चीनची हिंदुस्थानच्या ‘यूपीआय’सोबत स्पर्धा, पर्यटकांसाठी लाँच केले नवीन अॅप
हिंदुस्थानच्या यूपीआय प्रणालीने जगभरात आपला डंका वाजवला असतानाच आता शेजारील देश चीनने त्याची कॉपी करत पर्यटकांच्या सुविधेसाठी एक नवीन पाऊल उचलले आहे. चीनने परदेशी पर्यटकांना डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यासाठी निहाओ चायना हे अॅप लाँच केले आहे. हे अॅप खास करून चीनमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या पेमेंट समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. चीनमध्ये अलिपे आणि वीचॅट पे […]
‘दितवा’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला हिंदुस्थानने शेजारधर्माचे पालन करत विविध प्रकारे मोठी मदत केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जाफना भागातील पारांथन, किल्लीनोच्ची आणि मुल्लईतिवू या तीन शहरांना जोडणारा हा पूल अवघ्या दोन दिवसांमध्ये बांधून वाहतुकीसाठी खुला केला. चक्रीवादळामुळे या ठिकाणचा जुना पूल उद्ध्वस्त झाला होता. त्यामुळे 20 दिवसांपासून हा रस्ता बंद होता. हिंदुस्थानी सैन्याच्या […]
जोगेश्वरी, वडाळा आणि रायगड जिह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जाहीर!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते-खासदार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर नियुक्त्या सहा महिन्यांकरिता असतील, अशी माहिती शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. जोगेश्वरी विधानसभाः कक्ष विधानसभा संघटक – नितीन गायकवाड, कक्ष कार्यालय […]
राजस्थानच्या गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी
राजस्थानच्या जालोर जिह्यात पंचायतीने दिलेल्या निर्णयाने नवा वाद निर्माण झाला आहे. चौधरी समाजाच्या सुंधामाता पट्टी पंचायतीने 15 गावांतील लेकीसुनांना कॅमेरा असलेला मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. हा नियम येत्या 26 जानेवारीपासून लागू होणार आहे. गावांतील महिलांना साधा फोन वापरता येईल. शिकणाऱया मुलींना काही अटी-शर्ती टाकून या निर्णयातून सूट देण्यात आली आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, […]
तालुक्यातील पोसरे खुर्द बौद्धवाडी येथील सात घरांवर दरड कोसळून 17 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेस 5 वर्षांचा कालावधी लोटला तरीदेखील प्रशासनाने अद्याप त्यांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर उपलब्ध करून दिले नाही. पुनर्वसनाचे आश्वासन हवेतच विरलेले असताना आता अलोरे येथे राहणाऱया नागरिकांसाठी महावितरणने विद्युत देयकासाठी वीज खंडित करण्याचे फर्मान काढले आहे. प्रशासनाकडून पुनर्वसनासाठी जागेचा शोधदेखील घेण्यात आला. […]
पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरातील विविध देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेमार्फत 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्पेशल पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या आठवडाभराच्या ब्लॉकच्या अवधीत कोकण रेल्वे मार्गावरील अनेक मेल-एक्प्रेसचे वेळापत्रक कोलमडणार आहे. अप-डाऊन मेल लाईन्स, अप-डाऊन लूप लाईन्स, अप-डाऊन कर्जत लाईन्स, पनवेल स्थानकातील इंजिन रिव्हर्सल लाईन्स आणि प्लॅटफॉर्म 6 व 7 या […]
दिल्लीत 14 हजार लिटर नकली कोल्ड्रिंक जप्त
दिल्ली पोलिसांनी नकली पदार्थ बनवणाऱया टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी कारवाई करत 14 हजार लिटर नकली कोल्ड्रिंग जप्त केले आहे. तसेच एक्सपायरी डेट उलटून गेलेले फूड पॅकेट्स, चॉकलेट, बेबी प्रोडक्ट ताब्यात घेतले आहेत. दिल्ली- एनसीआर भागातून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली आणि परिसरात स्वस्त दरात खाद्यपदार्थ विकले जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. […]
स्वस्तात म्हाडाचे घर देतो सांगत चालकाची आर्थिक फसवणुक, दोघा आरोपींना अटक
चुनाभट्टी येथे 15 लाखांत म्हाडाची रुम मिळवून देतो अशी बतावणी करत धारावीत राहणाऱ्या एका कार चालकाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना रफिक अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. या दोघांनी अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय असून पोलिस अधिक चौकशी करत आहेत. शिवकुमार चव्हाण (45) आणि अभिनय कांबळे अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. शिवकुमार […]
निवडणुकीतील पैसे वाटपावर आयकर विभागाची नजर
राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आयकर विभागाने 247 कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष आयकर विभागाच्या निवडणूक निरीक्षण यंत्रणेचा एक भाग म्हणून कार्य करेल आणि आदर्श आचारसंहिता लागू असलेल्या संपूर्ण कालावधीत कार्यरत राहील. राज्यातील जागरूक नागरिक व रहिवाशांना निवडणूक प्रचारादरम्यान बेहिशेबी रोख रक्कम, मौल्यवान वस्तू किंवा इतर […]
‘लालपरी’तून सहलीला जाऊया! शाळकरी मुलांच्या मौजमजेसाठी एसटी महामंडळाचे ‘स्पेशल बुकिंग’
शालेय सहली विद्यार्थ्यांच्या बालपणातील संस्मरणीय क्षणांचा भाग असतात. सहलींचा आनंद लुटण्यासाठी आणि शाळकरी मुलांच्या मौजमजेसाठी एसटी महामंडळाने शैक्षणिक सहलींकरिता ‘स्पेशल बुकिंग’ची व्यवस्था केली आहे. सहलींसाठी नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबईतील एसटीच्या परळ, मुंबई सेंट्रल आणि कुर्ला आगारातून सहल स्पेशल गाडय़ांच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील 20 दिवसांत 30 हून अधिक एसटी […]
‘ज्ञानपीठ’ विजेते साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन
‘ज्ञानपीठ’ विजेते प्रख्यात हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे रायपूर येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 89 व्या वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘हताश से एक व्यक्ती बैठ गया था, अपने हिस्से में लोग आकाश देखते है’ अशा त्यांच्या अनेक कविता गाजल्या आहेत. त्यांच्या जाण्याने […]
अर्जावर तेजवानीच्या ऑफिसबॉयची पार्टनर म्हणून स्वाक्षरी
मुंढवा येथील 40 एकर सरकारी जमीन अमेडिया कंपनीला बेकायदा विकण्यासाठी शीतल तेजवानीचा ऑफिसबॉय चंद्रकांत तिखे याची कंपनीचा पार्टनर म्हणून अभिनिर्णय प्रक्रियेचा अर्ज, प्रतिज्ञापत्र आणि अधिकारपत्रावर स्वाक्षरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्या अनुषंगाने तेजवानी आणि या ऑफिसबॉयमध्ये झालेले व्यवहार आणि दस्ताच्या देवाणघेवाणीबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी तेजवानीच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांची वाढ करावी, अशी मागणी […]
पश्चिम रेल्वेच्या मोटरमनची डबल ड्युटीच्या सक्तीतून सुटका, आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ताळ्यावर
पश्चिम रेल्वे मार्गावरील मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरच्या प्रश्नांवर कर्मचाऱयांच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेताच रेल्वे प्रशासन ताळ्यावर आले आहे. मोटरमनवर ओव्हरटाईम, डबल डय़ुटीची सक्ती करणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सलग डय़ुटीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रासाला तोंड देणाऱया मोटरमनना रेल्वेच्या नव्या धोरणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेवर लोकल ट्रेनचे सारथ्य करणाऱया मोटरमन आणि ट्रेन […]
