SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
...

माझ्यावर कोणताही दबाव नाही; इराणसोबतच्या शांतता चर्चेवर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामाची मुदत जवळ येत असतानाच दोन्ही देशांमधील शांततेचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेबाबत संभ्रम कायम असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रक्रियेवर भाष्य केले आहे. ‘जागरण’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणसोबतच्या शांतता चर्चेबाबत आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जुन्या करारावर टीका करताना म्हटले […]

सामना 21 Apr 2026 12:56 am

होर्मुजच्या सामुद्रधुनीत तणाव; हिंदुस्थानी नौदलाने जारी केली ॲडव्हायजरी, ७ युद्धनौका करण्यात आल्या तैनात

होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सकडून (IRGC) हिंदुस्थानी जहाजांवर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेनंतर हिंदुस्थानी नौदल पूर्णपणे अलर्ट मोडवर आले असून आखाती क्षेत्रात उपस्थित असलेल्या सर्व व्यापारी जहाजांसाठी नवी ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नौदलाने या भागात आपल्या ७ अत्याधुनिक युद्धनौका तैनात केल्या आहेत. […]

सामना 21 Apr 2026 12:23 am

अमेरिकेत करपरतावा करण्यास प्रारंभ

ऐतिहासिक आर्थिक घटना, कोणाला लाभदायक ? वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सत्तेवर आल्यानंतर लागू केलेल्या व्यापार शुल्क धोरणाच्या माध्यमातून संकलित केलेल्या करांच्या परताव्यास प्रारंभ करण्यात आला आहे. हे व्यापार शुल्क धोरण घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे, असा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च फेडरल न्यायालयाने दिला होता. त्यामुळे या निर्णयापर्रंत संकलित करण्यात आलेल्या करांची रक्कम परत देण्याची वेळ [...]

तरुण भारत 21 Apr 2026 12:22 am

इराणमध्ये आमचं काम अजून संपलेलं नाही, बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला शस्त्रसंधी २२ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक मोठे विधान केले असून, यामुळे पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. इराणमध्ये इस्रायलने आपले काम अजून पूर्ण केलेले नाही, असे नेतन्याहू यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. ‘आज तक’च्या वृत्तानुसार, जेरुसलेममध्ये […]

सामना 21 Apr 2026 12:03 am

सोलापूरमध्ये बनावट ऑनलाइन परीक्षा रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार अटकेत

मल्टीनॅशनल आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध सर्टिफाईड कोर्सेसच्या ऑनलाइन परीक्षा बोगस मार्गाने पास करून देणाऱ्या टोळीचा सोलापूर शहर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अशपाक हेव्जुरहिमान अत्तार (वय ४६) याला अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे १७ एप्रिल २०२६ रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजस्व नगर परिसरात […]

सामना 20 Apr 2026 11:49 pm

राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; तुषार दोषींसह वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

महाराष्ट्र शासनाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. सातारा, सांगली, गडचिरोली, कोल्हापूर आणि जळगाव यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांसह एकूण नऊ जिल्ह्यांमधील वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जिल्हा स्तरावरील प्रशासकीय रचनेत महत्त्वाचे बदल होणार असून, […]

सामना 20 Apr 2026 9:02 pm

आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले

पती-पत्नीचा भांडण विकोपाला जाऊन पत्नीने अखेर आपल्या दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. निकिता अमरदीप भूरे (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून तिच्यासोबत तिची दोन लहान मुले शिवानी आणि शिवांश यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे ही घटना घडली. रविवार संध्याकाळपासून निकीताचे तिच्या पतीसोबत वाद सुरू होते. […]

सामना 20 Apr 2026 8:40 pm

Latur News –पतीच्या अनैतिक संबंधाचा राग निष्पाप चिमुरड्याच्या जीवावर; चाकूरमधील हत्याकांडाचा छडा, चुलतीला अटक

लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरात 19 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या देवांश मंगेश स्वामी या लहान मुलाच्या खळबळजनक हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. आपल्या पतीच्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून, संबंधित महिलेला अडकवण्याच्या कुहेतूने चुलतीनेच देवांशचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिता दिनेश स्वामी (वय 34) हिच्या मुसक्या आवळल्या असून, […]

सामना 20 Apr 2026 8:29 pm

Ratnagiri News –खतांचा काळाबाजार केल्यास विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार; जिल्हा कृषी अधीक्षकांची इशारा

कीटकनाशक औषधे आणि कृषी बियाणे विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत जास्त दराने किंवा निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची विक्री करू नये. रासायनिक खत विक्रेत्यांनी कोणत्याही खतांची साठवणूक, काळाबाजार व जादा दराने विक्री करू नये. तसे केल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिला आहे. कृषी हंगामादरम्यान कोणतीही […]

सामना 20 Apr 2026 8:22 pm

Photo –खणाची साडी, कोल्हापूरी साज…मराठमोळ्या लूकमध्ये दिसल्या बॉलिवूडच्या वहिणी

अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा राजा शिवाजी हा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत.

सामना 20 Apr 2026 8:18 pm

Kolhapur News –जिल्हाधिकारी कार्यालयातील कोट्यवधींचे सभागृह गाळपाटले! पालकमंत्र्यांच्या बैठकीतच निकृष्ट कामाचे प्रदर्शन

जिल्हाधिकारी कार्यालयावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून साकारलेले आलिशान सभागृह अवघ्या सात-आठ महिन्यांतच निकृष्ट कामामुळे चर्चेत आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या कामाचे जाहीर वाभाडे निघाले. बैठकीदरम्यान चक्क छताला असलेल्या एसीमधून पाण्याच्या धारा बरसू लागल्या आणि माईक यंत्रणाही पूर्णपणे कोलमडली. आधुनिक आणि देखणे म्हणवल्या जाणाऱ्या या […]

सामना 20 Apr 2026 8:09 pm

फुलोर्‍यापासून फळापर्यंतचा प्रवास अडखळला, मराठवाड्यातील केशर आंबा उत्पादक संकटात

>> उदय जोशी मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी गेम चेंजर ठरणारा केशर आंबा यंदा दरवळण्यापूर्वी उद्धवस्त झाला. तब्बल दिड लाख हेक्टरवरील उभ्या असलेल्या केशर आंब्याच्या मोहराचे रूपांतर फळामध्ये झालेच नाही. उत्पादनामध्ये मोठी घट झाल्याने शेतकर्‍यांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. बदलत्या हवामानामुळे फळधारणा प्रक्रियाच झाली नाही. केवळ २० टक्के उत्पादन पदरात पडणार असल्याने हेक्टरी ८ ते […]

सामना 20 Apr 2026 8:06 pm

IPL 2026 – 21 कोटींचा फटका? 6 सामन्यांमध्ये फक्त 51 धावा, लखनऊ सुपर जायंट्स संकटात

IPL 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघ अजूनही पहिल्या गिअरवर अडकला आहे. हंगामातील 29 व्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सला पंजाब किंग्सकडून 54 धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे लखनऊचे चाहते निराश झाले आहेत. संघात दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे, मात्र या खेळाडूंना अजूनही लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. या बाबतीत सध्या निकोलस पुरनचं नाव आघाडीवर […]

सामना 20 Apr 2026 7:55 pm

IPL 2026 –नागपूर, पंजाब व्हाया MI! तरुण तडफदार पठ्ठ्यांची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वर्णी; मैदान गाजवण्यासाठी सज्ज

IPL 2026 मध्ये गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना खेळला जात आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. या सामन्यात मुंबईच्या ताफ्यात दोन युवा खेळाडूंचे पदार्पण झाले आहे. Danish Malewar and Krish Bhagat will play their maiden #TATAIPL match tonight! […]

सामना 20 Apr 2026 7:25 pm

अमेरिका ब्लेम गेम खेळत आहे, आता चर्चेचा कोणताही विचार नाही; इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वक्तव्य

इराणने अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची नवीन चर्चा करण्याची योजना नसल्याचे सोमवारी स्पष्ट केले आहे. टीव्ही९ भारतवर्षच्या वृत्तानुसार, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. दोन्ही देशांमधील संबंधांबाबत अनिश्चितता कायम असतानाच इराणने चर्चेची कोणतीही तयारी सुरू नसल्याचे सांगत अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिका चर्चेबाबत अजिबात गंभीर नसून ते सातत्याने सीजफायरचे […]

