Pune News – 2 लाखांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी ACB च्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ
जुन्नर-आंबेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी गोविंद शिंदे (वय 46) यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो (ACB), पुणे पथकाने शुक्रवारी (27 मार्च) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी नारायणगाव येथे इमारत बांधकामासाठी अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळूनही […]
Ashok kharat case –रूपाली चाकणकर यांचा अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या आरोपांची राळ उठली आहे. यामुळे त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावे लागले होते आणि आता चाकणकर यांनी आ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर यांनी पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. सोशल मीडियात पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील 15 वर्षांची सलग सेवा पूर्ण करणाऱ्या चालकांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे. शैक्षणिक पात्रता नसली तरीही कालबद्ध पदोन्नतीनुसार चालकांना उच्च वेतनश्रेणीचा लाभ मिळायलाच हवा, असा महत्त्वपूर्ण निर्णय देत न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाची याचिका फेटाळून लावली. ठाणे परिवहन उपक्रमात 1989 ते 1996 दरम्यान अनेक चालकांची […]
Mega Block –पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक
पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पूल क्रमांक 61 च्या पुनर्बांधणीच्या कामासाठी पश्चिम रेल्वे 28 मार्च 2026 रोजी रात्री 11.30 ते 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर तसेच 29 मार्च 2026 रोजी पहाटे 1.00 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत […]
रत्नागिरीत रस्त्यांचा प्रश्न गंभीर; 8 दिवसांत दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोकोचा शिवसेनेचा इशारा
रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्र. 4 मधील खराब रस्त्यांच्या समस्येने नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले असून, या गंभीर प्रश्नावर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. प्रभागातील सर्व रस्ते आठ दिवसांच्या आत दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवानी माने, स्थानिक नगरसेवक केतन शेट्ये, नगरसेविका फौजिया मुजावर, नगरसेवक अमित विलणकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, विजय […]
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने टपाल गोळा करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ एक कक्ष उभारला. मात्र या कक्षात जमा केलेले टपाल संबंधित विभागाकडे जाण्यासाठी दहा ते बारा दिवस लागत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी केला. शुक्रवारी आयोजित विशेष सभेत ते बोलत होते. यावेळी कक्ष उभारण्यासाठी इतका खर्च कशासाठी केला असा […]
देशात लॉकडाऊनची कोणतीही शक्यता नाही, अर्थमंत्र्यांचे राज्यसभेत स्पष्टीकरण
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज राज्यसभेत लॉकडाऊनच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. देशात लॉकडाऊनची कोणतीही शक्यता नाही, असे सीतारमण यांनी सांगितले. गेल्या महिनाभरात कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलरवरून थेट १२२ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. पश्चिम आशियातील तणाव आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’मधील अडथळ्यांमुळे ही स्थिती […]
हिंदुस्थान पुन्हा रशियाकडून S-400 संरक्षण प्रणाली खरेदी करणार, चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढली!
संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थानी हवाई दलासाठी रशियाकडून पुन्हा एस-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या अतिरिक्त बॅटरी खरेदी करणार आहे. संरक्षण खरेदी परिषदेने (DAC) या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेने शुक्रवारी सुमारे 2.38 लाख कोटी रुपयांच्या विविध शस्त्रे आणि विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. डीएसीच्या बैठकीत हिंदुस्थानी हवाई दलासाठी रशियाकडून […]
आखाती देशांतील युद्धसदृश परिस्थिती आणि भविष्यातील संभाव्य दरवाढीच्या अफवांमुळे दापोली शहरासह परिसरात इंधन टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दापोलीतील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांमधील चिंतेत भर पडली आहे. दापोली शहरात 4 आणि गिम्हवणे परिसरात 2 असे एकूण 6 पेट्रोल पंप आहेत. मात्र, गेल्या काही […]
टीम इंडियाचा उगवता सितारा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने क्रिकेट जगतात आपल्या बॅटने खळबळ उडवून दिली आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सने त्याला 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले असले तरी, रॉयल्सचे क्रिकेट संचालक झुबिन भरूचा यांनी त्याच्यासाठी तब्बल 10 कोटी रुपयांचे बजेट राखून ठेवले होते. लिलावापूर्वी झालेल्या चाचणीत वैभवची फलंदाजी पाहून भरूचा इतके प्रभावित […]
आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हंदुस्थान रशियाकडून तुंगुस्का विमानविरोधी आणि क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणार आहे. यासाठी हिंदुस्थानने रशियाच्या रोसोबोरॉन एक्सपोर्टसोबत 445 कोटी रुपयांचा करार केला आहे. हिंदुस्थानी लष्करासाठी युद्धभूमीवर रणगाडे आणि यांत्रिक वाहनांना हवाई संरक्षण देण्यासाठी ही तुंगुस्का प्रणाली खरेदी करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी आणि पी8आय लांब […]
सामना प्रभाव! “घामाघूम” सभापती आता “थंडा थंडा कूल कूल”, तीन सभापतींच्या दालनात लागले नवेकोरे ‘एसी’
रत्नागिरी जिल्हा परिषद सभापती निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सभापती जेव्हा आपल्या दालनात गेले तेव्हा त्या दालनातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने सभापती “घामाघूम” झाल्याचे वृत्त दैनिक सामनाने प्रसिद्ध करताच जिल्हापरिषद प्रशासन जागे झाले. तात्काळ तीन सभापतींच्या दालनात नवीन “एसी” लावण्यात आल्याने आता वातावरण “कुल कुल थंडा थंडा” झाले आहे. जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक होणार आहे […]
Ahilyanagar news –महानगरपालिकेत अभूतपूर्व गोंधळ, शिवद्रोही श्रीपाद छिंदमला सभागृहातून पिटाळून लावले
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प सभेत शनिवारी अभूतपूर्व गोंधळ उडाला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधानांमुळे आधीपासूनच वादात असलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम सभागृहात बोलण्यासाठी उभा राहताच संतप्त नगरसेवक आक्रमक झाले. ‘जो शिवरायांचा अपमान करतो, त्याला सभागृहात बोलू देणार नाही,’ अशी ठाम भूमिका घेत नगरसेवकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडत छिंदमला बाहेर हुसकावून लावले. महानगरपालिकेच्या […]
मुलाचं जावळ काढून येताना काळाचा घाला; उभ्या ट्रकला पिकअपची धडक, 5 महिलांसह 8 ठार
उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 मुले आणि 5 महिलांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक प्रयागराज येथे एका मुलाचे जावळ काढून आपल्या […]
Ratnagiri News –संगमेश्वर तालुक्यात वणव्यांचे सत्र सुरूच, एका शेतकऱ्याचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणव्यांचे सत्र सुरूच असून, या आगीने आता रौद्र रूप धारण केले आहे. ग्रामीण भागात वारंवार लागणाऱ्या या वणव्यांमुळे केवळ पर्यावरणाचेच नुकसान होत नसून मानवी जीवनावरही याचे गंभीर परिणाम उमटत आहेत. दोन दिवसांपूर्वी लागलेल्या एका भीषण वणव्यात एका शेतकऱ्याला आपला प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण तालुक्यात […]
फेजिओथेरीपीमुळे खेळाडू झाला बरा
धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर मेडिकल कॉलेजच्या मैदानावर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा चालू असताना एका खेळाडूला खांद्याची नस बदल्यामुळे मोठ्या प्रमाणात वेदना होवू लागल्या. त्यामुळे तो खेळाडू बेचेन होवून मोठ-मोठ्याने ओरडू लागला. यावेळी फेजिओथेरीपी अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षात असणारे डॉ. प्रज्योत कावरे यांनी तातडीने लक्ष देवून धाडशाने त्या खेळाडूचा निळळलेला खंदा फेजिओथेरीपेद्वारे उपचार करून खेळाडूला दिलासा दिला. ही शरिराच्या अंतर्गत होणारी दुखापत आहे. शरीराच्या वरून कुठलीही जखम दिसत नाही आणि बाहेरून रक्तस्त्राव ही होत नाही. पण सांधा म्हणजे खांदा जागेवरून निखळून खाली घसरतो. त्यामुळे आतून वेदना होते. आणि जिथे नसला नुकसान असते तिथे प्रचंड वेदना होतात. त्यामुळे पेशंट अशा पेशंटला हात लावणे म्हणजे जोखमीचे काम असते. जिवाच्या आकांताने ओराडणाऱ्या पेशंटला दिलासा देऊन. तशाच परिस्थितीत त्याच सांधा काही विशिष्ट कोनात फिरवून परत जागेवर बसवणे हे माझ्या मते खूप अनुभवी तज्ञांचे काम असते. त्यामुळे अशा आणिबाणीच्या प्रसंगी डॉ. प्रज्योत कावरे याने ही परिस्थिती खूपच कौशल्याने हाताळली आणि पेशंटला दिलासा दिला. त्यामुळे डॉ. कावरे यांचे अभिनंदन होत आहे.