पार्थ पवार जमीन घोटाळ्याचे पोलीस आयुक्तांना दिले पुरावे; दमानियांनी यांची बावधन पोलीस ठाण्यात भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीच्या मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणात बावधन पोलीसांनी पार्थ पवार, अजित पवार यांचे दोन स्वीय सहायक, ओएसडी आणि सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करावा, अन्यथा न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला. त्यानंतर त्यांनी पुणे […]
सुधीरभाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? भाजपच्या आशीष देशमुख यांचा सवाल
चंद्रपुरमधील पराभव जिव्हारी लागल्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणाऱया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेवर पक्षातूनच प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. भाजप आमदार आशिष देशमुख यांनी मुनगंटीवारांची तुलना थेट माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी करत, सुधीरभाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? असा सवाल उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांची अशी कोणतीही इच्छा […]
पालघर साधू हत्याकांड प्रकरण हायकोर्टाने 4 आरोपींचा जामीन फेटाळला
पालघर जिह्यात जमावाकडून झालेल्या साधूंच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज चार आरोपींना दणका दिला. आरोपींविरोधात पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती नीला गोखले यांनी आरोपींचा जामीन फेटाळून लावला. राजेश राव, सुनील दळवी, सजनुआ बुरकुड आणि विनोद राव अशी त्या आरोपींची नावे आहेत. 14 एप्रिल 2020 रोजी, कोविड लॉकडाऊनदरम्यान, एका कारमधून प्रवास करणाऱया दोन साधूंवर […]
भाजपच्या नवनीत राणा म्हणतात, हिंदूंनी तीन ते चार मुलं जन्माला घालावीत
हिंदुस्थानला पाकिस्तान बनवायचा आहे. त्यासाठी मुस्लिम लोक मोठय़ा संख्येने मुले जन्माला घालत आहे. तर मग हिंदूंनी एका मुलावर संतुष्ट का व्हावे? हिंदूंनीदेखील किमान चार मुले जन्माला घातली पाहिजेत, असे वादग्रस्त विधान भाजप नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या नवनीत राणा यांनी अजब तर्कट मांडत नव्या वादाला तोंड फोडले आहे. […]
अजित पवार गटाची मुंबईतील युतीबाबत भाजपशी चर्चा सुरू! –सुनील तटकरे
मुंबई महापालिकेची निवडणूक नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याच्या अजित पवार गटाच्या निर्णयाला भाजपने ठाम विरोध केला असला तरीही भाजप आणि अजित पवार गटाची युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे आज स्पष्ट झाले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपबरोबर युतीबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी येत्या एक-दोन दिवसांत होणार असल्याचे सांगितले. अजित पवार गटाच्या वतीने नवाब मलिक […]
मुंबई पालिकेत महाविकास आघाडी म्हणून लढावे! –सुप्रिया सुळे
मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे. तरीही उद्धव ठाकरे व राज ठाकरे आणि काँग्रेससह महाविकास आघाडी म्हणून लढले पाहिजे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मांडली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुळे म्हणाल्या, पुण्यात अजित पवारांकडील काही पदाधिकारी […]
नॅशनल पार्कमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालघरमध्ये जागा हायकोर्टात राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र
नॅशनल पार्क मधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे तसेच पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जागा शोधल्या असून या जागांपैकी पालघरच्या केळवे येथील जागा पुनर्वसनासाठी योग्य असल्याचे सरकारने म्हटले आहे. या जागेवर शिक्कामोर्तब झाल्यास नॅशनल पार्क मधील रहिवाशांचे याठिकाणी पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हजारो रहिवासी राहत असून […]
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने विभागनिहाय निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली आहे. मुंबई पालिकेची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्यावर तर ठाणे, मीरा-भाईंदर, उल्हासनगर पालिकेची जबाबदारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर राहणार आहे. राज्यातील 29 पालिकांसाठी विभागनिहाय निवडणूक प्रभारी यांची नियुक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. यामध्ये कल्याण-डोंबिवली, भिवंडी- निजामपूर खासदार बाळय़ामामा म्हात्रे, वसई, नाशिक सुनील […]
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली. राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका व रणनीतीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर […]
भारतीय महिला संघाचा लंकेवर सलग दुसरा विजय
लंकेचा 7 गड्यांनी पराभव, सामनावीर शेफाली वर्माचे नाबाद अर्धशतक, मालिकेत 2-0 ने आघाडी वृत्तसंस्था / विशाखापट्टणम् सामनावीर शेफाली वर्माचे नाबाद अर्धशतक, भेदक गोलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षण यांच्या जोरावर मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान भारतीय महिलांनी लंकेचा 7 गड्यांनी पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा हा सलग दुसरा विजय आहे.या [...]
विजय हजारे चषक स्पर्धा आजपासून
विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिलच्या ‘स्टार पॉवर’ची जोड वृत्तसंस्था/ बेंगळूर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह अनेक अव्वल भारतीय क्रिकेटपटूंची करिश्माई उपस्थिती आज बुधवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विजय हजारे चषक स्पर्धेचे अभूतपूर्व आकर्षण असेल. यामुळे त्यांना घरगुती स्पर्धेतील खेळावर पुन्हा लक्ष केंद्रीत करताना आपला मुद्दा सिद्ध करण्याची संधी मिळते. सुपरस्टार्सच्या मखमली यादीत रिषभ [...]
मंगळवारी शेअर बाजार सपाट स्तरावर बंद
सेन्सेक्स घसरणीत तर निफ्टी अल्पशा तेजीत मुंबई : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअरबाजारात दिवसभरात चढउतार पाहायला मिळाला. आयटी, फार्मा आणि बँकिंग समभागांच्या विक्रीवर गुंतवणूकदारांनी भर दिला होता. सरतेशेवटी सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक सपाट स्तरावर बंद झाला. मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 42 अंकांनी घसरत 85524 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा [...]
कर्रेगुट्टा हिल्समध्ये नक्षलींचा ‘दारूगोळा’ हस्तगत
सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेत यश : जमिनीत गाडून ठेवला होता दारूगोळा वृत्तसंस्था/ बिजापूर छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शोधमोहिमेदरम्यान कर्रेगुट्टा हिल्सच्या डोलीगुट्टा शिखर क्षेत्रात जवानांनी शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा हस्तगत केला आहे. या भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबविली होती. नक्षलवाद्यांनी जमिनीत ख•ा करत शस्त्रास्त्रांसह स्फोटके लपविली होती.नक्षलवाद्यांची शस्त्रास्त्रs, दुरुस्ती उपकरणे, बीजीएल सेल [...]
