SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
... ...View News by News Source

पर्यावरणप्रेमी भावेश कारेकर यांचा वडवली येथील बांबू लागवडीचा प्रयोग यशस्वी , 50 एकरात 20 हजार बांबूची लागवड

सततच्या वातावरणातील बदलामुळे भातशेती धोक्यात आली आहे. तेच आंबा काजू फळ पिकांचेही झाले आहे त्यामुळे शेती करणे सोडून मंडणगड तालुक्यातील अनेकांनी रोजगारासाठी पुणे , मुंबई , ठाणे आदी विविध ठिकाणच्या शहरांची वाट धरली आहे. त्यामुळे गावेच्या गावे ओस पडू लागली आहेत. अशातच मुळ दापोली तालुक्यातील मांदिवली या गावचे रहिवासी असलेले आणि सध्या मंडणगड तालूक्यात रहिवास […]

सामना 21 Nov 2025 6:07 pm

कळबं आगाराला समस्याची घरघर, जुन्या व मोडकळीसआलेल्या बसमुळे एसटी तोटयात !

कळबं (प्रतिनिधी)- येथील बस आगार मागील काही वर्षापुर्वी उत्पन्न व प्रवासी वाढवा अभियानात मराठवाड्यात प्रथम असलेला कळंब आगाराला ढिसाळ नियोजन व कामचुकारपणा यामुळे घरघर लागल्याचे गंभिर चीत्र दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा कळंब आगार हा छत्रपती संभाजी नगर विभागातील एक प्रमुख आगार बनला होता. एकेकाळी उत्पन्न, प्रवाशी व सेवा या कसोटीवर प्रगतीच्या उच्च शिखरावर असलेल्या या आगाराने जिल्हा व विभाग स्तरावर आपला वेगळाच ठसा ऊमटलवला होता. परंतु या आगाराचे कर्तृत्ववान कारभारी बदलले गेले अन् आगाराच्या उत्तुंग यशाचा आलेख दर महिन्याला घसरत चालल्याचे गंभीर चीत्र अलिकडील काळात अनुभवयास मिळाले आहे.बस आहेत तर कर्मचारी नाहीत, कर्मचारी आहेत तर बस अपुऱ्या अशी सातत्याने अवस्था निर्माण होणारा हे आगार आत्ता प्रवासी संख्या व उत्पन्नातही मागे राहत आहे. कळंब आगाराला ढिसाळ नियोजन, कालमर्यादा भंग, मनमानी कारभार यामुळे घरघर लागली आहे. यातही प्रमुख अधिकारी उंटावरून शेळ्या राखत असल्याने याचा आगाराला तर फटका बसत आहेच शिवाय प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही. कळंब आगाराची कारभार सध्या आंधळा राजा, गोंधळी प्रजाया उक्तीप्रमाणे झाला असून आगार प्रमूख, स्थानक प्रमुख, कार्यशाळा व वाहतूक नियंत्रक यांच्यात ताळमेळ राहिलेला नाही. याचीच परिणिती वाहतुक व्यवस्थेवर झालेली दिसून येत असून लांब पल्ल्याच्या गाडय़ा दोन दोन तास विलंबाने मार्गस्थ होत आहेत.याचा प्रवासी संख्येवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. ग्रामिण मार्गावरील अनेक गाड्यांना आपला टाईम टेबल राखता येत नसल्याचे चीत्र आहे.. गाड्यांची दुरवस्था कळंब आगाराच्या अनेक गाड्यांची अवस्था विदारक अशी झाली आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. वेळेवर स्वच्छता केली जात नाही. अनेक गाड्यांच्या खिडक्या, दरवाजे नादुरूस्त आहेत. अनेक गाड्यांवर नावाच्या पाट्या नसतात, असल्या तरी त्या स्पष्ट अक्षरात नसतात. एकुणच कळंब आगाराचे केवळ नियोजनच ढिसाळ असून गाड्याची अवस्थाही विदारक अशी आहे. कोणीही या जाहिरात करा कळंब स्थानक आवारात बेलगामपणे जाहिरातबाजी केली जात असून कोणीही येवून आपली ब्रँडची जाहीरात करत आहे. यावर आगार प्रमूखांचे कसलेही नियंत्रण नाही. स्थानकातील स्पिकरवर व्यवस्थित पुकारले जात नाही. प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे या बाबत आगार प्रमुखांना विचारले असता त्यांनी सांगितलेकी एस. टी . आगारात कर्मचारी कमी आहेत ,त्यामूळे असे प्रकार घडत आहेत आपन त्याची सुधारणालवकरच करणार आहोत बालाजी भारती प्रभारी आगार प्रमुख . कळंब एस . टी चा कारभार हा उंठावरून शेळया राखलागत चा प्रकार आहे सुधारणा होणे ही काळाची गरज आहे , नाही तर लवकरच डेपोला शासन कुलूप लावेल प्रवाशी मित्र संघटना बस वेळेवर जात नाहीत ,मुला मुलींना शाळा कॉलेज ला जाणे साठी उशिर होत आहे ,मागणी नुसार बस गाडया सोडत नाहीत त्यामुळे आनेक विद्यार्थी ए्सटीचा पास काडून ही शिझण शाळेपासून वंचित राहावे लागत आहे , एक संतप्त विद्यार्थी

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 6:05 pm

भाजपा आमदारांनी ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला- सुरज साळुंके

