उन्हाळी सुट्टीत मुंबई-मडगाव मार्गावर 18 विशेष गाड्या धावणार; मध्य रेल्वेकडून सुधारित वेळापत्रक जाहीर
उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबई-मडगाव मार्गावर 18 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या गाड्या 5 एप्रिल 2026 ऐवजी 12 एप्रिल 2026 पासून चालविण्यात येतील. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, […]
दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे लखनऊमध्ये इमर्जन्सी लँडिंग
बागडोगरा (सिलिगुडी) येथून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. धुराचा अलार्म वाजल्याने चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षित उतरवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एअरबस ए320 हे विमान सोमवारी सायंकाळी सिलिगुडीहून दिल्लीला चालले होते. चालवले जाणारे हे विमान (IX1523), सोमवारी संध्याकाळी लखनौकडे वळवण्यात आले. विमानातील एव्हियोनिक्समधून धूर येत असल्याचे लक्षात येताच […]
बिहारमध्ये मंत्री बनण्यासाठी 27 आमदारांकडून तांत्रिक पूजा, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमधील राजकारणात मोठा ट्विस्ट आला. नितीश कुमार हे राज्यसभेवर गेल्यामुळे रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदासाठी सध्या भाजपमध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याचेही समोर येत आहे. अद्याप बिहारमध्ये नवीन सरकार कधी बसेल ते ठरलेले नसले तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात तांत्रित पूजा होत असल्याचे बोलले जात आहे. बिहारमधील जवळपास 27 आमदारांनी तांत्रिक […]
Chhattisgarh News –विजापूरमध्ये 25 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 12 महिलांचा समावेश
विजापूर जिल्ह्यातील दंडकारण्य विशेष विभागीय समितीशी (DKSZC) संबंधित 25 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये 12 महिलांचा समावेश आहे. या आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांवर एकूण 1.47 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आत्मसमर्पणासोबतच सुरक्षा दलांनी जप्ती मोहीम राबवली. यामध्ये 14.06 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली. या मालमत्तेमध्ये 2.90 कोटी रुपयांची रोकड आणि 11.16 कोटी रुपये किंमतीचे […]
हिंदुस्थानच्या न्यायव्यवस्थेवर टीका होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी परखड मत व्यक्त केले आहे. आपल्या देशातील न्यायव्यवस्था लोकांचा न्यायदानावरील विश्वास टिकवण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. हिंदुस्थानी न्यायव्यवस्था लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेली नाही, असे मत माजी न्यायमूर्ती ओक यांनी एका व्याख्यानादरम्यान मांडले. जर कोणी असे म्हणणार असेल की सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर गाढ […]
Keral Assembly Election –डोनाल्ड ट्रम्प, व्लादमिर पुतीन, जिनपिंग केरळमध्ये करतायत प्रचार!
केरळमध्ये विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस उरले आहेत. केरळमध्ये 9 एप्रिल रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी प्रचारात जोर लावला आहे. डावे पक्ष आपली सत्ता राखून ठेवण्यासाठी तर भाजप सत्तेत येण्यासाठी सर्वोत्तपरी प्रचार करत आहे. त्यातच आता केरळच्या विधानसभा निवडणूकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतीन यांनी एन्ट्री […]
आमच्याकडून कच्चे तेल विकत घ्या नाहीतर होर्मुझमध्ये स्वतःच लढा, ट्रम्प यांची मित्र राष्ट्रांवर आगपाखड
इराण युद्धात साथ न दिल्यामुळे संतप्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मित्र राष्ट्रांना विशेषतः ब्रिटनला खडे बोल सुनावले आहेत. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत मित्र राष्ट्रांना दोन सल्ले दिले आहेत. एक तर अमेरिकेकडून कच्चे तेल विकत घ्या. अमेरिकेकडे भरपूर तेलसाठा आहे. दुसरे म्हणजे मित्र राष्ट्रांनी धैर्य दाखवावे आणि होर्मुझमध्ये स्वतःच लढावे. अमेरिका आता मदतीला […]
IPL 2026 चा उद्घाटन सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात 28 मार्च रोजी पार पडला. मात्र, या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. याप्रकरणी बेंगळुरूच्या कब्बन पार्क पोलिसांनी मोठी कारवाई करत मोबाईल चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून, यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
दुबईत क्षेपणास्त्राचे अवशेष निवासी इमारतीवर कोसळले, दोन हिंदुस्थानी नागरिकांसह चौघे जखमी
दुबईच्या अल बदा भागातील निवासी इमारतींवर क्षेपणास्त्राचे अवशेष कोसळल्याने दोन हिंदुस्थानी नागरिकांसह चौघे जण जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये एका बांगलादेशी आणि एका श्रीलंकन नागरिकाचा समावेश आहे. या घटनेत मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. आखाती देशांतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. इराण आखाती प्रदेशात सक्रियपणे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, […]
कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पतीचा मृतदेह पाहताच धक्का सहन न झाल्याने त्याच्या पत्नीनेही इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. भानू चंदेर रेड्डी (३७)असे पतीचे तर शाझिया (३४) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. नऊ वर्षांपूर्वी त्यांचे […]
मध्यरात्री समुद्रात थरारक पाठलाग, एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या तीन नौका जयगड समुद्रात पकडल्या
मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या गस्तीनौकेकडे डिझेल नसल्याने एलईडी दिवे लावून बिनधास्त समुद्रात मासेमारी सुरू होती.हिच संधी ओळखून मत्स्यव्यवसाय विभागाने तात्काळ डिझेल उपलब्ध करून सोमवारी मध्यरात्री थरारक पाठलाग करून एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या तीन नौका जयगड येथे पकडल्या आहेत. कारवाईसाठी मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाने एक पथक तयार केले त्यामध्ये परवाना अधिकारी चिन्मय जोशी,पार्थ तावडे,स्वप्नील […]
अभिनेता रितेश देशमुख याचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्टचा असलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा आज फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. या द्वारे रितेशने आज त्याच्या चित्रपटातील तगडी स्टारकास्ट व त्यांचे चित्रपटातील लूक जगासमोर आणले आहेत. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, विद्या बालन अशी मोठी स्टारकास्ट आहे. ज्या मातीने घडवलं त्या मातृभूमीसाठी रयतेने दाखवलेल्या विश्वासासाठी, आणि […]
IPL 2026 –ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या मृत्यूवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया
IPL 2026 च्या ब्रॉडकास्ट टीममधील अनुभवी ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान विलियम लँगफोर्ड यांचे मुंबईत निधन झाले आहे. 76 वर्षीय लँगफोर्ड हे मूळचे ब्रिटिश नागरिक असून ते आयपीएलच्या प्रसारणाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. 30 मार्चच्या सकाळी दक्षिण मुंबईतील हॉटेलच्या खोलीत ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. […]
Photo –मृणाल ठाकूर ब्लॅक अॅण्ड बोल्ड
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या ब्लॅक कॉर्सेटमधल्या हटके फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
राज्य सरकारने मंगळवारी दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या सात महिन्यात दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आली आहे. आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल व वन विभागाचे सचिव या पदावर करण्यात आली आहे. गेल्या 21 वर्षातील ही त्यांची 24 वी बदली आहे.