बंदी टाळण्यासाठी बाइटडान्सने केला करार : डेटाचे नियंत्रण अमेरिकन गटाकडे जाणार वॉशिंग्टन : लोकप्रिय लघु व्हिडिओ अॅप टिकटॉकने अमेरिकेतील आपला व्यवसाय विकण्यासाठी करार केला आहे. टिकटॉकची मूळ कंपनी, चीनची बाइटडान्सने अमेरिकेतील अॅपवरील संभाव्य बंदी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या करारांतर्गत, टिकटॉकचे अमेरिकन युनिट आता अमेरिकन गुंतवणूकदारांच्या नेतृत्वाखालील एका उपक्रम (गट) कडे हस्तांतरित केले जाईल. [...]
भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा दणका
बागलकोट, विजापूर, कारवारसह अनेक जिल्ह्यात छापा : निवासासह कार्यालयांमध्ये शोधमोहीम प्रतिनिधी/ बेंगळूर बागलकोट, विजापूर, कारवार आणि रायचूरसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारी पहाटे एकाचवेळी भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांसह कार्यालयांवर छापे टाकून धक्का दिला. छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात मालमत्ता आढळून आली आहे. अनेक अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा छापा टाकण्यात आला. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांसह कार्यालयांमध्ये शोधमोहीम [...]
आसामच्या कार्बी आंगलोंगमध्ये हिंसा
गुवाहाटी : आसामच्या कार्बी आंगलोंगमध्ये निदर्शकांनी कार्बी आंगलोंग ऑटोनॉमस कौन्सिलच्या प्रमुखाला घराला आग लावली आहे. तर स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला, यात तीन निदर्शक जखमी झाले आहेत. पीजीआर आणि व्हीजआर जमिनीवरील अवैध कब्जा हटविण्याच्या मागणीवरुन निदर्शक 12 दिवसांपासून उपोषण करत होते. हिंसेनंतर कार्बी आंगलोंग आणि पश्चिम कार्बी आंगलोंगमध्ये कलम 163 लागू करण्यात आले [...]
9.3 लाख कोटीद्वारे गाझा होणार स्मार्टसिटी
ट्रम्प प्रशासन 5 लाख कोटी रुपये देणार : लक्झरी रिसॉर्ट अन् हायस्पीड रेल्वेसुविधा वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन युद्धाने जर्जर झालेल्या गाझाला पुन्हा सावरण्यासाठी अमेरिकेने एक मोठी योजना सादर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत गाझाला समारे 9.3 लाख कोटीच्या (112 अब्ज डॉलर्स) निधीद्वारे एका आधुनिक स्मार्टसिटीत बदलण्यात येणार आहे. यातील जवळपास 5 लाख कोटी रुपयांची (60 अब्ज डॉलर्स) [...]
टाटाने 1 लाख नेक्सॉनची केली विक्री
नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने आपल्या नेक्सॉन इलेक्ट्रीक वाहनांच्या बाबतीमध्ये नवा विक्रम साध्य केला आहे. कंपनीने 1 लाख नेक्सॉन इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करण्यामध्ये यश मिळविली आहे. भारतात सध्याला पाहता 2 लाख 50 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने कंपनीची कार्यरत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांप्रती प्रगती करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. एकंदरीत इलेक्ट्रिक वाहनांच्या योगदानांमध्ये [...]
अनन्या-कार्तिकच्या चित्रपटाचा ट्रेलर सादर
25 डिसेंबरला होणार प्रदर्शित कार्तिक आर्यन आणि अननया पांडे यांचा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरची सुरुवात कार्तिकसोबत होते, ज्यात तो भूतकाळ आणि भविष्यकाळाची चिंता सोडून देत केवळ वर्तमानात जगावे असे सांगत असल्याचे दिसून येतो. यानंतर ट्रेलरमध्ये अनन्याची एंट्री होते, यात ती एका लेखिकेच्या भूमिकेत [...]
बांगलादेश उच्चायोगावर उग्र निदर्शने
हिंदू युवकाच्या हत्येचा निषेध, हिंदू संघटना एकत्र वृत्तसंस्था / नवी दिल्ली बांगलादेशच्या उच्चायोग निवासाच्या बाहेर हिंदू संघटनांनी उग्र निदर्शने करत त्या देशात झालेल्या हिंदू युवकाच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी एकत्र येऊन या निदर्शनाचे आयोजन केले होते. या संघटनांचे सहस्रावधी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकही या निदर्शनांमध्ये सहभागी झाले [...]
समुद्रात उतरलेल्या पाणबुड्याच्या शरीरात फैलावला नायट्रोजन
10 वर्षांपासून फुगलंय ‘फुग्या’सारखे शरीर समुद्रात खोलवर जात कमाई करणाऱ्या डायवर्ससमोर अनेक संकटं उभी राहत असतात. परंतु पेरूच्या एका मच्छिमारासोबत जे घडले, ते जगभरातील चिकित्साशास्त्रासाठी एक कोडं ठरले आहे. एका साधारण डायविंग दुर्घटनेने एलजांद्रो विली रामोस मार्टिनेजचे जीवनच बदलून गेले. पेशाने डायवर राहिलेल्या एलेजांद्रोने 10 वर्षांपूर्वी समुद्रात उडी घेतली होती, तेव्हा एका दुर्घटनेत त्याचा ऑक्सिजन [...]
कार्ति चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ
चिनी व्हिसा घोटाळा प्रकरण : आरोप निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीतील एका न्यायालयाने चिनी व्हिसा घोटाळ्याशी निगडित सीबीआय प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ति पी. चिदंबरम आणि अन्य जणांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश मंगळवारी दिला आहे. हे प्रकरण 2011 शी संबंधित असून तेव्हा कार्ति यांचे पिता पी. चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते. पंजाबच्या [...]
हजारो नव्या ‘एपस्टिन फाईल्स’ उघड
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी अमेरिकन प्रशासनाच्या न्याय विभागाने हजारो नव्या ‘एपस्टिन फाईल्स’ उघड केल्या असून अनेक कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडीओ फिती आणि संवाद यांच्या त्यांच्यात समावेश आहे. 19 जानेवारी पासून अमेरिकेने या फाईल्स सार्वजनिक करण्यास प्रारंभ केला आहे. या फाईल्सची संख्या कोट्यावधींच्या घरात असल्याने त्या पूर्णत: सार्वजनिक करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे, असे अमेरिकेच्या न्याय [...]
अमेरिकेत मेक्सिकोच्या नौदलाचे विमान कोसळले, 5 ठार
वृत्तसंस्था/ गॅलवेस्टन मेक्सिकोच्या नौदलाचे विमान अमेरिकेच्या गॅलवेस्टनजीक कोसळले आहे. या विमानातून 7 जण प्रवास करत होते, ज्यातील कमीतकमी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर टेक्सास किनाऱ्यानजकी पाण्यात उर्वरित लोकांचा शोध घेतला जातोय. विमानात मेक्सिकोच्या नौदलाचे 4 अधिकारी होते, तसेच एका मुलासह सामान्य नागरिकही प्रवास करत होते. अमेरिकेच्या तटरक्षक दलाने विमान दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची [...]
