास येत आहे ते म्हणजे आके-बायश या गावातील एक प्रतिभावंत कुमार जलतरणपटू रुबन रोचा याचे. 11 वर्षीय रुबनने जलतरणात एवढं प्राविण्य मिळविले आहे, की हा जलतरणपटू भविष्यात एक ‘लंबी रेस का घोडा’ बनणार हे निश्चित आहे. हॅन्री रोशा आणि फिल्डा एँड्रो यांचा हा 11 वर्षीय पुत्र सध्या सां जुझे दी [...]
वैशालीकडून दिव्याचा पराभव, अव्वल स्थान राखले कायम
कँडिडेट् स्पर्धा जिंकण्याच्या मार्गावर असणारा उझबेकच्या जावोखिर सिंदारोव्हचे 7 तर दुसऱ्या स्थानावरील अनिश गिरीचे 5.5 गुण वृत्तसंस्था/पाफोस, सायप्रस महिलांच्या ’कँडिडेट्स’ स्पर्धेत अत्यंत चुरशीची लढत सुरू असून अजून पाच फेऱ्या बाकी असल्याने पुढील काळात आणखी रोमांचक घडामोडींची अपेक्षा आहे. सदर स्पर्धेच्या नवव्या फेरीत आपलीच सहकारी खेळाडू दिव्या देशमुखचा पराभव करत आर. वैशालीने भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. [...]
पालिका प्रशासन निवृत्त कर्मचाऱयांच्या हक्काचे पैसे देत नसल्याचे निदर्शनास येताच उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र संताप व्यक्त केला. एकीकडे सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेवर 40 हजार कोटींहून अधिक खर्च करतेय. आता ही योजनाच रोखली पाहिजे, असा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला देत न्यायालयाने पालिकेचेही कान उपटले. तिजोरीत पैसे नसतील तर पालिकेतील टेबल, खुर्च्या, एसी, फर्निचर… इतकेच नव्हे, तर […]
युद्धबंदीत इस्रायलचे बेफाम हल्ले,विश्वासघाताने इराण खवळला…आमचे बोट ट्रिगरवर!
इराण-अमेरिकेमध्ये युद्धविराम झाल्यानंतरही जगाचे टेन्शन कायम आहे. वादाचा केंद्रबिंदू आता होर्मुझवरून लेबनॉनकडे सरकला आहे. युद्धविरामाशी लेबनॉनचा संबंध नसल्याचे सांगत इस्रायलने तिथे बेफाम हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे इराण खवळला आहे. ‘‘हा विश्वासघात आहे. हे असेच सुरू राहिल्यास चर्चेला काडीचा अर्थ उरणार नाही. आमचेही बोट ट्रिगरवर आहे,’’ असा दम इराणने अमेरिका-इस्रायलला भरला. त्यामुळे कोणत्याही क्षणी पुन्हा […]
उत्पन्न वाढीसाठी महायुतीचा नवा फंडा, सरकारी भूखंड आता 49 वर्षे भाड्याने देणार
राज्यातील महायुती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे विविध सरकारी विभागांची आर्थिक कुतरओढ सुरू झाली आहे. यावर उपाय म्हणून उत्पन्न वाढीसाठी सरकारी भूखंड आता 49 वर्षे भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भाडेपट्टय़ाने दिलेल्या सरकारी जमिनींचेही नूतनीकरण करण्यास मुभा देण्यात आली आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील सुधारित धोरण जाहीर केले आहे. शासकीय जमिनी भाडेपट्टय़ाने देण्याचा कालावधी 30 वर्षांवरून […]
सीबीएसई शाळांत सहावीपासून तिसरी भाषा सक्तीची
‘सीबीएसई’ शाळांमध्ये आता सहावीपासून तिसरी भाषा शिकवणे बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ा अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-2027पासूनच या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषा आणि इंग्रजी व्यतिरिक्त आणखी एका भाषेत पारंगत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हिंदुस्थानच्या समृद्ध भाषा वारशाची माहिती व्हावी आणि […]
Baramati Bypoll Election आधी ताणले…अखेर बारामतीतून कॉँग्रेसची माघार
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, कॉँग्रेस ही निवडणूक लढणारच, अशी ठाम भूमिका कॉँग्रेसकडून घेण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीपासून ते अर्ज माघारीच्या एक दिवस आधीपर्यंत बारामतीत लढणारच, अशी टोकाची भूमिका घेत कॉँग्रेसने ताणून धरले होते. मात्र गुरुवारी सकाळी मुंबई आणि दिल्लीतून झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या पह्नापह्नीनंतर अखेर बारामतीच्या निवडणूक रिंगणातून कॉँग्रेसने माघार […]
