Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 31 मार्च 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळणार आहे आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे आर्थिक – बच्चे कंपनीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस मंगलमय वातावरणात जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म […]
राजस्थानचा चेन्नईवर दणकेबाज विजय
वैभव सूर्यवंशीचे 15 चेंडूत अर्धशतक : सामनावीर नांद्रे बर्गरचे 2 बळी :पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या पदरी निराशा वृत्तसंस्था/ गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या आयपीएलमधील सामन्यात राजस्थान रॉयल्सने पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई किंग्सचा धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. वैभव सूर्यवंशीचे तडाखेबंद अर्धशतक आणि सलामीवीर यशस्वी जैस्वालसह कर्णधार रियान परागच्या कडक बॅटिंगच्या जोरावर राजस्थानने 128 धावांचे टार्गेट [...]
गुजरात-पंजाबदरम्यान आज ‘हाय-व्होल्टेज’ लढत
वृत्तसंस्था/ चंदिगड भारताचे आघाडीचे फलंदाज शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर, ज्यांच्याकडे टी-20 प्रकारात अनेकदा दुर्लक्ष केले गेले आहे, ते अनुक्रमे गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सचे आज होणाऱ्या लढतीत नेतृत्व करतील. मंगळवारी चंदिगडमध्ये होणाऱ्या आयपीएल, 2026 च्या अत्यंत महत्त्वाच्या सलामीच्या सामन्यात आपली छाप पाडण्यासाठी हे दोन्ही खेळाडू उत्सुक असतील. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार गिल याची [...]
‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी गजाआड
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई : पाच दिवसांच्या कोठडीत रवानगी वृत्तसंस्था /..नवी दिल्ली राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संशयित हँडलर शब्बीर अहमद लोन याला अटक केली आहे. सोमवारा, 30 मार्च रोजी त्याला पटियाला हाऊस न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता [...]
6 वर्षातील निफ्टीची सर्वात मोठी मासिक घसरण
सेन्सेक्स 1635 अंकांनी तर निफ्टी 488 अंकांनी कोसळला मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे उद्भवलेली स्थिती जशीच्या तशी असल्याकारणाने शेअर बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दिसून आला. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत बंद झाले. निफ्टी 1635 अंकांनी कोसळला होता. बँक व आयटी निर्देशांक कमकुवत होत बंद झाले. गेल्या सहा वर्षांमध्ये पाहता निफ्टी [...]
वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स (फ्लोरिडा) रविवारी येथे झालेल्या मियामी खुल्या 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या द्वितीय मानांकित जेनिक सिनरने पुरुष एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना झेक प्रजासत्ताकच्या जेरी लिहेकाचा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. या स्पर्धेत महिलांच्या विभागात बेलारुसच्या आर्यना साबालेंकाने शनिवारी महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले होते. या स्पर्धेच्या इतिहासात 2026 च्या टेनिस हंगामात साबालेंका आणि सिनर यांनी [...]
नऊ नक्षलवाद्यांचे आंध्रात आत्मसमर्पण
36 वर्षांपासून लपून बसलेल्या सूत्रधार सुरेशचा समावेश वृत्तसंस्था/ विजयवाडा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे नऊ नक्षलवाद्यांनी एकाचवेळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याने सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. आत्मसमर्पण केलेल्या या नक्षलवाद्यांमध्ये अनेक दशकांपासून पोलिसांना चकमा देत असलेला सर्वोच्च माओवादी कमांडर चेलुरी नारायण राव उर्फ सुरेश हा सर्वात प्रमुख आहे. या शरणागतीनंतर राज्यातील नक्षलवादी कारवाया जवळजवळ संपुष्टात आल्या [...]
2023 मध्ये, भारताने त्याच्या एकूण खतांपैकी सुमारे 20-25 टक्के खते आखाती देशांमधून आयात केली. यापैकी बहुतेक आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते, जो भारताला आखाती देशांशी जोडणारा एक अरुंद पण महत्त्वाचा शिपिंग मार्ग आहे. जर या प्रदेशातील तणाव वाढला आणि हा मार्ग विस्कळीत झाला, तर त्याचा पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे खते आणि नैसर्गिक वायूच्या [...]
आज मध्यरात्रीपासून देशात टोलदरात वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशभरातील टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार असल्यामुळे महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील प्रवास अधिक महाग होणार आहे. 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून महामार्गावर प्रवास करण्यासाठी वाहन मालकांना 5 ते 25 रुपयांपर्यंत वाढीव टोल शुल्क आकारले जाईल. याचा थेट परिणाम वाहनधारकांच्या खिशावर होईल. वाढीव टोल शुल्क वसुली लागू करण्यासाठी टोल व्यवस्थापनाने सर्व प्रणाली अद्ययावत [...]
काँग्रेसच्या काळात फोफावला नक्षलवाद
पंतप्रधान मोदी यांच्या निर्धारामुळे त्यापासून मुक्ती ► वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेस पक्षाच्या दुर्बल प्रशासनामुळे नक्षलवादी हिंसाचाराला प्रोत्साहन मिळाले आहे, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. संसदेत नक्षलवाद आणि त्याचा नाश या विषयावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी देश आता नक्षली हिंसेपासून मुक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धारामुळे केंद्र सरकारने [...]
इस्रायलमधील रसायन प्रकल्प उद्ध्वस्त
इराणकडून भीषण हल्ला : गॅसगळतीचा धोका इराणच्या एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा तुकडा इस्रायलच्या दक्षिण हिस्स्यातील एका रसायन प्रकल्पाला धडकून तेथे भीषण आग लागली आहे. हा प्रकल्प बियरशेबा शहराच्या दक्षिणेस स्थित नेओत होवाव औद्योगिक भागात आहे. हा एडीएएमए कंपनीचा मखतेशिम प्रकल्प असून तो कीटकनाशक आणि पीक सुरक्षेशी निगडित रसायनांची निर्मिती करतो. चिनी कंपनी सिंजेंटा समुहाच्या या प्रकल्पावर [...]
नितीशकुमारांनी सोडली विधानपरिषद
आता राज्यसभा सदस्य म्हणूनच कार्यरत राहणार वृत्तसंस्था / नवी दिल्ली, पाटणा दहावेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे. बिहारमधून त्यांची काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर निवड झाली आहे. यापुढे ते राज्यसभा सदस्य म्हणूनच कार्यरत राहणार आहेत. संयुक्त जनता दलाचे विधान परिषद सदस्य संजय गांधी यांनी [...]
स्पेसेक्सचा येणार आयपीओ, जगातला मोठा आयपीओ?
7000 ते 7500 कोटी डॉलरचा असेल आयपीओ : तयारीला वेग वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमेरिकेतील दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स कंपनीचा आयपीओ लवकरच लॉन्च होणार असल्याची माहिती मिळाली आहे. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पेसेक्सचा हा नवा आयपीओ नवा विक्रम स्थापित करू शकतो. या आयपीओचे मूल्य हे 7000 ते 7500 कोटी डॉलरचे असणार असल्याचे सांगितले जात आहे. [...]
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय पिकलबॉल संघटनेने सोमवारी यूएस ओपन पिकलबॉल स्पर्धेसाठी भारतीय पिकलबॉल संघाची घोषणा केली. ही स्पर्धा 9 ते 18 एप्रिल दरम्यान फ्लोरिड येथील नेपल्स शहरात आयोजित केली जाणार आहे. या संघात विद्यमान राष्ट्रीय विजेते आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे उदयोन्मुख खेळाडू यांचा एक दमदार मेळ साधण्यात आला आहे. या संघात मिहिका [...]
एका डॉलरमागील भाव पहिल्यांदाच 95 पर्यंत घसरला वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इराण युद्धामुळे रुपयाच्या मूल्याने सोमवार, 30 मार्च रोजी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत प्रथमच 95 चा टप्पा ओलांडला. दैनंदिन व्यवहारादरम्यान तो 95.58 च्या नीचांकी पातळीपर्यंत घसरला होता. तथापि, नंतर त्यात थोडी सुधारणा होऊन व्यवहाराच्या अखेरीस तो 94.78 वर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत 94.85 च्या मागील बंद भावाच्या [...]
मुष्टियुद्धमध्ये प्रीती, दीपकची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ उलानबातार (मंगोलिया) सोमवारपासून येथे सुरु झालेल्या आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे मुष्टियोद्ध्यो प्रीती पवार आणि दीपक यांनी आपल्या वजन गटातून विजयी सलामी दिली. महिलांच्या 54 किलो वजन गटातील खेळविण्यात आलेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत प्रीतीने कझाकस्तानच्या बॅझेरोव्हाचा 5-0 अशा गुणफरकाने एकतर्फी पराभव करत पुढील फेरी गाठली. प्रीती पवारने यापूर्वी आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविल होते. तर [...]
