याच कारणासाठी पुरस्कार, कोश्यारींना पद्म पुरस्कार मिळल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका
राज्याचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीच त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत हे विधीमंडळाच्या अधिवेशनातून राज्य सरकारने तयार केलेले भाषण न वाचता निघून गेले. यावर तमिळनाडूचे […]
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनादरम्यान राष्ट्रीय प्रसारणावर समालोचकाकडून स्वातंत्र्यसैनिक मातंगिनी हाजरा यांच्या नावाचा चुकीचा उच्चार करण्यात आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमधील या स्वातंत्र्यसैनिकेचे नाव जाहीर करताना ‘मातंगिनी’ऐवजी ‘मंतागिनी’ असा अपभ्रंश करण्यात आला. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस पक्षाने तीव्र प्रतिक्रिया देत हा प्रकार केवळ भाषिक चूक नसून बंगालच्या इतिहास आणि अस्मितेचा अवमान असल्याचा आरोप केला. […]
व्हॉट्सॲप आता मोफत राहणार नाही? मोजावे लागणार पैसे; पाहा काय आहे नवा प्लॅन
जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ (WhatsApp) आता आपल्या युजर्ससाठी लवकरच एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत पूर्णपणे मोफत सेवा देणारे व्हॉट्सॲप लवकरच ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ (Subscription Model) आणण्याची शक्यता आहे. म्हणजेच, व्हॉट्सॲपच्या काही वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवणे पूर्वीप्रमाणेच मोफत राहील, मात्र हा बदल प्रामुख्याने […]
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधी कारवाईदरम्यान सहा स्फोट, 11 जवान जखमी
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात माओवाद्यांविरोधी कारवाईदरम्यान सहा स्फोट घडले. या स्फोटांमध्ये 11 जवान जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी हवाईमार्गे रायपूर येथे हलविण्यात आले आहे. जखमींपैकी 10 जवान जिल्हा राखीव रक्षक दलाचे असून एक उपनिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा पथकातील आहे. तिघा जवानांना पायांना गंभीर दुखापत झाली असून, आणखी तिघांच्या डोळ्यांना स्फोटातील […]
‘Border 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! ४ दिवसांत १६० कोटींचा टप्पा पार; प्रजासत्ताक दिनी किती कमाई?
सनी देओल आणि वरुण धवन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बॉर्डर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घोडदौड सुरू ठेवली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसांतच या सिनेमाने १६० कोटी रुपयांचा टप्पा आरामात ओलांडला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केल्याने चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. Sacnilk.com च्या आकडेवारीनुसार, सोमवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चित्रपटाने […]
उत्तराखंडमध्ये मोठी घोषणा: गंगोत्री धाम येथे बिगर हिंदूंना प्रवेशबंदी, मंदिर समितीचा निर्णय
उत्तराखंडमधील प्रसिद्ध गंगोत्री धाममध्ये बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय श्री गंगोत्री मंदिर समितीने घेतला आहे. रविवारी झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, केवळ मुख्य मंदिरच नाही तर देवीचे हिवाळी निवासस्थान असलेल्या मुखबा क्षेत्रातही ही बंदी लागू असेल. बद्रीनाथ-केदारनाथबाबतही हालचाली गंगोत्रीनंतर आता बद्रीनाथ आणि केदारनाथ धामसह समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या […]
निवडणूक असलेल्या राज्यांनाच पद्म पुरस्कारात प्राधान्य, कार्ति चिदंबरम यांची केंद्रावर टीका
पद्म पुरस्कार 2026 जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत निवडणूक असलेल्या राज्यांतील उमेदवारांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कार्ति चिदंबरम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “जर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ अमलात असते, तर सरकारसाठी पद्म पुरस्कार विजेत्यांची निवड किती गुंतागुंतीची […]
मुंबईची हवा आरोग्याला हानीकारक, प्रदूषण नियंत्रणं मंडळाची धक्कादायक आकडेवारी
मुंबईतील हवेच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई व नवी मुंबईतील महानगरपालिकेला फटकारले होते. त्याननंतर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) च्या आकडेवारीतून गंभीर स्थिती समोर आली आहे. 2026 या वर्षात आतापर्यंत मुंबईत आरोग्याला हानीकारक हवेचे (AQI) सर्वाधिक दिवस नोंदवले गेले असून, हे प्रमाण नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि मीरा-भाईंदरपेक्षा जास्त आहे. […]
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल
२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी* मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मुंबई / प्रतिनिधी राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत २०० गुणांपैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. [...]
फिलिपिन्समध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. 350 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक फेरी बोट समुद्रात बुडाली आहे. दक्षिण फिलिपिन्समध्ये झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आले. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे, तर बोटीवरून 316 जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती फिलिपिन्स कोस्ट गार्डाने दिली आहे. कोस्ट गार्डच्या […]
घरांच्या टंचाईवर मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉन एकत्र; सरकारला दिला कडक इशारा
तंत्रज्ञान क्षेत्रातील एकमेकांचे कट्टर स्पर्धक मानले जाणारे मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आणि ॲमेझॉन (Amazon) एका सामाजिक संकटासाठी एकत्र आले आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेटमध्ये निर्माण झालेल्या घरांच्या टंचाईच्या (Housing Crisis) प्रश्नावर या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येत चिंता व्यक्त केली असून सरकारला ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ आणि ॲमेझॉनचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी डेव्हिड […]
मुंबईत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या संशयित बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. पण या कारवाईदरम्यान पोलिसांनीच या बांगलादेशी नागरिकांच्या सोनं आणि पैश्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्याशी संलग्न असलेले एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस शिपाई अटकेत आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुतार तसेच योगेश खांडगे, नेमाणे आणि पेटकर या तीन […]
‘धुरंधर’मधील अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेवर १० वर्षे लैंगिक अत्याचाराचा आरोप
‘धुरंधर’ या गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून घरकाम करणाऱ्या ४१ वर्षीय महिलेवर गेल्या १० वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप या अभिनेत्यावर ठेवण्यात आला आहे. नदीम खान असे या अटक करण्यात आलेल्या अभिनेत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले […]
महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढला, तर उत्तर प्रदेशला कर्ज कमी करण्यात यश; RBI ने दिली आकडेवारी
महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढतच आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशसारख्या राज्याला आपले कर्ज कमी करण्यात यश आले आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आर्थिक गरजा सातत्याने वाढत असल्याने, निधी उभारणीसाठी त्यांचा बाजारातून घेतल्या जाणाऱ्या कर्जावरचा भर अधिक वाढत चालला आहे. यासाठी राज्य सरकारांकडून दीर्घकालीन बॉण्ड्सच्या माध्यमातून […]
आज संपूर्ण देशात 77 व्या प्रजासत्ताक दिनेचा उत्साह पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर लष्कराचे संचलन पाहायला मिळाले, तर राज्यातही विविध ठिकाणी मंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी ध्वजारोहन करत प्रजासत्ताक दिन साजरा केला. मात्र नाशिकमध्ये ध्वजारोहनानंतर मोठा राडा झाला. मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एका महिला पोलिसाने गोंधळ घातला. महाजन यांनी भाषणामध्ये घटनेचे शिल्पकार डॉ. […]
देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर लष्करी संचलन पार पडले. लष्करी संचलनानंतर कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारे विविध राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळाले. कर्तव्य पथावरील या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘गणेशोत्सव – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या विषयावर आधारित असलेल्या या चित्ररथाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या […]
सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा साडे सहा हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. साताऱ्यातील ड्रग्सचा पैसा महाराष्ट्राच्या निवडणुकीत खेळवला जातोय, सूत्रधार कोण हे फडणवीसांनी शोधावं असे आव्हान यावेळी राऊत यांनी दिले. सोमवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, साताऱ्यात […]
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात देशाला आणि जगाला शांततेचा संदेश दिला. पण या देशामध्ये सर्वच क्षेत्रात अशांतता, अस्थिरता आहे. त्याच्यामुळे शांततेचा संदेश देताना या देशातील अंशांतता कुणामुळे आहे? त्याला […]
अमेरिकेमध्ये भीषण विमान अपघात; टेकऑफनंतर प्रायव्हेट जेट कोसळले, भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद
अमेरिकेतील मेन (Maine) राज्यात भीषण विमान अपघात झाला. बँगोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेकऑफनंतर एका खासगी जेटने पेट घेतला आणि ‘बॉम्बार्डियर चॅलेंजर 600’ जातीचे हे विमान धावपट्टीवर कोसळले. रविवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या विमानामध्ये एकूण 8 प्रवासी होते अशी माहिती फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने दिली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी 7 […]
आयसीसीच्या तंबीनंतर पाकिस्तानचा यू टर्न! टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभाग निश्चित; संघ जाहीर
बहिष्काराच्या चर्चांनी वातावरण तापलेले असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अखेर माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कठोर इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आपला पवित्रा बदलत टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याची अधिकृत घोषणा केली आहे. एवढेच नव्हे, तर पीसीबीने थेट १५ सदस्यीय संघ जाहीर करून सर्व अफवांना जोरदार चपराक दिली आहे. बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानही स्पर्धेतून बाहेर पडणार, अशा […]
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा –गोव्याला नमवीत महाराष्ट्र अव्वल स्थानी
यजमान महाराष्ट्राने गोवा संघावर ८ गडी राखून विजय मिळवित रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. पहिल्या डावात ६ बळी टिपत फलंदाजीतही चमक दाखविणारा जलज सक्सेना या सामन्याचा मानकरी ठरला. पुण्याच्या गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना झाला. गोव्याला २०९ धावांवर रोखल्यानंतर महाराष्ट्राने ३५० धावसंख्या उभारून पहिल्या डावात १४१ […]
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा –सबालेंका, अल्काराजची उपांत्यपूर्व फेरीत धडक
अव्वल मानांकित एरिना सबालेन्का हिने रविवारी १७व्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या व्हिक्टोरिया एमबोकोचा ६-१, ७-६ (१) असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याचबरोबर जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्काराजनेही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत गेल्या चार वर्षांत तिसरा किताब जिंकण्याच्या तयारीत असलेल्या बेलारूसच्या एरिना सबालेन्काने […]
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील गोवणे, साखरे आणि वणई या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सूर्या प्रकल्पासाठी पाटबंधारे विभागाने संपादित केल्या. मात्र ३० वर्षे उलटून गेली तरी अद्यापही प्रकल्पग्रस्तांना फुटकी कवडी मिळालेली नाही. याविरोधात प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देत मोबदला लवकर मिळाला नाही तर आंदोलन छेडू, असा इशारी दिला आहे. गोवणे, साखरे व वणई हद्दीतून गेलेल्या सूर्या […]
साकेत-बाळकूम रोडवरील ग्लोबल हॉस्पिटल येथे त्री-मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. ठाणे महानगरपालिका, दादा भगवान परिवार व महावीर जैन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे त्री-मंदिर उभारण्यात आले आहे. सोहळ्यादरम्यान मुंबई-नाशिक महामार्गासह परिसरात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी हे तीन दिवस वाहतुकीत बदल केले आहेत. वाहतूक पोलिसांकडून ३० […]
सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबासह देवदर्शन तसेच पर्यटनाला निघालेल्या चाकरमान्यांचा ऐन थंडीत चांगलाच घामटा निघाला. एकाच वेळी लाखो वाहने रस्त्यावर आल्याने मुंबई-पुणे महामार्ग तसेच जुन्या महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिककोंडी झाली. तसेच सुट्ट्यांच्या आनंदालाही ‘ब्रेक’ लागला. बोरघाटात ६ किलोमीटरच्या रांगा लागल्या असल्याचे आज पाहायला मिळाले. अमृतांजन ब्रिज ते खोपोली बायपास वाहनांच्या लांबच लांब […]
असं झालं तर…बँकेची एफडी मोडावी लागली…
फिक्स्ड डिपॉझिड (एफडी) हा अजूनही लोकांच्या आवडीच्या गुंतवणूक पर्यायापैकी एक आहे. याचे कारण या स्किमवर गुंतवणूकदारांचा दीर्घ काळापासून विश्वास आहे. या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतात आणि त्यावर त्यांना खात्रीशीर परतावा मिळतो, पण काही वेळा लोकांना अचानक पैशांची गरज भासते आणि मग एफडी मोडली जाते. मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडल्याबद्दल बँका तुमच्याकडून दंड आकारतात. अशा परिस्थितीत तुम्हाला […]
पाकिस्तानच्या तुरुंगात हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू, शिक्षा पूर्ण होऊनही सुटका नाही
खोल समुद्रात मासेमारी करताना चुकून सागरी हद्द ओलांडणारे हिंदुस्थानातील १९९ मच्छीमार पाकिस्तानच्या कैदेत आहेत. यातील एका मच्छीमाराचा आजारपणामुळे रुग्णालयात मृत्यू झाला. भगा परबत असे मृत मच्छीमाराचे नाव असून पालघर-गुजरात सीमेवरील गावातील रहिवासी होते. साडेतीन वर्षांपूर्वीच त्याची शिक्षा पूर्ण झाली होती. सागरी हद्द ओलांडल्याने पाकिस्तानच्या तटरक्षक दलाने हिंदुस्थानातील १९९ मच्छीमारांना कैदेत ठेवले आहे. यातील १९ मच्छीमार […]
डोंबिवलीत आनंद दिघे उद्यानाची दुरवस्था; नाल्याचे पाणी घुसल्याने दुर्गंधी, प्रशासनाचे दुर्लक्ष
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती २७जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र त्यांच्या स्मरणार्थ डोंबिवलीत उभारलेल्या आनंद दिघे उद्यानाकडे प्रशासनाने पुरते दुर्लक्ष केले आहे. या उद्यानाची देखभाल, दुरुस्ती न केल्यामुळे त्याची दुरवस्था झाली असून नाल्याचे पाणी थेट याठिकाणी येत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. याबाबत रहिवासी अनेकदा तक्रारी करूनही पालिका […]
लहान भावंडांना मारते म्हणून संतप्त झालेल्या आईने पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यातील संतोष भुवन परिसरात घडली. कुमकुम प्रजापती असे या निर्दयी मातेचे नाव असून तिने डोक्यात वरवंटा घालून आपल्या १५ वर्षांच्या मुलीला संपवले आहे. अंबिका प्रजापती असे मृत मुलीचे नाव आहे. नालासोपारामधील भुवन परिसरातील तांडा पाडा येथील विद्या विकासिनी चाळीत प्रजापती कुटुंब राहते. […]
नवी मुंबई विमानतळावरून सिडको गायब, पत्रव्यवहाराला समाधानकारक उत्तर नाही
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात असला तरी या विमानतळावरून अदानी समूहाने सिडकोला गायब केले आहे. एकाही ठिकाणी सिडकोचे नाव टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे सिडको प्रशासनाने विमानतळ व्यवस्थापनाशी पत्रव्यवहारही केला असून त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर अदानी समूहाने दिलेले नाही. त्यामुळे सिडकोच्या नावाचा उल्लेख विमानतळावर होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित […]
बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाला जिवंत जाळले
बांगलादेशात आणखी एका हिंदू नागरिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नरसिंगदी जिह्यात चंचलचंद्र भौमिक नावाच्या 23 वर्षीय हिंदू तरुणाला जिवंत जाळून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. चंचल चंद्र भौमिक याचा जळालेला मृतदेह एका दुकानात सापडला. गेल्या 40 दिवसांमध्ये बांगलादेशमध्ये 10 हिंदूंची हत्या करण्यात आली आहे.
