‘धुरंधर’ चित्रपटात रहमान डकेतच्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. परंतु दृश्यम 3 या चित्रपटामधून मात्र त्याची गच्छंती झालेली आहे. अक्षय खन्ना आता अजय देवगण अभिनीत ‘दृश्यम 3’ चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार नाही. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कुमार मंगत पाठक यांनी […]
बारामतीतील आधुनिक एआय सेंटरचे उद्घाटन; अदानी म्हणाले, शरद पवार माझे मेंटॉर
शरद पवार हे एक असामान्य नेते आणि माझे मेंटॉर आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे बारामती हे शहर अमर्याद शक्यतांचे प्रतिक बनले आहे, अशा शब्दात अदानी समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी यांनी पवार यांचे काwतुक केले. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या एआय सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात […]
तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप
राजापूर तालुक्यातील भालावली गावात 18 जानेवारी 2023 मध्ये घडलेल्या खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी विनायक गुरव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन महाविद्यालयीन युवतींवर लाकडी दांडय़ाने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात साक्षी गुरव या युवतीचा मृत्यू झाला होता, तर दुसरी गंभीर जखमी झाली होती. गावात सुतक-सुवेर पाळणे आणि गावदेवतेच्या दास्तानाच्या हक्कावरून दोन गटांत तीव्र […]
दुसरा विवाह करणारी पत्नी भरपाईस पात्र नाही, न्यायालयाचा महिलेला दिलासा देण्यास नकार
पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार करत नुकसानभरपाई मिळावी यासाठी दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल करणाऱया महिलेला दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. पतीविरोधात याचिका दाखल केल्यानंतर संबंधित महिलेने दुसरा विवाह केला. त्यामुळे ती भरपाई मिळण्यास पात्र नाही, असे स्पष्ट करत कोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली आहे. पतीविरोधात नुकसानभरपाईच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. […]
शुभमन गिलचे प्रमोशन ठरले पक्के, बीसीसीआयच्या केंद्रीय करारात मोठ्या बदलांचे संकेत
बीसीसीआय लवकरच हिंदुस्थानी क्रिकेटपटूंसाठी 2026 सालाची केंद्रीय करार यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या यादीत टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळवू न शकलेल्या शुभमन गिलला ए ग्रेड प्लसमध्ये स्थान देण्याचे पक्के ठरले आहे. येत्या एक-दोन दिवसांत ही नवी यादी प्रसिद्ध होणार असून यामध्ये काही मोठे आणि निर्णायक बदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वाधिक चर्चेत […]
एका वर्षात दोन हजार कोटींची फसवणूक , डिजिटल अरेस्टची प्रकरणं तिप्पट वाढली
देशात डिजिटल अटक घोटाळे आणि संबंधित सायबर गुन्हे 2022 ते 2024 दरम्यान वेगाने वाढले आहेत. राज्यसभेत सरकारने सांगितले की, 2022 मध्ये डिजिटल अटकेची 39,925 प्रकरणे नोंदवली गेली होती आणि फसवणुकीची एकूण रक्कम 91.14 कोटी रुपये होती. तर, 2024 मध्ये ही प्रकरणे जवळपास तिप्पट वाढून 1,23,672 झाली. फसवणुकीची रक्कम 21 पट वाढून 19,35.51 कोटी रुपयांवर पोहोचली. […]
‘जी-मेल’चे युजरनेम सहज बदलता येणार, नवीन ई-मेल आयडी तयार करण्याची गरज नाही
जगातील सर्वात लोकप्रिय ई-मेल प्लॅटफॉर्म ‘जी-मेल’च्या कोटय़वधी युजर्सना दिलासा मिळणार आहे. गुगल लवकरच एक असे फीचर लॉन्च करणार आहे, ज्याची गेल्या दोन दशकांपासून वाट पाहिली जात होती. गुगलचे युजर्स आता त्यांच जुने ई-मेल अॅड्रेस (@gmedailed.comed) बदलू शकतील. विशेष बाब म्हणजे यासाठी त्यांना नवीन खाते तयार करण्याची गरज भासणार नाही आणि त्यांचा जुना डेटादेखील डिलीट होणार […]
कर्नाटकातील कारखान्यांचे दूषित पाणी कृष्णा नदीत
कर्नाटक राज्यातील कागवाड येथील शिरगुप्पी शुगर वर्क्स या साखर कारखान्याचे रासायनिक मळीमिश्रित दूषित पाणी महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी हद्दीतील कृष्णा नदीत सोडले आहे. यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रदूषणामुळे हजारो ग्रामस्थ आजारी पडले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या कारखान्याने सुमारे दोन किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकून दूषित पाणी गणेशवाडीतील ओढय़ामध्ये सोडले आहे. तेथून […]
आचारसंहितेचा भंग, भिवंडीच्या माजी महापौरांवर गुन्हा
भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्यासह चार जणांविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पाटील यांच्या माध्यमातून म्हाडा कॉलनी परिसरात एका रस्त्याचे काम केले जात होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱयांनी तेथे धाव घेऊन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. म्हाडा कॉलनी भागामध्ये मतदारांना प्रलोभन […]
कर्मचारी देण्यास टाळाटाळ, जीएसटीच्या सहाय्यक आयुक्तांना नोटीस
ठाणे निवडणूक कामासाठी कर्मचारी मिळत नसल्याची बोंब सुरू असताना जीएसटी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी कर्मचारी देण्यास टाळाटाळ केली आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून सहाय्यक आयुक्तांना शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. पालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तशी नोटीस पाठवली आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या कामासाठी जीएसटी विभागाकडून ९० कर्मचाऱ्यांची मागणी निवडणूक विभागाकडून करण्यात आली होती. तशा प्रकारचे पत्रदेखील जीएसटी विभागाला देण्यात […]
घाटमाथ्यांसह डोंगररांगांवर पोलिसांची ‘नजर’, ‘थर्टी फर्स्ट’साठी पोलीस सतर्क
नववर्षाच्या स्वागतासाठी शहराजकळील डोंगररांगा तसेच घाटमाथ्यातील ठिकाणांना तरुणाईकडून अधिकची पसंती देण्यात येते. या तरुणाईकडून कोणत्याही प्रकारचा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांनी अधिकचे लक्ष या काळात घाटमाथ्यांसह डोंगररांगांवर देण्याचे ठरवले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठीची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गोंगाटापासून दूर राहण्यासाठी अनेकांनी शहरालगतच्या डोंगररांगा तसेच घाटमाथ्याकरील ठिकाणांची निवड करण्यास सुरवात केली […]
ठाण्यात 16 हजार 574 दुबार मतदार, एकाच ठिकाणी मतदान करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार
ठाण्यात दुबार मतदारांची साफसफाई महापालिका प्रशासनाने केली आहे. या दुबार मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आल्यानंतर शहरात १६ हजार ५७४ दुबार मतदार असल्याचे महापालिकेने आज स्पष्ट केले आहे. या मतदारांनी एकाच ठिकाणी आणि एकदाच मतदान करत असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत तब्बल ८३ हजार ६४४ दुबार मतदार […]
‘नमो’नव्हे शिवसेनेचेच ठाणे, राजन विचारे यांनी भाजपला सुनावले
ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ठाण्यात ‘नमो भारत नमो ठाणे’ असे बॅनर्स लावले आहेत. त्यावरून शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी आज खरपूस समाचार घेत भाजपला सुनावले. ‘नमो’ नव्हे तर हे शिवसेनेचेच ठाणे आहे. ठाणे आणि शिवसेना तसेच शिवसेना आणि ठाणे हे अतूट नाते असून बॅनरबाजी करणाऱ्या भाजपला येथील जनता घरचा रस्ता दाखवल्याशिवाय […]
‘विश्वकर्मा’ फसवणुकीचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास
गुंतकणुकीपोटी जादा परताका देण्याचे आमिष दाखकत नागरिकांची आर्थिक फसकणूक करणाऱया ‘विश्वकर्मा सुपरमार्ट सर्क्हिसेस’ व ‘विश्वकर्मा सुपरमार्ट सर्क्हिसेस प्रायक्हेट लिमिटेड, बोडकी’ या कंपन्यांकिरोधात दाखल असलेला गुन्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे कर्ग केला आहे. गुंतकणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकल्याने संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया राबविण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. ‘विश्वकर्मा सुपरमार्ट सर्क्हिसेस’ […]
कांजूर डंपिंग ग्राऊंडमुळे मेटाकुटीला आलेल्या रहिवाशांना काही अंशी दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कचराभूमीमुळे निर्माण होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी अमेरिकेतील टार्पोमॅटिक कव्हरिंग प्रणाली वापरण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली वापरली जाणार असून हे तंत्रज्ञान मुंबईत आणण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने हायकोर्टात प्रतिज्ञापत्रावर दिली. कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात […]
आंध्र प्रदेशमधील अनाकापल्ली जिल्ह्यात मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. टाटानगरहून एर्नाकुलमला जाणाऱ्या टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला (18189) भीषण आग लागली. या आगीमध्ये दोन एसी कोच जळून खाक झाले असून एका 70 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला, तर शेकडो प्रवाशांनी वेळीच रेल्वेबाहेर उडी घेत जीव वाचवला. Ernakulam Express fire – आंध्र प्रदेशमध्ये एर्नाकुलम एक्सप्रेसला भीषण आग; दोन एसी कोच […]
कंपनीच्या पैशांचा अपहार करणाऱ्याला अटक
एका खासगी ट्रव्हल्स कंपनीच्या 40 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी एका कर्मचाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरी येथे एका खासगी कंपनीचे कार्यालय असून तक्रारदार हे मॅनेजर म्हणून काम करतात. त्या कंपनीत अटक आरोपी हा काम करत होता. फेब्रुवारी 2024 पासून तो अचानक कामावर यायचा […]
केवळ अफवा, काही गंभीर नाही! गौतम गंभीर यांच्या ‘डच्चू’च्या अफवांवर सचिव सैकियांचा फुलस्टॉप
हिंदुस्थानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षी 2024 मध्ये घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 0-3 अशी दारुण पराभवाची मालिका अनुभवावी लागली होती. या सलग अपयशांमुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संघातून डच्चू देत माजी स्टायलिश फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मणकडे संघाची सूत्रे सोपविली जाणार असल्याच्या चर्चांना अक्षरशः उधाण आले […]
कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची ‘भरती’
नाताळची सुट्टी आणि त्याला लागून आलेल्या शनिवार, रविवारची संधी साधत हजारो लोक थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडले आहेत. रायगड, रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणातील सर्वच समुद्रकिनाऱयांवर पर्यटकांची मोठी ‘भरती’ आली आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड देशीविदेशी पर्यटकांनी गजबजले आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील मालवणसह देवबाग, तारकर्ली, निवती, आचरा, वेंगुर्ले, सागरेश्वर, शिरोडा-वेळागर, भोगवे, खवणे, देवगड, कुणकेश्वर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची […]
टाटा मिलसह तीन गिरण्यांतील कामगारांवर उपासमारीची वेळ; दहा महिन्यांपासून पगारच दिला नाही
नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनमार्फत (एनटीसी) चालवण्यात येत असलेल्या टाटा मिलसह तीन गिरण्यांतील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना महामारीपासून बंद ठेवलेल्या गिरण्यांतील हजारो कामगारांना मागील दहा महिन्यांपासून पगारच दिलेला नाही. यात 95 टक्के मराठी कामगार असून त्यांच्या पगारासह इतर प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावेत, अशी मागणी करीत शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज […]
अंधेरीत भाजपमध्ये बंड, उपऱ्यांमुळे भरला अपक्ष अर्ज
राज्यभरात महायुतीमध्ये ‘बिघाडी’ होत असताना अंधेरीमध्येही उपऱयांमुळे संधी हुकलेल्या भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्याने बंड पुकारून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. वॉर्ड क्र. 82 मध्ये पक्षाने जुन्या निष्ठावंतांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या माजी नगरसेवकाला उमेदवारी दिल्याने भाजपचे दीपक जयस्वाल यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत शड्डू ठोकला आहे. भाजपने काँग्रेसमधून आलेले माजी नगरसेवक जगदीश अमीन यांना वॉर्ड क्र. 82 […]
रेल्वेच्या 30 हेक्टर जागेवर बेकायदा झोपडय़ांचे बस्तान; विकास प्रकल्प रखडले, पुनर्वसनाचा गुंता
लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करणे मुश्कील बनले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेणाऱया रेल्वे प्रशासनापुढे बेकायदा झोपडय़ांचे मोठे आव्हान आहे. मुंबई महानगरातील रेल्वेच्या तब्बल 30 हेक्टर जागेवर बेकायदा झोपडय़ांचे अतिक्रमण आहे. या अतिक्रमणाचा अनेक विकास प्रकल्पांमध्ये अडथळा येत असून झोपडीधारकांचे पुनर्वसन कसे करायचे, हादेखील यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. पश्चिम आणि मध्य […]
सोलापुरात उमेदवारी देऊनही काँग्रेस उमेदवाराचा ‘एमआयएम’मध्ये
सोलापूर पालिकेसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या 18 जणांच्या पहिल्या उमेदवारी यादीत नाव जाहीर करूनही संबंधित अधिकृत उमेदवाराने थेट ‘एमआयएम’मध्ये प्रवेश केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय असलेल्या उमेदवाराने एमआयएममध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसने नुकतील कोल्हापूरसाठी 48 तर सोलापूरसाठी 18 जागांसाठी उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये सोलापूरच्या यादीत नाव असलेले फिरदोस पटेल याने […]
राजमुंद्रीहून आणलेली पंधरा फुटी साडेसातशे झाडे सुकून गेली, कुंभमेळा मंत्री महाजन यांचा अट्टहास नडला
तपोवनातील वृक्षतोडीवरून एका झाडाच्या बदल्यात दहा मोठी झाडे लावू, असा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी गाजावाजा केला. आंध्र प्रदेशातील राजमुंद्रीहून सुमारे साडेसातशे झाडे आणून त्यांचे मखमलाबादला रोपण केले. मात्र चौदा दिवसांतच ही झाडे सुकली आहेत. संगोपनाकडे दुर्लक्ष होत असून मंत्र्यांनी अट्टहास करीत जनतेच्या पैशांचा चुराडा केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तपोवनातील अठराशेहून अधिक झाडे तोडण्याच्या […]
स्मृती मानधना बनली दसहजारी मनसबदार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारी चौथी
हिंदुस्थानची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडत इतिहास रचला आहे. दसहजारी मनसबदारांच्या पंगतीत बसणारी ती जगातील चौथी महिला फलंदाज ठरली असून, हिंदुस्थानकडून हा मान मिळवणारी मिताली राजनंतरची दुसरी खेळाडू ठरली आहे. मिताली राज 10,868 धावांसह या यादीत आघाडीवर आहे. न्यूझीलंडची सुझी बेट्स (10,652) आणि इंग्लंडची शार्लट एडवर्ड्स (10,273) या […]
निवडणुकीसाठी पालिकेचे 50 हजार कर्मचारी तैनात, प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर प्रणाली