67 विकेट घेऊनही दुर्लक्षित, निवड समितीला संदेश देत निवृत्तीवर शमी थेट बोलला
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. मात्र, तरीही त्याला अद्याप टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. याच दरम्यान त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या. आता त्याने त्याबद्दमल मोठे विधान केले आहे. मोहम्मद शमीने 2025-26 च्या घरगुती हंगामात बंगालसाठी 67 बळी […]
केवळ संशयाच्या आधारे व्यक्तीला दोषी ठरवता येणार नाही; हायकोर्टाचा निर्वाळा
नवी मुंबईत 16 वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यात तरुणाची जन्मठेप रद्द करीत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी पक्ष आणि पोलिसांना झटका दिला. केवळ संशयाच्या आधारे एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि हत्येच्या आरोपाखाली जन्मठेप भोगत असलेल्या संजय पोखरकरची निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने हा निकाल […]
अशोक खरात यांनी अजितदादा यांच्या फोटोवर फुल्या मारलेल्या, रोहित पवार यांचा आरोप
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्युचा अशोक खरात याच्याशी देखील संबंध असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अनेकदा केला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी या प्रकरणी अशोक खरात याने जादूटोणा करण्यासाठी अजित दादांच्या फोटोवर फुल्ल्या मारल्याचा दावा केला आहे. रोहित पवार यांनी याबाबत ट्विट केले आहे. अजित पवारांसोबतच महाराष्ट्रातील […]
IPL 2026 –चेन्नईचा सुपडा साफ होण्यामागे 5 खेळाडू ठरले कारणीभूत, चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा
IPL 2026 मधील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्स वर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेचा पूर्ण संघ अवघ्या 127 धावांत आटोपला. त्यानंतर राजस्थानने केवळ 12.1 षटकांत 128 धावांचे लक्ष्य सहज गाठत एकतर्फी विजय नोंदवला. या सामन्यात चेन्नईचा खेळ अगदीच सुमार राहिला. गोलंदाजांसह फलंदाजांनीही निराशाजनक खेळ केल्याने […]
पत्नीच्या माहेरच्या संपत्तीवर पतीचा हक्क नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा
वारसाहक्काबाबत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. एखाद्या महिलेला माहेरून वारसाहक्काने संपत्ती मिळाली असेल. मात्र मृत्यूपत्र करण्याआधी तिचा मृत्यू झाला तर त्या संपत्तीवर सासरच्यांचा किंवा पतीचा कोणताही हक्क राहणार नाही. ती संपत्ती वडिलांच्या वारसदारांकडे जाईल, असा महत्वपूर्ण निर्वाळा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला. हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956 च्या कलम 15(2)(अ)च्या आधारे न्यायमूर्ती तरलदा राजशेखर राव […]
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. या प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणे हा गृह विभागाचा कुटिल डाव असल्याची टीका त्यांनी केली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यातील महायुती सरकार पोखरले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ असल्याचे सांगितले जात असेल तरी त्यांची संख्या मोठी आहे. पण गृहविभागाकडून काही सिलेक्टिव्ह […]
Israel-Iran War –अमेरिका युद्धातून बाहेर पडण्याचे ट्रम्प यांचे संकेत; शेअर बाजाराला तेजीचे वेध
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाची तीव्रता वाढत आहे. त्यातच आता होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली झाली नाही तरी युद्धातून बाहेर पडण्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात तेजी दित आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतही घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने शेअर बाजाराला आता तेजीचे वेध लागले आहेत. शेअर बाजारात मोठ्या तेजीची […]
प्रत्येक विभागाचा आढावा घेवून जिल्हा परिषदेत कामाचे नियोजन- सीईओ महाडदळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अंतर्गमत असलेल्या प्रत्येक विभागाच्या कामाचा आढावा घेवून पुढील नियोजन करण्यात येईल. लोकाभिमुख्य प्रशासन, तसेच शिक्षण व आरोग्य सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करण्यासाठी भर देण्यात येईल. अशी माहिती नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची सांगली जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. यामुळे त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी नवीन सीईओ म्हणून महाडदळकर यांनी पदभार स्विकारला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष उषा गायकवाड यांच्यासह सर्व सभापती व जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांची भेट घेवून स्वागत केले. यावेंळी बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक विभागाचा आढावा घेवून काम केले जाणार आहे. सद्यस्थितीत विविध योजना कोणत्या स्थितीत आहेत आणि त्या पूर्णा करण्यासाठी काय करावे लागेल, या संदर्भात मायक्रो प्लॅनिंग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जि. प. सीईओ महाडदळकर यांनी आयएशसच्या प्रशिक्षणार्थी म्हणून उमरगा, तुळजापूर व धाराशिव येथे काम केल्यामुळे त्यांना जिल्ह्याची बऱ्यापैकी माहिती आहे.
उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाला
उमरगा (प्रतिनिधी)- देशातील अग्रगण्य व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नवभारत टाईम्स, दिल्ली या वृत्तसंस्थेतर्फे दिला जाणारा “उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार”आपल्या उमरगा येथील “श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ” या संस्थेला आज छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री अतुल सावे व आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर यांना भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी आदर्श वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्री. राम सोलनकर, श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य राम पेठकर व तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 10 सप्टेंबर 1984 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने अत्यंत उल्लेखनीय व गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तबझाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील व सरचिटणीस, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी प्राचार्य तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
Umdi accident |पंढरपूर-विजयपूर महामार्गावर काळजाचा थरकाप! कंटेनर आणि इको कारचा भीषण अपघात, चालक ठार
उमदी येथे इको गाडीचा भीषण अपघात उमदी -पंढरपूर-विजयपूर या वर्दळीच्या महामार्गावर उमदी गावाजवळ कंटेनर आणि इको कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात इको कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाचा मृत्यू झाला आहे. उमदी येथील स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कारमधील इतर [...]
लोहार-सुतार समाजाच्या चळवळीला नवे बळ; जिल्हास्तरीय कोअर कमिटीची घोषणा, बाळासाहेब लोहार अध्यक्षपदी
सातारा, लोहार–सुतार समाज, कोअर कमिटी स्थापन सातारा – सातारा जिल्ह्यात लोहार–सुतार समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. समाजाला एकत्र आणत ‘कोअर कमिटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे समाजाच्या चळवळीला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीची सुरुवात [...]
श्री तुळजाभवानी देवी चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी व्यापक तयारी; स्वच्छता व सुरक्षेवर भर
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचा चैत्र पौर्णिमा उत्सव यंदा दिनांक 30 मार्च 2026 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने चैत्र यात्रेची आवश्यक तयारी करण्यात आली आहे. उत्सव कालावधीत 31 मार्च, 1 एप्रिल व 2 एप्रिल रोजी देवीची पारंपरिक छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून, 1 एप्रिल रोजी देवीचा जोगवा असणार आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिस विभाग, आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासन यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिराकडे येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, उन्हापासून संरक्षणासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता दिनांक 31 मार्च ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत सर्व भाविकांना बीडकर पायऱ्या मार्गे प्रवेश देण्यात येणार आहे. गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशी आहे व्यवस्था भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही विशेष काळजी घेण्यात आली आहे. सोलापूर येथील प्रॉक्टो क्लिनिकच्या वतीने प्रथमोपचार पेट्यांमध्ये आवश्यक असणारी औषधे प्राप्त झाली आहे. तसेच उष्माघात टाळण्यासाठी ज्युस टेट्रापॅकचे वाटप करण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दर्शन मंडपात पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जाणार आहे. दर्शन मंडप व मंदिर परिसरात प्रकाशयोजना, फॅन, कुलर व एअर कुलिंग व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. गाभाऱ्यातील एअर कुलिंग प्लांटचे सर्व्हिसिंग पूर्ण झाले असून, जनरेटर व अग्निशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दिशादर्शक व सूचनादर्शक डिजिटल फलक बसविण्यात आले आहेत. तसेच अनाउन्समेंट सिस्टीमद्वारे वेळोवेळी सूचना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत रेफरल दर्शन पास बंद ठेवण्यात आले आहेत.
सेवानिवृत्ती नव्हे तर सामाजिक सेवेचा प्रारंभ- बसवराज पाटील
मुरुम (प्रतिनिधी)- काकांनी ज्या उद्देशाने शैक्षणिक संस्था उभी केली. त्या हेतूनेच वरिष्ठ महाविद्यालयात चांगली माणसे नियुक्त केली. ती गुणात्मक, दर्जात्मक, चांगल्या विचारांची राहावीत, या भूमिकेतूनच चांगली माणसे निर्माण होणे, ही संस्थेची परंपरा राहिली असून ज्या कर्मचाऱ्यांनी संस्थेत राहून मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळेच संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात नाव होत आहे. महाविद्यालयातील कर्मचारी हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत असले तरी ही त्यांची सेवानिवृत्ती नव्हे तर सामाजिक सेवेचा प्रारंभ असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजपचे लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. कार्यालयीन अधीक्षक राजू ढगे यांचा सोमवारी (ता. 30) रोजी नगर शिक्षण विकास मंडळाच्या वतीने माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बसवराज पाटील व बापूराव पाटील यांच्या हस्ते राजू ढगे व मायाताई ढगे यांचा संपूर्ण आहेर उपचार करून सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बसवराज पाटील होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, माजी प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, बीडचे कार्यकारी अभियंता शरीफ पटेल, धनराज मंगरूळे, मदन पाटील, देवेंद्र कंटेकुरे, प्राचार्य उल्हास घुरघुरे, इरफान मुजावर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी चैतन्यमूर्ति माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की, वैजनाथराव ढगे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या चिरंजीवाला उत्कृष्ट शिक्षण, संस्कार दिले. त्यांनी माधवराव (काका) पाटील परिवाराचे ऋणानुबंध कायम ठेवत प्रामाणिक, निष्ठा व कष्टाच्या जोरावर काम करत राहिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन काकांनी त्या काळात राजू ढगे यांना शिक्षण संस्थेत काम करण्याची संधी दिली. त्यांनी देखील चांगले विचार जोपासून या परिसरात आपली ओळख निर्माण केली. आज ते सेवानिवृत्त होत असून, त्यांनी पुढील काळातही समाजासाठी चांगले कार्य करत रहावे. सत्काराला उत्तर देताना ढगे म्हणाले की, या संस्थेने मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. विविध शाळेतील सहशिक्षक, सहकारी मित्र, नातेवाईक, शहरातील पदाधिकारी-कार्यकर्ते आदींनी त्यांचा सत्कार केला.
शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू- उषाताई गायकवाड.
मुरुम (प्रतिनिधी)- आदरणीय रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांच्या उमरगा विधानसभा धाराशिव लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या निमित्ताने मी खंबीरपणे त्यांच्या सोबत होते. जनतेत सहभागी होत होते जनतेच्या प्रेमामुळेच माझ्या स्वप्नात नसतानाही मला धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होता आले. प्राध्यापक रवी सरांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली मी जिल्हा परिषदेमध्ये काम करताना शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवेन असे आश्वासन चंद्रकांत गणपतराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात सन्माननीय उषाताई रवींद्र गायकवाड उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आणि आरोग्य जिल्हा परिषद, धाराशिव यांनी उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच माझ्यासहित अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. उमरगा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी माननीय राजपूत साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक गणपतराव पाटील होते. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काक्रंबा वाडी तुळजापूर इथून आपल्या सेवेचा प्रारंभ केला तर नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलदेव निंबाळा पदवीधर पदोन्नती नंतर सुपतगाव, समुद्राळ येथे कार्य केले. विषय तज्ञ समावेशित शिक्षण अपंग विभाग यात दोन वर्षे सेवा केली. लमाण तांडा डाळिंब सहशिक्षक, निलेगाव तालुका तुळजापूर तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेगुर येथे पाच वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावतानाच सेवानिवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात विस्तार अधिकारी डाळिंब बीट म्हणूनही त्यांनी कार्य केले. धाराशिव जिल्ह्यामध्ये शिक्षक समितीची स्थापना करत धाराशिव जिल्हा शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. शिक्षक आणि विद्यार्थी प्रिय विविध विषयांवरचा अभ्यास असलेले मनमिळावू ,सहनशील, उपक्रमशील शिक्षक चंद्रकांत पाटलांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्यामध्ये विविध मान्यवरांनी सत्कार केला. विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनानंतर धाराशिव जिल्हा परिषदेच्या नूतन उपाध्यक्ष सन्माननीय उषाताई रविंद्र गायकवाड यांचा सत्कार पाटील कुटुंबीयांच्या वतीने मुख्याध्यापिका रसिका पाटील मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलदेव निंबाळा यांनी केला. गटशिक्षणाधिकारी माननीय अमोल राजपूत साहेब यांचा सत्कार रमेश पाटील सहाय्यक कृषी अधिकारी उमरगा यांनी केला. पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब स्वामी यांचा सत्कार बालाजी बिराजदार जिल्हा उद्योग अधिकारी कोल्हापूर यांनी केला. सेवा निवृत्तीनिमित्त सन्माननीय उषाताई गायकवाड यांनी विस्तार अधिकारी तथा मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील आणि मुख्याध्यापिका रसिका पाटील यांचा सपत्नीक शाल फेटा आणि हार देऊन सत्कार केला. नुकतीच कलदेव निंबाळा ग्रामपंचायत उपसरपंचपदी मीरा पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मीरा पाटील आणि सहाय्यक कृषी अधिकारी रमेश पाटील यांचा सपत्नीक सत्कार धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सन्माननीय उषाताई गायकवाड यांनी करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माननीय कोकळगावे सर केंद्रप्रमुख, क्षीरसागर सर यांनी केंद्रीय प्राथमिक शाळा डाळिंब केंद्राच्या वतीने चंद्रकांत पाटील आणि रसिका पाटील यांचा सत्कार केला. बलसुर केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख माननीय गोपी पवार भुसार सर यांनी शाल फेटा आणि विठ्ठल मूर्ती देऊन सन्मान केला. माननीय तावशीकर मुख्याध्यापक शहीद भगतसिंग हायस्कूल यांच्या वतीने चंद्रकांत पाटलांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक शाळा येणेगुरच्या सर्व सहकाऱ्यांकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार करण्यात आला. श्रीधर डोंगरे, सरोजा डोंगरे, निवृत्त मुख्याध्यापक गोविंदराव डोणगावे ,कल्लेश्वर गायकवाड ,सुबोध फुलारी, सोलापूर, जि. प. प्रा. शा. महालिंगरायवाडीचे सर्व स्टाफ, जाधव सर भालेराव सर, मुल्ला सर ,यादव मॅडम, भोसले मॅडम, ज्ञान प्रसारक विद्यालय, सुंदरवाडी यांच्यावतीने माननीय अभिमन्यू गायकवाड ,धुळे सर, यांनी सत्कार केला. संतोष कांबळे पंचायत समिती उमरगा, यांनीही चंद्रकांत पाटलांचा सत्कार केला.डॉ. रमाकांत पाटील यांनी पाटील कुटुंबीयांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिष्कृत भारत आणि मूकनायक वृत्तपत्राचे संपादकीय पुस्तक भेट देऊन सत्कार केला. चिरंजीव सुजित चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांच्या निवृत्ती निमित्त निवृत्तीवर आधारित दोन अतिशय अर्थगर्भ कविता सादर केल्या. कार्यक्रमासाठी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुभाष वैरागकर, केसर जवळगा ग्रामपंचायतचे माजी सरपंच विष्णू रामजी पाटील ,कलाकार पाटील, अनिल जामगे, पुणे पोलीस, दिगंबर कल्याणकर, ग्रामसेवक ,सोलापूर, मोहन डोणगावे ,ग्रामसेवक पुणे, मोहन पाटील गजानन डोणगावे, अरुण डोणगावे, शितल पाटील तृप्ती, पाटील,दाळिंब बलसुर केंद्रातील शिक्षक शिक्षिका परिसरातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार डॉक्टर रमाकांत पाटील यांनी मांडले.
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे बालाजी अमाईन्स लि., रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात पार पडले. शिवरत्न नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित या शिबिरात तामलवाडी व परिसरातील तब्बल 600 नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली, तर 450 लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच तपासणीदरम्यान 95 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले. या शिबिराचा उद्देश नागरिकांमध्ये नेत्र आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गरजू रुग्णांना मोफत तपासणी, चष्मे व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून अशा समाजोपयोगी उपक्रमांसाठी सर्व संस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी बालाजी अमाईन्स यांच्या निधीतून मदत देण्यात आली. शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाचे डॉ. सुधीर सुधाळ व त्यांच्या टीमने सर्व रुग्णांची तपासणी केली. शिबिरासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, प्रमुख अनिल विपत, दत्तात्रय पडणे, यशवंत लोढे, आर. सुब्बा शास्त्री (जनरल मॅनेजर) यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, अशा शिबिरांची गरज अधोरेखित झाली आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; पेठनाका येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू!
ईश्वरपूर पेठनाका, भरधाव कारची धडक, दुचाकीस्वार ठार ईश्वरपूर -बेंगलोर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पेठनाका येथे भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या बहकेत दुचाकीरवार विशाल हरिशचंद्र काळबागे (३७ रा. चिखलगोठण ता. तासगाव) हा ठार झाला. हा अपघात रविवार २९ मार्च रोजी ११ च्या सुमारास घडला. विशाल काळबागे हा पल्लार क्रमांक [...]
