भ्रष्टाचार कायद्यावर खंडित निर्णय
आता प्रकरण सरन्यायाधीशांकडे दिले जाणार वृत्तसंस्था / नवी दिल्ली भ्रष्टाचार विरोधी कायद्यातील एका महत्वाच्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठाने खंडित निर्णय दिला आहे. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याविरोधात भ्रष्टाचाराचे प्रकरण चालवायचे असल्यास प्रथम पूर्वानुमती घ्पावी लागेल, अशी तरतूद या 1988 च्या कायद्यात आहे. या तरतुदीवर वाद निर्माण झाला असून ती रद्द केली जावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात [...]
अॅपलची एआयसाठी गुगल जेमिनीसोबत हातमिळवणी
नवी दिल्ली : अॅपल आणि गुगलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत करार झाला आहे. ज्या अंतर्गत आता गुगलच्या जेमिनी एआय मॉडेल आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर अॅपलचे एआय फाउंडेशन मॉडेल तयार केले जाणार आहे. गुगल जेमिनी मॉडेल अॅपलचे नवीन सिरी आणि अॅपल कृत्रिम बुद्धिमत्ता वैशिष्ट्यो आणि अधिक चांगली असल्याचेही म्हटले आहे. गुगलने एक्स वर पोस्ट करून या भागीदारीची घोषणा केली [...]
आमच्या वेळी विचारांवर निष्ठा होती, आताचे सगळे संधीसाधू; गडकरींनी टोचले कान
आमच्या काळात राजकारण हे विचारांवर आणि निष्ठेवर आधारित होतं. आजचं राजकारण मात्र संधीसाधूपणाकडे झुकलं आहे,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर थेट आणि रोखठोक भाष्य करत इकडून-तिकडे उड्या मारणाऱ्या संधीसाधूंचे कान टोचले आहेत. तसेच आता न लेफ्टीस्ट, न रायटीस्ट फक्त ऑपॉर्च्युनिस्ट (संधीसाधू) असा टोलाही गडकरी यांनी लगावला. लोकमतच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना […]
विजय हजारे करंडक 2025-26 आता अंतिम टप्प्यात आला आहे. जवळपास तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत धावांचा पाऊस आणि गोलंदाजंची धारधार गोलंदाजी पाहायला मिळाली. अखेर सेमी फायनलचे चार संघ निश्चित झाले असून फायनलमध्ये कोण पोहोचणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना अजून काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. परंतू सेमी फायनलच्या धुरळा उडवून देणाऱ्या लढती चाहत्यांची वाट […]
जम्मू कश्मीरच्या राजौरीमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन दिसले, राज्यात हाय अलर्ट
जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अनेक भागात ड्रोन दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. राजौरी शहरातल्या डुंगाला नाबला, थंडी खस्सी या भागात हे ड्रोन्स दिसले आहेत. जवानांनी या ड्रोन्सवर तत्काळ गोळीबार करत ते पाडले आहेत. या घटनेनंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला शस्त्रसंधी उल्लंघनानंतर इशारा दिल्यानंतर […]
Ratnagiri News –ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार, रत्नागिरीत वातावरण तापले
तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम उद्यापासून पहायला मिळणार आहे. रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या 56 जागांसाठी आणि नऊ पंचायत समित्यांच्या 112 गणांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटांपैकी 28 जिल्हापरिषद गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. वाटद गट अनुसूचित जाती महिला, हातखंबा […]
Tourist Missing –उत्तर प्रदेशचे चार पर्यटक लडाखमधून बेपत्ता, शोधमोहिम सुरू
लडाखमधील पांगोंग सरोवराच्या परिसरातून उत्तर प्रदेशचे चार पर्यटक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले सर्वजण 20 ते 26 वर्षे वयोगटातील तरुण असून मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. बचाव पथकांकडून या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. हे सर्वजण पांगोंग सरोवराजवळ शेवटचे दिसले होते. चारही तरुण जम्मू आणि कश्मीरला सहलीला गेले होते. तेथून ते लेह-लडाखला गेले. तरुणांनी […]
महापालिका निवडणुकांचा प्रचार संध्याकाळी ५.३० वाजता संपला. पण त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने १३ ते १५ जानेवारीपर्यंत पत्रके न वाटता घरोघरी जाऊन प्रचार करण्यास उमेदवारांना परवानगी दिली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे. नुकत्याच […]
अजित पवारांना मोठा धक्का! राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचची धडक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेले व डिझाईन बॉक्स या कंपनीचे मालक नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचची टीम पोहोचली आहे. क्राईम ब्रांचचे अधिकारी त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे समजते. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून हा अजित पवारांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
Satara : गोडोलीतील साईबाबा मंदिर चौकातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार
गोडोली परिसरातील वाहतूक सुरळीत होणार सातारा : गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर चौकात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परंतु [...]
Solapur News: माणेकरी शाळेत विद्यार्थ्यांनी लुटला फन फेअरचा आनंद
बाल आनंद मेळ्यात रमली चिमुकली सोलापूर: सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार समज शिक्षण मंडळाच्या माणेकरी शाळेत बाल आनंद मेळावा. आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना खरेदी- विक्री नफा- तोटा याचा अनुभव यावा या उद्देशाने [...]
चिप्सचं पाकिट चुकून गॅसवर पडलं; स्फोटात 8 वर्षाच्या मुलाचा डोळा निकामी, नेमकं काय घडलं?
लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच चिप्स खायला प्रचंड आवडतात. मात्र या चिप्समुळे एका 8 वर्षाच्या चिमुकल्यासोबत आपला डोळा गमवावा लागला आहे. ओडिशातील बालनगीर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी चिप्स उत्पादक कंपनीविरोधात तितलागड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने गावातील दुकानातून […]
Solapur News : संक्रांतीनिमित्त उमरगा बाजारात महिलांची गर्दी
संक्रांत सणामुळे उमरग्यात बाजारपेठेत खरेदीची गर्दी धाराशिव उमरगा : उमरगा शहरातील बाजारपेठेत संक्रांत सणामुळे महिलांनी वाणाच्या सामानासह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीनिमित्त बाजारात विविध वाणांचे सामान दाखल झाले असून महिला बजेटनुसार ते खरेदी करताना दिसत [...]
Solapur : सोलापुरात सिद्धेश्वर महाराज यात्रेतील भव्य अक्षता सोहळा उत्साहात
अक्षता सोहळ्यानिमित्त सिद्धेश्वर समाधीची भव्य सजावट सोलापूर :सत्यम सत्यम, दिड्डम दीड्डम म्हणत सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेतील अभूतपूर्व असा अक्षता सोहळा पार पडला. यावेळी शहरात उत्साहपूर्ण वातावरण होतं आज नंदीध्वजाला बाशिंग बांधण्याचा दिवस होता. सर्व भाविक बाशिंग घेऊन नंदीध्वजाची वाट [...]
मी काही माता सीता नाही, आध्यात्मिक मार्ग सोडण्याचा हर्षा रिछारियाचा निर्णय
प्रयागराज महाकुंभमेळ्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षा रिछारियाने आध्यात्मिक मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून आध्यात्मच्या वाटेवर चालणाऱ्या हर्षाने अत्यंत व्यथित होऊन हा मार्ग सोडत असल्याचे जाहीर केले. आपले मनोधैर्य जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. हर्षाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत आपली कैफियत मांडली आहे. तिने […]
Satara : साताऱ्यातील अतिक्रमणावर कोण होतेय गडगंज ?
सातारा शहर बनतेय टपऱ्यांच्या अतिक्रमणाचे केंद्र सातारा : सातारा शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडच्या काळात या शहराला ‘टपऱ्यांच्या अतिक्रमणाचे शहर’ अशी नवी ओळख मिळू लागली आहे. या परिस्थितीस काही स्वयंघोषित [...]
Photo –आदित्य ठाकरे यांचा झंझावात, शिवडीत भव्य बाईक रॅली
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवडी विधानसभेतील सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भव्य बाईक रॅली काढली. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे, खासदार अरविंद सांवत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. (सर्व फोटो […]
Satara News : उंब्रजमध्ये पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम
रेझिंग डे सप्ताहात शाळांमध्ये पोलीसांचे मार्गदर्शन उंब्रज : महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त २ ते ८ जानेवारी या कालावधीत आयोजित रेझिंग डे सप्ताह अंतर्गत उंब्रज परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर व्याख्याने घेण्यात आली. पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची याठिकाणी नेमणुकीस असलेल्या सहाय्यक पोलीस [...]