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेचे तब्बल 50 हजार कर्मचारी-अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी पालिकेकडून या कर्मचारी-अधिकाऱयांना ‘मास्टर ट्रेनिंग प्रणाली’च्या माध्यमातून मास्टर ट्रेनर प्रशिक्षण देणार आहेत. निवडणूक प्रक्रियेचा व्यापक अनुभव असलेले अधिकारी या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या 15 जानेवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी पालिकेच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. निवडणूक […]
गर्भवती, आजारी, दिव्यांगांना निवडणूक कामातून सूट, ड्युटी रद्द करण्यासाठी पालिकेची विशेष सुविधा
गर्भवती, आजारी, दिव्यांग अशा संवेदनशील घटकातील कर्मचाऱयांना निवडणूक कामातून लवकरच दिलासा मिळणार आहे. पालिकेने निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशा कर्मचाऱयांना लावलेली निवडणूक डय़ुटी रद्द करून घेण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी कर्मचाऱयांना याबाबत पालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून या कामासाठी पालिकेला सुमारे 75 हजार कर्मचाऱयांची गरज भासणार […]
एकनाथ शिंदेंचा सख्खा भाचा अजित पवार गटात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सख्खा भाचा आशीष माने यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत माने यांनी हा प्रवेश केला. आशीष माने यांना अजित पवार गटाकडून चांदिवली प्रभाग क्र. 159 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचेही समोर आले आहे. या प्रवेशामुळे महायुतीत […]
सोलापुरात पवार-शिंदे गट भाजपविरोधात लढणार
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठय़ा प्रमाणात फूट पडली असून, शिंदे गट आणि अजित पवार गटाने भाजपला दूर ठेवत युती केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपाला महापालिका सत्तेतून रोखण्यासाठी दोघेही भाजपच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या युतीची शक्यता संपुष्टात आल्या असून, महायुतीतील इतर दोन मित्रपक्ष असलेले शिंदे गट […]
Chandrapur News जिल्ह्यात एकाच दिवशी वाघांच्या हल्ल्यात दोन मजूर ठार
बांबू कटाईचे काम करताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी तासाभरात झालेल्या वाघाच्या हल्ल्यात दोन मजूर ठार झाल्याची घटना ताडोबा बफर क्षेत्रातील मामला व महादवाडी परिसरात घडल्या. प्रेमसिंग दुखी उदे व बुदशिंग श्यामलाल मडावी अशी मृतांची नावे असून ते बालाघाट येथील रहिवासी आहेत. ताडोबाच्या बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू असून यासाठी वनविभागाने बालाघाट येथून मजूर […]
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, अजित पवारांची घोषणा
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार आहेत. दोन्ही पक्ष एकत्रित येऊन या शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा रविवारी तळवडे येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ तळवडे येथे फोडला. […]
मटण 240, बिर्याणी 150, शाकाहारी थाळी 180 रुपये; खर्चाचे नियोजन कोलमडणार
महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याचे अवघे काही दिवस बाकी असताना निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी उमेदवारांच्या खर्चासाठी खानपानचे दर जाहीर केले आहेत. त्यात शाकाहरी जेवण 115 ते 180 रुपये, मटण प्लेट 240, तर बिर्याणीची प्लेट 150 रुपयांना निश्चित केली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खर्चाचे दर वाढल्याने उमेदवारांच्या खर्चाचे नियोजन कोलमडणार […]
एमपीएससी परीक्षा पद्धतीत महत्त्वाचा बदल
राज्य लोकसेवा आयोगामार्फत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले आहेत. आता एका प्रश्नासाठी पाच पर्याय उमेदवारांना दिले जाणार आहेत. यापैकी कोणताही एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे बंधनकारक असेल. असे न केल्यास प्रत्येक उत्तरासाठी 25 टक्के गुण कापले जाणार आहेत. 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू असतील. ‘एमपीएससी’ मार्फत याबाबतची सूचना जाहीर करण्यात […]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 29 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे कौटुंबिक वातावरण -कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाण्याची शक्यता आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय […]
सामनावीर स्मृती मानधना, शेफाली वर्मा यांची विक्रमी भागीदारीसह अर्धशतके वृत्तसंस्था/ तिरुवनंतपूरम सामनावीर स्मृती मानधना व शेफाली वर्मा यांनी अर्धशतकांसह नोंदवलेल्या विक्रमी दीडशतकी भागीदारीच्या बळावर भारतीय महिला संघाने चौथ्या टी-20 सामन्यात लंकन महिला संघावर 30 धावांनी विजय मिळविला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली. या मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना मंगळवारी 30 डिसेंबर [...]
‘आयएनएस वागशीर’वरून राष्ट्रपतींचे समुद्री भ्रमण
कारवारमधील सी-बर्ड नौदल तळाला भेट : राफेल उड्डाणानंतर अनुभवला आणखी एक थरार प्रतिनिधी / कारवार देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी येथून जवळच्या सी-बर्ड नौदल प्रकल्पातील बंदरातून ‘आयएनएस वागशीर’ या पाणबुडीतून समुद्री प्रवासाचा थरार अनुभवला. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या. तसेच आतापर्यंत असा थरार अनुभवणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी [...]
उन्नाव बलात्कार प्रकरणातील 24 वर्षीय पीडितेची व्यथा ऐकून मन सुन्न होते. आठ वर्षांच्या कठोर संघर्षानंतरही न्याय मिळवण्याच्या मार्गात अडथळे येतच आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने भाजपचे माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर पीडितेच्या मनात उमटलेली भीती आणि निराशा ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही, तर संपूर्ण समाज आणि न्यायव्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष [...]
अनासक्त राहून कर्म करणारा पुरुष कैवल्यपद मिळवतो
अध्याय तिसरा भगवंत म्हणाले, अर्जुना, परमेश्वरापासून सुरु झालेल्या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही, तो विषयांत रममाण होऊन आयुष्य व्यर्थ घालवितो. स्वकष्टाने एखादे कार्य करून ते देवाला अर्पण करणे हे यज्ञ केल्यासारखेच आहे. परमेश्वराने त्याच्या उदरनिर्वाहासाठी अन्नसाखळी तयार केलेली आहे. जो उन्मत्त मनुष्य स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण न करता, वाईट कर्माचे आचरण करून इंद्रियांचे लाड [...]
नवीन वर्षाच्या उदरात दडलंय तरी काय?
नवीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची विजयी घोडदौड चालू राहील काय? या प्रश्नाचे उत्तर म्हटले तर सोपे आहे. म्हटले तर अवघड. आजच्यासारखी स्थिती 2026मध्ये राहिली तर भाजपचे ढोलनगारे सुरूच राहतील. पण भारतीय राजकारण सारखे बदलत असते असे मानले तर सत्ताधारी मंडळींपुढे नवीन आव्हाने उभी राहू शकतात. एव्हरेस्टच्या शिखरावर फार काळ कोणी राहू शकत नाही [...]
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी घेतले भगवान रामाचे दर्शन
वृत्तसंस्था/ अयोध्या आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी रामनगरी अयोध्येचा दौरा केला आहे. नायडू यांनी राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेत पूजन केले आहे. याचबरोबर त्यांनी सप्तऋषी मंदिरात जात दर्शन-पूजन केले आहे. श्रीरामलल्ला आणि राम दरबारचे दर्शन करण्यासह त्यांनी जन्मभूमी परिसराचे भ्रमण केले आहे. यादरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी नायडू [...]
