…तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू! SIR बाबत सर्वोच्च न्यायालयाचे मत, निवडणूक आयोगाकडून मागवले उत्तर
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षणाला (SIR) आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निवडणूक आयोगाकडून (EC) उत्तर मागवले आहे. याबाबतच्या याचिका द्रमुक, सीपीआय(एम), काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्यांनी दाखल केल्या होत्या. न्यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राजकीय पक्षांनी या प्रक्रियेला घाबरू नये. जर आम्हाला काही […]
फरिदाबादमध्ये अटक केलेल्या डॉ. शाहीनबद्दल धक्कादायक माहिती उघड, जैश-ए-मोहम्मदच्या होती संपर्कात
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानात असल्याचे समोर येत आहे. फरिदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहीन शहीदबाबत सुरक्षा यंत्रणांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. डॉ. शाहीन यांना भारतात जैश-ए-मोहम्मदची महिला संघटना “जमात-उल-मोमिनीन” च्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. हिंदुस्थानात महिलांची भरती करणे, ब्रेनवॉश करणे आणि त्यांचे ऑपरेशनल नेटवर्क स्थापित करणे […]
Solapur Crime : सांगोला भागातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई
पंढरपूर पोलिसांचा छापा; 45 जुगारपट्ट्यांविरुद्ध गुन्हा दाखल पंढरपूर : ऐन नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाने व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगोला तालुक्यातील कोळा या गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून एक कोटी १९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. [...]
Delhi Blast –दिल्ली स्फोटाचा तपास NIAकडे, गृहमंत्रालयाचा निर्णय
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाचा तपास गृहमंत्रालयाने NIAकडे सोपवला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जखमी झाले. याशिवाय स्फोटात आसपासच्या अनेक वाहनांनाही आग लागली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (UAPA), 1967 च्या कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये आढळलेल्या जैश-ए-मोहम्मद (जेईएम) […]
कळंब नगर परिषद निवडणुक ; दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही
कळंब (प्रतिनिधी)- कळंब नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. नगर परिषद क्षेत्रातील २० ,९ ५८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यात १०७१३ पुरुष, १०२४५ महिला मतदार आहेत. मतदानासाठी शहरात २४ ठिकानी मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. नामनिर्देशन दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असली तरी दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर, छाननी १८ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची मुदत १९ ते २१ नोव्हेंबर, चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर, मतदान २ डिसेंबर, आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता होईल. या निवडणुकीत १० प्रभागांमधून प्रत्येकी दोन सदस्य निवडले जातील, म्हणजे एकूण २० नगरसेवक निवडले जातील. तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी खर्च मर्यादा ७ लाख ५० हजार, नगरसेवकपदासाठी २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. उमेदवारांनी दररोजचा खर्च निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येईल, तसेच सेतू सेवा केंद्रे आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सभा रेकॉर्डिंग करण्यासाठी व्ही .एस .टी . तीन पथक चेक पोस्ट साठी एफ . एस . टी .तीन पथक , धाड पथक एस . टी . टी . तीन पथक असे एकूण नऊ पथकाची निर्मिती या नगरपरिषद निवडणुकीसाठी करण्यात आलेली आहे . शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात फक्त दोन व्यक्तींना प्रवेश असेल. निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत ढोकले,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मंजुषा गुरमे ,अजित काकडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि मतदानाचा हक्क बजवावा.
Solapur : पहिल्या दिवशी अर्जदारांची अनुपस्थिती; मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक चर्चेत
मंगळवेढा निवडणूक अर्ज प्रक्रियेत उशीर मंगळवेढा : नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोमवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी मंगळवेढा नगरपरिषदेसाठी उमेदवाराकडून एकही अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली. त्यामुळे [...]
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 32 प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; प्रस्थापितांना धक्का!
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ३२ प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना आता उमेदवारीसाठी इतर प्रभागातून चाचपणी करावी लागणार आहे. जाहीर झालेली आरक्षण सोडत प्रभाग क्रमांक: १ अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव प्रभाग क्रमांक: २ अ) […]
Solapur : अकलूजमध्ये सावकारींच्या त्रासामुळे नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न ; पोलिसांची कारवाई
सावकारींच्या त्रासामुळे नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न अकलुज : अकलूज पोलीस ठाण्यात १० खासगी सावकारांविरुद्ध सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुनावर गुलमहंमद खान (वय ४८, रा. जुना बाजारतळ, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. अनिल मदने (रा. महादेवनगर, अकलूज), [...]
एनसीसी विभागा तर्फे वंदे मातरम गीताचा सार्ध शती महोत्सव
मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे 'वंदे मातरम 'आनंदमठ कादंबरी बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे वंदे मातरम गीत गाऊन देशभक्ती, देशप्रेम विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयात सर्वप्रथम वंदे मातरम गीत गाण्यात आले त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले सर यांनी कॅडेट्सना या दिवसाचे ऐतिहासिक व वंदे मातरम गिताचा संपूर्ण अर्थ महत्त्व सांगुन मार्गदर्शन केले. सरांनी आपल्या भाषणात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या गीताने सर्व देश भक्तांना एक सूत्र ते मध्ये बांधण्याचे काम केले . तसेच हजारो, लाखो भारतीयांनी वंदे मातरम म्हणत ब्रिटिशांच्या गोळ्या आपल्या छातीवर घेतल्या देशासाठी प्राण दिला पण वंदे मातरम म्हणतच. ऐवढे सामर्थ्य , देशप्रेम , शक्ति या गिता मध्ये होते असे सांगितले . आज सुद्धा हे गित कालजयी आहे त्यासाठी संपूर्ण भारतीयांनी भारत मातेला वंदे मातरम म्हणजेच मातृभूमिला वंदन करणे होय व आजच्या काळात सर्वांमध्ये देशप्रेम , देशभक्ति जागृत होणे महत्वाचे आहे असे सरांनी सांगितले . नंतर दिडशे वर्ष पूर्ण झाल्या बदल चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती चित्रकलेचा विषय होता 2047 मध्ये भारत कसा असेल? या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक पंकज जमादार, द्वितीय किरण सास्तुरे , तृतीय साक्षी राजपुत , सुलोचना सुर्यवंशी . या वेळी मंचावर उपप्राचार्य डॉ विलास इंगळे , डॉ पदमाकर पिटले होते सुत्रसंचलन ,प्रास्ताविक कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले व आभार कॅडेट सुशांत जाधव यांनी मानले . यावेळी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी , कॅडेटस या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
तलाठ्यांच्या 'अप-डाऊन'मुळे नागरिकांची कामे खोळंबलीः महसुल विभागात पदेही रिक्त...!
