SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
...

सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातले वाघांचे स्थलांतरण

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने महाराष्ट्रातल्या सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात आठ पट्टेरी वाघांचे स्थलांतरण करण्याला अनुमती देऊन, त्याची अंमलबजावणी आरंभल्याने देशभरातल्या वन्यजीव अभ्यासकांचे या घटनेने लक्ष वेधून घेतलेले आहे. पट्टेरी वाघ हा एकेकाळी भारतीय वन्यजीव संपदेचा मुकूटमणी ओळखला जात असल्याने, त्याला राष्ट्रीय प्राण्याचा सन्मान यापूर्वीच लाभलेला आहे. भारतातील नैसर्गिक जंगलांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी त्याचप्रमाणे पेय [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:30 am

अमेरिका-इराण निर्णायक वळणावर ?

मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडणार, असे चिन्ह दिसू लागले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद शिगेला पोहचला असून त्याचे पर्यवसान सशस्त्र संघर्षात आणि त्यानंतर युद्धात होईल, अशी स्थिती आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने इराणच्या युरेनियम संपृक्तीकरण केंद्रांवर वायुहल्ले चढविले होते. इराणचा अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम या हल्ल्यांमुळे काही वर्षे मागे गेला आहे, असे अमेरिकेचे म्हणणे होते. तर [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:30 am

सद्गुरुना शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञानाचा उपदेश घ्यावा

अध्याय चौथा भगवंत म्हणाले, असे विविध प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून विस्तार पावले आहेत. ते सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत. निष्काम कर्मयोगाच्या द्वारे मनुष्य संसारबंधनातून मुक्त होतो. सर्व प्रकारच्या द्रव्यसाधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा “ज्ञानयज्ञ” हा श्रेष्ठ आहे कारण सर्व प्रकारची कर्मे शेवटी ज्ञानामध्येच समाप्त होत असतात. त्यामुळे इतर यज्ञ ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत. ज्ञानयज्ञ हा [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:30 am

नेतृत्व बदलाचा तिढा अन् पिडा!

सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांना डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. कर्नाटकातील राजकीय तिढा सोडवण्यासाठी ठरवलेल्या सत्तासूत्रानुसार डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे. सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांचे असे मत आहे. राहुल गांधी सिद्धरामय्या यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्याला राजकीय कारणेही आहेत. त्यामुळेच कर्नाटकात नेतृत्व बदलाची केवळ चर्चाच सुरू आहे. [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:30 am

झिम्बाब्वेचा आणखी एक उलटफेर यजमान लंकेला दिला धक्का

श्रीलंकेवर 6 विकेट्सनी विजय : सामनावीर रझाची 26 चेंडूत 45 धावांची खेळी,ब गटात 7 गुणासह मिळवले अव्वलस्थान वृत्तसंस्था/कोलंबो आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत ब गटाच्या शेवटच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेने यजमानांना कोलंबोच्या मैदानावर सहज पराभूत केले. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 178 धावसंख्या उभारली. तर प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघाच्या प्रत्येक खेळाडूने महत्त्वपूर्ण धावांचे योगदान देत 19.3 षटकांत [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:05 am

आता लक्ष सुपर एटकडे!

चला संपले एकदाचे साखळी फेरीतील सामने. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक ‘दादा’ देशासाठी हे सामने सराव परीक्षा होती. कमीत कमी तीन विजय मिळवत सुपरएटचं तिकीट मिळवायचं हे प्रथम उद्दिष्ट प्रत्येक संघाचं होतं. भारताने तर विजयाचा चौकार ठोकला. परंतु या चौकारात टायमिंग आणि आत्मविश्वास किती होता, याची चाचपणी भारतीय संघाने करायला हवी. अगदी पहिल्या सामन्यापासून ते [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:00 am

सलग चौथ्या विजयासह विंडीज गटात आघाडीवर

वृत्तसंस्था/कोलकाता आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या क गटातील शेवटच्या सामन्यात विंडीजने इटलीचा 42 धावांनी पराभव केला. या विजयामुळे विंडीजने क गटात सलग चार सामने जिंकून आघाडीचे स्थान मिळविले. अर्धशतक झळकाविणाऱ्या शाय होपला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात इटलीने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 6 बाद 165 धावा [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:00 am

जलतरणात भविष्य उज्वल असलेली आराध्या बोरकर

गोव्यात जलतरणपटूंची वानवा नाहीयं. प्रामुख्याने महिला जलतरणपटूंनी गोव्याचे नाव राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चमकवण्यात यश प्राप्त केले आहे. भारतीय जलतरण संघाचे प्रतिनिधीत्व केलेली मडगावकर भगिनी, संजना प्रभुगावकर, गोव्याची स्विमिंग क्वीन म्हणून संबोधली जाणारी आणि भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून आपल्या कारकिर्दीत 171 सुवर्णपदक मिळविलेली तलाशा प्रभू, श्रृंगी बांदेकर, सुमन पाटील, आरोही बोर्डे तसेच पूर्वी [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:00 am

ऑस्ट्रेलियन महिला संघाचा 19 धावांनी विजय

तीन सामन्यांची टी-20 मालिका, जॉर्जिया व्हॉल सामनावीर वृत्तसंस्था/कॅनबेरा तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात सामनावीर जॉर्जिया व्हॉल आणि बेथ मुनी यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारताचा 19 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पहिला सामना भारताने जिंकला होता. या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:00 am

ऑफ-बिट…इटली…फुटबॉलनंतर क्रिकेटमध्ये ठसा

इटलीचं नाव घेतलं की, सर्वप्रथम आठवतो तो फुटबॉलचा संघ अन् त्या देशानं सदर खेळाला दिलेले एकाहून एक दिग्गज…मात्र त्याच इटलीत क्रिकेटही रुजलाय, वाढलाय हे दाखवून दिलंय ते यंदाच्या टी-20 विश्वचषकानं…त्यांनी नुसता सहभाग घेतलेला नाही, तर योग्य आधार मिळाल्यास बरीच मजल मारण्याची क्षमताही दाखवून दिलीय… भारतासारख्या ठिकाणी एकदम अनोळखी परिस्थितीत खेळावं लागूनही इटलीच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना नि [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:00 am

एका संघात 15 देश

सध्या 20-20 षटकांच्या सामन्यांची आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत एकंदर 20 देशांच्या संघांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी एक संघ असा आहे, की जो एकाच देशाचा समजला जातो. पण प्रत्यक्षात या संघात 15 स्वतंत्र देशांचा समावेश आहे. या संघाचे नाव आहे वेस्ट इंडिज. सर्वसाधारणपणे एक संघ हा एकाच देशाचा असतो. म्हणजे, या संघातील खेळाडू [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:00 am

आजचे भविष्य २० फेब्रुवारी २०२६

मेष : मानसिक शांततेसाठी तणाव दूर करा, पैसा मालमत्तेत गुंतवा वृषभ : नातेवाईकांच्या मदतीने व्यवसायात उत्तम प्रगती मिथुन : पैशासाठी नात्यात कटुपणा आणू नका. पैसा तुमचाच असेल कर्क : कमकुवत इच्छाशक्तीमुळे भावनिक व मानसिक कमजोरी सिंह : कार्यालयीन काम फत्ते होईल, सहकारी, वरिष्ठांचे उत्तम सहकार्य कन्या : चाणाक्ष बुद्धी नवीन गोष्टी त्वरित आत्मसात करेल. प्रयत्न [...]

तरुण भारत 20 Feb 2026 6:00 am

बुलेट ट्रेन फक्त गुजरात्यांसाठीच! आता मराठी माणसांनीही गुजरातला जाऊन व्यापार करावा, गणेश नाईक यांचे परखड विधान

महाराष्ट्र बुलेट ट्रेनने गुजरातला जोडला जाणार आहे. बुलेट ट्रेन फक्त गुजरात्यांसाठीच आहे असे म्हणतात, पण या बुलेट ट्रेनमधून फक्त गुजराती माणसांनीच यावे, असा काही सिद्धांत आहे का, असा परखड सवाल करतानाच बुलेट ट्रेनने मराठी माणसांनीही गुजरातला जावे आणि तिथे व्यवसाय करावा, असे आवाहन वनमंत्री आणि पालघर जिह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज केले. पालघर जिह्यातील […]

सामना 20 Feb 2026 5:30 am

प्रिन्स अ‍ॅण्ड्रय़ू यांना अटक; एपस्टीन फाईल्सने ब्रिटनच्या राजघराण्यात वादळ, नो क्लीन चिट…याला म्हणतात कायद्याचे राज्य

जगातील अनेक देशांतील सत्ता सिंहासनांना हादरे देणाऱ्या एपस्टीन फाईल्समुळे ब्रिटनच्या राजघराण्यात वादळ आले आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील गुन्हेगार एपस्टीनशी संबंध आणि बलात्काराच्या आरोपांत अडकलेले ब्रिटनचे माजी प्रिन्स अ‍ॅण्ड्रय़ू यांना आज अटक करण्यात आली. वाढदिवशीच पोलिसांनी त्यांना घरातून ताब्यात घेतले. ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्याला पहिल्यांदाच अटक झाली असून या अटकेमुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. हिंदुस्थानात एपस्टीन फाईल्सवरून […]