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला धोका देऊन पाठीत खंजीर खुपसला आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली आहे. धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यात चर्चा होऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर 17 जागा आणि काही सभापती पदे शिवसेनेला देण्याचे ठरले. परंतु 2016 च्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे शिवसेनेकडे असताना ही पदे देण्यास शिवसैनिकांचा विरोध होता. तेव्हा युतीधर्म म्हणून शिवसैनिकांची समजूत काढून 17 जागा लढविण्याची तयारी केली. वास्तवात आमच्याकडे देखील नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी 41 उमेदवार असताना आम्ही 17 जागा लढविण्याचे मान्य केले. परंतु उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र आम्हाला 2 जागा घ्या, 4 जागा घ्या असे सांगून ऐनवेळी 17 जागावर त्यांचे उमेदवार कायम ठेवून धोका दिला आहे. आता वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 6:00 pm

१९ उमेदवारांची माघार, ३२ जागांसाठी १०३ उमेदवार रिंगणात, नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवार रिंगणात; रत्नागिरी नगर परिषद 

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठीच्या १९ उमेदवारांनी माघार घेतली. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. रत्नागिरी नगर परिषदेच्या ३२ जागांसाठी १०३ आणि नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या ३२ जागांसाठी १३३ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १० अर्ज छाननीत बाद झाले होते. उर्वरित […]

सामना 21 Nov 2025 5:57 pm

बिहार सरकारच्या नाड्या भाजपच्या हाती! सम्राट चौधरी गृहमंत्री; नितीश मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

बिहारच्या नवीन एनडीए सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. या खातेवाटपातून बिहार सरकारच्या नाड्या भाजपच्या हाती असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे कारण म्हणजे २० वर्षांनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गृहखाते सोडले आहे. हे खाते आता भाजपकडे गेले आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी गृहखात्याची जबाबदारी सांभाळणार आहे. गुरुवारी नितीश मंत्रिमंडळात एकूण २६ मंत्र्यांनी शपथ घेतली, परंतु […]

सामना 21 Nov 2025 5:46 pm

Satara : म्हसवड रथोत्सवानिमित्त वाहतूक बदल; SP तुषार दोशींचा महत्वपूर्ण निर्णय

भाटकी रोड व माळशिरस चौकातून वाहतुकीचे पुनर्विनियोजन म्हसवड : पश्चिम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरी रथोत्सव यात्रे निमित्ताने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी म्हसवड गावातुन जाणारा, सातारा ते पंढरपुर व म्हसवड ते आटपाडी या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करुन [...]

तरुण भारत 21 Nov 2025 5:42 pm

Satara News : म्हसवडमध्ये यात्रा पटांगणावर व्यावसायिकांची लगबग

म्हसवड रथोत्सवासाठी यात्रा पटांगण गजबजले म्हसवड : श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव शुक्रवारी १ वाजता गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर म्हसवड येथील यात्रा पटांगणात पालिकेच्या बतीने तात्पुरत्या स्वरुपात जागा देण्याचे काम दोन [...]

तरुण भारत 21 Nov 2025 5:26 pm

एक तेरा सात ग्रुपच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

धाराशिव (प्रतिनिधी)- एक तेरा सात ग्रुप सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या ग्रुपचे अध्यक्ष अहमद हनीफ कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास दि.20 नोव्हेंबर रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिव शहरातील एक तेरा सात ग्रुप रक्तदान शिबिर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित करत आहे. तर फकीरा नगर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रुपचे अध्यक्ष कुरेशी यांनी केले. रक्त संकलनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन अधिकारी व स्टाफ यांनी काम पाहिले. यावेळी मकबुल टकारी, अशोक नागटिळे, अहेमद कुरेशी, फिदोज काझी, अल्ताफ शेख, चाँद सय्यद, अमजद कुरेशी, रुधीर गायकवाड, शारीक शेख, शकील काझी, अमजद शेख, कुणाल पेठे, झहीर कुरेशी, शाहीर नदाफ, जुबेर शेख, अजय कांबळे, मुजकीर कुरेशी, नवनाथ डोंगरे, सिताराम शिंदे, बिलाल कुरेशी, अकेब कुरेशी, जमीर शेख, मुजाहीर कुरेशी, तय्यब शेख, अरेफ सौदागर, सबील कुरेशी, निजाम कुरेशी, फारोक शेख, आयाज कुरेशी, अशपाक शेख आदींसह ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि रक्तदाते प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 5:25 pm

ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ढोकी येथे रास्तारोको आंदोलन

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदार तसेच गुळ पावडर कारखानदार यांनी चालू वर्षातील एफआरपी जाहीर न करताच ऊस गाळप चालू केले आहे. त्यामुळे उसाला 3500 रूपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्त्वात ढोकी येथे मुख्य चौकात शुक्रवारी दि.21 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जर लवकरात लवकर दर जाहीर न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष इंगळे यांनी यावेळी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यापूर्वीही जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना 5 ऑक्टोंबर व 11नोव्हेंबर रोजी निवेदन देवून कारखान्यांना एफआरपी जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच रास्तारोको आंदोलन करण्याबाबतही कळविले होते. धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि गुळ पावडर कारखानदार यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप करून ऊस उत्पादक शेतकन्यांची चेष्टा केली आहे. या अगोदर वेळोवेळी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने सुद्धा कोणती दखल घेतलेली नाही चालू हंगामातील पहिली उचल 3500 मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ढोकी येथे मुख्य चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याशिवाय वेळीच प्रशासनाने दखल घेतली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. साखर सम्राटांच्या बगलबच्च्यांनी ऊसदर न ठरवता गाळप चालू करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती घातली आहे. त्यास संपूर्ण प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. जिल्ह्यातील काही कारखानदारांनी साखर गाळप परवाना न घेता ऊस तोड सुरू केली आहे. काटामारी, रिकव्हरी चोरी, एफआरपीचे तुकडे करून दर ठरवणे ही खूली लुट खुलेआम सुरू आहे. आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन या साखर सम्राटांना पाठिशी घालत आहे. परंतु यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाचेही लाड खपवून घेणार नाही त्यामुळे वेळीच उसाचा योग्य दर जाहीर करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी म्हटले आहे. या आंदोलनात संघटनेचे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, धनाजी पेंदे, विष्णूदास डाळे, सचिन ठेले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 5:25 pm

WPL 2026 –लिलाव प्रक्रियेचं धुमशान! 73 जागांसाठी 277 खेळाडू नशीब आजमावणार, कोण होणार मालामाल?

