48 वर्षांनी मंदिराच्या खजान्याची मोजदाद
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात तब्बल 48 वर्षांनंतर मंदिरातील रत्न भंडारची मोजदाद अखेर बुधवारी सुरू करण्यात आली. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत कर्मचारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पारंपरिक पद्धतीचा पेहराव करून मंदिरात आले. मंदिरातील रत्न भंडारची मोजदाद सुरू असल्याने दैनंदिनी पूजा-अर्चना करण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. भाविकांना मंदिराच्या बाहेर लावलेल्या बॅरिकेडमधून दर्शन घेण्याची […]
सिक्कीममध्ये भूस्खलन, 200 पर्यटक अडकले
सिक्कीममधील उत्तरी भागात होत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलन होत आहे. भूस्खलनामुळे जवळपास 200 पर्यटक अडकल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. मंगळवारी रात्री चुंगथांग-लाचेन मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. यामुळे लाचेनला जाणारे पर्यटक अडकले. या पर्यटकांना रात्रभर आयटीबीपी कॅम्प आणि गुरूद्वारामध्ये ठेवण्यात आले. त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यात आली. सध्या भूस्खलन झालेल्या ठिकाणी मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू […]
माजी पंतप्रधान हसीना यांची युनुस यांच्यावर टीका
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद युनुस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आवामी लीगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेख हसीना यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की, 1971 ची ती भयानक रात्र आठवली. त्या रात्री पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन सर्चलाईट सुरू केले होते. या ऑपरेशनचा उद्देश बंगाली समाजाचे अस्तित्व मिटवणे हा होता. अवघ्या […]
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; मराठेशाहीचा इतिहासकार हरपला
महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मराठेशाहीचा इतिहास मांडणारा एक महान संशोधक आणि विचारवंत हरपल्याची […]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 26 मार्च 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे आरोग्य – मन उत्साही राहणार आहे आर्थिक – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढणार आहे कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय […]
सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारकडून माहिती वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतात कोणत्याही प्रकारच्या इंधनाची टंचाई नसून परिस्थिती समाधानकारक आहे. भारताने इंधन पुरवठ्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेतला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अनेक इंधनवाहक नौका सुखरुप भारतात आल्या असून आणखी नौका येण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना कोणताही अडथळा होणार नाही, हे सुनिश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात [...]
पेट्रोल-डिझेलची टंचाई मुळीच नाही !
केंद्र सरकारसोबतच पेट्रोलियम कंपन्यांचे स्पष्टीकरण : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वृत्तसंस्था / नवी दिल्ली देशात कोठेही पेट्रोल-डिझेलची टंचाई नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांनी केले आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले असून अफवा पसरवून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही केंद्राने दिला आहे. पेट्रोल [...]
बुधवारीही शेअरबाजारात तेजीचा माहोल कायम
सेन्सेक्स 1205 अंकांनी तेजीत : ऑटो, बँकेचे समभाग चमकले वृत्तसंस्था/ मुंबई मध्य आशियात तणावाचे वातावरण निवळण्याचे संकेत तसेच जागतिक बाजारांमधील तेजीचा फायदा भारतीय शेअर बाजाराने पुन्हा बुधवारी उठवला होता. सेन्सेक्स निर्देशांक 1205 अंकांनी आणि निफ्टी 394 अंकांनी वाढत बंद झाला आहे. ऑटो, बँकिंग समभागांनी शेअरबाजाराला तेजी राखण्यासाठी मदत केल्याचे दिसून आले. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा [...]
देशात 100 नवीन विमानतळ बांधणार
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ‘उडान 2.0’ला मंजुरी : 200 हेलिपॅडही विकसित करणार : आयव्हीएफआरटी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाने उडान 2.0 योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत देशात 100 नवीन विमानतळे विकसित केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सुधारित उडान योजना 2026-27 [...]
न्यूझीलंड महिलांचा एकतर्फी मालिकाविजय
पाचव्या टी-20 मध्ये 92 धावांनी मात, शतकवीर अमेलिया केरला दोन्ही पुरस्कार वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च, न्यूझीलंड कर्णधार अमेलिया केरने 52 चेंडूत नोंदवलेले शतक आणि मिळविलेले दोन बळी यांच्या बळावर न्यूझीलंड महिला संघाने पाचव्या व शेवटच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघावर 92 धावांनी दणदणीत विजय मिळविला. अमेलिया केरला सामनावीर व मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले. न्यूझीलंडने ही [...]
अमेरिकेचे सर्वात घातक यूनिट मध्यपूर्वेसाठी रवाना
इराणला चर्चेत गुंतवू पाहतोय पाकिस्तान : युद्धाचे बदलणार चित्र अमेरिकेचे हजारो मरीन कमांडो शुक्रवारी मध्यपूर्वेत पोहोचणार आहेत. इराणसोबत युद्धविरामावर चर्चा सुरू असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले असताना या मरीन कमांडोंना युद्धक्षेत्रात तैनात केले जाणार आहे. 31 व्या एक्सपीडिशनरी यूनिटचे जवळपास 2200 मरीन हे यूएसएस त्रिपोलीच्या माध्यमातून दाखल होणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत एक एम्फीबियस लँडिंग [...]
‘वंदे मातरम्’ प्रकरणी केंद्राला दिलासा
विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द वृत्तसंस्था / नवी दिल्ली प्रशासकीय कार्यक्रम आणि शिक्षण संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगान म्हणण्यासंबंधी केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. केंद्र सरकारचा आदेश सक्तीचा नसल्याने त्याच्या विरोधातील याचिका विचारार्थ घेण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करण्यात आले. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाला बागची आणि न्या. विपुल एम. पांचोली [...]
भारतीय तिरंदाजांना दोन कांस्यपदके, चार अंतिम फेऱ्यांमध्ये प्रवेश
वृत्तसंस्था/ बँकॉक बुधवारी येथे सुरू झालेल्या आशिया चषक जागतिक मानांकन स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी दोन कांस्यपदके पटकावली आणि पुऊष रिकर्व्ह व महिला कंपाऊंड सांघिक प्रकारांच्या अंतिम फेऱ्यांमध्येही धडक मारली. भारताने वैयक्तिक विभागातही तीन पदके निश्चित केली, परंतु पुऊष रिकर्व्ह तिरंदाजांना नामुष्की पत्करावी लागली. कारण मागील स्पर्धेत विष्णू चौधरी आणि राहुल यांनी मिळवलेल्या [...]
