आई तुळजाभवानीच्या चैत्री पौर्णिमा कालावधीत मंदिर पहाटे एक वाजता दर्शणार्थ खुले होणार
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चैत्री पौर्णिमा यात्रा महोत्सवाचा सोहळा यंदा दि. 30 मार्च ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर संस्थानने दर्शन व्यवस्था सुलभ करण्यासाठी यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दि. 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत पहाटे 1 वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शन सुरू होणार असुन अभिषेक पुजा घार सकाळी 6 वाजता होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरातील महंत, पुजारी, सेवेधारी व भाविक भक्तांनी वरील वेळापत्रकाची नोंद घ्यावी, तसेच दर्शनासाठी येताना शिस्त पाळावी, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
कुलस्वामिनी तुळजाभवानी माताच्या नगरीत आरोग्य सुविधांचा अभाव;
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता यांच्या पुण्यभूमीत दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्रात आजही अद्यावत व सुसज्ज रुग्णालय नसल्याची वस्तुस्थिती चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे भाविक व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तुळजापूर येथे 200 खाटांचे आधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पूर्वी लातूर रोडवर अडीच एकर जागेत असलेले उपजिल्हा रुग्णालय आता महामार्ग विस्तारामुळे केवळ दोन एकर जागेत उभे आहे. त्यातही इमारतीचे नियोजन व्यवस्थित नसल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांना काम करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुळजापूर हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो-लाखो भाविक येतात. मात्र गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना सोलापूरसह इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसत असून अनेकांचे प्राणही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात यंत्रसामुग्री आणि डॉक्टरांची यंत्रणा उपलब्ध असतानाही सुसज्ज इमारतीचा अभाव ही मोठी अडचण ठरत आहे. पूर्वी येथे सुमारे 400 ओपीडी होत असताना सध्या 800 पेक्षा जास्त रुग्णांची ओपीडी होत आहे. ऑपरेशनचे प्रमाणही वाढले आहे. मात्र जागा अपुरी असल्याने वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांना मोठी कसरत करावी लागत आहे... तीर्थक्षेत्र तुळजापूर विकासासाठी जवळपास दोन हजार कोटीचा विकास आराखडा मंजूर केला आहे मात्र यातही आरोग्याबाबत कुठलेही उपाययोजना नसल्याचे आरोप नागरिकातून होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास किंवा मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार करणे येथील रुग्णालयासाठी जवळपास अशक्य ठरू शकते. त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे हे भाविकांच्या जीवाशी खेळ ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री च्या नावाने हॉस्पिटल उभारण्याची चर्चा होती मात्र ती चर्चा सध्या हवेतच विरली आहे तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या मदतीने संस्था येथे हॉस्पिटल चालवण्याच्या तयारीत होती तीही चर्चा आता हवेतच विरली आहेत दरम्यान, देश-राज्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शनासाठी येतात, मात्र येथील आरोग्य सुविधांच्या प्रश्नाकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घेऊन तुळजापूर येथे जिल्हा दर्जाचे अत्याधुनिक रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी भाविक व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
सापडलेल दोन तोळे सोन्याचे गंठण परत करणारे तेर येथील आदर्श व्यक्तिमत्व नारायण सांळुके
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील नारायण साळुंके हे पायाने दिंव्यांग आहेत. सामाजिक कार्य करणारे नारायण साळुंके यांना तीन मुली असुन त्यांना आतिशय कष्टाने शिक्षण देत आहेत.त्यांची मोठी मुलगी कु.तनुजा ही फिजीओ थेरपी वैद्यकीय शिक्षणासाठी माजलगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात मध्ये शिक्षण घेत आहे. तीची फि एक वर्षासाठी 3 लाख 70हजार आहे.दुसरी मुलगी 9वीला आहे तिसरी मुलगी 7वी ला आहे. त्यांचा शिक्षणाचा खर्च खूप आहे. माजलगाव येथे मुलीला भेटण्यासाठी पाच दिवसांपूर्वी नारायण साळुंके आणि त्यांची पत्नी रेश्माताई साळुंके हे माजलगावला जात असताना त्यांना तेलगाव या ठिकाणी एका गरिब ऊसतोड कामगार असलेल्या महीलेचे दोन तोळा सोन असलेले गंठन सापडले .ते कुटुंब मुलीला भेटुन परत आले आणि ज्या ठिकाणी गंठन सापडले तिथे विचारपूस केली येथे कोणाचे सोन्याच गंठण हरवल आहे का? अशी विचारपूस केली.त्यावेळी नारायण साळुंके यांना समजले की, या गावात अंजना अंगत गायकवाड या गरिब महीलेच सोन्याचे गंठण हरवल होत.ती महीला सकाळपासुन रडत आहे.नारायण साळुंके आणि त्यांच्या पत्नीने ते सोन्याचे गंठण घरी जाऊन अंजना गायकवाड यांना जाऊन दिले.अंजना गायकवाड खुश होऊन आगदी गळ्यात पडुन रडली.या जगात माणुसकी जीवंत आहे.खुप अडचणीत मुलींना नारायण साळुंके शिक्षण देत आसताना दोन तोळे सोन्याचे गंठण परत देण म्हणजे खुप मोठा प्रामाणिकपणा आहे.सापडलेल सोन परत देण्यासाठी नीतीमता चांगली पाहिजे.आणि ती नीतीमत्ता नारायण साळुंके आणि त्यांच्या पत्नीने सांभाळली आहे.नारायण साळुंके यांच्या सारख्या प्रामाणिक माणसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.रस्त्यावर सापडलेले दोन तोळे सोन्याचे गंठण ज्यांचे आहे त्यांना परत करणारे नारायण साळुंके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आमदार प्रवीण स्वामींच्या पाठपुराव्याला यश; उमरगा-लोहारा तालुक्याला लवकरच मिळणार नवीन एसटी बसेस
उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांची एसटी बसची प्रतीक्षा आता संपणार आहे. आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत केलेल्या आक्रमक मागणीची दखल घेत राज्य सरकारने तालुक्यासाठी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांनी विधानभवनात यासंदर्भात अधिकृत ग्वाही दिली असून, यामुळे मतदारसंघातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. मतदारसंघातील अनेक ग्रामीण मार्गांवर बसेसची संख्या कमी असल्याने शालेय विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार प्रवीण स्वामी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले होते. जुन्या झालेल्या बसेस आणि अपुऱ्या फेऱ्यांमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने नवीन बसेसचा ताफा मिळावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता मोठे यश आले आहे. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी येणाऱ्या काही दिवसांतच उमरगा आणि लोहारा तालुक्यांसाठी विशेष कोट्यातून नवीन बसेस दिल्या जातील, असे आश्वासित केले आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जादा फेऱ्यांचे नियोजन करण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे तालुक्यातील एसटीचे जाळे अधिक सक्षम होणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. आमदार प्रवीण स्वामी यांच्या या यशस्वी प्रयत्नांबद्दल संपूर्ण तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे. विकासगंगा मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर भर देत असल्याचे यावेळी आमदारांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले. नवीन बसेस उपलब्ध होणार असल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि सर्वसामान्य जनतेला हक्काचे आणि सुरक्षित साधन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उमरग्यात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
उमरगा (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्र कुशल कामगारांची आवश्यकता असुन युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन त्यांच्या ज्ञानाचे रुपांतर रोजगारात करावे असे मत तहसिलदार गोविंद येरमे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव व हुतात्मा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरगा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. त्यावेळी तहसिलदार येरमे बोलत होते. राजेंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक अक्षय घोडके, मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला, आय. एम. सी. सदस्य संतोष वखारे, प्राचार्य संजय माळकुंजे, गटनिदेशक नागनाथ माकने उपस्थित होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. गुरव यांनी प्रस्ताविक करताना उमेदवारांना उपलब्ध असलेल्या विविध करिअर विषयक संधी बाबत माहीती दिली. व शासनाच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा व मेळाव्यातील खाजगी आस्थापनेकडील रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे उमेदवारांना आवाहन केले. या रोजगार मेळाव्यात 236 जणांनी नोंदणी केली.180 उमेदवारांनी आठ खाजगी आस्थापनाकडे मुलाखत दिली यापैकी 118 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली. या रोजगार मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील 8 नामांकित खाजगी कंपन्या, आस्थापना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने पुणे, व धाराशिव जिल्ह्यातील कंपन्यांचा समावेश होता. घोडके उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडील रिक्त पदे वेतन व इतर सुविधा बाबत उमेदवारांना माहिती दिली. यावेळी रोजगार मेळाव्यासोबत विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी योजनांचे स्टॉल लावून माहिती देण्यात आली. पवन नाईकवाडे यांनी सुत्रसंचलन केले तर गटनिदेशक नागनाथ माकणे यांनी आभार मानले. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, कर्मचारी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
