गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कारभारावर ओढले ताशेरे, म्हणाले तिथला कारभार तर…
टीम इंडियाला विश्वविजेतेपद मिळवून देणारे दिग्गज प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी अवघ्या सहा महिन्यांत पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आता तिथल्या ‘टॉक्सिक’ वातावरणाचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तान क्रिकेटमधील बाह्य हस्तक्षेप इतका टोकाचा आहे की, तिथे काम करणे अशक्य असल्याचे कर्स्टन यांनी म्हटले आहे. संघाच्या अंतर्गत बाबींमध्ये आणि खेळाडूंशी होणाऱ्या संवादात बाहेरील व्यक्तींचा सततचा […]
Ratnagiri News – आता समारंभातील बुफे भोजनही चुलीवरचेच…….! कार्यालयातील समारंभ रद्द करण्याची वेळ
युद्धामुळे व्यावसायिक सिलेंडर मिळणे बंद झाले असल्यामुळे आता कार्यालय चालवणाऱ्या व्यावसायीकांसमोर पूर्वी नोंदणी केलेले समारंभ देखील रद्द करण्याची वेळ आली आहे. याबरोबरच अगदी छोट्या समारंभात बुफे भोजनही चुलीवर करुन देण्याची वेळ येवून ठेपली आहे. हॉटेल अथवा कार्यालय व्यावसायिकांकडे पूर्वी घेतलेले सिलेंडर होते, ते कसेबसे अगदी काटकसरीने वापरले तरीही संपले असल्यामुळे आता हॉटेल अथवा कार्यालय चालवायचे […]
रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार; पोलीस अधीक्षकांचे समुपदेशनाचे आदेश
रत्नागिरीतील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कॉमन ऑफ’ घेण्यासाठी ८ विद्यार्थ्यांनी इतर ३ विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देऊन त्यांचे रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या सूचना […]
कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना चालू हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असतानाही सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. “बागायतदारांना जोपर्यंत योग्य नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरकारने शेतकऱ्यांना नोटिसा बजावून भीती घालण्याचा प्रयत्न करू नये,” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे […]
‘लक्ष्मी ऑरगॅनिक’चा टँकर ‘सीईटीपी’बाहेर पकडला ! लोटेत आंदोलकांकडून पाठलाग, टँकर पुन्हा कंपनीत माघारी
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी नाट्यमय वळण मिळाले. कंपनीतून ” एक थेंबही बाहेर जात नाही ” असा दावा प्रशासन आणि संबंधितांकडून केला जात असतानाच कंपनीच्या गेटमधून बाहेर पडलेला भरलेला टँकर आंदोलकांनी पाठलाग करून सीईटीपीबाहेर पकडल्याने खळबळ उडाली. आंदोलकाचा आक्रमक पवित्रा पाहून सीईटीपी प्रभासनाने टँकर आतमध्ये न […]
Kokan News –नागावेत प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग; सुदैवाने सहा कामगार बचावले
चिपळूण तालुक्यातील नागावे नदीपात्रालगत असलेल्या भंगार प्लास्टिकचा साठा असलेल्या गोदामाला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत भस्मसात झाली. या इमारतीत काम करत असलेल्या सहा कामगारांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला. ही घटना सायंकाळी साधारण 4 वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पालांडे नामक एका व्यवसायिकाची नागावे येथे डबर-खडी क्रशर होती. ती बंद पडल्यानंतर […]
दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करा, अन्यथा महाराष्ट्र दिनी तीव्र आंदोलन करणार; प्रवासी संघटनेचा इशारा
कोरोना काळापासून बंद असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करण्यास मध्य रेल्वे प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत कोकणवासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गाडी तात्काळ सुरू न केल्यास ‘महाराष्ट्र दिना’ला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या सुमारे ३० वर्षांपासून कोकणवासीयांची जीवनवाहिनी ठरलेली ही पॅसेंजर गाडी कोरोना काळात दादरऐवजी दिवा स्थानकातून चालवण्यात […]
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रणांगणावर दररोज नवे विक्रम प्रस्थापित होत असतात, पण रवांडाच्या अवघ्या 15 वर्षीय फॅनी उटागुशिमानिंदे या खेळाडूने जे करून दाखवले आहे, त्याने संपूर्ण क्रिकेट विश्व अवाक झाले आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्याला अविस्मरणीय बनवण्याच्या जिद्दीने मैदानात उतरलेल्या फॅनीने बॅटने अशी काही आग ओकली की, क्रिकेटच्या इतिहासातील दोन मोठे जागतिक विक्रम तिच्या नावावर जमा झाले आहेत. […]
T 20 वादानंतर बांगलादेशचे आयसीसीवर फुत्कार; बोर्ड निवडणुकांमुळे वातावरण तापले
बांगलादेश क्रिकेटसाठी हे वर्ष वादाचे ठरत आहे. बीसीसीआय आणि आयसीसीसोबतच्या संघर्षामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) आधीच चर्चेत होते आणि आता बोर्ड निवडणुकांसंदर्भात एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. मुस्तफिजुर रहमानवरील आयपीएल बंदीच्या वादानंतर, बीसीबीने २०२६ च्या टी२० विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच, बांगलादेश सरकारने अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, बीसीबी […]
IPL 2026 च्या रणधुमाळीपूर्वीच क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने (BCCI) हिंदुस्थानच्या आयर्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले असून, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जून महिन्यात दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 26 जून रोजी बेलफास्टमध्ये पहिला सामना होईल, तर 28 जून रोजी दुसरा सामना पार पडेल. विशेष म्हणजे, बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट […]
Video –भोंदू बाबासोबत त्याच्या राजकारणातील भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे!
अनेक नेते आणि पुढारी यांचे भोंदू बाबासोबतचे फोटो उघड झाले आहेत. त्यामुळे कर्तृत्वशून्य नेत्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात, हेच यातून दिसून येते. त्यांना अशा भाकड आणि भोंदूगिरीचा आसरा घ्यावा लागतो. असे नेते भोंदू आणि भाकड आहेत, त्यांचे काहीच कर्तृत्व नाही, हेच दिसत आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. एक सगळ्यांच्या पापावर पांघरून घालणारे खाते […]
IPL 2026 –सलामीवीर म्हणून कोण आहे वरचढ? विराट कोहली की रोहित शर्मा; जाणून घ्या एका क्लिकवर…
IPL 2026 चा रणसंग्राम 28 मार्चपासून सुरू होत असून क्रिकेटप्रेमींमध्ये आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर असला, तरी त्याने सलामीवीर, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत हे यश मिळवले आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मादेखील या लीगमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, जेव्हा […]
10 कोटी 38 लाख अंमली पदार्थ जप्त
धाराशिव (प्रतिनिधी)- नळदुर्ग- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिस पथक नाकांबदी व कोबिंग ऑपरेशन करत असताना संशयास्पद कार क्र एमएच 12 जीव्ही 1517 दिसून आल्याने पोलिसांनी गाडी थांबविण्याच्या प्रयत्न केला असता गाडी एका इसमाने रोडच्या कडेला एक बँग फेकून दिल्याने पोलिस पथकाने त्या बॅगची पाहणी केली. त्या बॅगमध्ये दहा प्लॉस्टिकच्या पिशव्यामध्ये हिरवट काळपट अवस्थेतील हशीम ऑईल सदृश्य अंमली पदार्थ वजन 10.382 कि. ग्रॅ एकुण 10 कोटी 38 लाख 20 हजार रूपये किंमतीचा हशीम ऑईल अमंली पदार्थ माल मिळून आल्याने त्याचा पंचनामा करून जप्त करण्यात आले. सदर प्रकरणी अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या दोन अनोळखी इसमावर(क्र एमएच 12 जीव्ही 1517) यांचेविरुध्द गुंगीकारक औषधीद्रव आणि मनोव्यावारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8(सी),20(B)(ii)( C), 25, 29 अन्वये गुरंन 114/2026 असा गुन्हा नळदुर्ग पोलिस ठाणे येथे 20.03.2026 रोजी नोंदवला आहे. सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्ष शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी मेघना आय. एन., सपोनि सोळुंके, आनंद कांगुने, पोउपनि गिते, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने केली
खरात प्रकरणात 9 ते 10 मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा; आदित्य ठाकरे यांची मागणी
राज्यभरात भोंदू अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजत आहे. या भोंदू बाबाचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही उघड होत आहे. या प्रकरणी या भोंदूबाबासह त्याच्या भोंदू भक्तांवरही कारवाई होण्याची गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्रात याआधी असे प्रकार कधी घडले नव्हते. मंत्रीमंडळातील 9 ते 10 मंत्र्यांचा खरातशी संबंध असल्याचे उघड झाले आहे, त्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
देवसूत जागतिक जल दिनानिमित्त ‘जल अर्पण दिन’सोहळा
जलदिंडी, कलश यात्रा व जनजागृती फेरी ठरली लक्षवेधी ओटवणे प्रतिनिधी जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या देवसू प्राथमिक शाळा येथील नळ पाणी योजनेचा लोकार्पण उत्साहात संपन्न झाला. यावेळी जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल अर्पण दिन’ सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी लेझीम पथकासह निघालेली भव्य जलदिंडी, कलश यात्रा व जनजागृती फेरी लक्षवेधी ठरली.सावंतवाडी पंचायत समिती सभापती [...]
मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांची कर्तव्यदक्षता
नळपाणी योजनेचे अपव्यय होणारे पाणी बंद करण्यासाठी केली गेटव्हॉल्वची दुरुस्ती मालवण|प्रतिनिधी धामापूर पाणीपुरवठा योजनेच्या कुंभारमाठ येथील पाणी साठवणूक करणाऱ्या टाकीजवळील मुख्यवाहिनीवरील आणि मालवण शहरातील उपवाहिन्यांवरील तीस वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले पाण्याचे गेटव्हॉल्व खराब झाल्याने पाण्याचा होणारा अपव्यय निदर्शनास येताच मालवणचे उपगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा समितीचे सभापती दिपक पाटकर यांनी पुढाकार घेत खराब झालेल्या नळपाणी योजनेच्या गेटव्हॉल्वच्या दुरुस्तीचे [...]
आळणीची लेक डॉक्टर बनली ! दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील आळणी गावासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा ठरला आहे. गावातील विद्यमान सरपंच प्रमोद वीर यांची पुतणी तसेच कैलास वाशी येथील माजी सरपंच अरुण पापावीर यांची कन्या डॉ. दिव्या अरुण वीर यांनी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या प्राप्त करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ग्रामीण भागातून येत असतानाही दिव्या यांनी अत्यंत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. लहानपणापासूनच अभ्यासात प्राविण्य मिळवत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर आपली गुणवत्ता सिद्ध केली. मेडिकलसारख्या कठीण शिक्षणप्रवासात त्यांनी अनेक अडचणींवर मात करत अखेर यशाचे शिखर गाठले. दिव्या यांच्या या यशामागे त्यांचे आई-वडील, कुटुंबीय यांचे सततचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या यशामुळे आळणी गावात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणाच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, याचा आदर्श दिव्या वीर यांनी घालून दिला आहे. त्यांच्या यशामुळे अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा मिळणार आहे. गावकऱ्यांनी “दिव्या पुढे जाऊन समाजसेवेसाठी उत्कृष्ट कार्य करतील आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करतील,” असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकीर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड येथे- प्रा. डॉ. टकले
धाराशिव (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील होळकर वाड्यात 11 व 12 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे संस्थापक प्रा. डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली. शुक्रवार दि. 20 मार्चच्या सायंकाळी धनगर साहित्य संमेलन नियोजन बैठक धाराशिव येथे घेण्यात आली. त्याप्रसंगी डॉ. टकले बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर राहणार असून, संमेलनाचे उद्घाटन विधानसभेचे सभापती राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामभाऊ वडकुते, पत्रकार सुभाष बोंद्रे, बाळासाहेब पाटील, जेष्ट पत्रकार उत्तम कांबळे, मध्यप्रदेशचे मंत्री सैतानसिंग पाल उपस्थित राहणार आहेत. संमेलनात धनगर जमात व राजकीय स्थिती, चांदवडच्या इतिहासात होळकरांचे योगदान आदी चर्चा सत्र होणार आहे. त्याप्रमाणे कवी संमेलनासाठी देशभरातून कवी येणार आहेत. संमेलनाचा समारोप नाशिकचे पोलिस आयुक्त बाळासाहेब वाघमोडे, प्रा. यशपाल भिंगे, माजीमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीस माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, जिल्हा बँकेचे माजी संचालक भारत डोलारे, जेष्ठ पत्रकार उज्वलकुमार माने, कवित्री जयश्री तेरकर, ॲड. प्रिया माने, सुभाष मैदांड, डॉ. संजय सोनटक्के, संतोष वतने, हरिश्चंद्र मैदांड, प्रा. सोमनाथ लांडगे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, बिभीषण लोकरे, ॲड. नामदेव तेरकर, अर्चना मैदांड, राजू मैदांड, मल्हारी नवले,संकेत पाटील, बिभीषण हजारे आदी उपस्थित होते.
सावंतवाडीच्या प्रवेशद्वारावर लावलेला फलक उलट्या दिशेने
सावंतवाडी : प्रतिनिधी संस्थानकालीन सावंतवाडी हे पर्यटन शहर म्हणून जगप्रसिद्ध आहे.या शहराची ओळख देशी- विदेशी पर्यटकांना व्हावी म्हणून शहराच्या प्रवेशद्वारावरच कोलगाव येथील मुंबई – गोवा हायवेलगत लावण्यात आलेला फलक उलट्या बाजूने लावण्यात आला असून तो फलक पर्यटकांना दिसतच नाहीत. त्यामुळे हे केवळ नामधारी फलक आहेत का असा सवाल व्यक्त होत आहे. उलट्या बाजूने लावलेल्या फलकाबाबत [...]
