श्रीकृष्णाचे लोभसवाणे रूप आणि त्याच्या प्रेमात बुडालेल्या राधिकेच्या भावनांचा एक अनोखा अविष्कार ‘कृष्ण सावळा रे’ या नवीन गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या गाण्यातून भक्ती, प्रेम आणि समर्पणाचा एक सुंदर त्रिवेणी संगम पाहायला मिळत असून या गाण्याचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आहे. आपल्या अदाकारीने आणि लयबद्ध नृत्याने तिने राधिकेची विरक्ती आणि […]
काळ आला होता पण…; कार दहा फुट नदीत कोसळली, सुदैवाने जिवित हानी टळली
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळती – सावरगाव ( थोर ) रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हडोळती पासून १ कि. मी. अंतरावर सावरगाव रोडवर १० फुट नदीत कार कोसळली. या अपघातात चालक थोडत्यात बचावला आणि कार सोडून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. सोमवारी सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हडोळतीकडून भरधाव येणारी स्वीफट डिझायर नदीच्या बाजूचे कठडे तोडून […]
चीनच्या हवाई क्षेत्र 40 दिवसांसाठी बंद; निर्णयामागे कोणतेही ठोस कारण नसल्याने गूढ वाढले
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धादरम्यान चीनने त्यांच्या हवाई क्षेत्रात 40 दिवसांसाठी उड्डाणबंदी केली आहे. कोणतेही ठोस कराण नसल्याने या निर्णयाबाबत गूढ आणि चिंता वाढली आहे. हा निर्णय जपानला लक्ष्य करून घेतला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे चीनच्या या निर्णयाने तणाव वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. चीनच्या ४० दिवसांच्या हवाई क्षेत्रबंदीमुळे हवाई उड्डाण क्षेत्रात नवे गूढ निर्माण […]
IPL 2026 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सची (CSK) कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली असून, सलग तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईच्या या अपयशामागे खराब गोलंदाजीसोबतच संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांसारख्या प्रमुख खेळाडूंचा खराब फॉर्म हे मोठे कारण मानले जात आहे. विशेषतः संजू सॅमसनला अद्याप एकाही सामन्यात दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. त्याने […]
पुणे महापालिकेचा ओव्हरहेड केबल कारवाईचा फुसका बार! सोसायट्यांवरील केबल कारवाईला स्थगिती
पुणे शहरात अनियंत्रितपणे पसरलेल्या ओव्हरहेड केबल्सवर कारवाईचा मोठा गाजावाजा करत महानगरपालिकेने मोहीम सुरू केली खरी, मात्र प्रत्यक्षात ही कारवाई केवळ दिखावा ठरत असल्याचे चित्र आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या मोहिमेतून तब्बल 1400 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात पालिकेची यंत्रणा तोकडी पडत आहे. महापालिकेकडे केवळ 10 मीटर म्हणजेच […]
संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील मुख्य रस्त्यावर असलेला सीएनजी पंप सध्या गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. गॅस भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि पंप परिसरात वाहनतळाची अपुरी व्यवस्था यामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी अक्षरशः धोकादायक ठरत आहे. पेट्रोलियम नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावरच वाहनांची […]
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कठोर शब्दांत आदेश दिला आहे की, पश्चिम बंगालची मतदार यादी उद्या, मंगळवारपर्यंत, कोणत्याही परिस्थितीत प्रसिद्ध केलीच पाहिजे. तसेच, सर्व कागदपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी नसली तरीही यादी प्रसिद्ध करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने सोमवारी कलकत्ता उच्च न्यायालयाला तीन माजी न्यायाधीशांची समिती स्थापन करण्याचा आदेशही दिला. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. […]
गंगेच्या पात्रात ‘बीयर पार्टी’; डीजेच्या तालावर मद्यपान आणि धिंगाणा, भाविकांचा संताप
वाराणसीतील नाविक समाजाकडून दरवर्षी दशाश्वमेध घाटावरून मिर्झापूरमधील अदलहाट येथील मोठ्या शीतला मातेच्या मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्याची जुनी परंपरा आहे. यावर्षी देखील नाविक ही शोभायात्रा घेऊन निघाले होते. मात्र, या धार्मिक प्रवासादरम्यान काही नाविकांनी बोटीवरच डीजे लावून मोठ्या आवाजात संगीत वाजवले आणि मद्यप्राशन करून जोरदार डान्स केला. पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या मध्यधारेत सुरू असलेल्या या कृत्यामुळे […]
पत्नीकडे असलेल्या कथित एकापेक्षा अधिक देशांच्या पासपोर्टच्या प्रश्नांमुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या पत्नीकडे कथितपणे एकापेक्षा जास्त पासपोर्ट आणि परदेशात मालमत्ता असण्यासंदर्भात काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करत आरोप करण्यात आले होते. हे आरोप हिमंता बिस्वा सरमा यांनी फेटाळून लावले. मात्र यानंतर काही तासांतच, लोकसभा खासदार गौरव गोगोई यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना श्रीभगवद्गीतेवर […]
आखातातील युद्धजन्य परिस्थितीत हिंदुस्थानींचे प्रश्न सोडवण्यात पंतप्रधान मोदी ‘अपयशी’: प्रियंका गांधी
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार आखातातील युद्ध परिस्थितीमुळे उद्भवलेले प्रश्न सोडवण्यात ‘अपयशी’ ठरले आहेत, असा हल्लाबोल केला. तसेच त्यांच्या अपयशाचा परिणाम लाखो हिंदुस्थानींना भोगावा लागत असल्याचेही त्या म्हणाल्या. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचासाठी पेरावूर येथे एका जनसभेला […]
बंद करा, बंद करा, लक्ष्मी ऑर्गानिक बंद करा! कोकणवासियांचा विराट मोर्चा
कोकणचा निसर्ग आमचा श्वास, बंद करा पीफास कारखाना, आमचा जीव मोठा, कारखाना बंद नाहीतर आंदोलन तीव्र, अशी घोषणांनी परिसर दणणला होता. लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज़मधील पीफास हे घातक उत्पादन बंद झालेच पाहिजे, या मागणीसाठी लक्ष्मी ऑर्गेनिकच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संघर्ष समिती, जन आक्रोश समिती यांनी […]
संपूर्ण शहर साखरझोपेत असताना गेल्या 48 तासांत नांदेडमध्ये रक्ताचा सडा पडला असून टोळीयुद्ध आणि वैयक्तिक वादातून झालेल्या पाच हत्येच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. वर्चस्वाच्या लढाईतून ‘साईलाला’ आणि ‘सदा’ गँगमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने हिंसक वळण घेतले असून, थेट शासकीय रुग्णालयात घुसून झालेल्या हत्येच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि […]
काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशई संवाद साधला. यावेळी बारामती मतदारसंघातील पोटनिवडणूक राजकारण आणि दोन्ही पक्षातील विलीनीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपला उमेदवार उतरवला आहे. आकाश मोरे हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत असून, त्यावर शरद पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केले. काँग्रेसने बारामती विधानसभा […]
सोलापूरच्या आकाशात झेपावणार आयटी पार्क; सोलापूर –होटगी रोडवरील प्रस्थापित आयटी पार्कमध्ये आता ५९ मीटर (१९३ फूट) उंचीच्या इमारती उभारण्यास एअरपोर्ट अवॉरिटी ऑफ इंडियाने हिरवा कंदील दाखवता आहे. या निर्णयामुळे आता आयटी पार्कच्या क्षेत्रात १४ ते १५ मजली टोलेजंग इमारती उभ्या राहण्याचा मार्ग [...]
डिकोळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न
भुम (प्रतिनिधी)- लोक सेवा हायस्कूल गिरवली येथे विद्यार्थी प्रिय चंद्रकांत गेनाजी डिकोळे (सेवक) यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ भूम चे अध्यक्ष व्यंकटराव मोटे ,कोषाध्यक्ष विजय मोटे, सचिव सतीश देशमुख, लोकसेवा हायस्कूल गिरवलीचे मुख्याध्यापक हरिदास डोर्केें गुरुदेव दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक माधव भोसले,पर्यवेक्षक पोपट बांगर गुरुदेव प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अंजना मुंडे, किरण जाधव, विठ्ठलराव दहिटणेकर, राजाराम कोळी, माजी मुख्याध्यापक कमलाकर साबळे, माजी मुख्याध्यापक विवेक चंदनशिवे, अंकुश परबळे, बबन साठे, सतीश पालके, राजेश भोरे, मुळे सतीश, भूपालसिंह गायकवाड, दहिफळे, हुंबे मॅडम, खोसे मॅडम, वाळके मॅडम पडवळ मॅडम, बांगर मॅडम, कटारे मॅडम, नवगिरे मॅडम, जिकरे मॅडम, गौड मॅडम, मनीषा मोटे, राठोड मॅडम, वाळके मॅडम, हुंबे मॅडम, खोसे मॅडम, वाळजे, मुलांनी, अमोल वडगणे, मेटे, मुलाणी, आप्पा मिसाळ, ढगे, शहाजी पाटील, प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक अरुण गायकवाड, गिरवलीचे सरपंच सतीश सोन्ने, सर्व पाहुणे मित्रमंडळी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दस्तगीर पठाण यांनी केले.
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहिता पोलीस ठाण्यात सोलापूर – नवीन घर खरेदी करण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन यावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भाग्यश्री शशिकांत हिरेमठ (वय २१, रा. [...]
IPL 2026 – MS धोनीच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट; दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरणार?
IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सची (CSK) सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्याने संघ सध्या अडचणीत आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 8 विकेट्सनी, दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने 5 विकेट्सनी, तर तिसऱ्या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा 43 धावांनी पराभव केला. या तिन्ही सामन्यांमध्ये माजी कर्णधार एमएस धोनी दुखापतीमुळे संघाबाहेर होता, ज्याचा […]
Kagal accident |कागलजवळ महामार्गावर भीषण अपघात; चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे–बेंगलोर महामार्गावर भीषण धडक, एक ठार कागल : पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे . दादासो महादेव सोनुले ( वय ४४, रा. वंदूर, ता. कागल) असे त्यांचे नाव आहे .तर बोलेरो जीप मधील तिघेजण गंभीर जखमी झाले [...]
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच ठरणार सरस; MATRIZE च्या ओपिनियन पोलचे भाकीत
देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे राजकारण तापले आहेत. सर्व पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच पश्चिम बंगालमध्ये एसआयआरचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे सर्वात जास्त चर्चा पश्चिम बंगालच्या निवडणुकांची आहे. आता नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोलमध्ये ममता बॅनर्जींचा जनतेचा पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेसच सरस ठरणार असे दिसत आहे. पाच राज्यांमध्ये […]
वाशी बसस्थानकाच्या दयनीय अवस्थेविरोधात मनसेचे निवेदन; तात्काळ दुरुस्तीची मागणी
वाशी (प्रतिनिधी)- वाशी शहरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बसस्थानकातील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करत बस स्थानक व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वाशी बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा अभाव असून बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे व धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात झाडाझुडपे वाढल्याने प्रवाशांना गैरसोय होत आहे. तसेच बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक, ज्येष्ठ प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानक शहरापासून काही अंतरावर असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. विशेषतः दुपारच्या वेळेत प्रवाशांना सावली व विश्रांतीची सुविधा नसल्याने अडचणी वाढत असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले आहे. धाराशिव जिल्हा हा राज्याचे परिवहन मंत्री यांच्या पालकमंत्रिपदाचा जिल्हा असतानाही बसस्थानकाची अशी दुरवस्था असणे ही गंभीर बाब असल्याचे मनसेने नमूद करत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, शब्बीर शेख, अक्षय चेडे, सलीम औटी, बाळासाहेब भुईंगळ, विष्णू पाटील, अजय सोनटक्के, किशोर गायकवाड यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धाराशिव व कळंब तालुक्यातील काही गावांमध्ये इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदी ग्रामसेवक यांचे बनावट शिक्के तयार करून व सह्या मारून बांधकाम कामगार असल्याच्या नोंदी केलेल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे त्यांना शासनाचे लाभ देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची चौकशी करून त्या नोंदी रद्द करण्यासह देण्यात येत असलेला लाभ तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्य कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.6 एप्रिल रोजी केली आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव व कळंब तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामसेवकांचे बनावट शिक्के व सह्या वापरून बांधकाम कामगारांच्या नोंदणी करण्यात आल्या असल्याचा संशय आहे. धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी, वलगुड, जुनोनी, झरेगाव, सांगवी, गोपाळवाडी, ढोकी व शिंगोली तसेच कळंब तालुक्यातील पानगाव, मोहा, लोहटा (पूर्व) व उपळाई या गावांमध्ये बनावट प्रमाणपत्रांचा वापर केला जात असल्याची शक्यता आहे. ग्रामसेवकांच्या अधिकृत शीक्के व सह्यांची नक्कल करून तयार करण्यात आलेली कागदपत्रे बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेसाठी वापरली जात असल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. या बनावट प्रकारामुळे आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचार वाढीस लागण्याचा धोका निर्माण झाला आहे यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सारोळा बु येथे भीम जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवानिमित्त सारोळा बु येथे आयोजित बैठकीत भीम जयंती उत्सव समिती 2026 च्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या बैठकीत यंदाचा भीम जयंती उत्सव शिस्तबद्ध, वैचारिक आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी सचिन शेषेराव कठारे, उपाध्यक्षपदी अमोल प्रल्हाद सावंत, सचिवपदी विकी सुभाष फडके तर कोषाध्यक्षपदी विश्वनाथ तुकाराम कठारे यांची निवड करण्यात आली. तसेच राकेश अमोल कठारे, संतोष जीवन सोनवणे आणि प्रशांत सुरेश गोरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.यावेळी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून यावर्षीचा भीम जयंती उत्सव अत्यंत शिस्तबद्ध, वैचारिक आणि भव्य स्वरूपात साजरा होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी प्रमोद कठारे, सतीश गायकवाड, दत्ता कठारे, सुरेश कठारे,अमोल मु कठारे, सुरेंद्र विधाते, बाळासाहेब कठारे,संदीप कठारे,अमोल सु कठारे, दत्ता कठारे, सोपान कठारे, तुकाराम वाघमारे, विशाल वाघमारे, आदी समाज बांधव उपस्थित होते.
परंडा येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा
परंडा (प्रतिनिधी)- 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टी नावाच्या वटवृक्षाचे बीज रुजले आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांनी “राष्ट्र प्रथम” मानून ‘लक्ष्य अंत्योदय’, ‘प्रण अंत्योदय’, ‘पथ अंत्योदय’ या ध्येयाने आपल्या त्याग, समर्पण आणि निष्ठेने या बीजाची मशागत केली. त्यातूनच आज भाजपा परिवार जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून उदयास आले आहे. आज भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भारतमाता, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड.गणेश खरसडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक अविनाश विधाते, माजी न.प.गटनेते सुबोधसिंह ठाकूर, ॲड.जहीर चौधरी, विकास कुलकर्णी, डॉ. अमोल गोफणे, साहेबराव पाडुळे, बाबासाहेब जाधव, किरण देशमुख, शिवाजीराव पाटील, निशिकांत क्षिरसागर, बाळासाहेब गिरी, मनोहर मिस्कीन, तानाजी घोडके, रामदास गुडे, सुजित परदेशी, नितीन जाधव, रामकृष्ण घोडके, धनंजय काळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, सुरज काळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा ज्योतीताई भातलवंडे, गायत्रीकाकी तिवारी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
भूम (प्रतिनिधी)- भूम शहर व तालुक्यातील सर्व शिवभक्तांच्या वतीने दुर्गराज रायगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अत्यंत भक्तीभाव, आदर आणि शिवप्रेमाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली. शिवसमाधीची नित्य पूजा करणारे तसेच वर्षभर रायगड परिसर व जगदीश्वर मंदिर परिसर स्वच्छ ठेवून सेवा बजावणाऱ्या शिवसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. रायगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या आदिवासी बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच काही बांधवांना सोलार लॅम्प व पावसापासून संरक्षणासाठी ताडपत्री देऊन मदतीचा हात देण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगड, श्रीतुळजाई दुर्ग प्रतिष्ठान भूम तालुका आणि सर्व शिवभक्तांच्या संयुक्त माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला.
. ‘त्या’ बेकायदेशीर सीडीआर प्रकरणाचीही चौकशी होणार नाशिक -नाशिकच्या भोंदू अशोक खरात मागे सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा लागणार आहे. या वृत्ताला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. दोन दिवसांपासून नाशिकमधील तपोवन येथे अखिल भारतीय संत समिती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोपासाठी [...]
रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुलच्या मैदानावर आयोजित केलेला गायक महेश काळे यांचा स्वरसंध्या हा गाण्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने बुक माय शो ॲपवरून तिकिट खरेदी केलेल्या अनेक रसिकप्रेक्षकांची फसवणूक झाली. स्वरसंध्या कार्यक्रम रद्द झाल्याची आगाऊ सूचना ऑनलाइन तिकिट खरेदी करणाऱ्या प्रेक्षकांना न दिल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड पडला आहे.प्रेक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात अर्ज देऊन आयोजकांवर फसवणुकीचा […]
Jyotiba Yatra |जोतिबा यात्रेचे वेगळेपण कायम; बेळगावच्या भाविकांनी जपली परंपरा
जोतिबा यात्रेची परंपरा आजही जिवंत कागल ( इम्रान मकानदार ) – चैत्र महिन्यात होणारी श्री जोतिबाची यात्रा काळानुसार बदलत गेली. सोयीसुविधा वाढल्या, प्रवासाचे स्वरूपही बदलले. मात्र एक परंपरा आजही तितक्याच निष्ठेने टिकून आहे आणि ती म्हणजे बैलगाडीतून जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्याची. बेळगाव [...]
दिल्ली विधानसभा परिसरात घुसलेली कार जप्त, चालकालाही अटक
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा परिसरात बॅरिकेट्स तोडून आत प्रवेश केलेल्या कारने परिसरात एकच खळबळ उडवली होती. या घटनेमुळे दिल्ली विधानसभेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासात कार जप्त करुन चालकालाही अटक केली आहे. सोमवारी एका पांढऱ्या रंगाच्या टाटा सिएरा कारने विधानसभेचे प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश […]
बस्तरमध्ये टॉप कमांडरसह 40 नक्षलवाद्यांची शरणागती, नक्षल चळवळीला मोठा धक्का
पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) या संघटनेचा टॉप कमांडर सोडी केशालू याच्यासह 40 नक्षलवाद्यांनी सोमवारी तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. बदीसे देवा याच्यानंतर केशालूने शरणागती पत्करल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. केशलू हा बस्तरमधील पीएलजीएच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. त्याला मल्ला या टोपणनावाने ओळखले जायचे. तो तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर सक्रिय असलेल्या नक्षलवादी बटालियनचा उप-कमांडर म्हणून कार्यरत […]
देश, वेश, भाषा वेगळी तरीही आपण सर्व एक आहोत; नितीन गडकरींनी सांगितला अली खामेनी यांचा किस्सा
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासोबतच्या आपल्या भेटीचा किस्सा सांगितला. वेगवेगळे देश, वेगवेगळी रूपं, वेगवेगळे वेश तरीही आपण एकच आहोत, असे खामेनी म्हणाले होते. जहाजबांधणी मंत्री असताना त्यांनी चाबहार बंदर प्रकल्पाची आठवणही सांगितली. सोमवारी नागपूरमध्ये भाजपच्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात बोलताना नितीन गडकरी यांनी ही […]
शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला, अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी
मध्य प्रदेशातील गुना येथे एका मिशनरी शाळेत मधमाशांनी अचानक विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केल्याची घटना घडली. यात अनेक विद्यार्थी आणि काही शिक्षक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे पसरले आहे. वंदना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ही घटना घडली. विद्यार्थी वर्गातून बाहेर पडत असताना मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे विद्यार्थी घाबरून सैरावैरा धावू लागले. या घटनेमुळे […]
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी कोलकाता शहरावर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर पंतप्रधान गप्प का आहेत, असा थेट सवाल त्यांनी सोमवारी नादिया येथील एका निवडणूक सभेत बोलताना विचारला. निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालला सतत लक्ष्य करणारे पंतप्रधान देशाच्या […]
Share Market News –शेअर बाजाराचा यू-टर्न; घसरणीने सुरुवात होत घेत मोठी उसळी
शेअर बाजारात सोमवारी मोठी उलथापालथ दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात कोसळणारे सेन्सेक्स आणि निफ्टी, बाजार बंद होताना रॉकेटप्रमाणे उसळी घेत मोठ्या वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निरदेशांक सेन्सेक्स व्यवहार सुरू झाल्यानंतर ५०० हून अधिक अंकांनी घसरला होता, तो ७८७ अंकांनी वाढून ७४,१०० अंकांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक सुरुवातीच्या घसरणीतून सावरला आणि अखेरीस २५५ अंकांच्या […]
पक्ष संघटना वाढीसाठी पूर्णवेळ काम करणार - अभिजीत चव्हाण
तुळजापूर (प्रतिनिधी)- या पुढील काळामध्ये पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नूतन महासचिव अभिजीत चव्हाण यांनी केली. काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने त्यांचा महासचिव पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार केल्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री शिवराज मोरे, अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले व युवकांचे अशा स्थान माजी मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानून चव्हाण म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील युवक युवतीचे बेरोजगारीचे प्रश्न लघुउद्योग विषयाचे प्रश्न सोडविण्यावर भर देणारा असून शेतमजूर महावितरण रस्ते पाणी आरोग्य घरकुल या विषयाच्या प्रश्नावर येणाऱ्या कालावधीमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्याचे मार्गदर्शन घेऊन काँग्रेस वाढविण्यावर भर देणार असल्याची ग्वाही देऊन त्यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी सेवा दल काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवाजीराव गायकवाड, तालुका सेवा दल अध्यक्ष तानाजीराव जाधव, रसिक वाले, एडवोकेट रामचंद्र ढवळे, पंचायत समिती सदस्य गोविंद डोंगरे,युवा कार्यकर्ते फरीद शेख इत्यादी उपस्थित होते.
मिंटोनेट प्लस व्हॉलीबाल स्पर्धेचे चषक अनावरण
धाराशिव (प्रतिनिधी)- मिंटोनेट प्लस व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आयोजित मिंटोनेट प्लस ज्युनियर हॉलिबॉल लीग स्पर्धा 2026 या भव्य स्पर्धेचे आयोजन दिनांक 17 ते 19 एप्रिल दरम्यान नेरुळ, नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे.या हॉल्िबॉल स्पर्धेच्या चषक अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर आमदार कैलास पाटील व व्हॉलीबाल क्षेत्रातील जेष्ठ खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू अंकुश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. धाराशिव-कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांनी क्रीडाक्षेत्रात योगदान देणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक आणि संघटनांचे विशेष कौतुक केलें. छत्रपती शिवाजी हायस्कूल चे क्रीडाशिक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत. यावर्षी छत्रपती क्लबची आठ मुले आणि चार मुली मिंटोनेट स्पर्धेत लातूर लायन्स नावाखाली व इतर संघात सहभागी होत आहेत. शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंकुश पाटील यांनी हॉलिबॉलचा इतिहास सांगत खेळाडू कशा संघर्षातून घडले आहेत आणि विद्यमान स्पर्धेत कसें घडत आहेत याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य खोखो संघटनेचे राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा डॉ चंद्रजीत जाधव यांनी क्रीडाक्षेत्रातील धाराशिवचा नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तीमत्वाना कोणताही मतभेद न ठेवता पाठबळ देण्याचे आणि त्यांना जपण्याचे आवाहन केलें. या कार्यक्रमाप्रसंगी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ एम डी देशमुख सर, उपाध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ् ऍड अविनाशराव देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिरीजाप्पा दहीहांडे, राजकुमार दहीहांडे, राजकुमार सोमवंशी, प्राचार्य व्ही के देशमुख, तालुका क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, हॉल्िबॉल संघटनेचे जिल्हा सचिव सचिन पाळणे, भाई उद्धवराव पाटील शिक्षक आणि शिक्षकेतर पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ सचिन देशमुख, यशदा परिवाराचे सर्वेसर्वा सुधीर सस्ते, श्री विठ्ठल सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, जिल्हा पत्रकार संघांचे माजी अध्यक्ष महेश पोतदार, सामाजिक कार्यकर्ते रवि वाघमारे, नगरसेवक श्री राज निकम, नगरसेवक श्री करवर आदी मान्यवर तसेच बहुसंख्य खेळाडू, गुरुजन,पालक आणि समाजातील प्रतिष्ठित क्रीडाप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात क्रीडाशिक्षक श्री संजय देशमुख यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आय पी एल धर्तीवर हॉल्िबॉल स्पर्धेचे मोठ्या पातळीवर आयोजन करण्यात आलेले आहे, असे सांगत खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर सदरील स्पर्धेची ओळख करून देण्यासाठी चषकाची यात्रा चालू आहे. असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद वीर यांनी तर आभार प्रदर्शन भैरवनाथ खांडेकर यांनी केलें. कार्यक्रम यशस्वी व्हावा. यासाठी अमोल खडके, नीलेश शिंदे, क्रीडाविभागाचे शैलेश पाचभाई आणि आशुतोष माने, प्रथमेश गंगणे व मैदानावरील सर्व खेळाडू व पालक यांनी परिश्रम घेतले.