सामना 20 Feb 2026 5:25 am

यशवंत व्हा! आजपासून दहावीची परीक्षा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा राज्यभरातून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. एकूण 23 हजार 683 शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 3 हजार 879 इतकी विद्यार्थी नोंदणीत वाढ झाली आहे. राज्यातील 5 हजार 111 मुख्य केंद्रांवर परीक्षा […]

सामना 20 Feb 2026 5:15 am

एआय भीतीचे नव्हे, भाग्य आणि भविष्याचे प्रतीक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) मुळे अनेक देशांत भीतीचे वातावरण आहे, मात्र हिंदुस्थान एआयकडे भाग्य आणि भविष्याचे प्रतीक म्हणून पाहतो आहे. हिंदुस्थान त्यास विकास यात्रेतील टार्ंनग पॉइंट समजतो,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एआय इम्पॅक्ट समिटमध्ये केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी एआयच्या सुरक्षित वापरासाठी नवे सूत्र दिले. नैतिकता (मोरल M), उत्तरदायित्व (अकाउंटॅबिलिटी A), राष्ट्रीय सार्वभौमत्व […]

सामना 20 Feb 2026 5:13 am

सामना अग्रलेख – एआय महाकुंभ, आत्मनिर्भरतेचे धिंडवडे

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गलगोटिया विद्यापीठाच्या या बनावट रोबोटिक डॉगची पोस्ट केली होती. सत्य उजेडात आल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की मंत्रीमहोदयांवर ओढवली. मुळात अश्विनी वैष्णव हे स्वतः आयआयटीयन आहेत. शिवाय या आंतरराष्ट्रीय एआय संमेलनाचे अध्यक्षही तेच आहेत आणि तेच वैष्णव चीनचा रोबोटिक डॉग भारताचा म्हणून […]

सामना 20 Feb 2026 5:10 am

अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया बंदी करा! एआय समिटमध्ये मॅक्रॉन यांचे हिंदुस्थानला आवाहन

‘एआय इम्पॅक्ट समिट’ला संबोधित करताना मॅक्रॉन बोलत होते. सतत ऑनलाइन असलेल्या अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत मॅक्रॉन यांनी आज तीव्र चिंता व्यक्त केली. ‘जी-7 राष्ट्रांच्या आगामी परिषदेत अन्य मुद्दय़ांबरोबरच एआय आणि डिजिटल साधनांच्या धोक्यापासून मुलांचे संरक्षण यावर चर्चेला आमचे प्राधान्य असेल. जगात ज्या गोष्टींना कायद्याने बंदी आहे, त्या गोष्टींचा लहान मुलांशी संबंध येता कामा नये याची काळजी […]

सामना 20 Feb 2026 5:10 am

लेख –जागतिक आरोग्य संघटनेचे भवितव्य

>> डॉ. संजय गायकवाड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. अमेरिकेने घेतलेली ही भूमिका आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या तत्त्वाला तडा देणारी आहे. यंदाच्या वर्षी अमेरिकेने सुमारे 958 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका निधी जागतिक आरोग्य संघटनेला देणे निश्चित केले होते. ही रक्कम जागतिक आरोग्य संघटनेच्या एकूण खर्चाच्या सुमारे 14 […]

सामना 20 Feb 2026 5:05 am

70 हजार कोटींचा बिर्याणी घोटाळा! रोख पेमेंटची बिले डिलीट, देशभरात लाखो रेस्टॉरंटने लपविली विक्री

प्राप्तिकर खात्याने देशभरात एक मोठा बिर्याणी घोटाळा उघडकीस आणला आहे. वर्ष 2019-20 पासून थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 70 हजार कोटी रुपयांची बिर्याणी विक्री लपवण्यात आल्याचा असून एका बिलिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आल्याचे प्राप्तिकर खात्याने म्हटले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू आणि गुजरातमधील लाखो रेस्टॉरंट्सचा या घोटाळय़ात समावेश आहे. हैदराबाद येथे एका […]

सामना 20 Feb 2026 5:01 am

जाऊ शब्दांच्या गावा –मांजराच्या गळ्यात…

>> साधना गोरे रानटी अवस्थेतल्या माणसाचा कळप ते समाज असा प्रवास झाला. या प्रवासात त्याने काही प्राण्यांनाही माणसाळवलं. त्यातलाच एक प्राणी म्हणजे मांजर. मांजर घरातले उंदीर खाऊन मनुष्याला मदत करतं; पण गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुत्रा, घोडा इत्यादी प्राण्यांप्रमाणे माणसाला त्याचा तसा थेट उपयोग होत नाही. ‘वाघाची मावशी’ म्हणून ओळखला जाणारा हा प्राणी जात्याच मांसाहारी […]

सामना 20 Feb 2026 5:00 am

तयारीला लागा ! महाराष्ट्रासह 22 राज्ये, केंद्र शासित प्रदेशांमध्ये होणार एसआयआर, राज्यांना निवडणूक आयोगाचे पत्र

पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये मतदार याद्यांची ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिज’ (एसआयआर) केल्यानंतर आता निवडणूक आयोगाने 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशा आदी राज्यांमध्ये एसआयआर करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात लवकरात लवकर पूर्वतयारी करण्याचे आदेश या राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया एप्रिल महिन्यापासून सुरू […]

सामना 20 Feb 2026 5:00 am

विमानात गोंधळ घालाल तर थेट प्रवासबंदी!

विमानात आक्षेपार्ह वर्तन किंवा गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना विमान कंपन्या आता थेट 30 दिवसांसाठी बंदी घालू शकतील. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांबाबत कठोर नियमावली करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार अशा प्रवाशांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार विमान कंपन्यांना देण्याचा डीजीसीएचा विचार आहे. सध्याच्या नियमांनुसार, विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांबाबत तक्रार केल्यानंतर समितीमार्फत चौकशी व्हायची. […]

सामना 20 Feb 2026 4:45 am

शासनजमा झालेल्या ‘पीटीसी’समोरील 62 एकर जमिनीच्या फाईल्स गायब; सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कुळ कायद्याचा भंग केल्याने शासनजमा झालेल्या ‘पीटीसी’समोरील 62 एकर जमिनीच्या फाईल्स नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून चोरी केल्याचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि बहुचर्चीत बिल्डर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ‘पीटीसी’समोरील 62 एकर जमीन ही कुळ कायद्याचा भंग करून एका […]

सामना 20 Feb 2026 4:44 am

राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी, करणी सेनेच्या कार्यकर्त्याला अटक

काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली. करणी सनेच्या एका कार्यकर्त्याने ही धमकी दिली होती. तपासानंतर पोलिसांनी राज आमेरा या कार्यकर्त्याला अटक केली आहे. काँग्रेसचे प्रवत्ते पवन खेरा यांनी राज आमेरा याचा धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या व्हिडीओमध्ये राज आमेरा धमकी […]

सामना 20 Feb 2026 4:38 am

सहा महिन्यांत सुरू होणार बीएसएनएलची 5 जी सेवा

सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) 5जी सेवा पुढील सहा महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी यासंदर्भात दिल्लीतील एआय समिटमध्ये माहिती दिली. त्यांनी सांगितले, की पुढील सहा महिन्यांमध्ये बीएसएनएलच्या 5जी सेवेचे दिल्लीत सॉफ्ट लाँच करण्यात येईल. दिल्लीतून 5जी सेवेची चाचणी आणि सुरूवात करण्यात येणार आहे.

सामना 20 Feb 2026 4:30 am

Ratnagiri News –असुर्डे येथे तिहेरी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

मुंबईहून संगमेश्वरकडे जात असताना बेदरकारपणे वाहन चालविल्याने झालेल्या तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. ही घटना चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथे आज (19 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास घडली. सावर्डे पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार अशोक मादगे (वय 35) हे आपल्या कारने पुणे ते साडवली असा प्रवास करत होते. त्यांच्या सोबत पत्नी रूपाली […]

सामना 19 Feb 2026 11:51 pm

हिंदुस्थानला अटी घालणारा अमेरिका कोण? देशाच्या सार्वभौमत्व व आत्मनिर्भरतेशी तडजोड मान्य नाही –सचिन पायलट

व्यापार करार हे आर्थिक प्रगतीचे साधन असतात, परंतु ते समान अटींवर आणि परस्पर लोकहिताच्या आधारावर असले पाहिजेत. देशाच्या सार्वभौमत्वाचा त्याग करून गुलामीकडे नेणारे करार कदापी स्वीकारार्ह नाहीत. व्यापार कराराच्या आडून देशहित आणि लोकहिताची आहुती देता येणार नाही. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार हा दबावाखाली केला असून तो हिंदुस्थानातील अन्नदात्यांचा गळा घोटणारा आहे, असा गंभीर आरोप करुन हिंदुस्थानातील […]

सामना 19 Feb 2026 10:47 pm

इराणला अण्वस्त्रे बनवू देणार नाही, ट्रम्प यांनी इराणला दिला १० दिवसांचा अल्टिमेटम

इराणच्या अण्वस्त्र निर्मितीच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी इराणला स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, त्यांना अण्वस्त्रे निर्मितीची परवानगी कोणत्याही परिस्थितीत दिली जाणार नाही. बोर्ड ऑफ पीसच्या बैठकीत बोलताना ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत अमेरिकेचा विरोध पुन्हा एकदा जगासमोर मांडला आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अमेरिकन प्रशासनाने […]

सामना 19 Feb 2026 10:41 pm

रितेश देशमुखच्या भव्य ‘राजा शिवाजी’चित्रपटाचा पोस्टर रिलीज; १ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आज शिवजयंतीच्या मंगल मुहूर्तावर अभिनेता -दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख याचा महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित हा चित्रपट हिंदुस्थानी इतिहासातील स्वराज्य स्थापनेचा जाज्वल्य प्रवास मोठ्या पडद्यावर मांडणार आहे. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. […]

सामना 19 Feb 2026 8:43 pm

महाराष्ट्रासह २३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये एप्रिलपासून सुरू होणार SIRची प्रक्रिया? निवडणूक आयोगाकडून राज्यांना निर्देश जारी

महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणासह २३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये येत्या एप्रिलपासून विशेष मतदारयादी पुनर्निरीक्षण (SIR) ची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना तयारी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. निवडणूक आयोगाचे सचिव पवन धवन यांनी यासंदर्भातील पत्र राज्यांना पाठवले आहे. बिहारमध्ये SIR ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर उत्तर […]

सामना 19 Feb 2026 8:08 pm

भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रशांत यादव

चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी येथील भाजप नेते प्रशांत यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गुरुवारी अधिकृत नियुक्ती जाहीर केली आहे. रत्नागिरी दक्षिण भागात भाजप संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. प्रशांत यादव यांनी यापूर्वी नगर परिषद तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये [...]

