साठ वर्षांपूर्वी मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून मराठी माणूस इरेला पेटला होता. प्रचंड मोठय़ा संघर्षानंतर, शेकडोंच्या बलिदानानंतर त्याने मुंबई मिळवली. आज तीच मुंबई पुन्हा महाराष्ट्रापासून तोडण्याचे भयंकर षड्यंत्र रचले गेल्याची जाणीव पुन्हा एकदा मराठी माणसाला झाली आहे. महानगरपालिका मराठी माणसांसाठी लढणाऱयांच्या हाती राहिली तरच मुंबई वाचू शकणार आहे. याच भावनेतून मराठी माणूस पेटून उठला आहे. उद्याची […]
पैशांच्या वाटपावरून राडे! ठाण्यात नोटांची बंडले वाटणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची धुलाई
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरले असतानाच आज दिवसभर मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी पैशांच्या वाटपावरून राडे झाले. कुठे ईव्हीएमचा डेमो दाखवत मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ घडवले, तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पाकिटातून गुपचूप पैसे वाटले जात होते. ठाण्यामध्ये तर नोटांची बंडले वाटणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धुलाई करण्यात आली. नोटाछाप प्रचार करणाऱ्यांना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या […]
मुंबईत 23 ठिकाणी मतमोजणी, आज 10 हजार 231 केंद्रांवर मतदान
मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी उद्या गुरुवार, 15 जानेवारी रोजी मतदान होत असून शुक्रवार, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदानासाठी पालिकेकडून 10 हजार 231 केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये पालिकेने 64 हजार 375 कर्मचारी-अधिकारी इलेक्शन डय़ुटीवर तैनात केले आहेत. तर मतमोजणीसाठी 23 केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. पालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत […]
मतदारांनो, मतदानाला जाताना या गोष्टी कराच!
मुंबईसह राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी उद्या, 15 जानेवारीला मतदान होत आहे. जे लोक मतदार आहेत, त्यांनी मतदानाला जाताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्यात. त्यामुळे मतदान केंद्रावर गेल्यानंतर गोंधळ उडणार नाही, तसेच काही गोष्टींमुळे पश्चाताप होणार नाही. 1 मतदानाला जाण्याआधी मतदानाची वेळ किती ते किती आहे हे आदल्या दिवशीच तपासून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे […]
बिनविरोध निवडीला आव्हानाच्या याचिकेवर 28 जानेवारीला सुनावणी, नोटाची याचिका फेटाळली
पालिका निवडणुकांपूर्वीच महायुतीचे 60पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आल्या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची तसेच उर्वरित उमेदवार व ‘नोटा’ला मिळालेल्या मतांचा विचार करून निवडणूक कार्यक्रम राबवण्याची मागणी करणाऱया याचिकाकर्त्यांना हायकोर्टाने आज दिलासा देण्यास नकार दिला. तुमची विनंती मान्य केली जाऊ शकत नाही असे निरीक्षण नोंदवत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने सदर याचिका फेटाळून लावल्या. मात्र उमेदवारांच्या […]
इराण पेटले…परिस्थिती चिघळली; अमेरिकेपाठोपाठ हिंदुस्थानचेही नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचे आवाहन
राजकीय अस्थिरता, हिंसाचार यामुळे इराणमधील परिस्थिती अत्यंत स्पह्टक बनली असून आतापर्यंत अडीच हजारांवर आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेपाठोपाठ केंद्र सरकारने महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. इराणमध्ये असणारे हिंदुस्थानी नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी, पर्यटक यांनी तत्काळ देश सोडावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, अमेरिकेकडून इराणवर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 5 जानेवारी […]
रसमलाई हे तामीळनाडूचे गद्दार, तामिळ जनतेने घेतला भाजपच्या अण्णामलाई यांचा समाचार
मुंबई हा मराठी व महाराष्ट्राचा अभिमान आहे. तामीळनाडूमध्ये निवडून आलेल्या एकाही नेत्यांनी मराठी व महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केलेले नाही. रसमलाई हे तामीळनाडूचे गद्दार आहेत, अशा शब्दांत तामिळ जनतेने भाजपच्या अण्णामलाई यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. प्रचारासाठी मुंबईत आलेल्या भाजप नेते अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर […]
मुंबईत लोकसभा, विधानसभेत वापरलेली ‘ईव्हीएम’ वापरणार! 28 पालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मशिन्स
मुंबईत 227 प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभेत वापरलेली केंद्राची ईव्हीएम वापरली जाणार आहेत, तर राज्यातील अन्य 28 पालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची ईव्हीएम वापरण्यात येणार आहेत. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मुंबईवगळता उर्वरित 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आहे. येथे मतदाराला तीन, चार किंवा पाच अशी मते द्यावी लागणार आहेत. या बहुसदस्यीय […]
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा ‘वीकेण्ड’ डोकेदुखीचा! शनिवारी आणि रविवारी 240 लोकल फेऱ्या रद्द होणार
पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या प्रवाशांना येत्या ‘वीकेण्ड’ला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शनिवारी आणि रविवारी लोकलच्या 240 फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. बोरिवली आणि मालाडदरम्यान शुक्रवारी व शनिवारी रात्री 11.15 ते मध्यरात्री 3.15 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर, तर मध्यरात्री […]
>> मच्छिंद्र ऐनापुरे प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय संकट ही भविष्यातील नाहीत, तर आजचीच वास्तव समस्या आहे. याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर अंदाधुंद विकासाची किंमत आपल्याला आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रचंड मोजावी लागेल. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या उपाययोजना, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर आणि सर्वांची सामूहिक जबाबदारी यातूनच या संकटावर मात करता येईल. अन्यथा विकासाच्या नावाखाली आपण […]
छत्रपती संभाजीनगरात 11 लाख मतदार हक्क बजावणार, 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत एपूण 11 लाख 17 हजार 477 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उद्या मतदान पार पडल्यानंतर शुक्रवारी चार ठिकाणी मतमोजणी होईल. महापालिकेसाठी मतदान शांततेत पार पडावे यासाठी शहरातील एपूण 1 हजार 267 मतदान केंद्रांवर मतदान […]
>> वैश्विक, khagoldilip@gmail.com 15 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचा काळ. खगोल अभ्यासात मकर संक्रांतीचे महत्त्व थोडे वेगळे. एकतर हा एकमेव वार्षिक सण नेहमीसारखा आपल्या चांद्र महिन्यानुसार न होता सौर कालगणनेप्रमाणे होणारा. सूर्याचे मकर राशीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणारे भ्रमण किंवा मकर संक्रमणाचा आरंभदिन म्हणजे मकर संक्रांत. अर्थातच, सौर कालगणनेनुसार त्याचा दिनांक ठरलेला. पूर्वी यावर चर्चा झाली की, […]
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि मतदानाला काही तास शिल्लक असताना केंद्र सरकारने दहिसर येथील हायफ्रिक्वेन्सी रडारचे गोराई येथे स्थलांतर करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत रडारच्या या स्थलांतराला हिरवा कंदील दाखवून पश्चिम उपनगरातील मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर डोळा ठेवत दहिसर येथील हायफ्रिक्वेन्सी रडारचे गोराई […]
भुयारी मेट्रो आज मध्यरात्रीपर्यंत धावणार
मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुयारी मेट्रोची (मेट्रो-3) सेवा गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. मतदानासाठी प्रक्रियेसाठी शहरात विविध मतदान केंद्रांवर तैनात असलेल्या अधिकारी-कर्मचाऱयांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो मध्यरात्री 12 वाजेपर्यंत धावणार आहे. पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत विशेष अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) घेतला आहे. निवडणूक डय़ुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत मतदान केंद्रावर […]
नागपुरात निवडणूक कामासाठी तब्बल 525 बसेस धावणार
नागपूर मनपा निवडणुकीसाठी 525 बसेस धावणार आहेत. उद्या महापालिकेसाठी मतदान होणार असून मतदान केंद्रापर्यंत निवडणूक कर्मचारी, अधिकारी तसेच निवडणूक साहित्य पोहोचविण्यासाठी 525 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 15 जानेवारीच्या सांयकाळी 5 वाजेपर्यंत मर्यादित मार्गावर 250 बसेस सुरू राहतील. 16 जानेवारीपासून शहरातील बस सेवा आपल्या नियमित वेळापत्रकानुसार, नियमित सुरू राहील, अशी माहिती नागपूरचे महापालिका आयुक्त डॉ. […]
बेस्ट, एसटी, खासगी गाड्या निवडणूक ड्युटीला जुंपल्या; मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सीचालकांनी लुटले!
पालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. बेस्टच्या 1023 बसेस, 101 एसटी बसगाडय़ा आणि 1160 खासगी बसेस निवडणूक डय़ुटीला जुंपल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना संपूर्ण दिवसभर बेस्टच्या थांब्यांवर बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. त्यांच्या गैरसोयीचा रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी गैरफायदा घेतला. ‘शेअरिंग’ तत्त्वावर प्रवासी सेवा देताना रिक्षा, टॅक्सीचालकांनी दुप्पट भाडेवसुली केली. […]
तरुणांची उद्योजकता आणि नेतृत्वाचा रोड मॅप, १७० हून अधिक स्टार्ट अप्सची नोंदणी
तरुणांना उद्योजकतेकडे आकर्षित करून त्यांच्या नवनवीन कल्पनांना वास्तवात आणण्याची ऊर्जा देण्यासाठी जय हिंद महाविद्यालयात १० वे ग्लोबल आंत्रप्युन्योरशिप समिटचे येत्या १६ आणि १७ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये कीनोट सत्रे, पॅनल चर्चा, कार्यशाळा, नेटवर्विंग यावर मार्गदर्शन केले जाणार असून यामुळे तरुणांमधील उद्योजकता आणि नेतृत्वाचा रोड मॅपच तयार होणार आहे. विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यास […]
IND vs NZ काय पो छे! न्यूझीलंडने कापली टीम इंडियाची पतंग, दुसऱ्या सामन्यात सात गडी राखून केला पराभव
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर बुधवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडने हिंदुस्थानचा पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीवर आहेत. डेरिल मिचेलच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने टीम इंडियाने दिलेले 285 धावांचे लक्ष्य सात गडी राखून पार केले.
मार्लेश्वर-गिरिजा देवी यांचा विवाह थाटात संपन्न
लग्न सोहळा म्हणजे वर्हाडी, वाजंत्री, यजमानी, करवली, पौरोहित्य करणारे, मानकरी आदी लवाजमा आलाच माणसांच्या लग्नात एवढा डामडौल असतो मग देवाच्या लग्नात तर गोष्ट सोडाच… पृथ्वीतलावर सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेल्या मारळ नगरीत आज दुपारी १२.३० च्या मुहुर्तावर आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया… वाजंत्री बहु गलबला न करणेचे सूर उमटले आणि उपस्थित लाखो भाविकांनी मंत्राक्षता टाकत साक्षात […]
रत्नागिरी जिल्ह्यात 56 गट; 112 गण, 11 लाख 73 हजार मतदार बजावणार आपला हक्क
जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यात एकूण ५६ जिल्हा परिषद गट, ११२ पंचायत समिती गणातील ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात […]
मुंबईत ताडदेवमध्ये भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप, गुजराती मतदारांनी विरोध करताच काढला पळ
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी ताडदेवमध्ये वॉर्ड क्रमांक २१५ मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. येथे भाजप कार्यकर्त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली मतदारांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप होत आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या जवळच्या सहकारी प्रदीप छेडा आणि प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे वाटप सुरू आहे, असा आरोप […]
महाराष्ट्राच्या समुद्र हद्दीत घुसखोरी करून मासेमारी करताना गोव्यातील हॉली क्रॉस आय व्ही नौका बुधवारी पकडण्यात आली. मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने साखरीनाटे बंदरात ही कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून गोव्यातील हॉली क्रॉस आय व्ही क्र.आयएनडी जीए 01 एमएम 2640 ही नौका महाराष्ट्राच्या हद्दीत पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करत […]
निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ कमी केली, आता ‘ही’असेल वेळ
मुंबईसह सर्व २९ महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाने मुंबईतील मतदानाचा वेळ एक तासाने कमी केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले होते. साधारणत: आतापर्यंतच्या सर्व निवडणूका याच वेळेत पार पडल्या आहेत. मात्र यंदा मतदान 7.30 वाजता सुरू होणार असून सायंकाळी 5.30 वाजता संपणार आहे. […]
प्रयागराजच्या माघ मेळाव्यात पुन्हा अग्नीतांडव, 24 तासांतील दुसरी घटना
प्रयागराजमधील माघ मेळ्यात बुधवारी पुन्हा आगीची घटना घडली आहे. मेळाव्याच्या सेक्टर 4 मध्ये ही आग लागली. या आगीत दोन तंबू जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, संगम लोअर परिसरात उभारलेल्या छावण्यांमध्ये ही आग लागली. अनेक मोठ्या आणि लहान ब्रह्माश्रम तंबूंना या आगीचा फटका बसला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तात्काळ घटनास्थळी झाल्या. अथक प्रयत्नांनंतर […]
Ratnagiri News –चिपळूणच्या परशुराम डोंगरावर भीषण वणवा, संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोट
चिपळूण तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या परशुराम डोंगर परिसरात बुधवारी सायंकाळी भीषण वणव्याने थैमान घातले आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात जंगल पेटल्याने संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून, दूरवरूनही धूर स्पष्टपणे दिसत आहे. या वणव्यामुळे शेकडो झाडे, झाडीझुडपे, गवत तसेच मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे. परिणामी या परिसरातील जैवविविधतेला मोठा फटका बसला […]
राहुल गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही, कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदावर काय म्हणाले डीके शिवकुमार?
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्यात येणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र आता उपमुख्यमंत्री आणि राज्य काँग्रेस अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी या अफवांवर पूर्णविराम घातला आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी स्पष्ट केले की, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्रीपदात बदल करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. डी.के. शिवकुमार म्हणाले की, “मी कर्नाटक […]
उमरग्यात भीम गीत गायन स्पर्धा उत्साहात
उमरग्यात डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर भीम गीत गायन स्पर्धा धाराशिव उमरगा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त उमरगा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन बौद्ध समाज पंच [...]
Satara News : साताऱ्यात स्टेडियमवरील लाईट खांब साहित्य संमेलनानंतर पूर्ववत
शाहू स्टेडियममध्ये प्रकाशाच्या पुनर्स्थापनामुळे सराव वातावरण सुधारले सातारा : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शाहू स्टेडियम येथे विविध बदल करण्यात आले होते. मंडप उभारण्यासाठी काढण्यात आलेले लाईटचे खांब पूर्ववत बसविण्यात आले आहेत. संमेलनासाठी मैदानाची रंगरंगोटी करण्यात आल्याने स्टेडियम अधिक आकर्षक व देखणे झाले [...]
Satara : परळी खोऱ्यातील बिबट्याच्या हल्ल्यात दोन खोडांचा मृत्यू
बिबट्याच्या दहशतीमुळे परळी खोऱ्यात पशुधन धोक्यात कास : परळी खोऱ्यातील बेणेखोल व ताकवली मुरा येथेबिबट्याने एकाच दिवशी दोन खोंडाचा जिव घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली असून बिबटे आहेत तरी किती प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याच्या बाढत्या दहशतीमुळे परळी खोऱ्यातील पशुधन धोक्यात आले आहे. [...]
श्री बालाजी मंदिरात “भव्य कल्याण उत्सव “ने धनुर्मास ची सांगता
कळंब (प्रतिनिधी)- कळंब.कळंब येथील श्री बालाजी मंदिरात भव्य दिव्य कल्याण उत्सव शुभविवाह चे आयोजन करण्यात आले होते. दि13 जानेवारी मंगळवार रोजी श्री गोदा (लक्ष्मी) आणि श्री रंगनाथ (बालाजी) यांचा शुभविवाह हजारो भक्तांच्या साक्षीने भक्ती भावात संपन्न झाला. दि 16 डिसेंबर पासून सुरू असलेल्या धनुर्मास उत्सवाची सांगता या कल्याण उत्सवाने झाली. आकर्षक रोषणाई , फुलांचे तोरण, केळीची पाने , रंगीबेरंगी कापड याने मंदिराच्या सभागृहाला भव्य लग्न मंडपाची सजावट करण्यात आली होती. सायंकाळी चार वाजता आकर्षक रथा मधून श्री रंगनाथ यांची वरात मिरवणूक वाजत गाजत निघाली. स्त्रियांच्या लाल साड्या तर पुरुषांचे पांढरे कपडे व गुलाबी फेटा याने वराती मधील शिस्तबद्धता व उल्हास हे विशेष आकर्षण ठरले.फटाक्यांची आतिषबाजी, फुगडी आणि गरबा नृत्याने वरात सजली होती. वर श्री रंगनाथ आणि वधू श्रीगोदा यांना लग्न मंडपात मोठ्या उत्साहाने पुष्पवृष्टी करत आणले गेले.यजमान आणि उपस्थित भक्तांना द्वारे श्रीगोदा (लक्ष्मी ) कन्यादान विधी पूर्ण करण्यात आला. विश्वकसेन पूजा, मंगलाष्टक आणि अक्षता मुख्य पुजारी श्री रामाप्रपान्नाचार्य (मोनूजी महाराज ) यांच्या हस्ते हा गोदा कल्याण उत्सव संपन्न झाला गोदा कल्याणम हा प्रामुख्याने दक्षिण भारतात साजरा केला जाणारा एक अत्यंत पवित्र आणि शुभ उत्सव आहे.गोदा देवी (लक्ष्मी) आणि भगवान रंगनाथ (बालाजी) यांच्या दिव्य विवाहाचे प्रतीक आहे. अलवर संतांमध्ये गोदा देवी ही एकमेव महिला संत होती. गोदा देवी ना लक्ष्मीचा अवतार आणि भक्तीचे सर्वोच्च अवतार मानले जाते.भगवान विष्णूला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी गोदा देवी ने धनुर्मासात थिरुपवै नावाचा उपवास केला.हा उत्सव भक्त आणि देवतेच्या मिलनाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की या कल्याणममध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांना त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंद, शांती मिळते आणि अविवाहित लोकांना योग्य जीवनसाथी मिळतो. असा अध्यात्मिक मान्यता असलेला तिरुपती येथील उत्सव कळंब बालाजी मंदिरात भव्य प्रमाणात साजरा केला गेल्या असल्याने अनेक बालाजी भक्तांना हो पवित्र पर्वणी च होती. शुभ विवाहनंतर हजारो भाविकानी प्रसादाच लाभ घेतला. श्री बालाजी मंदिरात असे भव्य आणि पवित्र उत्सव साजरे होतं असल्याने भक्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
