पाकिस्तानने 24 मेपर्यंत वाढवली, हिंदुस्थानी विमानांना हवाईबंदी, एअरलाईन्सला अब्जावधींचे नुकसान
पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रातून प्रवास करण्यास हिंदुस्थानने बंदी घातली असून ही हवाई बंदी 24 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानने 2024 एप्रिल 2025 पासून हिंदुस्थानी विमानांना हवाई बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानी विमान कंपन्यांना अब्जावधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. पाकिस्तानी विमानतळ प्राधिकरणाने नोटीस टू एअरमन म्हणजेच नोटममध्ये म्हटले की, सर्व हिंदुस्थानी […]
तोट्यातल्या एसटीसाठी धावली मराठमोळी जोडी, रितेश-जेनेलिया लालपरीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मदतीला रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे मराठमोळे कलावंत दांपत्य धावून आले आहे. रितेश आणि जेनेलिया यांना एसटीचे सदिच्छादूत (ब्रॅण्ड अॅम्बेसेडर) बनवण्यात आले आहे. पुढील पाच वर्षे ही जोडी लालपरीच्या सुरक्षित प्रवासाबाबत व नवनवीन उपक्रमांबाबत जनजागृती करणार आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक […]
देवस्थानांच्या साडेचार लाख हेक्टर इनाम, जमिनींच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील देवस्थानांच्या साडेचार लाख हेक्टरपेक्षा जास्त इनाम जमिनींच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकार पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील कायद्याचा मसुदा सार्वजनिक करणार आहे. त्यानंतर एक महिन्यात जनतेच्या हरकती, सूचना घेतल्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनात त्या कायद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज यासंदर्भात माहिती दिली. देवस्थान, […]
अमेरिकन संसदचे खासदार ब्रॅड शर्मन यांनी पाकिस्तानला लष्कर-ए-तोयबा (LeT) सारख्या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याशी या संघटनेचा संबंध जोडला गेला आहे. अमेरिकेतली हिंदुस्थानी दूतावासाने ‘Human Cost of Terrorism’ या विषयावरील प्रदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमावेळी बोलताना शर्मन यांनी पहलगाम हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. २६ […]
2025 मध्ये स्थलांतर करताना आठ हजार लोकांचा मृत्यू
एखाद्या देशांतून दुसऱ्या देशांत स्थलांतर करणे सोपे नाही. तरीही लोक जीव धोक्यात घालून हे स्थलांतर करतात. 2025 च्या आकडेवारीनुसार, स्थलांतर करताना जगभरात 7 हजार 900 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती इंटरनॅशन ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (आयओएम) ने जारी केली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे 2014 पासून आतापर्यंत 80 हजार लोकांचा स्थलांतर करताना मृत्यू झाला आहे. स्थलांतर करताना […]
‘मिसिंग लिंक’मधून फक्त बस आणि कारला प्रवेश
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’मधून पहिल्या टप्प्यात बस आणि कार या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाकडून (वाहतूक) याबाबतचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील 13.3 किमीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे पुढील महिन्यात उद्घाटन करण्याच्या हालचाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच मिसिंग लिंक […]
पेपरफुटीस जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा! युवासेनेचे मुंबई विद्यापीठ प्र-कुलगुरूंना निवेदन
तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पेपरफुटीबाबत संताप व्यक्त करत आज युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कार्यालयावर धडक देत प्र कुलगुरूंची भेट घेतली. या परीक्षा काळात तीन प्रश्नपत्रिका फुटल्याचे निदर्शनास आले असून दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला. या पेपरफुटीस जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी […]
हिंदुस्थानी नागरिकाला ब्रिटन सोडण्याचे आदेश
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी गमवलेल्या मोहम्मद शेखवाला यांना आता ब्रिटन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोहम्मद हे पत्नीच्या स्टुडंट व्हिसावर डिपेंडंट म्हणून ब्रिटनमध्ये राहात होते. गृहमंत्रालयाने अर्ज फेटाळल्यानंतर मोहम्मद यांनी ब्रिटन सोडले नाही तर त्यांना अटक केली जाईल.
ई-चलान कापणाऱ्यांना चाप, खासगी मोबाईल फोनने ई-चलान कापणाऱ्या पोलिसांना लागणार चाप
मुंबईच्या रस्त्यांसह महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांचे खासगी मोबाईलचा वापर करून ई-चलान कापण्याचे प्रमाण वाहतूक पोलिसांकडून सध्या वाढत आहे. भरसमसाट दंडाची भीती दाखवून वाहनचालकाकडून ‘चिरीमिरी’ घेणाऱया पोलिसांवर आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने अभ्यास गट स्थापन केला आहे. राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करताना ई-चलान तयार […]
राजस्थानमध्ये शाळेच्या बसला ट्रकची धडक
राजस्थानमधील बाडमेर येथे भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने एका स्पूल बसला जोरदार धडक दिली. या धडकेत 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. या बसमध्ये एकूण 24 मुले होती. ही बस रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांना घेण्यासाठी थांबली होती. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज जागतिक पुस्तक दिन: मुलांची पुस्तकांशी गट्टी जमेना, बाल वाचक वाढवण्यासाठी वाचनालयांचे प्रयत्न
अलीकडच्या काही वर्षांत ग्रंथालयांतील बाल वाचकांनी संख्या घटली आहे. मुले पुस्तकांपासून दूर जात आहेत. मुलांना पुस्तकांची गोडी लागावी, त्यांच्यावर बाल वयात वाचनाचे संस्कार व्हावेत, यासाठी ग्रंथालये-वाचनालयांचे प्रयत्न सुरू आहेत. उन्हाळी सुट्टीत मुलांची पुस्तकांशी गट्टी जमावी, यासाठी दादर येथील दादर सार्वजनिक वाचनलयातर्फे गेली अनेक वर्षे बाल वाचनालय सुरू करण्यात येते. यंदा 15 एप्रिलपासून बाल वाचनालय सुरू […]
माकड पकडणाऱ्याला 600 रुपये, उपद्रव टाळण्यासाठी वनखात्याने आखली योजना
कोकणासह राज्याच्या विविध भागांत माकडांनी प्रचंड उच्छाद घातला आहे. नारळांपासून आंबा आणि सर्व प्रकारच्या भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे वस्तीत आलेल्या माकडांना पकडून पुन्हा जंगलात सोडण्यासाठी 600 रुपये देण्याची योजना वन खात्याने आखली आहे. पण माकडांची नसबंदी करून पुन्हा जंगलात सोडण्याचा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारच्या बासनात अडकल्याचे पुढे आले आहे. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात वाघ […]
अमेरिकन महिलेवर कर्नाटकात बलात्कार, दोघांना अटक
हिंदुस्थानात आलेल्या एका अमेरिकन महिलेवर कर्नाटकात बलात्कार झाल्याची घटना घडली. कोडगू जिह्यातील पुट्टा परिसरातील एका होमस्टेमध्ये हा बलात्कार करण्यात आला असून महिलेच्या तक्रारीनंतर होमस्टेमधील एक कर्मचारी व मालकाविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. गुन्हा लपवण्यासाठी होमस्टे मालकाने तीन दिवस होमस्टेचे इंटरनेट बंद केले होते.