सत्ताधाऱ्यांना कोट्यवधी,विरोधकांची लाखांत बोळवण! विकास निधीवाटपात चालबाजी; हायकोर्टाचा संताप
स्थायी समितीला मिळालेल्या 800 कोटींच्या विकास निधीवाटपात सत्ताधारी भाजप-शिंदे गटाकडून चालबाजी करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नगरसेवकांना केवळ 20 ते 25 लाख रुपये देण्यात आले असून सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना तब्बल 8 ते 10 कोटींचा निधी देण्यात आल्याचे समजते. मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व नगरसेवकांना विकासनिधीचे समांतर वाटप होणे गरजेचे असताना सत्ताधाऱयानी मनमानी केल्यामुळे विरोधकांकडून संताप व्यक्त […]
लेख –विद्युत वाहनांचे चार्जिंग –दुर्घटना आणि उपाय
>> महेश शिपेकर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग पॉइंटमध्ये झालेल्या स्पह्टामध्ये एका कुटुंबातील सात जण ठार झाल्याची दुर्घटना गेल्या महिन्यात घडली होती. या घटनेनंतर विद्युत वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. पर्यावरणपूरक आणि भविष्याचे साधन म्हणून या वाहनांकडे पाहिले जात असले तरी सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांनी सर्वसामान्यांच्या मनात भीती घर करू लागली आहे. […]
जाऊ शब्दांच्या गावा –‘ ढ’ ढगाचा की गाढवाचा?
>> साधना गोरे, sadhanagore2018@gmail.com आपली शाळा आणि तिथले शिक्षक यांना आपल्या मनात एक अढळ स्थान असतं. शाळेत असताना काही शिक्षक आपल्याला आवडत नसले तरी मोठं झाल्यावर आपल्याला त्यांच्या वागण्याचं कारण कळतं आणि नाही कळलं तरी आपल्याला त्यांच्याविषयी आपुलकीच वाटते. तर आपल्या शाळेतल्या बऱ्याच शिक्षकांचं एक अक्षर फार लाडपं असतं ते म्हणजे ‘ढ’. हा ढगाचा ‘ढ’ […]
प्रत्येकाला सर्व मंदिर आणि मठांमध्ये दर्शन घेण्याचा अधिकार असला पाहिजे. कोणाला रोखल्यास हिंदुत्वावर त्याचा परिणाम होईल आणि परिणामी समाज विभागला जाईल. हे हिंदुत्वासाठी चांगले नाही, असे मत आज सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. त्याचवेळी, धार्मिक मुद्दय़ांमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली. याप्रकरणी पुढील सुनावणी 14 एप्रिल रोजी होणार आहे. केरळममधील शबरीमाला मंदिरासह […]
पवन खेरा यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी तहकूब, आज निर्णय होण्याची शक्यता
काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज तहकूब करण्यात आली. त्यावर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या पत्नीकडे 3 देशांचे पासपोर्ट असून अमेरिकेतील एका कंपनीत हिमंता सरमा यांनी 52 हजार कोटी रुपये गुंतविल्याचा गौप्यस्फोट खेरा यांना केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी आसाम पोलिसांनी खेरा यांच्या […]
बांगलादेशमध्ये ‘जेन-झी’ने आंदोलन करत माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले होते. तेव्हापासून गेले 18 महिने हिंदुस्थान आणि बांगलादेशमधील संबंध ताणले गेले आहेत. ते सुधारण्यासाठी हिंदुस्थान आणि बांगलादेशने सहमती दर्शवली. त्याच वेळी शेख हसीना यांच्या मुद्दय़ामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम होणार नाही, यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शविली. हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि बांगलादेशचे […]
दिवसाढवळ्या बायकोचा गळा चिरला! छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपावर थरार