Photo –आदित्य आणि अमित ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक येथे मुंबईसाठी प्राण अर्पण करणाऱ्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन केले.
Sangli News : आटपाडी पाटीलमळ्यात दोन कुटुंबांत तुफान मारहाण
घरगुती वादातून आटपाडीत हिंसाचार आटपाडी : आटपाडी पाटीलमळा येथे दोन कुटुंबामध्ये कोयता, काठीने झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीच्या घटनेत दोघे जखमी झाली आहेत.आटपाडी पाटीलमळा येथील सुनिता जालिंदर पाटील [...]
Sangli : मिरजमधील भारत लाईट हाऊसला भीषण आग, ३५ लाखांचे नुकसान
मिरज हायस्कूल रोडवर इलेक्ट्रॉनिक दुकान जळून खाक मिरज : शहरातील मिरज हायस्कूल रस्त्यावर असणाऱ्या भारत लाईट हाऊस या इलेक्ट्रॉनिक मटेरियल असलेल्या दुकानाला सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील सर्व इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक झाल्याने [...]
जिल्हा परिषद हायस्कूल भूमला आयडीबीआय बँकेकडून संगणक संच भेट
भूम (प्रतिनिधी)-येथील जिल्हा परिषद हायस्कूल भूमला आयडीबीआय बँक शाखा भूमकडून संगणक संच प्रिंटरसह भेट देण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक तात्या कांबळे होते तर प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी साहेब होते . मनोगतामध्ये भट्टी साहेब म्हणाले की , नवीन वर्षाचा पहिला सण संक्रांत आहे .संक्रांत म्हणजे संक्रमण आज आपल्या शाळेत संक्रमण होत आहे .शाळेला बँकेकडून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेले संगणक साहित्य मिळत आहे . म्हणजेच शाळा प्रगतीच्या संक्रमणाकडे जात आहे .या शैक्षणिक साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नक्कीच होईल असे म्हणाले यावेळी बँकेचे शाखाधिकारी स्वप्निल भातलवंडे ,उपशाखा अधिकारी सुनीत कुमार ,कर्मचारी अमोल चौधरी व रमेश वाघमारे यांच्या हस्ते साहित्य शाळेला सुपूर्द करण्यात आले .कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले .
भाजपा कार्यालयात सर्व पक्षीयांच्या वतीने माँसाहेब राजमाता जिजाऊंची जयंती साजरी
भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी कार्यालय भूम येथे सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वराज्यजननी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊंची शिकवण अंगीकृत करून जसे, शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोक यांना एकजुटीने एकसमान वागणूक दिली. तसेच आपण देखील आपल्या राजकीय कारकिर्दीत हीच शिकवण अंगीकार करावी असे त्यांनी सर्वांना सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, उबाठा महिला तालुका प्रमुख उमाताई रणदिवे, भाजपा शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, तालुकाध्यक्ष चंद्रकांत मासाळ, काँग्रेस प्रियदर्शनी सेल अध्यक्ष अमृता गाढवे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष स्वाती तनपुरे,सोशलमीडिया शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव, राणी यादव, शहर उपाध्यक्ष सुरेश उपरे,विकास यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Sangli News: आरोग्य अधिकाऱ्याची चौकशी करून बडतर्फ करा ; शिवसेनेची मागणी
सांगलीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप सांगली : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ या बेशिस्त, भ्रष्टाचारी आणि गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याची उच्चस्तरीय महिला समितीमार्फत चौकशी करून त्यांना शासकीय सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची यावी, अशी मागणी शिवसेनेचे [...]
Nanded News –महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावला; आता संक्रांत कुणावर? तर्कवितर्क सुरू
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रचाराच्या तोफा सायंकाळी थंडावल्या आहेत. मात्र, निवडणूक प्रचारात एकमेकांवर केलेले आरोप, मटनाचा विषय, एकमेकांवर केलेली कुरघोडी, शिंदे गटात झालेले बंड, आमदारातील गटबाजी यामुळे या निवडणुकीत कुणावर संक्रांत येणार हा आता चर्चेचा विषय ठरत आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या प्रचार आता संपला आहे. पंचरंग लढतीत या […]
Sangli Politcs : सांगलीत शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला
सांगलीत शिवसेना नेत्यांवर खुनी हल्ल्या सांगली : शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे उपजिल्हा प्रमुख हरि लेंगरे आणि शहर प्रमुख सचिन कांबळे यांच्यावर आज सायंकाळी खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात लेंगरे यांच्या गाडीवर दगडफेक करत तोडफोड करण्यात [...]
Mumbai News –सिगारेट दिली म्हणून पान टपरीवाल्याला जिवंत पेटवलं, आरोपीला पोलिसांकडून अटक
सिगारेट द्यायला नकार दिला म्हणून तरुणाने पान टपरीवाल्याला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पान टपरीवाला गंभीर भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला. याप्रकरणी आंबोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जोगेश्वरी पश्चिमेकडील यादवनगरमध्ये ही धक्कादायक […]
सैन्याला ड्रोन आणि क्षेपणास्त्र दलाची सर्वाधिक गरज; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे मत
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत ड्रोन आणि क्षेपणास्त्र दलाची सैन्याला सर्वाधिक गरज असल्याचे मत व्यक्त केले. सध्याच्या काळात ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांची सैन्य दलाला अत्यंत गरज आहे. चीन आणि पाकिस्तानने स्वतःचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र दल स्थापन केले आहे. त्यामुळे काळाची गरज म्हणून आपल्या सैन्याकडेही ड्रोन आणि क्षेपणास्त्रे असणे गरजेचे आहे, तसेच ड्रोन […]
Sangli : सांगलीत तरुणाचा रात्री खून, चौघे संशयित
शामरावनगरमध्ये खुनाची गंभीर घटना सांगली : शामरावनगर येथे गुंह चेतन आप्पासाहेब तांदळे (वय १८, रा. रामनगर, पहिली गल्ली) याचा खून केल्याप्रकरणी संशयित शुभम चंद्रकांत वाघमोडे (वय १८, रा. महादेव कॉलनी, शामरावनगर) याला सांगली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे [...]
