निवडणूक याचिकेला उत्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भाजप मंत्री गणेश नाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच खडेबोल सुनावले. भाजप मंत्र्यांना कायद्याचे ज्ञान असूनही याचिकेवर उत्तर सादर करायला वेळ नाही हा तर न्यायालयाचा अनादर असल्याचे सुनावत न्यायालयाने गणेश नाईकांवर ताशेरे ओढले इतकेच नव्हे तर याचिका गंभीरतेने घेत नसल्याने नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने गणेश नाईकांना दोन दिवसात […]
नगर परिषद व नगर पंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात, निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 664 उमेदवारी अर्ज
राज्यातल्या 246 नगर परिषदा व 42 नगरपंचायतींच्या रणधुमाळीला आजपासून सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी 664 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील उमेदवारांना उमेदवारी अर्ज व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगर परिषद व नगर […]
अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरे यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी; अजित पवार गटाकडून 17 जणांची नवी यादी
सोशल मिडियावरील वादग्रस्त भूमिकांनी पक्षाला अडचणीत आणणारे आमदार अमोल मिटकरी तसेच फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लक्ष्य करणाऱ्या रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पक्षाच्या प्रदेश प्रवत्ते पदावरून उचलबांगडी केली आहे. आज पक्षाने 17 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात […]
भाजपा, अजित पवार गटाकडून शिंदे गटाला ठेंगा
नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि अजित पवार गटाने महायुतीतील शिंदे गटाला ठेंगाच दाखविला आहे. अजित पवार गटाच्या समीर भुजबळ यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर महाजन यांनी नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत आवश्यक तेथे मैत्रिपूर्ण लढत देऊ, असे स्पष्ट केले. येवला, नांदगाव, मनमाडमध्ये ताकद नसल्याने शिंदे गटाला बरोबर घेण्याचा […]
नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्रित निवडणुका लढणार, पत्रकार परिषदेत घोषणा
शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, काँग्रेस हे सर्व विरोधी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढतील, अशी माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. भ्रष्ट आणि हुकूमशाही भाजपसह महायुतीला पराभूत करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. नाशिकच्या हॉटेल वैदेही येथे सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, राज्य संघटक विनायक पांडे, मनसे प्रदेश सरचिटणीस […]
‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाची मोहोर! 21 पैकी 20 व्या वेळा मिळवला विजयी बहुमान
राज्यस्तरीय 21 व्या आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले आहे. 5 ते 9 नोव्हेंबर दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 21 वेळा आयोजित केलेल्या या स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाने तब्बल 20 वेळा विजेतेपदाचा चषक पटकावला आहे. संगीत, […]
मुंबई विमानतळावर सहा ड्रग्ज तस्करांना अटक
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमा शुल्क विभागाने 6 ते 9 नोव्हेंबरदरम्यान धडक कारवाई करून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सहा प्रवाशांना रंगेहाथ पकडले. त्या तस्करांकडून 14 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय एका प्रवाशाकडून 358 ग्रॅम वितळवलेले सोन्याचे बारही जप्त करण्यात आले आहेत. 8 नोव्हेंबर रोजी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कारवाया केल्या.
भरधाव वेगातील डंपरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. निखिल कढरे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सुमित खैरनार आणि निखिल हे शनिवारी रात्री मालाड येथे गेले होते. तेथून परत येताना पठाणवाडी ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवरून भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. त्या धडकेत निखिल […]
निवृत्त लष्कर जवानास पोक्सो गुह्यात अटक
सेवानिवृत्त झालेल्या 59 वर्षीय लष्कर जवानाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी शीव इस्पितळात नेले होते. तेव्हा डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. अधिक चौकशीत शेजारी राहणाऱ्या काकांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये असे […]
कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेसाठी ज्योती सिंगकडे नेतृत्व वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चिलीतील सांतियागो येथे होणाऱ्या महिलांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी 20 सदस्यीय भारतीय महिला संघ जाहीर झाला असून या संघाचे नेतृत्व ज्योती सिंगकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना नामिबियाविरुद्ध 1 डिंसेबर रोजी तर दुसरा सामना जर्मनीविरुद्ध 3 डिंसेबर व तिसरा सामना आयर्लंडविरुद्ध 5 डिंसेबर [...]
Ratnagiri Crime News –रत्नागिरी हादरली! मांडवीत भररस्त्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार
रत्नागिरी शहरात थरकाप उडवणारी एक गंभीर घटना सोमवारी (10 नोव्हेंबर 2025) सायंकाळी मांडवी येथील भुतेनाका परिसरात घडली आहे. भररस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणावर मद्यधुंद हल्लेखोराने कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घडलेल्या घटनेनुसार, सायंकाळी भुतेनाका रस्त्यावर एक मद्यप्राशन केलेला तरुण हातात कोयता घेऊन फिरत होता आणि येणाऱ्या-जाणाऱ्या […]
अल्पवयीनाच्या बलात्कार प्रकरणी अटक
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये अल्पवयीन युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी तिच्याच एका नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी या युवतीवर कोलकत्याजवळील तारकेश्वर या स्थानी अतिप्रसंग करण्यात आला होता. ती रस्त्यावर तिच्या आजीसह झोपलेली असताना तिला पळविण्यात आले होते आणि नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. पहाटे चारच्या सुमारास हे अपहरण घडले होते. नंतर ही युवती [...]
दिल्लीतील स्फोटाच्या दुर्घटनेनंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया, म्हणाले की…
नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला. स्फोटानंतर तपास यंत्रणांनी तातडीने तपासाला सुरुवात केली असून हा दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट धक्कादायक; आदित्य ठाकरे यांच्याकडून खेद व्यक्त
नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला. स्फोटानंतर तपास यंत्रणांनी तातडीने तापसाला सुरुवात केली असून हा दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) […]
दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला, प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवली शक्यता
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर वर्तवली आहे. दरम्यान, स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेचा आढावा घेतला. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, i-20 कारच्या मागच्या भागात हा स्फोट झाला. स्फोटावेळी […]
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी, महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये भीषण स्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईतील संवेदनशील भागात गस्त आणि नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्थानके, […]
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट; पोलीस घटनास्थळी दाखल
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर परिसरातील तीन कारना भीषण आग लागली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनेत दोन ते तीन जण जखमी झाल्याची […]
घरात घुसून अज्ञात चोरट्यांकडून वृद्धेचा खून
सिंधुदुर्गात खळबळ ; कट्टा खालची गुरामवाडी येथील घटना कट्टा / वार्ताहर मालवण तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यानी रोहिणी रमेश गुराम (वय 65) या वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर चोरटे घटना स्थळावरून पसार झाले.दरम्यान, गंभीररित्या जखमी अवस्थेतील त्या महिलेला शेजारी व नातेवाईक [...]
रत्नागिरी नगर परिषदेसाठी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारापासून सुरुवात झाली आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर आहे.