सामना 20 Apr 2026 6:52 pm

महिलांसाठी विविध शासकीय योजना- जिल्हाधिकारी पुजार

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तमाशा कला केंद्र बंद करण्यात आले असून, कला केंद्रातील महिलांसाठी शासनाच्या अनेक उपजिविकाच्या योजना आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली आहे. राज्यात धाराशिव जिल्हा अनेक शासकीय योजनेत प्रथम व द्वितीय आल्याबद्दल आणि उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांचा पत्रकारांच्यावतीने सोमवार दि. 20 एप्रिल रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी तमाशा कला केंद्र मुक्त जिल्हा करण्यासाठी मंत्री, राजकीय नेते व पत्रकारांनी मोठे सहकार्य केले आहे. कला केंद्रातील महिलांसाठी अनेक शासकीय योजना असल्याची माहिती त्या महिलांना देण्यात आली आहे. ऐवढेच नाहीतर प्रशासन शासकीय योजनेमधील विविध उद्योगासाठी बँकेचे लोन देण्याच्या प्रयत्न करत आहे. त्यामुळे तमाशा कला केंद्र बंद पडले म्हणजे आमचे उपजिविकेचे साधन गेले असे त्या महिलेने म्हणून नये. असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, संतोष जाधव, हुंकार बनसोडे, सज्जन यादव, अमजद सय्यद, प्रशांत कावरे, प्रमोद राऊत, गणेश जाधव, सचिन चंदनशिवे, सुभाष कदम आदी उपस्थित होते. भोगावती नदीकडे लक्ष देणार यावेळी पत्रकारांनी दरवर्षी भोगावती नदीतील कचरा, गाळा काढण्याच्या नावाने नगर परिषद मोठ्या प्रमाणात खर्च करते. परंतु दरवर्षी भोगावती नदीची परिस्थिती जैसे तेच राहत आहे. कारण शहरातील नाल्याचे पाणी भोगावती नदीमध्ये जात असल्यामुळे नदीच्या पात्रात अस्वच्छता असते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जो डीपीआर तयार केला होता त्या डीपीआरची अंमलबजावणी केल्यास भोगावती नदी पात्र स्वच्छ राहिल. त्यामुळे शहराच्या सौदर्यात भर पडेल असेही पत्रकारांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी पुजार यांनी सदर डीपीआरची माहिती घेवून काम करू, त्याप्रमाणे त्या भागात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सामाजिक संस्थेने पुढाकार घ्यावा, असेही सांगितले.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 6:48 pm

LIVE –खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद, पहा थेट प्रक्षेपण

सामना 20 Apr 2026 6:40 pm

Latur News –अवैध दारू विक्री व हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक 19 एप्रिल 20269 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने लातूर ग्रामीण हद्दीत दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू साठा जप्त केला आहे. मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात पहिली कारवाई करण्यात आली. यामध्ये […]

सामना 20 Apr 2026 6:39 pm

शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाबाबत आमची दृष्टी एक सारखीच, अरविंद केजरीवाल यांनी घेतली एम.के. स्टॅलिन यांची भेट

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप अध्यक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान केजरीवाल यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील तामिळनाडू सरकारच्या कामाचे कौतुक केले. केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले की, “तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेणे हा माझ्यासाठी […]

सामना 20 Apr 2026 6:31 pm

एनसीएमसी कार्ड नसले तरी एसटी सवलती सुरूच; अफवांपासून दूर राहा

धाराशिव (प्रतिनिधी)- सध्या एसटी बसस्थानकांमध्ये एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना,नागरिकांमध्ये विविध अफवा पसरवल्या जात असल्याचे समोर आले आहे.विशेषतः एनसीएमसी कार्ड नसल्यास एसटीच्या विविध सवलती बंद होतील किंवा प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळणार नाही,अशी चुकीची माहिती प्रसारित होत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र,या सर्व अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे. विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी सांगितले की, एनसीएमसी कार्ड सध्या अनिवार्य नसून,कार्ड नसले तरीही प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सर्व सवलती मिळत राहणार आहेत. त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये,असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांकडे वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे.आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यांसारख्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना,ज्येष्ठ नागरिक सवलत,महिला सन्मान योजना यांसह इतर योजनांचा लाभ मिळत राहील,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एनसीएमसी कार्ड काढण्याची प्रक्रिया ही प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली असून, भविष्यात डिजिटल व्यवहार अधिक सुलभ व्हावेत,बस प्रवास अधिक सुसूत्र व्हावा आणि एकाच कार्डवर विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा या उपक्रमामागील उद्देश आहे.मात्र, यामुळे सध्या सुरू असलेल्या सवलती बंद होतील,असा कोणताही अर्थ नाही,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि स्थानिक स्तरावर पसरत असलेल्या चुकीच्या संदेशांमुळे अनेक नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर धाराशिव विभागीय कार्यालयाने अधिकृत स्पष्टीकरण देत अफवांवर विश्वास ठेवू नका आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या,असे स्पष्ट केले आहे. दरम्यान,जिल्ह्यात सध्या 117 नोंदणीकृत केंद्रे कार्यरत असून नागरिकांना येथे एनसीएमसी नोंदणी करता येत आहे.ही प्रक्रिया तत्काळ बंद होणार नसून,सर्व पात्र नागरिकांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत केंद्रे सुरू राहणार आहेत.त्यामुळे कोणत्याही एका केंद्रावर गर्दी करून गोंधळ निर्माण करू नये,असे प्रशासनाने सांगितले आहे.आगामी काळात केंद्रांची संख्या वाढविण्याचा विचारही सुरू असून नागरिकांनी संयम बाळगावा,असे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाकडून ही सेवा शेवटच्या घटकातील प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग तसेच विविध योजनांचे लाभार्थी यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच,नोंदणी करताना केवळ निश्चित शुल्कच भरावे आणि कोणालाही अतिरिक्त रक्कम देऊ नये.कोणी अतिरिक्त पैसे मागितल्यास तात्काळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,धाराशिव विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही माहिती मिळाल्यास तिची खातरजमा करूनच विश्वास ठेवावा. अफवांमुळे निर्माण होणारा संभ्रम टाळण्यासाठी अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा.एनसीएमसी कार्ड नसले तरी एसटीच्या सर्व सवलती पूर्ववत सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी निश्चिंत राहावे,असे विभाग नियंत्रक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 6:29 pm

आई भवानीच्या नावानं चांगभलं, रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि मुख्य भूमिकेची धुरा सांभाळली असून ट्रेलरमधील दमदार संवाद आणि दृश्यांनी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले आहेत. स्वराज्याच्या स्थापनेसाठी लागणारा विद्रोह आणि महाराजांचा जाज्वल्य इतिहास या ट्रेलरमध्ये प्रभावीपणे […]

सामना 20 Apr 2026 6:11 pm

Koyna Wildlife Sanctuary |कोयना अभयारण्यात ‘बहाव्या’चा लखलखाट; पिवळ्याधमक फुलांनी निसर्गप्रेमींना घातली भुरळ

कोयना अभयारण्यात बहाव्याच्या फुलांनी नटले निसर्गसौंदर्य कोयनानगर :कोयना अभयारण्यातील कोयना परिसर विविधतेने नटलेला आहे. सध्या कोयना परिसर अनेक वनस्पतींना आलेल्या फुलोऱ्यामुळे पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यातीलच एक असणारी बहावा ही वनस्पती आकर्षक फुलांनी बहरली असून ती फुले पर्यटकांना व निसर्गप्रेमींना वाढत्या तापमानतही आकर्षित [...]

तरुण भारत 20 Apr 2026 5:55 pm

नगरसेवकांच्या प्रभागात पहिला जनता दरबार- नगरसेवक अनिल शेंडगे

भुम (प्रतिनिधी)- शिव बसवेश्वर जयंती निमित माझा प्रभाग - माझी जबाबदारी हे ब्रीद वाक्य घेऊन नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवकांनी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबार घेतला. समस्या जाणून घेतल्या त्या अल्पावधीत निराकरण करणार असल्याचा विश्वास बांधकाम सभापती नगरसेवक अनिल शेंडगे यांनी दिला . रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी शिव बसवेश्वर जयंती सर्वत्र साजरी झाली . या निमित्ताने भूम नगर पालिकेचे जनशक्ती नगर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवक बांधकाम सभापती अनिल नामदेव शेंडगे व नुरजहा महमद ईसाक मणियार यांच्या पुढाकाराने शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच माझा प्रभाग - माझी जबाबदारी हे ब्रीद वाक्य घेऊन पहिला जनता दरबार घेतला, या दरबारामध्ये नागरिकांनी अक्षरशः पाऊस पडल्यासारख्या समस्या लेखी स्वरुपात सादर केल्या, प्रत्येक तक्रारीला अनुसरून त्या अल्पावधीतच मार्गी लागतील असा विश्वास दोन्ही नगरसेवकांनी सर्वांच्या समक्ष मतदारांना दिला . याच दरम्यान नगरसेवक शेंडगे यांनी विरोधकावर आरोप प्रत्यारोपाचा भडीमार करताना विरोधकांनी त्यांच्या काळात वेगवेगळ्या कामासाठी गुत्तेदार पोसण्याची फक्त भूमिका घेतली, समस्या सोडवण्याच्या नावाने ठणठणाट आहे, म्हणूनच आज समस्या उघडपणे मतदार मांडत आहेत, दहा दहा लाख शौचालयावर खर्च केल्याच दाखवल प्रत्यक्षात स्वच्छता नाही, माहिती मागितली तर देत नसल्याचा आरोप केला . यावेळी नागरिकांनी सकाळच्या दरम्यानची घंटागाडी, नाली स्वच्छता, अंडरग्राउंड नाली, अडचणीच्या झाडांच्या फांद्या, कॉक्रीट रस्ता, भाजीपाला विक्रीचा प्रश्न, शौचालय, टॉयलेट स्वच्छता, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, आठवडी बाजारात उघड्यावर शौचास बसतात , दुर्गधी होते , व्यापारी बांधवांना त्रास होत आहे . खेळाचे मैदान. ठिक ठिकाणचे धोकादायक पेवर ब्लॉक रस्ते, ठिकठिकाणी प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, घरकुल प्रश्न, बंद पडलेल्या पोलवरील लाईट अशा अनेक प्रश्नांचा भडीमार नागरिकांनी केलेला दिसून आला . दरम्यान प्रत्येक नागरिकांची समस्या जाणून घेतल्या . याशिवाय जनतेच्या विकासात्मक प्रश्ना संदर्भात घेतलेल्या ठरावाच्या ही अनुषंगाने पुढील जनता दरबारामध्ये या सर्व समस्या मार्गी लागलेल्या दिसतील असा ठामपणे विश्वास सर्वाना दिला, यावेळी नागरिकांनी पहिल्यांदाच जनता दरबार घेतल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्तही केले, यावेळी महिलांची देखील मोठी उपस्थिती दिसून आली . पहिल्या जनता दरबारामध्ये नगरसेवक यशवंतराजे थोरात, अनिस शेंडगे, नूरजहा मनियार विठ्ठल बागडे, चंद्रमणी गायकवाड, रूपेश शेंडगे, तसेच दिलीप शाळू महाराज, केशव दाते , इसाक बागवान, नामदेव शेंडगे, शंकर खामकर आधीही उपस्थिती होती .