साप चावल्यानंतर चालकाने केले असे कृत्य, उडाला एकच गोंधळ; व्हिडीओ होतोय व्हायरल
मथुरा जनपदमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका ईरिक्षा चालकाला विषारी सापाने दंश केला. त्यानंतर या चालकाने चक्क तो साप उचलून जॅकेटमध्ये घालून जिल्हा रुग्णालयात पोहोचला. ज्यावेळी त्याने जॅकेट खोलले त्यावेळी एकच खळबळ उडाली आणि रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ईरिक्षा चालकाला सापाने दंश केला. […]
जुगार अड्ड्यावर छापा, बुकी मालक ताब्यात
धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील ढोकी पोलिसांना कसबे तडवळे येथील बस स्टॅडजवळील चिंचेच्या झाडाखाली काही इसम मटका जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी पोलिसांनी छापा टाकला असता फरीद तुरब खान (रा. कसबे तडवळे) हा कल्याण मटका जुगार चालवताना दिसून आला. यावेळी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच अधिक चौकशी केली असता बुक्की मालक महेश यादव मला कमिशन देतात, त्यामुळे मी येथे कल्याण मटका जुगार चालवत आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. यानंतर ढोकी पोलिसांनी बुकी मालक महेश यादव व बुकी चालवणाऱ्या फरीद तुरब खानवर ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे यांनी केली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे शिक्षणक्षेत्रात नवे पर्व सुरू झाले आहे- प्रो.डॉ. संदीप टेकाळे
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालयात विवेकानंद सप्ताहामध्ये जागर :आधुनिक शिक्षण आणि तात्रंतनाचा या व्याख्यानमाला अंतर्गत “आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षणातील नवीन प्रवाह” या विषयावर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथील विभागाचे विभागप्रमुख प्रो.डॉ.संदीप टेकाळे यांचे एक दिवसीय मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. संदीप टेकाळे (HOD, AIDS, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव) उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिक्षण क्षेत्रातील वाढता प्रभाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमाशी होणारा समन्वय, तसेच भविष्यातील करिअरच्या संधी याविषयी सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी क्षेत्रात कौशल्ये विकसित करून नव्या संधी कशा साधाव्यात? यावर त्यांनी विशेष भर दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जीवन पवार होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तंत्रज्ञानामुळे झपाट्याने होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शिक्षण पद्धतीत नवकल्पना आवश्यक असल्याचे नमूद केले. कृत्रिम बुद्धिमात ही सर्व काही देत असेल तरी ती मानवास मूल्य देण्याइतके सक्षम नाही असे प्रतिपादन केले. ज्या ठिकाणी विकास झाला आहे त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने होतो. मूल्याची जोपासना करणे गरजेचे आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानास मूल्याची जोड द्यावी. असे आव्हान त्यांनी केले. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सज्जनराव साळुंखे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), कार्यक्रमाचे संयोजन प्रा. स्वाती पी. बैनवाड, विभागप्रमुख, राज्यशास्त्र विभाग (सदस्य, महाविद्यालय विकास समिती) यांनी केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांची सखोल माहिती मिळाल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास डॉ.बापुराव पवार , डॉ. नेताजी काळे, संस्कृतिक विभागप्रमुख डॉ.मंत्री आडे, प्रा. बालाजी कऱ्हाडे , प्रा.सुदर्शन गुरव , डॉ. आबासाहेब गायकवाड, प्रा जे. बी. क्षीरसागर, प्रा सतीश वागतकर प्रा.राऊत सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वाकडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश एकदंत यांनी केले सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पतंग उडवा पण, जरा जपून, वीजेच्या तारांपासून दूर रहा
धाराशिव (प्रतिनिधी)- मकर संक्रात सण आणि पंतगबाजीचे अनोखे नाते आहे. हा सण जसा जवळ येऊ लागतो तसे बालगोपालांना आणि मोठ्यांनाही वेध लागतात ते पतंगाचे. रंगीबेरंगी विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळाच आनंद असतो. मात्र या आनंदाच्या भरात आपण सुरक्षीततेकडे दुर्लक्ष करतो. पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास प्रसंगी जीव ही गमवावा लागू शकतो याचे भान राहत नाही. त्यामुळेच पतंग उडविताना पतंग, पतंगाचा मांजा वीज वाहिन्या, रोहीत्र यांच्या संपर्कात आल्याने काही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडविताना वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी. असे आवाहन महावितरणच्या लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे. पतंग उडविताना अपघात घडल्याच्या घटना बातम्यांच्या स्वरुपात आपण दरवर्षी वाचतो. शहरी भागात अपुऱ्या जागे अभावी घराच्या छतावर पतंग उडविताना अनेक जण आपल्याला दिसतात. पतंग उडविण्याच्या नादात आपल्या घराच्या परिसरातील वीजतारांचाही विसर पडतो आणि खबरदारी न घेतल्यामुळे अपघातही होतो. त्याचबरोबर युवकांच्यात वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचीही जणू स्पर्धाच लागलेली असते. अशावेळी शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. वीजतारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉटसर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबरच, त्या व्यक्तीचा शॉक लागून प्राणांकीत अपघात होण्याचाही धोका संभवतो.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना : शेतकऱ्यांच्या विकासाचा नवा महामार्ग
धाराशिव- महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. राज्यातील बहुतांश लोकसंख्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे.पेरणीपासून ते कापणी,मळणी आणि शेतीमाल बाजारात पोहोचविण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला सक्षम व सोयीस्कर पायाभूत सुविधांची गरज असते. यामध्ये शेतापर्यंत जाण्यासाठी असणारे शेत / पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, आजही अनेक गावांमध्ये हे रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झालेले, निकृष्ट दर्जाचे किंवा पूर्णतः वापरण्यायोग्य नसल्याचे वास्तव आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीतील यंत्रसामग्रीचा वापर वाढला असला तरी योग्य रस्त्यांच्या अभावामुळे त्या यंत्रांचा प्रभावी वापर करणे शेतकऱ्यांसाठी कठीण ठरत आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेत / पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण,अतिक्रमणमुक्ती आणि दर्जेदार बांधकामासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाकांक्षी आणि स्वतंत्र योजना जाहीर केली आहे,ती म्हणजे “मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना”. योजनेची गरज आणि पार्श्वभूमी शेत / पाणंद रस्ते हे सहसा मुख्य रस्ते योजनांमध्ये समाविष्ट नसतात. त्यामुळे त्यांची दुरवस्था दीर्घकाळ दुर्लक्षित राहते. अनेक ठिकाणी या रस्त्यांवर अतिक्रमण झालेले असून पावसाळ्यात ते चिखलमय, तर उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य असते. परिणामी शेतकऱ्यांचा वेळ,खर्च आणि श्रम वाढतात.ही समस्या लक्षात घेऊन दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ग्रामीण भागातील शेत / पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी स्वतंत्र योजना राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.या निर्णयातूनच “मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना” अस्तित्वात आली. ही योजना केवळ रस्ते बांधण्यापुरती मर्यादित नसून,ती शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारी आहे.पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जलद गतीने कामे सोपी,सुलभ आणि प्रभावी कार्यपद्धतीची आहे.अतिक्रमणमुक्त आणि बारमाही वापरण्यायोग्य रस्ते गुणवत्तेवर विशेष भर आणि दोष निवारण कालावधीची तरतूद आणि कार्यान्वयीन यंत्रणा या योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे विविध यंत्रणांमार्फत करता येणार आहेत.त्यामध्ये ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद बांधकाम विभाग, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग,वन विभाग (ज्या ठिकाणी वनजमीन आहे तेथे) तसेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचा समावेश आहे.त्यामुळे स्थानिक गरजेनुसार योग्य यंत्रणेमार्फत कामे करणे शक्य होणार आहे. शेत / पाणंद रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता देताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीनुसार अधिकार देण्यात आले आहेत.वनजमिनीच्या बाबतीत वन विभागामार्फत मान्यता देण्यात येणार आहे.प्रत्येक रस्त्याच्या कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार विधानसभा क्षेत्र समितीचे सदस्य सचिव असलेल्या उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत.यामुळे निर्णयप्रक्रिया वेगवान होणार आहे. निविदा प्रक्रिया व देयके 25 कि.मी. लांबीचा क्लस्टर तयार करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या कंत्राटदारांनाच निविदेत सहभागी होता येणार आहे.काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक यंत्रणेने प्रमाणित केलेली देयके उपविभागीय अधिकारी अदा करणार आहेत.निधीची उपलब्धता बहुआयामी स्रोत- या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उघडून शासनाकडून अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येणार आहे.याशिवाय निधी,विविध योजना व अनुदाने यांचे अभिसरण करून निधी उभारण्याची मुभा देण्यात आली आहे.15 वा वित्त आयोग, खासदार/आमदार निधी, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी,ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न, पेसा निधी,ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार कार्यक्रम,भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना अशा अनेक स्रोतांचा प्रभावी वापर करण्याची संधी या योजनेत उपलब्ध आहे. अतिक्रमणमुक्ती कठोर पण आवश्यक निर्णय गाव नकाशांवर दर्शविण्यात आलेल्या शासकीय रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी स्पष्ट व कठोर कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तहसीलदारांनी 7 दिवसांची नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी, अन्यथा शासन स्तरावरून अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.या प्रक्रियेत पोलीस बंदोबस्तासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही,ही बाब विशेष महत्त्वाची आहे.गुणवत्ता,पर्यावरण आणि शाश्वतता या योजनेत रस्त्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यात आला आहे.खडी,मुरूम यांची तपासणी, अनिवार्य करण्यात आले आहे.शेत / पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड करणे बंधनकारक असून यामुळे पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. ग्रामपंचायत,महसूल व पोलीस यंत्रणेची जबाबदारी योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत,महसूल यंत्रणा आणि पोलीस विभाग यांची स्पष्ट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी रस्त्यांचा आराखडा तयार करणे,महसूल यंत्रणेने अतिक्रमणमुक्ती व समन्वय साधणे,पोलीस विभागाने आवश्यक तेथे तात्काळ मदत उपलब्ध करून देणे या त्रिसूत्री समन्वयामुळे योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे. समित्यांची भूमिका आणि नियोजन जिल्हास्तरीय व विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांमार्फत योजनेचा आढावा,निधी संकलन,अडचणींचे निराकरण आणि कामांच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यात येणार आहे.दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेणे बंधनकारक आहे. “मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना”ही केवळ पायाभूत सुविधा विकासाची योजना नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक,सामाजिक आणि मानसिक सक्षमीकरणाचा पाया आहे.शेतापर्यंत पोहोचणारे दर्जेदार,अतिक्रमणमुक्त आणि बारमाही रस्ते उपलब्ध झाल्यास शेतीचा खर्च कमी होईल,उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचा बाजाराशी थेट संपर्क सुलभ होईल.ही योजना यशस्वीपणे राबविली गेल्यास ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि खऱ्या अर्थाने “बळीराजा” सशक्त होण्यास मदत होणार आहे. संकलन जिल्हा माहिती कार्यालय धाराशिव
प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित
परंडा (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी गुरुवारी रा.गे.शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांना नुकताच ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2026 प्राप्त झाला. फाउंडेशन फॉर एज्युकेशन अँड कम्युनिटी वेल्फेअर महाराष्ट्र राज्य यांनी पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय परिसंवाद विकसित भारत पारंपारिक ज्ञान आणि शाश्वत विकास शिक्षकांची भूमिका हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांमध्ये प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांना ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चंदनशिवे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे गुरुवर्य प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर, श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे,मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई येथील सचिव सुनील चंदनशिवे, कृषिमंत्र्याचे आवर सचिव अंबादास चंदनशिवे, बीड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ शंकर अंभोरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व सिनेट सदस्य प्रोफेसर प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे परंडा येथील महाविद्यालयातील कनिष्ठ कनिष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सर्व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मित्र परिवारांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले.