Kolhapur News –मावळत्या सोनसळी किरणांचा श्री अंबाबाईला अभिषेक
दक्षिणायनमध्ये होणाऱ्या किरणोत्सवाच्या आज (10 नोव्हेंबर 2025) दुसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याच्या सोनसळींनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अभिषेक घातला. सूर्याच्या किरणांनी देवीचे मुख उजळून गेले होते. हेमाडपंती स्थापत्य शास्त्राचा हा अद्भुत सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा पाहून अनुभवला. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ आणि हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात […]
Ratnagiri News –कौटुंबिक वादातून पत्नीला संपवले, मग भूताने हत्या केल्याचा बनाव; आरोपी पतीला जन्मठेप
कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भूताने पत्नीची हत्या केल्याचा बनाव पतीने केला होता. मात्र पोलिसांनी सखोल तपास करत पतीचा बनाव उघडकीस आणला. यानंतर पतीला अटक करत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने निकाल दिला. गजानन जगन्नाथ भोवड असे आरोपी पतीचे नाव आहे. राजापूर […]
दापोलीत करवाढीचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी गुंडाळला; शिवसेनेच्या दणक्याचा परिणाम
दापोली नगर पंचायतीच्या विशेष सभेत करवाढीचा विषय चांगलाच गाजला. पाणीपट्टीसह विविध कर वाढविण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मांडताच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध केला. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर सत्ताधाऱ्यांना नमते घ्यावे लागले. शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे सत्ताधाऱ्यांना करवाढीचा प्रसत्वा गुंडाळावा लागला. दापोली नगरपंचायत विशेष सभा पार पडली. या सभेत शिवसेना (उद्धव […]
सगुनाताई आचार्य यांच्यासह शेकडो महिलांचा आ. पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या सगुनाताई आचार्य यांच्यासह शहरातील शेकडो महिलांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा कार्यक्रम धाराशिव येथील भाजप कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदरील पक्ष प्रवेश हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा प्रवक्ते ॲड.नितीन भोसले, भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष प्रितीताई कदम,भाजपा महिला माजी जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. हा पक्षप्रवेश युवा नेते कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून यावेळी शहरातील असंख्य महिलांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी प्रवेश करणाऱ्या महिलांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. पक्षप्रवेश वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई केंद्रे, वंदनाताई डोके, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगुनाताई आचार्य यांच्या सोबत प्रवेश करणाऱ्या प्रमुख महिलांमध्ये मनिषाताई गोवर्धन, वंदना तीते, लता आगळे, स्वाती कुलकर्णी, अलका महाजन, अनुताई मगर, चंद्रकला घोडके, अमृता पवार, मंजिरी चिंचपुरकर, आरती कुलकर्णी आदींचा समावेश आहे. या प्रसंगी आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की, “महिलांना सक्षम करण्याचे धोरण भारतीय जनता पक्षाचे असून पक्षात सर्वसामान्य महिलेलाही न्याय आणि सन्मान मिळतो. महिलांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत भाजपा त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवते. त्यामुळे भाजपा हा जनतेचा, विशेषतः महिलांचा, खरा पक्ष आहे.” कार्यक्रमात बोलताना सगुणाताई आचार्य म्हणाल्या की, “आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महिलांचे मोठे संघटन उभे राहात आहे. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटन भाजपा मजबूत करण्यासाठी तळागाळात काम करत आहे.” या प्रवेश सोहळ्यात युवा नेते कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महिलांच्या सक्रीय सहभागामुळे धाराशिव जिल्ह्यात भाजप आणखी बळकट होईल. पक्षाच्या विचारसरणीशी जोडलेली प्रत्येक महिला ही नव्या परिवर्तनाची दिशा ठरेल.” भाजपच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून झालेला हा प्रवेश सध्या धाराशिवच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण करणारा ठरत आहे.
अखिल भारतीय संस्कार भारती सर्वसाधारण सभा संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय संस्कार भारती सर्वसाधारण सभा महर्षी व्यास सभागृह रेशीमबाग नागपूर येथे दि. ८ व ९ नोव्हेंबर २०२५रोजी संपन्न झाली.या सभेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखिल भारतीय संस्कार भारती चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हैसुर मंजुनाथ ,राष्ट्रीय महामंत्री अश्विन दलवी ,विदर्भ प्रांत संस्कार भारती अध्यक्षा सौ.कांचन नितीन गडकरी , झाडीपट्टी नाटककार पद्मश्री परशुराम खुणे, मोझरीचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला . दोन दिवशीय सभेत सपुर्ण भारतातील राज्यातून अपेक्षित पदाधिकारी ४०० कला साधक उपस्थिती होती. यात प्रांतस्तरीय अध्यक्ष ,महामंत्री , कोष प्रमुख , संयोजक उपस्थित होते. ४ सत्रात सभा होऊन संघ गीतांचा नृत्या सह सांस्कृतिक कार्यक्रम,'पुर्ण विजय संकल्प हमारा'सामुहिक गीत गायन , कोषबाबत चर्चासत्र, बौद्धिक, विधानिहाय संयोजक गट चर्चाआदि बाबत चर्चा सत्रे होऊन वंदेमातरमने सांगता झाली . या सभेसाठी संघटन मंत्री अभिजीत गोखले , उपाध्यक्ष नितीश भारद्वाज , पूर्व अध्यक्ष वासुदेव कामत ,पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे , मान्यगण राष्ट्रीय पदधिकारी देवगिरी प्रांतातील अपेक्षित १४ पदाधिकारी पैकी देवगिरी प्रांत संस्कार भारती अध्यक्षा प्रा.स्नेहल पाठक , महामंत्री डॉ.जगदीश देशमुख ,सहमहामंत्री डॉ.सतिश महामुनी, कोषप्रमुख मोहन रावतोळे , सहकोषप्रमुख विधिज्ञ संजय घायाळ , मंचीय कला संयोजक जयंत शेवतेकर, दृश्य कला संयोजक कलाध्यापक शेषनाथ वाघ , धरोहर संयोजक दत्तप्रसाद गोस्वामी , लोककला संयोजक डॉ. मार्तंड कुलकर्णी उपस्थित होते . संस्कार भारती देवगिरी प्रांत निर्मित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त दैनंदिनी २०२५ - २०२६ प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ यांनी सस्नेह दिली.
छत्तीसगडमध्ये महिला माओवाद्याचे तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण
छत्तीसगडमधील बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) गटाच्या एका महिला सदस्याने सोमवारी तेलंगणामध्ये पोलिसांना आत्मसमर्पण केले. मुलुगु जिल्हा पोलिस अधीक्षक शबरिश पी यांच्याकडे या महिला माओवाद्याने आत्मसमर्पण केले. तेलंगणा सरकारने आदिवासी समुदायांसाठी राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी आणि विकास योजना तसेच आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या पुनर्वसन उपायांबद्दल जाणून घेतल्यानंतर महिलेने शस्त्रे सोडण्याचा निर्णय घेतला. तिने नक्षलवादाचा मार्ग सोडून शांततापूर्ण जीवन […]
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडणार; क्रीडा मंत्रालय उभारणार ‘स्पोर्ट्स सिटी’
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडून 102 एकरवर नवीन ‘स्पोर्ट्स सिटी’ बांधण्यात येणार आहे. कतार आणि ऑस्ट्रेलियाच्या आधुनिक मॉडेलवर क्रीडा मंत्रालय त्याचा विकास करणार आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करणे आणि राजधानीत जागतिक दर्जाचे क्रीडा केंद्र स्थापन करणे आहे, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक मोठा क्रीडा प्रकल्प […]
Satej Patil : क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्कातील 25 एकर जागा द्या ; आ. सतेज पाटील यांची मागणी
कोल्हापूर जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रस्ताव पुन्हा गतीमान कोल्हापूर : जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी कृषी विभागाची शेंडा पार्क येथील २५ एकर जागा उपलब्ध करावी, अशी मगाणी आ. सतेज पाटील यांनी केली आहे. हे निवेदन क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे व कृषिमंत्री दत्ता भरणे यांना [...]
