Kokan News: चिपळुणातील बैठकीत महावितरण फैलावर, MLA Shekhar Nikam यांच्या सूचना
व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत उदय ओतारी यांनीही निवेदन सादर केले चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून चिपळूण शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापाऱ्याऱ्यांच्या तक्रारी तक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने नगर पालिकेसमोरील काणे सभागृहात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांसह नागरिकांनी महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावर [...]
कराड तालुक्यात रेशनवर सडलेला गहू, खराब तांदूळ
उंब्रज : कराड तालुक्यातील अनेक गावांतील रेशनिंग दुकानांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित करण्यात आले आहे. सडलेला गहू आणि आळ्या लागलेले तांदूळ नागरिकांना वाटप करण्यात आले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे रेशन ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीप घाडगे यांनी कराड [...]
Dream 11 आऊट! आता 30 हजार कोटींची संपत्ती असलेली कंपनी Team India च्या जर्सीवर झळकणार
केंद्र सरकारने बेटिंग आणि जुगाराशी संबंधित ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मना लक्ष्य करणारे कठोर विधेयक मंजूर केले होते. त्यामुळे BCCI सोबतचा Dream 11 चा डाव अर्ध्यात मोडला. यामुळे Asia Cup 2025 मध्ये हिंदुस्थानचा संघ जर्सी ‘स्पॉन्सर’विना मैदानात उतरला आहे. अशातच आता टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार टीम इंडियाच्या जर्सीवर ‘Apollo Tyres चं नाव झळकणार आहे. अपोलो टायर्स […]
पाचगणीत पवनऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत वाहिनीमुळे मोरांचा मृत्यू
कोकरूड : शिराळा तालुक्यातील पाचगणी येथे उभारण्यात आलेल्या कराड पॉवर इंडिया कंपनीच्या पवनऊर्जा प्रकल्पामुळे राष्ट्रीय पक्षी मोरांचा मृत्यू होत असल्याच्या सलग घटना घडत आहेत. काल दोन लांडोर व आज एका मोराचा सावंतवाडी येथे ३३ के. व्ही. विद्युत वहिनीच्या धडकेमुळे विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा वनविभाग व संबंधित कंपनीच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण [...]
बीचवर फिरायला गेलेल्या मित्राला झाडाला बांधत मैत्रिणीवर सामूहिक अत्याचार
मित्रासोबत समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या तरुणीवर त्याच्यासमोरच सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गजबजलेल्या पर्यटनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ओडिशातील पुरी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या पर्यटनस्थळी ही घटना घडली. एक जोडपं समुद्रकिनारी फिरायला गेलं होतं. यावेळी काही स्थानिक तरुणांनी दोघांचे […]
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी : डॉ. विवेक माँटेरो
मुरुम( प्रतिनिधी)- लातूर येथील अंनिस राज्य कार्यकारिणी बैठकीत सुधारककार आगरकर पुरस्कार मुंबई येथील पीपल सायन्स नेटवर्क इंडियाचे समन्वयक डॉ. विवेक मोन्टेरो (मुंबई) यांना, तर सुधाकर आठल्ये पुरस्कार अंबेजोगाई येथील प्राचार्य डी.एच. थोरात (अंबाजोगाई) यांना देण्यात आला. देवयानी भगत (नागपूर) यांना सावित्रीमाई फुले पुरस्कार सुनिता भोसले (शिरूर) यांना भटक्या विमुक्त जमाती प्रबोधन पुरस्कार, कमलाकर जमदडे (बिलोली, नांदेड) यांना सुधाकर आठले युवा कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये दहा हजार आणि मानपत्र असे आहे. यावेळी अंनिस ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले आणि लातूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश देवशेटवार, शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.एन.शिंदे या सर्वांनी पुरस्कार प्रदान केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन देशभर 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन'म्हणून साजरा करण्यासाठी मोलाचे सहकार्य डॉ. माँटेरो यांनी केले आहे. डॉ माँटेरो यांनी आजच्या जगातील समस्या यांना वैज्ञानिक दृष्टीकोनाने विश्लेषण करण्याची गरज बोलून दाखवली. ते पुढे म्हणाले, देशातील वैज्ञानिक विषयांबद्दलची स्थितीची उकल ही सामाजिक, राजकीय अंगाने तसेच वैज्ञानिक पद्धतीने विचार केल्याशिवाय होणार नाही. वैज्ञानिक पद्धत, वैज्ञानिक दृष्टिकोन, गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षण हे आर्थिक राजकीय समानता व न्याय मिळवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. याचे प्रशिक्षण, याबद्दल जागरूकता वाढायला हवी यावर त्यांनी भर दिला. *प्रश्न विचारणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे हे काम करणारे खरे देशभक्त आहेत. त्यामुळे ते आपण करत राहिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. भटक्या-विमुक्त जाती- जमातीतील अघोरी प्रथा, चाली-रीती याविषयी प्रबोधनकार्य करणाऱ्या सुनीता भोसले यांनी समाजाने भटक्या विमुक्त समाजाला अजूज स्वीकारले नाही ही खंत बोलून दाखवली. अंनिस तर्फे मिळालेला असा पुरस्कार हा आमच्या पारधी समाजातील मिळालेली मी पहिली व्यक्ती आहे ही समाधानाची भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली. भटक्या विमुक्त जमातीतील लोकांच्या समस्यांवर न्याय मिळण्यासाठी अंनिस व इतर सामाजिक संघटनांनी काम करण्याची गरज आहे असे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर अंनिस ने सुरू केलेल्या ग्रंथमित्र, आधारस्तंभ आणि शतकवीर हे ७५ पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रतर्फे दिले गेले. मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्तविक केले.फारुक गवंडी यांनी सूत्रसंचालन केले. अंनिस राज्य कार्यकारी समितीचे सदस्य मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, प्रवीण देशमुख, डॉ. अशोक कदम, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, अण्णा कडलसकर, मुंजाजी कांबळे, रामभाऊ डोंगरे, निळकंठ जिरगे, प्रकाश घादगिने हे यावेळी उपस्थित होते. रमेश माने यांनी आभार व्यक्त केले.
धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा जनता विकास परिषदेची छत्रपती संभाजीनगर येथे दि. 14/09/2025 रोजी स्वामी रामानंद तिर्थ सभागृह नागेश्वरवाडी छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या झालेल्या सर्वसाधारण सभेत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष पदी महाराष्ट्रातील प्रसिध्द विचारवंत प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. याच सर्वसाधारण सभेमध्ये केंद्रीय सचिव पदी प्रा. अर्जुन जाधव यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष पदी अशोक सिध्देवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी व्यंकटेश काबदे माजी अध्यक्ष, जीवन देसाई माजी सचिव तसेच मराठवाडयातील आठ जिल्हयातून संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. धाराशिव येथून संघटनेचे अध्यक्ष सुरेश शेळके, भाऊसाहेब शिनगारे, प्रा. धनंजय लोंढे, डी.एम. पाटील, अमोल घोगरे, विजय गायकवाड, सागर जाधव, सुभाष चव्हाण उपस्थित होते. या निवडीबद्दल धाराशिव शाखेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Kolhapur News: कोल्हापुरात होणार मेकॅनिकल पझल पार्किंग, शहरातली ताण होणार कमी
यामध्ये एकाचवेळी 40 चारचाकी वाहने पार्क करता येणार आहेत By : इम्रान गवंडी कोल्हापूर : शहरातील स्टेशन रोडवर नवीन बहुमजली ‘मेकॅनिकल पझल पार्किंग साकारत“ आहे. महापालिकेच्यावतीने याचे काम युद्धपातळीवर सुरू असुन एका महिन्यात हे पझल पार्किंग कार्यान्वित होणार आहे. 4 मजलीचा एक व 5 मजलीचा एक असे दोन टॉवर उभारले जाणार आहेत. यामध्ये एकाचवेळी 40 [...]
