आसाममध्ये संतप्त जमावाने भाजप नेत्याचं घर जाळलं; कर्फ्यू लागू, हिंसाचारात CRPF जवानासह अनेक जखमी
आसाममधील पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात सोमवारी संतप्त जमावाने कार्बी आंगलाँग स्वायत्त परिषदेचे प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तुलीराम रोंगहांग यांचे वडिलोपार्जित घर पेटवून दिले. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला. यात तीन आंदोलक जखमी झाले असून सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला […]
असं झालं तर…चुकीच्या यूपीआय आयडीवर पैसे पाठवले तर…
बरेचदा लोक घाई किंवा निष्काळजीपणामुळे चुकीच्या यूपीआय आयडीवर पैसे ट्रान्सफर करतात. त्यानंतर त्यांना पैसे परत मिळण्याची चिंता वाटू लागते. तुम्ही चुकून दुसऱयाच्या यूपीआय आयडीवर पैसे पाठवल्यास पैसे परत मिळवण्यासाठी प्रथम ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. जर त्याने पैसे परत केले नाहीत तर ज्याद्वारे हस्तांतरण केले गेले होते त्या यूपीआय […]
कोल्ड्रिफ विषबाधेतील पहिल्या बालरुग्णाला वाचवण्यात यश, नागपूरच्या AIMS च्या डॉक्टरांनी साधली किमया
विषारी कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 24 मुलांचा मृत्यू झाला होता. पण याच प्रकरणात उपचार घेत असलेल्या मुलांपैकी पहिल्यांदाच एक पाच वर्षीय मुलगा पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील या मुलाला सोमवारी दुपारी नागपूर एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. सुमारे महिनाभरापूर्वी हा मुलगा बालरोग सामान्य वॉर्डमध्ये उपचार घेत […]
हिवाळ्यात मखाना खाण्याचे अगणित फायदे, वाचा
मखाना हा दैनंदिन आहारात समाविष्ट करण्यासाठी सूपरफूड मानले जाते. म्हणून आयुर्वेदामध्येही मखाना खाणे खूप महत्त्वाचे मानले जाते. मुख्य बाब म्हणजे मखाना आपल्याला आतून बळकटी देण्यास, तसेच वजन कमी करण्यातही उपयोगी मानला जातो. चाळीशीनंतर तरुण दिसण्यासाठी फक्त हे पदार्थ आहारात समाविष्ट करा, वाचा दिवसाची सुरुवात पौष्टिक अन्नाने करायची असेल तर आपला नाश्ता सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. […]
हा जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रकार, ‘लिव्ह इन’वर मोहन भागवत नाराज
‘लिव्ह इन रिलेशनशीप’ म्हणजे जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रकार आहे. अशामुळे समाजाचा पाया असलेली कुटुंब व्यवस्था कमकुवत होते,’ अशी नाराजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. कोलकाता येथील कार्यक्रमात ते बोलत होते. ‘लग्न हे शारीरिक समाधानाचे माध्यम नाही. तो समाजाचा भाग आहे. समाजात कसे राहायचे त्याचे शिक्षण कुटुंबात मिळते संस्कृती, परंपरेचे संस्कार पिढ्यान्पिढ्या […]
चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आयत्यावेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले माजी नगरसेवक सुधीर शिंदे यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवलेल्या त्यांच्या पत्नीचाही पराभव झाला. यामुळे शिंदे कुटुंबाला दुहेरी धक्का बसला आहे. या पराभवाने सुधीर शिंदे चांगलेच खचले असून त्याची झळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही उमटताना दिसत आहे. पराभवाच्या वेदनेतून सुधीर शिंदे यांनी […]
भविष्यात देशासाठी मेडल आणू अशी स्वप्ने उराशी बाळगून शालेय जीवनापासून क्रीडा क्षेत्रात प्रचंड मेहनत करणाऱ्या खेळाडूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती नवीन नाही. मात्र अजून या शालेय क्रीडापटूंची स्थिती बदललेली नाही. ओडिशामधून उत्तर प्रदेशात ६९ व्या ‘नॅशनल स्कूल रेस्लिंग चॅम्पियनशिप’साठी गेलेल्या १८ तरुण कुस्तीपटूंना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अत्यंत अमानवीय परिस्थितीत प्रवास करावा लागल्याचा […]
वर्षातील विविध कर संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आयकर विभागाने करदात्यांना 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने देशभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना इशारा देत त्यांच्या कर्मचाऱयांना अघोषित विदेशी मालमत्ता आणि उत्पन्न जाहीर करण्यास प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना हा इशारा देण्यात आला आहे, त्यामध्ये जागतिक ग्राहक आरोग्य सेवा, वायरलेस तंत्रज्ञान क्षेत्र तसेच अमेरिकेतील […]
सोने तीन लाखांचा टप्पा पार करणार, अर्थतज्ञांचा अंदाज
अमेरिकेचे अर्थतज्ञ आणि दिग्गज मार्पेट रणनीतीकार एड यार्डेनी यांनी या दशकाच्या अखेरपर्यंत सोन्याच्या दरात मोठी वाढ होईल, असे म्हटले आहे. 2029 पर्यंत सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 10 हजार डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज यार्डेनी यांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 4410 डॉलर प्रति औंस आहे. सोन्याचे दर या दशकाच्या शेवटपर्यंत 10000 […]
Mumbai news –जलवाहिनी वळवण्याचे काम सुरू, ‘या’भागात पाणीपुरवठा बंद; सविस्तर जाणून घ्या…
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून जलवाहिनी वळवण्याचे काम सुरू असल्याने अंधेरी, विलेपार्ले भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठी करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. के पूर्व विभागातील बामणवाडा, विलेपार्ले (पूर्व) येथे मेट्रो मार्ग ७-अ च्या कामासाठी २४०० मिलीमीटर व्यासाची ऊर्ध्व वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम हाती घेण्यात आले […]
ट्रम्प यांनी 29 देशांतील राजदूतांना तडकाफडकी परत बोलावले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील 29 देशांमध्ये तैनात असलेल्या आपल्या राजदूतांना आणि वरिष्ठ मुत्सद्यांना तडकाफडकी परत बोलावले आहे. ज्या राजदूतांची नियुक्ती बायडेन प्रशासनाच्या काळात झाली होती, त्यांची सेवा जानेवारीमध्ये समाप्त होणार असल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘करीअर डिप्लोमॅट्स’चा (अनुभवी मुत्सद्दी) समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अशा व्यक्तींची या पदांवर नियुक्ती करायची आहे, […]
हिंदुस्थान-न्यूझीलंड व्यापार करार ‘ना मुक्त, ना रास्त’; न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांचाच विरोध
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड दरम्यान नुकत्याच पूर्ण झालेल्या मुक्त व्यापार कराराला (FTA) न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा करार ‘ना मुक्त आहे, ना रास्त’ अशी टीका करत त्यांनी याला आपल्या देशासाठी एक ‘अयोग्य व्यवहार’ म्हटले आहे. न्यूझीलंडच्या सत्ताधारी आघाडीतील महत्त्वाचे भागीदार असलेल्या ‘न्यूझीलंड फर्स्ट’ पक्षाचे नेते विन्स्टन पीटर्स यांनी ‘X’ वर […]
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबायचे नाव घेत नाही. अशातच एका हिंदुस्थानी तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. शिक्षणासाठी रशियाला गेलेल्या या तरुणाने रशियन सैन्यात सहभागी होण्यासाठी आपल्यावर कसा दबाव आणला गेला, याची आपबिती या व्हिडीओद्वारे मांडली आहे. सध्या तो युक्रेनच्या ताब्यात असून त्याने तिथूनच हिंदुस्थानी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. साहिल मोहम्मद हुसैन असे या […]
देशी गुंतवणूकदारांनी सावरला शेअर बाजार; सेन्सेक्स पुन्हा 85 हजार पार, निफ्टीतही तेजी
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी जोरदार तेजीने शेअर बाजाराची सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 638 अंकांनी वधारून 85,567 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 206 अंकांच्या तेजीसह 26,172 अंकांवर बंद झाला. जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण आणि देशी गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. आयटी आणि धातू क्षेत्रातील कंपन्याच्या […]
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने तपास यंत्रणांवर कब्जा केला असून संविधान संपवण्याचा कट रचला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) सारख्या संस्थांचा वापर राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी जर्मनीतील बर्लिन शहरामधील एका कार्यक्रमात […]
आनंद वरदराजन यांच्याकडे ‘स्टारबक्स’चे नेतृत्व
‘स्टारबक्स’ने हिंदुस्थानी वंशाच्या आनंद वरदराजन यांची कार्यकारी उपाध्यक्ष तसेच चीफ टेक्निकल ऑफिसर पदावर नियुक्ती केली आहे. आनंद वरदराजन हे आता जगभरात विस्तारलेल्या ‘स्टारबक्स’चे नेतृत्व करणार आहेत. 19 जानेवारी रोजी ते नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आनंद वरदराजन हे आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी असून त्यांनी पडर्यू विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून कॉम्प्युटर […]
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी सैन्यदलाच्या विविध पथकांचा सराव सध्या दिल्लीतील कर्तव्य पथवर सुरू आहे. दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी असून दाट धुके आणि वाढलेल्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सराव करणाऱया कोस्ट गार्डच्या जवानांनाही मास्क घालावा लागत आहे.