पारंपारिक शेतीऐवजी नवीन वाट स्विकारली, निवृत्त सैनीकाने केला हळद लागवडीचा अनोखा प्रयोग
निसर्गाचा असमतोलपणा आणि खर्चिक होत चाललेल्या पारंपारिक शेती पिकांना फाटा देत हातीप येथील हितेश प्रकाश जांभळे या सेवानिवृत्त सैनिकांने आपल्या वयोवृध्द वडिलांच्या साथीने हळद लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी भाडे तत्वावर जमीन घेतली या जमिनीवर जिद्द मेहनत चिकाटीच्या जोरावर कष्ट उपसत त्यांनी मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली आहे. भारतीय सैन्य दलातून सेवा निवृत्त झाल्यानंतर […]
तरुणीने ब्लॅकमेल केलं! दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला जीवे मारण्याची धमकी
दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला एका अनोळखी तरुणीने वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत ब्लॅकमेल केलं. नंबर ब्लॉक केला असता दुसऱ्या नंबरवरून त्याला फोन करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सुद्धा 21 वर्षीय विपराज निगमने केला आहे. या प्रकरणी विपराज निगमने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, विपराज निगमसोबत हा सर्व प्रकार […]
Solapur : व्होळे ते वरवडे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी
व्होळे गावातील रस्त्याचे डांबर तीन महिन्यात उखडले! लऊळ : माढा तालुक्यातील व्होळे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामां नंबर १७ हा रस्ता बांधकाम विभाग २ सोलापूर यांच्याकडून डांबरीकरण व कॉक्रिट करण्यात आले आहे. परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याची माहिती समोर येत असून रस्त्याचे डांबर हे ३ [...]
निळी साडी, मोकळे केस अन् मादक नजर; सोशल मीडियावर ट्रेंड होणारी ‘ही’अभिनेत्री आहे तरी कोण?
निळी साडी, मोकळे केस अन् मादक नजर असणारी ही महिला सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तिचा हा सुंदर फोटो पाहून युजर्स ही महिला कोण हे सर्च करत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या तासात 3 लाख लोकांनी तिला सर्च केले आहे. ही दुसरी तिसरी कोणी नसून ही आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री. प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा हा फोटो […]
Solapur : सोलापूर व्यापाऱ्याची 41 लाखांची ऑनलाइन फसवणूक
डिजिटल अटक धमकीने सोलापूर व्यापाऱ्याची फसवणूक सोलापूर : सीबीआय इंडिया येथे गुन्हा दाखल असून तुम्हाला डिजिटल अटक केल्याचे सांगून सोलापुरातील व्यापाऱ्याची ४१ लाखांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी चार ते ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.२७ वाजण्याच्या [...]
कॉफी विथ करणमध्ये विराट-अनुष्का नाही येत, करण जोहरने सांगितले कारण
करण जोहरचा फेमस टॉक शो कॉफि विथ करणमध्ये अनुष्काने उपस्थिती लावली मात्र ती आपला नवरा विराट कोहलीला घेऊ आलेली नाही. यावर आता करण जोहर यांनीच खुलासा केला आहे. आता या घटनेचा खुलासा खुद्द करण जोहरने केला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ‘कॉफी विथ करण’मध्ये कधीच सहभागी झालेले नाहीत. नुकताच करण जोहर सानिया मिर्झाच्या पॉडकास्टमध्ये […]
Pandharpur : पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळपूजा संपन्न
श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभ मणी व मोत्यांचे अलंकार परिधान पंढरपूर : कार्तिकी एकादशी रविवार, २ नोव्हेंबर रोजी झाली. रविवार, ९ नोव्हेंबर रोजी मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा मंदिर समिती सदस्या अॅड. माधवी निगहे व शकुंतला नहगिरे यांच्या [...]
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील शांतता चर्चा अयशस्वी झाल्या आहेत. दोन्ही देशातील संबंध ताणले गेल्याने आता अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. व्यापार बंदी आणि अफगाण निर्वासितांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध करत त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. अण्वस्त्रसज्जतेचा टेंभा मिरवणार देश सध्या बटाटे, कांदे आणि टोमॅटो टंचाईशी सामना करत आहे, अशा […]
MCA च्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा कार्यभार अजिंक्य नाईक सांभाळणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन पदाधिकारी, अॅपेक्स कौन्सिल आणि टी-20 मुंबई गव्हर्निंग कौन्सिलच्या निवडणुका 12 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, भाजपचे प्रसाद […]
Solapur : औरादमध्ये श्री महादेव मंदिराचे भव्य कळसारोहण उत्साहात संपन्न
श्रीशैल व काशी पीठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते मंदिर समितीचे सत्कार by बिसलसिद्ध काळे सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील श्री महादेव मंदिरावर श्रीशैल पीठाचे डॉ. चन्नसिध्दाराम पंडिताराध्य व काशी पीठाचे डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य यांच्या उपस्थितीत कळसारोहणचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानिमित्त 5 ते 10 नोव्हेंबरदरम्यान दररोज [...]
Tarun Bharat Effect : कुडाळ-पाचगणी मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरू
तरुण भारत’च्या बातमीनंतर प्रशासनाकडे तत्काळ प्रतिसाद कुडाळ : ‘तरुण भारत संवाद मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘बांधकाम मंत्र्यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था’ या परखड बातमीचा प्रशासनावर तत्काळ परिणाम झाला आहे. या वृत्तानंतर जावळी तालुका बांधकाम विभागाने कुडाळ-पाचगणी शनिवारपासूनच मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक [...]
Satara News : वाहतूक कोंडीचा फलटणकरांना त्रास
फलटण शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात वाहतूक कोंडी गंभीर फलटण : फलटण शहरातील वाहतूक समस्यांचा प्रश्न गंभीर बनला असुन विशेषतः क्रांतीसिह नाना पाटील चौकात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे तासनतास वाहने रस्त्यावर अडकून पडत आहेत. छोटे मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत [...]
जम्मू आणि कश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी (एजीयूएच) संबंधित एका आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या कारवाईत दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत २,९०० किलोग्रॅम स्फोटके जप्त करण्यात आली आहेत वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने) गेले नऊ दिवस रत्नागिरी शहरातून परिवर्तन पदयात्रा काढून अनेक समस्यांना वाचा फोडली. या पदयात्रेची राजिवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात सांगता झाली. शहरातील खड्डेमय रस्ते, कचऱ्याचे ढिगारे, गटरांची दयनीय अवस्था, अपुरा पाणीपुरवठा, मोकाट गुरे, भटके कुत्रे आणि बंद पथदिप असे अनेक प्रश्न नागरिकांनी मांडल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते,माजी आमदार […]
Pandharpur news –कार्तिकी वारीत श्री विठ्ठल चरणी 5 कोटी 18 लाखांची देणगी
कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान केले. तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी दिली. कार्तिकी शुध्द 01 (दिनांक 22 ऑक्टोंबर) ते कार्तिकी […]
Satara News : कराडमध्ये राजेंद्रसिंह यादव शिवसेनेचे उमेदवार
संपर्क प्रमुख शरद कणसे यांची घोषणा कराड:नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. पालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. त्या वाटाघाटी सुरू राहतील किंवा स्वबळावर लढण्याचा निर्णय होईल. ती तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी व प्रचारास [...]
Satara |साताऱ्यात 99 वे मराठी साहित्य संमेलन हटके स्वरूपात होणार : ना. शिवेंद्रराजे भोसले
साताऱ्यातील साहित्यिक इतिहासात 99 वे संमेलन खास ठरणार सातारा : येथील राजधानीत भाऊसाहेब स्वागताध्यक्ष असताना 66 वे मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात झाले होते. तदनंतर 33 वर्षांनंतर 99 वे मी स्वागताध्यक्ष असताना होणार असल्याने मोठा योगायोग आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री ना.छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी [...]
महिला आरक्षण कधी लागू करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायालयाने सांगितले की, सरकारने हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की महिला आरक्षण कायदा लागू करण्याची वेळापत्रक काय आहे. संसदेने हा कायदा मंजूर केल्यानंतरही तो लागू करण्यात उशीर का केला जात आहे? असा सवालही कोर्टाने विचारला […]
डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कार जाहीर
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार वितरण सातारा – वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी दीपक गायकवाड ( पुणे ), प्रा.वृषाली मगदूम ( वाशी- मुंबई ), डॉ. देवकुमार अहिरे (पुणे) यांची निवड करण्यात [...]