शाळा एकत्रीकरणास शालेय व्यवस्थापन समितीचा विरोध
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आयुक्त यांच्या दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजीच्या पत्राचा हवाला देऊन धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांना काढलेल्या पत्रानुसार एकाच कॅम्पसमध्ये भरत असलेल्या विविध शाळांचे एकत्रिकरण करण्याचा हुकूमशाही पद्धतीने काढलेल्या आदेशास शालेय व्यवस्थापन समिती तसेच अन्य पालकांनी तीव्र विरोध केला असून सदर शाळा जैसे थे ठेवण्याची मागणी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीने एकाच कॅम्पसमधील अन्य शाळांचे एकत्रीकरणास विरोध दर्शविण्याचा ठराव संमत करून त्या ठरावाच्या प्रतिसह लेखी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव व गटशिक्षणाधिकारी कार्यालय तुळजापूर यांना दिनांक 27 मार्च 2026 रोजी दिले आहे. एकाच कॅम्पस मधील शाळा एकत्रिकरण करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने दिनांक दि. 27 मार्च 2026 रोजी तातडीने बैठक घेऊन सदर बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा पत्रकार संजय रेणुके यांनी सूचक म्हणून शाळा एकत्रीकरणास विरोधाचा ठराव मांडला. सदर ठरावास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद गंगणे यांनी व अन्य सदस्यांनी एकमुखाने संमती दर्शवली. त्यामुळे सदर ठराव बहुमताने संमत होऊन पारित करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्रशालेच्या कॅम्पसमध्ये असलेली जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा ( इयत्ता 1 ली ते 7 वी ) व जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा ( इयत्ता 1 ली ते 4 थी ) या दोन्ही शाळांच्या स्वतंत्र शालेय व्यवस्थापन समित्यांनीही उपरोक्तपणे शाळा एकत्र करण्याच्या निर्णयास विरोध करण्याचा ठराव संमत करून सदर ठरावाची प्रत व लेखी निवेदन संबंधित प्रशासनाला दि. 27 मार्च 2026 रोजी दिले. तुळजापूरच्या गटशिक्षण कार्यालयाने संबंधित मुख्याध्यापकाच्या नावाने दिनांक 23 मार्च 2026 रोजी हिटलरशाही पद्धतीने काढलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे की दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार काही शाळांचे यु-डायस बंद करण्यात आले आहेत. अशा शाळांनी आपले विद्यार्थी एकत्र केलेल्या शाळेत बसविण्यात यावेत. बंद केलेल्या शाळेकडील स्थावर, जंगम मालमत्तेची व सर्व शाळेची अभिलेखे एकत्र केलेल्या शाळेत वर्ग करण्यात यावेत. तसेच यु डायस बंद केलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी यु-डायस चालू असणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या नियंत्रणाखाली कार्य करावे. असा बिनबुडाचा व बेजबाबदारपणाचा आदेश असल्याचे शालेय व्यवस्थापन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. संबंधीतांचा आदेश म्हणजेच बाजारात जावा कांदे, बटाटे, टमाटे, मिरच्या, दोडके, वांगे, भोपळे, रताळे, गाजर, केळे इत्यादी साहित्य घेऊन एका पोत्यात भरून आमच्या कार्यालयाला सादर करावे असे प्रशासनाला म्हणायचे आहे का ? असा संतप्त सवाल विविध शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शाळा एकत्रीकरण करणे म्हणजे एवढे साधे, सरळ, सोपे काम आहे का ? सदर शाळा एकत्र करण्याचे काम हे एका दिवसात करण्याचे आदेश दिले आहेत व त्यास शिक्षण विस्तार अधिकारी यांनी मूर्त स्वरूपही दिले आहे. हे अत्यंत संतापजनक व बेजबाबदारपणाचे आहे. या निर्णयास जळकोट येथील शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांसह पालकांतून तीव्र विरोध करून संताप व्यक्त केला जात आहे. शाळा एकत्रीकरण करण्याचा निर्णय घ्यायच्या अगोदर संबंधित शाळेतील शाळा व्यवस्थापन समित्यांचे मत विचारात घ्यावे असे संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटले नाही. वास्तविक शालेय व्यवस्थापन समित्या या शासनाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या असताना त्यांच्या मतांचा कसलाही विचार न घेता उपरोक्त एकतर्फी निर्णय लादण्यात आलेला आहे. शाळा व्यवस्थापन समित्या काय विटी दांडूचा खेळ खेळण्यासाठी स्थापन केलेल्या आहेत का ? प्रशासनातील अधिकाऱ्यांचा खरोखरच तसा समज होत असेल तर संबंधित शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी दांडू घेऊनच जिल्हा परिषदेवर आक्रमण करतील. व पुढिल विपरीत होणाऱ्या कृतीस संबंधित अधिकारीच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी अशा संतप्त भावना पालकांतून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने व शासनाने एकाच कॅम्पसमधील शाळा एकत्रिकरण करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा व त्या त्या शाळा स्वतंत्रपणे चालू ठेवण्यास संमती द्यावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, तज्ञ शिक्षक प्रेमी, पालक, नागरिकांतून केली जात आहे.
दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा
तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग, अक्कलकोट रस्ता संपादनाबाबत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत संपादन प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या अधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यात यावी यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय क्रॉग्रेस महाराष्ट्र याना तुळजापूर येथे शेतकरी न्याय हक्क यात्रेच्या निमित्ताने आलेले हर्षवर्धन सकपाळ यांना निवेदन देवुन या निवेदनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग-अक्कलकोट रस्ता बाधित क्षेत्र संपादन करण्याचे आदेश मुबंई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने आदेश दिलेले आसताना शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी या मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सहा व सोलापूर जिल्ह्यातील सात गावची संयुक्त मोजणी जिल्हाधिकारी धाराशिव व सोलापूर यांच्या देखरेखेखाली करण्यात येऊन या मोजणीत बाधित झालेले क्षेत्र संपादन करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आसताना यात जाणिवपुर्वक दिरंगाई केली जात आसल्याने दिरंगाई करणाऱ्या संबधित अधिकारी याच्या वरती करवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर व धाराशिव याना पत्र देवुन शेतकऱ्यांनरती आन्याय करणाऱ्या अधिकारी यांच्या वरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आसे निवेदन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले यावेळी दिलीप जोशी, सरदारसिग ठाकुर, व्यकट पाटील, पंडीत पाटील, गुलाब शिदे, अजमोददीन शेख, बालाजी ठाकुर, लक्ष्मण निकम, काशिनाथ काळे, बंडु मोरे, श्रीकात पोतदार, दशरथ सिग ठाकुर, आकाश निकम, दत्ता निकम ईत्यादी शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
निलेखन न करताच समाजमंदिर पाडणा-यावर कारवाई करण्याची मागणी
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील निलेखन न करताच समाजमंदिर पाडणा-यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अमोल कसबे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,तेर येथील लहुजीनगर येथील मध्यवर्ती मातंग समाजमंदिर हे ग्रामपंचायत कार्यालय व शासनाच्या माहीतीत असतानाही कोणताही निलेखन ठराव न करता ,वरीष्ठ अधिकारी यांची परवानगी न घेता सदर समाजमंदिर पाडण्यात आले आहे.या समाजमंदिरावर तीन ते चार महिन्यांपूर्वी पंचेविस ते तीस हजार रुपये दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आलेले आहेत.ही बाब गंभीर असून ग्रामपंचायत अधिनियम व नियमांचे उल्लंघन आहे.सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आहे.अनुसुचित जाती वस्तीतील समाजमंदिर पाडण्याने एस.सी/एस टी (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम लागू होण्याची शक्यता आहे.या प्रकरणी सदर पाडकामाची चौकशी करून दोषी संबंधित व्यक्ती विरूद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्याची मागणी तेर ग्रामपंचायतचे सदस्य अमोल कसबे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी,मुख कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी,तेर ग्रामपंचायत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोमवल्ली प्रसादाचे 2 एप्रिलला वाटप- वेदमूर्ती धनेश जोशी
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे आयोजित अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाच्या ठिकाणी 2 एप्रिलला सोमवल्ली प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती वेदमूर्ती धनेश जोशी यांनी दिली. सोमवल्ली म्हणजे पृथ्वीतलावरील अमृत आहे.ती दिव्य औषधी वनस्पती आहे.पूर्ण भारतामध्ये दुर्मिळ आहे.पण धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग घाट अभय अरण्य येथे सोमवल्ली मिळते.त्या सोमवल्लीचे पूर्ण तीन दिवस देशातून आलेल्या विद्वान ब्राह्मणाकडून त्रुग्वेद, यजुर्वेद , सामवेद, अथर्ववेदाने अभिमंत्रण होऊन 2 एप्रिलला त्या सोमवल्लीचे हवण करणार आहेत. निरोगी आयुष्यासाठी,असाध्य रोग निट होण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या सोमवल्लीचा प्रसाद सर्व उपस्थित भक्तांना देण्यात येतो.सोमवल्ली वनस्पती डोंगराळ भागात व कमी पाण्यावर येते व ती पान विरहीत रहाते.या सोमवल्ली वनस्पतीला प्रतिपदा ते पौर्णिमा एक एक पान येत जाते तसेच प्रतिपदा ते अमावास्या एक एक पाण गळत जातात.परत हीच प्रक्रियामध्ये ही सोमवल्ली वनस्पती वाढत जाते. देश व विदेशातून सोमवल्ली वनस्पतीची माहिती घेण्यासाठी विद्वान येतात.देशात कोठेही सोमयाग यज्ञ आयोजित केला की सोमवल्ली ही धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग घाट अभय अरण्य येथून घेऊन जातात अशी माहिती वेदमूर्ती धनेश जोशी यांनी दिली.
कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप, चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास
धाराशिव (प्रतिनिधी)- जिद्द,चिकाटी आणि आईच्या अथक परिश्रमांच्या जोरावर कर्णबधिर असलेला चेतन हणमंत सपकाळ आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिस्तोल नेमबाज म्हणून झळकत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्याने मिळवलेले यश हे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. चेतनचे शालेय शिक्षण पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशाला, एकात्मिक विशेष युनिट येथे झाले.त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इयत्ता 11 वी ते एम.कॉमपर्यंत शिक्षण घेत त्याने 73 टक्के गुणांसह ‘ए’ श्रेणीत उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे, कर्णबधिर असूनही त्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण पूर्ण केले. क्रीडा क्षेत्रातील त्याचा प्रवास सुरुवातीला बॅडमिंटनपासून झाला. गेल्या आठ वर्षांत चेतनने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये जर्मनी येथे झालेल्या जागतिक डेफ नेमबाजी स्पर्धेत त्याने दोन कांस्य आणि एक रौप्य पदक पटकावले. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये टोकियो येथे झालेल्या 25 व्या डेफ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवत देशाचा गौरव वाढवला.आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने एकूण चार पदके जिंकली आहेत. राष्ट्रीय पातळीवरही त्याची कामगिरी तितकीच उज्वल आहे.विविध स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण,सात रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 14 पदके त्याच्या नावावर आहेत.राज्य स्तरावरही त्याने आपली छाप सोडली आहे.याशिवाय 2016-17 मध्ये दिव्यांग क्रीडा पुरस्कार आणि 2022-23 मध्ये गुणवंत खेळाडू पुरस्कार मिळवणारा तो धाराशिव जिल्ह्यातील पहिला दिव्यांग नेमबाज ठरला आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (ॲट्रॉसिटी कायदा) अत्यंत महत्त्वपूर्ण असून जातीय अन्याय निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले हे प्रभावी पाऊल आहे.दर महिन्याला जिल्हा दक्षता समितीच्या नियमित बैठका घेऊन बाधितांना आर्थिक व न्यायालयीन मदत करण्यात येते. त्यामुळे या कायद्यांतर्गत अत्याचार पीडितांना तातडीने मदतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. आज (दि.31 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय धाराशिव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ॲट्रॉसिटी प्रकरणांतील मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात धाराशिवचा आंतरराष्ट्रीय दिव्यांग नेमबाज चेतन सपकाळ याचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पुजार होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, राजाभाऊ ओहोळ, विद्यानंद बनसोडे,महादेव वाघमारे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांची प्रमुख उपस्थिती होती. पुजार पुढे म्हणाले की,चेतन सपकाळ हा जिल्ह्याचा अभिमान असून त्याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून जिल्ह्याचा मान उंचावला आहे.अनेक खेळाडूंना तो प्रेरणादायी ठरत असून त्याच्या आदर्शातून इतरांनीही प्रगतीची दिशा घ्यावी.तसेच ॲट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृती सुरू असून नियुक्ती आदेश मिळालेल्या वारसांनी शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रियंवदा महाडदळकर म्हणाल्या की,अशा उपक्रमांमुळे सामाजिक विकासाला गती मिळत आहे.अत्याचार पीडितांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेणे ही महत्त्वाची बाब आहे.चेतन सपकाळच्या यशामागे त्याच्या आईचे योगदान मोठे असून त्या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहेत. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते चेतन सपकाळ याचा त्याच्या आई - वडिलांसह भारतीय संविधान उद्देशिकेची प्रत,प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.तसेच नियुक्ती आदेश प्राप्त उमेदवारांनाही भारतीय संविधान उद्देशिकेची प्रत, नियुक्ती आदेश व पुष्प देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले,संचालन समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप यांनी केले.उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने यांनी मानले.कार्यक्रमाला नियुक्ती आदेश मिळालेल्या उमेदवारांसह त्यांच्या नातेवाईकांची व समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.20 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 (सुधारित 2015)अंतर्गत खून अथवा अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना शासकीय किंवा निमशासकीय नोकरी देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण 26 प्रकरणांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी 20 प्रकरणे अनुसूचित जाती तर 6 प्रकरणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. सन 2012 पासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणांपैकी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या 18 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत 15 प्रकरणे (अनुसूचित जाती 12 व अनुसूचित जमाती 3) मंजुरीसाठी सादर करण्यात आली होती.या प्रस्तावांपैकी अनुसूचित जातीच्या 12 प्रकरणांना समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी नियुक्तीसाठी मंजुरी दिली आहे.त्यामधील 3 प्रकरणांमध्ये वारसांवर गुन्हे दाखल असल्याने प्रक्रिया प्रलंबित आहे,तर एका प्रकरणात बीड येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.उर्वरित 7 पात्र वारसांना नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले. दरम्यान,काही प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित आहे.2 प्रकरणे प्रतीक्षासूचीत,6 प्रकरणांत शेतजमिनीची मागणी,1 अनुकंपा तत्वावरील नियुक्ती,1 प्रकरणात कायदेशीर वारस प्रमाणपत्राचा अभाव आणि 1 प्रकरणात आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 (सुधारित अधिनियम 2015) अंतर्गत पात्र वारसांना देण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये श्री.महादेव संदिपान वाघमारे (मु.पो. पारा,ता.वाशी) यांची जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच श्री.अक्षय गौतम गंगावणे (सिद्धार्थनगर,सांजा रोड,धाराशिव) यांची जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धाराशिव येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती झाली आहे. अक्षय सहदेव मस्के (जवळगा (मेसाई), ता.तुळजापूर) यांची अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, मुरूम (ता. उमरगा) येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. याचप्रमाणे दिपाली चंद्रकांत गायकवाड/दिपाली जयकुमार शेलार (कासारवाडी,पुणे) यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,परंडा येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती झाली आहे.श्री.समाधान सहदेव कठारे (सारोळा बु.,ता.धाराशिव) यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,कळंब येथे पहारेकरी (गट-ड) पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच श्रीमती पूजा शहाजी मस्के(व्हनाळा,ता. तुळजापूर) यांची मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,तुळजापूर येथे सफाईगार (गट-ड) पदावर नियुक्ती झाली असून श्री.रुकेश बाळासाहेब सरवदे(भिकारसारोळा,ता.धाराशिव) यांची मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,उमरगा येथे पहारेकरी (गट-ड) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण वरिष्ठ निरीक्षक राहून काटकर,कपिल थोरात,अमोल काटांगळे,कार्यालय अधीक्षक श्रीमती.सुरेखा गवळी व बिभीषण शिरसाट यांनी परिश्रम घेतले.
धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहर कार्याध्यक्षपदी नरसिंह मेटकरी यांची नियुक्ती
धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने धाराशिव शहर कार्याध्यक्षपदी तरुण व तडफदार कार्यकर्ता नरसिंह लक्ष्मण मेटकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. या वेळी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते नरसिंह मेटकरी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास पक्षातील विविध वरिष्ठ पदाधिकारी व नगरसेवक उपस्थिती लाभली.या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, गटनेते खलिफाभाई कुरेशी, शहरप्रमुख, नगरसेवक आयाज भाई शेख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे मेटकरी यांनी नमूद केले.नवीन जबाबदारी स्वीकारताना नरसिंग मेटकरी म्हणाले, पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. शहरातील संघटना अधिक बळकट करून प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्षविस्तारासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.दरम्यान, मेटकरी यांच्या नियुक्तीमुळे धाराशिव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून आगामी काळात पक्षविस्ताराला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांकडून व्यक्त केला जात आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक कायापालटासाठी चालना- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील होतकरू तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार मिळावा आणि स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी 2026-27 आर्थिक वर्षात जिल्ह्यात 108 नवीन उद्योजक तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार असून, यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. केवळ उद्योग सुरू करण्याचा सल्ला न देता, तो प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने तरुणांच्या पाठीशी उभी राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रकल्प अहवाल अर्थात उद्योगासाठी आवश्यक असणारा तांत्रिक प्रकल्प अहवाल तयार करून दिला जाणार आहे. बँकांच्या माध्यमातून आगदी सुलभपणे कर्ज पुरवठा आणि अनुदान उपलब्ध करण्यासाठी विशेष सहकार्य करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध सवलती व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्यही केले जाणार आहे. उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही यंत्रणा मदत करणार आहे. तरुणांनी केवळ नोकरीमागे न लागता नोकरी देणारे बनावे या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी 1 एप्रिल 2026 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. तसेच, महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत निवडक उद्योजकांना पुढील दिशा ठरवून दिली जाईल. जिल्ह्यातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे, हा यामागील उद्देश आहे. 108 उद्योजकांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना हक्काचा रोजगार तर मिळेलच मात्र त्यातून अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होईल. असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Kolhapur |कोल्हापुरात सहाय्यक कामगार आयुक्तासह पाच जणांवर गुन्हा; पत्नीचा छळ केल्याचा गंभीर आरोप!
