SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

आरे-वारे समुद्रात दोन पर्यटक बुडाले; पालघर येथील एकाचा मृत्यू

रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असू एकाला स्थानिक ग्रामस्थ आणि येथील पोलिस पाटील आदेश कदम यांनी वाचवत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. संतोष शशिकांत भानुशाली (पालघर), असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर सुयोग राजेश भानुशाली (विरार), असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. […]

सामना 29 Mar 2026 7:28 pm

युद्धखोर नेत्यांची प्रार्थना देव स्वीकारणार नाही; पोप लिओ यांची नाव न घेता ट्रम्प यांच्यावर टीका

जगावर महायुद्धाचे सावट गडद होत असतानाच, कॅथोलिक धर्मगुरू पोप लिओ यांनी रविवारी जागतिक नेत्यांना अत्यंत कडक शब्दांत फटकारले आहे. “जे नेते स्वतः युद्धाची ठिणगी टाकतात आणि रक्ताचा खेळ खेळतात, त्यांच्या प्रार्थना देव कधीही स्वीकारणार नाही,” असे विधान पोप यांनी केले आहे. पोप यांनी आपल्या भाषणात कोणाचेही थेट नाव घेतले नसले तरी, त्यांचा रोख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […]

सामना 29 Mar 2026 7:22 pm

Ratnagiri News –वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत आंबेड खुर्द येथील वृद्धाचा मृत्यू

मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने धडक दिल्याने एका ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. शांताराम तानु येल्ये असे मृत वृद्धाचे नाव आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज रविवारी सकाळी १० च्या सुमारास आंबेड-भंडारवाडी येथील सुरंग बोगद्याजवळ घडली. शांताराम येल्ये हे रेल्वे रूळ ओलांडत असताना किंवा रुळाच्या कडेने जात […]

सामना 29 Mar 2026 7:20 pm

इराणचा अमेरिकेला मोठा दणका; सौदीतील तळावर क्षेपणास्त्र हल्ला, अब्जावधींचे E-3 Sentry विमान उद्ध्वस्त

इराणने सौदी अरेबियातील एका प्रमुख अमेरिकन लष्करी तळावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला असून, यामध्ये अमेरिकेचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे E-3 Sentry AWACS (Airborne Warning and Control System) विमान उद्ध्वस्त झाले आहे. या विमानाला अमेरिकन हवाई दलाचे हवेतील डोळे म्हटले जाते, त्यामुळे हा अमेरिकेसाठी मोठा लष्करी धक्का मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने सौदी अरेबियातील प्रिन्स […]

सामना 29 Mar 2026 6:49 pm

श्री तुळजाभवानी देवीला वेदांत कुलकर्णी यांनी केली सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण

तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर येथे आज सकाळी पाथरी, जिल्हा परभणी येथील श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी देवीच्या चरणी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण केली. वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांनी आज सकाळी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी देवीच्या चरणी अर्पण केली. या प्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 6:15 pm

Ratnagiri News –दापोली बाजारपेठेतील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा ;२०२६ च्या कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात

दापोली शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेले श्री हनुमान मंदीर हे शहरवासीयांसह तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे अशा या येथील मंदिरात श्री देव मारुती व श्री देव शंकर ट्रस्ट फंड बाजारपेठ दापोली यांच्या वतीने या मंदिरात वर्षभरात विविध प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमांमधील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा हा विशेष सोहळा […]

सामना 29 Mar 2026 6:14 pm

पंतप्रधानांनी ७ विमानतळांचे उद्घाटन केले, त्यापैकी ६ बंद पडले; अखिलेश यादव यांची भाजपवर टीका

“निवडणुका जवळ आल्या की भाजप केवळ उद्घाटनांचा धडाका लावते, पण प्रत्यक्षात त्या सुविधा जनतेच्या कामाला येत नाहीत. पंतप्रधानांनी थाटामाटात ७ विमानतळांचे उद्घाटन केले होते. परंतु सत्य हे आहे की, त्यातील ६ विमानतळ आता बंद पडले आहेत,” अशा बोचऱ्या शब्दांत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशमधील दादरी येथे आयोजित एका […]

सामना 29 Mar 2026 6:11 pm

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गोवा गुटखा मोठ्या प्रमाणात वाहतूक करताना पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करून धमकी दिल्याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 48 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दि. 27 मार्च 2026 रोजी सकाळी 9.12 वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग बायपास रोडवरील निसर्ग हॉटेलजवळ पोलीस कर्मचारी शासकीय कामकाज करत असताना संशयास्पद आयशर टॅम्पो (क्र. एमएच 16 सीडी 2395) आढळून आला. तपासणी केली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानव आरोग्यास घातक असलेला गोवा गुटखा मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जात असल्याचे उघड झाले. सदर वाहनातून 50 मोठ्या गोण्या गुटख्याच्या जप्त करण्यात आल्या. यासोबतच आयशर टॅम्पो, एक स्विफ्ट कार आणि तीन मोबाईल फोन असा एकूण 48,42,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी संजय सुभाष जगताप (रा. वानेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), सचिन परमेश्वर पवर (रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड), सतीश तुकाराम सोंडगे (रा. गवळवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि मिट्टू उर्फ इंद्रजितसिंग रणजितसिंग ठाकूर (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी वाहन कारवाईसाठी ताब्यात घेत असताना आरोपींनी गाडी अडवून “गाडी सोडून दे, नाहीतर तुला बघतो” अशी धमकी देत पोलिसांना शासकीय कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर काही इसमांनी आरोपींना चिथावणी देत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी फिर्यादी दत्तात्रय माणिकराव कुंभार (वय 41) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. 28 मार्च 2026 रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 132, 223, 274, 275, 123, 45, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 59 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलिसांकडून सुरू आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 6:11 pm

यात्रा काळात एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल येरमाळा, शिंगणापूर, तुळजापूर, पंढरपूर यात्रेसाठी 206 जादा बस

धाराशिव (प्रतिनिधी)- चैत्री यात्राकाळ लक्षात घेऊन धाराशिव विभागात राज्य परिवहन महामंडळाने व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी केली असून भाविकांच्या सोयीसाठी तब्बल 206 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आदेशान्वये विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे. येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेसाठी स्वतंत्र 151 जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये धाराशिव आगारातून 30, तुळजापूर 31, उमरगा 10, परंडा 20, भूम 30 आणि कळंब आगारातून 30 बसेसचा समावेश आहे. तसेच चैत्री पंढरपूर, शनि शिंगणापूर व तुळजापूर यात्रांसाठी स्वतंत्र 55 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. यात धाराशिव 10, तुळजापूर 12, उमरगा 5, कळंब 12, भूम 10 आणि परंडा 6 बसेसचा समावेश आहे. चैत्री पंढरपूर-शिंगणापूर यात्रा 27 मार्च 2026 ते 1 एप्रिल 2026 दरम्यान होणार असून तुळजापूर-येडेश्वरी येरमाळा यात्रा 1 एप्रिल ते 5 एप्रिल 2026 दरम्यान पार पडणार आहे. मुख्य दिवस 2 एप्रिल (पौर्णिमा) व 3 एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. यात्राकाळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन, अतिरिक्त फेऱ्या, चालक-वाहकांची उपलब्धता तसेच यांत्रिक तपासणी यावर विशेष भर देण्यात आला आहे. विभागीय वाहतूक अधिकारी व यांत्रिक विभाग यांच्यात समन्वय साधून सर्व बसेस सुरक्षित आणि वेळेवर धावतील याची दक्षता घेतली जात आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 6:11 pm

IPL 2026 –वानखेडेवर रंगणार MI vs KKR मध्ये थरार, हेड टू हेडमध्ये कोणता संघ पुढे?

आयपीएल 2026 च्या दुसऱ्या सामन्यात पाचवेळा विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स संघ आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर तीनवेळा चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला भिडणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. पहिल्या लढतीत विजय मिळवून अनेक वर्षांपासून सुरू झालेली पराभवाची परंपरा मोडण्याचा प्रयत्न मुंबईचा असेल तर कोलकात्याचा संघही विजयाने श्रीगणेशा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. वानखेडे […]

सामना 29 Mar 2026 6:00 pm

नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेची नोंद, नागरिकांमध्ये घबराट

नेपाळमध्ये भूकंपाचे सत्र सुरूच असून शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी मोजली गेली आहे. या धक्क्यांमुळे राजधानी काठमांडूसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडले. नेपाळच्या नॅशनल अर्थक्वेक मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूपासून सुमारे ८० किमी ईशान्येला असलेल्या सिंधुपालचोक जिल्ह्यातील नुल्थाला […]

सामना 29 Mar 2026 5:59 pm

Kolhapur |केर्ले ओढ्याजवळ साखरेचा ट्रक उलटला, दुचाकीला वाचवताना अपघात

केर्ले-कोतोली मार्गावर साखर कारखान्याचा ट्रक पलटी पोर्ले-केर्ले ते कोतोली रस्त्यावरील करवीर तालुक्यातील केर्ले ओढ्याजवळ समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचविताना साखरेने भरलेला ट्रक बाजुच्या नाल्यात उलटला. ही घटना शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रकचे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पन्हाळा [...]