भाविकांची हरवलेली पर्स होमगार्ड व सुरक्षारक्षकांच्या प्रामाणिकतेने परत
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर येथे सोमवार, दि. 06 एप्रिल रोजी एक उल्लेखनीय प्रामाणिकतेचा प्रकार घडला. भाविक श्री. विनायक रवींद्रनाथ आदम ( जि. ठाणे) हे देवीजींच्या दर्शनासाठी आले असता त्यांची पर्स हरवली. सदर पर्स प्रशासन कार्यालयासमोर होमगार्ड जवान श्री. पवार यांना आढळली. त्यांनी तत्परता दाखवत संबंधित पर्स सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्वरित दर्शन मंडप नियंत्रण कक्ष येथे जमा केली. यानंतर संबंधित भाविकांची ओळख पटवून पर्स त्यांना सुरक्षितरित्या परत करण्यात आली. सदर पर्समध्ये अंदाजे रु. 10,330/- रोख रक्कम तसेच परदेशी चलन व महत्त्वाची कागदपत्रे होती. होमगार्ड जवान श्री. पवार व सुरक्षारक्षकांच्या या प्रामाणिक व जबाबदार कृतीबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे. यावेळी सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, सहायक सुरक्षा निरीक्षक नवनाथ खिंडकर तसेच सुरक्षा निरीक्षक योगेश फडके व कमलाकर पवार उपस्थित होते.
Ratnagiri News –देवरुखमध्ये सापडली अतितीव्र कुपोषित बालिका, ग्रामीण रुग्णालयातील केंद्रात उपचार
देवरुख शहरातील कांजीवरा अंगणवाडी येथील श्रीनिधी मारुती दानोळे ही बालिका अतितीव्र कुपोषित या श्रेणीत आढळून आली आहे. या बालिकेला देवरुख ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. कुपोषित बालिकेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप माने व आरबीएसके पथक क्र 1 चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव धामणे धामणे, डॉ. […]
केंद्राच्या लेबर फोर्स सर्वेक्षणात नोंद पणजी : केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या लेबर फोर्स सर्वेक्षण अहवालातून 2025 या वर्षात गोवा राज्यातील बेकारीचा दर देशात सर्वाधिक म्हणजे 8.3 टक्के असल्याची नोंद करण्यात आली आहे. हा बेकारीचा दर राष्ट्रीय सरासरी 3.1 टक्क्यांपेक्षा बराच वर असल्याचे त्यात म्हटले आहे. अहवालातील माहितीनुसार, गोव्याच्या ग्रामीण भागातील बेकारी दर [...]
तक्रारदार महिलेचा वैद्यकीय तपासणीसाठी नकार
पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह: नवनवीन अडथळे निर्माण झाल्याने तपासकामात गुंतागुंत पणजी : कुडचडे येथील कथित वासनाकांड प्रकरणाच्या तपासात नवनवीन अडथळे निर्माण होत असल्याने पोलिसांसमोर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. एका 19 वर्षीय तक्रारदार महिलेने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिल्याने नवीन धक्का बसला आहे, असे अधिकाऱ्यानी सांगितले. तिने हा नकार दिल्याने तिच्या तक्रारीत संशयित सोहम नाईक याच्या [...]
लग्नसमारंभाहून परतत असताना कार ट्रकला धडकली, चौघांचा मृत्यू; 8 जखमी
लग्नसमारंभ आटोपून घरी परतत असताना भरधाव कारने गवताच्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर अन्य पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात […]
गोवा सरकार तीन महिन्यांसाठी घेणार 1 हजार कोटीचे कर्ज
विविध योजना, विकासकामे, प्रकल्पांवर करणार खर्च पणजी : एप्रिल ते जून 2026 या तीन महिन्यांसाठी गोवा राज्य सरकारतर्फे रु. 1 हजार कोटीचे कर्ज घेतले जाणार असून ते विविध विकासकामे, प्रकल्पांवरील खर्चासाठी वापरले जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे प्रत्येक राज्यासाठी प्रत्येक तीन महिन्यांकरीता कर्जाची तरतूद जारी करण्यात येते. गोव्यासाठी आरबीआयने रु. 1 हजार कोटीची तरतूद [...]
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख वक्ते फोंडा : फोंडा मतदारसंघात येत्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार रितेश रवी नाईक यांच्या प्रचारार्थ आज सोमवार दि. 6 रोजी फोंडा येथील जुन्या बसस्थानकावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वा. सुऊ होणाऱ्या या सभेला प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार [...]
दिल्ली विद्यापीठात बॉम्बची धमकी; रामजस आणि मिरांडा कॉलेज केले रिकामे, शोधमोहीम सुरू
दिल्लीतील प्रतिष्ठित दिल्ली विद्यापीठात सोमवारी खळबळ उडाली. विद्यापीठाच्या रामजस कॉलेज आणि मिरांडा कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने दोन्ही महाविद्यालयांचे कॅम्पस रिकामे केले असून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महाविद्यालयांच्या प्रशासनाला सोमवारी सकाळी एक ईमेल आला. […]
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्ध तीव्र होत आहे. तसेच इराण पूर्णपणे नष्ट झाला आहे, असा दावा ट्रम्प यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र, इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याने इराणने स्वतःची ताकद दाखवून दिली आहे. इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकन लढाऊ विमानातील दोन्ही वैमानिकांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले. ट्रम्प यांची ही पायलट आणि वैमानिकांना वाचवण्याची मोहीम यशस्वी ठरली. या वैमानिकांना आयआरजीसीने (IRGC) […]
सुरक्षा व्यवस्थेत मोठी घोडचूक, बॅरिकेट्स तोडून अज्ञात कार दिल्ली विधानसभा परिसरात घुसली, थेट…
दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार आत घुसल्याने एकच खळबळ उडाली. प्रवेशद्वारावरील बॅरिकेट्स उडवून कारने आत प्रवेश केला. कारमधील व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या खोलीबाहेर पुष्पगुच्छ ठेवून घटनास्थळावरून पळ काढला. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे दिल्ली विधानसभेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यूपीचा नोंदणी क्रमांक असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या टाटा सिएरा कारने […]
लग्नाचे आमिष…मात्र लुबाडणुकीचे विष!
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंना लुटले : महाद्वार रोडच्या तरुणावर फिर्याद, पोलिसांची समेटाची भाषा बेळगाव : सोशल मीडियावर झालेल्या परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर एका 25 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर तिला धोका दिल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित युवकाविरुद्ध फिर्याद देण्यासाठी गेलेल्या तरुणीवरच अरेरावी करून शहापूर पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा [...]