Women’s Premier League 2026 चा धमाका आतापासूनच सुरू झाला आहे. लिलाव प्रक्रियेसाठी 277 खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. 277 खेळाडू WPL 2026 साठी लिलाव प्रक्रियेमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत. मात्र, संघांना फक्त 73 खेळाडूंनाच आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेता येणार आहे. यासाठी 27 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या लिलाव प्रक्रियेसाठी 277 […]

सामना 21 Nov 2025 5:23 pm

Sangli Crime : सांगलीत गांजा ओढणाऱ्या दोघांवर कारवाई

सांगलीत दोन युवक गांजा ओढताना पोलिसांच्या जाळ्यात सांगली : शहरातील मंगळवार बाजार परिसर आणि शहरातील पोलिस लाइन क्रीडांगणाजवळ गांजा ओढणाऱ्या अथर्व रमेश माने (वय १९, रा. राजीवनगर, मंगळवार बाजार), सुमित सचिन माने (वय २४, रा. शनिवार पेठ, माधवनगर) या [...]

तरुण भारत 21 Nov 2025 5:17 pm

SIR विरोधात केरळ सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, निवडणूक आयोगाला नोटीस

मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) प्रक्रियेवर स्थगिती देण्याची मागणी करत केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर निवडणूक आयोगाला (ECI) नोटीस जारी केली असून, सुनावणीसाठी २६ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे. या प्रक्रियेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासेल आणि दैनंदिन प्रशासनाच्या कामावर याचा विपरीत परिणाम […]

सामना 21 Nov 2025 5:13 pm

Kolhapur Politics |जयसिंगपूरकरांचा आमच्या आघाडीलाच कौल मिळेल : माजी खासदार राजू शेट्टी

जयसिंगपूर विकास आघाडीचा शहरासाठी व्यापक आराखडा जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीच्या जयसिंगपूर शहर विकास पॅनेलच्या माध्यमातून शहराला विकासाच्या दृष्टीकोनातून सक्षम पर्याय मिळाला आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहरातील जनता या आघाडीसोबत राहिल [...]

तरुण भारत 21 Nov 2025 5:06 pm

SIR कामाच्या ताणामुळे गुजरातमध्ये एका BLO ने जीवन संपवले; शैक्षणिक संघटनांमध्ये तीव्र संताप

मतदारयादी पुनर्निरीक्षणाच्या कामामुळे देशभरातील बूथ लेव्हल ऑफिसर्सवर (BLO) तणाव वाढत आहे. या SIR च्या कामाच्या ताणातून आणखी एक BLO ने आत्महत्या केली आहे. त्यामुळे आतापर्यंत आत्महत्या केलेल्या BLO ची संख्या 8 वर केली आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) च्या मृत्यूच्या घटनांमुळे चिंता निर्माण झाली आहे. मृताच्या कुटुंबियांनी या मृत्यूसाठी SIR च्या कामाला […]

सामना 21 Nov 2025 5:03 pm

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीत 92 उमेदवार रिंगणात

सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी 86 उमेदवार मिळून 92 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भरलेल्या सहाही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले तर नगरसेवक पदासाठी भरलेल्या 94 उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगरसेवक पदासाठी 86 उमेदवार रिंगणात राहिले [...]

तरुण भारत 21 Nov 2025 4:36 pm

दारूसाठी पतीने मित्रांसोबत केला पत्नीचा सौदा, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरात एका पतीने दारूसाठी त्याच्या पत्नीला मिंत्रासोबत शैय्यासोबत करायला भाग पाडले. त्याने आपल्या पत्नीचा सौदा करून पैसे कमावले. त्याने तिला कोल्ड्रिंकमधून नशेची गोळी देऊन बेशुद्ध केले व तिला मित्रांच्या ताब्यात देऊन तो निघून गेला होता. या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्री कार्यालयाकडे देखील याची तक्रार दाखल केली आहे. वझीरगंजचे […]

सामना 21 Nov 2025 4:33 pm

Karad : कराड नगरपरिषद निवडणूक: पाच अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार

नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची माघारी कराड : कराड नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून गुरुवारी पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी २१ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पर्यंत आहे. नगराध्यक्षपद निवडणूकीसाठी एकुण १७ उमेदवारांचे अर्ज आहेत. तर नगरसेवकपदासाठी एकुण २५९ [...]

तरुण भारत 21 Nov 2025 4:33 pm

वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे होणार त्वरीत निराकरण

धाराशिव (प्रतिनिधी)- वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे त्वरीत व अधिक सुयोग्य पद्धतीने निराकरण करण्यासाठी मंडळ कार्यालयांतर्गत स्वतंत्र 'ग्राहक तक्रार निवारण कक्ष'स्थापन करण्यात आला आहे. माननीय वीज नियामक आयोगाच्या निर्देक्षानुसार मंडळ स्तरावर सुरू करण्यात आलेल्या या कक्षाचे औपचारिक उद्घाटन नुकतेच अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अधीक्षक अभियंता संजय आडे म्हणाले की, स्वतंत्र पध्दतीने कार्यरत राहणाऱ्या या तक्रार निवारण कक्षामार्फत ग्राहकांच्या तक्रारी अधिक गतिमान पद्धतीने निकालात काढणे शक्य होणार आहे.मा. वीज नियामक आयोगाने या करिता स्वतंत्र सदस्याची नेमणूक केली असून त्यांच्या मार्फत तक्रार निवारणाची कार्यपद्धत सोपी आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी महावितरणच्या धाराशिव मंडळाच्या प्रशासकीय कार्यकारी अभियंता निलांबरी कुलकर्णी, महाराष्ट्र वीज नियामक आयोगा मार्फत नियुक्त सदस्या मेधा कुलकर्णी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जिल्हा धाराशिवचे जिल्हा अध्यक्ष शरद वडगावकर, सचिव सचिन कवडे, जिल्हा संघटक रवी पिसे यांची उपस्थित होती. नवीन स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन झाल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण वेगाने आणि कार्यक्षमतेने होऊ शकेल. अशी अपेक्षा उपस्थित वीजग्राहक प्रतिनिधी व ग्राहकांनी व्यक्त केली. धाराशिव जिल्ह्यामधील सर्व ग्राहकांना या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता संजय आडे यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 4:29 pm