32 वा नामविस्तार दिन विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 32 वा नामविस्तार दिन विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रमुख अतिथी म्हणुन विशेष व्याख्यान दिले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. परिवर्तन जगझाप यांनी करुन दिला. प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर, इतिहास विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी “ नामविस्तार आणि मानवी हक्क चळवळ“ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी सर्व इतिहास हा मानवी हक्काचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ मानवी हक्कांबाबत आहे. भारताला उज्ज्वल शिक्षण परंपरा लाभलेली आहे. मानवी हक्काची तत्वे मुळात भारतीय ग्रंथात वर्णन केलेली आहेत. समानता, मानवी हक्क शिक्षणातून जपले पाहिजेत. चवदार तळ्याचा सत्याग्रह, मंदिर प्रवेशाची चळवळ या मानवी हक्क विषयक चळवळी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अहिंसक क्रांतीवर विश्वास होता. साउथबरो कमिशनसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात महत्वपूर्ण योगदान दिले. आर्थिक लोकशाही व सामाजिक लोकशाही भारतात प्रस्थापित झाल्यावर राजकीय लोकशाही योग्य प्रकारे रुजेल. शिक्षणाची दारे खुली करून देण्यात आली. लोकगीते,पोवाडे, साहित्य निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास देऊन नामविस्तार करण्यात आला. सामाजिक परिवर्तन हि हळुहळु होणारी व चिरकाल टिकणारी गोष्ट आहे, असे प्रतिपादन केले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सामाजिक न्याय, समतेचा हा लढा महत्वपूर्ण आहे. सामाजिक न्यायाची चळवळ हि लोकशाही मजबूत करणारी आहे, असे त्यांनी म्हटले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारंभ झाला. डॉ. गणेश शिंदे, समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेश्वर कळलावे यांनी आभार व्यक्त केले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
मुरुम शहरात महानायिका जन्मोत्सव सोहळ्यात शहरातील महिला नगरसेविकांचा गौरव
मुरूम( प्रतिनिधी) - क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा बी शेख आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने मंगळवारी (ता. १३) महानायिका जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शहरातील महिला नगरसेविकांचा सन्मान नगरपरिषदेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. महेश मोटे होते. यावेळी ईश्वरी क्लिनिकच्या डॉ. प्रीती चिलोबा, जिजाऊ ब्रिगेडच्या दैवशाला सावंत, सुप्रिया इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला नगरसेविकांचा फेटा बांधून शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. प्रीती चिलोबा मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, महिलांनी शिक्षण, आरोग्य व सामाजिक न्याय या क्षेत्रात पुढाकार घेतल्यास खऱ्या अर्थाने सक्षम समाज उभा राहील. महिलांचे आरोग्य, सन्मान आणि स्वावलंबन हे विकासाचे खरे मोजमाप आहे. अशा सन्मान सोहळ्यामुळे महिलांचा आत्मविश्वास अधिक बळकट होतो. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्रा. डॉ. महेश मोटे म्हणाले, सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचा वसा दिला, फातिमा बी शेख यांनी सामाजिक सलोखा शिकवला तर जिजाऊंनी नेतृत्व, धैर्य व राष्ट्रनिर्मितीचे संस्कार दिले. या महानायिकांचा वारसा आजच्या महिला लोकप्रतिनिधींनी पुढे नेणे ही काळाची गरज आहे. महिला नगरसेविका या केवळ प्रतिनिधी नसून समाजपरिवर्तनाच्या शिल्पकार आहेत. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महिला नगरसेविकांचा गौरव करत त्यांचे योगदान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे ठरेल. नवनिर्वाचित नगरसेविका ज्योती शेळके व अंकिता अंबुसे यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्रीधर इंगळे, तालुका उपाध्यक्ष संजय सावंत, किशोर आळंगे, मारुती बन्ने, प्रकाश कंटेकुरे, सूर्यकांत तडकले, विनोद सुरवसे, श्रावणी इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मोहन जाधव यांनी समाजात परिवर्तन घडवणाऱ्या महानायिकांच्या स्मृती जपत महिलांच्या नेतृत्वाचा गौरव करणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन पत्रकार अजिंक्य मुरुमकर तर आभार बाबा कुरेशी यांनी मानले. महानायिकांच्या विचारांचा जागर करत महिलांच्या नेतृत्वाचा सन्मान करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. सत्कारमूर्ती महिला नगरसेविका महादेवी बनसोडे, अंकिता अंबुसे, निर्मला कंटेकुरे, मुमताजबी ढोबळे, ज्योती शेळके, सुनिता बन्ने, समीना मुल्ला, रागिनी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
माधवराव पाटील महाविद्यालयातील प्रियंका मुंडासे राज्यशास्त्र पदव्युत्तर विषयात विद्यापीठातून प्रथम
मुरूम( प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर मार्च/एप्रिल-२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एम. ए. राज्यशास्त्र परीक्षेत मुरूमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र पदव्युत्तर विभागातील कुमारी प्रियंका विजयकुमार मुंडासे यांनी विद्यापीठातून गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना डॉ. रमेश अनंत ढोबळे (संभाजीनगर) यांच्यामार्फत सुवर्णपदक व कै. प्रा. उत्तमराव दिपाजी सूर्यवंशी (नांदेड) यांच्या स्मरणार्थ दोन सुवर्णपदक (मेडल ऑफ मेरिट), प्रशस्तीपत्र ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. फ. मु. शिंदे व विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते प्रियंका मुंडासे यांचा विद्यापीठाच्या नाट्यगृहात बुधवारी (ता. १४) रोजी ३२ व्या विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू प्रो. डॉ. वाल्मीक सरवदे, परीक्षा नियंत्रक प्रो. डॉ. बाबासाहेब डोळे, विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य डॉ. अपर्णा पाटील, डॉ. भारत खंदारे, कुलसचिव प्रो. डॉ. प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एम. ए. राज्यशास्त्र पदव्युत्तर विषयात विद्यापीठातून कुमारी प्रीती विजयकुमार मुंडासे यांनी गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकाविला. एकाच कुटुंबात जन्मलेल्या, एकाच स्वप्नासाठी झटणाऱ्या जुळ्या बहिणींनी शैक्षणिक भरारी घेत आपल्या कर्तुत्वाने विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल माजी मंत्री बसवराज पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सायबण्णा घोडके, राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. या दोघींनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. स्पर्धा एकमेकींशी नसून स्वतःशी असते. या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबातील शैक्षणिक वातावरण महत्त्वाचे ठरले. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवा करण्याचा मानस दोघींनी यावेळी व्यक्त केला. त्यांचे वडील विजयकुमार धानप्पा मुंडासे हे सैन्य दलातून सेवानिवृत्त माजी सैनिक तर आई जयश्री मुंडासे असून हे दोघेही उद्योजक आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय, नातेवाईक व परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील एम. ए. राज्यशास्त्र विषयात विद्यापीठातून गुणवत्ता यादीत प्रियंका मुंडासे प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल विद्यापीठाच्या नाट्यगृहात त्यांचा सत्कार फ. मु. शिंदे, विजय फुलारी, वाल्मीक सरवदे यांच्या हस्ते करताना.