IPL 2026 – RCB च्या अडचणीत वाढ; आणखी एक खेळाडू स्पर्धेतून बाहेर! क्रिकेट बोर्डाची आडकाठी
IPL 2026 सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. वेगवान गोलंदाज यश दयाल बाहेर पडल्यानंतर आता श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा याच्याही खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या नवीन आणि कडक फिटनेस धोरणांतर्गत तुषाराला NOC देण्यास नकार दिला आहे. या नियमानुसार परदेशी लीगमध्ये खेळण्यापूर्वी खेळाडूंना कठीण शारीरिक चाचण्या […]
जनगणना 2027 ची तयारी; 3731 कर्मचारी सज्ज
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या स्तरावर व्यापक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.जिल्ह्यातील विविध प्रशासकीय घटकांमार्फत एकूण 2850 गणक आणि 471 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून राखीव कर्मचारी धरून ही संख्या अनुक्रमे 3198 व 526 पर्यंत पोहोचली आहे.एकूण 3731 कर्मचाऱ्यांचा सहभाग या प्रक्रियेत राहणार आहे. तहसील कार्यालयांच्या पातळीवर धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परंडा, वाशी आणि कळंब या आठही तालुक्यांमध्ये गणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव तहसील कार्यालयात सर्वाधिक 456 गणक व 76 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून,तुळजापूर,उमरगा आणि कळंब या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी नेमण्यात आले आहेत.प्रत्येक तहसीलस्तरावर आवश्यक तेवढे राखीव कर्मचारी देखील ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी कार्यात खंड पडणार नाही.नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर देखील गणक व पर्यवेक्षकांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव, तुळजापूर, उमरगा, भूम, परंडा, कळंब, मुरूम, नळदुर्ग तसेच लोहारा व वाशी नगरपंचायतींमध्ये मिळून मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. नगरपरिषद धाराशिव येथे 206 गणक व 42 पर्यवेक्षक,तर तुळजापूर व उमरगा येथे अनुक्रमे 64 व 70 गणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्ह्यात एकूण 18 चार्ज कार्यालये कार्यरत असून,प्रशिक्षणासाठी 80 बॅचेस आणि 18 प्रशिक्षण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.मास्टर ट्रेनर्स,फील्ड ट्रेनर्स यांचीही नियुक्ती करण्यात आली असून,सर्व संबंधितांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन जनगणना प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यावर भर दिला जात आहे.प्रशासनाने यासाठी काटेकोर नियोजन केले असून जिल्ह्यातील जनगणना प्रक्रिया अचूक व पारदर्शकपणे पार पडणार आहे.
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी
धाराशिव (प्रतिनिधी)- डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी नोंदणी करणे शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी सहाय्यकांमार्फत 31 मार्च 2026 पूर्वी ई-पीक पाहणी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल क्रॉप सर्वे योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 साठी ई-पीक पाहणी नोंदणी सध्या सुरू आहे.या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत,कर्जसुविधा व विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. रब्बी हंगामाची सुरुवात 10 डिसेंबर 2025 पासून झाली असून,शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी 24 जानेवारी 2026 पर्यंत करण्यात आली होती.त्यानंतर सहाय्यक स्तरावरून 25 जानेवारी 2026 पासून ई-पीक पाहणी नोंदणी सुरू करण्यात आली.या नोंदणीसाठीची मुदत पूर्वी 10 मार्च 2026 पर्यंत होती.मात्र,जिल्ह्यातील एकूण अपेक्षित क्षेत्रापैकी केवळ 24.66 टक्के नोंदणी पूर्ण झाल्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत.यामुळे कोणताही शेतकरी शासकीय लाभांपासून वंचित राहू नये,यासाठी शासनाने ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत दि.31 मार्च 2026 पर्यंत वाढविली आहे. ई-पीक पाहणीच्या नोंदीवरच पीक विमा योजना,नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई,शेतकरी कर्ज व अनुदान व इतर कृषी योजनांचा लाभ निश्चित होतो.म्हणून ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदणी अद्याप झालेली नाही,त्यांनी आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकांच्या मदतीने मोबाईल ॲपच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पूर्वी अचूक व वेळेत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत गावोगावी विशेष मोहीम राबविण्यात येत असून या कामाचा दररोज आढावा घेतला जात आहे.शासनाची ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून, भविष्यातील सर्व शासकीय लाभ ई-पीक पाहणीच्या नोंदीवर आधारित राहणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सहाय्यकांच्या मदतीने आपली ई-पीक पाहणी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून दोन निष्पाप मुलींच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.बालविवाह आणि कौटुंबिक त्रासाच्या विळख्यात अडकलेल्या या मुलींना मुक्त करून त्यांना नव्या आयुष्याची दिशा देण्यात आली आहे.या मुलींची शक्ती सदन येथे रवानगी करण्यात आली असून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. धाराशिव तालुक्यातील एका गावातील शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलीने तिच्या आईने तिच्या व वडिलांच्या इच्छेविरुद्ध लावलेल्या बालविवाहाविरोधात धाडसाने आवाज उठवला.शिक्षण बंद करून मारहाण केली जात असल्याची वेदनादायक कहाणी तिने 13 मार्च 2026 रोजी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्जाद्वारे मांडली. हा अर्ज मिळताच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव भाग्यश्री पाटील यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली. या प्रकरणासाठी बालस्नेही संघातील उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दोन्ही मुलींची व्यथा समजून घेतली. चौकशीदरम्यान पीडित मुलीने लग्नातील फोटो आणि मारहाणीचे व्हिडिओ सादर केले.मात्र,तिची परीक्षा 18 मार्च रोजी संपत असल्याने पेपर संपल्यावर मी येते, असे तिने सांगितले.शिक्षणाविषयीची तिची जिद्द यामधून स्पष्ट झाली. 18 मार्च 2026 रोजी पीडिता तिच्या लहान बहिणी व वडिलांसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे आली. त्या वेळी दोन्ही बहिणी भीती आणि तणावाखाली होत्या.त्यांनी घरी परतण्यास नकार दिल्यानंतर तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधण्यात आला.त्यानंतर जिल्हा महिला बालविकास चाइल्ड लाईनचे अमर भोसले,पुनम पाटील, श्री.चव्हाण तसेच सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रतिनिधी प्रियंका जाधव व एक महिला प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. पीडित मुलींशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांना बालकल्याण समिती सदस्य ॲड.दिपाली जहागिरदार यांच्या समोर हजर करण्यात आले.तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन बालकल्याण समितीने दोन्ही मुलींना शक्ती सदन,बालाजी नगर,शेकापूर रोड,धाराशिव येथे पाठविण्याचा आदेश दिला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या संवेदनशील आणि तत्पर हस्तक्षेपामुळे दोन अज्ञान मुलींना त्रासातून मुक्तता मिळाली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटक आणि अज्ञान बालकांना कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय,धाराशिव यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
धाराशिव नगरपरिषदेसाठी 5 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारणार
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषदेला पाणीपुरवठ्यासाठी दरमहा येणाऱ्या भरमसाठ वीज बिलाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता ठोस पावले उचलण्यात येत आहेत. उजनी धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरावी लागत असल्याने नगरपरिषदेला लाखो रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. अनेक वेळा वीज तोडणीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या नेतृत्वात महत्त्वाकांक्षी सोलार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव शहराजवळ असलेल्या वरवंटी शिवारात महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या सुमारे 15 एकर जमिनीवर 5 मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ही जमीन नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, या जागेची प्राथमिक पाहणी करण्यात आली असून सोलार प्रकल्प उभारणीसाठी ती उपयुक्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पाहणी दौऱ्यात पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, बांधकाम सभापती अभिजीत काकडे, नगरसेवक पंकज भोसले, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, वरवंटी गावचे तलाठी तसेच वारी सोलार प्रकल्प भगवान शेजुळ यांच्या सह इतर कंपनीचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. हा सोलार प्रकल्प कार्यान्वित झाल्यास धाराशिव नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.