प्रारूप प्रभाग रचना आराखडयावर २२९ हरकती
सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी विक्रमी २२९ हरकती दाखल झाल्या. हरकती दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १८६ हरकती दाखल झाल्या. या हरकतीवर पुढील आठवडयात जिल्हाधिकारी अगर त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होवून हा आराखडा अंतिम मंजूरीसाठी राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. मनपाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक [...]
पावसाळ्यानंतर पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण
सांगली : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पावसाळ्यानंतर स्वच्छता सर्वेक्षण दि. १ ते ३० ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, जलसुरक्षक व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या माध्यमातून ही मोहीम व्यापक पातळीवर होणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यानंतर नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण [...]
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे मुख्य ध्वजारोहण
धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७७ वा वर्धापन दिन १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. धाराशिव येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.तत्पूर्वी श्री.सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करतील.या मुख्य ध्जवारोहण कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
देविदास पाठक यांना मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर
धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा सेवक संघ,पुणे यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त देण्यात येणारे राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर झाले असून यात धाराशिव येथील दूरदर्शन आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक यांना मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्कारांचे वितरण मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पुणे येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड या ठिकाणी बुधवार, दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता येथे आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा रत्न पुरस्काराने पद्मश्री रमण गंगाखेडकर, डॉ. दिनकरराव मोरे, राजेंद्र डहाळे, हभप. नारायण महाराज पालमकर, सुभाष देशपांडे, पत्रकार देविदास पाठक, धनंजय जोशी, महादेव जगताप, रामचंद्र पवार, प्रसाद पाटील आणि गणेश खरात यांचा गौरव केला जाणार आहे. अशी माहिती मराठवाडा सेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष दिनकर चौधरी आणि कार्याध्यक्ष दिनेश सास्तुरकर यांनी दिली आहे. पुरस्काराचे वितरण नाथ संस्थानचे (औसा, जि. लातूर) पिठाधीश हभप. गुरूबाबा औसेकर महाराज यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड असणार आहेत. तर पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त भक्ति-नाट्यरंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सूरमणी धनंजय जोशी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. मिहिर जोशी (संवादिनी), भार्गव देशमुख (तबला) साथसंगत करणार आहेत.
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहेत, असे अलंकार उत्सवाप्रसंगी श्रींस परिधान करण्यात येतात. नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शिवकालीन, पेशवेकालीन अनेक अमूल्य दागिणे श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेस असून, यामध्ये श्री विठ्ठलास सोन्याचे पैंजण, बाजीराव कंठी, मत्स्य, तोडे, सोवळे (धोतर), […]
रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने अभियंता दिनी अभियंत्यांचा सत्कार
मुरूम (प्रतिनिधी)- येथील रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने अभियंता दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध अभियंत्यांचा सत्कार सोमवारी दि. 15 सप्टेंबर रोजी नगर परिषदेच्या सभागृहात करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी होते. यावेळी नगरपरिषदेच्या नगर रचना सहाय्यक सुमित्रा गिरी, रोटरीचे सचिव कलाप्पा पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नगर अभियंता राहुल यादव, पाणीपुरवठा अभियंता पवनकुमार सुतार, प्रशासकीय अधिकारी श्रीराम नाडे, नगर रचना सहाय्यक सुमित्रा गिरी, प्रधानमंत्री आवास योजना अभियंता गौरव वडे, महावितरणचे अभियंता सचिन वाघमारे तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमित्रा गिरी, राहुल यादव, सचिन वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी म्हणाले की, रोटरीही समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करून त्यांनी करत असलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणा, बळ देते. ज्यामुळे अशा लोकांच्या हातून भविष्यासाठी समाजोपयोगी कार्य त्यांच्या हातून घडावे. सुशील कांबळे, पाशा जेवळे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. भूषण पाताळे, सुनिल राठोड, शिवकुमार स्वामी आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार कलाप्पा पाटील यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने नगरपरिषदेचे कर्मचारी वृंद व नागरिक उपस्थित होते.
ॲड. नितीन साळुंके यांची स्टँडिंग कौन्सिलपदी नियुक्ती
तुळजापूर (प्रतिनिधी)- कायद्याच्या क्षेत्रात परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठता येतात याचा प्रत्यय तुळजापूरच्या सुपुत्राने घडवून दिला आहे. मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस, दिल्ली यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या आदेशानुसार तुळजापूरचे सुपुत्र ॲड. नितीन सुरेश साळुंके यांची स्टँडिंग कौन्सिल फॉर युनियन ऑफ इंडिया (सरकारी वकील भारत सरकार) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूळचे तुळजापूरचे रहिवासी असलेले ॲड. नितिन साळुंके हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात वकिली करतात. अल्पावधीतच त्यांनी न्यायालयीन कामकाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व, कायद्यावरील सखोल अभ्यास, तर्कशुद्ध मांडणी आणि खंबीर भूमिकेमुळे केंद्र सरकारने त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे, ते या पदावर नियुक्त झालेले सर्वात कमी वयाचे एकमेव वकिल स्टँडिंग कौन्सिल आहेत. तुळजापूर शहर, तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानाची आहे. आता येणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकरणांत ते भारत सरकारची बाजू ठामपणे मांडतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल वकिली क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ॲड. नितीन साळुंके यांच्या या नियुक्तीने तरुण वकिलांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून तुळजापूरचा गौरव उंचावला आहे. “तुळजापूरच्या सुपुत्राने अल्पावधीतच मोठा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटतो.” - माजी नगरसेवक विशाल रोचकरी, तुळजापूर
मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन
धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर गेल्या दोन वर्षांपासून लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील बुधवारी (दि.17) धाराशिवच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बुधवारी (दि.17) सकाळी अकरा वाजता ते धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 151 फुटी स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला धाराशिव शहरात स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन होणार असल्यामुळे या कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी मराठा सेवकांनी सुरू केली आहे. या यावेळी जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठा सेवकांची बैठक घेऊन हैदराबाद गॅझेट संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटमध्ये धाराशिव जिल्ह्यातील अनेक मराठ्यांच्या नोंदी असूनही, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत एकलव्याचा संघ विजयी
धाराशिव (प्रतिनिधी)- तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा दिनांक 8/9/2025 रोजी श्री शिवछत्रपती कुस्ती क्रीडा संकुल अरळी बुद्रुक येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ यमगरवाडी तालुका तुळजापूर येथील विद्यार्थ्यांनी 14 वर्ष वयोगट मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. या 14 वर्षे वयोगटांमध्ये अनुज चव्हाण, वैभव धोत्रे, सुदर्शन राठोड, आकाश दूधभाते, रुद्राक्ष राठोड, साहिल चव्हाण, अमर पंचमहाल ,दिनेश वीर, तेजस गजभार, विशाल बंडीधनगर या सर्व खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली व 17 वर्ष वयोगट मुलांमध्ये द्वितीय क्रमांक मिळाऊन यश संपादन केले. व प्रथम क्रमांक मिळवलेल्या संघाची पुढे होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यांनी कबड्डी मध्ये चांगली कामगिरी केली.या सर्व विजयी खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भुतेकर , बालाजी क्षीरसागर, कबड्डी प्रशिक्षक यशवंत निंबाळकर यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्यवाह, विवेक अयाचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे,संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
गुंजोटीत समर्पण सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंतांचा सत्कार
उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील समर्पण बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने तालुक्यातील विविध शाळांतील ए. टी. एस. प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा येथील आर्यसमाज सभागृहात गुणगौरव करण्यात आला. यावेळी एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या 92 विद्यार्थ्यांना उमरगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, उपनिरीक्षक गजानन पूजारवाड, ज्ञानदान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळीं सार्थक चुंगे व संचित चुंगे यांनी राज्यस्तरावर प्राविण्य मिळवल्याबद्दल सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजोटी घंटामठाचे सचिव बसप्पा माळगे गुरुजी होते. तर सरपंच सौ. कौसल्या बेळमकर, माजी सरपंच सहदेव गायकवाड, शिक्षक संघाचे उमरगा तालुकाध्यक्ष विजयकुमार ओवंडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य दशरथ देवकते, गुंजोटी सोसायटीचे संचालक ओम शिंदे, शिवसेना विभागप्रमुख काका गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव किशोर व्हटकर यांनी केले. सूत्रसंचालन तन्मय शेटगार यांनी तर आभार विक्रम व्हटकर यांनी मानले. यावेळी उमरगा तालुक्यातील विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी साईराज कटकधोंड, विक्रम व्हटकर, तन्मय शेटगार, शिवानंद जोगे, प्रताप शिंदे, राम जाधव, सुनील.चौधरी, अशोक बिराजदार, आकाश कटकधोंड यांनी पुढाकार घेतला.