शिक्षण हीच सामाजिक क्रांतीची खरी ताकद- प्रा. डॉ. सायबण्णा घोडके
मुरूम( प्रतिनिधी) - देशात स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता ही चतु:सूत्री रुजवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. देशाची प्रगती ही शिक्षणामुळे होते. शिक्षण केवळ ज्ञान देत नाही, तर व्यक्तीला आत्मनिर्भर, आत्मसन्मान, जबाबदारीची जाणीव, स्वावलंबन, विचार स्वातंत्र्य, सामाजिक मूल्ये जोपासणारा नागरिक बनवते. याकरिता सर्वांना मूलभूत व समान शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनासाठी एक शक्तिशाली साधन डॉ. बाबासाहेबांनी मानले. शिक्षण हीच सामाजिक क्रांतीची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सायबण्णा घोडके यांनी केले. माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन,भूगोल दिन व मकर संक्रात या त्रिवेणी दिनाचे औचित्य साधून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार 'या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानाप्रसंगी बुधवारी (ता. १४) रोजी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी प्राचार्य डॉ. सादक वली, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. किरण राजपूत, डॉ. रवि आळंगे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. घोडके म्हणाले की, सन १९५८ साली औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. त्यानंतर १९७६ ते १९९४ या कालावधीत जवळपास १७ वर्षे विद्यापीठ नामांतराचा लढा उभारून संघर्ष करावा लागला. त्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार होऊन १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामविस्तार झाले. आज विद्यापीठात हजारो विद्यार्थी संशोधन कार्य व विविध विद्याशाखेत शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाल्याचे शेवटी ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात डॉ. चंद्रकांत बिराजदार म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे. यामुळे व्यवसायाभिमुख शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळेल व ते स्वावलंबी होतील, बेकारी कमी होईल, कार्य कुशल विद्यार्थी तयार होतील. त्यामुळे या धोरणाकडे विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले. प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. अविनाश मुळे, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. सुशिल मठपती, डॉ. सुजित मटकरी, डॉ. संध्या डांगे, सुरेखा पाटील, दत्तू गडवे, महादेव पाटील, मुनीर शेख आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ .सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कळंब बस आगारात मोठा बदल; आगार प्रमुखपदी विनोद अलकुंटे यांची नियुक्ती
कळंब (प्रतिनिधी)- कळंब एसटी बस आगारातील वाढत्या तक्रारी, बस बंद पडण्याचे प्रकार आणि व्यवस्थेतील ढिसाळपणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर कडक निर्णय घेतला असून कळंब च्या आगार प्रमुखपदी विनोद अलकुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . तरतत्कालीन प्रभारी आगार प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती यांची धाराशिवला बदली करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे आगारातील कामकाजाला शिस्त लागणार असून, निष्क्रिय व्यवस्थेला चांगलाच धक्का बसला आहे. शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि कामात तडजोड न करणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले विनोद अलकुंटे यांच्या हाती जबाबदारी देण्यात आल्याने आगारात बदलाची ठिणगी पेटली आहे. बस वेळापत्रकातील अनियमितता, देखभालीतील हलगर्जीपणा, प्रवाशांच्या तक्रारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरपणावर आता थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रवासी सेवा सुधारणा, बंद बस तातडीने मार्गावर आणणे आणि आगारातील एकूण कार्यक्षमता वाढवणे, हे अलकुंटे यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीने प्रवाशांमध्ये अपेक्षा तर कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरल्याचे चित्र आहे. कळंब बस आगार आता जुन्या कामकाजावर चालणार नाही, तर काम करणाऱ्यांनाच जागा आणि दुर्लक्ष करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा स्पष्ट संदेश या नियुक्तीतून गेला आहे. प्रवासी कळंबकर आता प्रत्यक्ष बदल कधी दिसतो, याकडे लक्ष ठेवून आहेत.अगर प्रमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कळंब व सागरात विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे यावेळी गणेश गोरे , गणेश इंगळे , ऋषिकेश पवार, आर एस . पवार ,शिवाजी कदम ,श्री मते, श्री बांगर आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते .
शोकसभेहून घरी परतत चालकाचे नियंत्रण सुटले, ट्रक आणि कारच्या धडकेत 6 महिलांचा मृत्यू
नातेवाईकांच्या शोकसभेहून घरी परतत असताना भीषण अपघाताची घटना घडली. ट्रक आणि कारच्या जोरदार धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्व महिला आहेत. जखमींमध्ये दोन महिला आणि कार चालकाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील आठ महिला राजस्थानमधील लक्ष्मणगढ येथे शोकसभेत सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. […]
परंडा (प्रतिनिधी)- मराठवाड्यात स्थापन झालेले विद्यापीठ हे केवळ ज्ञानदानाचे केंद्र नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा आहे असे प्रतिपादन प्रा.पवार यांनी केले.शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला.मराठी व प्रमुख प्रा.डॉ गजेंद्र रंदिल यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, मराठी विभाग प्रमुख डॉ.गजेंद्र रंदिल, डॉ बाळासाहेब राऊत, डॉ.कृष्णा परभणे, डॉ. अरुण खर्डे, प्रा.डॉ संतोष काळे, प्रा तानाजी फडतरे, प्रा.शंकर कुटे, प्रा.उत्तम माने यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिव यांनी केले तर आभार प्रा.उत्तम माने यांनी मानले.
कळंब नगरपरिषदेत ठाकरे गटाचा झेंडा बुलंद; सफुरा शकील काझी यांची गटनेतेपदी निवड
कळंब (प्रतिनिधी)- कळंब नगरपरिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखालील शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी एकमुखी निर्णय घेत सौ. सफुरा शकील काझी यांची कळंब नगरपरिषदेच्या गटनेतेपदी निवड केली. या निवडीमुळे कळंबच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका, प्रशासनाला जाब विचारण्याची ठाम भूमिका आणि नगरविकासाच्या मुद्द्यावर निर्भीड मते मांडणाऱ्या सौ. काझी यांच्या नेतृत्वाखाली आता ठाकरे गट अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवड म्हणजे केवळ पदाची नव्हे, तर कळंबच्या राजकारणात ठाकरे गटाच्या नव्या आक्रमक पर्वाची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. या निवडीमुळे येणाऱ्या काळात नगरपरिषदेत जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र होणार असून, भ्रष्टाचार, विकासातील दिरंगाई आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात ठाकरे गट निर्णायक भूमिका घेणार, असा इशाराही यानिमित्ताने देण्यात आला आहे. सौ. सफुरा शकील काझी यांच्या गटनेतेपदी निवडीचे शहरभर स्वागत होत असून, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कळंब नगरपरिषदेत आता ‘लढाई ठरलेली आहे’ आणि नेतृत्व सौ. काझी यांच्या हाती आहे, हे मात्र नक्की.या निवडीबद्दल त्यांचा कार्यालयात आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी पॅनेल प्रमुख संजय मुंदडा, रश्मी मुंदडा , सचिन काळे ,नगरसेवक ज्योती हारकर , जमील खाटीक, इंदुमती हौसलमल, अशा भवर ,सागर मुंडे, वन मला वाघमारे, मोसीन मिर्झा, रुकसाना बागवान या वेळी उपस्थित होते .
तेंडोली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी आ .निलेश राणेंच्या माध्यमातून साहित्य
वार्ताहर/कुडाळ कुडाळ तालुक्यातील तेंडोली – गावठणवाडी जि. प. प्राथ. शाळेच्या छप्पराचा भाग कोसळल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत शिंदे शिवसेनेचे तेंडोली उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. आमदार श्री. राणे यांनी तातडीने गंभीर दखल घेत तत्परता दाखविली. आमदार राणे आणि जिल्हाप्रमुख सामंत यांच्या माध्यमातून तात्काळ शाळेच्या [...]
मुंबई महानगरपालिकेसाठी उद्या म्हणजेच गुरुवारी 15 जानेवारीला मतदान होणार आहेत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी रात्र वैऱ्याची… म्हणत मराठी माणसासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मराठी माणूस चुकला तर मग पुन्हा संधी नाही, असा सावधगिरीचा इशाराही दिला आहे. बाळा नांदगावकर यांनी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट शेअर केली आहे. […]
भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनितीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता पक्षाने जन्माला घातलेली विषवल्ली महाराष्ट्राच्या जागरूक जनतेने ओळखावी आणि ही विषवल्ली […]
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबर 2024 ची मतदार यादी
राजा वैद्य धाराशिव- जिल्हा परिषद, पंचायत समिती धाराशिव यांची निवडणूक जाहीर झाली असून, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 55 जागेसाठी तर पंचायत समितीच्या 110 जागेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहेत. या निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंतची मतदार यादी वापरली जात असल्यामुळे ज्या नवीन मतदारांनी मतदानासाठी नावनोंदणी केली आहे त्यांच्या यादीची नोंद नसल्यामुळे नवीन नोंदी केलेल्या मतदारात संतापाचे वातावरण परसले आहे. या संदर्भात जि. प. निवडणूक निर्णय अधिकारी स्वामी शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणश्चवनीला प्रतिसाद दिला नाही. धाराशिव जिल्हा परिषदवर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना फुटीर गटाचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यानंतर बदलत्या राजकारणामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात कमजोर बनला आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये युती व आघाडीमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असून, भूम, परंडा,वाशीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत स्वबळाचा नारा दिल्यास आर्श्चय वाटायला नको. कारण भूम-परंडा नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्व पक्षांनी मिळून आघाडी केली होती. नुकत्याच तेरणा कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यातही आमदार सावंत यांनी भाजपवर घणाघाती टिका करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तोफ डागली आहे. जि. प. च्या जागा जिल्हा परिषदच्या तालुकावाईज जागा पुढील प्रमाणे आहेत. धाराशिव तालुक्यात 12 जागा, तुळजापूर तालुक्यात 9 जागा, लोहारा तालुक्यात 4 जागा, उमरगा तालुक्यात 9 जागा, कळंब तालुक्यात 8 जागा, वाशी तालुक्यात 3 जागा, भूम तालुक्यात 5 जागा, परंडा तालुक्यात 5 जागा याप्रमाणे एकूण 55 जागेसाठी निवडणूक होत आहे. गेल्या वेळेसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 26 जागा, काँग्रेस 13 जागा, शिवसेना 11 जागा, भाजप 4 जागा, भापसे 1 याप्रमाणे पक्षीय बलाबल होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा गट भाजपमध्ये गेल्या आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामविस्ताराच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव समोर विद्यार्थी संघटनेच्या वतीने दरवर्षी नामविस्तार वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवराकडुन संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते. भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समिती व फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या “जिथे जाचाल तिथे वाचाल भारतीय संविधान“ या उपक्रमात भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील संसद मधील भाषण असलेले पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते (वैद्यकीय)अधिक्षक सिध्दार्थ जानराव, आशाताई कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश वाघमारे यांनी भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान सभेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण व उद्देशिका विश्लेषण प्रत बाबत माहिती दिली व मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश वाघमारे, सामाजिक वैद्यकीय अधिक्षक सिध्दार्थ जानराव,आशाताई कांबळे,प्रदिप लष्करे, रणवीर जानराव,विवेक यादव,विजय राठोड सह इतर उपस्थित होते.