खरीप 2020 पीक विम्याचे पैसे वाटपासाठी विशेष खाते उघडण्यास मंजुरी- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 2020 साल खरीप हंगामातील पीक विमा परताव्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने मंगळवार 24 मार्च रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. पात्र शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यासाठी वैयक्तिक ठेव खाते उघडण्यास विशेष बाब म्हणून आपल्या महायुती सरकारने आता मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. खरीप 2020 च्या पीक विम्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अदा करण्यासाठी धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावाने स्वतंत्र खाते उघडण्याची आवश्यकता होती. 134 कोटींहून अधिकचा निधी आपल्या महायुती सरकारने उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी शासनाने निधीची व्यवस्था केली आहे. त्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रलंबित राज्य हिस्सा म्हणून 134 कोटी 11 लाख 91 हजार 938 रुपये वितरित करण्यात आले आहेत. न्यायालयाकडून मिळालेली व्याजासह रक्कम देखील याच खात्यात जमा केली जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
माजी सैनिक नामदेव सावंत यांचे आकस्मिक निधन
ओटवणे प्रतिनिधी भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार तथा जिल्हा समायोजन कार्यालयातील मुख्य लिपिक नामदेव रामचंद्र सावंत (५३) यांचे गुरुवारी दुपारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाचा सावंत कुटुंबीयांसह आजी – माजी सैनिक परिवार व सर्वांनाच धक्का बसला. मूळचे दाणोली गावठण येथील नामदेव सावंत यांनी भारतीय सैन्य दलात विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर ते ओरोस येथे जिल्हा [...]
सावंतवाडीत विजेचा खेळ खंडोबा ; नागरिक हैराण
दिवसातून 24 ते 25 वेळा जाते लाईट सावंतवाडी । प्रतिनिधी अमेरिका , इस्राईल- इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात गॅस सोबतच पेट्रोल, डिझेलचाही तुटवडा भासू लागला आहे. त्याबरोबरच सावंतवाडीकर सध्या विजेच्या खेळाने त्रस्त झाले आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल १२ तासांमधून 24 ते 25 वेळा वीज येत -जात असल्याने नागरिक हैराण [...]
IPL 2026 –आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; BCCI ची मोठी घोषणा, कारण काय?
BCCI ने आयपीएल २०२६ चा पारंपारिक उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी (28 एप्रिल 2026) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना रंगणार आहे, मात्र त्यापूर्वी कोणताही सोहळा होणार नाही. गेल्या वर्षी 4 जून 2025 रोजी बंगळुरूमध्ये झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. […]
नवे आर्थिक वर्ष सुरू होणार; नवीन आयकर कायदा लागू होणार, काय होणार बदल…जाणून घ्या…
१ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते. तसेच नव्या आर्थिक वर्षात अनेक बदलही केले जातात. यंदा नव्या आर्थिक वर्षात नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. त्यामुळे अनेक बदल होणार आहेत. ITR आणि PAN मधील हे बदल माहित असणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे आयकर श्रेणीत कोणताही बदल होणार नाही. तर उत्पन्न, वजावटी, पगार, भांडवली नफा आणि […]
आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा हिंदुस्थानला बसत आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने हिंदुस्थानमध्ये इंधन टंचाई आणि एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे एलपीजीच्या बुकिंगबाबतही सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेतील संबोधनादरम्यान ‘कठोर परिस्थिताला सामोरे जाण्यास तयार रहा’, असे म्हटले होते. यानंतर लॉकडाऊनच्या अफवांचा बाजार उठला आणि पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या. […]
दोन दिवसांनी पेट्रोलपंपांवरील गर्दी ओसरली
अफवांमुळे नागरिकांची ससेहोलपट : तासन्तास लावाव्या लागल्या रांगा बेळगाव : इंधन टंचाईची अफवा पसरल्यामुळे मागील दोन दिवसांत पेट्रोलपंपांवर प्रचंड गर्दी झाली होती. अखेर ही अफवा असल्याचे समजल्याने बुधवारी सकाळपासून परिस्थिती पूर्वपदावर आली. गर्दी ओसरू लागल्याने मुबलक पेट्रोल असतानाही पेट्रोलपंपांवर शुकशुकाट दिसून आला. रविवारी रात्रीपासून काही व्यक्तींनी सोशल मीडिया व रिल्सच्या माध्यमातून बेळगावमध्ये पेट्रोलचा तुटवडा असे [...]
अट्टल घरफोड्यांना उद्यमबाग पोलिसांकडून अटक
साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत बेळगाव : दोघा अट्टल घरफोड्यांना अटक करून त्यांच्याजवळून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे दागिने व वाहने जप्त करण्यात आली आहेत. उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रामचंद्र फकिराप्पा तळवार (वय 21) राहणार मोहरे, ता. बैलहोंगल, सुरेश लक्काप्पा पाटील (वय 33) राहणार राजनकट्टी, सध्या राहणार रंगदोळी-वाघवडे रोड अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून [...]
…पण अजूनही ‘भोंदूगिरी’संपलेली नाही !
मंगल – नाईक जोशी ‘देवाचे अवतार’ म्हणवून घेणारे स्वयंघोषित बुवा महिलांवर अत्याचार करीत असताना सुशिक्षित युवतींनी जाणीवपूर्वक जागरूक राहण्याची वेळ आलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील मुलींनी पुरोगामी विचार आणि विज्ञानाशी सख्य जोडले पाहिजे. खरे तर, महाराष्ट्राचे ‘पुरोगामी’ असणे म्हणजे ललाटी अभिमानाने टिळा मिरवावा, अशी गर्भश्रीमंत ओळख आहे. परंतु महाराष्ट्रात जे घडते आहे ते पाहता, पुरोगामी महाराष्ट्राची [...]