तरुण भारत 19 Feb 2026 7:54 pm

T20 World Cup –गोलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणही झक्कास! कॅरेबियन खेळाडूने इतिहास रचला

ICC T20 World Cup 2026 मध्ये वेस्ट इंडिजने आपल्या बहरदार खेळाने क्रीडा प्रेमींची मन जिंकली आहेत. आज (19 फेब्रुवारी) कोलकाता येथे पार पडलेल्या इटलीविरुद्धच्या सामन्यात संघाने पुन्हा एकदा दमदार खेळाचे प्रदर्शन केलं आणि स्पर्धेत विजयी चौकार मारला. वेस्ट इंडिजने नवख्या इटलीचा 42 धावांनी पराभव केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज शमर जोसेफने गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही कमाल केली […]

सामना 19 Feb 2026 7:45 pm

ISRO च्या माजी अधिकाऱ्याने पत्नीची गळा आवळून केली हत्या, नंतर अटकेसाठी पोलिसांची पाहत बसला वाट

बेंगळुरूच्या सहकार नगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) ६५ वर्षीय माजी नागेश्वर राव यांनी त्यांच्या पत्नीची टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर हा अधिकारी पळून न जाता, पोलिसांच्या अटकेसाठी घरीच वाट पाहत थांबला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नागेश्वर राव आणि त्यांच्या पत्नी संध्या […]

सामना 19 Feb 2026 7:28 pm

अमेरिकेची इराणवर हल्ल्याची तयारी; F-22 आणि F-35 फायटर जेट्स तैनात, इराणकडून NOTAM जारी

अमेरिका आणि इराणमधील तणाव आता टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचला असून, येत्या काही दिवसांत अमेरिका थेट तेहरानवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची तयारी सुरू केली असून, मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेने आपल्या सर्वात घातक F-22 आणि F-35 फायटर जेट्स तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याची कुणकुण लागताच इराणने संपूर्ण देशात NOTAM […]

सामना 19 Feb 2026 7:02 pm

Maharashtra SSC Exam 2026 |दहावीची लेखी परिक्षा उद्यापासून

राज्यभरातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेस सज्ज पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षेला उद्या दि. 20 फेब्रुवारी पासुन सुरुवात होत आहे. यंदा राज्यभरातुन 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थांनी नोंदणी केली [...]

तरुण भारत 19 Feb 2026 7:00 pm

Mumbai News –वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह PSI अडकला ACBच्या ट्रॅपमध्ये, १ लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात लाच घेताना लिपिकाला रंगेहाथ पकडल्याचे प्रकरण गाजत आहे. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मुंबईतील कुरार पोलीस स्टेशनमध्येच मोठी कारवाई केली आहे. १ लाखाची लाच स्वीकारताना कुरार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एका PSI ला ACBने रंगेहाथ पकडले आहे. मुंबईच्या मालाड परिसरात कुरार पोलीस स्टेशनमध्ये ACB ने कारवाई केली. […]

सामना 19 Feb 2026 6:30 pm

क्रिकेट सामना सुरू असताना मधमाशांचा हल्ला, अंपायरचा मृत्यू तर खेळाडू जखमी

क्रिकेटवेड्या हिंदुस्थानात दररोज कुठे ना कुठे क्रिकेट स्पर्धा सुरू असता. भर उन्हात तरुणांसह वयस्कर मंडळी सुद्धा क्रिकेट खेळण्यासह बघण्याचा आनंद घेतात. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये चालू सामन्यात हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूंचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच उत्तर प्रदेशात सामना सुरू असताना मधमाशांनी हल्ला केल्यामुळे 52 वर्षांच्या अंपायरचा मृत्यू झाल्याने एकच […]

सामना 19 Feb 2026 6:18 pm

ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती

माजी आमदार वैभव नाईकांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन मालवण । प्रतिनिधी मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगव्या शाली,भगवे झेंडे, भगवे फेटे, परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज कि [...]

तरुण भारत 19 Feb 2026 5:46 pm

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti |सांगलीत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात ‘मेगा पदयात्रा’ ; जिल्हा प्रशासनातर्फे रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सांगलीत भव्य ‘मेगा पदयात्रा सांगली : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘रयतेच्या राजाला’ आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानाचा मुजरा करण्यात आला. जिल्हा परिषद ते मारुती चौक या मार्गावर [...]

तरुण भारत 19 Feb 2026 5:44 pm

Ratnagiri News –देवघळी बीचचा विकास रखडला; ग्रामस्थांचा ‘जल उपोषण’चा इशारा

सनसेटसाठी प्रसिद्ध असलेल्या कशेळी गावातील ‘देवघळी बीच’वर गेल्या पाच-सहा वर्षांत पर्यटकांची लक्षणीय वाढ झाली असली, तरी मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. निधी मंजूर होऊन वर्कऑर्डर निघाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यामुळे नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. आवळचीवाडी परिसरातील या समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात […]

सामना 19 Feb 2026 5:44 pm

छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सवाचा जल्लोष मध्यरात्री फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत जन्मोत्सव सोहळा

धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव महोत्सव समितीच्या वतीने दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ढोल-ताशांच्या निनादात, शिवभक्तांच्या जयघोषात आणि पारंपरिक सजावटीने नटलेल्या चौकात शिवजन्मोत्सवाचा सोहळा भक्तिमस वातावरणात साजरा करण्यात आला. मध्यरात्री फटाक्याची जोरदार आतषबाजी करून जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिका ‌’जय मल्हार‌’ फेम अभिनेत्री ईशा केसकर यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या आगमनाने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत ‌‘खेळ पैठणीचा‌’ या कार्यक्रमात जल्लोषपूर्ण सहभाग नोंदविला. त्याचबरोबर संगीत खुर्ची, बकेट-चेंडू, फुग्यांचा खेळ, उखाणे स्पर्धा आदी विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला रंगत आणली. महिलांनी व तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सवात सहभाग घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संयोजक तथा यशदा परिवाराचे सर्वेसर्वा सुधीर सस्ते आणि मराठा परिवाराच्या व्यवस्थापक दीपांजली माने यांनी कुशलतेने केले. त्यांच्या परिश्रमांमुळे कार्यक्रमाची मांडणी, शिस्तबद्धता आणि सांस्कृतिक सादरीकरण विशेष उठून दिसले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा भव्यदिव्य स्वरूपात पार पडला. शिवचरित्राचा गौरव आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास समितीचे पदाधिकारी शिवप्रेमी आणि महिला व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 5:42 pm

देवराईतील १८० देशी औषधी प्रजाती व आंबा कलमे जळून खाक

आचरा – टेंबली येथील घटना, पाईपलाईनचेही मोठे नुकसान आचरा प्रतिनिधी आचरा टेंबली येथे लागलेल्या भीषण आगीत निलेश सरजोशी यांच्या देवराई–प्लांट प्रकल्पाला मोठा फटका बसला असून सुमारे ६ ते ७ एकर क्षेत्र बाधित झाले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात एकूण १० एकरांवर सुमारे १८० देशी औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यात येत होते. आगीत [...]

तरुण भारत 19 Feb 2026 5:39 pm

कोल्हापुरात शिवजयंती उत्साहात; मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं, भगवे ध्वज आणि भगव्या पताकांनी वातावरण शिवमय

शककर्ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती जिल्ह्यात विविध पारंपरिक व सामाजिक उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजन्म काळ सोहळा, शिवकालीन महानाट्य, भव्य मिरवणूक आणि विविध मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसह भगव्या पताका, भगवे ध्वज अशा सळसळत्या वातावरणात सर्वजण शिवमय झाले होते. छत्रपती घराण्याकडून पारंपरिक शिवजन्म सोहळा छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत ऐतिहासिक भवानी मंडपातून […]

सामना 19 Feb 2026 5:26 pm

Vande Bharat Express Delay |वंदे भारत एक्स्प्रेसला वाजले की बारा !

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तब्बल दोन तास उशिरा सोलापूर– मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पाटस-दौंड दरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी (दि. १७) रात्री मोठा गोंधळ उडाला. या बिघाडाचा सर्वाधिक फटका गाडी क्रमांक २२२२५ मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला बसला. १०.४० वाजता सोलापूरला पोहोचणारी [...]

