डब्ल्यूपीएल लिलाव : दीप्ती शर्मा ठरली महागडी खेळाडू
3.20 कोटीला यूपी वॉरियर्सकडे, शिखाला ‘लॉटरी’, अमेलिया केर, श्री चरणी, वोल्वार्ड यांनाही मोठी रक्कम वृत्तसंस्था/नवी दिल्ली भारताची स्टार महिला अष्टपैलू क्रिकेटपटू दीप्ती शर्माने येथे झालेल्या डब्ल्यूपीएल लिलावात बाजी मारली असून ती सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तिला यूपी वॉरियर्सने 3.20 कोटी रक्कम देत आपल्या ताफ्यात घेतले आहे. याशिवाय विश्वचषक विजेत्या संघांतील सदस्य, श्री चरणी, लॉरा [...]
विश्वचषक विजेत्या अंध महिला क्रिकेट संघाने घेतली पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली : कोलंबो येथे झालेल्या अंध महिलांच्या पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेपाळला 7 गड्यांनी पराभूत करुन भारतीय महिला क्रिकेट संघाने जेतेपद मिळविले. भारतीय अंध संघातील सदस्यांनी गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपली स्वाक्षरी असलेली बॅट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिली तर नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यासाठी चेंडूवर स्वाक्षरी केली.
तन्वी शर्मा, मनराज सिंग उपांत्यपूर्व फेरीत
जपानची टॉपसिडेड ओकुहारा, एचएस प्रणॉय पराभूत वृत्तसंस्था/लखनौ 2025 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताची बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने जपानची माजी विश्वविजेती नोझोमी ओकुहाराचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला तर भारताच्या 19 वर्षीय मनराज सिंगने पुरूष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना आपल्याच देशाच्या [...]
मेष : नवीन ओळखी होतील जुन्या प्रश्नांवर मात करता येईल वृषभ : काही मोठे निर्णय अचानक घ्यावे लागतील मिथुन : शब्द जपून वापरा, अर्थाचा अनर्थ होऊन मानसिक त्रास संभवतो कर्क : आपले म्हणणे विचारपूर्वक मांडा, सांभाळून पाऊल पुढे टाका सिंह : अति स्वार्थ व ईर्षेमुळे स्वत:चे नुकसान होऊ शकते कन्या : विश्वासू व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचा [...]
भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर विजय
वृत्तसंस्था/इपोह (मलेशिया) सुलतान अझलन शहा चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सेल्व्हम कार्तीच्या निर्णायक गोलाच्या जोरावर भारतीय पुरूष हॉकी संघाने कडव्या न्यूझीलंडचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेतील बुधवारच्या सामन्यात भारताने यजमान मलेशियाचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारतातर्फे अमित [...]
9 वर्षांनंतर जेतेपद मिळवण्यास भारत सज्ज
कनिष्ठ हॉकी विश्वचषक आजपासून वृत्तसंस्था/चेन्नई पुऊषांची कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धा आज शुक्रवारपासून सुरू होत असून स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत यशस्वी संघ असलेला यजमान भारत शुक्रवारी येथे पहिल्या गट सामन्यात चिलीविऊद्ध आपली मोहीम सुरू करताना नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दोन वेळा विजेता राहिलेल्या भारताने 2016 मध्ये लखनौत आताच्या वरिष्ठ महिला [...]
वृत्तसंस्था/अहमदाबाद 17 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या एएफसी आशाय चषक पात्र फेरी स्पर्धेतील झालेल्या सामन्यात दलालमुन गंगटेच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने चीन तैपेईच्या 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेच्या मोहीमेत भारताचा हा पहिला विजय आहे. गेल्या शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात भारताने पॅलेस्टीनला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. चीन तैपेईने या सामन्यात [...]
ऑफ-बिट…उझबेकिस्तानचा युवा सितारा…
गोव्यात झालेल्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील टायब्रेकरमध्ये चीनच्या वेई यीचा पराभव करून उझबेकिस्तानचा युवा खेळाडू जावोखिर सिंदारोव्हनं या खेळाच्या इतिहासात आपलं नाव कोरलंय…बाद फेरीपूर्वीच एकामागून एक मजबूत दावेदार बाहेर पडत असताना 16 वा मानांकित सिंदारोव्ह नुसता टिकून राहिला नाही, तर त्यानं मोठी झेप घेऊन दाखविली… 19 वर्षीय जावोखीर सिंदारोव्ह हा ठरलाय बुद्धिबळ विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वांत [...]
कव्हर ड्राईव्ह : कसोटी क्रिकेटकडे ‘गंभीर’तेने बघा
भारतीय क्रिकेट संघाचे नेमकं चाललंय काय? हा मला एकट्याला भेडसावणारा प्रश्न नाही आहे. हा भारतीय क्रिकेटसाठी पडलेला मिलियन डॉलर प्रश्न आहे. न्यूझीलंडने मागच्या दिवाळीत व्हाईटवॉश देत भारतात दिवाळी साजरी केली. आनंदाने फटाके वाजवले. फटाक्यात लवंगीची माळ नव्हती तर चक्क अॅटम बॉम्ब होते. 2012 मध्ये मायदेशात इंग्लंडने आपल्याला चितपट केलं होतं. परंतु हे क्रिकेट आहे कधीतरी [...]
भारताला न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुच्या कसोटी मालिकेतही अनपेक्षितरीत्या पूर्ण धुलाई सहन करावी लागलीय अन् प्रतिस्पर्ध्यांसाठी लावलेल्या फिरकीच्या जाळ्यात स्वत:च अडकून नाकावर आपटण्याची पाळी आलीय…यामुळं आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झालेत ते प्रशिक्षक गौतम गंभीरचे डावपेच. गंभीरच्या कार्यकाळात मर्यादित षटकांच्या सामन्यांत भारतीय संघानं वर्चस्व गाजविलेलं असलं, तरी कसोटींत मात्र आपली वाटचाल राहिलीय ती निराशाजनक अशीच… काही दिवसांपूर्वीची गोष्ट….भारतीय क्रिकेट [...]