शिवप्रतिष्ठान संस्थेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 प्रशांत शशिकांत मते यांना जाहीर
धाराशिव (प्रतिनिधी)- शिवप्रतिष्ठान संस्था, साई पार्क सोसायटी, पद्मावती रोड,आळंदी देवाची,ता.खेड जि.पुणे या संस्थेचा प्रशांत शशिकांत मते यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 प्रशांत शशिकांत मते यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार दिनांक 26/10/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धर्मशाळा पद्मावती रोड, आळंदी देवाची , पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शिव प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे शिव प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनजी रेनगडे पाटील यांनी कळवले आहे.
वर्ष अखेरीस वंदे भारत कोचची लातूरच्या प्रकल्पात निर्मिती सुरू- आमदार राणाजगजितसिंह पाटील
लातूर (प्रतिनिधी)- लातूर येथील रेल्वे कोच निर्मिती प्रकल्पात 2025 अखेरपर्यंत वंदे भारतच्या डब्यांच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे आधुनिकीकरण सुरू आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष (मित्र) आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवारी या प्रकल्पाला भेट देऊन आढावा घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत ही माहिती समोर आली. आमदार पाटील हे सोमवारी लातूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी बार्शी रोडवरील सारथी इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर रेल्वे कोचनिर्मिती प्रकल्पाला भेट दिली. मित्रच्या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर जिल्ह्याची आढावा बैठकही घेतली. याअंतर्गत स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोणते उपक्रम राबवता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वे कोच प्रकल्पाला रस्त्यांनी जोडणार रेल्वे निर्मिती कोच प्रकल्पात सध्या काय सुरू आहे, याचा आढावा आमदार पाटील यांनी घेतला. या प्रकल्पातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे किती जणांना रोजगार मिळेल, याबाबतही चर्चा झाली. प्रकल्पाच्या परिसरात सब व्हेंडर्स कसे उपलब्ध करता येतील, साहित्याची ने-आण करण्यासाठी प्रकल्पाची रोड कनेक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. उपजिल्हाधिकारी संगीता टकले, कायनेटचे व्यवस्थापकीय संचालक के. सत्यमूर्ती, एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक डी. व्ही. खाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदी उपस्थित होते. या सुविधांनी सज्ज असेल सारथी भवन बार्शी रोडवर उभारणी सुरू असलेल्या सारथी भवनच्या बांधकामाची आमदार पाटील यांनी पाहणी केली. या भवनामुळे आगामी काळात मराठा समाजातील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. लातूर विभागीय केंद्राच्या धर्तीवर धाराशिव येथेही चार एकरांवर भव्य सारथी भवनाची उभारणी करण्यात येणार आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले. अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज प्रशासकीय इमारत, मुली आणि मुलांसाठी प्रशस्त वसतिगृहे, आधुनिक अभ्यासिका आणि भव्य ऑडिटोरीयमचा सारथी भवनात समावेश असेल. उपजिल्हाधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ, अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात आदी उपस्थित होते.लातूर येथील रेल्वे कोचनिर्मिती प्रकल्पात अधिकाऱ्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वागत केले.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक पातळीवर 29 जुलै रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथील प्राणीशास्त्र विभाग यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाघ संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. निबंध स्पर्धेसाठी विषय “वाघाचे जैविक महत्त्व आणि संवर्धनाची गरज“हा देण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वाघाच्या परिसंस्थेमधील भूमिकेपासून ते मानवी अतिक्रमण, शिकारीसारख्या समस्यांवर सखोल विचार व्यक्त केला. निबंधांची परीक्षणे विषयतज्ज्ञ प्राध्यापकांनी केली व उत्कृष्ट निबंधांसाठी पारितोषिके पायाळ शौर्य (बी.एससी भाग 1) मधील विद्यार्थ्याला जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
Photo –जालना जलमय, अनेकांच्या घरात शिरले पाणी
जालना शहरात सोमवारी दुपारी चार वाजेपासून पावसाला सुरुवात झाली होती. पावसाची संततधार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती. रात्री दहा वाजेनंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटसह मेघागर्जनेत मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी पहाटेपर्यंत शहरात पाऊस सुरू होता. या पावसामुळे मध्यरात्रीनंतर संपूर्ण शहरातील वीज ही गुल झाली हाती.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली नुकसानीची पाणी
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यासह परिसरातील गावांना शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे पिकांचे, अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले. काही गावांचा संपर्क तुटला. घरांत पाणी शिरल्यामुळे अनेक गावांत नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. नागरिक, शेतकरी हवालदिल झाले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गावोगावी जाऊन नागरिक, शेतकऱ्यांना दिलासा दिला. अधिकाऱ्यांना घटनास्थलावर बोलावून घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रविवारी सकाळीच आमदार पाटील यांनी धाराशिव सोडले. जवळे (दु.), दुधगाव, ढोकी, तेर, पानवाडी, रामवाडी, भंडारवाडी, पाडोळी (आ.) आदी गावांना भेट दे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या पाहणीवेळी धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव याही उपस्थित राहिल्या. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आमदार पाटील यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळावर बोलावून घेतले. आमदार पाटील यांनी चिखल तुडवत नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अनेकांच्या शेतातील बांध फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आहे. तेरणा धरण भरल्यामुळे दरवाजे उघडण्यात आले आणि ते पाणी शेतांमध्ये शिरले. दुधगाव- खामगाव रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांसह तरुण, मुलांशीही संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. रविवारी सकाळी सुरू झालेला आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांचा पाहणी दौरा सायंकाळी सहाच्या सुमारास संपला. पंचनामे करण्याचे, यातून कोणालाही न वगळण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
Kolhapur-Gaganbawada Road: साबळेवाडी फाटा ते बालिंगा रस्त्यावरील भराव शेतकऱ्यांचा जीवावर
त्यामुळे या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ताच राहिलेला नाही By : प्रा. एस. पी. चौगले वाकरे : सध्या कोल्हापूर–गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणांमध्ये साबळेवाडी फाटा ते बालिंगे दरम्यान सुमारे 25 फूट उंचीचा भराव टाकण्यात आला आहे. हा भराव साबळेवाडी, दोनवडे, नागदेववाडी येथील शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. येथे दोन्ही बाजूला रस्ता न केल्यास शेतकरी संकटात सापडणार आहेत. यापूर्वी [...]