पाकिस्तानच्या कबड्डी खेळाडूवर बंदी
खासगी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल कारवाई वृत्तसंस्था/ कराची या महिन्याच्या सुऊवातीला बाहरिन येथे झालेल्या एका खासगी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल प्रसिद्ध पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू उबैदुल्लाह राजपूतवर राष्ट्रीय महासंघाने अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. पाकिस्तान कबड्डी महासंघाने (पीकेएफ) तातडीने घेतलेल्या बैठकीनंतर ही बंदी घातली, ज्यामध्ये राजपूतने महासंघ किंवा इतर संबंधित अधिकारिणींकडून अनिवार्य ना [...]
बेंगळूर ड्रग्ज प्रकरणात आंतरराज्य नेटवर्क
अमली पदार्थप्रकरणी चौघांना अटक : मुख्य सूत्रधार राजस्थानमधील असल्याचे स्पष्ट प्रतिनिधी/ बेंगळूर महाराष्ट्र अमली पदार्थ विरोधी दलाच्या (एएनटीएफ) कोकण विभाग पोलिसांनी बेंगळुरातील तीन ठिकाणी ड्रग्ज कारखान्यांवर छापे टाकून 55.88 कोटी ऊपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची सखोल चौकशी सुरू केली आहे. आरजे इव्हेंटच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या [...]
त्रिपुराच्या विद्यार्थ्याची देहरादूनमध्ये हत्या
वंशद्वेषी टिप्पणीला विरोध केल्याने गमावला जीव वृत्तसंस्था/ देहरादून उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये वंशद्वेषी टिप्पणीला विरोध केल्यावर एका आदिवासी विद्यार्थ्याची जबर मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. हा मृत विद्यार्थी त्रिपुरा येथील होता आणि त्याचे नाव अंजेल चकमा होते. अंजेल हा देहरादूनच्या जिज्ञासा विद्यापीठात एमबीएच्या अंतिम वर्षात शिकत होता. अंजेलवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, यानंतर तो अनेक [...]
मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली ; एक्यूआय थेट 200 अंकांवर, पुढचे काही दिवस ‘टेन्शन’ कायम
मुंबईकरांनी रविवारी सकाळी प्रदूषणाचा कहर अनुभवला. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) थेट 200 अंकांवर पोहोचला. प्रदूषणात अचानक मोठी वाढ होऊन हवेची गुणवत्ता ढासळली. त्यामुळे नागरिकांची घुसमट झाली. विशेषतः वृद्ध नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांना असह्य त्रास झाला. पुढील काही दिवस शहरातील प्रदूषण चिंता वाढवणारे असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. शहरात मागील अनेक दिवस थंडी मुक्कामी […]
सूर्या तमिरी, रित्विक यांना राष्ट्रीय बॅडमिंटन विजेतेपद
वृत्तसंस्था/ विजयवाडा येथे झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सूर्या करिश्मा तमिरी व रुत्विक संजीवी यांनी अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. 19 वर्षीय सूर्या तमिरीने जेतेपदासाठी झालेल्या लढतीत तन्वी पत्रीवर 17-21, 21-12, 21-14 अशी मात केली. ही लढत सुमारे एक तास रंगली होती. पहिल्या गेमच्या मध्यावर तन्वीने नियंत्रण राखत तमिरीला वारंवार चुका करण्यास भाग [...]
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ह्यू मॉरिस यांचे निधन
वृत्तसंस्था/ कार्डिफ (वेल्स) इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू व इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी म्हणूनही काम केलेले ह्यू मॉरिस यांचे 62 व्या वर्षी निधन झाले. ग्लॅमर्गन वेल्श काउंटी संघात मॉरिस यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले. या संघाचे ते कर्णधारही होते. त्या संघाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, मॉरिस कर्करोगाचे निदान झाल्यानंतर ‘कठीण’ स्थितीला सामोरे जावे [...]
लंका टी-20 मालिकेसाठी पाक संघ जाहीर शादाब खानचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ लाहोर पुढील महिन्यात लंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानने अष्टपैलू शादाब खानला पुनरागमनाची संधी दिली, पण बाबर आझम व वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांना संधी दिलेली नाही. दोघेही सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळत आहेत. 7 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या तीन सामन्यांच्या मालिकेत शादाब खानचे पुनरागमन झाले आहे. खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे गेल्या जूनपासून तो संघाबाहेर [...]
इस्रायलकडून सोमालीलँडला मान्यता
21 मुस्लीम देशांचा विरोध : संयुक्त वक्तव्य जारी करत व्यक्त केली भीती वृत्तसंस्था/ तेल अवीव, दोहा सोमालियापासून वेगळा झालेल्या सोमालीलँडला स्वतंत्र देशाच्या स्वरुपात मान्यता देण्याचा निर्णय इस्रायलने घेतला आहे. या निर्णयाबद्दल मुस्लीम देशांचा संताप वाढत चालला आहे. जगभरातील 21 देशांनी इस्रायलच्या या निर्णयाच्या विरोधात सयुंक्त वक्तव्य जारी केले आहे. वक्तव्य जारी करणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबिया, [...]
रोहिंगे मुस्लीम भारतात घुसखोरीच्या तयारीत
बांगलादेशातील हिंसाचारादरम्यान मोठे कट-कारस्थान वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेशात सध्या मोठ्या प्रमाणात अशांतता आणि हिंसाचार सुरू आहे. राजधानी ढाकासह देशाच्या मोठ्या भागात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. बांगलादेशातील अराजकतेमुळे रोहिंग्यांसह भारतासाठी अनेक चिंता निर्माण झाल्या आहेत. याचदरम्यान बांगलादेशातील रोहिंगे मुस्लीम सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतात प्रवेश करू शकतात, असा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. बांगलादेशमध्ये मोठ्या संख्येने रोहिंग्या [...]
सावंतवाडी चौथ्यांदा ‘लोकमान्य’चा मानकरी
म्हापसा उपविजेता : गणेश कंग्राळकर मालिकावीर, गौरव हेर्लेकर सामनावीर क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव लोकमान्य को.ऑप. सोसायटी आयोजित 13 व्या लोकमान्य प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्या सावंतवाडी संघाने म्हापसा गोवा संघाचा 15 धावांनी पराभव करुन 13 वा लोकमान्य चषकावर चौथ्यांदा नाव कोरले. सामनावीर गौरव हेरलेकर तर गणेश कंग्राळकरला मालिकावीर पुरस्काने गौरविण्यात आले. एसकेईच्या प्लॅटिनम ज्युबली [...]
मालगाडी घसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत
बिहारमधील जमुई येथे अपघात : अनेक गाड्या वळवल्या वृत्तसंस्था/ पाटणा बिहार-झारखंड सीमेवर शनिवारी रात्री रेल्वे अपघात झाला. जमुई येथे मालगाडीचे 19 डबे रुळावरून घसरले. त्यापैकी 10 डबे पुलावरून कोसळल्याचे सूत्रांकडून समजते. तथापि, अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केलेली नाही. रेल्वे अपघातामुळे अप आणि डाउन दोन्ही विभागांवरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या विविध ठिकाणी अडकल्या आहेत. वंदे [...]
‘ऑपरेशन सिंदूर’ देशाच्या अभिमानाचे प्रतीक
पंतप्रधानांची ‘मन की बात’ : 2025 मधील घटनांचा घेतला आढावा, नववर्षाचा संकल्पही विषद वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’द्वारे देशाला संबोधित केले. याप्रसंगी पंतप्रधानांनी 2025 च्या कामगिरीचा उल्लेख करत देशाला नवा आत्मविश्वास मिळाल्याचे स्पष्ट केले. त्यांनी ऑपरेशन सिंदूर, क्रीडा आणि अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीबद्दल देशवासियांचे कौतुक केले. यावर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रत्येक [...]