रामनवमीनिमित्त गंगास्नानासाठी गेलेल्या 5 महिला नदीत बुडाल्या, एकीचा मृत्यू; दोघी बेपत्ता
रामनवमीमित्त गंगा स्नान करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच महिला नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी दोघींना वाचवण्यास नागरिकांना यश आले आहे. एकीचा मृत्यू झाला असून अन्य दोघी बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांकडून बेपत्ता महिलांचा शोध सुरू आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गनियारी […]
IPL 2026 – 14 वर्षे झाली पण मुरली विजयचा हा विक्रम अजूनही अबाधित; यंदा मोडणार?
IPL 2026 चा धमाका उद्यापासून (28 मार्च 2026) सुरू होणार आहे. चौकार-षटकारांची आतषबाजी, गोलंदाजांची दादागिरी आणि श्रेत्ररक्षकांची चपळ कामगिरी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर अनेक विक्रम प्रस्थापित होतील तर काही जुने विक्रम मोडित निघतील. या सर्व धामधुमीत मुरली विजयचा एक विक्रम मागील 14 वर्षात एकाही हिंदुस्थानी खेळाडूला मोडता आलेला नाही. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर […]
उत्पादन शुल्कात कपात करत कोणावर मेहेरबानी केली? काँग्रेसचा सरकारला सवाल
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती आणि इंधनाचे दर गगनाला भिडत आहे. तसेच देशभरात इंधन, एलपीजी, पेट्रोल, डिझेलच्या टंचाईबाबतचे वृत्त येत आहे. जनतेला दरवाढीचा सामना करावा लागू नये, यासाठी उत्पादन शुल्कात कपात करण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले. यावर उत्पादन शुल्कात कपात करत सरकराने कोणावर मेहेरबानी केली? असा सवाल काँग्रेस नेते पवन खेरा यांनी […]
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या सुरुवातीला इराणमधील एका शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता. यात 175 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला होता. यावरून आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी अमेरिकेवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. मिनाबमधील शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ला ही चूक नसून युद्धगुन्हा आहे, […]
Ladakh Avalanche –लडाखमधील झोजिला खिंडीत हिमस्खलन, दोघांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती
लडाखमधील झोजिला खिंडीतील झिरो पॉइंट परिसरात शुक्रवारी हिमस्खलन झाले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बर्फाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमस्खलनामुळे बर्फाखाली 5 वाहने गाडली गेली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडलेली ही वाहने जम्मू-काश्मीरमधील […]
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) येथील इंदुबाई हणमंत शेटे (वय 75) यांचे गुरुवार दि. 26 मार्च रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांचे उपळा (मा.) येथे दि. 26 मार्च रोजी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
महायुतीमधील सर्वपक्षांना योग्य प्रमाणात न्याय दिला- अर्चना पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील सर्व पक्षांना योग्य न्याय दिला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. धाराशिव जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुका शुक्रवार दि. 27 मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे व शिंदे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सांवत यांना सभापतीपदासाठी भाजपने संधी न दिल्यामुळे नाराज असल्याचे सांगितले जात होते. परंतु निवडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी महायुतीमध्ये कोणीही नाराज नाही, सर्वांशी चर्चा करून सभापतीपदाचे उमेदवार निवडले आहेत असे स्पष्टपणे सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे सातारा जिल्हा परिषदेत मध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे धाराशिव जिल्हा परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीच्यावेळेस बाऊन्स मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या आवारात आण्यात आले होते. 45 जिल्हा परिषद सदस्य ट्राव्हल्स बसने धाराशिव जिल्हा परिषदेत आणण्यात होते. 10 विरूध्द 45 मतांनी विजयी समाजकल्याण सभापतीपदासाठी भाजपाचे विश्वास कोकणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तीर्थराज घाडगे यांचा 45 विरूध्द 10 मताने पराभव केला. तर महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेच्या पुजा तुषार शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या प्रतिक्षा सुरवसे यांचा 45 विरूध्द 10 मताने पराभव केला. तर कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भाऊसाहेब खरसडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जितेंद्र कानडे यांचा 45 विरूध्द 10 मताने पराभव केला. अर्थ व बांधकाम सभापतीपदासाठी भाजपचे सिध्देश्वर कोरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रदिप घोणे यांचा 45 विरूध्द 10 मतांनी पराभव केला. निवडीनंतर सर्व सभापतींनी आपला पदभार स्विकारला.
जि प प्रा शा सावरगाव (पा )येथे स्वयं शासन दिन संपन्न
भुम (प्रतिनिधी)- जि प प्रा शा सावरगाव (पा )येथे आज इ.चौथी च्या विद्यार्थ्यांचा स्वयं शासन दिन व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होतो.या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री. आण्णा महानवर, सल्लागार सदस्य श्री प्रकाश यादव, श्री. मधुकर महानवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच श्रीम. पोतरे मॅडम, कांबळे मॅडम, नभा महानवर, स्वाती महानवर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थी मुख्याध्यापक कुमार-सत्यजित यादव तर उपमुख्याध्यापिका कुमारी- स्वराली लोकरे या होत्या एकूण अकरा विद्यार्थी इयत्ता चौथी मधील हजर होते.संकटे येत जातील आपण प्रयत्न करणे सोडले नाही पाहिजे“ “अभ्यासातील सातत्य, काहीतरी करण्याची जिद्द, शिस्त, संयम आणि सुसंस्कार जर अंगी असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी आडवू शकत नाही. मुले हे मातीचा गोळा असतात.. त्यांना आकार देण्याचे कार्य शिक्षक करतात. जीवनात खूप गुरु येतात पण प्राथमिक शाळेतील गुरु चे सर्वश्रेष्ठ असतात.हा मुलमंत्र प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना दिला विद्यार्थी मनोगत , अल्पोपहार,फोटो सेशन, भेटवस्तूमध्ये इयत्ता चौथीच्या मुलांनी शाळेला महात्मा गांधी, आण्णाभाऊ साठे,यशवंतराव चव्हाण,राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले इत्यादी फोटो संच मुलांनी शाळेला भेट दिली.,मुलांचे शिकवणे यांनी या कार्यक्रमाला बहार आली.अध्यक्षस्थानी सल्लागार समितीचे श्री. प्रकाश यादव सर होते सुत्रसंचलन व आभार श्री. माधव पोतरे सर यांनी व्यक्त केले.