देवीचा इतिहास सांगणारे जय जगदंब पुस्तक- खासदार अशोक चव्हाण
तुळजापूर (प्रतिनिधी)- जय जगदंब या कॉफी टेबल पुस्तकात सरदार वल्लभभाई पटेल व निजाम यांच्या भेटीचा एक फोटो आहे. हा फोटो मराठवाडा महाराष्ट्रात हस्तांतरित होण्याचा प्रसंग असावा. त्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र ठिकाणी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत आहे. हे पुस्तक देवीचा इतिहास सांगणारे असून, प्रत्येक भक्ताच्या घरात जपून ठेवण्यासारखे आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. जागतिक महत्त्व असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये लेखक श्रीकृष्ण गंगाधरराव दीक्षित लिखित ‘जय जगदंब’ या कॉफी टेबल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी बोलताना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले की, या ग्रंथाच्या माध्यमातून देवीची आराधना होणार आहे.” हे पुस्तक भेट देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जय जगदंब हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा बाळासाहेबांना देवीने दिली असावी असे मला वाटते. यावेळी लेखक श्रीकृष्ण दीक्षित म्हणाले कि “आमचे बालपण मंदिरात गेले. रोज ‘उदो-उदो’चा गजर ऐकत मोठा झालो. देवीच्या सर्व धार्मिक विधींमध्ये सहभागी होत होतो. जुनी पदे विस्मरणात जात असल्याचे पाहून ती जतन करण्यासाठी हे पुस्तक लिहिले. या सोहळ्यास अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील होते. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण, आमदार ॲड. जया चव्हाण, आमदार जितेश अंतापूरकर, डी. पी. सावंत, हनुमंतराव पाटील बटमोगरेकर, महापौर कविता संतोष मुळे, नगराध्यक्ष विनोद गंगणे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाशनानंतर लेखक श्रीकृष्ण दीक्षित व त्यांच्या पत्नी पुष्पा दीक्षित यांचा अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विकृत मानसिकता सहन केली जाणार नाही, गरज पडल्यास फाशीची शिक्षा व्हावी - तटकरे
तुळजापूर (प्रतिनिधी)- खरात सारखी कोणतीही विकृत मानसिकता सहन केली जाणार नाही. संबंधित आरोपींना जलदगती न्यायालयात नेऊन कठोरात कठोर शिक्षा देण्याचीज गरज आहे. अशा व्यक्तीला वेळ पडल्यास फाशीची शिक्षा व्हावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तटकरे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या बिनविरोध निवडून याव्यात, यासाठी सर्वपक्षीय सहमती साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारामती शहरात शरद पवार यांनी उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी नमूद केले. काँग्रेस पक्षाशी लवकरच चर्चा करणार असल्याचे सांगत तटकरे म्हणाले की, “संवेदना आणि परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसने सुनेत्राताई पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी सहकार्य करावे, अशी आमची अपेक्षा आहे. विमान कंपनी मालकांच्या अटकेच्या मागणीवर बोलताना तटकरे यांनी सांगितले की, राज्य सरकारकडे सीबीआय आणि सीआयडी चौकशीची मागणी आधीच करण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू असला तरी प्राथमिक अहवाल समाधानकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी अभिजीत चव्हाण यांची फेरनिवड
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत अभिजीत बाबुराव चव्हाण यांची प्रदेश महासचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली असून, 130 जणांच्या या टीममध्ये चव्हाण यांची पुन्हा निवड झाली आहे. अभिजीत चव्हाण यांनी संघटनेत तळागाळापासून काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांना संधी देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब, राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रभारी अजय चिकोरा, राष्ट्रीय सचिव नवज्योत सिंग सिद्धू आणि सहसचिव सांभवी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर ही घोषणा करण्यात आली. अभिजीत चव्हाण यांनी 2022 मध्ये महासचिव पदाची निवडणूक महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्याने जिंकली होती. त्यानंतर त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम केले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी त्यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. तसेच, भारत जोडो अभियानात त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत सहभाग नोंदवला होता. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
Photo –बुलढाण्यातील भाजप, काँग्रेस आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यातील शिंदेगट, कॉंग्रेस, भाजप आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, आमदार सिध्दार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि […]
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शणार्थ तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे येणाऱ्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग वाहतूक पोलिसांकडून तपासणीच्या नावाखाली वाहनधारकांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य भाविक नागरिक आणि शेतकरी मोठ्या त्रासाला सामोरे जात असून संतापाची लाट पसरली आहे. महामार्गावर पोलिसांकडून रस्त्याच्या मध्यभागीच वाहने अडवून तपासणी केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे. मार्चअखेर जवळ आल्याने कारवाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी तपासणी मोहीम वाढवल्याची चर्चा आहे. तुळजापूर सोलापूर रस्त्यावर तामलवाडी जवळ असणाऱ्या टोलनाक्या वर वाहनांची अडवणूक करून कागदपत्र तपासणी व ऑनलाइन दंड वसुली केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विशेषता कर्नाटक सह अन्य परराज्यातील भविक वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे झिरो कर्मचार्यांच्या माध्यमातुन ही लुट होत आहे परिवहन मंत्री येथील पालकमंत्री असतानाही भाविकांची होणारे लूट बाबत भाविक खंत व्यक्त करत आहेत वसुली साठी वाहने अधिक वेळ थांबवले जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अचानक ब्रेक लावावे लागल्याने मागून येणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. अनेक वाहनचालकांनी किरकोळ कारणांवरून दंड आकारला जात असल्याची तक्रार केली आहे. काही ठिकाणी रोख रक्कम देण्याचा दबाव टाकला जात असल्याचेही सांगितले जात आहे. या कारवाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या राशींचे दिवस असल्याने धान्य, कडबा व इतर चारा वाहून नेणारी ट्रॅक्टर, ट्रक, पिकअप व छोटा हत्ती यांसारखी वाहने मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. तसेच दूध वाहतूक करणारी वाहने अडवल्याने माल वेळेत पोहोचत नसून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. नाशवंत मालाच्या बाबतीत ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची नेमणूक असते. मात्र सध्या तपासणीच्या नावाखाली अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
बालसाहित्याच्या संशोधनामुळे मुलांच्या भावनिक व नैतिक विकासाला चालना मिळते - डॉ अशोक मर्डे
धाराशिव (प्रतिनिधी)- बालसाहित्याच्या संशोधनामुळे मुलांच्या भावनिक व नैतिक विकासाला चालना मिळते असे प्रतिपादन डॉ. अशोक मर्डे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हिंदी संशोधन विभागाच्या वतीने प्रा. अनिता प्रदीप तोमर यांचा गोविंद शर्माच्या बाल साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर आधारित पीएचडीची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पूर्वी मौखिकी आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी डॉ. मर्डे बोलत होते. प्रारंभी अनिता तोमर यांनी आपल्या विषयासंबंधी विस्तारीत स्वरुपाची माहिती दिली. डॉ.मर्डे पुढे म्हणाले की, गोविंद शर्मा यांच्या साहित्यातुन समाजाला नैतिक संदेश प्राप्त होतो. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या हिंदी भाषेच्या संशोधन केंद्रातुन आजतागायत अनेक समाजोपयोगी विषयांवर आधारित संशोधकांनी पीएचडीच्या माध्यमातून आपले विषय समाजासमोर मांडले आहेत. सदर प्रसंगी बहिस्थ परीक्षक डॉ.राजेंद्र वडजे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूर, स्थानिक परीक्षक डॉ विनोदकुमार वायचळ, वरीष्ठ साहित्यिक डॉ देविदास इंगळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ केशव क्षीरसागर, माजी प्राचार्य डॉ मुकुंद गायकवाड, प्रा स्वाती देडे, प्रा रमा ओहाळ, प्रा सुवर्णा गेंंगजे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. तर आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले.
अवकाळीचा द्राक्ष बागेला मोठा तडाखा; चिंचपूर ढगे येथे दोन एकर बाग जमीनदोस्त
भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर ढगे परिसरात झालेल्या भीषण अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला असून, चिंचपूर ढगे येथील शेतकरी अक्षय गोकुळ ढगे यांच्या दोन एकर द्राक्ष बागेचे 100% नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे यांनी तातडीने बाधित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान, द्राक्ष बागेची झालेली दुरवस्था पाहून सभापतींनी चिंता व्यक्त केली. त्यांनी तत्काळ संबंधित कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे व शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सूचना दिल्या. विशेष म्हणजे, पाहणी करत असतानाच खरसडे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बागेची विदारक स्थिती दाखवली. दोन्ही नेत्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकरी अक्षय ढगे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना धीर देत तातडीने मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक हिरालाल ढगे, भगवान पाटील, प्रदीप ढगे पाटील, मयुर ढगे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी चंदनशिवे पी.एम. आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयुक्त पंचनामे आम्ही 100% नुकसान झाले म्हणून विद्यमानाने केले आहेत तरी आम्ही अहवाल शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे, शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्याप्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला योग्य ते नुकसान भरपाई मिळेल. कृषी अधिकारी प्रदीप चंदनशिवे
गरिबीवर मात करत सारोळ्याचा गणेश वडलीक पुणे पोलीस दलात भरती, मातंग समाजाकडून भव्य सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील गणेश नेताजी वडलीक यांची पुणे पोलीस दलात निवड झाल्याबद्दल मातंग समाजाच्या वतीने त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगर परिषद पाणीपुरवठा सभापती विलास बापू लोंढे, मिलिंद आप्पा पेठे तसेच समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गणेश वडलीक यांचा सत्कार करण्यात आला. गणेश वडलीक हे अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे आले असून त्यांचे आई-वडील लागल ते काम तसेच दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून संसार चालवतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे मातंग समाजातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना नगर परिषद पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे यांनी युवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “मातंग समाजातील युवकांनी शिक्षणाकडे अधिक लक्ष देऊन स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रांमध्ये पुढे यावे. शिक्षणामुळेच यश मिळते,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गणेश वडलीक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केला.