निर्भिड बाण्याचा आणि ताटकण्याचा गुरुदेव कार्यकर्ता बापूजींना अपेक्षित-प्रा.डॉ.बापुराव पवार
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद सप्ताह मध्ये जागर :आधुनिक शिक्षण आणि तात्रंतनाचा या व्याख्यानमाला अंतर्गत शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्ता या विषयावर सखोल व विचारप्रवर्तक मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. बापुराव पवार यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.बापुराव पवार त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, गुरुदेव कार्यकर्ता हा केवळ संघटनेचा घटक नसून तो निस्वार्थ सेवा, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाद्वारे परिवर्तन घडविणारा असावा. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी उभे केलेले शैक्षणिक कार्य हे ग्रामीण व वंचित समाजाच्या उत्थानासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्ता हा केवळ पदावरचा माणूस नसून तो विचारांचा, मूल्यांचा आणि सेवाभावाचा प्रतिनिधी असावा. अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांची गुरुदेव कार्यकर्ता कसा असावा याविषयी संकल्पना स्पष्ट करताना डॉ. बापूराव पवार यांनी बापूजींच्या पंचसूत्रीचा उल्लेख केला त्याचबरोबर निस्वार्थ सेवावृत्ती , शिक्षणाला जीवनमूल्य मानणारा , आदर्श चारित्र्य व शिस्त असणारा , समतेचा आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कर्ता , संघर्षशील पण संयमी व्यक्तिमत्त्वाचा , समाजाभिमुख आणि ग्रामीण वास्तवाशी जोडलेला , गुरुदेवांच्या विचारांशी निष्ठावान असावा तसेच बापूजी साळुंखे यांच्या विचारधारेवर निष्ठा, संघटनेच्या शिस्तीचे पालन आणि सातत्यपूर्ण कार्य ही गुरुदेव कार्यकर्त्याची ओळख असावी .असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या विषयी बोलताना ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या ध्येयासाठी समर्पित सत्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा या मूल्यांचे पालन करणारा, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक आणि बौध्दिक विकास घडवणारा.गुरुदेव कार्यकर्ता म्हणजे बापूजींच्या विचारांचा आणि कार्याचा वारसदार जो स्वतःच्या कृतीतून ते विचार समाजात रुजवण्यासाठी झटतो, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्ता हा केवळ शिक्षक नसून तो समाजपरिवर्तनाचा शिल्पकार आहे. शिक्षण हे जीवनोन्नतीचे प्रभावी साधन मानून तो ज्ञानासोबत संस्कारांची जोपासना करतो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्यात कर्तव्यनिष्ठा, स्वाभिमान, शिस्त, समता आणि सामाजिक भान निर्माण करणे हे त्याचे प्रमुख ध्येय असते.बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्ता म्हणजे ज्ञान, सेवा आणि समाजबांधिलकी यांचा संगम जो शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त, समताधिष्ठित आणि प्रबुद्ध समाज घडवतो. असे प्रतिपादन केले सदर कार्यक्रमास कार्यक्रमास समन्वयक, आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ .नेताजी काळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ .मंत्री आडे ,इंग्रजी विभाग प्रमुख डॉ . बालाजी कऱ्हाडे, राज्यशास्त्र विभागाच्या डॉ . स्वाती बैनवाड, प्रा.निलेश एकदंते, प्रा.सुदर्शन गुरव , डॉ. दत्तात्रय साळुंखे, प्रा.शिवाजी जगताप डॉ . शिवहार विभुते , प्रा .डॉ . फरजाना तांबोळी , अभिमन्यू कळसे , प्रा .राणूबाई कोरे ,डॉ .शिवकन्या निपाणीकर , कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.अनिल नवरे, प्रा.कदम मॅडम प्रा जे.बी. क्षीरसागर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .सिद्धेश्वर सुरवसे यांनी केले .आभार प्रदर्शन डॉ .आबा गायकवाड यांनी व्यक्त केले .यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी
परंडा (प्रतिनिधी)- शेताच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना लालुक्यातील भोत्रा येथे घडली. या प्रकरणी परंडा पोलीस ठाणे येथे तक्रारीवरून परस्परविरोधी दोन्ही गटातील 5 जणावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. भोत्रा येथील राजेंद्र ज्ञानदेव शिंदे, ब्रम्हदेव आबा शिंदे, धुळदेव आबा शिंदे व सुरज धुळदेव शिंदे (सर्व राहणार भोत्रा ) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून दगड व कोयत्याने जबर वार करून गंभीर जखमी केले.ही घटना सोमवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी घडली आहे. सदरील प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात 3 जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटाकडून दिलेल्या फिर्यादीत माहिती दिली आहे की धुळदेव आबा शिंदे यांना राजेंद्र ज्ञानदेव शिंदे व ज्ञानदेव शिंदे विठ्ठल शिंदे (राहणार भोत्रा) यांनी शेतातील बांध कोरल्याच्या कारणावरून लाथा बुक्या व दगडाने मारहाण केली. या वेळी फिर्यादीचा मुलगा सुरज धुळदेव शिंदे व त्याचा भाऊ ब्रम्हदेव आबा शिंदे यांनाही शिवी गाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यानुसार दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरग्यात मॅरेथॉन स्पर्धेला उत्सफुर्त प्रतिसाद
उमरगा (प्रतिनिधी)- रोटरी क्लब उमरगा व व्यापारी महासंघ, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. याच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, उमरगा नगरीचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.प्रा. धनंजय मेनकुदळे आदी प्रमुख उपस्थित होते. या मॅरेथॉन स्पर्धेत लातूर, सोलापूर, धाराशिव, या जिल्ह्यातील स्पर्धक उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण 180 स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी डॉ. दीपक पोफळे, क्लब सचिव प्रा. राजू जोशी, रो.डॉ. राजकुमार कानडे,रो. नितीन होळे पाटील, रो. कमलाकरराव भोसले, रो सोमशंकर महाजन, रो. देवप्पा सूर्यवंशी रो. संजय देशमुख, रो.जुगल खंडेलवाल, रो.प्रा. युसुफ मुल्ला, रो.ऍड. अक्षय तोतला, रो. परमेश्वर सुतार, रो. डॉ. प्रा. विनोद देवकर, रो. शिवकुमार लड्डा, रो. शिवकुमार दळवी रो. प्रा. डॉ. रवी आळंगे, आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून शाम दूधभाते, रोहित, तानाजी लेंडवे, संतोष जाधव, मालाजी काळे, येवते, रो. अनिल मदनसुरे व ओमसाई हेल्थ क्लबचे सदस्य इत्यादींनी पंच म्हणून उत्तम काम केले. तसेच शिवाजी महाविद्यालयातील एनएसएस यांच्या विद्यार्थ्यांनी देखील मदत केली. श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी या शाळेतील विद्यार्थ्याच्या ढोल पथकांनी मॅरेथॉनचे स्वागत केले.
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक 20 जानेवारीला
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची माहे ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील त्रैमासिक बैठक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठिक 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह सादर करावयाची असल्यास ज्या तालुक्यात संबंधित अधिकारी कार्यरत आहे,त्या तालुक्यातील तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे अर्ज सादर करावा.तसेच संबंधित विभागाने किंवा तालुकास्तरीय समितीने कार्यवाही केली नसल्यास जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार सादर करता येईल. याची नोंद सर्व कार्यालय प्रमुख, अशासकीय सदस्य तसेच सर्वसामान्य जनतेने घ्यावी. जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती : जिल्ह्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाने जिल्हा हा घटक समजून जिल्ह्यातील वरिष्ठतम अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दक्षता समिती गठीत केलेल्या आहेत. प्रथमतः तक्रारदाराने तक्रार सदर गठीत समितीकडे दाखल करावी. माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त माहिती अथवा इतर स्त्रोतांद्वारे शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार,गैरव्यवहार अथवा अफरातफर केल्याचे पुरावे उपलब्ध असल्यास,संबंधित अधिकारी ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे तक्रार सादर करता येईल. भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारी व सोबतच्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास 30 दिवसांच्या आत त्या तक्रारी पुराव्यासह तपासून संबंधित अधिकारी ज्या कार्यालयात कार्यरत आहे त्या कार्यालयाच्या परिच्छेद 8 नुसार गठीत केलेल्या जिल्हा दक्षता समितीकडे पाठविण्यात येतील. उपरोक्त “अ“ व “ब“ नुसार प्राप्त झालेल्या तक्रारींच्या संदर्भात परिच्छेद 8 नुसार गठीत केलेल्या जिल्हा दक्षता समितीने 90 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा. त्यामध्ये संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी सकृतदर्शनी दोषी आढळल्यास त्याबाबत शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात येईल.जिल्हा दक्षता समितीकडे पाठविण्यात आलेल्या तक्रारींवर 90 दिवसांच्या आत निर्णय न झाल्यास तक्रारदारास त्याची तक्रार जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे पुराव्यासह सादर करता येईल.जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे अर्ज सादर करताना तक्रारदाराने तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे पूर्वी सादर केलेल्या तक्रारीच्या अर्जाची छायाप्रत व त्यासोबतचे पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
14 मार्चला जिल्ह्यात सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत
धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार,14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोकअदालतीत मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे, दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच बँका आणि वीज वितरण कंपन्यांची दाखलपूर्व प्रकरणे यांचा समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय कौटुंबिक न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे देखील या लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटविल्यास संबंधित पक्षकारास भरलेली न्यायालयीन फी परत मिळते.नागरिकांनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून वेळ,पैसा आणि मानसिक ताण-तणाव वाचवावा,असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव व सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले आहे. आपली प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यास इच्छुक नागरिकांनी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद किंवा संबंधित तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी 8591903625 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dlsaosd25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यासाठी पक्षकारांनी आपल्या वकिलांशीही संपर्क साधावा,असेही कळविण्यात आले आहे.