उत्साहाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांस स्टार ऑफ द मंथ पुरस्कार

भूम (प्रतिनिधी)- पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी म्हटलं कि त्यांच्या समोर सतत कामाचा व्याप मोठया प्रमाणात असतो. सततच्या कामाच्या व्यापातूनही ते पोलीस ठाण्यात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद साधतात. कामाचा ताण असतानाही ठाण्यात आलेल्या नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी कर्मचाऱ्यांना 24 तास देखील कर्तव्यावर राहण्याची वेळ येते. तरी देखील ते कर्तव्यात कसूर करत नाहीत. सततच्या कामामुळे त्यांच्यात मरगळ न येता उत्साह टिकून राहावा, कामे तात्काळ व्हावीत, यासाठी भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी “ स्टार ऑफ द मंथ “ हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै 2025 पासून त्यांनी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याच्या मानकरी महिला पोहेकॉ शबाना मुल्ला या ठरल्या आहेत. तर ऑक्टोबर महिन्याचे मानकरी पोना संदेश क्षिरसागर हे ठरले आहेत. भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या हस्ते त्यांना त्या कर्मचाऱ्यांचा फोटो व भूम पोलीस ठाण्याचा लोगो असणारा कप व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक महिन्याच्या मानकरी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी कामकाज करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा लेखा जोखा ठेवण्यात येत आहे. एका महिन्यात जे कर्मचारी तपासासाठी असणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करतात. तपास करून अंतिम अहवाल तयार करून सादर करतात. तसेच इतर कामकाजाचा आढावा घेतला जातो. त्यानंतर हा पुरस्कार पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते देण्यात येतो. कर्मचाऱ्यांचा कामकाजात उत्साह वाढावा हा या उपक्रमामागे उद्देश आहे. तसेच नागरिकांची कामे यामुळे तात्काळ निकाली निघण्यास मोठी मदत होणार आहे. मी जोपर्यंत या ठाण्यात प्रभारी म्हणून कार्यरत आहे तोवर हा उपक्रम चालू ठेवणार आहे. श्रीगणेश कानगुडे पोलिस निरीक्षक भूम पोलीस ठाणे

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 4:28 pm

दुबईमध्ये एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना, तेजस लढाऊ विमान कोसळले

दुबईमध्ये एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. या शो दरम्यान शुक्रवारी तेजस लढाऊ विमान नियंत्रण गमावून कोसळले. हिंदुस्थानचे तेजस विमान स्थानीक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 10 मिनीटांनी उड्डाणादरम्यान अपघातग्रस्त झाले आहे. मात्र पायलट त्या विमानातून बाहेर पडला की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. याने एकच गोंधळ उडाला आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे. […]

सामना 21 Nov 2025 4:27 pm

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रतीचे वाटप

धाराशिव(प्रतिनिधी)-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हास्तर युवा महोत्सव 2025- 26 धाराशिव येथे संपन्न झाला. यामध्ये जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी चित्रकला स्पर्धा , काव्य लेखन स्पर्धा व कहानी लेखन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . तसेच या प्रसंगी न्यू कनिष्ठ स्वतंत्र कला महाविद्यालय करजखेडा येथील महाविद्यालयातून निवड झालेल्या आठ विद्यार्थिनीनी वरील स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. तसेच नशामुक्त समृद्ध राष्ट्र बनवण्याचे चित्रातून विद्यार्थ्यांनी संदेश दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वैयक्तिकरित्या कौतुक केले. त्यामुळे विशेष करून विद्यार्थ्यांना मतदार जनजागरण समितीच्या संविधान जनजागृती उपक्रमातुन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रत वाटप करण्यात आल्या. तर प्रा.बाळासाहेब अणदुरकर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील संसद मधील भाषण असलेले पुस्तक देण्यात आले. यावेळी मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे, प्रा.परमेश्वर ढमाले, प्रा.बी.ई.ओव्हाळ उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 4:27 pm

निवडणूक काळात शांतता कायम राहावी- जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.निवडणूकीच्या काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता कायम राहावी याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिले. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - 2025 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय निवडणूक संनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी पूजार यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्या कक्षात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, नगरपरिषद प्रशासन विभागाचे सहआयुक्त त्रिंबक ढेगळे,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक हर्षवर्धन शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एन.व्हि.भंडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) डी.बी.पारेकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहायक राज्यकर आयुक्त प्रदीप चव्हाण,वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता एन.एम.कुलकर्णी व सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक डयूटीवर असलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची नावे ज्या नगरपालिकेच्या मतदार यादीत आहे, त्यांना पोस्टल मतदान करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे असे पूजार यांनी यावेळी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी दिली.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 4:26 pm