पंतप्रधान मोदी माझे काही दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे. पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले आहेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज काहीजणांनी पक्ष प्रवेश केला. यानंतर […]
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाच वाघ आल्याने त्यांची संख्या ८ होईल By : संतोष पाटील कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ५ वाघ येत आहेत. वन्यजीव संस्था डेहराडूनच्या अभ्यासानुसार सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पामध्ये सध्या १८ वाघ व्यवस्थित राहू शकतील इतकी स्पेस आहे. या प्रकल्पात आतापर्यंत कोयना प्रकल्पात १ आणि आणि चांदोली परिसरात २ असे ३ वाघ ट्रॅप [...]
कारण काहीही असो…जीव देणे हा पर्याय नसतो…
सांगली / विनायक जाधव : जिल्हयात गेल्या काही दिवसापासून आत्महत्येचे सत्र थांबले होते. पण आता हे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. यामध्ये उच्चशिक्षीत असणारे आणि चांगली नोकरी असणारेही आत्महत्या करू लागले आहेत. जत पंचायत समितीकडे असणाऱ्या अभियंत्याने कृष्णेत उडी मारून आत्महत्या केली. वरिष्ठाच्या जाचाला आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले. त्याबरोबरच [...]
जिल्हयातील ६९६ गावांत एकाच दिवशी ग्रामसभा
सांगली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाननिमित्त बुधवारी जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत प्रशासन सक्षमीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिली. हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात होणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर गौरवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान [...]
रितेश देशमुख श्री क्षेत्र महाबळेश्वर भेटीवर
प्रतापगड : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख यांनी आपल्या आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवछत्रपती च्या शूटिंगसाठी लोकेशन पाहणी करण्यासाठी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे आगमन केले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या पवित्र स्थळाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाने प्रभावित होत त्यांनी विविध स्थळांची पाहणी केली. या दौऱ्यात रितेश देशमुख यांनी कृष्णामाई मंदिर परिसराला [...]
31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्याच पाहिजेत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सरकार आणि निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली. याआधी आम्ही दिलेल्या निर्देशांनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू होणे गरेजेचे होते. मात्र, तसे झाले नसल्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरकारी वकिलांनी मशीन आणि मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण दिले. त्यावर न्यायालयाने 31 […]
ZP Election 2025: मिनी विधानसभेसाठी महिला रिंगणात, महायुतीमध्ये चुरस
या जागेसाठीही महिलेला निवडणुकीत उभे करण्याची व्यूहरचना सुरू कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाले आहे. सर्वसाधारण जागेसाठी कोणत्याही जातीतील महिला अध्यक्षपदासाठी पात्र असतात. त्यामुळे सर्वसाधारण स्त्रीआरक्षित जागेबरोबर सर्वसाधारण पुरुष या जागेसाठीही महिलेला निवडणुकीत उभे करण्याची व्यूहरचना सुरू झाली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाल्यामुळे सर्वसाधारण पुरुष तर सर्वसाधारण ओबीसी [...]
पेरूपेक्षा पेरुची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणुन घ्या
पेरु खाण्यासाठी केवळ चवीलाच नाही तर ते पोषक तत्वांनीही समृद्ध आहे. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व असतात. हे तत्व शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. पेरू हा आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का पेरूसोबतच त्याची पाने देखील आरोग्यासाठी खूप […]
माळजाई मंदिर व परिसराचा होणार कायापालट
फलटण : शहर व तालुक्यातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन माळजाई देवी मंदिर व या मंदिराच्या परिसरात असणाऱ्या व दुरावस्था झालेल्या सार्वजनिक उद्यानाचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. हे काम प्रतिथयश बांधकाम व्यावसाईक प्रमोद निंबाळकर यांच्या पुढाकाराने व लायन्स क्लब आणि अन्य सेवाभावी संस्था व शहरवासीयांच्या संयुक्त सहभागाने हे कार्य सुरु आहे. लवकरच या परिसरात भाविक, [...]
हजार खर्च करून रुपया मिळाला नाय…
विहे / सुनील साळुंखे : ई पीक पाहणीस शासनाची मुदतवाढ मिळाली. मात्र शेतात गेले तर मोबाईल अॅप चालत नाही. तर हजार-बाराशे रुपये खर्च करून एक रुपया मिळाला नाही. शेतात हजारो रुपये घालायचे आणि शासनाच्या शे-पाचशे रुपयांसाठी कुठे झंझटी करत बसा, अशा प्रतिक्रिया येत असून शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. [...]
मराठी राजभाषा होणार ही काळ्या दगडावरची रेघ!
राज्यनिमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांचा विश्वास : मंगेशीयेथीलबैठकीस300 पेक्षाअधिककार्यकर्त्यांचीउपस्थिती पणजी : मराठी राजभाषा केल्याशिवाय या सरकारकडे अन्य पर्याय राहणार नाही, असे वातावरण गोव्यातील समस्त संस्कृतीप्रेमी व मराठीप्रेमी जनतेत, सामूहिक ताकदीच्या आधारावर आपण निर्माण करणार आहोत. सांस्कृतिक गोव्याच्या आकांक्षांचा हा निर्धार आहे. मराठी राजभाषा होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा आत्मविश्वास मराठी राजभाषा निर्धार [...]
वाई तालुक्यात पावसामुळे पिकांचे नुकसान
वाई : गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेल्या परतीच्या धुवांधार पावसामुळे वाई तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला असून हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी पिके कुजू लागली आहेत, तर पिके अतिपाण्यामुळे पिवळी पडली आहेत. वाईच्या पश्चिम भागातील भात पिकांसाठी पोषक वातावरण असले तरी सोयाबीन, [...]
Rain Update: जोरदार पावसामुळे जालना जलमय; अनेकांच्या घरात पाणी शिरले, विजेचा कडकडाटाने घबराट
जालना शहरात सोमवारी दुपारी चार वाजेपासून पावसाला सुरुवात झाली होती. पावसाची संततधार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती. रात्री दहा वाजेनंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटसह मेघागर्जनेत मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी पहाटेपर्यंत शहरात पाऊस सुरू होता. या पावसामुळे मध्यरात्रीनंतर संपूर्ण शहरातील वीज ही गुल झाली हाती. जोरदार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सीना – कुंडलिका नदीला […]
Kolhapur News: NMMS चे बदलले स्वरुप, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
उद्देश विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील विश्वासार्हता आणि समांतर संधी सुनिश्चित करणे आहे By : प्रकाश सांडुगडे पाटगांव : राज्य परीक्षा परीषदेमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एन.एम.एम.एस.) 21 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी प्रथमच परीक्षेचे स्वरूप बदलून प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका ए, बी, [...]
