व्होडाफोन-आयडियाला जीएसटी नोटीस
कंपनीला जवळपास 638 कोटींचा दंड अहमदाबाद : व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) ला अहमदाबाद येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) आयुक्त कार्यालयाकडून सुमारे 638 कोटी रुपयांची दंडाची नोटीस मिळाली आहे. व्होडाफोन-आयडिया म्हणते की ते या कर मागणीशी सहमत नाही आणि त्याविरुद्ध कायदेशीर लढा देणार आहे. कर कमी भरल्याचा आणि चुकीच्या इनपुट क्रेडिटचा आरोप अहमदाबाद अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने [...]
नववर्षी सर्वांच्या मनोकामना होवोत पूर्ण
पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशबांधवांना शुभसंदेश वृत्तसंस्था / नवी दिल्ली नूतन वर्षाचा प्रारंभ झाला असून या वर्षात सर्वांच्या मनोकामना आणि त्यांनी नववर्षाच्या निमित्ताने केलेले निर्धार सुफळ संपूर्ण होवोत, असा शुभसंदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आपली ध्येये साध्य करण्यासाठी सर्वांनी निर्धाराने, योजनाबद्ध पद्धतीने, आत्मविश्वासपूर्वक आणि उद्देश स्वच्छ ठेवून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असा संदेश त्यांनी [...]
लडाखमध्ये ‘धुरंधर’ चित्रपट करमुक्त
लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता यांची घोषणा ► वृत्तसंस्था/श्रीनगर केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये रणवीर सिंग यांचा ‘धुरंधर’ चित्रपट करमुक्त घोषित करण्यात आला आहे. उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत जगभरात 1,100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाचे अनेक भाग लडाखमध्ये चित्रित करण्यात आले आहेत. [...]
यू-19वर्ल्ड कपसाठी लंकन युवा क्रिकेट संघ जाहीर
वृत्तसंस्था / कोलंबो 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील विश्व युवा चषक पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यांचा लंकन युवा संघ जाहीर करण्यात आला. या संघाचे नेतृत्व विमथ दिनसाराकडे सोपविण्यात आले असून कविजा गामागे उपकर्णधार राहील. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या लंकन युवा संघामध्ये कर्णधार दिनसारा, गामागे, महाविथना हे प्रमुख फलंदाज असून विरान चमुदीता, चमिका [...]
वृत्तसंस्था / रांची महिलांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात श्राची बंगाल टायगर्सने एसजी पायपर्सचा सडनडेथमध्ये 1-0 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 3-3 असे गोलबरोबरीत होते. या सामन्यात पेनल्टी शूटआऊटनंतरही गोलकेंडी कायम राहिल्याने श्राची बंगाल टायगर्सला लालरेमसियामीने सडनडेथमध्ये निर्णायक गोल करुन विजय मिळवून दिला. हा सामना सुरूवातीपासून ते [...]
‘ग्रोक-एआय’मधून अश्लील मजकूर काढून टाकण्याची सूचना वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्र सरकारने अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ला नोटीस पाठवत ‘ग्रोक-एआय’मधून अश्लील सामग्री काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. यासंबंधी सरकारने कंपनीला 72 तासांत अहवाल सादर करण्यासही बजावले आहे. शुक्रवार, 2 जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशात ‘एक्स’च्या ‘ग्रोक-एआय’ तंत्रज्ञान वापरून तयार केलेली सामग्री त्वरित [...]
. दुर्दैवाने आमचे शेजारी वाईट : जयशंकर
वृत्तसंस्था/ .चेन्नई शेजारी वाईटही अशू शकतात, दुर्दैवाने आमचे आहेत, जर एखादा देश जाणूनबुजून सातत्याने आणि कुठल्याही पश्चातापाशिवाय दहशतवाद जारी ठेवणार असेल तर आम्हाला आमच्या लोकांना दहशतवादापासून वाचविण्याचा अधिकार असल्याचे उद्गार विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी काढले आहेत. विदेशमंत्र्यांनी आयआयटी मद्रासमध्ये एका कार्यक्रमाला शुक्रवारी संबोधित केले. दहशतवादविरोधातील आमचा अधिकार कशाप्रकारे वापरावा हे आमच्यावर निर्भर आहे. आम्ही काय [...]
आयआयटी हैदराबादच्या विद्यार्थ्याला 2.5 कोटींचे रेकॉर्डब्रेक पॅकेज
शैक्षणिक संस्थेसाठी विक्रमी कामगिरी झाल्याने नावलौकिक वाढणार वृत्तसंस्था/ हैदराबाद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी हैदराबाद) येथे कॅम्पस भरतीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येथे एका अंतिम वर्षाच्या संगणक विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला एका प्रसिद्ध डच कंपनीने दरवर्षी 2.5 कोटी रुपयांचे पॅकेज देऊ केले आहे. त्याच्या या कमाईने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे पॅकेज केवळ या वर्षीचेच नाही [...]
‘लग्नाचा शॉट’ चित्रपटात प्रियदर्शिनी
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो वधूच्या लुकमधील होता. हा फोटो तिच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरवरील आहे. ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या पोस्टरमध्ये पारंपरिक [...]
भारताचा सप्टेंबरमध्ये बांगलादेश दौरा
वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी घेषणा केली की ते यावर्षी सप्टेंबरमध्ये भारतासोबत तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करेल.तथपि, बांगलादेशमध्ये स्थिर सरकार नसतानाच्या सध्याच्या परिस्थितीत बीसीसीआय तिथे प्रवास करण्यास सहमत होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.बीसीबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार,तीन एकदिवसीय सामने 1,3 अणि 6 सप्टेंबर रोजी खेळले जातील,तर टी-20 सामने [...]
‘एआययू’च्या नोंदणीकृत चाचणी गटात नीरज चोप्रा, सचिन यादव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव हेच तेवढे या वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी वर्ल्ड अॅथलेटिक्सची उत्तेजकविरोधी देखरेख संस्था असलेल्या अॅथलेटिक्स इंटेग्रिटी युनिटच्या (एआययू) नोंदणीकृत चाचणी गटात (आरटीपी) स्थान मिळवणारे भारतीय खेळाडू आहेत. दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता चोप्रा या यादीत नियमितपणे झळकत असतो, तर गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर यादवने [...]
दरबारी राजकारणामुळे राज्यभर कार्यकर्त्यांचा उद्रेक!
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात संताप व्यक्त केला आहे. खुद्द काही आमदारांचीही पक्षाकडून फसवणूक झाल्याची भावना आहे. राजकीय पक्षांना आपल्या विचारधारेवर आणि आपल्या पक्षाला यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर विश्वास राहण्यापेक्षा पैसा आणि गुंडगिरी यांच्या मदतीने यश मिळू शकते हा जो विचार [...]
उत्खननात सापडला कांस्याचा मुखवटा
चीनचा सिचुआन प्रांत स्वत:चे हिरवेगार डोंगर आणि नद्यांमुळे ओळखला जातो. चेंगडू शहरात काही मजूर नदीकाठावर खोदकाम करत असताना अनोखा शोध लागला आहे. खोदकामादरम्यान कांस्याचा मुखवट हाती लागली आहे. या मुखवट्याचे डोळे मोठे होते आणि टोकदार कान तसेच रुंद तोंड होते. मुखवटा दिसून येताच येथे पुरातत्वतज्ञांना पाचारण करण्यात आले. यानंतर आसपासच्या भागात उत्खनन सुरू केले असता [...]
सोनेरी नौदल ताफा…स्वप्न की सत्य?