प्रेमविवाहानंतर सासरच्यांकडून हुंड्याची मागणी कोल्हापूर : पत्नीचा छळ केल्याप्रकरणीसहाय्यक कामगार आयुक्त निलेश लक्ष्मण येलगुंडे (वय ४२, रा. लांबोटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्यासह नात्यातील पाच जणांवर राजारामपुरी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. १० वर्षांपासून पती आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हुंड्याची मागणी केली, असा उल्लेख [...]
Miraj |मिरज तालुक्यात जमिनीच्या नोटिशीवरून राडा; चुलत्याकडून पुतण्याला बॅटने बेदम मारहाण!
मालगावमध्ये रक्ताच्या नात्याला काळिमा मिरज – मिरज तालुक्यातील मालगाव येथे जमीन मिळकती संदर्भात ग्रामपंचायतीकडून आलेल्या नोटीसीची माहिती दिली नसल्याच्या कारणातून चुलत काकांनी पुतण्याला बॅटने मारहाण केली. याबाबत ऋतुराज रावसाहेब तारदाळे (वय ३६) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून, संशयीत अनिल बाबुराव तारदाळे, प्रदीप तात्यासाहेब तारदाळे या दोघांवर गुन्हा दाखल [...]
IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का दिला. राजस्थानने एकतर्फी चेन्नईच्या बत्या गुल केल्या. या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने चमकदार कामगिरी केली. त्याने अवघ्या 17 चेंडूत 52 धावांची धडाकेबाज खेळी करत सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने झुकवला. फक्त 15 चेंडूत अर्धशतक झळकावत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. सामन्यानंतर वैभवने आपल्या खेळीबद्दल […]
राज्यात अवकाळीचा मुक्काम; पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात गारपिटीचे संकेत पुणे -राज्याच्या बहुतांश भागात सोमवारी गारांचा पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. दरम्यान, उद्या मंगळवारी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत गारपिटीसह अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यातआला आहे. दरम्यान, पावसामुळे कमाल तापमानात घट होणार आहे. पश्चिम विदर्भ पासून, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण [...]
अटल प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ॲड.नकुल पार्सेकर यांची फेरनिवड
पाच वर्षांकरिता नवीन कार्यकारिणी जाहीर सावंतवाडी । प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीस वर्षांहून अधिक काळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने स्थापन केलेल्या तसेच माजी केंद्रीय मंञी सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून कार्यरत अटल प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ॲड.नकुल पार्सेकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली असून अटल प्रतिष्ठानने पुढील पाच वर्षांत [...]
Mumbai News –भंगारच्या वादातून मजुराची क्रूर हत्या, आरोपीला पोलिसांकडून अटक
भंगारच्या वादातून एका मजुराची सहकाऱ्यानेच हातोड्याने वार करून हत्या केल्याची घटना मुंबईतील परेल परिसरात घडली. राजीव कुमार उर्फ पहाडीकुमार यादव असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. परेल येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या आवारात ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामजीकुमार प्रभू राऊत आणि पीडित […]
Ambap |अंबपमध्ये आरोग्य शिबिराचा जागर; दीडशेहून अधिक ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी!
अंबप येथे मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद अंबप (प्रतिनिधी) : अंबप येथील चिरायु क्लिनिकचे डॉ. अजिंक्य वडगावकर यांच्या पुढाकारातून मोफत रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (शुगर) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे दीडशे नागरिकांनी तपासणी करून घेतली. शिबिरामध्ये उपस्थित नागरिकांची रक्तदाब [...]
रोजगाराची चिंता युद्धापेक्षा भयानक…आखाती देशात अडकलेल्या हिंदुस्थानींची व्यथा
अमेरिका-इराण युद्धामुळे, नोकरीसाठी दुबईला गेलेल्यांना आता दुबईपेक्षा आपले घरच बरे असे वाटू लागले आहे. ब्रिटिशांपासून अमेरिकन नागरिकांपर्यंत अनेकांनी आखाती देश सोडून आपापल्या मायदेशी परतले आहेत, परंतु आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांची मोठी संख्या अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ते अजूनही आखाती देशातील रोजगार सोडून हिंदुस्थानात येण्यासाठी तयार नाहीत. आजतक.इनने आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या अनेक […]
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शारदा विद्यामंदिरचे घवघवीत यश
अनुष्का गवंडे उंच उडीमध्ये प्रथम तर शुभ्रा गवंडे लांब उडीमध्ये द्वितीय न्हावेली /वार्ताहर तालुक्यातील मळगाव – सावळवाडा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शारदा विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.अनुष्का देवदास गवंडे हिने उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक तर शुभ्रा परशुराम गवंडे हिने लांबउडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर [...]
हे युद्ध लवकर थांबवा! दलाई लामा यांचे आवाहन; पोप लिओंच्या शांततेच्या आवाहनाला पाठिंबा
तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर भाष्य केले आहे. दलाई लामा यांनी पोप लिओ चौदावे यांनी केलेल्या शांततेच्या आवाहनाला पाठिंबा देत इराण, अमेरिका आणि इस्रायल, तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. सर्वच धर्म सहिष्णुता आणि शांततेची शिकवण देतात आणि हिंसाचार हा निषेधार्ह आहे, असे मत त्यांनी व्यक्त […]
देशभरात जनगणना 2027 ची तयारी वेगाने सुरू असताना पश्चिम बंगालमध्ये अद्याप जनगणनेसाठी आवश्यक अधिसूचना जारी झालेली नाही. हा मुद्दा देशाचे नोंदणी महानियंत्रक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी राज्य सरकारसमोर उपस्थित केला आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असल्याने पश्चिम बंगाल लवकरच अधिसूचना जारी […]
निर्दोष सुटका झाली म्हणून पूर्ण पगाराचा हक्क प्राप्त होत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
फौजदारी खटल्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर नोकरीवर पुन्हा रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची निर्दोष सुटका झाली म्हणून त्याला निलंबन काळातील पूर्ण पगार आणि थकीत वेतन मागण्याचा हक्क आपोआप प्राप्त होत नाही. यासंदर्भातील निर्णय प्रत्येक प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थितीनुसार घेणे आवश्यक आहे, असा निर्वाळा न्यायमूर्ती श्रीराम मोडक आणि न्यायमूर्ती […]
विवस्त्र होऊन पूजा केल्यास कोट्यधीश होता येते! कानपूरमध्ये सासऱ्याचे सुनेशी असभ्य वर्तन
कानपूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. करोडपती होण्यासाठी तांत्रिक विधी करण्याच्या नावाखाली पती आणि सासऱ्याने महिलेला विवस्त्र केले. त्यानंतर महिलेला एका खोलीत डांबून ठेवत तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्यात आले. त्यानंतर तिला बळजबरीने त्याच अवस्थेत पूजेसाठी बसण्यास भाग पाडले. यानंतर पीडितेने कानपूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तांत्रिक विधींच्या नावाखाली छळ, जबरदस्ती आणि […]
शाहरुख खानच्या ‘किंग’ला मध्य पूर्वेतील युद्धाचा फटका, दुबईमधील शूटिंग आता मुंबईत पार पडणार
सुपरस्टार शाहरुख खानचा ‘किंग’, गेल्या बऱ्याच काळापासून निर्मितीच्या प्रक्रियेत आहे. काही महिन्यांपूर्वी शाहरुखच्या दुखापतीमुळे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. आता, चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा एकदा थांबल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी, मध्य पूर्वेत सुरू असलेले युद्ध हे चित्रीकरण थांबवण्याचे कारण आहे. ‘किंग’च्या काही भागाचे चित्रीकरण एप्रिलमध्ये दुबईमध्ये होणार होते. तथापि, दुबई आणि त्या प्रदेशातील युद्धामुळे बरीच अनिश्चितता […]
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात तीव्र बॉम्बहल्ले सुरू आहेत. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विविध घटनांमध्ये आतापर्यंत 8 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला असून एक नागरिक अद्याप बेपत्ता आहे. संबंधित व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. […]
वर्धमान महावीर की जय”च्या जयघोषाने सोलापूर दुमदुमले; सोलापूर: जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती सोलापूर शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या वर्षीच्या सोहळ्यात मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे रांगेत उभे राहून महिलांनी हातात पकडलेला १०० फुटी ध्वज यानिमित्ताने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. [...]