निस्तेज केसांसाठी ही पावडर आहे सर्वात बेस्ट, वाचा
वातावरणात बदल झाला की, आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. खासकरून थंडीमध्ये केस खूपच कोरडे होऊ लागतात. केसांमध्ये कोंड्याची समस्या ही थंडीमध्ये वाढते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपचार म्हणून मेंदीचा वापर केला जातो. मेंदीचा वापर आपल्याकडे फार पूर्वापार केला जात आहे. नैसर्गिक घटक असलेली मेंदी ही केसांच्या पोषणासाठी कायम गरजेची आहे. कुठलेही केमिकलयुक्त घटक केसांना […]
80 टक्के मते मिळवून आमचं पॅनेल सत्तेवर येणार
महेशदेसाईयांचादावा: जीसीएचीआजनिवडणूक: आंतरराष्ट्रीयदर्जाचेक्रिकेटस्टेडियमबांधण्यासाठीप्राधान्यदेणार मडगाव : ‘आमच्या पॅनेलचा विजय पक्का आहे. क्लबांचा आमच्यावर विश्वास असून आज होणाऱ्या निवडणुकीत आमचे पॅनेल 100 टक्के विजयी होणार’, असे चेतन देसाई आणि बाळू फडके पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार महेश देसाई प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 80 टक्के क्लबांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे देसाई म्हणाले. माझं मंडळ क्रिकेटसाठी साधनसुविधा निर्माण करण्यासाठी आणि धारगळ येथे [...]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अहिल्यानगर-बीड-पारळी वैजनाथ ब्रॉड गेज रेल्वे प्रकल्पासाठी अतिरिक्त 150 कोटी रुपयांची मंजुरी दिली. महत्त्वाकांक्षी ब्रॉड गेज रेल्वे प्रकल्प गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत 2,091 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा प्रकल्प बीड जिल्ह्याच्या विकासासाठी ‘गेम-चेंजर’ ठरणार आहे, असे मानले जाते. अहिल्यानगर–बीड रेल्वे मार्गाचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी होणार असून, यामुळे बीड […]
कळसा-भांडुराचे हवाई सर्वेक्षण करावे
शिष्टमंडळाचीमुख्यमंत्र्यांकडेमागणी पणजी : म्हादईची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात येण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, तसेच म्हादईचे पाणी वळविले जाते त्या कळसा-भांडुरा प्रकल्पाचे हवाई सर्वेक्षण करावेअशी मागणी म्हादई बचाव शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंन्द्र यादवा यांच्याशी शिष्टमंडळाला भेट घडवून द्यावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने बैठकीत केली आहे. शिष्टमंडळाने केलेल्या सगळ्या मागण्या विचारात घेतल्या जातील, असे अश्वासन मुख्यमंत्री [...]
युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्या अडचणी वाढल्या, ईडीने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले
ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना समन्स बजावण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने दोघांनाही नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने उथप्पाला २२ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे, तर युवराज सिंगला २३ सप्टेंबर रोजी बोलावले आहे. दोन्ही क्रिकेटपटूंची दिल्लीतील ईडी मुख्यालयात चौकशी केली जाईल असेही […]
‘जय किसान भाजी मार्केट’चा व्यापार परवाना रद्द
कृषीपणनसंचालकांचीकारवाई: शेतकऱ्यांच्यालढ्यालायश: चौकशीपथकपाठवूनकेलीपाहणी बेळगाव : अटींचे उल्लंघन झाल्याने बुडा आयुक्तांनी यापूर्वीच जय किसान भाजी मार्केटचा ‘लँड युज’बदल रद्द केला आहे. त्यापाठोपाठ कृषी पणन संचालकांनी व्यापार परवाना (ट्रेड लायसेन्स) देखील रद्द केल्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या सुरू असलेले भाजी मार्केट अखेर बंद झाल्याने शेतकऱ्यांसह आपल्या लढ्याला यश आले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, [...]
Kolhapur News: अखिल भारतीय किसान सभेचे आजऱ्यात आंदोलन, मागण्यांची अंमलबजावणी करा
पूर्वीप्रमाणे ही नावे मालकी हक्कात घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली आजरा : देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांकडे परंपरेने चालत आलेल्या आहेत. या जमीनीला वारसा हक्काने सात–बारा पत्रकी नोंदी घालण्याची मागणी करीत अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आजरा तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. काही देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांची मालकी हक्काला 7/12 पत्रकी परंपरागत नावे होती. ती इतर हक्कात घालण्यात [...]
आईच्या खूनप्रकरणी मुलास जन्मठेप
वडूज : ‘माझे लग्न का करत नाही’, या कारणावरून आईचा खून केल्या प्रकरणी आरोपी मुलगा किरण शहाजी शिंदे (वय 32, रा. मोराळे, ता. खटाव) यास वडूज येथील अतिरिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याबाबतच्या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, दि.11/12/2019 रोजी रात्री 10:30 ते दि. 12/12/2019 चे मोराळे येथे फिर्यादीचे राहते घरात यातील [...]
Kolhapur News: गावाच्या समन्वयातच खरी ताकद, Jaykumar Gore यांचे प्रतिपादन
5 कोटी रुपये बक्षिस देणारे हे देशातील एकमेव अभियान आहे कोल्हापूर : गावातील प्रत्येक व्यक्ती, गट आणि समूह यांना सहभागी करून गावसमृद्धीची चळवळ यशस्वी करावी. गावाच्या समन्वयातच खऱ्या अर्थाने बदलाची ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात प्रत्येक गावाने सहभाग नोंदवून बक्षिसासाठी नव्हे, तर गावाच्या विकासासाठी [...]
राज्यात ई-बाईक टॅक्सीचे लवकरच सुरू होणार, बेसिक भाडेही ठरले
सोमवारी परिवहन प्राधिकरणाने ई-बाईक टॅक्सीचे भाडे जाहीर केले आहे. पुढच्या महिन्याभरात ही सेवा सुरू होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने हे भाडे निश्चित केले असून, राज्य परिवहन विभागाने मंजूर केले आहे. हे भाडं महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, 2025 अंतर्गत लागू असणार आहे. बाईक टॅक्सींसाठी कमीत कमी भाडे दीड किमी साठी 15 रुपये असेल आणि प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी […]
महिलांसाठी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियान
रत्नागिरी : केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात महिलांसाठी एक विशेष आरोग्य अभियान सुरू करण्यात येत आहे. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या नावाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, उपचार, समुपदेशन सेवा मोफत पुरविल्या जाणार आहेत. या अभियानाचा मुख्य उद्देश [...]
Crime News: महेश राख खून प्रकरणी गवळ गॅंगचा म्होरक्या अटकेत, आठजणांना अटक
त्यामुळे या गुह्यात आतापर्यंत अटक केलेल्या संशयितांची संख्या आठ झाली आहे कोल्हापूर :फुलेवाडी येथील आहिल्याबाई होळकरनगरातील महेश रोजंद्र राख (वय 23) या गुंडाच्या खून प्रकरणी मुख्य संशयित आणि गवळी गँगचा म्होरक्या, गुंड आदित्य शशिकांत गवळी (रा. दत्त कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर) याला पोलिसांनी पकडले. सोमवारी सायंकाळी पाठलाग करुन, कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंपानजीक ही कारवाई [...]