तुळजापूर नगरपरिषद निवडणूकीसाठी 29 हजार 561 मतदार
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण 29 हजार 561 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. शहरात 35 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज स्वीकृतीपासून ते मतमोजणीपर्यंतची संपूर्ण यंत्रणा नळदुर्ग रोडवरील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स हॉलमध्ये उभारण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे,पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आदी उपस्थित होते. तहसीलदार बोळंगे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडला जाणार असून शहरासाठी 23 नगरसेवक निवडले जाणार आहेत. पत्रकार परिषदेस सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुबार आणि मयत मतदारांवरून गोंधळ मतदार यादीतील दुबार व मयत मतदारांबाबत विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना कडवे प्रश्न विचारले. यावर बोळंगे यांनी स्पष्ट केले की, मतदार नोंदणी, वगळणी आणि सुधारणा करण्याचा अधिकार फक्त भारतीय निवडणूक आयोगाकडे आहे. या उत्तरावरून काही काळ वातावरण तापले होते. खर्च मर्यादा नगराध्यक्ष पदासाठी 7 लाख 50 हजार रुपये, तर नगरसेवक पदासाठी 2 लाख 50 हजार रुपये इतकी निवडणूक खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.उमेदवारी अर्जासाठी खुल्या प्रवर्गाला 1 हजार रुपये तर महिला व राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये अनामत रक्कम ठरवण्यात आली आहे. मतदारसंख्या पुरुष 14,538, महिला 15,017, इतर 6, एकूण 29,561
मतदारसंघात 2 हजार कोटींचा निधी आणला- आमदार तानाजी सावंत
भूम (प्रतिनिधी)- जो महाराष्ट्रातील सत्ता उलटून टाकतो ? उलटू शकतो ? असा सहकारी तुमचा असताना 2024 मध्ये महाराष्ट्रातील 288 पैकी आपल्या मतदारसंघात दोन हजार कोटीचा निधी आणलेला असताना हे जनतेपर्यंत पोहोचू का शकलो नाही. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात संवाद बैठकीत बोलताना केले आहे. यावेळी दत्ता साळुंके, संजय गाढवे, संयोगिता गाढवे,अण्णासाहेब देशमुख, बाळासाहेब पाटील,बालाजी गुंजाळ,विशाल ढगे,युवराज हुंबे ,विशाल ढगे,अर्चना दराडे,प्रवीण देशमुख,निलेश चव्हाण,ज्ञानेश्वर गीते,रामकिसन गव्हाणे,यांच्या सहपदाधिकारी उपस्थित होते. सावंत पुढे बोलताना म्हणाले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना निधी दिला. दोन हजार कोटीचा निधी मंत्री असताना मतदारसंघांमध्ये मंत्रालयातून ताकद वापरून आणला. मी कमी मतांनी निवडून आलो मी नाराज होतो. ज्यांनी गद्दारी केली मी त्यांच्यावर नाराज होतो. शिवसैनिकावर नाराज नाही. आपल्याच लोकांनी गद्दारी केली. जे विरोधक होते त्यांना पक्षात तुम्हीच घेतलं त्यांना निधी दिला त्याच लोकांनी गद्दारी केली. शेतकरी संकटात असताना मी स्वतः मतदारसंघात येऊन सर्वांना कीट साहित्य वाटप केले. सहा कोटी रुपयांची मदत केली. जे आमदार, खासदार येत आहेत त्यांनी फक्त व्हिडिओ शूटिंग काढून लोकांना वाचवले एवढंच केले. मी माझ्या नेत्याला सांगून रेस्क्यू केले. हेलिकॉप्टर बोलावून लोकांचे जीव वाचवले. विरोधकांनी पाच रुपयाची तरी मदत केली का याचे मूल्यमापन झाले पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकच राष्ट्रवादी पक्ष असा आहे सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे वेगवेगळ्या नाहीत असे आमदार तानाजी सावंत यांनी सांगून पार्थ पवार बाबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार कुटुंब काहीच प्रतिक्रिया देत नाहीत असा टोलाही लगावला. यावेळी तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
पालक आठवडाभर ताजा राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जाते. परंतु अनेकदा बाजारातून पालक खरेदी केल्यानंतर, एक किंवा दोन दिवसांत पालक खराब होऊ लागतो. त्यामुळे तो फेकून द्यावा लागतो. पालक आठवडाभर ताजा ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात. पालक घरी आणताच, प्रथम पालकाची पाने नीट निवडून घ्या. खराब झालेले आणि पिवळे पान काढून टाका. पालक […]
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “आविष्कार- 2025“ चे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने महाविद्यालयीन स्तरावर आविष्कार -2025 या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रकल्पांचे परिक्षण महाविद्यालयाचे तज्ञ प्राध्यापक यांनी केले. यावेळी प्राचार्य विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रयोगाचे परिक्षण करताना ते म्हणाले, विद्यार्थांने नेहमीच नवनवीन समाजोयोगी संकल्पना असतात, त्यामुळे देशातील सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक समस्यांवर तोडगा निघतो. फक्त त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे असते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पना पुढे आल्या. हर्बल ड्रग प्रिपरेशन, कोरोना काळात पॅथॉलॉजी लॅबची गरज आणि त्यावर पडलेला अतिरिक्त ताण लक्षात घेता ऑनलाइन पॅथॉलॉजी लॅब ही एक नवीन संकल्पना विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोगातून मांडली.ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांना सामना करावा लागला. त्यादृष्टीने खेड्यातील शिक्षण पद्धतीसाठी ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर करून वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. अविष्कार 2025 मध्ये अंडर ग्रॅज्युएट मधील 12 विद्यार्थ्यांनी यश मिळवले, दीक्षा विकास मस्के, श्वेता व्यंकटेश कुलकर्णी, गायकवाड राजनंदनी राजेंद्र, सरपणे ओमकार विलास, पवन हनुमंत खुणे, ऋतुजा संतोष दराडे, आस्थासिंग पंकज राजपूत, इंगळे अभिषेक अनिल, थोरात आशिष रंगनाथ, फैजान रफिक शेख, सायली भारत साळुंखे, रयान युसुफ मोमीन,तर पोस्ट ग्रॅज्युएट मधील पाच विद्यार्थ्यांना यश मिळाले, अर्चना बाळासाहेब उदाणे, साकरते ऐश्वर्या, पवार अनुराधा, विद्या नंदकुमार शेलार, अंकिता शिंदे. या सर्व विद्यार्थ्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे अंतर्गत झोनल लेवल मध्ये निवड झाली आहे. येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी झोनल लेवल मध्ये अविष्कार 2025 मध्ये भाग घेऊन महाविद्यालयाची महाविद्यालयाचे नेतृत्व करणार आहेत. अविष्कार 2025 चे समन्वयक व डीन आर. एन डी.डॉ. सुशीलकुमार होळंबे, सह समन्वयक प्रा.रवींद्र गुरव, प्रा.डी. बी. ठाकूर, प्रा.डी. बी. भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.ए.के.पिंपळे, प्रा.व्ही. एस. बोंदर, डॉ.आर. बी. ननवरे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथांग परिश्रम घेतले परिश्रम घेतले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तेली समाज प्रतिनिधींची भेट
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेऊन तेली समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या “संत जगनाडे महाराज महामंडळा”ला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व या महामंडळाच्या माध्यमातून तेली समाजातील नवउद्योजक घडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी तेली समाजाचे युवा नेते व भाजप ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब घोडके यांनी केली. या भेटीत दादासाहेब घोडके यांनी तेली समाजासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांमधून अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या प्रसंगी तेली समाजाचे जिल्हा सचिव तथा माजी नगरसेवक ॲड. विशाल नाना साखरे, जिल्हा तेली समाज प्रसिद्धी प्रमुख कपिल नवगिरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यानंतर दादासाहेब घोडके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची देखील भेट घेतली. या भेटीत काटगाव जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून उमेदवारीच्या मागणीसंबंधी चर्चा करण्यात आली. त्यांनी समाजाच्या विश्वासास पात्र ठरवून कार्य केल्याचे सांगत आगामी निवडणुकीसाठी पक्षाकडून योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली. तेली समाजाच्या हक्कांसाठी व विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास दादासाहेब घोडके यांनी व्यक्त केला.