Israel Iran War –इराणच्या नतान्झ अणुप्रकल्प केंद्रावर मोठा हल्ला; अमेरिका-इस्रायलचा बॉम्बवर्षाव
अमेरिका, इस्रायल- इराणमधील युद्ध अधिक तीव्र होत आहे. त्यातच आता इराणच्या नतान्झ अणुप्रकल्प केंद्रावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. अमेरिका-इस्रायलने बॉम्बवर्षाव करत या केंद्रावर हल्ला चढवला आहे. त्यामुळे परिसरात मोठे स्फोट झाले आहेत. या हल्ल्यामुळे कोणतेही किरणोत्सर्ग झाल्याचे वृत्त नाही, तसेच परिसरातील लोकसंख्या पूर्णपणे सुरक्षित आहे. आखाती देशातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. सर्वात […]
Photo –शिवसेनेतर्फे एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्स, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने राज्यातील तरुण-तरुणींसाठी निर्यात-आयात (Export-Import) लॉजिस्टिक्स क्षेत्रातील प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दादर येथील शिवसेना भवनात करण्यात आले. (सर्व फोटो – रुपेश जाधव) फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया (एफएफएफएआय) ची शैक्षणिक शाखा असलेल्या […]
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. युद्ध सुरू झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील हे दुसरे संभाषण आहे. विशेषतः हार्मुझच्या सामुद्रधुनीत वाढता तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीवर होणारा परिणाम यावर दोन्ही नेत्यांमध्ये खलबते झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी समुद्री व्यापार मार्ग सुरक्षित ठेवण्यावर आणि प्रादेशिक […]
आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे औषधी निर्मिती व आरोग्य क्षेत्रात वाढणारे उपयोग पाहून धाराशिव शहरातील नामांकित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात फार्मसी विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) टूल्स संदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षणासाठी संभव फाउंडेशन, बेंगळुरू येथील प्रशिक्षक रोहन घाडगे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा दैनंदिन जीवनातील उपयोग, आरोग्य,कृषी, पर्यावरण ,औषध निर्मिती शैक्षणिक यासारख्या क्षेत्रातील वापर तसेच करिअर आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स, एजेंटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स तसेच रिझ्युमे बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे शिक्षण हे केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.फार्मसी क्षेत्रातही त्याचा उपयोग व मोठा फायदा होऊ शकतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग पेमेंट ऑफिसर प्रा.अशोक जगताप, फार्मसी चे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.जी.बी. चिवटे, विभागप्रमुख डॉ. पी. टी. माने व त्यांच्या सहकारी टीमने विशेष परिश्रम घेतले. हे तीन दिवसीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा भविष्यात आम्हाला फायदा होईल. असा विश्वास व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिक मालोजी निंबाळकर यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील जुन्या पिढीतील वतनदार तसेच ज्येष्ठ नागरिक मालोजी निंबाळकर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निंबाळकर गल्ली येथील त्यांच्या स्वगृही आयोजित कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील ज्येष्ठांचा सन्मान ही आपली संस्कृती असून त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमात मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुधीर पवार, ॲड. परवेझ काझी, ईलियास मुजावर, नंदकुमार शेटे,डॉ.विजय शिंदे,अमोल नायकल,कुणाल निंबाळकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मालोजी निंबाळकर यांना निरोगी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
युवा भारत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव (प्रतिनिधी)- मेरा युवा भारत कार्यालय व छत्रपती क्रीडा मंडळ,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी आदित्य पाटील (कार्यकारी अधिकारी,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव) होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून अक्षय बिराजदार (तालुका क्रीडा अधिकारी) उपस्थित होते. मार्गदर्शन वक्ते म्हणून विश्वास खंदारे (तालुका क्रीडा अधिकारी,धाराशिव) तसेच मेरा युवा भारत कार्यालयाचे वैभव लांडगे, रविकांत सुरवसे, रोहिले गोविंद, ऋतुराज आगळे व छत्रपती क्रीडा मंडळाचे प्रा.प्रवीण बागल, रोहित चव्हाण, सुनील मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आदित्य पाटील यांनी युवकांना मोठ्या संख्येने क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करण्याचे व देशाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले. त्यांनी क्रीडा क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन युवकांनी आपले भविष्य घडवावे, असेही सांगितले. या स्पर्धांमध्ये उमरगा,लोहारा,भूम व परंडा तालुक्यांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. खो-खो, कबड्डी,100 मीटर धावणे,गोळा फेक, लांब उडी व स्लो सायकलिंग अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे 200 ते 250 खेळाडूंनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत कापसे व सिद्धेश्वर मते यांनी केले.हा कार्यक्रम उपसंचालक, मेरा युवा भारत,धाराशिव (महाराष्ट्र-गोवा) राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
“लाडकी बहीण” योजनेसाठी आधार संलग्नीकरण मोहीम : तालुकास्तरावर समाधान कक्ष स्थापन
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे तसेच श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची टक्केवारी 59.10 टक्के तर स्त्रियांची टक्केवारी 28.70 टक्के असल्याची बाब लक्षात घेता महिलांच्या आर्थिक व आरोग्य परिस्थितीत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दि.28 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना राज्यात सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले असले तरी अनेक लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नसल्यामुळे त्यांना अद्याप योजनेचा लाभ त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.ही अडचण दूर करण्यासाठी तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात “समाधान कक्ष” स्थापन करण्यात आले आहेत. सर्व महिला लाभार्थ्यांनी संबंधित तालुक्यातील प्रकल्प कार्यालयात जाऊन समाधान कक्षातील कर्मचाऱ्यांकडून आपली समस्या दूर करून घ्यावी, तसेच ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत मोबाईल व मूळ आधार कार्डची छायांकित प्रत घेऊन स्वतः उपस्थित राहून आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व बँकांनीही ही प्रक्रिया मोहिम स्वरूपात राबवून आधार संलग्नीकरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविकांनी संबंधित महिला लाभार्थ्यांना बँकेत जाणे व आधार संलग्नीकरण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे,असेही सांगण्यात आले आहे.तसेच, काही कारणास्तव ई-केवायसी प्रलंबित असल्यास किंवा चुकीची झाल्यास संबंधितांनी तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयात जाऊन मार्गदर्शन घेऊन दि.31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर योजनेचा लाभ विनाविलंब जमा होईल,असे आवाहन अध्यक्ष,जिल्हा परिषद व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव यांनी केले आहे.
उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनाचे आवाहन ; नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी
धाराशिव (प्रतिनिधी)- माहे एप्रिल व मे या कालावधीत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता असल्याने नागरिकांनी स्वतःची व कुटुंबीयांची विशेष काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी काही महत्त्वाच्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.चहा,कॉफी व मद्यपान टाळावे,सैल व सुती कपडे वापरावेत तसेच कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे.लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना उन्हात उभ्या वाहनात सोडू नये,अनवाणी बाहेर पडू नये आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे.डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरणे, पुरेसे पाणी पिणे तसेच ताक,लिंबूपाणी, नारळपाणी यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.घरातून बाहेर पडण्यापूर्वी भरपूर पाणी पिणे व ताजे अन्न सेवन करणेही महत्त्वाचे आहे.घर हवेशीर ठेवण्यासाठी खिडक्या-दारे उघडी ठेवावीत तसेच एकटे राहणाऱ्या वृद्ध व आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. त्याचप्रमाणे काही गोष्टी टाळणेही गरजेचे आहे.उन्हात कष्टाची कामे करणे टाळावे, रिकाम्या पोटी बाहेर पडू नये,दीर्घकाळ उन्हात राहणे टाळावे तसेच तिखट, मसालेदार व शिळे अन्न सेवन करू नये. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये. ताप आल्यास थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.एअर कंडिशनर किंवा कूलरमधून थेट उन्हात बाहेर पडणे टाळावे. कामगार व मालकांसाठीही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.कामाच्या ठिकाणी गार पाण्याची सोय करावी,कामगारांनी दर 20 मिनिटांनी पाणी प्यावे तसेच प्रत्येक तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती घ्यावी.उन्हापासून बचावासाठी शेडची व्यवस्था करावी व शक्यतो बाहेरील कष्टाची कामे सकाळी किंवा सायंकाळी करावीत.स्थानिक हवामानाच्या माहितीसाठी रेडिओ,टीव्ही व वृत्तपत्रांचा आधार घ्यावा तसेच आवश्यक असल्यास अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था करावी किंवा कामाचा वेग कमी करावा. उष्माघाताची लक्षणे म्हणून डोकेदुखी, ताप,उलट्या,जास्त घाम येणे,बेशुद्ध पडणे, अशक्तपणा,शरीरात पेटके येणे व नाडी असामान्य होणे यांचा समावेश आहे.अशी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीला सावलीत झोपवून कपडे सैल करावेत,द्रव पदार्थ व कैरीचे पन्हे द्यावे तसेच थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात नेऊन वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात पशुधनाचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.जनावरांना सकाळी किंवा संध्याकाळी चरायला सोडावे,गोठे हवेशीर ठेवावेत तसेच छपरावर पांढरा रंग किंवा चुना लावून उष्णता परावर्तित होईल याची काळजी घ्यावी.गोठ्याभोवती झाडे लावणे, पाण्याचे फवारे,स्प्रिंकलर्स व पंख्यांचा वापर करणे तसेच पुरेसे थंड पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कडक उन्हात जनावरांना बाहेर सोडणे टाळावे, गरम पाणी पाजू नये तसेच जनावरांना गर्दीत बांधू नये,असेही निर्देश देण्यात आले आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शरीराचे तापमान वाढणे,बेशुद्ध होणे, भ्रमित होणे किंवा घाम येणे बंद होणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ 108 किंवा 102 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव यांनी केले आहे.