तुमचे आशीर्वाद लाखमोलाचे, शरद पवार यांच्यासाठी सुनेत्रा पवारांची खास पोस्ट
प्रकृती बिघडल्याने मतदानास जाणार नसल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, तुमचे आशीर्वाद लाखमोलाचे अशी खास पोस्ट केली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि […]
लोकलमध्ये बेशुद्ध झालेला रुग्ण 15 तास ट्रेनमध्येच पडून! रेल्वे पोलीस, प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकल प्रवासादरम्यान बेशुद्ध झालेला प्रवासी रुग्ण 15 तास ट्रेनमध्येच पडून राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, रात्री ती गाडी यार्डमध्ये गेली. त्यादरम्यानही रेल्वे पोलीस वा रेल्वे प्रशासनाचे बेशुद्धावस्थेतील रुग्णाकडे लक्ष गेले नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. डोंबिवली येथील संजय शिंदे हे 15 एप्रिल रोजी […]
आज पश्चिम बंगाल, तामीळनाडूत पहिल्या टप्प्याचे मतदान
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे, तर तामीळनाडूतील सर्व 234 जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये 152 जागांवर मतदान होईल. पश्चिम बंगालमध्ये राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व केंद्रातील सत्ताधारी भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. एवढे जवान जम्मू-कश्मीरमध्येही नाहीत, पश्चिम बंगालमध्ये घटनाबाह्य आणीबाणी! कपिल सिब्बल […]
ट्रेंड –तहानलेल्या गायींसाठी पाण्याची व्यवस्था
गाव-खेडय़ांमध्ये तर गुरं पाण्यावाचून इकडे-तिकडे भटकताना दिसतात. अजय ठापूर नावाच्या तरुणाने गावातील भटक्या गुरांसाठी पाण्याचा हौद स्वच्छ केला. हा हौद चक्क चिखलाने भरला होता. त्यामध्ये प्रचंड कचरा साठला होता. गुरे तिथे पाण्यासाठी येतात. मात्र पाणी न पिताच निघून जातात हे पाहिल्यानवर अजयने मित्रांच्या मदताने हौदामधील चिखल बाहेर काढला, मग हौद स्वच्छ केला आणि त्यामध्ये गुरांसाठी […]
‘लोकशाही देशात राजकीय पक्ष निवडणुका लढतात, मात्र पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार निवडणूक लढत आहे. राज्यात लागलेली ही एक प्रकारची घटनाबाह्य आणीबाणी आहे,’ असा जोरदार हल्ला खासदार कपिल सिब्बल यांनी आज मोदी सरकार व भाजपवर चढवला. दिल्लीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘केंद्रातील सगळे मंत्री, भाजपचे मुख्यमंत्री सगळे बंगालमध्ये […]
खड्डा पडला, कचरा साठला, पाणी आले नाही अशा कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी पालिकेने मुंबईकरांना ‘मॅनेजमेंट अॅण्ड रीर्डेसल ऑफ ग्रिव्हेन्स’ अर्थात एकच मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवल्यानंतर तातडीने ही तक्रार संबंधित विभागाला कळवण्यात येईल आणि तक्रारीचे निवारण करण्यात येईल. मुंबईकरांच्या तक्रार निवारणासाठी महानगरपालिकेकडून www.mcgm.gov.in हे संकेतस्थळ, नागरी मदतसेवा क्रमांक 1916, […]
‘स्वच्छ-सुंदर मुंबई’साठी पालिकेने सुरू केलेल्या ‘मुंबई क्लीन लीग’मध्ये आता सहाय्यक आयुक्तांच्या विभागातील स्वच्छतेच्या कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे. हे मूल्यमापन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी कार्यवाही करावी, असे सक्त निर्देशच आज पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. आयुक्त भिडे यांनी आज भल्यापहाटे पश्चिम उपनगरातील काही भागात सरप्राईज व्हिजिट करून स्वच्छतेचा कामाची अक्षरशः झाडाझडतीच घेतली. सहाय्यक आयुक्तांनीदेखील आपापल्या विभागात […]
सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’चे रसग्रहण, आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम
जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गुरुवार, 23 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वाजता प्रभात चित्र मंडळ आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पटकथा लेखिका मनीषा कोरडे या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटाचे रसग्रहण सादर करणार आहेत. हा कार्यक्रम नरिमन पॉइंट येथील यशवंतराव […]
ठाण्याची स्मार्ट सिटी ‘खड्ड्या’त; भर उन्हात माता-भगिनींवर डबक्यातून पाणी आणण्याची वेळ
उखडलेले रस्ते, अस्ताव्यस्त सुरू असलेली बेकायदा बांधकामे, तासन्तास होणारी वाहतूककोंडी यामुळे ठाणेकर मेटाकुटीला आले असतानाच महापालिका प्रशासनाने गाजावाजा केलेली ‘स्मार्ट सिटी’ कशी ‘खड्ड्या’त गेली आहे याचे आणखी एक भीषण वास्तव समोर आले आहे. एकीकडे घोडबंदरवर पंचतारांकित ‘टॉवर्स’च्या नळातून धो धो पाणी वाहत असताना या चकाचक वस्तीला लागून असलेल्या पाचवड पाडा, साग पाडा, उंबरबावडी पाडा येथील […]
भाजपच्या मोर्चामुळे मुंबईकरांचा ‘आक्रोश’, वरळी वाहतूककोंडीचा आणखी एक व्हिडिओ समोर
महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ मंगळवारी भाजपने मुंबईत काढलेल्या जनआक्रोश मोर्चामुळे वरळीत प्रचंड वाहतूककोंडी झाली. त्यादरम्यान, एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना ‘गेट आऊट ऑफ हिअर’ असे म्हणत सुनावल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपच्या मोर्चामुळे वाहतूककोंडीत अडकलेल्या मुंबईकरांनी जनआक्रोश केल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. भाजपच्या जनआक्रोश मोर्चामुळे जांबोरी मैदान परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली. परिणामी […]
मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 30 कोटींचा खर्च, स्थायी समितीची प्रस्तावाला मंजुरी
मिठी नदीमधील गाळ काढण्यासाठी पालिका 30 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कामातील पवई ते शिक्षक कॉलनी, कुर्ल्यापर्यंतच्या गाळ उपशासाठी 9 कोटी 47 लाख 39 हजार 346 रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर कुर्ला शिक्षक कॉलनी ते बीकेसी कनेक्टर पुलापर्यंतचा गाळ उपसा करण्यासाठी […]
मोदींना दहशतवादी म्हणाले, खरगे यांना निवडणूक आयोगाची नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केल्या प्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. ‘‘नरेंद्र मोदी हे ईडी, सीबीआयचा वापर करून सर्वांना भीती घालतात. राजकीय पक्षांमध्ये दहशत निर्माण करतात. अण्णा दुराईचा वारसा सांगणारा अण्णा द्रमुक मोदींसोबत कसा जाऊ शकतो,’’ असे खरगे म्हणाले होते. त्यावरून वाद झाल्यानंतर त्यांनी आपल्या […]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 23 एप्रिल 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस सुखाचा ठरणार आहे आरोग्य – धावपळ-दगदग टाळण्याची गरज आहे आर्थिक – शॉपिंगला जाण्याचे योग आहे कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात […]
सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च कानपिचक्या
सर्वोच्च न्यायालयाने आय पॅक प्रकरणी खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या हस्तक्षेपाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. मुख्यमंत्रीपद हे घटनात्मक महत्त्वाचे पद आहे आणि अशा व्यक्तींनी एखाद्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या यंत्रणेलाच आव्हान देणे किंवा त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे झाले तर लोकशाहीला ते फार बाधक आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींच्या कारभारावर तीव्र नापसंती [...]