थोडक्यात बातम्या – 50 लाख तरुणांना सायबर प्रशिक्षित करणार
आयबीएमने 2030 पर्यंत हिंदुस्थानातील 50 लाख विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), सायबर सिक्युरिटी आणि क्वांटम कम्प्युटिंग या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले आहे. ही योजना आयबीएम स्किल्स बिल्ड या कार्यक्रमाद्वारे राबवली जाईल. याचा उद्देश प्रगत डिजिटल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. या उपक्रमांतर्गत आयबीएम शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक तसेच प्रशिक्षण संस्थांमध्ये एआय आणि नव्या तंत्रज्ञानाचे […]
मुंबई ते सॅन फ्रॅन्सिस्कोची थेट विमानसेवा बंद
एअर इंडियाने मुंबई आणि बंगळुरूवरून थेट सॅन फ्रान्सिस्कोला जाणारी विमान सेवा रद्द केली आहे. हा बदल 1 मार्चपासून लागू होईल. विमान तैनातीमधील अडचणी आणि हवाई क्षेत्रांतील प्रतिबंधामुळे वाढलेला खर्च यामुळे एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया आता दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को आणि टोरँटोला जाणारी उड्डाणे वाढवणार आहे. दिल्लीवरून आता आठवडय़ाला 10 उड्डाणे होतील. […]
वैष्णो देवी यात्रा 24 तासांत करा पूर्ण
नवीन वर्षाचे औचित्य साधून माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱया भाविकांसाठी माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाने काही नवे नियम लागू केले आहेत. आता भाविकांना रेडिओ फ्रेक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डीवाईस (आरएफआयडी) कार्ड जारी झाल्यानंतर वैष्णो देवीची यात्रा 10 तासांत सुरू करावी लागणार आहे. त्याचबरोबर ही यात्रा आता 24 तासांत पूर्ण करावी लागणार आहे. हे निर्देश तत्काळ लागू […]
केजरीवाल, सिसोदिया मुंबई पालिका निवडणूक प्रचारात उतरणार, आपची स्टार प्रचारकाची यादी जाहीर
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाने मुंबई पालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी नेते प्रचारासाठी मुंबईच्या मैदानात उतरणार आहेत. मुंबई पालिकेच्या सर्व 227 जागांवर आम आदमी पक्ष निवडणूक लढविणार आहे. पक्षाची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर 40 स्टार […]
ऑस्ट्रेलियात आरोपींनी घेतले बंदुकीचे प्रशिक्षण
ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर 14 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी न्यायालयात कागदपत्रे सादर झाली. त्यानुसार, या हल्ल्यातील आरोपी पिता-पुत्राने एका गावातील गुप्त ठिकाणी बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. 50 वर्षीय साजिद अक्रम आणि त्यांचा 24 वर्षीय मुलगा नवीद अक्रम यांचा एक व्हिडीओ सापडला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही विशेष प्रशिक्षण घेताना दिसतात.
दैवी मदत मिळाली आणि संघर्ष थांबला, पाकिस्तानी सेना प्रमुख आसिम मुनीर यांची उघड कबुली
पाकिस्तानी सेनाप्रमुख आसिम मुनीर यांनी ऑपरेशन सिंदुरठसंदर्भात केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र. दैवी मदत मिळाली आणि संघर्ष थांबला, असे मुनीर यांनी एका कार्यक्रमात सांगितले. एकीकडे हिंदुस्थानची लढाऊ विमाने पाडल्याचा दावा करणाऱया मुनीरने हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे किती नुकसान झाले, याची कबुली दिली आहे. मुनीर यांनी हे […]
निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतोय! ममता बॅनर्जी यांचा आरोप
मतदार यादी फेरपडताळणीच्या पहिल्या टप्प्यानंतर प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतून हजारो मतदारांची नावे गायब असल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे. ’निवडणूक आयोग भाजपच्या इशायावर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या बूथ पाथळीवरील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. एकाच मतदारसंघातील दुसऱ्या पत्त्यावर स्थलांतरीत झालेल्या मतदारांची व […]
रक्षक बनला भक्षक, वर्दीतल्या पोलिसाकडून गतिमंद महिलेचा विनयभंग
वर्दीतल्या पोलिसाने एका गतिमंद महिलेच्या असह्यतेचा गैरफायदा उचलत तिचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या मैदानात घडला. यावेळी मैदानात असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्या पोलिसाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ताडदेव पोलिसांनी त्या सहाय्यक फौजदाराला अटक केली. ताडदेव येथील साने गुरुजी मार्गावर भाऊसाहेब हिरे उद्यान आहे. सार्वजनिक मैदान असल्याने नागरिक […]
क्षणार्धात सगळेच थबकले; गिलला वगळल्याचा श्रीकांत यांनाही धक्का
टीम इंडियाची संघ निवड जाहीर होताच एकच प्रश्न हवेत घुमला… हे खरंच घडलंय का? टी-20 विश्वचषकापूर्वी हिंदुस्थानी संघातून उपकर्णधार शुभमन गिलला वगळण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. या निर्णयाने माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. श्रीकांत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, उपकर्णधारपद दिलेल्या खेळाडूला मोठय़ा स्पर्धेआधी बाहेर […]
जगज्जेतेपद हुकल्यावर क्रिकेट सोडणार होतो! रोहित शर्माकडून कबुली
‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार रोहित शर्माने एका कार्यक्रमात 2023च्या वन डे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतरची आपली मानसिक अवस्था उघड केली. त्या पराभवानंतर आपण पूर्णपणे तुटून गेलो होतो आणि क्रिकेट सोडण्याचाही विचार मनात आला होता, अशी कबुली रोहितने दिली. एका कार्यक्रमात रोहित म्हणाला, ‘2023च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये हरल्यानंतर मला वाटत होते की, आता बस्स झाले क्रिकेट. […]
टोमॅटोने भाव खाल्ला दिंडोरीत 56 रुपये किलो
अवकाळीसह सरासरीपेक्षा जास्त झालेल्या मोसमी पावसामुळे टोमॅटोचे नुकसान होऊन यंदा पूर्ण हंगाम उत्पादकांना आर्थिक अडचणीत ढकलणारा ठरला. मात्र, पावसाळ्याच्या शेवटी लागवड केलेला नवा टोमॅटो आता दिंडोरी बाजार समितीत दाखल झाला आहे. कमी आवकेमुळे तो चांगलाच तेजीत आला आहे. त्याला आज प्रतिकिलो 56 रुपये असा उच्चांकी भाव पुकारला गेल्याने उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत […]
नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित होतील असा कयास होता. परंतु या निवडणुकांच्या घोषणेला अजून पंधरा दिवस लागणार असल्याचे स्पष्ट झाले. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे काय करायचे या प्रश्नावर राज्य सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने निवडणुका 31 जानेवारीपूर्वी होणार का, असा संभ्रम निर्माण झाला आहे. […]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका आर्थिक – कार्यक्षेत्रात फायदा होणार आहे कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय […]
न्यूझीलंडचा विंडीजवर कसोटी मालिका विजय
जेकॉब डफी ‘मालिकावीर’, देवॉन कॉन्वे ‘सामनावीर’ वृत्तसंस्था / माऊंट माँगेनुई (न्यूझीलंड) यजमान न्यूझीलंडने विंडीज विरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात सोमवारी पाचव्या दिवशी न्यूझीलंडने विंडीजचा 323 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात 9 बळी मिळविणाऱ्या न्यूझीलंडच्या जेकॉब डफीला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले तर दोन्ही डावात [...]