वृत्तसंस्था/ टॉलेडो (स्पेन) येथे सुरु असलेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय लेव्हल-1 स्पर्धेत भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने दर्जेदार कामगिरी करत 1 सुवर्ण आणि 2 रौप्यसह एकूण 3 पदके मिळविली. मिश्र दुहेरी एसएल 3-एसयू 5 विभागातील झालेल्या अंतिम सामन्यात प्रमोद भगत आणि मनीषा रामदास या भारतीय जोडीने आपल्याच देशाच्या नितेश कुमार व तीलसीमती मुरुगेसन यांचा 21-15, [...]
7 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1.75 लाख कोटींची घसरण
पश्चिम आशियातला तणाव कारणीभूत : सेन्सेक्स 949 अंकांनी होता घसरणीत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आघाडीवरच्या दहापैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.75 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. मागच्या आठवड्यात ही घसरण झाली असून यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक घसरणीत राहिले होते. मागच्या आठवड्यात शेअर बाजाराच्या कामगिरीचा विचार करता बीएसई सेन्सेक्स 949 अंकांनी [...]
‘जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स’कडून निकी प्रसाद करारबद्ध
वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय उद्योगसमूह ‘जेएसडब्ल्यू’ची प्रतिष्ठित क्रीडा शाखा असलेल्या ‘जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स’ने भारताच्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक, 2025 विजेत्या संघाची कर्णधार निकी प्रसादला करारबद्ध केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अवघ्या 20 वर्षांच्या वयातच निकीने असाधारण नेतृत्व कौशल्य आणि सातत्यपूर्ण कामगिरीने स्वत:ला सिद्ध केले असून या खेळातील एक भविष्यातील तारका म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली [...]
नितीन नबीन यांचा आमदारकीचा राजीनामा
वृत्तसंस्था/ पाटणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावागी यांच्याकडे सादर केला आहे. संजय सरावागी यांनी सोमवारी हा राजीनामा बिहार विधानसभेचे अध्यक्ष प्रेम कुमार यांच्याकडे सादर केला. नितीन नबीन हे आसाममध्ये प्रचारात व्यस्त असल्याने ते व्यक्तीश: उपस्थित राहू शकले नाहीत. राज्यसभेवर निवडून आल्यानंतर नितीन [...]
सुनेत्रा पवारांच्या ‘पॉवर प्ले’ने दिग्गजांमध्ये अस्वस्थता
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी अवघ्या काही तासात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांच्या चितेची धग कायम असताना एकीकडे राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊ नये, यासाठी दोन मतप्रवाह असल्याचे राज्याने पाहिले. सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्यात आले, मात्र गेल्या काही दिवसातील [...]
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणी विमानाचे नुकसान
विमान 1 एप्रिल रोजी नवी दिल्लीत येणार होते वृत्तसंस्था/ तेहरान, नवी दिल्ली इराणमधील मशहद विमानतळावर तैनात असलेले ‘महान एअर’चे एक विमान अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात नुकसानग्रस्त झाले आहे. वृत्तानुसार, हे विमान मानवतावादी मदत मोहिमेसाठी मदत साहित्य घेऊन जाण्यासाठी नवी दिल्लीला पोहोचणार होते. ते 1 एप्रिल रोजी पहाटे 4:00 वाजता दिल्लीत पोहोचणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्याच्यावर अमेरिकेने [...]
आजचे भविष्य मंगळवार दि. 31 मार्च 2026
मेष: कार्यालयीन वरिष्ठ व सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य वाढेल वृषभ: शांत व तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. मिथुन: आनंद वा समाधान एकीकडे व दुसरीकडे व्यवसाय ठेवा कर्क: आत्मस्तुतीवर वेळ दवडू नका, वरिष्ठांचे सहकार्य मिळेल सिंह: चिंता व काळजी मिटवण्याची गरज आहे. कन्या: पूर्वी केलेली मेहनत आज फळाला येईल, भागीदाराला सांभाळा तुळ: आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्वाचे [...]
रुपयाची लोळण,95चा नीचांक! निर्मलाताई म्हणतात, रुपया ठीक चल रही है!!
इराण युद्ध सुरू झाल्यापासून सातत्याने घसरणाऱ्या रुपयाने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अक्षरशः लोळण घेतली. रुपयाच्या किमतीने प्रतिडॉलर 95 रुपयांचा नीचांक गाठला. असे असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र लोकसभेत अजब दावा केला. ‘रुपया ठीक चल रही है,’ असे त्यांनी बेधडकपणे सांगितले. गेल्या महिनाभरात रुपयाचे मूल्य 4.1 टक्क्यांनी घसरले आहे. सोमवारी या घसरणीने नवा […]
नऊ लाखांच्या उत्पन्नासाठी 2 कोटी नऊ लाखांचे घर; म्हाडाकडून अल्प उत्पन्न गटाची क्रूर थट्टा…
मोठा गाजावाजा करत म्हाडाने मुंबईतील 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर केली; परंतु या लॉटरीमधील घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. नऊ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटासाठी वरळीतील प्रेरणा सोसायटीत असलेल्या म्हाडाच्या फ्लॅटची किंमत चक्क 2 कोटी नऊ लाख रुपये आहे. एवढेच नव्हे तर, अल्प उत्पन्न गटासाठी लॉटरीमध्ये उपलब्ध असलेल्या सव्वाशेहून अधिक […]
भोंदूबाबाला कोठडीत हवंय भस्म, कुंकू, जपमाळ! न्यायालयाने मागणी अर्ज फेटाळला
आपण देवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेला गुंगीकारक औषध देत तिच्यावर अत्याचार करणाऱया भोंदू ऋषिकेश वैद्य याला न्यायालयाने दणका दिला आहे. पोलीस कोठडीत असताना पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मिळावे म्हणून वैद्य याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत […]
अमित शहा यांचे जुनेच भाषण नव्याने, ‘60 वर्षे काँग्रेसने काय केले?’
लोकसभेत नक्षलवादावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आज जुनेच भाषण नव्याने केले. ‘‘60 वर्षांत काँग्रेसने काय केले,’’ असा नेहमीचा ‘भाजपछाप’ सवाल करत, शहा यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ‘‘नक्षलवादाचे मूळ गरिबीत नसून डाव्या कट्टरतावादी विचारधारेत आहे. इंदिरा गांधी यांनी 1970मध्ये राष्ट्रपती […]
महाराष्ट्रात अमली पदार्थांविरोधात लढा –मुख्यमंत्री
राज्यात अमली पदार्थांविरुद्ध मोठी लढाई सुरू केली जाणार आहे. यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक नवीन रणनीती तयार करीत आहेत. शाळा-महाविद्यालयांना अमली पदार्थमुक्त करण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री कॅम्पस’ मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद मुंबईत पार पडली. या परिषदेनंतर […]
इराणचे प्रत्युत्तर, शत्रूला पूर्ण नेस्तनाबूत करू!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विध्वंसाच्या धमकीला इराणने तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आमच्यावरील आक्रमणाविरोधात आम्ही लढतच राहणार असून शत्रूला पूर्ण नेस्तनाबूत करणार,’ असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ठणकावले. होर्मुझ सामुद्रधुनी ताब्यात घेण्याच्या ट्रम्प यांच्या वक्तव्याचीही अराघची यांनी खिल्ली उडवली. ‘अमेरिका, इस्रायल किंवा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने होर्मुझ सामुद्रधुनीच्या बाबतीत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नये. […]
आखाती युद्धात भडकाभडकी सुरूच! ट्रम्प यांची धमकी! इराण पूर्ण उद्ध्वस्त करू
आखातात सुरू असलेल्या युद्धात भडकाभडकी सुरूच आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. ‘होर्मुझ खुले करून युद्धबंदी करण्यास इराण तयार न झाल्यास संपूर्ण इराण उद्ध्वस्त करून टाकू. इराणचे वीज निर्मिती प्रकल्प, तेल विहिरी आणि खर्ग बेटे नष्ट करून टाकू,’ असा इशारा ट्रम्प यांनी सोमवारी दिला. सोशल मीडियावर ट्रम्प यांनी सांगितले की, […]
सामना अग्रलेख –अमेरिकेत जनतेचे बंड!