ब्रिटनमध्येही आता ‘स्मोक फ्री जनरेशन’
2008 नंतर जन्म झाला असल्यास करता येणार तंबाखू खरेदी : संसदेत जनरेशन बॅन कायदा संमत : 1 जानेवारीपासून होणार लागू वृत्तसंस्था/ लंडन ब्रिटनने धूम्रपान रोखण्यासाठी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. आता तेथील नव्या पिढीच्या लोकांसाठी सिगारेट खरेदी करणे कायमस्वरुपी बंद करण्याची तयारी झाली आहे. सरकारने टोबॅको अँड वेप्स विधेयक संमत करविले असून याच्या अंतर्गत 2008 [...]
लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा ‘चौकार’
लखनौ 40 धावांनी पराभूत : राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी : अष्टपैलू रवींद्र जडेजा सामनावीर वृत्तसंस्था/ लखनौ राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला 40 धावांनी पराभूत करून आयपीएलमध्ये आपला पाचवा विजय नोंदवला. एकाना स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 6 गडी गमावून 159 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा संघ 119 धावांत ऑलआऊट [...]
सद्गुरुंच्या कृपेने प्रयत्न केल्यावर कोणतीही गोष्ट साध्य होते
सहाव्या अध्यायाची सुरवात करताना स्वत:च्या शब्दांचे वर्णन करताना माउली म्हणतात, माझे शब्द संगीतातील सुराहून अधिक सुस्वर आहेत, सुवासिक आहेत. माझ्या शब्दांचा आस्वाद घेण्यासाठी इंद्रियांमध्ये भांडण लागेल कारण ते सर्वांचे समाधान करणारे असतील. सूर्य स्वत:च्या सामर्थ्याने सर्व जगाला जागे करतो. सूर्याप्रमाणे शब्दाचे सामर्थ्यही असामान्य असल्याने ते सर्वांना आत्मस्वरूपाची आठवण करून देतात. अशी ही ग्रंथरूपी मेजवानी मी [...]
प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते!
भविष्यात भारताची भूमिका शक्य : इराण-अमेरिका मध्यस्थीवर राजनाथ सिंहांचे वक्तव्य वृत्तसंस्था/ बर्लिन पश्चिम आशियात जारी तणावादरम्यान भारताच्या भूमिकेवरून महत्त्वाचे वक्तव्य समोर आले ओह. जर्मनीच्या दौऱ्यावर असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सद्यस्थितीत भारत थेट मध्यस्थी करत नसला तरीही भविष्यात याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे. भारताने स्वत:च्या वतीने प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांनी [...]
दोन राज्यांमध्ये आज होणार मतदान
पश्चिम बंगाल प्रथम टप्पा, तामिळनाडूमध्ये सज्जता वृत्तसंस्था / कोलकाता, चेन्नई पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये आज गुरुवारी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 मतदारसंघांपैकी 152 मतदारसंघांमध्ये आज गुरुवारी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. तर तामिळनाडू या राज्याच्या सर्व 234 मतदारसंघांमध्ये मतदान केले जाईल. पश्चिम बंगाल या राज्यात मतदानाच्या द्वितीय टप्प्यामध्ये ऊर्वरित 142 [...]
चंद्राच्या मातीतून मिळविला ऑक्सिजन
जेफ बेजोस यांच्या कंपनीची कामगिरी अमेरिकन उद्योगपती जेफ बेजोस यांची कंपनी ब्ल्यू ओरिजिनने एक मोठी कामगिरी केली आहे. ब्ल्यू ओरिजिनने चंद्राच्या धुळीमधून ऑक्सिजन मिळविण्यास यश प्राप्त केले आहे. चंद्रावर दीर्घकाळापर्यंत मानवी जीवनाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. बेजोस यांची कंपनी दीर्घकाळापासून या प्रकल्पावर काम करत होती. चंद्राची माती रेगोलिथमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात [...]
पुन्हा एकदा सेंट फ्रान्सिस झेवियर
देव, धर्म ही अफुची गोळी केवळ झिंग आणत नाही तर एकमेकांचे जीव घेण्यासही प्रवृत्त करते. खरेतर आमचा देव अन् तुमचा देव, असे काहीच नसते. सर्वांचा तारणहार एकच असतो. तो कुणी पाहिलेला नसतो, तो कसा असतो, कसा दिसतो याची कल्पनाही कुणालाच नसते. खरी-खोटी अनुभूती असते. परंपरेनुसार जपल्या गेलेल्या श्रध्दा असतात. भावना गुंतलेल्या असतात किंवा अंधश्रध्दाही असतात. [...]
शिवा नरवालला सुवर्ण, चिरागला कांस्य, प्रणाहला रौप्य
वृत्तसंस्था कैरो, इजिप्त : माजी मिश्र सांघिक वर्ल्ड चॅम्पियन शिवा नरवालने तीन वर्षानंतर झोकात पुनरागमन करताना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप रायफल-पिस्तुल-शॉटगन स्पर्धेत पुरुषांच्या कनिष्ठ विभागात 10 मी. एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. चिराग शर्मा कांस्यपदक स्वीकारण्यासाठी त्याच्यासह पोडियमवर होता. याशिवाय महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत प्रणाह भुगराने रौप्यपदक मिळविले. शिवा नरवालने पात्रता [...]
महाराष्ट्र, गोव्यात 3,400 हून अधिक नवीन 5जी साइट्ससह विस्तार : एअरटेल
` वृत्तसंस्था, मुंबई भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलकडून मागील 12 महिन्यात महाराष्ट्र आणि गोव्यात 3,400 हून अधिक नवीन 5जी साइट्स उभारण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना अधिक वेगवान इंटरनेट, व्यापक कव्हरेज आणि सुधारित नेटवर्क अनुभव मिळत असल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे. ‘महाराष्ट्र आणि गोव्यात डेटा वापराची मागणी वेगाने वाढत आहे आणि आमचे उद्दिष्ट या मागणीपेक्षा [...]