जि. प. प्रा. शा. सावरगाव (पा) शाळेस टेबल भेट
भुम (प्रतिनिधी)- जि. प. प्रा. शा. सावरगाव (पा )येथे अतिवृष्टी आप्तकालीन सहायता संघाचे तालुका प्रमुख भगत सर व दत्तात्रय गुंजाळ यांच्या सहकार्याने आज प्रा. शा. सावरगाव (पा ) ता. भूमला एक ऑफिस टेबलं आणि एक व्हील चेअर जवळपास सात हजार रुपयाच्या वस्तू देण्यात आल्या.त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचे शाळेच्या वतीने शाल आणि पुष्पगुछ देऊन यथोचित स्वागत करून, त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सदरील स्वागत आणि आभार कार्यक्रमात मान्यवरांनी शाळेतील चिमुकल्याना अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. गणित तज्ञ् श्री. भगत सरांनी मुलांनी मोबाईल पासून दूर व्हावे आणि पुस्तकाला जवळ करावे असा कानमंत्र दिला.इंग्रजी एक्स्पर्ट सन्माननीय श्री. गुंजाळ सरांनी मुलांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, दररोजचा अभ्यास दररोज पूर्ण करावा. कोणतेही काम आवडीने करा म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. समजून जर तुम्ही अभ्यास केला तर इंग्लिश आणि गणित या विषयासारखा सोपा विषय कोणताही नाही.तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही केंद्र, तालुका नव्हे तर जिल्हा किंवा राज्यस्तरावर तुम्ही नक्कीच पोहचाल.अश्याप्रकारे मुलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून मुलांचे मनोबल वाढविले.सदरील कार्यक्रमास उपस्थित मान्यवर शा. व्य. समितीचे अध्यक्ष शिवदास लोकरे, सदस्य डोंगरीबुवा महानवर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आण्णा महानवर, सल्लागार सदस्य प्रकाश यादव, मधुकर महानवर, समाधान यादव, हनुमंत महानवर,माजी सरपंच अर्जुन महानवर,गावातील जेष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी पालक, तरुण मंडळ,श्रीम. कांबळे मॅडम, श्रीम. नभाताई महानवर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांनी मान्यवरांचे टाळ्याच्या गजरात स्वागत केले. शालेय परिसर स्वच्छ व सुंदर पाहून मान्यवर आनंदीत होऊन समाधान व्यक्त केले. शाळेला वेळोवेळी मदत केली जाईल असे आश्वासन उपस्थितांना मान्यवरांनी दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे. मुख्याध्यापक श्री पोतरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका श्रीम. पोतरे मॅडम यांनी मानले.
सोन्याचे बिस्किट सापडल्याचा बनाव; वृद्धेची 90 हजारांची फसवणूक
तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील जुने बसस्थानक परिसरात दोन अनोळखी इसमांनी सोन्याचे बिस्किट सापडल्याचा बनाव करून एका वृद्ध महिलेची सुमारे 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत पार्वती कृष्णकुमार राठोड (वय 60, रा. गोकुळ नगर, रोहीणी नगर 3, सैफुल, जि. सोलापूर) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी (दि. 26 मार्च 2026) सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास जुने बसस्थानक परिसरातून जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. या इसमांनी “10 तोळ्याचे दोन सोन्याचे बिस्किट सापडले” असा बनाव करून त्यातील एक बिस्किट राठोड यांना देत विश्वास संपादन केला. संबंधित बिस्किट खोटे असल्याचे नंतर उघड झाले. त्यानंतर त्यांनी राठोड यांच्याकडील दोन तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण (अंदाजे किंमत 90 हजार रुपये) घेऊन पसार झाले. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अतिक्रमणधारकांना नोटिसा; तीन दिवसांचा अल्टिमेटम
भूम (प्रतिनिधी)- टाकळी-पाटोदा-भूम-वारदवाडी राज्यमार्ग क्र. 62 वरील भूम शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अनाधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भूम यांच्या वतीने गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित अतिक्रमणधारकांना तीन दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सध्या या मार्गावर नवीन सिमेंट काँक्रीट नाल्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मात्र, रस्त्याच्या हद्दीत दोन्ही बाजूंना नाल्यावर व बाजूपट्ट्यावर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या टपऱ्या, शेड्स, कच्ची व पक्की दुकाने, हॉटेल्स, लोखंडी अँगल, पोल आदी बेकायदेशीर अतिक्रमणामुळे नाली बांधकामात मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम होत असून नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नोटिसामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, रस्त्याच्या मध्यभागापासून 12 मीटर उजव्या व 12 मीटर डाव्या बाजूस असलेले सर्व अतिक्रमण तात्काळ हटविणे आवश्यक आहे. अन्यथा या अतिक्रमणामुळे अपघात किंवा दुर्घटना होऊन जीवित व वित्तहानी झाल्यास संबंधित अतिक्रमणधारक स्वतः जबाबदार राहतील. तसेच, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण काढून न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस बंदोबस्तात कारवाई करून अतिक्रमण हटवेल व त्यासाठी लागणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. अतिक्रमण हटविताना झालेल्या नुकसानीस विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय अभियंता आर. आर. गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, कनिष्ठ अभियंता एस. आर. उघडे, बी. आर. खुणे, एम. एम. कुलकर्णी, अमोल जरांडे व एस. पी. जाधवर हे अधिकारी अतिक्रमणधारकांना प्रत्यक्ष नोटिसा बजावत आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शहरात अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, येत्या काही दिवसांत रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोठी मोहीम राबवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
साताऱ्यातील 44वी शिक्षण परिषदस जिल्हा कलाध्यापक संघाचे उपस्थितीसाठी आवाहन
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ आणि सातारा जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 44 वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद (कार्यशाळेचे) भव्य आयोजन करण्यात आले आहे. 28 आणि 29 मार्च 2026 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद सातारा येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. दिग्गजांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन शनिवार, 28 मार्च रोजी सकाळी 12:00 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार ना. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होईल. यावेळी कला क्षेत्रातील अनेक नामवंत अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी दोन दिवसांच्या या परिषदेत कलाशिक्षकांसाठी वैचारिक आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्तरावर भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे: प्रात्यक्षिके: चित्रकार ओंकार पवार, सत्यजित वरेकर आणि युवा शिल्पकार मंदार लोहार यांची थेट प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळणार आहे. चर्चासत्रे: रंगरेषा ते डिझाईन : सृजनात्मक प्रवास आणि नवीन शैक्षणिक धोरण मधील कलाशिक्षणाचे स्थान या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. करिअर संधी: कला क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी आणि जागतिक स्तरावरील आर्ट स्टुडिओबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पुरस्कार सोहळा: राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार वितरण आणि कलाध्यापकांचा गौरव सोहळाही या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार आहे. समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी 29 मार्च रोजी सायंकाळी 4:00 वाजता परिषदेचा समारोप होईल. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. परिषदेच्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, निसर्गचित्र स्पर्धा , फलक लेखन स्पर्धा आणि कलाशिक्षक खुला मंच असे उपक्रमही राबवले जाणार आहेत. राज्यातील कलाशिक्षकांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे राज्यअध्यक्ष नरेंद्र बाराई यांनी या परिषदेचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, “बदलत्या शैक्षणिक धोरणात कलेचे स्थान आणि कलाशिक्षकांचे भविष्य यावर या परिषदेत मंथन होणार आहे. तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कलाशिक्षक, कलाप्रेमी, कलाकार आणि चित्रकारांनी या कलाकुंभात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.“ तसेच धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष कलाध्यापक शिवाजी भोसले , जिल्हाध्यक्ष कलाध्यापक नानासाहेब बोराडे , जिल्हासचिव कलाध्यापक शेषनाथ वाघ जिल्हाकोषाध्यक्ष किरण वाघमारे यांनी धाराशिव जिल्ह्यातील तमाम कलाध्यापक बांधनांनी या परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले यासाठी मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.धाराशिव यांचे पत्र ही काढण्यात आले आहे . या परिषदेच्या यशस्वीतेसाठी सातारा जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख आणि सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
प्रगणक-पर्यवेक्षकांची भूमिका निर्णायक; जनगणना अचूकतेने पार पाडा- कडवकर
धाराशिव (प्रतिनिधी)- भारताची जनगणना 2027 ही डिजिटल पद्धतीने होणारी असून ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे जनगणनेचे काम काळजीपूर्वक करावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज (दि.26) जनगणना संचालनालय, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय जनगणना 2027 प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जनगणना संचालनालय,मुंबईचे उपसंचालक तथा प्रशिक्षक किरण गुरव,सहनिरीक्षक पवन गोडे,जिल्हा समन्वयक चेतन प्रकाश,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,तहसीलदार (महसूल) प्रकाश व्हटकर तसेच सहाय्यक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अंकित सिंह उपस्थित होते. खडसे यांनी जनगणनेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की,जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. मूलभूत सुविधांचे अचूक नियोजन करता येते आणि लोकसंख्येनुसार निधीचे न्याय्य वाटप शक्य होते.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे ही जबाबदारी आहे. उपसंचालक किरण गुरव यांनी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, पहिल्या टप्प्यात प्रगणक कुटुंब प्रमुखाकडून 33 प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करणार असून प्रत्येक कुटुंबाने आपल्या सोयी-सुविधांची माहिती देणे आवश्यक आहे. सहनिरीक्षक पवन गोडे यांनी सांगितले की,जनगणना 2027 चा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार असून या कालावधीत घरयादी व घरगणना केली जाईल.दुसरा टप्पा 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान पार पडणार आहे.