उन्हाळ्यातील डिहायड्रेशनवर मात करण्यासाठी, आहारात काकडीचा समावेश करायलाच हवा
उन्हाळ्यात शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तीव्र सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. अशा परिस्थितीत, डिहायड्रेशन टाळणारे आणि शरीराला उष्णतेपासून वाचवणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही तुमच्या आहारासाठी असा एखादा खाद्यपदार्थ शोधत असाल, तर काकडी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पाण्याने भरपूर असलेल्या काकडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम […]
युद्धाचे भयावह परिणाम होतील; अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, विकासाची गती मंदावेल; IMF चा गंभीर इशारा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. आयएमएफने म्हटले आहे की, आशिया आणि युरोपमधील प्रमुख ऊर्जा-आयातदार देशांना वाढत्या इंधन आणि इतर कच्च्या मालाच्या किमतींचा सर्वाधिक फटका बसत आहे. या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. मात्र, वाढती महागाई आणि मंदावलेली आर्थिक वाढ हे परिणाम सर्वत्र दिसणार आहेत. […]
‘धुरंधर -2’यू ट्यूबवर लीक, चाहत्यांनी केली कठोर कारवाईची मागणी
रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ थिएटरमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. परंतु हा चित्रपट नुकताच यू ट्यूबवर लीक झाल्याने, चाहत्यांना धक्का बसला आहे. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होणार आहे. चित्रपटाची एक पायरटेड आवृत्ती यूट्यूबवर प्रदर्शित झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३,१४९ मिनिटांच्या या चित्रपटाची मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेली आवृत्ती यूट्यूबवर उपलब्ध आहे. काही चाहत्यांनी याबद्दल आदित्य धरला माहिती […]
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदारांना थेट आवाहन करत, “मला सर्व 294 मतदारसंघांमध्ये तुमचा उमेदवार समजा,” असे म्हटले. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील चंद्रकोणा येथील प्रचारसभेत त्यांनी हे विधान केले. या सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी व्यक्तीपेक्षा नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी […]
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती, आजच पदभार स्वीकारणार
मुंबई महानगरपालिकेला पहिल्या महिला आयुक्त मिळाल्या आहेत. मुंबईच्या नव्या आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची निवड झाली असून मंगळवारी या संदर्भात शासन आदेश काढण्यात आला. आज सायंकाळी साडे चार वाजता त्या पदभार स्वीकारणार आहेत. मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त भूषण गगराणी 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या रिक्त जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली […]
Beed News –झोका खेळताना गळफास बसला, नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; माजलगावातील घटना
घरात झोका खेळताना गळ्याला अचानक फास बसल्याने एका नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात घडली. वृंदा समीर रुद्रवार असे या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील व्यापारी प्रदीप रुद्रवार यांचे खंडोबा मैदान परिसरात घर आहे. मंगळवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने त्यांची 9 वर्षांची नात वृंदा […]
शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अटक; उत्तर प्रदेशात वातावरण तापले
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांना ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये शेतकऱ्यांसह अटक करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ, शेकडो कार्यकर्त्यांनी बुलंदशहरमधील खुर्जा आणि हापूर येथील विविध पोलीस ठाण्यांसमोर हिंसक निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष चौधरी अरब सिंग यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी खुर्जा नगर पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि दही विकून आपला निषेध नोंदवला. टिकैत यांच्या अटकेची बातमी मिळताच, संघटनेचे […]
Jalna News –भरधाव आयशर टेम्पो झाडावर आदळला, अपघातात दोन जण ठार
जालना शहरातील कन्हैय्यानगर भागातील सेंट मेरी शाळेसमोर आयशर झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अविनाश लोंढे, रा. डुकरी पिंपरी ता. जि. जालना आणि सुरेश पालवे रा. जिंतूर अशी मृतांची नावे आहेत. परभणी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील 5 टन जनावरांचा चारा घेऊन आयशर शिर्डीकडे जात होते. यादरम्यान, हॉटेल व्यवसायिक […]
वडिलांसोबत झालेल्या किरकोळ वादाचा सूड घेण्यासाठी एका नराधमाने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या या चिमुरड्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपीला वसई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वसई पश्चिमेकडील ‘अनुपम घर […]
महायुतीचा ‘वेगवान’कारभार, रविवारीसुद्धा काम! आर्थिक वर्षअखेर निधी खर्चासाठी 3 दिवसांत काढले 500 जीआर
आर्थिक वर्ष 31 मार्चला संपण्यापूर्वी निधी खर्च आणि वाटप करण्यासाठी राज्य सरकारने अवघ्या तीन दिवसांत जवळपास 500 शासकीय निर्णय (GR) जारी केले आहेत. शनिवारपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत विविध विभागांनी रविवारीसुद्धा मोठ्या प्रमाणात जीआर काढले असून सोमवारी संध्याकाळपर्यंत 483 जीआर जारी करण्यात आले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या जलदगती निर्णयप्रक्रियेवर आरटीआय कार्यकर्ते […]
तमिळनाडूत निवडणूक आचारसंहितेचा भंग, टीव्हीके प्रमुख विजय यांच्याविरोधात गुन्हा दाखल
तमिळनाडूमध्ये निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे प्रमुख विजय यांच्याविरोधात पेरवळ्लूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात विजय यांच्यासह सुमारे 5,000 पक्ष कार्यकर्त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. फ्लायिंग स्क्वॉड अधिकारी कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सार्वजनिक सभेदरम्यान निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. सभेत […]
सासवडच्या ‘तेल्या भुत्या’च्या कावडीचा मुंगी घाटात थरार नातेपुते – सकाळपासून रखरखणारेऊन होते. कावड मुंगी घाटाची बडण सुरू करताच मुसळधार पाऊस सुरू झाला. मोठ्या भक्तिभावात महाद्या धाव- महाद्या धाव अशी आर्त हाक देत अतिशय कठीण असणारा मुंगी घाट कावडी चढत होत्या, अतिशय उत्साही अन तारोमहर्षक वातावरणात मुंगी घाटातून कावडी चढविण्याचा सोहळा [...]
उमरग्यात महादेव मंदिराच्या यात्रानिमित्त शाही मिरवणूक धाराशिव उमरगा -शहराचे ग्रामदैवत महादेव मंदिराच्या यात्रा महोत्सवानिमित्त ” श्री ” च्या काठीची शहरातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान मिरवणूकीत सादरीकरण केलेल्या धार्मिक व पौराणिक सजीव देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले होते. मिरवणूकीत अनेक उत्साही तरूणांनी हलगीच्या तालावर मोठ्या कौशल्याने काठी उचलण्याचा यशस्वी प्रयत्न [...]
सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात डंका! सातारा – १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम प्रभावीपणे राबवून सातारा जिल्हा परिषदेने शंभर टक्के गुण मिळवत राज्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा गौरव करण्यात आला होता. या गौरवपूर्ण [...]
सातारा-पाटेघर रोडवर रानगव्याचा मुक्त संचार कास -मंगळवारी सकाळी सातारा -पाटेघर रोडवरीलकुडेघर गाव परिसरात रानगव्याच्या अचानक दर्शनामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांना शेताजवळ मोठा गवा फिरताना दिसला त्याने मुख्य वाहतुकीच्या सातारा पाटेघर रोडवर येऊन वाहनचालकांची भांबेरी उडवली गवा हा अत्यंत बलवान आणि आक्रमक [...]
इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगला. या लढतीत विजय मिळवत मुंबईने 13 वर्षांपासून सलामीचा सामना गमावण्याचा पायंडा मोडीत काढला. हा सामना संपल्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बीसीसीआयशी संबंधित असलेल्या ब्रिटीश नागरिकाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे […]
सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून डिस्चार्ज
माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप आणि सिस्टेमिक इन्फेक्शनमुळे सोनिया गांधी यांना 24 मार्चला सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी आता पूर्णपणे बऱ्या झाल्या असून मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सर गंगा राम रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, ताप […]
एपस्टीन फाईल्स आणि अदानी प्रकरणाच्या दबावावामुळे हिंदुस्थान-अमेरिका करार, राहुल गांधी यांची टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनी केरळमधील भाषणात पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका करत हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी दरवर्षी 9 लाख कोटींच्या अमेरिकन वस्तू खरेदी करण्याचे मान्य केले आहे. यामुळे देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा फटका बसेल. हिंदुस्थान-अमेरिका करार देशाच्या हिताचा नसून तो दबावाखाली करण्यात […]
Satara Breaking |सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा अजब कारभार; मृतदेहांची अदलाबदल, नातेवाईक आक्रमक
सातारा जिल्हा रुग्णालय, मृतदेहांची अदलाबदल सातारा– सातारा जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिन्याभरात घडलेली ही दुसरी घटना असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोनगरवाडी (ता. वाई) येथील आनंद ओव्हाळ (वय २६) यांनी विषप्राशन [...]