आई तुळजाभवानी मातेस ‘वारा घालण्याच्या’ परंपरेला प्रारंभ
तुळजापूर (प्रतिनिधी)- चैत्र पाडव्यानंतर उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने आई तुळजाभवानीला उकाड्याचा त्रास होऊ नये, यासाठी तुळजापूरात दरवर्षीप्रमाणे पारंपरिक ‘वारा घालण्याची’ सेवा सुरू झाली आहे. शुक्रवार, दिनांक 20 मार्चपासून या प्राचीन परंपरेचा विधिवत प्रारंभ करण्यात आला. दुपारी 1 ते 4 या वेळेत देवीच्या मुख्य मूर्तीला मखमली पंख्याने वारा घालण्यात येतो. या सेवेदरम्यान देवीला लिंबू सरबत, पन्हे आणि पेढे यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. विशेष म्हणजे, ही सेवा भक्ती भावाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाते. या पारंपरिक सेवेचा पलंगे परिवाराला मान असून, त्या परिवारातील एक सदस्य दररोज ठरलेल्या वेळेत देवीला वारा घालण्याची सेवा करतो. वारा घालण्यासाठी चांदीचा दांडा, मखमली पंखा आणि पडद्याचा उपयोग केला जातो, ज्यामुळे सेवेला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारी ही परंपरा मृग नक्षत्रातील पावसापर्यंत अखंड सुरू राहते. दरम्यान, वारा घालण्याच्या कालावधीत गर्भगृहात कुणालाही प्रवेश दिला जात नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शेकडो वर्षांची परंपरा जपत, आई तुळजाभवानीची सेवा आजही तेवढ्याच भक्तिभावाने सुरू आहे.
बालाजी अमाईन्सच्यावतीने मोफत नेत्रपासणी शिबार
तुळजापूर (प्रतिनिधी)- बालाजी अमाईन्स लि. तामलवाडी या कंपनीच्या आर्थिक सहाय्याने, एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटल (संचलित शंकरशेठ साबळे नेत्र रूग्णालय) व रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू नागरीकांकरीता तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दि.27 मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतिबिंन्दू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे शिवरत्न नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बालाजी अमाईन्स लि. यांच्या अर्थिक सहाय्याने शंकरसेठ साबळे आय हॉस्पीटल संचलित एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटल सोलापूर व रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सदरच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 40 वर्षापुढील व्यक्तींची होणार मोफत तपासणी व मिळणार मोफत चष्मा, या शिबीरामध्ये 40 वर्षापुढील वयोगटातील व्यक्तीची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून जवळच्या नंबरचा चष्मा मोफत देण्यात येईल व मोतीबीन्दू असलेल्या व्यक्तींची मोफत शस्त्रकिया करण्यात येईल. शस्त्रक्रिया करण्यात येणार्या रूग्णांची राहण्याची, जेवणाची व ने - आण करण्याची मोफत व्यवस्था डोळ्यावर शस्त्रकिया करण्यात येणा-या रुग्णांची जेवणाची व राहण्याची मोफत सोय करण्यात येईल शस्त्रकिया करण्याकरिता रुग्णांना मोफत ने- आण करण्याची सुविधाही देण्यात येईल. रुग्णांनी शिबिरास येताना व शस्त्रक्रीयेस येताना “ आधारकार्ड झेरॉक्स “ व “ रेशन कार्ड झेरॉक्स “ सोबत आणणे आवश्यक आहे. असे संयोजकांच्या वतीने काळविण्यात आले आहे.
तुळजापूरात अवैध धंद्यांवर नगराध्यक्षांचा हल्लाबोल
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर केले आहे. विशेष म्हणजे, खुद्द नगराध्यक्षांनीच या प्रकरणी आवाज उठवल्याने शहरात मोठी चर्चा रंगली असून आता पोलिस प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आई तुळजाभवानीचे पवित्र स्थान असलेल्या तुळजापूर शहरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र काही समाजकंटकांकडून या पावन नगरीत जुगार अड्डे, मटका, चक्री, देहविक्री, इंधन व गुटखा विक्री तसेच पत्त्यांचे क्लब अवैध इथेनॉल विक्री असे विविध अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकारामुळे तुळजापूरच्या प्रतिमेला तडा जात असून विशेषतः महिला भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अवैध धंदे बंद करून केवळ एजंटवर नव्हे, तर मूळ मालकांवर आणि या धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या नेते मंडळींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. जर कारवाई झाली नाही, तर पुढील आठवड्यात पोलीस कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष व नगरसेवकांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे. या निवेदनावर नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यासह नगरसेवक औदुंबर कदम, नरेश अमृतराव, किशोर साठे, माऊली भोसले, सागर कदम, रत्नदीप भोसले, लखन पेंदे, दिनेश क्षीरसागर, पंडित जगदाळे, अजित परमेश्वर, आनंद सावंत, विजय कंदले, विशाल रोजकरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कळंब आगाराला नवे नेतृत्व; प्रश्नांचा डोंगर समोर, विजयकुमार घोलप यांच्यासमोर मोठे आव्हान
कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील राज्य परिवहन आगारात प्रशासनाने मोठा बदल करत विद्यमान आगारप्रमुख एस. डी. खताळ यांची अक्कलकोट येथे बदली केली असून त्यांच्या जागी विजयकुमार घोलप यांची नव्या आगारप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 20 मार्च रोजी घोलप यांनी खताळ यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारत कळंब आगाराची सूत्रे हाती घेतली. मात्र नव्या आगारप्रमुखांच्या स्वागतासोबतच कळंब आगारातील प्रश्नांचा डोंगर त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. आगारातील अनेक बस नादुरुस्त अवस्थेत असून प्रवाशांना याचा थेट फटका बसत आहे. त्यातच यांत्रिक विभागातील कामकाजाची पद्धत, बस स्थानकातील घाण पाणी, अस्वच्छता आणि दुर्लक्षित सुविधा यामुळे आगाराची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे नवीन नेतृत्व या साचलेल्या प्रश्नांवर कितपत आक्रमकपणे काम करते, याकडे कर्मचारी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे. कळंब बसस्थानकातील स्वच्छतेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना, प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबतही नाराजी वाढत आहे. नादुरुस्त बस, उशिरा धावणाऱ्या फेऱ्या आणि असुविधेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे विजयकुमार घोलप यांच्यासाठी हे पद केवळ पदभार नसून कार्यक्षमतेची खरी परीक्षा मानली जात आहे. नियुक्तीनंतर विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने विजयकुमार घोलप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, वाहतूक निरीक्षक निलेश जाधव, वाहतूक नियंत्रक सुशील हुंबे, प्रशांत नानजकर, नामदेव जगताप, चेतन गोसावी, शिवाजी बांगर, विलास जाधव, प्रभाकर झांबरे , महेश थोरबोले, सायास खराटे, अनिल बांगर, गणेश काळे, एजास शेख, गणेश गोरे, आर. के. जोशी, बळीराम कवडे, राहुल तोरगले आदी उपस्थित होते. तसेच कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने दोन्ही आगारप्रमुखांचा स्वागत व निरोप समारंभ घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष रवीकांत शिंदे, सचिव नितीन गायकवाड, कोषाध्यक्ष प्रशांत गायकवाड, प्रकाश पटेकर, लक्ष्मण जानराव, महेंद्र शेंडगे, विलास थोरात, डी. के. बीटे, अशोक रणदिवे, पांडुरंग गरड, सुनील जगताप तसेच महिला कर्मचारी पालके मॅडम, प्रियंका शिंदे, अनुराधा भोसले, पवार डी. एस., प्रशांत वेदपाठक आणि एम. बी. राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. “उत्पन्नवाढीसाठी सर्वांनी एकत्र या“ नवीन आगारप्रमुख विजयकुमार घोलप यांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट संदेश देताना सांगितले की, “सर्व वाहक-चालकांनी स्वतःची काळजी घेत कर्तव्य पार पाडावे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू. प्रवासी आणि प्रशासनाला सहकार्य करत कळंब आगाराचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.“
IPL 2026 – 55 चेंडूंमध्येच खुर्दा उडवला; सामना हातातून निसटलेलाच…पण 21 वर्षाच्या पोरानं चित्र बदललं
IPL 2026 सुरू होण्यापूर्वी एका 21 वर्षांच्या खेळाडूने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आपआपसात एक सराव सामना खेळला. या सराव सामन्यात गोल्डन नाईट्स आणि पर्पल नाईट्स हे दोन संघ एकमेकांना भिडले. या सामन्यात 21 वर्षीय अंगक्रिश रघुवंशीने बिंदास्त फलंदाजी करत गोलंदाजांना चोपून काढत शतक ठोकलं आणि संघालाही विजय मिळवून दिला. रघुवंशीच्या तोडफोड […]
इंडियन प्रीमियर लीगचा नवीन हंगाम सुरू होण्यास अवघए 7 दिवस बाकी आहेत. 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सलामीची लढत खेळली जाणार आहे. मात्र स्पर्धेला सुरुवात होण्याआधी कोलकाताच्या अडचणीत वाढ झाली आहे. संघाचा प्रमुख हिंदुस्थानी गोलंदाज आकाश दीप जायबंदी झाला असून डॉक्टरांनी त्याला 8 ते 12 आठवड्यांची विश्रांती सांगितली आहे. […]
विलवडे क्वारी व क्रशर बाबत संयुक्त बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार
पाहणी अहवालानंतरच महसूलच्या उपस्थितीत संयुक्त बैठक ; ग्रामस्थांची भूमिका ओटवणे : प्रतिनिधी विलवडे परिसरातील क्वारी व क्रशर विरोधात विलवडे ग्रामस्थांनी धरणे आंदोलन छेडल्यानंतर महसूल विभागाने त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली. त्यामुळे धाबे दणाणलेल्या क्वारी व क्रशर मालकांनी याबाबत तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्याचे विलवडे ग्रामपंचायतीला पत्र दिले. मात्र शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या [...]