पूर्णाहुतीने अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाची सांगता
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे आयोजित अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते मंत्रोच्चारात पुर्णाहुतीने यज्ञाची सांगता झाली. भीष्म फाउंडेशन स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्ऊ,पुणे विश्व मंदिर परिषद , भीष्म 108 सोमयाग यज्ञ प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे होते.संपूर्ण विश्वाचे कल्याण, दैवी ऊर्जेची अनुभूती,त्रुतू चक्रांचे संतुलन,पंच महाभूतांचे संतुलन, पर्यावरण आणि वायुमंडलाचे शुद्धीकरण, वैयक्तिक आरोग्य प्राप्ती,आभा(ऑरा),पंचकोशीय शुद्धी,भूमी-जल पोषण सुधार आणि शुद्धीकरण यासाठी अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.अत्यग्निष्टोन सोमयाग यज्ञाची सांगता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते मंत्रोच्चारात पुर्णाहुतीने करण्यात आली.यावेळी भीष्म फाउंडेशन स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्ऊ पुणे चे अध्यक्ष प्रा.क्षितीज पाटुकले, वेदमूर्ती धनेश जोशी,हभप कैलास महाराज दिवाणे, भारतीय जनता पार्टीच्या माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नरहरी बडवे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
12 एप्रिलपासून श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस प्रारंभ
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस 12 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. 12 एप्रिलला श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस निमित्ताने तेर येथे दिंडयांचे आगमन व मंदिरात सायंकाळी हभप भाऊसाहेब महाराज गोसावी यांचे किर्तन,13 एप्रिलला पहाटे आमदार राणाजगजितसिंह पाटील व मंदिर प्रशासक रूपाली कोरे यांच्या हस्ते महापूजा व दिंडयांची ग्रामप्रदक्षणा व सायंकाळी हभप बाळासाहेब महाराज देहूकर यांचे किर्तन, 14 एप्रिलला सायंकाळी हभप शंकर महाराज थोबडे यांचे किर्तन,15 एप्रिलला श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त फडक-यांचे मानाचे अभिषेक व सकाळी हभप दत्तात्रय महाराज अंबिरकर यांचे किर्तन व सायंकाळी हभप कान्होबा महाराज देहुकर यांचें किर्तन.16 एप्रिलला पहाटे श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीची छबिना मिरवणूक व श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे हजेरी किर्तन व मुख्य काल्याचा कार्यक्रम व दुपारी श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिर परिसरात कुस्त्यांची स्पर्धा होणार आहे. ही यात्रा अक्षय्यतृतीया पर्यंत चालणार आहे.याचा भाविक भक्त यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे व निरीक्षक अतुल नळणीकर यांनी केले आहे.
बिलाच्या कारणावरून हॉटेलची तोडफोड
परंडा (प्रतिनिधी)- बिलाच्या कारणावरून हॉटेलची तोडफोड करून रोख रक्कम व सोन्याची चेन पळवल्याची घटना तालुक्यातील मौजे इडा येथे घडली.या घटनेत हॉटेल चालकाला जबर मारहाण करण्यात आली असून उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार मौजे इडा येथील हॉटेल 7/12 (सातबारा) मध्ये मालक आणि जेवण्यासाठी आलेल्या लोकामध्ये वाद झाला होता. थोड्या वेळानंतर सात ते आठ जमावाने सदर हॉटेलवर हल्ला केला. हॉटेलचालकास लोखंडी गज व खुर्चीने मारहाण करून जमावाने हॉटेलमधील सामानाची नासधूस केली. जखमी हॉटेल चालकाच्या गळ्यातील चैन व रोख रक्कम घेऊन पसार झाले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धाराशिव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जख्मी मध्ये प्रमोद कचरू भोसले, निलेश गणपती बोकेफोडे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.या प्रकरणी परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास परंडा पोलीस करीत आहे.
चोरीच्या आरोपावरून सहा महिने कारावास
धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील समर्थ नगर धाराशिव येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सुधीर मुळे यांच्या दवाखान्यातील सेवकाला चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा व 30 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, डॉ सुधीर मुळे यांचे स्वतःचे समर्थ नगर येथे श्रेयस नावाचे बाल रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात सेवक म्हणून काम करत असलेला मुळेवाडी येथील अरविंद रामकृष्ण वाघ हा रुग्णालयात काम करीत असताना दवाखान्यातील ड्राव्हर मध्ये ठेवलेले पैसे अरविंद वाघ याने पैसे चोरी करीत असल्याचा संशय आल्याने डॉ मुळे यांनी रुग्णालयात सी सी टी व्ही बसवला व नेहमीप्रमाणे अरविंद वाघ हा पैसे चोरून घेत असताना दि. 22/9/2011 रोजी सी सी टी व्ही मध्ये दिसून आला त्यावर आरोपी अरविंद वाघ याने 22500/- रु चोरून घेतल्याचे साक्षीदारासमक्ष कबूल केले. त्यानंतर फिर्यादी डॉ सुधीर मुळे यांनी धाराशिव न्यायालयात फिर्याद दाखल केली न्यायालयाने 156(3) ... प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे आदेश पारित केले आरोपी अरविंद वाघ याचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशन धाराशिव येथे गुन्हा रजिस्टर नं. 8/11 कलम 381,411,414 सह 34 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला व गुन्ह्याचा तपास तपासिक अमलदार विष्णू यादवराव कुऱ्हाळे यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोपत्र दाखल केले व सदरचा खटला मुख्य न्याय दंडाधिकारी धाराशिव यांच्या न्यायालयात चालला सदर खटल्यात डॉ सुधीर मुळे सह एकूण 7 साक्षीदारांचे जवाब नोंदविण्यात आले न्यायालयाच्या समोर साक्षीदारांनी योग्य तो नोंदविलेल्या साक्षी व विशेष म्हणजे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात आरोपी पैसे चोरी करीत असताना झालेला कैद इ. पुराव्यावरून व फिर्यादी डॉ. सुधीर मुळे यांच्यातर्फे शासकीय अभियोकता व्ही एस शेवाळकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अरविंद वाघ या श्रीमती अपर्णा एन नावंदर मुख्य न्यायदंडाधिकारी धाराशिव यांनी दि.30/3/2026 रोजी आरोपी अरविंद वाघ यास दोशी धरून 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा व 30 रुपये चा दंड ठोठावण्यात आला व दंडाच्या रकमेपैकी रुपये 25 हजार फिर्यादी डॉ. सुधीर मुळे यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश झाला.
धाराशिवमध्ये ग्राहकांची उघड लूट कोल्ड्रिंक्सवर कूलिंग चार्ज’च्या नावाखाली जादा वसुली
धाराशिव (प्रतिनिधी)- उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिक थंड पेयांकडे वळत असताना शहरातील काही किराणा दुकानदार ग्राहकांची सरळ लूट सुरू केल्याचे चित्र समोर आले आहे. 20 रुपये एमआरपी असलेल्या थम्स अप, स्प्राईटसारख्या कोल्ड्रिंक्स बाटल्यांवर तब्बल 5 रुपये कूलिंग चार्ज’ लावून 25 रुपयांना विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, एमआरपी स्पष्टपणे 20 रुपये असतानाही फ्रिजमध्ये थंड केलंय या कारणाखाली अतिरिक्त पैसे उकळले जात आहेत. काही ठिकाणी तर ग्राहकांनी विरोध केल्यास उडवाउडवीची उत्तरे देत सरळ नकार देण्याचे प्रकारही घडत आहेत.ग्राहक संघटनांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री करणे हा ग्राहक संरक्षण कायद्याचा सरळ भंग आहे. कूलिंग चार्ज’ नावाखाली पैसे घेणे पूर्णपणे बेकायदेशीर असून संबंधित दुकानदारांवर कारवाई होणे आवश्यक आहे.नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली असून 20 ची बाटली 25 ला का? असा सवाल विचारला जात आहे. प्रशासनाने तात्काळ धडक कारवाई करून अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर ग्राहकांना लुटण्याचा हा प्रकार आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक नगरपालिकेने तातडीने तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या- ॲड रेवण भोसले
धाराशिव (प्रतिनिधी)- अवकाळी पाऊस व गारपीटीच्या तडाक्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील स्थिती अतिशय गंभीर झाली असून रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, मका यांच्यासह कांदा, द्राक्ष, डाळिंब ,केळी, मोसंबी इत्यादी फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून आता सरकारने गारपीटने उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी जेष्ठ समाजवादी नेते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. राज्यभरातील हजारो हेक्टरवरील पीक अवकाळी पाऊस व गारपिटीने उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. इराण युद्धामुळे शेतीसह सर्वच क्षेत्रांना आधीच फटका बसला आहे ,त्यात आता अवकाळी पाऊस, गारपीट व उन्हाचा तडाका अशा दुहेरी नैसर्गिक आपत्तीची भर पडली आहे. अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झालेल्या पिकासाठी आता शासनाने कसल्याही अटी- शर्ती लागू न करता तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.