तरुण भारत 29 Mar 2026 5:57 pm

सौरउर्जा प्रकल्पाचे काम तत्काल थांबवा

भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील गट नंबर 114 गायरान जमीन मागासवर्गीय लोक कसून उपजीविका भागवत असलेल्या जमीनीवर सुरु असलेले सौरउर्जा प्रकल्पाचे बेकायदेशीर काम सुरु करण्यात आले असुन सदरील अनाधिकृत पणे सुरू करण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी तहसील कार्यालयासमोर दि. 30 रोजी पासुन धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे प्रशासनास दिलेल्या निवेदनास असे म्हटले आहे की मौजे बन्हाणपुर, ता. भुम, जि. धाराशिव येथील सर्व्हे नं. 114 मधील क्षेत्र 13 हे. 89 आर इतकी जमीन ही गायरान (सार्वजनिक) जमीन आहे. सदर जमीन ही गावातील सर्व मागासवर्गीय अनुसूचित जाती मधील नागरीकांची सामोहिक मालमत्ता असुन अनेक वर्षापासुन गावातील शेतकरी पशुपालक तसेच मागासवर्गीय समाजातील कुटुंबिय आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती व जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर करीत आहे. मात्र सदर गायरान जमीनीवर सध्या सौरउर्जा प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करतांना गावातील नागरीकांची कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही. तसेच ग्रामसभेची अधिकृत परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे गावातील गरीब कुटुंबाच्या उपजिविकेवर मोठा परिणाम होत आहे. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 चे कलम 38,53,63 नुसार गायरान जमीन ही सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असते, अशा जमीनीचा वापर बदलण्यासाठी शासनाच्या अनेक विभागाच्या परवानग्या घ्याव्या लागतात व ग्रामसभेचा ठराव आवश्यक असतो. तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 नुसार गावातील सार्वजनिक मालमत्तेबाबत ग्रामसभेचा निर्णय बंधनकारक असतो. परंतू ग्रामसभा न घेता व ग्रामसभेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देता ग्रामसभा घेतल्याचे दर्शवून खोटया स्वाक्षऱ्या करून खोटे नाहरकत प्रमाणपत्र तयार केले आहे .त्याच प्रमाणे भारत सरकारच्या विविध शासन निर्णयानुसार गायरान जमीनीचा वापर करतांना गावातील पारंपारिक वापर, जनावरांची चाराई व गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह याचा विचार बंधनकारक आहे. आमच्या गावामध्ये जनावरे चारण्यासाठी अशा प्रकारची कुठलीही जमीन नाही. सदर सौरउर्जा प्रकल्पाचे काम सखोल चौकशी होईपर्यंत तात्काळ बंद करण्यात यावे. या संपुर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन जबाबदार अधिकारी व संबंधीत व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. गायरान जमीनीवरील मागासवर्गीय कुटुंबाचे पारंपारिक हक्क कायम ठेवण्यात यावे. एम.एस.ई. बी. या विभागाने खाजगी कंपनीला भाडेतत्वावर दिलेली गायरान जमीनीची चौकशी करण्यात यावी. यासाठी आधार बहुउद्देशीय संघटना व बऱ्हाणपूर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे प्रशासनास दिलेल्या निवेदनावर आधार बहुउद्देशीय सामाजिक संघटना संस्थापक अभिमान मिसाळ,मा. सरपंच शंकर मिसाळ, माजी ग्रा.प सदस्य नाथा मिसाळ, विलास मिसाळ सुर्यकांत मिसाळ, अशोक वारे, अकूंश मिसाळ, दिपक मिसाळ, सतिश मिसाळ, खंडू मिसाळ, अतुल मिसाळ, यांच्या सह नागरिकांनी मागणी केली आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:53 pm

विनोदी शैलीत समाजजीवनाचे कथकथनात चित्रण स्व. अजितदादा पवार साहित्यनगरी

धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात दुपारी कथाकथन सत्र पार पडले. कधी खुमासदार विनोदी शैलीत तर कधी समाजजीवनाचे विदारक चित्रण करणाऱ्या कथाकथनाने साहित्यप्रेमींना खिळवून ठेवले. डॉ. सत्यशिला तौर (जालना) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन सत्रात प्रा.सुरेश पाटील (अंबाजोगाई) व स्वाती कान्हेगावकर (नांदेड) यांचा सहभाग होता. मंचावर स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती. डॉ. सत्यशीला तौर यांनी वलांडा ही कथा सादर केली. समाजातल्या प्रथेमुळे कथेची नायिका सासुरवास आणि अंधश्रद्धेची बळी ठरते. पण शिकलेल्या गावातली मुलगी तिला भोंदू बाबाच्या फोलपणा बद्दल सांगते. तेव्हा तिला तिची चूक कळते. आणि अंधश्रद्धेचा विचार ओलांडून ध्रुपदा नवीन विचार स्वीकारते. अशी कथा सांगून समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार केला. प्रा. सुरेश पाटील यांनी, निरोप या कथेत गुरु-शिष्य यांचे नाते सांगणारी कथा, मित्रप्रेम आणि शिक्षणाचा संघर्ष मांडला. प्रा. स्वाती कान्हेगावकर यांनी शेवग्याच्या शेंगा या कथेतून ग्रामीण स्त्रीच्या कष्टाची, जिद्दीची आणि मुलांसाठी जीवाचे रान करणाऱ्या आईचे चित्रण मांडले. ही आई परिस्थिती पुढे झुकत नाही. मुलाला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करूनही नियती मुलाला हिरवते. पण शेवग्याच्या झाडात आपल्या मुलाला पाहत झाडाचे संगोपन करते. असा कथेचा आश्य होता. कथाकथन सत्राचे सुत्रसंचालन अविनाश ताटे यांनी केले. तर आभारप्रदर्शन बालाजी तांबे यांनी केले.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:53 pm

नवतेजस्विनी महोत्सवात महिला उद्योजकतेची झेप; दोन दिवसांत 7 लाखांहून अधिक विक्री

धाराशिव (प्रतिनिधी)- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त ‌‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प‌’ अंतर्गत उस्मानाबाद क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ येथे दि.27 ते 29 मार्च 2026 दरम्यान ‌‘नवतेजस्विनी महोत्सव‌’ उत्साहात सुरू आहे.या महोत्सवाचे उद्घाटन दि.27 मार्च रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात जिल्ह्यातील स्वयंसहाय्य महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री स्टॉल उभारण्यात आले असून एकूण 42 स्टॉल्सचा सहभाग आहे.गावरान तूप,अंडी,वर्मी कंपोस्ट खत, दुग्धजन्य पदार्थ,मसाले,पापड, कुरडई,शेवया,मनुके,शोभेच्या वस्तू, मूर्ती,फ्लॉवर पॉट,रेडीमेड कपडे, धान्य व कडधान्य अशा विविध उत्पादनांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी धाराशिवकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली. विशेषतः गावरान अंडी, साजूक तूप, काळा मसाला,जात्यावरच्या डाळी, विविध प्रकारच्या शेवया आणि इतर खाद्यपदार्थांना नागरिकांची मोठी पसंती मिळाली. या दोन दिवसांत सुमारे 7 लाख 12 हजार रुपयांची विक्री झाल्याने महिला बचतगटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे दिसून आले. हा महोत्सव महिला बचतगटांसाठी हक्काची बाजारपेठ ठरत असून, अशा प्रकारचे प्रदर्शन वर्षातून किमान दोन ते तीन वेळा आयोजित करावे, अशी मागणी स्टॉलधारक महिलांनी व्यक्त केली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक सबलीकरणाची संधी मिळत असून त्यांच्या उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळत आहे.दि. 29 मार्च 2026 रोजी या महोत्सवाचा समारोप होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून महिला बचतगटांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर (माविम) यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:52 pm

ग्रामीण जनतेसाठी सुलभ सेवा : ई-गव्हर्नन्समुळे धाराशिव प्रशासन अधिक गतिमान

धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे यश केवळ एक क्रमांक नसून,जिल्ह्यातील प्रशासनात विशेषतः महसूल विभागात झालेल्या डिजिटल परिवर्तनाचे द्योतक आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.महसूल विभाग हा थेट ग्रामीण नागरिकांशी निगडित असलेला अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे.जमीन नोंदी,शेत रस्ते,विविध प्रमाणपत्रे,तक्रारींचे निराकरण अशा अनेक बाबींमध्ये नागरिकांना या विभागाशी सतत संपर्क साधावा लागतो.अशा वेळी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवा सुलभ,जलद आणि पारदर्शक झाल्याने नागरिकांचा वेळ,श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचत आहे. धाराशिव जिल्ह्यात विकसित करण्यात आलेल्या ‌‘डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड‌’ प्रणालीमुळे विविध शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले आहे.यामुळे महसूल प्रशासनाला योजनांची अंमलबजावणी,प्रगती आणि पाठपुरावा अधिक प्रभावीपणे करता येत आहे.निर्णय प्रक्रियेला वेग मिळाल्याने नागरिकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना शक्य होत आहेत. ‌‘कल्पवृक्ष स्मार्ट जीआर‌’ प्रणाली ही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.शासन निर्णय, परिपत्रके आणि कायदे यांची अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने कामकाज अधिक अचूक आणि सुसंगत झाले आहे.यामुळे निर्णय घेताना होणाऱ्या त्रुटी कमी होऊन प्रशासनातील पारदर्शकता वाढली आहे. ग्रामीण भागाशी थेट संबंध असलेली ‌‘जीवनरेखा‌’ प्रणाली ही या डिजिटल परिवर्तनाची एक महत्त्वाची कडी ठरली आहे.शेत रस्त्यांची गट नंबर व सर्वे नंबरनिहाय नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे जलद निराकरण शक्य झाले आहे.यामुळे शेती उत्पादन,वाहतूक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.महसूल विभागाच्या कामकाजात यामुळे अधिक सुसूत्रता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. तसेच ‌‘तुळजाई चॅटबॉट‌’ या उपक्रमामुळे ग्रामीण नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती घरबसल्या मिळू लागली आहे.संजय गांधी योजना,पुरवठा विभाग, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या सेवांची माहिती काही क्षणांत मिळत असल्याने नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होत आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे ‌‘पेपरलेस कार्यालय‌’ संकल्पना प्रत्यक्षात येत असून फाइलांची हालचाल वेगवान झाली आहे. महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक,उत्तरदायी आणि वेळेत पूर्ण होऊ लागले आहे.यामुळे नागरिकांच्या कामांना विलंब न होता सेवा वितरण अधिक विश्वासार्ह बनले आहे. या सर्व उपक्रमांच्या यशामागे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनीही अत्याधुनिक तंत्रज्ञान,विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता चा वापर वाढवून प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांनी या डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे. एकूणच, ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनले आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ सेवा देण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असून,भविष्यातील सुशासनाचा मजबूत पाया म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:51 pm