55 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी ‘सुक्रू’ची शरणागती
कमांडर पापा राव याच्यासह इतर 22 नक्षलींचेही आत्मसमर्पण वृत्तसंस्था/ रायपूर, भुवनेश्वर ओडिशाच्या कंधमाल जिह्यात 55 लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी सुक्रू चार साथीदारांसह पोलिसांसमोर शरण आला. तसेच छत्तीसगडमधील एक वरिष्ठ नक्षलवादी कमांडर पापा राव त्याच्या 17 साथीदारांसह सुरक्षा दलांसमोर शरण आला. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात हे एक मोठे यश मानले जात आहे. संयुक्त [...]
अजितदादांच्या विमान अपघातामागे घातपात असेल तर मुडदाही खोदून काढू, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला घातपात झाला असेल तर ते शोधून काढण्यासाठी सरकार आकाश पातळ एक करील. यामागे कोणाचा बाप असेल तरी शोधून काढू. घातपात असेल तर मुदडाही खोदून काढू, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहाला दिले. विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन […]
महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे अधिवेशन, विरोधी पक्षाचा महायुती सरकारवर जोरदार हल्ला
विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे, महायुती सरकारचा नाकर्तेपणा दाखवणारे आणि केवळ इतिहासात रमणारे अधिवेशन होते, असा जोरदार हल्ला विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने आज केला. विधिमंडळ अधिवेशनाचे आज सूप वाजले. त्यानंतर विधान भवनात विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते आमदार ऍड. अनिल परब, विधानसभेतील मुख्य प्रतोद […]
कोकण पर्यटनासाठी जाहीर योजनांची अंमलबजावणी नाही! सुनील शिंदे यांनी वेधले लक्ष
जागतिक स्तरावर कोकणचा किनारा पर्यटकांचे आकर्षण आहे. मागील अनेक वर्षांत कोकणच्या पर्यटनासाठी शासनाने विविध पॅकेजेस व योजना जाहीर केल्या, परंतु या योजनांची अंमलबजावणी किंवा दिलेल्या पॅकेजेसनुसार कोकणचा विकास झालेला दिसून येत नसल्याकडे शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. 260 अन्वये चर्चेत सहभागी होत सुनील शिंदे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. शहरी […]
भारताचा विकासदर 7.1 टक्क्यांनी वाढणार
एस अॅण्ड पी कडून आगामी अर्थव्यवस्थेवर अंदाज वृत्तसंस्था/ मुंबई भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वाढीचा दर 7.1 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, खासगी उपभोग, गुंतवणूक आणि निर्यात हे विकासाचं चक्र राहणार आहे. दरम्यान, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे तेल आणि वायूच्या किमती वाढल्याने वित्तीय स्थितीवर दबाव येऊ शकतो. आशियाई क्षेत्रावरील आपल्या त्रैमासिक [...]
महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून राज्य ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. गेल्या वर्षभरात ड्रग्जसंदर्भात 13 हजार 954 गुन्हे नोंद करण्यात आले असून तब्बल 10 हजार 686 जणांना अटक झाल्याची आकडेवारीच शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांनी आज विधान परिषदेत सादर केली. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून ड्रग्जमुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याचे ते म्हणाले. विधान परिषदेत […]
कार्यालये सोडण्याची काँग्रेसला नोटीस
28 मार्च पर्यंत कालावधी, अन्यथा कारवाई होणार वृत्तसंस्था / नवी दिल्ली दिल्लीतील अकबर मार्ग आणि रायसिना मार्ग येथील कार्यालये रिकामी करण्यात यावीत, अशी नोटीस केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाला दिली आहे. ही कार्यलये सोडण्यासाठी 28 मार्चपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत कृती न केल्यास कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसने केंद्र सरकारच्या [...]
विधीमंडळात शक्ती कायदा एकमताने मंजूर
स्त्राrची बदनामी केल्यास तीन वर्षांच्या तुऊंगवासाची तरतूद : गुह्याची सत्यता पडताळणीसाठी समिती करणार गठीत प्रतिनिधी/ मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागफहात महिलांच्या अब्रुचे रक्षण करणारा शक्ती कायदा एकमताने सहमत करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागफहात मांडले. त्याला दीर्घ चर्चेनंतर सदस्यानी एकमताने संमती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय [...]
इराणला हवी जेडी व्हान्स यांच्याशी चर्चा
कुशनर किंवा विटकॉफ यांच्याशी बोलण्यास नकार वृत्तसंस्था / तेहरान आखाती युद्ध थांबविण्याच्या संदर्भात अमेरिकेशी चर्चा करण्यासंबंधी आपली ताठर भूमिका इराणने काही प्रमाणात सौम्य केली आहे. अमेरिकेशी चर्चा करण्यास आम्ही राजी आहोत. मात्र, ही चर्चा अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे प्रतिनिधी जॅरेड कुशनर किंवा अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्याशी केली जाणार नाही. आम्ही अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी [...]
पाईपलाईन गॅस उपलब्ध असल्यास तो सक्तीचा : सवलतीही जाहीर वृत्तसंस्था / नवी दिल्ली ज्या भागांमध्ये पाईप लाईनद्वारे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा उपलब्ध आहे, त्या भागातील घरांनी पाईप लाईनचे कनेक्शन घेणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. हे कनेक्शन न घेतल्यास अशा घरांचा सिलिंडर पुरवठा बंद करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने हा नवा आदेश काढला असून पाईप लाईन [...]
बिबटे आता अंगणात येऊ लागलेत, वन विभाग काय करतोय? नाना पटोले यांचा सवाल
विदर्भात बिबटय़ांचा वावर वाढला असून ते आता थेट घराच्या अंगणात येऊ लागलेत, त्यांना आरण्यासाठी वन विभाग काय करतोय, असा सवाल काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला. अभयारण्य परिसरात वाघाने माणसांवर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत असून साकोली येथे एका 50 वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्या कुटुंबावर मोठे संकट […]
स्पॉटिफायवर अशीच गाणी लावून ठेवली तर त्यात स्पॉटिफायवरच्या सजेशनप्रमाणे आपोआप गाणी लागत जातात. आपलं लक्ष नसलं तरीही गाणी चालूच असतात. पण प्लेलिस्ट न करता अशी चालू ठेवलेली गाणी कित्येकदा आपल्याला छान छान गाणी मिळवून देतात. अशीच गाणी लावलेली असताना एक गाणं ऐकायला मिळालं. राधा ना बोले ना बोले ना बोले रे घूँघट के पट ना [...]