नेतान्याहूंविरोधात इस्रायलची जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यांनाही नेतान्याहूंची मनमानी नको आहे, तर अमेरिकेत एक प्रकारे जनतेने बंडच पुकारले आहे. रस्त्यावर उतरलेले आंदोलक घोषणा देत आहेत. ‘इराणमध्ये रेजिम चेंज नाही, तर अमेरिकेत रेजिम चेंज हवा!’ प्रे. ट्रम्प यांची दुसरी टर्म मध्यावरच अडचणीत आली आहे. अमेरिकेच्या रस्त्यावर लोकशाहीचा आवाज अधिक जोरात उसळला आहे. तेथील ‘नो किंग्ज’ आंदोलन […]
मुंबई पालिकेला मिळणार पहिली महिला आयुक्त, अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुंबई महानगरपालिकेला पहिल्या महिला आयुक्त मिळणार आहेत. मुंबईच्या नव्या आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्याचा शासन उद्या निघणार असल्याचे सांगण्यात आले. अश्विनी भिडे सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांचा कार्यकाळ उद्या संपत आहे. उद्याच अश्विनी भिडे पदभार स्वीकारतील, असे कळते.
नवीन कर प्रणाली…पॅन कार्ड ते एटीएमपर्यंत नियम बदलणार; उद्यापासून खिशाला कात्री, डोक्याला ताप!
1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असून नवीन कर प्रणाली लागू करण्यात येणार आहेत. याशिवाय बँकिंग, गॅस, प्रवास आणि दैनंदिन खर्चाशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम दैनंदिन खर्चावर होणार असल्याने ग्राहकांचा खिसा खाली होणार आहे. या नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक उत्पन्न 12 लाखांपर्यंत असलेल्या नागरिकांना मोठी सवलत दिली असून त्यांना […]
लेख –संपूर्ण नक्षलमुक्ती खरंच होईल का?
>> सुभाषचंद्र सुराणा सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडल्याने या चळवळीस धक्के बसू लागले आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा पोलिसांनी समन्वय ठेवून, नियोजन करून, डावपेच आखून धाडसी कारवाया करीत टप्पाटप्प्यांनी माओवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे या दहशतीस आळा बसला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आता अतिसंवेदनशील गटातून मुक्त झाला आहे. अर्थात संपूर्ण नक्षलमुक्ती खरंच होईल का, या प्रश्नाचे […]
अंगठय़ा, रत्ने आणि चिंचोके एसआयटीच्या ताब्यात
वासनाकांडाचा अड्डा असलेल्या भोंदू अशोक खरातच्या नाशिक येथील ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयाची सोमवारी पुन्हा तपासणी करण्यात आली. तपासी पथकाने तेथील रत्ने, चिंचोके व अंगठय़ा हस्तगत केल्या. तसेच काही आक्षेपार्ह वस्तूही पथकाच्या हाती लागल्या आहेत. खरात याने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात कार्यालय सुरू केले होते. तेथेच तो महिलांवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे समोर आले आहे.
नीलम गोऱ्हे भोंदूबाबाला मंत्रीपदासाठी फाइव्ह स्टार हॉटेलात भेटल्या, तृप्ती देसाईंचा आरोप
शिंदे गटाच्या आमदार आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या सात-आठ वर्षांपासून अशोक खरात याच्या संपर्कात होत्या. आमदारकी आणि मंत्रिपदासाठी भविष्य जाणून घ्यायला त्या खरातला भेटायच्या. नाशिकमधील एक्स्प्रेस इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली होती, खरातने महिलांवर जिथे अत्याचार केले त्या कार्यालयातही गोऱहे भेटायला जायच्या, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला.
>> संध्या काटदरे अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. याकरिता आपल्याला शेतीवर अवलंबून राहावे लागते. तृणधान्ये-गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, वरई इ. द्विदलधान्ये हरभरा, मूग, तूर, उडीद, मटकी इ. आणि तेलबिया म्हणजे तीळ, शेंगदाणे, सूर्यफूल, करडई, जवस, मोहरी इ. गळिताची धान्येही शेतीतूनच मिळू शकतात. कापसापासून उत्तम सूत मिळते, ज्याचे वस्त्राsद्योगात महत्त्वाचे आणि […]
नगर अर्बन बँक बुडविणाऱयांना मोठा धक्का, माजी अध्यक्षांसह संचालकांची 100 कोटींची मालमत्ता जप्त
नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बुडविण्यास कारणीभूत असणाऱया भ्रष्ट पदाधिकारी आणि अधिकाऱयांविरुद्ध राज्य शासनाने कठोर पावले उचलून बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि काही बडय़ा कर्जदारांच्या मालकीची सुमारे 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना 18 मार्च रोजी जारी केली आहे, अशी माहिती बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी व राजेंद्र चोपडा यांनी दिली. […]
चिपी-मुंबई विमान सेवेसाठी राज्याच्या तिजोरीवर 8 कोटींचा भार
सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी विमानतळ ते मुंबईपर्यंतच्या हवाई प्रवासासाठी विमान परिचालक कंपनीला जवळपास 7 कोटी 64 लाख रुपयांचा व्यवहार्यता तफावत निधी अर्थात व्हीजीएफ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निधी देण्याचा निर्णय 17 मार्च 2026 च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. चिपी ते मुंबई आणि मुंबई ते चिपी अशी हवाई सेवा देणाऱया मेसर्स जस्ट उडो […]
एल्फिन्स्टन पुलाचा उरलेला भाग आठवडाभरात पाडणार, मध्य रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक
ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल येत्या आठवडाभरात इतिहासजमा होणार आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी एकूण 26 तासांचे सहा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. सलग पाच रात्री 11.45 ते पहाटे 3.45 वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यापैकी एक तास रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार असून उर्वरित तीन तासांत कमी अंतराच्या लोकल फेऱया रद्द […]
IPL 2026 –आयपीएलमध्ये आज गिल-अय्यरची कसोटी, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स एकमेकाशी भिडणार
मुल्लानपूरच्या मैदानावर आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर आमनेसामने येणार आहेत. सध्या हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या या दोघांसाठी हा केवळ सामना नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी आहे. हिंदुस्थानच्या टी20 संघातून बाहेर पडलेले हे दोन्ही स्टार्स आता गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जची धुरा सांभाळत जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. हिंदुस्थानचा […]
IPL 2026 –शार्दुल, आता इथेच राहा! हार्दिकचा प्रेमळ सल्ला
आतापर्यंत खूप संघ बदललेस, मात्र आता करीअरच्या शेवटपर्यंत मुंबई इंडियनमध्येच राहा, असा प्रेमळ सल्ला मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंडय़ाने 13 वर्षांचा सलामीहारचा काळा डाग पुसून काढणाऱ्या शार्दुल ठाकूरला दिला आणि त्यानेही, मी दीर्घकाळ मुंबई इंडियन्ससाठी खेळू शकलो तर हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल, अशी उत्स्फूर्त दाद दिली. काल मुंबईच्या 13 वर्षांच्या पराभवाचा दुष्काळ संपवणाऱ्या शार्दुलच्या […]
शिवसेनाप्रमुखांची जन्मशताब्दी भव्यदिव्य साजरी करणार! शिवसेना भवनात बैठक
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्यभरात भव्यदिव्य स्वरूपात साजरे करण्यात येणार आहे. सोमवारी शिवसेना भवन येथे राज्यभरातील जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील नगरसेवक यांच्या बैठकीत याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, अंगिकृत संघटना या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक जिल्हय़ांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत यावेळी उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या. […]
हाँगकाँगविरुद्ध विलियम्सकडे हिंदुस्थानच्या नजरा
हिंदुस्थानी फुटबॉल संघ मंगळवारी एएफसी आशिया चषक पात्रता स्पर्धेतील आपल्या शेवटच्या आणि औपचारिक सामन्यात हाँगकाँगचा सामना करणार आहे. ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या रायन विलियम्सवर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील. दोन्ही संघ आधीच पुढील फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले असल्याने जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत फिफा रँकिंग गुण मिळवणे आणि भविष्यासाठी संघबांधणी मजबूत करणे हा दोन्हींचा उद्देश असेल. संघाचे […]
हिंदुस्थानचा परफेक्ट बॉक्सिंग पंच, प्रीती-दीपकची धडाकेबाज सुरुवात
आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानने धडाकेबाज सुरुवात करत रिंगमध्ये आपली ताकद दाखवली. प्रीती पवार आणि दीपक या दोघांनीही प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत विजयी सलामी ठोकली. महिलांच्या 54 किलो गटात वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्सची सुवर्णपदक विजेती प्रीती पवारने कझाकस्तानच्या एलिना बाजारोवाला 5-0 अशा एकतर्फी फरकाने पराभूत करत रिंगवर वर्चस्व गाजवले. अनुभवी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तिने दाखवलेले नियंत्रण आणि आक्रमक […]
विमानाने येऊन मारायचा बँक खात्यावर डल्ला
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाच्या एटीएमची अदला बदली करून पैसे काढणाऱयास दिंडोशी पोलिसांनी अटक केली. संभवकुमार आचार्य असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 25 एटीएम कार्ड, दोन मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्याच्या अटकेने चार गुह्यांची उकल करण्यात दिंडोशी पोलिसांना यश आले आहे. संभवकुमार हा बँक खात्यावर डल्ला मारण्यासाठी ओडिशा येथून मुंबईत येत असायचा. तक्रारदार हे […]
IPL 2026 मध्ये रविवारी (29 मार्च 2026) झालेल्या अटीतटीच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) पराभव करत स्पर्धेची विजयी सरुवात केली. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 220 धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र मुंबईने शेवटच्या षटकात हे लक्ष्य गाठून सामना खिशात घातला. या पराभवानंतर केकेआरचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन याने गोलंदाजी का […]
गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत चेन्नईला 19.4 षटकांत अवघ्या 127 धावांवर रोखले. नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चेन्नईची फलंदाजी अक्षरशः खिळखिळी केली. अखेरच्या षटकांत ओव्हरटनने 43 धावांची झुंजार खेळी करत चेन्नईला थोडाफार सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवले. […]