गाव खेड्यातील झगमगाटामध्ये ग्रामीण जीवन बदलत गेले -प्रा.गंगाधरराव हिंगोले स्व. अजितदादा पवार साहित्यनगरी

धाराशिव (प्रतिनिधी)- गाव खेड्यातील झगमगाटामध्ये ग्रामीण जीवन बदलत गेले. शहरे वाढत गेली आणि गावे बकाल झाली असे मत सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.गंगाधरराव हिंगोले यांनी व्यक्त केले. शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात दुपारी बदलते ग्रामीण जीवन या विषयावर प्रा.हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला. यावेळी ते बोलत होते. परिसंवादात सुप्रसिद्ध वक्ते कमलाकर कांबळे प्रा.डॉ.कैलास इंगळे (छत्रपती संभाजीनगर) यांनी सहभाग नोंदवला. प्रा.हिंगोले म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासन मोठमोठ्या योजना राबवित आहे पण त्या गरजू पर्यंत पोहचत नाहीत. असेही त्यांनी सांगितले. परिसंवादात कमलाकर कांबळे यांनी ग्रामीण भागातील चित्र बदलत असल्याचे सांगून आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल फोन आणि दारात दुचाकी आल्या असल्याचे सांगितले. मराठवाडा मागास म्हणून ओळखला जात असला तरी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात प्रगत आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांनी लिहिते व्हावे. लोकांच्या हिताचे लेखन करावे, असेही त्यांनी सांगितले प्रा.डॉ.इंगळे यांनीही बदलत्या ग्रामीण जीवनशैलीवर भाष्य करताना पारंपरिक शेतीत आधुनिक तंत्रज्ञाना ने मोठा बदल झाला असल्याचे सांगून श्रेष्ठ नोकरी आणि कनिष्ठ शेती अशी विचारधारा ग्रामीण भागात वाढली असल्याचे सांगितले. परिसंवादाचे सुत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले. आभार राजकुमार मेंढेकर यांनी मानले.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:51 pm

इंदापूर येथील अजित पवार गटाच्या कार्यक्रमातील बॅनरवरून सुनेत्रा पवार, अजित पवारांसह पक्ष श्रेष्टींचे फोटो बेपत्ता

माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहोळा कार्यक्रम पार पडला. या कार्यालयातील बॅनरवरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यासह पक्ष श्रेष्ठीचे फोटो बेपत्ता असल्याचे पहावयास मिळाले. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघांतील इंदापुर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि […]

सामना 29 Mar 2026 5:45 pm

साक्षी बुरकुलेला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

पहिल्‍या खेलो इंडिया ट्रायबल स्‍पर्धेत यवतमाळच्‍या साक्षी बुरकुलेने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून दिवस गाजविला. वेटलिफ्टिंगच्‍या ८६ किलो गटात सर्वाधिक एकूण १५० किलो वजन पेलून साक्षी बुरकुलेने पर्दापणातच सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स २०२६ चा भाग म्हणून छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित महिलांच्या ८६ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. पंडित […]

सामना 29 Mar 2026 5:39 pm

War Crisis –पश्चिम आशियातील संकटाचा सामना करण्यासाठी, नागरी विमानन मंत्रालय सज्ज

पश्चिम आशियातील संघर्षाचा विमान कंपन्यांवरील परिणाम कमी करण्यासाठी नागरी विमानन मंत्रालय विविध पर्यायांचा शोध घेत आहे. यामध्ये जेट इंधनावरील कर कमी करण्याबाबत राज्य सरकारांशी चर्चा करण्याचाही समावेश आहे. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या आणि अमेरिका, इस्रायल व इराण यांचा समावेश असलेल्या पश्चिम आशियातील अशांततेमुळे, तेलाच्या वाढत्या किमती आणि हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे भारतीय विमान कंपन्यांचा परिचालन […]

सामना 29 Mar 2026 5:35 pm

भाजप सत्तेत आल्यास तुमचं मांसाहार करणंही बंद करेल; निवडणूक सभेत ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता धार चढली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. “जर भाजप सत्तेत आली, तर ते लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही बंधनं आणतील आणि तुम्हाला मांसाहार करण्यापासून रोखतील,” असा दावा ममता बॅनर्जी यांनी एका जाहीर सभेत केला आहे. उत्तर दिनाजपूर येथील चोप्रा येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना ममता […]

सामना 29 Mar 2026 5:34 pm

ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ मिळाले- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचा उदघाटन सोहळा उत्साहात स्व. अजितदादा पवार साहित्यनगरी

धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शिक्षक आमदार विक्रम काळे सातत्याने करत आहेत. त्यामुळे विक्रम काळे हे स्व. वसंतराव काळे यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने ते चालवीत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. धाराशिव तालुक्यातील पळसप येथे शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे उदघाटन रविवारी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.सुरेश सावंत, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, मसापचे संमेलनाध्यक्ष प्रा. फ.म. शहाजिंदे, स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, प्राचार्य अनिल काळे, अनुराधा काळे, शुभांगी काळे, व्यंकट बेद्रे, चंद्रकांत बिराजदार, हेमंत जाधव, दत्तात्रय पवार, रमेश बिराजदार, बी. एन. केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथदिंडीने साहित्यनगरी दुमदुमली. तर ग्रंथप्रदर्शनाला साहित्यरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याचे उद्घाटन डॉ. घ. ना. पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रप्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याचे उद्घाटन साहित्यिक राजेंद्र अत्रे यांच्या हस्ते रसिकांची पावले थबकली. मातृभाषा हीच ज्ञान भाषा झाली पाहिजे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी, स्व. आमदार वसंतराव काळे यांनी जीवन मूल्यांची शिकवण दिली असल्याचे सांगून मराठवाड्यात त्यांनी विचारांचे जाळे निर्माण केले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी, संमेलन आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात, संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत म्हणाले की, बॅरिस्टर सावरकर यांनी 1938 साली साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून मातृभाषा हीच ज्ञान भाषा झाली पाहिजे असा आग्रह धरला होता असे सांगितले. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी तर आभारप्रदर्शन बालाजी इतबारे यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत लिखित अनुभवाचे बोल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास मराठवाड्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह साहित्यिक, कवी, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 5:21 pm

महिलांच्या खात्यात पैसे, प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा; आसाममध्ये काँग्रेसच्या काय आहे ५ मोठ्या गॅरंटी?

आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज जनतेसाठी पाच मोठ्या ‘गॅरंटी’ जाहीर केल्या आहेत. नओबोईचा येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना खरगे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आणि काँग्रेस सत्तेत आल्यास महिला, आरोग्य आणि भूमिपुत्रांच्या हितासाठी क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. या पाच गॅरंटींच्या जोरावर […]

सामना 29 Mar 2026 5:17 pm

तेलाच्या भीषण संकटामुळे पाकिस्तानात ‘स्मार्ट लॉकडाऊन’लागू; लग्नसोहळ्यांवरही बंदी

इराण युद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमालीची खालावली असून, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहबाज शरीफ सरकारने देशात ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमांनुसार, 4 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी मध्यरात्री 12.01 वाजेपासून ते रविवारी सकाळी 11.59 वाजेपर्यंत संपूर्ण पाकिस्तानात कडक निर्बंध असतील. या काळात सर्व […]

सामना 29 Mar 2026 5:13 pm

मसुरे येथील मान्यवरांचा मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या वतीने गौरव

मसुरे प्रतिनिधी मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या वतीने मसुरे येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव मुंबई दादर येथे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक मुळीक परब आणि संस्थेचे मुंबईचे सचिव प्रसाद बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये मसुरे सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेचे सर्व नूतन संचालक मंडळ, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेतील विशेष योगदान [...]

तरुण भारत 29 Mar 2026 4:47 pm

Jammu Kashmir –बर्फवृष्टीनंतर गुलमर्ग पर्यटकांनी फुलले, गोंडोला राईडसाठी सर्वाधिक गर्दी

कश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये रविवारी झालेल्या ताज्या हिमवर्षावामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली. विशेषतः गुलमर्ग गोंडोलाजवळ लांबच लांब रांगा दिसत होत्या, जिथे शेकडो पर्यटक तासन्तास थांबले होते. जगातील सर्वात उंच केबल कार सेवांपैकी एक मानली जाणारी गुलमर्ग गोंडोला दोन टप्प्यांत चालते. पहिला टप्पा गुलमर्ग ते कांगदुरी आणि दुसरा कांगदुरी ते अफारवत पर्यंत आहे. Jammu […]

सामना 29 Mar 2026 4:35 pm

स्मिता जयंत शिंदे तसेच ॲड.निलेश बारखडे पाटील यांचा गृह सत्कार

धाराशिव (प्रतिनिधी)- आंबेडकर साखर कारखाना परिवारात, परिवारातील सदस्यांचे कुठलेही यश हे प्रत्येकाच्या घरातील यशासारखेच साजरे केले जाते.आज ॲड.निलेश पाटील यांचा बॅडमिंटन स्पर्धेतील दैदिप्यमान यशाबद्दल तसेच कु.स्मिताचा कृषी अधिकारी झाल्याबद्दल दोघांचा मनस्वी सत्कार आमचे पितृतुल्य पी. डी. बप्पा व पितृतुल्य दादांच्या हस्ते पार पडला.या प्रसंगी ॲड.चित्रावजी गोरे,युवराजजी राजे,लइकभाई शेख, धनंजयजी भोसले, विलासराव जगदाळे सर, माणिकराव रोहिले सर, शिवदासजी कांबळे सर,शशिकांत कापसे त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे महादेव बिडवे साहेब,अमोल पाटील साहेब व मल्टीस्टेट हेड ऑफिस चा पूर्ण स्टाफ हजर होता.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 4:34 pm