गरिबी निर्मूलनासाठी रोजगार द्यावा लागणार
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा: विकसनशील देशांमधील गरिबीसह अन्य विषयांवर सखोल भाष्य वृत्तसंस्था, नवी दिल्ली विकसनशील देशांमधील गरिबीचे निर्मूलन झालेच पाहिजे. ब्रोकरेज फर्म जिरोधाचे सीईओ निखिल कामत यांच्याशी झालेल्या संभाषणात जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी जागतिक अर्थव्यवस्था, भारताची प्रगती आणि तरुणांच्या भविष्यावर सविस्तर चर्चा केली यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे. गरिबी संपवण्याचा थेट मार्ग माझा [...]
ह्युंडाई व्हेन्यू नाईट आवृत्ती लाँच
सुरुवातीची किंमत 9.69 लाख : सुरक्षेसाठी नवीन ब्लॅक-थीम, डॅशकॅम वृत्तसंस्था, नवी दिल्ली ह्युंडाईने भारतात आपल्या व्हेन्यूची नाईट एडिशन 2026 लॉन्च केली आहे. या नवीन ब्लॅक-थीम असलेल्या सब-4-मीटर एसयूव्हीची किंमत 9.69 लाख (एक्स-शोरूम) आहे. दक्षिण कोरियाच्या या वाहन निर्मात्याच्या नव्या वाहनात अनेक नवीन वैशिष्ट्यो देखील जोडली आहेत. 2026 व्हेन्यू नाईट एडिशन: नवीन रंग आणि बोल्ड लूकसह [...]
टेक महिंद्राने कमावला 1354 कोटीचा नफा
नवी दिल्ली : टेक महिंद्रा कंपनीचा आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीतला नफा 16 टक्के वाढीसोबत 1354 कोटी रुपयांवर पोहचला आहे. एक वर्षापूर्वी याच अवधीत कंपनीने 1167 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. बुधवारी उशीरा कंपनीने आपल्या तिमाही निकालाची घोषणा केली. याचदरम्यान कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 36 रुपयांचा लाभांश देण्याची घोषणादेखील केली आहे. निकालानंतर टेक महिंद्राचा समभाग [...]
आंध्रप्रदेशात साइन बोर्डाला धडकली कार, 3 ठार
विशाखापट्टणम आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या वीरवल्ली टोलनाक्यानजीक बुधवारी पहाटे भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. एक भरधाव कार साइन बोर्डाला जाऊन धडकली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रारंभिक तपासात दुर्घटनेचे कारण भरधाव वेग असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत मृतदेह [...]
सहज संध्याकाळी रेडिओ लावून बसलेलं असताना एकाएकी कुमार गंधर्वांच्या स्वरातलं ‘सुजन कसा मन चोरी’ हे गाणं कानावर पडलं आणि जे काही वाटलं ते शब्दात सांगता येण्याजोगं नव्हतंच. बरं अशी गाणी एकदा ऐकून कधीही समाधान होणे शक्यच नसतं. आणि त्यासाठी आधुनिक काळातली साधनं उपयोगी पडतात. आज काल आपण म्हणू त्या पद्धतीचं, म्हणू त्या प्रकारचं, म्हणू त्या [...]
आशियातील नकारात्मक संकेतामुळे बाजारात घसरण
सेन्सेक्स 750 अंकांनी कोसळला : आयटी क्षेत्रात मोठी पडझड वृत्तसंस्था, मुंबई बीएसई सेन्सेक्स बुधवारच्या सत्रात 756.84 अंकांसह 0.95 टक्क्यांनी घसरून 78,516.49 अंकांवर बंद झाला. याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (एनएसई) निफ्टी 198.50 अंकांनी घसरून 24,378.10 वर बंद झाला. सेन्सेक्समधील शेअर्समध्ये एचसीएल टेक सर्वाधिक घसरला. त्यात 10.76 टक्क्यांची घट झाली. इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, टेक महिंद्रा, [...]
ममता बॅनर्जी यांचा लोकशाहीला धोका
आय-पॅक’ संबंधी सर्वोच्च न्यायालयाकडून ताशेरे ► वृत्तसंस्था/नवी दिल्ली तीन महिन्यांपूर्वी गाजलेल्या ‘आय-पॅक’ फाईल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर टिप्पणी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीला धोका उत्पन्न केला आहे, असे ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची बुधवारी निर्भर्त्सना केली. ‘आय-पॅक’ कंपनीवर प्रवर्तन निदेशालयाची (ईडी) धाड पडली असताना ममता बॅनर्जी यांनी पोलिस [...]
पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी बांगलादेश संघ जाहीर
वृत्तसंस्था, ढाका बांगलादेशने न्यूझ्^ााrलंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. ही मालिका 27 एप्रिलपासून चट्टोग्राम येथे सुरू होत आहे. आयसीसीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, यजमान संघाने मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यांसाठी वेगवान गोलंदाजी आक्रमणात काही बदल करत एका नव्या फळीला पसंती दिली आहे. यासाठी मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद आणि नाहीद राणा यासारख्या प्रमुख [...]
इराणविरोधी अभियानात मिस्ट मेमचा मृत्यू
इस्रायलची कबुली : मोसादने गमावला स्वत:चा एजंट वृत्तसंस्था/तेल अवीव इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या एका एजंटवरून मोठा खुलासा झाला आहे. इराणविरोधी इस्रायलच्या अभियानात या एजंटने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. इस्रायली एजंटचा मे 2023 मध्ये इटलीतील एका नौका दुर्घटनेत मृत्यू झाला होता अशी माहिती मोसाद प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी बुधवारी दिली आहे. ही एजंट केवळ त्यांच्या नावाचे [...]
पनामाच्या राष्ट्रीय प्रतीक गोल्डन फ्रॉगचे होतेय संरक्षण
2009 मध्ये लुप्त झाली होती प्रजाती : पनामाचा गोल्डन फ्रॉग म्हणजेच सोनेरी बेडकाला वाचविण्याची तयारी सुरु आहे. त्याची प्रजाती संपुष्टात येण्यापासून रोखण्यासाठी हा प्रयत्न आहे. पनामाच्या एम्फीबियन रेस्क्यू अँड कंजर्वेशन प्रोजेक्टचे संचालक रोबर्टो इबानेज यांनी गाम्बोआ एम्फीबियन रिसर्च अँड कंजर्वेशन सेंटरमध्ये सुंदर सोनेरी बेडुक दाखविले, याचे शास्त्राrय नाव एटेलोपस जेटेकी आहे. या बेडकाला राष्ट्रीय प्रतीक [...]
दुपारी 12 वाजता जाहीर होणार : तृतीय भाषेसाठी गुणच : शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची माहिती त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर : तृतीय भाषेसाठी गुण की ग्रेड, या मुद्द्यावरून बराच गोंधळ निर्माण झालेला असतानाच दहावी परीक्षेच्या निकालासाठी मुहूर्त निश्चित झाला आहे. गुरुवार 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा [...]
‘फिफा’च्या महिला विकास कार्यक्रमासाठी भारताची निवड
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक फुटबॉल नियामक संस्था असलेल्या ‘फिफा’ने आपल्या ‘महिला विकास कार्यक्रमा’साठी निवडलेल्या 12 देशांच्या यादीत बुधवारी भारताचा समावेश करण्यात आला. या यादीतील इतर देशांमध्ये जर्मनी, नेदरलँड्स, स्वीडन, स्कॉटलंड, कॅनडा, मेक्सिको, फिनलंड, घाना, जॉर्डन, लिथुआनिया आणि पॅराग्वे यांचा समावेश आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने केलेल्या प्राथमिक अर्जानंतर आणि व्यावसायिक धोरण व भविष्यातील योजनांचे [...]