Pune News –किरकोळ भांडणातून दुसऱ्या मजल्यावरून ढकलले, मजुराचा मृत्यू
किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून एका मजुराने दुसऱ्या मजुराला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यात जखमी मजुराचा जागीच मृत्यू झाला. चिंचवड येथील वाल्हेरकरवाडी येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. केशवकुमार महतो असे मयत मजुराचे तर पुनीत राम नक्षत्र शुक्ला असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. महतो हा मूळचा बिहारचा असून कामानिमित्त चिखलीतील अष्टविनायक […]
पाथर्डीत वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे शेतात काम करत असताना वीज कोसळून शेतकरी शिवाजी रघुनाथ खेडकर (वय ५४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेत त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. दरम्यान अचानक वादळी वातावरण निर्माण होऊन वीज […]
थलापथी विजयकडे 520 कोटींची संपत्ती; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती उघड
तमिळ सुपरस्टार आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचा अध्यक्ष विजय थलपथी याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पेरांबूर (Perambur) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याने आपली एकूण ५२० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. विजय कडे ४०५ कोटींची जंगम मालमत्ता आहे तर ११५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. अशी एकूण 520 कोटींची संपत्ती […]
Jalna News –मुसळधार पावसात झाडाचा घेतला आसरा…तिथेच झाला घात; वीज कोसळून दोघांचा मृत्यू
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील विज्ञानेश्वर आपेगाव येथे महादेवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक अवकाळी पाऊस व विजेच्या गडगडाट सुरू झाला. त्यावेळी दोन तरुणांनी झाडाचा आसरा घेतला असता त्यांच्यावर वीज कोसळून दोघेही जागीच ठार झाले. या दुर्घटनेत एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री 7.30 ते 8 च्या दरम्यान महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी ‘नक्षलमुक्त भारत’ या विषयावरील चर्चेदरम्यान बोलताना आपले परखड मत मांडले. यावेळी त्यांनी खाण कंपन्यांचे हित जपण्यासाठी आदिवासींचे विस्थापन नक्षलवाद संपवण्याच्या नावाखाली होत असल्याचा संशय देखील व्यक्त केला. तसेच ‘नक्षलवादाचा उगम हा अन्याय, शोषण आणि जमिनीच्या हक्कासाठीच्या लढ्यातून झाला आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे केवळ […]
मध्य-पूर्वेतील युद्ध पाचव्या आठवड्यात पोहोचले आहे. अमेरिकेकडून सातत्याने इशारे दिले जात असतानाही इराण देखील युद्धातून मागे हटायला तयार नाही. त्यामुळे आता अमेरिका एक पाऊल पुढे जात थेट इराणच्या हद्दीत सैन्य उतरवण्याची तयारी करत आहे. अद्याप याबाबत अधिकृत निर्णय झाला नसला तरी अमेरिकेने यासाठी तयारी सुरू केल्याचे समजते. याअंतर्गत खार्ग बेट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील किनारी ठिकाणांवर […]
Mumbai News –एलफिन्स्टन पूलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर मोठा ब्लॉक; प्रवाशांची रखडपट्टी होणार
एल्फिन्स्टन रोड रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वे ओव्हर ब्रिजचे पॅनेल काढण्यासाठी विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करणार आहेत. या ब्लॉकमुळे सोमवार आणि मंगळवार दरम्यान रात्रीच्या वेळी लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. 30 मार्च रात्री 23.40 ते 31 मार्च पहाटे 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार […]
सेंट्रल आर्म फोर्स विधेयकावरून संजय राऊत यांनी सरकारला सुनावले
सेंट्रल आर्म फोर्स विधेयकावर आज राज्यसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे. यावेळी त्यांनी ‘जर सरकारने हे बिल आणले तर तो केंद्रीय सुरक्षा पोलीस दलाच्या जवानांवर अन्याय होईल व त्यामुळे जवानांमध्ये असंतोष पसरेल. जर फोर्सेस मध्ये असंतोष राहिला तर त्यांच्या हातातील बंदूकांचा दुरुपयोगही होऊ शकतो’, […]
Crime News –पतीचा खून केला आणि मुलांना घेऊन रात्रभर मृतदेहा शेजारी झोपली; पत्नीसह तिघांना अटक
आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिपलोती कला गावातील मेराज हा गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र, त्याची पत्नी रुहीचे तिच्या मेव्हण्याच्या भावाशी प्रेमसंबंध होते. मेराजला या गोष्टीची माहिती मिळाली आणि त्याने विरोध केला, ज्याचा राग धरून रुहीने त्याला आपल्या वाटेतून […]
‘शिकण्याला वयाचे बंधन नसते’ याचा प्रत्यय जेजुरीमध्ये आला आहे. शासनाच्या ‘उल्लास नवभारत साक्षरता’ अभियानांतर्गत रविवारी झालेल्या परीक्षेत लवथळेश्वर येथील 99 वर्षीय सदाशिव कोंडीबा साळवे यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वयाच्या या टप्प्यावरही साक्षर होण्याच्या त्यांच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. जेजुरी येथील जिजामाता महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. या केंद्रावर […]
पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच एका मोठ्या वादाने या लीगला घेरले आहे. लाहौर कलंदर्स आणि कराची किंग्स यांच्यातील सहाव्या सामन्यात बॉल टॅम्परिंगचा प्रकार समोर आला आहे. गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात लाहौर कलंदर्सच्या फखर जमानला चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात टिपण्यात आले. या लाजिरवाण्या प्रकारामुळे पाकिस्तान क्रिकेट पुन्हा […]
Jammu Kashmir –सांबा येथे गस्तीवर असलेल्या बीएसएफ जवानांवर हल्ला, दोन जवान गंभीर जखमी
जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या बीएसएफ जवानांवर हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी डाव साधला. या घटनेनंतर परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जवान नियमित गस्त घालत असताना हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी […]
कधीकाळी सहजपणे झाडाझुडपांमध्ये सापडणारे मधमाश्यांचे पोळे म्हणजेच ‘मोहोळ’ सापडणेही आता दुर्मिळ झाले आहे. मधमाशा घटल्याने मोहोळ दिसेनासे झाल्याचे मुख्य कारण म्हणजे मधमाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्याचा थेट परिणाम फळबागांवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बागेत कृत्रिम मधमाशी पेट्या लावून फुलांचे परागीभवन वाढून फळधारणा चांगली होण्यासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम पद्धतीने मधमाशांचे पालन करून फळबागा फुलवण्यासाठी […]
IPL 2026 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. वानखेडे स्टेडियमवर 221 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील रोहितचे हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी 2025 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने […]
शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस खोटारडे […]
>> अभय मिरजकर मोदी सरकारने ‘उज्ज्वला’ योजनेचा उदोउदो करत घराघरांत गॅस कनेक्शन पोहोचवल्याचा डांगोरा पिटला खरा, पण आता त्याच गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक पुन्हा एकदा पारंपरिक इंधनाकडे वळले आहेत. ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटत आहेत. चुलीसाठी सरपण गोळा करताना महिला, पुरुष दिसत आहेत. यासोबत आता ठिकठिकाणी शेणाच्या गोक्यांचे ‘उडवे’ […]
धाराशिव येथे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शानदार शोभायात्रा
धाराशिव (प्रतिनिधी)- जिओ और जीने दो, भगवान महावीरजीके तत्त्वोंकी यही पुकार, युद्ध को दो अभी विराम अशा घोषणांच्या निनादात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने धाराशिव शहरात सोमवारी शानदार शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी एकात्मता जोपासण्याचा संदेश देत लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सकल जैन समाजाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. धाराशिव शहरातील माऊली चौकात असलेल्या 1008 भगवान पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिरासमोरून पारंपारिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली. सुरुवातीला नगराध्यक्ष नेहाताई काकडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल काकडे,सतिश कदम, वैशाली मुंडे, रवि मुंडे,पंकज पाटील, तुषार निंबाळकर आदींच्या हस्ते भगवान महावीर यांच्यातील तैलचित्राचे पूजन करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. शोभायात्रा गुजर गल्ली जैन मंदिर, मारवाडी गल्ली, सावरकर चौक, शहर पोलीस स्टेशन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळा मारुती रोड, निंबाळकर गल्ली मार्गे फिरवण्यात आली. नंतर मंदिराजवळ शोभायत्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी शहरात विविध ठिकाणी फुले उधळून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यासोबतच शहरात विविध ठिकाणी रांगोळी काढण्यात आली. शोभायात्रेत असलेल्या पालखीचे पादप्रच्छालन व पूजन करण्यात येत होते. भगवान महावीरजीके तत्त्वोंकी यही पुकार, युद्ध को दो अभी विराम, जिओ और जिने दो, अहिंसा परमो धर्म की जय, भगवान महावीर की जय, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने श्वेत वस्त्र परिधान करून पुरुष श्रावक आणि लाल साडी परिधान करून महिला श्राविका रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल अजमेरा,अमित गांधी,प्रशांत येणेगूरे,अतुल कांबळे, मनोज कोचेटा, मनोज चाकवते, सुदेश फडकुले, सुहास हिंदानेआदींनी पुढाकार घेतला. लहान मुलांचे मनभावन नृत्य रॅलीच्या सुरुवातीला व अधून मधून लहान मुलांनी भगवान महावीर यांनी एकतेचा संदेश कसा दिला आहे याबद्दल नृत्य सादर करून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये त्यांनी जैन तत्वावर आधारित गीतावर नृत्य सादर केले. यासाठी प्रिया कांबळे, वंदना गांधी यांनी चिमुकल्यांना मार्गदर्शन केले. सुकन्या चाकवते, राजवीर चाकवते, पिहू चाकवते, श्रीशा चाकवते, चाकवते, ओवी पलसे, स्वानंदी फडकुले,मोक्षा पलसे चिमुकले या उपक्रमात सहभागी झाले होते.