हिंदुस्थानच्या इतिहासाचे साक्षीदार, प्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे चार दिवसांपूर्वी त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल 30 वर्षे टुली हे बीबीसीचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 20 वर्षे त्यांनी स्वतंत्र पत्रकारिता केली. […]
अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र
अंतराळवीर आणि वायुदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्रने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गॅलेंट्री पुरस्कार आणि सेवा पदक विजेत्यांची नावे जाहीर केली. तीन जणांना कीर्ती चक्र आणि 13 जणांना शौर्य चक्रने सन्मानित करण्यात येणार आहे. लष्कराचे मेजर अर्शदीप सिंग, नायक सुभेदार डोलेश्वर सुब्बा आणि वायुदलाचे ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर […]
रेल कामगार सेनेचा दणदणीत विजय, मुंबई सबर्बन निवडणुकीत एकता पॅनलचा झेंडा
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रेल कामगार सेनेचाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंबई विभागांतर्गत उपनगरीय लोकल सेवांसाठी लोको व ट्राफिक रनिंग स्टाफच्या डिटेल बुक निर्मितीसाठी स्थापन होणाऱया कमिटीसाठी मोटरमन व ट्रेन मॅनेजर प्रतिनिधींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत रेल कामगार सेनेने ‘सीआरएमएस’सोबत स्थापन केलेल्या ‘एकता पॅनल’चे सर्व सहा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. रेल […]
शिंदे गटाचे ‘बी’ फॉर्म भाजपने वाटले!
राणा पाटील यांचं पोरगं ‘बी’ फॉर्म आणून देतं हे आमचं दुर्दैव. धाराशिव जिल्ह्यातील शिंदे गट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दावणीला बांधला असून त्याची लाज वाटते अशी खदखद व्यक्त करत शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांना एका कार्यकर्त्याने फोनवर झापले. त्याची एक क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. जिह्यात सध्या जिल्हा परिषद, […]
सलग सुट्ट्यांमध्येही जादा गाड्या नाहीत, कोकण रेल्वेमध्ये खचाखच गर्दी
सलग सुट्टय़ांमुळे कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांना रविवारीही प्रचंड गर्दी झाली. संभाव्य गर्दी लक्षात घेत मध्य आणि कोकण रेल्वेने वेळेत पुरेशा जादा गाड्या सोडल्या नाहीत. त्यामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नव्हती. कोकणकन्या एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचची परिस्थितीदेखील अत्यंत भयावह होती. अभूतपूर्व गर्दीत प्रवाशांची घुसमट झाली. ज्येष्ठ नागरिक, महिलांचे प्रचंड हाल झाले. सलग सुट्टय़ांच्या कालावधीत […]
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विकासकामांचा धडाका लावला आहे. गेल्या वर्षभरात शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी मतदारसंघात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणाऱया ‘कार्यअहवाल’ या पुस्तिकेचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ’मातोश्री’ निवासस्थानी झाले. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनिल देसाई यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे संकलन अहवालात करण्यात आले […]
रात्री शांत झोप लागत नाही…हे करून पहा!
काही जणांना रात्री लवकर झोप लागत नाही. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर कधीतरी डोळा लागतो, पण शांत झोप होत नाही. याचा परिणाम मग दुसऱ्या दिवशीच्या कामावरही होतोच. शिवाय असेच जर रोज होत असेल तर त्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. म्हणूनच रात्री पुरेशी आणि शांत झोप होणे खूप गरजेचे आहे. झोपण्याआधी मोबाईलपासून दूर रहा. ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास […]
तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडचा उडवला धुव्वा : मालिकेत 3-0 ने आघाडी वृत्तसंस्था/ गुवाहाटी अभिषेक शर्माची तुफानी खेळी (20 चेंडूत नाबाद 68) आणि कर्णधार सूर्याची त्याला मिळालेली सुरेख साथ (26 चेंडूत नाबाद 57) या जोरावर तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 8 विकेट्स आणि 60 चेंडू राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला 9 बाद [...]
अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण
प्रभाकर कोरे यांना पद्मश्री :शिबू सोरेन यांना पद्मभूषण : एकूण 131 जणांना पद्म वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी राष्ट्रपतींनी 2026 या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली. या यादीत पाच पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना कला क्षेत्रात पद्मविभूषण प्रदान केले जाईल. [...]
कर्नाटकातील सात जणांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव प्रतिनिधी/ बेंगळूर कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय आदी विविध क्षेत्रात असाधारण सेवा देणाऱ्या भारतीय नागरिकांना भारत सरकारकडून दरवषी देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात कला क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शतावधानी आर. गणेश यांना पद्मभूषण तर अन्य क्षेत्रात सेवा दिलेल्या सात [...]