उमेद अभियानाचे उत्कृष्ट कार्य महिला सशक्तिकरण होतं आहे बळकट
उमरगा(प्रतिनिधी)- बुधवार दि.२५ रोजी उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती उमरगा वतीने व तालुक्यातील सर्व महाराष्ट्र ग्रामीण बँक , स्टेट बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या तालुवयातील सर्व शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा तालुक्यातील 119 स्वयं समुहांना 5 कोटी 32 लक्ष रक्कमेचे समूहांला व वैयक्तिक योजनेतून उद्योग करण्यासाठी विविध बँकेकडून समुहांतील 14 महिला सदस्यांना 20 लक्ष 40 हजार रक्कमेचे कर्ज मंजुरीपत्र वितरण मेळावा पंचायत समिती सभागृह उमरगा येथे आयोजित करण्यात आला होता . सदरील बँक कर्ज मेळाव्याचे अध्यक्ष पंचायत समिती चे नूतन सभापती मां. ॲड .आकांक्षा ज्ञानराज चौगुले मॅडम ,तसेच पंचायत समितीचे नुतन उपसभापती मा . सौ . रेखा दादा इंगळे मॅडम तसेच सदरील कर्ज मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती उमरगा गटविकास अधिकारी (वर्ग१ ) मा .प्रशांतसिंह मरोड सर तसेच तालुक्यातील बँकेचे शाखा व्यवस्यापक यामध्ये रोशन सर MGB बँक शाखा, उमरगा , SBI बँकेचे व्यवस्थापक मा . डॉ अंकुश सर शाखा उमरगा मेन , SBI शाखेचे व्यवस्थापक मा शैलेज बिराजदार , बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक मा . राहुल सुरवसे सर , पंचायत समितीचे सर्व विस्तार अधिकारी वर्ग आणि सर्व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष . उमरगा उपस्थितीत सदरील कर्ज मंजुरी पा मेळाव्याचे उद्घाटन मान्यवर चे हस्ते प्रतिमा पूजन करून झाले या कार्यक्रमातून मा .ॲड आकांक्षा चौगुले सभापती मॅडम यांनी महिलांनी कर्जाच्या माध्यमातून विविध व्यवसाय करावेत व आपल्या गटाच्या माध्यमातून विविध वस्तु तयार करून त्याची विक्री केंद्र उभारावी व इतर माध्यमातून वस्तुची विक्री करण्याविषयी प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवावे आपली आर्थिक उन्नती करावे असे सांगितले . त्यानंतर . तसेच SBI बँकेचे शाखा व्यवस्थापक डॉ अकुंश सर यांनी महिलांनी कर्जाच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करावेत व स्वयंसहायता समूहातील सर्व सदस्य महिलांनी वैयक्तिक उदयोग निर्माण करण्यासाठी शासनाच्या व बँकेच्या योजनेतून लाभ घ्यावे तसेच समुहांचे आर्थिक हिशोबाचे लेखे अद्यावत ठेवावे तसेच गटांच्या संदर्भातील बँकेच्या कामकाजाची विषयी मार्गदर्शन केले . सदरील कर्ज मेळाव्यात खालील प्रमाणे बँक निहाय कर्ज मंजुरी प्राप्त झाली महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तुरोरी कर्ज मंजूर गट - 7 एकूण कर्ज मंजूर रक्कम 32 लाख MGB गुजेंटी कर्ज मंजूर गट - 17 एकूण कर्ज मंजूर रक्कम 47 लाख SBI / आष्टा कासार कर्ज मंजूर गट - 5 एकूण कर्ज मंजूर रक्कम 24 लाख बँक ऑफ इंडिया / उमरगा कर्ज मंजूर गट - 19 एकूण कर्ज मंजूर रक्कम 1 कोटी 3 लाख SBI - उमरगा (SC ) कर्ज मंजूर गट 13 एकूण कर्ज मंजूर रक्कम 64 लाख बँक ऑफ महाराष्ट्र / येणेगुर कर्ज मंजूर गट - 10 एकूण कर्ज मंजूर रक्कम 45 लाख बंक ऑफ महाराष्ट्र / उमरगा मंजुर गट - 15 मंजुर रक्कम - 76 लाख SBI / बलमुर मंजुर गट - 2 मंजुर रक्कम - 6.50 लाख बँक ऑफ महाराष्ट्र / मुरूम मंजुर गट - 5 मंजूर रक्कम - 14 लाख SBI / दाळींब मंजूर गट - 5 मंजुर रक्कम - 20 लाख SBI / मेन उमरगा मंजुर गट -4 मंजुर रक्कम - 19 लाख SBI / गुजेंटी मंजुर गट -2 मंजुर रक्कम - 8.50 लाख MGB / नाईकचाकुर मंजुर गट - 13 मंजुर रक्कम - 51 लाख SBI मुरुम मंजुर गट - 2 मंजुर रक्कम -12 लाख तालुक्यातील एकूण कर्ज मंजूर गट 119 तालुक्यातील एकूण कर्ज मंजूर रक्कम 05 कोटी 132 लाख व विविध बँकेकडून वैयक्तिक कर्ज योजना उदयोगासाठी कर्ज 14 महिला सदस्य 20 लाख 40 हजार कर्ज मंजुरी पत्र व वाटपाचा अशा प्रकारे सदरील कर्ज मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते गटातील महिला सदस्यांना मंजुरी पत्र देण्यात आले .सदरील कर्ज मेळावा आयोजित करण्यासाठी पंचायत समिती उमरगा येथील सर्व वरिष्ट अधिकारी,सर्व शाखा व्यवस्थापक,तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक,तालुका व्यवस्थापक,प्रभाग समन्वयक,प्रभाग संघ व्यवस्थापक व सर्व CRP ,कृषी सखी,,बँक सखी, FL CRP ,प्रभाग संघ यांनी मोलाचे सहकार्य केले .