तरुण भारत 19 Feb 2026 5:19 pm

Stock Market Today –शेअर बाजार धडाम! निर्देशांक १२०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले

शेअर बाजार आज जोरदार आपटला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२०० अंकांनी कोसळला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही कोसळला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वच सेक्टरमधील कंपन्यांना या घसरणीचा फटका बसला आहे. शेअर बाजार कधी उसळेल आणि कधी आपटेल हे सांगणं सध्या कठीण झालं आहे. मुंबईचा निर्देशांक सेन्सेक्स […]

सामना 19 Feb 2026 5:17 pm

श्रीसिद्धीविनायकचा आधुनिक इन्स्टंट खाद्यपदार्थांकडे प्रवास

धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत श्रीसिद्धीविनायक परिवाराच्या फिलगुडी शॉपचे उद्घाटन परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते बार्शीनाका चौकात करण्यात आले. शहरातील ग्राहकांना शुद्ध, पारंपरिक आणि झटपट तयार होणारे गुळावर आधारित पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गुळ पावडर उद्योगातील यशस्वी वाटचालीनंतर श्री सिद्धीविनायक परिवाराने आता इन्स्टंट प्रीमिक्सच्या माध्यमातून ग्राहकांसाठी नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये गुळ पावडर प्रीमिक्स, गुळ इन्स्टंट लापशी, गुळ इन्स्टंट लाडू, गुळ चहा, गुळ कॉफी, गुळ इन्स्टंट खीर आदी उत्पादनांचा समावेश आहे. चहा व कॉफी वगळता इतर सर्व खाद्यपदार्थांमध्ये दर्जेदार ड्रायफ्रूट्स व तुपाचे मिश्रण करण्यात आले आहे. उत्तम आणि दर्जेदार चव चाखायला मिळणार आहे. या प्रीमिक्सच्या साहाय्याने ग्राहकांना झटपट ड्रायफ्रूट लाडू, खीर यांसह विविध चविष्ट पदार्थ सहज तयार करता येणार आहेत. पारंपरिक चवीला आधुनिक सोयीची जोड देत स्थानिक स्तरावर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. दरम्यान उद्घाटनप्रसंगी श्री सिद्धीविनायक परिवारातील बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी,प्रतीक देवळे ,गणेश कामटे, राजकुमार जाधव, देवीदास कुलकर्णी, अरविंद गोरे, रामचंद्र सारडे, प्रथमेश आवटे, मंगेश कुलकर्णी, प्रद्युम्न मोरे, शुभम मिंडे, महादेव फुलारी यांच्यासह श्री सिद्धीविनायक परिवारातील सदस्य उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 5:10 pm

Solapur News : निवडणूक निकालानंतर सोलापूरमध्ये हार-पुष्पगुच्छांच्या विक्रीत तिप्पट वाढ

निवडणूक काळात हार-पुष्पगुच्छांना विक्रमी मागणी सोलापूर – निवडणुकीच्या काळात राजकीय पुढाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी हार, पुष्पगुच्छांना मोठी मागणी झाली. यावेळी फुल व्यापाऱ्यांचा रोज चार ते पाच हजार रुपयापर्यत होणारा व्यापार निवडणूक निकाल लागल्यानंतर दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत गेला असल्याचे फुल व्यापाऱ्यांनी सांगितले. तसे पाहिल्यास लग्नसभारंभ, सण [...]

तरुण भारत 19 Feb 2026 5:08 pm

राहुल गांधी आणि २५ काँग्रेस खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी, भाजप समर्थक आरोपीला अटक

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला राजस्थानमधील कोटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून दखल घेत ही कारवाई केली. काय आहे प्रकरण? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये संबंधित आरोपीने स्वतःचे नाव राज सिंह असल्याचे सांगितले. त्याने […]

सामना 19 Feb 2026 5:07 pm

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या उपस्थितीत साजरी

धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे वास्तव ग्रुपच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धाराशिव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पाणीपुरवठा सभापती विलास बापू लोंढे, नगरसेवक राहुल काकडे, नगरसेविका वंदना बापू पवार, माजी नगरसेवक बापू पवार यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील असंख्य शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शिवभक्तांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून समाजात न्याय, समानता आणि स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली, या भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे वास्तव ग्रुपच्या वतीने हा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वास्तव ग्रुपचे खंडू चांदणे,भारत कांबळे,सोमनाथ पेठे,अजय चव्हाण , पंकज चव्हाण,वीरा चव्हाण, रोहन कदम,गणेश काशीद,योगेश कसबे,बापू चव्हाण,शिवा तुपे आदी उपस्थित होते

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 5:06 pm

ICC T20 World Cup –‘थला फॉर अ रिझन’; शिवम दुबेची दबावातही झुंजार फलंदाजी, श्रेय महेंद्र सिंग धोनीला

अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने बुधवारी (18 फेब्रुवारी 2026) नेदरलँडविरुद्ध धमकेदार खेळी केली. त्याच्या 66 धावांच्या अमुल्य योगदानामुळे टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड निर्माण झाली. मधल्या फळीत फलंदाजी करताना शिवम दुबेने लौकिकाला साजेसा खेळ केला असून संघालाही त्याचा वेळोवेळी फायदा झाला आहे. शिवन दुबेने आपल्या या आक्रमक आणि संयमी फलंदाजीचं श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र […]

सामना 19 Feb 2026 5:00 pm

Solapur Crime : माळशिरसमध्ये महिला ग्रामपंचायत अधिकारी लाच घेताना रंगेहात

माळशिरस तालुक्यात पूजा लोंढे लाच प्रकरणात अटकेत सोलापूर -माळशिरस तालुक्यातील मोरोची ग्रामपंचायत येथील महिला ग्रामपंचायत अधिकारी पूजा बाबासाहेब लोंढे (वय ३८) यांना कंत्राटदाराकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभागात खळबळ उडाली आहे. णाहितीनुसार तक्रारदार [...]

तरुण भारत 19 Feb 2026 4:56 pm

Kolhapur News |छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य जगभरात वाखाणण्याजोगे ; मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार

कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी कागल:-छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ती केवळ तलवारीच्या बळावर नव्हे तर लोकांच्या विश्वासाच्या आणि न्यायाच्या आधारे. त्यांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून कारभार केला. शेतकरी, महिला, सर्वसामान्य प्रजा यांचा सन्मान राखणारा राजा म्हणून त्यांची ओळख होती. जगभरात [...]

तरुण भारत 19 Feb 2026 4:47 pm

ब्रिटनच्या राजघराण्यात भूकंप! एपस्टाईन फाइल्स प्रकरणात प्रिन्स अँड्र्यूला अटक

ब्रिटनच्या राजघराण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे पुत्र आणि किंग चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स अँड्र्यू (Prince Andrew) यांना अटक करण्यात आली आहे. कुप्रसिद्ध जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित नवीन फाइल्स समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री […]

सामना 19 Feb 2026 4:24 pm

Satara News |कोरेगाव पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारत उभारणार: सुनील फुलारी

सातारारोड पोलीस दुरुक्षेत्राचे ठाण्यात रूपांतर? एकंबे -कोरेगाव पोलीस ठाण्याची ब्रिटिशकालीन इमारत व पाठीमागील पोलीस वसाहत जीर्ण अवस्थेत असून नवीन इमारतीचा प्रस्ताब शासन दरबारी सादर करण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर नवीन इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील [...]

तरुण भारत 19 Feb 2026 4:14 pm

जय भवानी…जय शिवाजी !, हर हर महादेव! रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या निनादात आणि लेझीमच्या गजरात, अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती निमित्त आज रत्नागिरी शहरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने आणि पोलीस बँडने दिलेल्या विशेष सलामीने वातावरणात जल्लोष निर्माण झाला होता. महाराजांचे शौर्य, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांची युवकांना जोडणे […]

सामना 19 Feb 2026 4:09 pm

खरे खुरे जनतेचे कैवारी पवनराजे निंबाळकर होते

धाराशिव (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे लोकनेते, स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त आज पवनराजे कॉम्प्लेक्स येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. हा दिवस केवळ स्मरणाचा नसून, पवन राजे यांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा दिवस असल्याचे सांगून खरे खुरे जनतेचे पवन राजेनिंबाळकर कैवारी होते अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. या जयंती दिनाचे औचित्य साधून पवनराजे कॉम्प्लेक्स येथील त्यांच्या प्रतिमेस व स्मृतीस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. साहेबांनी आयुष्यभर जोपासलेली मूल्ये आणि जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख नंदू राजेनिंबाळकर, अतिश पाटील, शहर प्रमुख सोमनाथ गुरव, प्रवीण कोकाटे, राजाभाऊ पवार, गणेश खोचरे, संभाजी सलगर, प्रशांत साळुंके, नितीन गरड, मनोज पडवळ, मोईन पठाण, सतीश लोंढे, विनोद केजकर, शहाजी पवार, अमित लोंढे, बापू चव्हाण, हनुमंत देवकत्ते, सह्याद्रीराज राजेनिंबाळकर, रवी कोरे, महेश उपासे, संदीप शिंदे, सुरज पडवळ, प्रभाकर राजेनिंबाळकर, ओम भिसे, गायकवाड उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी पवनराजे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. “साहेबांचे कार्य हे आमच्यासाठी सदैव मार्गदर्शक राहील,“ अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:55 pm