‘त्या’ दगडांचे जतन होणार, मुंबई क्राईम ब्रँचचे पोलादी पत्थर शौर्याची अखंड साक्ष देणार
>> आशीष बनसोडे ऐतिहासिक वारसा असलेली पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेची दगडी इमारत आता जमीनदोस्त होत आहे. ही पुरातन इमारत इतिहासजमा होत असली तरी गुन्हे शाखेच्या शौर्याची अखंड साक्ष देणाऱया ‘त्या’ इमारतीचे दगड जतन करण्यात येणार आहेत. त्या दगडातून नायगावच्या परेड मैदानात किल्ल्याची अभेद्य भिंत साकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. एक शतकाहूनही अधिक काळ मुंबई गुन्हे […]
उद्धव ठाकरे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, ‘शिवतीर्थ’वर दोन्ही बंधूंमध्ये दीड तास चर्चा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. महानगरपालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच निर्णय होणार आहे. तसेच राज्यातही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही भेट चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे आज दुपारी ‘शिवतीर्थ’वर पोहोचले. यावेळी उद्धव ठाकरे […]
महाराष्ट्रातील निवडणुकांचे काय होणार? आज सर्वोच्च न्यायालय देणार अंतरिम आदेश
आरक्षणाची 50 टक्क्यांची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये ठरणार आहे. आरक्षण मर्यादा उल्लंघनाबाबत राज्य सरकार आणि निवडणूक आयोग सविस्तर तपशील सादर करणार आहे. त्या अनुषंगाने न्यायालय अंतरिम आदेश देणार आहे. त्याचा नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सुरू असलेल्या निवडणूक कार्यक्रमावर थेट परिणाम होणार आहे. तसेच मुंबईसह इतर […]
महायुतीत बेबनाव…मोठ्या गडबडीची चाहूल
दोन दिवसांत काय होईल सांगता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सस्पेन्स वाढवला. पुढील दोन-तीन दिवसांत काय होईल सांगता येत नाही, असे पवार म्हणाले. 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे पालन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आग्रही दिसत आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय दोन-तीन दिवसांत होईल, त्याबाबत आताच काही सांगता येत नाही, असेही पवार पुढे म्हणाले. […]
एकीकडे अनेक मंत्र्यांना सरकारी बंगले मिळालेले नाहीत. अनेक मंत्री बंगल्याऐवजी फ्लॅटमध्ये राहतात. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट मंत्रालयासमोरील सरकारी बंगला बिनदिक्कतपणे वापरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. चव्हाण हे मंत्री नसतानाही मंत्र्यांसाठी राखीव बंगला वापरत आहेत आणि बंगल्यातील यंत्रणेवर मात्र सरकारी खर्च होत आहे. रवींद्र चव्हाण हे मागील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री […]
केवढं हे प्रदूषण, 500 मीटरपुढचे काहीच दिसत नाही…न्यायालयाला चिंता, आज तातडीने सुनावणी
केवढं हे प्रदूषण, पाचशे मीटरच्या पुढचे काहीच दिसत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबईच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. मुंबईच्या प्रदूषणावर कायमस्वरुपी तोडगा हवा, असेही न्यायालयाने नमूद केले. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दिल्लीच्या प्रदूषणावर काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचा नेमका काय परिणाम होतोय याचा आढावा घेऊन […]
पाकिस्तानवर लष्करप्रमुख असिम मुनीर यांचा ताबा, घटनादुरुस्ती करून सीडीएफपदी नियुक्ती
पाकिस्तानच्या सत्तेवर कायम लष्कराचे नियंत्रण राहिले आहे. आता लष्कराची पकड आणखी घट्ट करण्यात आली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानात नुकतीच 27 वी घटनादुरुस्ती करण्यात आली. याद्वारे मुनीर यांनी पाकिस्तानच्या संपूर्ण लष्कराचा ताबा घेतला आहे. ते आता लष्कर, वायू सेना आणि नौदलाचे प्रमुख असतील. […]
फडणवीसांच्या सभेत गोंधळ, आरक्षणाच्या मागणीसाठी मातंग समाजातील तरुण आक्रमक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमधील लोहा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत तरुणांनी प्रचंड गोंधळ घातला. फडणवीसांचे भाषण सुरू असतानाच मातंग समाजाच्या तरुणांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करून मातंग समाजाला न्याय देण्याची घोषणा केली. ‘अनुसूचित जातीमधील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ वर्गीकरणाची अंमलबजावणी सरकारने तातडीने करावी’, ‘सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा सात ते आठ तरुणांनी दिल्या.
सामना अग्रलेख – मंत्र्यांकडे मालच माल! माल येतो कोठून?
‘सत्तेतून पैसा, त्याच पैशांतून पुन्हा सत्ता व पैसा’ या चक्रात महाराष्ट्राचे राजकारण गुंतले आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगतात, ‘‘माझ्याकडे चिक्कार पैसा आहे. पैशांची चिंता करू नका. तुम्ही निवडणुका जिंका.’’ गुलाबराव पाटील, बावनकुळे हे दोन वेगळ्या पक्षांचे मंत्री ‘लक्ष्मी’दर्शनाच्या बाबतीत एकाच सुरात बोलतात. बावनकुळ्यांकडे महसूल खाते, एकनाथ शिंद्यांकडे नगरविकास खाते, अजित पवारांकडे […]
लेख –आयात -निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर!
>> सतीश देशमुख शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची परिस्थिती निर्माण होत असताना सरकार हस्तक्षेप करून शेतमालाचे भाव खाली पाडते. आफ्रिका, म्यानमार, ब्राझील, अर्जेंटिना, मोझांबिक, टांझानिया वगैरे परदेशी शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा जास्त किमतीमध्ये, चढय़ा दराने खरेदी करून त्यांचे हित जपते. आपल्या परकीय चलनाची उधळपट्टी करते. केंद्र सरकार शेतकऱयांच्या अर्थकारणापेक्षा उद्योगपतींच्या नफेखोरीला जास्त प्राधान्य देते. निर्यातबंदीपेक्षा वेळोवेळी होणारी आयात […]
दुबार मतदार हाजिर हो!वॉर्ड ऑफिसमध्ये अर्ज भरून घेणार
डबल मतदान टाळण्यासाठी पालिकेने घरोघरी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून, दुबार मतदारांना परिशिष्ट – 1 भरण्यासाठी ‘इंटिमेशन लेटर’ देण्यात येत आहे. यानुसार दुबार मतदारांना वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन ‘परिशिष्ट-1’ फॉर्म भरून द्यावा लागेल; अन्यथा मतदानाच्या दिवशी त्यांच्याकडून ‘दुबार मतदान करणार नाही’ असे हमीपत्र लिहून घेतले जाईल. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत एकाच व्यक्तीचे […]
जाऊ शब्दांच्या गावा –‘उ’ उखळाचा
>> साधना गोरे म्हणी, वाक्प्रचार ही त्या त्या भाषेतली लघुकाव्येच असतात. कारण त्यांतून त्या भाषिकांची हजारो वर्षांची संस्पृती म्हणजे त्या समाजाची जीवनशैली, रूढीपरंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा तर कळतातच; पण त्यांची विचार पद्धती, सर्जनशीलता, कल्पकता ठळकपणे लक्षात येते. आपल्या कृषिप्रधान समाजाची जीवनशैली, त्यासाठी वापरलं जाणारं साधन साहित्य यावरून केवढे तरी शब्दप्रयोग आहेत. आपल्या कृषिप्रधान संस्पृतीतलं आताशा अजिबात वापरात […]
चष्म्याची फ्रेम अचानक व्रॅक झाली तर काय कराल. सर्वात आधी फ्रेम प्लॅस्टिकची असेल तर व्रॅक झालेल्या ठिकाणी सुपर ग्लू किंवा पारदर्शक टेप लावू शकता. स्क्रू सैल झाला असेल तर स्क्रूड्रायव्हरने तो घट्ट करा. जर फ्रेम जास्त खराब झाली असेल, तर तुमच्या लेन्ससाठी नवीन फ्रेम घेऊ शकता. तुमची जुनी लेन्स नवीन फ्रेममध्ये बसवून […]
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनचे सारथ्य सांभाळणाया मोटरमनच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासन चालढकल करीत आहे. कमी मनुष्यबळामुळे एक-दोन दिवसही रजा मिळेनाशी झाली आहे. उलट डबल डय़ुटीचा ताण पडत असल्याने मोटरमनमध्ये प्रशासनाविरुद्ध असंतोष वाढत चालला आहे. रेल्वे प्रशासनाच्या जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. उपनगरी रेल्वेमार्गावरील मोटरमनना एकही साप्ताहिक सुट्टी नसते. केवळ आजारपणाच्या […]
खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी बेस्टचे चालक-वाहक दावणीला, आठ तासांपेक्षा अधिक डय़ुटीचा ताण
बेस्टच्या ताफ्यात खासगी कंपन्यांच्या बसेसचे वाढलेले प्रमाण सध्या बेस्ट कर्मचाऱयांसाठी डोकेदुखीचा विषय बनले आहे. खासगी कंपन्या बेस्ट उपक्रमाकडून भाडय़ाच्या रूपात मोठा फायदा कमावत आहेत. त्या कंपन्यांच्या फायद्यासाठी बेस्टच्या चालक-वाहकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. त्यांची डय़ुटी आठ तासांपेक्षा अधिक होत असून अतिरिक्त कामाचा भत्ताही वेळेत मिळत नसल्याने बेस्ट कर्मचाऱयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बेस्टच्या […]
महापालिकेला जाग आली, प्रदूषणकारी 53 बांधकामांवर बंदी
मुंबईत वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱया 53 बांधकामांचे काम पालिकेने बंद केले आहे. बांधकामांनी एअर क्वालिटी इंडेक्स दर्शवणारे सेन्सॉर बसवावेत आणि पालिकेने जाहीर केलेली इतर 27 प्रकारचे नियम पाळावेत, अन्यथा पालिका सक्त कारवाई करेल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. धुरकट वातावरण आणि हवेची गुणवत्ता […]
4500 हजार कोटींच्या सिडको घोटाळ्याची चौकशी, संजय शिरसाट यांच्यावर झाला होता आरोप
यशवंत बिवलकर यांच्याशी संबंधित 4500 कोटी रुपयांच्या कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर हा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. शिरसाट यांनी पदाचा दुरुपयोग करत बिवलकर यांना ही जमीन दिल्याचा रोहित पवार यांचा दावा आहे. […]
जास्त कराल तर कापून काढू, बावनकुळेंसमोर भाजप आमदाराची विरोधकांना धमकी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असून सत्ताधाऱ्यांकडून दररोज कुणी ना कुणी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. कधी मतांसाठी निधीची धमकी दिली जातेय तर कधी पैशांचा खुलेआम वापर केल्याची कबूलीही दिली जातेय. याच दरम्यान भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार आशिष देशमुख […]
माझ्या घरी शंभर पोलिसांनी पहाटे धाड टाकून झाडाझडती घेतल्याचे भोकाड पसरून सांगणारे मिंधे गटाचे नाटकी आमदार संतोष बांगर यांचे अश्रू चक्क वाया गेले! पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आम्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार तपासत होतो, आमदार बांगर यांचे घर आम्ही तपासलेच नाही, असे स्पष्ट केले. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या खुलाशामुळे आमदार संतोष बांगर, ‘लावणी’फेम माजी खासदार हेमंत पाटील […]
तळ ठोकून बसा नाही तर विकासाचे गाजर दाखवा विजय शिवसेनेचाच होणार, अमोल किर्तीकर यांनी भाजपला सुनावले
पक्ष फोडाफोडी झाली. लोकप्रतिधींना पळवून झाले. खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्यात आले. मात्र तरी सुद्धा शिवसेनेच्या विरोधात लढताना सत्ताधाऱ्यांना अजूनही लोकांना विकासाचे गाजर दाखवावे लागते आणि याने सुद्धा शिवसैनिक आपल्याकडे वळत नाही म्हणून गल्ली बोळात देखील कित्येक दिवस सत्ताधाऱ्यांना तळ ठोकून बसावे लागते. याचाच अर्थ शिवसेनेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पक्ष सोडून गेले […]
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी राज्यसभेने खासदारांच्या वर्तनाबाबत जारी केलेल्या बुलेटिनमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी या बुलेटिनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुलेटिनमध्ये खासदारांसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. बुलेटिननुसार, खासदारांना थँक्यू , थँक्यू, जय हिंद आणि वंदे मातरम […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरिक्षक पदासाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव एक वर्षाची विशेष संधी देण्यात यावी, अशी मागणी राज्यशासनाकडे वयोधिक झालेल्या विद्यार्थ्यांकडून निवेदनाव्दारे केली जात आहे. संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ जाहिरात २९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वयो मर्यादा गणना दिनांक 1 नोव्हेंबर २०२५ अशी आहे. उपरोक्त जाहिरात येण्याससाठी ७ महिने […]
२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने महायुतीत भूकंप
महायुतीत मिंधे गट आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य असताना २ डिसेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचं राजकरण चांगलंच तापलं आहे. आज नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने रवींद्र चव्हाण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया […]
बीडमध्ये कमळ-घड्याळ्यात जुंपली, महाविकास आघाडी सेफ झोनमध्ये
बीड नगर पालिका निवडणुकीच्या मैदानात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आगपाखड करत आहेत. टोकाची भाषा बोलली जात आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकीकड महायुतीत संघर्षाचे नाट्य रंगले असताना दुसरीकडे मात्र तुतारी आणि मशाल सेफ झोनमध्ये पोहचले आहेत. बीड नगर पालिका निवडणुक खर्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. या […]
मुंबईला केंद्रशासित नाही तर अदानीशासित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आदित्य ठाकरे यांची टीका
मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाचे 1700 कोटींचे काम अदानी समुहातील एका कंपनीला देण्यात आले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ”भाजपचे मुंबईला केंद्रशासित नाही तर अदानीशासित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ”मुंबईकरांनो, वेळीच सावध व्हा! […]
पाकिस्तानचा कंट्रोल मुनीरच्या हाती! घटनादुरुस्ती करून CDF पदी करण्यात आली नियुक्ती
पाकिस्तानमधील लष्कराचा प्रभाव एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. देशाचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याची गुरुवारी पाकिस्तानचे पहिले संरक्षण दल प्रमुख (CDF) म्हणून नियुक्ती करण्यात केली आहे. हे पद अलिकडेच लागू झालेल्या २७ व्या घटनादुरुस्ती अंतर्गत निर्माण करण्यात आले आहे. या दुरुस्तीनंतर मुनीर आता लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांचा सर्वोच्च कमांडर बनला […]
Solapur Crime : एसीबीने सोलापूरमध्ये भ्रष्टाचार प्रकरणात कृषी अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ
सोलापूर एसीबीच्या पथकाने तालुका कृषी अधिकाऱ्यावर केली कारवाई सोलापूर : महाडीबीटी पोर्टलवर शेतीसाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या अर्जाला पूर्वमंजुरी देण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे (वय ३१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सोलापूर युनिटने रंगेहाथ पकडले. तडजोडीअंती आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई [...]
जगळपूर येथे शेतात सापडले अतिविषारी घोणस, सर्पमित्राने दिले जीवनदान
जळकोट तालुक्यातील जगळपूर येथील शेतकरी व्यंकटेश पाटोदाकर यांच्या शेतामध्ये सोयाबीनच्या बनमी मध्ये दोन साप दिसून आले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत काम करीत असलेले सर्पमित्र अमोल शिरूरकर, दयानंद हाक्के यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. सर्पमित्र शिरूरकर लगेचच त्यांची टीम घेऊन त्याठिकाणी पोहोचले व त्यांनी त्या अतिविषारी दोन्ही घोणस सापांना […]
Solapur : माजी जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार आज वडाळा गावात उत्तर सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे यांचा तीन आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निश्चित झालेला प्रवेश आज होणार असून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आज वडाळा येथे पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी [...]