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी लोकसभेत शून्य प्रहरात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा अत्यंत आक्रमक आणि भावूकपणे उपस्थित केला. देशाच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताचा एफआयआर नोंदवण्यासाठी जर त्यांच्या कुटुंबाला संघर्ष करावा लागत असेल, तर सामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला. सुप्रिया सुळे […]
सरकार कोणता खेळ करत आहे, लॉकडाऊनचा विषय कोणी काढला? काँग्रेसचा सवाल
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती आणि इंधनाचे दर गगनाला भिडत आहे. तसेच देशभरात इंधन, एलपीजी, पेट्रोल, डिझेलच्या टंचाईबाबतचे वृत्त येत आहे. या सर्व परिस्थितीबाबत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी संसदेत संबोधन देताना आपल्याला कोरोना आणि लॉडाऊनसारख्या मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे, असे वक्तव्य […]
भुवनेश्वर कुमार इतिहास रचणार? IPL 2026 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरू शकतो पहिला वेगवान गोलंदाज
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आयपीएल IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या भुवनेश्वरला 200 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी आता केवळ 2 विकेट्सची आवश्यकता आहे. जर त्याने ही कामगिरी केली, तर आयपीएलमध्ये 200 बळी घेणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरेल. […]
पिंगुळीत 51 दिव्यांगाना जयपूर फूटचे वाटप
प.पू. विनायक (अण्णा ) महाराज यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य ; दिव्यांग बाधवांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य कुडाळ – प.पू. विनायक (अण्णा) महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व प.पू.राऊळ महाराज संस्थान ( पिंगुळी ) ,रोटरी लोककल्याण मंडळ (कोल्हापूर) आणि प्रा. डॉ. एस. एन. ओझा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा जयपूर फूट’ (कृत्रिम [...]
हिंदुस्थानच्या तरुणांना परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दावून त्यांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा CBI ने पर्दाफाश केला आहे. थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून हिंदुस्थानी तरुणांना म्यानमारमधील सायबर फसवणूक केंद्रांमध्ये गुलाम म्हणून विकण्याचे काम करत असल्याचा खळबळजनक आरोप आहे. या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुनील नेल्लातू रामकृष्णन उर्फ ‘क्रिश’ याला मुंबई विमानतळावर […]
चौके : प्रतिनिधी चौके थळकरवाडी येथील सौ.ज्योती प्रकाश गावडे (७०) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुलगे,सूना ,नातवंडे असा परिवार आहे.चौके गावातील माजी सैनिक व ज्येष्ठ शिवसैनिक श्री प्रकाश उर्फ बाळा गावडे याच्या त्या पत्नी तर चौके बाजारपेठेतील रत्नेश जनरल स्टोर्स मालक हेमंत गावडे व शरद गावडे याच्या त्या आई होत .चौके येथील [...]
कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये 50 लाख रुपये जिंकून प्रसिद्धीझोतात आलेल्या तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. 2021 मधील 2.57 कोटी रुपयांच्या पूर मदत घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला असून याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय? 2021 मध्ये अमिता सिंह तोमर या […]
आंबोली वार्ताहर आंबोली- गावठणवाडी येथील अभय नवसू गावडे (38 ) या तरुणाचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे तुती रेशीम बीज केंद्राचे माजी कर्मचारी नवसू गावडे यांचा तो मुलगा व सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांचा तो मोठा भाऊ होय . सामाजिक कार्यात त्याचा नेहमी [...]
Beed News –आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार-टिप्परची धडक; माय-लेकराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू
आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर आज (27 मार्च 2026) एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. भरधाव टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील माय-लेकराचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये आष्टी पंचायत समितीचे ग्रामसेवक तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांच्या […]
…तर यंदा सिलिंडर बडवू; इंधन टंचाईवरून अखिलेश यादव यांचा भाजपला टोला
देशात एलपीजीचा पुरवठा सुरळीत असल्याचे तसेच एलपीजी, पेट्रोल, डिझेलची टंचाई नसल्याचे सरकार सांगत आहे. मात्र, देशभारात सिलिंडरसाठी रांगा लागत आहेत. पेट्रोल आणि डिझेल संपल्याचे फलक पेट्रोल पंपांवर लागले आहेत. त्याचा विरोधकांनी संसदेत निषेध केला. सिलेंडरचे चित्र असलेला टी-शर्ट घालून टीएमसी खासदार डेरेक ओ’ब्रायन संसदेत आले. तसेच या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर […]
कोल्हापूर जिल्हा न्यायालयात आता कायमस्वरूपी पोलीस चौकी? कोल्हापूर -जिल्हा न्यायालयामधील सुरक्षेबाबतची माहिती गुरुवारी पोलीस प्रशासनाने सर्किट बेंचच्या डिव्हीजन बेंचसमोर सादर केली. पोलिसांनी सादर केलेल्या उपाय योजनांबाबत सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एम. जे. जामदार, न्यायमूर्ती पी. एस. पाटील यांनी समाधान व्यक्त केले. याचसोबत मारहाणीच्या घटनेनंतरच्या वकीलांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करत घटनेच्यावेळी सीसीटीव्हीबाबत छेडछाड [...]
मोठी घडामोड! वादळानंतर तुषार दोशी सातारा पोलीस मुख्यालयात दाखल; पुन्हा स्वीकारला पदभार
एसपी तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश मागे? सातारा– सातारा जिल्हा परिषद निवडीवेळी मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्कीचे प्रकरण राज्यभर गाजले. त्याचे पडसाद अधिवेशनातही उमटले. यावर उपसभापतींनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. यावर राजकारण चांगलेच तापले असताना निलंबनाचे आदेश मागे घेतल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक श्रीराम नवमीच्या दिवशी [...]
मंत्री नरहरी झिरवाळांच्या आक्षेपार्ह व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओ झिरवळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. आधी खरात फाईल्स आणि त्यानंतर झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ यामुळे राज्यातील राजकारण तापलेले असताना आता […]
Solapur news |सोलापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ‘डिजिटल अरेस्ट’करणाऱ्या ठगाला दिल्लीतून बेड्या
सोलापुरात ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव; सोलापूर -डिजिटल अरेस्ट करून फसवणाऱ्यास सोलापूर सायबर पोलीसांनी दिल्लीतून अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून ९ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली आहे. राघवेंद्र सिंग पिता मुलचंद (वय ३८, रा. हायटेंशन रोड, कपातहंडा, दक्षिण-पश्चिम नवी दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव [...]
Mumbai News –तांत्रिक बिघाडामुळे बोरीवली स्थानकाजवळ पश्चिम रेल्वे विस्कळीत; प्रवाशांचे हाल
तांत्रिक बिघाडामुळे बोरीवली स्थानकाजवळ पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. अनेक उपनगरीय गाड्या विलंबाने सुरू होत्या. यामुळे नोकरदार वर्गाला सर्वाधिक फटका बसला असून कार्यालयात पोहचायला उशीर झाला. तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 10 ते 20 मिनिटे विलंबाने धावत होत्या. यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. […]
देशात घरगुती आणि व्यावसायिक LPG चा साठा किती? सरकारने दिली माहिती
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानमध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमती, पुरवठा आणि संभाव्य तुटवडा याबाबत अफवा मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. या परिस्थितीत केंद्र सरकारने शुक्रवारी (27 मार्च 2026) महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले की देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढील दोन महिन्यांसाठी […]
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जगात इंधन टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे हिंदुस्थान कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठा सुरळीचत ठेवण्यासाठी विविध पर्याय शोधत आहे. तसेच या युद्धामुळे अनेक जागतिक समीकरणेही बदलली आहेत. आता या संकटाच्या काळात हिंदुस्थान रशिया संबंध दृढ होत आहेत. त्यामुळे अमेरिकेलाही दणका बसण्याची शक्यता आहे. व्यापार करार करण्यासाठी अमेरिकेच्या बंदीमुळे हिंदुस्थानने रशियाकडून […]
गुजरातचा बिहार पॅटर्न, उंदरांनी फस्त केले 2300 किलोचे ड्रग्ज
दारू बॅन असलेल्या बिहारमध्ये उंदरांनी लाखो लिटर दारू फस्त केली होती. आता हाच बिहार पॅटर्न गुजरातमध्ये पहायला मिळत आहे. 2300 किलोचे अंमली पदार्थ उंदरांनी फस्त केले आहे. गुजरात विधानसभेत सादर करण्यात आलेल्या Comptroller and Auditor General of India (कॅग) च्या ताज्या अहवालात जप्त अंमली पदार्थांच्या साठवणूक आणि हाताळणीबाबत गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.अहवालानुसार, ऑक्टोबर 2022 […]
Photo –पैठणीत सजली प्रिया बापट
अभिनेत्री प्रिया बापटने निळ्या रंगाच्या पैठणीत फोटो शूट केले आहे. या निळ्या पैठणीसोबत तिने गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घालून स्टाईल केले आहे. त्यासोबत तीने पारंपारिक गोल्डन दगिने घालून साज पुर्ण केला आहे.