नौदलाची स्टिच्ड नौका निघणार समुद्रप्रवासावर
पोरबंदर ते मस्कत मग बाली येथे जाण्याची योजना वृत्तसंस्था/नवी दिल्ली भारतीय नौदलाची अनोखी स्टिच्ड नौका (शिवलेले जहाज) आयएनएसव्ही कौंडिन्य स्वत:चा पहिला सागरी प्रवास सुरू करणार आहे. याचा पहिला सागरी प्रवास गुजरातच्या पोरबंदर येथून सुरू होईल आणि ही नौका ओमानच्या मस्कत येथे पोहोचणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या नौकेला फ्लॅगऑफ करणार आहेत. कौंडिन्यचा हा प्रवास ऐतिहासिक [...]
अरुणाचलमध्ये हेरांच्या रॅकेटचा पर्दाफाश
कुपवाडाच्या दोन जणांना अटक वृत्तसंसथा/ ईटानगर अरुणाचल प्रदेशात हेरगिरीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ईटानगर पोलिसांनी अरुणाचल प्रदेशात हेरगिरीच्या कारवाया केल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या दोन जणांना अटक केली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातून या दोन्ही आरोपींना अटक करत अरुणाचल प्रदेशात आणले गेल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक चुखु आपा यांनी मंगळवारी दिली आहे. एजाज अहमद भट आणि बशीर अहमद [...]
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे: ठाकरे बंधू एकत्र येत असताना पवार बंधू-भगिनीही एकत्र येणार का? 26 डिसेंबरला दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील का, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की, अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. चर्चा सुरू आहेत, पण पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाईल! अजित [...]
ट्रंप यांची स्थलांतरितांना ख्रिसमस ऑफर
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेत अवैधरित्या आलेले स्थलांतरीतांसाठी एक ख्रिसमस ऑफर दिली आहे. जे स्थलांतरीत स्वत:हून अमेरिका सोडून जाण्यास राजी असतील, त्यांना प्रत्येकी 3 हजार डॉलर्स आणि त्यांच्या ज्या स्थानी जायचे आहे, त्या स्थानापर्यंत विनामूल्य विमानप्रवास अशी ही ऑफर आहे. अशा स्थलांतरितांसाठी अमेरिकेच्या प्रशासनाने एक अॅपही उपलब्ध करुन दिले असून या अॅपचा [...]
मध्यप्रदेशात वगळली 42 लाख नावे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण’ किंवा एसआयआर प्रक्रियेचा प्रथम टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मध्यप्रदेशात 42 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली असून छत्तीसगडमध्ये ही संख्या 27 लाखांहून अधिक आहे. निवडणूक आयोगाने या दोन्ही राज्यांच्या अस्थायी मतदारसूची प्रसिद्ध केला आहेत. मध्यप्रदेशात एसआयआर प्रक्रियेच्या प्रारंभिक [...]
आजचे भविष्य बुधवार दि. 24 डिसेंबर 2025
मेष: व्यापारात मजबुती येण्यासाठी महत्वाचे पाऊल उचला वृषभ: सहकाऱ्यांशी चातुर्याने व्यवहार करा, तणावमुक्त राहा. मिथुन: बचत केलेल्या धनाचा आज उपयोग होईल, समाधानी असाल कर्क: सट्टेबाजीपासून दूर राहा. तुमच्या कामाविषयी कुतूहल वाढेल सिंह: तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्यांकडे दुर्लक्ष केल्यास फायदा कन्या: आवडीचे छंद जोपासताना आनंद वाटेल. स्वत:साठी वेळ काढा तुळ: निष्काळजीपणामुळे आजार वाढण्याची शक्यता वृश्चिक: मित्रांचे [...]
भंडाऱ्यात ईव्हीएमवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव झाकले, सात कर्मचारी निलंबित
भंडारा नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवार करुणा राऊत यांचे ईव्हीएम बॅलेट युनिटवरील नावच मतदानाच्या वेळी गायब झाल्याचे आढळून आले आहे. याची गंभीर दखल घेत भंडारा जिल्हाधिकाऱयांनी संबंधित मतदान केंद्रावरील सात कर्मचाऱयांना निलंबित केले आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी असणाऱया भंडारा प्रांत अधिकारी माधुरी तिखे आणि […]
महाराष्ट्र आणि मराठी माणसाला प्रतीक्षा असलेला ऐतिहासिक क्षण अखेर आला आहे. तमाम मराठी माणसाच्या मनासारखं घडत आहे. शिवसेना आणि मनसे युतीचा निर्णय झाला आहे. मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या दुपारी 12 वाजता युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. […]
दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुटलेली राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका होत असून, येत्या दोन दिवसांत एकत्रित लढण्याबाबत मी स्वतः यावर खुलासा करेन, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. दोन दिवसांत याबाबत घोषणा केली जाणार असल्याचे पदाधिकाऱयांनी जाहीर केले आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप विरोधात ताकद एककटण्याचे […]
मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकाम स्थळांवरील असुरक्षित परिस्थितीबद्दल उच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त करत पालिका आयुक्त तसेच एमपीसीबीला धारेवर धरले. वायू प्रदूषण रोखण्यासाठी अधिकाऱयांनी निर्णायकपणे कारवाई केली नाही तर मुंबईला दिल्लीसारख्या प्रदूषित हवेच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो असे खडसावत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने अधिकाऱयांच्या निक्रियतेवर बोट ठेवले. इतकेच नव्हे तर पालिका […]
अमेरिकेने केले 95 हजार व्हिसा रद्द, हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मोठा फटका
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चालू वर्षात आतापर्यंत तब्बल 95 हजार परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली असून हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. सध्या अमेरिकेत असलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसाची काटेकोर तपासणी केली जात आहे. या तपासणीअंती डिसेंबरच्या सुरुवातीला 85 हजार व्हिसा रद्द करण्यात आले होते. […]
हिंदुस्थानच्या निवडणूक यंत्रणेत गडबड, बर्लिनमधून राहुल गांधींचा हल्ला
‘हिंदुस्थानातील संस्थात्मक व्यवस्थेवर घाऊक हल्ले होत असून सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचा विरोधकांविरोधात शस्त्रासारखा वापर होत आहे. देशातील निवडणूक यंत्रणेतही मोठी गडबड आहे,’ असा हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. जर्मनीतील बर्लिन येथे हर्टी स्कूलमध्ये चर्चासत्रात त्यांनी भाग घेतला. त्यावेळी त्यांनी हिंदुस्थानातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले. आम्ही लढत राहणार! ‘निवडणुकांमध्ये गडबड घोटाळा आहे हे […]
सामना अग्रलेख –सुधीरभाऊंची सल! भाजपचे ‘शनी शिंगणापूर’
पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भाजपची तुलना थेट शनी शिंगणापूरशी केली आहे. मात्र एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातच भाजपचे ‘शनी शिंगणापूर’ झाले आहे काय? राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपची दारे सर्वपक्षीय नेत्यांसाठी सताड उघडी आहेत. राज्यातच कशाला, संपूर्ण देशभरातच भारतीय जनता पक्षाचा ‘शनी शिंगणापूर’ झाला आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांवर घोटाळ्यांचे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि […]
लेख –शिक्षकांसमोर टीईटीचे धर्मसंकट!