दिल्लीतील वाढत्या प्रदुषणामुळे मुलाची करावी लागली शस्त्रक्रिया, व्हिडीओ शेअर करत आईने मांडली व्यथा
नोएडामधील एका महिलेनं दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे तिच्या लहान मुलाची तब्येत किती बिघडली याची हकिगत सांगत सोशल मीडियावर वेदना व्यक्त केल्या. साक्षी पाहवा नावाच्या या महिलेनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत मुलाची हॉस्पिटलमधील अवस्था दाखवली आणि वाढत्या प्रदूषणावर संताप व्यक्त केला. साक्षी यांनी म्हटलं की, लिहिलं की ती दोन वर्षांपूर्वी कुटुंबासह दिल्ली-एनसीआरमध्ये राहायला आली. त्यानंतरपासूनच तिच्या […]
WPL 2026 Schedule –महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, ९ जानेवारीपासून होणार सुरू
जगातील सर्वात मोठ्या महिला क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या WPL 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीतील मेगा लिलावाच्या अगदी आधी चाहत्यांना याची माहिती देण्यात आली होती. BCCI ने घोषणा केली की ही, स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये खेळवली जाईल. महिला प्रीमियर लीग 9 जानेवारी रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना 5 […]
Pandharpur : पंढरपूरमध्ये परप्रांतीय चोरट्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीती
पंढरपूर तालुक्यातील चोरट्यांचा वाढता सुळसुळाट पंढरपूर : पंढरपूर शहर आणि तालुक्यात परप्रांतीय चोरट्यांचा सुळसुळाट बाढला आहे. महागड्या मोटारसायकल आणि दुकाने, बँका, पतसंस्था यांना लक्ष्य केले जात आहे. मागील तीन दिवसांत पंढरपूर शहरातून तीन दुचाकी वाहने चोरीला गेली तर तालुक्यातील तुंगत येथे छोटे किराणा [...]
नगरपालिका निवडणुकीत मालवणमध्ये भाजपकडून पैशाचे वाटप सुरू आहे, असा अरोप शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे. त्याचा एक व्हिडीओही नितेश राणे यांनी शेअर केला होता. यावरून जर सत्तेमधलेच लोक काळा पैसा पकडून देतात तर मग काळा पैसा कुणाचा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तसेच […]
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘जागतिक दिव्यांग दिना’निमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या, शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांनी विशेष उपक्रम राबवावेत, अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटना, धाराशिव जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या पदधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात दिव्यांग व्यक्तींबाबत जनजागृती, त्यांच्या हक्कांची माहिती, विविध योजनांचा प्रसार आणि सामाजिक संवेदनशीलता वाढविण्यासाठी जिल्हास्तरावरून स्पष्ट निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याचे आदेश द्यावेत. जनजागृती कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, सन्मान समारंभ, तसेच दिव्यांग हक्क व योजना मार्गदर्शनाचे उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश द्यावेत. दिव्यांगांच्या तक्रारी व मागण्यांसाठी विशेष तक्रार निवारण दिवस आयोजित करावा. शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प, सुलभ प्रवेश, मार्गदर्शक फलक इत्यादी सुविधा तपासून आवश्यक सुधारणा कराव्यात. या उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांच्या हक्कांचे संरक्षण, आत्मविश्वास वृद्धी आणि समाजातील सकारात्मकता वाढण्यास मदत होईल, असे संघटनेने नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने आदेश जारी करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सदरील निवेदन जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, कार्याध्यक्ष महादेव खंडाळकर, शहराध्यक्ष जमीर शेख, जिल्हा सहसंघटक मेहबूब तांबोळी, तसेच प्रकाश खडके, सागर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Solapur : येळकोट…येळकोट…जय मल्हार’च्या जयघोषात चंपाषष्टी उत्साहात!
सोलापूरच्या बाळे खंडोबा देवस्थानात चंपाषष्टी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा सोलापूर : महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र बाळे खंडोबा देवस्थानात चंपाषष्टीचा पारंपरिक उत्सव यंदा अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा झाला. बुधवारी (दि. २६) पहाटे ५ वाजता ‘श्रीं’ च्या पवित्र [...]
आता वादळी वाऱ्यात केळी पिकाचे नुकसान होणार नाही, बार्कने विकसित केले नवीन वाण
जोरदार वारे, पावसाळा आणि वारंवार होणारे पिकांचे नुकसान याला उपाय म्हणून भाभा अणुसंशोधन केंद्राने (BARC) तयार केलेली नवीन बुटकी केळीची जात ‘कावेरी वामन’ शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरू शकते. भारतातील पहिलीच म्युटंट केळी अशी तिची नोंद झाली आहे. तसेच बार्कने विकसित करून बाजारात आणलेला हा पहिलाच फळवर्गातील म्युटंट प्रकार आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले […]
Solapur : सोलापुरात कोठे प्रतिष्ठान तर्फे 26 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात
लिंगराज वल्याळ मैदानात मंगलवाद्यांच्या सूरात विवाह सोहळा सोलापूर : गोरज मुहूर्तावरची लगबग….मंगलवाद्यांचे सूर…आणि अनुपम्य असा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी जमलेले हजारो वऱ्हाडी अशा वातावरणात बुधवारी स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला. लिंगराज [...]
बंदीवानांसाठी सुर्दशनक्रिया, योगा, भजन, नामस्मरण शिबिर
ओरोस येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आयोजन ओरोस| प्रतिनिधी बंदीवानांना योग हा व्यायामाचा एक प्रभावशाली प्रकार आहे. ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. कारागृहाच्या आत चार भिंतीमध्ये बंदी जनांमध्ये स्वस्थ निरोगी, शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी योग अभ्यासाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनः शांती टिकवुन ठेवण्याचा सुरक्षित आणि [...]
Satara Politics : साताऱ्यात विकासाच्या मुद्यावर आरोप-प्रत्यारोपांची रंगली मालिका
साताऱ्यात निवडणूकीसाठी रिक्षा युतीचे अनोखे प्रचार सातारा : साताऱ्यात तब्बल आठ वर्षांनंतर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुलवाजला असून, प्रचाराची तापलेली हवा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पक्षनिहाय उमेववारी जाहीर झाल्यानतर उमेववारानी प्रभागनिहाय पवयात्रा, घराघरांत जाऊन पत्रकवाटप करीत जोरवार शक्तिप्रवर्शन सुरू आहे. कालचे मित्र आज कट्टर [...]
चाईल्ड हेल्पलाईन चमूने रोखले दोन बालविवाह
धाराशिव (प्रतिनिधी)- ‘बालविवाह मुक्त भारत 100 दिवसांचे अभियान'या उपक्रमाचे औचित्य साधत चाईल्ड हेल्पलाईन धाराशिव चमूने जिल्ह्यातील दोन बेकायदेशीर बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. धाराशिव येथील भीमनगर आणि तुळजापूर तालुक्यातील पिंपळे (खुर्द) येथे होणारे दोन बालविवाह चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या तत्पर हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले. दि.21 नोव्हेंबर रोजी चाईल्ड हेल्पलाईनला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार, भीमनगर येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा,तर पिंपळे खुर्द येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह होणार असल्याचे समजताच चमूने तातडीने पथके रवाना केली.विवाहस्थळी पोहोचून संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असता दोघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे असणे बंधनकारक आहे. त्यामुळे दोन्ही विवाह बेकायदेशीर असल्याने तत्काळ ते रोखण्यात आले. ही कारवाई प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे आणि जिल्हा प्रकल्प समन्वयक विकास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पार पडली.चमूमध्ये अमर भोसले (सुपरवायझर), योगेश माने तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे व त्यांचे सहकारी सहभागी होते. दोन्ही प्रकरणांत संबंधित बालक/बालिका व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले.त्यांनी बालविवाह न करण्याबाबत हमीपत्र दिले असून पंचनामा करण्यात आला आहे. त्यानंतर या दोन्ही बालक/बालिका यांना बालकल्याण समिती, धाराशिव यांच्यासमोर सादर करण्यात आले आहे. प्रशासनाने आवाहन केले आहे की, बालविवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून भविष्यातील बालविवाहाचे अनिष्ट प्रकार रोखता येतील.