ट्रम्प यांना गोल्डन या नावाचे फार आकर्षण आहे मग व्हिसा असो कोणती योजना असो त्याला ते गोल्डन हे नाव देऊन मोकळे होतात कारण त्यामुळे त्यांना आपण अमेरिकेला पुन्हा सुवर्ण विभागणी देत आहोत अशी खात्री वाटू लागते. अमेरिकन नौदलात सशस्त्र विमानवाहू सुसज्ज जहाजांचा म्हणजे युद्धनौकांचा नवा काफीला वाढविण्याची ही योजना आहे. या लढाऊ युद्ध पोतामध्ये पुढील [...]
आजचे भविष्य शनिवार दि. 3 जानेवारी 2026
मेष: जुन्या मित्रांच्या भेटीगाठी, धनसंचयाचे कौशल्य शिकाल वृषभ: अति कामाच्या ताणामुळे चिडचिडे बनाल. मिथुन: उधार उसनवारी नको, विद्यार्थ्यांचा मैत्रीमुळे वेळ वाया कर्क: व्यापारात नफा संभवतो. निर्णय घेण्याआधी विचार करा सिंह: ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. नातेवाईक मदत करतील कन्या: मानसिक शांतीसाठी संभ्रम व नैराश्यापासून दूर राहा तुळ: आकर्षक योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या वृश्चिक: आत्मविश्वास ढळू [...]
मराठी माणसांसाठी पाच वर्षांत मुंबईत एक लाख परवडणारी घरे देणार, सर्वांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत पार्किंग, महिला-विद्यार्थ्यांना निःशुल्क ‘बेस्ट’ प्रवास आणि 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट असा मुंबईच्या विकासाचा जबरदस्त ‘रोड मॅप’ आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ‘मनसे’ नेते अमित ठाकरे यांनी शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांसमोर सादर केला. शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक कार्यालयात गोंधळ घातला. माझ्याशी पंगा कशाला घेताय, असे म्हणत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना धमकावले. एवढेच नाही तर राठोड यांना असलेले पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेशदेखील त्यांनी सहपोलीस आयुक्तांना दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व विधानसभा […]
महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकवणाऱया उमेदवारांच्या माघारीवरून राज्यात हायव्होल्टेज ड्रामा दिसून आला. कुठे समजूत, कुठे दबाव, तर कुठे राजकीय तोडगे वापरत बंडखोरांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी ‘मिशन थंडखोरी’ मोहीम राबवली. पण बंडखोरांच्या समर्थकांमुळे माघारीवरून घमासानाचे प्रसंगही ओढवले. नाशिक आणि नागपुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बंडखोराला घरातच कोंडून ठेवल्याने […]
मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई…वेळीच जागे व्हा! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी घातली साद
>> गजानन चेणगे छत्रपती शाहू महाराजनगरी, सातारा, दि. 2 – ‘या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे. मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. उद्या तुमच्या देव्हाऱ्यावर विठोबासमवेत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमा टिकाव्यात असे वाटत असेल तर वेळीच झोपेतून जागे व्हा, […]
महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरल्या, भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही! अजितदादांची टीका
आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असा पिंपरीचा गौरव होता. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आम्ही अनेक विकासकामे केली. पण भाजपच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाली. शहरात लुटारूंची टोळी दिवसाढवळ्या वावरतेय. भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केला. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर पवार यांनी शुक्रवारी पिंपरीत पत्रकार परिषद घेतली. महापालिका […]
एसटीच्या कामकाजात मराठी भाषा बंधनकारक
एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवनेरी, शिवशाही गाडय़ांवर हिंदी भाषेत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. त्याची दखल घेत एसटी महामंडळाने आता संपूर्ण कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला आहे. बसगाडय़ा, बसस्थानके, आगारांमध्ये लिहिल्या जाणाऱया सर्व सूचना तसेच अंतर्गत फलक मातृभाषेतूनच लिहिण्याचे बंधनकारक केले आहे. तशा सक्त सूचना महामंडळाने जारी केल्या. मराठी […]
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी वढू बुद्रुक येथे अडीच एकर जमीन
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिरूरमधील वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाच्या विकासासाठी पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील अडीच एकर जमीन उपलब्ध होणार आहे. ही जमीन तत्काळ हस्तांतरीत केली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
सामना अग्रलेख – विधानसभा अध्यक्षांची झुंडगिरी, लोकशाही ओशाळली
राहुल नार्वेकर (सन्माननीय विधानसभा अध्यक्ष) आता कांगावा करतात, ‘‘तो मी नव्हेच! विरोधक रडीचा डाव खेळतात.’’ आमदार अपात्रतेच्या प्रकरणात भाजपच्या वतीने विधानसभा पटलावर नार्वेकरांनी खेळलेला रडीचा डाव देशाने पाहिला. नार्वेकरांच्या पक्षपाताने लोकशाही तेव्हा ओशाळून पडली. आजही तेच झाले, पण फौजदारानेच चोरी केल्यावर कारवाई कोणी करावी? महाराष्ट्राने आपले सत्त्व, तत्त्व, नीतिमत्ता गमावली आहे. ‘व्हाईट कॉलर’ गुंडांना संविधानिक […]
लेख –चीन-जपान तणाव आणि भारताला संधी
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन चीनची ‘मिडल किंगडम’ बनण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी त्यांनी तैवान, दक्षिण चीन समुद्र आणि भारताच्या हिमालयीन सीमांवर दिलेले आव्हान, यामुळे संपूर्ण आशिया एका ज्वालामुखीवर उभा आहे. या संघर्षात जपानने घेतलेली आक्रमक भूमिका आणि वाढवलेले संरक्षण बजेट हे भारतासाठी केवळ दिलासादायक नाही, तर सामरिकदृष्टय़ा अत्यंत फायदेशीर ठरणारे आहे. चीनसाठी तैवान हा केवळ एक […]
वेब न्यूज – AI 2026 मध्ये काय बदल घडवणार?
>> स्पायडरमॅन 2026 हे वर्ष AI चे असणार हे नक्की. AI मुळे जगभरातील सर्व क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे. उद्योग, क्रीडा, आरोग्य, वाहतूक अशा अनेक क्षेत्रांत मोठे बदल अपेक्षित आहेत. मात्र सामान्य माणसाच्या आयुष्यातदेखील या तंत्रज्ञानामुळे काही मोठे बदल अपेक्षित आहेत. मानवी आरोग्य, व्यवसाय, उत्पन्न यामध्ये AIची खूप मोठी मदत मानवाला मिळणार आहे. आतापर्यंत […]
प्रासंगिक –लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन
>> पंजाबराव मोरे राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने बुलढाणा येथील लोककवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन देखणे झाले. काटेकोर आयोजन, वेळेचे बंधन, तब्बल 14 सत्रांची बेमालूम गुंफण आणि दोन्ही दिवस रसिकांनी ओसंडून वाहणारा सभामंडप ही या अत्यंत कमी कालावधीत पार पडलेल्या साहित्य संमेलनाची वैशिष्टय़े म्हणावी लागतील. त्यामुळे लोककवी […]
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने उमेदवारी माघार घेण्याच्या मुदतीत म्हणजेच आज, शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण ४५३ नामनिर्देशन पत्रे माघार घेण्यात आली आहे. तर, १ हजार ७२९ उमेदवार निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत. उद्या, शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक […]
वायुतळावर धावपट्टीचे केले उद्घाटन वृत्तसंस्था/ निकोबार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी अंदमान आणि निकोबार बेटसमुहात भारतीय वायुदलाच्या कार निकोबार वायुतळावर अपग्रेड करण्यात आलेल्या धावपट्टीचा शुभारंभ केला आहे. सीडीएस चौहान हे शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता निकोबार बेटावर पोहोचले, जेथे अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल अजय कोचर आणि अन्य वरिष्ठ [...]
