Solapur News : मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेसाठी सोलापुरातील 55 गावांची निवड होणार
सोलापूरमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाला गती सोलापूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुणांकन असलेल्या पाच अशा एकूण ५५ गावांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. [...]
Solapur News : बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पंढरपुरात कारवाई
स्टेशन रोडवर वेड्यावाकड्या वाहनतळामुळे नागरिक त्रस्त पंढरपूर : येथे स्टेशन रोड भागातील वाईन शॉपसमोर वेड्यावाकड्या पद्धतीने लावलेल्या वाहनावर कारवाई करून वाईन शॉप मालकास पोलिसांकडून समज देण्यात आली. वाढत्या थंडीमुळे स्थानिक लोक गारठून जात आहेत. यामुळे देशी-विदेशी मद्याची विक्री चांगलीच वाढली असून याचा सर्वसामान्य नागरिकांना [...]
Solapur News : सोलापूर शहर भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांची अक्षरशः जत्रा
सोलापूर शहर भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी सोलापूर : सोलापूर शहर भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची अक्षरशः रांग लागल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. दुपारी अडीच वाजेपर्यंत तब्बल एक हजार ८ इच्छुक उमेदवारांनी सोलापूर शहर भाजपच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. शहराच्या [...]
Solapur News : सोलापूरकरांना घेता येणार विठ्ठल अन् बालाजीचे दर्शन
सोलापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी रेल्वेची मोठी सुविधा सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी आणि भगवान वेंकटेश बालाजी यांच्या भक्तांसाठी रेल्वेकडून मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने पंढरपूर-तिरुपती-पंढरपूर दरम्यान साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस सुरू केली असून, या गाडीला बार्शी टाऊन व धाराशिव (उस्मानाबाद) येथे थांबे [...]
Airtel, Jio सह अनेक टेलिकॉमच्या नेटवर्कमध्ये बिघाड, युजर्सचे हाल
देशभरात रविवारी पहाटे अनेक टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये अचानक बिघाड झाल्याने लाखो युजर्संना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलच्या वापरकर्त्यांनी स्लो इंटरनेट, कॉल ड्रॉप तसेच नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. नेटवर्कची स्थिती तपासणाऱ्या डाउन डिटेक्टर या वेबसाइटनुसार, ही समस्या पहाटे सुमारे 3 ते 6 या वेळेत सर्वाधिक तीव्र होती. या तीन तासांच्या […]
Satara News : वाईत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; थकीत पगार व पीएफसाठी ठिय्या
NDK कंपनीविरोधात वाईत संतप्त कर्मचाऱ्यांचे रस्त्यावर आंदोलन वाई : वाई नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार तसेच पीएफ व ईएसआयसारख्या कायदेशीर सुविधा थकवल्याच्या निषेधार्थ संबंधित NDK कंपनी विरोधात शनिवारी किसनवीर चौकात जोरदार काम बंद आंदोलन करण्यात आले. संतप्त कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत प्रशासन व ठेकेदाराच्या मनमानी [...]
Satara News : साताऱ्यात मादी बिबट्याची शिकार
साताऱ्यात बिबट्याची निर्घृण शिकार सातारा : सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील बरड शिवारात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रगतशील शेतकरी रविंद्र आबाजी घोरपडे यांच्या उसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेहआढळला. या बिबट्याची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. [...]
Chhatrapati Sambhajinagar News –ज्येष्ठ लेखक बब्रूवान रुद्रकंठावार उर्फ धनंजय चिंचोलीकर यांचे निधन
मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक बब्रूवान रूद्रकंठावार उर्फ धनंजय चिंचोलीकर यांचे आज (14 डिसेंबर 2025) रविवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील प्रतापनगर स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. […]
सुप्रिसुद्ध फुटबॉलपटू मेस्सी मुंबईत, गणपती आरतीने चाहत्यांनी केले स्वागत
मुंबईत अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी यांच्या वानखेडे भेटीपूर्वी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मुंबईतील काही चाहते मेस्सीच्या पोस्टरसमोर गणपती आरती गाताना दिसत आहेत. कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपती आरती करण्याची परंपरा असल्याने, चाहत्यांनी मेस्सीच्या भेटीचे स्वागत या अनोख्या पद्धतीने केले. इतकेच नाही तर एफसी बार्सिलोनाचे अनेक चाहते नरिमन […]
Satara News : जावळी तालुक्यातील हुंमगावात महिलांचा रौद्रावतार; अवैध दारूचा अड्डा उद्ध्वस्त
दारूच्या त्रासाला कंटाळून हुंमगावातील महिलांचा थेट छापा सातारा : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुंमगावात महिलांचा रौद्रावतार पाहायला मिळाला,राष्ट्रवादी काँग्रेसचे sp) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या गावात सुरू असलेला अवैध दारूचा अड्डागावकऱ्यांनी आणि महिला ग्रामस्थांनी एकत्र येत थेट उद्ध्वस्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून हुंमगावात [...]
Satara News : बोरगावजवळ खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात; तीन जण किरकोळ जखमी, महामार्गावर वाहतूक कोंडी
सातारा बोरगाव बस अपघात ; तीन जखमी सातारा : सातारा तालुक्यातील बोरगाव नजीक पहाटेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला. या अपघातात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले [...]
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांसह संतप्त ग्रामस्थांनी शहरातील खासगी रूग्णालयात तोडफोड केली. डॉक्टरांच्या केबिनलाही घेराव घातला. नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह रूग्णालयाच्या दारातत ठेवला आहे. या घटनेमुळे रूग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. मयत तरुणीला उपचारासाठी कणकवली येथील खासगी रूग्णालयात आणण्यात आले होते. या रुग्णालयात तरुणीच्या डोक्यातील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रेक्रियेनंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने […]
IPL 2026 –लिलावापूर्वी सरफराज खानने दावेदारी केली सिद्ध; गोलंदाजांना काढलं चोपून, मोठी बोली लागणार?
सरफराज खानने IPL 2026 च्या लिलावापूर्वी धुरळा उडवून दिला आहे. आपल्या धारधार फलंदाजीची झलक त्याने Syed Mushtaq Ali Trophy मध्ये दाखवून दिली आहे. हरयाणाविरुद्ध त्याने 25 चेंडूंमध्ये 65 धावांची धुवांधार फटकेबाजी केली आहे. त्यामुळे IPL च्या लिलावामध्ये सरफराज खानवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सुपर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबईकर सरफराज हैदराबादविरुद्ध […]
Sangli News : सांगलीत नाल्यावरील अतिक्रमणामुळे पुराचा धोका; नागरिकांची चिंता
सांगली महापालिका क्षेत्रातील अवैध बांधकामांमुळे नागरिकांचा त्रास सांगली : महापालिका क्षेत्रात नाल्यावरील अतिक्रमणामुळे पुरस्थीती निर्माण होत असताना मनपा नगररचना विभाग मात्र अकार्यक्षम आहे बोगस प्रमाणपत्रे, नाल्यावरील बांधकामाना अभय तसेच शहरात पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे शहराला कोंडवाड्याचे स्वरूप आले आहे तसेच नाल्यावरील अतिक्रमण वअवैध बांधकामामुळे शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण होणार आहे हे [...]
Sangli Crime : कुची येथे नातेवाईकाच्या घरी चोरी करणारा जेरबंद
कवठेमहांकाळ तालुक्यात कुची येथील चोरीचा पोलिसांनी उलगडा सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील चोरीचा छडा लावला आहे. याप्रकरणी चोरटा प्रविण विठ्ठल निकम (वय ३२, रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) याला अटक करण्यात आली असून त्याने चोरलेले ७ लाख ८० हजार रुपयांचे [...]
नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले निवडणुकीत सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करण्यासाठी […]
अर्थसंकल्पीय अधिवेशनातल भाषण मुख्यमंत्र्यांनी नागपूरात कॉपीपेस्ट केलं, भास्कर जाधव यांची टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा केली. त्या भाषणावरून शिवसेनेचे विधीमंडळातील नेते, आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांचे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अर्थसंकल्पीय अधिवेशनातल भाषण कॉपी पेस्ट केलं, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर टीका केली. […]
Miraj News : मिरज तालुक्यातील बेडग येथे 12 फूट खड्ड्यात कोसळली दुचाकी
मिरज-बेडग रस्त्याचे काम सुरू असताना अपघातांचे आवर्तन मिरज : मिरज तालुक्यातील बेडग येथे सुरू असलेल्या मिरज-बेडग रस्ता कामाच्या ठिकाणी खोदलेल्या सुमारे १२ फुटाच्या खोल चरीत दुचाकीसह दोघे तरुण पडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. रस्ता काम [...]
सचिन पाकळेंच्या अडचणीत वाढ, ईडीच्या चौकशी दरम्यान सापडला अवैध खैर लाकडाचा साठा ; वनविभागाकडून कारवाई
कात व्यवसायिक सचिन पाकळे यांच्या निवासस्थानी दोन दिवस ईडीची यंत्रणा ठाण मांडून चौकशी सुरू असताना वनविभागाने केलेल्या तपासणीत खैराचा अवैध साठा आढळून आला आहे.त्यामुळे सचिन पाकळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीची कार्यवाही सुरू असताना त्यांना त्याठिकाणी खैराचा साठा आढळून आला.ईडीने तपासणीसाठी वनविभागाला पाचारण केले.त्यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी सरवर खान यांनी तपासणी केली असता त्यांना […]
Sangli News : सांगलीत बिटल जातीच्या शेळीने गाठला ₹1,01,000 चा विक्रमी दर
वाळवा तालुक्यातील युवा शेतकऱ्याचा विक्रमी शेळीपालन व्यवहार सांगली : अबब… एका शेळीची किंमत तब्बल एक लाख एक हजार रुपये! होय, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने शेळीपालनातून असा विक्रम केला आहे, जो सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. सांगली [...]
भररस्त्यात कारने पेट घेतला, चालकाचा होरपळून मृत्यू; पोलिसांना घातपाताचा संशय
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून वानवडा शिवारात मध्यरात्री चारचाकी कारला भीषण आग लागून चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना एसी लातूर अंतर्गत येणाऱ्या औसा तालुक्यात घडली असून संबंधित चारचाकी गाडी स्कोडा कंपनीची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास वानवडा शिवारातील एका निर्जन ठिकाणी अचानक कारने […]
महावितरणने एका झटक्यात फेडले १२,८०० कोटींचे कर्ज- लोकेश चंद्र
मुंबई,(प्रतिनिधी)- देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरणने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १२,८०० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतीपूर्वी एकाच हफ्त्यात नुकतीच परतफेड केली. अन्य वित्तीय संस्थेकडून कमी व्याज दराचे कर्ज उभारून तसेच स्वनिधीतून ही परतफेड केली असून त्यामुळे व्याजाच्या रकमेत मोठी बचत होईल, अशी माहिती अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याची सूचना केली असून त्यादृष्टीने कंपनीवरील कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी यशस्वी पावले टाकण्यात आली. महावितरणने विविध टप्प्यांवर स्टेट बँकेकडून एकूण १२,८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी ८.६५ टक्के ते ९.२५ टक्के दराने व्याज द्यावे लागत होते. त्याऐवजी अन्य वित्तीय संस्थेकडून ७,१०० कोटी रुपये कर्ज ८.२५ टक्के इतक्या कमी व्याजदराने उभारून महावितरणने स्टेट बँकेचे ७,१०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले. त्या खेरीज महावितरणने स्वनिधीतून ५,६३४ कोटी रुपयांचे स्टेट बँकेचे कर्ज फेडले. महावितरणने स्टेट बँकेचे कर्ज घेताना आपल्या दहा सर्कलमधील महसूल तारण म्हणून ठेवला होता. या सर्कलमध्ये वार्षिक तीस हजार कोटी रुपयांचा महसूल आहे. स्टेट बँकेचे सर्व कर्ज फेडल्यामुळे हा महसूल तारणमुक्त होईल. त्या आधारे कंपनीला ५०,००० कोटी रुपयांपर्यंतचा निधी माफक व्याजदरात कर्जरुपाने उभा करता येईल. महावितरणची पत वाढविणारे पाऊल- महावितरणने एकाच हफ्त्यात स्टेट बँकेच्या १२,८०० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्यामुळे कंपनीची वित्तीय बाजारातील पत वाढली आहे. ही घडामोड गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविणारी आहे. कंपनीसाठी भविष्यात खासगी किंवा सार्वजनिक बाँड उभारायचे झाल्यास त्यासाठीही इतक्या मोठ्या कर्जाची परतफेड करणे उपयुक्त ठरणारे आहे. आगामी काळात महावितरणला शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याच्या दृष्टीनेही ही कर्जाची परतफेड महत्त्वाची आहे.
एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसताना रत्नागिरी जिल्ह्यातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा कंत्राटी बीएएमएस डॉक्टर सांभाळत आहेत. मात्र जिल्ह्यातील १०२ कंत्राटी डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य सरकारने बिघडवले आहे. हे बीएएमएस डॉक्टर २४ तास सेवा देत आहेत, मात्र त्यांची अवस्था बिनपगारी फुल अधिकारी अशी झाली आहे. कंत्राटी डॉक्टरांना गेले पाच महिने पगार मिळालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात ६७ प्राथमिक आरोग्य […]
दोस्ती ग्रुप कडून, हॉकी खेळाडू आराध्या धस हिचा सत्कार
कळंब (प्रतिनिधी)- विशाखापट्टणम येथे झालेल्या राष्ट्रीय इनलाईन हॉकी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र टिम मधुन आराध्या प्रदिप धस हीची निवड होऊन विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय इनलाईन स्पर्धेत खेळल्या बद्दल तीचा व पालकांचा कळंब येथील निवासस्थानी दोस्ती ग्रुप च्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी सतिश टोणगे, संदीप भैय्या बाविकर, प्रताप मोरे , पार्श्वनाथ पाटील, प्रकाश धस , बाळासाहेब धस, पालक प्रदिप धस यांनी तिचा सत्कार केला व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कुमारी आराध्य धस ही पिंपळगाव डोळा ता.कळंब जिल्हा धाराशिव येथील असुन , या गावातील ही एकमेव खेळाडू ठरली आहे. तिच्या या यश बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खराब हवेमुळे मुंबईकरांची घुसमट; आरोग्यावर परिणाम होण्याची चिंता
गेल्या आठवड्यापासून मुंबईत थंडीची तीव्रता कायम आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी पहाटे मुंबईकरांना थंडीने हुडहुडी भरवली. मात्र याचदरम्यान हवेच्या खराब गुणवत्तेमुळे नागरिकांना अस्वस्थ वाटू लागले आहे. शहर आणि उपनगरांच्या अनेक भागांत हवेची गुणवत्ता खराब बनली आहे. त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची चिंता सतावत आहे. दिल्लीप्रमाणेच मुंबईतील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. मुंबई शहरातील खराब […]
Australia Firing –सिडनीत हनुक्का उत्सवादरम्यान अंधाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू; अनेक लोक जखमी
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील प्रसिद्ध बोंडी बीचवर रविवारी हनुक्का उत्सवादरम्यान दोन बंदुकधाऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. नागरिकांनी घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेचाी […]
Kolhapur News : कोल्हापुरात सोलापूरसारखी आयटी पार्क सुविधा निर्माण होणार
कोल्हापुरात आयटी क्षेत्रामुळे हजारो रोजगारनिर्मितीची शक्यता नागपूर : कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत [...]