भारतीय जनता पार्टीची उमेदवारांच्या प्रचारार्थ समता नगर व परिसरात भव्य रॅली
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे तसेच प्रभाग क्र. 9 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. दिपाली अरुण यादगिरे आणि श्री. सुजीत दिपकराव साळुंके यांच्या प्रचारार्थ समता नगर व परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात धाराशिव नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. या भव्य रॅलीमध्ये श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. नितीन भोसले, श्री. युवराज नळे, श्री. अमरसिंह देशमुख, श्री. संदीप साळुंके, श्री. सुजित साळुंके, श्री. आशिष पाटील, सौ. सुनिताताई साळुंके, सौ. वर्षाताई युवराज नळे, शिवानीताई परदेशी, श्री. वैभव मोरे, श्री. गिरीश पानसरे यांच्या प्रभागातील कार्यकर्ते, नागरिक व माताभगिनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद निवडणुकीतील तुतारी चिन्हावरील 30 उमेदवार व दोन पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभा उत्साहात आणि विजयी निर्धारात पार पडली. सभेला प्रचंड जनसमुदायाने उपस्थित राहून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. आपल्या प्रभावी भाषणात शशिकांत शिंदे म्हणाले,“महाविकास आघाडीसोबत लढण्याची आमची इच्छा होती; भाजपाला फायदा होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले. मात्र आम्हाला कमी लेखले गेल्याने तुतारी चिन्हावर स्वतंत्र लढत देणे भाग पडले आहे.” ते पुढे म्हणाले, आजचा हा जनसागर या गोष्टीची साक्ष देतोय की परवीन खलिफा कुरेशी आजच विजयी झालेल्या आहेत. लोकांसाठी रात्रंदिवस काम करणारा माणूस जाती-धर्म पाहत नाही. सर्व समाजबांधवांनी चांगल्या उमेदवारांना साथ द्यावी.”भारतीय जनता पार्टीवरही मतचोरीचा आरोप करत त्यांचाही खरपूस समाचार घेतला.आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचेही नाव न घेता यावेळी टीका केली. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मुस्लिम समाजाला दिलेल्या प्रतिनिधित्वाचे आणि पक्षाने दाखवलेल्या खऱ्या पुरोगामी विचारांचे विशेष कौतुक केले. तुतारी चिन्हावरील उमेदवार विजयी झाल्यास जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पाच वर्षांत पूर्ण करण्याची शपथ त्यांनी घेतली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, धाराशिव जिल्हा निरीक्षक भारत जाधव,प्रदेश चिटणीस मसूद शेख,माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन खलिफा कुरेशी, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अविनाश तांबारे तसेच पक्षाचे 32 उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,विलास रेणके,मनीषा पाटील,शहराध्यक्ष रणवीर इंगळे, उमेदवार अर्चना अंबुरे,तेजस भालेराव, शिवशाहीर अनिल माने,उमेदवार हिना शेख यांसह इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयाज शेख यांनी केले तर प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.तुषार वाघमारे यांनी केले. या जाहीर सभेतून धाराशिवमध्ये तुतारीच्या बाजूने स्पष्ट जनमत तयार होत आहे, हे ठळकपणे जाणवले.
‘एम-सॅंड’ प्रकल्प उभारणीसाठी अर्ज मागवले
धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून कृत्रिम वाळू (M-Sand) धोरण जाहीर करण्यात आले असून, पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे १०० टक्के एम-सॅंड (कृत्रिम वाळू) उत्पादक प्रकल्प उभारण्यासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून,सदर अर्ज मागविल्यापासून एक महिन्याच्या आत सर्व आवश्यक कागदपत्रांसह महाखनिज संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. यापूर्वी एम-सँड युनिटसाठी महाखनिज प्रणालीवर अर्ज केलेल्या अर्जदारांनीही या नवीन बाबीला प्रतिसाद देत नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील. आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहे.संबंधित जमिनीचा ७/१२ उतारा. वैयक्तिक अर्ज असल्यास आधार कार्ड व पॅन कार्ड.संस्था अर्ज असल्यास संस्थेची कागदपत्रे.अर्ज फी ₹ ५००/- (महाखनिज प्रणालीवर भरावयाची) आहे.एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘Consent to Establish’ प्रमाणपत्र. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र – युनिटमधून १०० टक्के एम-सँड उत्पादनाबाबत.एम-सँड उत्पादनासाठी दगड कोणत्या खाणपट्ट्यातून वा स्त्रोतांतून आणणार त्याचा तपशील.उद्योग आधार नोंदणी / जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमाणपत्र.खाणपट्टा व M-Sand यंत्रणेस लागणाऱ्या जमिनीवरील वापर अनुज्ञेयतेचे वैध प्रमाणपत्र.महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) २०१३ अनुषंगाने आवश्यक परवानग्या.त्याच कायद्यानुसार प्रदान केलेला व्यापारी परवाना आवश्यक आहे. जाहीर धोरणानुसार जिल्ह्यातील एम-सॅंड प्रकल्पांना उद्योग विभागामार्फत खालील विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. औद्योगिक प्रोत्साहन अनुदान.व्याज अनुदान.विद्युत शुल्कात सवलत.मुद्रांक शुल्क माफी.वीज दर अनुदान.शंभर टक्के कृत्रिम वाळूचे उत्पादन करणाऱ्या यंत्रणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्जदारांनी महाखनिज प्रणालीवर खालील संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. www.mahakhanij.maharashtra.gov.in अधिक माहितीसाठी जिल्हा खनिकर्म कार्यालयाशी संपर्क साधावा. पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य निर्मितीसाठी एम-सॅंड प्रकल्प स्थापनेची ही सुवर्णसंधी असून,शासनाच्या प्रोत्साहन योजनांमुळे उद्योग क्षेत्रासाठी मोठी चालना मिळणार आहे.
Satara News |सामान्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी मतदान महत्त्वाचे : रेणू येळगावकर
साताऱ्यात मतदारांसोबत प्रचार फेरीत नागरिकांशी संवाद साधला सातारा : सामान्य कुटुबातील अडचणी आणि जीवन जगण्यासाठी त्याचा सुरू असलेला वैनंविन संघर्ष मी स्वतः अनुभवला आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील बहुताश भाग हा अद्यापही वुर्लक्षित आहे सामान्य यांच्या भावना समजून घेऊन त्यांना योग्य [...]