नितीश कुमारांकडून संजदची नवी टीम स्थापन
राष्ट्रीय कार्यकारिणीत 24 नेत्यांना स्थान वृत्तसंस्था/पाटणा संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीत नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना सध्या स्थान मिळालेले नाही. संजद कार्यकारिणीत 24 नेत्यांना सामील करण्यात आले आहे. राज्यसभा खासदार संजय झा हे संजदचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असतील. तर पक्षाचे वरिष्ठ नेते [...]
‘स्वयंभू’ चित्रपटात निखिल सिद्धार्थ
चित्रपटाच्या टीझर पोस्टर्समुळे वाढली उत्सुकता निखिल सिद्धार्थ या अभिनेत्याला ‘कार्तिकेय 2’ या चित्रपटामुळे देशभरात ओळख मिळाली. आता तो ‘स्वयंभू’ या चित्रपटाद्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात निखिल एक अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली योद्ध्याच्या अवतारात दिसून येतोय. जबरदस्त अॅक्शन दृश्यं, आकर्षक व्हिज्युअल्स [...]
‘व्हीआय’ची घसरणीतही चमक; एजीआर थकबाकी स्थिर होण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली एप्रिल महिन्यात आतापर्यंत वोडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये सुमारे 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर याच काळात बाजारात मंदी होती. कंपनीची एजीआर थकबाकी स्थिर होईल या अपेक्षेनेही शेअरला आधार मिळाला आहे. दरम्यान, या तेजीनंतरही, या वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर अजूनही सुमारे 11 टक्क्यांनी खाली आहे. पुढील वाढीची अपेक्षा बजाज ब्रोकिंगच्या तांत्रिक विश्लेषकांचा विश्वास आहे की, [...]
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मेअखेरची डेडलाईन दिली असताना व बरीच कामे अजूनही अर्धवट स्थितीत असताना सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावरून मेपासून पथकर वसुली सुरू होणार आहे. या टोल नाक्यासाठी केंद्र सरकारने निविदा मागविल्या आहेत. येत्या 24 एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जाणार असून ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. […]
इराणने दोन जहाजे ओढत नेली, हिंदुस्थानला युद्धाचा फटका
इराण-अमेरिकेमधील युद्धविरामाची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव वाढला. या तणावाचा फटका हिंदुस्थानला बसला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने हिंदुस्थानकडे येणाऱ्या जहाजासह तीन जहाजांवर गोळीबार केला. यातील दोन जहाजे जप्त करून इराणच्या दिशेने ओढून नेण्यात आली असून त्यात हिंदुस्थानकडे येणाऱ्या जहाजाचाही समावेश आहे. इराणच्या होर्मुझ बंदीला उत्तर म्हणून अमेरिकी नौदलाने इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली […]
शिवसेनेची सुनावणी आज तरी होणार का?
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी बुधवारी कार्यतालिकेत सूचिबद्ध केले आहे. मागील तीन वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालय अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे नाव व ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 2022 मधील […]
खरातच्या बायकोचा जामीन फेटाळला; अटक अटळ
भोंदूगिरी आणि ब्लॅकमेलिंग करून अशोक खरात याने कोटय़वधी रुपयांची माया जमविली आहे. बँक खात्यातून सात कोटी रुपयांचे व्यवहार होऊनही माझा व्यवहाराशी संबंध नाही, अशी भूमिका त्याची फरार पत्नी कल्पना हिने घेतली आहे. पापात तीसुद्धा भागीदार होत नसल्याने खरात एकाकी पडला आहे. दरम्यान, राहाता न्यायालयाने बुधवारी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून अटक अटळ आहे. पोलीस […]
‘एशियाटिक’ निवडणुकीचा हायकोर्टात आज निकाल
गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणूक प्रक्रियेच्या वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. एशियाटिक सोसायटीच्या निवडणूक संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल उद्या गुरुवारी 23 एप्रिल रोजी न्यायमूर्ती फरहान दुभाष जाहीर करणार आहेत. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या […]
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या दोन्ही मतदारसंघांत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार म्हणून […]
आभाळमाया –उल्कांची आरास आणि आघात!
>> वैश्विक khagoldilip@gmail.com 1998 मध्ये नोव्हेंबरच्या मध्याला होणारा सिंह राशीच्या पार्श्वभूमीवरचा ‘लिओनिड’ उल्कावर्षाव पाहण्याचं ‘भाग्य’ ज्यांना लाभलं त्यात आम्ही काही ‘खगोल’ मंडळी होतो. सर्वच उल्कावर्षावांचे वार्षिक दिनांक आधीच ठरलेले असतात. तसाच ‘लिओनिड’चा काळ साधारण 15 ते 18 नोव्हेंबर असा असतो. 1998 मध्ये आपल्याकडून हा उल्कावर्षाव दिसण्याची सर्वात अनुकूल स्थिती होती. साहजिकच दोन-तीन हजारांची गर्दी होणार […]
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर आज-उद्या तीन तास ब्लॉक
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर कुसगाव येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढण्यासाठी दोन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यासाठी उद्या मुंबईकडे येणारी तर परवा पुण्याकडे जाणारी मार्गिका दुपारी 12 ते 3 या कालावधीत बंद असेल.
लेख –सायबर स्पेस : आधुनिक अदृश्य रणक्षेत्र
>> प्रभात सिन्हा आजच्या काळात युद्धाचे स्वरूप केवळ सीमा, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही. डिजिटल रूपात आता एक नवीन आघाडी उघडली गेली असून ती अदृश्य असूनही सातत्याने सक्रिय आहे. या युद्धामध्ये गोळ्यांचा आवाज येत नाही, परंतु त्याचे परिणाम तितकेच विनाशकारी असतात. आता कोणताही देश सीमा ओलांडल्याशिवाय शत्रूची अर्थव्यवस्था, ऊर्जा व्यवस्था किंवा दळणवळण यंत्रणेला थेट […]
सामना अग्रलेख – पहेलगाम हत्याकांडाची वर्षपूर्ती, न्याय झाला काय?