उमरगा (प्रतिनिधी)- तलाठी हे गावाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र जिल्ह्यातील दूरदूरच्या गावांमध्ये तलाठ्यांचे नियमितपणे न येणे ही गंभीर समस्या बनली आहे. अनेक तलाठी शहरातून अप-डाऊन करतात, तर काही ठिकाणी पदभरती रखडल्यामुळे तलाठी कार्यालये ओस पडलेली आहेत. या परिस्थितीमुळे शासकीय योजना, विविध प्रकारचे दाखले, अनुदान मिळवणे अशा अत्यावश्यक कामांसाठी ग्रामस्थांना वारंवार खर्च करूनही निराश होण्याची वेळ येते. कार्यालय गावात असतानाही तलाठी शहरात वास्तव्यास असल्यामुळे, ते प्रत्यक्ष गावात दिसतच नाहीत. त्यामुळे काम कुणाकडून करून घ्यायचं आणि तलाठी सापडायचा तरी कुठे..? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महसूल विभागातच कर्मचाऱ्यांची टंचाई आहे. काही ठिकाणी तर तहसीलदारांनी एका तलाठ्याला दोन गावे देऊन प्रभारी वर कामचलाऊपणा सुरू केल्याचे दिसत आहे. तलाठी कार्यालय गावात आहे पण साहेब शहराच्या ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे समजते. त्यामुळे गावगाडा रखडला असल्याचे दिसत आहे..! उमरगा तालुक्यात 80 ग्रामपंचायत असून 96 गावे आहेत. तलाठ्यांची संख्या मात्र केवळ 35 असल्यामुळे अनेक गावांमध्ये तलाठीच नेमले गेलेले नाहीत. जेथे तलाठी कार्यरत आहेत, तेथे ते नियमितपणे गावात उपस्थित राहत नाहीत. शासनदरबारी एकुण 41 तलाठ्यांचे पदे मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र केवळ 35 तलाठ्यांवर भार घालून कामे केली जात आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामविकासाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. तलाठ्यांची पदे सज्जे 41 मंजूर आहेत. पण सुंदरवाडी, कोराळी, समुद्राळ, केसरजवळगा, तुरोरी आणि सावळसुर या सहा तलाठी सज्जाचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे 35 जणांवर तालुक्यातील गावगाड्याचा भार वाहीला जात आहे. तलाठी साहेब आज कुठे...? जिल्ह्यातील बहुतांश गावांमधील तलाठी गावात वास्तव्यास न राहता शहरातून अप-डाऊन करतात. आज तलाठी साहेब गावात येणार की नाही, सध्या ते कुठे आहेत. याची ना ग्रामस्थांना कल्पना असते, ना कुठे कोणतीही अधिकृत सूचना दिसते. त्यामुळे शासकीय कामांसाठी आलेल्या ग्रामस्थांना तलाठ्यांचा शोध घेत गावागावात भटकावे लागते. नागरिकांची वणवण...! कोणत्याही योजनेची माहिती किंवा अर्ज भरताना, विविध योजनेचे अनुदान आले किंवा नाही यासह विविध कागदपत्रे हवे असल्यास ग्रामस्थांना तलाठ्यांच्या शोधात वणवण भटकावे लागत आहे. विशेष म्हणजे एका एका तलाठ्याला दोन गावे दिलेली आहेत. त्यामुळे साहेब कुण्या गावात आहेत की आज आलेच नाहीत याचा शोधच लागत नाहीत. उमरगा येथे मुख्य कार्यालय असले तरीही ते वास्तव्यास मात्र बहुतांश तलाठी लातूरला, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर येथे राहतात. त्यामुळे ते जरी नाही आले व त्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते उमरग्याला मीटिंग असल्यामुळे आलोच नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकतात. उमरगा शहरातून अप-डाऊन; 4 वाजता तलाठी गायब...! उमरगा लोहारा तालुक्यातील अनेक गावांमधील तलाठी मुख्यालयी न राहता अपडाऊन करतात. चार-साडेचार वाजले की तलाठी गायब होतात. नंतर ते चार-आठ दिवसानंतरच येत असल्याने तसेच काही तलाठी नेमून दिलेल्या दिवशीच गावकऱ्यांना दर्शन देत असल्याने गावागावांतील नागरिकांचे कामे प्रभावित होत आहेत. काही तलाठ्यांचे नियमित गावांना भेटी...! काही तलाठी 'अप-डाऊन'करीत असले तरी काही तलाठी नियमित गावांत भेट देऊन नागरिकांची कामेही करताना दिसून येत आहेत. गावात 'डमी'तलाठी.... काही गावात तलाठी वेळेवर पोहोचत नसल्याने तलाठ्यांनी गावात एक खाजगी व्यक्ती ठेवला आहे. तलाठ्याचे कामे बहुतांश या डमी तलाठ्याकडून होत आहेत. याबाबत नायब तहसीलदार महसूल डॉ. अमित भारती व जी. एस. पारीसकर यांना विचारले असता ते म्हणाले की, काही दिवसातच प्रत्येक तलाठी सज्जाला तलाठी भवनाचे बांधकाम दुरूस्ती सुरू आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास रितसर पाठवले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सर्व कामकाज सुरळीत चालू होईल असे सांगून वेळ मारून नेले.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच सर्व शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक रॅम्प सुविधा उभारण्यात याव्यात,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. जिल्हा व्यवस्थापन मंडळ व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तसेच मतिमंद व बहुविकलांग राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 आणि दिव्यांग हक्क अधिनियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज 11 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा स्थानिकस्तर समितीच्या आढावा बैठकीत श्री.पुजार बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री.बांगर,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी मयूर काकडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता व्ही.आर.सुर्यवंशी आदी उपस्थित होते. दिव्यांग हक्क अधिनियम-2016 च्या अंमलबजावणीअंतर्गत कायदेशीर पालकत्वासाठी आलेल्या अर्जांवर चर्चा करण्यात आली.जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याकरिता जागा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा,पुढील तीन महिन्यांच्या कामकाजाचे नियोजन,दिव्यांगांचे सर्वेक्षण,तसेच दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडून विनाअट कर्जमंजुरी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बँकांमार्फत दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या बीजभांडवल योजना व इतर योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच पाच टक्के दिव्यांग निधीचा खर्च,संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रलंबित दिव्यांग प्रस्ताव,दिव्यांगांना स्वतंत्र घरकूल योजनेचा तात्काळ लाभ मिळवून देणे,200 स्क्वेअर फुट जागा शासन निर्णयानुसार उपलब्ध करणे,अंत्योदय रेशन कार्ड वाटप,आणि दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र देणे या बाबीवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री.पूजार यांनी सर्व संबंधित विभागांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी तत्परतेने काम करून योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा,तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांगांचा सहभाग वाढावा,यावर विशेष भर दिला.
दक्षिण मुंबईतील ओपेरा हाऊस येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका घरकमा करणाऱ्या महिलेवर त्याच घरातील चालकाने बलात्कार केला. यानंतर महिलेचे अश्लील फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला ओपेरा हाऊस परिसरात एका घरात घरकाम करते. ती ज्या घरामध्ये काम […]
Solapur : सोलापुरात पहिल्याच दिवशी उमेदवारांनी फिरवली पाठ
सोलापूर जिल्ह्यातील १२ नगरपालिका व नगरपंचायतीसाठी निवडणूक अर्ज प्रक्रिया सुरू सोलापूर : जिल्ह्यातील ११ नगरपालिका व १ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवार ११पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करणे टाळले. केवळ पंढरपूर नगरपालिकेसाठी एकाने अर्ज दाखल केला असल्याची माहिती नगरपरिषद विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके [...]
लातूर - पुणे महामार्गावर ढोकी येथे ट्रॉमा केअर युनिट सुरू करा
धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर - बार्शी - पुणे महामार्गावरील ढोकी येथे ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे राज्य आंदोलन समन्वयक ॲड. तुकाराम शिंदे यांनी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनाही निवेदन देऊन मागणीकडे लक्ष वेधले. दोन्ही मंत्री महोदयांनी ट्रॉमा केअर युनिटबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती ॲड. तुकाराम शिंदे यांनी दिली. मुंबई येथे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन ॲड. तुकाराम शिंदे यांनी मंगळवारी (दि.11) सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, लातूर - बार्शी - पुणे ते मुंबई महामार्गावरील 15 ते 16 गावाचा संपर्क असणारे आणि हायवेलगत असलेले ढोकी गाव साखर कारखाना व गाव ही महत्त्वाची वर्दळीची ठिकाणे आहेत. दररोज हजारो लोक या मार्गावरून विविध वाहनांतून ये-जा करतात. दिवसेंदिवस वाहनांची व प्रवाशांची संख्या वाढत असल्याने अपघातांची व त्यातील जखमी रुग्णांची संख्या वरचेवर वाढत आहे. त्यामुळे अपघातग्रस्त व जखमी रूग्णांना तात्काळ योग्य ते उपचार वेळेवर मिळण्यासाठी ढोकी येथे अस्थिरोगतज्ञासह ट्रॉमा केअर युनिटची म्हणजेच अपघात विशेषोपचार केंद्राची नितांत आवश्यकता आहे. सध्या विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. आता ढोकी पीएचसीच्या जागी विशेष बाब म्हणून तात्काळ ट्रॉमा केअर युनिट मंजूर करण्याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आदेशीत करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
लातूर रोडवरील एका लॉजवर छापा; तेवीस वर्षाच्या तरूणीची सुटका
उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील जकेकूर चौरस्ता ते लातूर जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा मारला असून एका तेवीस वर्षाच्या तरूणीची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगाल येथील एका तरूण महिलेची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली. प्रीतीश दिलीप सगर (वय 26, रा. गुंजोटी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जकेकूर चौरस्ता येथील हॉटेल सागर बार अँड लॉजचा चालक आणि व्यवस्थापक (मॅनेजर) प्रीतीश दिलीप सगर (वय 26, रा. गुंजोटी, ता. उमरगा) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लॉजच्या वरच्या मजल्यावर वेश्या व्यवसाय चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड, पांडुरंग कन्हेरे, रामहरी चाटे, पोहेका. अतुल जाधव, अनुरूद्र कावळे, पोलीस नाईक नवनाथ भोरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक यासाठी स्थापन करण्यात आले.रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक लॉजमध्ये पाठवले. बनावट ग्राहकाने इशारा करताच, पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकला. छाप्यात आरोपी प्रीतीश सगर हा पैशाचे आमिष दाखवून एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका 23 वर्षीय महिलेची सुटका केली आहे.