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:41 pm

शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन उत्साहात पार

भुम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव (पा), ता. भूम, जि. धाराशिव येथे शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन उत्साहात पार पडले. या वेळी पालक, ग्रामस्थ तसेच शिक्षकवर्ग यांची लक्षणीय उपस्थिती होती. नवीन समितीच्या अध्यक्षपदी श्री. आण्णा मारोती महानवर यांची तर उपाध्यक्षा म्हणून श्रीमती सोनाली समाधान यादव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी समितीतील इतर सदस्यांची निवड ही एकमताने करण्यात आली. बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत, शाळेतील भौतिक सुविधा, स्वच्छता, पोषण आहार, तसेच उपस्थिती वाढविणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच निपुण भारत अभियान, डिजिटल शिक्षणाचा वापर, ग्रंथालय विकास, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम यांना चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शाळेशी सतत संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.मुख्याध्यापक व शिक्षकांनी नवीन समितीचे स्वागत करून शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली. ग्रामस्थांनीही नव्या समितीकडून शाळेच्या उन्नतीसाठी प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला.बैठकीस शिवहारी महानवर, मधुकर महानवर, मारुती महानवर, शिवदास लोकरे, कोंडीबा कांबळे, अर्जुन महानवर, महावीर यादव, प्रकाश यादव, प्रकाश महानवर, नितीन महानवर, यादव समाधान, राहुल महानवर,काजल महानवर, स्वाती महानवर, रोहिणी हाळनोर, जोत्स्ना लोकरे, उषा कांबळे, शीतल महानवर, मोहिनी यादव, ज्योती महानवर, मंजुषा शिंदे, प्रियंका उबाळे, सीता महानवर, पूजा कांबळे, नभा महानवर, सोनाली यादव, बाळासाहेब खरात, प्रियंका खरात, सतीश कांबळे, आरुणा कांबळे, शरद खरात, पल्लवी महानवर, मनिषा यादव इत्यादी माता पालक व पिता पालक उपस्थित होते.बैठकीचे संयोजन मुख्याध्यापक श्री. पोतरे माधव सर यांनी केले व आभार प्रदर्शन सहशिक्षिका श्रीम. पोतरे मॅडम यांनी केले.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:40 pm

धाराशिवमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त भव्य मिरवणूक; परंपरेचा सन्मान राखत नवा पायंडा

धाराशिव (प्रतिनिधी)- जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव जंगम मठ ट्रस्ट, धाराशिव यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आपल्या परंपरांचा सन्मान राखत, पारंपरिक पद्धतींचे अनुकरण करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बसवेश्वर महाराज चौक व वीरशैव जंगम मठ ट्रस्ट येथे महाराजांच्या मूर्तीचे पूजन डॉ. अनंत राजमणे, श्री. सोमेश्वर पाळणे, श्री. उमेश जोशी तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी मठामध्ये सर्व भगिनी व बांधवांच्या हस्ते आरती करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक मार्ग : वीरशैव जंगम मठ, नेहरू चौक, काळा मारुती चौक, यमाई मंदिर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इच्छापूर्ती महारुद्र हनुमान चौक, समता नगर, आनंद नगर, रामनगर, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज चौक (समारोप). मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मोठ्या उत्साहात पार पडली. तुतारीच्या गजरात तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवक-युवतींमुळे वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी झाले. लहानांपासून थोरांपर्यंत सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मिरवणूक दिमाखदार ठरली. महिला सहभाग स्नेहल पाळणे, पद्मावती चपणे, सुलेशा चपणे, अनुराधा तोडकरी, अंजली चपणे, आशा पाटील, तनया पाळणे, त्रिशा पाळणे, रुद्रा पाळणे, चित्रा पाळणे, अर्पिता पाळणे, सोनी पाळणे, अनिता गुळवे, वैष्णवी गुळवे, शिवगंगा गुळवे, जयश्री झाडे, संजीवनी ढोले, कांचन ढोले, कीर्ती ढोले, ईश्वरी पाळणे, सुनंदा पाळणे पुरुष सहभाग सोमेश्वर पाळणे, संजय वैजनाथ गुळवे, संजय पाळणे, राजाभाऊ दिवटे, रमेश ढोले, महेश ढोले, महेश मैरान, नागपूरे अण्णा, गोपाळ केसकर, सोमनाथ बेलूरे, भाऊसाहेब बेलूरे, उमेश जोशी, बसवेश्वर पाळणे, अनिल मैरान, अजित शिंगणापूरे, श्रीकांत साखरे, अर्जुन साखरे, शिरीश गिरवलकर, मल्लिकार्जुन आपचे, समाधान भोरे, अजय शेटे, सुनील शेरखाने, सुहास तानवडे, अशोक पाळणे, रवी कोरे, राजाभाऊ माळी, ज्ञानेश्वर जावळे, चेतन माशाळकर, सुशील पाळणे, विशाल साखरे, संदीप पाळणे, गाजरे सर, कल्पेश गाढवे, आरुष गाढवे, पांडुरंग भोकरे, प्रथमेश पाळणे बसवेश्वर महाराज चौक येथे रात्री 9 वाजता सर्वांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजातील एकता, समता व बंधुभाव यांचा संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्री. गिरीश महाबळेश्वर पाळणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच उपाध्यक्ष ॲड. शिवयोगी विश्वेश्वर चपणे, श्री. अक्षय अशोक पाळणे व श्री. प्रथमेश राजेश्वर पाळणे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. सर्व समाजबांधवांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. तसेच संबंधित शाखा अभियंता व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनियमिततेशी संबंधित रकमेची वसुली करून ती शासन तिजोरीत जमा करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिराढोण ग्रामपंचायत प्रशासनात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, स्थानिक पातळीवर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:40 pm

Kolhapur news –जुन्या घराची भिंत पाडताना आक्रीत घडलं, प्राध्यापिका आणि सहावीतील विद्यार्थीनी ठार

आजरा येथील वाणी गल्ली परिसरात एका जुन्या घराची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. डॉ. देशपांडे यांच्या जुन्या घराची दक्षिणेकडील रस्त्यालगतची भिंत अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाले आहे. वैष्णवी तुकाराम भोसले (14) आणि प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार (45) असे मृत मुलगी आणि महिलेचे नाव […]

सामना 20 Apr 2026 5:36 pm

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधी गैरवापर केल्यामुळे शिराढोणच्या सरपंच अपात्र

कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायतीतील सरपंचांविरुद्ध दाखल प्रकरणात विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी निर्णय देत सरपंचांना पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र ठरविण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अर्जदार अमित कुमुदराव माकोडे यांनी सरपंच श्रीमती लक्ष्मी दिलीप म्हेत्रे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, 15 वा वित्त आयोग अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचे तसेच काम अपूर्ण असतानाही देयक अदा केल्याचे नमूद करण्यात आले होते. सदर प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या स्तरावर करण्यात आली. चौकशी अहवालात पाणीपुरवठा योजनेतील काही कामे पूर्ण न होता देयके अदा केल्याचे आणि निधीच्या वापरात नियमांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. यावरून सरपंचांनी कर्तव्यात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला. अर्जदाराच्या वतीने ॲड. अमोल माकोडे यांनी बाजू मांडली, तर प्रतिवादी सरपंच श्रीमती म्हेत्रे यांच्या वतीने ॲड. एच. पी. जाधव यांनी युक्तिवाद केला. विभागीय आयुक्तांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर सरपंचांना पदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:35 pm

पुतण्याचा खुन, जमिनीचा वाद, काकाच ठरला वैरी

धाराशिव (प्रतिनिधी)- जमिनीच्या वादातुन काकाने पुतण्याचा खुन केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे घडली आहे. चुलत्यानेच पुतण्याचा चाकूने भोसकून खून केला. सुजित शेळके असे मृत पुतण्याचे नाव असुन तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. विलास शिवाजी शेळके हा आपल्या आई-वडिलांशी जमिनीच्या वादावरून वाद घालत त्यांना मारहाण करत होते. ही बाब पाहून त्याचा पुतण्या सुजित ज्ञानेश्वर शेळके हा आजी-आजोबांना वाचवण्यासाठी मध्ये पडला. यावेळी तुला जमीन देणार नाही, तू जास्त माजलास अशी धमकी देत विलास शेळके यांनी सुजितवर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुजितचा जागीच मृत्यू झाला. मृताची आई मनीषा शेळके यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात आरोपी विलास शेळके याच्याविरुद्ध गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घडलेल्या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक धरणीधर कोळेकर व पोलिस उपनिरीक्षक चोपणे करत आहेत.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:35 pm

विदर्भात पारा 45 अंशावर…चंद्रपूरसह संपूर्ण पट्ट्यात उन्हाच्या तीव्र झळा, जिल्हा प्रशासनाकडून ‘ही’खबरदारी घेण्याचे आवाहन

विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने विशेष नियमावली जाहीर केली असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात होण्याची […]

सामना 20 Apr 2026 5:34 pm

15 कृषि सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; 1 परवाना कायमस्वरूपी रद्द, 14 निलंबित

धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने जिल्हाभरातील कृषि सेवा केंद्रांवर विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान विविध अनियमितता आढळून आल्याने एकूण 15 कृषि सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी एका केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे, तर 14 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषि विभागाच्या पथकांनी केलेल्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. ई-पॉस मशीनवरील नोंदीप्रमाणे खताचा साठा न जुळणे, परवान्यात नमूद नसलेल्या स्त्रोतांमधून बियाणे व खतांची खरेदी-विक्री करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, शेतकऱ्यांना नियमानुसार पावती न देणे, खरेदीची बिले उपलब्ध नसणे, तसेच अनुदानित खत विक्रीसंबंधित अभिलेख अपूर्ण ठेवणे अशा प्रकारच्या अनियमितता आढळल्या. तालुकानिहाय पाहता धाराशिव व तुळजापूर येथील प्रत्येकी 1, उमरगा येथील 4, भूम येथील 3, परंडा येथील 2, कळंब येथील 2 आणि वाशी तालुक्यातील 2 अशा एकूण 15 केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कृषि विभागाने स्पष्ट केले आहे की, ही तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार असून दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर बियाणे, खते व कीटकनाशके संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जादा दराने विक्री, लिंकिंग, साठा रजिस्टर न ठेवणे, दरफलक न लावणे, अनधिकृत स्त्रोतांमधून खरेदी-विक्री, पावती न देणे किंवा परवान्यात नमूद नसलेल्या गोदामाचा वापर आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कृषि विभागाने शेतकऱ्यांना देखील महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक केंद्राची निवड करावी आणि प्रत्येक खरेदीवर पक्की पावती घ्यावी. पावतीवर खरेदी केलेल्या वस्तूंचा तपशील व विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. अनुदानित खत घेताना ई-पॉस मशीनवरील बिल घेणे बंधनकारक असून खताच्या बॅगवरील किंमत आणि बिल यांची पडताळणी करावी. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्यावरील टॅग, पिशवी व थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करून अंतिम मुदत तपासावी आणि नामांकित कंपन्यांचीच उत्पादने खरेदी करावीत, असेही कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:34 pm

वर्षा बंगला, मलबारहिल येथेही लोडशेडींग करण्याची शिवसेनेची मागणी

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली शहरी व ग्रामीण भागातील लोड शेडींग बंद करुन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने कमीत कमी 8 तास विज पुरवठा करणेची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. महावितरण कंपनीस लोडशेडींग करायची असेल तर मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला, मलबारहील येथे लोडशेडींग करावी अशी मागणी करत पक्षावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. धाराशिव जिल्हयामध्ये मागील वर्षी मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक उन्हाळी पिकांची लागवड केलेली आहे. परंतु विजेअभावी त्यांची पिके वाळुन जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसानही होत आहे. शेतकऱ्यांना 8 तास सुरुळीत वीज मिळत नाही व जो वीज पुरवठा करण्यात येतो तोही कमी दाबाने पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोटारी नादुरुस्त होणे, वारंवार ट्रान्सफार्मर जळणे अशा गोष्टी घडत आहेत. तर जनावरांना पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परिक्षेचे दिवस असल्यामुळे व रात्री सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासापासुन वंचित रहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.तसेच काही गावांमध्ये संध्याकाळी शेतातील सिंगल फेज वीज पुरवठा 6-10 या काळा मध्ये बंद असतो, बऱ्याच गावामध्ये शेतकरी शेतामध्ये वास्तव्यास असल्यामुळे व शेतात जनावराचे गोठे असल्याने त्यांना या वेळेत वीज नसल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी शहर प्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना जिल्हाप्रमुख रवि वाघमारे, जगदीश पाटील, प्रदिप घोणे, विठ्ठल सातपुते, राजदिप गायकवाड, आदित्य पवार, शौकत शेख, ज्ञानदेव करवर, पंकज पाटील, अमित उंबरे, राणा बनसोडे, संभाजी सलगर, सिध्देश्वर कोळी, राकेश सुर्यवंशी, अभिजीत कदम, कृष्णा मुंडे, सुनिल वाघ, लखन देशमुख, जगदिश शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:33 pm

विद्यार्थ्यांनी बहुभाषिक व्हावे- संजय मिस्किन

भूम (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषे बरोबरच जर्मन, जापनीज, फ्रेंच इत्यादी भाषेवर प्रभुत्व मिळवावे व जगातील विविध क्षेत्रात यश मिळवावे. असे मत पत्रकार संजय मिस्कीन यांनी व्यक्त केले. भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधारेवस्ती येथे सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी कर्मवीर परिवार आयोजित “गौरव सोहळा“ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन वेळी ते बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी तालुका कृषी अधिकारी किशोर अंधारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून परंडा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश कुकडे, शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ टकले हे होते. यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी सोमनाथ टकले व नूतन केंद्रप्रमुख संदीप मोरे, गणेश महाराज अंधारे, किशोर अंधारे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तोडकरी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राहुल अंधारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दत्तात्रय घोडके यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी भालचंद्र पाटील, प्रवीण अंधारे, ज्ञानेश्वर कातुरे, अशोक बनसोडे, दत्तात्रय गुंजाळ, रत्नदीप अंधारे, अमोल चोपडे, अलका तांबे, मंजुषा सुरवसे, प्रमिला जावळे, विद्या वैद्य आदी कर्मवीर परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेतला. यावेळी संदीप मोरे, विशाल अंधारे, आरोही सांगडे, अनया अंधारे, प्रशांत क्षीरसागर, साधना अंधारे, पूजा विशाल ढगे, परसू गवारे, मनोज अंधारे, सुदाम पाटील, विशाल बापू ढगे यांचा सन्मान करण्यात आला.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:32 pm

“ना पाऊस, ना वारा तरीही अंधारच!” कळंबमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिकांचा संताप शिगेला

कळंब (प्रतिनिधी)- “ना पाऊस, ना वादळ तरीही वीज गायब!” असा संतप्त सवाल करत कळंब शहर व परिसरातील नागरिकांनी वीज वितरण व्यवस्थेवर तीव्र रोष व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग दर दोन तासांनी वीज पुरवठा खंडित होत असून, प्रत्येकवेळी दोन-दोन तास अंधाराचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेत भर पडत असताना होणाऱ्या या लोडशेडिंगमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. विशेषतः रुग्णालयातील रुग्ण, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. “गरमीने हैराण आणि वर वीज गायब” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शंभर टक्के वसुली, पण सेवा कुठे? नागरिकांकडून वीज बिलाची शंभर टक्के वसुली होत असताना अशा प्रकारे वारंवार वीज खंडित होणे म्हणजे “शहाण्याला बुक्क्याचा मार” असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नियमित पैसे भरूनही सेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. प्रशासन झोपेत? नागरिकांचा सवाल वीज वितरण यंत्रणा नेमकी कोणत्या कारणामुळे ठप्प होत आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. “ना पावसाचा अडथळा, ना तांत्रिक कारणांची माहिती मग वीज जाते कुठे?” असा थेट सवाल प्रशासनाला विचारला जात आहे. तात्काळ उपाययोजनांची मागणी या गंभीर परिस्थितीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या या वीज खंडितीमुळे कळंबकरांचा संयम संपत चालला असून, “आता तरी प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:32 pm

स्मार्ट कार्ड बस स्थानकात काढण्याची मागणी; कळंब शहरात प्रवाशांची लूट?

कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील एसटी बस स्थानकात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी अधिकृत सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने तात्काळ अधिकृत एजन्सीची नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. सध्या बस स्थानकाबाहेर काही एजंटांकडून स्मार्ट कार्डासाठी तब्बल 300 रुपये वसूल केले जात असल्याची तक्रार समोर येत आहे. ही वसुली अधिकृत नसल्याने प्रवाशांची उघडपणे आर्थिक लूट होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याकडे राज्य परिवहन महामंडळाने तात्काळ लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, “जर कोणी जास्त पैसे घेत असल्याचे आढळले, तर संबंधितांविरोधात थेट कळंब एसटी आगार प्रमुखांकडे तक्रार करावी. दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल,” असे आश्वासन आगार प्रमुख विजयकुमार घोलप दिले आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिक, अमृत योजनेतील लाभार्थी तसेच दिव्यांग प्रवाशांची यामुळे मोठी हेळसांड होत आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी त्यांना बाहेर फिरावे लागत असून आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कळंब बस स्थानकातच अधिकृतपणे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी स्वतंत्र काउंटर व कर्मचारी नेमण्यात यावा, अशी ठाम मागणी आता प्रवासी वर्गातून जोर धरत आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रमुख मागण्या कळंब बस स्थानकात स्मार्ट कार्डसाठी अधिकृत एजन्सी नेमावी, प्रवाशांकडून होत असलेली अवैध वसुली तात्काळ थांबवावी,ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करावी, दोषी एजंटांवर कडक कारवाई करावी. स्मार्ट कार्ड नसले तरीही सवलत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ! स्मार्ट कार्ड नसल्यास प्रवाशांना सवलत मिळणार नाही, अशी अफवा पसरत असताना कळंब आगार प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडत नागरिकांना दिलासा दिला आहे. स्मार्ट कार्ड नसले तरी पात्र लाभार्थ्यांना सवलतीचा प्रवास सुरूच राहणार असल्याचे आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांनी स्पष्ट केले आहे. राज्य परिवहन महामंडळामार्फत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच 75 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. या योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू असली, तरी अनेक प्रवाशांकडे अद्याप स्मार्ट कार्ड उपलब्ध नाही. याच पार्श्वभूमीवर “स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही” अशी चुकीची समजूत काही ठिकाणी पसरली आहे. मात्र, आगार प्रमुखांनी ही अफवा फेटाळून लावत स्पष्ट केले की, ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड उपलब्ध नाही, अशा पात्र लाभार्थ्यांनाही नियमानुसार सवलतीचा लाभ दिला जात आहे आणि पुढेही दिला जाणार आहे. सवलतीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत असून प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पात्र प्रवाशांनी लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असेही आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:31 pm

ना सभापती, ना अधिकारी कळंब पंचायत समिती ‌‘बेवारस‌’!