भूमची ओळख आता खवा क्लस्टर म्हणून राहणार- डोंगरे

भुम (प्रतिनिधी)- भूम तालुक्याची ओळख आता केवळ दूध उत्पादक तालुका न राहता खवा क्लस्टर म्हणून व्हावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन भूम येथील उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधीकारी धाराशीव राजकुमार मोरे तसेच प्रकल्प संचालक आत्मा धाराशीव विष्णू मिसाळ, उपविभागीय कृषी अधिकारी भूम भागवत सरडे आणि तहसिलदार भूम जयवंत पाटिल व इतर मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भूम यांच्या वतीने बुधवार दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी रामहारी मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार-विक्रेता संमेलन आणि केळी पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी आणि खवा व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भूम आणि वाशी परिसरातील खवा उद्योगाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात केळी पीक परिसंवाद 2026 पार पडला. यावेळी कृषी विद्यापीठातील केळी पिकातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी भूम अतूल ढवळे यांनी केले. तसेच सुत्रसंचालन हर्षल यादव यांनी केले. आभार प्रदर्शन रोशनी भामरे यांनी केले. या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमासाठी केळी पिकासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोके, प्रताप गाढवे, रवी गवळी, आबासाहेब जाधव, योगेश म्हसे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच खवा खरेदिदार -विक्रेता संमेलन याकरीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनोद जोगदंड, भरत दळवे हे मान्यवर लाभले. या कार्यक्रमासाठी अंदाजे 600-700 शेतकरी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:55 pm

विख्यात भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांचे निधन

प्रतिनिधी | सिंधुदुर्ग ओरोस येथील रहिवासी व आंतरराष्ट्रीय किर्तीचे भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांचे बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आह भूगर्भशास्त्र या विभागात डॉ. एम. के. प्रभू यांचे नाव साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कोयना येथे [...]

तरुण भारत 19 Feb 2026 3:54 pm

मॉडेल इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी रंगला रंगमंच !

कळंब (प्रतिनिधी)- शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. येथील साई मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या हस्ते देवी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार गोपाल तापडिया, कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, अनंतराव देशमुख तसेच संस्थेचे अध्यक्ष करसन पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्षा कापसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्नेहसंमेलन महत्त्वाचे व्यासपीठ आहे.” त्यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्या लता यंदे यांनी करत वर्षभर राबविण्यात आलेल्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती दिली. स्नेहसंमेलनाची सुरुवात गणपती गीताने झाली. त्यानंतर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक, कोळीगीत, ‌‘तितली‌’, ‌‘बिजुरिया‌’, विठ्ठल गीत आदी सादरीकरणांतून विद्यार्थ्यांनी रंगतदार कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन व आभार शुभांगी पालकर व बाळासाहेब मुळे यांनी प्रभावीपणे केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख सारिका चव्हाण यांच्या नियोजनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ओलंपियाडमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव ओलंपियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गिलडा पलक, रणदिवे आर्या, पाटील स्वराली व वाघमारे प्रणित या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . संगीत क्षेत्रातही प्रथम श्रेणी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई आयोजित परीक्षेत विशेष तबला वादनात माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माधव कुलकर्णी तसेच पखवाज वादनात विद्यार्थिनी शिवयोग कडबने यांनी प्रथम श्रेणी मिळविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. नगराध्यक्षांचे इंग्रजीतील मार्गदर्शन चर्चेत नगराध्यक्षा कापसे यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन इंग्रजी भाषेत केले. आजवर अनेक नगराध्यक्षांनी पद भूषविले; मात्र विद्यार्थ्यांशी इंग्रजीत संवाद साधण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याने उपस्थितांमध्ये याची विशेष चर्चा रंगली. शिक्षण व विकासाच्या दृष्टीने हा सकारात्मक संदेश असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबिका कदम, वैशाली राऊत, आयेशा पठाण, नंदिनी खरबड, सौ. इंगळे, सुप्रिया चव्हाण, आम्रपाली कसबे, जनाबाई थोरात, सारिका चव्हाण, अभंग साक्षी, भारत शिंदे, दामोदर शिंदे, सौ. जोशी, पोपट लोमटे, बसवेश्वर शिंगणापूरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती माने, पवार, सौ. उबाळे, संजीव शेळके, दत्तात्रय ताटे, अशोक पुरी यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व बौद्धिक क्षमतांना नवे व्यासपीठ मिळाले असून, कार्यक्रमाने उपस्थित पालक व नागरिकांची मनं जिंकली.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:54 pm

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेत रयत केंद्रस्थानी होती- डॉ. विकास सरनाईक

धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना रयतेच्या सुखाचा प्रामुख्याने विचार केला. रयतेच्या या स्वराज्यात रयत सुरक्षीत रहावी यासाठी मां साहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळी कोणताही भेदभाव न करता या मातीतील अठरापगड जातीतल्या माणसाला जपले आणि योग्य न्याय दिला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेत रयत केंद्रस्थानी होती. असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. विकास सरनाईक यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय समापनाप्रसंगी प्राचार्य डॉ संदीप देशमुख म्हणाले की, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण विश्वात छत्रपती शिवाजी महाराजांना अभ्यासक व्यवस्थापन गुरू म्हणून देखील ओळखतात. कारण युद्ध तोंडावर असताना शेतकरी बांधवांना गैरसोय होऊ नये म्हणून अगोदरच शेतरस्ते तयार करायचे म्हणजे शेतात पिकांचे नुकसान होणार नाही आणि पिक व्यवस्थितपणे आले तर रयत उपाशी रहाणार नाही ही दुरदृष्टी त्यांच्याकडे होती. यावेळी छत्रपती शिवाजी हायस्कूलची विद्यार्थ्यांनी गौरी माळी हिने देखील आपले मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने आठवावा शिवप्रताप या शिर्षकाखाली गुलमोहर भित्तिपत्रिकेचे प्राचार्य डॉ. देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन केले. सदर प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ मंगेश भोसले, कनिष्ठ विभाग प्रमुख बबन सुर्यवंशी, प्रा डॉ. केशव क्षीरसागर,प्रा गोंदकर, प्रा विवेकानंद चव्हाण, प्रा माधव उगिले, सुमेर कांबळे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बालाजी गुंड यांनी केले. तर आभार मनिषा मस्के हिने मानले.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:54 pm

महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार तानाजी क्षिरसागर यांना जाहीर

तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हा आरोग्य विभागाचे सुरवायझर तानाजी क्षिरसागर यांना सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन 2024 - 25 या वर्षीचा राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार“ जाहीर करण्यात आला असुन हा पुरस्कार प्राप्त करणारे तानाजी क्षिरसागर हे संपुर्ण महाराष्ट्रातुन एकमेवर आरोग्य सुपरवायझर आहेत. हा पुरस्कार महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, एक लाख रूपये असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो. तानाजी क्षिरसागर यांनी आपले आरोग्य विषयक काम व्यवस्थीत सांभाळुन त्यांनी अतिरीक्त आरोग्य विषयक कामकाज उत्कृष्टरित्या पार पाडले आहे. विविध आरोग्य विषयक कामकाजामध्ये आरोग्य शिबीरे, कुटुंब कल्याण, क्षयरोग, कुष्ठरोग, अंधत्व, हत्तीरोग मोहिम, पल्स पोलीओ मोहिम, कोरोना काळातील उल्लेखनिय काम, स्वच्छता अभियान, वारकरी पायी पालखी नियोजन, यात्रा महोस्तव, वृक्षारोपण, बगीचा व इतर कार्यक्रमात उल्लेखनिय कामे केलेले आहेत. राज्यस्तरीय हा पुरस्कार 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्षिरसागर यांना देण्यात येणार आहे. त्यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत धाराशिव जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत आरोग्य विभाग, जि. प. धाराशिव मार्फत तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खडी फोड मजुर, विटभट्टी मजुर, खनिज काम करणारे मजुर व इतर मजुरांसाठी आरोग्य विषयक कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे आरोग्य विषयक लागणाऱ्या साहित्यासाठी मुंबई येऊन सी.एस.आर. फुडातुन आरोग्य उपकेंद्र बारूळ ता. तुळजापूर येथे रू. 4,65,000/- व प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी ता. धाराशिव येथे रू. 6,21,114/- इतकी रक्कम फंडातुन मिळवुन दिल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय, बारूळ ता. तुळजापूर व प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी यांच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच आर.आर.पाटील सुंदर गाव योजना अंतर्गत सहभागी झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या तपासणी समितीचे सदस्य म्हणुन निवड करण्यात आली होती. तानाजी क्षिरसागर यांनी नागपूर, पैठण, धाराशिव, सोलापूर छत्रपती संभाजीनगर येथे विविध आरोग्य विषयक प्रशिक्षण पुर्ण केल्याबद्दल त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबाच्या जीवनावर आधारीत पोळा ही कथा लिहिली आहे आरोग्य विभागातील उत्कृष्ठ कामा बाबत त्यांना सन 2006 मध्ये आगाऊ वेतनवाढ देऊन गौरव केला तसेच जिल्हा स्तरावरील पुरस्काराने सन 2023 - 24 व 2024-25 असे सतत दोन वर्ष प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यांनी स्वयंस्फुर्तीने राबविलेले कार्यक्रम हे जनमानसात फारच आकर्षक ठरले होते. कन्येच्या लग्न सोहळ्यात वृक्षा बाबत संवर्धन आणि जोपासनेसाठी जनजागृती केली होती. ते वृक्षारोपणाबाबत सातत्याने जनजागृतीचे काम करत आलेले आहेत. तानाजी क्षिरसागर यांची राज्यांतर्गत अभ्यासदौऱ्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्या आदेशान्वये “राज्यांतर्गत सिंधुदुर्ग “या जिल्ह्यासाठी पाच दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी विशेष निवड करून सिंधुदुर्ग येथे पाठविण्यात आले होते. त्यांना मिळालेल्या “ वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार पुरस्कार“ या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचे जिल्हा व तालुकास्तरातील अनेक मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले असुन त्यांच्या सार्वजनिक कार्याबद्दल शुभेच्छ्या व्यक्त केल्या आहेत.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:53 pm