भारताचा न्यूझीलंडशी मुक्त व्यापार करार
95 टक्के वस्तूंवर शुल्क कपात जाहीर, 5 वर्षांत दुप्पट व्यापार करण्याचे ध्येय ► वृत्तसंस्थानवी दिल्ली दीर्घ प्रतीक्षेनंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार करार झाला आहे. या ‘एफटीए’मुळे न्यूझीलंडच्या 95 टक्के वस्तूंवरील शुल्क कमी करण्यात आले आहेत. हा करार न्यूझीलंडसाठी 140 कोटी भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. या ऐतिहासिक कराराअंतर्गत, न्यूझीलंडच्या 95 टक्के [...]
प्रियकराच्या चित्रपटात काम करणार श्रद्धा
हुतात्मा पोलीस अधिकाऱ्यावर येणार चित्रपट श्रद्धा कपूर आगामी काळात प्रियकर राहुल मोदीच्या एका चित्रपटात काम करणार आहे. राहुल मोदी हा एक लेखक आणि फिल्ममेकर आहे. ‘ईथा’ चित्रपटानंतर ती राहुल मोदीच्या एका चित्रपटात दिसून येणार असून याची कहाणी स्टार्टअपच्या जगतावर आधारित असणार आहे. चित्रपटातील माझी भूमिका अत्यंत आव्हानात्मक असेल असे श्रद्धाचे सांगणे आहे. निर्माती म्हणून सुपर [...]
जीडीपी, महागाई मोजण्याची पद्धत बदलणार
सरकार नवी मालिका जारी करणार : सध्या 2011-12 च्या आधारावर आकडेवारीची गणना वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्र सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्याच्या निकषांमध्ये मोठे बदल करणार आहे. फेब्रुवारी 2026 पासून किरकोळ महागाई दर आणि विकासदर म्हणजेच जीडीपीची आकडेवारी नवीन मालिकेसह (नवी सीरिज) प्रसिद्ध केली जाणार आहे. तर मे महिन्यापासून औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची (आयआयपी) आकडेवारी देखील नवीन [...]
मलप्पुरममध्ये मुस्लीम लीगच्या कार्यालयावर हल्ला
माकपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल वृत्तसंस्था/ मलप्पुरम केरळच्या मलप्पुरममध्ये मुस्लीम लीगच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे. या हल्ल्याप्रकरणी माकपच्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा नेंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. स्थानिक निवडणुकीत यूडीएफ आघाडीने यश मिळविले होते. या विजयानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान हा हल्ला झाला. माकप कार्यकर्त्यांनी मुस्लीम लीगच्या कार्यालयावर लाठ्या आणि दगडांनी हल्ला केला, यामुळे [...]
मोहम्मद युनूसांकडून कट्टरवाद्यांना बळ : हसीना
बांगलादेशातील स्थिती धोकादायक : भारतविरोधी वक्तव्यांवर संताप वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बांगलादेशातील भारतविरोधी वातावरण आणि वक्तव्यांवरुन माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ही स्थिती अत्यंत धोकादायक असल्याची टिप्पणी केली आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कट्टरवादी शक्तींना बळ मिळाले असून हे लोक ईशान्य भारतावरुन धोकादायक वक्तव्यं करू लागले आहेत असे हसीना यांनी म्हटले आहे.अलिकडेच बांगलादेशच्या नॅशनल सिटिजन [...]
अरुणाचल हेरगिरीमध्ये पाकिस्तानी कनेक्शन
सीमावर्ती भागात चीनच्या हालचालींवरही करडी नजर वृत्तसंस्था/ इटानगर अरुणाचल प्रदेशात हेरगिरी नेटवर्क आणि सीमापार घुसखोरीसंबंधी कारवाया उघडकीस आल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. गेल्या 10 दिवसांत पोलिसांनी पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कच्या चार संशयितांना अटक केली आहे. याचदरम्यान, स्थानिकांनी वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) चिनी सैन्याची उपस्थिती आणि संभाव्य घुसखोरीची तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, [...]
बांगलादेशात आणखी एका हसिनाविरोधी नेत्यावर हल्ला
घरात घुसून गोळ्या घातल्या : प्रकृती गंभीर वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेशमध्ये शेख हसिनाविरोधी आणखी एका नेत्यावर हल्ला झाल्याने अजूनही वातावरण तप्त असलेले दिसत आहे. नॅशनल सिटीझन्स पार्टीचे (एनसीपी) नेते मोहम्मद मोतालेब शिकदार यांच्यावर सोमवारी दुपारी 12 वाजता खुलना येथील त्यांच्या घरात घुसून गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी मोतालेब यांच्या डोक्यावर थेट गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले [...]
स्वधर्माचे आचरण न करणाऱ्याचे जगणे निरर्थक होय
अध्याय तिसरा भगवंत अर्जुनाला म्हणाले, तू स्वधर्माचे आचरण कर. जो स्वधर्माचे आचरण करतो, त्याला काहीही बाधत नाही. स्वधर्मरूप यज्ञाच्या आचरणाने तुम्ही देवांचे पूजन केले असता देव तुमच्यावर प्रसन्न होतील, याप्रमाणे तुम्ही परस्परांना संतुष्ट करून आपले कल्याण करून घ्या. ह्या अर्थाचा रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देव ते । एकमेकास रक्षूनि पावा कल्याण सर्व हि ।। [...]
पंजाबमध्ये माजी ‘आयजीं’चा आत्महत्येचा प्रयत्न
स्वत:वर झाडली गोळी : 12 पानी सुसाईड नोट हस्तगत : 8.10 कोटींच्या ऑनलाइन फसवणुकीचा उल्लेख वृत्तसंस्था/ पटियाला पंजाबमधील माजी आयपीएस अधिकारी अमर सिंग चहल यांनी सोमवारी पटियाला येथे रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते ‘आयजी’ म्हणजेच पोलीस महानिरीक्षक पदावरून निवृत्त झाले होते. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून [...]
महवश करणार अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण
पंचायत सीरिजमधील ‘सचिव जी’ आता गुलाब हकीमच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. जितेंद्र कुमार यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘टेढी हैं पर मेरी हैं’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून यात महवश देखील दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रेमो डिसूजा करत असून जयेश प्रधान दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहे. चित्रपटात प्रेमाला हलक्या-फुलक्या शैलीत सादर करण्यात आले. या चित्रपटाला [...]
स्वबळाच्या चाचणीत महायुतीच विजयी
राज्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निकालात भाजपने 117 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 53 जागांवर विजय मिळवला. महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने 37 जागांवर विजय मिळवला, महायुतीतील तीनही पक्षाने या निवडणुका एकमेकांच्या विरोधात स्वबळावर लढवल्या. मात्र निकालानंतरचे यश मात्र महायुतीला मिळाले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीने महामुसंडी मारली तर [...]
वृत्तसंस्थना / रांची 2025-26 च्या क्रिकेट हंगामातील होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी झारखंड संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक आणि फलंदाज इशान किशनकडे सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 डिसेंबरपासून सुरू होणार असून झारखंडचा पहिला सामना अहमदाबाद येथे कर्नाटक विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी झारखंड क्रिकेट संघटनेने संघाची घोषणा केली आहे. झारखंड संघामध्ये कुमार कुशाग्रह, अंकुल रॉय, [...]
हुमायूं कबीरांकडून नवा पक्ष स्थापन
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढविण्याची तयारी वृत्तसंस्था/ कोलकाता पश्चिम बंगालच्या राजकारणात सोमवारी एक नवे नाव जोडले गेले आहे. तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी सोमवारी स्वत:च्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या या पक्षाचे नाव जनता उन्नयन पक्ष आहे. या पक्षाच्या राज्य समितीत 75 सदस्य असतील, ज्यात सुमारे 20 टक्के प्रतिनिधित्व हिंदू समुदायाचे असणार [...]