पहेलगामच्या क्रूर हत्याकांडास एक वर्ष पूर्ण झाले असताना हा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या पाकिस्तानला जागतिक पातळीवर अमेरिकेने प्रतिष्ठा द्यावी हे चिंताजनक आहे. पाकिस्तानातून 200 किलोमीटर अंतर पार करून दहशतवादी पहेलगाममध्ये कसे घुसले व बैसरन घाटीत अंदाधुंद गोळीबार करून 26 निरपराध्यांना ठार करेपर्यंत या अतिरेक्यांना कोणीच कुठेही कसे अडवले नाही? याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. पहेलगाममध्ये निष्पाप […]
सात साखर कारखान्यांना ‘एनसीडीसी’ने कर्ज नाकारले, भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना जोरदार झटका
राज्यातील सात साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अर्थात ‘एनसीडीसी’ने कर्ज नाकारले आहे. राज्य सरकारकडून एकूण 14 साखर कारखान्यांचे प्रस्ताव ‘एनसीडीसी’कडे पाठवण्यात आले होते; परंतु त्यापैकी केवळ सात साखर कारखान्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून उर्वरित सात कारखान्यांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहे. एनसीडीसीच्या या निर्णयामुळे पक्षांतर करून भाजपमध्ये जाणाऱया नेत्यांना जोरदार झटका बसला आहे. कारण, कारखान्यासाठी […]
पॅट परीक्षेचे पेपर फुटले; यूट्युब चॅनेलवर मराठी, इंग्रजी, गणिताच्या प्रश्नपत्रिका व्हायरल
शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) घेण्यात येणाऱया नियकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट 3) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सहा यूट्युब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता, गणित, इंग्रजी, मराठी विषयातील कल जाणून घेण्यासाठी एससीईआरटीकडून नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट 3) ही परीक्षा घेण्यात […]
…तर अमेरिका-इराणसाठी हिंदुस्थान मध्यस्थी करणार, राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
आखातीमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. इराण-अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी हिंदुस्थान मध्यस्थी करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, हिंदुस्थान सध्याच्या परिस्थितीत थेट मध्यस्थी करत नाही, परंतु भविष्यात जर गरज लागली तर ही भूमिका हिंदुस्थान बजावू शकतो, असे उत्तर दिले. राजनाथ सिंह सध्या जर्मनी दौऱ्यावर असून […]
लोकशाही वाचवण्यासाठी ‘आप’चा ममता दीदींना पाठिंबा, केजरीवाल यांची एक्सवर पोस्ट करत माहिती
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. लोकशाही वाचवण्यासाठीच्या अत्यंत कठीण लढाईमध्ये आमचा ममता दीदींना पाठिंबा आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. ममता यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केजरीवाल म्हणाले की, मी आत्ताच ममता दीदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना माझा […]
8 वर्षीय गुरनूर कौर जेकेमधील सर्वात तरुण तायक्वाँदो ब्लॅक ब्लेटधारक
वृत्तसंस्था, पूंछ आठ वर्षांच्या गुरनूर कौरने संपूर्ण जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील सर्वात तरुण तायक्वाँदो ब्लॅक बेल्टधारक बनल्यानंतर आनंद व्यक्त केला. तिच्या क्रीडा प्रवासातील हा एक उल्लेखनीय टप्पा ठरला आहे. या यशाबद्दल आपला आनंद व्यक्त करताना गुरनूर म्हणाली की, या सन्मानामुळे तिला अत्यंत आनंद झाला आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण सरावाला आणि समर्पणाला [...]
भाजपची खर्गे यांच्याविरोधात तक्रार
पंतप्रधान मोदी यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख वृत्तसंस्था / नवी दिल्ली ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत, ही टिप्पणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. ही टिप्पणी त्यांनी म्ंगळवारी विधानभा निवडणूक प्रचाराच्या संबंधात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली होती. या टिप्पणीवर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. आता या पक्षाने केंद्रीय [...]
तामिळनाडूत बस अन् टँकरची टक्कर, 20 जखमी
कोइम्बतूर : तामिळनाडूच्या तूतुकुडी जिल्ह्यातील कोविलपट्टीनजकी राष्ट्रीय महामार्गावर बस दुर्घटना घडली आहे. कोइम्बतूर येथून नागरकोइलच्या दिशेने जाणारी खासगी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिमेट मिक्सर टँकरला जाऊन धडकली. या दुर्घटनेत बसचा पुढील हिस्सा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. बसचालकासमवेत सुमारे 20 जण यात जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
खड्ड्यात रोप, कॅमेर्यात चेहरा; बीडच्या वृक्षलागवड मोहिमेचा पर्दाफाश
पावसाळा सुरू झाला की, जनतेच्या पैशावर बीड जिल्ह्यात ग्रीन ड्रामा रंगत असतो. लाखो झाडे लावल्याचे दावे वृक्ष लागवडीच्या मोहिमा, मग वृक्ष लागवड करतानाचे फोटो सेशन हा तमाशा महिनाभर सुरू असतो. एकदा काय उन्हाळा सुरू झाला की खड्डे रिकामे, रिपोर्ट फुल, मृत झाडांची रांग, अखेर काय तर खड्ड्यात रोप आणि कॅमेर्यात चेहरा ही स्टंटबाजी आणि फोटोबाजीचा […]
उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात, ट्रकच्या धडकेने २ कारला आग लागून ११ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ड्रमंडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडका घुमान वळणाजवळ एका भरधाव ट्रकने दोन कारना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही कारनी पेट घेतला आणि त्यामधील ९ प्रवासी जिवंत जळाले. या भीषण दुर्घटनेत ट्रक चालक आणि क्लिनरसह एकूण ११ जणांचा […]
अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध ताणलेले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक सकारात्मक संकेत दिले आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेबाबत गुड न्यूज असून शुक्रवारी शांतता वार्ता होण्याची शक्यता असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘एबीपी न्यूज’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू यॉर्क पोस्टशी बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी इराणसोबतचा युद्धविराम वाढवण्याचा […]
उच्च न्यायालयाचा के. चंद्रशेखर राव यांना दिलासा
वृत्तसंस्था/ हैदराबाद तेलंगणा उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि माजी मंत्री टी. हरिश राव यांना मोठा दिलासा दिला आहे. कालेश्वरम लिफ्ट सिंचन प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या आयोगाच्या अहवालाच्या आधारावर केसीआर आणि टी. हरिश राव तसेच दोन अन्य याचिकाकर्त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यापासून राज्य सरकारला रोखले आहे. संबंधित आयोगाने अधिनियमाच्या अंतर्गत [...]
पाकिस्तानात अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण
मुस्लीम युवकाशी बळजबरीने करविला विवाह वृत्तसंस्था/ कराची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण, बळजबरीने धर्मांतर आणि विवाहाचे प्रकरण उघडकीस आले आहे. अल्पसंख्याक अधिकार संघटना व्हॉइस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटीने या प्रकरणाची निंदा केली आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवरून गंभीर चिंता व्यक्त करत संघटनेने हिंदू मुलींसोबत सातत्याने अशाप्रकारच्या घटना होत असल्याचा आरोप केला आहे. इयत्ता 9 [...]