वडूज भूमी अभिलेख कार्यालयात राडा; उपअधीक्षकांच्या केबिनमध्येच नागरिकाला मारहाण
वडूजमध्ये मोजणीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्काबुक्की वहुज -वडूज येथील भूमी अभिलेख कार्यालयात आलेल्या एका व्यक्तीला अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये कर्मचाऱ्याकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत खटाव तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांना घटनास्थळी पाठवून अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. याबाबत [...]
कराडमध्ये क्रूरतेचा कळस! विषप्रयोग करून २५ भटक्या कुत्र्यांची सामूहिक हत्या
कराडमधील विविध पेठांमध्ये कुत्र्यांच्या मृतदेहांचा खच कराड -शहरातील विविध भागात २० ते २५ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. यावेळी काही तडफडत असलेल्या कुत्र्यांना प्राणी मित्रांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार केले. यात दोन कुत्र्यांना वाचवण्यात यश आले आहे. अज्ञाताने भटकी कुत्री [...]
निरवडे महोत्सवात खाद्य स्टॉल लावण्यासाठी नावनोंदणीला सुरुवात
व्यावसायिकांना संपर्क साधण्याचे आवाहन न्हावेली /वार्ताहर निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ आयोजित ‘निरवडे महोत्सव २०२६’ निमित्त यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सोबतीला खवय्यांसाठी ‘खाद्य महोत्सवाचे’ विशेष आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३ आणि ४ एप्रिल रोजी माळकरवाडी येथे हा भव्य सोहळा संपन्न होणार असून महोत्सवाचे यंदाचे स्वरूप अतिशय व्यापक असणार आहे. या खाद्य [...]
काळीज पिळवटून टाकणारी घटना: आईला वाचवताना मुलाचाही शेततळ्यात बुडून मृत्यू
जत तालुक्यातील डफळापूरमध्ये माय-लेकाचा दुर्दैवी अंत जत -जत तालुक्यातील डफळापूर येथील भोसले मळ्यातील शेततलवात बुडून मेंढपाळ कुटुंबातील सुशिला विठ्ठल पडोळकर (वय ४५) आणि मुलगा अनिल विठ्ठल पडोळकर (वय २८, दोघे रा. अकोळ, ता. निपाणी, कर्नाटक) हे दोघे मयत झाले. ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजता घडली. [...]
बहिणीच्या जमिनीवर भावाचा कूळ म्हणून हक्क नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
जमिनीवरील मालकी हक्काबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. विधवा बहिणीच्या जमिनीवर भावाचा कूळ म्हणून हक्क राहत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने पुण्यातील एका प्रकरणात दिला. भावाने विधवा बहिणीला शेतीच्या कामात मदत केली होती. तथापि, त्याआधारे भावाला संबंधित जमिनीवर ‘कूळ’ म्हणून मालकी हक्क सांगता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आणि याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती संदीप […]
गरीब आणि गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाही. महिला दिनच्या दिवशी हप्ता मिळणार… नंतर गुढीपाडव्याच्या दिवशी हप्ता मिळणार अशी आवई उठली, मात्र मार्च एण्ड आला तरी महिलांच्या खात्यात दमडी जमा झाली नाही. हप्ता मिळणार तरी कधी? असा सवाल विचारणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता मोठी […]
जागतिक ऊर्जा संकट आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा राज्यांना पूर्वस्थितीच्या 70 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील प्रमुख उद्योगांवरील ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, या निर्णयाचा फायदा विशेषतः स्टील, वाहन उद्योग, कापड उद्योग […]
तब्बल २० वर्षांनंतर गांधी चौकातील पुरातन राम मंदिराचे कुलूप उघडले
ईश्वरपूरच्या ऐतिहासिक राम मंदिराचा होणार जिर्णोद्धार ईश्वरपूर -येथील गांधी चौकातील पुरातन राम मंदिर गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत होते. त्यामुळे मंदिर व परिसराची पडझड झाली असून गुरुवारी श्रीराम जन्मोत्सवावेळी हे मंदिर खुले करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान देशपांडे, आठले, वशीकर-पोतदार कुटुंबीयांनी या [...]
अलाहबाद उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे की, एखादा विवाहित पुरुष जर एखाद्या प्रौढ महिलेसोबत संमतीने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल, तर त्याच्यावर गुन्हा दाखल करता येत नाही. हा निर्णय उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील एका जोडप्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान देण्यात आला. या प्रकरणात संबंधित जोडप्याने महिलेच्या आईने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी […]
भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; 5 गंभीर जखमी
भरधाव स्कॉर्पिओने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना ग्वाल्हेरमध्ये घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालकासह पाच जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास परशुराम चौकाच्या पुढील जैन मंदिराजवळ घडली. एकाच कुटुंबातील 9 सदस्य शीतला माता मंदिरात दर्शन घेऊन रिक्षाने घरी परतत होते. यादरम्यान जैन मंदिराजवळ भरधाव वेगात […]
जगासमोर आणखी एका युद्धाचे काळे ढग; चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत?
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जगाची चिंता वाढली आहे. तसेच जगावर इंधन टंचाईचे संकट उभे असतानाच जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. ही संकटांची मालिका संपण्याचे चिन्हे नाहीत. त्यातच आता जगासमोर आणखी एका युद्धाचे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. चीन तैवानवर हल्ला करण्याची तयारी करत असून त्यादृष्टीने रणनीती आखत असल्याचे दिसत आहे. चीन आता तैवानविरोधातील आपली लष्करी […]
Israel Iran War – मोदी आणि मी, जे ठरवतो ते करून दाखवतो! युद्धादरम्यान ट्रम्प यांच्या विधानाने संभ्रम
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले आहे. ‘पंतप्रधान मोदी आणि मी असे दोन लोक आहोत, जे हाती घेतलेले काम पूर्ण करूनच दाखवतो,’ अशा शब्दांत ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांमधील संबंध स्पष्ट केले. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराण युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये […]
सांगलीत खळबळ! बालसुधारगृहातून सुटताच संशयिताचा पुन्हा जीवघेणा हल्ला
धामणी रस्ता खून प्रकरणातील अल्पवयीन संशयिताचा विठ्ठलनगरमध्ये हैदोस सांगली -धामणी रस्त्यावरील खून प्रकरणातील संशयित अल्पवयीन आरोपीने गुरुवारी आणखी एकावर जीवघेणा हल्ला केला. खून प्रकरणात तो बालसुधारगृहात होता. तेथून त्याची सोमवारी सुटका झाली होती. त्याच्या या कृत्याने खळबळ उडाली. या हल्ल्यात राजवर्धन सुखदेव कांबळे (वय १७, रा. हनुमाननगर) हा जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात [...]