डॉ. आंबेडकर विचारमंचचे राजमाता जिजाऊंना अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिवच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने धाराशिव येथील जिजाऊ चौकात अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्रा. रवि सुरवसे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र धावारे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ यांचा विजय असो, तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करण्यात आला. यावेळी प्रा. रवि सुरवसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विजय गायकवाड, राजेंद्र धावारे, एम.जी. पवार, सी.के. मस्के, विकास काकडे, अमोल गडबडे, ॲड. अजित कांबळे, प्रा. अंबादास कलासरे इत्यादींची उपस्थिती होती.
जाणीव संघटनेचा 19 जानेवारीला वाशी तहसीलवर भव्य मोर्चा
वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, गायरानधारक तसेच निराधार घटकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जाणीव संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि. 19 जानेवारी रोजी वाशी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये दिव्यांगांप्रमाणे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना, एकल महिला व निराधार लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये मानधन देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. वाशी तालुक्यात सन 1985 पासून दलित, भूमिहीन व आदिवासी समाजातील कुटुंबे पडीत गायरान जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे या कुटुंबांच्या नावे सातबारा नोंद करून पिकांचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणीही मोर्चामार्फत करण्यात येणार आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजनांसाठी लागू असलेली 21 हजार रुपयांची वार्षिक उत्पन्न अट रद्द करून ती 60 हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे कर्ज, वीज बिल व शैक्षणिक फी माफ करावी, मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार प्रलंबित अनुदान वितरित करावे, घरकुल व घरपरजरीचे अनुदान तातडीने देण्यात यावे, तसेच मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू करून मजुरांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले असून, या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ नागडे यांनी केले आहे.
महापालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आयोगाकडून करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी म्हणजे निकाल लागणार आहे. यामुळे शहरांनंतर राज्यातील ग्रामीण भागांमध्ये निवडणुकांचा […]
कारखानदारांकडून 23 लाखांची ऊसतोड कामगार कुटुंबाला मदत
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील मौ. डोंगरवाडी येथील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांच्या अपघाती मृत्यूनंतर प्रशासन आणि साखर कारखान्यांकडून सुरुवातीला दुर्लक्ष होत असताना, मानवी हक्क अभियानाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिलेल्या निवेदनामुळेच अखेर या प्रकरणाला गती मिळाली. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित यश साखर कारखान्याकडून मृत कामगाराच्या कुटुंबाला 23 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली असून हा संपूर्ण न्यायसंघर्षाचा विजय मानवी हक्क अभियानालाच श्रेयस्कर असल्याचे बोलले जात आहे. कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात गणेश डोंगरे यांचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी व तीन लहान मुलांचे भवितव्य अंधारात गेले होते. शासन, प्रशासन आणि साखर कारखाने गप्प असताना मानवी हक्क अभियानाने पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. मृत कामगाराच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शासन व कारखान्यांनी घ्यावी, तसेच किमान 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली होती. या निवेदनानंतरच संबंधित यश साखर कारखान्याला हालचाल करावी लागली. संघटनेच्या दबावामुळे 19 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला, तसेच ऊसतोड कामगार महेश याने घेतलेली 4 लाख रुपयांची उचल पूर्णतः माफ करण्यात आली. त्यामुळे एकूण 23 लाख रुपयांची मदत कुटुंबाला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. मानवी हक्क अभियानाने ही मदत प्राथमिक असल्याचे सांगत मृत कामगाराच्या कुटुंबाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका घेतली आहे. संघटना नसती तर हे प्रकरण दडपले गेले असते, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या यशाचे सर्व श्रेय मानवी हक्क अभियानाच्या लढाऊ भूमिकेला व प्रशासनावर टाकलेल्या दबावालाच जाते, असे स्पष्ट मत व्यक्त होत आहे. या निवेदनावर मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा सचिव माहन ताटे, समन्वयक अरुणकुमार माने, सय्यद रझाक, सुग्रीव कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
राजमाता जिजाऊ यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
धाराशिव (प्रतिनिधी)- शहरामध्ये राजमाता जिजाऊ यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबववून मोठ्या उत्साहात दि.12 जानेवारी रोजी साजरा करण्यात आली. सकाळपासूनच जिजाऊ चौकात जिजाऊ प्रेमींनी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. जिजाऊ उत्सव पारंपारिक पद्धतीने मात्र मोठ्या जल्लोषात साजरा केल्याने संपूर्ण परिसर जिजाऊंच्या जयघोष यांनी दणाणून गेला होता. धाराशिव येथील जिजाऊ चौकामध्ये मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती अध्यक्ष प्रणिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, नगराध्यक्ष नेहा काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध संस्थांनी भाग घेऊन जिजाऊंच्या विचारांना अभिवादन केले. या उत्सवांमध्ये जिजाऊंच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक उपक्रम राबवले गेले. यामध्ये रक्तदान आणि वृक्षारोपण याचा समावेश आहे. जिजाऊ चौकात जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तर मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे आज जन्मलेल्या मुलींना कपडे व मातांना साडी चोळी आदींचे वाटप करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी वेशभूषा काढून शोभायात्रा व वाहन रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमास जिजाऊ प्रेमी, शिवप्रेमी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तब्बल 38 वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.