>> ज. मो. अभ्यंकर jmabhyankar@yahoo.com शैक्षणिक वर्तुळात, विशेषतः शिक्षक वर्तुळात सध्या एकच विषय चर्चेच्या केंद्रीभूत आहे आणि तो म्हणजे ‘टीईटी’. शिक्षक वर्गासाठी अनिवार्य केलेली ही ‘किमान शैक्षणिक अर्हता’ परीक्षा, त्यासंदर्भात असलेले वेगवेगळे विचार प्रवाह, त्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, आधीचे काही शासन निर्णय, त्यांचे काढले जाणारे अर्थ अशा फेऱयांत टीईटी आणि ती द्यावी लागणारा शिक्षक […]
प्रासंगिक –विविध देशांतील ख्रिसमस!
>> गौरी मांजरेकर ख्रिसमस हा सण जगभरात मोठय़ा उत्साहाने आणि आनंदात साजरा केला जातो. हा सण जगभर साजरा होत असला तरी प्रत्येक देशाने स्वतःची आगळीवेगळी संस्कृती आणि समृद्ध परंपरा यांच्यासोबत आपल्या खास ढंगात व जोशात उत्सवाचा जिवंतपणा जपला आहे. भारत हा विविध संस्कृतींचा आणि सणांचा देश आहे. विशेषतः गोवा, केरळ, मुंबई आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये […]
भगवद्गीता धार्मिक नाही!मदास हायकोर्टाने नोंदवले निरीक्षण
‘भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून नैतिक शास्त्र आहे. हा ग्रंथ हिंदुस्थानच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून त्याला कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत बांधता येणार नाही,’ असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मद्रास हायकोर्टाने नोंदवले आहे. ‘आर्ष विद्या परंपरा’ नामक ट्रस्टने विदेशी निधी मिळवण्याच्या उद्देशाने एफसीआरए अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज केला होता, मात्र ही संस्था धार्मिक असून तिने आधीच परवानगीशिवाय विदेशी निधी […]
अजब महायुती सरकारचा गजब कारनामा, कोकणात प्रदूषण होणार की नाही? लक्ष्मी ऑरगॅनिक्सकडेच मागितला अहवाल
इटलीतून हद्दपार करण्यात आलेला विनाशकारी रासायनिक प्रकल्प चिपळुणातील लोटे औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच महायुती सरकारची अक्षरशः पळापळ झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहा अधिकाऱयांचे पथक मुंबईतून तातडीने लोटे येथे दाखल झाले आहे. दरम्यान, लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनीने हा प्रकल्प उभारला असून या प्रकल्पामुळे प्रदूषण होणार की नाही, याचा अहवाल एमपीसीबीने कंपनीकडेच मागितल्याची […]
इलेक्ट्रिक वाहन ‘सक्ती’ ठीक, पण सुरक्षेचे काय? बाईक टॅक्सी संघटनांचा सवाल
सरकारने रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी सेवांना फक्त इलेक्ट्रिक वाहन असणे अनिवार्य केले आहे. मात्र अनेक बाईक टॅक्सींकडून बेकायदेशीरपणे ही सेवा दिली जात आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनसक्ती ठीक, मात्र सुरक्षेचे काय, असा सवाल बाईक टॅक्सी संघटनांकडून करण्यात येत आहे. शहरी वाहतुकीतील सुरक्षितता ही वाहन पेट्रोलवर चालते की विजेवर चालते यापेक्षा त्या सेवेच्या रचनेची पद्धत, देखरेख आणि जबाबदारीवर […]
उत्तम कलाकृतीच्या निर्मितीसाठी वेडं व्हावं लागतं, अशोक नायगावकर यांचे प्रतिपादन
शहाणपण काही कामाचं नाही. कोणत्याही उत्तम कलाकृतीच्या निर्मितीसाठी वेडं व्हावं लागतं. जे वेडे झाले त्यांच्या हातून उत्तम कलाकृती घडल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी आज केले. नॅशनल लायब्ररी, वांद्रे येथे पाच दिवसीय ‘शब्दोत्सव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई आणि गिरणगावातील मराठी माणसाच्या व्यथा, वेदना, जीवन संघर्ष […]
साहित्य संमेलनात होणार 110 पुस्तकांचे प्रकाशन
सातारा येथे होणाऱया 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यभरातील लेखकांची तब्बल 110 पुस्तके प्रकाशित होत आहेत. पाच सत्रांत होणाऱया या प्रकाशन कट्टय़ाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रकाशन कट्टय़ाचे घनश्याम पाटील यांनी दिली. 1 जानेवारी रोजी पहिल्या सत्रात राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांच्या ऐतिहासिक सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक […]
बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंच्या देशांतर्गत सामन्यातील मानधन वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिला खेळाडूंना आता प्रथम श्रेणी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रति सामना 50 हजार रुपये मानधन मिळणार आहे. याचबरोबर टी-20 सामन्यासाठी 25 हजार रुपये दिले जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘बीसीसीआय’ने यापूर्वीच महिला आणि पुरुष खेळाडूंचे सामना मानधन समान केलेले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुरुषांइतकेच मानधन बीसीसीआयने 22 डिसेंबरला […]
इंडोनेशियाचा वेगवान गोलंदाज गीड प्रियांदना याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. मंगळवारी बालीतील उदयाना क्रिकेट स्टेडियमवर कंबोडियाविरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात तब्बल 5 विकेट टिपण्याचा अनोखा विश्वविक्रम केला. हा सामना इंडोनेशियाने 60 धावांनी जिंकला. 28 वर्षीय गीड प्रियांदना हा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात 5 विकेट टिपणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 […]
चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामने आता सीओईवर, सुरक्षेमुळे विजय हजारे ट्रॉफीचे सामने स्थलांतरित
बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसंदर्भात एक महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा कारणांचा हवाला देत कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारे सर्व सामने आता बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे हलवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे खेळाडू, टीम मॅनेजमेंट आणि प्रशंसकांचे लक्ष वेधले गेले आहे. चिन्नास्वामी स्टेडियम देशातील सर्वात प्रतिष्ठत क्रिकेट […]
टी-20 वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, पॅट कमिन्सच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह
आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या आधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार आणि आघाडीचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्या फिटनेसबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्ड्रय़ू मॅकडोनाल्ड यांनी स्पष्ट संकेत दिले असून कमिन्सचा पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधील सहभाग सध्या ‘अत्यंत अनिश्चित’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. […]
दीप्ती शर्माची ऐतिहासिक झेप : टी-20 क्रमवारीत गोलंदाजीत जगात अव्वल
हिंदुस्थानची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने कारकीर्दीतील सर्वोच्च यश संपादन करत प्रथमच आंतरराष्ट्रीय टी-20 गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. श्रीलंकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे झालेल्या घरच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात तिने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे ही झेप शक्य झाली. चार षटकांत केवळ 20 धावा देत 1 विकेट घेत दीप्तीने सामन्यावर पकड मिळवली आणि हिंदुस्थानच्या 8 […]
कौटुंबिक वादातून पत्नीने पतीचे डोके भिंतीवर आपटून केला खून