वृत्तसंस्था / चंदीगड भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल याची अलिकडेच द. आफ्रिकेच्या विरुद्धच्या मालिकांमध्ये खराब कामगिरी झाल्याने त्याला आगामी होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले. यानंतर आता गिलचे आगामी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पंजाब संघात पुनरागमन झाले आहे. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील पंजाबचा पहिला सामना 24 [...]
भारतात घुसण्याच्या तयारीत रोहिंग्या
बांगलादेश हिंसेच्या आड मोठ्या कटाचा सुगावा : वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेश सध्या मोठी उलथापालथ आणि हिंसेच्या काळाला सामोरा जातोय. राजधानी ढाकासमवेत देशाच्या मोठ्या हिस्स्यामध्ये कायदा-सुव्यवस्था कोलमडून गेली आहे. बांगलादेशात फैलावलेल्या अव्यवस्थेमुळे भारतासाठी अनेक चिंता उभ्या ठाकल्या आहेत. यातील सर्वात मोठी चिंता रोहिंग्यांवरून आहे. बांगलादेशातील वर्तमान स्थितीचा लाभ घेत रोहिंग्या भारतात घुसखोरी करू शकतात असे गुप्तचर सूत्रांचे [...]
ट्रम्प यांच्या विदेश धोरणात मोठा फेरबदल
अमेरिकेने 29 देशांमधून परत बोलाविले स्वत:चे राजदूत वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 अनुभवी राजदूतांना त्यांच्या पदावरून हटवत परत बोलाविले आहे. या राजदूतांची नियुक्ती जो बिडेन यांच्या प्रशासनाच्या काळात झाली होती. ट्रम्प प्रशासनाच्या या पावलाकडे विदेश धोरणात मोठ्या बदलाची तयारी म्हणून पाहिले जातेय.अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट प्राथमिकतांचे पूर्णपणे समर्थन करणाऱ्या राजदूत [...]
पाक युवा संघाला 1 कोटींचे बक्षीस
वृत्तसंस्था / कराची नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताचा 191 धावांनी दणदणीत पराभव करुन अजिंक्यपद मिळविणाऱ्या पाकच्या युवा संघाला पंतप्रधान शहाबाज शरीफने 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विजेत्या पाक युवा संघाचे इस्लामाबादमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पाकमधील क्रिकेट शौकिन या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित [...]
मुंबई : धातू क्षेत्रातला समभाग हिंदुस्थान झिंक गेल्या महिन्याभरापासून चांगलीच तेजी कमावताना दिसतो आहे. सोमवारीदेखील हा समभाग 3 टक्के वाढला होता. गेल्या महिन्याभरात पाहता या समभागाने गुंतवणुकदारांना 25टक्के इतका परतावा दिला आहे. याच दरम्यान चांदीने दरामध्ये 2 लाख 14 हजार 583 रुपयाचा नवा विक्रमी टप्पा सोमवारी प्राप्त केला. सोमवार हिंदुस्थान झिंकचा समभाग 3.3 टक्के वाढत [...]
मानवी अवयवांनी सजविले होते सायको किलरचे घर
कवटीला पात्रांचे स्वरुप : हाडांची पुष्पदाणी मानवी कवटींनी तयार केलेले पात्र, खुर्चींच्या सीट्सवर फैलावलेली मानवी त्वचा आणि एखाद्या मानवी चेहऱ्याच्या त्वचेने सजलेले लॅम्प कवर असे दृश्य पोलिसांना एका मारेकऱ्याच्या घरात शिरल्यावर दिसून आले होते. अमेरिकेच्या विस्कॉन्सिनच्या वुशारा काउंटी येथील प्लेनफील्ड गावात राहणाऱ्या सायको किलरची ही कहाणी आहे. त्याला ‘फ्लेनफील्डचा कसाई’ असेही म्हटले जाते. त्याचे नाव [...]
फॉक्सकॉनकडून 30 हजार उमेदवारांची भरती
नवी दिल्ली : आयफोन निर्मिती करणारी कंत्राटदार कंपनी फॉक्सकॉनने अलिकडेच आपल्या कारखान्यामध्ये 30 हजार नव्या उमेदवारांना सामावून घेतले आहे. यामध्ये विशेष म्हणजे 80 टक्के उमेदवार या महिला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. बेंगळूर जवळच्या देवनहळ्ळी येथे असलेल्या आपल्या आयफोन निर्मितीच्या कारखान्यामध्ये नव्याने 30 हजार जणांना सामावून घेतले आहे. ही भरती गेल्या 9 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने यशस्वीरित्या [...]
आजचे भविष्य मंगळवार दि. 23 डिसेंबर 2025
मेष: येणारा काळ खूप चांगला आहे, उल्हसित राहा वृषभ: ध्यानधारणा व योगाद्वारे शांती मिळेल, आनंदी वातावरण मिथुन: गुंतवणुकीपासून सावध, घरी पाहुण्यांची रेलचेल कर्क: आर्थिक आघाडीवरील सुधारणा प्रलंबित देणी देण्यास योग्य सिंह: कौटुंबिक जबाबदाऱ्या, मनावर दडपण, मैत्री होईल कन्या: रागावर नियंत्रण ठेवा, कार्यालयात गोडीने वागा. तुळ: देणेदारांकडून वसुली, योजना अंतिम स्वरूपा साकारतील वृश्चिक: उच्च बौद्धिक क्षमतेमुळे [...]
मला मंत्रीपद नाकारण्यात आले त्याची नाराजी माझ्यात नव्हे, तर येथील जनतेत आहे. मंत्रीपद येते आणि जाते. मुख्यमंत्रीपदही येणार आणि जाणारही आहे. पर्मनंट कुणीही नाही. मुख्यमंत्रीपद असो वा मंत्रीपद, काहीच शाश्वत नसते, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिह्यातील पक्षांतर्गत राजकारणावरून मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांना लगावला. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत चंद्रपूर जिह्यात […]
शिवसेना-मनसे युतीची घोषणा धूमधडाक्यात होणार!
मुंबई, महाराष्ट्रासह तमाम मराठी माणसाचे लक्ष शिवसेना-मनसे युतीच्या घोषणेकडे लागले आहे. मुंबईचे अस्तित्व आणि मराठी अस्मिता टिकवण्यासाठी ही युती होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या युतीची घोषणा धूमधडाक्यात आणि वाजतगाजत होणार आहे. हा क्षण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि […]
महापालिकेचा रणसंग्राम, आजपासून उमेदवारी अर्ज
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी लगबग सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले असून उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज […]
हद्दपार करण्यात आलेला विनाशकारी प्रकल्प कोकणात लोटे येथे आणण्यात आला आहे. आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असलेला हा रासायनिक प्रकल्प रत्नागिरीच्या लोटे परशुराम एमआयडीसीत सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्गसौंदर्याबरोबरच तेथील जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या विवा लाइफसायन्सेस या उप कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाची पाळेमुळे इटलीमध्ये आहेत. मायटेनी […]
सामना अग्रलेख –चोरलेल्या धनुष्यबाणाचे पुण्य!