महिला संरक्षण, शक्ती कायदा वगैरे सगळे थोतांड असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. दोन वेळा पतीच्या विरोधात तक्रार देऊनही पोलिसांनी दखल न घेतल्याने दोन निष्पाप मुले अनाथ झाली. अत्यंत थंड डोक्याने या पतीने भरदिवसा, पेट्रोल पंपावर आपल्या पत्नीचा गळा चिरला आणि पळून गेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कचनेरपर्यंत पाठलाग करून या नराधमाला अटक केली. चित्तेपिंपळगाव येथील […]
पोक्सोच्या गुह्यात अडकविण्याची भीती दाखवून उकळले 7 लाख रुपये
महाविद्यालयातील विद्यार्थिनीला धाक दाखवून प्राचार्यांविरुद्ध अपहरणाची तक्रार करायला सांगून शिवाजीनगर पोलिसांनी 7 लाखांची खंडणी उकळली आहे. प्राचार्याला पोक्सोच्या गुह्यात अडकवण्याची भीती दाखवून पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, मार्शल सोनाली हिंगे, पोलीस अंमलदार सुदाम तायडे यांनी खंडणी उकळली असून, त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व जण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. उपनिरीक्षक बडे […]
किरण शार्दूल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे कार्यासन अधिकारी किरण शार्दूल यांनी लिहिलेल्या ‘किरणोत्सव’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शार्दूल यांनी आपल्या पुस्तकात सरकारी सेवा बजावत असताना आलेले प्रशासनिक अनुभव शब्दबद्ध केले आहेत. मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या नवलेखक अनुदान योजनेच्या अंतर्गत शार्दूल यांच्या पुस्तकाची निवड करण्यात आली असून […]
…आणि हा चेंडू थेट रवी शास्त्री स्टँडच्या छतावर! वानखेडेवर ‘रवी शास्त्री स्टँड’चे दिमाखदार अनावरण
– गणेश पुराणिक धोनी फिनिशेस ऑफ स्टाईल, इंडिया लिफ्ट द वर्ल्डकप आफ्टर 28 इयर्स… 2011 मध्ये वानखेडे मैदानावर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने उत्तुंग षटकार ठोकला आणि क्रिकेट समालोचक रवी शास्त्री मोठ्या उत्साहात हे अजरामर वाक्य म्हणाले. आजही वानखेडे मैदानावर गेल्यावर क्रीडाप्रेमींच्या कानात हे वाक्य घुमत असणार… याच मैदानावर रवी शास्त्री यांनी बडोदा विरुद्ध […]
केरळम, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण; उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये कैद
देशातील राजकीय लक्ष लागून राहिलेल्या केरळ, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, तिन्ही ठिकाणी मतदारांनी मोठा उत्साह दाखवला असून अनेक केंद्रांवर मतदानाचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. या सर्व जागांचे निकाल येत्या ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहेत. कुठे किती टक्के […]
बिहारमधील अररिया जिल्ह्यात फारबिसजंग येथे पार्किंगवरून झालेल्या वादावरून एका ज्यूस विक्रेत्याने एका कार चालकाची गळा चिरून मुंडके छाटले. त्याने भररस्त्यात कार चालकाचे मुंडके फेकले. त्यानंतर संतप्त जमावाने ज्यूस विक्रेत्याला पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेत त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. फारबिसगंज येथील कृषि उत्पादन बाजार समितिच्या गेटवर राहुल चौहान याचा ज्यूसचा स्टॉल होता. त्या ठिकाणी […]
बेपत्ता तरुणाचा मृतदेह रत्नदुर्ग किल्ला येथे आढळला
तीन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. अमोल संजय किड्ये (वय ३०, रा. मांडवी, रत्नागिरी) असे समुद्र किनारी मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.९) सायंकाळी चारच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल किड्ये हा तीन दिवसांपासून […]
महिला आरक्षण विधेयकावरून भाजपचा ‘निवडणूक ड्रामा’; आप खासदार संजय सिंह यांचा हल्लाबोल
आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी महिला आरक्षण विधेयकावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हा केवळ निवडणूक ड्रामा करत असल्याचा आरोप त्यांनी गुरुवारी केला. ‘एएनआय’ने (ANI) ने दिलेल्या वृत्तानुसार, मथुरेतील पदयात्रेदरम्यान त्यांनी हे विधान केले. संजय सिंह म्हणाले की, जेव्हा हे विधेयक यापूर्वी मांडण्यात आले होते, तेव्हा आम […]
Photo –शिवसेना भवनात शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि विभाग संघटक यांना आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पुरुष आणि महिला शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि विभाग संघटक यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि विभाग संघटक उपस्थित होते. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अनिल परब आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (सर्व फोटो – रुपेश जाधव)
गोदावरीच्या मध्यभागी भक्तीचा सागर, आत्मतीर्थमध्ये दत्त अवतार दिन साजरा
गेवराई तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र पांचाळेश्वर आत्मतिर्थ येथे श्री दत्त अवतार दिन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. महानुभव पंथाचे उपकाशी म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्री हजारो भाविकांनी श्री दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे मंगलस्नान, दत्त कवच पारायण, महाआरती आणि रात्री भव्य छबिना मिरवणुकीने संपूर्ण परिसर “श्री दत्त जय जय दत्त” […]
सत्ता बळकावण्यासाठी भाजपने मतदार यादीतून ९० लाख नावे हटवली; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, राज्यात सत्ता बळकावण्यासाठी भाजपने मतदार याद्यांमधून ९० लाख नागरिकांची नावे हटवली आहेत. असे असूनही आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच विजय मिळवेल, असा दावा ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला आहे. ‘पीटीआय’ने (PTI) याबाबत वृत्त दिले आहे. उत्तर २४ परगना जिल्ह्यातील मीनाखान येथे एका जनसभेला […]
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल वनला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १-बी मध्ये गुरुवारी आग लागल्याची घटना समोर आली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही आग टर्मिनलच्या तळमजल्यावर असलेल्या केबल ट्रे आणि स्विच बॉक्समध्ये लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी […]
IPL 2026 –एका सेल्फीने चाहत्याचा दिवस बनला; संजू सॅमसनने भेट दिला महागडा स्मार्टफोन; पण का? वाचा…
IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज संजू सॅमसन सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या संजूला IPL मध्ये अद्याप सुर गवसलेला नाही. मात्र, त्याने आपल्या एका कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. केरळमधील मुंदूर-थुथा रोडवर प्रवास करत असताना सॅमसनने एका क्रिकेटप्रेमी चाहत्याला तब्बल 40 हजार रुपये किमतीचा नवीन स्मार्टफोन भेट देऊन सर्वांना […]
Ratnagiri News –८० वर्षांपूर्वीचा जुना पूल तोडल्याने गावांचा संपर्क तुटला, पर्यायी पायवाट अडचणीची
खेड तालुक्यातील फुरूस पोयनार मार्गावरील सुमारे ८० वर्षांपूर्वी बांधलेला जुना पूल बांधकाम विभागाने नुकताच तोडला असून त्याठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. सध्या दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या कामामुळे फळसोंडा परिसर आणि पोयनार गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. काही गावांचा संपर्क तुटल्याची ही गंभीर समस्या समोर […]
मोबाईलचा स्फोट अन् UPSC विद्यार्थ्याचे स्वप्न भंगले! ग्राहक आयोगाने Realme ला ठोठावला लाखांचा दंड
मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाल्याने गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याला दिल्ली जिल्हा ग्राहक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. या स्फोटामुळे विद्यार्थ्याला यूपीएससीची (UPSC) पूर्व परीक्षा देता आली नव्हती. याप्रकरणी आयोगाने ‘रियलमी’ (Realme) कंपनीला १.५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘पीटीआय’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युपीएससीचा विद्यार्थी कोती साई पवन याने यासंदर्भात तक्रार दाखल […]
असंसदीय भाषेवरून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर भडकले आसामचे मुख्यमंत्री
आसाममध्ये आज विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे जलुकबारी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मतदानाच्यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना हिमांता सरमा हे लल्लनटॉप चॅनेलच्या पत्रकारावर भडकले. या पत्रकाराने त्यांना असंसदीय भाषेवरून प्रश्न विचारला होता. तो प्रश्न ऐकताच सरमा हे चांगलेच संतापले व माझी भाषा लल्लनटॉपपेक्षा चांगली असते असे त्या पत्रकाराला […]
छत्रपती संभाजीनगर हादरले, भररस्त्यात माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर भरदिवसा माथेफिरू प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा चिरून तिचा निघृण खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करमाड येथील गणपती मंदिराजवळ इंडियन ऑईलचा एक पेट्रोल पंप आहे. पूजा सुदाम गावंडे ही तरुणी या पेट्रोल पंपावर काम करते. गुरुवारी दुपारी साडे […]
बिहारमधील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि आर्थिक स्थितीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, बिहार सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली असून, लोकप्रतिनिधींनाही अद्याप पगार मिळालेला नाही, असा खळबळजनक दावा तेजस्वी यादव यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला. तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारमधील संपूर्ण सरकारी यंत्रणा आता […]
निवडणूक आयोगाच्या एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि वरिष्ठ निवडणूक निरीक्षक अनुराग यादव यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. या वादानंतर अनुराग यादव यांना तातडीने निवडणूक निरीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या एका व्हर्च्युअल बैठकीदरम्यान हा प्रकार घडला. पश्चिम बंगालमधील कूचबिहार दक्षिणचे निवडणूक निरीक्षक म्हणून […]
11 दिवसात पैसे डबल होणार; ज्येष्ठ नागरिकाने गुंतवले 12 कोटी आणि पुढे
12 कोटीचे 11 दिवसात मिळणार 24 कोटी होणार असे सांगत पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. पैसे डबल मिळण्याच्या हव्यासापोटी हडपसर भागातील एका 75 वर्षीय डॉक्टरने सायबर चोरट्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी १२ कोटी ३१ लाख रुपये दिले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली […]
आफ्रिकन टोळीचा पर्दाफाश, देशभरातील १२ सायबर गुन्ह्यांशी संबंधित दोन जणांना दिल्लीत अटक
देशभरातील विविध राज्यांमध्ये ५० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा छडा लावत दिल्ली पोलिसांनी दोन आफ्रिकन नागरिकांना अटक केली आहे. ‘PTI’ ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर महिला असल्याचे भासवून हिंदुस्थानी नागरिकांशी मैत्री करत असत आणि भावनिक नाते निर्माण करत असत. त्यानंतर आपण हिंदुस्थानात येत […]
स्वच्छता कराच्या नावाखाली एसटी प्रवाशांकडून कोट्यवधींची वसुली; तरीही बसस्थानके अस्वच्छच !