Israel Iran War –जगातील ‘तेलकोंडी’सोडवण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय; इराणच्या तेलावरील बंदी उठवली
जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहे. जगातील कच्च्या तेलाच्या टंचाईची समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी अमेरिकेने इराणच्या तेलावरील बंदी उठवली आहे. मात्र, ती फक्त एका महिन्यासाठी आणि केवळ समुद्रातील इराणच्या तेलापुरतीच आहे. त्यामुळे, हिंदुस्थानी तेल शुद्धीकरण कंपन्या आता हे तेल खरेदी करण्याची तयारी करत आहेत. कच्च्या तेलाच्या […]
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगावर मोठे ऊर्जा संकट उभे ठाकले आहे. अमेरिका-इस्रायलने इराणच्या तेल साठ्यांवर हल्ले केले आहेत. तर इराणनेही पलटवार करत आखातातील तेल-गॅस प्लांटवर हल्ले चढवले आहे. इराणने गॅस हबवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे कतारचे मोठे नुकसान झाले असून हे नुकसान भरून काढण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतील असा अंदाज आहे. […]
आमदार दिपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा
वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब यांची मागणी वेंगुर्ले । प्रतिनिधी महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात या भोंदू बाबासोबत आमदार दीपक केसरकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून अशोक खरात यांने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. अशा भोंदूबाबा सोबत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर यांचे [...]
लक्ष्मी ऑरगॅनिक धोकादायक! लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात 11 ग्रामपंचायतींनी दंड थोपटले
लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात परिसरातील आंबडस, लोटे, धामणदेवी, घाणेखुंट, शेल्डी, सोनगाव, भेलसई, आवाशी, कालुस्ते, शेल्डी व गुणदे या अकरा ग्रामपंचायतींनी लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या विरोधात ठराव केले आहेत. या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनी मानवाला व जीवसृष्टीला घातक अशा पीफास रसायन उत्पादन करीत […]
वाराणसीतील कॉलेजमध्ये दिवसाढवळ्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या
उत्तर प्रदेशातील एका महाविद्यालयात दिवसाढवळ्या एका विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जोपर्यंत आपल्या मुलाला मारणाऱ्याचा पोलीस एन्काऊंटर करत नाही तोपर्यंत आपण मुलाचे अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा वडिलांनी घेतला आहे. […]
दोन लिव्ह-इन प्रकरणं, दोन लग्न, दोन मुलं अन्…साठी ओलांडलेल्या अभिनेत्रीला पुन्हा नवरी व्हायचंय
प्रेमाला वयाचे बंधन नसतं म्हणतात ते काही खोटं नाही. पन्नाशी, साठी ओलांडलेल्या अनेक लोकांनी लग्न केल्याचे आपण पाहिले असेल. अर्थात अशी लग्न दुर्मीळच म्हणावी लागतील. वयाच्या साठीनंतर पुन्हा एकदा संसाराची स्वप्ने पाहणे किंवा जोडीदाराची साथ शोधणे ही बाब आजही आपल्या समाजात चर्चेचा विषय ठरते. मात्र मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आणि वकील म्हणून कार्यरत असलेल्या अभिनेत्री […]
एक महिन्याच्या वीज बिलासाठी महावितरणकडून तगादा
कट्टा / वार्ताहर सध्या प्रत्येक क्षेत्रात मार्च महिन्याच्या अखेरीस आर्थिक वर्षाची गोळाबेरीज केली जात आहे. यात महावितरण कंपनीने देखील आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. थकलेली वीज बिले भरून घेणे हे ग्राह्य आहे. पण एक महिन्याचे वीज बिल शिल्लक राहिले असतानाही ग्राहकांना त्या बिलावरून वारंवार बिल भरा अन्यथा तुमची विद्युत वाहिनी कट करून वीज खंडित केली [...]
गॅस सिलिंडरच्या आश्वासनाचा फक्त धूर, हॉटेलमध्ये पेटल्या चुली
इराण-इस्त्रालय आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे हिंदुस्थानात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे. हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलिंडर देण्याच्या आश्वासनाचा फक्त धूर निघाला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी चूल पेटवून त्यांचं जगण्याशी नवं युध्द सुरू केले आहे. ज्या हॉटेल व्यावसायिकांना चूल मांडणे शक्य नव्हती त्यांनी हॉटेलची शटर […]
साटेली- भेडशी आठवडा बाजाराला काजूची मोठी आवक
प्रतिकिलो १७२ रुपयांचा दर (साटेली भेडशी प्रतिनिधी) शनिवारी येथील आठवडा बाजाराला काजूची आवक मोठ्या प्रमाणात होती. आज प्रतिकिलोला 172 रुपये असा दर होता. साटेली – भेडशी आठवडा बाजाराला मोठ्या प्रमाणावर काजूची आवक येते.या परिसरात व्यावसायिक पध्दतीने मोठ्या प्रमाणावर काजू बागायती तयार केल्या आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतींचा विचार करता काजूचे मोठे क्षेत्र दोडामार्ग तालुक्यात आहे. येथे [...]
पैशांची मागणी करून हुज्जत घालणाऱ्या महिलांची चौकशी करा
भाजप कार्यकर्ते विराग मडकईकर यांची मागणी ; सावंतवाडीतील प्रकार ; ओटी भरण्याच्या नावाखाली पैशांची मागणी सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी शहरात घरोघरी फिरून ओटी भरण्याच्या नावाखाली हजारो रुपयांची मागणी करणाऱ्या चार संशयास्पद महिला फिरत असून आपली ओटी भरा आणि त्यानंतर पाच हजार द्या अशी मागणी त्या नागरिकांकडून करीत आहेत. पैसे न दिल्यास नागरिकांशी हुज्जत घालून त्यांच्याकडून [...]