Lionel Messi India Tour –मेस्सीच्या कार्यक्रमातील राडा; ऑर्गनायझरला 14 दिवसांची पोलीस कोठडी
लिओनल मेस्सी हिंदुस्थानात आला आणि कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये राडा झाला. मेस्सीला पाहण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये चाहत्यांनी मोजले. परंतू मेस्सीला पाहता आले नाही, त्यामुळे संतापलेल्या चाहत्यांनी स्टेडियमची तोडफोड केली खुर्च्या तोडल्या, बाटल्या फेकल्या मिळेल त्या वस्तूंची नासधुस केली. याप्रकरणी ऑर्गनायझर सताद्रु दत्ताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला आता बिधाननगर न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस […]
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने पुरस्स्कारने सन्मानित
धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांना 12 डिसेंबर 2025 रोजी फेअरफील्ड बाय मॅरियट, पुणे येथे झालेल्या सिम्पलीलर्न युनिव्हर्सिटी लीडर्स फोरममध्ये उच्च शिक्षण नेते - 2025 पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि पुनर्कौशल्य यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण या पुरस्कारातून केले जाते. ही मान्यता त्यांचे मजबूत शैक्षणिक नेतृत्व आणि दर्जेदार शिक्षण आणि संस्थात्मक विकासासाठी वचनबद्धता दर्शवते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा मित्राचे उपाध्यक्ष तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अभिनंदन केले. डॉ. विक्रमसिंह व्ही. माने हे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,धाराशिव येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे 40 हून अधिक शोधनिबंध प्रतिष्ठित जर्नल्स, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांची तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,धाराशिव येथे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी म्हणून सात वर्षाहून अधिक काळ काम पहिले असून,त्यांनी कंपन्यांच्या 110 हून अधिक भरती कार्यक्रमांचे व जॉब फेअर आयोजन केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील, विश्वस्त बाळासाहेब वाघ,तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,उद्योजक, कर्मचारी व आजी माझी विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.
परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील कार्ला येथील तत्कालीन ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांनी संगनमत करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश वरपे यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यास, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी येत्या 26 डिसेंबर 2025 रोजी पंचायत समिती परंडा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे वरपे यांनी निवेदन दिले आहे. या दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,शासनाच्या विविध रोजगार योजनांमध्ये अनियमितता आणि निधीचा गैरवापर झाल्याचा दावा वरपे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर यावे आणि शासनाच्या निधीचा दुरुपयोग थांबवावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या इशाऱ्यामुळे स्थानिक प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आलमप्रभू यात्रा उत्सवानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे आलम प्रभू यात्रा उत्सवाच्या निमित्ताने श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान, भूम तालुका यांच्या वतीने पूरग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी “आजचा युवक आणि छत्रपती शिवरायांचे कार्य” या विषयावर श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, संकल्पक व संस्थापक माननीय शिवश्री विठ्ठल आण्णा बाराते यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजासाठी कार्य करावे, तसेच गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा “श्री तुळजाई दुर्ग सामाजिक योद्धा पुरस्कार 2025” हा ह.भ.प. अरुण काळे महाराज यांना संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. काळे सर यांनी श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान तसेच विठ्ठल अण्णा बाराते यांच्या सामाजिक कार्याची सविस्तर ओळख करून दिली. अध्यक्षीय समारोपात बोलताना प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान व विठ्ठल अण्णा बाराते यांचे कार्य अतिशय अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार काढत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मनोगतात बोलताना विठ्ठल अण्णा बाराते यांनी निस्वार्थी, सुसंस्कारित, निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न युवक समाजात उभा राहावा, ही अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी तसेच श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस औताडे, अभिषेक सुरवसे, प्रशांत राजे शेळके, निलेश औताडे, अनिकेत आकरे, अभी कराळे, शुभम अंधारे, रामराजे कुंभार, यश भांगे आदी पदाधिकारी व शिलेदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काळे यांनी विलोभनीय शब्दांत केले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जुन्या कपड्यातून देऊ मायेची ऊब
भुम (प्रतिनिधी)- आज अलंप्रभु यात्रेनिमित्त आलेल्या सर्व परगावून आलेले दुकान मालक यांच्या लहान मुल, स्त्रिया आणि तरुण यांना संदीप बागडे राज्य मंडळ सदस्य भारतीय मानवाधिकार परिषद महाराष्ट्र आणि कपडा बँकेतर्फे आज पहिल्या दिवशी जवळजवळ 7 ते 8 हजार लहान मुलांचे स्वेटर्स, शर्ट पॅन्ट मुलींचे घागरे, पंजाबी ड्रेस, जीन्स पॅन्ट, महिलांना साड्या तसेच वृद्ध महिला आणि पुरुष यांना स्वेटर्स आणि ब्लँकेट कपड्यांचे वाटप करण्यात आले कपडा बँक मागील आठ वर्षापासून यात्रेतली माणसे, वीट भट्टी कामगार असो पूरग्रस्त असो किंवा गरजवंत असतील यांना सातत्याने कपडा वाटप करत आहे. आत्तापर्यंत जवळजवळ तीन लाखापर्यंतचे कपडे कपडा बँकेमार्फत वाटप करण्यात आले आहे. आपल्या घरातील चांगले वापरण्यायोग्य कपडे लोक कपड्या बँकेत आणून जमा करतात. आम्ही ते गरिबापर्यंत आणि गरजवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. यास कपडा बँकेला कपडा बँकेचे निर्माते बघते बख्तित्यार काजी, फैजान काजी आणि इतर अनेक मंडळींचे सहकार्य लाभते. तरी आपण आपल्याकडील स्वेटर्स, मफलर, ब्लँकेट, कान टोपी असतील तर ते कपडा बँकेत जमा करावेत असे आवाहन संदीप राघवेंद्र बागडे कपडा बँक करत आहे.
टीआरपी वाढवायला ते काय ओमराजे आहेत का?“ रवींद्र वाघमारेंचा भाजपला खोचक टोला
धाराशिव (प्रतिनिधी)- “आम्ही 'धाराशिव 2.0'या फेक पेजवर कारवाईची मागणी करत आहोत, मग त्या ॲडमिनला वाचवायला भाजपचे लोक का पुढे येत आहेत? आणि राहिला प्रश्न टीआरपीचा, तर टीआरपी वाढवायला ते काय ओमराजे आहेत का? ज्यांचे नाव आम्हाला घ्यावे लागेल,“ अशा शब्दांत युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. फेक एक्झिट पोल प्रकरणी ठाकरे गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजप जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर टीका केली होती. तसेच, “टीआरपीसाठी विरोधक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव घेतात,“ असा आरोप केला होता. या आरोपांचा रवींद्र वाघमारे यांनी खरपूस समाचार घेतला. नेमकं काय म्हणाले रवींद्र वाघमारे? “आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन थेट प्रश्न विचारला की, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, हे प्रकरण समोर येताच भाजपचा 'छुपा पुढाकार'आणि बचाव करण्याचे प्रयत्न सिद्ध झाले आहेत. मुळात 'धाराशिव 2.0'आणि तुमचा काय संबंध आहे? आम्ही त्या पेजवर बोललो तर तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?“ असा थेट सवाल वाघमारे यांनी केला आहे. “आमच्याकडे 'ओमराजे'ब्रँड असताना दुसऱ्यांची गरज काय?“ भाजपच्या टीआरपीच्या आरोपावर बोलताना वाघमारे यांनी भाजपला चिमटा काढला. ते म्हणाले, “तुम्ही म्हणता की टीआरपीसाठी आम्ही राणा पाटलांचे नाव घेतो. पण ते काय ओमराजे निंबाळकर आहेत का? आमच्याकडे ओमराजेंसारखे वलयांकित नाव असताना आम्हाला प्रसिद्धीसाठी दुसऱ्यांचे नाव घेण्याची गरजच काय? मुळात ज्यांनी चुकीचा आणि फेक व्हिडिओ प्रदर्शित केला, त्यांना जाऊन विचारा की तुमच्यावर ही वेळ का आली?“ “रडका डाव खेळून काय सिद्ध केलं?“ भाजपवर हल्लाबोल करताना वाघमारे पुढे म्हणाले की, “तुमच्यात पहिल्यापासून समोरासमोर लढण्याची धमक नव्हती. म्हणूनच असले फेक व्हिडिओ तयार करून रडका डाव खेळावा लागला. यातून तुम्ही काय साध्य केले, याचे उत्तर आधी भाजपने द्यावे,“ असे आव्हानही त्यांनी दिले आहे. 'धाराशिव 2.0'च्या फेक एक्झिट पोल प्रकरणानंतर आता भाजप आणि ठाकरे गटातील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटल्याचे दिसून येत आहे.