भूम(प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्रशाला भूम येथे 1987/88 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. 11जानेवारी2 026 गेटटूगेदर साठी प्रथमता रांगेत उभा राहून राष्ट्रगीताने, शाळेमध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी बेंचवर बसून हजेरी दिली. नंतर जे विद्यार्थी उशिरा उपस्थित झाले. त्यांना शिक्षकांच्या छड्या किंवा शिक्षा देण्यात आली. तदनंतर याच ठिकाणी नाश्ता झाला व पुढील कार्यक्रम आकरे मंगल कार्यालय मध्ये आगे कुछ झाल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी जे गुरुजी व विद्यार्थी दिवंगत झालेले आहेत. अशांना आदरांजली अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सातपुते, रेंगे, जगदाळे व जिल्हा परिषद शाळेचे कार्यरत मुख्याध्यापक कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर आलेल्या दहावीतील सर्व विद्यार्थ्यांचे स्वतःहून ओळख करून देण्यात आले. कारण बऱ्याच कालावधीनंतर हे विद्यार्थी भेटल्याने त्यांचे चेहरे एकमेकांना ओळखू येत नव्हते म्हणून सर्वांनी स्वतः आपापली ओळख करून दिली. ओळख झाल्यानंतर संजीवन सातपुते , रेंगे, जगदाळे व तात्या कांबळे सर यांनी मार्गदर्शनात्मक संवाद साधला. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर स्नेहभोजन झाले थोड्या विश्रांतीनंतर या ठिकाणी संगीत खुर्चीचा खेळ रंगला. यामध्ये अनेक विद्यार्थी मागे पडले काहींचा नंबर आला. यातच सर्वांना आनंद झाला. दरम्यान जिल्हा परिषद शाळेमध्ये मागेपुढे अतिक्रमण झाले आहे जी जागा उरलेले आहे. त्या ठिकाणीही तळीरामाचा जुगारी यांचा वावर असतो. त्यामुळे या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने 15000 रुपये रोख स्वरूपात मुख्याध्यापक तात्या कांबळे यांच्याकडे शाळेच्या बाजूने कंपाऊंड मारण्यासाठी सुपूर्द केले. नंतर फोटो सेक्शन होऊन सर्व सवंगडी जातानी या ठिकाणी काय विद्यार्थ्यांना जाऊ वाटले नाही निरोप ही देवू वाटला नाही. काही विद्यार्थ्यांना गहिवरून आले. परंतु हा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न झाला. यासाठी शेख तय्यब,कैलास तांबे,धनंजय खामकर,विजय साबळे,वंदना वाईकर,संध्या सातपूते,चंद्रकांत साठे,मनिषा खोले, तूकाराम देशमाने, मनिषा वैदय(कूलकर्णि), मनीषा जोशी, संजय वडेकर, प्रशांत धर्मे, ऊज्वला सोनावणे, निर्मला मडके, सुनिता म्हेञे, सूहास जोशी, काशीनाथ व्हटकर, दत्ताञय शिंदे, मूकुंद लगाडे, धनंजय देशमूख, संजय शिंदे, अर्जुन सीतापे, वसंत माळी यांनी परिश्रम घेतले. कुमार सानू प्रस्तुत महेश कुमार कराओके म्युझिकल प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा सोनगाव करमाळा पुणे यांचा हिंदी मराठी भावगीत भक्तीगत सुपीक कव्वाली चित्रपट गीते असा कार्यक्रम संपन्न झाला.सूत्रसंचालन अलीम शेख सर यांनी केले.
अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी व्यापक कृती समिती- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात साकारण्यात येणाऱ्या अण्णाभाऊंच्या भव्य स्मारकासाठी व्यापक कृती समिती गठित करण्यात येणार आहे. त्याची नोंदणी करून बँकेत खाते उघडले जाईल. पारदर्शकता रहावी यासाठी केवळ धनादेशाद्वारे थेट बँक खात्यात लोकसहभाग स्वीकारण्यात येईल. समाजबांधवांसह विविध समाज घटकातील नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्वप्रथम स्वतःचा एक लाख रुपयांचा सहभाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दिला आहे. धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या शासन आदेश शुक्रवारी निर्गमित करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर पूर्वीच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या आदेशामुळे नगरपालिकेचे 2 कोटी वाचणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारणीच्या अनुषंगाने सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत स्मारक उभारणीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते स्मारकासाठी व्यापक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीची अधिकृत नोंदणी करून बँक खाते काढण्याचेही बैठकीत ठरले. सर्व आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता रहावी यासाठी लोकसहभागाची रक्कम केवळ धनादेशाच्या माध्यमातूनच स्वीकारण्याची सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केली. यावेळी दत्ता पेठे ,नगरसेवक विलास लोंढे, बापु पवार, कानिफनाथ देवकुळे, शिवाजी गायकवाड नळदुर्ग, युवराज शिंदे, सचिन लोंढे, दयानंद शिंदे, विजय क्षिरसागर तुळजापुर, विलास रसाळ तेर, विलास रसाळ ढोकीकर, अभिमान पेठे, यशवंत पेठे, रोहिदास झोबाडे, राजु रसाळ, सुमेध क्षिरसागर, किसन पेठे, काकासाहेब पेठे, सतोष पेठे, सतोष मोरे, शंकर मोरे,अंकुश पेठे, शिवाजी क्षिरसागर, दादा पेठे, खंडू चांदणे उपस्थित होते. सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका आणि उद्यानही या स्मारकाच्या ठिकाणी सुसज्ज असे ग्रंथालयही उभारण्यात येणार आहे. ज्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र ग्रंथसंपदेसह इतरही मौलिक ग्रंथांचा समावेश असणार आहे. त्याबरोबरच एक अद्यावत अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही याठिकाणी साकारले जाणार आहे. एमपीएससी आणि युपीएससी परीक्षेचे पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. यात कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र देखील असणार आहे. तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमासाठी एक सांस्कृतिक सभागृह देखील याठिकाणी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर आकर्षक असे भव्य उद्यान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जिल्ह्यातील पहिला पूर्णाकृती पुतळा याठिकाणी साकारण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही उमेदवार करू शकणार प्रचार! निवडणूक आयोगाच्या निर्णयाने मोठा गोंधळ
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून उमेदवार घरोघरी जाऊन सर्वप्रकारे प्रचार करत आहेत. मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच आज 13 जानेवारीला प्रचाराचा कालावधी संपत असून गेल्या अनेक दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराचा तोफा संध्याकाळी पाच नंतर थंडावणार आहेत. मात्र आज निवडणूक आयोगाने एक पत्रक काढत उमेदवार प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही घरोघरी […]
हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सीमेपलीकडील दहशतवादी हालचालींबाबत पाकिस्तानला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. सीमेपलीकडे अद्यापही दहशतवाद्यांचे आठ ट्रेनिंग कॅम्प सक्रिय असून हिंदुस्थानच्या सैन्य त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या तळांवरून कोणतीही कुरापत झाली, तर भारतीय लष्कर त्याला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम जनरल द्विवेदी […]
भाजपचं सरकार आलं तर मुंबईचं नाव बदलून अदानीस्तान करतील, आदित्य ठाकरेंचा मतदारांना सावधगिरीचा इशारा
महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज (13 जानेवारी 2025) प्रचाराचा शेवटचा दिवस असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अण्णामलाई यांच्यावर सडकून टीका केली. भाजपचं जर सरकार आलं तर मुंबईचं नाव बदलून अदानीस्थान करतील, अशी […]
10 मिनिटांत डिलिव्हरी देण्यावर केंद्र सरकारची बंदी; स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिटला मोठे निर्देश
डिलिव्हरी बॉईजच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. श्रम मंत्रालयाने अत्यंत कमी वेळेत म्हणजेच 10 मिनिटांत डिलिव्हरी करण्याच्या सुविधेवर आता बंदी घातली आहे. डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला असलेला धोका आणि रस्त्यावरील सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील महत्वाच्या ऑनलाईन […]
Jammu Kashmir –कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर भागात दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन सदस्य […]
छत्रपती संभाजीनगरातील मामा काणे चौकात झालेल्या सभेत भाजप आमदार संजय केनेकर यांनी मिंध्यांचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना चांगलेच सुनावले आहे. तुम्ही जिल्ह्याचे पालक असाल तर आम्ही मालक आहोत, तुम्ही कमळाच्या पिचवर खेळताय हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत त्यांनी शिरसाट यांना सुनावले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत तुम्ही मुलगा, मुलगी आणि पीएलाच तिकिट देता, इतर कार्यकर्त्यांचा […]
कोलझर वृक्षतोडप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल
दोडामार्ग : प्रतिनिधी कोलझर येथे खाजगी जंगलक्षेत्रात झालेल्या वृक्षतोडप्रकरणी वनविभागाने ठोस पावले उचलली आहेत. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्याबरोबरच येथे झालेल्या वृक्षतोडीचा रितसर पंचनामा करण्यात आला. कोलझर येथील डोंगरात काही अज्ञातांनी सुमारे ४ किलोमीटर लांबीचे उत्खनन केले होते. हा परिसर केंद्र सरकारने इकोसेन्सिटीव्ह एरिया म्हणून जाहीर केला आहे. स्थानिकांच्या मालकी क्षेत्रात विनापरवाना घुसून हे [...]