दिव्यांगांवर अन्यायाचा कळस! शयनयान व शिवाई बसमधून सवलत नाकारून शासनाची उघड बेपर्वाई !
कळंब (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाच्या शयनयान व शिवाई या तथाकथित “आधुनिक” बस सेवांमधून दिव्यांग नागरिकांना प्रवास सवलत नाकारणे म्हणजे सामाजिक न्यायाची थेट हत्या आहे. दिव्यांगांना हक्क म्हणून मिळणारी सवलत डावलून शासनाने पुन्हा एकदा दुर्बल घटकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शासनाच्या घोषणा कागदावर आणि जाहिरातीपुरत्याच मर्यादित राहिल्या असून प्रत्यक्ष प्रवासात मात्र दिव्यांगांना पूर्ण तिकीट भरायला भाग पाडले जात आहे. हा निर्णय म्हणजे दिव्यांगांविरोधातील अमानुष, असंवेदनशील व अन्यायकारक धोरणाचा जिवंत पुरावा आहे. दिव्यांग सवलत ही दया नाही, भीक नाही, तर घटनात्मक अधिकार आहे. तरीही शयनयान व शिवाई बस सेवांना सवलतीतून वगळून शासन जाणीवपूर्वक दिव्यांगांना आर्थिक लुटीला सामोरे जावे लागत आहे. हा अन्याय तात्काळ थांबवला नाही, तर राज्यभर रस्त्यावर उतरून लढा उभारला जाईल, असा इशारा दिव्यांग संघटनांनी दिला आहे. आता गोड आश्वासनांना वेळ उरलेली नाही. शयनयान व शिवाई बसमधून दिव्यांगांना प्रवास सवलत तात्काळ लागू करा, अन्यथा हा प्रश्न आंदोलन, चक्का जाम आणि कायदेशीर लढ्याच्या मार्गाने अधिक तीव्र केला जाईल, अशी मागणी दिव्यांग संघटनेमार्फत परिवहन महामंडळाकडे करण्यात आलेली आहे.
कळंब पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा अभाव
कळंब (प्रतिनिधी)- कळंब पोलीस ठाण्याची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर बनली असून कायद्याचे रक्षकच मनुष्यबळाअभावी असहाय्य झाल्याचे वास्तव समोर आले आहे. कळंब शहर व तालुक्याच्या सुरक्षेसाठी 07 अधिकारी व 89 कर्मचारी असे एकूण 96 पदे मंजूर असताना प्रत्यक्षात फक्त 05 अधिकारी व 51 कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच थेट 40 पेक्षा अधिक पदे रिक्त असून ही परिस्थिती नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत आहे. पोलीस निरीक्षक 1, सहाय्यक पोलीस निरीक्षक 3 असे वरिष्ठ अधिकारी तैनात असले तरी उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षकांच्या पदे कमी आहेत. मंजूर 03 पैकी फक्त 02 पोलीस उपनिरीक्षक, तर 08 पैकी केवळ 02 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हजर आहेत. हवालदार, नाईक व अंमलदारांची संख्याही निम्म्यावर आली असून, एकाच कर्मचाऱ्यावर दोन-दोन, तीन-तीन जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. वाढती लोकसंख्या, वाहतूक, गुन्हेगारी लक्षात घेता कळंब सारख्या तालुक्याला पुरेसे पोलीस न देणे म्हणजे जाणीवपूर्वक धोका पत्करणे असल्याची भावना व्यक्त होत आहे. जर लवकरात लवकर रिक्त पदांची भरती व तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही, तर कायद्याची अंमलबजावणी ढासळण्याची पूर्ण शक्यता असून याची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. असे आहे संख्याबळ कळंबच्या पोलीस ठाण्याला मंजुर संख्याबळ 1 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक, 8 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 20 पोलीस हवालदार, 15 पोलीस नाईक , 46 पोलीस अंमलदार एकुण 7 अधिकारी व 89 कर्मचारी मंजूर आहेत. त्या पैकी सध्या हजर 1 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 9 पोलीस हवालदार, 7 पोलीस नाईक, 33 पोलीस अंमलदार एकुण 5 अधिकारी व 51 पोलीस कर्मचारी आहेत. त्यात कोणी सुट्टीवर तर कोण रजेवर आहेत. त्यामुळे तपासात व सुरक्षेवर परिणाम होत आहे.
कळंबमध्ये सेवापूर्ती गुणगौरव सोहळा; सैन्यशिस्त व बलिदानाचा गौरव
कळंब (प्रतिनिधी)- देशसेवेतील प्रदीर्घ व गौरवशाली कार्याचा सन्मान करणारा “सेवापूर्ती गुणगौरव सोहळा” कळंब तालुक्यात सोमवारी, दि. 12 जानेवारी रोजी अत्यंत भावनिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. भारतीय थलसेनेतील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडिअर (निवृत्त) सुमंत दशरथ (मराठा लाईट इन्फंट्री) व लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) भिमराव शिवाजी पवार (आर्मी एज्युकेशन कोअर) यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. हा सोहळा कळंब माजीसैनिक, वीरमाता, वीरपत्नी, एनसीसी ग्रुप व माजीसैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील शेकडो माजी सैनिक गणवेषात उपस्थित राहिल्याने सभागृहात सैनिकी शिस्त, अभिमान व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, तहसीलदार हेमंत ढोकळे, गटविकास अधिकारी सोपान अकोले तसेच जिल्हा सैनिक कार्यालय, धाराशिवचे जी.ए. कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी आपल्या भाषणात, “सैनिक म्हणजे शिस्त, अनुशासन, प्रामाणिकपणा, त्याग आणि बलिदान यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. माजीसैनिकांच्या सन्मानासाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे,” असे स्पष्ट केले. तहसीलदार हेमंत ढोकळे यांनी माजीसैनिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने न्याय देण्याची ग्वाही देत अमर जवान स्मारकासाठी आवश्यक असलेली जागा चर्चेतून मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले. सैनिकांचा सन्मान राखून सेवा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. गटविकास अधिकारी सोपान अकोले यांनी देशभक्तीपर गीत सादर करून सभागृहात ऊर्जा व उत्साह निर्माण केला. सत्कारमूर्ती ब्रिगेडिअर (निवृत्त) सुमंत दशरथ यांनी आपल्या मनोगतात, “माझ्या यशाचे श्रेय आई-वडील आणि माझ्या ज्युनियर सहकाऱ्यांना जाते. अधिकारी म्हणून काम करताना माझा ज्युनियर सुखी असेल, तरच मी सुखी असतो, या तत्वावर मी कार्य केले,” असे सांगितले. अमर जवान स्मारक पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) भिमराव पवार यांनी सामान्य सैनिकापासून अधिकारी पदापर्यंतचा आपला प्रवास उलगडून दाखवत माजी सैनिकांना शासकीय नोंदी, पेन्शन व विविध प्रक्रियांबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. “भारत माता की जय” च्या घोषात हा गौरवसोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एस. के. पुरी यांनी मानले.
प्रतीक्षा जाधव यांची पुरवठा अधिकारी पदावर निवड
कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाथर्डी येथील माजीसैनिक रविंद्र नारायण जाधव यांच्या सूनबाई प्रतीक्षा शुभम जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वर्ग 2 ‘पुरवठा अधिकारी’ पदावर निवड झाली आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजीसैनिक कुटुंबातील सूनबाईने मिळविलेल्या या यशामुळे पाथर्डी गावासह कळंब तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या यशामुळे अनेक युवक-युवतींना प्रेरणा मिळत असून भविष्यातील प्रशासकीय सेवेसाठी तो आदर्श ठरत आहे.