अभिलेख दुरुस्त न झाल्यास 26 जानेवारी रोजी पंचायत सामिती समोर आत्मदहन करणार-आश्विनी मगर
परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील शेळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकृत दस्तऐवज आणि अभिलेखांमध्ये जाणीवपूर्वक खाडाखोड करून फेरफार करण्यात आल्याचा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप गावातील काही जागरूक आश्विनी मगर यांनी केला आहे. याबाबत माहिती साठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन या वरिल आरोपामुळे केवळ शेळगावमध्येच नव्हे, तर संपूर्ण तालुका पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, शेळगाव ग्रामपंचायतीच्या काही महत्त्वपूर्ण नोंदी, सरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमत करून खाडाखोड करून बदल केले आहेत.मूळ नोंदींमध्ये दस्ताऐवजा वर खाडा खोड करून नवीन माहिती घुसडण्यात आली असून, हा प्रकार पदाचा गैरवापर करून केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. आश्विनी मगर यांचा थेट आरोप या प्रकरणातील प्रमुख तक्रारदार आश्विनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहिलेली नाही. विशिष्ट फायद्यासाठी अधिकृत सरकारी अभिलेखांमध्ये बदल केले गेले आहेत, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे,“असे आश्विनी यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणाचे पुरावे लवकरच जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याचेही सांगितले. प्रशासकीय चौकशीची मागणी हा शासकीय दस्तऐवजातील फेरफाराचा गंभीर गुन्हा असल्याने, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने प्रशासकीय चौकशी सुरू करावी, अशी मागणी मगर याणी परंडा तालुका प्रशासनाकडे केली आहे. या गंभीर आरोपामुळे शेळगाव ग्रामपंचायतीचे कामकाज सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून,आता परंडा पंचायत समितीचे अधिकारी यावर काय भूमिका घेतात आणि चौकशी कधी सुरू होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
एम्स नागपूरच्या धर्तीवर धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- नागपूर येथील एम्सचे तज्ञ आता दर पंधरा दिवसाला धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर घेणार आहे. त्याचबरोबर काही सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर दररोज एक तास त्यांचा अमूल्य वेळ रुग्ण उपचारासाठी देणार आहेत. एम्स आणि आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराच्या मसुद्याला राज्य शासनानेही आता मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. एम्स आणि धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यातील सामंजस्य कराराच्या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतला. नागपूर येथील एम्सच्या सहकार्यातून धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना एम्समधील तज्ञ डॉक्टरांकडून थेट मार्गदर्शन, अद्ययावत माहिती आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षण लाभणार आहे. कर्मचाऱ्यांनाही एम्ससारख्या नामांकित संस्थेत कशाप्रकारे रुग्णसेवा आणि व्यवस्थापन चालते याचे व्यावहारिक प्रशिक्षणही आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एम्समधील काही सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर दररोज त्यांचा एक तास अमूल्य वेळ रुग्ण उपचारासाठी देणार आहेत. काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी या मान्यवर सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर मंडळींचे मोठे सहकार्य लाभणार आहे. एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील अभ्यासक्रम असायला हवा यासाठीही आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्रसिंह चौहान,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास उपस्थित होते. सामंजस्य कराराच्या मसुद्याला शासन मान्यता धाराशिव जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे अद्ययावत शिक्षण मिळावे. यासाठी नागपूर येथील एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्याला जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सभागृहातच वरील माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराचा फायदा थेट विद्यार्थ्यांसह धाराशिव जिल्हा आणि परिसरातील रुग्णांनाही होणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
लातूर (प्रतिनिधी)- जवळपास सहा दशके आपल्या सुसंकृत राजकारणाने जनसेवा करणारे लातूर जिल्ह्याचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर आज वरवंटी (ता. लातूर) येथे शासकीय इतमामात, मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलीस दलाच्या जवानांनी यावेळी बंदुकीच्या फैरींची सलामी देऊन मानवंदना दिली. तत्पूर्वी सकाळी देवघर निवासस्थानी शिवराज पाटील यांच्या पार्थिवाला पोलीस दलातर्फे मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या रथातून त्यांचे पार्थिव औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पीव्हीआर चौकमार्गे वरवंटी येथे पाटील चाकूरकर कुटुंबियांच्या शेतामध्ये आणण्यात आले. याठिकाणी शोकाकुल जनसमुदायाच्या उपस्थितीत शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले. कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर खंड्रे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार रजनीताई पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पंजाब पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक इंदरवर सिंग, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यावेळी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या ६ दशकांच्या राजकीय, सामाजिक जीवनात प्रामाणिकपणे देशाची सेवा केली. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी भरीव योगदान दिले, संसदीय परंपरेला नवा आयाम दिला. संसदीय समित्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. राजकारणातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील, अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असल्याचे सांगून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ म्हणाले की, राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करणारा आणि लोकशाहीला मजबूत बनविण्यासाठी प्रयत्न करणारा एक विनम्र राजकारणी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासोबत १९६७ पासून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी विविध पदांवर काम करताना समाजाची सेवा करत विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यांची उणीव सदैव भासत राहील, असे राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले. चिंतनशील राजकारणी अशी ओळख असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे आपल्यासाठी एक मार्गदर्शक, एक आदर्श होते. त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध मंत्री पदे भूषवत देशाची सेवा केली. लोकसभा अध्यक्ष असताना त्यांनी केलेले काम संस्मरणीय होते, असे सांगून कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी त्यांना कर्नाटक सरकारच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. शिवराज पाटील चाकूरकर यांनी नगरपरिषदेचे अध्यक्ष ते लोकसभेचे अध्यक्ष पदापर्यंतच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. अतिशय शिस्तप्रिय आणि वैचारिक मूल्य असणारे राजकारण, सर्वांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकीय जीवनाचे वैशिष्ट्य होते. त्यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय वेदनादायी असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले. गेली सहा दशके राज्याची, देशाची प्रामाणिकपणे सेवा करताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला, सुशिक्षित युवा वर्ग यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या पदांचा उपयोग केला. ते एक अजातशत्रू, चिंतनशील, अभ्यासू व तत्वनिष्ठ राजकारणी होते. त्यांची उणीव सर्वांना जाणवेल, अशी भावना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केली. शिवराज पाटील चाकूरकर हे सुसंस्कृत राजकारणी म्हणून परिचित होते. लातूर जिल्ह्याच्या राजकारणाला सुसंस्कृत बनविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाचा वारसा पुढे घेऊन जाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यावेळी म्हणाले. खासदार म्हणून काम करताना शिवराज पाटील चाकूरकर यांचे आपल्याला सदैव मार्गदर्शन लाभल्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले. तसेच त्याबाबतच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न राजकारणी अशी ओळख असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या जवळपास साठ वर्षांच्या राजकारणात त्यांनी अनेकांना घडविले. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याचे माजी मंत्री बसवराज पाटील यावेळी म्हणाले. राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कर्नाटकमधील आमदार बी. आर. पाटील, महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी क्षेत्र व प्रक्रिया उद्योगांची बृहद जोडणी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर (प्रतिनिधी)- कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांचा क्षमता विकास करून प्रक्रिया उद्योगासह इतर संलग्न क्षेत्राशी त्याची बृहद जोडणी करण्यात येईल. यासाठी आवश्यक धोरण तयार करण्यात येईल व आवश्यक निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये कॉन्फेड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्यावतीने (सीआयआय) भविष्याभिमुख महाराष्ट्रासाठी कृषी क्षेत्राचे कृषिउद्योगात रूपांतर : मूल्यवर्धन, नवोन्मेष व गुंतवणूकविषयावर आयोजित फूड कॉनक्लेवचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, सीआयआयचे अध्यक्ष बुर्जीस गोदरेज आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतीमध्ये झालेले बदल हे या क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. यासंदर्भात उचित उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कृषी क्षेत्रात मुल्यवर्धन करून शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त फायदा होण्याच्या दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासोबतच अन्न प्रक्रिया उद्योगाशी या क्षेत्राला जोडण्याचे कार्यही सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. कृषी संबंधित उर्वरित क्षेत्रामध्ये प्रक्रिया पद्धती रूजवून उचित परिसंस्था उभारण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू आहेत. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यात ‘स्मार्ट’ आणि ‘मॅग्नेट’ या महत्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. देशात सर्वात जास्त शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात या दोन्ही प्रकल्पांना केंद्र व राज्याच्या विविध योजनांद्वारे मदत करून कृषी क्षेत्र बळकट करण्यासाठी शासन कार्य करीत आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात मागील वर्षी पुणे येथे कृषी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले व त्यात विविध स्टार्टअपस्द्वारे शेती क्षेत्रातील अडचणी दूर करण्याबाबत नवोन्मेशी प्रयोग पुढे आल्याचे त्यांनी सांगीतले. कृषी क्षेत्रात क्षमता विकास आणि वित्त पुरवठा करण्यासाठी खाजगी क्षेत्राची मदत घेण्याबाबतही शासन विचार करीत आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांचा क्षमता विकास करून प्रक्रिया उद्योगासह इतर संलग्न क्षेत्राशी त्याची बृहद जोडणी करण्याच्या दिशेने कार्य सुरू असून आवश्यक धोरण तयार करण्यात येईल व यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नागपूर येथे आयोजित या परिषदेत जे विषय पुढे येतील त्याला राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासाठी राज्य शासन मदत करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन यांनी 'महाराष्ट्र द इकॉनॉमिक इंजिन पॉवरिंग विकसित भारत २०४७'विषयावर सादरीकरण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी विभागाच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन झाले. सीआयआयचे अध्यक्ष बुर्जीस गोदरेज यांनी स्वागतपर भाषण केले तर संस्थेचे फिरोज खंबाटा यांनी आभार मानले.
हिंदुत्वाचं पांघरुण घेऊन स्वतःची घरं…रोहित पवार यांनी भाजपला फटकारले
भाजप आता party with Difference म्हणून ओळखला जाणारा पक्ष नाही तर party with selective preference असलेला पक्ष आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच त्यांनी मागील 20 वर्षांत काँग्रेसच्या तुलनेत भाजपच्या खात्यात जमा झालेल्या पैशांची आकडेवारी मांडली असून देशाला लुटतंय कोण आणि हिंदुत्वाचं पांघरुण घेऊन स्वतःची […]
महाराष्ट्राच्या तिजोरीत खूप पैसा नाही; मुख्यमंत्र्यांची कबूली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना ‘राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. ओढाताण होतेय, पण महाराष्ट्राची वाटचाल आर्थिक दिवाळखोरीकडे मात्र सुरू नाही’, असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांची ‘ही’ ओढताण हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत देखील दिसून आली. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीत फार पैसा नसल्याची कबूली दिली आहे. ”महाराष्ट्र हे शक्तिशाली […]
Photo –हुडहुडी…पुणे गारठले, तापमान 8 अंशावर
पुणे शहरात हंगामातील नीचांकी किमान तापमान असून, थंडीने कहर केला आहे. थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी पुणेकर उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत. शहराच्या विविध भागातील ही दृश्ये. शुक्रवारी 8.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. फोटो- चंद्रकांत पालकर
साताऱ्यात एमडी ड्रग्स तयार करणारा कारखाना उजेडात आला आहे. विशेष म्हणजे ही ड्रग्ज फॅक्टरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून काही किलोमीटरवर आहे. या फॅक्टरीमध्ये कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा सापडला आहे. अशातच कारवाई करायला गेलेल्या पोलिसांच्या कामात स्थानिकांकडून अडथळे आणले गेले. सरकारी कामात अडथळा आणणारी व्यक्ती कोण? बंगालहून इथे कामगार कामाला आणणारे कोण? आणि मुंबई पोलीस […]
छत्तीसगडमध्ये दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, प्रत्येकी 5 लाख रुपयांचे होते बक्षीस
छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यातील दोन कुख्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये एका महिला नक्षलवादीचा समावेश आहे. दोघांवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.संतोष उर्फ लालपावन आणि मंजू उर्फ नांदे अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. दोघेही बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) […]
US Firing –अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; दोन ठार, अनेक जण जखमी; 8 जणांची प्रकृती गंभीर
अमेरिकेतील ऱ्होड आयलंड राज्यातील प्रोव्हिडन्स येथील ब्राउन विद्यापीठात गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. गोळीबारानंतर संशयित आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ब्राऊन विद्यापीठ […]
रत्नागिरीत तयार झाली आयएनएस ओल्ड विक्रांत जहाजाची प्रतिकृती
मिरजोळे पाटीलवाडी येथे दी मॉडेल क्राफ्टच्या टीमने अवघ्या 22 दिवसांत 35 फूट आकाराच्या ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ जहाजाची प्रतिकृती तयार केली आहे. दिल्ली रक्षा मंत्रालयाच्या कोलकाता येथील पी. एम. संग्रहालयाचे हि प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे. मयूर वाडेकर व त्याच्या 14 जणांच्या समूहाने ही जहाजाची प्रतिकृती तयार केली आहे. मयूर हा 2013 सालचा नेव्हल एनसीसी छात्र असून, […]
Jalgaon News ट्रकने रिक्षाला उडविले, तिघांचा मृत्यू; सहा जण जखमी
जळगाव जिल्ह्यातील जामनेर गावातील भुसावळ जामनेर दरम्यान गारखेडा शिवारात गंगापुरी जवळ भुसावळहून जामनेर साठी येणाऱ्या रिक्षा व जामनेर होऊन भुसावळकडे जाणाऱ्या मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत. मिक्सर ट्रक या गाडीने पियाजो रिक्षाला जबरदस्त धडक दिली. रिक्षात एकूण आठ प्रवासी बसलेले होते त्यापैकी निकिता गोपाल निंबाळकर […]
Haryana Accident News –धुक्यामुळे मोठा अपघात! बस, ट्रक, कार, दुचाकीसह अनेक गाड्या एकमेकांवर धडकल्या
थंडीचा तडाखा वाढल्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास धुक्याची चादर अनुभवायला मिळत आहे. मात्र, वाहन चालकांना याचा जोरदार फटका बसत आहे. हरयाणामध्ये धुक्यामुळे आज (14-12-2025) दोन भयंकर अपघात झाले. या अपघातात बस, कार, ट्रक, दुचाकी अशा अनेक गाड्या एकमेकांना धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. हरयाणाऱ्या हिसारमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक […]
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या सात दिवसाच्या अधिवेशनात विदर्भाला न्याय मिळावा, विशेषतः शेतकरी, कापूस आणि धान उत्पादकांचे प्रश्न केंद्रस्थानी असावेत यासाठी हे अधिवेशन घेतले गेले होते. मात्र यापैकी कोणत्याही विषयाला न्याय मिळाला नसून हे अधिवेशन फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आल्या आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर […]
Kolhapur News : अंबप येथे बाळासाहेब माने व तात्यासाहेब कोरे पुण्यतिथीनिमित्त भव्य मॅरेथॉन
अंबप मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद अंबप : माजी खासदार कै. बाळासाहेब माने व सहकारमहर्षी कै. तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंबप येथे आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रदेश खुल्या पुरुष गटातून वारणानगरच्या अनिकेत शिंगाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर [...]