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून विकासाचा आभास निर्माण करणार्यांना धडा शिकविण्याची वेळ –सुषमा अंधारे
गेल्या २५ वर्षात कोट्यवधीचा निधी आणून विकास केला असा भास निर्माण करुन नांदेडकरांची फसवणूक करणार्या व भ्रष्टाचार व गैरव्यवहाराच्या माध्यमातून पैसा गोळा करुन जनतेची मते विकत घेण्याचे पाप करणार्या मंडळींना नांदेडकरांनी या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवून अन्यायाविरुध्द भ्रष्टाचाराविरुध्द लढणार्या शिवसेना उमेदवारांची मशाल पेटवून १५ तारखेला शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा […]
सावंतवाडी नगराध्यक्षांचा माजगावच्या सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळाच्यावतीने सन्मान
ओटवणे ।प्रतिनिधी सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रीमंत सौ. श्रद्धाराजे लखमराजे भोंसले यांची सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळ यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी युवराज्ञी श्रीमंत सौ. श्रद्धाराजे लखमराजे भोंसले यांनी आपला सन्मान केल्याबद्दल सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळ यांचे आभार मानले.सावंतवाडीत राजवाडा येथे झालेल्या या कार्यक्रमाला सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत [...]
शाकाहारी व्यक्तींनी बी १२ वाढवण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत
हिंदुस्थानात मोठ्या संख्येने लोक शाकाहारी आहेत, परंतु यामुळे व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता ही एक सामान्य समस्या बनली आहे. हे जीवनसत्व लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी१२ हे सामान्यतः प्राण्यांपासून बनवलेल्या पदार्थांमध्ये आढळते, परंतु काही शाकाहारी पदार्थ ही कमतरता दूर करण्यास मदत करू शकतात. हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, […]
शिरोडा येथे दिवसाढवळ्या घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास
वेंगुर्ले / प्रतिनिधी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा परबवाडा परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे मिळून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, हि चोरी १० जानेवारी २०२६ रोजी [...]
दोडामार्ग तालुका शासकीय भात खरेदी केंद्राचा शुभारंभ
(साटेली भेडशी प्रतिनिधी) दोडामार्ग तालुका शासकीय भात खरेदी केंद्राचा शुभारंभ मे. श्री.विजयादुर्गा ॲग्रो सर्विस साटेली भेडशी येथे सरपंच छाया धर्णे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शासकीय भात खरेदी केंद्र केंद्रप्रमुख भिकाजी गणपत्ये,तेरवण मेढे उपसरपंच मायकल लोबो, साटेली भेडशी माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र(संतोष) भिसे,ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी बोडदे माजी सरपंच तथा शेतकरी फटी नार्वेकर, शेतकरी शिवराम देसाई [...]
हिवाळ्यात नारळ पाणी पिणे सुरक्षित आहे का?
नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. नारळ पाण्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तसेच आपले शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळ पाणी महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते आणि मूत्रपिंड आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. परंतु प्रश्न असा उद्भवतो की, हिवाळ्यात नारळ पाणी पिणे आवश्यक आहे का. नारळ पाणी हे साधारणपणे उन्हाळी पेय मानले […]
सावंतवाडी उपनगराध्यक्ष ,स्वीकृत नगरसेवक निवड उद्या
सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे श्रद्धाराजे भोसले यांनी हाती घेतल्यानंतर आता उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी उद्या बुधवारी निवड प्रक्रिया पार पडणार असून स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून ॲड. सिद्धार्थ भांबुरे तर शिवसेनेकडून ॲड.नीता -सावंत कविटकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी [...]
सध्या पैशांचा धुमाकूळ सुरू आहे, आता झुकाल तर मुंबईला मुकाल; उद्धव ठाकरे यांचा इशारा
मुंबईत शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाभेटींचा कार्यक्रम होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील विमानतळ परिसराला भेट देत जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबई आपली आहे, ती आपल्याचा ताब्यात ठेवा. आता झुकाल तर मुंबईला मुकाल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. आपण निवडणूक नाही, तर गद्दार आणि भ्रष्टाचाराच्या वृत्तीविरोधात लढत आहोत. छत्रपती शिवराय आणि भारतरत्न […]
आयब्रो विरळ असतील तर हे उपाय करुन बघा, वाचा
केस आपल्या शरीराचे सौंदर्य वाढवतात, तसेच भुवया चेहऱ्याच्या सौंदर्यात महत्वाची भूमिका बजावतात. जाड आणि सुंदर भुवया चेहरा आकर्षक बनवतात, परंतु कधीकधी, ताणतणाव, हार्मोनल बदल, वारंवार थ्रेडिंग किंवा पौष्टिक कमतरतांमुळे, भुवया विरळ होऊ लागतात. काही लोकांच्या लहानपणापासूनच भुवया विरळ असतात, ज्यामुळे त्या निस्तेज दिसतात. भुवया वाढीसाठी बाजारात अनेक उत्पादने आणि सीरम उपलब्ध आहेत, परंतु त्यातील रसायने […]
उत्तम आरोग्यासाठी जेवण्याच्या योग्य वेळा कोणत्या आहेत, जाणून घ्या
योग्य वेळी खाणे हे आरोग्यासाठी पोषणाइतकेच महत्त्वाचे आहे. दिवसा जड जेवण पचण्यास सोपे असते, तर रात्री उशिरा खाल्ल्याने पोटाच्या समस्या वाढू शकतात. डॉक्टर लवकर जेवण करण्याची शिफारस करतात. पौष्टिक अन्न खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण चांगला आणि पौष्टिक आहार पोटाशी संबंधित आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी करतो. आपल्या दैनंदिन दिनचर्येत कोणत्या प्रकारचे अन्न खावे […]
रताळे की बटाटा आपल्या आतड्यांसाठी सर्वात उपयुक्त काय आहे?
आपल्या स्वयंपाकघरात बटाटे आणि रताळे दोन्ही असतात. परंतु यापैकी आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. बटाट्याला भाज्यांचा राजा म्हणून ओळखले जाते. तर रताळे हे गोड चवीसाठी आणि त्यातील असलेल्या पोषक तत्वांसाठी ओळखले जातात. आपल्या आतड्यांचे आरोग्य केवळ पचनपुरते मर्यादित नाही. आतड्यांचे चांगले आरोग्य थेट रोगप्रतिकारक शक्ती, रक्तातील साखर नियंत्रण, वजन आणि […]
पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या, परवा मोठा ब्लॉक; तब्बल 288 लोकल फेऱ्या रद्द
पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे हाल संपण्याचे नावच घेताना दिसत नाही. आणखी आठवडाभर प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने बुधवारी आणि गुरुवारी रात्री पुन्हा मोठा ब्लॉक घेतला आहे. ब्लॉकमुळे दोन दिवसांत तब्बल 288 लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. तसेच गुजरातहून येणाऱ्या काही एक्सप्रेस वसईपर्यंत चालवण्यात येणार […]
महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून सतत सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका महिला प्राध्यापिकेने थेट जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रक्ताने निवेदन लिहिले आहे. तसेच, राष्ट्रपतींकडे कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगीही मागितली आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला प्राध्यापिकेने महाविद्यालय व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. मूळ […]
पेरणोलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व शक्तीनिशी लढण्याचा निर्धार पेरणोली-: पेरणोली-नव्याने अरेखीत केलेल्या शक्तीपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करण्याचा निर्णय आज पेरणोली येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. शुक्रवारी याबाबतचे निवेदन तहसीलदार आजरा यांना देण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम बघून बाधित गावातील शेतकऱ्यांचा [...]
संकेश्वर येथील हिरण्यकेशी साखर कारखान्यात क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
चिक्कोडी : साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यात घडली आहे. सदर कारखाना बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात आहे. या अपघातात सच्चिन बसप्पा द्यामण्णी (वय ३६) या कामगाराचा मृत्यू झाला. मृत सच्चिन हा हुक्केरी तालुक्यातील अम्मिनभावी गावाचा रहिवासी असून तो रोजंदारीवर काम करत होता. कारखान्यातील [...]