बंगळुरूमध्ये गॅस सिलिंडरची चोरी! LPG पुरवठ्याच्या टंचाईदरम्यान चोरांनी घराला केलं लक्ष्य
एकीकडे शहरात एलपीजी (LPG) सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता आणि चिंतेचे वातावरण असताना, दुसरीकडे चोरांनी आता थेट लोकांच्या घरातील गॅस सिलिंडरवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. बंगळुरूमध्ये एका घरातून घरगुती गॅस सिलिंडर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू मधील एका निवासी भागातून ही चोरी झाली आहे. […]
भोंदू बाबासोबत त्याच्या राजकारणात असलेल्या भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची मागणी
शिवसेना आणि स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे सुरू होणाऱ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी या कोर्सचे महत्त्व सांगितले. तसेच राज्यातील एपस्टीन म्हणून गाजत असणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करत राज्यातील राजकारण अजून किती खालच्या पातळीवर नेणार आहात? […]
कॅनडातील व्हँकुव्हरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी कालचा दिवस प्रचंड मनस्तापाचा ठरला. तांत्रिक आणि नियामक चुकांमुळे एअर इंडियाचे विमान तब्बल 8 तास हवेत राहिल्यानंतर पुन्हा दिल्ली विमानतळावर परतले. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान शुक्रवारी दिल्लीहून व्हँकुव्हरसाठी झेपावले होते. ज्या विमानाचा वापर या प्रवासासाठी करण्यात आला होता, त्या विमानाला कॅनडाच्या हवाई […]
महाराष्ट्रातील अनेक मंत्री हे भोंदू बाबांच्या सल्ल्याने राज्याचा कारभार करतायत. देवेंद्र फडणवीसांचे सरकार उलथवण्यासाठी या भोंदूबाबाच्या स्थानावर काही विधी झाल्या त्यानंतरच या धाडी सुरू झाल्या, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ”महाराष्ट्रातील अनेक मंत्री हे भोंदू बाबांच्या सल्ल्याने कारभार करतायत. अंधश्रद्धेचा वापर करून आपला विभाग चालवतायत. […]
‘वंदे मातरम्’चा विशेष टप्पा 23 पासून गोव्यात
पणजी : राष्ट्रगीत वंदे मातरम्च्या 150 व्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासंबंधी विशेष टप्पा दि. 23 ते 30 मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या विशेष टप्प्यात नागरिकांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या टप्प्यातील उत्सव ‘शहीदी दिवस’ निमित्त साजरा केला जाईल. स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांना, विशेषत: ‘वंदे मातरम्’च्या इतिहासाशी आणि [...]
मुख्यमंत्री ठणठणीत, आज परतणार गोव्यात
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे झाली अँजिओप्लास्टी : मान्यवरांकडून प्रकृतीची विचारपूस पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना काल, शुक्रवारी दुपारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवासासाठी तंदुरुस्त घोषित केले आहे. ते आज शनिवारी गोव्यात परतणार आहेत. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे चेअरमन आणि मुख्य हृदयरोगतज्ञ [...]
गोव्यात 1 एप्रिलपासून होणार घरांची गणना
खोटी माहिती देणाऱ्यास हजाराचा दंड पणजी : गोवा राज्यासाठी नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन संचालनालयाने जनगणना 2027 कार्यक्रम अधिसूचित केला आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी व घरांची गणना 16 एप्रिल ते 15 मे 2026 या कालावधीत होणार आहे. तत्पूर्वी 1 ते 15 एप्रिल या कालावधीत स्वेच्छेने गणना सादर करता येणार असून यासाठी विशेष खिडकी खुली केली [...]
मनपा आयुक्तांकडून आदेश जारी पणजी : पणजी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी सोमवार दि. 30 मार्च रोजी नवनियुक्त मंडळाची पहिली बैठक सकाळी 11 वाजता मनपा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. त्यात वरील दोन्ही पदासांठी निवडणूक होणार आहे. मनपा आयुक्त ग्लेन मदेरा यांनी या संदर्भाचा आदेश काढला आहे. दि. 27 मार्चपासून दोन्ही पदासांठी इच्छुक उमेदवारांनी आपले [...]
डिजिटल अरेस्ट : वृद्धाला 15 लाखांचा गंडा
सायबर गुन्हेगारांचे कारनामे सुरूच : सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल बेळगाव : टिळकवाडी येथील एका वृद्धाला डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून तब्बल 15 लाख 45 हजार रुपयांना ठकविण्यात आले आहे. यासंबंधी दोन दिवसांपूर्वी शहर सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. सीबीआय डायरेक्टर असल्याचे सांगून वृद्धाला ठकविण्यात आले आहे. आगरकर रोड, [...]
सततच्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे तिघा जणांवर तडीपारीची कारवाई
वारंवार गुन्हे केल्याने शिक्षा : पोलीस उपायुक्त बरमणींचा आदेश बेळगाव : मटका, जुगार, गांजा विक्रीत गुंतलेल्या तिघा जणांना सहा महिन्यांसाठी बेळगावातून तडीपार करण्यात आले आहे. विशेष दंडाधिकारीही असणारे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी तडीपारीचा आदेश बजावला आहे. सर्फराज शब्बीरअहमद शेख, राहणार शहापूर, विनायक प्रकाश कोल्हापुरी, राहणार अयोध्यानगर, टिळकवाडी, सागर पांडुरंग सालगुडे, [...]
अमेरिका, इस्रायल-इराणमधील वाढत्या युद्धाचा जागतिक ऊर्जा सुरक्षेवर थेट आणि विनाशकारी परिणाम होत आहे. हिंदुस्थानमध्येही तेल टंचाई जाणवत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी कायम असल्याने, हिंदुस्थान व्यापारी जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करण्यासाठी आणि भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठीही तयारी करत आहे. या योजनेचा एक भाग म्हणून भारतीय नौदल अनेक ठिकाणी आपली तैनाती वाढवत आहे. दहा दिवसांपूर्वी उत्तर अरबी समुद्रातून […]
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत लाखोंची उलाढाल
घर खरेदीपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत खरेदीचा उत्साह : सोने-चांदीच्या दागिन्यांमध्येही गुंतवणूक बेळगाव : बेळगावसह परिसरात गुरुवारी नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. यानिमित्त बाजारपेठेमध्ये वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून वाहने, सोने-चांदी ते घरांपर्यंत खरेदी करण्यात आली. त्यामुळे शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून आले. बऱ्याच दिवसांनी उत्तम व्यवसाय झाल्याने दुकानदारांच्या चेहऱ्यावर समाधान होते. गुढीपाडव्याच्या [...]
मराठी भाषिकांच्या व्यथांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
माजी मंत्री जयंत पाटील यांचे समिती नेत्यांना आश्वासन बेळगाव : बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’ म्हणणे हा देखील गुन्हा होऊ लागला आहे. लग्न अथवा समारंभांमध्ये जय महाराष्ट्र गीत लावल्यास कारवाई केली जात आहे. मग चळवळ चालवायची कशी? असा प्रश्न महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडला. यावेळी त्यांनी तुमच्या सर्व समस्यांचे पत्र द्या, [...]
…आता मिंधे गटाला बेईमानीचा खंजीर काय असतो ते भाजपकडून कळेल, संजय राऊत यांचे टीकास्त्र
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडीत भाजपने फोडोफोडीचे राजकारण करत शिंदे गटाला जोरदार धक्का दिला. भाजपकडे केवळ 27 सदस्य असतानाही भाजपने मित्र पक्षाचेच सदस्य फोडून बहुमताचा आकडा गाठला. भाजपच्या या ऑपरेशन लोटसनंतर मिंधे गटाचे शंबूराज देसाई भडकले व त्यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, […]
चौदा दिवसांच्या मुलीला विष पाजणाऱ्या बापाच्या अखेर आवळल्या मुसक्या
दूध पाजण्याच्या बाटलीने विष पाजल्याची कबुली बेळगाव : चौदा दिवसांच्या मुलीला विष पाजून तिचा खून केल्याच्या आरोपावरून काकती पोलिसांनी बापाला अटक केली आहे. पोटच्या गोळ्याच्या खुनासाठी बापाने बेळगाव येथून विषाची बाटली नेऊन आपल्या मुलीला पाजल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भीमराई बाणाप्पा चिप्पाडी (वय 28) राहणार भुतरामहट्टी असे त्याचे नाव [...]
सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच दीपक दळवींना खरी श्रद्धांजली
शोकसभेत कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना : मराठी भाषिकांचे हित एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेवटपर्यंत दळवींनी आयुष्य वेचले बेळगाव : सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि मराठी भाषिकांचे हित हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेवटपर्यंत दीपक दळवी यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांना अनेक संधी चालून आल्या. परंतु त्यांनी सीमाप्रश्नाशी कधीही प्रतारणा केली नाही. त्यामुळे सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच दीपक दळवी [...]
माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडून दळवी कुटुंबीयांचे सांत्वन
सीमाप्रश्न सोडवणुकीचे स्वप्न एकजुटीतून पूर्ण करूया बेळगाव : महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री व सांगलीचे विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी बेळगावमध्ये येऊन दळवी कुटुंबीयांचे सांत्वन केले. सीमावासीयांचा आधारवड हरपला, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली. दीपक दळवी यांनी पाहिलेले सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचे स्वप्न आपण सर्वांच्या एकजुटीतून पूर्ण करूया, असे आवाहन त्यांनी केले. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक [...]