म्हैसूरमध्ये ज्वेलर्समध्ये घुसून पाच कोटींचे दागिने लंपास
प्रतिनिधी/ बेंगळूर म्हैसूर जिल्ह्याच्या हुनसूर तालुक्मयातील एका दागिन्यांच्या दुकानात घुसलेल्या दरोडेखोरांनी मॅनेजरवर गोळीबार करून सुमारे 4 ते 5 कोटी किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने लुटून फरार झाले आहेत. तोंड बांधून दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी हुनसूर बस स्थानकमागील स्काय गोल्ड अँड डायमंड शॉपमध्ये दिवसाढवळ्या दरोडा टाकला. दरम्यान, चोरट्यांनी सोन्याच्या दुकानाचे मॅनेजर अजगर यांच्यावर गोळीबार केला. परंतु [...]
आजचे भविष्य सोमवार दि. 29 डिसेंबर 2025
मेष: गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. वृषभ: क्वचित गाठीभेटी होणाऱ्या लोकांशी संपर्क साधा मिथुन: खर्चावर मर्यादा ठेवा. स्वयंसेवी कार्य कराल कर्क: रिकाम्या वेळेत नकारात्मक विचारांची मालिका सतावेल. सिंह: कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासा. कन्या: व्यवसायातील नुकसान टाळा, वाचारांती पावले उचला तुळ: देवाण घेवाण करताना सतर्क राहाल तरच फायदेशीर वृश्चिक: स्वत:साठी वेळ काढा, आपली उणीव [...]
धाकधूक आणि धावपळ! उमेदवारी अर्ज भरायचे उरले फक्त दोन दिवस, युती, आघाडीचे उमेदवार अजूनही गुलदस्त्यात
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर असून आता फक्त दोन दिवस उरले आहेत. मात्र अद्यापही युती आणि आघाडीचे उमेदवार गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यास उमेदवारांची धावपळ होणार आहे. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये कोणता पक्ष कोणाशी युती करणार हे चित्र बऱयापैकी स्पष्ट झाले आहे, मात्र […]
नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी, अयोध्या, वैष्णोदेवी आणि तिरुपती अशा प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. येत्या 1 जानेवारीला या मंदिरांमध्ये सुमारे 10 लाख भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर या मंदिरांमध्ये दर्शनाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. शिर्डी साई संस्थानाचे भक्त निवास 80 टक्के […]
बंकरमध्ये लपण्याच्या मार्गावर होतो, ‘ऑपरेशन सिंदूर’वर पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची कबुली
पहलगाम येथे एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून पाकिस्तानला धडा शिकवला होता. त्यावेळी हिंदुस्थानने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या वायुसेनेच्या तळांचेही नुकसान झाले होते. त्यावर प्रथमच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी कबुली दिली आहे. आम्ही बंकरमध्ये लपण्याच्या तयारीत होतो, असे झरदारी […]
गुंडांनी फडणवीस, शिंदे व अजित पवारांच्या पक्षांत प्रवेश केला आहे. राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हा गुंडांचा पोशिंदा बनला आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांत गुंड टोळ्यांचा भरणा आहे व या टोळ्या मुंबई-महाराष्ट्रात एकमेकांविरुद्ध लढत आहेत. गृहखाते हात चोळत बसल्यावर दुसरे काय होणार? मंगेश काळोखेंची हत्या होणार, गोगावलेंचा गुंड पुत्र फरार होणार […]
गांधी-नेहरूंचा हिंदुस्थान आता लिंचिस्थान झालाय,मेहबुबा मुफ्ती यांची टीका
‘देशातील सध्याचे वातावरण भीतीदायक आहे. अल्पसंख्याकांवरील हल्ल्याच्या घटना सुरूच असून महात्मा गांधी व पंडित नेहरूंचा हिंदुस्थान आता लिंचिस्थान झाला आहे,’ अशी टीका पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी आज केली. ‘बांगलादेशात हिंदू बांधवांची हत्या झाल्यामुळे प्रचंड गदारोळ उठला आहे, मात्र अशाच घटना आपल्याकडेही होतात. अखलाकपासून सुरू झालेले हे लिंचिंग आजही थांबताना दिसत नाही. हे वातावरण देशाच्या […]
दिल्ली डायरी –उत्तर प्रदेशात ‘घडलंय-बिघडलंय!’
>> नीलेश कुलकर्णी, nileshkumarkulkarni@gmail.com उत्तर प्रदेशात मतांच्या दृष्टीने निर्णायक असलेल्या ब्राह्मण समाजाच्या सर्वपक्षीय 42 आमदारांनी लखनऊच्या कडाक्याच्या थंडीत बैठक घेऊन ‘राजकीय पारा’ टिपेला पोहोचवला आहे. ब्राह्मणांच्या या बैठकीवर योगी व प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी नाराजीचा कटाक्ष टाकत डोळे वटारल्याने तेथील भाजपांतर्गत राजकारणात ‘घडलंय बिघडलंय’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. ब्राह्मण हा परंपरागत भाजपचा मतदार मानला […]
सत्ता नसली तरी काँग्रेसच्या पाठीचा कणा ताठ!
‘‘काँग्रेसची ताकद कमी झाली असली, सत्ता नसली तरी काँग्रेसच्या पाठीचा कणा ताठ आहे. संविधान, धर्मनिरपेक्षता आणि गरीबांच्या अधिकारांच्या मुद्दय़ावर आम्ही कुठलीही तडजोड केलेली नाही. सत्ता नाही म्हणून आम्ही सौदा करणार नाही,’’ असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ठणकावले. काँग्रेसच्या 140व्या स्थापनादिनी पक्षाच्या या मुख्यालयात संबोधित करताना ते बोलत होते. काँग्रेस संपली म्हणणाऱयांना खरगे यांनी […]
काँग्रेसने धरला वंचितचा हात, 62 जागा दिल्या
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने अखेर आज वंचित बहुजन आघाडीसोबत युती करीत असल्याची घोषणा केली. मुंबईत वंचितला 62 जागा देणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. मुंबईत झालेल्या काँग्रेस आणि वंचितच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांनी याबाबत माहिती दिली. आघाडीची घोषणा करताना वंचित बहुजन आघाडी मुंबईतील कोणत्या 62 जागा लढणार याची यादी जाहीर करण्यात आली. […]
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची वाघशीर पाणबुडीतून सफर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज हिंदुस्थानी नौदलाच्या ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीतून समुद्र सफरीचा अनुभव घेतला. कर्नाटकच्या कारवार नौदल बंदरावरून त्यांनी समुद्र सफरीला सुरुवात केली. तब्बल दोन तास त्यांनी पाण्याखालून प्रवास केला. नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे यावेळी राष्ट्रपतींसोबत होते. राष्ट्रपतींनी यावेळी अधिकारी आणि पाणबुडीवरील जवानांशी चर्चा केली व त्यांच्या कामाची माहिती घेतली.
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे भाविकांची पूजा साहित्यात मोठी लूट होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत येथील व्यावसायिकांनी पूजा साहित्य दराचे मोठे फ्लेक्स दुकानाबाहेर लावावेत, भाविकांना सक्ती करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक उपविभागीय आयुक्त, देवस्थानचे प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिला. डॉ. गेडाम हे शनिशिंगणापूर येथे शुक्रवारी व शनिवारी दाखल झाले होते. त्यांनी […]
अफगाणिस्तानातील नागरिकांची अन्नान्न दशा, अर्धी जनता उपाशी, मदतीचा ओघही आटला!
अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे आधीच कंबरडे मोडले आहे. एकीकडे कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे बेरोजगारी, भूकंप, निर्वासितांचे लोंढे अशा कात्रीत अडकलेल्या अफगाणी जनतेसमोर आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अफगाणिस्तानात भुकेने हाहाकार निर्माण झाला आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे अफगाणिस्तानला मिळणाऱया आंतरराष्ट्रीय निधीत मोठी कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीच्या ताज्या अहवालानुसार, 2025 मध्ये […]
वाहतूक पोलिसाची वॉकीटॉकी चोरीला
वाहतुकीबाबत संदेश आणि संवाद साधण्यासाठी आवश्यक असणारी एक वॉकीटॉकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. वॉकीटॉकी चोरीला गेल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार विपुल मोकल हे ट्रॉम्बे वाहतूक विभागात रायडर म्हणून काम करतात. सीओआर, फिक्स पॉइंट बंदोबस्ताचे ते काम करतात. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून ट्रॉम्बे वाहतूक विभागातील अधिकारी, […]
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेले वडील, आयपीएस लेकाने घडविला पहिला विमान प्रवास
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या बिरदेव डोणे यांचे देशभरातून कौतुक झाले. मेंढपाळाच्या लेकाला सर्वसामान्यांनी डोक्यावर घेतले. बिरदेव यांनी कुटुंबीयांना हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीची भेट घडवून आणली. त्यासाठी त्यांचे कुटुंबीय विमानातून हैदराबादला पोहोचले. त्यांच्या आई-वडिलांसाठी हा पहिलाच विमान प्रवास होता. नऊवारी साडीतील आई अन् अंगावर घोंगडं घेऊन त्यांचे […]
कश्मीर खोऱयात किमान तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. अनेक ठिकाणी पारा शून्याखाली नोंदवला गेला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये किमान तापमान -2.6 डिग्री होते. जम्मू-कश्मीरमध्ये सर्वात कमी तापमान सोनमर्गचे होते, जिथे तापमान -5.8 डिग्री नोंदवले गेले. हिमाचल प्रदेशातील कुकुमसेरी येथेही तापमान 0 च्या खाली -4.2 डिग्री नोंदवले गेले. हवामान विभागाने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह 23 […]
लांब चोचेचे गिधाड पेंचमधून थेट नाशिकमध्ये, 17 दिवसांत 750 किलोमीटरचा प्रवास
नागपूरजवळच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या एक लांब चोचीच्या गिधाडाचा थक्क करणारा प्रवास उलगडला आहे. हे गिधाड 17 दिवसांमध्ये 750 किलोमीटरचा प्रवास करून नाशिकजवळच्या अंजनेरी टेकडीजवळ पोहोचले आहे. गिधाडाला जीपीएस ट्रान्समीटर लावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या हालचाली, अधिवास आणि जगण्याचे दीर्घकालीन निरीक्षण करणे शक्य होते. 11 डिसेंबरला ‘जे-132’ नावाचे गिधाड पेंच व्याघ्र प्रकल्पातून सोडण्यात आले […]
कलिना येथे व्यावसायिक इमारतीला भीषण आग,कोट्यवधीचे सामान जळून खाक
सांताक्रुझ येथील कलिना परिसरातील व्यावसायिक इमारतीला शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत इमारतीतील कोटय़वधी रुपयांचे फर्निचरचे सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने चार फायर इंजिनच्या सहाय्याने जवळपास दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कलिना परिसरातील सीएसएमटी रोडवरील ‘एमजीईएन चेंबर्स’ नावाच्या सहामजली व्यावसायिक इमारतीला ही आग लागली. […]
अमेरिका हेच आता संयुक्त राष्ट्र
‘जगातील वेगवेगळ्या देशांतील संघर्ष थांबवण्यात संयुक्त राष्ट्र संघाचा फार उपयोग होत नसून हे काम अमेरिकाच करत आहे. त्यामुळे अमेरिका हेच आता खरे संयुक्त राष्ट्र झाले आहे,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. ‘टथ सोशल’ या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करून ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडियामधील युद्ध थांबवल्याचा दावा केला. तसेच, दोन्ही […]
जेसीबीने महिलेला चिरडले, वांद्रे येथील संतापजनक घटना
मैदानात झोपलेल्या महिलेला जेसीबीने चिरडल्याची घटना वांद्रे पश्चिमच्या चिंबई मैदानात घडली. मृत महिलेची ओळख पटली नाही. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी जेसीबी चालक मोह्हमद सलीम नूर खान याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. भरतलाल जयस्वाल हे वांद्रे पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री ते बीट मार्शल म्हणून गस्त करत होते. रात्री त्यांना एक पह्न आला. […]
म्यानमारमध्ये पाच वर्षांनंतर निवडणूक
म्यानमारमध्ये रविवारी पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली. देशाच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धादरम्यान लष्कराच्या देखरेखीखाली या होत आहेत. यावेळी पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जात आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, ही निवडणूक लष्करी राजवटीला लोकशाहीचा मुखवटा चढवण्यासाठी आयोजित केली जात आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये लष्कराने नोबेल विजेत्या आंग सान सू ची यांच्या […]
फ्रेन्च अभिनेत्री ब्रिगिट बार्डोट यांचे निधन, 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. 60च्या दशकातील हॉलिवूड आणि फ्रेंच सुपरस्टार ब्रिजिट बार्डोट यांचे निधन झाले आहे.वयाच्या 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बार्डोट यांना अभिनयाबरोबरच एक गायिका आणि प्राणी हक्क कार्यकर्ती अशी त्यांची ओळख होती. ब्रिजिट बार्डोट फाउंडेशनचे प्रतिनिधी ब्रुनो जॅकेलिन यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली. मीडिया वृत्तानुसार,गेल्या महिन्यात त्यांना आरोग्याच्या समस्यांमुळे […]
अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
अहिल्यानगर–मनमाड राज्य महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना दि. २८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात घडली. नदीम आदम शेख (वय १९) व उमर अब्बास शेख (दोघे रा. डिग्रस, ता. राहुरी) हे […]
लिव्ह-इन पार्टनरचे लैंगीक शोषण करणाऱ्या विवाहीत प्रियकराला अटक, 20 लाख रूपये-सोनं लुटल्याचा आरोप
बंगळुरुच्या बागलकुंटे येथे लिव्ह-इन रिलेशनशिपच्या बहाण्याने विवाहित प्रियकराने 20 लाख रुपये आणि जवळपास 200 ग्रॅम सोने लुटल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 29 वर्षीय प्रियकराला फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुलार, शुभम शुक्ला असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आधी एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि तिच्यावर लैंगिक […]
हिंदु तरुणीच्या वाढदिवसाला आलेल्या मुस्लीम तरुणांना बजरंग दल कार्यकर्त्यांची मारहाण
उत्तर प्रदेशमधील बरेली येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका कॅफेमध्ये घुसून मुस्लीम तरुणंना मारहाण केली आहे. या कॅफेमध्ये एका हिंदू तरुणीचा वाढदिवस साजरा होत होता. त्या वाढदिवसासाठी हे तरुण आले होते. सदर तरुणी ही नर्सिंगची विद्यार्थीनी असून शनिवारी तिच्या वाढदिवसानिमित्त तिने एका कॅफेमध्ये पार्टी ठेवली होती. त्या पार्टीसाठी तिने तिच्या नऊ मित्र मैत्रीणींना बोलावले होते. त्यातील […]
जगातील मातब्बर गोलंदाजांच्या यादीत मानाचे स्थान पटकावणाऱ्या ब्रेट लीचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा सन्मान केला आहे. ब्रेट लीने आपली कारकिर्द गाजवली आणि अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयी करण्यात खारीचा वाटा उचलला. त्याचे ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठीचे अमुल्य योगदान लक्षात घेऊन ब्रेट लीची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने Hall Of Fame साठी निवड केली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये एक दादा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या […]
वीस रुपयांवरुन वाद पेटला, नवऱ्याने बायकोचा गळा आवळून केली हत्या; नंतर केले भयंकर कृत्य
वीस रुपयांच्या क्षुल्लक वादातून संतप्त नवऱ्याने बायकोची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: देखिल ट्रेनसमोर जाऊन आत्महत्या केली. ही घटना पूर्व दिल्लीतील शाहदरा शहरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलवंत सिंग आणि महिंदर सिंग असे नवरा बायकोचे नाव आहे. दोघांमध्ये लहान मोठी भांडण व्हायची. बुधवारी अशाच क्षुल्लक कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. कुलवंतने महिंदरकडून 20 रूपये मागितले. […]
PHOTO –राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी रचला इतिहास, INS वाघशीरमधून केला प्रवास
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी INS वाघशीरमधून प्रवास केला आहे. असं करणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. याआधी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांनी INS वाघशीरमधून प्रवास केला होता.