देशाच्या विकासात नारीशक्तीची महत्त्वपूर्ण भूमिका
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले आहे. देशाचे युवा सोनेरी भविष्यावरून विश्वास मजबूत करत आहेत. आमचे कलाकार, शिल्पकार आमच्या समृद्ध परंपरांना आधुनिक अभिव्यक्ती देत आहेत. देशाच्या विकासाच्या नारीशक्तीची भूमिका महत्त्वपूर्ण असून मुली देशाच्या विकासात सक्रीय योगदान देत असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत. आमची [...]
प्रियांकाच्या ‘द ब्लफ’चा ट्रेलर सादर
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा नवा चित्रपट ‘द ब्लफ’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो जबरदस्त आहे. या हॉलिवूड चित्रपटात देसी गर्ल मुख्य भूमिकेत असून स्वत:च्या अॅक्शनदृश्यांद्वारे तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ‘ही कहाणी रक्ताळलेल्या वाळूसोबत संपणार आहे, द ब्लफ हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओवर येतोय’ असे प्रियांकाने ट्रेलर शेअर करत म्हटले आहे. प्रियांका चोप्रा यात [...]
अल्कारेझ, साबालेंका, गॉफ, जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत
ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम : मेदवेदेव्ह, टॉमी पॉल, म्बोको, मुचोव्हा, बुबलिक पराभूत वृत्तसंस्था/ मेलबर्न 2026 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अल्कारेझ, सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविच, ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स डी मिनॉर, महिलांच्या विभागात टॉप सिडेड बेलारुसची आर्यना साबालेंका, अमेरिकेची कोको गॉफ तसेच अमेरिकेची नवोदित 18 वर्षीय ईव्हा [...]
मध्यप्रदेशात नक्षलींकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
जंगलातून रायफल-पिस्तूल, 48 काडतुसे आणि 43 डेटोनेटर्स जप्त वृत्तसंस्था/ गारियाबंद (मध्यप्रदेश) छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त गारियाबंद जिह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का दिला आहे. गुप्त माहितीच्या आधारे, संयुक्त कारवाईत सैन्याने जंगल आणि डोंगराळ भागातून शस्त्रs, स्फोटके आणि दळणवळण उपकरणे जप्त केली. जप्त केलेल्या साहित्यात पोलिसांकडून लुटलेली एक रायफल, एक पिस्तूल, 48 काडतुसे आणि 43 डेटोनेटर्सचा समावेश [...]
वृत्तसंस्था/ नोंथाबुरी (थायलंड) येथे सुरु असलेल्या 2026 च्या सॅफ फुटसाल चॅम्पियनशिप पुरुषांच्या स्पर्धेत भारताने आपला सलग दुसरा विजय नोंदविताना श्रीलंकेचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात नोंदविलेले सर्व गोल खेळाच्या पूर्वार्धात झाले. भारतातर्फे सिऑन डिसोझाने तिसऱ्या आणि 20 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. लालसेव्हामपुईयाने 10 व्या मिनिटाला तर निखिल माळीने 12 व्या मिनिटाला [...]
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली न्यूयॉर्कमध्ये सुरु असलेल्या स्प्राट स्क्वॅश आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगला दुसऱ्या फेरीतील सामन्यात जपानच्या सातोमी वटांबेने पराभूत केले. दुसऱ्या फेरीतील सामन्यात सहाव्या मानांकित वटांबेने अनाहत सिंगचा 6-11, 6-11, 11-2, 11-8, 11-6 असा फडशा पाडत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत अनाहत सिंगने पहिल्या फेरीतील सामन्यात इंग्लंडच्या टर्मेलचा 11-3, 11-6, 9-11, [...]
तामिळनाडूत हिंदीला कुठलेच स्थान नाही : स्टॅलिन
हिंदी लादण्याला नेहमीच विरोध करणार : तमिळसाठी आमचे प्रेम कायम राहणार वृत्तसंस्था/ चेन्नई तामिळनाडचे मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी तमिळ भाषा शहीद दिनी रविवारी राज्यभाषेसाठी हुतात्म्या झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी स्टॅलिन यांनी तामिळनाडूत हिंदीसाठी कुठलेच स्थान नसल्याचे वक्तव्य केले आहे. हिंदी लादण्याच्या कृतीला आम्ही नेहमीच विरोध करणार आहोत. तमिळ भाषेसाठी आमचे प्रेम [...]
वृत्तसंस्था/ बडोदा महिलांच्या प्रीमीयर लीग टी-20 स्पर्धेत सोमवारी येथे होणाऱ्या आरसीबी विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला आपले आव्हान जीवंत ठेवण्यासाठी विजयासाठी झगडावे लागेल. मात्र या स्पर्धेच्या गुणतक्त्यात सलग 5 सामने जिंकल्यानंतर आरसीबी संघाला शनिवारच्या सामन्यात पहिल्या पराभवला सामोरे जावे लागले होते. दिल्ली कॅपिटल्सने त्यांना पराभूत करुन गुणतक्त्यात 6 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. या सामन्याला भारतीय [...]
अमेरिकेत 18 राज्यांमध्ये हिमवादळाचा धोका तीव्र
आणीबाणी जाहीर, आणखी 9 हजारांहून अधिक उ•ाणे रद्द वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेतील हिमवादळ आणखीनच तीव्र झाले आहे. 18 राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रविवारी आणखी 9 हजार विमानोड्डाणे रद्द केल्याने गेल्या दोन दिवसांत 14 हजारांहून अधिक उड्डाणांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय हवामान सेवेनुसार 20 कोटी लोक म्हणजेच जवळजवळ दोन तृतीयांश अमेरिकन नागरिक या वादळाच्या [...]
लोकांनी स्वदेशी उत्पादने खरेदी करावी!
कॅनडाच्या पंतप्रधानांचे जनतेला आवाहन : ट्रम्प यांच्याकडून 100 टक्के शुल्काची धमकी वृत्तसंस्था/ ओटावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 100 टक्के आयातशुल्काची धमकी दिल्यावर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी देशवासीयांना स्वदेशी सामग्री खरेदीचे आवाहन केले आहे. कार्नी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर बर्हिगत धोका असल्याने आमच्या नियंत्रणात जे आहे त्यावर लक्ष द्यावे लागेल [...]
आणखी एका हिंदूला बांगलादेशात जिवंत जाळले
गेल्या 40 दिवसांत 10 हिंदूंची हत्या वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेशच्या नरसिंदी जिह्यात एका हिंदू तरुणाला जिवंत जाळल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय चंचल चंद्र भौमिकचा जळालेला मृतदेह एका दुकानात आढळला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी चंचल गॅरेजवजा दुकानामध्ये झोपला होता. कोणीतरी बाहेरून शटरवर पेट्रोल ओतून दुकानाला आग लावली. ही आग आत वेगाने पसरल्यामुळे चंचलचा [...]