इंडियन प्रीमियर लीगचा 19 वा हंगाम 28 मार्चपासून सुरू होत आहे. सलामीचा सामना गतविजेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असतानाच कोलकाताचा मेंटर आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधारल ड्वेन ब्रावो एका विचित्र वादामध्ये अडकला आहे. एका कार्यक्रमात बोलताना माईक सुरू राहिला आणि ब्रावोच्या […]
आरक्षण संरक्षण महासभेचे 24 मार्चला ‘चलो बेंगळूर’
रवी पुजारी यांची माहिती : विश्रामगृहात पत्रकार परिषद बेळगाव : राज्य सरकारने अंतर्गत आरक्षण रोस्टर वाटप रद्द करून जुन्या आरक्षण नियमांनुसार त्वरित भरती प्रक्रिया सुरू करावी, आदी मागण्यांसाठी कर्नाटक आरक्षण संरक्षण महासभेच्यावतीने 24 मार्च रोजी ‘चलो बेंगळूर’ची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार बेंगळूरच्या फ्रिडम पार्क येथे मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये बंजारा, भोवी, कोरम, [...]
पदपथावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पथकांची स्थापना करा
नगरसेवक रवी साळुंखे यांची मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी बेळगाव : शहर व उपनगरातील विविध ठिकाणच्या पदपथांवर अतिक्रमण केले आहे. मनमानी पद्धतीने वाहने पार्क करण्यासह काही जणांनी व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे सदर पदपथावरील अतिक्रमण हटवण्यासाठी दक्षिण आणि [...]
शेतजमिनीवरील घरांना मिळणार ‘ई-स्वत्तू’ नोंद!
राज्य सरकारकडून मंजुरी : एप्रिल 2025 पर्यंत बांधलेल्या घरांना मिळणार ओळख बेळगाव : राज्यातील ग्रामीण भागात कृषी जमिनीवर घरे बांधूनही अधिकृत कागदपत्रांच्या अभावामुळे वर्षानुवर्षे अडचणींना सामोरे जावे लागणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता अशा घरांना अधिकृत ई-स्वत्तू (खाता) नोंद देण्यास सरकारने मंजुरी दिली असून यामुळे ग्रामीण भागातील मालमत्ता व्यवस्थापनात मोठा बदल होणार [...]
आगीत नुकसान झालेल्या गॅरेज मालकाला सखीतर्फे आर्थिक मदत
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीतर्फे सामाजिक बांधिलकी जपत काकती येथील अष्टविनायक ऑटो गॅरेजचे मालक विक्रम आनंदाचे यांना आर्थिक मदत देण्यात आली. दि. 12 मार्च रोजी शॉर्टसर्किटमुळे गॅरेजमध्ये अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या सदस्यांनी पुढाकार घेत 10 [...]
इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये गेल्या 22 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारीला युद्धाचा भडका उडाला आणि अवघे जग याच्या कचाट्यात आले. दरम्यानच्या काळात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी हे हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर इराणही पेटून उठला आणि आखातातील अमेरिकन तळांवर इराणने क्षेपणास्र, ड्रोन हल्ले केले. आता हे युद्ध हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर पोहोचले इराणची क्षेपणास्त्रे थेट […]
तालुक्यात गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने साजरा
घरोघरी गुढी उभारून नूतन वर्षांरभ : विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये अंबिल गाडे मिरवणूक, भजन, कीर्तन वार्ताहर/किणये तालुक्यात गुऊवारी गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त गावागावातील विविध मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा, काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन निरूपण आदी कार्यक्रम झाले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काही गावांमध्ये पालखी मिरवणुका काढण्यात आल्या तर काही गावांमध्ये [...]
राजहंसगडावर गुडीपाडव्यानिमित्त यात्रोत्सवाला गर्दी
वार्ताहर/धामणे राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील सिद्धेश्वर देवाच्या यात्रोत्सवाला प्रतिवर्षाप्रमाणे गुडीपाडव्यानिमित्त सुरुवात झाली. येथील देवस्थान पंचकमिटीच्यावतीने गुरुवार दि. 19 रोजी सकाळी 6 वाजता अभिषेक घालण्यात येवून सिद्धेश्वर देवाचे विधीवत पूजन करण्यात आले. पूजनप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण थोरवत व सर्व सदस्य आणि राजहंसगड गावातील व पंचक्रोषीतील भाविक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पालखीचे [...]
खानापुरात गुढीपाडवा उत्साहात साजरा
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिरातून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तर पहाटेपासूनच घरोघरी आंब्याची तोरणे बांधून सडा, रांगोळी घालून परंपरेनुसार गुढी उभाऊन त्याचे पूजन करण्यात आले. तसेच मंदिरातून सायंकाळी दर्शनासाठी लोकांची गर्दी दिसून येत होती. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्रामदेवता रवळनाथ मंदिर, सातेरी माउली मंदिर, [...]
हस्तकला कारागिरांच्या मदतीसाठी ऊपरेषा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची बैठकीत माहिती : सदुपयोग करून घेण्याचे आवाहन बेळगाव : जिल्ह्यातील हस्तकला कारागिर, शेतकरी, विणकर, कुंभार यांच्यासह अन्य लघुद्योजकांच्या व्यापार-वहिवाट वाढीसाठी आर्थिक मदत व कर्जसुविधा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा पंचायत व इंडिया एक्सिम बँक या सरकारी संस्थेच्या सहकार्याने व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. हस्तकला कारागिरांनी याचा सदुपयोग करून [...]
आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. भुवनेश्वरहून नबरंगपूरकडे जाणाऱ्या एका खासगी बसचे टायर फुटले आणि बसने पेट घेतला. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये चित्रकोंडा मतदारसंघातील काँग्रेस आमदार मंगू खिल्ला यांच्यासह 37 प्रवासी प्रवास करत होते. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना जागे करत खाली उतरवले. यामुळे मोठी जीवितहानी टळली […]
अनगोळ येथे धर्मवीर बलिदान मासाची सांगता
बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक श्री शिवशंभू तीर्थ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाची सांगता गांभीर्याने करण्यात आली. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या असा एक महिना छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास श्री शिवशंभू भक्तांच्यावतीने मोठ्या गांभीर्याने पाळण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या 337 व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी सायंकाळी अनगोळ येथील श्री शिवशंभू तीर्थ येथून [...]
तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम लवकरच
राजा छत्रपती चौक ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे सर्वेक्षण होणार खानापूर : खानापूर शहरांतर्गत रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी सर्वेक्षण विभागाला मागील आठवड्यात तिसऱ्या टप्प्यातील राजा छत्रपती स्मारक ते रुमेवाडी क्रॉस रस्त्याचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी भूमीलेखा विभागाकडून लवकरच करण्यात [...]
17 व्या मि.इंडिया स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची निवड
बेळगावच्या तीन शरीरसौष्ठवपटूंचा समावेश, मध्यप्रदेश येथे होणार स्पर्धा बेळगाव : नंजनगुडी येथील जारकीहोळी स्पोर्ट्स फाऊंडेशन व कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना आयोजित वज्रदेही राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेवेळी दि. 29 व 30 रोजी इंदौर मध्यप्रदेश येथे होणाऱ्या 17 व्या वरिष्ठ पुरूष व महिला मि. इंडिया स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचा संघ निवडला गेला. नंजनगुडी येथे झालेल्या स्पर्धेवेळी केलेल्या कामगिरीची दखल [...]
कडोलीत सोमवारी भव्य कुस्ती मैदान
कार्तिक काटे-संतोष दोडवाड यांच्या प्रमुख लढत वार्ताहर/कडोली कडोली कुस्ती संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान सोमवार दि. 23 रोजी आयोजित बसवाण्णा मंदिर कडोली येथे करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोडवाड यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन स्वप्नील शिंदे-कोल्हापूर [...]