ओडिसातील सुप्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिराच्या ‘रत्नभांडारा’तील अमूल्य दागिन्यांची आणि खजिन्याची मोजणी प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. तब्बल 46 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर हे रत्न भांडार उघडण्यात आले. या खजिन्यात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा देवींचे सोन्या-चांदीचे अलंकार, मौल्यवान रत्ने आणि पुरातन नाणी यांचा समावेश आहे. 12 व्या शतकातील या मंदिराला ‘धरतीवरील वैकुंठ’ मानले जाते. बुधवारी दुपारी […]
चिअर्सSsss…आता पेट्रोल पंपावर दारूही मिळणार; नवीन अबकारी धोरणाला शासनाची मंजुरी
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यातील बहुतांश पेट्रोल पंप कोरडे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहन धारकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहेत. एकीकडे काही भागात पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल मिळायचे वांदे झालेले असताना दुसरीकडे चंदीगड प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. चंदीगड प्रशासनाने नवीन अबकारी घोरणाला मंजुरी दिली असून आता दारूच्या दुकानांमध्येच नाही तर पेट्रोल पंप, शॉपिंग […]
सावंतवाडीत “ज्ञानियांचा राजा -मोगरा फुलला” उत्साहात
सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचलनालय महाराष्ट्रचे आयोजन सावंतवाडी प्रतिनिधी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने “ज्ञानियांचा राजा–मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक-संगीत कार्यक्रम बुधवार 25 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता बॅरिस्टर नाथ पै बहुउद्देशीय सभागृह , सावंतवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमातील [...]
LPG Crisis –देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती साठा आहे? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती
इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाने जगभरात कच्चे तेल आणि नैसर्गिल वायूची कमतरता निर्माण झाली आहे. हिंदुस्थानवरही याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती साठा आहे? याची महिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा नियंत्रणात आहे. देशात सध्या ६० दिवसांचा साठा उपलब्ध आहे. सरकारने […]
ब्लूटूथ इयरफोन्समुळे खरोखरच कॅन्सर होतो का? अमेरिकन न्युरोसर्जननी मांडले सत्य!
ब्लूटूथ इयरफोन्स हा आपल्या जच्या धावपळीच्या युगात आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. प्रवासात असो वा कार्यालयात, हे उपकरण सतत आपल्या कानाशी जोडलेले असते. मात्र, याच वाढत्या वापरासोबत रेडिएशन आणि मेंदूच्या कर्करोगाच्या (ट्यूमर) जोखमीबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. या विषयातील सखोल सत्य जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. रूपा जुथानी यांनी वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे काही [...]
मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा निर्णय घेतला आहे. इराणने हिंदुस्थानसह 5 देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराणी सरकारी टीव्हीशी बोलताना याबाबत माहिती दिली. ‘रॉयटर्स’ने याबाबत वृत्त दिले आहे. पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी दावा केल्याप्रमाणे होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करत अब्बास अराघची म्हणाले […]
Health Update : उरलेला भात पुन्हा गरम करून खाताय? सावधान! शरीरासाठी ठरू शकते ‘स्लो पॉयझन’.
अनेकदा घरामध्ये भात उरला की, आपण तो जपून ठेवतो आणि पुढच्या वेळेस पुन्हा गरम करून खातो. भाताच्या बाबतीत ही सवय अत्यंत घातक ठरू शकते. जर उरलेला भात योग्य पद्धतीने साठवला नाही किंवा तो वारंवार गरम केला, तर त्यात हानिकारक जीवाणूंची वाढ होऊन अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. बऱ्याचदा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जाते, जे [...]
Israel Iran War –अमेरिकेचा खतरनाक प्लॅन तयार; इराणमध्ये सैन्य उतरवण्यावर विचार सुरू
अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध आता निर्णायक टप्प्यावर पोहचले आहे. अमेरिका युद्धसमाप्तीची घोषणा करत असून इराणशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. तर इराणने स्पष्य शब्दात याचा इन्कार केला आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आपली पुढची मोठी योजना तयार केली आहे. या योजनेत ५०,००० अमेरिकी सैनिक, २०० लढाऊ विमाने, दोन विमानवाहू जहाजे आणि १,००० कमांडोंचा […]
मधुमेह नियंत्रणात केवळ आहार-औषधे पुरेशी नाहीत; ‘या’सवयीची जोड रक्तातील साखरेसाठी ठरेल रामबाण!
मधुमेहींसाठी खास ‘वॉकिंग’ तंत्र मधुमेहाच्या व्यवस्थापनात केवळ आहार आणि औषधे पुरेशी नसतात. योग्य व्यायाम आणि जीवनशैलीची जोड नसल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. अनेकदा उत्तम आहार घेऊन आणि वेळेवर औषधे घेऊनही साखर वाढत असल्याचे दिसते. यामागे मानसिक ताण, अपुरी झोप [...]
मनपाच्या अशोकनगर कार्यालयात ठिय्या : केआयएडीबी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक-रहिवासी आक्रमक, झोनल आयुक्तांच्या कामकाजाबाबत नाराजी बेळगाव : केआयएडीबी औद्योगिक वसाहतीतील मिळकतीना ई-आस्थी देण्यासाठी महापालिकेच्या अशोकनगर कार्यालयातील अधिकारी टोलवा टोलवी करत आहेत. त्यामुळे कर्ज, मिळकती घेणे व विक्री करणे कठीण झाले आहे. महापालिकेत ई-आस्थी व पीआयडी देण्याबाबत ठराव होऊनही दुर्लक्ष केले जात आहे. झोनल आयुक्त अनिल बोरगावी [...]
जलवाहिनीसाठी चन्नम्मा चौकातून होणार खोदकाम
मनपा-एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी : एप्रिलपासून कामाला सुरुवात होण्याची शक्यता बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथील पाण्याच्या टाकीतून शहरातील प्रमुख गल्ल्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे चन्नम्मा चौकातून खोदकाम करावे लागणार असल्याने कशा पद्धतीने जलवाहिनी घालण्याचे काम हाती घ्यावे, तत्पूर्वी कोणती खबरदारी घ्यावी, चन्नम्मा सर्कल शहरातील प्रमुख रहदारीचे ठिकाण असल्यामुळे नियोजनबद्ध काम केले पाहिजे. यासाठी [...]
भोंदूबाबा अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लिल व अश्लाघ्य कारनाम्याने महाराष्ट्राची पुरती नाचक्की झालेली असताना राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नरहरी झिरवाळांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, […]
पिंपळवाडीत घराच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी सातारा -पिंपळवाडी धावडशी येथे जुन्या गावठाणच्या जागेवर घराच्या बांधकामाच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद निर्माण होऊन एकमेकांना मारहाणीची घटना घडली आहे. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे. बजरंग बाबुराब फाळके यांनीप्रवीण परशुराम फाळके (वय ३४,रा. पिंपळवाडी, [...]
तळमावलेत इंधन तुटवड्याची अफवा! पेट्रोल पंपांवर जत्रेसारखी गर्दी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
इंधन साठवण्यासाठी नागरिकांची पेट्रोल पंपांवर झुंबड तळमावले – युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सध्या सर्वत्र डिझेल-पेट्रोलच्या तुटवड्याबाबत अफवा पसरल्याने नागरिकांनी रात्रीपासून पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. डिझेल-पेट्रोल मिळणार नाही ही अफवा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्याचा परिणाम म्हणून येथील पेट्रोल पंपावर जत्रेसारखी गर्दी उसळली आहे. एका [...]