शाळेत स्मार्टफोन नेण्यावर आता बंदी! ‘या’देशातील सरकारने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर
इंग्लंडमधील शाळांमध्ये स्मार्टफोनच्या वापराबाबत सरकारने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आतापर्यंत केवळ सूचना म्हणून लागू असलेले नियम आता कायद्याच्या स्वरूपात आणले जाणार आहेत. मुलांचे हित आणि शिक्षणाचे वातावरण अधिक चांगले करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. ‘एबीपी न्यूज’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या प्रस्तावानुसार, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण ठेवणे […]
लोटे औद्योगिक वसाहतीत पिण्याच्या पाण्यातून केमिकल मिश्रित पाण्याचा पुरवठा; ग्रामस्थांना विषबाधा
खेड तालुक्यातील पिरलोटे येथील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी येथील नळांना रासायनिक सांडपाणी मिश्रित पिवळ्या रंगाचे पाणी आल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. ही घटना काल बुधवारी सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेला सुप्रिया लाईफ सायन्सेसचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत असून या रासायनिक पाण्यामुळे लोटे परिसरातील ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे आढळून येत असल्याने […]
IPL 2026 –वानखेडेवर ‘थाला’चा कडक सराव! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत कमबॅक करण्याची शक्यता
इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन कट्टर संघात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दुखापतीमुळे स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला मुकलेला चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी याने वानखेडे मैदानावर जोरदार सराव सुरू केला आहे. त्यामुळे तो मुंबईविरुद्ध खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धोनीचा ‘विंटेज’ अवतार 44 वर्षांचा […]
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘गोरी’ (Gori) नावाच्या सौंदर्य प्रसाधनावर बंदी घालत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर परिसरातून या क्रीमचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, क्रीमच्या बॉक्सवर Made in Pakistan” असा उल्लेख आढळला आहे. तपासणीत या क्रीममध्ये पाऱ्याचे (Mercury) प्रमाण अत्याधिक असल्याचे समोर आले आहे. त्वचेद्वारे पारा शरीरात गेल्यास […]
अमित शहा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री आणि महिलांचा अपमान केला, अभिषेक बॅनर्जी यांचा आरोप
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपमान केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी बुधवारी केला आहे. शहा यांचे हे वागणे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘पीटीआय’ने (PTI) याबाबतचे वृत्त दिले आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील जयनगर येथे एका निवडणूक सभेला […]
पत्नीने नाईटड्रेस परिधान केल्याने पतीला राग अनावर; अंगावर रॉकेल ओतून पेटवले
पत्नीने नाईटड्रेस घातल्याने संतापलेल्या पतीने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. कर्नाटकच्या खानापूर तालुक्यातील नंदगड गावात मंगळवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत पत्नी गंभीर भाजली आहे. याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला मंजुळा पाटील ही घरी साडीऐवजी नाईटड्रेस परिधान करायची. मात्र […]
पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूत २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीपूर्वी या राज्यांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भेट वस्तू, अमली पदार्थ, मद्याचा साठा आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १००० कोटींहून अधिक किमतीच्या वस्तू आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही माहिती दिली. ‘पीटीआय’ने […]
हिंदुस्थानला येणारे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ने पुन्हा इराणला नेले
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने होर्मुझमध्ये बुधवारी दोन जहाजांवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोन्ही जहाजे जप्त करून इराणमध्ये नेण्यात आली. हल्ला केलेल्या जहाजांपैकी एक जहाज हिंदुस्थानात येत होते. इराणच्या सरकारी मीडियानुसार, एमएससी फ्रान्सिस्का आणि एपामिनोड्स अशी जहाजांची ओळख पटली आहे. एमएससी फ्रान्सिस्कावर पनामाचा ध्वज आहे, तर एपामिनोड्सवर लायबेरियाचा ध्वज आहे. जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, एपामिनोड्स हे जहाज दुबईहून […]
गुजरातमध्ये जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के; रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रतेची नोंद
गुजरातच्या काही भागांमध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ नोंदवली गेली. सायंकाळी ४:३५ च्या सुमारास आलेल्या या भूकंपामुळे आनंद आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू आनंदच्या ईशान्येस सुमारे ३६ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मध्य गुजरातमध्ये झालेल्या सौम्य भूकंपामुळे लोकांमध्ये […]
मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप
उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर न्हावेली /वार्ताहर कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर हे फाटक असल्याने दररोज शेकडो प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात असून, येथे तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे.वेळेचा प्रचंड अपव्यय रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार, गाडी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर [...]
मुरुम (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायत्ता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी संशोधन नियोजन समितीच्या धाराशिव जिल्हा समन्वयक व छत्रपती संभाजीनगर विभागाचा विभागीय प्रतिनिधी म्हणून श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा प्रसाद मम्माळे या विद्यार्थ्यांची निवड करिअर कट्ट्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील करियर कट्टा नियोजन समिती च्या मतदानाद्वारे ही निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी यशस्वीरित्या राबवला जातो. या करीअर कट्ट्यांतर्गत कु.आणिशा सुरवसे हीची दिल्ली दौऱ्यासाठी निवड झाली होती तर गणेश मोरे हा सध्या टेक्निकल इंटर प्रमुख म्हणून राज्य पातळीवर काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील शैक्षणिक वर्षासाठी श्री. प्रसाद मम्माळे याची निवड करण्यात आलेली आहे. तो यावर्षी बी.ए.द्वितीय वर्षात शिकत असून करिअर कट्ट्याअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमांमध्ये त्याचा सहभाग असतो. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी सत्कार करून त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन करिअर कट्टा हा उपक्रम इतर महाविद्यालयांमध्येही प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी महाविद्यालयीन समन्वयक प्रा. डॉ. चंद्रसेन करे, प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले व करिअर कट्ट्यातील विद्यार्थी कु.दिशा सुरवसे, कु.योगेश्वरी मारकड,इनामदार सैफ, सुशील सूर्यवंशी, गणेश मोरे, कु.पूजा हांडे आणि प्रियंका इंगळे उपस्थित होते.
रस्त्याच्या दूरवस्थेवरून मतदारराजाची बॅनरमधून खरमरीत टीका
तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे रस्त्यावरून सावनधानतेचा इशारा वार्ताहर/कुडाळ कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्याला जोडणारा तसेच केळुस-आंदूर्ले पंचक्रोशीतील गावांना जोडणारा तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच वाहनधारकांना सावधतेचा इशारा करण्यासाठी रस्त्याच्या नजीक अज्ञातांकडून “सावधान” असा बॅनर लावण्यात आला. बॅनरवरमधील मजकुराने प्रशासन व लोकप्रतिनिधींवर असलेल्या नाराजीवर स्पष्ट प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. बॅनरच्या माध्यमातून [...]
आमदार पाटील यांनी ॲड.अनिल काळे यांची भेट घेत केले सांत्वन
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांच्या मातोश्री कै. सुभद्राबाई काळे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या दुःखद बातमीने काळे परिवारावर शोककळा पसरली असून, या कठीण काळात तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केमवाडी येथे काळे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. दिनांक 13 मार्च 2026 रोजी कै. सुभद्राबाई काळे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या भेटीदरम्यान काळे कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. “सुभद्राबाईंचे जाणे हे कुटुंबासाठी न भरून येणारे नुकसान आहे,“ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या सांत्वन भेटीच्या प्रसंगी आमदार पाटील यांच्यासोबत सभापती विक्रमसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, बाबासाहेब काशिद, अरुण खोत, बालाजी काळे, रवि काळे, श्रीकांत धावणे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनीच काळे परिवारावर ओढवलेल्या या संकटात सहभागी होत आपल्या संवेदना व्यक्त केल्या. यावेळी पत्रकार वैद्य परिवार, पु.वि. लोकराज्य व दैनिक भास्कर यांनी पण काळे यांच्या दुखात सहभागी होवून सांत्वन केले.