उत्तराखंडमध्ये ढगफुटीत बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह सापडला
उत्तराखंडमधील हर्षिल गावात झालेल्या ढगफुटीनंतर बेपत्ता झालेल्या अग्नीवीर जवानाचा मृतदेह चार महिन्यांनी सापडला आहे. सचिन पोनिया (२३) असे त्या जवानाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील हाथरसचा होता. उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली येथे ऑगस्ट महिन्यात ढगफुटीझाली होती. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढय़ामुळे अख्खे गाव वाहून गेले. 10 जवानांसह 50 हून अधिक बेपत्ता […]
सावधान ! ईसिगारेटने महिलेची गेली दृष्टी, डॉक्टरांनी दिला इशारा
अलिकडे आपल्या दैनंदिन जीवनात ईसिगारेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. अनेकांच्या मते ईसिगारेट धु्म्रपानापेक्षा कमी धोकादायक आणि शरीरावा कमी नुकसान पोहोचवणारी आहे. त्याचा शरिरावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. मात्र तसे तुम्हालाही वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका महिलेने ईसिगारेटचा अतिवापर केल्याने तिच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे. नेत्रतज्ज्ञ मेघा कर्णवत यांनी इंस्टाग्रामवर […]
पोलार्ड तात्याची धडकी भरवणारी फलंदाजी, एकाच षटकात 30 धावा चोपून काढल्या; केली षटकारांची बरसात
मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का म्हणून कायरॉन पोलार्डने आपली कारकिर्द गाजवली. त्याच्या आक्रमक फलंदाजीपुढे विरोधी संघातल्या गोलंदाजांची नेहमीच तारांबळ उडायची. आता पुन्हा एकदा त्याने वयाच्या 38 व्या वर्षी आपल्या तडाखेबंद फलंदाजीची झलक दाखवून दिली आहे. ILT20 2025 मध्ये MI एमिरेट्स संघाकडून खेळताना त्याने गोलंदाजांना चोपून काढलं आहे. पोलार्डच्या झुंजार खेळीमुळे MI एमिरेट्सने दुबई कॅपिटल्सचा 8 विकेटने […]
एमआयएममध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांची अशोक चव्हाणांवर टीका
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना काँग्रेसची साथ सोडून दहा माजी नगरसेवकांनी एमआयएममध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर टिका करत ही अशोकरावांची चाल असून अशोकरावांना आता भाजप हिरवा करायचा आहे, या शब्दात त्यांच्यावर प्रखर टिका केली आहे. 2012 मध्ये एमआयएम पक्षाने 11 उमेदवार निवडून आणले होते. […]
बालाजी अमाईन्सकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नसंच भेट
तुळजापूर (प्रतिनिधी)- बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने सीएसआर उपक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील गरजू दहावीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नसंचांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार असून त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करणारा आहे. तामलवाडी येथील सरस्वती माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बालाजी अमाईन्सचे जनरल मॅनेजर श्री. शास्त्री व ऑफिस इन्चार्ज श्री. मारुती सावंत यांच्या हस्ते प्रश्नसंच वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी सराव परीक्षांमध्ये या प्रश्नसंचाचा वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी, असे मार्गदर्शन केले व कंपनीच्या संचालक मंडळाचे आभार मानले. या कार्यक्रमात पुढील ६ शाळांना अपेक्षित प्रश्नसंच भेट देण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अरळी बु. महात्मा गांधी विद्यालय, वडगाव काटी श्रीराम विद्यालय, धोत्री नरेन्द्र बोरगावकर विद्यालय, देवकरळी छत्रपती शिवाजी हायस्कूल, पिंपळा खुर्द कार्यक्रमास संस्थेचे संचालक बाळासाहेब जगताप, पत्रकार संतोष मगर, विठ्ठल नरवडे सर, बोबडे सर, डोंगेरे सर, स्वामी सर, शिणगारे सर, गुड्ड सर तसेच बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालाजी अमाईन्सची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा हा उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.
श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज घटस्थापनेने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. दुपारी 12 वाजता मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली आणि सात दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली. या प्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, उपाध्ये सुनीत पाठक, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमराराजे कदम, अनंत कोंडो, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रोच्चार, विधी आणि भक्तीभावाने संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता. श्री तुळजाभवानी देवींचे दरवर्षी दोन प्रमुख उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सव व पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र उत्सवाचा समावेश आहे. शाकंभरी नवरात्र उत्सवाला तुळजापुरात ‘धाकटा दसरा’ असेही म्हटले जाते. तत्पूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली श्री तुळजाभवानी देवींची मंचकी निद्रा संपवून आज पहाटे पौष शुक्ल अष्टमीच्या शुभमुहूर्तावर देवींची सिंहासनावर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सात दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता 3 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेला दुपारी 12 वाजता पूर्णाहुती व त्यानंतर घटोत्थापनाने होणार आहे. या नवरात्र काळात श्री तुळजाभवानी देवींची 29 डिसेंबर रोजी रथ अलंकार महापूजा, 30 डिसेंबर रोजी मुरली अलंकार महापूजा, 31 डिसेंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा तसेच, सकाळी 7 वाजता जलयात्रा, 1 जानेवारी रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा व 2 जानेवारी रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा संपन्न होणार आहे. तसेच शाकंभरी नवरात्र काळात दररोज रात्री श्री तुळजाभवानी देवींचा छबीना निघणार आहे. संपूर्ण तुळजापूर नगरी भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने भारावून गेली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज रविवार, पौष शुक्ल अष्टमीला धार्मिक उत्साह व भक्तिभावाच्या वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.
युवकांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम
धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 28 डिसेंबर 2025 रोजी अहमदिया मुस्लिम जमाअतची युवक शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया उस्मानाबाद यांच्या वतीने वकार-ए-अमल विभाग (श्रमाची प्रतिष्ठा) अंतर्गत शहरातील खिरणी मळारासोलपुरा परिसरात स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला. मोहम्मदिया मशिद ते अहमदिया मशिद रस्त्यादरम्यान असलेली जुनी नाली पूर्णतः खराब झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरत होते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अस्वच्छता व आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन अहमदिया मुस्लिम युवक संघाच्या युवकांनी पुढाकार घेत जुनी नाली साफ करण्यासोबतच नवीन नाली खोदण्याचे कामही केले, ज्यामुळे सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन परिसर स्वच्छ करण्यात आला. या श्रमप्रतिष्ठा उपक्रमात युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थी, अभियंते, शिक्षक, फार्मासिस्ट तसेच इतर विविध पेशांतील नागरिकांनी कोणताही संकोच न ठेवता स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून मानवसेवेचा आदर्श निर्माण केला. या उपक्रमाच्या माध्यमातून परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर नागरिकांची स्वतःचीही जबाबदारी आहे, असा महत्त्वाचा संदेश उपस्थित नागरिकांना देण्यात आला. या कार्यक्रमात ख़ुद्दाम-उल-अहमदिया जिल्हाध्यक्ष राग़ेब अलीम, शहराध्यक्ष नदीम अहमद, अहमदिया मुस्लिम जमाअत अध्यक्ष अब्दुस समद, चिटणीस (वक़ार-ए-अमल) आदिल अहमद तसेच अब्दुल अलीम,अब्दुल नईम, मामून अहमद, मुताहिर अहमद, सजील अहमद, तौसीफ अहमद, शफीक अहमद व इतर सदस्य सहभागी झाले होते.