शौर्य पुरस्कारप्राप्त सैनिकांसह कुटुंबीयांना रेल्वेच्या एसी डब्यांमधून आजीवन मोफत प्रवास
देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांचा सन्मान करत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील शौर्य पुरस्कार विजेत्यांना आता एसी डब्यांमध्ये आजीवन मोफत प्रवास मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत एक आदेश जारी केला आहे. हा निर्णय म्हणजे शूर सैनिकांना दिलेली ही एक आदरांजली आहे. ही सुविधा केवळ सेनिकांपुरतीच मर्यादित नाही. […]
वीजतारेच्या धक्क्याने सहा मेंढरांचा मृत्यू
बेळगाव-वेंगुर्ले मार्गानजीक उचगाव हद्दीतील शेतवडीतील दुर्घटना वार्ताहर/उचगाव बेळगाव-वेंगुर्ले मार्गानजीक उचगाव हद्दीतील शेतवडीत विद्युत तार तुटून पडल्याने सहा मेंढरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजता घडली. त्यामुळे या धनगराला दीड लाखाचा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेने संपूर्ण उचगाव परिसरातील धनगर समाजामध्ये एकच खळबळ माजली आहे. या नुकसानीबाबत शासनाने त्वरित आर्थिक साहाय्य करावे, अशी [...]
कॅन्टोन्मेंटला राज्य सरकारकडून निधी
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 6 कोटी 40 लाख खर्च करणार बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रस्ते आता चकाचक होणार आहेत. राज्य सरकारकडून 6 कोटी 40 लाख रुपयांचा निधी कॅन्टोन्मेंटला देण्यात आला आहे. या निधीतून खराब झालेले रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत. त्यामुळे कॅम्प तसेच किल्ला येथील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डला निधी मिळत नसल्याने [...]
बेळगावहून मुंबईसाठी पुन्हा घेता येणार भरारी
29 मार्चपासून दोन विमानफेऱ्या होणार सुरू : प्रवाशांतून समाधान बेळगाव : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहराला रविवार दि. 29 पासून बेळगावमधून विमानफेरी सुरू होत आहे. मुंबई व नवी मुंबई या दोन्ही विमानतळांसाठी बेळगावमधून सेवा सुरू होत असल्याने बेळगावमधील उद्योगजगतातून समाधान व्यक्त होत आहे. प्रवाशांना सकाळी मुंबईला पोहोचून रात्री पुन्हा बेळगावला परतण्याची संधी यामुळे मिळणार आहे. [...]
कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णेत कोयत्याचा थरार! एकंबे – कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथे श्री नवलाईदेवी यात्रेवेळी मंदिराजवळ झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च [...]
लोककल्प फौंडेशनतर्फे देवाचीहट्टी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्यावतीने सेंट्राकेअर हॉस्पिटलच्या साहाय्याने देवाचीहट्टी (ता. खानापूर) येथे मंगळवार दि. 24 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे 40 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करून आवश्यक नागरिकांना आरोग्यासंबंधी सल्ला देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याच्या [...]
Israel Iran War – इराणचा अमेरिकन तळांवर हल्ला; 6 सैनिकांचा मृत्यू, कुवैतमधील रडार यंत्रणा उद्ध्वस्त
आखाती देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून इराणने अमेरिकेच्या विविध लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी कुवैत, कतार आणि सौदी अरेबियातील अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे. या भीषण संघर्षात अमेरिकेच्या 6 सैनिकांचा मृत्यू झाला असून अनेक महत्त्वाच्या लष्करी सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कुवैत येथील ‘शुएबा’ बंदरावर […]
क्लब रोडवरील धोकादायक झाडे हटविण्याकडे कॅन्टोन्मेंटचा कानाडोळा
बेळगाव : क्लब रोडवरील अनेक वृक्ष कोसळण्याच्या स्थितीत आहेत. परंतु, ते हटवण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक पावसात क्लब रोड, हिंडलगा रोड, गणेशपूर रोड या परिसरात झाडे कोसळत आहेत. त्यामुळे निष्पापांचा बळी जाण्यापूर्वी या रस्त्यावरील धोकादायक झाडे हटविण्याची मागणी केली जात आहे. मंगळवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे अरगन तलावानजीक झाड कोसळले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहतुकीस अडथळा [...]
चार दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आखाती देशातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनासारखी लॉकडॉऊनची परिस्थिती निर्माण होवू शकते, असे भाषण केल्याने गेल्या दोन दिवसापासून शहर आणि जिल्ह्यात अफवा पसरल्या आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी लोकांनी रांगाच रांगा लावल्या. काही पेट्रोलपंप रात्रीच बंद पडले. प्रशासनाची व पुरवठा विभागाची कचुराई व सतर्कता न बाळगळल्याने नांदेडकर मात्र त्रस्त […]
चार दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आखाती देशातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनासारखी लॉकडॉऊनची परिस्थिती निर्माण होवू शकते, असे भाषण केल्याने गेल्या दोन दिवसापासून शहर आणि जिल्ह्यात अफवा पसरल्या आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी लोकांनी रांगाच रांगा लावल्या. काही पेट्रोलपंप रात्रीच बंद पडले. प्रशासनाची व पुरवठा विभागाची कचुराई व सतर्कता न बाळगळल्याने नांदेडकर मात्र त्रस्त […]
विश्वविक्रमातून सोमय्या ग्रुप देणार जगाला शांती संदेश, सोमय्या ग्रुप संस्थेचा दुसरा विक्रम ठरणार
जगभरातील युद्धजन्य परिस्थिती, महागाई आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सने शांततेचा जागतिक संदेश देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘युद्ध नव्हे, तर शांती हवी’ हा ठाम संदेश देत ही संस्था 28 मार्च ला सकाळी 9 वाजता नवा विश्वविक्रम नोंदविणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना सांगीतली. चंद्रपूर शहरातील वडगाव […]
नोकर भरती विरोधात दलित संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अनुसूचित जातीसाठी अंतर्गत आरक्षणाशिवाय भरतीच्या निर्णयाला विरोध बेळगाव : नोकरी शोधणाऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून मंत्रिमंडळाने 53432 जागांवर भरती करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आपला विरोध नाही. मात्र नोकर भरतीमध्ये अनुसूचित जातीसाठी अंतर्गत आरक्षणाशिवाय भरती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आपला विरोध आहे, असे निवेदन कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आले. मादिग, संबंधित समुदाय गेल्या [...]
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी 2026-27 हंगामातील हिंदुस्थानच्या पुरुष संघाच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या हंगामात हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे. एकूण 5 कसोटी, 9 वनडे आणि 8 टी-20 सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून हे सामने देशातील 17 विविध शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, […]
जुने कपिलेश्वर तलावाशेजारील धोकादायक पाण्याच्या टाकीकडे दुर्लक्ष
बेळगाव : जुन्या कपिलेश्वर तलावाशेजारी बसविण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा लोखंडी स्टँड पूर्णपणे गंजून गेला आहे. सदर पाण्याची टाकी कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर स्टँडची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाशांकडून अनेकवेळा एलअँडटीकडे करण्यात आली. तरीदेखील त्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार [...]