लवंग घालून चहा पिण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल, वाचा
लवंग हा असा मसाला आहे, ज्याचा वापर खाण्यापासून ते आरोग्यासाठी केला जातो. भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या लवंग चहाचे फायदे आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जातात. लवंगाचे वैज्ञानिक नाव सिझिजियम अरोमेटिकम आहे. अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या लवंग अतिशय आरोग्यदायी असतात. अँटी-ऑक्सिडंट, अँटी-मायक्रोबियल, अँटी-व्हायरल आणि वेदनाशामक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पौष्टिक घटक लवंगात आढळतात. लवंग चहाचे सेवन केल्याने […]
Beed News –माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावास पुराचा वेढा
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली या दिड हजार लोकवस्तीच्या गावास खेटून सिंदफणा नदी वाहते व ती पुढे जाऊन मंजरथ येथे गोदावरी नदीस मिळते. सध्या सिंदफणा नदी पात्रात ८५ हजार क्युसेसने विसर्ग सुरू असल्याने ती काठोकाठ भरून वाहत आहे. तसेच गोदावरी नदीदेखील तुडूंब भरून वाहत असल्याने, सांडस चिंचोली गावाला पूराचा वेढा पडला आहे. नदीपात्रातून बाहेर […]
अमली पदार्थांच्या विळख्यात जिल्ह्यातील तरुणाई
रत्नागिरी / प्रवीण जाधव : तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालल्याचे चित्र आहे. महागडी ड्रग्स, गांजा, दारू यांचा वाढता वापर तरुणांच्या आरोग्यासह समाजव्यवस्थेलाही धोका निर्माण करत आहे. शिक्षण, रोजगाराच्या अपुऱ्या संधी, तणाव व संगत या कारणांमुळे युवक अमली पदार्थांना बळी पडत आहेत. जनजागृतीचे कार्यक्रम विविध स्तरावर हाती घेतले जात असले तरी त्याचा फारसा परिणाम [...]
राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे रेल्वे प्रकल्प रखडले
केंद्रीयरेल्वेराज्यमंत्रीव्ही. सोमण्णायांच्याकडूनटीका बेळगाव : बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. बेळगाव व धारवाड जिल्ह्यातील 1200 एकर जमिनीचे संपादन केले जात आहे. यापैकी 40 ते 42 एकर जमीन भूसंपादन तांत्रिक कारणामुळे रखडली आहे. यासाठी 937 कोटी रुपयांची रेल्वेने तरतूददेखील केली आहे. भूसंपादन, तसेच कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री व [...]
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मेट्रो स्टेशनला देण्याची मागणी
बेळगाव : बेंगळूर येथील शिवाजीनगर हे थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारसाशी जोडलेले आहे. नुकतेच या भागातील मेट्रोचे काम पूर्णत्वास आले असून शिवाजीनगर येथे मेट्रो स्टेशन निर्माण करण्यात आले आहे. या स्टेशनचे छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन असे नामकरण करण्याची मागणी होत असताना राज्य सरकारने मात्र सदर स्टेशनचे सेंट मेरी नामकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. [...]
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीचे नवरात्र राज्य महोत्सव, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश
तुळजाभवानीचे प्रसिद्ध असे प्राचीन मंदिर देशभर प्रसिद्ध आहे तुळजापूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणजेच श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे. तुळजाभवानी देवी नवरात्र महोत्सवास मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या प्रयत्नामुळे राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. नवरात्र महोत्सवाचा पर्यटन विभागामार्फत 25-26 या वित्तीय वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकेमध्ये समावेश [...]
जाहिरात फलक कर वसुलीसाठी नवीन बायलॉजला मंजुरी
महानगरपालिकाअर्थ-करस्थायीसमितीबैठकीतनिर्णय: विविधविषयांवरचर्चा बेळगाव : पोदार स्कूल, टिळकवाडी क्लब, ए व बी खाता नोंदणीसाठी घेतलेल्या कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा पगार करणे, जाहिरात फलक कर आकारणीसाठी नवीन बायलॉजला सोमवार दि. 15 रोजी झालेल्या अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी रेखा हुगार होत्या. सोमवारी स्थायी समिती सभागृहात अर्थ व कर स्थायी समितीची बैठक आयोजित [...]
तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील समस्या सोडवा
चेंबरऑफकॉमर्सचीरेल्वेमंत्र्यांकडेमागणी बेळगाव : बेळगाव शहराला उद्यमबाग, अनगोळ, मजगाव येथील औद्योगिक वसाहत जोडण्यासाठी तिसरे रेल्वेगेट महत्त्वाचे ठरते. परंतु, रेल्वे उड्डाणपुलाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. याचा परिणाम उद्योगांवरही होत असून कामगारांचे वरचेवर अपघात होत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाशी संवाद साधून तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील खड्ड्यांची डागडुजी करा, अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्यावतीने रेल्वेमंत्री व्ही. सोमण्णा [...]
गैरप्रकारांमुळे राज्यातील कारागृहे ठळक चर्चेत
कर्नाटकातीलकारागृहांमध्येघडलेल्यागैरप्रकारांसंबंधीएकूणपंधराप्रकरणेदाखल बेळगाव : बेळगावसह राज्यातील विविध कारागृहांमध्ये कैद्यांना सुख-सुविधा पुरविण्यात येत आहेत. अनेक गैरप्रकारांमुळे राज्यातील कारागृहे ठळक चर्चेत आली असून रेणुकास्वामी खून प्रकरणात तर सर्वोच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनावर ताशेरे ओढले होते. उपलब्ध माहितीनुसार बेंगळूर येथील परप्पन अग्रहार, बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृह, गुलबर्गा, बळ्ळारी, धारवाड, दावणगेरे आदी कारागृहांमध्ये घडलेल्या गैरप्रकारांसंबंधी एकूण पंधरा प्रकरणे दाखल झाली असून [...]
राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये उपचारात्मक अध्यापन योजना
राज्यसरकारकडूनविस्ताराचाप्रयत्न: शिक्षणातकमीअसणाऱ्याविद्यार्थ्यांनालाभ बेळगाव : अभ्यासात कमी असणाऱ्या मुलांसाठी राज्य सरकारकडून उपाययोजना राबविण्यात येत आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन योजना अमलात आणण्यात येणार आहे. सरकारी शाळेतील सुमारे 18 लाख मुले या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ही योजना राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पूर्ण क्षमतेने विस्तारित करण्यात येणार आहे. दोन [...]
‘मेरी सहेली’मुळे महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित
बेळगाव : महिलांना सुरक्षितपणे रेल्वे प्रवास करता यावा, यासाठी ‘मेरी सहेली’ हा उपक्रम नैर्त्रुत्य रेल्वे व आरपीएफ जवानांकडून राबविला जात आहे. नोव्हेंबर 2020 पासून महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे अभियान राबविले जात असून प्रवासादरम्यान महिलांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी सोडविल्या जात आहेत. नैर्त्रुत्य रेल्वेने 250 मेरी सहेली संघांची स्थापना केली असून यामध्ये आरपीएफ जवानांची नेमणूक केली आहे. [...]
आता शरद पवार यांनाही माओवादी, नक्षलवादी ठरवणार का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल
देवाभाऊ, शेजारी बघा, काय चालले आहे? असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारत शेतकऱ्यांच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. नेपाळमध्येही राज्यकर्त्यांची अशीच लूट केली, त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. नेपाळचे उदाहरण देत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष शेतकऱ्यांच्या समस्येकडे वेधले आहे. नेपाळचे उदाहरण दिले तर आम्हाला […]
माजी आमदार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई ठोकळ (वय ८५) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळाने आजारी होत्या. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव सकाळी अकराच्या सुमारास मुरारजी पेठेतील तोरणा बंगला येथे आणण्यात येणार असून, आज सायंकाळी पाच वाजता […]
जनगणनेच्या नावाखाली हिंदू समुदायाला विभागण्याचा प्रयत्न
महांतेशकवटगीमठयांचीराज्यसरकारवरटीका बेळगाव : राज्य सरकार जाती जनगणनेच्या नावाखाली हिंदू समुदायाला विभागण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदू समुदायाला इतर जातीत आणण्याचे षडयंत्र राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. राज्य सरकार जाणीवपूर्वक जाती जनगणतेत इतर जातीचा कॉलम समाविष्ट करून हिंदू समुदायाला दुभंगण्याचा डाव आखला आहे. याचा हिंदू जनजागृती महासंघ निषेध करत असून आपण या विरोधात राज्यपालांची भेट घेणार आहे. [...]