कळंब (प्रतिनिधी)- तब्बल 92 गावांचा कारभार सांभाळणारी कळंब पंचायत समिती आज अक्षरशः ‌‘देवाच्या भरोशावर‌’ चालत असल्याचे चित्र समोर आले आहे. ना सभापती, ना गटविकास अधिकारी, ना आरोग्य अधिकारी आणि सर्वात धक्कादायक म्हणजे अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची कोणतीही सक्षम व्यवस्था नाहीअशी दयनीय अवस्था सध्या येथे निर्माण झाली आहे. एकीकडे ग्रामीण भागातील नागरिक विविध कामांसाठी पंचायत समितीकडे धाव घेतात; मात्र संबंधित अधिकारी वेळेवर उपलब्धच नसल्याने त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. कोणी अधिकारी अपडाऊन करतो, तर कोणी भाड्याच्या घरात राहत असल्याने कार्यालयीन वेळेत त्यांची उपस्थिती अनियमित असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. विशेष म्हणजे, 2009 पूर्वी पंचायत समितीच्या आवारात सभापती, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने (क्वार्टर) उपलब्ध होती. मात्र, प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे ही निवासस्थाने आज पूर्णपणे निस्तनाबूत झाली आहेत. काही इमारती पडीक अवस्थेत आहेत, तर काहींचे अक्षरशः उकिरडे झालेले दिसून येते. यामुळे मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. या दुर्दशेला जबाबदार कोण? नागरिकांना आपले काम करायचे असल्यास नेमका अधिकारी कुठे मिळणार, हा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. “कार्यालय आहे, पण अधिकारी नाहीत; आणि अधिकारी आहेत, पण सापडत नाहीत,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून निवासस्थानांची दुरुस्ती करावी, अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी आणि पंचायत समितीचा कारभार सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:31 pm

salt intake health |सावधान! जेवणातील जादा मीठ ठरतंय ‘सायलेंट किलर’; जाणून घ्या आरोग्यावरील परिणाम

वाढते मीठ सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे उमरगा – मीठ खाण्यापिण्यातील महत्त्वाचा घटक आहे. मीठाविना अन्न म्हणजे बेचव, याचा बहुतांश पदार्थांमध्ये सर्रासपणे वापरले जाते. मीठ शरीरासाठी आवश्यक घटक आहे. पूर्वी हेच मीठ खड्याचे असायचे. त्यात बदल होत त्याची जागा आयोडिनयुक्त सोडियम पावडर मिठाने घेतली, [...]

तरुण भारत 20 Apr 2026 5:31 pm

धार्मिक तिर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये शांतता लाभणार का ?

तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिर नगरीत गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हाणामाऱ्या, चोरी, गुंडगिर, गोळीबार तसेच भाविकांवरील मारहाणीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूरमध्ये शांतता लाभणार का ? असा प्रश्न जेष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. गेल्या मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उदय हॉटेल परिसरात जुन्या वादातून दोन तरुणांनी मिळून एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात आनंद चांगदेव जानराव (रा. बोरी) गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचवण्यासाठी धावून आलेले त्याचे चुलत भाऊ साहिल व महेश जानराव हेही जखमी झाले आहेत. तिघांवर सध्या उपचार सुरू असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरात अवैध धंदे सट्टा, पत्याचे क्लब, चकऱ्यासह धंद्यात वाढ झाली आहे. शहराच्या मुख्य भागावर काही भागात उघडपणे टपऱ्यांवर मटका घेतला जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे भाविक व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. प्रत्यक्ष पातळीवर गुन्हेगारीवर नियंत्रण दिसून येत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरात कडक पोलीस बंदोबस्त वाढवावा, अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी, नियमित गस्त व नाकाबंदी वाढवावी, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करावी. अशी मागणी शहरवासीयातून होत आहे. एकूणच, तुळजापूरसारख्या धार्मिक व पर्यटनस्थळी वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब ठरत असून, नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी पोलीस व प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:31 pm

परशुराम जयंती उत्साहात साजरी

भूम (प्रतिनिधी)- कसबा येथील श्रीराम मंदीरात श्री परशुराम जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत ह. भ. प. भालचंद्र देव बीड यांचे नारदिय किर्तन पार पडले. यानंतर श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पवृष्टी करण्यात आली. या नंतर महाआरती होवुन प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ब्राम्हण समाजातील जेष्ठ नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यासाठी भूम तालुका ब्राम्हण संघटना पदाधिकारी व समाज बांधवांनी विषेश परिश्रम घेतले.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:30 pm

मुख्य बाजारपेठेत चौंडेश्वरी मंडळाकडून पाणपोई सुरू

भूम (प्रतिनिधी)- उष्णतेचा वाढता पारा विचारात घेता मुख्य बाजारपेठेत बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी व्यापारी बांधव आणि कोष्टी समाज ट्रस्ट बांधवांच्यावतीने मुख्य मेनरोड येथे पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पानपोईचे उद्घाटन देखील जेष्ठ समाज बांधवांच्या हस्तेच करण्यात आले. रविवार दिनांक 20 एप्रिल 2026 अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पानपोईचे उद्घाटन करण्यात आले, पाणी पोईसाठी मोठाल्या रांजणातून पाणी नैसर्गिक रित्या थंड व्हावे यासाठी मोठे रांजण उपलब्ध केले आहे. त्याला कपडा देखील गुंडळला आहे. जेणेकरून पाण्याचा थंडावा आणखी वाढावा, याशिवाय मुख्य रस्त्यावर पाणपोईच्या वरती मोठा कपडा देखील टाकलेला आहे. जेणेकरून पाणी स्वच्छ राहील त्यामध्ये घाण जाणार नाही याची देखील मंडळांनी दखल घेतली आहे. यावेळी आलमप्रभु देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दिलीप शाळू महाराज, नगरसेवक विठ्ठल बागडे, ज्येष्ठ समाज बांधव पांडुरंग बुगड, आबासाहेब नवले, धनंजय बाबर, धनंजय बागडे, पांडुरंग वरवडे, अंबादास वरवडे, बापू डिसले, संदीप बागडे, शंकर म्हेत्रे, सुभाष उपरे, बाळासाहेब फासे आदींची उपस्थिती होती.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:29 pm

अक्षय तृतीया निमित्त श्री तुळजाभवानी मातेस सुवर्ण अलंकार

तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह तालुक्यात रविवार दि 20 एप्रिल रोजी अक्षय तृतीया सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अक्षय तृतीया निमित्ताने श्री तुळजाभवानी तिचे मातेस शिवकालीन सुवर्ण अलंकार घालण्यात आले होत. अक्षय तृतीया निमित्ताने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शणार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अक्षय तृतीया निमित्ताने श्री तुळजाभवानी मातेस पुजारीवृंद सह स्थानिकांनी आमरस पोळ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. अक्षय तृतीया निमित्ताने घरोघर पितरांना भोजन देण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने श्री तुळजाभवानी मंदिरात बालकांचे जावळविधी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अक्षय तृतीया निमित्ताने. कधी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:29 pm

32 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नंदकुमार राऊत यांची निवड

धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र दिले. दिनांक 29 व 30 मे 2026 रोजी लोकनेते अजितदादा साहित्य नगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात धाराशिव येथे हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनास देशभरातून 900 साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. मानदेशी ग्रामीण शब्दशैलीतील त्यांचे दौशाड हे आत्मकथन प्रचंड लोकप्रिय झाले आहे. कंजाळ, बिलिंगा, काडकुसुंबा, हराटी आदी ग्रंथांचे विपूल लेखन राऊत यांनी केले आहे,. आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष निवडी संदर्भात नुकतीच एक बैठक झाली. यावेळी सर्वानूमते हि निवड करण्यात आली. यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, गोरक्षनाथ भांगे, राष्ट्रीय सचिव सुर्वणा पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोंगळे, लीलादेवी पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनील लोणकर, संतोष शेलार,प्रदेश संघटक सचिव अमोल कुंभार,मराठवाडा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पालकर,उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे,धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रा.राजा जगताप, महिला जिल्हाध्यक्ष मीना महामुनी आदीजण उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 20 Apr 2026 5:28 pm

IPL 2026: पंजाबच्या धावांच्या डोंगरामागे होतं ‘हे’खास कारण; कॅप्टन श्रेयसने केला खुलासा!

मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी धुव्वा उडवत पॉइंट टेबल्समध्ये आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. या दमदार विजयानंतर बोलताना कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या तुफानी फलंदाजीमागचे गुपित उघड केले. ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंमध्ये रंगलेल्या षटकारांच्या स्पर्धेमुळेच मैदानात फलंदाजीची अशी आतषबाजी पाहायला मिळाली, असे अय्यरने स्पष्ट केले. या सामन्यात प्रियांश […]

सामना 20 Apr 2026 5:26 pm

Pandharpur theft case |पंढरपूर पोलिसांची मोठी कामगिरी! १८ लाखांची घरफोडी करणाऱ्या टोळीचा १२ तासांत पर्दाफाश

पंढरपुरात घर देण्याच्या बहाण्याने चोरी पंढरपूर – येथील गोपाळपूर येथे स्वस्तात घर मिळवून देण्याचा बहाणा करून घरात प्रवेश करत चोरी करणाऱ्या टोळीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी १२ तासांत पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे.याप्रकरणात चार महिला, एका पुरुषाविरुद्ध चोरीचा [...]

तरुण भारत 20 Apr 2026 5:23 pm

Solapur News |घुणकीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग; सव्वा लाखांचे नुकसान

घुणकीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग घुणकी : आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात झालेल्या शाॅर्टसर्किटने येथील आनंदा ज्ञानू चव्हाण यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले‌ सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले. आज घुणकी परीसरात सायंकाळी विजेच्या कडकडाटात वादळी वारा जोराने झाला. हलका पाऊस [...]

तरुण भारत 20 Apr 2026 5:17 pm

Sangli burglary |सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ! वारणालीत बंद घर फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

सांगलीत बंद घरात घरफोडी; ३.७६ लाखांचा ऐवज लंपास सांगली : सांगलीत पुन्हा एकदा चोरट्यांनी डोकेवर काढत नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्रचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील वारणाली परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने थेट घरात प्रवेश करत तब्बल ३ लाख [...]

तरुण भारत 20 Apr 2026 5:03 pm

IPL 2026 –गुजरातविरुद्धच्या सामन्यात ‘हिटमॅन’ची एन्ट्री होणार? गोलंदाजी प्रशिक्षकाची महत्त्वाची अपडेट

IPL 2026 मध्ये आज (20 एप्रिल 2026) मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगतदार चुरस पाहायला मिळणार आहे. एकीकडे गुजरातचा संघ विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरेल, तर दुसरीकडे मुंबईचा संघ पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुंबईने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यांना फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. अशातच मुंबईचा हुकूमी […]

सामना 20 Apr 2026 5:02 pm

Atpadi news |खरसुंडीत दोन गटात तुंबळ हाणामारी; काठी, रॉड आणि स्टम्पचा वापर, १५ जणांवर गुन्हा

आटपाडीत दोन गटांत तुफान हाणामारी आटपाडी: आटपाडी तालुक्यातीलखरसुंडी येथे दोन गटात काठी, रॉड, स्टम्पने झालेल्या मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीनुसार दोन्ही गटाकडील १५ जणांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरसुंडीतील दत्तात्रय नंदकुमार भिसे यांच्या फिर्यादीवरून अथर्व [...]

तरुण भारत 20 Apr 2026 4:55 pm

ट्रम्प म्हणाले तर मोदी उडी देखील मारतील! –राहुल गांधी

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. यावेळी पश्चिम बंगालमधील एका प्रचारसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. राहुल गांधी हे सोमवारी प्रचारासाठी म्हणून थुथुकुडी येथील सभेला उपस्थित होते. या प्रचार सभेवेळी त्यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड […]

सामना 20 Apr 2026 4:40 pm

Sangli News |मिरज तालुक्यात खळबळ: पंधरा दिवस घरात पाहुणे म्हणून राहिले आणि लग्नानंतर मुद्देमाल घेऊन पळाले

अक्षयतृतीयेनिमित्त सांगली बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल मिरज– आरग येथे लग्नात घातलेल्या दागिन्यांसह एक लाख, ८० हजार रुपयांची रोख असा दोन लाख, तीन हजार, ७७० रुपयांचा मुद्देमाल घेऊन महिलेच्या माहेरकडील नातेवाईक पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत लक्ष्मण कृष्णा माळी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात [...]

तरुण भारत 20 Apr 2026 4:38 pm

एमसीए चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ला सुरुवात, 8 संघांमध्ये विजेतेपदासाठी चूरस

मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सोमवारी बीकेसी मैदानावर एमसीए चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चे शानदार उद्घाटन करण्यात आले. आगामी टी-20 मुंबई लीगसाठी खेळाडूंना सराव आणि व्यासपीठ मिळवून देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, हिंदुस्थानची माजी कर्णधार डायना एडुलजी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ही स्पर्धा 20 एप्रिल ते 30 एप्रिल […]

सामना 20 Apr 2026 4:34 pm

LIVE- महिला आरक्षण विधेयक, प्रणिती शिंदे यांची पत्रकार परिषद

#pranitishinde महिला आरक्षण विधेयक, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची पत्रकार परिषद. पहा थेट प्रक्षेपण https://www.youtube.com/live/0iXF8mKVjf8?si=LVujAoJ7PHn54EG1

सामना 20 Apr 2026 4:23 pm

वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू; उमरी तालुक्यातील हुंडा तांडा येथील घटना

उमरी तालुक्यातील हुंडा तांडा परिसरात 19 एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली, ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. यात हुंडा तांडा येथील रहिवासी असलेले, पांडुरंग संगू राठोड यांच्या शेत सर्वे नंबर 22 मधील शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या बैलाच्या जोडीवर अचानक वीज कोसळली. या घटनेत दोन्ही बैल जागीच मरण पावले. याची माहिती […]

सामना 20 Apr 2026 4:17 pm

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते! –प्रणिती शिंदे

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले. पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते. सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतेो, पण त्यांचा कुटील डाव विरोधकांनी हाणून पाडला असून सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस […]

सामना 20 Apr 2026 4:09 pm

केसांसाठी तुरटीचा उपयोग कशापद्धतीने करायला हवा, जाणून घ्या

तुरटीचा उपयोग हा प्रामुख्याने पाणी स्वच्छ करण्यासाठी पूर्वीपासून केला जायचा. परंतु तुरटीचा केवळ इतकाच उपयोग नसून, तुरटी ही सौंदर्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते. तुरटीचा वापर हा सौंदर्यासाठी सुद्धा खूप प्रकारे आपण करु शकतो. केवळ इतकेच नाही तर केसांसाठी सुद्धा तुरटी ही वरदान मानली जाते. आपल्या केसांसाठी खोबरेल तेल हे खूपच फायद्याचे आहे. पण या […]

सामना 20 Apr 2026 4:08 pm

वडाळा टीटीजवळ उभी असलेल्या खासगी बसला आग, अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई

वडाळा टीटी परिसरातील आरटीओजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या खासगी बसला सोमवारी (20 एप्रिल) दुपारी अचानक आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलासह विविध आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही मिनिटांतच आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 2 वाजता आगीची माहिती मिळाली आणि […]

सामना 20 Apr 2026 3:48 pm

Sangli News |सांगलीच्या बाजारपेठेला ‘अक्षय’झळाळी! मुहूर्ताच्या खरेदीमुळे कोट्यवधींची उलाढाल

अक्षयतृतीयेनिमित्त सांगलीत कोट्यवधींची बाजारपेठेत उलाढाल सांगली : हिंदू धर्मातील महत्वाचा मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूतपिकी एक असलेल्या अक्षयतृतीयेनिमित्त सांगलीच्या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. यानिमित्त सराफ पेठेत सोने-चांदीचे दागिने, दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रीक दुचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मुहूर्तावर दागिने [...]

तरुण भारत 20 Apr 2026 3:46 pm

मी कोणत्याही निर्मात्यांकडे माझ्या मुलांसाठी कामाची शिफारस करणार नाही; अर्शद वारसी असे का म्हणाला

बॉलिवूडमधील मु्न्नाभाई एमबीबीएस या सिनेमातील सर्किट म्हणजे, अभिनेता अर्शद वारसी याने नुकताच त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा केला. अर्शदने त्याच्या मुलाखतींच्या माध्यमातून कित्येकदा त्याच्या मुलांबद्दल ओझरते का होईना भाष्य केले आहे. अर्शद वारसीचा २१ वर्षीय मुलगा, झहीर वारसी याने सिद्धार्थ आनंद आणि राजू हिरानी यांसारख्या चित्रपट निर्मात्यांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करून आधीच चित्रपटसृष्टीत पदार्पण […]

सामना 20 Apr 2026 3:39 pm

Femina Miss India 2026 |गोव्याची साध्वी सैल बनली ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६’

फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चा मान गोव्याच्या साध्वी सैलला भुवनेश्वर -केआयआयटी भुवनेश्वरमये ६१ व्या मिस इंडिया वर्ल्ड स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या सौंदर्यस्पर्धेत गोव्याची साध्वी सैल हिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६ चा मान पटकाविला आहे. मिस इंडिया २०२४ ची [...]