सावित्रीमाई फुले शिक्षक संस्थेची कर्जमर्यादा झाली 20 लाख रुपये

भूम (प्रतिनिधी)- ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित भूमच्या वतीने 20 लाख रुपये कर्जवाटपाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या विचाराने व बाळकृष्ण तांबारे यांचे मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने 20 लाख रुपये कर्जमर्यादा करण्याची घोषणा सप्टेंबर 2025 मध्ये सर्वसाधारण सभेत केली होती त्याची अंमलबजावणी आज व्हाईस चेअरमन श्रीमती जयश्री माळी/मुळे यांचे हस्ते करण्यात आली. संस्थेच्या कारभाराची अशीच वेगवान घोडदौड सुरु आहे. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सोमनाथ टकले, हरी पवार, सुनील गुंजाळ, नितीन मस्तुद, जमील तांबोळी, परशुराम राऊत, अशोक जाधवर, सोमनाथ राऊत, वैशाली डांगे, आशा शिंदे, अनुराधा बाशिंगे, सूर्यवंशी मॅडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 4:25 pm

Satara : फलटणमध्ये ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव पारंपरिक पद्धतीने होणार साजरा

फलटण शहरात रथयात्रेचा उत्सव रंगणार फलटण : फलटण येथे संस्थान काळापासून सुरु असलेला ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. आज मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर हा या यात्रेचा मुख्य दिक्स आहे. [...]

तरुण भारत 21 Nov 2025 4:24 pm

ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

परंडा (प्रतिनिधी)- परंडा - करमाळा रस्त्यावरील बावची चौकाजवळ पवार कॉम्लेक्स समोर ट्रॅक्टर व दुचाकीच्या भीषण अपघातात बार्शी येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बार्शी येथील सविता शंकर मुसळे राहणार नाइकवाडी प्लॉट (वय 52 वर्ष ) हे सोनारी येथील भैरवनाथ मंदीर येथून देवदर्शन करून बार्शीकडे दुचाकीवरून जात असताना अचानक मुसळे यांना चक्कर आली असता त्या अचानक खाली पडल्याने सोनारी येथील भैरवनाथ कारखाना कडे ऊस घेऊन जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने मुसळे यांचा जागीच मृत्यू झाला.मुसळे यांचा आपघात झालेल्या ( ट्रॅक्टर क्रमांक 25 के 3717 ) आहे. घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीसांनी घटना स्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस निरीक्षक चोरमुले यांच्या मागदर्शनाखाली परंडा पोलीस करित आहे.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 4:24 pm

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस चालकमालकांसाठी 23 नोव्हेंबर रोजी मार्गदर्शन कार्यशाळा

धाराशिव (प्रतिनिधी)- नंदुरबार जिल्ह्यातील अमलीबार येथे शालेय विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्यांचे निधन व अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टळावी,यासाठी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबस चालक व मालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा रविवार,दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता,उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,एमआयडीसी, प्लॉट नं. पी18, धाराशिव येथे होणार आहे. तरी सर्व स्कूलबस चालकमालकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. स्कूलबससाठी अनिवार्य पालन करावयाच्या उपाययोजना वेग नियंत्रण यंत्रणा सुस्थितीत आहे का याची तपासणी,अग्नीशमन सिलेंडरची मुदत तपासणे व आवश्यक असल्यास रिफिलिंग करणे,प्रथमोपचार पेटीतील साहित्य पूर्ण आहे याची खात्री,वाहनाची वैध कागदपत्रे इन्शुरन्स,योग्यता प्रमाणपत्र,पीयूसी,टॅक्स,परवाना तपासणी,चालकाकडे वैध अनुज्ञप्ती व बॅजची खात्री केली असावी. विद्यार्थी सुरक्षेसाठी 21 नोव्हेंबरपासून स्कूलबस तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून कागदपत्रांची पूर्तता नसल्यास वाहन विद्यार्थी वाहतूक करू नये.नियमभंग आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1988 अंतर्गत कारवाई केली जाईल,असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 4:23 pm

युवकांमध्ये प्रचंड क्षमता : जिल्ह्याचा नावलौकिक करा- जिल्हाधिकारी पुजार

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे.स्पर्धांमध्ये उत्कृष्टता साधून राज्य आणि देशपातळीवर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा.प्रत्येक कलाप्रकार हा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग आहे.आत्मविश्वासाने मंचावर उतरा आणि तुमचे उत्तम कौशल्य जगासमोर मांडा.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सव 2025 2026 ची पुष्पक मंगल कार्यालय,धाराशिव येथे आज 20 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दीपप्रज्वलन करून केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी श्री.पुंडलिक गोडसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,जिल्हा युवा अधिकारी श्री.राहुल डोंगरे व तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियंत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.ओमप्रकाश रांजणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हा युवा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत समूह लोकगीत,समूह लोकनृत्य,चित्रकला,कथा लेखन,कविता लेखन,वक्तृत्व अशा विविध कलाप्रकारांसोबतच कौशल्य विकास व नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) यांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे.विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात एकूण 35 प्रकल्प सादर झाले असून त्यातून जिल्हा पातळीचा संघ निवडून विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र तज्ज्ञ परीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार,तालुका क्रीडा अधिकारी यांनी केले.प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले. भैरवनाथ नाईकवाडी,तालुका क्रीडा अधिकारी, अक्षय बिरादार,क्रीडा अधिकारी, राजेश बिलकुले, सुनील घोगरे, किशोर भोकरे, नितिन आडसकर,सुरेश कळमकर व व्यंकटेश दंडे आदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण सहकार्य करत आहे.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 4:23 pm