मोबाईलशिवाय वाचन लिखान संस्कृती विकसित करण्याचा भोसले हायस्कूलमध्ये शिवाई प्रतिष्ठानाचा अनोखा उपक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील शिवाई प्रतिष्ठान यांच्यावतीने श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.स्क्रीनकडून वाचन लिखान संस्कृतीकडे. या उपक्रमांतर्गत शिवाई प्रतिष्ठान धाराशिवच्या महिलांनी एकत्रित येऊन श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील 120 विद्यार्थ्यांनां छोट्या वह्ंयाचे वाटप केले. विद्यार्थ्यांना सुट्टी मध्ये वाचण्यासाठी गोष्टीच्या पुस्तकांचे वाटप केले. श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या ग्रंथालयातून करण्यात आले. इ 5 वी ते पुढील विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गोष्टींची व अभ्यासात्मक पुस्तके वाचतील आणि आपण काय वाचलं कोणतं पुस्तक वाचले या संदर्भामध्ये त्या त्या वेळी वही मध्ये थोडक्यामध्ये नोंद करून ठेवतील. हा उपक्रम एकाच वेळी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. याचे समाधान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिवाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका माजी प्राचार्या डॉ. सुलभा देशमुख , अध्यक्षा शोभा घोडके, सचिव डॉ.विद्या देशमुख, उपाध्यक्षा डॉ. स्मिता कोल्हे, सहसचिव अस्मिता देशमुख, माधुरी कोकाटे, आशा पाटील, जयश्री भोसले आदि मान्यगण सदस्या उपस्थित होते. श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर डॉ. सुलभा देशमुख यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपण जर वाचनाची सवय ठेवली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. आपण अनेकांचे जीवन समजून घेऊ शकतो. सुसंस्कृत जीवन घडवण्यासाठी वाचनाचा नक्कीच फायदा होतो असे सांगितले. विविध माध्यमांच्या आपल्या वरती होत असलेल्या आक्रमणामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची सवय कमी झालेली आहे . त्या दृष्टीने हा अनोखा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. असे सर्व शिक्षकांनी बोलून दाखवले. शालेय विद्यार्थ्यांनी पण खूप आवडीने वाचनासाठी पुस्तक घेतली. आणि भरपूर पुस्तकं सुट्टी मध्ये वाचणार आणि बक्षी से मिळवणार असा आत्मविश्वास व्यक्त केला. या उपक्रमा प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक प्रमोद कदम 8 वी पर्यवेक्षक कुमार निकम शिक्षकशिक्षिका वृंद उपस्थित होते.
भूपालसिंह गायकवाड यांचे टीइटी परीक्षेत यश
भूम (प्रतिनिधी)- येथील श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर मधील भूपालसिंह गायकवाड सर हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता टीइटी परीक्षेत पहिली ते पाचवीसाठी असलेला पेपर एक व सहावी ते आठवी साठीचा पेपर दोन पहिल्याच प्रयत्नात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. बुद्धीच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश खेचून आणले आहे. याबद्दल त्यांचा श्री गुरुदेव दत्त प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वतीने शाळेच्या प्रांगणात हजारो विद्यार्थी,पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक माधव भोसले, राजेश भोरे, पर्यवेक्षक पोपट बांगर, लातूर बोर्ड मेंबर किरण जाधव यांचे शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. सदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षव्यंकटराव मोटे, उपाध्यक्ष विजय मोटे, सचिव सतिश देशमुख, संचालक सत्येंद्र मस्कर, सिद्धेश्वर मनगिरे,मुख्याध्यापिका अंजना मुंढे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप दहिफळे यांनी केले.
गणेश नगर येथे सीएनजी पंपाचे भूमिपूजन बापूराव पाटील यांच्या हस्ते...
मुरूम (प्रतिनिधी)- पर्यावरणापूरक इंधनाला प्रोत्साहन देण्याकरिता आणि वाहनधारकांची सोय करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्त आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गणेश नगर, ता. उमरगा येथे रविवारी (ता. १९) रोजी नूतन सीएनजी पंपाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या सीएनजी पंपाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन आणि कुदळ मारून करण्यात आले. यावेळी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, नगरसेवक गणेश अंबर, अमर भोसले, दिलीप भालेराव, रफिक तांबोळी, धनराज मंगरुळे, रशीद शेख, गोविंद पाटील, बसवराज पाटील, उल्हास घुरघुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी बोलताना शरण पाटील म्हणाले की, वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजी हा एक उत्तम पर्याय आहे. हा पंप केवळ एक व्यवसाय नसून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल आहे. पर्यावरणापूरक पाऊल, वाहनधारकांना दिलासा, सीएनजीमुळे प्रदूषणात घट, नागरिकांना स्वस्त इंधन उपलब्ध होईल. या पंपाच्या सुविधेमुळे आता स्थानिक वाहनधारकांना इंधनासाठी लांबवर जाण्याची गरज भासणार नाही. या परिसरातील नागरिकांनी या नवीन सुविधेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
मुरूम, (प्रतिनिधी)- फार्मसी हे क्षेत्र आरोग्याशी संबंधित असून अत्यंत जबाबदारीचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून न थांबता, सतत नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडून राहावे. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि रुग्णसेवा ही मूल्ये जपल्यास आपण नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. मुरूम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या सांस्कृतिक सभागृहात आकर्षक सजावट आणि फलक लावून शनिवारी (ता. १८) रोजी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे होते. यावेळी प्रा. डॉ. महेश मोटे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कमलाकर मोटे, प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. रफिक शेख, प्रा. वैष्णवी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील शिक्षक, शिस्त आणि मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना उजाळा दिला. प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच उत्तम माणूस व्हा, असा संदेश दिला. कठोर परिश्रमच यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत डॉ. रवींद्र आळंगे यांनी व्यक्त केले. अध्यक्ष समारोपप्रसंगी डॉ. होगाडे म्हणाले की, उद्या तुम्ही मोठे संशोधक व्हाल, यशस्वी उद्योजक व्हाल किंवा नावाजलेले फार्मसिस्ट व्हाल, तेव्हा तुमच्या यशात या महाविद्यालयाचा सहभाग असेल याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटेल. महाविद्यालय तुमच्याकरिता नेहमी उघडे असेल. शेवटी इतकेच म्हणेन की, तुमची जिद्द आणि कष्टाच्या जोरावर तुम्ही यशाचे शिखर गाठावे. तुमच्या भावी आयुष्यासाठी, करिअरसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. प्रा. हर्षद बदोले, डॉ. राजकुमार देवशेट्टे, मल्लिकार्जुन स्वामी, किशोर कारभारी, बालाजी शेळके, प्रतिभा शेळके आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रियंका काजळे यांनी केले. सूत्रसंचालन हुमा लोणी तर आभार प्रा. विनंती बसवंतबागडे यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

29 C