Kolhapur News : पेठ वडगाव येथे श्री हलिसिद्धनाथ महाराज व संत बाळूमामांचा भंडारा सोहळा उत्साहात
भंडारा सोहळ्यात डोणे महाराज यांची भाकणूक पेठवडगाव : भाकणूककार श्री कृष्णात डोणे महाराज यांचे शिष्य श्री मयूर सनगर महाराज यांच्या वतीने पेठवडगाव शहरात भंडारा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याची सुरुवात सणगर गल्ली येथून पारंपारिक ढोलाच्या गजरात भंडाऱ्याची [...]
घणसोलीतील माथाडी कामगार घालणार आज पालिकेचे श्राद्ध
घणसोली येथील सेक्टर 7 मधील सिम्प्लेक्स या माथाडी कामगारांच्या वसाहतीत असलेल्या इमारतींची दयनीय अवस्था झालेली आहे. या इमारतीतील वास्तव्य हे धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटी खडकपूर आणि व्हीजेआयटी मुंबई या संस्थांसह कोकण आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिला आहे. मात्र त्यानंतरही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे या इमारतींना आयोग्य असल्याचा दाखला देत नाहीत. त्यामुळे सिम्प्लेक्समधील […]
Kolhapur News : कोल्हापुरात सुसाईड नोट व्हॉट्सअॅप करुन डॉक्टरची आत्महत्या
जयसिंगपूर येथील डॉक्टरची कोल्हापुरात आत्महत्या, कोल्हापूर : कुटुंबीय आणि मित्रांना सुसाईड नोट व्हॉ टसअॅप करुन डॉक्टर तरुणाने राजाराम तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. अवधूत प्रकाश मुळे (बय ३९ रा. जयसिंगपूर) असे त्यांचे नाव आहे. शनिवारी सकाळी हा [...]
वयाच्या 53 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा
धुरंदर चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग सर्वच सोशल मीडियावर हिट होत असून यातील कलाकारांनी केलेल्या भूमिकांचे देखील कौतुक होत आहे. यात मेजर इक्बालची भूमिका करणारा अभिनेता अर्जुन रामपाल याने त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत साखरपुडा केला आहे. अर्जुन रामपाल याचे पहिले लग्न 1998 मध्ये मॉडेल मेहेर जेसिया सोबत झाले होते. त्यांना […]
साखरझोपेत असलेल्या कुटुंबावर प्लास्टर कोसळले; एक ठार
साखरझोपेत असलेल्या कुटुंबीयांच्या अंगावर छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. लोकमान्यनगर पाडा नंबर 2 परिसरातील करुमेदेव सोसायटीत ही घटना घडली. या घटनेत घरातील मनोज मोरे (45) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी अर्पिता (42) व मुलगा आरुष (16) हे जखमी झाले आहेत. प्लास्टरचा भाग कोसळून झालेल्या आवाजामुळे इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये […]
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील सुरक्षा अनामत खात्यातून तब्बल 111 कोटी 63 लाख रुपये हडप करण्याचा कट करणाऱ्या आरोपींचा जामीन भिवंडी सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. जव्हार न्यायालयाच्या निर्णयावर भिंवडी सत्र न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. विक्रमगडचा नगराध्यक्ष आणि शिंदे गटाचा पदाधिकारी नीलेश पडवळे आणि यज्ञेश अंभिरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्टेट बँक ऑफ […]
पाकिस्तानात गिरवले जाणार संस्कृतचे धडे, फाळणीनंतर लाहोर विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू
हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात झालेल्या फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे धडे शिकवले जाणार आहे. लाहोर विद्यापीठात संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्कृत भाषेतील महाभारत आणि भगवद्गीतादेखील विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने दिली. पाकिस्तानात आगामी 10 ते 15 वर्षांत संस्कृत भाषेतील विद्वान तयार होतील, असा विश्वास लाहोर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अली […]
Bigg Boss Marathi 6 बिग बॉस मराठीची मोठी घोषणा, ‘या’तारखेपासून सुरू होणार शो
बिग बॉस मराठीची घोषणा झाली आणि तेव्हापासून हा चाहते या शो ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर चॅनेलने शो च्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे. बिग बॉस मराठीचे सहावे पर्व 11 जानेवारी पासून सुरू होणार आहे. View this post on Instagram A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
महावितरणमध्ये 300 जागांची भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण पंपनीमध्ये 300 पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदांच्या 94 जागा, अतिरिक्त कार्यकारी अभियंताच्या 5 जागा, उपकार्यकारी अभियंता पदांच्या 69 जागा, उपकार्यकारी अभियंता (सिव्हील) पदांच्या 12 जागा, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या 13 जागा, व्यवस्थापक पदांच्या 25 जागा आणि उपव्यवस्थापक पदांच्या 82 अशा एकूण 300 जागांसाठी ही भरती […]
मध्यरात्री इमारतीत आगडोंब; चौघे थोडक्यात बचावले
शीळ परिसरातील चार मजली इमारतीत मध्यरात्री आगडोंब उसळला होता. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका रूममध्ये लागलेली ही आग इतकी भीषण होती की या आगीने काही क्षणातच घरातील सर्व साहित्य भक्ष्य केले. यावेळी घरातील रहिवाशांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने सुदैवाने ते बचावले. शीळ भागातील तळ अधिक चार मजली इमारतीतील रूम नंबर 303 मध्ये पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास […]
मुंबई रेशनिंग विभागाची छापेमारी, डोंबिवली एमआयडीसीत 1 हजार 839 बेकायदा गॅस सिलिंडर्स जप्त
एमआयडीसी परिसरात घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्या गोदामावर मुंबईच्या रेशनिंग विभागाने छापेमारी केली. या कारवाईत पथकाने विविध कंपन्यांचे 1 हजार 839 घरगुती व व्यावसायिक वापराचे एलपीजी सिलिंडर व सात वाहने असा एकूण 67 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई रेशनिंग विभागाचे दक्षता पथक गस्तीवर असताना एमआयडीसी फेस 2 मधील […]
लष्करामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱया विद्यार्थ्यांना लष्करात नोकरी करण्याची संधी आहे. राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकॅडमी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 30 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. यूपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱया एनडीए आणि एनएची लेखी परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये लष्करात 208 जागा भरल्या जाणार आहेत. […]
मुंबईत एका वर्षात 1 लाख 28 हजार नागरिकांना कुत्रे चावले
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी यासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान ही माहिती दिली. मुंबई पालिकेने ऑनिमल वेल्फेअर बोर्ड विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेमार्फत भटक्या श्वानांचे 2014 मध्ये सर्वेक्षण केले. त्यानुसार 95,172 तसेच 2024 मधील पुनसर्वेक्षणानुसार 90,757 इतक्या श्वानांची नोंद घेण्यात आली […]
कमालच झाली…मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमचा दरवाजा चक्क उंदराने उघडला, सीसीटीव्हीमुळे कारनामा उघड
पेण नगर परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमला आज चक्क भगदाड पडले. स्ट्राँगरूमचा दरवाजा कुणीतरी अज्ञाताने उघडल्याची बातमी सकाळी पेणमध्ये पसरली आणि प्रचंड खळबळ उडाली. या स्ट्राँगरूमभोवती असलेले सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांची तर पाचावर धारण बसली. हा स्ट्राँगरूमचा दरवाजा उघडला तरी कसा गेला हे पाहण्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना धक्काच बसला. स्ट्राँगरूमच्या आतमध्ये […]
जुन्या पेन्शनसाठी शिक्षक आमदारांचे आंदोलन
जुनी पेन्शन लागू करा, यासह विविध मागण्यांच्या समर्थनार्थ शनिवारी शिक्षक आमदारांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले. गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी होत आहे. अशात शनिवारी विविध पक्षांच्या शिक्षक आमदारांनी डोक्यावर ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ लिहीलेल्या पिवळ्या रंगाच्या टोप्या घालून विधानभवन परिसरात आंदोलन केले. यामध्ये आमदार विक्रम काळे, आमदार किरण सरनाईक, आमदार ज. […]
‘‘शिंदे सेना’ उल्लेख मिंधे गटाच्या जिव्हारी, वरुण सरदेसाई शंभुराज देसाईंना भिडले