मिंधे म्हणतात, ‘‘आता माझीच शिवसेना खरी!’’ काय खरे आणि काय खोटे, हे राज्यातील सामान्य जनता ओळखून आहे. ज्यांनी आपला विजय मोदी-शहांच्या चरणी अर्पण केला त्या चोरांच्या तोंडी ‘शिवसेना’ हे पवित्र नाव शोभत नाही. याच मोदी-शहांनी धनुष्यबाण चोरला आणि महाराष्ट्रातील अट्टल बेइमानांच्या हाती सोपवला. आता हे अट्टल म्हणत आहेत की, ‘‘आम्हीच खरे!’’ लोकसभा, विधानसभा व नगरपालिका […]
शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप करणाऱया भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पितळ नुकत्याच पार पडलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीत उघडे पडले. या निवडणुकीतील उमेदवारांमध्ये 70 उमेदवार घराणेशाहीतील होते. विद्यमान आमदारांच्या आई, पत्नी, मुले, सुना आणि भावजयींचा त्यात समावेश होता. 70पैकी सर्वाधिक 67 टक्के उमेदवार महायुतीचे होते. त्यातही भाजपचे 42 टक्के उमेदवार होते. त्यामुळे भाजपा केवळ […]
मुद्दा –निवडणुकीच्या बाजारात इमानदारीचा लिलाव
>> अजित कवटकर जिथून नोट मिळणार, तिथे इमान झुकणार. आजच्या राजकारणातील विचारधारा याच कार्यपद्धतीवर चालते. एकनिष्ठता, समर्पण, प्रामाणिकपणा वगैरेसारखी तत्त्वे आता संपली आहेत. हे इतके ‘नॉर्मल’ झाले आहे की, दर काही वर्षांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर करण्याची प्रथा पडली आहे. नेता गेला की, तो सोबतच्या कार्यकर्त्यांना आपसूकच स्वतःबरोबर फरफटत नेत असतो. जसा नेता आपली सोय बघतो, […]
लेख –ट्रम्प यांच्या ‘सी 5’ सुपर क्लबमागे दडलंय काय?
>> सनत्कुमार कोल्हटकर sanat.kolhatkar@gmail.com डोनाल्ड ट्रम्प यांचे सुपुत्र ट्रम्प (ज्युनियर) यांनी नुकतेच दोहा, कतारमध्ये आर्थिक परिसंवादामध्ये भाग घेताना युक्रेन-रशिया युद्धाबद्दल एक लक्षवेधी विधान केले होते. ते म्हणाले होते, युक्रेन-रशिया युद्धात प्रत्येक वेळी अमेरिका एकटय़ाने युक्रेनचा संरक्षण खर्च उचलते आहे, पण यापुढील काळात अमेरिका हा आर्थिक भार उचलणार नाही. अमेरिका या युद्धापासून स्वतःला दूर ठेवू […]
मुंबईत पाच दिवस थंडीचे!आठ जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा
मुंबईत पुढील पाच दिवस तापमान सरासरी 14 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याने गारठा वाढणार आहे. राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली असून आठ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘थंडीच्या लाटे’चा इशारा दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती मुंबई हवामान विभागाच्या सुष्मा नायर यांनी दिली. मुंबईसह दोन्ही उपनगरांत गेल्या दोन दिवसांपासून पहाटे […]
कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, आमदारकी वाचली
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटणारे अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या दोषसिद्धीला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कोकाटेंच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस जारी केली. सुनावणी पूर्ण होईपर्यंत आमदार अपात्रता लागू होणार नाही. तथापि, कोकाटे हे कोणत्याही लाभाच्या पदावर राहू शकणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे कोकाटे यांच्या आमदारकीवरील संकट […]
डॉक्टरची रुग्णाला बेदम मारहाण, शिमला येथील रुग्णालयातील धक्कादायक घटना
रिकाम्या पलंगावर आराम करणाऱया रुग्णाला डॉक्टरने ‘तू’ म्हणून बोलल्यावरून झालेल्या वादातून दोघांमध्ये वॉर्डमध्येच हाणामारी झाली. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी करत रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र निदर्शने केली. अर्जुन पंवार हे रुग्णालयात आज सकाळी एंडोस्कोपीसाठी गेले होते. […]
सोनिया व राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाची नोटीस, नॅशनल हेराल्ड प्रकरण
नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केलेल्या आव्हान याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लॉण्डरिंग झाल्याचा दावा करत ईडीने सोनिया व राहुल गांधी यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. दिल्लीच्या […]
हुमायूं कबीर यांनी केली नव्या पक्षाची स्थापना, प्रतिबाबरीची पायाभरणी करणाऱ्या
पश्चिम बंगालमध्ये ‘प्रतिबाबरी’ उभारण्याची घोषणा करणारे तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. जनता उन्नयन पार्टी असे या पक्षाचे नाव आहे. कबीर यांनी स्वतः आज याची माहिती दिली. त्यांचा पक्ष पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढणार असून अल्पसंख्याकांचे वर्चस्व असलेल्या काही जागांवरील उमेदवारांची घोषणाही कबीर यांनी केली आहे. हुमायूं […]
मेल-एक्सप्रेसच्या तिकीट दरवाढीमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दरवाढीला तीव्र विरोध केला जात आहे. कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर दरवाढीचा भुर्दंड लादू नका, आधीपासून अन्यायकारक पद्धतीने आकारला जाणारा 40 टक्के अंतराचा अधिभार तातडीने रद्द करा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. देशातील इतर प्रवाशांच्या तुलनेत कोकण […]
‘जर-तरची गोष्ट’चे दिग्दर्शक रणजीत पाटील यांचे निधन
‘जर-तरची गोष्ट’ या नाटकाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेते रणजीत पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, रणजीत यांच्यावर कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. रणजीत यांच्या निधनामुळे मराठी कलाकार आणि अनेक रंगकर्मींनी हळहळ व्यक्त करत युवा कलाकारांचा भक्कम आधारस्तंभ हरपल्याचे म्हटले आहे. गेल्या […]
ट्रेंड –मॉलच्या मधोमध बसून तरूणीला प्रपोज केले अन्…
गाझियाबादच्या गौर सेंट्रल मॉलमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेहमीप्रमाणे गजबजलेला मॉल, लोकांची ये-जा सुरू असतानाच अचानक एक तरुण मॉलच्या मधोमध आपल्या प्रेयसीसमोर गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करतो. मुलगी तरुणाला होकार देते आणि तेवढय़ात तो तरुण खिशातून कुंकू काढतो. मग काही क्षणांतच तो तिच्या कपाळावरील भांगात कुंकू भरतो आणि गळ्यात मंगळसूत्रही […]
भारतीय महिलांचा श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी-20 सामना आज
वृत्तसंस्था/ विशाखापट्टमण भारतीय महिला क्रिकेट संघ आज मंगळवारी येथे श्रीलंकेविऊद्धच्या दुसऱ्या महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानात उतरताना आपल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावण्याचा आणि पहिल्या सामन्यातील सर्वसमावेशक विजयाने मिळालेली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. गेल्या महिन्यात ऐतिहासिक विश्वचषक विजेतेपदानंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना हरमनप्रीत कौरच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध आठ गडी राखून मिळवलेल्या विजयादरम्यान फलंदाजी आणि गोलंदाजी विभागात [...]
विश्वचषक टी-20 स्पर्धेसाठी नेपाळची घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने 2026 च्या 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आगामी प्रशिक्षण शिबिरासाठी 24 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. दरम्यान या शिबिरानंतर नेपाळचा 15 सदस्यांचा संघ घोषित केला जाणार आहे. भारताने यापूर्वीच सदर स्पर्धेसाठी 15 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. गेल्या सप्टेंबर,ऑक्टोबर दरम्यान झालेल्या [...]