समितीच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती
धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव सामाजिक संघटना म्हणून गेली बावीस वर्ष धाराशिव मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर अशी एक संघटना म्हणून काम करत आहे. याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्राचे काम वाढवण्याच्या दृष्टीने समितीचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नेमणूक धाराशिव शहरातील श्री गणेश मंगल कार्यालय येथे करण्यात आली. उमरगा शहराध्यक्ष-किशोर माडजे आणि उमरगा तालुकाध्यक्ष- महेश फंड, लोहारा शहराध्यक्ष-श्री मंगेश गोरे आणि लोहारा तालुका अध्यक्ष श्री हरिदास रवळे तुळजापूर शहराध्यक्ष- श्री प्रतीक अंभोरे आणि तुळजापूर तालुका अध्यक्ष- अतिश मिसाळ, कळंब शहराध्यक्ष- श्री ऋषिकेश काळे आणि कळंब तालुकाध्यक्ष- श्री ॲड. रणधीर देशमुख, वाशी शहराध्यक्ष- श्री विशाल कवडे आणि वाशी तालुकाध्यक्ष- श्री अंकुश मोरे, भूम शहराध्यक्ष- श्री अर्जुन जाधव आणि भूम तालुका अध्यक्ष- श्री प्रशांत शेळके, परंडा शहराध्यक्ष- श्री राहुल आगरकर आणि परंडा तालुकाध्यक्ष- श्री सुरेश घाडगे, धाराशिव शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे आणि धाराशिव तालुकाध्यक्ष श्री बबलू भोईटे यांची शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये एकमताने .निवडी करण्यात आल्या. शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव चे मार्गदर्शक श्री शशिकांत खुणे, गुंडोपंत जोशी, धर्मराज सूर्यवंशी, ॲड. संजय शिंदे, अमोल पवार, हरिचंद्र आगळे, सुनील मिसाळ, दत्ता साळुंके, हनुमंत तांबे, धनंजय साळुंके, अच्युत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या नियुक्ती देण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने बनवलेल्या 270 कृत्रिम घरट्यांचे विद्यार्थ्यांना वाटप
धाराशिव (प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रभर 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाचे आयोजन प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली (12 नोव्हेंबर) आणि ज्येष्ठ पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली (5 नोव्हेंबर) यांच्या जयंतीनिमित्त केले जाते. या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील कला व वाणिज्य शाखेच्या वतीने पक्ष्यांसाठी 270 कृत्रिम घरटी बनवण्यात आली होती. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य भैया पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, संस्थेच्या सरचिटणीस सौ प्रेमाताई पाटील यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना ही पक्ष्यांची घरटी मोफत वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे, लोकसहभाग वाढवणे या हेतूने हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य प्रा.नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य प्रा. संतोष घार्गे, प्रा.डॉ.बालाजी कामठाणे, प्रा.डॉ. अजित मसलेकर, प्रा.डॉ. गोरख देशमाने, कला व वाणिज्य प्रमुख प्रा.कैलास कोरके, मनोज राजे निंबाळकर, श्रीकांत देशमुख, पर्यवेक्षिका सौ.भारती गुंड व ज्यांच्या संकल्पनेतून ही घरटी बनवली गेली ते मानद वन्यजीव रक्षक तथा पक्षी अभ्यासक प्रा.डॉ.मनोज डोलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.डॉ.मनोज डोलारे यांनी पक्षी सप्ताहाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कृत्रिम घरट्यांविषयीची माहिती सांगितली. आदित्य पाटील यांनी पक्ष्यांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगून पक्षीसंवर्धन काळाची गरज असल्याचे सांगितले. तुम्हीही वापरात नसलेली खोकी, बाटल्या यांपासून घरटी बनवून या मुक्या जीवांच्या संवर्धनात मोलाचे योगदान देवू शकता, असे प्रतिपादन केले. तसेच प्रत्येक वाढदिवसाला दरवर्षी याच पध्दतीने किमान 500 घरटी मोफत वाटण्याचे आश्वासन दिले. प्राचार्य प्रा.नंदकुमार नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांना पक्षीनिरीक्षण कसे करायचे? छंद कसा जोपासायचा? पक्षीनिरीक्षणातून आनंद कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष सुधीर आण्णा पाटील यांनी पक्षी हे पर्यावरणासाठी, शेतीसाठी कसे आणि किती उपयुक्त आहेत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत पक्षीसंवर्धनासाठी तरुणांनी, विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहनही केले. या अभिनव उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.शितलकुमार ऐवळे, प्रा.राज भोसले, प्रा.यशवंत कोकाटे, प्रा.सिध्देश्वर जाधव, प्रा.प्रसाद माशाळकर, प्रा.दत्तात्रय जाधव, प्रा.डी.वाय.घोडके, प्रा.शंकर गोरे, प्रा.लक्ष्मण शिंदे,प्रा.राजहंस कांबळे, प्रा.अमित काकडे, प्रा.सविता जाधव, प्रा.सुवर्णा शेळके व शिक्षकेतर कर्मचारी पद्माकर ढेकणे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सूर्यकांत कापसे तर आभार उपप्राचार्य प्रा.संतोष घार्गे यांनी मानले.
फरीदाबादमध्ये दहशतवादाची फॅक्टरी, दिल्ली स्फोटाबाबत महत्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जण जखमी झाले. या कटाचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर मोहम्मद देखील स्फोटात ठार झाला. मोहम्मद हा डॉ. मुझम्मिल शकीलचा मित्र होता आणि फरीदाबादमधील एका रुग्णालयात काम करत होता. पोलिसांनी उमरच्या पालकांना आणि दोन भावांना ताब्यात घेतले आहे. […]
Pandharpur : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास कार्तिकी यात्रेत 5 कोटी 18 लाखाचे उत्पन्न
वारकरी भाविकांचे कार्तिकी यात्रेत मोठे देणगी योगदान पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ [...]
गायिका पलक मुच्छल आपल्या गायकीबरोबरच सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. पलकची आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समने नोंद घेतली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने पलकची दखल तिच्या गायकीसाठी नव्हे तर, समाजसेवेसाठी घेतली आहे. गायिका पलक पलाश चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून 3800 हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केली आहे. लहानपणी पलक एका […]
दिल्लीतील स्फोटाची घटना निषेधार्ह; जगभरातून शोक व्यक्त
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाने देश हादरुन गेला आहे. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट असून देशभरात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेवर आता जगभरातून प्रतिक्रिया येत असून अनेक […]
Karad : कराडमधील पोलीस कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू
कराड पोलिस प्रवीण काटवटे यांचे आकस्मिक निधन कराड: शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या प्रवीण बाळकृष्ण काटवटे (वय ५१, रा. दक्षिण तांबवे, ता. कराड) या पोलीस कर्मचाऱ्याचा रविवारी दुपारी मुंबईतील एका कार्यक्रमावेळी आकस्मिक मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची [...]
Satara : लिंब ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
लिंब ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप सातारा : लिंब ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या आराखड्यात कामे नसतानाही परस्पर बिले काढली आहेत. ग्रामनिधी परस्पर रोखीने खर्च केला आहे, असा आरोप करत लिंब येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांनी आपल्या [...]
भूतानचे चौथे राजे यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
मरो त्याचे दुश्मन…, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्यांवर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा संतापले
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून ते सध्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर धर्मेंद्रचे जवळचे मित्र अभिनेते शत्रुघ्न सिन्हा नाराज झाले आहेत. ते म्हणाले विश्वासू पोर्टल्सवर बातम्या पाहून त्यांनाही निधनाची बातमी खरी वाटली. मात्र, नंतर त्यांना निधनाची बातमी खोटी असल्याचे कळले. बॉलीवूड हंगामाशी बातचीत […]
Karad News : कराड तालुक्यात ऊसदर घोषणेची शेतकऱ्यांची मागणी तीव्र; कारखान्यांना निवेदन
कराडमध्ये ऊस उत्पादकांचा कारखान्यांविरोधात हल्लाबोल कराड : कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सह्याद्रि, अथणी रयत, जयवंत शुगर, कृष्णा व डायमंड शुगर या कारखान्यांच्या गट ऑफिसवर जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करून ऊसतोड करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. [...]