केंद्र सरकारने ‘X’ला बजावली नोटीस, Grok AI मधून अश्लील कंटेंट काढून टाकण्यास सांगितले
केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ ला नोटीस बजावली आहे. प्लॅटफॉर्मवरील Grok AI चॅटबॉटचा दुरुपयोग करून अश्लील कंटेंट तयार केले जात असल्याच्या वाढत्या घटनांवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) ही कारवाई केली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, Grok AI चा वापर करून युजर्स महिलांच्या आणि मुलांच्या फोटोंमध्ये बदल करून अश्लील, नग्न […]
मुंबईतील महायुती आघाडीच्या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार अरविंद सावंत यांनी आरोप केला की विरोधकांकडून दबाव टाकला जात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांचा भाऊ निवडणूक लढवत असून तो अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या निवडणूक लढवणारा हा उमेदवार गेल्या तीन दिवसांपासून विधानसभाध्यक्षांच्या भीतीमुळे बेपत्ता असून तो स्वतःच्या घरीही गेलेला […]
कुलाबा येथील तीन वॉर्डांमध्ये आपल्या कुटुंबातील तीन उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप ओबीसी नेते व माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे. याच एक व्हिडीओही समोर आला आहे. यावरूनच आता सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. X वर एक व्हिडीओ शेअर करत अंजली […]
सोलापुरात राजकीय वादातून मनसे नेत्याची हत्या, शहरात तणावपूर्ण वातावरण
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक घटना घडली असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख बाळासाहेब सरवदे यांची संध्याकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. गंभीर अवस्थेत त्यांना मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात […]
Photo –उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या मुंबईतील सर्व उमेदवारांना मार्गदर्शन केले. मुंबईतला मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी, सामान्य मुंबईकर आणि मुंबईच्या विकासासाठी आपण मैदानात उतरलो असून आपला वचननामा सर्व मुंबईकरांपर्यंत पोहचवून तुमचा विजय पक्का कराल असा विश्वास उद्धव ठाकरे […]
Pandharpur : पंढरपुरात नववर्षानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास
नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले पंढरपूर : नववर्षाच्या प्रारंभानिमित्त गुरुवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध प्रकारच्या फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली होती. या फुलांच्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा अधिकच मनमोहक व प्रसन्न दिसत असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या [...]
लोकशाहीच्या नावाने झुंडशाही सुरू, उमेदवारी अर्ज माघारीवरून संजय राऊत यांची टीका
सरकारी यंत्रणेचा संपूर्ण गैरवापर सुरू आहे. लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही सुरू आहे, उमेदवारी अर्ज माघारीवरून अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजया राऊत यांनी महायुती सरकारवर केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले आहेत की, “रात्री कितीही वाजेपर्यंत माघारीचा अर्ज आणून दिल्यास तो तीन वाजेच्या […]
मुंबईच्या विकासासाठी आपण मैदानात उतरलोय असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आपला वचननामा सर्व मुंबईकरांपर्यंत पोहचवून तुमचा विजय पक्का करा असा विश्वासही व्यक्त केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची […]
Satara : वडगाव हवेलीच्या खंडोबाची आज यात्रा
यात्रेनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम दुशरे : परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव हवेली (ता.कराड) येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची यात्रा पौष शुक्ल १४ म्हणजे शुक्रवार दिनांक २ रोजी जानेवारी रोजी होत आहे. यात्रेची मुख्य सुरुवात मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा यादिवशी मृग [...]
Photo –आदित्य आणि अमित ठाकरे यांचं मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज शिवसेना भवन येथे युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी युतीच्या वतीने मुंबई, मुंबईकर आणि मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन मुंबईतील युतीच्या सर्व उमेदवारांसमोर सादर केलं. मुंबई भविष्याचं आणि मुंबईच्या भल्यासाठी आम्ही दिलेला शब्द […]
ड्रिंक अँड ड्राइव्हवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 1.31 कोटींचा दंड, 13,752 ई-चलान जारी
मुंबई पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राइव्हविरोधात नववर्षाच्या पूर्वसंध्येला राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 हजार हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करून दंड आकारला आहे. गुरुवार, 01 जानेवारी 2026 च्या सकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती. या कालावधीत एकूण 211 वाहनचालकांवर मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. ही संख्या 2023 आणि 2024 च्या अखेरच्या दिवशी […]
Satara : मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर बोंबाबोंब करणार ; महेश करचे यांचा इशारा
म्हसवड पोलीस ठाण्यात मनमानी कारभार म्हसवड : म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या बेकायदेशीर, मनमानी आणि एकतर्फी कारभारामुळे लोक भयभीत आहेत. या परिस्थितीसंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी करूनही सोनवणे यांना अभय दिले जात आहे. त्यामुळे [...]
Satara : बहुजमध्ये जिल्हा परिषद सीईओ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
बहुज येथील मोक्याची जागा नगरपंचायतीला देण्याचा निर्णय वादात बहुज : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयाची जागा नगरपंचायतीला भाड्याने देण्याचा निर्णयाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याऱ्यांनी फेरविचार कराबा या मागणीचे निवेदन देऊन दहा दिवसाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीयनि घेतले नाही. याच्या निषेधार्थ बहुजला [...]
Miraj |मिरज महापालिका निवडणूक: मुख्य निरीक्षकांकडून ईव्हीएम व स्ट्राँग रूमची पाहणी
मिरज महापालिका निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात मिरज : महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सूक्ष्म नियोजन राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निरीक्षक कार्तिकयन एस. यांनी शहरातील सेंट्रल वेअरहाऊस येथील ईव्हीएम यंत्रांची साठवणूक, स्ट्रॉग [...]
SIR मध्ये मृत घोषित केलेल्या व्यक्तींना TMC ने आणलं मंचावर, निवडणूक आयोगावर केला हल्लाबोल
पश्चिम बंगालमध्ये एसआयआरवरून सुरू असलेला गोंधळ अजूनही थांबलेला नाही. निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रियेअंतर्गत मसुदा मतदार यादी प्रकाशित केली आहे, परंतु मसुदा मतदार यादीत अनियमिततेच्या तक्रारी सुरूच आहेत. एसआयआर मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी हे सातत्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत आहे. यातच शुक्रवारी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बरुईपूर […]
Sangli Politics : सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची भाजपकडून तयारी
सांगली महापालिकेसाठी भाजप सज्ज सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराची गती वाढवली असून, येत्या शनिवार ३ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन सांगलीतील स्टेशन चौकात करण्यात आले आहे. या [...]