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे एका ३६ वर्षीय तरुणाचा त्याच्याच पत्नीने डोके भिंतीवर आपटून आणि गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रशांत प्रकाश गायकवाड (वय ३६) असे मृताचे नाव असून, सुरुवातीला अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नीचा प्रताप अहमदपूर पोलिसांनी पर्दाफाश केला. नेमकी घटना काय? मयत प्रशांत आणि त्याची पत्नी अर्चना (वय ३०) यांच्यात […]
बीड जिल्ह्याच्या राजकारणातून क्षीरसागर घराणे हद्दपार, चाळीस वर्षांच्या राजकारणाचे पानिपत झाले
>> उदय जोशी ‘बीडमध्ये श्वासही घ्यायचा असेल तर तो क्षीरसागरांच्या परवानगीने!’ असे गमतीने म्हटले जायचे. क्षीरसागर नावाच्या वटवृक्षाखाली अनेक राजकीय झुडपे उगवली आणि नामशेष झाली. या वटवृक्षाला कुर्हाडी, करवती लावण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला; परंतु त्याची साधी पारंबीही कुणी तोडू शकले नाही. कालचक्राच्या ओघात क्षीरसागर घराण्याच्या पाती विखुरल्या, राजकारणावरची पोलादी पकड सैल झाली आणि हे मातब्बर […]
१३ पैकी ३ नगर परिषदांमध्ये विजय, अशोक चव्हाण यांचा उपयोग काय? भाजपच्या निष्ठावंताचा संतप्त सवाल
>> विजय जोशी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेऊन काय उपयोग झाला? त्यांनी पक्षासाठी काय केले? असा संतप्त सवाल भाजपचेच निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी होती. त्यांच्या नेतृत्वात १३ पैकी फक्त ३ नगर परिषदांत भाजपला विजय मिळाला, बाकी ठिकाणी पराभवाची नामुष्की पदरात पडली. जिल्हा वार्यावर सोडून ते स्वत:च्या मतदारसंघात […]
>> सचिन कावडे मुख्यमंत्र्यांनी दोन सभा घेऊनही केवळ आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेभळट धोरणामुळे हिंगोलीत भाजप रसातळाला गेली. हिंगोलीत मिंध्यांच्या दांडगाईपुढे भाजपने अक्षरश: गुडघे टेकले. स्वत:ला कार्यसम्राट म्हणवून घेणार्या आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वावरच या निकालाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत या तीन नगर परिषदांसाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या तीनही […]
आम्ही हिंदुस्थानातले सर्वात मोठे पळपुटे, ललित मोदी व विजय मल्ल्याने हसत हसत दिली कबूली
देशाला कोटय़वधी रुपयांचा चुना लावून परदेशात परागंदा झालेला उद्योगपती विजय मल्ल्या आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हे दोघेही अत्यंत निर्लज्जपणे आम्ही हिंदुस्थानातील सर्वात मोठे फरार पळपुटे असल्याची कबूली दिली आहे. View this post on Instagram A post shared by Lalit Modi (@lalitkmodi) […]
पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पीआयएचा लिलाव, आरिफ हबीब ग्रुपने ४३२० कोटी रुपयांना केले खरेदी
पाकिस्तानची सरकारी मालकीची विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचा (पीआयए) लिलाव करण्यात आला. आरिफ हबीब ग्रुपने पीआयएला ४,३२० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पाकिस्तान सरकारने एअरलाइनच्या विक्रीसाठी ३,२०० कोटी अंदाज लावला होता. परंतु त्यांना १,३२० कोटी जास्त मिळाले. एअरलाइनसाठी आरिफ हबीब ग्रुप आणि लकी सिमेंट ग्रुपमध्ये मोठी बोली लावली होती. मात्र सर्वात मोठी बोली लावून आरिफ […]
शिक्षणाधिकाऱ्याने केला १२ कोटींचा भ्रष्टाचार! शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी आणखी एक अटक
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आणखी एका एका शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. एसआयटीने जिल्हा परिषदचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक केली आहे. शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणालीच्या गैरवापर प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. काटोलकर यांच्यावर 12 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत […]
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबर पासून ऑनलाईन नोंदणी, सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 जानेवारी ते 31 मार्च, 2026 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात दि. 26 डिसेंबर रोजी स.11.00 पासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज […]
WPL 2026 –वर्ल्ड कप विजेतीच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची धुरा
महिला प्रीमियर लीग 2026 चे वारे आतापासूनच वाहायला सुरुवात झाली आहे. नववर्षावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. अवघ्या काही दिवसांवर स्पर्धा येऊन ठेपली आहे. अशातच दिल्ली कॅपिटल्सने मोठा डाव टाकत वर्ल्ड कप विजेत्या जेमिमा रोड्रिग्जवर कर्णधारपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. मागील तीन हंगामात ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मॅग लॅनिंगने दिल्लीचे कर्णधारपद भुषविले. मात्र, […]
संगमनेरमध्ये कत्तलखान्यावर छापा, 700 किलो गोमांस जप्त
संगमनेरमध्ये गोमांसाचे अवैध कत्तलखान बंद होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. कारवाया होतात, पण धंदे पुन्हा आडमार्गे सुरूच राहतात. रविवारी मध्यरात्री शहर पोलिसांनी मदिना नगर भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर धडक कारवाई करत ७०० किलो गोमांस जप्त केले. या कारवाईत सव्वा दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पोलीस […]
अरुणाचल प्रदेश पोलिसांनी चीनच्या सीमेजवळील भागात हेरगिरीच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील दोन व्यक्तींना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या दोघांची नावे एजाज अहमद भट आणि बशीर अहमद गनाई अशी आहेत. हे दोघे १८ डिसेंबर रोजी कुपवाड्यातून […]
रत्नागिरी पंचायत समितीने आज एका दिवसात मिशन बंधारे उपक्रमांतर्गत 95 ग्रामपंचायतीमध्ये पाचशेहून अधिक बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली. कोतवडे गावच्या घारपुरेवाडीत बचतगट महिलांच्या लक्षणीय आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून वेतोशी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे जलसाठ्याचा दृश्यपरिणाम तात्काळ दिसून आला. गावासाठी आता हा बंधारा उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या […]
बिग बॉस फेम अभिनेत्याने केला साखरपुडा, या राज्यात पार पडला सोहळा
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता जय दुधाने याने त्याची गर्लफ्रेंड व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलसोबत साखरपुडा केला आहे. उत्तराखंडमधील मसुरीच्या डोंगरदऱ्यांत हा सोहळा पार पडला. View this post on Instagram A post shared by J A Y A N I L D U D H A N E (@jaydudhaneofficial) […]
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात ‘गौडगाव बु’चा पर्यटन विकास उपक्रमात समावेश
गौडगाव ‘धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे गाव’ म्हणून विकसित अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थाच्या पदस्पर्शनि पावन झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव (ता. अक्कलकोट) हे गाव धार्मिक आणि ग्रामीण परंपरेचा अनोखा संगम असलेले गाव म्हणून पुढे येत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद [...]