Israel Iran War –आता ट्रम्प मोठा हल्ला करणार; इराणला धमकी देत अमेरिकेने स्पष्ट केले इरादे
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाला २७ दिवस झाले आहेत. पण परिस्थिती सामान्य होण्याऐवजी, ती आणखी बिघडत चालली आहे. आता, व्हाईट हाऊसच्या एका नवीन निवेदनाने आगीत तेल ओतले असून, इराणवर मोठ्या हल्ल्याचे संकेत दिले आहेत. इराणला अमेरिकेकडून पुन्हा एकदा मोठा इशारा देण्यात आला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प […]
मार्कंडेय नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाणीटंचाई
शेतातील पिकांना पाणी कसे द्यावे, याची शेतकऱ्यांना चिंता : वर्षभर पाणी पात्रात टिकून राहण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक वार्ताहर/उचगाव बेळगावच्या पश्चिम भागातील हजारो एकर जमिनीतील पिकांची आणि जनतेची जीवनदायीनी ठरलेल्या मार्कंडेय नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतवडीतील पिकांबरोबरच या संपूर्ण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचीही टंचाई आता तीव्र भासू लागणार असल्याचे संकेत या भागात निर्माण झाले [...]
Israel Iran War –रशियातून तेल घेऊन जाणाऱ्या तुर्कीच्या टँकरवर काळ्या समुद्रात हल्ला
रशियातून कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या तुर्कीच्या तेलवाहू जहाजावर गुरुवारी पहाटे काळ्या समुद्रात भीषण हल्ल्याची घडली. मानवरहित नौकेद्वारे हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता तुर्कीचे परिवहन मंत्री अब्दुलकादिर उरालोघलू यांनी व्यक्त केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सिएरा लिओनचा ध्वज असलेले आणि तुर्की कंपनीमार्फत चालवल्या जाणारे हे जहाज रशियातून कच्चे […]
पोलीस महानिरीक्षकांची खानापूर स्थानकाला भेट
कामकाजाची केली पाहणी : प्रलंबित प्रकरणे-चोरीच्या घटनांबद्दल पोलिसांना विशेष सूचना खानापूर : पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड आणि जिल्हा पोलीस अधिक्षक के. रामराजन यांनी बुधवारी भेट देवून स्थानकाच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी पोलीस स्थानकाच्या आवारात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. बुधवारी सकाळी दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खानापूर पोलीस स्थानकाला भेट देवून स्थानकातील विविध विभागांचा आढावा [...]
सांगलीच्या राम मंदिर चौकात भक्तीचा जागर सांगली – आज साजऱ्या होणाऱ्या रामनवमीनिमित्त शहरातील विविध राममंदिरांना आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. गेले आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची सांगता आज मुख्य दिवशी होत आहे. शहरातील राम [...]
केदनूर येथे कलमी आंब्याच्या बागेला आग लागून 30 झाडे जळून खाक
शेतकऱ्याला सुमारे तीन लाखाचा फटका : शेतकऱ्याचे मोठे नुकसान वार्ताहर/अगसगे केदनूर येथे कलमी आंब्याच्या बागेला आग लागून सुमारे 30 झाडे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. मनोहर यल्लाप्पा कोरे या शेतकऱ्याची गावच्या पश्चिमेला मासार शिवारामध्ये एकूण 50 कलमी आंब्याची झाडे आहेत. त्यापैकी 30 झाडे अचानक आग लागून आंब्याच्या फळासह [...]
पावसाचे पाणी साचल्याने शाळेचा परिसर जलमय
नंदगड संत मेलगे शाळेच्या आवाराची अवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष वार्ताहर/नंदगड नंदगड येथील संत मेलगे मराठी प्राथमिक शाळेच्या आवारात मंगळवारी पडलेल्या वळीव पावसामुळे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्ये जाण्या येण्यास अडचण निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षापासून शाळेसमोर व परिसरातील आवाराची उंची वाढवण्यासाठी ग्रा. पं., ता. पं. व जि. पं. कार्यालय तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज व विनंती यापूर्वी [...]
सांगली महासभेपाठोपाठ स्थायी समितीमध्येही गॅस कंपनीला दणका सांगली : महापालिका क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फोडणाऱ्या आणि रस्त्याची चाळण करणाऱ्या गॅस कंपनीला महापालिका प्रशासनाकडून तब्बल ४२ लाखाची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका स्थायी समिती सभेमध्ये देण्यात आली. स्थायी सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रभाग क्रमांक १९ चे नगरसेवक आणि [...]
दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या अत्याधुनिक एअरबस A350-900 विमानाला गुरुवारी तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा दिल्लीत परतावे लागले. हे विमान हवेत जवळपास सात तास होते. त्यानंतर सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे. एअर इंडियाचे AI111 हे विमान गुरुवारी सकाळी 6 च्या सुमारास दिल्लीहून लंडनसाठी रवाना झाले होते. विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असताना […]
आईने सोडलेल्या बाळाला सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांची माया सांगली -माणुसकी अजून जिवंत असल्याचा प्रत्यय देणारी हृदयस्पर्शी घटना शासकीय सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे घडली. जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी आईने सोडून दिलेल्या बाळाला सिव्हिलच्या डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन महिने आईचे प्रेम देत जपले. या बाळाचे नामकरण ‘बीरप्रताप’ असे करत अखेर [...]
दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट पुणे – पुणे मराठवाडा ते दक्षिण कर्नाटक किनारपट्टीदरम्यान पसरलेला हवेचा ट्रफ, दक्षिण कर्नाटकवर असलेली हवेची द्रोणीय स्थिती यामुळे राज्याच्या दक्षिण भागात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात सिंधुदुर्ग, सातारा, सांगली तसेच सोलापुरमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट [...]
होर्मुझ नाकेबंदीचे नेतृत्व करणारे इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याची जबाबदारी अलीरेझा तांगसिरी यांच्यावर होती, असे इस्रायली अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेबाबत इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इस्रायली प्रसारमाध्यमांनी एका इस्रायली अधिकाऱ्याचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’चे (IRGC) […]
दागिने चोरी प्रकरणातील संशयितांना पोलीस कोठडी
मालवण येथील घटना ; सरकार पक्षातर्फे ॲड. नितीन कुंटे यांनी मांडली बाजू प्रतिनिधी । मालवण मालवण येथील राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरी प्रकरणातील संशयित अमृता अमर म्हापणकर रा .कुंभारमाठ ता. मालवण आणि राघो सूर्यकांत राऊत, रा .सुकळवाड ता. मालवण यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याकामी सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. [...]
बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. दौलतदिया फेरी टर्मिनलजवळ बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बस थेट पद्मा नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 24 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून ईदची सुट्टी घालवून हे सर्व जण माघारी परतत होते. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले […]
Kolhapur News |कोल्हापूर एक तास अंधारात! ग्लोबल वॉर्मिंगच्या लढ्यासाठी उद्या ‘अर्थ अवर’उपक्रम
‘अर्थ अवर’ निमित्त कोल्हापुरात एक तास दिवे बंद कोल्हापूर -वर्ल्ड बाईल्ड फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) च्या आवाहनानुसार, शनिबार, दि. २८ रोजी ‘अर्थ अवर” उपक्रमाचे आयोजन केले आहे. उपकरणे सांयकाळी ७.३० ते शनिवारी शहरातील सर्व विद्युत८.३० अशी एक तासांसाठीबंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिगबाबत जनजागृतीसाठी उपक्रम उपयुक्त ठरत [...]