तेरच्या पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळेची शैक्षणिक सहल संपन्न
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळेची शैक्षणिक सहल कोल्हापूर दर्शन करत संपन्न झाली. सालाबाद प्रमाणे यावर्षीही पीएमश्री योजनेअंतर्गत 40 विद्यार्थ्यांसाठी सदर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीसाठी परवानगीच्या सर्व बाबी आटोपून राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.बसने 24 मार्च 2026 रोजी तेर येथून रात्री प्रस्थान करत कोल्हापूर दर्शनासाठी सहल निघाली. धाराशिव , सोलापूर मार्गे सकाळी कोल्हापूर येथे पोहोचत छत्रपती शाहू महाराज यांच्याद्वारे स्थापन केल्या गेलेल्या मुस्लिम बोर्डिंग येथे विश्रांती घेण्यात आली. सकाळी कनेरी मठ येथील सिद्धगिरी गार्डन, माया महाल , तारा मंडल आणि ग्रामीण बलुतेदारी देखाव्यांचे म्युझियम इत्यादी बाबी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राचीन संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देखाव्यातून घेता आला. विद्यार्थ्यांचे आनंद द्विगुणित झाले. दुपारी शहराकडे प्रस्थान करण्यात आले. शहरांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी चिकन बिर्याणीचा आस्वाद घेतला. दुपारी वाजता छत्रपती शाहू महाराज पॅलेस, शालिनी पॅलेस आणि वस्तुसंग्रहालयास भेट देऊन ऐतिहासिक वास्तू प्रत्यक्ष पाहण्याचा योग विद्यार्थ्यांना लाभला. संग्रहालयात विद्यार्थ्यांनी प्राचीन हत्यारे, दैनंदिन उपयोगातील वस्तू , प्राणी, पक्षांचे देखावे , दाग-दागिने, युद्धात वापरली जाणारी पोशाखे इत्यादी बाबी प्रत्यक्ष पाहिल्या. यामुळे ऐतिहासिक जीवन आणि राजे-महाराजे यांच्या दैनंदिन जीवनशैलीचे दर्शन घडले. छत्रपती शाहू महाराजांच्या पॅलेस मधील त्यांचा दरबार हॉल पाहून त्याची भव्यता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. अशाप्रकारे कोल्हापूर दर्शनाची सहल पूर्ण करत सायंकाळी कोल्हापुर येथून परतीच्या प्रवासाकडे प्रस्थान करण्यात आले. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी कोल्हापूरी भडंग चिवडा व चहाचा आस्वाद घेतला. अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची सहल कोल्हापूर येथून सुखरूप तेर येथे रात्री पोहोचली. या सहलीसाठी शाळेचे मुख्याध्यापक शहा तय्यबअली यांनी नियोजनबद्ध आखणी करून सहल यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तर तौफिकुलआलम फुलमामडी , खतीब मुमताज , शेख शबाना आणि डॉ.शेख मौला यांनी सहकार्य केले. एस.टी.महामंडळा तर्फे सहलीसाठी चालक म्हणून उपळा येथील सरवदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना सुखरूप ने आण केल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. अशाप्रकारे शाळेची शैक्षणिक सहल यशस्वी रीत्या संपन्न झाली.
नाट्यस्पर्धा कलाकाराला घडवणारी शाळा- नीलिमा शिर्के-सामंत
धाराशिव (प्रतिनिधी)- नाट्यस्पर्धा ही केवळ जिंकणे-हरणे यापुरती मर्यादित नसून प्रत्येक स्पर्धकासाठी ती “जय-पराजयातून शिकण्याची” संधी असते. ती केवळ कला सादर करण्याची संधी देत नाही, तर जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची ताकदही देते.नाट्यस्पर्धा ही कलाकाराला घडवणारी शाळा असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा शिर्के-सामंत यांनी केले. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे 27 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव च्यावतीने राज्यस्तरीय ‘गंगाधर करंडक’ एकांकिका नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाधर करंडक स्पर्धेच्या रविवार 29 मार्च रोजी बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून सिने अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा शिर्के-सामंत बोलत होत्या. गंगाधर करंडक स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा शिर्के-सामंत, सिने अभिनेत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्या सविता मालपेकर, डॉ.अभय शहापूरकर,दादा साळुंके , उद्योजक सुमित कोठारी, नगरसेविका अर्चना विशाल शिंगाडे, पत्रकार रवींद्र केसकर, ज्येष्ठ नेते सुधाकर गुंड, उद्योजक अमित मोदाणी, सुदेश माळाळे, आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना नीलिमा शिर्के - सावंत म्हणाल्या की नाट्यस्पर्धेमुळे कलावंतांना पुढे जाण्यास मोठी मदत होते. स्पर्धेमुळे कलाकारांना व्यासपीठ मिळते, त्यांचे कौशल्य लोकांसमोर येते. धाराशिव शहरात बालरंगभूमीची लवकरच शाखा स्थापन करणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना शिर्के यांनी दिले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धाराशिव शाखेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच पोलिस भरतीमध्ये अंतिम निवड झाल्या बद्द्ल अभिजीत ओव्हाळ आणि सुधाकर झेंडे यांचा तर नगरसेवक म्हणून विजयी झाल्या बद्द्ल अर्चना विशाल शिंगाडे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांनी हार आणि सन्मानचिन्ह देऊन केला. स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व विजेत्यांचा मान्यवरांनी करंडक, सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. या नाट्य स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ अभिनेते नितीन दंडुके ,ज्येष्ठ अभिनेते प्रशांत तपस्वी, नाट्य रंगकर्मी अश्विनी तडवळकर यांनी केले.सूत्रसंचलन नाट्य परिषदेचे सुगत सोनवणे यांनी तर प्रस्ताविक आयोजक विशाल शिंगाडे यांनी तर आभार विजय उंबरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.जी.कुलकर्णी, सुगत सोनवणे,रोहित कुलकर्णी,ताहेर शेख, विजय उंबरे, अविनाश बनसोडे , सुहास झेंडे, दीपेश दणाने, आकाश वाघमारे, यशवंत शिंगाडे, सुमित शिंगाडे, सारीपुत शिंगाडे,प्रवीण सोनवणे, यांच्या सह शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. ही नाट्य स्पर्धा पाहण्यासाठी शहर व परिसरातील नाट्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत ‘बिटवीन द डोअर’ (अनुभूती संस्था, बदलापूर) या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत 51,990 रुपये व करंडक जिंकला. द्वितीय क्रमांक 31,000 रुपये ‘हमको हिंदी नही आती’ (ज्ञानसाधना नाट्य परिवार, ठाणे) तर तृतीय क्रमांक 21,000 रूपये ‘पहिली रात्र’ (क्रिदन एंटरटेनमेंट, पुणे) यांना मिळाला. चतुर्थ 11,000 रूपये ‘बुजगावणे’ (रंग फौज सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान, संभाजीनगर) आणि उत्तेजनार्थ 5000 रूपये ‘प्रेम की यातना’ (दीपवैभव नाट्य संस्था, सोलापूर) यांची निवड झाली. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट लेखनासाठी गोपाळ वाघमारे (बुजगावणे) प्रथम 1500 रूपये, अजय पाटील (हमको हिंदी नही आती) द्वितीय 1000 रूपये, संकेत मोडक (पहिली रात्र) तृतीय 500 रूपये ठरले. दिग्दर्शनात अमोल ताटे (बिटवीन द डोअर) प्रथम 1500 रूपये, सुमेध गायकवाड-साहिल कदम (हमको हिंदी नही आती) द्वितीय 1000 रूपये, संकेत मोडक (पहिली रात्र) तृतीय 500 रूपये ठरले. अभिनय (स्त्री) विभागात वैष्णवी दळवी (पहिली रात्र) प्रथम 1500, काजल अटकारे (पुंडलिक वरदा) द्वितीय 1000, सई दरेकर (प्रेम की यातना) तृतीय 500 ठरल्या. अभिनय (पुरुष) विभागात साहिल कदम (हमको हिंदी नही आती) प्रथम 1500, ऋषीकेश कारके (बुजगावणे) द्वितीय 1000, अमोल ताटे (बिटवीन द डोअर) तृतीय 500 ठरले.
अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञास प्रारंभ, भाविकांची प्रचंड गर्दी
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञास 29 मार्च पासून प्रारंभ झाला. यज्ञ पहाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. भीष्म फाउंडेशन स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्ऊ,पुणे विश्व मंदिर परिषद, भीष्म 108 सोमयाग यज्ञ प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण विश्वाचे कल्याण, दैवी ऊर्जेची अनुभूती,त्रुतू चक्रांचे संतुलन,पंच महाभूतांचे संतुलन, पर्यावरण आणि वायुमंडलाचे शुद्धीकरण, वैयक्तिक आरोग्य प्राप्ती, आभा(ऑरा), पंचकोशीय शुद्धी, भूमी-जल पोषण सुधार आणि शुद्धीकरण यासाठी अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचा प्रारंभ धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहा काकडे व राहुल काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, जिल्हा परिषद सदस्य संजय लोखंडे, येडशीचे माजी सरपंच गजानन नलावडे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
सारोळा (बुद्रुक) येथील जिल्हा परिषद शाळेचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सारोळा (बुद्रुक) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव २५ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांचे चरित्र, महाराष्ट्राची कला परंपरा आणि भारताच्या सांस्कृतिक वारशावर आधारित विविध नाट्यकला, नृत्य आणि सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेल्या कला, अभिनय आणि नृत्य कौशल्याला व्यासपीठ मिळाले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना पालक आणि प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, प्रेक्षक व पालकांकडून जवळपास ४० हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. नवोदय स्कॉलरशिप, रायगडवीर, कब-बुलबुल यांसारख्या उपक्रमांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून विशाल सूर्यवंशी यांनी जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन राजेंद्र अंगरके आणि सुमित्रा आटपलकर यांनी प्रभावीपणे केले. यावेळी श्रीमती गोकर्णताई कदम, प्रमोद पाटील, प्रशांत तात्या रणदिवे, निर्मलाताई चंदने, वैभव पाटील, नामदेव आप्पा खरे, बालाजी मसे, सचिन जासूद, आरटीओ कुदळे, दत्ता कुंभार, तानाजी वनकळस, संजय आबा पवार, राकेश कटारे, सुनिता वडगावकर, अनिता सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, शेषणी, नानासाहेब सावंत, बाळासाहेब कटारे, प्रवीण वाघमारे, उर्मिला देवगिरे आदी मान्यवर उपस्थित होते
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध आता महिन्याभरापासून सुरू आहे. या युद्ध समाप्तीसाठी इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तर इराणने या दाव्याचा साफ इन्कार केला आहे. तसेच या दोन देशांमध्ये पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याचीही चर्चा आहे. मात्र, युद्ध समाप्तीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. त्यातच आता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार मंगळवारी […]
नागावरून उडी मारत आईने पोटच्या गोळ्याचे प्राण वाचवले
जिंतूर येथील येलदरी वसाहतीमध्ये ‘आईचं काळीज ते आईचंच!’ याची प्रचिती देणारी एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या दिशेने येणारा काळ पाहून, एका माऊलीने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता थेट फणा काढलेल्या नागाच्या अंगावरून उडी मारली आणि आपल्या लेकीला मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले. येलदरी वसाहतीमधील रहिवासी मोनाली रवि जाधव या […]
कर्नाटकात खासगी बस पुलावरून कोसळली, 10 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी
कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी एक खासगी बस पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडली. या अपघातात दहाहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी भद्रावती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भद्रावती तालुक्यात असलेल्या वीरपुरा गावातील कागेहल्ला येथे हा अपघात घडला. अपघातग्रस्त बस दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी येथून भद्रावतीच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये […]
Chandrapur News मजुराने धावत येऊन स्वत:ला ट्रकखाली झोकून दिले, घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद
मजुराने धावत येऊन ट्रकच्या चाकाखाली स्वत:ला झोकून देत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे घडली आहे. ही संपूर्ण घटना cctv मध्ये कैद झाली आहे. भैरव खेदू ठाकूर (४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहे. बल्लारपूरात सुरू असलेल्या sndt महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. तो तिथे मृतक […]
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान शेकडो चाहत्यांना मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे रंगतदार सामना सुरू होता. मात्र, दुसरीकडे स्टेडियममधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल फोनवर डल्ला मारला आहे. विशेषतः दुसऱ्या डावात प्रेक्षकांची हालचाल वाढत असताना आणि लोक पाणी किंवा नाश्त्यासाठी बाहेर येत असताना […]
Photo –शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक; संघटना बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी केले मार्गदर्शन
शिवसेनाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आणि मुंबई नगरसेवकांची बैठक आज शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. संघटना बांधणीच्या दृष्टीने यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल […]
डिजिटल माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांवरही कर भरावा लागणार; मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
हिंदुस्थानात राहून विविध ग्राहक सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या कर आकारणीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हिंदुस्थान आणि चीनमधील द्विपक्षीय कर करारानुसार जर एखादी चिनी कंपनी हिंदुस्थानी उपकंपनीला तांत्रिक सेवा पुरवत असेल, तर त्यावर हिंदुस्थानात कर आकारला जाऊ शकतो, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. चीनमधील ‘बेंटेलर ऑटोमोटिव्ह इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ या […]
हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेसाठी आजचा दिवस अत्यंत चिंतेचा ठरला आहे. जागतिक बाजारातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय रुपयाने (INR) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९५ चा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी सकाळी व्यवहार सुरू झाल्यानंतर रुपया काही काळ सावरला होता, मात्र दुपारपर्यंत तो ९५.२० या ऐतिहासिक नीचांकी पातळीला पोहोचला. घसरणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या शुक्रवारी […]
अभंगवाणी कार्यक्रमात संगीत रसिक मंत्रमुग्ध
भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील ग्रामदैवत श्री.हनुमान जयंतीच्या अनुषंगाने येथील हनुमान मंदिरात दि.26 मार्च पासून प्रारंभ झाला. सप्ताहात वासुदेव शास्त्री महाराज,मंगेश महाराज देशमुख प्रसाद महाराज कुलकर्णी उमेश सुतार महाराज श्री कबिर महाराज अशा नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा , दैनंदिन हरिपाठ,श्री हनुमान चालीसा पठण नामवंत कलाकारांची भजन सेवा हरि जागर, अन्नदान महाप्रसाद अशी आध्यात्मिक कार्यक्रमाची रेलचेल होत असून 2 एप्रिल रोजी ह.भ.प.श्री. भागवत महाराज कबिर पंढरपूर,संत कबीर महाराजांचे 17 वे वंशज यांच्या काल्याचे किर्तनाने सांगता होत आहे. 27 मार्च रोजी भूम येथीलअंबादास देशपांडे, संगीत विशारद, सेवानिवृत्त स्टेट बँक अधिकारी यांचा सुश्राव्य असा *अभंगवाणीचा कार्यक्रम* झाला. कार्यक्रमाची सुरुवात “जय रामकृष्ण हरी “ बिहाग रागात पारंपारिक भजनाने झाली.पंचपदीनंतर किरवाणी रागात “संतसंगतीचे काय सांगु सुख “ हा संत नामदेव महाराजांच्या अभंगाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. “ ज्ञानाचा सागर “ हा संत जनाबाईचा अभंग “घेई घेई माझे वाचे“ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग तसेच भक्तीगीत नाट्यगीतांने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.शेवटी “ शेवटची विनवणी “ या संत तुकाराम महाराजांचा अभंग भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. गायनाची साथ श्री.दत्ता गोळे ,ह.भ.प.श्री.विलास महाराज ,ह.भ.प.उमेश महाराज यांनी तर तबला साथ बाळासाहेब चव्हाण, उल्हास जवाहिरे,बापू पौळ, बप्पा जोशी यांनी केली. सप्ताहाचे यशस्वीतेसाठी सर्व हनुमान सेवेधारी परिश्रम घेत आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनीने पशु पक्षांना पाण्याची व धान्याची केली व्यवस्था
भूम (प्रतिनिधी)- यावर्षी पर्जन्यमान जास्त झाल्याने सर्वत्र डोंगर दर्याने झाडे झुडपे अधिक प्रमाणात वाढले असल्याने रस्त्यालगत गवत जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी ते जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यामध्ये असल्या उन्हाच्या धगधगते मध्ये चिमणी पाखरू पक्षी यांचा जीव घरटे जळून खाक झालेली दिसून आली येताच मौजे हाडोंग्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी नालंदा रवींद्र लोमटे इयत्ता 2 री या विद्यार्थिनीने उन्हामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला पिण्याच्या पाण्याची सतत गरज भासते उन्हामध्ये माणसांचा देखील जीव लाईलाई होत आहे ही गोष्ट लक्षात घेता या पशु पक्षांना उष्माघाताचा त्रास होऊ नाही म्हणून विद्यार्थिनीने घराशेजारी असलेल्या छोट्याशा झाडाला एका बिसलरी बॉटलमध्ये पाणी भरून ते झाडाला बांधून ठेवली आहे आणि सोबत जवारीच्या धान्याचे कणीश या झाडाला बांधल्याचे दिसत आहे या माझ्या पशु पक्षांना तहान व भूक लागल्यास त आपल्याला मागू शकत नाही म्हणून उष्णतेमुळे पशु पक्षांचा अन्नधान्य धान्य पाण्यावाचून मृत्यू होऊ शकतो. पशु पक्षांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर पाण्याची व्यवस्था केली पाहिजे .पाणी हे जीवन आहे पाण्याशिवाय पशु पक्षी मानव प्राणी जगू शकत नाही.2 री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पशु पक्षांना पाण्याची व्यवस्था करून . पशु पक्षांना अन्नधान्याची व पाण्याची गरज असल्याचे एक प्रकारचा इथल्या मानव समूहाला संदेश दिल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमामुळे तिचे कौतुक होत आहे.