संविधानामुळे भारत एकसंघ - ॲड. पल्लवी वाघमारे
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिवच्या वतीने नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग गोरे कॉम्पलेक्स, धाराशिव येथे संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड. पल्लवी वाघमारे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राम चंदनशिवे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. यावेळी प्रा. राम चंदनशिवे यांचे पुष्पगुच्छ देवून प्रा. अंबादास कलासरे यांनी स्वागत केले. ॲड. पल्लवी वाघमारे यांचे पुष्पगुच्छ देवून अमोल गडबडे यांनी स्वागत केले. आर.डी. अंगरखे यांनी प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमात डॉ. रत्नाकर मस्के यांची एमपीएससी मार्फत प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्रा. रवि सुरवसे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ॲड. पल्लवी वाघमारे म्हणाल्या की, भारतीय संविधान आहे म्हणून भारत आजपर्यंत एकसंघ राहिला आहे. संविधान हे नागरिकांना अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव करुन देते. संविधानाने स्त्री-पुरुष समानता दिली. समान वेतन दिले. अस्पृश्यता कायमची हाटवली आहे. तेंव्हा संविधानाचे रक्षण करणे ही भारतीयांची सर्वांची जबाबदारी आहे. सभागृहातील सदस्यांनीही संविधान रक्षणासाठी बोलले पाहिजे. अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. राम चंदनशिवे म्हणाले की, संविधानाने जाती व्यवस्था संपवली आहे. पण सध्याही जाती व्यवस्था डोके वर काढताना दिसते आहे. संविधानाने जातीच्या उतरंडी कायमच्या संपवल्या आहेत. घटना मसूदा समितीतील सदस्यांपैकी सर्वात जास्त जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली व संविधान लिहून पूर्ण केले. म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना, मागासवर्गीयांना आरक्षणाची संधी दिली आहे. त्यामुळेच त्यांना शिक्षणाचे दारे खुली झाली आहेत. बहुजनांनी सतत जागृत राहून समतेच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे व संविधानाचे रक्षण केले पाहिजे. कार्यक्रमाचे आभार प्रा. संजय मिसाळ यांनी मांडले. कार्यक्रमास पंडीत कांबळे, बलभीम कांबळे, अशोक बनसोडे, दिपक सरवदे, प्रभाकर बनसोडे, बाळासाहेब माने, नितीन माने, एच.एम. गायकवाड, प्रा. बलभीम ओव्हाळ, अनंत वाघमारे, सुदेश माळाळे, सी.के. मस्के, रत्नाकर मस्के, प्रदिप शिंदे, ॲड. अनुरथ नागटिळक, दिलीप शिंदे, विकास काकडे, इनामदार अहेमद मसूद, साहिल माने इत्यादीची उपस्थिती होती.
भारतीय संविधान मानवतावादी मूल्यांचा स्त्रोत - रवि केसकर
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातंर्गत राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्राचार्य डॉ. संदीप देशमुख व मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख व्याख्याते रवि केसकर पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाने व्यक्तीची प्रतिष्ठा, समानता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्याय या मूलभूत तत्वांना स्थान दिले. संविधानातील प्रस्तावनेपासूनच भारतीय लोकशाहीची ओळख समाजवादी, पंथ निरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक अशी देण्यात आली आहे. मूलभूत हक्कांनी सर्वांना समानतेचा अधिकार, शोषणाविरुद्ध संरक्षण, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार प्राप्त झाला आहे. शेवटी ते म्हणाले की, संविधानाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये नागरीकांना देशभक्ती, सामाजिक सलोखा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी बंध यांचे पालन करण्याचा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. दत्तात्रय साखरे, प्रा. मोहन राठोड, प्रा. मोहिते, डॉ. सी. आर. दापके तसेच स्टाफ सेक्रेटरी डॉ. बालाजी गुंड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाला.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रचार रॅली
तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे धाराशिव येथे आयोजित सभेला जात असताना तुळजापूरात अल्पविराम घेत स्थानिक उमेदवारांसाठी भव्य प्रचार रॅली काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अमर मगर तसेच प्रभाग क्र. 5 चे नगरसेवक पदाचे उमेदवार मीना अभिमान कांबळे आणि राकेश राजेश चोपदार यांच्या समर्थनार्थ ही मोर्चासदृश प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात कणे गल्ली, पावनारा गणपती मंदिर येथून झाली आणि श्री तुळजाभवानी मंदिर येथे सांगता झाली. ढोलताशांचा ताल, तुतारीचा गजर, हात व मशाल चिन्हाचे फडफडते झेंडे आणि उमेदवारांचा उत्साह रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. रॅलीदरम्यान प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले की,“हात, मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून तुळजापूरच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करा. हे उमेदवार कार्यक्षम, विकासाभिमुख आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांशी बांधील आहेत.” प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या प्रचार रॅलीत अनेक मान्यवरांचा सहभाग होता. त्यातजिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, निरीक्षक अमोल सुरवसे, बाळासाहेब चिखलकर, युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, स्वरूप कांबळे यांचा विशेष उल्लेखनीय सहभाग होता.
5 डिसेंबरला शिक्षकांची सामूहिक रजा व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्र मोडकळीस आणण्याच्या शासनाच्या धोरणाविरुद्ध धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने दिनांक 5 डिसेंबर शुक्रवार रोजी सामूहिक रजा घेऊन दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षक संघटना समन्वय समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत घेतला असल्याची माहिती शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक बाळकृष्ण तांबारे यांनी दिली. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी व नगरपालिका शाळेतील प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक धाराशिव तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. राज्य शासनाने 2013 पूर्वी कार्यरत असलेले शिक्षक हे प्रादेशिक निवड मंडळाची पात्रता परीक्षा देऊनच भरती केलेले शिक्षक असताना त्यांना टी ई टी बंधनकारक केली असून ही बाब शिक्षकांवर अन्याय करणारी आहे. तसेच 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय शासकीय व अनुदानित शाळा मोडीत काढण्याचा प्रयत्न असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मराठवाडा शिक्षक संघ,उर्दू शिक्षक संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, दिव्यांग शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा मुख्याध्यापक संघ, विनाअनुदानित शाळा कृती समिती, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, राष्ट्रीय ओबीसी शिक्षक महासंघ, जिल्हा जिल्हा मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, विकास मगर शिक्षक मित्र मंडळ या प्रमुख 17 संघटना सहभागी होणार आहेत. दिनांक 5 डिसेंबर दुपारी 12-30 वाजता रोजी लेडीज क्लब धाराशिव पासून हा मोर्चा निघणारा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्ष व निवडणुकीच्या वातावरणात मतदार जनजागृती म्हणुन संविधान उद्देशिका व विश्लेषण प्रत वाटप करण्यात आल्या. संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस वंदन करण्यात आले. मतदार जनजागरण समितीच्या आयोजित संविधान जनजागृती रॅलीतील मान्यवरांचा यावेळी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे, कोषाध्यक्ष अंकुश उबाळे, मार्गदर्शक बलभीम कांबळे,सदस्य अतुल लष्करे, विशाल घरबुडवे, मुकेश मोटे,तसेच मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतीफ, सहसचिव बाबासाहेब गुळीग, कोषाध्यक्ष शेख रौफ, उपाध्यक्ष सचिन चौधरी, कायदेसल्लागार ॲड.अजय वाघाळे, सदस्य अमर आगळे, विकास विधाते, तर किसन घरबुडवे, अशोक बनसोडे, डावखरे, सरफराज पटेल, पुरातत्वज्ञ रविंद्र शिंदे, ॲड.पायाळयांची विशेष उपस्थिती होती. सुत्रसंचलन बलभीम कांबळे यांनी केले. तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.
शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला यश- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याला यश आले आहे. ठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे प्रलंबित असलेल्या 2020 सालच्या पीक विम्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. उच्च न्यायालयाने विमा कंपनीच्या विरोधात निकाल देत न्यायालयात जमा असलेले 75 कोटी रूपये व्याजासह तातडीने शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच विमा कंपनीची राज्य सरकारने रोखलेली देय रक्कमही शेतकऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे आणखीन 220 कोटी रूपये मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. ठाकरे सरकार सत्तेत असताना सन 2020 सालच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीकाचे काढणी पश्चात प्रचंड नुकसान झाले होते. मात्र जुजबी तांत्रिक कारणे देत बजाज अलायन्स या खासगी विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. तत्कालीन ठाकरे सरकारकडे याबाबत आपण वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आपण न्यायालयात धाव घेतली. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार आजवर खरीप 2020 च्या नुकसानीपोटी विमा कंपनीच्या माध्यमातून 289 कोटी रूपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर जवळपास 220 कोटी रूपये शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असतानाही विमा कंपनीकडून जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात होती. ही उर्वरित रक्कम मिळावी यासाठी उच्च न्यायालयात लढा सुरू होता. आपले महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी आपण केली होती. त्यानुसार जेष्ठ विधीज्ञ ॲड. धोर्डे पाटील यांना नियुक्त करण्यात आले होते. जेष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. डी. साळुंके आणि ॲड. राजदीप राऊत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश आले आहे. विमा कंपनीने न्यायालयात जमा केलेली 75 कोटी रूपयांची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर विमा कंपनीला राज्य सरकारकडून देय असलेले 134 कोटी रूपये देखील शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आपल्या मागणीप्रमाणे या निकालामुळे जिल्ह्यातील 3 लाख 33 हजार 412 शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. डी. साळुंखे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. धोर्डे पाटील, ॲड. राजदीप राऊत, सर्वोच्च न्यायालयातील ॲड. चौधरी, या सर्वांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्याबद्दल आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या या प्रदीर्घ लढ्याला यश आल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचेही अभिनंदन करून आमदार पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अन्यायाविरूध्द ताकदीने लढलो आणि जिंकलो, याचे समाधान वर्णनापलीकडे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त 220 कोटी रूपये मिळणार, याचे मोठे समाधान असल्याची भावनाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Satara News : जावलीत पावसामुळे भात उत्पादनात 50% घट; शेतकरी वर्ग हवालदिल
केळघर-केर्हथे-मेढा भागातील पिकांवर अतिवृष्टीचा फटका केळघर : सध्या जावलीत भात काढणी अंतिम टप्यात असून मे महिन्यापासून संततधार पावसाने केळघर-केहये-मेढ़ा परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून जादा घटल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाचे आगर म्हणून ओळख असणाऱ्या जावली तालुक्यात संततधार पाऊस [...]
भाजपसाठी बिल्डर आणि कंत्राटदारच महत्त्वाचे, मुंबईच्या प्रदुषणावरून आदित्य ठाकरे यांचा घणाघात
मुंबईत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायुप्रदूषणाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई आणि दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर यादीत स्पर्धा करत असताना, राज्य आणि केंद्रातील भाजप सत्ताधारी नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की,मुंबईत भाजप सरकारसाठी बिल्डर आणि कंत्राटदारच महत्त्वाचे […]
‘लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेसला हरवण्यासाठी CIA-मोसादने कट रचला होता’, कुमार केतकर यांचा दावा
काँग्रेसचे माजी खासदार आणि नेते कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. कुमार केतकर म्हणाले आहेत की, “२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर संस्था सीआयए आणि मोसादने कट रचला होता.” ते म्हणतात की, २०१४ मध्ये लोक मनमोहन सिंगांवर नाराज होते, “पण इतके नाराज नव्हते की […]
रेल्वे स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचा धोका रोगासारखा फैलावतोय!- मुंबई हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी
मुंबई शहर आणि उपनगरांतीलरस्त्यांवर बेकायदेशीरपणे बस्तानमांडणाऱ्या फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्थानकांबाहेरीलपरिसरातील फेरीवाल्यांचाधोका एखाद्या रोगासारखा फैलावत आहे. त्यांना रोखण्याचीगरज आहे. देशात कायद्याचे राज्य आहे हा कठोर संदेश बेकायदेशीर फेरीवाले आणि सार्वजनिक जमीन बळकावणाऱ्यांना देण्याची वेळ आली आहे,अशी महत्वपूर्ण न्यायालयाने केली आणि कांदिवली रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना मोठा दणका […]
Satara News : साताऱ्यात खा. उदयनराजे यांनी वाहिली 26/11तील शहिदांना श्रद्धांजली
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या शहीदांना साताऱ्यात भावपूर्ण श्रद्धांजली सातारा : मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली, सदर बझार येथील शहीद अशोक कामटे उद्यानात खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उदयनराजेंनी अशोक कामटे यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. २६ नोव्हेंबर [...]
सावंतवाडीत तरुणीची गळफासाने आत्महत्या
सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील झिरंग रोड येथील कादंबरी प्रशांत वंजारी (३४) हिने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बुधवारी मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास तिने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यावेळी ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. दीड वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. तिच्यावर [...]
आप नेत्याच्या घरावर गोळीबार; 25 राउंड फायर केले, 5 कोटींच्या खंडणीची मागणी
आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाब सरकारच्या ड्रग्जमुक्त मोहिमेचे समन्वयक दलजीत राजू दरवेश यांच्या घरावर बुधवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी त्यांच्यावर सुमारे 25 राउंड फायर करत 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारे पत्र फेकून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दलजीत राजू दरवेश यांच्या पंजाबमधील फगवाडा येथील निवासस्थानी […]
इन्सुली -रमाईनगर समाजमंदिरात संविधान दिन साजरा
भिमगर्जना युवक मंडळाचे आयोजन बांदा | प्रतिनिधी भिमगर्जना युवक मंडळ इन्सुली, रमाईनगर यांच्या वतीने प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इन्सुली येथे संविधान दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी विचार मंचावर मंडळाचे अध्यक्ष धम्मचारी लोकदर्शी, सचिव अरविंद जाधव, सल्लागार राघोबा जाधव, दिपक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात राघोबा जाधव यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्ध्याकृती [...]
Karad News : कराड शंभूतीर्थवर 25 फुटांचा संभाजी महाराजांचा पुतळा लवकरच प्रतिष्ठापित होणार
कराड शंभूतीर्थ भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार कराड : येथील शंभूतीर्थवर प्रतिष्ठापित करण्यात येणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा २५ फुटी पुतळा मंगळवारी सायंकाळी येथे आणण्यात आला. हा भव्य पुतळा पाहण्यासाठी शिवशंभूप्रेमी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक [...]
उत्तर प्रदेशात आणखी एका बीएलओच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशात पाच बीएलओचा मृत्यू झाला आहे. तीन मृत्यू प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाले आहेत आणि दोन आत्महत्यांमुळे झाले आहेत. यातच आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या आत्महत्येला निवडणुकीशी संबंधित कामाच्या ताणाचे दुःखद परिणाम असल्याचे म्हटले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबाला निवडणूक आयोगाकडून १ कोटी रुपयांची […]
Sangli Crime : प्रेमसंबंधासाठी सतत त्रास देत युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
सांगली जिल्ह्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गंभीर प्रकरण उघडकीस सांगली : प्रेमसंबंध ठेवण्यासाठी सतत त्रास देऊन बदनामीची धमकी देत पूजा राहुल देसाई (वय २४) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चुलत दीर अभिषेक उत्तम देसाई (रा. मार्डी, ता. माण, जि. सातारा) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल [...]
न्हावेली येथील माऊली रवळनाथाचा ३० नोव्हेंबरला जत्रोत्सव
न्हावेली /वार्ताहर न्हावेली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार ३० नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी त्यानंतर ओटी भरणे,केळी ठेवणे,तसेच नवस बोलणे व फेडणे रात्री उशिरा वालावलकर दशावतार नाट्य मंडळ,ओसरगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान कमिटी व मानकरी गावकर मंडळी यांच्यावतीने करण्यात आले [...]