विभागीय वन अधिकारी महेश झांजुर्णे यांना मानाचे सुवर्ण पदक सातारा -वनसंरक्षण क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्याच्या वनसेवेत आपली ठळक ओळख निर्माण करणारे विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), जळगाव येथील महेश सुरेश झांजुर्णे यांना महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत सन २०२४-२५ साठी सुवर्ण पदक जाहीर करण्यात आले आहे. वनसंरक्षणाच्या [...]
डॉ. जयसिंगराव पवार यांची ८५ व्या वर्षी प्राणज्योत मालवली कोल्हापूर – महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील एक सुवर्णपान आज कायमचं मिटलं आहे. ज्यांनी इतिहासाची धूळ झटकली आणि खरं सत्य जगासमोर आणलं ते ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार [...]
राज्यात 24.5 लाख ग्रामीण कुटुंबे अद्यापही नळजोडणीपासून वंचित
जलजीवन मिशन अंतर्गत मुदत उलटूनही नळजोडणी देण्यात अपयश बेळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात 72.1 लाख उद्दिष्टांपैकी 34 टक्के म्हणजेच 24.5 लाख ग्रामीण कुटुंबांना मार्च 2024 ची अंतिम मुदत उलटूनही नळजोडणी देण्यात अपयश आले आहे. सात जिल्ह्यांमध्ये 2019 ते 2024 या कालावधीत केलेल्या लेखापरीक्षणात नियोजन, अंमलबजावणी, आर्थिक व्यवस्थापन आणि पाण्याच्या गुणवत्तेच्या देखरेखीत त्रुटी आढळून आल्या. [...]
Israel Iran War – इराण आणि कतारमध्ये ‘सिक्रेट डील’? युद्धातून घेतला काढता पाय
आखाती देशांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि कतारमध्ये एका ‘सिक्रेट डील’ची जोरदार चर्चा सुरू आहे. इस्रायली वेबसाइट ‘JFeed’ च्या मते, इराणने कतारच्या तेल आणि वायू तळांवर हल्ले थांबवावेत, यासाठी कतारने इराणला 6 अब्ज डॉलर्स देण्याचे मान्य केले आहे. हे तेच पैसे आहेत जे 2023 मध्ये अमेरिकन कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात इराणला मिळणार होते, मात्र नंतर कतारने […]
शहरातील कँटिलिव्हरवरील दिशादर्शक फलकांची दुरवस्था
महापालिकेने लक्ष देण्याची मागणी : नवीन फलक बसविण्याची गरज बेळगाव : महानगरपालिकेकडून शहरातील विविध ठिकाणच्या कँटिलिव्हरवर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सदर फलक नव्याने बसविण्यात आलेले नाहीत त्यामुळे जुन्या दिशादर्शक फलकांची दयनीय अवस्था बनली आहे. काही ठिकाणच्या फलकांवरील नावे अस्पष्ट असून काही फलक फाटले आहेत. त्यामुळे याकडे महापालिकेने लक्ष देऊन दिशादर्शक [...]
जाहिरातींची पत्रके रस्त्यावर फेकल्याने सफाई कर्मचाऱ्यांची दमछाक
बेळगाव : परीक्षा सुरू झाल्या की शहरातील विविध शैक्षणिक संस्था आपापल्या कोचिंग क्लासेसची जाहिरातींची पत्रके प्रसिद्ध करू लागतात. काही संस्था तर यासाठी खास तरुण-तरुणींची नेमणूक करतात. त्यांनी रस्त्यावर थांबून त्या संस्थेचे पत्रक दिसेल त्याला वाटायचे, असा हा प्रकार असतो. परंतु विद्यार्थ्यांना आणि काही वेळेला सुजाण म्हणवून घेणाऱ्या नागरिकांनासुद्धा या पत्रकाचे काय करायचे? हे समजत नाही. [...]
एसएसएलसी विद्यार्थ्यांची आमदारांनी घेतली भेट
बेळगाव : एसएसएलसी परीक्षा देणाऱ्या कणबर्गी येथील विद्यार्थिनींची आमदार असिफ सेठ यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या अभ्यासाबाबत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर दहावीच्या निकाल वाढीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बुधवार दि. 18 पासून एसएसएलसी परीक्षा सुरू झाली आहे. 2 एप्रिलपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. या परीक्षांबाबत आमदारांनी विद्यार्थ्यांना सूचना केल्या. जनता दरबारनिमित्त ते [...]
सागर देवकातेने उदयकुमारला दाखविले ‘घिश्शा’वर अस्मान
विश्वचरण, संभाजी परमोजी, रामदास यांचे प्रेक्षणीय विजय, हजारो कुस्तीशौकिनांची उपस्थिती वार्ताहर/काकती सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्र चॅम्पियन सागर देवकातेने दिल्लीच्या उदयकुमारला 18 व्या मिनिटाला घिस्सा डावावर तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत विश्वचरण सोलंकरने अवघ्या दोन मिनिटात सदाशिव नलवडेला छडीटांग डावावर अस्मान दाखवून उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली. [...]
हलसाल क्रिकेट स्पर्धेत गर्लगुंजीचा संघ विजेता
वार्ताहर/नंदगड हलसाल येथे आयोजित हाफपिच क्रिकेट स्पर्धेत गर्लगुंजीच्या मराठा स्पोर्ट्स संघ विजेता तर हलसालचा माउली संघ उपविजेता ठरला. कलमेश्वर संघ डिगेगाळीने तृतीय क्रमांक तर कापोली माउली संघाने चतुर्थ स्थान पटकावले. या विजेत्या संघांना युवा नेते प्रशांत लक्केबैलकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी किशोर हेब्बाळकर, संजय देसाई, देमाणी मष्णूचे, दत्तू कुट्रे, हेमंत [...]
सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर; ताप आणि संसर्गामुळे दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना ताप आणि संसर्गाच्या तक्रारीमुळे दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय […]
कणेरी मठात रंगणार कारागीर महाकुंभ कोल्हापूर -कोल्हापूरची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ येथे दि. ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ” हा भव्य सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि सिद्धगिरी संस्थान [...]
पुरवठा असूनही पेटोलपंपांवर झुंबड
वाहनांच्या टाक्यांसह गॅलन, बाटल्या भरण्यास गर्दी : बहुतेक पेट्रोलपंपांवर लांबचलांब रांगा : ग्राहकांत वाद-भांडणे पणजी : ‘राज्यात पेट्रोल आणि गॅस सिलिंडरचा मुबलक साठा असून कुणीही घाबरून जाऊ नये, तसेच साठवणूक करण्यासाठी पंपावर गर्दी करू नये’, असे मुख्यमंत्र्यांकडून वारंवार सांगण्यात येत असले तरीही काल बुधवारी अचानक राजधानीसह राज्याच्या अनेक शहरांमध्ये सर्व पेट्रोलपंपावर वाहनांची अक्षरश: झुंबड पहायला [...]
साखळीतील जमीन रूपांतरण होणार रद्द!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : कलम 39 ए अंतर्गत दिलेल्या मंजुरी रद्द करण्याचे निर्देश पणजी : साखळी आणि परिसरातील जमिनींच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले. साखळी नगररचना कायद्याच्या कलम कलम 39 ए अंतर्गत 80,926 चौरस मीटर जमिनीचे ऊपांतरण करण्याच्या प्रस्तावास देण्यात आलेली [...]