95 ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मिशन बंधारे मोहीम, 500 पेक्षा अधिक बंधारे बांधण्याचे नियोजन
मिशन बंधारे उपक्रमातंर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून तालुकास्तरावर एकाच दिवशी २३ डिसेंबर २०२५ रोजी ९५ ग्रामपंचायतीमध्ये मिशन बंधारे मोहीम राबविण्यात येणार आहे. एकाच दिवशी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमध्ये विजय, वनराई, कच्चे बंधारे बांधले जाणार आहेत. जवळपास ५०० पेक्षा अधिक बंधारे बांधण्याचे नियोजन असून, मिशन बंधारे मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गट विकास अधिकारी चेतन शेळके यांनी […]
महापालिका हिंमतीने लढेल व जिंकेल, संपर्कप्रमुख बबनराव थोरातांचा विश्वास
पक्ष फुटीनंतर शिवसैनिकांनी मेहनत करुन लोकांना साथ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामान्य माणसे शिवसेनेसोबत जोडली गेली असून, त्याचाच प्रत्यय या निवडणुकीत आला असून, या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एक नगराध्यक्ष, 14 नगरसेवक व चार शिवसेना पुरस्कृत अशा एकूण १८ जागेवर विजय मिळविला असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते तथा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी सोमवार दि. […]
Photo – IIT पवईमध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीचा टेक फेस्ट सुरू
आयआयटी पवई येथे विद्यार्थ्यांच्या आवडीचा बहुप्रतीक्षित टेक फेस्ट आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. (सर्व फोटो – रुपेश जाधव) या टेक फेस्टमध्ये हिंदुस्थानासह परदेशातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे आणि नाविन्यपूर्ण विचारांचे दर्शन घडवणारे अत्याधुनिक प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. फेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले रोबोट, रोबोटिक गाड्या, स्वयंचलित यंत्रसामग्री तसेच […]
अजित पवार गटाला महापालिकेसाठी मिळेनात उमेदवार, भाजपने टाकल्याने पवारांची तारेवरची कसरत
भाजपने पुण्यात महापालिका निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती तोडत मैत्रिपुर्ण लढतीची घोषणा करत अजित पवार गटाला सुरूंग लावला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला अनेक प्रभागांसाठी उमेदवार मिळत नसल्याचे मुलाखतींमधून समोर आले आहे. त्यामुळे अजित पवारांची सत्तेसाठी धडपड सुरू असून काँग्रेसला आघाडीसाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा जोर धरत आहे. अजित पवार गटाकडून पालिकेसाठी इच्छुकांकडून अर्ज […]
शार्दुल ठाकूर झाला बाबा…पोस्ट शेअर करत दिली मुलाच्या जन्माची गुड न्यूज
टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर हा बाबा झाला आहे शार्दुलची पत्नी मितालीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. शार्दुलने एक पोस्ट शेअर करत त्याला मुलगा झाल्याची गुड न्यूज दिली आहे. View this post on Instagram A post shared by Shardul Thakur (@shardul_thakur) शार्दुल ठाकूर व मिताली पारूलकर यांनी 27 फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न […]
Ratnagiri News –जिल्ह्यात 47 हजार लाडक्या बहिणी अपात्र; दोन महिने हफ्ताच मिळाला नाही
लाडकी बहीण योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार लाडक्या बहिणींची नावे छाननीनंतर कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. लाडक्या बहिणींना गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता अजूनही मिळालेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. मात्र सत्तेवर येताच या योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी […]
भाजपशासित राज्यांमध्ये SC-ST विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ, उत्तर प्रदेश आघाडीवर
देशात अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्याविरोधातील अत्याचारांच्या प्रकरणांत सातत्याने वाढ होत असून, न्यायालयांत निपटारा मात्र संथ गतीने होत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्यूरोच्या (एनसीआरबी) २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपा शासित राज्यांत अशा प्रकरणांची संख्या सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेत एका खासदाराच्या […]
राज्यातील उद्योगांना महावितरणच्या ऑनलाइन ‘स्वागत सेल’ पोर्टलने नवी ऊर्जा
लातूर (प्रतिनिधी)- राज्यातील ४ लाख ४८ हजार उच्चदाब व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांना महावितरणकडून जागतिक दर्जाची तत्पर वीजसेवा देण्याची प्रक्रिया ऑनलाइन ‘स्वागत सेल’ पोर्टलमुळे अतिशय पारदर्शक व वेगवान झाली आहे. उद्योगांना वाढीव वीजभाराच्या मागणीनुसार सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होण्यासोबतच विविध प्रश्न व तक्रारी सोडविण्याचा वेगही वाढला आहे. यासह महावितरणसोबतच २४x७ थेट संवाद साधण्यासाठी या पोर्टलद्वारे राज्यातील २७८ औद्योगिक संघटना ‘कनेक्टेड’ झाल्या आहेत. दरम्यान ऑनलाइन पोर्टलसह औद्योगिक संघटना व वीज ग्राहकांसोबत स्थानिक अधिकाऱ्यांच्या बैठकांसह महावितरणच्या थेट मुख्यालयातून संचालक व कार्यकारी संचालक स्तरावर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वतंत्र बैठका घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे वीजपुरवठा, नवीन वीजजोडणी, बिलिंग व इतर मुद्द्यांबाबत औद्योगिक संघटना व ग्राहकांनी मांडलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी महावितरणने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल (Action Taken Report) माहितीसाठी या पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. आतापर्यंत १२४ कार्यपूर्ती अहवाल अपलोड करण्यात आले आहेत. पोर्टलद्वारे व बैठकांमध्ये प्राप्त झालेल्या विविध २४२ पैकी २१५ तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात आले तर ऊर्वरित २७ प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन वीजयंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरु आहे. महावितरणकडून औद्योगिक वर्गवारीत लघु व उच्चदाबाच्या दरवर्षी सुमारे २३ हजारांवर नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. सद्यस्थितीत औद्योगिक ग्राहकांचा एकूण वीजवापरात ४३ टक्के तर महसुलात ४१ टक्के वाटा आहे. राज्यातील औद्योगिक ग्राहकांना थेट संवादासाठी, विविध प्रश्न मांडण्यासाठी तसेच प्रश्नांचे पारदर्शक पद्धतीने व तत्पर निराकरण करण्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्याची सूचना मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानुसार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने औद्योगिक ग्राहक व संघटनांसाठी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्र ‘स्वागत सेल’ पोर्टल कार्यान्वित केले आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- निवडणुक निर्णय अधिकारी, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व त्यानंतर सुप्रीम कोर्ट अशी न्यायालयीन लढाई जिकंलेल्या भाजपचे शहराध्यक्ष अमित दिलीपराव शिंदे यांचा जनतेच्या दरबारात सुद्धा विक्रमी मतांनी विजय झाला आहे. तब्बल 932 मतांच्या फरकाने अमित दिलीपराव शिंदे हे नगरसेवक पदी निवडुन आले आहेत. ते पुन्हा एकदा 'वन साईड'निवडुन येणारे नगरसेवक ठरले आहेत. शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, न्यायालयात शिंदे यांचा विजय झाला त्याचं प्रमाणे जनतेच्या दरबारात सुद्धा त्यांचा विजय झाला. प्रकरण कोर्टात गेल्याने शिंदे यांच्या जागेसाठी 20 डिसेंबरला मतदान झाले, त्यांच्या विरोधात सगळे एकवटले होते मात्र विरोधक तोंडावर पडले. शिंदे यांना 1984 मते तर प्रतिस्पर्धी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कृष्णा पंडित मुंडे यांना 1052 मते पडली. शिंदे यांच्या प्रभागात भाजपच्या आकांक्षा आकाश वाघमारे यांचा सुद्धा विजय झाला. माझा हा विजय सामान्य जनतेचा व त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा आहे. सुप्रीम कोर्टात जसा विजय झाला तसाच जनतेच्या दरबारात सुद्धा विजय झाला हा द्विगुणित करणारा आनंद आहे. मी आजवर जे समाज कार्य करीत आलो ते यापुढेही करीन. मी जनतेचा प्रतिनिधी म्हणुन प्रभागासह शहरात विविध उपक्रम राबवून एक आदर्श प्रभाग निर्माण करण्यास प्राधान्य देईल. मी सर्व मतदार, कार्यकर्ते, हितचिंतक यांचा आभारी व ऋणी आहे अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. नगर परिषद निवडणुकीपुर्वी अमित दिलीपराव शिंदे यांची भाजप शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आल्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. शिंदे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, सुजितसिंह ठाकुर,जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता व पक्ष बांधणी करीत युवकांची मोट बांधली व नगर परिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले. धाराशिव नगर परिषदेत भाजपने एकहाती स्पष्ट बहुमत मिळवल्याने शहराध्यक्ष अमित दिलीपराव शिंदे यांची उपाध्यक्ष पदी निवड करावी अशी मागणी नगरसेवक व त्यांच्या समर्थकाकडुन व्यक्त होत आहे. शिंदे यांना 3 टर्म नगरसेवक पदाचा प्रदीर्घ अनुभव असुन त्यांनी नगराध्यक्ष पदासह अन्य जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडली आहे. पक्ष संघटन, शहरातील समस्याची जाण व अनुभव यामुळे ते उपाध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार आहेत.