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीमहाविकास आघाडीत उमेदवार निश्चीतीला वेग !
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीची शिगेला पोहोचलेली तयारी आता महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांत जोर धरत आहे. दोन्हीकडील पक्षांनी उमेदवार निश्चीती, जागा वाटप आणि आर्थिक नियोजनावर गुप्त चर्चांचा वेग वाढवला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या तिन्ही पक्षांनी तुळजापूरमध्ये प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. बैठकीत जागा वाटप, उमेदवार निवड, प्रचार निधी आणि स्थानिक पातळीवरील समन्वय या मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय झाल्याचे सूत्रांकडून समजते. दुसरीकडे भाजपनेही आपली उमेदवार निश्चिती आणि आर्थिक तयारीला वेग दिला असून, महायुतीच्या एकूण रणनितीवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले जाते. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना त्यांच्या होमग्राउंडवर अडवण्यासाठी रणनीती आखत आहे. यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी सक्षम, स्थानिक उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी आघाडीत एकजूट राखण्यासाठी दोन पावले मागे घेण्याची तयारी दाखवली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसने राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेनेसोबत प्राथमिक बैठक पार पाडून संभाव्य उमेदवार व खर्च तयारीचा आढावा घेतला आहे. मात्र या बैठकीत नेमके काय ठरले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते प्रथम पक्षांतर्गत चर्चा पूर्ण करूनच अंतिम बैठकीस बसणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय अंतिम बैठक लवकरच होणार असून जागा वाटप जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, तुळजापूर नगरपरिषद क्षेत्रातील काही प्रमुख प्रभागावर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) इच्छुक आहेत. त्यामुळे आघाडीतील जागावाटप निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, भाजपनेही गुरुवारी झालेल्या बैठकीत आपली रणनीती आखून प्रचार मोहिमेची दिशा ठरवली आहे. दोन्ही आघाड्यांतील हालचालींमुळे तुळजापूर नगरपरिषद निवडणूक चुरशीची आणि अत्यंत रोचक होण्याची चिन्हे आहेत.
नळदुर्गमध्ये परत एकदा कोट्यावधीची सोन्याची चोरी
नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेतून शाखेतीलच कर्मचाऱ्याने कट रचून सुमारे दोन कोटी 63 लाख 63 हजार 272 रुपयेचे तारण ठेवलेले सोने चोरुन नेल्याची घटना दि. 7/11/2025 च्या सांयकाळी सहा वाजले पासून ते दि. 8/11/2025 च्या रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटने मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची फिर्याद शाखाधिकारी उमेश भानुदास जाधव यांनी पोलिस ठाण्यात दिल्याने पतसंस्थेचे कर्मचारी राहूल राजेंद्र जाधव यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नळदुर्ग च्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी असून यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या बाबत पोलिस सुत्रा कडून समजलेली माहीती अशी की, दिशा नागरी सहकारी पतसंस्थेतील लिपीक पदावर काम करीत असलेला कर्मचारी राहूल राजेंद्र जाधव याने संगनमत करुन त्याच्या पदाचा दुरुपयोग करुन त्याचा मित्र सुशील राठोड यासह इतर दोघे जण आपसात कट रचून दि. 7 नोव्हेंबर च्या सायंकाळी सहाच्या ते दि. 8 नोव्हेंबर च्या रात्री दोन वाजे पर्यंत शाखेच्या मुख्य शटरचे लॉक चावीने उघडून आत प्रवेश करुन आत मधील तिजोरीतील एकूण दोन त्रेसष्ठ कर्जदाराचे दोन कोटी 61 लाख 42 हजार सत्तावीस रुपयेचे कर्ज रक्कमेसाठी तारण ठेवलेले चार किलो 762 ग्रॅम 679 मिली वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख 23 हजार 737 रुपये पैकी दोन लाख 21 हजार 245 रुपये असे एकूण दोन कोटी त्रेसष्ठ लाख त्रेसष्ठ हजार 272 रुपयेचा मुददेमाल चोरुन नेला आहे. दरम्यान उमेश जाधव यांच्या फिर्यादीवरुन राहूल राजेंद्र जाधव, सुशील राठोड व इतर दोन अनोळखी असे चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक रितू खोखर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक इज्जपवार पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे जिल्हा पोलिस अधिक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळंखे, आनंद कांगुने, पोलिस उपनिरीक्षक संतोष गिते, ईश्वर नांगरे यांनी घटना स्थळी भेट देवून पहाणी केली.
धाराशिव जिल्हा शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनिल नागणे, सचिव संतोष कदम
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनिल नागणे (तुळजापूर) तर सचिवपदी संतोष दत्ता कदम (कळंब) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सोपानराव शेजवळ यांनी निवडीचे पत्र नूतन अध्यक्ष नागणे व कदम यांना दिले आहे. शस्त्रांग मार्शल आर्ट खेळाचा प्रचार प्रसार करणे, शासनाच्या माध्यमातून जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणे, मुलींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आयोजित करणे असा मानस नवनियुक्त अध्यक्ष सुनिल नागणे यांनी व्यक्त केला. तसेच संघटनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून उत्कृष्ट खेळाडू घडविणार असल्याचेही नूतन जिल्हाध्यक्ष नागणे यांनी सांगितले. या निवडीचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे यांनी तसेच तुळजापूर, कळंब तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.
कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीसांची शाळेस भेट
धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग स्कीम अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- अमृता पटाईत,पोलीस उप निरीक्षक जाकिर पटेल, पोलीस हावलदार तेलप, पवार तसेच महिला पोलीस हावलदार- सोनाली जाधव, महिला पोलीस नाईक रोहिणी धुमाळ, पिंक पथक बीट अंमलदार संजय राठोड, वैशाली कोरे, आकाश सुरनर यांचेसह पोलीस पथकाने सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे भेट दिली. त्यावेळी शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींना पोलीसांविषयी समज-गैरसमज, वाहतुकीचे नियम, बाललैंगिक अत्याचार, भारतीय न्याय संहिता व पोक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबधित असेलेल्या कलमाबाबत, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, 1098, सायबर गुन्हे, सायबर आवरनेस तसेच सोशल मिडियां विषयांच्या गुन्हा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. सदर भेटी दरम्यान शाळेचे सरस्वती विद्यालय शाळेचे 925 विद्यार्थी, मुख्याध्यापक वडणे, शिक्षक वृंद, कर्मचारी माजी सरपंच दत्ता वडणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थितीत होते.