तरुण भारत 20 Apr 2026 3:36 pm

दुसऱ्या देशासाठी खेळण्यापेक्षा क्रिकेट सोडणे पसंत करेन; राशिद खानने नाकारली हिंदुस्थानच्या नागरिकत्वाची ऑफर

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या निमित्ताने हिंदुस्थानमध्ये आहे. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. यंदाच्या हंगामात राशिदला आतापर्यंत आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अशातच तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘राशिद खान- फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टारडम’ या त्याच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. […]

सामना 20 Apr 2026 3:32 pm

Pandharpur temple |विठ्ठल-रुक्मिणीचे राजस रूप! अक्षयतृतीयेनिमित्त सोन्या-नाण्यांच्या अलंकारांत सजले देवाचे रूप

अक्षयतृतीयेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीला सुवर्ण अलंकारांची सजावट सोलापूर: हिंदू धर्मात अनय्यतृतीयेला विशेष महत्त्व असते. त्यानिमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी अलंकार परिधान केल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीणकुमार धम यांनी दिली. यामध्ये श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट वाक्या जोड, तोडे जोड, तानवह जोड, चिंच पेटी तांबडी, जव मणी पदक, जवेच्या [...]

तरुण भारत 20 Apr 2026 3:30 pm

राजस्थानमध्ये रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होतं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याच्या अवघ्या 24 तास आधी राजस्थानातील मोठ्या रिफायनरी प्रकल्पात भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीतून आकाशात काळ्या धुराचे मोठे लोट उठताना दिसले, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही रिफायनरी राजस्थानातील बाळोतरा जिल्ह्यातील पचपद्रा येथे उभारण्यात आलेली आहे. हिंदुस्थानमधील पहिली ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. […]

सामना 20 Apr 2026 3:26 pm

कल्याण-मुरबाड रायते पूल अपघात प्रकरण –टिटवाळा, मुरबाड येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; हप्तेखोर वाहतूक, परिवहन अधिकारी मात्र मोकाट

आठवड्यापूर्वी कल्याण – मुरबाड महामार्गावरील रायते पुलावरील अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. यानंतर बेकायदा प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे अपघातप्रकरणी जबाबदार धरून कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांची बदली ठाणे कंट्रोल येथे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांची बदली शहापूर ग्रामीणला […]

सामना 20 Apr 2026 3:22 pm

वास्कोची साध्वी सैल बनली ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’

ओडिशात अंतिम फेरीत झाली निवड : गोव्याचे केले होते प्रतिनिधीत्व : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले अभिनंदन : गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला काणकोण : मूळ सदाशिवगड, कारवार येथील आणि सध्या वास्को येथे स्थायिक झालेल्या साध्वी सतीश सैल या युवतीची 61 वी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 म्हणून निवड झाली आहे. साध्वी सैल ही [...]

तरुण भारत 20 Apr 2026 2:59 pm

काँग्रेसमुळेच रखडले ‘नारीशक्ती अधिनियम’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची काँग्रेसवर टीका पणजी : ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) लोकसभेत मंजूर होऊ न शकल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, रविवारी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. पणजी येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष [...]

तरुण भारत 20 Apr 2026 2:55 pm

लारक बेटापासून दूर रहा; इराणच्या गोळीबारानंतर हिंदुस्थान सतर्क, जहाजांसाठी नवीन नियमावली जारी

इराण-अमेरिकेमध्ये युद्धविराम सुरू असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या हिंदुस्थानी जहाजांवर इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) गोळीबार केला होता. त्यानंतर हिंदुस्थान सतर्क झाला असून पर्शियन आखातातील हिंदुस्थानी जहाजांसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. जहाजांना लारक बेटापासून दूर राहण्यास आणि सुरक्षेच्या कारणास्तव नौदलाच्या निर्देशांनुसार मार्गक्रमण करण्यास सांगण्यात आले आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे. […]

सामना 20 Apr 2026 2:55 pm

दीपिका पादुकोण गरोदरपणातही काम करत राहणार; सध्या ‘राका’चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनमध्ये व्यस्त

दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी, नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. त्यानंतर रणवीर आणि दीपिका दोघांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. परंतु यातील महत्त्वाची बाब म्हणजे गरोदर असतानाही, दीपिका ही कामातून ब्रेक घेणार नाही असे समजते. इंडस्ट्रीतील सूत्रांनुसार, दीपिका गरोदरपणातही तिच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणार आहे. ती सध्या ‘राका’ चित्रपटाचे चित्रीकरण करत […]

सामना 20 Apr 2026 2:55 pm

केपे कालव्यात बुडून दोन युवकांना मृत्यू

केपे : बोपरीमड्डी-केपे येथील कालव्यात आंघोळीकरिता उतरलेल्या दोन युवकांना मृत्यू येण्याची घटना घडली असून केपे पोलिसांनी कुडचडे अग्निशामक दलाच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करून हे मृतदेह शवचिकित्सेकरिता पाठविण्यात आले आहेत. केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवक इग्नेशियस फर्नांडिस (24, फातोर्डा) व हरजित (उत्तराखंड) हे दोघे माजोर्डा येथे कामाला होते. सदर युवक आंघोळीसाठी कालव्यात [...]

तरुण भारत 20 Apr 2026 2:52 pm

अक्षय्य तृतीया उत्साहात साजरी

पणजी : ‘साडेतीन मुहूर्तांपैकी’ एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा उत्सव राज्यात काल रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषत: पणजी आणि आसपासच्या परिसरात धार्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासूनच पणजीतील महालक्ष्मी मंदिर, मारुती मंदिर आणि इतर प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन वस्तू, विशेषत: सोने खरेदीसाठी पणजीतील ज्वेलरी दुकानांमध्ये मोठी लगबग [...]

तरुण भारत 20 Apr 2026 2:50 pm

राज्यातील धरणांमधील जलसाठा अर्ध्यापेक्षा कमी

पावसाला उशीर झाल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती पणजी : पावसाचा प्रत्यक्ष हंगाम सुरु होण्यासाठी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असताना राज्यातल्या पाच प्रमुख धरणांतील पाण्याचा साठा अर्ध्यापेक्षा कमी झाल्याचे समोर आले आहे. पावसाळा वेळेवर सुरु झाला तर समस्या निर्माण होणार नाही तथापि पावसाला उशीर झाला तर मात्र पाणी टंचाई होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. [...]

तरुण भारत 20 Apr 2026 2:48 pm

जत्रेपासून पाच दिवस ओटी स्वीकारणार नाही : गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस तैनात

डिचोली : शिरगावातील श्री देवी लईराईच्या मंदिरात जत्रोत्सवानिमित्त होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच देवीचे दर्शन जलदगतीने होऊन लोकांची गर्दी लवकर मोकळी करण्यासाठी जत्रोत्सवाच्या दिवसापासून पाच दिवस मंदिरात ओटी स्वीकारली जाणार नाही. त्यासाठी जत्रेच्या पूर्वीच देवीची ओटी भरण्यासाठी विविध भागातून आलेल्या सुवासिनींची गर्दी वाढत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिचोली पोलिसांची मंदिरात ड्युटी सुरू झाली आहे. [...]

तरुण भारत 20 Apr 2026 2:45 pm

कुडचडेत ट्रक-दुचाकी अपघातात काकोड्यातील तरुणाचा मृत्यू

रवींद्र भवनसमोर घडली दुर्घटना : पोलिसांकडून तपास सुरू कुडचडे : येथील रवींद्र भवनसमोर रविवारी पहाटे अंदाजे 5.30 च्या दरम्यान ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची माहिती कुडचडे पोलिस स्थानकातून प्राप्त झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काऱ्यामड्डी, काकोडा येथील जेस्वल दिनीज (वय 18 वर्ष) हा आपल्या दुचाकीवरून जात असताना, समोरून येणाऱ्या ट्रकशी [...]

तरुण भारत 20 Apr 2026 2:43 pm

निवडणुकीच्या तोंडावर आयकराच्या धाडी; विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न, स्टॅलिन यांचा भाजपवर जोरदार हल्ला

तमिळनाडूमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाच्या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तामीळनाडूतील काँग्रेस नेते के. सेल्वापेरुंथगई यांच्या निवासस्थानी झालेल्या आयकर छाप्याचा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तीव्र निषेध केला. स्टॅलिन यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये या कारवाईला “कटकारस्थान” असे म्हटले आहे. निवडणूक प्रचार संपण्यास अवघे 48 तास शिल्लक असताना अशा प्रकारची कारवाई करण्यात येणे हे लोकशाहीच्या […]

सामना 20 Apr 2026 2:41 pm

आपण पूर्वी विश्वगुरू होतो, पण आता आहोत असे नाही! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी ‘विश्वगुरु’ या शब्दाच्या वापरावर भाष्य करताना म्हटले आहे की, ‘आपण सध्या हा शब्द वापरू नये, कारण सध्या आपण ‘विश्वगुरु’ नाही आहोत. आपण विश्वगुरु व्हायला हवे आणि पूर्वी आपण तसे होतोही, परंतु आज आपण आहोत असे म्हणणे योग्य नाही’. मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्य ज्येष्ठ नेत्यांनी हे विधान करणे म्हणजे […]

सामना 20 Apr 2026 2:35 pm

देशाचा निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारीच, संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या माणसाविरुद्ध केलेलं महाभियोग प्रस्ताव बहुमत असताना 193 सह्या असताना उपराष्ट्रपतींनी फेटाळून लावलं. त्या निवडणुक आयोगाकडून आम्ही कोणती अपेक्षा करणार? हा निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला. संजय […]

सामना 20 Apr 2026 2:28 pm

यवतमाळ हादरलेः ६ महिन्यात ३४ आदिवासी मुली बेपत्ता, मानवी तस्करीचा संशय

नाशिक येथील भोंदू बाबा खरात प्रकरणानंतर अमरावतीतील परतवाडा येथे स्त्री लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस येत नाही तेच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३४ आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामागे आंतरराज्य मानर्वा तस्करी आणि देहव्यापाराची मोठी टोळी सक्रिय असल्याचा आरोप होत असून, एका कथित ऑडिओ क्लिपने या संशयाला […]