कळंब (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटावर आकारलेला दोन रुपयांचा स्वच्छता कर हा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर टाकलेला अतिरिक्त आर्थिक भार असल्याची तीव्र नाराजी राज्यभरातून व्यक्त होत आहे. राज्यात दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये आकारल्यास महामंडळाच्या तिजोरीत दररोज १ कोटी १० लाख रुपये, महिन्याला ३३ कोटी रुपये, तर वर्षाला तब्बल ४०१ कोटी ५० लाख रुपये जमा होणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी जमा होत असताना राज्यातील अनेक बसस्थानके आणि बसेस आजही स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव समोर येत आहे. राज्यात सध्या २५१ आगार आणि ५९८ बसस्थानके असून या सर्व ठिकाणची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे आणि बसची नियमित साफसफाई यासाठी हा निधी प्रभावीपणे वापरण्याची मागणी जोर धरत आहे. महामंडळाने अलीकडेच सहलीच्या माध्यमातून १२७ कोटी १८ लाख रुपये उत्पन्न मिळवले असून, त्यासाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्या करण्यात आल्या. गतवर्षीच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाख रुपयांची वाढ झालेली असतानाही प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, अनेक बस वाटेतच बंद पडतात, स्वच्छतेचा अभाव जाणवतो, तर बसस्थानकांवरील परिस्थितीही समाधानकारक नाही. त्यामुळे स्वच्छता करातून मिळणारा निधी नेमका कुठे खर्च होतो, याबाबत पारदर्शकता ठेवावी अशी मागणी पुढे येत आहे. दरम्यान १५ एप्रिल ते १५ जून हा गर्दीचा उन्हाळी हंगाम सुरू होत असताना महामंडळाने १० टक्के उन्हाळी भाडेवाढ जाहीर करून प्रवाशांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता एसटी प्रवासही महाग होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. एकेकाळी “गोरगरिबांची लालपरी” म्हणून ओळखली जाणारी एसटी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक बस सेवांमध्ये वाढ झाली असली तरी त्याचे तिकीटदर अनेकांसाठी परवडणारे नसल्याने “लालपरी आता श्रीमंतांचीच होत चालली का?” असा सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 7 शाळांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तसा शासन आदेशही जारी केला आहे. राज्यातील 405 शासकीय शाळांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा“ म्हणून विकसित करण्यास मान्यता मिळाली असून, यात आपल्या धाराशिव जिल्ह्यातील 7 शाळांनी स्थान पटकावले असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. निवड झालेल्या या शाळांमध्ये विकसित महाराष्ट्र - 2047 चे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रामुख्याने या सर्व शाळांमध्ये आता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना एकाच छताखाली सलग आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र पिंक रूमची निर्मितीही या शाळांमधून केली जाणार आहे. प्रत्येक शाळेत / शुद्ध पिण्याचे पाणी आणि आधुनिक स्वच्छतागृहांची सुविधाही असणार आहे. जिल्ह्यातून एका शाळेची निवड क्रीडा प्रबोधिनी म्हणून करून तिथे खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या शाळांची झाली निवड धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि शिक्षकांच्या निष्ठेमुळे जिल्ह्यातील खालील शाळांची या निवड झाली आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केशेगाव ता. धाराशिव, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारा, ता. वाशी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा होर्टी, ता. तुळजापूर, जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला खामसवाडी, ता. कळंब, पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला ईट, ता. भूम, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा कसबे तडवळे, ता. धाराशिव, पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला, शिराढोण, ता. कळंब
मे महिन्यात श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांचे भूमिपूजन- पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव (ंप्रतिनिधी)- कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात या संदर्भात आज आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. या बैठकीस आमदार राणाजगजीतसिंह पाटील,छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाने सुमारे 1865 कोटी रुपयांच्या श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे.त्यापैकी 421 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विकास कामांमुळे बाधित होणाऱ्या 105 खाजगी मालमत्तांपैकी सुमारे 75 टक्के मालमत्ता धारकांशी शासनाने यशस्वी वाटाघाटी केल्या आहेत.त्यामुळे उर्वरित विकास कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर,तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास भव्य व दिव्य स्वरूपात व्हावा,यासाठी वेळेचे काटेकोर पालन करून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत रामदरा तलावाजवळ विकसित होणाऱ्या शिवसृष्टी उद्यानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच मंदिर परिसरातील आठ जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि आठ कुंडांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय पार्किंग प्लाझा, प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, भक्तनिवास आणि दर्शन मंडप यांसारख्या कामांबाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या. तुळजापूर शहराचा वेगाने विस्तार होत असल्याने शहरासाठी स्वतंत्र ‘मास्टर प्लॅन’ तयार करून सुनियोजित विकास साधण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या. या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत समिती स्थापन करण्याचे निर्देशछत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांविषयी समाजात नितांत आदर आहे.त्यांच्या प्रेरणादायी स्मारकांची उभारणी व्हावी,मात्र काही ठिकाणी शासनाचे निकष न पाळता अनधिकृतपणे पुतळे उभारले जात असून त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर,अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन करावी आणि इच्छुकांना शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार पुतळे उभारण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे सामाजिक सलोखा अबाधित राहील आणि महापुरुषांचा सन्मानही राखला जाईल,असे त्यांनी सांगितले. बैठकीत श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासोबतच मुख्यमंत्री शेतकरी सौर पंप योजना, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, जलसंपदा,मृद व जलसंधारण विभाग,नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच जलजीवन मिशनअंतर्गत पाणीटंचाई या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत संबंधित विभागांनी आपल्या कामकाजाचा अद्ययावत आढावा सादर केला.तसेच बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले.