मुंबई : देशातील सर्वात मोठी ऑनलाइन ब्रोकिंग कंपनी झिरोधाने ब्रोकरेज शुल्कात वाढ केली आहे. यासंदर्भातील माहिती शेअरबाजाराला बुधवारी कंपनीने दिली आहे. फ्युचर व ऑप्शन संबंधीत व्यवहारांसाठी झिरोधाने ब्रोकरेज शुल्क आता 20 रुपयांवरुन 40 रुपये इतके वाढवले आहे. पण हे वाढीव शुल्क सर्वच ग्राहकांवर लागू होणार नसल्याचा खुलासाही कंपनीकडून करण्यात आला आहे. या वाढीव शुल्काचा परिणाम [...]
आरेतील बांधकामाचे सॅटेलाईट मॅपिंग
आरे दुग्ध वसाहतीमधील बेकायदेशीर बांधकामाचे सॅटेलाईट मॅपिंग करण्यात येणार असून त्याद्वारे संबंधित विभागाकडून कठोर कारवाईसाठी धोरण आखण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. महापालिका, पोलीस, वन विभाग, पर्यावरण विभाग, आरे प्रशासन आणि जिल्हाधिकारी अशा विविध विभागांची महिन्याभरात संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासनही त्यांनी […]
राष्ट्रीय पोल व्हॉल्ट स्पर्धेत बारानिका,जी.रीगनचा नवा विक्रम
राष्ट्रीय इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा वृत्तसंस्था/ भुवनेश्वर येथील कलिंगा इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रीय इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तामिळनाडूची 29 वर्षीय आंतरराष्ट्रीय बारानिका एलांगोवन महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये 4.22 मीटरची उंची गाठली तर पुरुषांमध्ये जी.रीगनने 5.30 मीटर उंची पार करून सुवर्णपदक जिंकले. या दोघांनीही आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. बंगळूरमध्ये 2022 मध्ये 4.21 [...]
कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ल्यानंतर फ्यूल टँकमध्ये आग लागली आहे. कुवैत सिव्हिल एव्हिएशन प्राधिकरणाने याची पुष्टी दिली आहे. या हल्ल्यात कुठलीच जीवितहानी झालेली नाही असे प्रवक्ते अब्दुल्ला अल-राजही यांनी सांगितले. तर ड्रोन हल्ल्यानंतर विमानतळावर आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आले. अग्निशमन दल आणि अन्य संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम सुरू केले.
शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सुरतचा विषय काढताच शिंदे गटाच्या आमदारांचा थयथयाट झाला. देशमुख यांना बोलण्यापासून थांबवा अशी मागणी त्यांनी केली. इतकेच नव्हे तर, त्यांनी सुरतेमध्ये जे घडले त्याबाबत दिलेली माहिती पटलावरून काढून टाका अशी मागणी केली. नितीन देशमुख यांनी अकोल्यातील आपल्या बाळापूर मतदारसंघातील कामांना जाणीवपूर्वक निधी दिला जात […]
फिलिपाईन्समध्ये ऊर्जा आणीबाणी घोषित
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा साखळी आणि ऊर्जा स्थिरतेला धोका निर्माण झाल्याने फिलिपाईन्सने राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी घोषित केली आहे. फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिर यांनी हा आपत्कालीन उपाय देशाच्या ऊर्जा सुरक्षेचे रक्षण करणे आणि ग्राहकांना वीजेच्या वाढणाऱ्या किमतीपासून वाचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आल्याचे सांगितले आहे. देशाला काळोखात बुडण्यापासून वाचविणे आणि जनतेला विजेच्या महाग दरांपासून [...]
राज्य मंत्रिमंडळाची आज विशेष बैठक
अंतर्गत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रतिनिधी/ बेंगळूर विविध खात्यांमधील पदे भरतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी अनुसूचित जातींच्या अंतर्गत आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकारची कसरत सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत अंतर्गत आरक्षणासंदर्भात विस्तृत चर्चा करून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची 2026 सालातील नववी मंत्रिमंडळ बैठक गुरुवार 26 मार्च रोजी बोलावण्यात [...]
चीनच्या विदेशमंत्र्यांचे इराणला आवाहन चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी इराणचे विदेशमंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यादरम्यान त्यांनी सर्व पक्षकारंना लवकरात लवकर शांतता चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. याची माहिती चीनच्या विदेश मंत्रालयाने दिली आहे. लढाई करण्यापेक्षा चर्चा करणे चांगले आहे. सर्व संवेदनशील मुद्द्यांवर तोडगा शक्तीने नव्हे तर चर्चा अन् संवादाने काढला जावा [...]
गुजरात ‘युसीसी’ मंजुरीचे शाह यांच्याकडून कौतुक
देश समानतेनेच चालवला जाणार असल्याचा निर्धार व्यक्त : विरोधकांवर साधला निशाणा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उत्तराखंडनंतर, भाजपशासित आणखी एक राज्य, गुजरातनेही समान नागरी संहिता (युसीसी) विधेयक मंजूर केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर आनंद व्यक्त करत सर्व नागरिकांसाठी समान कायद्यांवर देश चालवणे हे आमचे प्राधान्य आणि आमचा संकल्प असल्याचे सुतोवाच केले. तसेच देश समानतेनेच [...]
लेबनॉनच्या 10 टक्के भूभागावर कब्जा करू
इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा मोठा दावा इस्रायलचे सैन्य लिटानी नदीपर्यंत दक्षिण लेबनॉनवर कब्जा करणार असून तेथे एक मजबूत संरक्षणात्मक बफर झोन निर्माण करणार असल्याचा दावा संरक्षणमंत्री इस्रायल काट्ज यांनी केला आहे. लिटानी नदी ही इस्रायलच्या सीमेपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा भाग लेबनॉनच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास 10 टक्के क्षेत्राला व्यापणारा आहे. इस्रायलचे सैन्य लिटानी नदीपर्यंत [...]
कोण आहे तो ‘सन्मानीय व्यक्ती’?