हेच भाजपचे हिंदुत्व आहे का? तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचा भाजपला सवाल
टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दक्षिण 24 परगणा (पश्चिम बंगाल) येथे झालेल्या सभेत भाजप आणि राज्यातील विरोधकांवर जोरदार टीका केली. सुवेंदु अधिकारी यांनी बांगलादेशातील युनुस सरकार बंगाल सरकारपेक्षा चांगले प्रशासन चालवत असल्याचे वक्तव्य केले होते, त्यावर प्रत्युत्तर देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, दिपू दास यांची बांगलादेशात हत्या झाली असूनही भाजप नेते तेथील […]
बीड नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणूक मोठी प्रतिष्ठेची केली. केवळ बीड शहरात दोन सभा आणि दोन बैठका त्यांना घ्याव्या लागल्या. नगर पालिका ताब्यात आली. नगराध्यक्षपद अजितदादांच्या गटाने राखले मात्र अजितदादा बीडमधून निघून जाताच दुसर्याच दिवशी नगराध्यक्षांच्या पदभार कार्यक्रमात ड्राम दिसला. उपनगराध्यक्ष पदासाठी अनेकांच्या आत्मिक इच्छा समोर आल्या. रूसवा फुगवी आणि मतभेदही उघड […]
कळंब नगर परिषद नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या सुनंदा कापसे यांनी सूत्रे स्वीकारले
कळंब (प्रतिनिधी)- कळंब नगर परिषद सर्वाधिक निवडणूक 2025 साठी कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून शिवसेनेच्या सुनंदा शिवाजी कापसे या 2254 मताधिक्याने विजय झाल्या आहेत .त्यांनी मंगळवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी कळंब नगर परिषद कार्यालय येथे आयोजित भव्य समारंभात नगराध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली हलगीच्या कडकडात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे व निर्वाचित नगरसेवक यांनी रॅली द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला , हि रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करण्यासाठी पोहोचली , यानंतर नगरपरिषद कार्यालय येथील मीटिंग हॉलमध्ये पदग्रहण समारंभ संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, कळंब नगर परिषद निवडणूक प्रमुख माजी जीप बांधकाम सभापती दत्तात्रेय देऊळकर, शिवसेना नेते अजित पिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी आप्पा कापसे , नगरपरिषद मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात आर.पी. आय आठवले पक्षाचे बंडूभाऊ बनसोडे, मुकुंद मामा साखरे तसेच निवडणूक व्यवस्थापक योगेश अंधारे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांनी सत्कार केला तर प्रमुख पाहुणे यांनी नूतन नगराध्यक्षांचा सत्कार केला तसेच कळंब नगर परिषद कार्यालयाच्या वतीने मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी नूतन नगराध्यक्षाचा फेटा, शाल, बुके देऊन सत्कार केला, यानंतर माजी सैनिक संघटनेच्या वतीने नूतन नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला ,शिवसेना तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते, शिवसेना जिल्हा उपप्रमुख आनंत वाघमारे तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मकरंद पाटील, तालुकाप्रमुख दत्ता साळुंखे, अरुण चौधरी, नवनिर्वाचित नगरपरिषद सदस्य, शितल चोंदे, रोहन पारख, लखन गायकवाड, हर्षद अंबुरे, अमर चाऊस, अतुल कवडे, भूषण करंजकर, योजना वाघमारे, पूजा धोकटे, शाला पवार यांच्यासह कार्यकर्त्यांची व नागरिकांची उपस्थिती होती. निर्वाचित नगराध्यक्ष सुनंदा कापसे यांनी शहराचा विकास योजना राबविण्याचे मतदारांना आश्वासन दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले तर दत्ताभाऊ कुलकर्णी, अजित पिंगळे, नितीन काळे यांनी विकास योजना पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पूर्ण सहकार्य राहणार आहे असे सांगितले व शंभर दिवसाचा विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील तीर्थकर यांनी केले.
Sangli : सांगलीत कॉलेज कॉर्नरजवळ भरदिवसा तरुणाची हत्या; दोन तासांत संशयित ताब्यात
तरुणाच्या हत्येने सांगलीत खळबळ सांगली : शहरातील गजबजलेल्या कॉलेज कॉर्नरजवळ ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास धारदार लोखंडी चाकूने झालेल्या हल्ल्यात २४ वर्षीय विष्णू सतीश वडर या तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे [...]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेत स्थलांतर करणं दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळवणे हे अनेक स्थलांतरितांचे स्वप्न असते. मात्र आता अमेरिकन नागरिकाशी विवाह करून हे ग्रीन कार्ड मिळवता येणार नाहीए. अमेरिकेचे इमिग्रेशन तज्ज्ञ ब्रॅड बेर्नस्टेन यांनी याबाबत कठोर इशारा दिला आहे. अमेरिकन कायद्यानुसार जोडीदाराला ‘इमिजिएट रिलेटिव्ह’ (जवळचे नातेवाईक) मानले जात […]
Sangli Politics : भाजपच्या आक्षेपाला “नकार; मैनुद्दीन बागवान उमेदवारी अर्ज वैध ठरला
भाजपच्या आक्षेपाला “नकार”; बागवान अर्ज पूर्ण वैध ठरला सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये आज महत्त्वाचा निर्णय समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उमेदवार व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचे अधिकृत उमेदवार अल्लाभक्ष [...]
अध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्या नंतर उपाध्यक्ष पदग्रहण सोहळ्याची तयारी
कळंब (प्रतिनिधी)- नववर्षाचे मुहूर्त साधत महायुतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांनी भाजपा,शिवसेना,रिपाइं,ओबीसी अश्या अनेक वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.यादरम्यान अनेक वरीष्ठ पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले,मात्र ज्या कळंब भाजपा ने मागील वर्षभरापासून शहरात रामनवमी,राम मंदीर उत्सव,जनता दरबार,बुथ बांधणी,मन कि बात कार्येक्रम,विवीध योजनां,सरकार आपल्या दारी,मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार,लाडकी बहीण योजना,अशा अनेक कार्येक्रमांच्या माध्यमातून मकरंद पाटील यांनी संघटनेसोबत वाढवलेले जनसंपर्क व समाजाच्या शेवटच्या घटकाचा जनाधार मिळवला होता. जे घटक भाजप वर्ज्य समजत होते त्यांनी पण मतदान केले यासाठी मकरंद पाटील यांना श्रेय द्यावेच लागेल. या निवडणुकीत भाजपाने शहराध्यक्ष मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुक्ष्मपणे आपली निवडणूक रणनीती आखत सर्वस्व पणाला लावून महायुतीच्या नगराध्यक्षांस प्रचंड बहूमत मिळवून दिले,कांहीं नगरसेवकांचा निसटता विजय झाला,तर कांहीं उमेदवारांना सर्वशक्तीनीशी लढूनही पराभव स्विकारावा लागला. निवडून आलेल्या भाजपा व शिवसेना उमेदवारांची संख्यात्मक मर्यादा जनतेने देत काठावर बहूमत दिले आहे,महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळालेले बहूमत पाहता महायुतीचे किमान तेरा ते चौदा उमेदवार निवडून यायला हवे होते,असे राजकिय जाणकारांचे मत आहे.मग माशी कुठे शिंकली ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्हीही शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र अद्याप हाती कांहीच लागले नसले तरी,यास कुठेतरी भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांतील अंतर्गत धुसफुस कारणीभूत असावी असे जनतेत बोलले जाते. यातच आता नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी कळंब शहर भाजपाचे अध्यक्ष मकरंद पाटील,निवडणूक प्रसंगी विवीध माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवणारे विवीध सामाजिक नेते,भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या कोणत्याही नगरसेवकांचे सत्कार याप्रसंगी झाले नाहीत,याबाबत अनेक नेते व कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत,आता उपनगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळाही लवकरच होण्याकरीता,उपनगराध्यक्ष,विवीध विषय समित्या,स्विकृत सदस्य,याकरीता भाजपा आता ॲक्शन मोडवर असल्याचे बोलले जाते.