Kolhapur : रायदेवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे ४ एकर ऊस पीक जळून खाक
रायदेवाडीमध्ये भीषण आग; हेरे : रायदेवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे ४ एकर परिसरातील उभे ऊस पीक जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अचानक ऊस पिकाला आग लागली. ही आग इतकी भयानक होती, [...]
हिवाळ्यात जेवल्यानंतर तुम्हालाही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते का?
हिवाळ्यात आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतरही काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. हिवाळ्यात दिवस लहान होत असताना आणि तापमान कमी होत असताना, शरीर आपोआप अधिक ऊर्जा प्रदान करणाऱ्या पदार्थांकडे वळते. यामध्ये गोड पदार्थांचा समावेश आहे. खरंतर, थंड हवामानात, शरीर स्वतःला उबदार आणि संतुलित ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा शोधते. म्हणूनच आपल्याला खाल्ल्यानंतरही अनेकदा गोड पदार्थ किंवा काहीतरी गोड पदार्थ हवे […]
पैशांचा मोह कुणालाही आवरता येत नाही. माणूस कोट्याधीश असो किंवा फकीर, रस्त्यात पडलेली रोकड, सोने-नाणे किंवा मौल्यवान वस्तू सापडली तर तो पटकन खिशात टाकतो. पैशांचा हाच मोह आवरत चेन्नईतील कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. कचरा वेचणारी महिला पद्मा यांना तब्बल 45 तोळे सोन्याचे दागिने सापडले. बाजारात याची किंमत 45 लाखांच्या आसपास आहे. […]
Kolhapur : दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमास 20 वर्षांची सक्तमजुरी
बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षांची शिक्षा कोल्हापूर : दहा वर्षाच्या चिमुरडीला गाणी शिकविण्याच्या बहाण्याने घरी बोलावून चॉकलेट देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास सोमवारी न्यायालयाने दोषी ठरविले. राजाराम अशोक सुतार (बय ५२, रा. भादोले, ता. हातकणंगले) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने [...]
राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद; जिल्हा परिषद निवडणुकीबाबत घोषणा होण्याची शक्यता
राज्य निवडणूक आयोग मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणूक घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मुदतवाढ दिली असून 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. […]
खरा विकास जनतेच्या कल्याणावर अवलंबून
राज्यपालपुसापतीअशोकगजपतीराजूयांचेप्रतिपादन: सावंतसरकारच्याकामाचाघेतलाआढावा पणजी : विविध क्षेत्रातील गोमंतकीय जनतेचा आनंदी निर्देशांक राज्य सरकार लवकरच तयार करणार आहे. खरा विकास हा केवळ आर्थिक उन्नती, साधनसुविधा यावरच अवलंबून नसतो, तर तो जनतेच्या कल्याणावरही अवलंबून असतो, असे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी विधानसभेतील अभिभाषणात नमूद केले. गोव्याचा आरोग्य, सामाजिक जीवन, शिक्षण, पर्यावरण, संस्कृती या क्षेत्रातील निर्देशांक तयार होणार [...]
‘बर्च’ अग्निकांडच्या मुळाशी जाणार
अवैधतेलासंरक्षणदेणारीसरकारी‘व्यवस्था’ मोडूनकाढू: उच्चन्यायालयानेस्पष्टकेलीभूमिका पणजी : आम्ही ही बाब हलक्यात घेणार नाही. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अवैधतेला संरक्षण देणारी व्यवस्था आपल्याला मोडून काढावी लागेल. गोव्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच करू, अशी महत्त्वाची टिप्पणी उच्च न्यायालयाने हडफडे येथील ‘बर्च’ या नाईट क्लबमधील अग्निकांडावरील सुनावणीवेळी काल सोमवारी केली. हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लब’चे मूळ मालक [...]
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टॅरिफमुळे जगभराला धमकी देत आहेत. तसेच आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याची त्यांची तयारी सुरू आहे. ट्रम्प जगभराला धमकावत असले तरी अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात टॅरिफच्या वैधतेबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे ट्रम्प धास्तावल्याचे दिसत आहे. आता त्यांनी या निकालापूर्वी संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफ अवैध ठरवले तर गंभीर संकट ओढवेल, अमेरिका रसातळाला […]
वेंगुर्ले समुद्रात कर्नाटकातील अनधिकृत ट्रॉलिंग मासेमारी नौका पकडली
मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती दरम्यान कारवाई वेंगुर्ले : प्रतिनिधी वेंगुर्ला समोरील समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री.गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) हे सोमवारी रात्री नियमित गस्त घालत होते. यावेळी कर्नाटक राज्यातील एक नौका ही महाराष्ट्राच्या जलधीक्षेत्रात वेंगुर्ला समोरील समुद्रात अनधिकृतरित्या ट्रॉलिंग मासेमारी करत असताना पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह इतर ६ खलाशी [...]
आणखी तीन तरुणांची कंबोडियातून सुटका
बेळगावपोलीसआयुक्तांचापुढाकार, कालीमिर्चीयांचाहीपाठपुरावा: अद्यापशेकडोतऊणदुष्टचक्रातअडकून बेळगाव : परदेशातकॉम्प्युटरडाटाएंट्रीऑपरेटरची नोकरी देण्याचे सांगून कंबोडियात पाठविण्यात आलेल्या बेळगाव येथील तीन तरुणांना पोलिसांच्या मदतीने पुन्हा बेळगावला आणण्यात आले आहे. बेळगाव व खानापूर येथील दोन तरुणांनी स्वत:ची सुटका करून घेतल्याची घटना ताजी असतानाच कंबोडियात अडकलेल्या आणखी तिघा तरुणांचीही सुटका झाल्याचे सामोरे आले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे व पोलीस निरीक्षक जे. [...]
ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच
कडोलीतआठलाखाचीतरबेन्नाळीमध्ये5 लाखाचीधाडसीचोरी वार्ताहर/कडोली कडोली येथे चोरीच्या दोन घटनांनंतर आता तिसरी घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पाटील गल्ली येथील बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 8 लाख रुपयाचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याने गावात खळबळ माजली आहे. शिवाजी गल्ली कडोलीत शनिवारी रात्री दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी 3 लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. परत जाताना [...]
बेन्नाळीमधील बंद घराचा कडीकोयंडा तोडून पाच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
बेळगाव : चव्हाट गल्ली, बेन्नाळी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 5 लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने पळविल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विनायक कल्लाप्पा टक्केकर (वय 37) यांच्या घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी 100 ग्रॅम चांदीचे दागिने, 126 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले आहेत. [...]
मरण उताऱ्यासाठीचा अर्ज मराठीतून उपलब्ध करून द्यावा
म. ए. समितीचेनगरसेवकरवीसाळुंखेयांच्यामागणीनंतरसभागृहातखडाजंगी: सध्याचाफॉर्मअत्यंतकिचकट बेळगाव : मरण उतारा मिळविण्यासाठी पूर्वी देण्यात येणारा अर्ज सरळ सोपा होता. मात्र सध्या उपलब्ध करून देण्यात आलेला अर्ज अत्यंत किचकट आहे. तसेच केवळ कानडी भाषेत असलेला अर्ज इंग्रजीतही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक संतोष पेडणेकर, नितीन भातकांडे यांनी केली. त्यापाठोपाठ म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी मराठी भाषेतही [...]
आचरा- पारवाडी दिंडीच्या कलाविष्काराने पंढरपूरनगरी दुमदुमली
आचरा|प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजलेल्या श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी भजन मंडळ आचरा पारवाडी या दिंडी भजन मंडळाने पंढरपुर येथे विठ्ठल मंदिर नामदेव पायरी समोर सादर केलेल्या दिंडी भजनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विठ्ठल दर्शनासोबत तुकोबा महाराजांचेही दर्शन आगळी अनुभूती देऊन गेले. आचरा पारवाडी येथील दिंडी भजन मंडळाने पंढरपुर वारीचे नियोजन करत अक्कलकोट स्वामी समर्थ, [...]