राज्यात आगामी काळात महानगरपालिका निवडणुकीचा बार उडणार आहे. त्याची रणधुमाळी सुरू झाली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या एकूण 17 प्रभागातून 66 सदस्य पदासाठी मंगळवारी शहरातील प्रियदर्शनी सभागृहात आरक्षण सोडत जाहीर झाली. 66 पैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय ,महानगरपालिकेचे अधिकारी- कर्मचारी आणि विविध राजकीय पक्षांचे […]
Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पळसावडेतील भूमिपुत्रांचा टाटा पॉवरविरोधात हल्लाबोल सातारा : माण तालुक्यातील पळसावडे येथील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून भूमिपुत्रांवर अन्याय केला आहे. स्थानिकांचा पगार वाढवला जात नाही. दिलेले आश्वासन कागदावरच ठेवली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरच घोंगडी आंदोलन करून त्यांना भंडारा भेट देणार होतो, [...]
ठाण्यात महापालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये 66 जागा महिलांसाठी राखीव; इच्छुकांची धाकधूक वाढली
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 131 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 66 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर उर्वरित 65 जागा या सर्वसाधारण गटासाठी असतील. या सोडतीमुळे अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यातून एकूण 131 सदस्य […]
उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
हरिनाम सप्ताह १५ नोव्हेंबर रोजी ओटवणे | प्रतिनिधी देवसू गावचे ग्रामदैवत श्री देवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शेंडोबा माऊली देवसूसह केसरी आणि दाणोली या तीन गावांचे एकत्रित देवस्थान आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर शेंडोबा माऊलीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. या दिवशी तीन [...]
Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
मिरजमध्ये आर्थिक फसवणूक उघडकीस मिरज : येथील शिक्षण संस्था चालकाला संस्थात्मक कामासाठी सहा टक्के व्याजदराने दहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देण्याचे अमिष दाखवून आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शिवानंद आप्पाराया तेलसंग (वय ५४, [...]
आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
गिरीजानाथाच्या दर्शनासाठी भाविकांची होणार अलोट गर्दी ओटवणे प्रतिनिधी सांगेली गावचे ग्रामदैवत श्री गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतरगिरीजानाथाला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात आले असून गिरीजानाथाच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे.यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक [...]
Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी
कवठेमहांकाळमध्ये राजकीय तापमान चढले! निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या असून आचारसंहितेच्या घोषणेकडे नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या बैठका नुकत्याच मुंबईमध्ये पार पडल्या. कवठेमहांकाळ तालुक्यात रांजणी, ढालगाव, कुची आणि देशिंग डे चार [...]
जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांचा शिवसेनेत प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांनी आज पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षात प्रवेश केला. ग्रामीण भागातील जनतेशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क, सामाजिक कार्यातली निष्ठा आणि विकासासाठीची प्रामाणिक धडपड लक्षात घेता त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना संघटनेला ग्रामीण पातळीवर निश्चितच नवं बळ प्राप्त होणार आहे, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. या प्रवेशप्रसंगी युवासेना धाराशिव लखन गायकवाड, अक्षय गरड, तसेच ॲड. तुकाराम शिंदे (राज्य आंदोलन समन्वयक व शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष) उपस्थित होते. पक्षात प्रवेश घेतल्यानंतर इरशाद शेख यांनी शिवसेनेच्या विचारधारेनुसार जनतेची सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या प्रवेशाचे मनःपूर्वक स्वागत करत, “जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहा आणि ग्रामीण भागातील विकासासाठी सक्रिय भूमिका निभवा,” असे आवाहन केले. इरशाद शेख यांच्या प्रवेशामुळे जुनोनी परिसरात तसेच संपूर्ण धाराशिव तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
दिल्लीत झालेल्या घटनेसाठी जबाबदार कोण? काँग्रेसचा सरकारला सवाल
दिल्लीतील स्फोटानंतर केंद्र सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहांकडून उत्तराची मागणी केली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की अमित शाह हे अयशस्वी गृह मंत्री आहेत. सात महिन्यांत 41 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये जे घडले त्यासाठी जबाबदार कोण आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. […]
विद्यापीठ उप-परिसर येथे रक्तदान शिबीर संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर धाराशिव येथे राष्ट्रीय सेवा योजना व शासकीय रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदरील शिबीराचे आयोजन विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. पी. पी. दीक्षित यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. सदरील शिबिराच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदरील शिबिरामध्ये चोवीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील दीपमाला करंडे (रक्त संक्रमण अधिकारी), निलाक्षी जानराव (रक्तपेढी तंत्रज्ञ), विनय कुंभार (रक्तपेढी तंत्रज्ञ), गणेश साळुंके (वैद्यकीय समाजसेवक), जयदेव सुरवसे (रुग्णवाहीका चालक), रविराज गंभीरे (रक्तपेढी परिचारक) यांनी रक्त संकलणाचे कार्य पार पाडले. सदरील रक्तदान शिबिरामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच धाराशिव येथील प्रदीप खामकर, अमोल माने, रविंद्र बेदमूथा व महेश भोंग या नियमित रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. के. पाटील, डॉ. आर. एम. खोब्रागडे, डॉ. जे. एस. शिंदे, तसेच रासेयो स्वयंसेवकानी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
हातलाई शुगरचा गळीत हंगाम शुभारंभ
धाराशिव (प्रतिनिधी)- हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड जवळा खुर्द कळंब यांचा बॉयलर अग्नी प्रतिपादन समारंभ व ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ 7 नोव्हेंबर 2025 रोजी हभप. प्रकाश बोधले महाराज यांच्या शुभहस्ते व परिसरातील सर्व शेतकरी बांधव, वाहतूक तोडणी ठेकेदार व प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सीईओ आदित्य पाटील, सुभाष कल्याणकर, साहेबरावर देशमुख, सुभाष देशमुख, अमोल पाटील सरपंच खामसवाडी, राजाभाऊ मुंडे, पप्पू मुंडे, विजय देशमुख, साखरे आप्पा, अमरसिंह देशमुख, सोमेश बगॅस सर्वेसर्वा मालकरी,अमोल शेळके, तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी भागातील शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आदित्य पाटील बोलताना म्हणाले की, पंधराव्या दिवशी सर्व शेतकऱ्यांचे बिले काढण्याचा आमचा मानस आहे. याप्रसंगी बोलताना हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील हणाले की जिल्ह्यातील सर्व गुळ फॅक्टरी जे भाव देतील तोच भाव मीही या ठिकाणी देणार आहे. हातलाई शुगर यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व ऊस वाढीसाठी एआय एप्लीकेशन द्वारे प्रशिक्षण देणार आहेत. चेअरमन साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवत तीन लाख टन गाळप यावर्षी करण्याचा मानस देखील व्यक्त केला. हे जे युनिट या ठिकाणी अण्णांनी मला काढण्यासाठी सांगितले त्याचं एकच ध्येय होतं की या भागातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. अशाप्रकारे कारखान्याच्या मोळीपूजन चा कार्यक्रम पार पडला.