उसाच्या शेताला आग

तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील ढेकरी येथे शनिवार दि 28 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता रोड लगत असलेल्या उसाच्या शेताला आग लागली मात्र तुळजापूर नगरपालिकेचे अग्निशामक वाहन 15 मिनिटात येऊन त्यांनी आग विझवल्याने पुढील मोठ्या आर्थिक नुकसान कळले यात शेतकऱ्याचा अर्था ऊस जळून खाक झाला मात्र त्यापुढील शेतकऱ्याची शेतातील ज्वारी वाचवण्यास अग्निशामक दलाला यश आले तुळजापूर तालुक्यातील ढेकरी लगत 5 13 गट नंबर मध्ये येथील दादा मूडफणे यांची रोड लगत शेतजमीन असून त्यात दीड एकर वर असणाऱ्या उसाच्या शेताला शनिवारी सकाळी अचानक या उसाला आग लागली यात अर्धा ऊस जळून खाक झाले तुळजापूर अग्निशामक दलाचे वाहन वेळेवर, आल्याने अर्धा ऊस वाचला व त्यापुढील साडेचार एकरात उभे असलेले ज्वारी वाचली . सदरील रस्त्यावरून किंवा वाहनांमधून जाणाऱ्यांनी सिगरेटचे थोटके फेकला ने आग लागल्याया संशय व्यक त होत आहेसदरील आग हे अग्निशामक दलाचे प्रमुख देविदास देवकते वाहन चालक हर्षद क्षीरसागर फायरमन शुभम साळुंखे संजय बनसोडे अजय सोनवणे सह त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 4:33 pm

चैत्र पौर्णिमा काळात बिडकर तलाव पायऱ्या मार्गे देवि दर्शणार्थ सोडणार

तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा महोत्सव 2026 हा दिनांक 30 मार्च 2026 ते 03 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या महोत्सव काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेता, तसेच सलग सुट्ट्यांचा विचार करून मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याअनुसार, दिनांक 31 मार्च 2026 रोजी रात्री 01:00 वाजल्यापासून ते 05 एप्रिल 2026 रोजी रात्रीपर्यंत भाविकांना ‌‘बिडकर पायऱ्या‌’ येथून दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाने सर्व महंत, पुजारी, सेवेधारी तसेच भाविकांनी या व्यवस्थेची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार तथाव्यवस्थापक प्रशासन माया माने यांनी केले आहे. दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 4:33 pm

पंचायत समिती मधून समतानगरकडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा

धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नं. 145 मधून 12 मीटर रुंदीचा जिल्हाधिकारी कार्यालय ते समता कॉलनीला जोडणारा रस्ता असून तो पंचायत समितीच्या क्वार्टर समोरुन जातो. या रस्त्यावरुन नागरीकांना दवाखाने, कार्यालय, बँक इत्यादी ठिकाणाला भेट देता येत होती. गेल्या 50 वर्षापासून या रस्त्यावरुन नागरीकांची येण्या-जाण्याची वहिवाट आहे. शासनाने धाराशिव शहराची विकास योजना मंजूर केली असून या विकास योजनेत या रस्त्याला 12 मी. डी.पी.रोडचा दर्जा आहे. परंतू पंचायत समितीने या रस्त्यावर समता कॉलनीच्या बाजूने सिमेंट पोल आडवे टाकून नागरिकांच्या वहिवाटीला बेकायदेशीर अडथळा केला असून तो रस्ता वहिवाटीसाठी गैरमार्गाने बंद केला आहे. असे करुन पंचायत समिती धाराशिव ही शासनाने मंजूर केलेल्या विकास योजनेच्या प्रस्तावाचे व नगर रचता कायद्याचे उल्लघंन करीत आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या वहिवाटीला बेकायदेशीर प्रतिबंध करीत आहे. जो की हा फौजदारी गुन्हा आहे. प्रशासनाच्या या मनमानी निर्णयामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे जिल्हाधिकारी, धाराशिव यांना सदरील रस्ता तात्काळ खुला करणेबाबतचे निवेदन देण्यात आले व यापुढे जर रस्ता बंद केला तर रस्ता अडवण्यासाठी लावलेलं पोल शिवसेना उखडून टाकणार असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक राजाभाऊ पवार, पंकज पाटील, अमित उंबरे, राज निकम, ज्ञानदेव करवर, राणा बनसोडे, संभाजी सलगर, शहर संघटक प्रशांत साळुंके, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख राकेश सुर्यवंशी, उपशहरप्रुख बंडु आदरकर, विजय ढोणे, युवासेना शहरप्रमुख अभिजीत कदम, शहर संघटक कृष्णा मुंडे, अजिंक्य राजेनिंबाळकर, महेंद्र शिंदे, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे, अक्षय खळदकर, सागर मोरे, मनोज पडवळ, सुनिल गायकवाड, पंकज पडवळ, मनोज उंबरे, सात्वीक दंडनाईक, अमित लाटे, वैभव उंबरे, प्रदिप साळुंके यांच्यासह स्थानिक नागरीक उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 4:32 pm

तुळजापूरात आयपीएलच्या निमित्ताने सट्टा बाजाराला उधाण ?

तुळजापूर (प्रतिनिधी)- देशभरात क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाचा शिखर गाठणारी आयपीएल स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होत आहे. पण या क्रिकेट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात मात्र एका वेगळ्याच ‌‘खेळा‌’ची चर्चा रंगू लागली आहे ती म्हणजे सट्टा बाजाराची. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएलच्या कालावधीत तुळजापूर परिसरात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या या शहरात विविध अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा असताना, आता त्यात सट्टा बाजाराची भर पडणार असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. क्रिकेटमधील प्रत्येक बॉलवर रन, चौकार, षटकार, विकेट यावर पैसे लावले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मोबाईल ॲप्स, ऑनलाईन नेटवर्क आणि स्थानिक एजंट यांच्या माध्यमातून हा सट्टा मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, या सट्टा व्यवहारात तरुणांचा वाढता सहभाग ही सर्वात गंभीर बाब ठरत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक तरुण या जाळ्यात अडकत असून, त्यामुळे भविष्यात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शहरात आयपीएल काळात दररोज लाखोंचा सट्टा लावला जातो, अशी माहिती पुढे येत आहे. सट्टा घेणाऱ्या अड्ड्यांवर गर्दी वाढल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, तुळजापूरातील नागरिकांकडून एकच मागणी जोर धरू लागली आहे “आगामी आयपीएलमध्ये सट्टा बाजार सुरू होऊ देऊ नका, तरुणाई वाचवा!”नगराध्यक्षांनी अलीकडेच अवैध धंद्यांविरोधात हल्लाबोल करत कठोर भूमिका घेतल्याने, आता सट्टा बाजार रोखण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर येऊन ठेपली आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 4:31 pm

वाढदिवसाचा अनोखा उपक्रम : ध्रुव जाधवकडून स्वच्छतेचा संदेश

तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील अवघ्या दहा वर्षांच्या ध्रुव जाधव या चिमुकल्याने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. केक कापणे, फुगे लावणे याऐवजी ध्रुवने आपल्या घरासमोरील परिसर आजोबा आणि वडिलांसोबत स्वच्छ करून वाढदिवस साजरा केला. “महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारताचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. आमच्या जाधव परिवारातील तीन पिढ्या परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत,” असे ध्रुवने अभिमानाने सांगितले. स्वच्छतेची प्रेरणा त्याला घरातूनच मिळाल्याचे तो सांगतो. “संत गाडगे बाबांनी दिलेली स्वच्छतेची शिकवण माझ्या वडिलांकडून मला आणि माझ्या पिढीला मिळाली,” असेही त्याने नमूद केले. ध्रुव हा विकास पोपटराव जाधव (चेअरमन, एकनाथ फाउंडेशन तुळजापूर) यांचा मुलगा असून, लहान वयातच समाजभान जपणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे स्वच्छतेचा संदेश समाजात अधिक प्रभावीपणे पोहोचत असून, नव्या पिढीसमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण होत आहे. वाढदिवसाचा अनोखा उपक्रम : ध्रुव जाधवकडून स्वच्छतेचा संदेश तुळजापूर येथील अवघ्या दहा वर्षांच्या ध्रुव जाधव या चिमुकल्याने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. केक कापणे, फुगे लावणे याऐवजी ध्रुवने आपल्या घरासमोरील परिसर आजोबा आणि वडिलांसोबत स्वच्छ करून वाढदिवस साजरा केला. “महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारताचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. आमच्या जाधव परिवारातील तीन पिढ्या परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत,” असे ध्रुवने अभिमानाने सांगितले. स्वच्छतेची प्रेरणा त्याला घरातूनच मिळाल्याचे तो सांगतो. “संत गाडगे बाबांनी दिलेली स्वच्छतेची शिकवण माझ्या वडिलांकडून मला आणि माझ्या पिढीला मिळाली,” असेही त्याने नमूद केले. ध्रुव हा विकास पोपटराव जाधव (चेअरमन, एकनाथ फाउंडेशन तुळजापूर) यांचा मुलगा असून, लहान वयातच समाजभान जपणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 4:31 pm

लोकलच्या दिव्यांग डब्यातच पोलिओग्रस्त प्रवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

मुंबई लोकल ट्रेनमधील दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डब्यात एका पोलिओग्रस्त व्यक्तीवर 5 ते 6 जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. ही घटना 28 मार्च रोजी दुपारी सुमारे 2:45 वाजता सीएसएमटी–कर्जत फास्ट लोकलमध्ये घडल्याचे समोर आले आहे. […]

सामना 29 Mar 2026 4:14 pm

Israel Iran War –‘सौदीचे राजकुमार माझी हाजी हाजी करत आहेत’; इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

इराणविरुद्ध सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान करून जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. “सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सध्या माझी हाजी हाजी करत आहेत,” असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराणवर जमिनीवरून हल्ला करण्यासाठी सौदीकडून दबाव आणि विनवण्या केल्या जात असल्याचे संकेत यातून मिळत […]

सामना 29 Mar 2026 4:08 pm

इस्रायली हल्ल्यात तीन पत्रकार ठार, लेबनॉनचे राष्ट्रपती म्हणाले, हा एक घृणास्पद गुन्हा…

दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात युद्धाच्या बातम्या देणाऱ्या तीन पत्रकारांचा मृत्यू झाला. या बातमीची त्यांच्या टीव्ही चॅनल्सनी पुष्टी केली आहे. यामुळे या प्रदेशात इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल चिंता वाढली आहे. हिजबुल्लाहच्या अल-मनार टीव्हीचे वार्ताहर अली शोएब हे शनिवारी दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या हल्ल्यात ठार झाले. इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, शोएब […]

सामना 29 Mar 2026 4:03 pm

Solapur |पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा निर्णय; पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार

सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळ्यातील पाणीपुरवठा योजना सोलापूर -सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहरतसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होण्यासाठी उजनी धरणातील सात टीएमसी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उन्हाळ्यात टंचाई सुनिश्चित करण्यासाठी [...]