पंजाबमध्ये रेल्वेमार्गावर आरडीएक्सचा स्फोट
मालगाडीचा वेग कमी असल्याने मोठा रेल्वे अपघात टळला चंदीगड प्रजासत्ताक दिनापूर्वी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर अशांतता दिसून आली. पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्हा शनिवारी रात्री हादरला. सरहिंद परिसरात एका नवीन रेल्वेमार्गावर एक शक्तिशाली स्फोट झाल्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. हा स्फोट आरडीएक्सद्वारे घडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आरडीएक्स स्फोटकांनी एका मालगाडीला लक्ष्य करण्यात आले. स्फोटात ट्रॅकचे तुकडे झाले. [...]
मुंबईचा हैदराबादवर नऊ गड्यांनी विजय
वृत्तसंस्था/ हैदराबाद रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या इलाईट ड गटातील सामन्यात मुंबईने यजमान हैदराबादचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. मुंबईच्या पहिल्या डावात द्विशतक झळकाविणाऱ्या सर्फराज खानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 507 धावा जमविल्या. त्यानंतर हैदराबादचा पहिला डाव 267 धावांत मुंबईने 293 धावांची भक्कम आघाडी मिळविली. [...]
मध्य प्रदेशचा कर्नाटकवर मोठा विजय
वृत्तसंस्था/ अलूर रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या इलाईट ब गटातील सामन्यात मध्य प्रदेशने यजमान कर्नाटकाचा 217 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात गोलंदाजीत 7 बळी आणि फलंदाजीत 32 धावा करणाऱ्या मध्य प्रदेशच्या सारांश जैनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्या डावात 323 धावा जमविल्या. त्यानंतर कर्नाटकाचा पहिला [...]
प्रवेश करा, हाती लागेल ते उचलून न्या!
जपानच्या स्टोअरमध्ये चोरीची पूर्ण मोकळीक टोकियोत सध्या एक असा स्टोअर चर्चेत आहे, ज्याची अनोखी स्कीम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हे काही सामान्य दुकान नसून येथे येणाऱ्या लोकांना चोरी करण्याची पूर्ण मोकळीक दिली जाते. स्टोअरच्या नियमांनुसार आत प्रवेश केल्यावर व्यक्तीला पूर्ण 60 सेकंद मिळतात, ज्यात तो कपडे, अॅक्सेसरीज, गॅझेट्स किंवा अन्य कुठलेही सामान उचलू शकतो. [...]
आजचे भविष्य सोमवार दि. 26 जानेवारी 2026
मेष: फावल्या वेळेत आवडीचा छंद जोपासाल, वडिलांकडून भेट वृषभ: नवी स्वप्ने व आशा दाखवतील, प्रयत्नावर यश विसंबून मिथुन: चांगल्या गोष्टी करण्यासाठी मन सज्ज राहील कर्क: झटपट पैसा कमावण्याचा मोह निर्माण होईल सिंह: रिकाम्या वेळेत कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा कराल कन्या: मनाप्रमाणे गोष्टी घडण्याची शक्यता अगदी कमी तुळ: कर्मकांड व शुभकार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले वृश्चिक: केवळ [...]
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. देशभरात 131 मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाले असून सर्वाधिक 15 पद्म पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर उमटली आहे. तमाशा कलेचा प्रथमच सर्वेच्च गौरव झाला असून तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित केले जाणार आहे. वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा, कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड, प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे, […]
कल्याण-डोंबिवलीत विरोधी बाकावर बसू, पण ज्यांच्याविरोधात लढलो त्या भारतीय जनता पक्ष आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही, असे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना ही भूमिका स्पष्ट केली. नॉट रिचेबल नगरसेवकांवर […]
महाराष्ट्रात संविधानाची हत्या केल्याबद्दल कोश्यारी यांना पद्मभूषण
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यावर समाज माध्यमांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांची कारकीर्द अनेक कारणांनी वादग्रस्त ठरली होती. त्यावर नेटकऱ्यांनी बोट ठेवले. ‘महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून शिंदे गट आणि भाजपचे असंवैधानिक सरकार बसवल्याबद्दल हा मोदी सरकारने दिलेला किताब आहे’, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त […]
शिवसेनेचे नगरसेवक हरवले; कल्याणमध्ये झळकले पोस्टर्स
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मशाल चिन्हावर निवडून आलेले शिवसेनेचे चार नगरसेवक बेपत्ता झाले. आठवडा उलटला तरी त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत नगरसेवक हरवले असल्याचे पोस्टर्स कल्याण पूर्वेत झळकावले आहेत. कुणाला माहिती मिळाल्यास तत्काळ शिवसेना शहर शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान उद्या कल्याण पश्चिम येथील शहर शाखेत […]
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभाचा सोहळा 23 जानेवारी रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झाला. या कार्यक्रमात शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांसाठी लिहिलेल्या एका प्रतीकात्मक पत्राचे वाचन परेश दाभोळकर यांनी केले. ‘कपाळावरचं निष्ठेचं कुंकू पुसू देऊ नका,’ असा संदेश बाळासाहेबांनी या पत्रातून दिला. जणू बाळासाहेबच आपल्याशी संवाद साधत आहेत असा भास या पत्रामुळे शिवसैनिकांना झाला आणि […]
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पेंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील 982 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली आहेत. महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. यातील 31 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘शौर्य पदक’, तर 4 पोलीस अधिकारी आणि सुधार सेवा विभागातील 2 कर्मचाऱयांना ‘राष्ट्रपती पदक’ देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्र पोलीस […]
सामना अग्रलेख –प्रजासत्ताक कुठे आहे?
‘शत-प्रतिशत फक्त आम्हीच’ हा एककलमी कार्यक्रम भारतीय जनता पक्ष साम, दाम, दंड, भेद वापरून राबवीत आहे. त्यासाठी अडथळा ठरणारी ‘राज्यघटना’ आणि त्या घटनेने जनतेला बहाल केलेले ‘प्रजासत्ताक’ शिल्लकच ठेवायचे नाही, असे त्यांचे प्रयत्न आहेत. तरीही दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नेहमीच्या उत्साहात साजरा होईल. राष्ट्रपती देशाला उद्देशून भाषण करतील. संचलन होईल, परंतु साडेसात दशकांपूर्वी […]
दिल्ली डायरी –उत्तर प्रदेशात योगी विरुद्ध अविमुत्तेश्वरानंद
>> नीलेश कुलकर्णी (nileshkumarkulkarni@gmail.com) मौनी अमावस्येला अविमुत्तेश्वरानंद गंगास्नानाला जात असताना त्यांना पालखीने जाण्यास मज्जाव करून भक्तगणांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या लाठीमाराने तेथील राजकारण ढवळून निघाले आहे. पवित्र मणिकर्णिका घाटावर हातोडा चालवणाऱ्या सरकारविरोधात अगोदरच हिंदूंमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असताना शंकराचार्यांना आव्हान देत योगींनी स्वतःसह भाजपच्या पायावर धोंडा मारल्याचे मानले जात आहे. योगी यांच्याविरुद्ध सगळा संतसमाज […]
विज्ञान रंजन –कॉन्कॉर्डची सुपरसॉनिक भरारी!