धाराशिव (प्रतिनिधी)- इस्रो सारख्या संस्थेत आमचे विद्यार्थी आता काम करतात हा आमच्या महाविद्यालयाचा गौरव आहे. असे प्रशंसनीय उद्गगार तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी काढले. नुकताच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी आदेश भोरे याची इस्त्रोमध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 2022 चा विद्यार्थी आदेश भोरे हा इस्त्रोमध्ये सध्या कार्यरत आहे. पदवीनंतर एवढ्या अल्पावधीत निवड झाल्याबद्दल मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने त्याचा सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते, एम जी चौधरी, डी.डी.लिंगे, रामेश्वर मुंडे, किरण बोधले यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्काराला उत्तर देताना आदेश भोरे म्हणाले की, धाराशिव सारख्या भागात असून सुद्धा महाविद्यालयाने शहरी भागात मिळणाऱ्या सर्व सुविधा आम्हा विद्यार्थ्यांना पुरविल्या. अगदी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षापासून नियोजित अभ्यासक्रमाबरोबरच तांत्रिक कौशल्यावर भर देऊन महाविद्यालयाने अनेक उपक्रम राबविले. मी पहिल्या वर्षापासून सातत्यपूर्ण प्रत्येक उपक्रमामध्ये सक्रियपणे भाग घेऊन अभ्यास पूर्ण केला. त्यामुळे पदवी मिळाल्याबरोबर माझी इस्रो सारख्या संस्थेत निवड झाली याचा मला स्वतःलाही आनंद आणि अभिमान वाटतो. यापुढेही असे अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातून घडतील अशा शुभेच्छा आदेश भोरे यांनी याप्रसंगी दिल्या. आदेश भोरे यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्रशासनाने ही आदेश यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.आणि महाविद्यालयाने सत्कार करून शुभेच्छा दिल्याबद्दल आदेश भोरे यांनी महाविद्यालयाचे आभार मानले.
भूम येथे माजी विद्यार्थ्यांची बैठक
भूम (प्रतिनिधी)- भूम येथील गुरुदेव दत्त हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक 9 नोव्हेंबर रोजी गुरुदेव दत्त हायस्कूल येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये माजी मुख्याध्यापक कल्याणराव मोटे, अरुण गायकवाड, लगाडे, गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुदेव दत्त हायस्कूल भूम माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला. शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेतील मुलासाठी आरो फिल्टर बसवणे, शाळेत सोलर सिस्टिम बसवणे, आधुनिक पद्धतीचे स्मार्ट डिजिटल बोर्ड, अद्यावत सुसज्ज स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उभारणे, सर्व वर्गात सीसीटीव्ही बसवणे, शाळेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा मिळवावे म्हणून पारितोषिके ठेवणे अशा विषयावर चर्चा होऊन प्रधान्य क्रमांकाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीमध्ये ठरवण्यात आले. या बैठकीमध्ये प्रथम प्रधान्य विद्यार्थ्यांसाठी आरो फिल्टर बसवण्यासाठी देण्यात आले तसेच सोलर सिस्टिम बसवणे यासाठीही सहकार्य करणार असल्याचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी गुरुदेव दत्त माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी संदीप बागडे,सचिव पदी उमेश ढगे ,कोषाध्यक्ष निशिकांत गाढवे,उपाध्यक्ष गणेश तांबे,नवनाथ रोकडे,गणेश पवार,सुधीर बागडे,तानाजी वडेकर, सिराज मोगल,अजित मस्कर ,हरिभाऊ महामुनी उपस्थित होते.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भूमचा रोहित माने ठरला तृतीय
भूम (प्रतिनिधी)- खोपोली (जि. रायगड) येथे झालेले असलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रविंद्र हायस्कूल, भूम येथील विद्यार्थी रोहित माने याने 17 वर्षे वयोगट व 60 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवत भूम तालुक्याचा मान उंचावला आहे. रोहित माने हा सलग चार वर्षे विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविणारा खेळाडू असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने आपली दमदार कामगिरी कायम ठेवली. या उल्लेखनीय यशाबद्दल रोहित माने याचा व त्याचे मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक अमर सुपेकर (कबड्डी कोच) यांचा शाळेतर्फे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव आर.डी. सुळ, कोषाध्यक्ष डॉ. विजयकुमार सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे सर, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे सर, तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहितच्या या कामगिरीमुळे भूम तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रात आणखी एक अभिमानाची नोंद झाली आहे.
शरद पवार गटाचे अशोक जगदाळे यांचा काँग्रेस प्रवेश
नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्गचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहरात कमकुवत झाला असून, आता शहरात काँग्रेसला नवा उत्साह प्राप्त झाला आहे. दरम्यान येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून अशोक जगदाळे हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये अशोक जगदाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. अशोक जगदाळे यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यामध्ये काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशोक जगदाळे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेचे उमेदवारी घेऊन जवळपास पहिल्याच टप्प्यात 35 हजार मतदान घेऊन सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. दरम्यान 2016 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अशोक जगदाळे यांनी त्यांची बहीण रेखाताई जगदाळे यांना नगराध्यक्षपदी निवडून आणून एकहाती सत्ता नगरपालिकेत काबीज केली होती. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी उपनगराध्यक्ष शरीफ शेख, माजी नगरसेवक अमृत पदाले, ताजुद्दीन सावकार, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय बेडगे, नवल जाधव, माजी नगरसेविका सुमन जाधव, मास्टर टेलर, अमोल सुरवसे, दत्ता राठोड, अलीम शेख यांच्या सह अनेकांचा काँग्रेस प्रवेश झाला आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत यांची नगरपालीकेच्या निवडणूकीत विरोधकावर जोरदार चढवीला हल्ला
परंडा (प्रतिनिधी)- माजी मंत्री भूम-परांडा-वाशी मतदार संघाचे आमदार डॉ.प्रा.तानाजी सावंत हे शुक्रवार दि.7 रोजी पासून परंडा - भूम - वाशी मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असून परंड्याचे माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या निवासस्थानी उपस्थितीत राहून पदाधिकारी,कार्यकर्तेसह उपस्थित हजारो मतदारास मार्गदर्शन करित विरोधकावर जोरदार हल्ला चढविला विरोधक एकत्र आले तरी आपणास काही फरक पडणार नाही असे म्हणत त्यांनी मी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका साम दाम दंड वापरून विरोधकांचे आमानत रक्कम जप्त करून वीस नगसेवक सह जाकीर भाई तुम्ही नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत बहूमताने निवडून येणार मला पूर्ण खात्री आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी विरोधकावर जोरदार प्रहार करित माझ्या विरोधात शहरातील विरोधक सर्व पक्ष एकत्र आले असून त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लडवून दाखवावी असे खुले आव्हान केले.तसेच शहशतील वीस नगरसेवकासह व मी स्वःता नगराध्यक्षपद निवडूण आणून दाखवून विरोकांचे अनामत रक्कम जप्त केल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माझ्या पाठीशी परंड्यातील जनता व आमदार सावंत आहेत. त्यामुळे विकास कामाला गती मिळणार आहे. परंडा शहरात आमादर सावंत यांनी कोट्यवधी रुपयांची निधी आणून विकासकामे केली आहेत आणि या विकासकामांच्या बळावर जनता नक्कीच निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गटाला ) बहुमताने विजयी करेल असे मत सौदागर यांनी यावेळी व्यक्त केले. या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख,परंडा शहर प्रमुख यांच्यासह शिवसेना, युवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते मतदार आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
366 वा शिवप्रताप दिन व समिती स्थापना दिन साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सरदार अफजलखान यास ठार मारून मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा दिवस म्हणजे 366 वा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. 366 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी बादशाहीचे अफजलखान रुपी आलेले संकट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार मारून ऐतिहासिक विजय संपादन केला होता. दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव या ऐतिहासिक दिनाची स्मृती जागृत व जतन करण्यासाठी हा दिवस शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 10 नोव्हेंबर 2003 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सतत शिवकार्य करणारी समिती संपूर्ण जिल्हाभर कार्यरत आहे. 366 वा शिवप्रताप दिन व शिवराज्याभिषेक सोहळा समिती स्थापना दिन या दोन्हींच्या निमित्ताने धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक व महाभिषेक समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत खुणे, गुंडोपंत जोशी, धर्मराज सूर्यवंशी, अमोल पवार, अच्युत थोरात मेजर, धनंजय साळुंके, एडवोकेट संजय शिंदे, हरिश्चंद्र आगळे, हनुमंत तांबे, दत्ता साळुंके यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शिवरायांचा पुतळा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. तसेच वाद्यांच्या दणदणाटात व फटाक्यांच्या आतषबाजीने तसेच समितीच्या मावळ्यांच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच धाराशिव शहर, तालुका परिसरातील आजी-माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते मावळे उपस्थित होते.
काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अभय मालवणकर
सावंतवाडी । प्रतिनिधी नगरपालिका ,जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षात नवचैतन्य यावे यासाठी पक्षात आता फेरबदल करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी महेंद्र सांगेलकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अभय मालवणकर यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ [...]