तरुण भारत 29 Mar 2026 4:02 pm

प्रेरणा अनुभवात्मक शिक्षण उपक्रमासाठी सुमित जेवळीकर याची निवड

तुळजापूर (प्रतिनिधी)- शिक्षण मंत्रालय केंद्र सरकार व CBSE व NCERT मार्फत चालवल्या जात असलेल्या प्रेरणा अनुभवात्मक शिक्षण उपक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर नोडल स्कुल धाराशिव येथे 5 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत देशातून 20 मुलांची निवड करण्यात आली. यामध्ये श्री.कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर येथील 9 अ मधील विद्यार्थी सुमित सर्वोत्तम जेवळीकर याची प्रेरणा अनुभवात्मक शिक्षण केंद्र वडनगर, गुजरात साठी निवड झाली आहे. हे प्रशिक्षण येत्या मे महिन्यात 7 दिवस चालणार आहे. या यशाबद्दल शिक्षणाधिकारी धाराशिव, गटशिक्षणाधिकारी तुळजापूर, नवोदय विद्यालय तुळजापूरचे प्रभारी प्राचार्य डी.व्ही बडे तसेच प्रेरणा समन्वयक संजय माने यांनी जेवळीकर सुमित सर्वोत्तम याचे अभिनंदन करून वडनगर, गुजरात येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर येथील सांस्कृतिक विभाग प्रमुख भालेराव सर यांनी केले त्याचा यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 4:01 pm

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा, जिल्हाधिकारी पुजार यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या कार्यालयीन मूल्यमापनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांचा देखील सन्मान करण्यात आला.या वेळी माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार,मुख्य सचिव राजेश अग्रवाल,पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या कुशल नेतृत्व,दूरदृष्टी आणि परिणामकारक नियोजनामुळे धाराशिव जिल्ह्याने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कामकाज अधिक गतिमान,पारदर्शक आणि नागरिकाभिमुख केले असून याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. 150 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आल्या.यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड,तुळजाई चॅटबॉट, ‌‘कल्पवृक्ष स्मार्ट जीआर‌’ प्रणाली तसेच ‌‘जीवनरेखा‌’ प्रणाली या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे.डिस्ट्रिक्ट डॅशबोर्डमुळे विविध शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले असून निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. ‌‘कल्पवृक्ष स्मार्ट जीआर‌’ प्रणालीमुळे शासन निर्णय व परिपत्रकांची अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक अचूक आणि जलद झाले आहे. ‌‘जीवनरेखा‌’ प्रणालीद्वारे शेत रस्त्यांची नोंद व व्यवस्थापन सुलभ झाले असून ग्रामीण भागातील तक्रारींचे प्रभावी निराकरण होत आहे.तसेच तुळजाई चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांची माहिती घरबसल्या उपलब्ध होत असून सेवा वितरण अधिक सुलभ,जलद आणि विश्वासार्ह झाले आहे.ई-ऑफिस प्रणालीच्या व्यापक वापरामुळे ‌‘पेपरलेस कार्यालय‌’ संकल्पना प्रत्यक्षात येत असून प्रशासनाची कार्यक्षमता वाढली आहे. या यशामागे जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नमूद केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान,विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर प्रशासनात वाढवून कामकाज अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.नागरिकांनी उपलब्ध डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 4:00 pm

आदर्श प्राथमिक विद्यामंदिरात पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव येथे दि.28 मार्च 2026 रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापकांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट करत शाळा व पालक यांच्यातील संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. वर्गशिक्षक वैभव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यास, शिस्त व वर्तनाविषयी पालकांशी संवाद साधत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी पालकांनीही आपले अभिप्राय व सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक के.बी. घोडके, उपमुख्याध्यापक बी.के. कुंभार यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक यांचा समन्वय अत्यावश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव धनंजय आप्पा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पालक व शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 3:59 pm

जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे यांचा सत्कार

परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी तालुक्यातील भाऊसाहेब खरसडे यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.गणेश खरसडे, जेष्ठ विधीज्ञ दादासाहेब खरसडे, डॉ.दशरथ घोगरे, अंकुश मुळीक, होरे, नितीन गाढवे, प्रकाश दुरूंदे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 3:58 pm

तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल

तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी जव्हेरिया जुबेर शेख हिने लहान वयातच उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.ऑलिम्पियाड परीक्षेतील गणित विषयात तिने तब्बल 97.98% गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने जव्हेरियाचा विशेष सत्कार करण्यात आला.शाळेचे प्राचार्य लोद मॅडम व राजेश जगताप सर यांच्या हस्ते तिला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षकवर्ग,विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते. जव्हेरिया ही वीर महाराष्ट्र न्यूज व सा.नेक्स्ट फ्रेमचे संपादक यांची मोठी मुलगी असून तिच्या यशामुळे शाळेसह तुळजापूर शहराचा अभिमान वाढला आहे. लहान वयातच गणित विषयात दाखवलेली तिची प्रावीण्य आणि मेहनत कौतुकास्पद असल्याचे शिक्षकांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी तसेच शेख परिवाराच्या वतिने जव्हेरियाचे अभिनंदन करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 3:58 pm

बावची येथील शेतकऱ्याचे बोअर व पाईपलाईनची तोडफोड

परंडा (प्रतिनिधी)- तुला इथे शेती करू देणार नाही अशी धमकी देत तालुक्यातील बावची येथील एका दलित शेतकऱ्याच्या शेतातील बोअर व पाईपलाइनची तोडफोड केल्याने सुमारे 45 हजारांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. जातीय द्वेषातून एका दलित शेतकऱ्याला लक्ष्य करून त्याच्या शेतातील पाइपलाइन, बोअरवेल आणि सिंचन साहित्याची तोडफोड केल्याची धक्कादायी घटणा परंडा तालूक्यातील बावची येथे घडली आहे. इतकेच नव्हे, तर तुला इथे शेती करू देणार नाही.असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बावची येथील रामचंद्र विक्रम थिटे यांच्याविरोधात परंडा पोलिस ठाण्यात गुरुवारी दि.26 मार्च रोजी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ऑट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 3:57 pm

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

धाराशिव (प्रतिनिधी)- प्रियंवदा महाडदळकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव यांच्या स्वाक्षरीने 27 मार्च रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले.भारतीय प्रशासकीय सेवेत 2022 मध्ये देशात 13 वा आणि महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या श्रीमती.महाडदळकर यांनी मुंबई येथील व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून,त्यानंतर बेंगळुरू येथील आयआयएममधून फायनान्स विषयात एमबीए पदवी संपादन केली आहे.शैक्षणिकदृष्ट्या भक्कम पायाभूत तयारीनंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी जून 2023 ते मे 2024 या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातच त्यांनी परिविक्षाधीन काळात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना स्थानिक प्रशासन,ग्रामीण विकास व विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे अर्थ मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून काम पाहिले. यानंतर अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) म्हणून त्यांनी कार्य करत आदिवासी व दुर्गम भागातील विकासकामांना गती दिली. स्थानिक समस्यांचे निराकरण, शासकीय योजनांचा प्रभावी लाभ आणि प्रशासनातील पारदर्शकता यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्रीमती. महाडदळकर यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण विकास,पायाभूत सुविधा,शिक्षण,आरोग्य आणि सामाजिक कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 3:57 pm

नाटक हे मानवी जीवन समृद्ध करणारे माध्यम : नितीन दंडुके

धाराशिव (प्रतिनिधी)- नाटकामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. विविध अनुभवांमुळे माणूस अधिक समजूतदार आणि सहानुभूतीशील बनतो. त्यामुळे नाटक हे मानवी जीवन समृद्ध करणारे एक महत्त्वाचे कला माध्यम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नितीन दंडुके यांनी केले. धाराशिव शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव आयोजित राज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे शुक्रवार 27 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता उदघाटन संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत तपस्वी, नाट्य रंगकर्मी अश्विनी तडवळकर , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे, डॉ.गणेश शिंदे,डी. जी.कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, सुगत सोनवणे, सारीपुत शिंगाडे, यांच्या सह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिवच्या पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना नितीन दंडुके म्हणाले की, नाटक हे मानवी जीवनाचे प्रतिबिंब मानले जाते. ते केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. नाटकामुळे व्यक्तीला आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येतात, त्यामुळे मानसिक ताण कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत तपस्वी म्हणाले की, अशा स्पर्धांमुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होते. रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांची प्रगती साधली जाते. नाटकातून समाजातील समस्या, संस्कृती आणि मूल्यांची जाणीव होऊन व्यक्ती अधिक संवेदनशील बनत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर सोलापूर येथील वैभव दीप नाट्य संस्थेची प्रेम की यातना ही एकांकिका सादर करण्यात आली. या नाटकात जैद हसन, सई दरेकर,प्रतीक तांदळे यांनी भूमिका साकारल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक विशाल शिंगाडे, सूत्रसंचलन डी. जी.कुलकर्णी यांनी केले. तर आभार शशिकांत माने यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ताहेर शेख, विजय उंबरे, अविनाश बनसोडे , यशवंत शिंगाडे, सुमित शिंगाडे,प्रदीप गायकवाड, भैरू कसबे, सुरेश देवकुळे,प्रमोद जोगदंड,दिशा सोनटकके, रिया राठोड, प्रवीण सोनवणे, प्रियांका पोतदार, रिया राठोड यांच्या सह शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. नाटक पाहण्यासाठी शहर व परिसरातील नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 3:56 pm

कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 1 हजार रुपयांचे अनुदान द्या- डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून त्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कांद्याच्या लागवडीसाठी लागणारे बियाणे, खते, कीडनाशके, मजुरी तसेच इतर शेतीसंबंधित खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, बाजारपेठेत कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होत आहे. डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. विशेषतः कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान दिल्यास त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.तसेच शासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंतीही त्यांनी केली आहे. राज्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 3:56 pm

जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नये- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

धाराशिव (प्रतिनिधी)- महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासात्मक पालट होत असून,या उपक्रमात केवळ संख्येपेक्षा गुणवत्तापूर्ण कामाला अधिक महत्त्व आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांची संख्या जरी मोठी नसली तरी त्यांनी केलेले काम अत्यंत दर्जेदार आहे. महिला जिद्दीने व्यवसाय करून आर्थिक उलाढाल वाढवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महिलांना बचत गटात समाविष्ट करून एकही कुटुंब या चळवळीपासून वंचित राहू नये, असे आवाहन असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. धाराशिव शहरातील शहर पोलीस स्टेशनजवळील उस्मानाबाद क्लब मैदानावर महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त ‌‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प‌’ अंतर्गत 27 ते 29 मार्च दरम्यान आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक साळुंके,प्रभारी महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महादेवी रणदिवे तसेच माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर यांनी केले. सूत्रसंचालन सीएमआरसीचे सहव्यवस्थापक किशोर टोम्पे यांनी केले,तर उपस्थितांचे आभार सीएमआरसी व्यवस्थापक महादेव पवार यांनी मानले.या कार्यक्रमास बचत गटातील महिला,अधिकारी,कर्मचारी तसेच सीएमआरसीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 3:55 pm

Solapur |सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवकांचा ‘रुद्रवतार’; सामान्य प्रशासन विभागाचे केले ‘पोस्टमार्टम’

प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोलापूरचा डोलारा सोलापूर – महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय आढावा बैठकीत सामान्य प्रशासन विभागाच्या कारभारावर नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल करत अक्षरशः पोस्टमार्टम केले. चार विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर चालू आहे. तर गेल्या वीस वर्षापासून १२ वाहनचालक कायमसेवेच्या प्रतीक्षेत असल्याचे बैठकीत समोर आले. विभागाच्या [...]

तरुण भारत 29 Mar 2026 3:54 pm

प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्याकडून निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा

धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या परिसर मुलाखतीमध्ये महाविद्यालयातील 28 उमेदवारांची निवड झालेली होती. त्या सर्व उमेदवारांना टाटा मोटर्स कंपनीचा रुजू आदेश आणि गुलाब पुष्प देऊन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर प्लेसमेंट ऑफिसर प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे यांचे देखील अभिनंदन करण्यात आले. यापुढे देखील अशाच प्रकारच्या परिसर मुलाखतीचे आयोजन या विभागाकडून करण्यात यावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी मदत करावी असे आवाहन डॉ. देशमुख यांनी यावेळी केले.

लोकराज्य जिवंत 29 Mar 2026 3:54 pm

गॅस सिलिंडरच्या रांगेत वृद्धाचा मृत्यू, रोहिणी खडसेंनी भाजपच्या महिला आमदाराला फटकारले

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी राज्यात सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे जरी सांगत असले तरी अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी मोठ्याच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहे. या रांगांमध्ये काही जणांचा मृत्यूही झाल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार अकोल्यातही घडला आहे. अकोल्यातील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना आपला जीव गमवावा लागला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा […]

सामना 29 Mar 2026 3:46 pm

Solapur |मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारणे पडले महागात; सिंदखेडमध्ये चौघांवर चाकूने खुनी हल्ला

सोलापूर अक्कलकोट सिंदखेड मुलीला छेडल्याचा जाब सोलापूर -मुलीला छेडल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या चौघांना चाकू तसेच लाकडाने मारहाण करण्यात आली. ही मारहाण शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड येथे झाली. सुमित गोकुळ खांडेकर (वय १७),गोकुळ मारुती खांडेकर (वय ४३). सागर दत्तात्रय महाबुरे (वय २७) व दत्तात्रय राम [...]

तरुण भारत 29 Mar 2026 3:45 pm

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रजत दलाल अडकला विवाह बंधनात; गुपचूप उरकले लग्न

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि पॉवरलिफ्टर रजत दलाल याने रविवारी 29 मार्च 2026 रोजी आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ‘बिग बॉस 18’ मुळे घराघरात पोहोचलेल्या रजतने अत्यंत गुप्त पद्धतीने हा विवाहसोहळा पार पाडला असून, इन्स्टाग्रामवर फोटो समोर येताच ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. आयुष्याच्या एका नवीन पर्वाची सुरुवात, असे […]

सामना 29 Mar 2026 3:44 pm

या गुन्हेगारांना लक्षात ठेवा, मुलींच्या शाळेवर हल्ला करणाऱ्या अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांचा फोटो शेअर करत इराणने दिला इशारा

इराणने अमेरिकेवर गंभीर आरोप करत मिनाब येथील मुलींच्या शाळेवरील क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी दोन अमेरिकी नौदल अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवले आहे. या हल्ल्यात सुमारे 175 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केला आहे. इराणच्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि नायजेरिया येथील दूतावासांनी सोशल मीडियावर या अधिकाऱ्यांचे फोटो शेअर करत त्यांची नावे जाहीर केली. लेह आर. टेट (कमांडिंग ऑफिसर) आणि जेफ्री […]

सामना 29 Mar 2026 3:44 pm

वाळवा तालुक्यात भक्तीचा जागर! ढगेवाडीत सोमवारी श्री पालकेश्वर देवालयाची भव्य यात्रा

ढगेवाडीत पालकेश्वर यात्रेचा उत्साह ऐतवडे बुद्रुक -बाळवा तालुक्याच्या पश्चिम टोकावर असणारे ढगेवाडी हे छोटेसे खेडेगाव. या गावचे ग्रामदैवत श्री पालकेश्वर देवालयाची यात्रा सोमबार ३० मार्च रोजी होत असून येथे महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे. गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या बाराव्या दिवशी द्वादशीचा यात्रेचा मुख्य दिवस असून [...]

तरुण भारत 29 Mar 2026 3:40 pm

नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या 30 हून अधिक नव्या उड्डाणांना सुरुवात, देशभरातील शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढणार

इंडिगो या विमान कंपनीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 30 हून अधिक नवीन उड्डाण मार्ग सुरू करण्याची घोषणा केली आहे. या उड्डाणांना 29 मार्चपासून सुरुवात झाली असून 23 एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने नवीन मार्ग सुरू केले जाणार आहेत. या नव्या उड्डाणांमुळे नवी मुंबई विमानतळाचा संपर्क आग्रा, अयोध्या, बागडोग्रा, बेळगाव, चंदीगड, दीव, कन्नूर, कोलकाता, पटना, राजकोट, श्रीनगर, वाराणसी, विशाखापट्टणम […]

सामना 29 Mar 2026 3:29 pm

Varanasi- विमान लॅंडिग दरम्यान प्रवाशाने आपत्कालीन गेट उघडल्यामुळे गोंधळाचे वातावरण, जाणून घ्या नेमकं काय घडलं

बंगळूरूवरुन वाराणसीला जाणाऱ्या विमानात एक विचित्र घटना घडली. विमान लॅंडिंग दरम्यान एका प्रवाशाने आपत्कालीन गेट उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वच प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. वाराणसी विमानतळावरील धावपट्टीवर विमान उतरणार असताना प्रवाशाने हे कृत्य केले. प्रवाशाच्या या कृतीमुळे विमानातील प्रवाशांचे प्राण धोक्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, विमान जमिनीपासून केवळ ५०० फूट उंचीवर उतरण्याच्या स्थितीत होते. दरम्यान, आपत्कालीन […]

सामना 29 Mar 2026 3:24 pm

कर्नाटकमध्ये कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या तरुणाने आई, बहिण आणि भाच्याचा गळा चिरला आणि नंतर…

कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या एका तरुणाने त्याची आई, बहिण व भाच्याची गळा चिरला.त्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात आई व बहिणीचा मृत्यू झाला असून आरोपी तरुण व त्याचा भाचा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्नाटकमधील बंगळुरू शहरात मोहन गौडा हा त्याची आई आशा (५५), बहिण वर्षिता (३४), भाचा मयंक (११) याच्यासोबत राहत होता. […]

सामना 29 Mar 2026 3:11 pm

रामनवमी मिरवणुकीत गोळीबार, भाजप आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; पिस्तूल जप्त

ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील तितलगड येथे रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गोळीबार केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार नबीन कुमार जैन या भाजप आमदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तितलगडचे आमदार जैन यांनी मिरवणुकीदरम्यान सायंकाळी आनंदाच्या भरात त्यांच्या परवानाधारक 0.32 बोर पिस्तूलमधून तीन फायर केले. या मिरवणुकीत शेकडो […]

सामना 29 Mar 2026 3:10 pm

कवठेमहांकाळ हादरले! रायवाडीत फळविक्रेत्या दाम्पत्याला बेदम मारहाण करून दागिने लंपास

रायवाडी-भिवघाट रोडवर लूटमार; कवठेमहांकाळ -अनोळखी चोरट्यांनी दाम्पत्याला बेदम मारहाण करूनएक लाख वीस हजार रुपयांच्या दागिन्यांची लूट करून चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना रायवाडी येथे शुक्रवारी रात्री घडली. याबाबत माहिती अशी की, रायवाडी येथील फळविक्रेते रघुनाथ बिरू खरात (वय ५०) यांची दोन अनोळखी चोरट्यांनी मोटरसायकल अडवून त्यांना [...]