सामना 20 Apr 2026 2:15 pm

राज्यातली सत्ता हस्तगत करून भाजप दिल्लीहून राज्य चालवण्याचा प्रयत्न करत आहे, मणिपूर प्रकरणी राहुल गांधी यांची टीका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. तमिळनाडूतील कोळाचेल येथे झालेल्या सभेत बोलताना त्यांनी मणिपूरमधील परिस्थितीचा उल्लेख करत “एकेकाळी शांत असलेले राज्य पेटवले गेले असून शेकडो लोकांचा बळी गेला आहे. आजही तिथे संघर्ष सुरूच आहे,” असा आरोप केला. मणिपूरमध्ये अलीकडेच घडलेल्या एका दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा […]

सामना 20 Apr 2026 2:15 pm

जपानला 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा जारी

जपान शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. उत्तर जपानमधील सॅनरिकू किनारपट्टीवर 7.5 रिश्टर स्केलच्या महाभयंकर भूकंपाने जोरदार धक्के बसले आहेत. त्यानंतर संपूर्ण परिसरात त्सुनामीचा हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4 वाजून 53 मिनिटांच्या सुमारास आलेल्या या भूकंपाने टोकियोपर्यंतच्या उत्तुंग इमारती पत्त्यासारख्या हलू लागल्या. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. जपानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, […]

सामना 20 Apr 2026 2:14 pm

Ichalkaranji Crime |इचलकरंजीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; ५ जणांवर गुन्हा दाखल

इचलकरंजीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला इचलकरंजी : पूर्ववैमनस्यातून तरुणावरजीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश शंकर कोपार्डे, विवेक साळुंखे, सागर गायकवाड, रोहीत पुजारी आणि अल्तमेश (सर्व रा. पोबार मळा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद जखमी अवधूत शंकर ढवळे [...]

तरुण भारत 20 Apr 2026 2:06 pm

Ambabai temple |रणरणत्या उन्हात माउलीला शीतल थंडावा; गरुड मंडपात रंगला अंबाबाईचा ‘दोलोत्सव

रणरणत्या उन्हाळ्यात थंडावा मिळावा म्हणून अंबाबाई बनात गेली. तेथे झाडाच्या पाना फुलांनी बहरलेल्या, बेली पारंब्याच्या हिरव्यागार झुल्यावर बसुन हळुवार झोके घेत आहे. असे पुराणकथांमधून ऐकलेले दृश्य रविवारी अक्षयतृतीयेच्या दिवशी भाविकांना ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळाले. साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि वैशाख महिन्यातील महत्वाचा सण असलेल्या अक्षयतृतीयेनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा दोलोत्सव सोहळा रविवारी (दि. १९) [...]

तरुण भारत 20 Apr 2026 1:55 pm

साखरपा गावची सुकन्या तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची महाविजेती

कोकणचे नाव केले उज्वल : सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची सुकन्या तन्वी कोलते हिने ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ चे विजेतेपद पटकावले आहे. तालुका, जिल्ह्यासह कोकणचे नाव उज्वल केले आहे. १९ एप्रिल रोजी उत्साहात पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये तिने दमदार कामगिरी करत महाट्रॉफीवर नाव कोरले. जानेवारी २०२६ मध्ये कलर्स मराठी [...]

तरुण भारत 20 Apr 2026 1:27 pm

जल्लोषी वातावरणात शिवपर्वाला सुरुवात

शिवजयंती मंडळांमध्ये उत्साह : विविध गडकोटांवरून शिवज्योतींचे आगमन : पोवाड्यांचे भरगच्च कार्यक्रम बेळगाव : ढोल-ताशांच्या गजरात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती सोहळ्याला रविवारपासून जल्लोषात सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी उद्यान येथे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर विविध गडकोटांवरून आणण्यात आलेल्या शिवज्योतींचे शहरात स्वागत करण्यात आले. यामुळे संपूर्ण शहरात [...]

तरुण भारत 20 Apr 2026 1:24 pm

अरुणाचलमधील पासीघाट शहर दाखवले चीनमध्ये, जनगणना 2027 पोर्टलवरील गंभीर चूक

जनगणना 2027 साठी केंद्र सरकारने तयार केलेल्या डिजिटल पोर्टलवर गंभीर तांत्रिक चूक आढळून आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट हे शहर पोर्टलवर चिनी शहर ‘मेडोग’ म्हणून दर्शवले जात असल्याचे समोर आले. ही चूक उघड होताच संबंधित यंत्रणांनी तातडीने दुरुस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हा प्रकार एका निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. ग्रुप […]

सामना 20 Apr 2026 1:23 pm

हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

गळफास घेऊन संपविले जीवन : सासरच्यांविरुद्ध एफआयआर दाखल, पती ताब्यात बेळगाव : हुंड्यासाठी पती, सासूसह सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचाला कंटाळून ज्योतीनगर, कंग्राळी खुर्द येथील एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात चौघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. श्रीनिधी [...]

तरुण भारत 20 Apr 2026 1:22 pm

Shiv Jayanti |कोल्हापुरात शिवजयंती मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट; १५ मंडळांवर गुन्हे दाखल होणार!

शिवजयंती मिरवणुकीत आवाज मर्यादा भंग कोल्हापूर – महाराज छत्रपती शिवाजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीमध्ये साउंड सिस्टीमचा दणदणाट करणाऱ्या १५ मंडळांच्या आवाजाचे नमुने रविवारी पोलीस प्रशासनाने घेतले आहेत. आवाज मयदिचे उल्लंघन करणाऱ्या सर्व मंडळासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शनिवारी [...]

तरुण भारत 20 Apr 2026 1:20 pm

शिवजयंती मिरवणुकीसाठी प्रशासनाची तयारी

विविध ठिकाणी सीसीटीव्हीची नजर : काही ठिकाणी मंडप उभारणीचे काम बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मंगळवार दि. 21 रोजी होणार असून यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. तर काही संवेदनशील भागामध्ये पोलिसांना देखरेख करण्यासाठी मंडप उभारणी केली जात आहे. शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीदिवशी लाखो शिवभक्त सजीव [...]

तरुण भारत 20 Apr 2026 1:16 pm

उशीत लपविले…श्वानाने शोधले

अडीच लाखांचे हेरॉईन जप्त : दोन युवकांना अटक बेळगाव : सुळगा-हिंडलगा येथील दोन युवकांना अटक करून त्यांच्याजवळून 2 लाख 60 हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम 92 मिली हेरॉईन व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या युवकांनी विक्रीसाठी आणलेले हेरॉईन उशीमध्ये लपवून ठेवले होते. पोलीस दलातील आदिती या अमलीपदार्थांच्या शोधासाठीच्या श्वानाने ते शोधून काढले. हा [...]

तरुण भारत 20 Apr 2026 1:13 pm

शिवजयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात दारुविक्री बंदी

बेळगाव : शिवजयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी मंगळवार दि. 21 एप्रिलच्या सकाळी 6 पासून बुधवारी सकाळी 6 पर्यंत दारुविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारीही असणारे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.दारू दुकाने, बार, क्लब, हॉटेलमध्ये दारुविक्री व [...]

तरुण भारत 20 Apr 2026 1:09 pm

कॅन्टोन्मेंट विरोधात खासदारांची संरक्षणमंत्र्यांकडे नाराजी

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये खासदार जगदीश शेट्टर यांना विश्वासात न घेता 6045 चौरस फूट जमीन फूल मार्केटसाठी बेकायदेशीररित्या भाडेतत्त्वावर देण्यात आली. अशोकनगर येथे एक फूल मार्केट असताना पुन्हा दुसरे फूल मार्केट तेदेखील एपीएमसीची परवानगी न घेता सुरू करण्यात आल्याने याबाबतची नाराजी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्याकडे व्यक्त केली. शनिवारी खासदार शेट्टर [...]

तरुण भारत 20 Apr 2026 1:07 pm

शहरात अक्षयतृतीया पारंपरकपणे साजरी

भगवान विष्णू-लक्ष्मीदेवीचे पूजन; सोने-चांदी, वाहन खरेदी बेळगाव : हिंदुंच्या साडेतीन शुभमुहूर्तांपैकी अक्षय्यतृतीया हा एक शुभमुहूर्त असून रविवारी पारंपरिकपणे साजरी करण्यात आली. पूजेसाठी संपूर्ण दिवस शुभ असल्याने घरोघरी व मंदिरांतूनही विशेष पूजा झाली. अक्षय्यतृतीयेला भगवान विष्णुचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्मदिवस मानला जातो. मंदिरांतून परशुरामांची पूजा झाली. परशुरामाच्या सन्मानार्थ हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही साजरा होत [...]

तरुण भारत 20 Apr 2026 1:02 pm

“मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? हे विधेयक 2023 ला एकमताने मंजूर झाले, मग…”, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? नारी शक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) 20 सप्टेंबर 2023 ला लोकसभेमध्ये एकमताने मंजूर झाले. 21 सप्टेंबरला राज्यसभेत मंजूर झाले. 28 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आणि त्याचे कायद्यात रुपांतर झाले. हे विधेयक मंजूर होऊन अडीच वर्षे झाली, तरी मोदी सरकारने त्याची अंमलबजावणी का केली नाही? […]

सामना 20 Apr 2026 12:59 pm