Unnao case –भाजपचा माजी आमदार बलात्कारी कुलदीप सेंगरला जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने त्याला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद आणि हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला होता. न्यायालयाने कुलदीप सेंगरला १५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. तसेच तितक्याच […]
Solapur : करमाळा-टेंभुर्णी महामार्गावर पिकअप-दुचाकीच्या धडकेत मामा-भाच्याचा मृत्यू
पंढरपूरच्या रानमळा परिसरात भीषण अपघात टेंभुर्णी : करमाळा-टेंभुर्णी महामार्गावर भरधाव पिकअप टेम्पोने समोरा समोर दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भोसे शिवारातील रानमळा (ता. पंढरपूर) येथील उत्तम निवृत्ती सरडे (वय ६६). नवनाथ रामा जमदाडे (वय ४०) हे [...]
जिल्ह्यातील शेत आणि पाणंद रस्ते मिशन मोडवर ,जानेवारीपासून कामांना गती - आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दळणवळणाच्या मूलभूत सुविधांचा दर्जेदार लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेत आणि पाणंद रस्ते मिशन मोडवर पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात येत्या जानेवारी महिन्यापासून युद्धपातळीवर सुरू होणार असून, यासाठी मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात मिशन मोडवर हाती घेण्यात आलेल्या या कामांसाठी मनरेगा योजना तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये 50 हजार रुपये शेतकऱ्यांचा सहभाग व 1 लाख रुपये शासनाचा वाटा अशा पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी निधी मिळणार आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक असून, जानेवारी महिन्यापासून हे काम मिशन मोडवर हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. शेतकरी बांधवांच्या वाट्याला केवळ मूलभूत सुविधांअभावी येणाऱ्या अडचणी ध्यानात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्राधान्याने शेत आणि पाणंद रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि संबंधित सर्व यंत्रणांना शेत आणि पाणंद रस्त्यांच्या कामांबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्याबाबतही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. शेत रस्त्यांच्या कामात कुणाकडून अडवणूक होत असल्यास संबंधित तहसीलदारांकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात काही अडचण असल्यास 8888627777 या क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तक्रार नोंदविण्याचे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा : आमदार राणाजगजितसिंह पाटील राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला असून या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. मिशन मोडवर सुरुवातीला रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत. यात जर कोण आडकाठी आणत असेल तर संबंधित तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर लोकसहभागातून 50 हजार व शासनाचे 1 लाखातून मातीकाम करण्यात येणार आहे.त्यानंतर मजबुतीकरण करण्यासाठी 15 लाख निधी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
बापूराव पाटील यांचा बसवरत्न पुरस्कार समिती तर्फे सत्कार
मुरुम (प्रतिनिधी)- मुरुम नगरपरिषदेच्या राजकारणात गेल्या 50 वर्षांपासून कै. माधवराव पाटील यांच्या वारसा जपत एकहाती सत्ता अबाधित राखत, जनमानसावर अधिराज्य गाजवणारे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा नगराध्यक्ष पदी विराजमान झालेले लोकनेते, बापूराव पाटील यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. 'बसवरत्न पुरस्कार सोहळ्याचे'मुख्य आधारस्तंभ बापूराव पाटील यांचा 'बसवरत्न पुरस्कार नियोजन समिती, धाराशिव'यांच्या वतीने करण्यात आला मुरुम शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन गेली पाच दशके सातत्याने सत्तेवर राहणे ही एक साधी गोष्ट नसून, ती पाटील परिवाराच्या जनसामान्यांशी असलेल्या घट्ट नात्याची पावती आहे. लोकशाहीत लोकांचे प्रेम टिकवून ठेवणे कठीण असते, परंतु कै. माधवराव पाटील यांच्या नंतर बसवराज पाटील, बापूराव पाटील व युवा नेतृत्व शरण पाटील यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि दूरदृष्टीने मुरुम नगरपरिषदेवर आपली पकड कायम मजबूत ठेवली आहे. 50 वर्षांच्या या राजकीय प्रवासात अनेक लाटा आल्या आणि गेल्या, पण पाटील यांचे नेतृत्व एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अढळ राहिले आहे, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. पाटील परिवाराच्या या अभूतपूर्व यशाचे मुख्य सूत्र म्हणजे त्यांनी कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नाही. “सर्व जाती-धर्माला सन्मानपूर्वक न्याय“ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून त्यांनी समाजकारण केले. मुरुममधील प्रत्येक घटकाला, मग तो कोणत्याही समाजाचा असो, पाटील परिवाराने नेहमीच आपले मानले आहे. याच सर्वसमावेशक वृत्तीचे फलित म्हणजे आज 50 वर्षांनंतरही नगरपरिषदेची सत्ता त्यांच्याकडे अबाधित आहे. जनतेचा हा विश्वास संपादन करणे हेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठे यश आहे. यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, युवा नेते शरणजी पाटील यांच्यासह बसवरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष सन्नी पाटील,बालाजी पाटील, धनराज धुम्मा, करण पाटील, संगमेश्वर वारद, जगदीश वरकले आदीनी बापूराव पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बापूराव पाटील नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्यामुळे मुरुम शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, तो असाच पुढे चालू राहील. पाटील साहेबांचे हे नेतृत्व आणि 50 वर्षांची ही यशस्वी कारकीर्द भावी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
एनसीसी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिरात 51 जणांनी केले रक्तदान
मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे एनसीसी व एनएसएस, एचडीएफसी बँक, श्रीकृष्ण रक्तपेढी, रोटरी क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात अस्वले सरांनी रक्तदान केल्यामुळे हृदयरोग , कँसर , मधुमेह , रक्तदाब ,यासारखे रोग होण्याचा धोका कमी होतो . रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे या उक्ती प्रमाणे प्रत्येक व्यक्तिने रक्तदान करून एखाद्या गरजवंतास जीवदान देऊन त्याचे प्राण वाचवावे . उमरगा शहर हे महामार्गावर असल्यामुळे अनेक अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेक रक्तपेढया मध्ये रक्त कमी पडत असते अशावेळी श्रीकृष्ण रक्तपेढी गरजुंना मदत करत असते तसेच रोटरी क्लब ,भारतातील अग्रगण्य अशी एचएफडीसी बँक नेहमी सामाजिक कार्य करत असते यासाठी अनेक सामाजिकसंस्था , महाविद्यालयाने असे कार्यक्रम घेऊन व्यक्तिचे प्राण वाचवावे असे आव्हान त्यांनी केले. या शिबिरामध्ये एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसी बँकेचे मॅनेजर श्री आशिष बिराजदार , डॉ धनंजय मेनकुदळे, प्रा आर एम जोशी, विजय केवडकर उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, डॉ भरत शेळके डॉ अशोक पदमपल्ले, डॉ विनोद देवरकर, प्रा गुंडाबापू मोरे , प्रा शैलेश महामुनी बँकेचे , रक्तपेढीचे सर्व कर्मचारी महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी ,मोठ्या संख्येने एनसीसी कॅडेट्स व एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अनिल देशमुख, केले तर कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आंबेगावातील शेतकरी मारहाण प्रकरणी संबंधितावर कारवाई नाही
पोलीस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा आंबेगाववासियांचा इशारा ओटवणे |प्रतिनिधी आंबेगाव येथील शेतकरी जानू फाले यांना आंबोली येथे अमानुष मारहाण केलेल्या संबंधितावर पाच दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. याबाबत आंबेगाव ग्रामस्थानी तीव्र नाराजी व्यक्त करीत मंगळवारी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेत याबाबत संबंधितावर तात्काळ कारवाई न केल्यास सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने पोलीस ठाण्यावर [...]