इराण युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेची एकासोबत चर्चा इराण युद्ध समाप्त करण्यासाठी अमेरिका अत्यंत ठोस चर्चा करत आहे आणि इराणमधील सर्वात सन्मानीय व्यक्तीसोबत वाटाघाटी करत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल आहे. परंतु त्यांनी या व्यक्तीचे नाव उघड करण्यास नकार दिला आहे. आम्ही काही अशा लोकांसोबत काम करत आहोत, जे अत्यंत समजंस अन् विश्वासार्ह वाटतात. या [...]
आजचे भविष्य गुरुवार दि. 26 मार्च 2026
मेष: कामाच्या ठिकाणी चांगली वार्ता कानी पडेल. वृषभ: खर्चामुळे मन कावरं बावरं होईल. वेळेचा सदुपयोग कराल मिथुन: मित्राच्या स्वार्थीपणामुळे मन:शांती ढासळेल. कर्क: कोणतेही वचन देण्यापूर्वी त्याच्या दोन्ही बाजू समजून घ्या सिंह: कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, रचनात्मक कार्य करा कन्या:आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका तुळ: घरातील प्रलंबित कामे वेळखाऊ ठरतील वृश्चिक: अनपेक्षित स्रोतांद्वारे [...]
टाटा स्टीलचा हरित पोलाद कारखाना
लुधियानामध्ये 3,200 कोटींच्या खर्चाचा प्रदूषणमुक्त &ंकारखाना उभारणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली टाटा स्टीलने शुक्रवारी पंजाबच्या लुधियानामधील हाय-टेक व्हॅली येथे आपल्या पहिल्या स्क्रॅप-आधारित इलेक्ट्रिक आर्क फर्नेस सुविधेचे औपचारिक उद्घाटन केले. 3,200 कोटींचा हा प्लांट भारताच्या पोलाद उद्योगासाठी एक मैलाचा दगड असून, पर्यावरण आणि विकास यांच्यात संतुलन साधण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या सोहळ्यात टाटा सन्सचे अध्यक्ष [...]
महिलांबाबत अश्लील व्हिडीओ, ई-मेल, आक्षेपार्ह मजकूर, फोटो सोशल मीडिया किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमातून पसरवल्यास, धमकी दिल्यास या प्रकरणांत गुन्हा नोंद होणार आहे. ही प्रकरणे लैंगिक गुह्याच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयकातील दोन सुधारणांना आज विधानसभा आणि विधान परिषदेत मंजुरी […]
जादूटोणा करून प्रश्न सुटले असले तर आपण युद्ध ड्रोनऐवजी लिंबूमिरचीने लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आपण इथे बसून टाचणी टोचून संपवले असते. जादूटोण्याने समस्या संपल्या असत्या तर भोंदू खरातला ट्रम्पने सुरक्षा सल्लागार नेमले असते. इतपंच कशाला प्रचारसभा न घेता निवडणुका एका जागी बसून जिंकलो असतो, अशी तुफान टोलेबाजी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. खरात […]
सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचा तिढा, सभापती राम शिंदे कायदेतज्ञांचा सल्ला घेणार
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीप्रसंगी झालेल्या राडय़ात शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याच्या प्रकरणात उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे निलंबन करण्याचे निर्देश दिले. मात्र, गोऱ्हे यांनी दिलेले निर्देश रद्द करण्यावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. उपसभापतींचे निर्देश फिरवताना सभापती राम शिंदे यांची अडचण झाली असून यासंदर्भात आता कायदेशीर […]
शीव, एल्फिन्स्टन पुलांचे काम रखडले आहे. आता परळच्या उड्डाणपुलाचा एक मार्गही बंद करण्यात आला आहे. त्यात भर म्हणून जागोजागी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मध्य मुंबईत दादर, परळ, लालबाग, प्रभादेवी या भागांमध्ये सध्या प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. कडाक्याच्या उन्हात वाहतूककोंडीत ‘मरा’ असेच हाल सध्या सामान्यांचे झाले आहेत. एक काम पूर्णत्वास नेण्याआधीच दुसऱया ठिकाणी खोदकाम […]
अमेरिकेला दणका…युद्धबंदीचा प्रस्ताव इराणने धुडकावला!
युद्धबंदीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेला 15 कलमी प्रस्ताव इराणने धुडकावून लावला आहे. ‘हा प्रस्ताव मर्यादा भंग करणारा असल्याचे सांगताना इराणनेच अमेरिकेला काही अटी घातल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीवर अंतिम अधिकार आमचाच राहील हे मान्य करा, अशी यातील प्रमुख अट आहे. अमेरिकेने पाकिस्तान व तुकाaच्या माध्यमातून इराणला युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे, मात्र तो इराणने अमान्य […]
रोज 20 गाड्या रद्द, पश्चिम रेल्वेचा प्रवास जीवघेणा
पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलच्या वेळापत्रकाचा बट्टय़ाबोळ उडाला असून प्रवास आणखी जीवघेणा झाला आहे. या मार्गावर दररोज 15 ते 20 गाडय़ा रद्द तसेच बहुतांश गाड्या अर्धा तास उशिराने धावत असल्याने लोकल गाडय़ांना खचाखच गर्दी होत आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा 82 टक्क्यांपर्यंत ढासळला आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरिवली, विरार आणि डहाणूपर्यंत दररोज एकूण […]
‘वंदे मातरम्’ची सक्ती करता येणार नाही! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
सरकारी कार्यालये तसेच सार्वजनिक कार्यक्रमांत ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गाणे सक्तीचे नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांना आव्हान देणारी याचिका फेटाळली. केंद्र सरकारच्या परिपत्रकात ‘वंदे मातरम्’ न गायल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे कुठेही म्हटलेले नाही. या परिपत्रकाचे पालन करणे बंधनकारक केलेले नाही. ते केवळ ‘प्रोटोकॉल’ स्वरूपाचे […]
‘पीएनजी’ न घेतल्यास ‘एलपीजी’ बंद होणार! गॅस टंचाईमुळे सरकारचे नवे फर्मान
आखातातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवे फर्मान काढले आहे. ज्या भागातून पाईपद्वारे नॅचरल गॅसचे (पीएनजी) काम पूर्ण झाले आहे तेथील कुटुंबांनी पीएनजी कनेक्शन घ्यावे. तीन महिन्यांत ‘पीएनजी’ न घेतल्यास ‘एलपीजी’ सिलिंडरचा पुरवठा बंद होईल, असे या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. युद्धामुळे ‘एलपीजी’ पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने सरकार ‘एलपीजी’ऐवजी ‘पीएनजी’ला प्रोत्साहन देत आहे. […]
सामना अग्रलेख –ब्रह्मवाक्याचे वस्त्रहरण; कोणते फडणवीस खरे?