तरुण भारत 29 Mar 2026 3:10 pm

Sangli Crime |तुम्हाला मस्ती आली आहे का?”; सांगली जेलमध्ये किरकोळ वादातून दोघांना बेदम मारहाण

सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांची आपापसात भिडंत सांगली -सांगली कारागृह परिसरातील मोकळ्या मैदानात स्थानबध्द असलेल्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी कारागृहातच बंदी असलेल्या सोळा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास घडली. हाणामारीत पवन धर्मेद्र साळुंखे (वय २८) आणि मेघशाम उर्फ मोठ्या [...]

तरुण भारत 29 Mar 2026 3:04 pm

Jammu Kashmir –बंदीपोरामध्ये हिमस्खलनाचा इशारा, पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा अंदाज

जम्मू काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार हिमवृष्टीमुळे खोऱ्यातील हवामान अचानक बदलले आहे. नुकत्याच झालेल्या हिमवृष्टीमुळे खोऱ्यातील सौंदर्य अधिक द्विगुणित झाले आहे. मैदानी प्रदेशात हलक्या पावसामुळे पुन्हा थंडी वाढली आहे, ज्यामुळे लोकांना उबदार कपडे घालण्यास भाग पडले आहे. बदलत्या हवामान परिस्थितीमुळे, श्रीनगर येथील हवामान केंद्राने बंदीपोराच्या गुरेझ परिसरात पुढील २४ तासांत हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. […]

सामना 29 Mar 2026 2:59 pm

लखीमपूर खेरीमध्ये थरार; टॅक्सी चालकांमध्ये झाला वाद, बोनेटवर लटकवून 4 किमीपर्यंत पळवली कार

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातून अंगावर शहारे आणणारी एक थरारक घटना समोर आली असून, भारत-नेपाळ सीमेजवळ प्रवाशांच्या वाहतुकीवरून झालेल्या वादात एका टॅक्सी चालकाने दुसऱ्याला कारच्या बोनेटवर लटकवून तब्बल चार किलोमीटरपर्यंत गाडी पळवली. ताशी 100 किमी वेगाने धावणाऱ्या या कारच्या बोनेटवर जीव मुठीत धरून लटकलेल्या चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ही घटना लखीमपूर […]

सामना 29 Mar 2026 2:59 pm

मिरज हादरले! दामदुप्पटच्या अमिषाने बेडग येथील शेतकऱ्यांना ३९ लाखांचा गंडा

मिरज बेडगमध्ये शेतकऱ्यांची दामदुप्पट फसवणूक उघडकीस मिरज -दामदुप्पट करुन देण्याच्या अमिषाने बेडग येथील पाच ते सहा शेतकऱ्यांना ३९ लाख, २३ हजार, १७० रुपयांचा गंडर घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मनोजकुमार अशोक पाटील यांच्यासह फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी मिरज ग्रामीण पोलिसात धांव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार [...]

तरुण भारत 29 Mar 2026 2:58 pm

नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंगचा टीजर प्रदर्शित, या तारखेला रिलीज होणार वेबसीरीज

फँड्री, सैराट आणि झुंड या चित्रपटांनंतर नागराज मंजुळे यांची मटका किंग ही नवीन वेबसीरीज प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सीरीजमध्ये विजय वर्मा आणि कृतिका कामरा यांची मुख्य भूमिका आहे. मुंबईतला सुप्रिसुद्ध मटका किंग रतन खत्रीच्या आयुष्यावर आधारित ही सीरीज आहे असे सांगितले जात आहे. मटका खेळून ब्रिज भट्टी कसा श्रीमंत होतो आणि आपले साम्राज्य उभं करतो […]

सामना 29 Mar 2026 2:51 pm

डिजीटल अरेस्टच्या नावाने नांदेडच्या चार तरुणांनी मुंबईतील तरुणीला 32 लाखाला गंडवले

डिजीटल अरेस्ट असा कोणताही प्रकार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात येत असले तरी याचा फटका मुंबईच्या एका तरुणीला बसला असून, नांदेडच्या तरुणीला डिजीटल अरेस्टच्या नावाखाली या तरुणीला 32 लाखाला गंडवले. मुंबईच्या पथकाने यातील चार आरोपींचा शोध लावला असून त्यांना नांदेडच्या इतवारा पोलिसांच्या मदतीने अटक करुन त्यांना मुंबईला तपासासाठी घेवून गेले आहेत. मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे राहणार्‍या […]

सामना 29 Mar 2026 2:38 pm

अभिनेता विजय तामिळनाडूमध्ये दोन जागांवर निवडणूक लढवणार

अभिनेता आणि टीव्हीके प्रमुख विजय तामिळनाडूमध्ये दोन जागांवर निवडणूक लढवणार असून, उमेदवारांची नावे जाहीर करून तरुणांना एक मोठे आश्वासन दिले आहे. विजय स्वतः त्रिची पूर्व आणि पेरांबूर (चेन्नई) या दोन जागांवरून निवडणूक लढवणार आहेत. विजय यांनी असेही म्हटले आहे की, ते स्वतः सर्वत्र प्रचार करू शकणार नाहीत. त्यामुळे, त्यांनी अशा उमेदवारांची निवड केली आहे ज्यांच्यावर […]

सामना 29 Mar 2026 2:33 pm

जर बंगालमध्ये भाजप सत्तेवर आली तर मासे खाण्यावरही बंदी येईल, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला इशारा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यात भाजप सत्तेत आल्यास नागरिकांना नॉनव्हेज खाण्यावर बंधने येऊ शकतात. “मासे खाण्यावरही बंदी येईल आणि इतर नॉनव्हेज पदार्थांवरही निर्बंध लादले जातील,” असे त्या म्हणाल्या. याशिवाय, भाजप सत्तेत आल्यास राज्यातील महत्त्वाच्या कल्याणकारी योजना बंद केल्या जातील, असा आरोपही त्यांनी केला. विशेषतः ‘लक्ष्मी भंडार’ योजनेचा उल्लेख […]

सामना 29 Mar 2026 2:26 pm

चैत्री कामदा एकादशीची अनोखी परंपरा, पंढरपुरात विठूरायाला पुरणपोळीचा नैवेद्य

आज चैत्री कामदा एकादशीचा मुख्य सोहळा लाखो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा होतो आहे. अवघी पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेली पाहायला मिळते. उन्हाचा असह्य तडाखा बसत असताना देखील वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्साह काही कमी दिसत नाही. दरम्यान आज एकादशी असली तरी श्री विठ्ठल रखुमाईला फराळाचा नैवैद्य न दाखविता चक्क पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला आहे तथापि […]

सामना 29 Mar 2026 2:20 pm

चैत्री कामदा एकादशीची अनोखी परंपरा, पंढरपुरात भाविक दाखल

आज चैत्री कामदा एकादशीचा मुख्य सोहळा लाखो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा होतो आहे. अवघी पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेली पाहायला मिळते. उन्हाचा असह्य तडाखा बसत असताना देखील वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्साह काही कमी दिसत नाही. दरम्यान आज एकादशी असली तरी श्री विठ्ठल रखुमाईला फराळाचा नैवैद्य न दाखविता चक्क पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला आहे तथापि […]

सामना 29 Mar 2026 2:20 pm

IPL 2026 लिलावानंतर आयपीएलमधून माघार घेणाऱ्या खेळाडूंवर सुनील गावस्कर संतापले; BCCI कडे केली ‘ही’मोठी मागणी

हिंदुस्थानचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आयपीएलच्या (IPL) लिलावात निवड झाल्यानंतर अचानक माघार घेणाऱ्या खेळाडूंवर कडक ताशेरे ओढले आहेत. अशा खेळाडूंना लगाम घालण्यासाठी बीसीसीआयने सध्याच्या शिक्षा प्रणालीचा गांभीर्याने फेरविचार करावा, अशी मागणी गावस्कर यांनी केली आहे. या खेळाडूंवर फक्त दोन वर्षांची बंदी आणणे ही शिक्षा देखील कमीच असल्याचे मत गावस्कर यांनी मांडले आहे. गेल्या काही […]

सामना 29 Mar 2026 2:00 pm

शेतमजूरी करणाऱ्या महिलेच्या खात्यात आले 10 कोटी रुपये, बॅलेन्स चेक करताना दिसली रक्कम

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकाच गोंधळ निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या बँक खात्यात अचानक जवळपास 10 कोटींची रक्कम जमा झाल्याचे एटीएममध्ये दिसून आल्याने कुटुंबीयांसह स्थानिकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. बॅलन्स चेक करताना ही बाब समोर आली आहे. या महिलेचे नाव सीता असून त्या गरीब कुटुंबातून येतात. संपूर्ण कुटंब शेतात […]

सामना 29 Mar 2026 1:59 pm

Satara |सातारा हादरले! सोनगाव कचरा डेपो परिसरातील पत्रावळी कारखान्याला भीषण आग

सातारा सोनगावात कचरा डेपो कारखान्यात आग सातारा – सोनगाव कचरा डेपो परिसरातील पत्रावळी बनविणाऱ्या कारखान्याला शनिवारी सायंकाळी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर पत्रावळ्या जळून खाक झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच सातारा [...]

तरुण भारत 29 Mar 2026 1:53 pm

Karad |टेंभू योजनेचा एअर व्हॉल्व फुटला! ४० ते ५० फूट उंच उडणारे पाण्याचा फवारा; लाखो लिटर पाणी वाया

टेंभू उपसा योजनेचा व्हॉल्व फुटल्याने उडाला पाण्याचा उंच कारंजा कराड -सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कायम दुष्काळी जमिनीसाठी बरदान ठरलेल्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा शुक्रवारी एअर व्हॉल्व फुटल्याने लाखो लिटर पाणी बाया गेले. एअर व्हॉल्वमधून जवळपास ४० ते ५० फूट उंच उडणारा पाण्याचा फवारा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने टप्पा [...]