म्हटलं तर सुफल संपूर्ण किंवा म्हटलं तर असफल अपूर्ण अशी कॉन्कॉर्डची कहाणी. तुम्ही म्हणाल काय आहे हे कॉन्कॉर्ड? आणि तसं वाटणंही साहजिक. कारण 2003 मध्ये कॉन्कॉर्ड विमानसेवा बंद होऊन आता तेवीस वर्षे होतायत. 21 जानेवारी 1976 या दिवशी कॉन्कॉर्ड नावाच्या बहुचर्चित विमानाचं पहिलं उड्डाण झालं त्याला आता 50 वर्षे होतील. पक्ष्याच्या बाकदार चोचीसारखा पुढचा भाग […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अशा राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेतील कामाची गुणवत्ता तसेच योजनेत वित्तीय अनियमितता होत असल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. मुख्य म्हणजे चुकीच्या डिझाईनमुळे या योजनेच्या खर्चात 44 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ झाल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिली होती. त्याची प्रचीती आता आली आहे. राज्यातील शाळा अंगणवाड्या, […]
बांगलादेश मंडळाने फोडले सरकारवर खापर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) रविवारी सांगितले की, ते भारतात होणाऱ्या आयसीसी पुऊष टी-20 विश्वचषक स्पर्धा 2026 मध्ये खेळण्यास इच्छुक होते, परंतु बांगलादेश सरकारच्या निर्णयाशी त्यांना बाधील राहावे लागले आणि सरकारने या दौऱ्यासाठी परवानगी दिली नाही. बीसीबीचे संचालक अब्दुर रझाक म्हणाले की, सर्व परदेश दौऱ्यांसाठी सरकारी मंजुरी अनिवार्य आहे आणि ती केवळ विश्वचषकापुरती [...]
कोलकाताजवळ तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; सभेचा मंच पेटवला
पश्चिम बंगालमधील बेहाला परिसरातील साखेर बाजार येथे रविवारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. राजकीय कार्यक्रमाचे झेंडे लावण्यावरून सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूचा जमाव हिंसक झाला. यावेळी संतप्त जमावाने जाहीर सभेसाठी उभारलेला तात्पुरता मंच पेटवून दिला, तसेच स्थानिक नगरसेवकाच्या कार्यालयाचीही तोडफोड केली. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे निवडणूक […]
मनालीत Ice Age! २४-२४ तास बर्फात अडकलेले पर्यटक गारठले, अन्न पाण्याविना हाल, अनेकांची पायपीट
हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य मनालीचे सौंदर्य पाहण्यासाठी गेलेल्या हजारो पर्यटकांवर सध्या भीषण संकट ओढवले आहे. मुसळधार बर्फवृष्टी आणि सलग सुट्ट्यांमुळे झालेल्या गर्दीने मनालीतील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेकडो पर्यटक गेल्या २४ तासांहून अधिक काळ आपल्या वाहनांमध्ये अडकून पडले आहेत. बर्फवृष्टी ठरली शाप दीर्घ प्रतीक्षेनंतर हिमाचलमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे पर्यटन व्यवसायाला अच्छे दिन येतील, अशी आशा होती. मात्र, […]
महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून अंमली पदार्थांचे (Drugs) मोठे साठे सापडण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने पोलीस प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘गृहमंत्री खरंच कठोर पावले उचलणार का?’ […]
केंद्र सरकारने २०२६ सालासाठीच्या ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळातील काही विधानांमुळे हा पुरस्कार आता चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री, राज्यसभा आणि लोकसभा खासदार तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून प्रदीर्घ […]
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला ‘तमाशा’ जिवंत ठेवणारे आणि ग्रामीण संस्कृतीचे शिलेदार रघुवीर खेडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमाशा क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ सेवेची ही सर्वात मोठी पावती मानली जात आहे. आईचा वारसा आणि ‘सोंगाड्या’ची मोहिनी संगमनेरचे सुपुत्र असलेले […]
केंद्र सरकारने २०२६ सालासाठीच्या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील ४ दिग्गज मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. शेती, वैद्यकीय आणि लोककला यांसोबतच आदिवासी संस्कृतीचा श्वास असलेल्या वारली संगीतालाही यंदा सन्मान मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम वाळवंडा गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. […]
प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर) यांच्यासह पाच मान्यवरांना ‘पद्मविभूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी यंदाचे पाच पद्मविभूषण पुरस्कार खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आले आहेत: धर्मेंद्र (कला) […]
जालन्यातील अंबड तालुक्यातील पारनेर फाटा येथे 18 वर्षीय तरुणाची पोटात चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पवन संतोष बोराटे (वय 18) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणीअंबड पोलिसांनी आरोपी राहुल खरे याला अटक केली. शनिवारी रात्रीच्या सुमारास पारनेर फाटा येथे पवन संतोष बोराटे (रा. पारनेर) आणि […]
अदानी, लोढा यांसारख्या स्थानिक कंपन्यांबरोबर दाव्होसमध्ये MoU करणे हे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेच्या उद्देशालाच हरताळ फासणारे असून, हा प्रकार ‘क्रूर विनोद’ असल्याची टीका काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर केवळ टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाले असतील, तर ही राज्यासाठी आनंदाची […]
त्यांनी जिभेला लगाम लावण्याची गरज आहे, अन्यथा…! रोहित पवार यांचा शिवतारे यांना इशारा
पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘टीका करताना शिवतारे साहेब यांनी जिभेला लगाम लावण्याची गरज आहे, अन्यथा पोपटासारखं ‘मिठू.. मिठू’ बोलणाऱ्यांचं काय होतं, याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेच’, अशा शब्दांत रोहित पवारांनी त्यांचा समाचार घेतला. […]
प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक व नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिराचा आतील व बाहेरील परिसर तसेच श्री संत नामदेव पायरी येथे तिरंग्याच्या रंगसंगतीत विशेष […]
धाराशिव जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेत शिवसैनिकांचा उद्रेक
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारीवरून शिवसैनिकांनी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राजन साळवी यांना घेराव घालून, चर्चा केली असता शिवसैनिक व साळवी यांच्यात खंडाजंगी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे शिवसेनेचे युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अविनाश खापे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क प्रमुख राजन साळवी यांना शिवसैनिकांचे मत मांडताना आपणास शिवसैनिक म्हणून घेण्यास लाज वाटते. तुम्ही दिवसभर आमच्या सोबत असता आणि रात्री युतीतील भाजप नेत्यांसोबत बैठक घेता. आमदार राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म आणून देतात हे योग्य नसल्याचे भ्रमणध्वनीवर बोलले. कळंब-धाराशिव मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेतला होता. परंतु आता पुर्णपणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एबी फॉर्म वाटण्याचे भाजपच्या हातात गेले आहे. असे सांगून अविनाश खापे यांनी शिवसेनेचे जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवार शिंदे यांना मल्हार पाटील यांनी एबी फॉर्म आणून दिला हे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर साळवी यांनी विधानसभेचे शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार अजित पिंगळे यांनी या मतदारसंघातील उमेदवारीबाबत निर्णय घेतल्याचे साळवी यांनी या भ्रमणध्वनीवर सांगितले. यावर खापे यांनी पिंगळे हे आमदार पाटील यांचे समर्थक आहेत. त्यामुळे या निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्याकडे द्या अशी आमची मागणी होती. असे सांगून खापे यांनी मी सावंत यांचा समर्थक किंवा आर्थिक लाभधारक नाही, असे सांगून शिवसेना वाचविण्यासाठी आमदार सावंत योग्य असल्याचे सांगितले. त्यानंतरही अविनाश खापे व संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यात बरीच चर्चा झाली. यावेळी साळवी यांनी बरेच मुद्दे खोडून असे काही झाले नसून, पालकमंत्री प्रताप सरनाईक 26 जानेवारीला येत आहेत. आपण सर्वजण बसून फायनल निर्णय घेवू असे सांगितले. धाराशिव जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीपासून शिंदे यांच्या शिवसैनिकात गोंधळाची परिस्थिती असून, तीच परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कायम राहिल्यामुळे शिवसैनिका संताप व्यक्त केला जात आहे.