वांद्रे शासकीय वसाहतीच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत भाग घेताना शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी ‘शिंदे सेना’ असा उल्लेख केला त्यावर आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना-धनुष्यबाण दिले आहे. त्यामुळे आमचा उल्लेख शिवसेना असा करा असे मंत्री शंभुराज देसाई म्हणाले त्याला प्रत्युत्तर देताना ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पत्रकार परिषदेत चार वेळा शिंदे सेना’ असा उल्लेख केल्याची वरुण सरदेसाई यांनी […]
मी सातवी नापास नाही…भुजबळांना पाडून आलोय; मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सुहास कांदे संतापले
विधानसभेत उत्तर देण्यासाठी मंत्रीच नसल्यामुळे लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आज आली. नाशिकच्या मालेगावमधील तीन वर्षांच्या मुलीवरील अत्याचाराच्या संदर्भात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर चर्चेसाठी गृहमंत्री नसल्याने कांदे संतप्त झाले आणि आम्ही काय सातवी नापास नाही, समीर भुजबळांचा पराभव करून निवडून आलो आहे, अशा शब्दांत खदखद व्यक्त केली. दरम्यान बालिकांवरील वाढत्या […]
पारा 10.4 वर घसरला ! हुडहुडी.. बदलापूर, कल्याण, कर्जतचे झाले ‘महाबळेश्वर’
थंडीचा कडाका वाढू लागला असून बदलापूर, कल्याण आणि कर्जतचे आज अक्षरशः महाबळेश्वरच झाले. या भागात किमान तापमान 10.4 तर कमाल तापमान साधारण 12.8 इतके होते. पुढील तीन दिवस थंडीचा हा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या गुलाबी थंडीने ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या असून नागरिक याचा आनंद घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून […]
महापालिकेची घरांसाठी सोडत, 373 जणांचे गृहस्वप्न साकार
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 अंतर्गत प्राप्त 426 घरांची संगणकीय सोडत शनिवारी ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. या सोडतीत 426 घरांपैकी 373 अर्जदारांना घरे मिळाली. 362 अर्जदार प्रतीक्षा यादीवर आहेत. सदनिका विजेत्या यशस्वी अर्जदारांना ई-मेलद्वारे माहिती कळविण्यात येणार आहे. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधण्यात येईल. सोडत प्रक्रियेतील यशस्वी तसेच प्रतीक्षा यादीवरील […]
आटगाव स्थानकात पुलाचा सांगाडा कोसळला, महाकाय लोखंडी खांबाखाली दोघे चिरडले एका कामगाराचा मृत्यू
मध्य रेल्वे मार्गावरील आटगाव रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. जीर्ण झालेल्या पुलाचे पाडकाम सुरू असतानाच या पुलाचा सांगाडा पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे सर्व कामगार जीवाच्या आकांताने आजूबाजूला पळाले. मात्र एका भल्या मोठ्या लोखंडी खांबाखाली दोन कामगार चिरडले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आटगाव रेल्वे […]
घराच्या उंबऱ्यावर बसलेल्या चिमुरडय़ावर बिबट्याचा हल्ला, संगमनेरमधील घटना; मुलाचा मृत्यू
घरासमोर उंबरठय़ावर बसलेल्या चार वर्षांच्या चिमुरडय़ावर बिबटय़ाने हल्ला केला. तालुक्यातील जवळे कडलग येथे आज सायंकाळी घडलेल्या या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला. सिद्धेश सुरज कडलग (वय 4) असे बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.जवळे कडलग येथील फळविक्रेते दिलीप कडलग यांचा नातू व सुरज कडलग यांचा चार वर्षांचा मुलगा सिद्धेश आज सायंकाळी आपल्या घरासमोर उंबरठय़ावर बसलेला […]
सिडकोची घरे 10 टक्क्यांनी स्वस्त
सर्वसामान्यांना घर घेता यावे यासाठी म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून घरे बांधली जातात. बाजारभावाच्या तुलनेत या घरांचे दर कमी असतात, परंतु म्हाडाच्या तुलनेत सिडकोची घरे महाग आहेत. ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावीत यासाठी राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला. सिडकोच्या घरांच्या किमती तब्बल 10 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा आज विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या […]
…तर कारखान्यांकडून 15 टक्क्यांनी व्याज वसूल करा, ‘जनहित शेतकरी’च्या आंदोलनाला यश
ऊसउत्पादक शेतकऱयांच्या साखर कारखान्याकडून पूर्तता करणे अपेक्षित असणाऱया विविध मागण्यांसाठी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीची रक्कम विहित वेळेत दिली नाही, त्या साखर कारखान्यांकडून वार्षिक 15 टक्के दराने व्याज वसूल करून शेतकऱयांना देण्याचे आदेश साखर सहसंचालकांनी दिले आहेत. […]
माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय मनपाकडून रद्द
नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या रेटय़ामुळे आज आयुक्तांना माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय रद्द करावा लागला. लेखी पत्राद्वारे आयुक्त यशवंत डांगे यांनी या संदर्भातला खुलासा केला आहे. काल सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी माळीवाडा वेस पाडण्यासाठी विरोध केला होता. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी आपला विरोध नोंदवला होता. विशेष म्हणजे आजूबाजूच्या माळीवाडा भागातील नागरिकसुद्धा या आंदोलनात सहभागी झाले […]
सातारच्या चौकाचौकांत सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, त्या ठिकाणी धूर ओकणाऱया वाहनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या वायुप्रदूषणामुळे नागरिकांना सायलेंट स्ट्रोकचा (पॅरालिसिस) धोका निर्माण झाला आहे. मागील पाच वर्षांपासून सातारा शहरात वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहने, यामुळे साताऱयात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः […]
कॅनॉलमध्ये पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश, मिरजगावात वन विभागाची रेस्क्यू मोहीम
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील गोरे वस्तीनजीक असलेल्या कॅनॉलमध्ये पाण्यात पडलेल्या बिबटय़ाला आज सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. वन विभाग, रेस्क्यू टीम आणि पोलिसांच्या समन्वयातून ही रेस्क्यू मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. दरम्यान, परिसरात बिबटय़ाचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी मिरजगाव परिसरातील एक लहान मुलगा कॅनॉलजवळ गेला असता, त्याला बिबटय़ा […]
मुले पळवली जाताहेत, याकडे गांभीर्याने लक्ष द्या! राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार 2021 ते 2024 या कालावधीत मुलं पळवण्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले आहे. लहान मुलांना पळवून त्यांना भीक मागायला लावणे, कामाला जुंपण्यासाठी आंतरराज्य टोळ्या निर्माण झाल्या आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि महत्त्वाच्या विषयावर सदनामध्ये चर्चा करावी, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे […]
बोल्हेगावात घरात घुसून महिलेचा खून, नगर शहरात खळबळ; तोफखाना पोलिसात गुन्हा
दोन्ही पायांनी अधू असलेल्या आणि घरात एकटीच असल्याची संधी साधत अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून 40 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा बाळासाहेब शिंदे (वय 40, रा. भारत बेकरी रोड, कौस्तुभ कॉलनी, बोल्हेगाव, अहिल्यानगर) असे हत्या […]
साप्ताहिक राशिभविष्य –रविवार 14 डिसेंबर 2025 ते शनिवार 20 डिसेंबर 2025
>> नीलिमा प्रधान मेष – शब्द जपून वापरा मेषेच्या भाग्येषात रवि, शुक्र चंद्र मंगळ लाभयोग. साडेसातीचे पर्व सुरू आहे. जे ठरवाल ते पूर्ण होईल असे गृहित धरू नका. शब्द जपून वापरा. धंद्यात वाद नको. नवे काम मिळेल. योजनांना साथ मिळेल. अतिशयोक्ती नको. शुभ दि. 15, 16 वृषभ – संयमाने प्रश्न सोडवा वृषभेच्या अष्टमेषात सूर्य, शुक्र. […]
अथणी नगरपरिषदेला पालिकेचा दर्जा
प्रतिनिधी/ अथणी अथणी नगरपरिषदेला नगरपालिकेचा दर्जा देण्यात आल्याची अधिकृत घोषणा होताच शहरात जल्लोष साजरा झाला. शिवकुमार सवदी व माजी नगरपरिषद अध्यक्ष दिलीप लोणारे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद सदस्य व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. नगरपरिषदेला नगरपालिकेचा दर्जा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे आमदार लक्ष्मण सवदी यांचा यावेळी जयघोष [...]