सातारा प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांना साक्षात्कार झाला की, सभापती किंवा विधानसभा अध्यक्षांचे निर्देश ब्रह्मवाक्य नसतात. ही भाषा राजकीय सोयीची आहे. जेव्हा विधानसभा अध्यक्ष (जे भाजपचे आमदार आहेत) आपल्या बाजूने निर्णय देतात ते ब्रह्मवाक्य ठरते, पण विधान परिषदेच्या उपसभापती (ज्या शिंदे गटात पक्षांतर करून गेल्या) श्रीमती गोऱ्हेबाई तुमच्या पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध निर्देश देतात, तेव्हा […]
>> नागेश शेवाळकर आज राम नवमी. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म दिवस. मध्यान्ह काळी त्यांचा जन्म झाला. पुत्र जन्माचा आनंद वेगळाच असतो. त्यात हे तर साक्षात प्रभू श्रीराम. त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या जन्म समयीचे वर्णन साहित्यात होणारच. अनेकांनी ते अत्यंत सोज्वळ आणि सुंदर शब्दांत केले आहे. चैत्र महिन्यातील नवमी! दुपारची वेळ! माथ्यावर आलेला सूर्य अचानक थांबलाय. […]
>> वैश्विक,khagoldilip@gmail.com पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जिथे संपतं आणि जवळ जवळ शून्य गुरुत्वाकर्षणाच्या अवकाशात गेल्यावर कोणत्याही जिवाचं किंवा वस्तूचं वजन शून्यावर येऊन ती तरंगायला लागते. या निर्वात पोकळीत वजन गणिती पद्धतीने अगदीच शून्यावर येत नाही, तर ते ‘मायक्रोग्रॅव्हिटी’ किंवा शून्यवत होतं. हे कसं घडतं ते गेली अनेक वर्षे आपण आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर गेलेल्या अवकाशयात्रींच्या तिथल्या वास्तव्याचं प्रत्यक्ष […]
कामाठीपुराचा समूह पुनर्विकास लवकरच
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाठीपुरा परिसराचा समूह पुनर्विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समूह पुनर्विकासाचा निर्णय होऊनही प्रशासकीय कारणामुळे विंलब झाला; पण या आठवडय़ात कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात येईल. दोन महिन्यांच्या आत काम सुरू होईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानसभेत केली.
‘एशियाटिक’ची निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार
‘द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’च्या निवडणूक प्रक्रियेबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधान परिषदेत दिली. ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’ या संस्थेच्या सदस्यांची निवडणूक दीर्घकाळ प्रलंबित असल्याबाबत तसेच निवडणूक जाहीर करून पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याबाबत शासन कोणती कार्यवाही करणार, याबाबत आमदार प्रसाद लाड यांनी […]
अक्कलकोटमध्ये गुरुवारी मांस विक्री बंद
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया अक्कलकोट नगरीमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वामी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून अक्कलकोट परिसरात गुरुवारी मांस विक्री करण्यास बंदी घालण्याची मागणी होत होती. मावाबंदीच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आता प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय नगर परिषदेकडून घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली.
अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता. यासाठी अजितदादा यांच्या निधनाच्या 18व्या दिवशी म्हणजे 16 फेबुवारी 2026 रोजी पटेल, तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना तसेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार […]
प्रतीक्षा संपली! ‘भारतमाता’ सिनेमागृहाचा पडदा उघडला
सिनेरसिकांची प्रतीक्षा अखेर संपली असून मंगळवारपासून लालबागमधील आयकॉनिक भारतमाता सिनेमागृहाचा पडदा उघडला आहे. पिढय़ान्पिढय़ा प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये असलेले हे सिनेमागृह नूतनीकरणांनंतर आता नव्या रूपात भेटीला आले आहे. यानिमित्ताने पारंपरिक सिनेमा अनुभवासोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि हायटेक सुविधा प्रेक्षकांना मिळणार आहेत. लालबाग-परळसह मराठी रसिकांच्या गळय़ातील ताईत असलेले आणि ‘मराठी सिनेमाचे माहेरघर’ अशी ओळख असलेले भारतमाता सिनेमागृह 2018 पासून […]
रवींद्र नाटय़ मंदिरात 27, 28 मार्चला रंगणार सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन
‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ यंदा 27 आणि 28 मार्च रोजी रवींद्र नाटय़ मंदिरात होणार आहे. लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे या संमेलनाचे अध्यक्ष असतील. संमेलनात दोन दिवस दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतींचा जागर होणार आहे. स्वामिराज प्रकाशन आयोजित या संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते होणार […]
पडद्याआडून –‘ही दोस्ती तुटायची नाय’ एक अस्सल नात्यानुभव
>>पराग खोत काही नाटकं निखळ मनोरंजन करतात, तर काही विचार करायला लावतात. काही खळखळून हसवतात तर काही हलकेच डोळ्यांच्या कडा ओलावतात. काहींत तरुणाईची झिंग असते तर काहींमध्ये अनुभवांची परिपक्वता. या गुढीपाडव्याला आलेलं ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे नवंकोरं नाटक प्रेक्षकांना हे सगळे भावानुभव देतं. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याला आपल्या भूतकाळाची एक सोनेरी किनार जोडलेली असते. अगदी […]
सत्तरच्या दशकातील हौशी रंगभूमीवरील कलावंत आणि आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर कोंकणी भाषेतील कार्यक्रमाच्या सादरकर्त्या पूर्वाश्रमीच्या किशोरी नार्वेकर उपाख्य स्मिता हासे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 79 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार नितीन हासे यांच्या त्या मातोश्री होत. गोवा येथील नार्वे गावात जन्मलेल्या किशोरी नार्वेकर […]
घरातील झुरळे घालवायची…हे करून पहा
nघरात साफसफाई करूनही सतत झुरळे होत राहतात. घरात एकदा झुरळांचा शिरकाव झाला की मग ती अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीत. झुरळे घरातून घालवण्यासाठी लसूण बारीक करून, त्यात व्हिनेगर घाला आणि हा स्प्रे बाटलीत भरून झुरळ असलेल्या ठिकाणी फवारा मारल्याने झुरळे कमी होतात. nपाण्यात लाल तिखट मिसळून, ते एका स्प्रे बाटलीत भरा आणि घरात ज्या […]
खोपोलीत सहलीच्या बसची ट्रकला धडक; दहा जखमी, 30 विद्यार्थी बालबाल बचावले
काळ आला होता, पण वेळ नाही.याचा प्रत्यय आज सकाळी पुण्याहून खोपोलीला सहलीला जाणाऱ्या 30 विद्यार्थ्यांना आला. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील एक्झिट मिल ठाकूरवाडीजवळील तीव्र उतारावर खासगी बसचे ब्रेक फेल झाले आणि ही बस पुढे असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात 10 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने 30 विद्यार्थी बालबाल बचावले. […]
असं झालं तर…व्हॉट्सअॅपवर ओटीपीची समस्या उद्भवल्यास…
काही वेळा व्हॉट्सअॅपवर अचानक ओटीपी येण्यात अडचण येते. जर तुमच्या बाबतीत असे होत असेल तर सर्वात आधी काही गोष्टी काळजीपूर्वक फॉलो करा. व्हॉट्सअॅप ओटीपी मिळवण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे वाय-फाय किंवा मोबाईल डेटा व्यवस्थित चालू आहे का, ते आधी तपासा. एसएमएसव्यतिरिक्त, तुम्हाला पह्न कॉलद्वारे ओटीपी मिळवण्याचा पर्याय मिळतो. हा पर्याय निवडून तुम्ही कॉलद्वारे […]