आलूर -बोळेगाव प्रलंबित रस्ता काम लागणार मार्गी, डॉ. रामलिंग पुराणे यांच्या पाठपुराव्याला यश

मुरुम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ब मुरूम मोड ते मुरूम -आलूर -बोळेगाव मार्गे अक्कलकोटला जोडणारा रस्ता काम घिसाड घाईने उरकण्यात आले त्यामुळे रस्त्यावर ठिठिकाणी खड्डे पडले आहेत त्याचबरोबर आलूर -बोळेगाव रस्ता काम अद्याप प्रलंबित असल्याने वाहतुकीस, नागीरकांना त्रासाना सामोरे जावे लागत आहे, याबाबत समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी 14 सप्टेंबर रोजी सदरील प्रलंबित रस्त्यावरील पाणी साचलेल्या खड्ड्यात बसून लाक्षणिक आंदोलन करीत संबंधित विभागाला रस्ता काम तात्काळ पूर्ण करावी अशा मागणीचे पत्र दि. 18. 09. 2025 व दि. 06 ऑक्टोबर रोजी ईमेलच्या माध्यमातून केली होती अन्यथा दि. 14 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा ईशारा पत्रात दिला होता. संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दि. 13 ऑक्टोबर रोजी मुरूम पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, राष्ट्रीय महामार्ग विभाग अधिकारी, शेतकरी, बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्यात बैठक संपन्न झाली आणि सदरील 1300 मीटर रस्त्यावर तूर्तास दुरुस्ती करण्यास शेतकऱ्यांनी समत्ती दर्शवली त्यामुळे आणि संबंधित विभागाच्या लेखी आश्वासना नंतर 14 ऑक्टोबर रोजीचा आंदोलन स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित विभागाने तात्काळ मुरूम मोड ते बोळेगाव रस्त्यावरील ठिक ठिकाणचे खड्डे दुरुस्ती काम आणि प्रलंबित रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आले. मात्र डांबारीकरण काम अद्याप प्रलंबित आहे, सदरील विषयावर डॉ. पुराणे यांचा कायम पाठपुरावा चालू होता पुन्हा 11 जानेवारी 2026 रोजी पत्र पाठवून प्रलंबित आलूर -बोळेगाव रस्ता (1300) रस्ता काम पूर्ण करण्यास विनंती केली होती, मात्र शेतकऱ्यांची अधिक जमीन अधिग्रहण म्हणजे भूसंपादन रक्कम मंजुरी मिळाले नसल्याने सदरील रस्ता काम अद्याप प्रलंबित आहे. दि. 18. 02. 2026 रोजी संबंधित विभागानी पत्र पाठवून सदरील रस्ता कामासाठी भूसंपादन ची मंजुरी भूतल परिवहन मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झाली असून सदरच्या मंजुरी अन्वये भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून आलूर बोळेगाव रस्त्याचे (1300मी ) रस्ता काम हाती घेऊन पूर्ण करण्यात येणार असल्याबाबत पत्राद्वारे डॉ. रामलिंग पुराणे यांना कळवीण्यात आले आहे.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:52 pm

शिवजयंतीनिमित्त पोवाड्यांतून शिवचरित्राचा जयघोष

धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध इतिहास शिवशाहीर बिहारीलाल राजपूत यांच्या दमदार पोवाड्याने झाली. “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत तसेच जिजाऊ वंदना सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे गायिली.यानंतर शिवशाहीर राणा जोगदंड व त्यांच्या संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आला. या कार्यक्रमात शिवचरित्रातील पराक्रम,स्वराज्याची प्रेरणा आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. तसेच शुभम खोत व सहकलाकारांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. श्रीपतराव भोसले हायस्कूलचे संगीत शिक्षक महेश पाटील यांनी “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती”, “मल्हार वारी मोतीयांनी द्यावी भरून- नाहीतर देवा जातो मी दुरुन”, “आम्ही अंबेचे गोंधळी”, “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श,स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रभावशाली वर्णन शिवशाहीरांनी पोवाड्यांच्या माध्यमातून उपस्थितांना ऐकविले. यामुळे वातावरण भारावून टाकले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,जिल्हा विधी प्राधिकरण सचिव न्या.भाग्यश्री पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, उप विभागीय अधिकारी ओंकार देशमुख, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे, कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा कापसे, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:52 pm

गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी जिल्ह्यात उपशामक सेवेची सुरुवात; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने उपक्रम

धाराशिव (प्रतिनिधी)- गंभीर आजारांनी त्रस्त आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात उपशामक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपशामक सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे.अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय धाराशिव,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून ही रुग्णसेवा आयोजित करण्यात आली आहे.समुपदेशनाद्वारे रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हा रुग्णालयात दहा स्वतंत्र उपशामक काळजी बेडची व्यवस्था करण्यात आली असून उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्व उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालय येथे आठवड्यातून एक दिवस विशेष तज्ज्ञ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. येथे मानसोपचारतज्ज्ञ,फिजिओथेरपिस्ट आणि डॉक्टर यांच्या माध्यमातून उपचार दिले जाणार आहेत. जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना या सेवेचा लाभ दिला जाईल. कर्करोग, हृदयरोग, मेंदूचे आजार, अर्धांगवायु, एड्स तसेच उपचाराने पूर्णपणे बरे न होणाऱ्या आजारांनी त्रस्त रुग्णांना गट अ (गंभीर), गट ब (मध्यम) व गट क (सौम्य) अशा प्रकारे वर्गीकृत केले जाईल. गट अ व ब रुग्णांच्या वर्गीकरणानुसार गृहभेटीद्वारे आवश्यकतेनुसार उपशामक उपचार देण्यात येणार आहेत. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी घरपोच सेवेचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमार्फत सामुदायिक आरोग्य अधिकारी आणि आशा स्वयंसेवकांच्या माध्यमातून ही सेवा गावपातळीपर्यंत विस्तारली जाणार आहे.प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी गृहभेटी देऊन तपासणी,औषधोपचार व समुपदेशन करतील.त्यामुळे रुग्णांना वारंवार रुग्णालयात जाण्याचा त्रास कमी होईल. तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही आवश्यक मार्गदर्शन मिळेल. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांनी की,जिल्ह्यात सुरू होणारी ही उपशामक सेवा गंभीर आजारी रुग्णांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरेल.या रुग्णांना वेदना, मानसिक ताण,नैराश्य,श्वास घेण्यास त्रास व अशक्तपणा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. उपशामक सेवेच्या माध्यमातून आजाराच्या उपचारांसह वेदना नियंत्रण, मानसिक आधार, सामाजिक सेवा आणि आध्यात्मिक समुपदेशन प्रदान करण्यात येईल. तसेच रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांनाही समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:51 pm

24-25 फेब्रुवारीला तुळजापुरात ‌‘तुळजाभवानी कृषी महोत्सव‌’

धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा तसेच शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी आणि शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद घडावा या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग,कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ‌‘श्री. तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026‌’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2026 रोजी सैनिक विद्यालय मैदान,नळदुर्ग रोड, तुळजापूर येथे होणार आहे. कृषी महोत्सवाचे उद्घाटन प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते होणार असून सर्व लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. या कृषी महोत्सवामध्ये एकूण 60 दालने उभारण्यात येणार असून त्यापैकी 35 दालने शासकीय योजना व प्रकल्पांसाठी तर उर्वरित दालने खाजगी संस्थांसाठी असतील. महोत्सवात कृषी प्रदर्शन,परिसंवाद चर्चासत्र,उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालन तसेच शेतकरी सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय कृषी विद्यापीठांची दालने, विविध संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्र व प्रक्रिया उद्योगांचे विशेष सादरीकरण आणि परिसंवादही आयोजित करण्यात येणार आहेत. कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राच्या समन्वयाने विविध पिकांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोयाबीन,हरभरा,फळबाग लागवड आदी पिकांच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत तसेच निर्यातक्षम केळी लागवड तंत्रज्ञान,रेशीम लागवड व्यवस्थापन, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन,कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे ऊस शेती उत्पादन व व्यवस्थापन,आंबा लागवड तंत्रज्ञान व मोहोर व्यवस्थापन इत्यादी विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये उच्च तंत्र व नवनवीन तंत्रज्ञान,संधी व व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी कृषी महोत्सवास अवश्य भेट द्यावी,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:51 pm