कोलकात्यात ‘मेस्सी’प्रेमींचा संताप
स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ : आयोजकांना अटक; ममता बॅनर्जी सरकारकडून चौकशीसाठी समिती स्थापन वृत्तसंस्था/ कोलकाता अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा बहुप्रतिक्षित ‘जीओएटी इंडिया टूर’ सुरू झाल्यापासून वादात सापडला आहे. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी कोलकातामध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी डम-डम विमानतळावर गर्दी केली होती. शहरातील रस्ते देखील फुटबॉल चाहत्यांनी भरलेले होते. तथापि, [...]
निपाणीतील प्रशासक स्थगितीची याचिका फेटाळली
सत्ताधारी-विरोधकांना उच्च न्यायालयाचा दणका प्रतिनिधी/ निपाणी निपाणी नगरपालिकेत प्रशासक नियुक्तीला स्थगिती देण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवक तसेच विरोधी गटनेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना प्रशासक नियुक्तीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही चपराक बसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यानुसार निपाणी नगरपालिकेचा पंचवार्षिक कालावधी ऑक्टोबर 31 रोजी संपुष्टात आला. मात्र, [...]
फिलिपाईन्समध्ये आगीत 500 लोक बेघर
वृत्तसंस्था/ मनिला फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथील मंडलुयोंग शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या निवासी भागात शनिवारी आगीची भीषण दुर्घटना घडली. नुएवा डी फेब्रेरो येथील बारांगे प्लेझंट हिल्सच्या ब्लॉक 5 मध्ये ही आग लागली. या आगीच्या भडक्यात अनेक घरे भस्मसात झाली असून 500 हून अधिक लोक बेघर झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही. येथील घरे [...]
भूस्खलनात रुग्णालये, शाळा, पूल उद्ध्वस्त; आतापर्यंत 1,000 हून अधिक मृत्यू वृत्तसंस्था/ सुमात्रा इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील तीन प्रांतांमध्ये भीषण पूर आणि भूस्खलनाने हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तसेच 218 जण बेपत्ता असून त्यांच्याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने शनिवारी यासंबंधी अधिकृत [...]
दिल्ली-एनसीआरच्या सुरक्षेसाठी स्वदेशी संरक्षण प्रणाली तैनात
लढाऊ विमानांचे हल्ले रोखण्यासाठी ड्रोनचा वापर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे संरक्षण करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. दिल्ली-एनसीआरला शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी भारत आता स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली तैनात करत आहे. या तैनातीमुळे दिल्लीला आता क्षेपणास्त्रs, ड्रोन किंवा उंचावरून उडणाऱ्या विमानांमधून होणाऱ्या शत्रूच्या हल्ल्यांपासून पूर्णपणे संरक्षित केले जाईल. ही बहुस्तरीय [...]
रेल्वे इंजिन जप्त होणार, यात आश्चर्यकारक असे काय आहे, असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. पण ते जप्त करण्याचा निर्णय घेतला जाण्यामागचे कारण भिन्न आहे. ते समजल्यावर आपल्यालाही, ते योग्यच आहे, असे निश्चितच वाटेल. ही घटना मध्यप्रदेशातील आहे. या राज्यात ‘रातापानी’ नामक एक व्याघ्र अभयारण्य आहे. या अभयारण्यातून रेल्वेमार्ग जातो. काही दिवसांपूर्वी या अभयारण्यातून एक [...]
लष्कर करणार पिनाका रॉकेटची खरेदी
120 किमीपर्यंत मारक क्षमता : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली होती मोलाची भूमिका वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय लष्कराने 120 किमी पर्यंतच्या रेंजसह गाईडेड पिनाका रॉकेट समाविष्ट करून आपली तोफखाना ताकद आणखी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या खरेदी व्यवहाराची अंदाजे किंमत अंदाजे 2,500 कोटी रुपये इतकी आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर लांब पल्ल्याच्या तोफखाना क्षमता मजबूत करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे [...]
शासकीय कर्मचाऱ्यांना वांद्रयांतच भूखंड मिळाला पाहिजे, वरुण सरदेसाई यांनी आठवण करून दिली जीआरची
वांद्रे येथील शासकीय कर्मचाऱयांना वांद्रे भागातच भूखंड देण्याचा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे आणि आता आपण सांगता शासकीय वसाहतीसाठी महानगर प्रदेशात भूखंड दिला जाईल. मग तुम्ही तुमच्याच जीआरचे उल्लंघन करणार काय, असा सवाल शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधीच्या माध्यमांतून केला. वांद्रे पूर्व येथील शासकीय भूखंडावर शासकीय कर्मचारी हक्काची घरे मिळावीत म्हणून कर्मचारी गेल्या […]
माझगाव ताडवाडीच्या पुनर्विकासासाठी बीडीडीच्या धर्तीवर निर्णय घ्या, मनोज जामसुतकर यांची आग्रही मागणी
माझगाव ताडवाडी बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मागील चार अधिवेशनांपासून मांडत आहेत, पण सरकार त्यावर निर्णय घेत नाही. बीडीडी व अभ्युदय नगरच्या धर्तीवर धोरणात्मक निर्णय घेऊन माझगाव ताडवाडीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत केली. बीआयटी चाळींच्या सोळा इमारती व ए, बी, सी ब्लॉक असे तेराशे भाडेकरू आहेत. हा पुनर्विकास प्रकल्प […]
वेतनासाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन, शिक्षिकेची प्रकृती खालावली
शालार्थ ओळखपत्र घोटाळ्याच्या गदारोळात राज्यातील शेकडो शिक्षकांचे वेतन थांबले. त्यामुळे उपासमार सोसत असलेल्या शिक्षकांनी विधिमंडळ हिवाळी अधिवेशन काळात सोमवारपासून यशवंत स्टेडियमवर अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षिकेची प्रकृती खालावल्याने यशवंत स्टेडियमवर एकच गदारोळ झाला. राज्य सरकारने गेल्या 10 महिन्यांपासून शालार्थमधून नोकरी मिळालेल्या शिक्षकांचे वेतन अडवून ठेवले आहे. शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढावा, […]
दरवर्षी 2 लाख भारतीय सोडतात देश
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांची लोकसभेत माहिती वृत्तसंस्था / नवी दिल्ली प्रत्येक वर्षी साधारणत: दोन लाख भारतीय भारत देश सोडून अन्य देशांमध्ये स्थिरावत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 9 लाख भारतीयांनी भारत सोडून विदेशात वास्तव्य केले आहे. 2021 नंतर भारतीय नागरीकत्व सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती परराष्ट्र [...]
मुंबईतील कष्टकरी व कामगार वर्गातील तसेच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या तरुणांना रात्रशाळांमुळे शिकण्याची संधी मिळते. परंतु दुर्दैवाने पटसंख्येअभावी मुंबईतील 17 रात्रशाळा गेल्या चार वर्षांत बंद पडल्या. मुंबईतील मराठी माणूस उपनगरांमध्ये स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढल्याने ही परिस्थिती ओढवली, असा आरोप विरोधी पक्षाने आज विधान परिषदेत केला. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. […]

31 C