वाजत गाजत लग्नमंडपात चाललेल्या नवरदेवाच्या गाडीने वऱ्हाड्यांनाच चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात वरपित्याचा जागीच मृत्यू झाला असून नवरदेवाचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सार्वजनिक आरोग्य केंद्रात पाठवला. ओडिशातील बलांगीर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अमपाली गावातील तरुणाचे मंडल गावातील तरुणीसोबत लग्न ठरले होते. […]
पश्चिम बंगालमध्ये २८ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, निवडणूक आयोगाने काय दिलं कारण? वाचा सविस्तर
देशातील १२ राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे वाद निर्माण झाला आहे आणि या कामात काम करणाऱ्या BLOs च्या मृत्यूची प्रकरणे देखील समोर येत आहेत. काल सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआरमुळे आता २८ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत, असं वृत्त ‘टीव्ही ९ […]
आरोस गिरोबा देवस्थानचा 29 रोजी जत्रोत्सव
न्हावेली /वार्ताहर आरोस येथील श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि. 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी श्रींची पुजाअर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमांना सुरूवात होईल. रात्री देवाची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. [...]
आरोस माऊलीचा जत्रोत्सव 28 नोव्हेंबरला
न्हावेली /वार्ताहर आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी श्रींची पुजाअर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमांना सुरूवात होईल. रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर [...]
Sangli news : वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध आमरण उपोषण सुरू
हातनूर बंजारवाडी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार हातनूर : तासगाव तालुक्यातील बंजारवाडी ग्रामपंचायतीच्या गैर कारभाराबाबत ग्रामस्थ बजरंग बाळासो चवदार व योगेश पोपट दौंड यांनी प्रथम ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसीलदार, तासगाव पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, यांना लेखी निवेदन देत आजपासून ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास [...]
मिंधे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 कोटी रुपये घेतले, भाजप आमदाराचा दावा
एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी शिवसेना सोडताना 50 कोटी रुपये घेतले होता असा आरोप झाला होता. आताय आरोपाला पुष्टी मिळणारे एक विधान समोर आले आहे. संतोष बांगर यांनी मिंधे गटात जाण्यासाठी 50 कोटी रुपये घेतला असा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे. तसेच 50 खोके एकदम ओके ही घटना सत्य आहे असेही मुटकुळे […]
Ratnagiri News –बिबट्या आला आणि खुराड्यात अडकला; वनविभागाच्या बचाव पथकाने केली सुटका
चिपळूणमधील कात्रोळी येथील एका घरात कोंबड्यांच्या लोखंडी खुराड्यात बिबट्या अडकून पडला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बुधवारी (ता. २६) मध्यरात्री २ वाजता वनविभागाच्या पथकाने बचाव मोहीम राबवली. अथक प्रयत्नानंतर त्याची सुटका करण्यात यश आले. दहा ते अकरा महिन्याचा बिबट्या आईपासून विभक्त होऊन स्वतः शिकारीसाठी बाहेर पडलेला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. बुधवारी मध्यरात्री कात्रोळीपैकी लायकवाडी येथील […]
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रचाराचा झंझावात; महाविकास आघाडीला वाढता पाठिंबा
रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक १४ मध्ये महाविकास आघाडीने प्रचारात मुसंडी मारली आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रशिदा गोदड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नीलेश भोसले या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. रशिदा गोदड गेली अनेक वर्ष नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्या शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या आहेत. […]
Ratnagiri News –चिपळूणात शिवसेनेची निवडणूक प्रचारात मुसंडी
चिपळूण शहरातील मार्कंडी प्रभाग क्रं. 7 मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल प्रमोद लोटेकर आणि सपना संतोष पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर यांनाही प्रचारात पाठिंबा मिळत आहे. यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव उर्फ बाळा कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर, शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, शहर सचिव […]
Sangli : कापरी येथे ऊस तोडीदरम्यान सापडली बिबट्याचे दोन बछडे !
कापरी शेतात बिबट्याची पिल्ले आढळली शिराळा : कापरी (ता. शिराळा) येथील शिवाजी बाळा पाटील यांच्या शेतात ऊस तोडीच्या दरम्यान दोन बिबट्यांची पंधरा ते वीस दिवस वयाचे दोन बछडे आढळून आली. सदर बिबट्याचे बछडे वनविभाग व सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स च्या पथकामुळे आईच्या [...]
Sangli Crime : कुपवाडमध्ये धारदार शस्त्रासह दोघे सराईत गुन्हेगार गजाआड
एक अल्पवयीन ताब्यात सहापैकी तिघे पसार कुपवाड : कुपवाडमध्ये कोणतातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या एकूण सहापैकी दोन सराईत गुन्हेगारांना धारदार शरत्रासह पकडून गजाआड करण्यात कुपवाड पोलिसांना यश आले. एका अल्पवयीन तरुणासठी ताब्यात घेतले आहे. शहरातील चाणक्य चौक ते [...]
गौतम गंभीरला सुनील गावसकरांचा खंबीर पाठिंबा; टीकाकारांना फैलावर घेत विचारले खणखणीत प्रश्न
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका पराभव झाल्यापासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गौतम गंभीर सध्या टीका कारांच्या केंद्रस्थानी असून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. तसेच मुख्य प्रशिक्षकपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गौतम गंभीर यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत असताना सुनील गावस्कर यांनी टीकाकारांना फैलावर घेत त्यांची बोलती […]
आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालीय…धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची भावूक पोस्ट
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रं यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत घालवलेले चांगल्या क्षणांची आठवण काढत धर्मेंद्र एक चांगला नवरा, वडिल, मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होता. धर्मेंद्र यांच्या जाण्याने आयुष्यात मोठी पोकळी निर्माण […]
आचरा इंग्लिश मिडीयम स्कूलचे किक बॉक्सिंग स्पर्धेत यश
विभागस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत 2 विद्यार्थ्यांची निवड आचरा| प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 19 वर्षाखालील मुलगे गटातून अथर्व निलेश भोसले व 17 वर्षाखालील मुली गटाततून ॲलिसिया वॉलविन फर्नांडिस हिने प्रभावी खेळ सादर करत विभागस्तरीय [...]
Sangli Crime : चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणारा आरोपी कवठेमहांकाळ पोलिसांच्या जाळ्यात
निसर्ग हॉटेलजवळ झालेल्या दरोड्याचा पोलिसांनी केला वेगाने उलगडा कवठेमहांकाळ : चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. बोरगाव हद्दीत तासगाव रोडलगत निसर्ग हॉटेल जवळ २० नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या जबरी दरोड्याचा तपास वेगाने करून कवठेमहांकाळ पोलिसांनी आरोपीला अटक केली असून [...]
आज तांबुळी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे | प्रतिनिधी तांबुळी गावचे ग्रामदैवत देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी 27 डिसेंबर रोजी होणार आहे. नवसाला पावणारी माहेरवाशिणीची पाठीराखी अशी माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर माउलीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात आले. त्यानंतर देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ झाला. यानिमित्त [...]
Kolhapur : कामगार संहितांविरोधात कागलमध्ये सीटूचे तीव्र आंदोलन
कंत्राटीकरण वाढवणाऱ्या संहितांविरोधात कागलमध्ये संतप्त आंदोलन कागल : केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे २९ कायदे रद्द करून कामगार विरोधी व मालक दर्जने चार सहिता आणलेले आहेत. या चार संहितांना विरोध करण्यासाठी आज केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने देशभर निदर्शने करण्यात आली. त्याचाच एक भाग [...]
Kolhapur : मार्गशीर्ष महिन्यातील आज पहिला गुरुवार!
लक्ष्मी-विष्णू पूजेसाठी शुभ दिवस कोल्हापूर : आज, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. विवाहित महिला या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. कार्तिक [...]

25 C