छत्तीसगडच्या बिजापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील नॅशनल पार्क परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत मोठे नक्षली नेते ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चकमकीत नेमके किती नक्षलवादी मारले गेले आहेत? याचा निश्चित आकडा समोर आलेला नाही. मात्र, जवानांनी […]
Chhatrapati Sambhaji Nagar –महापालिकेच्या निवडणुकीसाठी 115 जागांचे आरक्षण जाहीर
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगर येथील 29 प्रभागातील 115 नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. यामध्ये 58 जागा या महिलांसाठी असणार आहे. तर 57 जागा या खुल्या असणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण 30 महिला, सर्वसाधारण पुरुष 30, ओबीसी महिला 16 असून, ओबीसी पुरुष 15 आहेत. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये 11 पुरुष आणि 11 महिला नगरसेवकांसाठी आरक्षण […]
आयपीएल २०२६ रिटेन्शनपूर्वी ५ अफवा, जाणून घ्या
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्फोटाने हादरली, हायकोर्टाबाहेर कारमधील स्फोटात 12 जणांचा मृत्यू
पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्यावेळी कोर्ट परिसराच्या पार्किंगमध्ये कार उभी होती. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट परिसरात गर्दी आणि वाहतूक कोंडी असताना हा स्फोट झाला. स्फोटात अनेक वकील आणि सामान्य नागरीक […]
दिल्लीतील स्फोटावर पंतप्रधान मोदी भूतानमध्ये बोलले, षडयंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही
मंगळवारी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर इशारा दिला आहे. भूतानच्या थिम्फूमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, या घटनेमागील कटकारस्थान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. सर्व जबाबदारांना कोर्टात उभे केले जाईल.” पंतप्रधान मोदी हे भूतानचे राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेजारील देशात […]
हे निर्लज्ज लोक फक्त तुमचा वापर करतील…, सुनील गावसकरांनी टीम इंडियांच्या रणरागिंणींना केलं सावध
टीम इंडियाच्या महिला क्रिकेट संघाच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर महिला संघाच्या वाढत्या लोकप्रियतेचे सगळीकडून कौतुक होत आहे. सरकारपासून ते अगदी मोठ मोठ्या ब्रँडपर्यंत सर्वांनी या रणरागिणींचे कौतुक केले आहे. दरम्यान, हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी हरमनप्रीत कौर आणि संपूर्ण टीमला सावधगिरीचा इशारा दिला आहे. जर काही […]
चेहरा सुंदर ठेवण्यासाठी घरातील हा पदार्थ वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
तुम्ही फेशियलसाठी वारंवार पार्लरमध्ये जाऊन कंटाळला असाल किंवा रासायनिक उत्पादनांमुळे त्वचेवर प्रतिक्रिया येत असेल, तर आता काहीतरी नैसर्गिक अवलंब करण्याची वेळ आली आहे. तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या दूध आणि मध सारख्या साध्या पण प्रभावी गोष्टींनी तुम्ही घरी चमकदार त्वचा मिळवू शकता. हे दोन्ही त्वचेला हायड्रेटिंग, क्लीन्झिंग आणि पोषण देण्यासाठी खूप प्रभावी आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्यासोबत […]
तब्बल तीन तासाच्या थरारानंतर कोल्हापुरात बिबट्या जेरबंद, उच्चभ्रू वसाहतीत एका हाॅटेलमधुन शिरला
कोल्हापूरातील नागाळापार्क या उच्चभ्रू वस्तीतील हॉटेल वूडलँडमध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. मुख्य वर्दळीच्या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यावयाशेजारी रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्याने हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली.काम करत असलेल्या माळीवर हल्ला केला. हॉटेलमधून बिबट्याने पलिकडे बीएसएनल कार्यालयात उडी घेतली. यानंतर महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसला. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर […]
नावे यापूर्वीच दिलीय, कारवाई का नाही?
पूजा नाईकच्या दाव्यानेपोलिसांच्या निक्रीयतेवर प्रश्नचिन्ह : विद्यमान मंत्रिमंडळातील तो मंत्री कोण? घोटाळ्याचे गूढ वाढले,अनेकखात्यांतीलनोकऱ्यांसाठी17 कोटी68 लाखांचाव्यवहार पणजी : राज्यभर गाजत असलेल्या कथित नोकऱ्यांसाठी रोकड घोटाळ्यातील सूत्रधार पूजा नाईक हिने पुन्हा एकदा एक घणाघाती दावा करीत नोकऱ्या घोटाळ्यातील संबंधित मंत्री आणि अधिकारी यांची नावे यापूर्वीच पोलिसांना दिली होती, असे सांगितले आहे. त्यामुळे जर नोकऱ्यांसाठी पैसे घेणाऱ्यांची [...]
PMC Election 2025 –आरक्षण सोडत जाहीर, 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी
आगामी महापालिका निवडणुकांसाठीची पुणे महापालिकेच्या आगामी आरक्षणाची सोडत मंगळवारी (11 नोव्हेंबर) गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडली. यावेळी महापालिकेच्या 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडून येणार आहे. यंदा 41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. यंदा महापालिकेच्या निवडणुकीत 41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये तब्बल […]
पूजा नाईकची डिचोलीत अर्धा तास चौकशी
डिचोली : नोकरभरतीत लोकांकडून पैसे उकळल्या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिला चौकशीसाठी काल सोमवारी 10 नोव्हें. रोजी सकाळी डिचोली पोलिसस्थानकात बोलावण्यात आले होते. त्यानुसार सकाळी 11.30 वा. च्या सुमारास ती डिचोली पोलिस्थानकावर दखल झाली. सुमारे अर्धा तास चौकशीनंतर ती पोलिसस्थानकाच्या मागील दाराने बाहेर पडली. कॅश फॉर जॉब प्रकरणात प्रमुख संशयित असलेली पूजा नाईक डिचोली पोलिसस्थानकावर [...]
विजापुरात पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या
विजापूर: जिह्यातील अरकेरी येथील अमोघसिद्ध मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत असलेल्या अमसिद्ध बिरादार (वय 35) यांची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. रविवार दि. 9 रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून गुन्हेगारांनी दगडाने त्याचे मस्तक ठेचून ते घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आण्णासाहेब जोल्ले
उपाध्यक्षपदीराजूकागे: कार्यकर्त्यांतूनजल्लोष: जिल्हाबँकेलाराज्यातआदर्शबनविण्यासाठीप्रयत्नकरणार– जोल्ले बेळगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले तर उपाध्यक्षपदी कागवाडचे आमदार राजू कागे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर उभयंतांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. राजू कागे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची [...]
मोटारसायकलवरून पडून प्रभारी मुख्याध्यापकाचा मृत्यू
संतिबस्तवाडनजीकअपघात: संतप्तजमावाकडूनरास्तारोको बेळगाव : मोटारसायकलवरून पडून संतिबस्तवाड येथील ऊर्दू शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी संतिबस्तवाड क्रॉसपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी रास्तारोको केला. जमीलअहमद गुडूसाब तोपिनकट्टी (वय 52) मूळचे राहणार नंदगड, सध्या राहणार अमननगर असे [...]
अखेर सात वर्षानंतर मुंबई महानगर पालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. आज पालिकेच्या प्रभाग आरक्षण जाहीर झाले आहे. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांकडून मुंबईच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबई महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या 227 महिलांसाठी राखीव-114 अनुसुचित जातींसाठी राखीव वॉर्ड- 15, महिलांसाठी 8 अनुसुचित जमाती एकूण राखीव -2 महिलांसाठी 1 ओबीसी राखीव 61, महिलांसाठी 31 सर्वसाधारण वॉर्ड […]
Sangli : तासगावात 200 जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा !
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संग्राम शेळके यांची कारवाई तासगाव : नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच तासगाव पोलीसांनी कायदा-सुव्यवस्थेसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. निवडणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने २०० हून अधिक व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या असून, १० तडीपारी प्रस्ताव तयार केले आहेत. ही माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी [...]
Sangli : सांगली-शेगाव बससेवेतील नियोजनाचा गोंधळ; प्रवाशांचा जीव मात्र धोक्यात
सांगली-शेगाव बस प्रवास सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर सांगली : सांगली डेपोच्या शेगावमार्गी चालणाऱ्या बससेवेतील बेफिकीरी व गैरव्यवस्था दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली डेपोतून शेगावकडे फक्त दोनच गाड्या धावतात. मात्र या दोन्ही गाड्यांच्या नियोजनात गंभीर त्रुटी दिसून येतात. [...]