परंडा (प्रतिनिधी)- आज सोमवार दि.30 रोजी, रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली, परंड्याचे नगराध्यक्ष जाकीरभाईं सौदागर यांना परंडा शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा परंडा शहरात शिवाजी महाराज चौकामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारण्या बाबतचे निवेदन दिले,परंडा शहरात दि.15 सप्टेंबर2024 रोजी महीला मेळाव्याचे निमित्ताने आले असता तत्कालीन मुख्यमंत्री, व आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन आरोग्य मंत्री व परंडाचे विद्यमान आमदार डॉ.प्रा.तानाजीराव सावंतसर यांचे शिफारशीसह, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राज्य सचिव संजय कुमार बनसोडे यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले, त्याच वेळेस मा. उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी परंडा शहरात दोन्ही महा मानवांचे पुतळे बसवण्याची जाहीर घोषणा केलेली आहे, त्याच घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करून परंडा शहरात,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चौदा एप्रिल चे मुहूर्तावर पुतळे बसवण्याबाबतचे निवेदन दिले, सोबत रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब सरोदे माजी तालुकाध्यक्ष फकीर दादा सुरवसे, रिपाई नेते अमोल चौतमहाल, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, जयपाल बनसोडे अक्षय कांबळे ,विजय बनसोडे सिद्धार्थ बनसोडे, विश्वास बनसोडे ,वामन शिंदे आकाश लोखंडे व आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जाहीर केले नुसार पुतळा बसविण्याची सकारात्मक कार्यवाही तात्काळ करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष जाकीरभाईं सौदागर यांनी यावेळी दिले.
IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे आरसीबीने विक्रमी विजय नोंदवला असला, तरी सध्या सर्वत्र चर्चा होत आहे ती हैदराबादच्या अनिकेत वर्माची. झाशीच्या या 24 वर्षीय युवा खेळाडूने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेत केवळ 18 चेंडूंमध्ये 43 […]
अंकुर शिशुगृहातून दहा बालके मोठ्या घरात अदत्तक- डॉ. दिग्गज दापके
धाराशिव (प्रतिनिधी)- नकोशी असलेली, कुमारी माता, घटस्फोट व इतर कारणामुळे जन्मताच बाळांना रस्त्यावर फेकून देणे किंवा कचराकुंडीमध्ये टाकून जाणे यामुळे बालकांचे जीवन धोक्यात येते. मात्र, अशाच बालकांना धाराशिव येथील अंकुर शिशुगृहामध्ये आणून त्याचे जीवन फुलविले जाते. या शिशुगृहामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये 21 बालके असून, त्यापैकी 10 बालकांना भुवनेश्वर (ओडिशा), नंदियाल (आंध्र प्रदेश), पुणे, मुंबई, मुंबई उपनगर, अहमदाबाद (गुजरात) आदी शहरातील मोठ्या उद्योगपतींच्या घरात हे बालके दत्तक विधान् कायद्यानुसार पुनर्वसित झाले आहेत. अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल व अंकुर शिशुगृहाचे प्रमुख डॉ. दिग्गज दापके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. धाराशिव शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अंजुमन सोसायटी व सह्याद्री हॉस्पिटलच्यावतीने आयोजित ईद-ए-मिलाद व पत्रकार परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे फेरोज पल्ला उपस्थित होते. एक बालक अमेरिकेत या शिशुगृहातील एक बालक अमेरिकेत जाण्याची शक्यता असल्याचे डॉ. दिग्गज दापके यांनी सागून, त्यानुसार केंद्र सरकारकडून प्रोसेस चालू असल्याचे सांगितले. दत्तक विधान कायद्यानुसार त्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती चांगली असणे आवश्यक आहे. दत्तक घेणाऱ्या पती-पत्नीची संमती असण्याबरोबरच त्या दांपत्यांना कुठलाही जीवघेणा आजार आहे का ? त्यांचे वय तसेच त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ? याची तपासणी केली जाते. विशेष म्हणजे दत्तक घेण्यासाठी 30 हजार दामप्त्य वेटींगवर असल्याचे डॉ. दापके यांनी सांगितले. दानशूरांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे करावा हा प्रकल्प लोकसहभाग व संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे अशा पालकांचे व्यवस्थित पालन पोषण व त्यांची जपणूक व्हावी यासाठी जास्तीत जास्त दानशुरांनी आर्थिक मदत करावी. असे आवाहन डॉ. दिग्गज दापके यांनी केले.
अजय घारगेचा अमरावती येथे पोलीसमध्ये भरती झाल्याबदल सत्कार
मुरुम (प्रतिनिधी)- दि .30 मार्च 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट अजय परमेश्वर घारगे राहणार कोंडजीगड ता. लोहारा येथील रहिवासी हा भाग भूकंपग्रस्त परिसरात असल्यामुळे अनेक कठिण समस्याला सामोरे जाऊन वडिलांने कुटुंब सांभाळले. उदरनिर्वाह हा केवळ शेतीच असल्यामुळे वडिलांनी अजयला शिक्षणासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे बीए प्रथम वर्षात तसेच एनसीसी मध्ये प्रवेश घेण्यास सांगितला. घरची हालाकिची परिस्थिती असल्यामुळे मुलाला पोलीस करण्याचे स्वप्न मनात होते. ते वडिलाचे स्वप्न अजयनी पूर्ण करून दाखवले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी त्याचा सत्कार करून पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कारप्रसंगी प्राचार्यांनी मार्गदर्शन करताना इतर कॅडेटसनी पण यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावे असे आव्हान केले. या सत्कार समयी डॉ पद्माकर पिटले, कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, डॉ सुभाष इंगळे, डॉ सन्मुख मुच्छटे, डॉ खंडु मुरळीकर, राजकुमार सोनवणे, नितीन कोराळे प्राध्यापक, कॅडेट्स उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव व ओपन लिंक फाउंडेशन यांच्या सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम’ (विनोबा ॲप) माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना दरमहा प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जिल्हा स्तरीय स्कॉलरशिप सराव परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या शाळांचा सन्मान गट शिक्षण कार्यालय, धाराशिव येथे करण्यात आला. यामध्ये जी प. शाळा अळणी जि.प. कोडगाव आंबेजवळगा, जि.प. ताकविकी व जि.प. राजुरी या शाळांच्या मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार सय्यद ए. जी. (गट शिक्षण अधिकारी, धाराशिव) व हाके डी. आर.(विस्तार अधिकारी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गट शिक्षण कार्यालयातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम’चे प्रकल्प अधिकारी मनोज बिरादार उपस्थित होते.कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत तालुक्यातील इतर शिक्षकांना प्रेरणा देण्याचे आवाहन केले. तसेच सय्यद ए. जी. यांनी शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचे विशेष कौतुक केले. जि.प. आळणी येथील मुख्यध्यापक बशीर तांबोळी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर विनोबा ॲप व स्कॉलरशिप सराव परीक्षेमुळे त्यांच्या शाळेला मोठा फायदा झाल्याचे सांगितले. त्यांच्या शाळेतील एक विद्यार्थी नवोदय परीक्षेत धारक ठरले असून त्यांनी विनोबा ॲपचे आभार व्यक्त केले.