यंत्रणांनी विविध प्रकल्प व विकास कामे विहित मुदतीत पूर्ण करावी- पालक सचिव अंशू सिन्हा
धाराशिव(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. दरडोई उत्पन्न देखील वाढले पाहिजे. आकांक्षित जिल्ह्याची ओळख मिटवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील विविध प्रकल्प आणि विविध विकासकामे यंत्रणांनी मुदतीत पूर्ण करावी.असे निर्देश वस्त्रोद्योग, सहकार व पणन विभागाच्या प्रधान सचिव तथा पालक सचिव श्रीमती.अंशू सिन्हा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 7 नोव्हेंबर रोजी विविध यंत्रणांचा आढावा घेताना श्रीमती सिन्हा बोलत होत्या. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश काळे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती सिन्हा म्हणाल्या की,जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांचे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे. कोणताही बाधित हा मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. संबंधितांच्या बँक खात्यात शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वेळेत जमा करण्यात यावी.शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दयावे.जिल्ह्यातील शेतकरी हा मोठ्या प्रमाणात रेशीम शेतीकडे वळला पाहिजे, यासाठी चालना देण्यात यावी.तसेच मागील वर्षी पडलेल्या अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या अनुदानाची मदत वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेत जमा करावी. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे प्रलंबित असल्यामुळे मदत करता आलेली नाही,त्या शेतकऱ्यांची पोर्टलवरील प्रलंबित ई-केवायसी त्वरित पूर्ण करावी,असे श्रीमती.सिन्हा म्हणाल्या. जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी ज्या गावातील शेतकऱ्यांचे भूसंपादन करावयाचे आहे,त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना भूसंपादनासाठी प्रोत्साहित करावे,असे सांगून श्रीमती सिन्हा म्हणाल्या की,त्यामुळे राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.श्री जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रलंबित असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी.जिल्ह्यातील कोणताही शेतकरी हा ॲग्रीस्टेक नोंदणीपासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे.भविष्यात सर्व कृषी योजनांचा लाभ ॲग्रीस्टेक क्रमांकाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी जिल्ह्यात सप्टेंबर-2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीची मदत वाटपाची माहिती दिली. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमा, अतिवृष्टीमुळे 2109 विहिरींचे नुकसान झाले असून 1397 विहिरी ह्या पूर्णतः खचून अथवा वाहून गेलेल्या आहेत व 712 विहिरींचे अंशतः नुकसान झाले असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या आणि विविध विकासकामांच्या सद्यस्थितीबाबतची माहिती श्री.पुजार यांनी यावेळी दिली. या बैठकीत उपस्थित विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्प व विकासकामांच्या प्रगतीबाबतची माहिती यावेळी दिली.
बिहारमध्ये इतिहास घडणार! जनता बदल घडवणार; तेजस्वी यादव यांचा विश्वास
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी राजद नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एनडीए सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी भाजप आणि बिहारमधील सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले. तेजस्वी यादव म्हणाले की, या सरकारच्या २० वर्षात बिहारमध्ये गरिबी, बेरोजगारी आणि स्थलांतर सर्वाधिक वाढले आहे. एकही कारखाने उभारले गेले नाहीत, उद्योग सुरू झाले नाहीत आणि […]
डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडी बद्दल सत्कार
धाराशिव(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) धाराशिव जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांनी शनिवार 8 नोव्हेंबर रोजीत्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन सत्कार केला. डॉ. शहापूरकर म्हणाल्या की, “डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून सार्थ निवड झाली आहे.ही निवड समविचारी पक्षांना बळकट करणारी आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”या वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक काळात प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - 2025 कार्यक्रम जाहीर केला आहे.नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात 4 नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक काळात विविध प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. आज 8 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने आयोजित कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या बैठकीत श्री.पूजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोखर,सहाय्यक जिल्हाधिकारी रवैयाह डोंगरे व नगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक्त श्री.ढेंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पूजार पुढे म्हणाले की,निवडणूक काळात परवाना असलेली शस्त्रे जमा करून घ्यावी.निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.सुरक्षाविषयक बाबींचा आढावा नियमित घेण्यात यावा.मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसराची आखणी करण्यात यावी.या परिसरात आवश्यक तो प्रतिबंध करण्यात यावा.मतदान केंद्राच्या 200 मीटर बाहेर उमेदवारांचे बुथ असले पाहिजे,याची दक्षता घ्यावी.संयुक्त भेटी देऊन कुठेही उणीव राहणार नाही याबाबत जबाबदारी घ्यावी.मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे,त्या स्ट्राँग रूमला व परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा.तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे.मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर कोणाला प्रवेश राहणार आहे,याची माहिती स्थानिक पातळीवर द्यावी.त्यामुळे संभ्रम राहणार नाही असे ते म्हणाले. खोखर म्हणाल्या,निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहावी.निवडणुकीच्या संदर्भाने तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.दारू व पैशाचा वापर या काळात होणार नाही, याची दक्षता घ्यावी.गावठी पिस्तूल व तलवारीचा निवडणूक काळात कोणाकडूनही वापर होणार नाही,यासाठी धाडसत्र राबवून ते जप्ती कारवाई करण्यात यावी.निवडणुकीसाठी लागणाऱ्या पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक पोलीस मनुष्यबळाची मागणी करावी.सर्व पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक ते शस्त्रास्त्रे व साहित्य उपलब्ध करून घ्यावे,ही निवडणूक निर्भय व शांत वातावरणात पार पाडावी,असे त्या म्हणाल्या. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार,नगरपरिषदा व नगरपंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते.यावेळी संबधित अधिकाऱ्यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.
महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून काँग्रेसचे आंदोलन, वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न
फलटणमध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केली होती. या महिलेने हातावर एका पोलीस अधिकाऱ्याचे आणि माजी खासदाराचाही उल्लेख केला होता. या प्रकरणी महिलेला न्याय मिळावा म्हणून काँग्रेसने मुंबईत आंदोलन केले आहे. युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. नरिमन पॉईंटवर […]
तुम्हीही या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का?
रेफ्रिजरेटर हा आजच्या लाईफस्टाईलमध्ये खूप गरजेचा भाग झालेला आहे. असे असले तरी काही भाज्या या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने, नुकसान होऊ शकते. त्यामुळेच अशा भाज्या या रेफ्रिजरेटरबाहेर ठेवणे अधिक उत्तम. कोणत्या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत ते जाणून घ्या. बटाटे थंड तापमानात ठेवल्याने त्यांचा स्टार्च साखरेत बदलतो, ज्यामुळे त्यांची चव बदलते आणि शिजवल्यावर ते गोड होतात. बटाटे जास्त […]
Sangli Crime : रसिका कदम खून प्रकरणात आणखी दोघांना अटक
ईश्वरपूरमध्ये हत्येचे थरारक प्रकार ईश्वरपूर : बहे नाका परिसरातील रसिका मल्लेश कदम (३५ मुळ रा. उटगी ता. जत) या महिलेचा तिचा प्रियकर तुकाराम शंकर वाटेगावकर (३८ रा. बोरगाव) याने एकट्यानेच गळा आवळून खून केला. त्यानंतर अन्य दोन साथीदारांच्या मदतीने मृतदेह व ज्युपिटर गाडी [...]
पर्यटनासाठी ‘आयर्नमॅन’सारख्या स्पर्धा आवश्यक : मुख्यमंत्री
पणजी : आयर्नमॅन स्पर्धेमुळे काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी पर्यटन वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात म्हणून त्यास विरोध करु नका, तर सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. पणजी येथे आयर्नमॅन 70.3 या नामांकीत आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे गोवा जागतिक [...]
‘इफ्फी’ स्पर्धा विभागात 15 चित्रपट
गोल्डनपिकॉकसहतब्बल1 कोटीचीबक्षिसे पणजी : राजधानी पणजीत होणाऱ्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपट यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात एकूण 15 चित्रपट असून 12 आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तर 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट म्हणजे उत्कृष्ट कलाकृती असून जागतिक स्तरावरील विविध समस्यांचे प्रतिनिधित्व त्यातून समोर येणार आहे. या महोत्सवातील विविध स्पर्धा, [...]