Puch AI कंपनी आर्थिक सक्षम नाही , उत्तर प्रदेश सरकारकडून 25 हजार कोटी रुपयांचा करार रद्द
उत्तर प्रदेश सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील स्टार्टअप Puch AI सोबत झालेला 25 हजार कोटींचा सामंजस्य करार रद्द केला आहे. कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 23 मार्च रोजी झालेल्या या कराराचा आढावा घेतल्यानंतर तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारने सांगितले की, नियमानुसार आवश्यक तपशील गुंतवणूकदाराकडून […]
हाँगकाँगविरुद्धच्या एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हिंदुस्थानी फुटबॉलला पुन्हा एकदा प्रशासकीय वादाचा फटका बसला आहे. कोची येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सराव आणि पत्रकार परिषदेसाठी आलेल्या हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील आणि तीन खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला. जवळपास 10 वर्षांनंतर हिंदुस्थानी संघ कोचीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, गुरुवारी एक विचित्र परिस्थिती […]
Miraj bike fire |मिरजेत थरार! वादळी पावसात धावत्या दुचाकीने घेतला पेट; चालकाने उडी मारली अन्…
टाकळी रस्त्यावर दुचाकीचा ‘भडका’ मिरज : वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरूअसतानाच शहरातील गाडवे चौक येथे टाकळी रस्त्यावर अचानक दुचाकी गाडीने पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. गाडी चालक प्रसाद पवार याने प्रसंगावधान पाहून गाडीवरून उडी घेतली. त्यामुळे जीवितहानी टळली. अचानक पेटलेल्या दुचाकीने परिसरात भीती पसरली. [...]
अमेरिकन सैनिकांना आश्रय दिल्यास खबरदार! इराणचा आखाती देशांना इशारा
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) हॉटेल मालकांना कठोर इशारा दिला आहे. अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांना आश्रय दिल्यास संबंधित हॉटेल्सवर हल्ले करू असा इशारा इराणने दिला आहे. इराणी क्षेपणास्त्र हल्ले आणि सहकारी दहशतवादी गटांसोबतच्या संयुक्त कारवायांनंतर अमेरिकन सैन्याने मध्यपूर्वेतील विविध हॉटेल्समध्ये आश्रय घेतला आहे. अमेरिकेच्या लष्करी पायाभूत सुविधांवर (military infrastructure) हल्ले झाल्यानंतर […]
पाकिस्तान सुपर लीग 2026 च्या हंगामाला गुरुवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरुवात झाली. मात्र, मैदानावर प्रेक्षकांची अनुपस्थिती आणि चेंडूचा बदललेला रंग या दोन गोष्टींमुळे हा सामना चांगलाच चर्चेत राहिला. सलामीच्या लढतीत शाहीन आफ्रिदीच्या लाहोर कलंदर्स संघाने मार्नस लॅबुशेनच्या हैदराबाद किंग्समन संघावर 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र या लढतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आंतरराष्ट्रीय फजिती झाल्याचे पाहायला […]
जम्मू आणि कश्मीर विधानसभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या निषेधार्थ आमदारांनी जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आंदोलन केले. घोषणाबाजी आणि पोस्टर्समुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या विषयावर चर्चेची मागणी करण्यात आली. त्यामुळे सभागृहात संघर्ष निर्माण झाला. नॅशनल कॉन्फरन्सच्या (NC) आमदारांनी इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची हत्या […]
जागतिक बाजारातील घडामोडी आणि मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा हिंदुस्थानी चलनाला मोठा फटका बसला आहे. डॉलरसमोर रुपयाच्या गटांगळ्या सुरूच आहे. शुक्रवारी 27 मार्च रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 94.70 इतक्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध भडकले. तेव्हापासून रुपयात सुमारे साडे तीन टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली […]
राज्यात १५ दिवस पुरेल इतका पेट्रोल साठा
अफवांवर विश्वास नको, राज्यातील इंधन पुरवठा सुरळीत पेट्रोल डिलर्स संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांची माहिती पणजी : इंधन संपण्याच्या भीतीमुळे लोकांमध्ये अजूनही घबराट आहे. आजदेखील लोकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केल्यामुळे काही पंपांवरील पेट्रोल साठा संपला आणि ते बंद करावे लागले. लोकांनी घाईघाईने गर्दी करून पेट्रोल आणि डिझेलचा साठा केल्यामुळे पंप मालकांचे गणित कोलमडले आहे. [...]
कृषी खात्याच्या संचालकपदी रीना मिनेझिस
गोव्याच्या इतिहासात प्रथमच महिलेची निवड पणजी : गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कृषी खात्याच्या संचालकपदी एका महिलेची निवड गोवा सरकारने केली असून येत्या 1 एप्रिल रोजी सध्याच्या ज्येष्ठ अधिकारी व कृषी उपसंचालिका रीना मिनेझिस या संचालकपदाचा ताबा घेतील. कृषी खात्यावर आतापर्यंत सर्व संचालक हे पुऊष होऊन गेले. प्रथमच या खात्यावर संचालिका म्हणून एका महिलेची निवड करण्यात आली [...]
महिन्यातील तिसरे जहाज मुरगाव बंदरात
26 हजार मेट्रिक टन इंधन, 15 दिवसांचा साठा वास्को : मे. सन्मार सितारा हे इंधनवाहू जहाज गुरुवारी मुरगाव बंदरात 26 हजार मेट्रिक टन इंधनासह दाखल झाले. या जहाजात 18 हजार मेट्रिक टन डिझेल तर 8 हजार मेट्रिक टन पेट्रोल आहे. नियमित सेवांतर्गतच हे जहाज इंधन साठ्यासह आलेले असून गोव्यात इंधन टंचाई नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. [...]
Kolhapur police transfers |कोल्हापूर पोलीस दलात खांदेपालट; २७ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांचा दणका कोल्हापूर – कोल्हापूर पोलीस दलातील २७पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी रात्री बदल्या करण्यात आल्या. यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार तर सहाय्यक निरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक निरीक्षक तबस्सुम मगदूम यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी [...]
बालेंद्र शाह घेणार नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ; असा होणार सोहळा
बालेंद्र शाह नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून शुक्रवारी शपथ घेणार आहेत. ते सनातन आणि पारंपरिक पद्धतीने शपथ घएणार असल्याने त्यांचा शपथविधी सोहळा विशेष होणार ठरणार आहे. शपथविधीचा मुहूर्त चैत्र नवरात्रीतील श्री रामनवमीच्या दिवसाशी जुळून आला आहे. हा शपथविधी सोहळा केवळ एक औपचारिक नसेल. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये रुजलेला हा एक विशेष सोहळा ठरणार आहे. या शपथविधीवेळी […]
सातार्डातील हॉटेल व्यावसायिकांवर चुलीवर भजी , वडे तळण्याची वेळ सातार्डा – गॅस सिलिंडर वेळेत भरून मिळत नसल्याने सातार्डा पंचक्रोशीतील हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत.मिर्ची, वडापाव हॉटेल व्यावसायिक मोहन पेडणेकर चुलीवर कढईमध्ये वडे, मिर्ची तळून ग्राहकांना देत आहेत.याआधी हॉटेल व्यावसायिकांकडे गॅस सिलिंडर उपलब्ध होते. मात्र हळूहळू गॅस सिलिंडर संपल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली [...]
Satara road accident |सातारा-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; निकम कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू
म्हसवडजवळ कारला भीषण अपघात सातारा – माण तालुक्यातील म्हसवडजवळ धुळदेव गावाच्या हद्दीत आज सकाळी भीषण अपघात घडला असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली [...]