पाऊस, वारा त्यामुळे बाजारभाव कोसळले
भूम,(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्यात व बाजारपेठेवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे सध्या अवकाळी पाऊस, वादळी वारा यांचा फटका पिकाला बसत आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना केळीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गोरमाळा (ता. भूम, जि. धाराशिव) येथील शेतकरी शंकर राजेंद्र औताडे यांनी गट क्रमांक 60 मध्ये दोन एकर क्षेत्रावर सुमारे 2300 केळीची झाडे लावली होती. या लागवडीसाठी त्यांना सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा खर्च आला होता. उत्पादनातून 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. केळी हार्वेस्टिंगसाठी तयार झाली असून, यापूर्वी 10 टन केळी 15 रुपये दराने विक्रीस दिली होती. मात्र, दि. 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे बागेतील सुमारे 60 ते 70 टक्के नुकसान झाले. यामुळे अपेक्षित उत्पादन घटले असून सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, बाजारात केळीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून पूर्वी 15 रुपये मिळणाऱ्या केळीला आता केवळ 3 ते 4 रुपये दराने व्यापारी मागणी करत आहेत. तसेच सध्याच्या परिस्थितीत अनेक व्यापारी थेट बागेत येऊन खरेदी करण्यासही टाळाटाळ करत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी शंकर औताडे यांनी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.
तीन गाईचा मृत्यू, दोन गाई अत्यावस्थे
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील होंनाळा येथील शेतकरी विजय गिरजाप्पा शेलार यांच्या गोठ्यात सोमवारी दि. 30 मार्च रोजी पशुखाद्य खाल्ल्यानंतर 3 गाईंचा जागीच मृत्यू झाला. तर 2 गाई अत्यावस्थेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेलार यांच्याकडे एकूण 18 जनावरे आहेत. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे गायींची धार काढल्यानंतर त्यांनी पशुखाद्य तयार करून जनावरांना देण्यास सुरुवात केली. पहिल्या पाच गाईंना खाद्य दिल्यानंतर काही क्षणांतच त्यापैकी तीन गाई अचानक कोसळून मृत्युमुखी पडल्या, तर दोन गाईंची प्रकृती गंभीर झाली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या गाईचा हत्यारा कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम शहरात भव्य मिरवणूक
भूम (प्रतिनिधी)- महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम शहरातील जैन समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून भगवान महावीरांच्या विचारांचा जागर केला. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम येथील कसबा जैन मंदिरातून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक बाजार रोड, गोलाई चौक, मेन रोड, नगरपालिका मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा कसबा जैन मंदिर येथे संपन्न करण्यात आली. या मिरवणुकीत पुरुष, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. भगवान महावीरांच्या उपदेशांप्रमाणे मिरवणूक अत्यंत साधी, शांत व शिस्तबद्ध होती. मिरवणुकीमध्ये जैन संघटनेचे अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल, शितल शहा, अभय गांधी, विवेक पोकर्णा, स्वप्नील शहा, प्रदीप आहेरकर, डॉ. शांतीनाथ अंबुरे, बाहुबली एखंडे, राजकुमार आहेरकर, निलेश शहा, संतोष मुनोत, राजकुमार पितळे, नेमचंद मुनोत, नेमचंद पोकर्णा, विजय सुरपुरिया, प्रीतम आहेरकर, धर्मचंद पोकर्णा डॉ.शुभम पोकर्णा, सूरज शहा, धवल गांधी, सुनील जोशी सुरेश लोखंडे, यांच्यासह अनेक जैन बांधव उपस्थित होते. मिरवणुकीनंतर भगवान महावीरांची आरती करण्यात आली. या उपक्रमातून शांती, करुणा व अहिंसेचा संदेश देण्यात आला.
त्यागातूनच राज्य व केंद्रात भाजपचे सरकार आहे- दत्ता कुलकर्णी
भूम (प्रतिनिधी)- प्रत्येक क्षेत्रात त्याग केल्या शिवाय फळ मिळत नाही, जनसंघाच्या माध्यमातून अनेकांनी त्याग केला. त्यांच्या विचारधारेवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र, राज्यात आणि जिल्ह्यात सरकार आहे. प्रगत राष्ट्रासाठी ही बाब समाधानकारक असल्याचे मत जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले. शनिवार दि. 28 व रविवार दि 29 मार्च या दोन दिवसाच्या कालावधीचे भारतीय जनता पार्टीच्यावतीने भूम शहर व ग्रामीण मंडल स्तरीय प्रशिक्षण वर्ग श्री संत गजानन महाराज मंदिर सभागृहात माजीमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राज्य परिषद सदस्य तथा मतदार यादी पुनरनिरीक्षण विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. सात सत्रामध्ये विविध विषयावर वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. नितीन काळे, सचिन घोडके, रामदास कोळगे, देविदास पाठक, अस्मिता कांबळे, शिवाजी गिट्टे, बाळासाहेब क्षिरसागर सखोल मार्गदर्शन केले. दोन दिवसाच्या प्रशिक्षण वर्गात तालुक्यातून 163 बूथ प्रतिनिधी निवासी उपस्थित होते. सर्व प्रशिक्षणार्थींची भोजन निवास व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीची केली होती. यात महिलांची सुद्धा उपस्थिती चांगली होती. संपूर्ण प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे प्रभारी दत्ताभाऊ राजमाने, तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, महिला तालुकाध्यक्ष स्वाती तनपुरे, शहराध्यक्षा विद्या खामकर, मन की बात व्यवस्थापन करणारे सिद्धार्थ जाधव, शुभम खामकर तसेच नगरसेवक तथा प्रभारी आबासाहेब मस्कर, शांतीराज बोराडे, बापू बगाडे, संदीप खामकर, शरद चोरमले, रघूनाथ वाघमोडेसह अनेकांनी परिश्रम घेतले. प्रत्येक सत्रामध्ये गीत गायन महादेव वडेकर यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंकर खामकर यांनी केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानात योग प्राणायाम सत्र उत्साहात संपन्न
परंडा (प्रतिनिधी)- पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाच्या अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंग ठाकूर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. तसेच शिबिराची सुरुवात भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून करण्यात आली. या प्रशिक्षण महाअभियानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा ते आठ या वेळेमध्ये योग, प्राणायाम व सूर्यनमस्कार शिबिर तसेच आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता दर्शविली. याप्रसंगी भाजपा उपजिल्हाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, बौद्धिक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सूर्यवंशी, भाजपा परंडा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे व शहर प्रमुख उमाकांत गोरे , तानाजी पाटील, जयदेव गोफणे, गौतम लटके सर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योग सत्रामध्ये योग, प्राणायाम व सूर्यनमस्काराचे महत्त्व तसेच निरोगी जीवनशैलीबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ.आनंद मोरे (एम.डी. आयुर्वेद मेडिसिन) योगशिक्षक यांनी प्रात्यक्षिकासह केले. त्यांनी नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक ताण कमी होतो व कार्यक्षमता वाढते, असे प्रतिपादन केले. तसेच निरोगी कार्यकर्ता हा सशक्त संघटनेचा पाया असून आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी असून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले. या प्रशिक्षण महाअभियानामुळे कार्यकर्त्यांचा सर्वांगीण विकास होऊन समाजसेवा व राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला अधिक बळ मिळेल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
केरळमध्ये दोन प्रमुख आघाड्या सत्ताधारी LDF आणि मुख्य विरोधी गट UDFएकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. केरळच्या या राजकारणात भाजपची बी-टीम हा मुद्दा गाजत आहे. या आघाड्या राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपशी एकमेकांची तुलना करत आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मोदी केरळच्या मुख्यमंत्र्यांना नियंत्रित करतात, ते भाजपची बी टीम आहेत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधींनी पिनराई विजयन […]

27 C