Kolhapur : कोल्हापुरात इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
मोर्च्यात साखर कारखाना कर्मचाऱ्यांचा सहभाग कोल्हापूर : अर्थव इंटरट्रेड प्रा. लि. अर्थात दौलत सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानसिंग खोराटे यांनी कामगारांवर अन्याय करणे सुरु केले आहे. त्यांनी चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे सल्लागार डॉ. उदय नारकर यांना धमकी दिली आहे, याबद्दल खोराटेंवर [...]
एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक
सतत वाहतुकीची कोंडी : पोलीस प्रशासनाचीसुद्धा डोकेदुखी, वाहतुकीचे नियम सर्वांनीच पाळणे बंधनकारक बेळगाव : शहरातील वाहनांची वाढती वर्दळ आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांचीच नव्हे तर पोलीस प्रशासनाचीसुद्धा डोकेदुखी झाली आहे. तिसऱ्या रेल्वेगेटनजीक उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू झाल्याने सध्या वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी शाळा सुरू होण्याच्या व कार्यालयीन वेळेत आणि संध्याकाळी प्रचंड [...]
उड्डाणपुलावरील कामामुळे वाहतूक कोंडीचे सत्र सुरूच
आठवड्याच्यापहिल्याचदिवशीवाहनांच्यालांबचलांबरांगा बेळगाव : तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने काँग्रेस रोडमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे सोमवारी काँग्रेस रोड परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. अनगोळ नाका ते दुसरे रेल्वेगेटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारी सकाळी 9 पासून 11 वाजेपर्यंत या परिसरात मोठी गर्दी झाली [...]
भारत-श्रीलंका लष्करांमध्ये संयुक्त कवायतीला प्रारंभ
दोन्हीदेशांमधीलसंबंधबळकटीचाप्रयत्न बेळगाव : भारत व श्रीलंका या देशांमध्ये संयुक्त लष्करी सरावाला सोमवारपासून प्रारंभ झाला. 10 ते 23 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या कवायतींना ‘मित्रशक्ती-2025’ असे नाव दिले आहे. भारत व श्रीलंका या देशांच्या लष्करी सरावाची ही अकरावी वेळ आहे. विशेष म्हणजे बेळगावच्या फॉरेन ट्रेनिंग नोड येथे या कवायती सुरू आहेत. 170 भारतीय तर 135 श्रीलंकन जवानांचा यामध्ये [...]
हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी हळदीसोबत हे पदार्थ खायलाच हवेत
हवामान बदलू लागते तेव्हा त्याचा आपला आरोग्यावर थेट परिणाम होतो. बदलत्या हवामानात आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर आजारी पडण्याचा धोका आणखी वाढतो. बदलत्या हवामानात आजारांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर काही घरगुती उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. हळद ही आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम मानली जाते. दररोज सकाळी दूध आणि केळी खाण्याचे […]
लोकमान्य सोसायटीच्या राणी चन्नम्मानगर शाखेचे स्थलांतर
नवीनशाखावेदमंदिर, प्लॉटक्र. 224, सेकंडस्टेज, राणीचन्नम्मानगरयेथेकार्यरत बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या राणी चन्नम्मानगर शाखेचा स्थलांतर सोहळा सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. नव्या कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाचा शुभारंभ करून सोहळ्यास औपचारिक सुरुवात झाली. कार्यक्रमाला लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित [...]
वाफोली माऊली देवस्थानचा जत्रोत्सव १२ नोव्हेंबरला
प्रतिनिधी बांदा वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. केळी ठेवणे, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री पालखी प्रदक्षिणा होणार असून मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी देवीचे दर्शन व [...]
सत्तेसाठी तीन साप एकत्र येऊन एकमेकांना गिळू पाहताहेत, जनतेकडे कोण पाहणार…उद्धव ठाकरे यांनी फटकारले
गोपीनाथ मुंडे असताना आपण बीडला झुकते माप दिले होते, पण आता बीडची विल्हेवाट लागली आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच सत्तेसाठी तीन साप एकत्र येऊन एकमेकांना गिळू पाहताहेत, जनतेकडे कोण पाहणार अशा शब्दांत त्यांनी महायुतीला फटकारले. आज कुंडलिक खाडे यांनी मातोश्रीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश […]
Kolhapur Breaking : कोल्हापुरातील नागाला पार्क परिसरात बिबट्याचा हल्ला !
बिबट्याने शहरात घुसखोरी, परिसरात तणाव कोल्हापूर : शहरातील विवेकानंद कॉलेज परिसरात आज सकाळी बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरात काही वाहनचालकांना बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी आणि [...]
मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांची पंचायत
बेळगाव : सध्या बेळगाव व खानापूर तालुक्यात भातकापणीचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, कापणीसाठी मजुरांचा तुटवडा असल्याने अखेर यंत्रांचा आधार घ्यावा लागला आहे. सध्या भातकापणीसाठी यंत्राचा वापर केला जात असून त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल पहायला मिळत आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे भातकापणीला ब्रेक लागला होता. शनिवारपासून ऊन पडू लागल्याने भातकापणीचा हंगाम सुरू झाला. यावर्षी उशिरापर्यंत पाऊस [...]
डेअरी फार्म रस्त्यावरील पथदीप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय
कॅन्टोन्मेंटप्रशासनाचागलथानकारभार बेळगाव : कॅम्प येथील मिलिटरी डेअरी फार्म रस्त्यावरील पथदीप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अंधार पसरला असून, वाहनचालकांना वाहने हाकताना अडचणी येत आहेत. तसेच या अंधाराचा फायदा घेऊन अनेक गैरप्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. युनियन जिमखाना प्रवेशद्वारापासून अरगन तलाव गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. यापूर्वी अनेक वेळा [...]
बहुप्रतिक्षीत ईएसआय रुग्णालय लवकरच कामगारांच्या सेवेत
केंद्रसरकारकडूनपुन्हानिविदा: कामगारवर्गातूनसमाधान बेळगाव : राजकीय प्रतिष्ठा, जागेच्या अभावामुळे 100 खाटांच्या ईएसआय रुग्णालयाची स्थापना गेल्या दोन वर्षापासून रखडली होती. मात्र आता केंद्र सरकारने पुन्हा ईएसआय रुग्णालयासाठी निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे कामगार वर्गाच्या बहुप्रतिक्षीत ईएसआय रुग्णालयाचा प्रकल्प पुन्हा एकदा जीवित झाला आहे. बेळगावात मोठ्या प्रमाणात लघु आणि मध्यम उद्योग आहेत. यांच्यामुळे 1.50 लाखाहून अधिक कामगारांना रोजगार मिळतो. [...]
जिल्हाधिकारी, जि. पं. सीईओंना ग्रंथपालांचे निवेदन
बेळगाव : वेतनाविना आपल्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आपले वेतन थकले असून, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे मुश्कील बनले आहे. वेतन होत नसल्याच्या कारणाने दोन ग्रंथपालानी आत्महत्या केली असून, आतातरी विभागाने जागे होणे गरजेचे आहे. मृताच्या कुटुंबीयांना भरपाई देऊन त्यांना अनुकंपा तत्वावर रुजू करून घ्यावे. त्याचबरोबर ग्रंथपालांचे वेळेवर वेतन करण्याची मागणी ग्राम [...]
90च्या दशकातला बॉलीवूडचा सर्वात गाजलेला ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांना तितकात आवडतो. या चित्रपटातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटात सलमान खानच्या वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेणुका शहाणे सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतेच एका मुलाखती दरम्यान त्यांना आलेला एक भयानक अनुभव त्यांनी शेअर केला. रेणुका यांनी एका विवाहित निर्मात्याची […]
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाने सर्वांना हादरवून टाकले आहे. यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक जण जखमी झाले. फरिदाबाद दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसंदर्भात जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी लखनऊच्या लाल बाग येथील डॉ. शाहीन शाहिद नावाच्या एका लेडी डॉक्टरला अटक केली आहे. तिच्या कारमधून एके-47 रायफल, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त […]
बेळगाव शुगर्सच्या गळीत हंगामाला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव शुगर्स प्रा. लि. हुदली कारखान्याने 2025-26 सालाच्या गळीत हंगामाला सोमवारपासून प्रारंभ केला. संचालक व युवा नेते राहुल जारकीहोळी व कारखान्याचे अध्यक्ष प्रदीपकुमार इंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामाला चालना दिली. यावेळी इंडी म्हणाले, 2025-26 हंगामासाठी सरकारने निश्चित केलेल्या ऊस दराप्रमाणे शेतकऱ्यांना बिले दिली जातील. शेतकऱ्यांनी चालू हंगामात कारखान्याला उच्च दर्जाचा ऊस पुरवठा करून [...]