शिवभक्तांच्या रेट्यापुढे प्रशासनाचे नमते
धारवाडरोडउड्डाणपुलावरील‘छत्रपतीं’चाफलकपुन्हाबसविला: कारणमात्रगुलदस्त्यात, शहरभरजोरदारचर्चा बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम भारतीयांचे दैवत असूनही त्यांच्या नावाने बेळगावमध्ये राजकारण करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. महानगरपालिकेत ठराव करून धारवाड रोड उड्डाणपुलाला नाव देण्यात आल्याने या ठिकाणी नवा फलक शनिवारी बसविण्यात आला. परंतु काहीवेळातच फलक पुन्हा हटविण्यात आला. तथापि शिवरायांच्या नावाने सुरू झालेले राजकारण परवडणारे नसल्याचे लक्षात येताच मनपाने दोन [...]
युवा समिती : 26 पासून ‘मराठी सन्मान यात्रा’
स्वराज्याचीराजधानीरायगडावरूनहोणारप्रारंभ: संविधानाच्यापायमल्लीचीसीमाभागातपरिसीमा बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने मराठी भाषिकांसाठी ‘मराठी सन्मान यात्रा’ काढली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या व स्वराज्याची राजधानी रायगड येथून 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी या यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती सोमवारी मराठा मंदिर येथे आयोजित बैठकीत देण्यात आली. या बैठकीमध्ये 17 जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा [...]
बारावीची उजळणी परीक्षा-2 पुढील आठवड्यात
मुख्यपरीक्षेच्यातयारीसाठीसंधी बेळगाव : बारावीची उजळणी परीक्षा-2 जानेवारी 19 ते 2 फेब्रुवारीदरम्यान घेतली जाणार आहे. मागच्या आठवड्यात पहिली उजळणी परीक्षा घेतल्यानंतर आता दुसरी उजळणी परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षेचा विद्यार्थ्यांना सराव व्हावा, या उद्देशाने उजळणी परीक्षा घेतल्या जात आहेत. मुख्य परीक्षेची भीती कमी व्हावी व प्रश्नपत्रिकेचे स्वरुप समजावे यासाठी उजळणी परीक्षा घेण्यात येते. जानेवारी महिन्याच्या [...]
अन्नोत्सवात चोखंदळ खवय्यांची रसनातृप्ती
सोमवारच्यादिवशीशाकाहारीपदार्थांकडेकल: महोत्सवातभारतातीलविविधखाद्यसंस्कृतीचीओळख बेळगाव : सावगावरोडयेथीलअंगडीकॉलेजच्या मैदानावर सुरू असलेला रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित ‘अन्नोत्सव’ खाद्यप्रेमींना आकर्षित करीत आहे. चौथ्या दिवशीही नागरिकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती. सोमवार असल्यामुळे मांसाहारापेक्षा शाकाहारी पदार्थांना अधिक मागणी असल्याचे दिसून आले. मनोरंजनाच्या कार्यक्रमांतर्गत बुगीवूगी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. सर्व वयोगटातील स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आपापल्या स्पर्धकांना प्रोत्साहन [...]
पुन्हा बॅरिकेड्स लावून नागरिकांची गैरसोय
काँग्रेसरोडवरझालेल्याअपघातानंतरपोलीसप्रशासनानेरस्ताअडविला बेळगाव : काँग्रेस रोडवर झालेल्या अपघातानंतर पोलीस प्रशासनाने यू-टर्न घेता येण्याच्या म्हणजेच दुभाजकाचा खुला भाग बॅरिकेड्स लावून रस्ता अडविला. त्यामुळे पुन्हा नागरिकांना लांब वळसा पडणार आहे, म्हणजे पुन्हा बॅरिकेड्स लावून नागरिकांची गैरसोयच झाली आहे. आधी पहिल्या रेल्वेगेटवर असलेल्या बॅरिकेड्सने लोकांना बराच ताप दिला आहे. आता त्या पुढे दुभाजकाच्या जागी बॅरिकेड्स लावल्याने विवेकानंदकॉलनी, महात्मा गांधी [...]
संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर भाजीबाजारात चैतन्य
भोगीसाठीभाज्यांचीमोठीउलाढाल; दरातकिरकोळवाढ बेळगाव : हिरवागार मटार, वाटाणा, कांदा पात व बिनिस, लुसलुशीत गुलाबी गाजर, तुकतुकीत अशी वांगी, पांढरे सोले, लाल भाजी अशा विविध भाज्यांनी बाजार नटला असून भोगीच्या निमित्ताने भाजी खरेदीसाठी गर्दी तर झालीच, परंतु खरेदीबरोबरच भाजीबाजाराचा माहोल डोळ्यांना मोठा सुखद वाटला. संक्रांतीच्या आदलेदिवशी भोगीच्या निमित्ताने विविध प्रकारच्या भाज्या केल्या जातात. त्यामुळे रविवारी बाजारपेठेत गर्दी [...]
फुल मार्केटवरून मनपा अधिकाऱ्यांची झाडाझडती
मनपासर्वसाधारणबैठकीतविविधविषयांवरचर्चा: लीजसंपलेल्यामालमत्तांचीमाहितीझोनलनुसारघेणार बेळगाव : महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या फुल मार्केटचा सर्वे करून त्याचा अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. त्यावर कोणती कार्यवाही केली. मनपाची मालमत्ता असून दर महिना 5 लाख रुपये भाडे वसूल करून ते कोण घशात घालत आहे. अधिकारी बेजबाबदारपणे का वागत आहेत. सिमेंटचे रस्ते करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. पण अधिकाऱ्यांनी त्या [...]
अन्यथा 26 जानेवारीला महापालिकेला काळे झेंडे दाखविणार
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून किल्ला तलावमध्ये भगवान बुद्धांचा तर केएलई सर्कलमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पुतळ्याच्या मागणीसाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. तरीही याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. याबाबत त्वरित पावले न उचलल्यास 26 जानेवारीला महापालिकेला काळे झेंडे दाखविण्यात येतील. तसेच भविष्यात होणाऱ्या आपत्तीला [...]
तोडगा नाहीच…‘ते’ उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच
तुडयेग्रामस्थांनीदोनफेऱ्यासोडण्याचेआश्वासननाकारले: बेळगावजिल्हाधिकाऱ्यांशीचर्चेचीमागणी वार्ताहर/तुडये बेळगाव ते तुडये दरम्यान केएसआरटीसीने राकसकोपला असलेल्या बसफेऱ्या सुरू कराव्यात या मागणीसाठी तुडये येथील बस स्टॅन्डवर8 जानेवारीपासून सुरू असलेले साखळी उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच होते. चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण व डेपो मॅनेजर सतीश पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा केली. तुडये ते बेळगाव दोन फेऱ्या सुरू करण्यात येतील असे सांगितले. मात्र, [...]
गौतम बुद्ध-छ. शाहू महाराज पुतळ्यासाठी दलित संघटनेचे मनपासमोर आंदोलन
बेळगाव : किल्ला तलावात गौतम बुद्ध तर केएलई सर्कल येथे छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी कर्नाटक दलित संघर्ष समिती (भीमवादी) बेळगाव तालुक्याच्यावतीने महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आमदार आसिफ सेठ व मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात [...]
खानापुरात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणार
म. ए. समितीचानिर्णय: 17 जानेवारीरोजीसकाळी8.30 वाजतादिवंगतांनाअभिवादन खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक छत्रपती शिवस्मारक येथे सोमवारी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले व बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. सुरवातीला दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राजाराम देसाई यांनी सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करणे हे [...]
मकर संक्रांतीनिमित्त तालुक्यातील तीर्थक्षेत्रांवर विशेष पूजेचे आयोजन
मलप्रभानदीस्नानालाविशेषमहत्त्व खानापूर : मकर संक्रांतीनिमित्त खानापूर तालुक्मयातील काही तीर्थक्षेत्र तसेच मलप्रभा नदी किनाऱ्यावरील काही मंदिरातून विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. तसेच मकर संक्रांतीनिमित्त गंगास्नानाला महत्त्व असल्याने मलप्रभा नदीपात्राच्या किनाऱ्यावर भाविकांची मोठ्या प्रमाणात स्नानासाठी गर्दी असते. यात असोगा रामलिंग मंदिर, खानापूर मलप्रभा नदी घाट तसेच पंचमुखी महादेव मंदिर, हंडीभडंगनाथ मठ तसेच नंदगड येथील तीर्थक्षेत्रावर विशेष पूजेचे [...]

27 C