फोंड्यातील पोटनिवडणुकीनंतर भरणार मंत्रिमंडळातील रिक्त जागा
पणजी : माजी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेली मंत्रिमंडळातील एक जागा फोंडा पोट निवडणुकीनंतर भरली जाईल, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री सावंत यांनी फोंडा पोटनिवडणुकीतील विजयी आमदाराला मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे फोंडावासीयांची आशा वाढली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. फोंडा पोटनिवडणुकीसाठी [...]
राज्यातील नगरपालिकांच्या नगरसेवकांची संख्या निश्चित
पणजी : राज्य निवडणूक आयोगाने गोव्यातील विविध नगरपालिकांसाठी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नगरसेवकांची मर्यादा निश्चित केली असून तशी अधिसूचना जारी केली आहे. पुढील काही महिन्यात राज्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या कदाचित पावसापूर्वी होतील, असा अंदाज आहे. मडगाव पालिकेसाठी 24 नगरसेवकांची संख्या मर्यादा ठरवली असून त्या खालोखाल मुरगाव-21 तर म्हापसा- 20 अशी संख्या निश्चित केली [...]
आज राज्यात श्रीरामनवमी आनंदपर्व
पणजी : आदर्श राजा, एक वचनी, एक पत्नी असे ज्याचे वर्णन केले जाते त्या प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव म्हणजेच श्रीराम नवमी उत्सव आज गोव्यात सर्वत्र उत्साहात व थाटात साजरा केला जाणार आहे. गोव्यात आज सर्व ठिकाणी रामनवमी उत्सव साजरा केला जात असून त्यानिमित्त राम मंदिरे तसेच हनुमान मंदिर आणि साई मंदिरामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. [...]
न्हावेलीत २८ मार्चला जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन
न्हावेली /वार्ताहर कै.बुवा भूषण उदय पार्सेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वरभूषण मित्रमंडळ,न्हावेली पार्सेकरवाडी येथे शनिवार २८ मार्च रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ६.वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.स्पर्धेत भाग घेतलेले संघ असे – सायंकाळी ६ वाजता श्री देव कालिका प्रासादिक भजन मंडळ,कारिवडे ( बुवा – सुदिप गावडे ) सायंकाळी ७ वाजता श्री देवी सातेरी [...]
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सुट्ट्यांमुळे बोरघाटात वाहतुकीचा खोळंबा
रामनवमीच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईहून पुणे आणि सातारा-कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अचानक वाढल्याने ही कोंडी निर्माण झाली आहे. उन्हाळ्याची सुट्टी आणि धार्मिक सणांच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या प्रवाशांना घाटातील संथ वाहतुकीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत […]
वीजबील थकीत असल्याने पंचायत समिती अंधारात, महावितरणची मोठी कारवाई
सात महिन्याचं वीज बिल न भरल्याने महावितरण ने वरोरा शहरातील पंचायत समितीची वीज खंडित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 51 हजार 580 रुपये इतके वीज बिल थकीत आहे. वारंवार सूचना देऊनही बिलाची रक्कम न भरल्याने महावितरणने अखेर कठोर कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला. मार्च एंडिंगच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण कार्यालयीन कामकाज ठप्प […]
युद्धाचा भडका! अमेरिकन फायटर जेट पाडल्याचा इराणचा दावा, व्हाईट हाऊसकडून वृत्ताचे खंडन
आखाती देशातील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन ठेपला असून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) बुधवारी अमेरिकेचे अत्याधुनिक ‘F-18’ फायटर जेट यशस्वीरित्या पाडल्याचा खळबळजनक दावा केला. इराणच्या सरकारी वाहिनीने यासंदर्भातील एक व्हिडिओही प्रसिद्ध केला असून, चाबहार क्षेत्रात नव्या एअर डिफेन्स सिस्टमद्वारे ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. मात्र, अमेरिकेने […]
आखीत देशातील वाढता तणाव आणि इराणसोबत सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स या आठवड्याच्या अखेरीस पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून इराणसोबतच्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी हा महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला जात आहे. विशेष म्हणजे, इराणने ट्रम्प यांचे मध्यपूर्वेतील दूत स्टीव्ह विटकॉफ आणि त्यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी चर्चा करण्यास […]
पुण्यात 424 फेरफारात हेराफेरी; दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे निर्देश, राज्यभर तपास मोहीम राबविणार
पुणे जिह्यात 424 फेरफार प्रकरणांत मोठी हेराफेरी झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या पाच वर्षांत महसूल कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करून 424 प्रकरणांमध्ये बेकायदेशीर कार्यपद्धतीचा अवलंब करून आदेश पारित केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांशी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱयांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महसूल कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करून पारित झालेल्या […]
सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नसतील, तर त्याला अर्थ नाही; संजय राऊत संतापले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्या बैठकीत त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर भाष्य केले. सर्वपक्षीय बैठक बोलावत त्या बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नसतील, तर त्या बैठकीला अर्थ नाही, अशा शब्दांत त्यांनी संतात व्यक्त केला. सध्या जगभरात तणावाचे वातावरण आहे. अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध वाढत आहे. तसेच अमेरिका युद्धसमाप्तीची […]
मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू व गर्भावतींचे मृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने आज फैलावर घेतले. राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’सारख्या योजना सुरू करून कोणतेही काम न करणाऱया लोकांना पैसे वाटप करण्यास सुरुवात केली आहे, मात्र दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्याचा सरकारला विसर पडला असून मेळघाटमधील धारणीत रुग्णालय उभारण्याची घोषणा सरकार कधी […]
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली. या अधिवेशनात धर्म स्वातंत्र्य विधेयकासह एकूण 19 विधेयकांना विधानसभेत तर विधान परिषदेत 4 विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, यापुढील पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एकूण 20 दिवस कामकाज चालले असून जवळपास 143 तास 51 मिनिटे काम […]
13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा यांना इच्छामरण देण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबईतही 40 जणांना इच्छामरण हवे असल्याची माहिती उघडकीस आली आहे. मुंबई महापालिकेकडे 40 जणांचे इच्छामरणासाठी अर्ज आले असून यासंदर्भात कोणतीही सुस्पष्टता नसल्याने या अर्जांचे पुढे काय करायचे, असा पेच निर्माण झाला आहे. हरीश राणाच्या पहिल्या इच्छामृत्यूनंतर मुंबईतही इच्छामृत्यूसाठी आग्रही असलेल्यांची […]
एक्सप्रेसमध्ये पुढील स्थानकाची घोषणा होणार, हायकोर्टाचे रेल्वेला महत्त्वपूर्ण आदेश
‘वंदे भारत’प्रमाणे सर्व एक्सप्रेस गाडय़ांमध्ये पुढील स्थानकाची घोषणा करणारे तंत्र विकसित करा, असे आदेश उच्च न्यायालयाने रेल्वेला दिले. एका प्रवाशाने चुकून एक एक्सप्रेस पकडली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याने उतरण्याचा प्रयत्न केला व तो ट्रेनमधून पडला. यात त्याच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली. याच्या भरपाईसाठी त्याने अर्ज केला. रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरणाने तो फेटाळला. याविरोधात या […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्या बैठकीत त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर भाष्य केले. भाजपचे सरकार आल्यापासून राजकीय नेतृत्वाचे, अध्यात्माचे आणि हिंदुत्वाचे अधःपतन झाल्याचे त्यांनी सांगितले. कोणाचेही खासगी व्हिडीओ काढून ते व्हायरल करत त्यावर चर्चा करणे हे पत्रकारिता आणि राडकारणात योग्य नाही. महाराष्ट्रात राजकारणात राजकीय नेतृत्वाचे, […]

33 C