महापूर समस्येवरील उपाय ही शासन, प्रशासन आणि समाजाची सामूहिक जबाबदारी

धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यासह महाराष्ट्रात इतरत्रही यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या महापुरामुळे शेतीची अपरिमित हानी झालेली आहे. गावसमाज विस्कळीत झाला आहे. जनजीवन पूर्ववत होण्यासाठी समाज आणि शासनाचे संवेदनशील आणि नियोजनबद्ध प्रयत्न आवश्यक आहेत. ही केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हती तर संरचनात्मक आणि नियोजनात्मक गंभीर चुका, त्रुटी आणि बेजबाबदारपणा यांचा हा एकत्रित परिणाम होता. अशा तऱ्हेच्या संकटांची वारंवारिता पाहता त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरजच नव्हे तर तातडी आहे. त्यासाठी शाश्वत विकासाची दृष्टी व दिशा आवश्यक आहे. या सर्व स्थितीवर उपयांसाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रित येत सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचा सुर ‌‘महापूर : कारणे आणि उपाय अभ्यास'या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांनी काढला. जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्म्युनिकेशन,कल्चर अँड मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘महापूर : कारणे आणि उपाय अभ्यास'अहवालाचे प्रकाशन व चर्चा सत्राचे गुरुवार दि. 20 नोव्हेंबर रोजी विनोबा भावे सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर प्रा.प्रदीप पुरंदरे, सोमीनाथ घोळवे, सुनीती सु.र, डॉ.संजय मंगला गोपाळ, डॉ.रेखा शेळके आदि मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, ज्येष्ठ गांधीवादी श्रीराम जाधव, अर्थतज्ञ प्रा.एच. एम. देसरडा व सर्व संबंधित मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक इब्राहिम खान यांनी केले. या चर्चासत्रात केवल फडतरे, झुल्पिकार काझी, वैभवी प्रेमलता संजय व सर्व संबंधितांनी हा अहवालाच्या संदर्भाने आपले अनुभव मांडले. सामजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर पुढे बोलताना म्हणाल्या की, या अहवालात गेली 2 महिन्यात आम्ही सर्व सहकाऱ्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन शेतकरी आणि सर्व बाधित भागाला भेट देऊन सत्य स्थिती मांडण्यात आली आहे. आज जल, जंगल आणि जमिनीसाठी लढणाऱ्या लोकांवर हल्ले होत आहेत. ग्रामीण भागातील संस्थांना उभे करण्याचे काम करणे आवश्यक आहे. बाधित व्यक्तींना तत्काळ मदत करण्याची गरज आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, हवामान बदल हे एक वास्तव आहे. त्याला कसे सामोरे जायचे आहे? हा विचार करणे आवश्यक आहे. आत्ताच्या स्थितीचा वैज्ञानिक अभ्यास करून नियोजन करणे आवश्यक आहे. नद्यांमध्ये अतिक्रमण झालेले असून नद्यांचे ओढे आणि नाले झालेत. हे थांबणे आवश्यक आहे. झालेले नुकसान झालेले पाहता शेतकरी पुढील पेरणी करू शकणार नाहीत. ही पाहणी, हा अभ्यास, या शिफारशी आणि या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आता तत्काळ कामाला लागले पाहिजे. समाजाने आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक दिनचर्येचा विचार करणे आवश्यक आहे. पाणी अभ्यासक प्रा.प्रदीप पुरंदरे मार्गदर्शन म्हणले की, एकच गोष्ट कितीवेळा सांगायची असे सध्या वाटत आहे. मोठ्या प्रमाणात नदी भागात अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी कोण जबाबदार आहे? नदीची अधिसूचना काढणे आवश्यक आहे. कालवा अधिकारी यांची नेमणूक होत नाही. जलसंधारणाच्या संदर्भात कायदे आहेत मात्र, त्यातील काही कायद्यांसाठी नियम नाहीत. संविधानिक प्रक्रियेनुसार पाणी हा राज्याचा विषय आहे. सिंचनासाठी 9 कायदे बनवले आहेत मात्र, त्यातील 8 कायद्यांचे नियम केले गेले नाहीत. प्रत्येक नदीची अधिसूचना काढणे अत्यंत गरजेचे आहे. शासन विचार क्षमता गमावून बसले असून त्यांच्या हातून परिस्थिती निघून जात आहे. जलयुक्त शिवार याची गरज नव्हती. 13 योजनांची एकत्रितता करून जलयुक्त शिवार ही योजना राबविण्यात आली. नदीवरती हजारो बंधारे बांधले, याची कोणीही परवानगी घेतली नाही. जलयुक्त शिवारचा चुकीचा परिणाम झालेला आहे. सोशल ऑडिट होणे गरजेचे - सोमीनाथ घोळवे पर्यावरण अभ्यासक सोमीनाथ घोळवे म्हणाले की, समस्यांच्या उपायांसाठी धोरणाचे सोशल ऑडिट होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात 85% अल्पभूधारक आहेत. कोणतेही गाव आपण उदा. घेतले की, काही बाबी लक्षात येते. आपल्याकडे यंत्रणा नावाची गोष्ट नाही. 30 वर्षापूर्वी जितक्या विहिरी होत्या त्यापेक्षा कितीतरी अधिकारी विहिरी आता झाल्या आहेत. बांध राहिले नाहीत, सगळ्या जमिनी सपाट झाल्या आहेत. निसर्गसंवादी विकास नियोजनाची पाऊलवाट हवी - डॉ.संजय गोपाळ सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजय मंगला गोपाळ मार्गदर्शन करताना म्हणाले की या अहवालात भूमिका, पार्श्वभूमी, काय घडले? - उद्ध्वस्त जीवनाची हकीकत, का घडले ? - पूरसंकटाची कारणमीमांसा, पुनर्वसनाच्या वाटेवरील काटे, ‌‘तात्कालिक मदत'व त्यापलीकडे पुनर्वसन : काय असावे धोरण आणि प्रक्रिया, जल व्यवस्थापन : शासनाची जबाबदारी, जागतिक हवामान बदल आणि पूर संकट, समारोप : निसर्गसंवादी विकास नियोजनाची पाऊलवाट हवी आदि प्रकरणे असून याबद्दल अभ्यासाअंती सर्व सत्य परिस्थिती मांडलेली आहे.