मटका-जुगाराचा नाद…तरुणपिढी बरबाद!
सीमेवरील गावांमध्ये अड्डे, सभोवतालच्या गावातील तरुणाई नादी, विशीच्या तरुणांवर लाखोंचे कर्ज रमेश हिरेमठ/बेळगाव बेळगाव शहर व तालुक्यात मटका व जुगार बिनदिक्कतपणे सुरू आहे. एकीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी आपण गैरधंद्यांना थारा देणार नाही, असे सांगत असले तरी बेळगाव अनेक गैरधंद्यांचे माहेरघर बनत आहे. महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवरील काही गावातील तरुणही मटका व जुगारामुळे बरबाद होत चालले [...]
झट पट पटापट…भाजप प्रवेश करताच लिएंडर पेसला एक्स दर्जाची सुरक्षा
भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘वॉशिंग मशीन’ आहे. भ्रष्टाचारी, गुंड किंवा बलात्कारी असे कोणतेही आरोप असलेले नेते आले की भाजपच्या वाशिंग मशिनमधून लगेच स्वच्छ होऊन बाहेर पडतात. या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावर जुन्या फाईल्स एक तर थंड बस्त्यात जातात आणि सदर व्यक्तीला क्लीन चिटही मिळते, असा आरोप विरोधक सतत करत असतात. पण आता भाजप प्रवेश करताच सरकारी […]
लोंढा येथील मारामारीत दोघेजण गंभीर जखमी
पाच जणांवर गुन्हा दाखल : हिंडलगा कारागृहात रवानगी खानापूर : तालुक्यातील लोंढा येथे रविवार दि. 5 रोजी सायंकाळी दोघा भावांवर पाच जणांनी अचानक हल्ला केल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ला करणाऱ्या पाच जणावर गुन्हा दाखल करून त्यांना रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. [...]
पीयुसी बारावीच्या विद्यार्थ्यांची हुरहुर वाढली
7 किंवा 8 एप्रिलला निकाल लागण्याची शक्यता बेळगाव : पीयुसी द्वितीय वर्षाचा निकाल लागण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील हुरहुर वाढली आहे. बारावीच्या गुणांवरच उच्च शिक्षण अवलंबून असल्याने आकड्यांची जुळवाजुळव केली जात आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमुळे निकालाच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 7 किंवा 8 एप्रिल रोजी निकाल जाहीर केला [...]
मनपाच्या शववाहिन्या बनल्या केवळ शोभेच्या वस्तू
चालकाअभावी शववाहिन्या वेळेत मिळणे कठीण : खासगी शववाहिन्यांवर नागरिकांची भिस्त बेळगाव : महानगरपालिकेच्या शववाहिन्याबाबत नागरिकांतून दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालल्या आहेत. शववाहिकेसाठी संपर्क साधला असता आपल्याकडे चालकांची कमतरता आहे. त्यामुळे वेळेत सेवा देणे अशक्य असल्याचे अजब उत्तर दिले जात असल्याने नागरिकांना खासगी शववाहिन्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. रविवारी भेंडीबाजार येथील एका रहिवाशाचे निधन झाले. नातेवाईकांनी [...]
बांधकाम कामगारांचे सुरक्षाकवच : कामगार कार्ड
बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्वांची नोंदणी आवश्यक : सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना बेळगाव : बांधकाम कामगारांसाठी कामगार खात्याकडून अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार कार्ड असणे जरुरीचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून अनेक वेळा जनजागृती केली जात असली तरीही बांधकाम कामगारांमध्ये अद्यापही कामगार कार्डासंबंधी म्हणावी तशी जागृती झालेली नाही. त्यामुळेच अनेक जण [...]
झारखंडच्या सारंडा जंगलात नक्षलवाद्यांकडून IED स्फोट, CRPF जवान गंभीर जखमी
झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झाला. जखमी जवानाला उपचारासाठी रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सारंडा जंगलात अद्याप चकमक सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सारंडा जंगलात सोमवारी नक्षलविरोधी मोहीम सुरू असताना जवानाचा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीवर पाय पडल्याने स्फोट झाला. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा […]
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ अध्यक्षपदी अंकुश केसरकर
बैठकीत सर्वानुमते निर्णय : नूतन कार्यकारिणीचीही निवड बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची निवड करण्यात आली. रविवारी जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्ष तसेच नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला शिस्त आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. प्रारंभी मंडळाचे खजिनदार [...]
कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
बेळगाव : आजकाल सर्वत्र लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून कपडे खरेदीसाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नरगुंदकर भावे चौक परिसर रविवारी गजबजून गेला होता. साड्या, डेस मटेरियल, रेडिमेड कपडे यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. विशेषत: महिलांची साड्यांच्या दुकानांमध्ये मोठी वर्दळ होती. विविध प्रकारच्या साड्या, लग्न समारंभासाठीचे विशेष डिझाइन्स आणि [...]
देशाच्या अन्नसुरक्षेसाठी डॉ.जगजीवनराम यांचे कार्य
डॉ. संजीव तळवार यांचे प्रतिपादन : हरितक्रांतीचे शिल्पकार डॉ. बाबू जगजीवनराम जयंती प्रशासनातर्फे साजरी बेळगाव : इतिहास अनेक महान व्यक्तींना घडवतो, पण काळ काही मोजक्मया व्यक्तींनाच लक्षात ठेवतो. त्यामध्ये डॉ. बाबू जगजीवनराम यांचा समावेश होतो. समाजातील समतेचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. कामगारांचे हित हेच देशाचे हित जोपासत अन्नसुरक्षा म्हणजेच देशाची सुरक्षा असा [...]
Us Israel Iran War –हायफा येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला, इराणी मीडियाचा दावा
इराण आणि इस्त्रायलमध्ये संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इराणने इस्त्रायलमधील निवासी इमारतींवर केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता रिफायनरी प्रकल्पाला लक्ष्य केले आहे. हायफा येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा इराणी मीडियाने केला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने तेहरानला लक्ष्य केल्यानंतर इराणने आता जोरदार पलटवार केला आहे. दरम्यान याआधी हायफा येथील निवासी इमारतीवर झालेल्या […]
थकीत ऊसबिले द्या; अन्यथा आंदोलन
भारतीय कृषक समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा बेळगाव : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहे. गळीत हंगाम संपुष्टात आला तरी त्यांच्या थकीत ऊस बिलांची रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. यामुळे त्यांना शेतीसह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होत आहे. यासाठी तात्काळ शेतकऱ्यांना व्याजासह थकीत ऊसबिल देण्यात यावे, अशी मागणी भारतीय कृषक समाज [...]
Ratnagiri |आमच्या आरोग्याशी खेळू नका”; लक्ष्मी ऑरगॅनिकच्या गेटसमोर जनशक्तीचा हुंकार
लोटे एमआयडीसीत आंदोलनाचा एल्गार चिपळूण – खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी व तिच्या पीफास (PFAS) उत्पादनाच्या विरोधात सोमवारी नागरिकांनी जोरदार मोर्चा काढला. स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल आणि कंपनी विरोधात घोषणा देत [...]
बेनाडी येथील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : जिह्यातील बेनाडी गावातील प्रलंबित समस्या आणि अपुऱ्या सुविधांबाबत राज्य राज्य रयत संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत गावातील बिकट परिस्थिती मांडून मागण्यांचे निवेदन सादर केले. बेनाडीमध्ये रस्ते व गटारींची अवस्था अत्यंत खराब झाली असून, नागरिकांना मूलभूत [...]