हिरव्या मिरच्या महिनाभर टिकवण्यासाठी या सोप्या टिप्स अमलात आणायलाच हव्यात, वाचा
स्वयंपाकघरात हिरव्या मिरच्या जवळजवळ दररोज वापरल्या जातात. भाज्यांमध्ये मसाले कमी प्रमाणात हवे असल्यास, हिरव्या मिरचीचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. हिरव्या मिरच्या या आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहेत. अनेकदा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतरही, हिरव्या मिरच्या लवकर खराब होतात किंवा सुकतात. हिरव्या मिरच्या अधिक काळ टिकण्यासाठी काही टिप्स अमलात आणायला हव्यात. अंडी अधिक काळ टिकावी म्हणून काय करायला […]
Miraj Crime : मिरजेतून चालणाऱ्या हनी ट्रॅपमध्ये अडकले सांगली, कोल्हापूरचे तरुण
तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याचा संशय, शहर पोलिसात तक्रार दाखल मिरज : सोशल मिडीया अकौंटवरुन तरुणांना जाळ्यात ओढत मिरजेतील एका भामट्या महिलेने हनीट्रॅपद्वारे लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधीत भामट्या महिलेच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील एका तरुणाने मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधीत महिलेच्या सोशलमिडीया अकाऊंटच्या प्रोफाईलवरुन गुन्हा दाखल केला आहे. [...]
वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे याबाबतचा चौकशी अहवाल आला असून पोलीस महासंचालकांना हा चौकशी अहवाल पाठवला जाणार आहे. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री गस्तीवर असताना राकेश जाधव यांनी चिमूर येथील हजारे पेट्रोलपंपासमोर वाळू […]
आलेमाव कुटुंबाच्या गुंडाराजला भाजपचा पाठिंबा
आमदारव्हेंझीव्हिएगशयांचाआरोप: वाळूचेढिगारेहटवूनरस्ताकरण्याच्याकामाचापर्दाफाश मडगाव : बाणावलीतील आपचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी झालोर-फात्राडे सीमेवर वॉरन आलेमाव यांच्या मालकीच्या जेसीबीद्वारे बेकायदेशीररित्या नैसर्गिक वाळूचे ढिगारे हटवून रस्ता करण्याच्या कामाचा पर्दाफाश केला आहे. सदर काम कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय सुरु होते. याची माहिती मिळताच जेव्हा आप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना बोलावले. त्यावेळी आलेमाव कुटुंबाशी संबंधित गुंडांनी [...]
बाणावली आमदारांकडून सुसंवादाऐवजी गुंडगिरीला प्रोत्साहन
मडगाव : बाणावली मतदारसंघातील आमदारांना वार्का आणि फात्राडेच्या लोकांनी उघडे पाडले असून वार्कामध्ये जे घडत आहे ती लोकशाही नाही, ते दिवसाढवळ्या गुंडाराज आहे. प्रामाणिक, कष्टाळू गोमंतकीयांना फक्त त्यांच्या पायावर उभे राहिल्याबद्दल धमकावले जात आहे, त्यांच्यावर हल्ला केला जात आहे आणि दहशत निर्माण केली जात आहे. जेव्हा एक निवडून आलेला प्रतिनिधी, स्वयंघोषित ‘सोशल मीडिया आमदार’ व्हेंझी [...]
पणजीत भाज्यांच्या दरात चढउतार,घरगुती बजेटवर ताण
पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात सातत्याने चढउतार सुरु आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांचे घरगुती बजेट कोलमडले आहे. कांदा, बटाटा, टोमॅटो यांसारख्या दैनंदिन वापराच्या भाज्यांच्या किंमतीत वारंवार होणाऱ्या बदलामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात फरक पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिकिलो 50 रुपये असलेले [...]
अलार्म वाजला, पण ती उठलीच नाही…आंध्र प्रदेशमधील 23 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत रहस्यमय मृत्यू
अमेरिकेतील टेक्सास येथे एका 23 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. राजलक्ष्मी यार्लागड्डा असे मयत मुलीचे नाव असून ती मूळची आंध्र प्रदेशमधील रहिवासी होती. टेक्सास येथे ती ए अँड एम युनिव्हर्सिटी-कोर्पस क्रिस्टी येथून पदवीचे शिक्षण घेतले होते. सध्या ती नोकरीचा शोध घेत होती. मात्र 7 नोव्हेंबर 2025 रोजी ती अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. बातमी अपडेट […]
Miraj : कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसतोडणीला वेग; मात्र दराची संभ्रमावस्था
कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसतोडणी सुरू कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसतोडणी जोरात सुरू असून दररोज शेकडो टनांची ऊस वाहतूक सुरू आहे मात्र ऊस दराबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून ऊस दराकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे. टेंभू आणि म्हैसाळ योजनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. विशेषतः म्हैसाळ [...]
दिल्लीत खळबळ! जंतर- मंतरवर आंदोलकाने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं; पोलिसांकडून तपास सुरू
राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. दिल्लीच्या जंतर मंतरवर सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने स्वत:लाच गोळी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती एक आंदोलक असून तो येताना सोबत पिस्तूल घेऊन आला होता. हा व्यक्ती जंतर-मंतरवर […]
Sangali News:महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखाची फसवणूक
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक सांगली: महापालिकेत कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाची ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनायक मुरलीधर शिंदे (वय ४१, रा. पेठभाग, गवळी गल्ली, सरकारी तालीमजवळ, सांगली) यांनी [...]
आपल्याला अपेक्षित निकाल न दिल्यास न्यायाधीशांवर निंदनीय (Scandalous) आरोप करण्याची वाढती प्रवृत्ती अत्यंत खेदजनक आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सोमवारी आपली नाराजी व्यक्त केली. २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश एन. पेड्डी राजू प्रकरणात न्यायालयीन अवमान (Contempt of Court) युक्तिवादावर सुनावणी करत होते. या प्रकरणात राजू यांनी तेलंगणा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मौशमी […]
Miraj : पालकांचा सांभाळ न करणाऱ्यांना संपत्तीचा हक्क नाही ; मिरज प्रांताधिकाऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय
सांभाळ न करणाऱ्या मुलीला दिलेलं घर परत आईच्या नावे सांगली : हरिपूर (ता. मिरज) गावातील वयोवृद्ध सुरेखा सुहास रामचंद्रे यांनी आयुष्यभर मुलांच्या प्रेमात स्वतःला झोकून दिलं. पतीच्या निधनानंतर २०१६ साली त्यांनी आपल्या मुलींपैकी एकीवर विश्वास ठेवत राहते घर आणि मालमत्ता बक्षीसपत्राने तिच्या नावावर केली. “माझी [...]
Prakash Abitkar : भीती…धाकधुक…आणि जल्लोष !
पॅराग्लायडिंगचा जिल्ह्यात भुदरगडमध्ये पहिल्यांदाच उपक्रम byअनिल कामीरकर गारगोटी : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पॅराग्लायडिंगचा उपक्रम भुदरगड किल्ल्यावर वन विभागाच्यावतीने सुरू करण्यात आला, काहीशी भीती तर मनात थाकधुक अशा वातावरणात कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून आकाशात झेप घेऊन किल्ले भुदरगडचा फेरफटका मारला, मात्र भीतीने धास्तावलेल्या कार्यकर्ते आणि पर्यटकांनी पालकमंत्री आबीटकर जमिनीवर स्थिरावताच त्यांना गराडा [...]