केंद्रातील भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये अघोषित राष्ट्रपती राजवट लागू केली असून विधानसभा निवडणुकांनंतर एनआरसी आणि जनगणनेच्या नावाखाली लोकांचे नागरिकत्व हिरावून घेण्याचा मोठा कट रचला जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. #WATCH | Kolkata, […]
बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ (Dhurandhar 2: The Revenge) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाचे दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआर आणि महेश बाबू यांनी भरभरून कौतुक केले. मात्र, धुरंदरचे कौतुक करणाऱ्या या स्टार्सवर प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी निशाणा साधला आहे. ‘धुरंधर २’ प्रदर्शित […]
कॅनडामध्ये अश्लील चाळे केल्याप्रकरणी तरुणाला अटक
कॅनडामध्ये राहणाऱया एका हिंदुस्थानी तरुणाला महिला डॉक्टरांसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वैभव असे या तरुणाचे नाव आहे. त्याला पॅनडाचे नागरिकत्व मिळाले आहे. वैभव आधी क्लिनिकची रेकी करायचा. त्यानंतर महिला डॉक्टर असल्यास तेथे तो रुग्ण बनून जायचा. आजारी असल्याचे नाटक करायचा आणि तपासणीच्या बहाण्याने महिला डॉक्टरशी अश्लील चाळे करायचा. वैभवचा हा प्रकार वाढल्याने […]
इराण आणि इस्रायल-अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे जग दहशतीत आहे. जगभरामध्ये ऊर्जा संकट निर्माण झाल्याने हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र हा संघर्ष आता आणखी उग्र होण्याचे संकेत मिळत आहेत. इराणने होर्मझची सामुद्रधुनी बंद केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. ही सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेने तीन युद्धनौका आणि 2500 मरीन कमांडो […]
14 वर्षांच्या तुफानाला ‘संरक्षण कवच’, हिंदुस्थानचे ‘वैभव’ जपण्यासाठी राजस्थानची खास रणनीती
हिंदुस्थानच्या क्रिकेटचे उज्ज्वल भवितव्य मानला जाणारा वैभव सूर्यवंशी हा केवळ एक खेळाडू नाही, तर एक अमूल्य ठेवा आहे. हिंदुस्थानी क्रिकेटची संपत्ती आहे. पण याच ठेव्याला माध्यमांच्या झगमगाटात हरवू न देण्यासाठी राजस्थान रॉयल्सने आता कडक पावले उचलली आहेत. अल्पवयात मिळालेली अफाट प्रसिद्धी त्याच्या बालमनावर परिणाम करू नये, त्याची वाट चुकू नये यासाठी संघाने खास रणनीती आखत […]
‘डिजिटल अरेस्ट’करणाऱ्यांची आता खैर नाही; केंद्र सरकारचा व्हॉट्सॲपला मोठा आदेश
देशभरात गेल्या काही काळापासून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सर्वसामान्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे. गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘इंडियन साइबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटर’नेदिलेल्या अहवालाचा आधार घेत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला थेट आदेश दिले आहेत. त्यानुसार स्कॅमसाठी वापरले जाणारे डिव्हाइस आयडी कायमस्वरूपी ब्लॉक करण्यात येणार आहेत. सायबर भामटे वारंवार नवीन सिम कार्ड वापरून किंवा फेक […]
बालेंद्र शाह घेणार 27 मार्चला पंतप्रधानपदाची शपथ
नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह हे येत्या 27 मार्चला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथेआधी म्हणजेच 26 मार्चला खासदारांना शपथ दिली जाईल. 5 मार्चला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला 182 जागा जिंकण्यात यश आले आहे. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने निवडणुकीच्या आधीच बालेंद्र शाह यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. नेपाळी काँग्रेसचे सभापती […]
धक्कादायक! इंदूरमध्ये डिजिटल लॉकमुळे आठ जणांचा मृत्यू
घराला डिजिटल लॉक लावल्यामुळे घराला लागलेल्या आगीत आठ लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इंदूरमधील स्वर्ण बाग कॉलनीत उघडकीस आली आहे. रबर व्यावसायिक मनोज पुगलिया यांच्या तीन मजली घरात आग लागली, परंतु ऐनवेळी डिजिटल लॉक उघडले नाहीत. त्यामुळे घरातील लोक बाहेर पडू न शकल्याने आठ जणांचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. या घटनेने डिजिटल, […]
लंडनमध्ये पान खाऊन थुंकल्याने पावणेदोन लाखांचा दंड
लंडनमधील ब्रेंट परिसरातील सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकल्याने हिंदुस्थानी वंशाच्या दोन व्यक्तींना 1391 पाऊंड म्हणजेच जवळपास पावणेदोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अक्षीतकुमार भद्रे पटेल आणि हितेश पटेल अशी या दोन व्यक्तींची नावे आहेत. या व्यक्तींना थुंकल्याप्रकरणी 100 पाऊंड दंड भरण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी दंड न भरल्याने हे प्रकरण कोर्टात पोहोचले. कोर्टाने थेट […]
विमा जाहिरातीत ‘सबस्क्रिप्शन ट्रॅप’ वाढला, पॉलिसी घेणे सोपे, पण रद्द करणे अवघड
सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. डिजिटल युगात विमा खरेदी करणे खूपच सोपे झाले आहे, परंतु विमा घेताना ग्राहकांना डार्क कॅडर्न्सनाही सामोरे जावे लागत आहे. लोकल सर्कलच्या एका सर्वेक्षणानुसार, 10 पैकी 8 जण ‘सबस्क्रिप्शन ट्रॅप’सारख्या समस्यांना तोंड देत आहेत. याचाच अर्थ पॉलिसी घेणे सोपे आहे, परंतु ती रद्द करणे अवघड झाले आहे. मागील […]
व्हॉट्सअॅपवर करा कोणत्याही भाषेत चॅटिंग, लवकरच ऑटोमेटिक ट्रान्सलेशन फीचर येणार…टेस्टिंग सुरू
व्हॉट्सअॅप फीचरचा अधिकाधिक लोकांनी वापर करावा, यासाठी पंपनीतर्फे नवनवीन फीचर आणले जात असतात. आताही एक नवीन आणि उपयुक्त फीचर येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करणे आता आणखी सोपे होणार आहे. व्हॉट्सअॅप कंपनी आता ऑटोमेटिक ट्रान्सलेशन फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे युजर्सला चॅटिंग मेसेज सहज दुसऱया भाषांमध्ये भाषांतरित करता येईल. व्हॉटस्अॅपच्या फीचरचे ट्रकिंग करणाऱया ‘डब्ल्यूएबीटाइन्पह्’ने […]
बनावट नोटा बनवण्यासाठी चीनहून मागवले कागद, अहमदाबादमध्ये सात जणांना अटक
500 रुपयांच्या नकली नोटा बनवण्यासाठी थेट चीनहून हाय क्वॉलिटीचे कागद मागवणाऱया आणि बनावट नोटा बनवणाऱया टोळीला गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. 2.38 कोटी रुपयांच्या फेक नोटांसह एकूण सात जणांना अहमदाबाद क्राइम ब्रँचने अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. 500 रुपयांच्या नोटा बनवण्यासाठी आरोपी चॅटजीपीटी एआय आणि चीनहून मागवलेल्या सिक्योरिटी थ्रेड पेपरचा वापर करत […]
युद्धाचा फटका, गॅस तुटवड्याचा झटका; बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद
इराण-इस्त्रायल युद्धाची झळ सर्वसामान्यांना बसत असतानाच त्याचे पडसाद अष्टविनायक तीर्थक्षेत्रातही उमटू लागले आहेत. युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने अष्टविनायक गणपतीपैकी प्रसिद्ध पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्रही बंद झाले आहे. भाविकांना प्रिय असणारा प्रसादाचा लाडूही मिळणे बंद झाले आहे. श्री बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनाला दररोज देशभरातून हजारो भाविक येतात. त्यातील दिवसा व रात्री मिळून सरासरी चारशेहून […]
‘धुरंधर-2’ची 102 कोटींची बंपर ओपनिंग
रणवीर सिंहचा बहुचर्चित ‘धुरंधर-2’ ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी तब्बल 102.55 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. ‘धुरंधरः द रिव्हेंज’ या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. 102 कोटींच्या कमाईसोबत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 150 कोटींवर पोहोचले आहे.

27 C