ओसरगाव येथे कार आणि एसटी बसचा भीषण अपघात
दोन प्रवासी गंभीर जखमी कणकवली / वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे रविवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर आली आणि समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू [...]
रथसप्तमी निमित्त देवीच्या सिंहासनावर रथालंकार पूजा; सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मंदियाळी
तुळजापूर (प्रतिनिधी)- रथसप्तमीचा पवित्र योग आणि शनिवार-रविवार-सोमवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा लाभ मिळाल्याने रविवारी (दि. 25) तीर्थक्षेत्र तुळजापुरात भाविकांचा अक्षरशः महापूर उसळला. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या असून रथसप्तमी निमित्त देवीच्या सिंहासनावर भव्य रथालंकार महापूजा मांडण्यात आली होती. रविवारी पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन धर्मदर्शनास प्रारंभ झाला. सकाळी सहा वाजता देवीजींचे अभिषेक व भाविकांचे अभिषेक सुरू झाले ते सकाळी दहा वाजेपर्यंत चालले. त्यानंतर देवीजींना वस्त्रालंकार परिधान करून नित्योपचार पूजा संपन्न झाली. या विशेष पूजाविधींच्या पार्श्वभूमीवर देवीदर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. धर्मदर्शन, मुखदर्शन, अभिषेक दर्शन आणि सशुल्क दर्शनाच्या सर्व रांगा भाविकांनी तुडुंब भरून वाहत होत्या. रथालंकार पूजेच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. . देवीदर्शनानंतर भाविकांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी करत पूजेचे साहित्य, प्रसाद, देवीचे फोटो व मूर्तींची खरेदी केली. मात्र मोठ्या संख्येने भाविक खाजगी वाहनांनी आल्याने संपूर्ण तुळजापूर शहराला जणू वाहनतळाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहतूक नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत होता. मंदिराच्या महाद्वारासमोर किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने भाविकांना दर्शन रांगेत जाण्यास मोठी कसरत करावी लागत होती. अरुंद रस्ते, अतिक्रमणे आणि वाढती गर्दी यामुळे भाविकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याने या संपूर्ण प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
प्रजासत्ताक दिनी मांसविक्री बंदीचा निर्णय अखेर मागे; आदिवासी संघटनांच्या रोषानंतर प्रशासनाची माघार
ओडिशामधील आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरापुटमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मांसाहार विक्रीवर बंदी घालण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अवघ्या काही तासांतच मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. स्थानिक लोक आणि आदिवासी नेत्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला आपला हा वादग्रस्त आदेश अखेर मागे घ्यावा लागला. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोरापुटचे जिल्हा दंडाधिकारी मनोज सत्यवान महाजन यांनी जिल्ह्यात […]
स्नॅपचॅटवरील ओळख, फिरायला नेऊन केला अत्याचार ; ३१ वर्षीय तरुणाला बेड्या
प्रतिनिधी : ओरोस बारावीत शिकणाऱ्या एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विठ्ठल भगवान शिंदे (३१, रा. हिवाळे, ता. मालवण) या संशयितावर सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मालवण तालुक्यातील एका गावातील एक मुलगी नजिकच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होती. दररोज ती बसने प्रवास करत होती.बारावीत शिकणाऱ्या आणि वयाची १८ वर्षे नुकतीच [...]
अभिनेते दिगंबर नाईकांच्या एन्ट्रीने विद्यार्थ्यांना सुखद धक्का
असनियेच्या शिवछत्रपती विद्यालयाला दिली भेट ओटवणे : प्रतिनिधी प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक यांनी असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. दिगंबर नाईक यांच्या प्रशालेतील नकळत एंट्रीने विद्यार्थ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का बसला. यावेळी दिगंबर नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खास मालवणी भाषेत घातलेले गाऱ्हाणे लक्षवेधी ठरले.स्व. मच्छिंद्र कांबळे यांनी अजरामर करुन [...]
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी सन 2002 मध्ये उपअधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी आपल्या दीर्घ, निष्ठावान आणि कर्तृत्ववान सेवेद्वारे पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी भारत सरकारकडून दखल घेण्यात येऊन त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत [...]