निधी देणाऱ्या आमदारांना धोका दिला ते जनतेलाही धोकाच देतील- मा. आ. ठाकूर , मा. आ. मोटे
भूम (प्रतिनिधी)- विविध पक्षाच्या मंत्री आणि आमदाराकडून वेळोवेळी दिशाभूल करून निधी आणणाऱ्यानी विरोधकाचा एक जरी नगरसेवक निवडून आला तरी राजीनामा देणार असल्याची वलगणा करणाऱ्यांनी 14 नगरसेवक निवडून आल्यामुळे पदाचा राजीनामा द्यावा. असे आवाहन भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांनी नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी बोलताना केले. सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 भूम नगर पालिकेच्या जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नूतन 14 नगरसेवकांचा सत्कार भाजपच्या कार्यालयात करण्यात आला, यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकुर , माजी आमदार राहुल मोटे, माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, भाजपाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सत्वशीला थोरात, यशवंतराव थोरात, दिलीप शाळू महाराज, सिताराम वनवेसर, महादेव वडेकर, सौ शामलताई क्षिरसागर, ॲड अमृता गाढवे , बाजार समिती संचालक विकास जालन महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी भाजपचे मा.आ. सुजितसिंह ठाकूर, रा. काँ. मा. आ. राहुल मोटे यांनी अल्पमतांनी निवडून आलेल्या नेत्यांवर नाव न घेता आरोप प्रत्यारोपाची मोठी सरबती केली, यावेळी त्यांनी जनतेला जाहीर सभेत दिलेला शब्द पाळावा, विरोधकांचे एकही उमेदवार नगरसेवक निवडून येणार नाहीत, एक जरी निवडून आला तर राजीनामा देऊ असे जाहीर केले होते, आज 14 नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असे आवाहन केले . ज्यांनी वेळोवेळी विकास निधी दिला त्या एकाही आमदारा बरोबर राहिला नाही, प्रत्येका बरोबर धोकेबाजी केली. ते जनतेलाही धोकाच देतात, म्हणूनच जनतेने यावेळेस जनशक्ती नगर विकास आघाडीलाच कौल दिल्याचं आवर्जून सांगितलं . यावेळी जनशक्ती नगर विकास आघाडीचे नगसेवक चंद्रमणी गोरख गायकवाड, शमशाद हरून मुजावर , शितल अमोल गाडे, रुपेश परमेश्वर शेंडगे, चंद्रकला हरिश्चंद्र पवार, नवनाथ विलास रोकडे , लक्ष्मी प्रशांत साठे आबासाहेब धोंडीराम मस्कर, नूरजहा मोहम्मद ईसार मणियार , अनिल नामदेव शेंडगे, विठ्ठल महादेव बागडे, सुनिता गणेश वीर, सुरेखा दत्ता काळे, रामराजे बाळू कुंभार यांचा सत्कार केला. दरम्यान नगरसेवक पदासाठी अल्प मतानी हुलकावणी मिळालेल्या सुनिता साठे, तानाजी साबळे, प्रेमानंद महाजन, मनिषा नाईकवाडी, राणी यादव, वाहेद कुरेशी यांचाही सन्मान केला. कार्यक्रमासाठी भाजपचे शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, प्रभाकर शेंडगे, सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे, शुभम खामकर, संदीप खामकर, हेमंत देशमूख, बापू बगाडे, आदींनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर खामकर यांनी केले तर आभार भाजप ता. अध्यक्ष संतोष सुपेकर यांनी मांनले.
डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंती वर्षानिमित्त विशेष व्याख्यान संपन्न
कळंब (प्रतिनिधी)- शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब ,आयक्यूएसी विभाग व श्री.शिवाजी शिक्षण संस्था,द्वारा संचालित महात्मा फुले कला,वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय,वरुड जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठिक 10:00 वा. 'क्रांतीदर्शी डॉ.पंजाबराव देशमुख यांची समग्र क्रांती व भारतीय संविधानातील योगदान'या विषयावर व्याख्यानाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले होते. प्रथम कार्यक्रमाची सुरवात कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.डॉ.राजेश मिरगे(संत साहित्य व शिवचरित्र अभ्यासक,श्री.शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती) मा.प्रा.डॉ.दिलीप हांडे (प्राचार्य,महात्मा फुले कला वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरूड) संस्थेचे सहसचिव प्रा. संजयजी घुले,कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष मा.प्रा.डॉ. हनुमंत माने (प्राचार्य, छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब)प्रा.कदम सर, आयक्युएसीसमन्वयक डॉ. अनिल जगताप व रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. मनिषा कळसकर या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख व संस्थेचे संस्थापक कै. नरसिंग (आण्णा)जाधव यांच्या प्रतिमांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा यशोचित सत्कार महाविद्यालयाच्या वतीन करण्यात आला.महात्मा फुले कला,वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रा. डॉ.दिलीप हांडे यानी त्यांच्या महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सहसचिव प्रा.संजयजी घुले व प्राचार्य. डॉ.हनुमंत माने याना डॉ. पंजाबराय देशमुख यांची प्रतिमा व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.राजेश मिरगे यानी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या राजकीय,सामाजिक,कृषि तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यांचे तसेच त्यांचे विचार या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य.डॉ.दिलीप हांडे यानी केले.त्यानी या कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी प्रास्ताविक केले. कार्यकमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.हनुमंत माने यांनी केला.सुंदर असे सुत्रसंचालन प्रा.मनिषा कळसकर यानी केले.आभार प्रा.राजाभाऊ चोरघडे यानी मानले.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मतमोजणी केंद्रावर पत्रकारांची कोंडी!
तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील मतमोजणीच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याची जाणीव करून देण्याऐवजी, प्रशासनाने जणू अडथळ्यांचीच भिंत उभी केली. तुळजापूर येथे मतमोजणीचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना एका वरिष्ठ अधिकाऱ्यां ने केंद्र प्रवेशद्वारावर थांबवले थांबा तुम्हाला पुन्हा सोडतो म्हटले, अधिकृत ओळखपत्रे असतानाही अनेक पत्रकारांना गेटबाहेर रोखून ठेवण्यात आले. या गोंधळामुळे प्रत्यक्ष घडामोडींपेक्षा अंदाजावर बातम्या देण्याची वेळ पत्रकारांवर आली. निवडणूक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेमधील समन्वयाचा अभाव उघड झाला आणि त्याची किंमत माध्यमांना मोजावी लागली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी असा दुजाभाव करणारा हा प्रकार म्हणजे बेफिकीर वृत्तीचे जिवंत उदाहरण आहे. भविष्यात तरी माध्यमांसाठी योग्य नियोजन होणार का? असा सवाल आता उपस्थित होतोय.