लोकराज्य जिवंत 21 Nov 2025 4:22 pm

Satara Municipal Election : साताऱ्यात अर्ज मागे घेण्यासाठी सुरु झाले राजकारण

सातारा नगरपालिकेतील निवडणुकीत अपक्ष – पक्षीय उमेदवारांमधील संघर्ष सातारा : मंगळवारी छाननीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेच अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. जे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी ज्यांना अधिकृत तिकीट मिळाली आहे त्यांच्याकडून व पक्षाच्या नेत्यांकडून विनवणी सुरु करण्यात येत [...]

तरुण भारत 21 Nov 2025 4:08 pm

Satara : मोरगिरी गावात मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाअंतर्गत स्वच्छता व विकास उपक्रम यशस्वी

मोरगिरी गावातील सामाजिक वाढली बांधिलकी पाटण : मोरगिरी येथे रविवारचे चार तास गावासाठी या उपक्रमांतर्गत संपूर्ण गावातील स्वच्छता करून नाले, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आले. राज्यात सध्या सुरू असलेले मुख्यमंत्री पंचायतराज अभियान यामध्ये गावागावात उत्साह दिसून येत आहे. हा उपक्रम यशस्वी [...]

तरुण भारत 21 Nov 2025 3:53 pm

Satara : चाफळ भागात भात काढणी, झोडणीच्या कामांना वेग!

चाफळमध्ये पारंपरिक आणि यांत्रिकी मळणीचा संगम चाफळ : पाटण तालुक्यात यावर्षी पडलेल्या पावसामुळे सर्वच पिकांना पोषक असे वातावरण लाभले. अनुकूल वातावरणामुळे भात पीक चांगले आले असून सध्या चाफळ विभागात भात पिकाची काढणी व झोडणीची कामे वेगात सुरू असल्याचे चित्र शिवारात पहावयास मिळत आहे. सद्यस्थितीत भात कापणी [...]

तरुण भारत 21 Nov 2025 3:45 pm

जागतिक शेअर बाजारात भूकंप! अमेरिकेपासून जपानपर्यंत मोठी घसरण, सोन्या-चांदीच्या दरांनाही फटका

प्रसिद्ध लेखर रॉबर्ट कियोसाकी यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञ जागतिक मोदीबाबत गंभीर इशारा देत आहे. गेल्या काही दिवसांपासून किप्टोमार्केट आणि सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तरीही कियोसाठी यांनी सोने-चांदी आणि बिटकॉइन खरेदीचा सल्ला दिला होता. आता जागतिक मंदीबाबतची अनेक तज्ज्ञांची भाकिते खरे ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेपासून जपानपर्यंतच्या सर्व शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे […]

सामना 21 Nov 2025 3:42 pm

सावंतवाडी प्रांताधिकारी पदी समीर घारे

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी प्रांताधिकारी पदी समीर भीमराव घारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी प्रांताधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. श्री घारे यांची नवी मुंबई निवडणूक विभाग तहसीलदार पदावरून पदोन्नतीने सावंतवाडी प्रांताधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कणकवली ,मालवण, तहसीलदार पदावर काम केले आहे . कोकण विभागात ठाणे ,कल्याण,रायगड तहसीलदार पदी काम [...]

तरुण भारत 21 Nov 2025 3:42 pm

Photo –देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या व्यक्ती, 10व्यादा शपथ घेणारे नितीश कुमार पहिल्या 5 मध्येही नाहीत

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालेल्या एनडीए सरकारचा शपथविधी गुरुवारी पार पडला. नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्यांची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे दहाव्यांचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नितीश कुमार पहिल्या पाचातही नाहीत. सध्या ते आठव्या स्थानावर आहेतच. अर्थात त्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यास […]

सामना 21 Nov 2025 3:39 pm

पत्नी आणि दोन मुलांची हत्या करणाऱ्या वन अधिकाऱ्याचे सहकाऱ्यासोबत प्रेमसंबंध, संबंधित महिलेची चौकशी

आपली पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह भावनगर येथील निवासस्थानाच्या जवळच्या खड्ड्यात पुरणाऱ्या गुजरातच्या वन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अधिकाऱ्याचे एका महिला सहकाऱ्यासोबत गेली चार वर्षे प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश खांभला (३९), जो सहाय्यक वनसंरक्षक (ACF) आहे, त्याची २०२० मध्ये वन विभागात काम करणाऱ्या एका […]

सामना 21 Nov 2025 3:33 pm

Sangli : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची ‘वॉर रूम’प्रणाली यशस्वी

मनपा ‘वॉर रूम’ची ऐतिहासिक कामगिरी सांगली : शहर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने शहर विकासाच्या कामांना गती देण्यासाठी सुरू केलेली ‘वॉर रूम’ प्रणाली अत्यंत यशस्वी ठरत आहे. आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पांचा दर १५ दिवसांनी आढावा घेऊन जहवळे तत्काळ दूर केले जातात सुरक्षितता, सुविधामाधवनगर रोड [...]

तरुण भारत 21 Nov 2025 3:26 pm

IND Vs SA 2nd Test –दुखापतीचं ग्रहण! शभुमन गिलच्या पाठोपाठ आणखी एक खेळाडू दुसऱ्या कसोटीतून बाहेर

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्यापासून (22 नोव्हेंबर 2025) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमध्ये सामना खेळला जाणार आहे. या सामन्यातून टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेला सुद्धा आता कॅगिसो रबाडाच्या स्वरुपात मोठा धक्का बसला आहे. […]

सामना 21 Nov 2025 3:26 pm

दातांची योग्यरीत्या काळजी कशी घ्यावी, वाचा

ऋतू कोणताही असो, आपल्या दातांची स्वच्छता राखणे हे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा दात घासणे हे खूप गरजेचे आहे. पण याही व्यतिरिक्त दात निरोगी राहण्यासाठी आपण इतर अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. दातांची काळजी घेण्यासाठी कोणत्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात जास्त कॉफी किंवा चहा प्यायल्याने तोंड कोरडे पडू शकते आणि दातांवर डाग […]

सामना 21 Nov 2025 3:25 pm

Sangli News : स्मृती मानधना 23 नोव्हेंबरला होणार विवाहबद्ध; सांगलीत लग्नसोहळ्याची धूम!