Solapur Crime : सांगोल्यात इन्कम टॅक्स विभागात मुलांना नोकरी लावतो म्हणून १५ लाख रुपये उकळले
सांगोल्यात पैशांसाठी फसवणूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात सांगोला : इन्कम टॅक्स विभागात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून १५ लाख रुपये उकळले. फसवणूक केल्याप्रकरणी भोपसेवाडी, जवळा येथील व्यक्तीने संतोष राचय्या स्वामी (रा. गाताडे प्लॉट, जुना कराड नाका मागे, पंढरपूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा [...]
कंडारी हत्या प्रकरण: आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी
परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील कंडारी येथे 15 डिसेंबर रोजी घडलेल्या मोतीराम जाधव यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा. यासाठी 'मी वडार महाराष्ट्राचा'संघटनेच्या वतीने सोमवार दि.22 डिसेंबर रोजी सदरील घटनेच्या निषेधार्त परंडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून शांततेत लाँग मार्च काढत तहसील कार्यालयावर शेकडो वडार समाज बांधवांचा लाँग मार्च धडकला. यावेळी शेकडो उपस्थित वडार समाजाच्यावातीने शासनाला आणि प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश ईटकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार, तालुकाध्यक्ष भास्कर ईटकर, बाबुराव काळे, भारत जाधव, देवराम सुकळे, अर्जुन पवार, उमेश सुकळे, अविनाश जाधव, शहाजी, पवार यांच्यासह मयत मोतीराम जाधव यांचे कुटुंब, महिला व वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेमकी घटना काय सोमवार, दि.15 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 ते 10 च्या सुमारास कंडारी येथील 35 वर्षीय तरुण मोतीराम जाधव यांना त्यांच्याच गावातील विष्णू कालीदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांनी'पार्टी'च्या बहाण्याने बोलावून नेले. जेवणाच्या ताटावरून उठवून नेल्यानंतर डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी केवळ हत्याच केली नाही, तर हा अपघात वाटावा यासाठी मृतदेह रस्त्यावर आणून टाकला. घटनास्थळावरील रक्ताचे डाग धुणे, माती टाकणे असे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्नही आरोपींनी केल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ 'मी वडार महाराष्ट्राचा'संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश ईटकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षक यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि शेकडो समाज बांधव उपस्थित होते. सदर खटला 'फास्ट ट्रॅक'कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या हत्येचा तपास सी. आय. डी मार्फत करण्यात यावा. मयत मोतीराम जाधव हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने शासनाने त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि मुलांचे शिक्षण मोफत करावे. पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. शासनाने या प्रकरणी तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याची लेखी माहिती 20 जानेवारी 2026 पर्यंत द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. जर दिलेल्या मुदतीत ठोस कारवाई झाली नाही, तर 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर 'मी वडार महाराष्ट्राचा'संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
ॲड. सायली दुभाषींनी घेतली प्रवीण भोसलेंची सदिच्छा भेट
सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या नवंनिर्वाचित नगरसेविका ऍड सायली दुभाषी यांनी आज दुपारी माजी मंत्री प्रवीण भाई भोंसले व पत्नी सौ अनुराधा यांची त्यांच्या सालईवाडा येथील निवासस्थानी, पती काशिनाथ दुभाषी यांच्यासह सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रवीण भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले व सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय स्वर्गीय सतीश दुभाषी यांच्या [...]
Solapur Crime : सोलापुरात दारूच्या नशेत तीन वर्षीय चिमुकल्याचा गळा दाबून खून
सोलापूर एमआयडीसी हद्दीत भीषण खून सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्पना नगर, कोंडा नगर परिसरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन वर्षांच्या फरहान या चिमुकल्याचा गळा दाबून निघृण खून केल्याप्रकरणी मौलाली ऊर्फ अकबर [...]
9 to 5 जॉब नको, आता स्वप्नांची भरारी हवी! GenZ ची करिअरबाबत नवी व्याख्या
आजच्या डिजिटल युगात जगभरातील तरुणाई स्वावलंबी बनण्यासाठी लढत आहे. तरुणांमधील करिअरच्या संकल्पना दिवसेंदिवस बदलत आहेत. वडिलधाऱ्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे ‘कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी शोधायची आणि निवृत्तीपर्यंत एकच स्थिर नोकरी करायची’ असा जो पायंडा पाडला होता, तो आता ‘जेन झी’ (Gen Z) पिढीला नकोसा वाटू लागला आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या ठराविक वेळेतील नोकरी […]
Solapur Politics : सोलापुरात महाविकास आघाडी एकत्र; महापालिका निवडणूक आघाडीने लढणार
सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय सोलापूर : महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, माकप, समाजवादी पार्टी या घटक पक्षांनी आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत हॉटेल सिटी पार्क [...]
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची उद्या हॉटेल ब्लू सीमध्ये दुपारी 12 वाजता संयुक्त पत्रकार परिषद
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या 24 डिसेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद वरळीतील हॉटेल ब्लू सीमध्ये होणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. उद्या १२ वाजता हॉटेल ब्लू सी वरळी pic.twitter.com/k2O590ftO4 — Sanjay Raut (@rautsanjay61) December […]
टी20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम; अचूक मारा अन् 28 वर्षांच्या पठ्ठ्याने एकाच षटकात पाच विकेट घेतल्या
क्रिकेट जगतामध्ये हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड सारखे मातब्बर संघ आहेत. दमदार, विस्फोटक आणि वेगावर स्वार होऊन अचूक मारा करणाऱ्या गोलदाजांचा या संघांमध्ये भरणा आहे. मात्र, क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या या संघांमधील गोलंदाजांना जी कामगिरी टी20 क्रिकेटमध्ये करता आली नाही अशी कामगिरी क्रिकेटच्या पटलावर नाव नसणाऱ्या इंडोनेशीच्या एका गोलंदाजाने करून दाखवली आहे. इंडोनेशियाचा […]

24 C