वैष्णवी बाबर यांचा कबड्डी संघ देशात दुसरा
भूम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शालेय 69 व्या अजिंक्य कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलींचा संघ देशात दुसरा ठरला आहे. या स्पर्धेत चमकदार खेळी करणाऱ्या स्वराज क्रीडा मंडळाची खेळाडू वैष्णवी बाबर हिचे भूम शहरात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तिचे गोलाई चौकात फटाक्यांच्या अतिषबाजीत व फुलाची उधळण करीत गोलाई चौकापासून गांधी चौकापर्यंत वाजत गाजत जंगी मिरवणूक काढण्यात आली. ही राष्ट्रीय अजिंक्य कबड्डी स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यात कोकमठाण येथे संपन्न झाल्या. या संघात भूम येथील स्वराज क्रीडा मंडळाच्या वैष्णवी बाबर हिने जोरदार कामगिरी करत आपल्या संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलला होता. या प्रसंगी स्वराज क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू स्वराज मुळे, यशोदीप कांबळे, सुहास बाबर, साहिल जरडकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी तिचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. सिराज मोगल, गोपाळ येळमकर, भरात साठे, महादेव कुटे, समाधान मिसाळ, निलेश व्हरे,अक्षय बाराते,स्वप्नील सुपेकर, अक्षय तिकटे, साक्षी मिसाळ, राजनंदिनी मिसाळ, राधिका जाधव, कुणाल भारती, अमित सुपेकर, संजय साठे, अभिजित देवरे, कैफ मोगल, आदित्य जगदाळे ,मयूर साठे, श्रेयश शिंदे, पार्थ साठे ,साहिल सुरवसे, विनायक आहेर, पृथ्वीराज हसवले, समाधान भोसले, अमित राऊत यांच्यासह स्वराज क्रीडा मंडळाचे खेळाडू मोठया संख्येने हजर होते. तिला एनआयएस प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक अमर सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
3 व 4 जानेवारीला विशेष मोहीम; धाराशिव तालुक्यात 117 जमीन मोजणी प्रकरणांचा दोन दिवसांत होणार निपटारा
धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाळ्यात काम होऊ न शकल्याने प्रलंबित राहिलेल्या जमीन मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी धाराशिव तालुक्यात 3 व 4 जानेवारी 2026 रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत दोन दिवसांत 117 प्रकरणांचा निपटारा केला जाणार असून,यासाठी इतर तालुक्यांतून 55 सर्वेअर सहभागी होणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात माहे जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत सतत पाऊस व शेतजमिनीत चिखल असल्यामुळे मोजणीची कामे होऊ शकली नाहीत. परिणामी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय,धाराशिव येथे एकूण 710 मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिली असून त्यापैकी 510 प्रकरणे मुदतबाह्य आहेत. या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त व संचालक,भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमी अभिलेख,छत्रपती संभाजीनगर विभागाचे किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 3 व 4 जानेवारी रोजी 117 प्रकरणांची प्रत्यक्ष मोजणी होणार आहे.संबंधित जमीनधारकांना नोटिसा पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या असून ई-चावडीवरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.संबंधित अर्जदार व हितसंबंधितांनी या दिवशी उपस्थित राहून आपल्या जमिनीची मोजणी करून घ्यावी,असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संग्राम जोगदंड यांनी केले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास प्रलंबित प्रकरणांचा मोठ्या प्रमाणात निपटारा होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कळंब येथे दिनेश मंडलिक यांचा सत्कार
कळंब (प्रतिनिधी)- येथील उपविभागीय कार्यालयातील कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष महसूल सहाय्यक अधिकारी दिनेश गोरख मांडलिक यांचा वाढदिवसानिमित्त कळंब येथील उपविभागीय कार्यालयात सेतू सुविधा केंद्र संचालक व मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने वाढदिवसा निमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे,सेतु सुविधा केंद्र संचालक नटराज गायकवाड, सुनील पाटोळे, दीपक दळवी, बाबासाहेब टोपे, कर्मचारी धनराज पिसुरे, बबन जाधवर यांच्या सह नागरीक उपस्थित होते.
Solapur : सावित्रीबाई फुले जयंती निमित्त नायगांव स्मारक भूमिपूजन
सोलापूर जिल्ह्यातून हजारो लोक नायगांव भूमिपूजनासाठी निघणार पाटकुल (सुहास परदेशी) :क्रांति ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त नायगांव येथील कार्यक्रमास सोलापूर जिल्हा मधुन हजारो लोक जाणार असल्याची माहिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी दिली आहे. स्त्री शिक्षणाच्या जनक प्रथम शिक्षिका सावित्रीमाई फुले [...]
सेवाभावातून शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी दिशा- जयकुमार पांढरे
तुळजापूर (प्रतिनिधी)- समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवणे आणि त्या शिक्षणाला सेवाभावाची जोड देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांनी केले. ‘सेवाभावातून शिक्षण’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मसला खुर्द येथे सुरू आहे. या शिबिरात आज सर्व स्वयंसेवकांनी श्रमदान केले श्रमदान करत असताना गावातील मुख्य रस्ता, शोष खड्डे मुख्य रस्ता व प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छता करून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. आपल्या मार्गदर्शनात पांढरे यांनी सांगितले की, केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, संवेदनशीलता व सेवावृत्ती निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी स्वयंसेवी संस्था, युवक व विद्यार्थी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करताना त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांची उदाहरणे दिली. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, साक्षरता, आरोग्य जनजागृती अशा क्षेत्रांत सेवाभावातून शिक्षण कसे प्रभावी ठरू शकते, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षणातून मूल्यसंस्कार घडवले गेले तरच जबाबदार नागरिक घडतील, असे सांगून त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना, युवक चळवळी व सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. सेवाभावातून मिळणारे शिक्षण हे आयुष्यभर उपयोगी पडते आणि व्यक्तिमत्त्व विकासास हातभार लावते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थितांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ स्वयंसेवक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गोकुळ बाविस्कर तर आभारप्रदर्शन प्रा कुकडे यांनी केले यावेळी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा गोकुळ बाविस्कर, कार्यक्रमाधिकारी प्रा बैनवाड स्वाती, प्रा.सुदर्शन गुरव, प्रा.बाळासाहेब राऊत, प्रा. सतीश वागतकर तसेच प्रा. क्रांती कदम आणि गावातील ग्रामस्थ महाविद्यालयातील कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसडून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन व सत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र लिहून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे की, राज्यातील महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना लोकशाहीवादी, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरण असणे […]
Dapoli News –बुरोंडी बंदरात जेटी अभावी मासेमार बांधवांचे होतायेत हाल
दापोली तालुक्यातील ऐतिहासिक बंदर म्हणून ओळख असलेल्या या बुरोंडी बंदराचा विकास आजही खितपत पडला असून त्याची झळ येथील स्थानिक मच्छीमार बांधवाना बसत आहे. ताज्या मासळीसाठी प्रसिद्ध असलेल्या या बुरोंडी बंदरावर होड्या लावण्यासाठी जेटीचे बांधकाम केले नसल्याने मासेमार बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत. मलपी परप्रांतीय फास्टर बोटींनी हैदोस घातल्याने तसेच एलईडी लाईटव्दारे केल्या जाणाऱ्या मासेमारींने येथील […]
कुंभार्ली घाटात अवघड वळणावर मालवाहक ट्रक उलटला, आठ तास वाहतूक ठप्प
चिपळूण पाटण मार्गावर कुंभार्ली घाट येथे रस्त्याच्या दुर्दशेमुळे शुक्रवारी पहाटे चार वाजता एक मालवाहू ट्रक रस्त्यात मध्यभागी उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास आठ तास ठप्प झाली होती. यादरम्यान छोटी चार चाकी वाहने जातील एवढाच मार्ग शिल्लक होता. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. हा अपघात कुंभार्ली घाटात असणाऱ्या मंदिराजवळ रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळेच घडल्याचे […]
हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ नैराश्यात असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या प्राध्यापकासह तीन विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पल्लवी ही हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील गव्हर्मेंट डिग्री कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिचे वडील विक्रम कुमार यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. […]
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भागीरथपुरामध्ये दुषितपाणी प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. तर 338 नवे रुग्ण सापडले आहेत. या घटनेने संपूर्ण राजकारण तापले आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. इंदूरच्या लोकांना पाणी नाही तर, विष पाजलं गेलं आणि प्रशासन मात्र कुंभकरणाची झोप घेत असल्याचा संताप […]
कारिवडे उपसरपंच महेश गावकर यांचे युवानेते विशाल परब यांच्याकडून अभिनंदन
गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची दिली ग्वाही ओटवणे|प्रतिनिधी कारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या महेश गावकर यांचे भाजपाचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशाल परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारिवडे येथे जात महेश गावकर यांचे अभिनंदन केले. तसेच गावच्या विकासासाठी सर्वतोपारी सहकार्य करण्याची ग्वाही महेश गावकर यांना दिली.यावेळी विशाल परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच महेश गावकर यांचा [...]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी संयुक्तरित्या शिवसेना भवनात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या मुंबईतील उमेदवारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांसमोर मुद्देसूद सादरीकरण करत उमेदवारांना प्रचारासाठी एक दिशा दिली. यामुळे उमेदवारांमध्ये मोठा उत्साह आणि जोश निर्माण झाला. ही आमच्या मनातली इच्छा आहे, […]
तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील सहाव्या माळी दिनी पौष शुक्ल पक्ष 14 चतुर्दशी विश्वावसू नाम संवत्सरे शके 1947 शुक्रवार दि. 02 जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. ती पूजा मांडण्याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, साक्षात पार्वती असणाऱ्या जगदंबा तुळजाभवानी मातेने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला.त्यामुळे महिषासूर मर्दिनी ह्या स्वरुपात देवीची अलंकार पूजा बांधण्यात येते. श्री तुळजाभवानी मातेच्या कंबरी नवरात्र महोत्सवातील देवीचा वार शुक्रवार पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी दर्शनाला भाविकांनी आज मोठी गर्दी केली होती. आजही दर्शन अभिषेक मुखदर्शन सशुल्क दर्शन वाहिल्या. रात्री श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रांगणात काढण्यात आल्यानंतर महंत वाकुजी बुवा, गुरु तुकोजी बुवा यांनी प्रक्षाळ पूजा केल्यानंतर सहाय्या माळीच्या धार्मिक विधीचा सांगता झाला.
भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात मैदानी स्पर्धांचे आयोजन
भूम (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी गॅदरिंग निमित्त शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे विविध मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे सहसचिव डॉ. संतोष शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे, डॉ. तानाजी बोराडे, समन्वयक डॉ. गोकुळ सुरवसे व डॉ. अशोक दुनघव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये 100 मीटर मुले या स्पर्धेत प्रथम क्रमांक गणेश मुंडेकर, द्वितीय क्रमांक, विशाल जाधव, तृतीय क्रमांक अभिषेक कांबळे या विद्यार्थ्यांनी मिळवला. तसेच गोळाफेक मुली स्पर्धेत प्रथम क्रमांक भक्ती कराळे, द्वितीय क्रमांक कोमल बोराडे, तृतीय क्रमांक महादेवी जाधव या विद्यार्थ्यांनी मिळवला. याप्रसंगी क्रीडा शिक्षक प्रा. महेश सूर्यवंशी, प्रा. राहुल राठोड, प्रा. नंदू जगदाळे, प्रा. मंगेश खराटे, प्रा. अमोल कुटे, प्रा. हरी महामुनी, प्रा. अक्षयकुमार डोंगरदिवे, प्रा. रमेश गायकवाड, प्रा. नवनाथ भोंग, डॉ. शामसुंदर आगे, डॉ.शिवशंकर माळी, प्रा.जयेश मसराम प्रा.लक्ष्मण पवार, डॉ.शितल अलगुंडे, डॉ.राजश्री तावरे, प्रा. पूनम सुतार, प्रा. दिप्ती गिरी तसेच इतर प्राध्यापकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
शहरातील घाणीचे साम्राज्य दूर करा - महाविकास आघाडी
तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरामधील सर्व नाल्या, गटारी व परिसर, सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ करणे व कचरा घंटा गाडीची दररोज वेळेवर व्यवस्था करण्याची मागणी मुख्याधिकारी यांना निवेदन देवून महा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली. निवेदनात, तुळजापुर शहरामध्ये ठिक ठिकाणी मोठया प्रमाणात घाणिचे साम्राज्य स्थापीत झाले असुन तुळजापुर येथील प्रत्येक नगरामध्ये सर्व गटारी, नाल्या, हे सर्व गहाण जावुन तुंबलेल्या असुन गटारीचे वाहणारे गहान पाणी हे सर्व रस्त्यावर वाहत आहे. तरी त्यापासुन मच्छरांची उत्पत्ती होऊन संबंधीत ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच सदरील घाणिचे साम्राज्य पाहुन येणारे भाविक भक्तांच्या दृष्टीकोनातुन तुळजापुर शहर हे अस्वच्छतेची छबी दिसत आहे. तसेच कांही ठिकाणी गटारीच्या चेंबर वरील झाकणे ही दुरावस्थेत असुन त्याची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच तुळजापुर शहरातील सर्व परिसर व सार्वजनिक स्वच्छतागृहे येथे स्वच्छता नसल्यामुळे सर्वत्र दुर्गधी पसरत आहे. तसेच मंजुर ठिकाणी करचरा कुंडीची स्वच्छता करणे व दररोज वेळच्या वेळी कचरा घंटा गाडी ही सर्व शहरामध्ये फिरणे यावी. तरी मे. साहेबांना विनंती आहे की, कृपया आपण तुळजापुर शहरातील सर्व नाल्या, गटारी व परिसर, सार्वजनिक स्वच्छतागृहे हे लवकरात लवकर स्वच्छ करण्यात यावे. तसेच कचरा कुंडीची ही व्यवस्था लवकरात लवकर करावी हे निवेदन नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ, आनंद नानासाहेब जगताप, अक्षय धनंजय कदम, प्रगती गोपाळ लोंढे, रणजीत चंद्रकांत इंगळे यांनी दिले.
यात्रा मैदानावर चर्चा? आमदार सुरेश अण्णा धस यांची शिवसेना नेत्यांची सदिच्छा भेट
तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव व नगरसेवक किरण (टिनु) कदम यांनी आमदार सुरेश अण्णा धस यांची आष्टी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार धस यांचा श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा व कवळ्याची माळ देऊन सन्मान करण्यात आला. या भेटीत तुळजापूर शहरातील ऐतिहासिक यात्रा मैदानाच्या जमीन हडप प्रकरणासह विविध स्थानिक व नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात्रा मैदान प्रकरणाच्या चौकशी अहवालास होत असलेल्या विलंबाबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार धस यांच्याकडे व्यक्त केली. नागरिकांच्या अडचणी व विकासात्मक मुद्द्यांवर संवाद यावेळी यात्रा मैदानाशी संबंधित नागरिकांच्या अडचणी, तुळजापूर शहरातील विकासात्मक प्रश्न तसेच इतर स्थानिक समस्यांवर सकारात्मक व सखोल चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. तुळजापूरच्या सर्वांगीण हितासाठी संबंधित सर्व विषयांवर समन्वयाने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आल्याचेही समजते. या भेटीनंतर तुळजापूरच्या यात्रा मैदान प्रकरणासह इतर महत्त्वाच्या विषयांना गती मिळणार का, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भूसंपादन मालमत्ताधारकांना अधिकाधिक मोबदला देणार- ओंकार देशमुख
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीक्षेत्र तुळजापूर येथील विकासकामांसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये बाधित मालमत्ताधारकांना पूर्णपणे विश्वासात घेऊन ऑर्डर पद्धतीने अधिकाधिक मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी ओंकार देशमुख यांनी दिली. भूसंपादनाबाबत बुधवारी आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने, अभियंता राजकुमार भोसले, मंदिर संस्थानचे कर्मचारी तसेच बाधित मालमत्ताधारक उपस्थित होते. यावेळी मालमत्ताधारकांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, भूसंपादनाबाबत सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली असून प्रशासनाने आम्हाला योग्य व सविस्तर माहिती द्यावी. तसेच या प्रक्रियेत आमचे सर्वस्व जाणार असल्याने समाधानकारक मोबदला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी रेल्वे रस्ता मावेजासारखी प्रकरणे रखडली होती, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावर बोलताना उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी ओंकार देशमुख म्हणाले की, भूसंपादन प्रक्रिया सर्वांना विश्वासात घेऊनच केली जाईल. प्रत्यक्ष जागेवर किती क्षेत्र आहे व कागदोपत्री किती क्षेत्र आहे, याची सखोल तपासणी करून मोजणी केली जाईल. ही मोजणी येत्या सोमवार किंवा रविवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
बस चालक यांनी बसमध्ये आपला परिवार प्रवास करत आहे असे समजून वाहन चालवावे -पोनि अजित चिंतले
कळंब (प्रतिनिधी)- सध्याच्या धावपळीच्या युगात बस चालकाने बस मध्ये आपला परिवार आहे असे समजून नशा पाणी न करता वाहन व्यवस्थित चालवावे व शिस्तीचे पालन करावे असे मत कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी कळंब येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. येथील बस आगारात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे दि. 1 ते 31 जानेवारी या मासिका च्या कालावधीत राज्यभर आयोजन केले जात आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटन गुरुवार दि ,1 जानेवारी रोजी दुपारी 11 वाजता कळंब आगारात धाराशिव विभागाचे यंत्र अभियंता सूर्यकांत थोरबोले व कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कळबं आगाराचे प्रभारी आगार प्रमुख बालाजी भारती हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मोहन जाधव,कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, स्थानक प्रमुख जानराव हे होते. यावेळी कार्यक्रमासाठी प्रभाकर झांबरे , वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप , सुशिल हुंबे , प्रशांत नानजकर,सहाय्यक वाहतूक निरीक्षक निलेश जाधव , सुरेंद्र पायाळ, शिंदे मॅडम, श्रीमती शेख मॅडम चालक वाहक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते. यावेळी सडक सुरक्षा जीवन सुरक्षा सुरक्षितता मोहीम याविषयी मान्यवरांनी वाहक-चालक व प्रवाशांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश गोरे यांनी केले . कार्यक्रमासाठी वाहक चालक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सोनारी ग्रामस्थ आक्रमक; 6 जानेवारीपासून बेमुदत ‘रस्ता रोको’चा इशारा