जि.प.चे बदली झालेले 470 शिक्षक कार्यमुक्त
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बदल्यांची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या सहा संवर्गांतील एकूण 470 शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या असून, त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. हे सर्व शिक्षक सोमवारपासून त्यांच्या नवीन शाळेवर हजर होउ लागले आहेत. या बदल्यांमुळे आता बदली प्रक्रियेच्या सातव्या टप्प्याचा मार्गही मोकळा झाला आहे. [...]
अनगोळ रेल्वेगेट सर्व्हिस रोडची रुंदी वाढवा
माजीनगरसेवकविनायकगुंजटकरयांचीमागणी बेळगाव : अनगोळ चौथे रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या दुतर्फा ठेवलेला सर्व्हिस रोड अरुंद आहे. त्यामुळे भविष्यात दुचाकी व तिचाकी वगळता इतर मोठी वाहने ये-जा करणे अशक्य आहे. याचा परिणाम येथील उद्योग व व्यवसायावर होणार असून यासंदर्भात रेल्वे विभागाने फेरविचार करावा, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा व खासदार जगदीश शेट्टर [...]
खानापूर रेल्वेस्टेशनचा कायापालट होणार
रेल्वेराज्यमंत्रीव्ही. सोमाण्णायांचेवक्तव्य: हुबळी-दादररेल्वेलाखानापूरयेथेथांबण्यासहिरवाझेंडा खानापूर : खानापूर तालुका अति पावसाचा आणि दुर्गम प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे खानापूरसारख्या दुर्गंम भागातील रेल्वे स्थानकाचाही विकास होणार. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असून, रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचेही काम तातडीने हाती घेण्यात येणार असून कमी वेळात भुयारी [...]
खरीप हंगामातील पिकांसाठी जोरदार पावसाची गरज
पावसानेफिरवलीपाठ: रिमझिममुळेरोगवाढण्याचीशक्यता वार्ताहर/किणये तालुक्यात अनंत चतुर्दशीपासून पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी सध्या जोरदार पावसाची गरज आहे. तालुक्यात सध्या केवळ पावसाची रिमझिम सुरू आहे. या रिमझिम पावसामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. गेल्या महिन्याभरापूर्वी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी नाल्यांच्या [...]
‘या’चहाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी आहे सर्वात उत्तम
आपल्याकडे कुणीही पाहुणे आल्यावर सर्वात आधी चहा देण्याची पद्धत आहे. चहा आपल्या हिंदुस्थानींसाठी सर्वात लोकप्रिय पेय मानले जाते.चहा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे, सकाळी डोळे उघडण्यापासून ते संध्याकाळी थकवा घालवण्यापर्यंत आपण चहा पितो. आजच्या काळात चहाचे अनेक प्रकार आहेत (ब्लॅक टी फॉर स्किन), चहाचे असंख्य पर्याय आहेत जसे की दुधाचा चहा, ग्रीन टी, […]
Himachal News –मंडीमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन, 3 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने कहर केला आहे. गेल्या २४ तासांपासून मंडी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. नद्या आणि नाल्यांची पाण्याची पातळी अचानक वाढली, त्यामुळे मंडीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. निहरी तहसीलच्या ब्रागटा गावात रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला […]
बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे 75 प्रवासी बचावले
बेंगळूर : इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर आग लागल्याने संपूर्ण बस बेचिराख झाल्याची घटना सोमवारी सकाळी बेंगळूरच्या एचएएल एअरपोर्ट मुख्य गेटजवळ घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे 75 प्रवासी असणारी बस सोमवारी सकाळी 5:15 वाजता मॅजेस्टीक स्थानकावरून निघाली होती. दरम्यान, एचएएल विमानतळ गेटजवळ बसच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. वेळीच सतर्क झालेल्या चालकाने [...]
सामाजिक, शैक्षणिक सर्वेक्षणापासून आशा कार्यकर्त्या राहणार दूर
बेंगळूर : राज्य मागासवर्ग आयोगाकडून 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणात सहभागी न होण्याचा निर्णय आशा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्त्या संघटनेच्या सचिव डी. नागलक्ष्मी यांनी यासंबंधी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. गॅरंटी योजनांच्या सर्वेक्षणासाठी 1 हजार कोटी रु. देण्याचे सांगून सर्वेक्षणानंतर एक रुपयाही देण्यात आलेला नाही. इतर खात्यांकडून झालेल्या अनेक [...]
‘त्या’ मेट्रो रेल्वे स्थानकाला शिवाजी महाराजांचे नाव द्या!
बेंगळूर : बेंगळूरमधील शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्थानकाला सेंट मेरी मेट्रो रेल्वे स्थानक हे नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने संमती दर्शविली आहे. सरकारच्या या निर्णयाला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सोमवारी सकाळी विधानपरिषद सदस्य डॉ. एम. जी. मुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाला छत्रपती [...]
राज्यात 4 हजार कोटींच्या गुंतवणुकीची हमी
उद्योगमंत्रीएम. बी. पाटीलयांनीदिलीजपानदौऱ्याविषयीमाहिती: उद्योजकांशीचर्चा बेंगळूर : मागील आठवड्यात जपान दौऱ्यावेळी तेथील विविध उद्योजकांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडून कर्नाटकात 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार असल्याची हमी मिळाली आहे, अशी माहिती मोठे आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. सोमवारी बेंगळूरमधील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. भांडवल गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने आपण दुसऱ्यांदा जपानचा दौरा [...]
कणबर्गीतील समस्या सोडविण्यासाठी खासदार शेट्टर यांची भेट
विसर्जनतलावाचाआकारवाढविण्यासाठीप्रयत्नकरण्याचीमागणी बेळगाव : कणबर्गी गावातील महापालिकेच्या सार्वजनिक तलावात गावातील घरगुती, सार्वजनिक, त्याचबरोबर परिसरातील गावातील सार्वजनिक मंडळांच्या श्रीमूर्तीचे विसर्जन केले जात असल्याने तलाव अपुरा पडत आहे. त्यामुळे भविष्यात ही समस्या उद्भवू नये, यासाठी तलावाचा आकार वाढविण्यात यावा यासह गावातील विविध प्रश्न सोडविण्यात यावेत, यासाठी कणबर्गी ग्रामस्थांनी सोमवारी खासदार जगदीश शेट्टर यांची माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या [...]
रेल्वेस्थानकांवरील इलेक्ट्रीक वाहनातून होणारी माल वाहतूक थांबवा
कुलीकामगारसंघटनेचीरेल्वेमंत्र्यांकडेमागणी बेळगाव : रेल्वेस्थानकांवर चालविल्या जाणाऱ्या ट्रॉली सेवेचे खासगी कंपन्यांना आऊटसोर्सिंगद्वारे काम देणे थांबवावे, केवळ दिव्यांग, वृद्ध व आजारी लोकांव्यतिरिक्त इलेक्ट्रीकच्यावाहनातून सामानाची वाहतूक करणे थांबवावे. यामुळे रेल्वेस्थानकांवर असणाऱ्या कुली व्यवसायाला फटका बसत आहे. याचा विचार करून रेल्वेमंत्र्यांनी यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी श्री सिद्धारुढ स्वामी रेल्वे कुली पोर्टर्स संघाच्यावतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा [...]