पॅनेल विधिज्ञ” पदासाठी 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समिती यांच्या स्तरावर “पॅनेल विधिज्ञ” या पदाकरिता काम करण्यास इच्छुक असलेल्या विधिज्ञांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.23 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. धाराशिव तालुका कार्यक्षेत्रातील विधिज्ञांनी आपले अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद येथे सादर करावेत.तसेच उमरगा,भूम, परंडा,तुळजापूर,कळंब,वाशी आणि लोहारा या तालुक्यांतील इच्छुक विधिज्ञांनी संबंधित तालुका विधी सेवा समितीच्या न्यायालय परिसरातील कार्यालयात अर्ज सादर करावेत.अर्ज 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी (सुट्टीचे दिवस वगळून) सादर करणे आवश्यक आहे.निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत,याची सर्व विधिज्ञांनी नोंद घ्यावी. सदर माहिती जिल्हा न्यायालय, उस्मानाबाद यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.तरी इच्छुक विधिज्ञांनी या संधीचा लाभ घ्यावा व निर्धारित मुदतीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद तसेच संबंधित तालुका विधी सेवा समिती येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:50 pm

छत्रपती शिवाजी महाराज मुल्याधिष्ठित आणि न्यायप्रधान व्यक्तीमत्व

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या इतिहासात एक अद्वितीय, लोकोत्तर व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहतात. त्यांच्या आधी होऊन गेलेले, त्यांच्या समकालीन तसेच त्यांच्या नंतरच्या असंख्य राज्यकर्त्यांच्या तुलनेत ते सर्वार्थाने सर्वश्रेष्ठ ठरतात. कारण त्यांचे शासन केवळ सत्ता, विस्तार किंवा वैभव यांवर आधारलेले नव्हते, तर ते माणूस केंद्रित, मूल्याधिष्ठित आणि न्यायप्रधान होते. धर्म, जात, पंथ किंवा कुळ यांपलीकडे जाऊन माणसातील गुण, कर्तृत्व आणि प्रामाणिकपणा यांना महत्त्व देणारी राज्यव्यवस्था शिवरायांनी उभी केली. जातीपातीची उतरंड झुगारून देत, सामान्य घरातील माणसालाही त्याच्या गुणवत्तेनुसार जबाबदारी आणि सन्मान मिळू शकतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच स्वराज्यातील अनेक महत्त्वाची पदे ही समाजाच्या तळागाळातील, खेड्या पाड्यातील, वाडीवस्त्यांतील तरुणांच्या खांद्यावर आली. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी केवळ भूमीवर मर्यादित नव्हती. समुद्राचे सामर्थ्य त्यांनी ओळखले आणि भारतीय आरमाराची पायाभरणी केली. परकीय सत्तांनी समुद्रावर वर्चस्व गाजवण्याच्या कितीतरी आधी, स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी आरमार आवश्यक आहे, हे जाणून त्याची स्थापना करणारे ते भारतातील पहिले शासक ठरतात. त्यांचा राज्यकारभार कर गोळा करण्यापुरता कधीच सीमित नव्हता. रयत कर भरण्यास सक्षम झाली पाहिजे, तिच्या हातात उत्पादनाची साधने असली पाहिजेत, ही त्यांची मूलभूत भूमिका होती. भूमिहीनांना शेतीसाठी जमीन देणे, शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देणे, ते कर्ज निव्वळ नफ्यातून हळूहळू फेडून घेणे, दुष्काळासारख्या आपत्तीमध्ये कर्ज आणि शेतसारा माफ करणे, तसेच मशागतीसाठी बैल आणि साधने स्वराज्याकडून कर्जाऊ स्वरूपात देणे, हे सारे निर्णय त्यांच्या शेतकरीहितैषी धोरणाचे जिवंत उदाहरण होते. शिवकालीन पाणीव्यवस्था आजही अभ्यासाचा विषय ठरते. गडकोटांवरील पाण्याचा काटकसरीने वापर, त्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन यासाठी कठोर नियम होते. वृक्षतोडीविरोधी कायदे करून पर्यावरणाचे भान त्यांनी त्या काळातच राज्यकारभाराचा अविभाज्य भाग बनवले. स्त्रियांच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी शिवाजी महाराजांनी अत्यंत कठोर कायदे केले आणि ते तितक्याच कठोरतेने अंमलात आणले. स्त्री ही उपभोगाची वस्तू नाही, तर समाजाचा सन्मान आहे, ही भूमिका त्यांच्या प्रत्येक निर्णयातून स्पष्टपणे दिसून येते. राज्यकारभार लोकांच्या भाषेतच व्हावा, या हेतूने मराठी भाषेतील शब्दकोश तयार करून घेतला गेला. प्रशासन, न्याय आणि व्यवहार स्वभाषेतून चालवण्याचा आग्रह त्यांनी धरला. वेळेचे भान आणि शिस्त याबाबत शिवाजी महाराजांइतका आग्रही शासक मध्ययुगीन इतिहासात क्वचितच सापडतो. अकल्पित, धाडसी आणि तरीही यशस्वी लष्करी मोहिमा आखणे, भूगोल आणि ऋतुमानाचा अचूक वापर करणे, गरज भासल्यास स्वतः रणांगणावर उतरून नेतृत्व करणे, अशा असामान्य युद्धनीतीमुळे ते एक अद्वितीय रणधुरंधर ठरतात. त्यांची युद्धनीती केवळ तलवारीवर नव्हे, तर बुद्धी, नियोजन आणि माणसांवरील विश्वासावर आधारलेली होती. सामान्य घरातील पोरांना एकत्र बांधून, त्यांच्या अंगी असलेले गुण हेरून, त्यांना संधी देऊन, पुढे त्यांचे पराक्रमी सरदारांमध्ये रूपांतर करणे, हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनाच शक्य झाले. अशा असंख्य असामान्य, अद्वितीय गुणांमुळेच साडेआठ जिल्ह्यांपुरते मर्यादित असलेले स्वराज्य उभे करणारे शिवाजी महाराज हे त्यांच्या पेक्षा कितीतरी पटींनी मोठ्या साम्राज्यांचे अधिपती असलेल्या राज्यकर्त्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. आणि हे मत केवळ भावनिक अभिमानाचे नसून, जगातील निष्णात इतिहासकारांनी मान्य केलेले ऐतिहासिक सत्य आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील, ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे लोकोत्तर व्यक्तिमत्त्व, त्यांची महती आणि त्यांचे रयतेशी असलेले नाते स्पष्टपणे दिसून येते. अशा रयतेच्या राजांना अशा लोकोत्तर लोकनायकाला आपल्या शिवबा राजांना मनोभावे मानाचा मुजरा दौलत निपाणीकर. धाराशिव

लोकराज्य जिवंत 19 Feb 2026 3:50 pm

Sangli Crime : सांगलीच्या युवकाचा शहापूरमध्ये खून

इचलकरंजी महापालिका हद्दीत शहापूरमध्ये युवकाची निघृण हत्या उघडकीस यड्राव – इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील शहापूर येथील कृष्णा नगर परिसरातील महालक्ष्मी नगर येथे युवकाचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून निघृणपणे खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. शाहीद शब्बीर शेख (रा. शामराव नगर, सांगली) असे मयत युवकाचे नाव असून खुनाचे [...]

तरुण भारत 19 Feb 2026 3:42 pm

दक्षिण कोरियात मोठी खळबळ! मार्शल लॉ लावणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्षांना जन्मठेपेची शिक्षा; पाहा काय आहे प्रकरण

दक्षिण कोरियातून एक मोठी बातमी समोर येत आहे. देशात मार्शल लॉ (Martial Law) लागू करून लोकशाही पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करणारे माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल (Yoon Suk Yeol) यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दक्षिण कोरियाच्या विशेष न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. काय आहे प्रकरण? डिसेंबर २०२४ मध्ये यून सुक येओल यांनी राष्ट्राध्यक्ष पदावर […]

सामना 19 Feb 2026 3:39 pm

Shiv Jayanti |सांगलीत शिवजयंतीनिमित्त भगव्या उत्साहाची दिमाखदार लाट

सांगली शहर शिवजयंतीनिमित्त भगव्या रंगात न्हालले सांगली -शिवजयंतीनिमित्त सांगली शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहे. जागोजागी उभारलेल्या कमानी, फडकणारे भगवे झेंडे, पताका आणि रोषणाईमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी शिवजयंतीच्या स्वागताचे [...]

तरुण भारत 19 Feb 2026 3:29 pm

Photo –छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आणि विभागप्रमुख महेश सावंत यांच्या प्रयत्नांतून मुंबईच्या राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेत्या […]

सामना 19 Feb 2026 3:26 pm

AI Impact Summit चा फज्जा! भर स्टेजवर मोदींसमोरच दोन एआय कंपन्यांच्या CEOमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

हिंदुस्थानात आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ (India AI Impact Summit) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जगातील आघाडीच्या दोन एआय कंपन्यांच्या प्रमुखांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, भर स्टेजवर या दोन्ही दिग्गजांमधील बेबनाव उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्सनी याला ‘एआय समिटचा फज्जा’ […]

सामना 19 Feb 2026 3:19 pm

Ramadan 2026 |अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला आजपासून सुरुवात

आजपासून रमजानचे रोजे सुरू कोल्हापूर – हिलाल कमिटी चांद कमिटीची मिटींग मौ. मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम बोर्डिंगमध्ये सायंकाळी मगरीब नमाजनंतर झाली. मिटींगमध्ये मुंबई हिलाल कमिटी, अमारते शरीआ पटना, दारूल [...]