नांदेडहून मुंबई, गोव्यासाठीची विमानसेवा पुन्हा एकदा लांबणीवर, श्रेय घेणार्यांचे झाले हसे
>> विजय जोशी, नांदेड मध्यंतरीच्या काळात विमानतळ दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आल्यानंतर ऐन मोसमात नांदेडहून सुटणार्या चार विमानसेवा बंद पडल्या. आता 15 नोव्हेंबरपासून नांदेड-मुंबई, नांदेड-गोवा अशा विमानसेवा सुरू होणार असे उर बडवून सांगणार्या भाजपच्या नेत्यांचे हसे झाले असून, अनिश्चित काळासाठी ही विमानसेवा आता लांबणीवर पडणार आहे. नांदेडचे विमानतळ सध्या औद्योगिक विकास महामंडळाने रिलायन्सकडून ताब्यात घेतले […]
उत्तम आरोग्यासाठी मासांहरींनी आहारात हे समाविष्ट करायलाच हवे, वाचा
मासांहरी लोकांसाठी मासे हा एक आरोग्यवर्धक पर्याय मानला जातो. आपल्या आहारामध्ये मासे समाविष्ट करणे हे खूप लाभदायक आहे. आहारामध्ये मासे खाल्ल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. माशांमध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूपच हितावह असल्याचे आता सिद्ध झालेले आहे. आठवड्यातून दोनदा मासे खाल्ल्यास पक्षाघाताचा धोकाही खूप मोठ्या प्रमाणावर कमी होतो. […]
युवकांना, महिलांना सहकारक्षेत्रात प्रोत्साहन द्यावे
मुख्यमंत्रीडॉ. प्रमोदसावंतयांचेआवाहन, पेडणेयेथेसहकारभारतीचेआठवेअधिवेशनउत्साहात पेडणे : नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत आणि विकसित गोवा 2037 स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी सहकार भारतीने सहकाराच्या माध्यमातून प्रयत्न करावे. त्यासाठी गोव्याच्या सहकार क्षेत्रात युवक आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश करावा, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले पेडणे येथे आयोजित केलेल्या सहकार भारती गोवाचे आठव्या अधिवेशनाचे उद्घाटन [...]
एक मिनिटाच्या उशिराने 50 हून अधिक जणांची परीक्षा हुकली, रोहित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विविध पदांसाठी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत. यामध्ये पुण्यातील रामवाडी येथील TCS ION केंद्रांवर एक मिनाटाचा उशीर झाल्याने परीक्षार्थिंना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्ट टॅग करत विनंती केली आहे. आपल्या पोस्टमध्ये […]
Kolhapur : राजापूर परिसरात उसाला आग; 12 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
राजापूर शिवारात उसाच्या शेतात भीषण आग कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील राजापूर परिसरात उसाला लागणाऱ्या आगीचे सत्र सुरूच असून, पुन्हा एकदा आगीच्या तांडवाने सुमारे १२ एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना राजापूरवाडी रस्त्यालागत गट क्र. ४१८ ते २४३ या शिवारात घडली. दुपारी एकच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना अचानक आग लागली. [...]
कुर्टी पंचायतीच्या नवीन इमारतीला स्व.रवी नाईक यांचे नाव द्यावे
कुर्टीखांडेपारग्रामसभेतठरावसंमत: विविधप्रश्नांवरचर्चा फोंडा : कुर्टी – खांडेपार पंचायतीच्या हाऊसिंग बोर्ड येथे होणाऱ्या नवीन प्रशासकीय इमारत प्रकल्पाला फोंड्याचे दिवंगत आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला. सरपंच नावेद तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत अकरापैकी दहा पंचसदस्य उपस्थित होते. सभेत केवळ चारच लेखी प्रश्न आले व [...]
जागतिक मराठी संमेलनाची पणजीत सभा
पणजी : जागतिक मराठी अकादमी मुंबईतर्फे 21 वे जागतिक मराठी संमेलन 2026 पणजीच्या कला अकादमी सभागृहात जानेवारी च्या 9, 10 व 11 असे तीन दिवस भरवले जाणार आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेसाठी हे संमेलन भरवले जाणार आहे. या संमेलनाच्या आयोजन समितीची सभा शनिवार 8 रोजी इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाच्या सभागृहात समितीचे कार्याध्यक्ष दशरथ परब यांच्या [...]
हजारो पालीवासीयांचे आरोग्य धोक्यात
बेशिस्त नागरिकांमुळे तीर्थक्षेत्र पाली शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. घंटागाड्यांची सुविधा असूनही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असल्याने रस्त्यांना डम्पिंगचे स्वरूप आले आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले असून तेथे घूस, डास व भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पावसामुळे रस्त्यावरील कचरा कुजला असून शहरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालीतील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी […]
इफ्फीत प्रदर्शित होणार कोकणी चित्रपट ‘क्लावडिया’
मडगाव : 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यात होणार आहे. या महोत्सवात राजेंद्र तालक यांनी लिहिलेला, निर्मित आणि दिग्दर्शित केलेला कोकणी चित्रपट ‘क्लावडिया’ भारतीय पॅनोरामा-विशेष सादरीकरण विभागांतर्गत प्रदर्शित केला जाणार आहे. राजेंद्र तालक यांचा हा आठवा कोकणी चित्रपट आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्यांचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट भारतीय पॅनोरामामध्येप्रदर्शितझालेआहेतकिंवाआंतरराष्ट्रीयचित्रपटमहोत्सवात(इफ्फी) प्रीमियरझालेआहेत. [...]
रायगड जिल्ह्यातील धरणांची कामे रखडली; धो-धो पाऊस पडूनही पाणीटंचाई भेडसावणार
रायगड जिल्ह्यातील किनेश्वरवाडी, लोहारखोडा, कोतवाल तसेच कोंढवी हे धरण प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून लटकले आहेत. विशेष म्हणजे या सर्व धरणांवर शेकडो कोटींचा चुराडा करूनही उर्वरित निधी न मिळाल्याने त्यांची रखडपट्टी झाली आहे. या सर्व प्रकल्पांची बांधकामे ठप्प असल्याने दरवर्षी दक्षिण रायगड जिल्ह्यातील अनेक गावांतील हजारो नागरिकांना जानेवारी महिना उजाडताच हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सरकारच्या […]
पालीच्या एसटी तिकीट स्थानकातील आरक्षण खिडकी बंद
एसटी स्थानकातील तिकीट आरक्षण खिडकी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे. प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंग करावी लागत असून अनेक प्रवाशांना दलालांच्या मध्यस्थीने तिकीट आरक्षित करावे लागते. आरक्षणासाठी दलाल जास्त पैसे उकळत असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. आधीच एसटी स्थानकाची दुरवस्था त्यात आरक्षण मशीन बंद पडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. […]
डिचोलीत पाण्याविना लोकांची गैरसोय
तीनदिवसलोकांचेहाल, दुरूस्तकेलेलीजलवाहिनीदोनवेळाफुटली, आमदारशेट्योंकडूनपाहणी डिचोली : नाईकनगर बोर्डे डिचोली येथे मोठी जलवाहिनी दुसऱ्या जागी हलविण्याचे काम चालू असून काम पूर्ण केल्यानंतर तीनवेळा दुऊस्त केलेली जलवाहिनी फुटली. त्यामुळे डिचोली शहराबरोबरच आजूबाजूच्या परिसरामध्ये गेले तीन दिवस पाणीपुरवठा ठप्पच आहे. त्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. तरीही पाणीपुरवठा विभागातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने किही प्रमाणात लोकांना दिलासा मिळाला आहे. [...]
तीनदिवसांचीन्यायालयीनकोठडी पणजी : समुद्र किनारी आणि इतर पर्यटक स्थळावर पर्यटकाना विविध सुविधांचे आमीष दाखवून लुटणे तसेच पर्यटकांची छळवणूक करणाऱ्या दलालांवर कळंगुट पोलिसांनी कडक कारवाई करणे सुऊ केले आहे. कळंगूट समुद्र किनारी गस्त घालून 13 दलालांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. सर्वंना न्याय दांधिकाऱ्यांसमोर हजर केले असता तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती [...]

25 C