मिहीर पोतदार यांची चीफ पेट्रॉनपदी निवड
बेळगावडिस्ट्रीक्टबॉडीबिल्डिंगअॅण्डस्पोर्ट्सअसोसिएशन बेळगाव : बेळगाव डिस्ट्रीक्ट बॉडीबिल्डिंग अॅण्ड स्पोर्ट्स असोसिएशनच्या जिल्हा संघटनेचे चीफ पेट्रॉन म्हणून बेळगावचे युवा उद्योजक व क्रीडाप्रेमी मिहीर अनिल पोतदार यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावातील सुवर्ण कारागीर क्षेत्रात ठसा उमटविलेले अनिल पोतदार यांचे ज्येष्ठ चिरंजीव मिहीर पोतदार यांची क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी झाली आहे. सेंट पॉल्स स्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन [...]
पं.नेहरु हायस्कूलचे कुस्तीत यश
वार्ताहर/येळ्ळूर पंडीत नेहरु हायस्कूलच्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत शाळेचे पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाले आहे. या स्पर्धेमध्ये राजू दोडमनी 48 किलो, श्रीशाल करेनी 60 किलो, सुरेश लंगोटी 92 किलो प्रथम, तर ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात कैलाश 65 किलो तर विजय मुतनाळ 71 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकविला आहे. मयुरेश भाकोजी 41 किलो वजनी गटात द्वितीय [...]
बेळगुंदी हायस्कूलच्या ओमकार, स्वप्नीलचे सुयश
किणये : विश्व भारत सेवा संचलित समिती बेळगुंदी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत यश मिळविले आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत 14 वर्षाखालील कुस्तीमध्ये 62 किलो वजन गटात ओमकार सुतारने प्रथम तर 17 वर्षाखालील क्रीडा स्पर्धेत उंचउडीमध्ये स्वप्नील बोकमुरकरने प्रथम क्रमांक पटकविले. या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हा क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली आहे. राहुल देसाईने तालुका पातळीवर कुस्तीमध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. [...]
बेळगाव : जिल्हा पंचायत बेळगाव व जिल्हा क्रीडा युवजन खात्याच्यावतीने जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय दसरा स्पर्धेमध्ये ज्योती अॅथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू पूर्णानंद कामतीने 1500 मी. धावणे शर्यतीत सुवर्णपदक तर 800 मी. धावण्याच्या शर्यतीत तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकाविले. त्याची जिल्हास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला क्लबचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक एल. जी. कोळेकर, [...]
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये हे खायला विसरू नका, वाचा
वजन कमी करण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट खूप महत्त्वाचा मानला जातो. लठ्ठपणा ही आजच्या काळातील सामान्य समस्यांपैकी एक आहे. खरे तर लठ्ठपणाचे एक कारण म्हणजे आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली. आपण बर्याचदा कामामुळे नाश्ता करणं विसरतो किंवा टाळतो. Cooking Tips – कारल्याचा कडवटपणा कसा कमी करावा? जाणुन घ्या वजन कमी करण्याच्या आहारात ब्रेकफास्ट हा फार महत्त्वाची […]
कश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुराच्या पाण्याचे संकट ओढावले आहे. त्यातच आता जम्मू-कश्मीरमधील फळ मार्केट दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने कश्मीरचे सफरचंद संकटात सापडले आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय राजमार्ग (एनएच-44) वर फळांचे ट्रक अडकून पडले आहेत. त्यामुळे फळ मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सफरचंद खराब होत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि […]
अन्नधान्य महागले! ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर 0.52 टक्क्यांवर
सोमवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई दर 0.52 टक्क्यांपर्यंत वाढला. जुलैमध्ये तो -0.58 टक्के होता. याचाच अर्थ घाऊक बाजारात महागाई वाढली आहे. ऑगस्टमध्ये महागाई वाढण्याचे कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू, खनिज तेल, नैसर्गिक गॅस, अन्न उत्पादने, धातू नसलेल्या खनिज उत्पादनांच्या आणि वाहतूक उपकरणांच्या किमतीत वाढ होती. ऑगस्ट […]
एटीएम कार्ड विसरा, आता मोबाईलने कॅश काढा! यूपीआयचा वापर करून पैसे काढणे होणार सोपे
एटीएममधून पैसे काढायचे असतील तर एटीएम कार्डची गरज लागते, पण स्मार्टफोनचा वापर करूनही कॅश काढता आली तर किती बरे होईल ना… लवकरच गुगल पे, फोन पेसारख्या यूपीआयचा वापर करून कॅश काढता येणार आहे. सध्या यूपीआयवरून पैसे पाठवणे, बिल भरणे, ऑनलाईन शॉपिंग करणे सोपे आहे. आता लवकरच कॅश काढणेही शक्य होईल, असा दावा केला जातोय. यूपीआय […]
चीनचे फुजियान समुद्रात उतरले, अमेरिका चिंतेत
चीनने आपली तिसरी आणि आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली विमानवाहक युद्धनौका फुजियानला समुद्रात उतरवले आहे. फुजियानला लवकरच सेवेत उतरवले जाणार आहे. चीनच्या फुजियानमुळे अमेरिकन सैन्याच्या पॉवरला थेट आव्हान मिळणार आहे, तर हिंद महासागर आणि आशिया प्रांतातील हिंदुस्थानसह अन्य शेजारी राष्ट्रांची चिंता वाढणार आहे. फुजियानला शांघायच्या जियांगन शिपयार्डमधून बाहेर पडताना पाहिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून याचे मेंटेनन्स चालू […]
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरला
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 119 अंकांनी घसरून 81,785 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 44 अंकांनी घसरून 25,069 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी 1.5 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, इन्फोसिस, टायटन, […]
आयटीआरची डेडलाईन वाढल्याचा दावा खोटा
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्याची डेडलाईन 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात येत असल्याचा सोशल मीडियावरचा दावा खोटा आहे, असे आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयटीआरची डेडलाईन 15 सप्टेंबर होती ती वाढवली नाही, असेही आयकर विभागाने सांगितले. आयकर विभागाच्या अधिकृत एक्स हँडलवर डेडलाईनसंबंधी सविस्तर माहिती दिली आहे.
टेक्सासमध्ये शरीया कायद्याला नो एण्ट्री
अमेरिकेतील टेक्सास राज्याचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी मोठी घोषणा केली आहे. टेक्सास प्रांतात शरीया कायदा लागू करण्यासाठी कुणी दबाव टाकत असेल तर पोलिसांना माहिती द्यावी. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ह्युस्टममधील एक मुस्लिम धर्मगुरू दुकानदारांना दारू, डुकराचे मांस, लॉटरी तिकीट विक्री न करण्याचे आवाहन करत होता.
ब्रिटनमध्ये एका शीख महिलेवर वर्णभेदाची टिप्पणी करून तिच्यावर दोन ब्रिटिश तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सध्या कसून चौकशी करत आहे. ब्रिटनमध्ये वर्णभेद आणि स्त्री-पुरूष द्वेषाला अजिबात थारा नाही, असे खासदार प्रीत कौर गिल यांनी म्हटले.
न्यूयॉर्कच्या गव्हर्नरचा ममदानी यांना पाठिंबा
न्यूयॉर्क सिटीच्या आगामी महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कैथी होचुल यांनी डेमोक्रेटिकचे उमेदवार आणि हिंदुस्थानी वंशांचे जोहरान ममदानी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. न्यूयॉर्कवासीयांनी ममदानी यांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. ममदानी यांना आतापर्यंत मिळालेला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा राजकीय पाठिंबा मानला जात आहे. गव्हर्नर कैथी होचुल यांनी एका वृत्तमानपत्रात […]