तरुण भारत 19 Feb 2026 3:17 pm

Kolhapur Crime : सासने कॉलनी परिसरात घरावर सशस्त्र हल्ला

कोल्हापूरमध्ये विशाल मांगोरे आणि टोळीवर पोलिसांची कारवाई कोल्हापूर– सासने कॉलनी आणि परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने बिशाल मांगोरे आणि त्याच्या साथीदारांनी सचिन पोतदार याच्या घराबर मंगळवारी उशिरा सशस्त्र हल्ला केला. याप्रकरणी पोतदार यांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी बिशाल मांगुरे, शहरुख शेख [...]

तरुण भारत 19 Feb 2026 3:04 pm

म्हापण माळरानावर गवताने घेतला पेट

म्हापण / प्रतिनिधी म्हापण माळरानावर गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. गवताने अचानक पेट घेतल्याने आग सर्वत्र विखुरली. लागलेल्या आगीत काही भागातील काजू व आंब्याची कलमेही जळाली असून आग विजवण्यासाठी नागरिक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र वारा आणि माळरानावरील सुके गवत यामुळे आगीने पेट घेतला.

तरुण भारत 19 Feb 2026 2:55 pm

चिनी रोबोट प्रकरणी केलेला दावा आला अंगाशी? ‘गलगोटियास’च्या प्रोफेसरचा ‘Open To Work’फोटो व्हायरल!

नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये चिनी बनावटीच्या ‘रोबोटिक डॉग’ला स्वतःच्या विद्यापीठाने बनवल्याचा कथित दावा करणे गलगोटियास विद्यापीठाच्या प्रतिनिधीला चांगलेच महागात पडले आहे. या वादामुळे संबंधित प्राध्यापिका नेहा सिंह यांचा ‘Open To Work’ असा उल्लेख असलेला लिंकडइन प्रोफाईल फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इंग्रजी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गलगोटियास विद्यापीठाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या […]

सामना 19 Feb 2026 2:36 pm

‘विकासासाठी एक नवा पैसाही उरला नाही’; निवडणुकांमधील ‘मोफत’खिरापतीवरून सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना झापले

निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या ‘मोफत’ आश्वासनांच्या (Freebies) संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. ‘मोफत अन्न, मोफत वीज आणि सायकल… अशा मोफत गोष्टी वाटत राहिलात, तर राज्याच्या विकासासाठी पैसा कुठून आणणार?’असा सडेतोड सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या तमिळनाडूतील ‘पॉवर डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन’ने आर्थिक स्थितीचा विचार न करता सर्व ग्राहकांना […]

सामना 19 Feb 2026 2:07 pm

मला रोहितची काळजी वाटते, मुख्यमंत्र्यांनी त्याची सिक्युरिटी रिव्ह्यू करावी, सुप्रिया सुळे यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुद्दे मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः रोहित पवारांच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला […]

सामना 19 Feb 2026 2:03 pm

Shiv Jayanti |शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांची पन्हाळा गडावर अलोट गर्दी

महाराष्ट्र-कर्नाटकमधील हजारो शिवभक्तांचा पन्हाळगडावर उत्साह पन्हाळा : ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी जयघोषाने ऐतिहासिक पन्हाळगड परिसर शिवमय झाला आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्तांनी गडावर गर्दी केली आहे. पन्हाळगडावर असलेल्या शिवमंदिर इथून शिवज्योत प्रज्वलित करून [...]

तरुण भारत 19 Feb 2026 1:42 pm

भाजप व काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष युती करतायत की काय असा प्रश्न पडलाय –आदित्य ठाकरे

सत्तेसाठी अनेक पक्ष फोडणाऱ्या भाजपचाच एक गट महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ हातात घेण्याची शक्यता असून त्यामुळे भिवंडीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी ”भाजप व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्षच युती करतायत का असा प्रश्न पडलाय”, अशी मिश्कील प्रतिक्रीया दिली. भिवंडी महापालिकेबाबत पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, ”भिवंडीत […]

सामना 19 Feb 2026 1:29 pm

Satara Shiv Jayanti |छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठ्यांची राजधानी सातारा झालं शिवमय

ग्रामविकास मंत्री शिवजयंती मेगा रॅलीत सहभागी सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज ऐतिहासिक सातारा नगरीत ‘जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा’ उत्साहात पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने ही भव्य पदयात्रा आयोजित करण्यात [...]

तरुण भारत 19 Feb 2026 1:29 pm

Satara News : कर्नाटकातील शहाजीराजे यांच्या समाधीची दुरावस्था ;शिवप्रेमींच्याकडून केंद्र शासन –लोकप्रतिनिधिनी लक्ष देण्याची मागणी

दोडेगिरी येथे शहाजी राजे भोसले यांच्या समाधीस्थळी शिवजयंती साजरी आनेवाडी ( धनंजय गोरे ) -जयहिंद फॉउंडेशन च्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते या वर्षी शहाजी राजे भोसले यांच्या कर्नाटक राज्यातील दावनगिरी जिल्ह्यात असलेल्या दोडेगिरी या गावातील समाधी स्थळी साजरी करण्याच्या [...]

तरुण भारत 19 Feb 2026 1:16 pm

शिवस्मारकाच्या कामाचं काहीही चिन्ह नाही, हे दुर्दैवी आहे- आदित्य ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील सुशोभीकरणाच्या कामांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, , आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नारळ वाढवून सुरुवात करण्यात आली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याच्या कामावरून राज्य सरकार व मोदी सरकारवर टीका केली. […]

सामना 19 Feb 2026 1:13 pm

Satara |साताऱ्यात शिवजयंती मिरवणुकीत अघोरी नृत्य; नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण

‘अघोरी नृत्य म्हणजे अंधश्रद्धा नाही’ – सातारा नगराध्यक्षांचा खुलासा सातारा -शिवजयंती महोत्सवानिमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रम, उपक्रम साजरे करण्यात येत असतात. याही वर्षी त्याचे आयोजन केलेले आहे. उज्जैन येथील डमरु नृत्यासोबतच आपल्या सातारा जिह्यातील रहिमतपूर येथील स्थानिक कलाकारांचे अघोरी नृत्य शिवजयंती महोत्सवाच्या मिरवणूकीत होणार आहे. त्यामध्ये कोणतीही [...]

तरुण भारत 19 Feb 2026 1:07 pm

AI साठी पंतप्रधान मोदींचे ‘मानव’व्हिजन

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये हिंदुस्थानचे ‘मानव’ (MANAV) व्हिजन जगासमोर मांडले. ‘एआय हे केवळ मशीन-केंद्रित नसून ते मानवकेंद्रित असावे, हाच आमचा मूळ उद्देश आहे’, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. पंतप्रधानांनी ‘MANAV’ या शब्दाचा अर्थ सविस्तर स्पष्ट केला. M (Moral and Ethical): […]

सामना 19 Feb 2026 1:01 pm

मोन्सेरातांची राजकीय घराणेशाही संपविणार

उत्पलपर्रीकरयांच्या‘आमीपणजेकार’ पॅनलचानिर्धार: सर्वप्रभागातस्वच्छउमेदवारउतरविणार पणजी : बाबुश मोन्सेरात कुटुंबाची राजकीय घराणेशाही संपविणे हा पणजी महानगरपालिका निवडणुकीत पॅनल उभे करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन उत्पल पर्रीकर यांनी केले आहे. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरणार असलेल्या ‘आमी पणजेकार’ या पॅनलची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, वैदेही नाईक [...]

तरुण भारत 19 Feb 2026 12:58 pm

Satara News |पेरले येथे अमावास्येच्या रात्री अघोरी कृत्य ; स्मशानभूमीत काळ्या कोंबड्या, सुया टोचलेल्या आढळल्या बाहुल्या

उंब्रज परिसरात अघोरी कृत्यामुळे खळबळ उंब्रज – अमावास्येच्या मध्यरात्री पेरले येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मशानभूमीतील एका शववाहिनीवर दोन बॉक्स ठेवण्यात आले होते. या बॉक्समध्ये मुंडी मुरगळलेल्या दोन काळ्या [...]

तरुण भारत 19 Feb 2026 12:58 pm

शिंदे शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

किल्ले सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ल्यावर कार्यक्रम मालवण/प्रतिनिधी शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि शिवसैनिक यांनी किल्ले सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

तरुण भारत 19 Feb 2026 12:57 pm

लहान कॅसिनोच्या नावाखाली मोठा कॅसिनो ठरतो बेकायदेशीर

निवृत्तन्यायाधीशरिबेलोयांचादावा: आंदोलनासपाठिंबा पणजी : लहान कॅसिनो बोटीच्या बदली मोठी कॅसिनो बोट हस्तांतरीत करता येत नाही आणि तसे करणे बेकायदेशीर असल्याचा दावा निवृत्त न्यायाधीश फर्दिन रिबेलो यांनी केला आहे. तसे पत्र त्यांनी कॅसिनो विरोधी पणजीकर संघटनेला पाठवले असून कॅसिनो विरोधी आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी पत्रातून दिलेल्या माहितीनुसार गोवा जुगार कायद्याप्रमाणे कॅसिनो बोटीचा परवाना दुसऱ्या बोटीच्या [...]

तरुण भारत 19 Feb 2026 12:57 pm