मॅग्नेट स्कूल विरोधात 10 रोजी आंदोलन
एआयडीएसओकडून जिल्ह्यात जागृती : बेंगळूर येथे जाहीर सभा बेळगाव : केपीएस मॅग्नेट योजनेच्या नावाखाली 40 हजार सरकारी शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. या विरोधात शुक्रवार दि. 10 रोजी बेंगळूर येथील फ्रिडम पार्क येथे राज्यस्तरीय भव्य जाहीरसभा घेतली जाणार आहे. या सभेच्या जागृतीसाठी बेळगावमध्ये प्रचार केला जात आहे. होन्निहाळ, कुट्टलवाडी, बाळगमट्टी, मल्लाहोळी, हालभावी [...]
कांदा मार्केटमध्ये नवीन सीडी वर्कचे काम सुरू
महापालिकेने दाखविलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांतून समाधान बेळगाव : दरवर्षी पावसाळ्यात कांदा मार्केटमध्ये गुडघाभर पाणी तुंबून रहात असल्याने त्याचा फटका भाजीविक्रेते व व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेत महानगरपालिकेकडून तेथील जुनी सीडी फोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी मोठ्या आकाराची नवीन सीडी बांधली जाणार आहे. महापालिकेने दाखविलेल्या या तत्परतेबद्दल नागरिकांतून [...]
निधीचा गावच्या विकासासाठी वापर करा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे : उगार बी. के. येथे कायक ग्राम आढावा बैठक बेळगाव : उगार बी. के. ग्रामपंचायतीने 2025-26 या आर्थिक वर्षात 100 टक्के करवसुली करून आदर्श कामगिरी बजावली आहे. या निधीचा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्यरित्या वापर करावा. ग्रा. पं. हद्दीत पिण्याचे पाणी, वाचनालय, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्रे सुस्थितीत कार्यरत असून ही कार्यपद्धती [...]
बापट गल्ली येथे वीज वाहिन्यांनी घेतला पेट
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली बेळगाव : विद्युत खांबावरील वीज वाहिन्यांना आग लागण्याची घटना रविवारी सकाळी बापट गल्ली येथे घडली. खांबावरील वीज वाहिन्यांनी अचानक पेट घेतल्याने सर्व वीज वाहिन्या जळून खाक झाल्या. सुदैवाने आसपासच्या दुकानांपर्यंत ही आग पोहोचली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. बेळगावचे इलेक्ट्रॉनिक मार्केट म्हणून ओळख असलेल्या बापट गल्ली येथील विद्युत खांबावर वीज [...]
कणकवली आणि सावंतवाडी शहरात लागोपाठ दोन रात्री दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) अवघ्या 30 तासांत यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना रायगड जिल्ह्यातील रोहा येथून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कणकवली शहरात 4 एप्रिल रोजी एकाच रात्री सहा दुकाने […]
UCC आणि ‘एक देश, एक निवडणूक’याबाबत सकारात्मक चर्चा सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
सध्या देशभराच समान नागरी कायदा आणि ‘एक देश, एक निवडणूक’ याबाबत चर्चा होत असते. आता हे दोन महत्त्वाचे मुद्दे सरकारसाठी महत्त्वाचे आहेत. तसेच त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. हे दोन मुद्दे देशासाठी महत्त्वाचे असून याचे फायदेही त्यांनी सांगितले. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान […]
Mumbai News –पंतप्रधानांचे बनावट पत्र वापरून खंडणी उकळण्याचा प्रयत्न, दोघांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बनावट स्वाक्षरी असलेले पत्र वापरून एका व्यक्तीकडून 4 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोन व्यक्तींना अटक केली आहे. आरोपींना एस्प्लेनेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तौसीफ हुसेन इस्माईल पटेल आणि सिद्धीनाथ दीनानाथ पांडे ऊर्फ सुनील अशी आरोपींची […]
नाटे परिसरात अवैध गोवा दारू विक्रीवर ग्रामस्थांची धाड; गोवा बनवटीचा साठा सापडला
राजापूर तालुक्यातील नाटे परिसरात गोवा बनावटीची अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या प्रकारावर अखेर स्थानिक ग्रामस्थांनीच धाड टाकत कारवाई केली. या धाडीत मोठ्या प्रमाणात दारू साठा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाटे परिसरात काही ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली होती. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही […]
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान इराणला मोठा धक्का बसला आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) गुप्तचर संघटनेचे प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी यांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून या हल्ल्यासाठी थेट अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. अमेरिका आणि इस्रायलने सोमवारी पहाटे इराणची […]
सुरक्षेचा दावा करणाऱ्या लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज़ लिमिटेड कंपनीला गावकऱ्यांनी एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात कंपनीला काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. जगातील प्रगत देशांनी ज्या पीफास रसायनाला विनाशकारी मानून बाहेर काढले त्याचे उत्पादन आमच्या सुपीक जमिनीवर का? पीफास उप-उत्पादने आणि प्रक्रिया करताना निघणारा कचरा कोणते तंत्रज्ञान वापरणार आहात याचे पुरावे द्या. अनेक गावांतील ग्रामसभांनी […]
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सकाळी एक खळबळजनक ट्विट केले आहे. अजितदादांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरातचा काही संबंध आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती […]
Photo –‘ही’अभिनेत्री 42 व्या वर्षी होणार आई; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गूड न्यूज
हिंदी टिव्ही आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. करिश्मा लवकरच आई होणार असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गरोदरपणाची अधिकृत घोषणा केली आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर करिश्मा आणि पती वरुण बंगेरा यांच्या आयुष्यात एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असून या बातमीने सोशल मीडियावर आनंदाचे वातावरण आहे. करिश्माने […]
नंदगडच्या चांभार तलावाचे अस्तित्व धोक्यात
तलावाची दयनीय अवस्था : नागरिक संतप्त : तातडीने स्वच्छता करण्याची गरज वार्ताहर/हलशी नंदगड येथील हलशी रस्त्यालगत असलेला चांभार तलाव सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या महत्वाच्या जलस्रोताचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एकेकाळी परिसरातील शेतकरी, जनावरे आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारा हा तलाव आज जल वनस्पती, कचरा आणि घाणीने वेढला गेला आहे. परिणामी तलावाचे [...]
हलशी-हलशीवाडी श्री लक्ष्मीयात्रेची जय्यत तयारी
शामियानाची उभारणी अंतिम टप्प्यात : 8 एप्रिलपासून यात्रेला प्रारंभ वार्ताहर/हलशी हलशी-हलशीवाडी परिसरात तब्बल 28 वर्षांनंतर होत असलेल्या श्री लक्ष्मी यात्रेमुळे संपूर्ण गाव आणि परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला हा सोहळा यंदा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. ग्रामस्थांच्या सहभागामुळे या यात्रेला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होत आहे. बुधवार दि. 8 रोजी यात्रेला [...]
शीव रुग्णालयात पोलिसाला मारहाण प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा सरकारी पक्षाला झटका
शीव रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलील हवालदाराला मारहाण करणाऱ्या दोघा आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि सबळ पुराव्यांअभावी सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना दोषमुक्त केले. सत्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारी पक्षाला मोठा झटका बसला आहे. शेखर समुद्रपांडी नाडर आणि अक्षय प्रकाश चव्हाण अशी दोघा आरोपींची नावे आहेत. 16 मार्च 2016 रोजी शीव रुग्णालयातील […]
क्षेत्र वैजनाथ मंदिरात दवणी पौर्णिमा यात्रोत्सव
कडोलीहून मानाच्या दोन पालख्या : सनई चौघड्यांचे वाद्य, मंगलमय वातावरणात शिव-पार्वती विवाह वार्ताहर/कुद्रेमनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात शिव-पार्वतीच्या विवाह सोहळ्याने देवरवाडी श्रीक्षेत्र वैजनाथ मंदिरात यंदाचा दवणी पौर्णिमा यात्रोत्सव नुकताच साजरा झाला. या यात्रोत्सवात कडोली (ता. बेळगाव) गावातील कलमेश्वर देवस्थानच्या प्रामुख्याने मानाच्या पालख्या असतात. त्यांना वधूच्या पालख्यांचा मान असतो. बुधवार दि. 1 रोजी रात्री कडोलीहून [...]

27 C