Israel Iran War – देशात पुन्हा लॉकडाउन लागणार? केंद्र सरकारचे मोठे स्पष्टीकरण
आखाची देशातील युद्ध आणि जागतिक तेल संकटामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, देशात पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भात अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सोशल मीडियाद्वारे या सर्व अफवांचे खंडन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सरकार लॉकडाऊनचा कोणताही प्रस्ताव विचारात घेतलेला नाही. अशा कठीण […]
मनपाकडून 70 कोटींचा मालमत्ता कर वसूल
आढावा बैठकीत महसूल उपायुक्त डॉ. सिद्दू हुल्लोळी यांची माहिती : उर्वरित 8 कोटी वसुली बाकी बेळगाव : महानगरपालिकेच्या महसूल विभागाला 2025-26 मार्चअखेरपर्यंत 78 कोटीचा मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 70 कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. उर्वरित 8 कोटी रुपये वसूल करण्यासाठी 3 सॉफ्टवेअर सुरू करण्यात आले आहेत. तसेच 527 [...]
42 आरोपींकडून 1.20 कोटीचा मुद्देमाल जप्त
इंडी विभागात गेल्या तीन वर्षांत घडलेल्या चोऱ्यांचा उलगडा : विजापूर पोलिसांची कारवाई वार्ताहर/विजापूर इंडी उपविभागाच्या हद्दीत गेल्या तीन वर्षांत घडलेल्या विविध चोरी प्रकरणांचा उलगडा करण्यात विजापूर पोलिसांना यश आले आहे. सदर कारवाईत सोन्या-चांदीची दागिने, जेसीबी, पिकअप, स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर आदींसह सुमारे 1.20 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये आंतरराज्य चोरांसह एकूण [...]
अमेरिका, इस्रायल-इराणच्या युद्धात जागतिक चिंता वाढली आहे. अनेक देशात इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच या युद्धात इराणचेही प्रचंड नुकसान झाले आहे. तरी इराणे तेलाच्या व्यापारातून जबरदस्त कमाई केली आहे. या संकटाच्या काळात इराण तेलातून दररोज १३९ दशलक्ष डॉलर्स कमावत आहे, असा दावा अका अहवलाता करण्यात आला आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या काही व्यापारी जहाजांवर २ […]
म्हणे…बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य घटक
असा ठराव विशेष सर्वसाधारण सभेत संमत करण्याची महापौर-उपमहापौरांकडे कन्नड संघटनेची मागणी : मनपात पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता बेळगाव : महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदी कन्नड भाषिक नगरसेवकांची वर्णी लागल्यापासून कन्नड संघटनांची वळवळ पुन्हा एकदा सुरू झाली आहे. बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य घटक असून महाजन अहवालच अंतिम असा ठराव विशेष सर्वसाधारण सभेत संमत करावा, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी [...]
केआयडीबी येथील उद्योजकांना अखेर पीआयडी, ई-आस्थीचे वितरण
बेळगाव : पीआयडी व ई-आस्थीवरून केआयडीबी आणि महापालिकेच्या अशोकनगर कार्यालयात सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. उद्योजकांच्या आंदोलनाला यश आले असून मनपाकडून पीआयडी व ई-आस्थी देण्यात आली आहे. केआयडीबी औद्योगिक वसाहत महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यास नकार दिला जात आहे. मात्र तेथील मिळकतींना पीआयडी आणि ई-आस्थी देण्यासंदर्भात महापालिकेच्या 2 मार्चच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार [...]
शिवाजीनगर येथील ‘त्या’ चोरी प्रकरणी महिलेला अटक
बेळगाव : शिवाजीनगर येथील एका घरात झालेल्या चोरी प्रकरणी त्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीला अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून तिच्याजवळून 9 लाख 27 हजार 990 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सुरेखा बसवराज तलवार (वय 40) [...]
विविध ठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी
बेळगाव : श्री राम जय राम जय जय राम हा नामजप, रामरक्षा पठण, तीर्थप्रसाद वितरण, स्तोत्र पठण अशा विविध धार्मिक विधींनी शहर परिसरात रामनवमी साजरी करण्यात आली. दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. काही ठिकाणी तीर्थप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप.सोसायटी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात लोकमान्य [...]
ज्येष्ठ दशावतारी कलावंत नाना गावकर यांना दशावतार जीवन गौरव पुरस्कार
पणजी येथील कला व संस्कृती संचालक भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण ओटवणे : प्रतिनिधी ओटवणे येथील प्रसिद्ध कलाकार आना उर्फ नाना धोंडीराम गावकर यांच्या दशावतार कलेतील गेल्या पाच दशकातील योगदानाची दखल घेऊन त्यांना गोवा येथील आर्ट्स टुरिझम अँड कल्चर फेस्टिवल समिती आणि श्री नागेश महारुद्र फाउंडेशनचा दशावतार जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पणजी येथील [...]
इराण-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र, 10 लाखांहून अधिक सैनिक सज्ज; तणाव शिगेला
इराण आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असून संभाव्य भूप्रदेशीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठी लष्करी तयारी सुरू केली आहे. इराणमधील भरती केंद्रांवर तरुण स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याची माहिती समोर आली आहे. तेहरानस्थित ‘तस्नीम’ वृत्तसंस्थेने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणने 10 लाखांहून अधिक ग्राउंड फायटर्सची संघटना केली असून हे सैनिक लढाईसाठी पूर्णपणे तयार आहेत. […]
Murgaud Accident |निपाणी-मुरगूड रस्त्यावर भीषण अपघात; देवगडच्या तरुणाचा जागीच मृत्यू
स्पीड ब्रेकर ठरला जीवघेणा; दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू मुरगूड -निपाणी – मुरगूड रस्त्यावर जवाहरलाल तलाव मार्ग वळणाजवळ देवचंद कॉलेजच्या पुढील बाजूस असणाऱ्या स्पीड ब्रेकरवरून दुचाकी उडाल्यामुळे रस्त्यावर आपटून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला संकेत दिलीप चव्हाण (वय ३८) मूळ गाव मुरगुड, ता. कागल सध्या रा. तुळशीकाटे जामसंडे ता. [...]
श्रीराम नवमीनिमित्त भक्तिमय वातावरणात शोभायात्रा
श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने आयोजन : शहरवासियांचा उत्स्फूर्त सहभाग बेळगाव : शहरात श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने गुऊवारी भव्य आणि आकर्षक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. आंबेडकर उद्यान येथून सुरू झालेल्या या शोभायात्रेला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शोभायात्रेत संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात रंगून गेले होते. शोभायात्रेचा शुभारंभ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, उद्योजक शिवराज जाधव, रणजित चव्हाण-पाटील [...]
शहापूर येथे लोककल्पतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत लोककल्प फौंडेशनतर्फे राम मंदिर, आचार्य गल्ली, शहापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आल्या. सुमारे 60 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी सेंट्रा केअर हॉस्पिटलच्या डॉ. सना हुदली, परिचारिका दिप्ती कांबळे व प्रज्योत हिरेमठ, पीआरओ विनायक ताम्हणकर व [...]
रामलिंगखिंड-रिसालदार गल्लीतून दोन मोकाट जनावरे पकडली
बेळगाव : रामलिंगखिंड गल्ली आणि रिसालदार गल्ली परिसरात फिरणाऱ्या दोन मोकाट गायींना महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून गुरुवारी पकडण्यात आले. पकडलेल्या दोन्ही गायींची रवानगी श्रीनगर येथील गोशाळेत करण्यात आली आहे. शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम मध्यंतरी थंडावली होती. मात्र आता पुन्हा महापालिकेचा पशुसंगोपन विभाग सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात फिरणाऱ्या मोकाट गायींना पकडले जात [...]

29 C