विद्यापीठचा नामविस्तारामुळे परिवर्तनाचा विचार दृढ झाला- प्रा. सिद्धेश्वर सुरवसे
तुळजापूर (प्रतिनिधी)- “विद्यापीठाच्या नामविस्तारामुळे केवळ नाव बदलले नाही, तर सामाजिक समतेचा आणि परिवर्तनाचा विचार अधिक दृढ झाला,” असे प्रतिपादन प्रा. सिद्धेश्वर सुरवसे यांनी केले. तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. सिद्धेश्वर सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार हे उपस्थित होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. जीवन पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या विद्यापीठाला लाभणे ही मराठवाड्याच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील एक क्रांतिकारी घटना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला केवळ पदवी मिळविण्याचे साधन न मानता, माणूस घडविण्याचे आणि समाज बदलण्याचे माध्यम मानले आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंत्री आडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. कुकडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्यावरून जाताना चायनीज नायलॉन मांजामुळे गळा कापला, मोटारसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू
जीवघेण्या नायलॉनच्या मांजामुळे एका मोटारसायकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत एका ४८ वर्षीय व्यक्तीने जीव गमावला आहे. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पतंगाच्या चायनीज नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्याचा वापर होत असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे. संजू कुमार होसमानी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो बिदर जिल्ह्यातील तलामडगी पुलाजवळ दुचाकीवरून जात […]
लष्कराचे उद्दीष्ट स्त्री-पुरुष समानतेचे! महिलांनी स्वतःला कमजोर समजू नये; लष्करप्रमुखांचे मोठे विधान
हिंदुस्थानी लष्करामध्ये महिलांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मोठे विधान केले आहे. लष्कराचे उद्दीष्ट स्त्री-पुरुष समानतेचे आहे. महिलांनी स्वतःला कमजोर समजण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे, असे आवाहन लष्करप्रमुखांनी केले. महिलांना पायदळात सहभागी करून घेण्यास हिंदुस्थानी लष्कर तयार आहे. मात्र समाजाच्या स्वीकृतीवर हा निर्णय अवलंबून आहे, असे लष्करप्रमुख म्हणाले. नवी दिल्ली येथे आयोजित […]
Satara News : सातारा पोलिसांनी शोधले ९. ६० लाखांचे मोबाईल
सातारा पोलिसांनी ५३ चोरीस गेलेले मोबाईल परत केले सातारा : सातारा शहर पोलिसांनी चोरी व हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत नागरिकांचे एकूण ९ लाख ६० हजार रुपये किंमतीचे ५३ स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत करून ते मूळ मालकांना परत केले. या [...]
Solapur : सोलापूरात कडेकोट बंदोबस्तात मतदान साहित्य मतदान केंद्रांकडे रवाना
गुरुवारी सोलापूरमध्ये पारदर्शक मतदानासाठी प्रशासन सज्ज सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि. १५ जानेवारी) रोजी होणाऱ्या मतदानासाठी आवश्यक मतदान साहित्य आणि ईव्हीएम यंत्रणा मतदान केंद्रांकडे बुधवारी (दि. १४) सुरक्षितरीत्या रवाना करण्यात आल्या. वितरण केंद्रातून मतदान केंद्रासाठी लागणारे साहित्य देण्यात आले, त्यानंतर [...]
Sangli : अंकत्री पुलावरून विवाहितेची कृष्णा नदीत उडी, चारतास शोध सुरू
सांगलीत विवाहितेची कृष्णा नदीत उडी सांगली : अंकत्री (ता. मिरज) येथील कृष्णा नदीवरील पुलावरून प्राजक्ता योगेश देसाई (वय २४, रा. गावभाग, सांगली) या विवाहितेने नदीत उडी टाकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच रेस्क्यू [...]
Kolhapur : अंकत्री पुलावरून विवाहितेची कृष्णा नदीत उडी, चारतास शोध सुरू
सांगलीत विवाहितेची कृष्णा नदीत उडी सांगली : अंकत्री (ता. मिरज) येथील कृष्णा नदीवरील पुलावरून प्राजक्ता योगेश देसाई (वय २४, रा. गावभाग, सांगली) या विवाहितेने नदीत उडी टाकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच रेस्क्यू [...]
Sangli : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
१६ जानेवारीला मिरज सेंट्रल वेअरहाऊसमध्ये मतमोजणी सांगली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. १५ रोजी मतदानासाठी ११४० मतदान केंद्रे वापरण्यात येणार आहेत. तर १६ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मिरज सेंट्रल वेअर हाऊसमध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार [...]
विज्ञान व गणिताचा जादूगार राज्यस्तरीय स्पर्धेत गौरव नाईक विजेते
कुडाळ – कविलकाटे प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक कुडाळ – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र – पुणे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान व गणिताचा जादूगार स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून कुडाळ तालुक्यातील कुडाळ – कविलकाटे येथील जि. प.प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक गौरव शंकर नाईक यांनी विजेतेपद पटकावले.राज्यातील एकूण चाळीस स्पर्धकामधून [...]
Sangli : सांगलीत शिंदेसेनेच्या हरिदास लेंगरेवर विनयभंगाचा गुन्हा
शिंदेसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप सांगली : शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे यांच्याविरूद्ध महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हंटले आहे, पिडित महिला ही सांगलीत राहते. संशयित लेंगरे हे त्यांच्या ओळखीचे आहेत. जानेवारीत पहिल्या आठवड्यात फिर्यादी [...]
…तर भाजपाने लोकशाहीच्या फोटोला हार घालावा, रोहित पवार यांची टीका
ईव्हीएम मशीनला या मतदानाच्या वेळी आता ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit – PADU) हे नवे अतिरिक्त यंत्र जोडले जाणार आहे. हे यंत्र ईव्हीएममधील कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटसोबत जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत पाडू मशीनसोबतच […]
Chattisgarh News –सुकमामध्ये सीपीआयच्या 29 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात बुधवारी 29 नक्षलवाद्यांनी अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. हे सर्व सदस्य प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) संघटनेच्या आघाडीच्या संघटनांचे सदस्य म्हणून सक्रिय होते. ‘पुना मार्गेम’ पुनर्वसन उपक्रमांतर्गत या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. ते राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणाने प्रभावित झाले होते. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये 2 लाख रुपयांचे बक्षीस असलेला गोगुंडा येथील दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचा […]
‘त्या’रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 45 लाखाचा निधी
आमदार निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा मालवण |प्रतिनिधी भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम गतवर्षी मालवण, वायरी, तारकर्ली, देवबाग मार्गांवर करण्यात आले. या दरम्यान रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली होती. त्यानुसार वीज विभागाच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी 45 लाख रुपये निधी डिपॉजिट [...]
Photo –मुंबई आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे कुटुंबाचं आई मुंबादेवीला साकडं
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब मुंबादेवी मंदिरात गेले होते. यावेळी ठाकरे कुटुंबीय आई मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मुंबई आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी साकडं घातलं. मुंबईवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला दूर लोटून, आम्हां मुंबईकरांवर तुझी सदैव कृपादृष्टी राहूदे! असे साकडे यावेळी त्यांनी घातले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब […]
सांधेदुखीसाठी मोहरीचे तेल कसे फायदेशीर ठरते, जाणून घ्या
हिवाळ्यात गुडघे आणि सांधेदुखी सामान्य आहे. सांधेदुखी कमी करण्यासाठी किंवा ती बळकट करण्यासाठी, बरेच लोक कोमट मोहरीच्या तेलाचा वापर करतात आणि त्याद्वारे मालिश करतात. एका अभ्यासात असे आढळून आले की मोहरी आणि लसूण मालिश केल्याने मानक उपचारांच्या तुलनेत वेदनांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. शतकानुशतके आपल्या घरांमध्ये हिवाळ्यात मोहरीच्या तेलाचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. मोहरीच्या […]
दररोज १० हजार पावले चालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
दररोज चालणे खूप फायदेशीर आहे. आरोग्य तज्ञांपासून ते डॉक्टरांपर्यंत, सर्वजण म्हणतात की दररोज १० हजार पावले चालणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केवळ मृत्युदर कमी होत नाही तर हृदयाचे आरोग्य, चयापचय आणि तंदुरुस्ती देखील सुधारते. शाकाहारी व्यक्तींनी बी १२ वाढवण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत सामान्य गतीने १-२ मिनिटे चालणे, त्यानंतर १ मिनिट जलद […]
Kolhapur Crime : घुंगूर जंगल परिसरात शिकारी करणारे तिघे अटकेत
घुंगूर जंगलात देशी बनावटीची बिनापरवाना बंदूक जप्त कोल्हापूर : घुंगूर जंगल परिसच आरोपी बनकर्मचाऱ्यांच्या हाती लागले. यामध्ये सर्वजीत विष्णू खोत, संजय बाळू खोत व विठ्ठल श्रीपती खोत (रा. खोतवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. आरोपींकडून देशी बनावटीची बिनापरवाना बंदूक तसेच शिकारीसाठी वापरण्यात [...]
Mumbai News –मध्य रेल्वेची लोकलसेवा विलंबाने; सीएसएमटीकडे येणाऱ्या ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले
मध्य रेल्वेच्या मेन लाईन मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक बुधवारी देखील विस्कळीत राहिले. टिटवाळ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) येणाऱ्या अनेक लोकल ट्रेन विलंबाने धावत आहेत. जवळपास 20 ते 35 मिनिटे उशिराने गाड्या धावत असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मंगळवारी सकाळी अशाच प्रकारे अप दिशेने येणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. मागील काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या […]
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने पाडू मशीन्स आणल्या आहेत. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. ईव्हीएम प्रणालीत आता ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit – PADU) हे नवे अतिरिक्त यंत्र जोडले जाणार आहे. हे यंत्र […]
Kolhapur : कोल्हापूर महापालिका मतदानासाठी केएमटी बस फेऱ्यांत कपात
मतदान प्रक्रियेसाठी केएमटी बसचा वापर कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर १४ व १५ रोजी केएमटीच्या बस फेऱ्यात कपात करण्यात आली आहे. अनेक मार्गावरील बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी होणारी गैरसुविधा लक्षात घेवून केएमटीला सहकार्य [...]
‘युनिटी मॉल’वरुन विधानसभेत गोंधळ
विरोधकांनीसभापतींसमोरीलहौदातजाऊनकेलानिषेध: घोषणाबाजी, गोंधळामुळेकामकाज10 मिनिटेतहकूब पणजी : चिंबल येथे युनिटी मॉलच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्य विधानसभेत उमटले. काल मंगळवारी दुपारनंतरच्या सत्रात विरोधी पक्षीय आमदारांनी युनिटी मॉलच्या विरोधात आवाज उठवला आणि घोषणाबाजी करीत सभापती गणेश गांवकर यांच्यासमोर येऊन निषेध नोंदवला. तसेच सरकारच्या विरोधात टीका केली. यावेळी कामकाज चालवणे अशक्य झाल्यामुळे सभापतींनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब [...]
अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा रोजगाराभिमुख प्रकल्प: खंवटे
पणजी : चिंबल येथील प्रस्तावित युनिटीमॉल प्रकल्प हा अधिसूचित ओलित संवर्धन क्षेत्रात समाविष्ट नाही आणि ओलित संवर्धन क्षेत्रात या प्रकल्पाचे कोणतेही विकासकाम होणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल मंगळवारी विधानसभेत दिले. सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी लक्षवेधी सूचनेव्दारे विधानसभेत युनिटी मॉलचा मुद्दा उपस्थित केला होता. ओलित संवर्धन प्राधिकरणाने देखील हा प्रस्तावित प्रकल्प [...]
पंचाला धक्काबुक्की, आंदोलकांवर लाठीचार्ज
आंदोलनालाहिंसकवळणलागण्याचीशक्यता तिसवाडी : युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी वादग्रस्त पंचसदस्य शंकर नाईक याला धक्काबुक्की केली. चिंबलवासियांनी शंकर नाईकने सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली, पण नाईक यांनी माफी मागण्यास नकार दिला. यामुळे काल मंगळवारी आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी शंकर नाईकला धक्काबुक्की केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यामुळे हे आंदोलन [...]
Kolhapur : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त
कोल्हापुरातील मतदान केंद्रांवर सकाळपासून बंदोबस्त कोल्हापूर : महापालिका निवडणूक मतदान आणी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील चारही पोलीस ठाण्यांतून पोलीस बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर मोबाईल घेवून जाण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, मतदान करतानाचा फोटो व्हायरल केल्यास संबंधितावर तातडीने [...]
ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने झोडपले
जनजीवनविस्कळीत: व्यापाऱ्यांचीतारांबळ: शेतीचेनुकसान, शेतकरीचिंताग्रस्त: पुढीलपाचदिवसढगाळवातावरण बेळगाव : कडाक्याची थंडी असलेल्या बेळगावला मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले. ऐन हिवाळ्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सायंकाळी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. लोकांना छत्री व रेनकोटचा आधार घ्यावा लागला. शहरासह ग्रामीण भागात रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर असल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले. मंगळवारी शहर व ग्रामीण भागात अवकाळी [...]
अनेकभागातरात्रीपर्यंतदुरूस्तीचेकाम बेळगाव : अवकाळी पावसामुळे मंगळवारी सायंकाळनंतर बेळगाव शहरात विजेचा लपंडाव सुरु झाला. कचेरी रोड येथील वीज खांबावर वीज वाहिन्यांनी पेट घेतल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहरात तब्बल तासभर वीजपुरवठा ठप्प झाला होता. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत केला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाला सुरुवात झाली. धुवाधार पावसामुळे ट्रान्स्फार्मरमध्ये शॉर्टसर्किट [...]
रसमलाई हे तामिळनाडूचे गद्दार; तामिळ जनतेने घेतला समाचार, शिवशक्तीला दिला पाठिंबा
तामिळनाडूचे नेते अण्णामलाई यांनी मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख करत ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी!” असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर सभेत खास ठाकरे शैलीत त्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्या या भूमिकेला तामिळनाडूमधील जनतेने देखील […]
पार्टी विथ डिफरन्स, भाजपच्या प्रचारप्रमुखाचा डान्सबार मधला व्हिडीओ शेअर करत रवींद्र धंगेकरांची टीका
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देताना चारित्र्याचा निकष बाजूला ठेवत चारित्र्यहीन लोकांसाठी जणू वेगळेच आरक्षण ठेवले असल्याचा गंभीर आरोप मिंधे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. भाजपच्या उमेदवार निवडीवर त्यांनी जोरदार टीका करत अनेक धक्कादायक दावे मांडले आहेत. धंगेकर यांनी म्हटले आहे की, भाजपचा प्रचार प्रमुखच जर महापालिकेच्या टेंडरमधील पैसा डान्सबारमध्ये उडवत असेल, तर त्या […]
खोटेपणा आणि खोटी वचनं, दहिसर येथील हाय फ्रिक्वेन्सी रडार प्रकरणी आदित्य ठाकरे यांची टीका
दहिसर येथील हाय फ्रिक्वेन्सी रडार (HFR) दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा दावा खोटा असून, पुन्हा एकदा जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले […]
नव्या मशीनमुळे मतदानात गडबड होणार नाही याची खात्री कोण देणार? राज ठाकरे यांचा सवाल
पाच वाजल्यानंतरही मतदारांना भेटण्याची मुभा यावेळीच का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. तसेच नव्या मशीनमुळे मतदानात गडबड होणार नाही याची खात्री कोण देणार? असेही राज ठाकरे म्हणाले. आज दादरच्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शीवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, […]
थायलंडमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या ट्रेनवर क्रेन कोसळली; 22 जणांचा मृत्यू, 30 अधिक जखमी
थायलंडच्या सिखिओ भागात बुधवारी मोठी दुर्घटना घडली. धावत्या ट्रेनवर बांधकाम क्रेन कोसळल्याने किमान 22 लोकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही ट्रेन बँकॉकहून थायलंडच्या ईशान्येकडील प्रांताकडे जात असताना ही दुर्घटना घडली. एका हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावर काम करत असताना थायलंडमधील उबोन रात्चाथानी प्रांताकडे जाणाऱ्या ट्रेनवर ही क्रेन कोसळली. यामुळे ट्रेन रुळावरून […]
राज्यामध्ये निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कमधील सभेत वडापावची थट्टा उडवली. याच मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी बुधवार (14 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधताना या मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा इतिहास, मराठी माणसाचा त्याग […]
मकर संक्रांतीनिमित्त तुळजाभवानी मंदिरात प्रवेशासाठी महिलांना आधार कार्ड सक्तीचे
मकर संक्रांतीचा सण आज संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, यानिमित्ताने मंदिरांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. मात्र, दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात यंदा मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ओवाळणीसाठी येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या […]
अवजड वाहनांना शहरात 8 ते 8 निर्बंधाचा विचार
पोलीसआयुक्तभूषणबोरसेयांचीलॉरीअसोसिएशनसोबतचर्चा बेळगाव : शहरात अपघातांची संख्या वाढत असल्यामुळे अवजड वाहनांसाठी गर्दीच्यावेळी निर्बंध घालण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी लॉरी असोसिएशनसोबत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये चर्चा होऊन पुढील 10 दिवसांत प्रवेशाबाबतच्या वेळा ठरविण्याचे निश्चित करण्यात आले. सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत अवजड वाहनांना निर्बंध घालण्याचा विचार पोलीस आयुक्तांनी [...]
बापानेच केले तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण
गँगवाडीयेथीलघटनेनेखळबळ बेळगाव : पोटच्या तीन वर्षीय बालिकेचे चक्क बापानेच अपहरण केल्याची खळबळजनक घटना गँगवाडी येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भाग्यश्री जितेंद्र लोंढे रा. शिवबसवनगर यांनी सोमवार दि. 12 रोजी पतीविरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी जितेंद्र मुरलीधर लोंढे (वय 30) रा. हातकणंगले याच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. फिर्यादी भाग्यश्रीचा विवाह गेल्या 10 वर्षांपूर्वी जितेंद्रसोबत झाला [...]
जिल्ह्यात 1788 मंदिरांचे अस्तित्वच नाही?
अतिक्रमणझाल्याचेउघड: बेळगावजिल्ह्यातसर्वाधिक: धर्मादायखात्याचीविशेषमोहीम बेळगाव : राज्यात धर्मादाय खात्याच्या अखत्यारित 34 हजारांहून अधिक मंदिरे असून यापैकी 4 हजारांपेक्षा अधिक मंदिरांचे भौतिकदृष्ट्या अस्तित्व नाही. बेळगाव जिल्ह्यात 1788 मंदिरांचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. गदग जिह्यात 51 मंदिरे, रायचूरमध्ये 275, उडुपीमध्ये 235, यादगिरी येथे 172, चामराजनगरात 142 मंदिरांचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. F़तर जिह्यांच्या तुलनेत बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मंदिरांचे [...]
तेलंगणात तब्बल 500 भटक्या कुत्र्यांची कत्तल, निवडणुकीचे आश्वासन पाळण्यासाठी उचलले पाऊल
तेलंगणामध्ये भटक्या कुत्र्यांच्या कथित सामूहिक हत्येच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या एक आठवड्यात राज्यातील विविध गावांमध्ये सुमारे 500 भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप असून, ही माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे. प्राणी मित्र संघटनेचे स्वयंसेवक अदुलापुरम गौतम (35) यांनी 12 […]
केसरी येथील उमेश सावंत यांचे निधन
ओटवणे : प्रतिनिधी मूळचे केसरी येथील सेवाभावी व्यक्तीमत्त्व तथा कोल्हापूर संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश आत्माराम सावंत (५६) यांचे मंगळवारी दुपारी कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. सुरुवातीला त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्यानंतर कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाचा सर्वांनाच [...]

22 C