हलसाल येथे हत्तींच्या कळपाकडून प्रचंड नुकसान
वनखात्याच्यानिष्काळजीपणामुळेहाता-तोंडाशीआलेलेभातपीकवायाजाण्याचीभीती: शेतकरीहतबल खानापूर : तालुक्यातील पडलवाडी-हलसाल भागात दांडेली जंगलातून आलेला हत्तींचा कळप गेल्या चार दिवसापासून ठाण मांडून आहे. रविवारी आणि सोमवारी दिवसभरात आठ हत्तीच्या कळपानी हलसाल येथील कापणीला आलेल्या भात पिकाच्या शिवारात धुडगूस घालून भातपिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले भातपीक हत्तींच्या धुडगुसामुळे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तालुक्यात सर्वच भात [...]
खानापूर तालुक्यात थंडीची चाहूल
पारा15 अंशापर्यंतखाली: थंडीचाकडाकावाढण्याचाअंदाज खानापूर : खानापूर तालुक्मयात एकीकडे सुगी हंगामाला जोर आला असताना तालुक्मयात आता थंडीची चाहूल जाणवत आहे. गेल्या दोन दिवसापासून आकाशातील ढग पूर्णपणे नाहीसे झाले असून, आकाश निरभ्र दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसापासून हवामानात एकदमच बदल झाला आहे. रविवारी हवेत एकदम गारठा पडला. तर सोमवारी पहाटे कडाक्याची थंडी पडली होती. तपमान [...]
येळ्ळूर शिवारात भातकापणीची लगबग
निसर्गानेसाथदेताचकामालासुरुवात: मजुराविनाशेतकऱ्यांचीगैरसोय: घरच्यालोकांनाहीलावलेकामाला वार्ताहर/येळळूर पावसाने दिलेली उघडीप आणि कडक ऊन यामुळे शेतकऱ्यांनी हंगाम साधून,भात कापणीला सुरुवात केल्याचे चित्र येळ्ळूर शिवारात पहायला मिळत आहे. गेले पंधरा दिवस सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची झोप उडली होती. हाता-तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो की काय असा प्रश्न अवेळी पडणाऱ्या पावसाकडे बघून शेतकऱ्याना पडला होता. पण, निसर्गाने साथ देताच त्याने भातकापणीला [...]
कडोली परिसरात यंत्राच्या साहाय्याने भातकापणी
वार्ताहर/कडोली कडोली परिसरात भातकापणीला जोर आला असून, मुजरांची टंचाई अधिक जाणवत असल्याचे चित्र दिसत असून, प्रसंगी यंत्राच्या साहाय्याने भातकापणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून भातकापणीची सुगी काही ठिकाणी आली होती. पण, पाऊस कमी होत नसल्याने भातकापणी झाली नाही. सध्या पावसाने उगडीप दिल्याने कडोली परिसरातील सर्व शिवारातील भातकापणी एकदम आली आहे. त्यामुळे सर्वच [...]
मोहम्मद शमीसंदर्भात सौरव गांगुलीचे महत्त्वाचे विधान, सिलेक्टर्सना दिला सल्ला
आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) निवड झालेली नाही. यावर हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने सिलेक्टर्सना लक्ष्य केले. सौरव गांगुली म्हणाला की, मोहम्मद शमीने हिंदुस्थानी संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायला पाहिजे. गांगुलीच्या मते, शमी सध्या तंदुरुस्त आहे आणि उत्तम गोलंदाजी करत आहे. मात्र, सिलेक्टर्स […]
करंबळ क्रॉस-नदीपर्यंतच्या रस्ताकामाच्या काँक्रिटीकरणास आजपासून प्रारंभ
21 दिवसरस्त्यावरीलवाहतूकपूर्णपणेबंदकरण्याचेआवाहन खानापूर : शहरांतर्गत असलेल्या राजा टाईल्स ते करंबळ क्रॉस या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मंगळवार दि. 11 पासून हाती घेण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा करंबळ क्रॉस ते नदीपर्यंतच्या रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील दुचाकीसह सर्व वाहतूक पूर्णपणे पुढील 21 दिवस बंद करण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात आले [...]
देसूर भागात कापणीसाठी मजुरांची जमवाजमव
वार्ताहर/धामणे धामणे, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड (ये.), नागेनहट्टी या भागातील शेतकऱ्यांनी भातपिकाच्या कापणीला जोमाने सुरूवात केली आहे. पण, कापणीसाठी रोजगाराच्या जमवाजमवीसाठी शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण कमी होवून उन्हाला सुरूवात झाल्याने आता या भागात भातकापणीला जोर आला आहे. परंतु कापणीला उशीर झाल्याने सर्वच भातपिके कापण्यासाठी आल्याने सर्वांनाच मजूर मिळणे कठीण झाले [...]
सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला तीन दिवस राहणार बंद, दिल्लीचे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद
देशाची राजधानी दिल्ली सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी हादरली, जेव्हा लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका चालत्या कारमध्ये स्फोट झाला. दिल्ली पोलिस, फॉरेन्सिक पथक आणि बॉम्ब निष्क्रिय पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून चौकशी सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांच्या […]
Kolhapur : शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला ठोकले टाळे!
चौपट भरपाईसाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न हातकणंगले : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते अंकली मार्गावरील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना चौपट मोबदल्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास सोमवारी वेगळेच वळण लागले. हातकणंगले येथील भूमी संपादन कार्यालयासमोर अतिग्रे येथील विजयपाटोळे याने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांमुळे अनर्थ टळला. त्यानंतर आक्रमक शेतकऱ्यांनी भूमी [...]
दररोज सकाळी दूध आणि केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
आपल्या शरीरासाठी दूध आणि केळी हे दोन्ही पदार्थ कायमच आरोग्यवर्धक मानले गेले आहेत. खासकरून हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्याचे खूप फायदे आहेत. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने आपण ताजेतवाने राहतो. म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये दूध केळी दोन्ही पदार्थ एकत्र करुन, शिकरणाच्या रुपात खाल्ले जातात. पालक आठवडाभर ताजा राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा दररोज सकाळी रिकाम्या […]
कारागृहांसाठी उच्चाधिकार समिती
गृहमंत्रीडॉ. जी. परमेश्वरयांचीमाहिती: बेंगळूरपरप्पनअग्रहारकारागृहातीलघटनेचातपासकरणार बेंगळूर : बेंगळूरमधील परप्पन अग्रहार कारागृहात कैद्यांना मोबाईल, टीव्ही सुविधा पुरविण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती. कैद्यांच्या बेताल वर्तनाला लगाम घालण्यासाठी व कारागृह प्रशासनाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या (एडीजीपी) नेतृत्त्वाखाली समिती स्थापण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. परप्पन अग्रहार कारागृहातील अवैध घटनांच्या [...]
परप्पन अग्रहार कारागृहातील दोन अधिकारी निलंबित
बेंगळूर : बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात फाशीची शिक्षा झालेला नराधम उमेश रेड्डी,लष्कर ए तोयबाशी संबंधित दहशतवादी आणि इतर कैद्यांना मोबाईल, टीव्ही व इतर सुविधा पुरविण्यात येत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेला जबाबदार ठरवत राज्य गृह खात्याने कारागृहाच्या मुख्य अधीक्षकांची तडकाफडकी बदली केली आहे. तर दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. परप्पन अग्रहार कारागृहातील [...]
अध्यक्षपदीएम. कृष्णारेड्डी: जी. टी. देवेगौडायांचीगच्छंती बेंगळूर : माजी पंतप्रधान व निजदचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची पुनर्रचना केली आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री व निजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांची पक्षाच्या उच्चस्तरीय राजकीय व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्य निजद कार्यकारिणी समितीच्या अध्यक्षपदावरून माजी मंत्री जी. टी. देवेगौडा यांना हटविण्यात [...]

28 C