मतदान झाले हाय-टेक; पुद्दुचेरीतील मतदान केंद्रावर ‘नीला’रोबोने केले मतदारांचे स्वागत
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना पुद्दुचेरीमध्ये तंत्रज्ञानाचा एक आगळावेगळा आविष्कार पाहायला मिळाला. पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी नीला (Nila) नावाचा ह्युमनॉइड रोबो मतदान केंद्रावर तैनात करण्यात आले होते. साडी परिधान केलेल्या या रोबोने मतदारांचे स्वागत केल्यामुळे मतदान केंद्रावर सर्वांचे लक्ष वेधले गेले. काय आहे नीला रोबोची वैशिष्ट्ये? पुद्दुचेरीतील व्ही.ओ.सी. सरकारी […]
Video – I Parth Ajit Pawar…पार्थ पवार यांनी इंग्रजीत घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. पार्थ पवार यांनी ही शपथ इंग्रजीत भाषेत घेतली. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. View this post on Instagram A post shared by Saamana (@saamana_online) अजित […]
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वादावर आमदार महेश शिंदेंचे प्रत्युत्तर कोरेगाव – कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या जात पडताळणी प्रकरणावर माध्यमांनी चर्चा थांबवावी, असे आवाहन केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमांनुसार व वैध असल्याचा त्यांनी [...]
अंत्रोळी प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण अंत्रोळी – (समीर शेख ) जय हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त येथील अंत्रोळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंत्रोळी प्रीमियर लीग (APL) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवारी (दि. ८ एप्रिल) मोठ्या उत्साहात पार पडले. पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींसाठी [...]
Jalna News वडिलांना करायचे होते दुसरे लग्न, मुलाने रागच्या भरात कुऱ्हाडीने केले सपासप वार
पोटच्या मुलानेच बापाची कुर्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज ९ एप्रिल रोजी जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात मुलासह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू (४५) यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती […]
Ratnagiri News –‘ऑपरेशन क्लीन-सी’चा धडाका; एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी आणखी एक नौका जप्त
रत्नागिरीच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाने आपली ‘ऑपरेशन क्लीन-सी’ ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. बुधवारी (08 एप्रिल 2026) मध्यरात्री मिरकरवाडा बंदरात कारवाई करत, पथकाने एलईडी (LED) दिवे लावून मासेमारी करणाऱ्या ‘हलीमा मरीयम’ नावाच्या मच्छिमार नौकेला पकडले. मिरकरवाडा समुद्र क्षेत्रात काही नौका नियमांचे उल्लंघन करून एलईडी दिवे लावून बेकायदेशीर मासेमारी करत असल्याची […]
ॲट्रॉसिटी प्रकरणातील बावची येथील आरोपी रामचंद्र थिटे यांचा जामीन अर्ज फेटाळला
परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील ॲट्रॉसिटी प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे.बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने दि.7 एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे. दि.26 मार्च रोजी थिटे याच्यावर परंडा पोलिस ठाण्यात ॲट्रासिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा पासुन आरोपी फरार आहे. या प्रकरणातील फिर्यादी उमेश भास्कर सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी केली आहे.त्यामुळे आता परंडा पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुधी शिवारातील शेतकरी उमेश सोनवणे यांच्या शेता शेजारील रामचंद्र विक्रम थिटे यांनी जातीय द्वेषातून सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे 45 हजार रुपयांचे नुकसान केले. इतकेच नव्हे, तर “तुला इथे शेती करू देणार नाही” अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर दि.26 मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यात आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी परंडा जिल्ह्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. फिर्यादीच्या वतीने शासकीय विशेष अभियोगता ॲड.गाडे,ॲड.निकाळजे, ॲड.बी.बनसोडे यांनी यूक्तीवाद केला.