तरुण भारत 29 Mar 2026 1:46 pm

Kolhapur |कोल्हापूरचा ‘अर्थ अवर’यशस्वी! एका तासात ३ हजार युनिट विजेची केली मोठी बचत

कोल्हापुरात ‘अर्थ अवर’ उत्साहात, हजारो युनिट वीज बचत कोल्हापूर -वर्ल्ड वाईल्ड फंडकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार शनिवारी कोल्हापुरात ‘अर्थ अवर’ पाळण्यात आला. नागरिकांना वीजेच्या बचतीचे महत्व कळावे, हवेत मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाला प्रतिबंध व्हावा असा ‘अर्थ अवर’ पाळण्याचे आवाहन करण्यामागे उद्देश होता. या उद्देशाला सफल करण्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्व [...]

तरुण भारत 29 Mar 2026 1:38 pm

Kolhapur News |विशाळगडावर वन विभागाचा ‘जेसीबी’; राबणाऱ्या हातांचे संसार आले उघड्यावर!

विशाळगड पायथ्याशी कामगारांच्या झोपड्यांवर कारवाई आंबा (वार्ताहर) – विशाळगड येथे गडाच्या बुरुज बांधकामासाठी मदतनीस म्हणून काम करण्यासाठी आलेल्या कामगारांच्या गडाच्या पायथ्या जवळ बांधलेल्या 10 झोपड्या वन विभागाकडून तोडण्यात आल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेतगेले चार महिने बुरुजाचे बांधकाम चालू होते त्या वेळेपासून हे मदतनिस कामगार कुटुंबासह या झोपड्यात [...]

तरुण भारत 29 Mar 2026 1:24 pm

Kolhapur Crime |शुल्लक कारणावरून कांडगाव पेटले! मोटार उभी करण्याच्या वादातून दोन कुटुंबात फ्री-स्टाईल हाणामारी

कांडगावात पार्किंगवरून वाद कोल्हापूर – मोटार दारात उभी केल्याच्या कारणातून कांडगांव – (ता. करवीर) येथे दोन कुटूंबात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही कुटुंबातील चौघेजण जखमी झाले, याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला. शुक्रवार (२७ मार्च) रोजी रात्री ९ वाजण्याच्या [...]

तरुण भारत 29 Mar 2026 1:13 pm

पालापाचोळ्यापासून तयार केला गॅस, मुंबई आयआयटीने शोधला LPG गॅसला भन्नाट पर्याय

इराण -इस्रायल मध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर देशात मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा सुरू आहे. व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद झाले आहेत किंवा मेन्युतील पदार्थांना कात्री लावण्यात आली आहे. घरगुती गॅसही मिळत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल सुरू आहे. असे असले तरी पवईतल्या मुंबई आयआयटी या संस्थेला फार फरक पडलेला नाही. या संस्थेतले कँटीन सुरळीत […]

सामना 29 Mar 2026 1:10 pm

Kolhapur Crime |कोल्हापूर हादरले! कनाननगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ; घरांवर सशस्त्र हल्ला आणि वाहनांची तोडफोड

कनाननगरमध्ये तरुणावर चाकू हल्ला, परिसरात दहशत कोल्हापूर -पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याचा राग मनात धरुन टोळक्याने तरुणाच्या घरासह अन्य दोन घरांवर सशस्त्र हल्ला करत वाहनांची तोडफोड केली. यामध्ये अनिकेत विनोद कांबळे (कनाननगर) याच्यावर टोळक्याने चाकू हल्ला करत जखमी केले. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कनाननगर परिसरात [...]

तरुण भारत 29 Mar 2026 1:07 pm

Antroli |अंत्रोळीच्या तरुणांची भरारी! स्पर्धा परीक्षेत यश मिळवत शासकीय पदांना गवसणी

अंत्रोळी गावात यशाचा जल्लोष, तरुणांच्या कामगिरीचा गौरव अंत्रोळी ( समीर शेख ) : अंत्रोळी गावातील होतकरू तरुणांनी पुन्हा एकदा यशाचा झेंडा रोवला असून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत या तरुणांची विविध शासकीय पदांवर [...]

तरुण भारत 29 Mar 2026 12:56 pm

Israel Iran War –अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर हल्ला; होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पाच ठार, चार जण जखमी

आखाती देशांमधील तणाव आता एका अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचला असून रविवारी सकाळी अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याने इराणवर मोठा लष्करी हल्ला चढवला. इराणच्या मोक्याच्या समजल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळील ‘बंदर खमीर’ या शहरातील जेट्टीवर हा हल्ला करण्यात आला. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा […]

सामना 29 Mar 2026 12:49 pm

Iran War –अमेरिका इस्त्रायलमुळे सर्व देशांना परिणाम भोगावे लागतील, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा

अमेरिका इराण या युद्धाला आता महिना उलटून गेला. तरीही हे युद्ध थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. त्यातच आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायल इतर देशांना सामील करून किंवा खोटा प्रचार करून सध्याचा संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात. ग्रीसचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज गेरापेट्रिस यांच्याशी फोनवर बोलताना अराघची यांनी ही टिप्पणी केली आहे. […]

सामना 29 Mar 2026 12:41 pm

LPG गॅसचा तुटवडा, एजन्सीच्या माणसानेच 30 सिलिंडर केले लंपास आणि झाला फरार

सध्या सुरू असलेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका एलपीजी वितरण एजंटने सुमारे 30 घरगुती गॅस सिलिंडर घेऊन फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या विझाग शहरात सध्या स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून सिलिंडरसाठी मोठी प्रतीक्षा यादी […]

सामना 29 Mar 2026 12:37 pm

आचरा रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता

आचरा:प्रतिनिधी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता रविवारी पहाटे लळीताने झाली. शनिवारी रात्री पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत बसवून मंदिराभोवती ‘हर हर महादेव च्या जयघोषात सोमसूत्री प्रदक्षिणा करण्यात आली. आतिषबाजी व तोफेच्या सलामीने सुरू झालेल्या पालखीला हजारो भाविक उपस्थित होते. देवस्थानच्या रामनवमी उत्सव सांगता सोहळ्यात शाहीथाटातील पंचमुखी महादेवाची पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली. [...]

तरुण भारत 29 Mar 2026 12:37 pm

भोंदूबाबा अशोक खरातला 4 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी

भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 4 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे आता खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे. भोंदूगिरी, जादूटोणा आणि महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला अशोक खरात याला रविवारी नाशिकमधील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने अधिक माहिती मिळावी यासाठी खरातला पोलीस […]

सामना 29 Mar 2026 12:31 pm

Satara |माझंच अपहरण करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न”; अनिल देसाईंचा पोलिसांवर गंभीर आरोप

अनिल देसाईंनी घेतली पालकमंत्री शंभूराज देसाईंची भेट सातारा – जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांचे अपहरण केल्याचा गुन्हा जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांच्यावर दाखल झाल्याने त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई,जिल्हाधिकारी सुभाष पाटील यांची भेट घेतली,यावेळी मी कोणाचे अपहरण केलं नाही,पोलिसांनी माझ्यावर खोटा गुन्हा करून माझेच अपहरण केले [...]

तरुण भारत 29 Mar 2026 12:31 pm

Satara |साताऱ्यात उस बिल थकवणाऱ्या कारखान्यांविरोधात काँग्रेस आक्रमक; १ एप्रिल रोजी ‘जनसुनावणी’चे आयोजन

साताऱ्यात उस बिलांसाठी शेतकरी आक्रमक सातारा -सातारा जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले अद्याप मिळालेली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विशेष ‘जनसुनावणी’ आयोजित करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे उस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या [...]

तरुण भारत 29 Mar 2026 12:19 pm

Dajipur Sanctuary |दाजीपूर अभयारण्यात जनावरे चोरीची टोळी सक्रिय, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्त करण्याची मागणी

राधानगरी परिसरात जनावरांची चोरी वाढली राधानगरी ( महेश तिरवडे ) -दाजीपूर अभयारण्य क्षेत्रातील दाजीपूर, हसणे व ओलवन परिसरात जनावरे चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आपली गाई, म्हशी व इतर जनावरे दिवसभर जंगलात चारण्यासाठी सोडतात [...]

तरुण भारत 29 Mar 2026 12:11 pm

आईची हत्या आणि वडिलांच्या अटकेनंतर अनाथ मुलींवर मामांकडूनच अत्याचार; 16 वर्षीय बहिणीची विक्री तर 17 वर्षीय भाचीवर बलात्कार

आईची निर्घृण हत्या आणि वडिलांना झालेली जन्मठेपेची शिक्षा अशा कौटुंबिक धक्क्यातून सावरण्यापूर्वीच, आधार देणाऱ्या मामांनीच दोन सख्ख्या बहिणींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षीय भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिच्या 16 वर्षीय धाकट्या बहिणीची पैशांसाठी विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधम मामांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिची लहान […]

सामना 29 Mar 2026 11:52 am

ओरोसमध्ये 10 एप्रिल पासून ‘खासदार चषक’क्रिकेट स्पर्धा

विजेत्या संघाला मिळणार 1 लाखाचे पारितोषिक प्रतिनिधी ओरोस मयूर राणे मित्र मंडळ ओरोसच्या वतीने 10 ते 14 एप्रिल या कालावधीत सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल मैदानावर खासदार चषक अंतर्गत खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे 10 एप्रिल पासून आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. [...]

तरुण भारत 29 Mar 2026 11:48 am

महिलेला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण; ऍट्रॉसिटीचा गुन्हा

घटस्फोटप्रकरणी कामानिमित्त गेलेल्या महिलेला न्यायालयाच्या आवारात जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी तब्बल 15 वकिलांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मुंबई आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांचाही समावेश असल्याने कायदे वर्तुळात खळबळ उडाली आहे. काजल शेळके, मनीषा सातपुते, साक्षी निकम, […]

सामना 29 Mar 2026 11:45 am

गॅस टंचाईच्या अफवा गुजरातमधून पसरत आहे, त्या राज्याविरोधात गुन्हा दाखल करा; संजय राऊत यांची टीका

गॅसची टंचाई आहे की नाही याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातच एकमत नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच गॅस टंचाईबाबत जर गुन्हा दाखल करायचा असेल तर गुजरात राज्याविरोधात करा कारण या अफवा तिथूनच येत आहेत असेही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की […]

सामना 29 Mar 2026 11:40 am