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे घवघवीत यश;
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दमदार कामगिरी करत एकूण आठ नगरसेवक विजयी केले आहेत. या निकालामुळे धाराशिव शहरातील जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर आपला ठाम विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पक्षाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत प्रभाग क्रमांक 1 ब : निसाबी मसुद कुरेशी, प्रभाग क्रमांक 9 अ : रूपाली सुनील आंबेकर, प्रभाग क्रमांक 14 अ व ब: अर्चना विशाल शिंगाडे व आयाज उर्फ बबलू शेख, प्रभाग क्रमांक 16 अ व ब: शकुंतला अशोक देवकते व खालील गफूर कुरेशी, प्रभाग क्रमांक 17 व 18 अ व ब : इस्माईल बाबासाहेब शेख व काझी शमीम बेगम, तसेच या निवडणुकीत खलिफा कुरेशी यांनी अत्यंत प्रभावी व लढाऊ प्रचार करत 18 हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. या यशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या धाराशिव शहरातील मतदारांचे मनःपूर्वक आभार त्यांनी व्यक्त केले. या निवडणूक निकालामुळे आगामी काळात धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वासही डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळा, स्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- नगरोत्थान योजनेतून मंजूर धाराशिव शहरातील रस्ते व नालीच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शहरातील रस्त्यांच्या कामांना देण्यात आलेली स्थगिती आता रद्द करण्यात आली आहे त्यामुळे 59 रस्त्यांची आणि नाल्यांची कामे आता युद्धपातळीवर सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. धाराशिव शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल 117 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील 59 रस्ते व नाल्यांची कामे करण्यात येणार आहेत. निधी मंजूर झाला आता कामे सुरू झाली. तर आपली अकार्यक्षमता जनतेसमोर येईल या भीतीने जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या कामाला आडकाठी आण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यासाठी त्यांनी अनेक हातखंडे वापरत हा विषय अनेक महिने प्रलंबित ठेवला. मात्र आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला अनुसरून सदर कामांसाठी धाराशिव नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यारंभ आदेश जारी केले होते. त्यानुसार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ देखील झाला. मात्र, पालकमंत्री यांच्या कडे काही नागरिक व जनप्रतिनिधींनी निवेदन सादर केले होते.या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर मा. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दूरध्वनीद्वारे सदर कामांना स्थगिती दिली. त्या पत्रात सादर केलेल्या मुद्द्यांची सत्यता तपासण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 4 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सचिवांच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेची सखोल तपासणी करण्यात आली असता, संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध व पारदर्शक रितीने पार पडल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, यावर देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली होती व शहरातील रस्ते कामांचा देण्यात आलेली स्थगिती रद्द झाल्याचा निर्णय चार नोव्हेंबर रोजीच झाला होता. मात्र त्या कालावधीत जिल्ह्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे स्थगिती रद्द होऊनही कामाला सुरुवात करता आली नाही. आता आज स्थगित रद्द झाल्याचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेली नागरिकाची हेळसांड आणि गैरसोय आता दूर होणार आहे. रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आता कोणतीही आडकाठी येणार नाही. पालिका निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी भाजपाला भरभरून कौल दिल्यानंतर लगेच ही आनंदाची वार्ता आली आहे. त्यामुळे उद्यापासून कामाला सुरुवात होणार असून औपचारिक शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नंतर केला जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
एमआयएम उमेदवाराचा पराभव करून भाजपचे नगराध्यक्ष विजयी
नळदुर्ग (ंप्रतिनिधी)- नळदुर्ग पालिकेच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचे बसवराज धरणे यांनी एम आय एम चे उमेदवार शहबाज काझी यांचा पराभव करून विजय मिळवून पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपाचा झेंडा फडकवलाफ दरम्यान या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हायझाक केलेले अशोक जगदाळे हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने ही निवडणूक काँग्रेस साठी आत्मचिंतन करणारी ठरली आहे, तर अशोक जगदाळे यांनी काँग्रेस मध्ये पक्ष करून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविली असली तरी या निमित्ताने जगदाळे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नाराज झालेले शहबाज काझी यांनी एम आय एम चा रस्ता निवडल्यामुळे शहरात एम आय एम चा शिरकाव झाला, दरम्यान निवडणुकीत नगरसेवकाच्या निवडणुकीत फारसा प्रभाव दिसला नसला तरी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एम आय एम चे उमेदवार शहबाज काझी हे केवळ 420.मतांनी पराभूत झाले असल्याने त्यांनी सगळ्यांनाच मोठा हादरा दिला आहे, तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि नितीन काळे यांनी योग्य रीतीने प्रचाराची धुरा सांभाळत केवळ कोणावरती टीका न करता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग मध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि पुढे करण्यात येणारे विकास कामे यावर भर देत मतदारांपुढे जाऊन मते मागितल्या मुळे या निवडणुकीत भाजपला व शिंदे सेनेला पालिका ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे, दरम्यान काँग्रेस चे उमेदवार अशोक जगदाळे यांना सन 2016 ते 2021 या कालावधी मध्ये त्यांना नळदुर्ग पालिकेची एक हाती सत्ता दिली होती पण त्या कालावधी मध्ये शहरात काय विकास कामे झाली याचा नागरिकांनी विचार करून आणि दोन महिन्यांनी केवळ सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय सण या दिवशीच नगराध्यक्ष मुंबई हून येत असल्याने पुन्हा तीच परिस्थिती निर्माण करायची नाही असा ही विचार मतदारांनी केला, त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस तीन नंबर ला गेली, तर नव्याने एम आय एम ने शिरकाव केलेल्या पक्षाला मुस्लिम समाजाने पाठबळ दिले असल्याने काँग्रेस चे अशोक जगदाळे यांची जी मुस्लिम मतदारांची भिस्त होती ती पूर्ण तुटली आणि केवळ हजार बाराशे मुस्लिम मतावरच समाधान मानावे लागल्याने अशोक जगदाळे यांना तिसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे. जगदाळे यांचे पहिले पासूनच राजकीय गणित चुकीचे होत गेल्याने आणि शेवटच्या क्षणी उमेदवारी देताना घाई गडबड ही त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली असल्याची चर्चा ही जोर धरू लागली आहे, शिवाय काँग्रेसचे या निवडणुकीत जगदाळे यांच्या नेतृत्वात 9 नगरसेवक निवडून आले असले तरी मुस्लिम वाहिल भागात मुस्लिम समाजाने नगरसेवकासाठी काँग्रेसला दिलेली पसंती नगराध्यक्ष पदासाठी अशोक जगदाळे यांना न देता ती एम आय एम पारड्यात झुकल्याने जगदाळे यांचा पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजपाचे दहा आणि शिंदे सेनेचे एक असे एकूण 11 नगरसेवक निवडून आल्याने पालिकेवर निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाअंतर्गत इस्रोच्या दोन राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाअंतर्गत इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आयोजित “एरोसोल : मेजरमेंट्स रिट्रीवल अँड इम्पॅक्ट“व “अंडरस्टँडिंग द सायन्स बिहाइंड जिऑलॉजिकल हजार्ड्स फोर अर्ली वार्निंग अँड मेगिटेशन मेजर्स“ या दोन राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळा दिनांक 17 व 19 डिसेंबर रोजी राबवण्यात आल्या. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे आऊटरिच नोडल सेंटर म्हणून कार्य करते, या अंतर्गत इस्रो आयोजित विविध कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित केले जातात. याच अंतर्गत या दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत वायू प्रदूषण आणि आरोग्य, एरोसोल व त्याचे परिणाम, नवीन तंत्रज्ञान, जागतिक समस्या व नियंत्रणासाठीच्या उपाय योजना अशा विविध घटकांबद्दल सखोल मार्गदर्शन व चर्चा इस्रोतील शास्त्रज्ञांनी केली. एरोसोल हे हवेतील सूक्ष्म कण असतात, जे वाहनांमधून निघणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि इतर घटकांमुळे तयार होतात. हे कण श्वसनमार्गात जाऊन फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतात आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करतात. तसेच पर्यावरणातील बदल, प्रदूषण व आपली जबाबदारी याबद्दलचे सखोल मार्गदर्शन सदर कार्यशाळेमध्ये करण्यात आले.सदर कार्यशाळेसाठी इस्रो देहरादून येथील डॉ. सुरेश चॅटर्जी, डॉ. प्रतिमा पांडे, डॉ. फरहान काझी व डॉ. मनू शर्मा असे विविध शास्त्रज्ञ व अभ्यासक साधन व्यक्ती म्हणून लाभले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व इसरो नोडल सेंटर समन्वयक डॉ. कुणाल वनंजे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अभयसिंह खुणे यांनी केले तर आभार प्रा. संजय घोडके यांनी मानले. या कार्यशाळेसाठी आय क्यू ए सी समन्वयक डॉ. मंगेश भोसले, प्रा.अक्षय स्वामी, प्रा. गोविंद साळुंखे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
धाराशिव, भूम, कळंब नगर परिषदेत आदिवासी पारधी समाजातील रणरागिणींना जनतेचा कौल
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदेच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर आदिवासी पारधी समाजातील रणरागिणींना जनतेने कौल देवून भरघोस मतांनी विजयी केले आहे. समाजातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणारे आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे हे या निवडणुकीत गेमचेंजर ठरले आहेत. या यशाबद्दल नूतन नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, वंदना बापू पवार, शालाबाई शिवा पवार, सुरेखा दत्ता काळे यांचा सुनील काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Kolhapur News : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन व पोलिसांची संयुक्त तयारी
कोल्हापुरात निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी कोल्हापूर, ता. 22 – कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने आज महापालिका, पोलिस प्रशासन व निवडणुकीसाठी नियुक्त [...]

27 C