हिंदुस्थान क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने आपल्या जीवनातील सर्वात भीषण संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या युवराजला त्यावेळी आपण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने ग्रासले आहोत याची कल्पना होती, पण देशासाठी खेळण्याची जिद्द मोठी होती. विश्वचषकानंतर जेव्हा त्याची प्रकृती अधिक खालावली, तेव्हा डॉक्टरांनी दिलेला इशारा ऐकून तो […]
Ratnagiri News –देवरुख पोलिसांची धडक कामगिरी; आंबा घाटातील दरोडेखोरांना अवघ्या दोन तासांत अटक
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील दख्खन ते आंबा घाट दरम्यान गाडी अडवून, चाकूचा धाक दाखवत आणि मारहाण करून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा देवरुख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पाच आरोपींना जेरबंद केले असून, फरार असलेल्या तीन जणांचा कसून शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहूवाडी, कोल्हापूर) हे आपल्या बोलेरो […]
दुशेरेच्या इंद्रायणीचा दरवळ देशभर! दुशेरे ( विकास जाधव ): कराड तालुक्यातील दुशेरे गावाने पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडत इंद्रायणी भाताच्या माध्यमातून नवे यश मिळवले आहे. कृष्णा नदीकाठच्या सुपीक भूमीत पिकवला जाणारा हा [...]
बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून राडा; पोस्टर लागले, पोस्टर फाडले, वाचा सविस्तर…
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले असतानाच, पाटणा येथील भाजप कार्यालयाबाहेर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, हे पोस्टर भाजप […]
महाबळेश्वर तालुक्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा थरार प्रतापगड ( जितेंद्र कारंडे ) -महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात दुपारच्या सुमारास धाडसी घरफोडीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वर्गीय राघू जानू कदम यांच्या [...]
डॉ.प्राची माळी व डॉ.शाम पाटील यांचा सत्कार
तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची माळी व डॉ.शाम पाटील यांचा उच्च शिक्षणासाठी पीजी साठी प्रवेश मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी , आशा पर्यवेक्षिका स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
मंथन परीक्षेत जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे यश
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेने मंथन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. आराध्या संतोष भातभागे,ञिशा सागर लाड,श्रृतीका सतीश रोहीदास,सानिका प्रदीप भोरे,श्रेया जयवंत वाघमारे,आरोही हनुमंत काळे,जन्नत अब्बास शेख, स्वरा विठ्ठल पवार या विद्यार्थिनींनी मंथन परीक्षेत यश संपादन केले.यशस्वी विद्यार्थीनीना सुशिल क्षिरसागर, सुषमा माने यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात उद्देशिका देवून विजय गायकवाड सन्मानित
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यभर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे 08 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या काळात आयोजन केले आहे. धाराशिव येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 08 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे समता सप्ताहाचे उद्दघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त साहित्यिक इतिहासाचे अभ्यासक विजय गायकवाड यांचा संविधान उद्देशिका देवून जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जात पडताळणी सचिव बलभीम शिंदे, सहाय्यक संचालक अमोल ताकभाते, सहाय्यक आयुक्त सचिन कवले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील कर्मचारीवृंद उपस्थित होते. या सन्मानाबद्दल गायकवाड यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.

28 C