तेलंगणामध्ये अग्नितांडव! फर्निचरच्या गोदामाला भीषण आग, 5 जणांचा होरपळून मृत्यू
तेलंगणातील हैदराबाद जिल्ह्यात अग्नितांडव पाहायला मिळाला. हैदराबादमधील नामपल्ली येथे शनिवारी सायंकाळी फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये होरपळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून गोदामाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याी माहिती अग्निशमन विभागाचे महासंचालक विक्रम सिंह मान यांनी माध्यमांशी बोलताना दिली. #WATCH | Hyderabad | Nampally Fire […]
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनला होता या पार्श्वभूमीवर पापनास नगर, विवेकानंद नगर व एरसीटी कॉलनी परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी योग्य व सोयीस्कर सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी नवीन सुसज्ज स्मशानभूमी उभारण्याच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे यांनी प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. दीर्घकाळापासून या परिसरात स्मशानभूमीची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विजय गंगणे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित स्थानिक प्रतिनिधींनी पाहणी करून परिसराची माहिती घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या |विजय गंगणे समोर मांडताना मणाले कि. सध्या अंत्यसंस्कारासाठी लांब अंतरावर जावे लागत असून वेळ, खर्च आणि मानसिक तणाव वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वाढती लोकसंख्या व नागरी विस्तार लक्षात घेता स्वतंत्र व सुसज्ज स्मशानभूमी उभारणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. नवीन स्मशानभूमीत पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, स्वच्छता, अंत्यसंस्कारासाठी शेड, बसण्याची व्यवस्था तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या पाहणीवेळी ग, स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवीन स्मशानभूमी उभारणीसाठी एकमताने पाठिंबा दर्शविला. गंगणे ही सकारात्मक भूमिका घेत योग्य जागेची निवड करून लवकरच प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. नवीन स्मशानभूमी उभारली गेल्यास पापनास नगर, विवेकानंद नगर व एस टी कॉलनी परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागणार असून, उर्वरित तीन स्मशानभूमीवरचा ताण कमी होणार आहे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. यावेळी जयकुमार पांढरे बालाजी नाईकवाडी भैय्या शिंदे उपस्थित होते स्मशानभूमी लवकरच उभारली जाणार - विजय गंगणे याप्रकरणी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे म्हणाले की स्मशानभूमीसाठी चार वर्षापासून माझे प्रयत्न सुरू होते तसा ठरावही झालेला आहे शेख फरीद जवळ शासकिय गट नंबर 215 येथे भरपूर जागा असून येथे सर्व सोयीन सुसज्जयुक्त अत्याधुनिक पद्धतीचे अशी ही स्मशानभूमी लवकरात लवकर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे
दोन माजी उपाध्यक्ष अपक्ष म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व धनंजय सावंत अपक्ष म्हणून जिल्हा परिषदच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दुधगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे माजी मंत्री शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात मतभेद झाल्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. संजय पाटील दुधगावकर हे कळंब तालुक्यातील नायगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून उभारले आहेत. तर धनंजय सावंत हे परंडा तालुक्यातील जवळा व डोंजा गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात अजून एक पुतण्या काकापासून दूर गेला आहे. यासोबतच माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत उपाध्यक्ष होते. ते सध्या परंडा तालुक्यातील जवळा व डोंजा गटातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. सावंत यांच्याबरोबर सुत न जमल्यामुळे त्यांना शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळालेली नाही. गेल्या टर्ममध्ये सुरूवातीचे अडीच वर्षे अध्यक्षपद उपभोगेलेले नेताजी पाटील यांना तर गटाबरोबर पक्षही बदलावा लागला आहे. वडगाव (सि.) गटातून ते पूर्वी सदस्य होते. नंतर ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये गेले होते. त्यांना आता पक्ष बदलून शिवसेनेकडून (शिंदे गट) पळसप गटातून निवडणूक लढवावी लागत आहे. त्यावेळच्या उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यावेळीचे विरोधी पक्षनेते शरद पाटील यांनीही अशीच भूमिका सांगत ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे. कळंब तालुक्यातील नायगाव गटातून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर कोणत्याच पक्षात प्रवेश घेतलेला नाही. माजी सदस्य संदिप मडके ईटकूर गणातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या मातोश्री मोहा गटातून रिंगणात आहेत. परंडा तालुक्यातील माजी सभापती आवेदाबाई जगताप यांचे पुत्र नवनाथ जगताप शिंदे गटाकडून रिंगणात आहेत. तुळजापूर तालुक्यातील अणूदर गटातून माजी सदस्य दीपक आलुरे, तर जळकोटमधून प्रकाश चव्हाण रिंगणात आहेत. लोहारा तालुक्यातून पुन्हा अश्विनी दीपक जवळगे, शोभा शामसुंदर तोरवडे तसेच लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती असिफ मुल्ला यांच्या पत्नी कोमल भालेराव रिंगणात आहेत. माकणी गटातून शितल राहुल पाटील पुन्हा निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी धाराशिव तालुक्यातून 12 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. अन्य तालुक्यात एक ते दोन किरकोळ स्वरूपात अर्ज मागे घेणयात आले आहेत. मात्र 27 जानेवारीपर्यंत सर्व अपक्षांची व स्वतःला धोकादायक ठरणाऱ्या उमेदवारांची मनूरणी करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी अपक्षांची संख्या अधिक असल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला अडचणी येवू शकतात.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे जीवन तत्वनिष्ठ योध्दयाचे होते- डॉ. मच्छिंद्र नागरे
धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे जीवन तत्वनिष्ठ योध्दयाचे होते असे प्रतिपादन डॉ. मच्छिंद्र नागरे यांनी केले आहे. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व्याख्यानमालेच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी डॉ. मच्छिंद्र नागरे, बोलत होते. डॉ. नागरे पुढे ते म्हणाले की,दि.9 जून 1919 ते 8 ऑगस्ट 1987 हा इतक्या वर्षाचा प्रवास थक्क करणारा होता,या 68 वर्षाच्या जीवन प्रवासात रानावनातून, दऱ्याखोऱ्यातून अनवाणी प्रवास,तो ही निःस्वार्थी,या सामाजिक भावना होत्या. बापूजींचे जीवन हे पवित्र गंगेसारखे होते. आणि त्यांनी त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन पवित्र केले. बापूजींनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा शैक्षणिक इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांचे जीवन सार्वजनिक जीवनात समरस झाले होते. चांगले कार्य करत असताना अनेकांनी अडचणी निर्माण केल्या. बापूजी 1958 मध्ये मराठवाड्यात आले. त्यावेळी बापूजींचे गुरू अप्पासाहेब पवार शिक्षण सचिव होते. मराठवाड्यात निजामशाहीचा प्रभाव संपला नव्हता. कसदार जमिनीत पिकं घेणं अवघड नाही, पण माळरानावर शेती करणारा खरा धुरंधर ठरतो. 20 जून 1959 मध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालय एका ताडपत्री खाली सुरू झाले. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कणबरकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिकुल परिस्थितीमध्ये महाविद्यालय चालवले. यावेळी प्रमुख पाहुणे नानासाहेब पाटील म्हणाले की, जस जसं पिढ्या बदलत चालल्या आहेत तसं तसं शिक्षणपद्धती बदलत चालली आहे. पण पध्दती कितीही बदलल्या तरी हाडा मासाचीच माणसं असतात त्यांना आयुष्यात निटनिटकेपणा हवा असतो. शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचे व्यक्तिमत्त्व हे वैश्विक आहे. कारण संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले आणि बापूजींनी देखील शैक्षणिक प्रबोधनाचे पवित्र कार्य केले. प्राचार्य डॉ संदीप देशमुख म्हणाले की,शिक्षण घेऊन मोठी झालेली जी माणसं आहेत त्यांना आपण संस्थेत शिक्षण घेतले त्याबद्दल आदर असतोच, बापूजींच्या विचारांचा प्रपंच हा जागतिक पातळीवर होणे आज गरजेचे आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ मदनसिंह गोलवाल, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ मंगेश भोसले, प्रा विवेकानंद चव्हाण, डॉ बालाजी गुंड, डॉ केशव क्षीरसागर, डॉ अरविंद हंगरगेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. सदरप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

25 C