Sangli Crime : तासगाव तालुक्यातील नेहरूनगर येथे घरफोडीमध्ये सोन्याचे दागिने लंपास
नेहरूनगरमध्ये सायंकाळी भीषण घरफोडी तासगाव : तासगाव तालुक्यातील नेहरूनगर येथे काडेपेटी पाहिजे अक्षा बहाणा करूण पराचा दरवाजा उपहताष परामध्ये पुसून एका महिलेत पक्काबुकी करुण, चाकुचा धाक दाबून जबरदस्तीने २ लाख ४ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. पाप्र करणी उषा प्रकाश [...]
आदर्श विद्यालयाच्या गणित साहित्य प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा (प्रतिनिधी)- येथील आदर्श विद्यालयात घेण्यात आलेल्या गणित साहित्य प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित 151 विविध गणितीय साहित्य सादर केली. या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, धाराशिव येथील डाएटचे प्राचार्य डॉ. दयानंद जेटनुरे,डॉ. बिराप्पा शिंदे, प्राचार्य धनराज खोंडे, मुख्याध्यापक व्यकंट घोडके, माजी मुख्याध्यापक कमलाकर भोसले, मुख्याध्यापक सुदेश माने, प्राचार्य शैफन शेख, प्राचार्य भीमाशंकर सारणे, वाघमारे, पर्यवेक्षक श्रीपाद कुलकर्णी, सह आदि मान्यवरांची उपस्थिती होती. या गणित साहित्य प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित 151 विविध गणितीय साहित्याचे सादरीकरण केले. या वेळी बोलताना विनायकराव पाटील म्हणाले कि- दर्जेदार व गुणक्तेचे शिक्षण सार्वत्रिक झाले पाहिजे. ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळवी यासाठी शालेय स्तरावर विविध प्रदर्शने भरविणे गरजेचे आहे. शैक्षणिक ज्ञानाचे कार्य सर्व सामान्या पर्यंत पोंहचविण्यासाठी कवठा येथील साईग्राम येथे गुरुकूल ते गुगल हा शिक्षकांचा कुंभमेळा भरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गणित हा विषय अभ्यासाचा नव्हे तर जगण्याचा आहे असे सांगताना अधिव्याख्याते डॉ. बिराप्पा शिंदे म्हणाले कि, जीवनाच्या प्रत्येक वाटेत गणित आपल्या सोबत असते. गणित हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गणिता मुळे समाज घडविण्याचे अप्रतिम कार्य केले जाते. आदर्श विद्यालयाने गुणक्तेचा मानबिंदू अखंडीत ठेवल्याचा आपल्याला मना पासून आनंद असल्याचे समाधान डाएटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनूरे यांनी व्यक्त केले. सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, गणित शिक्षिका पौर्णिमा दाहोत्रे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्राचार्य शैफन शेख यांनी केले. सुत्रसंचालन कला शिक्षक तात्याराव फडताळे यांनी केले. आभार प्रशांत सोमवंशी यांनी मानले. या प्रदर्शना साठी पालकांची मोठया संख्येनि उपस्थिती होती. गणित विभागातील पुजा राठोड, दयानंद उमाटे, ज्ञानेश्वर माणिकवार, विकास कांबळे सह आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ईस्माईल मुल्ला व वेदांत गुरव या विद्यार्थ्यानी सादर केलेले गणितीय पोष्टर लक्षवेधी ठरले. सफीया शेख, राजश्री शिंदे, सुभान पठाण, श्वेता दळवे, प्रजोत सगर, वर्षा शिंगारे, धनश्री स्वामी, श्रावणी स्वामी, राधा गवळी, हर्षदा कुलकर्णी, जोरावीन सास्तूरे प्रांजली स्वामी, सोविया शेख, उजेर शेख, महिरा काजी, प्रतिक शिंदे, अबुतली सय्यद, शाहिस्ता सय्यद, आदित्य चव्हाण, मयुरी झाकडे, श्रेयश ग्राम,अमित सुरवसे या इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणित साहित्यांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ निवड करण्यात आली.
उमरगा (प्रतिनिधी)- मानव जन्माला येतो तो कर्मभोगासाठी, संसार हा क्षणिक असून त्यात अडकून पडण्याऐवजी ईश्वर भक्तीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. देह हा काळाच्या अधीन आहे, तर धनसंपत्ती ही कुबेराची आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर मनुष्याचा कायमस्वरूपी अधिकार नाही. अशा परिस्थितीत केवळ देवाकडील शरणागतीच मानवाला तारू शकते, असे मत हभप गुरूराज महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले. तालुक्यातील मुळज येथील हनुमान मंदिरात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्या निमित्त शुक्रवारी, दि 26 डिसेंबर रोजी आयोजित किर्तन सेवेत गुरूराज महाराज देगलूरकर बोलत होते. यावेळी वेदमुर्ती अशोक जोशी, महेश इनामदार, माजी व्हाइस चेअरमन सतिश जाधव, भारत शिक्षण संस्थेचे संचालक दिगंबर बिराजदार, रघुनाथ मुळजे, उध्दव चव्हाण, विजय चव्हाण, माधव औरादे, देवीदास चव्हाण, संजय घोटणे आदी उपस्थित होते. “आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन हे कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे,” संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा आशय उलगडताना देगलूरकर म्हणाले की, मानवाला पंचमहाभूतापासून उसना देह मिळालेला आहे, त्याला परत करावा लागणारा आहे. मानव जन्म अनमोल असून देह काळाच्या अधीन आहे, तर संपत्ती क्षणभंगुर आहे, अशा परिस्थितीत मनुष्याने गर्व कशाचा करावा?” असा थेट सवाल करत त्यांनी देव सोडून ईतराला शरण जावू नका पांडुरंगाच्या शरणागतीतच जीवनाचे कल्याण आहे, असे सांगत त्यांनी भक्ती मार्गाचे महत्त्व पटवून दिले. किर्तनात विविध उदाहरणे, अभंगांच्या ओळी आणि संतवचनांच्या माध्यमातून आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करण्यात आले. शेवटी किर्तनात संसारातील मोह, माया, लोभ आणि अहंकार यापासून दूर राहून नामस्मरण, सदाचार आणि भक्तीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले. यांवेळी गाव व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतवाणीचे मर्म उलगडले! हभप देगलूरकर महाराज यांनी अभंगाच्या माध्यमातून तपाने देवाचं दर्शन होत नाही तर भजनाने दर्शन होते. नामस्मरणाला काळ, स्थळ, वेळेची मर्यादा नसतात, देवाचा धावा केला तर उशीर होईल पण संत आणि भक्तांचा धावा केला तर देव लवकर येतो, संतानी आत्मचिंतन, नामस्मरण आणि सदाचार याचा मार्ग दाखविला. असे सांगत त्यांनी संतवाणीचे मर्म सोप्या उदाहरणांतून उलगडले.

27 C