परंडा (प्रतिनिधी)- परंडा-पाथरूड राज्य महामार्ग क्रमांक 210 ची अत्यंत दुरवस्था झाली असून, वारंवार सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या उदासीनतेच्या निषेधार्थ आणि रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सोनारी ग्रामस्थांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 6 जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास बेमुदत ‘रस्ता रोको’ करण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाने येत्या 5 दिवसांत (6 जानेवारीपर्यंत) या निवेदनाची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. अन्यथा, समस्त सोनारी ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. यादरम्यान होणाऱ्या परिणामांना पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन देताना रवी मांडवे, सचिन पवार, अविनाश हांगे, गणेश फले हे उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, पोलीस अधीक्षक धाराशिव, तहसीलदार परंडा आणि आंबी पोलीस स्टेशन यांना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत. मौजे सोनारी येथील शहीद मेजर सागर तोडकरी यांच्या स्मारकासमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आणि धोकादायक झाली आहे. सोनारी हे ठिकाण श्री काळ भैरवनाथ तीर्थक्षेत्र असल्याने येथे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर आजवर अनेक अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित विभागाला वारंवार प्रत्यक्ष भेटून आणि फोनद्वारे माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सद्यस्थितीत ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने साखर कारखान्यांची अवजड वाहने याच मार्गावरून धावतात. हा मार्ग अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख दुवा असूनही प्रशासनाकडून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग परंडा येथे 1 जानेवारी 2026 रोजी हे निवेदन देण्यात आले. “जर या धोकादायक रस्त्यामुळे भविष्यात कोणताही अपघात झाला, तर त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल आणि संबंधित विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल,“ असा आक्रमक पवित्रा ग्रामपंचायतीने घेतला आहे.
जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत वाशीच्या पूनम चेडे यांचा प्रथम क्रमांक
वाशी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एस.सी.ई.आर.टी.) पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 डिसेंबर 2025 रोजी लातूर येथे आयोजित जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत वाशी येथील जे. आय. आर. टी. तंत्र प्रशालेच्या शिक्षिका पूनम गौतम चेडे यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. धाराशिव जिल्ह्यातून सादर करण्यात आलेल्या विविध नवोपक्रमांपैकी चेडे यांच्या उपक्रमाची गुणवत्ता, उपयुक्तता व सादरीकरण सर्वोत्तम ठरले. या घवघवीत यशामुळे त्यांची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, येत्या जानेवारी 2026 मध्ये एस.सी.ई.आर.टी. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्या धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
रस्ता सुरक्षा अभियानाची हेल्मेट रॅलीद्वारे जनजागृती
धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियान 2026 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव व जिल्हा पोलीस प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये जिल्हाभर राबविण्यात येत आहे. त्याप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी वाहनास रस्ता सुरक्षा अभियान 2026 चे बॅनर लावून त्यास हिरवा झेंडा दाखवून रस्ता सुरक्षा अभियान 2026 ची सुरुवात केली. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी, नवनाथ साठे, राजन शिंदे, शुभम खोसे तसेच कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले व त्यांचे सहकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक धनंजय लोंढे,नरसिंह कुलकर्णी व इतर सर्व कार्यालयीन कर्मचारी तसेच कार्यालयात आलेले सर्व नागरिक, वाहन चालक/मालक,मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व वाहन वितरकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात हेल्मेट परिधान करून बाईक रॅलीद्वारे करण्यात आली.ही रॅली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथून शहरातील तेरणानगर, ज्ञानेश्वर मंदिर, भानूनगर, सेंट्रल बिल्डिंग, एस.पी. ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, तुळजाभवानी स्टेडियम,कोर्ट इत्यादी ठिकाणी फिरवून पुन्हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे येऊन समारोप करण्यात आला. तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी कार्यालयात जमलेल्या वाहन मालक/चालक व इतर नागरिकांना मार्गदर्शन करताना दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करणे,चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करणे, अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ अँम्बुलन्स बोलावून रुग्णालयात पोहोचविण्यास मदत करणे तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये,असे आवाहन केले.
अरविंद सावंत ,भास्कर जाधवांसह १५ जणांची निर्दोष मुक्तता
मनाई आदेशांचे उल्लंघन करून कुडाळ एसीबी कार्यालयावर काढला होता मोर्चा ; ॲड. सुधीर राऊळ यांचा युक्तिवाद कुडाळ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ मोर्चा काढून आणि सभा घेऊन जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून शिवसेना नेते व खासदार [...]
कारिवडे उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा! ओटवणे|प्रतिनिधी कारिवडे गावच्या उपसरपंचपदी महेश नारायण गांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या खास बैठकीत महेश गावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.कारिवडे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटात ठरल्याप्रमाणे तुकाराम बाबाजी आमुणेकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी कारिवडे [...]
मळेवाडचा युवक बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला
बिबट्याने केला युवकाचा पाठलाग न्हावेली /वार्ताहर मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून निरवडे येथे कामानिमित्त गेला होता.मात्र काल गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना घोडेमुख पायथ्या नजीकच्या मुख्य रस्त्यावर पेंढऱ्याचीवाडी खुळादेववाडी येथे झडप घालण्याच्या तयारीत असलेला बिबट्या त्याच्या नजरेत पडला.मात्र कुत्रा असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केला.परंतु मागे वळून पाहिले [...]
सावंतवाडी बाजारपेठेलगत कचऱ्याचे साम्राज्य
नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी वेधले पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांचे लक्ष सावंतवाडी ; प्रतिनिधी सावंतवाडी शहराच्या बाजारपेठेलगत सालईवाडा येथीव वर्दम, नेवगी, भांबुरे घरामागील असणाऱ्या ओहोळावरील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. येथील रहिवाशांच्या खाजगी जागेत देखील कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी मिनी कचरा डेपो तयार झाला असून प्लास्टिक व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आरोग्य प्रशासनाने [...]
जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपला बाहेरून उमेदवार आणण्याची वेळ, अंबादास दानवे यांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, उमेदवारीबाबत असंतोषाचे प्रमाण अतिशय कमी असून कार्यकर्त्यांना समजावून सांगितल्याने पक्षाला फारसा फटका बसणार नाही. अनेक ठिकाणी चार-पाच इच्छुक असताना एका व्यक्तीलाच उमेदवारी देण्यात येते, त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज होतात, परंतु ही भूमिका समजावून सांगितल्यास ते समजून […]
राज्यात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात मोठा वाद निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप होत आहे. कुलाबा येथील 3 वॉर्डांमध्ये आपल्या कुटुंबातील 3 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप ओबीसी नेते व माजी खासदार हरीभाऊ […]
दुचाकींवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती
वाहतूकमंत्रीमाविनगुदिन्होयांचीमाहिती: 1 एप्रिलपासूनअंमलबजावणी: सर्वोच्चन्यायालयाच्याआदेशानुसारनिर्णय येत्या15 पासूनरस्तासुरक्षासप्ताहातजागृती सरकारनेअपघातांचीघेतलीगंभीरदखल प्रत्येकमतदारसंघातदेणारमोफतहेल्मेट राज्यातील91 ठिकाणीकॅमेराबसविणार झेब्राक्रॉसिंगसहअन्यसुविधांचीहीतपासणी पदपथांवरीलवाहनांवरहोणारकारवाई पणजी : राज्यसरकारनेवाढत्याअपघातांचीगंभीरदखलघेतलीअसूनतेटाळण्यासाठी6 महिन्यात61 ठिकाणीकॅमेरा बसवून ते कार्यान्वित करण्यात येणार आहेत. शिवाय येत्या 1 एप्रिलपासून दुचाकीवरील दोन्ही स्वारांना हेल्मेट सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहात हेल्मेटबाबत जागृती केली जाणार आहे. तसेच हेल्मेट मोफत देण्याची योजनाही सरकार [...]
आज असनियेच्या गडघेरा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव
शिवकालीन हनुमंत गडावरील जागृत देवस्थान ओटवणे प्रतिनिधी असनिये कणेवाडी येथील शिवकालीन श्री देव नितकारी महालक्ष्मी पिसादेवी गडघेरा पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज शुक्रवारी २ जानेवारीला होत आहे. शिवकालीन हनुमंत गडावरील जागृत देवस्थान म्हणून गडघेरा देवस्थान परिचित आहे. यानिमित्त सकाळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर या पंचायतन देवतांना सजविण्यात आले आहे. त्यानंतर दर्शनास प्रारंभ झाला.या निमित्त [...]
इंदूर दूषित पाणीप्रकरण –सरकारने या पापाचे प्रायश्चित्त घ्यायला हवे, उमा भारती यांचा भाजपला घरचा आहेर
इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्याने अनेकांवर मृत्यू ओढावल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आपल्याच सरकारवर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला आहे. ही घटना लज्जास्पद असून यासाठी सरकारने माफी मागायला हवी. मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपये नुकसान भरपाई ही त्यांच्या आयुष्याची किंमत असू […]
कोल्हापूरात मुख्यमंत्री फडणवीसांचा मिसळ कट्ट्यावर थेट संवाद कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे महायुतीने हटके नियोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा १२ जानेवारी रोजी मिसळ कट्ट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नितळचा आस्वाद घेत मुख्यमंत्री तासमर कोल्हापूर वासियांसोबत चर्चा करणार आहेत, अशी माहिती खात्तदार [...]
Kolhapur : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम तपासणी पूर्ण!
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी नियोजन अंतिम टप्प्यात कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी निवडणुक विभागाकडे प्राप्त झालेल्या ईव्हीएम मशिनची तपासणी पूर्ण झाली आहे. प्रशासनाकडून मतदान आणि मतमोजणी प्रक्रीयेची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. मतमोजणी ही चार ठिकाणी घेतली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ यांनी दिली. कोल्हापूर महापालिका [...]
Inchalkranji Crime : इचलकरंजीत दिवसाढवळ्या घरफोडी
इचलकरंजीत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह इचलकरंजी : शहरातील विक्रमनगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरात शिरून तिजोरीतील लॉकर उचकटत सुमारे २ लाख १५ हजार रुपये किमतीचे २७.२६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संभाजी गणपती भोसले (वय ६२. [...]
Kolhapur : नूतन वर्षारंभ व गुरुवार योगाने नृसिंहवाडीत भाविकांची लाखोंची गर्दी
नृसिंहवाडी दत्त मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला कोल्हापूर : नूतन वर्षारंभ व गुरुवार असा अनोखा योग साधत नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लाखावर भाविकांनी आज दत्त दर्शनाचा लाभ घेतला. थंडीची तमा न बाळगता पहाटेच्या काकड आरतीपासून [...]
ताळगाव वांगी, हिलारियो आंबा, कोंरगुट, काजू बोंडे, मुसराद आंब्याला ‘जीआय टॅग’
पणजी : राज्यातील विविध वैशिष्ट्यापूर्ण आणि पारंपरिक उत्पादनांना यापूर्वी भौगोलिक निर्देशांक (जीआय टॅग) प्रदान करण्यात आले असून त्या यादीत आता आणखी पाच उत्पादनांची भर पडली आहे. ताळगावची वांगी, हिलारियो आंबा, कोंरगुट तांदूळ, काजू बोंडे आणि मुसराद आंबा यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. जीआय निबंधकांकडून या उत्पादनांना ‘जीआय’ दर्जा देण्यात आला असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना [...]
देव श्री बोडगेश्वराचा जत्रोत्सव आजपासून
8 जानेवारीपर्यंतविविधधार्मिक, सांस्कृतिककार्यक्रमांचेआयोजन म्हापसा : म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा देव श्री बोडगेश्वरचा 91 वा महान जत्रोत्सवतसेच देवस्थानाचा 33 वा वर्धापनदिन आज शुक्रवार दि. 2 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त 8 जानेवारीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज शुक्रवार दि. 2 रोजी दु. 12 वा. श्री देव बोडगेश्वराच्या [...]
सांबरा येथे पाणी भरताना विजेचा धक्का; सातवीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : सांबरा (ता. बेळगाव) येथे आज शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पाणी भरताना विजेचा धक्का लागून सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. परिणीती चंद्रकांत पालकर (वय १२, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे [...]
म्हापसा : पोरबावाडा-कळंगुट येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला खून झाल्याची घटना घडली. मूळ पश्चिम बंगाल येथील एस. देवदास असे या मृत केअरटेकरचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा केअरटेकर पाहत असलेल्या मालमत्तेचे मूळ मालक मुंबईत वास्तव्यास आहेत. मृत देवदास हा गेल्या 15 वर्षापासून केअरटेकर म्हणून काम करत होता. मालकाने त्याच मालमत्तेत देवदासला राहण्यासाठी एका स्वतंत्र खोलीची सोय [...]
गोळीबारातकार्यकर्त्याचामृत्यू: बॅनरलावण्यावरूनवाद बेंगळूर : गंगावतीचे आमदार गाली जनार्दन रेड्डी यांच्या बळ्ळारीतील निवासस्थानासमोर बॅनर लावण्यावरून निर्माण झालेला वाद विकोपाला गेला. दोन गटात दगडफेक, हवेत गोळीबाराची घटना घडली. यावेळी बंदुकीतून झाडलेली गोळी लागून एका कार्यकर्त्याचा बळी गेला. या घटनेनंतर प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेमुळे बळ्ळारी शहरात तणाव निर्माण झाला आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी, [...]

22 C