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४ एप्रिलला सराव सीईटी परीक्षा
भोसले नॉलेज सिटीकडून नावनोंदणीचे आयोजन सावंतवाडी । प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे बारावी पीसीएम गटाच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी सराव परीक्षा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना आपली तयारी तपासता यावी या उद्देशाने ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेचा पेपर विषय तज्ज्ञांनी तयार केलेला असून तो महत्त्वाच्या प्रश्नांवर आधारित असेल.सराव परीक्षा नियमित सीईटी [...]
मीराबाग येथे एकजूट‑सत्याचा विजय !
आंदोलनाच्या 49 व्या दिवशी बंधारा रद्द करण्याची घोषणा : निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांसह समर्थकांचे मानले आभार कुडचडे : गेल्या 49 दिवसांपासून मीराबाग-सावर्डे येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला अखेर काल सोमवारी मोठे यश आले. मीराबाग येथे प्रस्तावित असलेला बंधारा आणि त्याच्याशी संबंधित सर्व प्रकल्प रद्द करण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मडगाव येथील मोती डोंगर सरकारी सभागृहात [...]
मुंबईतील सायन रुग्णालयात आग; एसीमध्ये स्फोट झाल्याने उडाला भडका, रुग्णांसह नातेवाईकांमध्ये घबराट
मुंबईतील सायन रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक ओपीडीमध्ये भीषण आग लागली. आग लागल्यानंतर, रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून कोणीही जखमी झाले नाही. एसीमध्ये स्फोट झाल्याने, ही आग लागल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात आग; एसीमध्ये स्फोट झाल्याने उडाला भडका, रुग्णांसह नातेवाईकांमध्ये घबराट#SionHospital #Sion #Mumbai #FireIncident pic.twitter.com/a1vigacW3k — Saamana Online (@SaamanaOnline) […]
सोहमला अटक करण्यास बाल न्यायालयाची मान्यता
पणजी : कुडचडे येथील वासनाकांडप्रकरणी संशयित आरोपी सोहम सुशांत नाईक याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोहमला अटक करण्यास पणजी येथील बाल न्यायालयाने मान्यता दिली आहे. सोहमला पणजी येथील बाल न्यायालयाकडून शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास कुडचडे पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सुपूर्द [...]
नदीत बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
हुक्केरी तालुक्यातील हळेगुडगनट्टीतील दुर्घटना : सुटी असल्याने पाच मुले गेली होती पोहायला वार्ताहर/यमकनमर्डी हुक्केरी तालुक्यात हळेगुडगनट्टी गावाबाहेर असलेल्या हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटरमधील श्री ब्रह्मदेव मंदिराजवळ पाच मुले नदीच्या पाण्यात पोहायला गेली होती. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. कृष्णा विठ्ठल खानापुरी (वय 14) आणि दुदावी गावातील प्रज्ज्वल मुत्तेप्पा गोकर (वय 14) अशी मृत मुलांची नावे [...]
Satara News |सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; खंडाळ्यात वीज पडून ८ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू!
खंडाळा, अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडून आठ शेळ्यांचा मृत्यू खंडाळा – सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, खंडाळा तालुक्यातील मोर्वे गावात वीज पडून आठ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खंडाळा तालुक्यातील मोर्वे गावातील [...]
गणेशमूर्तींच्या उंचीबाबत प्रशासनाकडून निर्बंध
15 फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्ती साकारण्याची सूचना : यावर्षी सहा महिन्यांपूर्वीच गणेशमूर्तीच्या उंचीबाबत प्रशासनाकडून निर्णय बेळगाव : दरवर्षी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशमूर्तींची उंची हा चर्चेचा विषय ठरत आहे. उंच गणेशमूर्तीमुळे विसर्जन करतेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दरवर्षी गणेशोत्सव काळात मूर्तीच्या उंचीबाबत मंडळांना विचारणा केल्यास तीन ते चार महिन्यांपूर्वीच मूर्ती निश्चित करण्यात आल्याचे उत्तर देण्यात येत [...]
मागणी मंदावल्याने भाजीपाला दिला फेकून
बेळगाव एपीएमसी मार्केटमधील स्थिती : व्यावसायिक गॅसच्या कमतरतेमुळे दरांमध्ये घसरण बेळगाव : बेळगाव एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे घाऊक दर कोसळल्याने हजारो टन भाजी फेकून देण्याची वेळ आली आहे. रविवारी व सोमवारीही भाजी उचल झाली नसल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांनी ती फेकून दिल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या कमतरतेमुळे बंद असलेल्या हॉटेल व्यवसायाना फटका बसला असल्याची माहिती [...]
चेनस्नॅचिंग, घरफोड्या करणाऱ्या गदग जिल्ह्यातील चोरट्याला अटक
सौंदत्ती पोलिसांची कामगिरी, 9 लाखांचा ऐवज हस्तगत बेळगाव : सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा डोंगरावर चेनस्नॅचिंग करण्याबरोबरच परिसरात घरफोड्या करणाऱ्या गदग जिल्ह्यातील एका युवकाला अटक करून सौंदत्ती पोलिसांनी त्याच्याजवळून सुमारे 9 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व एक दुचाकी जप्त केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. फकिरेश ऊर्फ [...]
शिंदे गटाचे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांना उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्याची खताळ यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. आता या प्रकरणी रीतसर खटला चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर […]
गडहिंग्लज येथे आढळले शके १६१० मधील शुद्ध मराठीतील शिलालेख गडहिंग्लज -गडहिंग्लज परिसरात जैन धर्माचा प्रभाव प्राचीन काळापासून दिसून येतो. ऐनापूर येथील जैन बस्ती ही या भागातील अत्यंत जुनी मानली जाते. तेथील मूर्तीच्या वाहिकेवर नवव्या शतकातील कन्नड (हळेकन्नड) लिपीतील शिलालेख आढळतो. तसेच गडहिंग्लजमधील महादेव मंदिर, तेरणी येथील दुरदुंडेश्वर मंदिर, भादवण [...]
सात नद्यांचा जिल्हा तरीही पाणीटंचाईच्या छायेत!
जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची नितांत गरज : हिप्परगी धरणातील बिघाडामुळे संकट अधिक गडद बेळगाव : ज्या बेळगाव जिल्ह्यातून मलप्रभा, घटप्रभा, कृष्णा यासह एकूण सात नद्या वाहतात त्याच जिल्ह्यावर यंदाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषत: हिप्परगी धरणाचा 22 वा दरवाजा फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होण्याची शक्मयता असून त्यामुळे 100 [...]
गणपत गल्लीतील ‘त्या’ आस्थापनाचे फोटो चर्चेत
बेळगाव : गणपत गल्लीत उभारण्यात येत असलेल्या व्यापारी आस्थापनाचा समोरील भाग बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात असून याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी काही जणांकडून केली जात आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत बांधकाम करावयाचे असल्यास त्यासाठी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून रितसर बांधकाम परवाना घ्यावा लागतो. मात्र महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवान्याचे [...]
तामिळनाडूमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 मार्चपासून सुरू झाली. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, टीव्हीकेचा अध्यक्ष थलापती विजय यांनी सोमवारीच आपला अर्ज दाखल करत प्रचाराचा शुभारंभ केला. स्टॅलिन यांनी कोळतूर येथे रोड शो घेतला. त्यानंतर मंगळवारी ते आपल्या मूळ गावी […]
राकसकोप-हिडकल जलाशयातील पाणीपातळीत कमालीची घट
म्हणे 10 जूनपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही : मात्र गतवर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस झपाट्याने घट होत चालली आहे. तरीदेखील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहराला पाणी टंचाईची झळ पोहोचणार नाही, असे एलअॅण्डटीकडून सांगितले जात आहे. जूनपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही, असे सांगितले जात [...]
फ्रुटमार्केट रस्त्याला येणार ‘अच्छे दिन’
गांधीनगर रस्ताकामाला प्रारंभ : अनेक महिन्यांपासून रखडले होते काम बेळगाव : गांधीनगर फ्रुट मार्केटच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. पावसाळ्यात तर शेतकऱ्यांचा आपल्या फळभाज्या चिखलामध्ये उतराव्या लागत होत्या. तसेच वाहनधारकांना चिखलातूनच वाहने चालवावी लागत होती. एकूण हा रस्ता शेतकऱ्यांसह वाहनधारकांसाठी अडचणीचा ठरत होता. याची दखल घेऊन संबंधित विभागाकडून रस्त्याच्या दुरुतीचे काम हाती घेण्यात आले [...]

28 C