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अनेक युजर्सच्या थेट मनाला भिडला आहे. हा व्हिडीओ बांगलादेशातील आहे. या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, एक तरुण कामाला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत आहे. ट्रेनमध्ये उभे राहायलाही जागा नसल्याने हा तरुण ट्रेनच्या दरवाजावर उभा आहे. तितक्यात पाऊस आला. हा तरुण भरपावसात भिजला असून थंडीने […]
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सवुमनसोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. X वर एक पोस्ट करत हर्षवर्धन […]
Ratnagiri News –साखरीनाटे जेटीचे काम निकृष्ट; मच्छीमार आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या जेटीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. बांधकामादरम्यान ८ ते १० पिलर चिखलात खचले असून, भरावालाही भेगा पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कामाची तत्काळ चौकशी आणि ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (संरचनात्मक लेखापरीक्षण) करण्याची मागणी साखरीनाटे मच्छीमार सहकारी सोसायटी व स्थानिक मच्छीमारांनी […]
रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या रॅगिंग प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना ‘शिवसेना स्टाईल’ने धडा शिकवला जाईल, असा आक्रमक इशारा युवासेनेने महाविद्यालय प्रशासनाला दिला आहे. यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्यांची […]
जम्मू-कश्मीरमध्ये मोठ्या आयईडी हल्ल्याची शक्यता, गुप्तचर यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांकडून मोठ्या घातपाताचा कट रचला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी आयईडी (IED) स्फोटाद्वारे सुरक्षा दलांच्या ताफ्याला किंवा सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला असून सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून या […]
Bus Accident News –प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पद्मा नदीत कोसळली, अनेक जण बुडाल्याची भीती
प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पद्मा नदीमध्ये कोसळली आहे. बुधवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला असून यात अनेक जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातील दौलतदिया घाट क्रमांक 3 वर भीषण अपघात झाला आहे. सौदार्ह परिवहनची ही बस असून नौकेमध्ये चढत असताना बस नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट पद्मा नदीमध्ये कोसळल्याची माहिती […]
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. याची झळ हिंदुस्थानलाही बसत असून तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणि वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी तोबा गर्दी उसळली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जालना जिल्ह्यातही हिच […]
ग्वाल्हेरच्या विद्यार्थ्याचा स्कॉटलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. संस्कार श्रीवास्तव असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो स्कॉटलंडच्या सेव्हरन्स विद्यापीठात फॉरेन्सिक सायन्समध्ये एमएससीचे शिक्षण घेत होता. 18 दिवस उलटले तरी संस्कारचे आई-वडील आपल्या मुलाच्या मृतदेहाच्या प्रतिक्षेत आहेत. ग्वाल्हेरच्या बहोदापूर परिसरात राहणाऱ्या कुलदीप यांनी आपला मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी बँकेकडून 39 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. संस्कार […]
वेदनादायी जगणे नकोसे, मुंबईत 85 जणांचा इच्छामरणासाठी अर्ज
मरणासन्न जगण्यातून सुटका मिळवलेल्या गाझियाबादच्या हरीश राणानंतर देशभरात इच्छामरणाच्या प्रक्रियेला नवी दिशा मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकालाद्वारे इच्छामरणाचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे इच्छामरणासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतही अनेकजण इच्छामरण पत्करण्यास तयार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आतापर्यंत शहरातील 85 नागरिकांनी इच्छामरणासाठी अर्ज केला आहे. यावरून गंभीर आजार किंवा अपघात झाल्यास लोकांना […]
Iran US Israel War –इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळला, युद्ध थांबवण्यासाठी ठेवल्या 5 अटी
इराणने युद्ध संपवण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आम्ही अमेरिकेच्या नाही तर स्वत:च्या अटींवर हे युद्ध थांबवू असे इराणने म्हटले आहे. 28 फेब्रुवारीपासून मध्यपूर्वेत सुरू असलेले हे युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर पाच अटी ठेवल्या आहेत. यात होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणच्या सार्वभौमत्वाला मान्यता देण्याचाही समावेश आहे. त्यामुळे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या अटींवर काय भूमिका घेतात […]
इराणचा इराकवर भीषण हवाई हल्ला; ७ सैनिकांचा मृत्यू, १३ जखमी
आखाती देशांमधील तणाव वाढत असतानाच इराणने बुधवारी पश्चिम इराकच्या अनबार प्रांतात मोठा हवाई हल्ला केला. या भीषण हल्ल्यात इराकचे ७ सैनिक जागीच ठार झाले असून, अन्य १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. इराणने अनबार प्रांतातील एका लष्करी वैद्यकीय केंद्र आणि जवळच असलेल्या इंजिनिअरिंग युनिटला […]
बनावट IRCTC खात्यांवर रेल्वेची कारवाई, लाखो आयडी बंद
देशातील 88 टक्के रेल्वे तिकिट ऑनलाईन बुक केली जातात. यामुळे रेल्वेने तिकीट दलाली आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. 2025 मध्ये, अंदाजे 30.4 कोटी बनावट युझर आयडी बंद करण्यात आले, तर 29.4 कोटी खाती तात्पुरती निलंबित करण्यात आली. यापैकी, 1,80,000 खाती नंतर पुन्हा सक्रिय करण्यात आली. तत्काळ तिकिट बुकिंग फसवणूक रोखण्यासाठी आधार पडताळणी […]
Ratnagiri News –बिनविरोध निवडून आलेले सभापती ‘घामाघूम’
रत्नागिरी जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक आज पार पडली. निवडीनंतर दालनात जाताच सभापती घामाघूम झाले. शिक्षण सभापती, कृषी सभापतींच्या दालनातील वातानुकूलित यंत्रणा बंद होती. आज सभापती निवड होणार हे माहित असतानाही जिल्हापरिषद प्रशासनाने देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याचे निदर्शनास आले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. निवडून आल्यानंतर सर्व सभापती […]
वर्ल्डकप संपल्यानंतर क्रीडाप्रेमींनी इंडियन प्रीमियर लीगचे वेध लागले. जगभरातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देणारी ही लीग 28 मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाची विक्रमी डील झाली आहे. राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीचा तब्बल 1.63 अब्ज डॉलर (सुमारे 15,290 कोटी रुपये) इतक्या विक्रमी किमतीत करार झाला आहे. अमेरिकन उद्योजक काल सोमानी यांच्या […]
माझ्या भावाला फोन करण्याची हिंमत कशी झाली? सरन्यायधीश संतापले, नेमकं काय घडलं?
वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशासंदर्भात भावाला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या याचिकाकर्त्यावर सरन्यायाधीश सुर्य कांत चांगलेच संतापले. माझ्या भावाला फोन करण्याची हिम्मत कशी झाली? माझ्याशी अशा प्रकारे वागण्याची हिंमत पुन्हा करू नका, अशा कडक शब्दांत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला खडेबोल सुनावले. मूळचे सामान्य प्रवर्गातील असलेल्या हरियाणातील दोन उमेदवारांनी उत्तर प्रदेशातील सुभारती मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय […]
तेलंगणात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट, अनेक कामगार जखमी
तेलंगणातील पारिगी मंडळातील लक्ष्मीदेवीपल्ली येथील स्टील फॅक्टरीत बुधवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक कामगार जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. स्फोटानंतर परिसरात आगीच्या ज्वाला उसळल्या आणि संपूर्ण परिसरात दाट काळा धूर पसरला. स्फोट इतका शक्तिशाली होता की आसपासच्या गावांमध्येही आवाज ऐकू आला. प्राथमिक अहवालानुसार, या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत. मात्र […]
प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना अजित दादा यांच्या पक्षाचा संपूर्णपणे ताबा घ्यायचा होता, असा आरोप करत रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. या आरोपांना सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. पक्षावर पकड कुणाची यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता अजित पवार गटाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक […]
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या चौकशीवरून सध्या राजकारण तापले आहे. या प्रकरणात कर्नाटक सरकारने झिरो एफआयआर (Zero FIR) दाखल केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपली भूमिका मांडली. “अजितदादांच्या अपघातामागे जर काही घातपात असेल, तर आम्ही आकाश पाताळ एक करू आणि यात कुणाचाही बाप असेल तरी त्याला शोधून काढू,” असे ते म्हणाले. […]
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाला 28 मार्चपासून सुरू होत आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात सलामीचा सामना खेळवला जाईल. क्रिकेटच्या या महाकुंभाला सुरुवात होण्यापूर्वी दोन मोठ्या डील झाल्या. पहिल्या हंगामाचा विजेता संघ राजस्थान रॉयल्स आणि गतविजेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विक्रमी किंमतीत विक्री झाली. यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडने आरसीबीची 16,660 कोटी रुपयांना विक्री […]
संकटात दिलासा? हिंदुस्थानने रशियाकडून 6 कोटी बॅरल तेल केले खरेदी
तेल कंपन्यांनी रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल कच्च्या तेलाची खरेदी निश्चित (Book) केली आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय हिंदुस्थानची दिलासा मानला जात आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक देशांसमोर संकट उभे ठाकले आहे. यातच हिंदुस्थानने रशियाशी असलेला आपला व्यापारी व्यवहार सुरू ठेवत मोठ्या प्रमाणात तेल साठा […]
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास मंडळ म्हणजे टेंडर मॅनेज करणारी यंत्रणा- आमदार कैलास पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ हे फक्त टेंडर मॅनेज करणारी यंत्रणा असल्याचा खळबळजनक दावा आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केला. यातील अधिकारी म्हणजे कलेक्शनची यंत्रणा असल्याचं त्यांच्या कामावरून दिसतं असाही आरोप आमदार पाटील यांनी विधानसभेत बोलताना केला. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 8 हजार अभियंते असताना पुन्हा नव्याने महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास मंडळ स्थापन करण्याच नेमकं कारण काय हे आजवर न उघडलेलं कोड आहे. मनुष्यबळ कमी तर कामे जास्त अशी अवस्था मंडळाची आहे. सध्या मंडळाकडून 37 हजार कोटीची काम सुरू आहेत. हे कमी की काय त्यांनी ऊसतोड मजूर यांच्या वसतिगृह बांधकामाची कामे घेतली आहेत. एवढेच नाही तर काही मेडिकल कॉलेजच्या बांधकामाचीही कामे त्यांनी घेतल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या यंत्रणेकडून ही कामे केली जातात तरीही या मंडळाकडे ही कामे सोपवण्याची आवश्यकता सरकारला का वाटली? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. मुंबई स्थित एक कार्यालय तिथं बोटावर मोजण्याइतके मनुष्यबळ तर प्रत्येक विभागाला एक किंवा दोन कार्यकारी अभियंता अशी तोकडी यंत्रणा असतानाही त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे देण्याचा घाट सरकार का घालत आहे? केलेल्या कामाची पाहणी करणे देखील यंत्रणेला शक्य नाही तरीसुद्धा हे सरकार मंडळावर मेहरबान का आहे अशी विचारणा आमदार कैलास पाटील यांनी केली. यांनी कामाच्या ज्या निविदा काढल्या आहेत त्यामध्ये एकही काम निविदा रक्कम पेक्षा कमी नाही. निविदा प्रक्रियेमध्येच नियम करण्यात आलेला आहे की, जर निविदा कमी दराने आल्यास साडेसात टक्के इतकी बँक गॅरंटी त्या एजन्सी कडून घेतली जाणार आहे. अशी अट सरकारने या कामांसाठी का लावली. शिवाय राष्ट्रीय महामार्गाची जी कामे होतात ती सुद्धा 40 ते 45 टक्क्यापर्यंत निविदा रक्कमेपेक्षा कमी असतात. केंद्र सरकारचे मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा या पद्धतीने रस्त्याची कामे करत असताना आपल्या सरकारला निविदा रक्कमेपेक्षा कमी दराने कामे करता येणार नाहीत का याचे उत्तर सरकारने द्यावे. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली. या ठिकाणी असलेले अधिकारी हे फक्त कलेक्शन अधिकारी असल्यासारखे वाटतात. त्यांची कोणतीही भूमिका कामाप्रती दिसत नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा आहे. त्यामुळे सुशासन म्हणणाऱ्या मुख्यमंत्री यांनी याबाबतीत खुलासा करणे आवश्यक आहे. असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.
शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम अनिवार्य नाही, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गाण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेमार्फत केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान देण्यात आले होते. ही मार्गदर्शक तत्त्वे केवळ सल्ला स्वरूपाची असून ती बंधनकारक नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट करत ही याचिका धुडकावून लावली. सरन्यायाधीश सुर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल […]
इराण विरुद्ध सुरू असलेले युद्ध 5 दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर व इंधन साठ्यांवर 5 दिवस कसलेही हल्ले केले जाणार नाहीत, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले असले तरी इराण काही माघार घ्यायला तयार नाही. अशातच इराणच्या सैन्याने बुधवारी मोठा दावा केला. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ला लक्ष्य […]
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 28 विद्यार्थ्यांना टाटा मोटर्समध्ये नोकरी
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने टाटा मोटर्स कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर परिसर मुलाखतीसाठी 154 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. त्यामध्ये 31 विद्यार्थी मुलाखतीसाठी हजर होते. यापैकी 28 विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड करण्यात आल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ. मारुती लोंढे यांनी दिली. सदर मुलाखतीसाठी टाटा मोटर्स कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सोमेश्वर सोनवणे आणि एच आर एक्झिक्यूटिव्ह प्रकाश हाळवे हे उपस्थित होते. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना कंपनी विषयी माहिती देण्यात आली व त्यानंतर त्यांच्या मुलाखती घेऊन निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी केले, सूत्रसंचालन कवी प्रा. डॉ. अरविंद हंगरेकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. कुणाल वणंजे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रो .डॉ. छाया दापके या होत्या.तर प्रमुख उपस्थितीत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.मंगेश भोसले हे होते. सदर कार्यक्रमासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर निवडीबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी यशस्वी उमेदवारांचे व प्लेसमेंट विभागाचे अभिनंदन केले आहे.
इस्कॉन आयोजित शालेय प्रज्ञाशोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओटवणे प्रतिनिधी आतंरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या सावंतवाडी शाखेच्यावतीने भगवद्गीता आधारित आयोजित करण्यात आलेल्या शालेय प्रज्ञाशोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी १० वी अशा दोन गटात घेतलेल्या या परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातील २२ शाळां मधील एकूण २७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सावंतवाडी [...]
देशात निर्माण झालेल्या एलपीजी आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. “जनतेमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांना कोविड काळ आवडतो की काय?” असा खोचक सवाल करत, केंद्र सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच नागरिक रस्त्यावर उतरल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, […]
परंडा तालुक्यात 150 विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप
भूम (प्रतिनिधी)- दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत तसेच सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. 25 मार्च) रोजी साळुंके मंगल कार्यालय, परंडा येथे तालुक्यातील 36 शाळांतील 150 गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास परंडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सूर्यभानजी हाके, सेवा सहयोग फाउंडेशनचे सोशल मीडिया प्रमुख अनिकेत गमरे, धाराशिव जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परंडा तालुकाध्यक्ष ॲड. अशोक जाधव, सामाजिक कार्यकर्ते विशाल काशिद, तसेच फाउंडेशनचे प्रतिनिधी श्रीराम केसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविकात जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे यांनी सेवा सहयोग फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत, दुरच्या वस्तीवरून शाळेत पायी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींचा सायकलीमुळे वेळ वाचणार आहे. या वेळेचा उपयोग विद्यार्थिनींनी अभ्यासासाठी व आपल्या गुणवत्तावाढीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. गट शिक्षणाधिकारी सूर्यभान हाके यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व शाळांच्या सुविधा सुधारण्यासाठी पुढील उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सायकली मिळाल्याने विद्यार्थिनी व पालकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. गेल्या वर्षीही या संस्थांच्या माध्यमातून परंडा तालुक्यात 150 सायकलींचे वाटप करण्यात आले होते. यंदा भूम तालुक्यात 125, कळंब येथे 125 व परंडा तालुक्यात 150 अशा 400 सायकलींचे वाटप करण्यात आले असून, मुलींच्या शिक्षणाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक शंकर पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाळसाहेब घोगरे यांनी मानले.
Israel Iran War –इराणविरोधातील युद्ध वर्षभर लांबू शकते; मोसादने नेतान्याहूंना दिला होता इशारा
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्ध अधिक तीव्र होत आहे. तसेच अमेरिका आणि इराण यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे संभ्रम अधिक वाढत आहे. इराणचे सध्याचे नेतृत्व नष्ट झाल्यानंतर तेथील राजवट लवकर कोसळेल असे मानले जात होते. मात्र, तसे झाले नाही आणि इराणने अधिक आक्रमक होत इस्रायलसह आखाती देशात विनाशाला सुरूवात केली. त्यातच आता मोसदच्या इशाऱ्याची चर्चा होत आहे. काही वृत्तांनुसार […]
पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती संसदेला द्यावी, समाजवादी पक्षाची मागणी
आखाती देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत पारदर्शकता असावी, अशी मागणी करत समाजवादी पक्षाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी नेमकी काय चर्चा केली, याची सविस्तर माहिती संसदेला द्यावी,” अशी मागणी सपा खासदार रामगोपाल यादव यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना रामगोपाल यादव म्हणाले की, देशाचे परराष्ट्र […]
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर, नेमकं प्रकरण काय?
उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य स्वामी कुंदानंद गिरी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला. कथित लैंगिक छळ आणि पोक्सो कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायमूर्ती जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या एकल खंडपीठाने हा निकाल दिला. 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर […]

29 C