क्रिकेट स्टार स्मृती मानधनाच्या लग्नाला सांगली सज्ज सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना हिचा विवाह सोहळा येत्या २३ नोव्हेंबर रोजी सांगलीत पार पडणार आहे. ती प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्यासोबत विवाहबद्ध होत असून या सोहळ्याला क्रीडा आणि [...]

तरुण भारत 21 Nov 2025 3:15 pm

केसगळतीवर ही माती वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

केसगळती ही समस्या सध्याच्या घडीला अनेकांना भेडसावत आहे. या समस्येमुळे सौंदर्यातही बाधा येते. म्हणूनच केसगळतीवर वेळच्या वेळी उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. केसगळतीवर मुलतानी मातीचा वापर हा फार पूर्वीपासूनच केला जात होता. मुलतानी मातीचा उपयोग केवळ चेहरा सुंदर ठेवण्यासाठी नव्हे तर, केसांचे सौंदर्य जपण्यासाठी सुद्धा मुलतानी मातीचा वापर केला जातो. मुलतानी मातीचा मूळ गुणधर्म […]

सामना 21 Nov 2025 3:10 pm

Photo –उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना केले अभिवादन

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते-सचिव विनायक राऊत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे तसेच आमदार, विभागप्रमुख आणि […]

सामना 21 Nov 2025 3:00 pm

PHOTO मराठी कलाकारांमध्ये 80 च्या रेट्रो लूकची क्रेझ…

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एक अनोखा ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला ‘#असंभव80s’ हा ट्रेंड मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या कलाकारांना भुरळ घालत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुमित राघवन, अंकुश चौधरी, अवधुत गुप्ते, सुबोध भावे, अभिजीत पानसे, आनंद इंगळे, संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री, सुयश टिळक, प्रिया बेर्डे, रेशम टिपणीस, कविता लाड, […]

सामना 21 Nov 2025 2:59 pm

Bangladesh Earthquake : बांगलादेशात भूकंप, 6 जणांचा मृत्यू; 200 जण जखमी

बांगलादेशात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे झटके बसले. या भूकंपात सहा जणांचा मृत्यू झाला असून 200 जण जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 5.7 रिश्टर स्केल इतकी नोंद नोंदवली गेली. ढाकापासून 25 किमी अंतरावर नरसिंगडी जिल्ह्यातील घोराशाल येथे भूकंपाचे केंद्र होते. भूकंपानंतर बांगलादेशात सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाही थांबवण्यात आला आहे. भूकंपामुळे इमारतीची भिंत आणि छताचा काही […]

सामना 21 Nov 2025 2:54 pm

Delhi Bomb Blast –उमर सहा महिने हॉस्पिटल आणि विद्यापीठातून गायब होता, दोन शिकाऊ डॉक्टरांनी दिली संशयास्पद माहिती

दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाने 23 जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर तपास यंत्रणांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत एक-एक गोष्टीचा छडा लावत आहेत. या स्फोट प्रकरणात अल फलाह विद्यापिठाचे 200हून अधिक डॉक्टर स्टाफ तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. अशातच आता विद्यापिठाच्या अप्रेंटिसशीप करणाऱ्या दोन डॉक्टरांनी 2023 मध्ये उमर सहा महिने रुग्णालय आणि विद्यापीठातून गायब होता, असा […]

सामना 21 Nov 2025 2:53 pm

IND Vs SA 2nd Test –वर्कलोड मॅनेज करायचं असेल तर IPL सोडून दे, कर्णधारपदही; शुभमन गिलचे आकाश चोप्राने टोचले कान

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानात उतरला नाही आणि त्याचा […]

सामना 21 Nov 2025 2:45 pm

नाश्त्याला केळी का खायला हवीत, वाचा

सर्व सीझनमध्ये केळी आढळतात, त्यामुळे केळी ही सहज उपलब्ध असतात. केळी ही आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची मानली जातात. केळीला उर्जेचा उत्तम स्त्रोत मानला जातो. मुख्य म्हणजे केळी खाण्यामुळे आपल्या हृद्याचे आरोग्यही सुधारते. केळी हे पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि व्हिटॅमिन बी 6 ने समृद्ध असलेले फळ आहे. ते शरीरासाठी उर्जेचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, विशेषतः सकाळी […]

सामना 21 Nov 2025 2:27 pm

Jalna News –शाळेच्या इमारतीवरून उडी घेत आठवीच्या विद्यार्थिनीने जीवन संपवलं

शाळेच्या इमारतीवरून उडी घेत आठवीच्या विद्यार्थिनीने जीवन संपवल्याची घटना जालना घडली आहे. शहरातील सीटीएमके गुजराती विद्यालयात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे. नेहमीप्रमाणे ही मुलगी सकाळी सात वाजता शाळेत गेली. प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात गेले. मयत मुलगीही वर्गात गेली. त्यानंतर […]

सामना 21 Nov 2025 2:17 pm

एनडीएने बिहारची मते 5.5 रुपये प्रतिदिन दराने विकत घेतली! प्रशांत किशोर यांचा खळबळजनक दावा

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला पाशवी बहुमत मिळाले, तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. यावर आता प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली असून एनडीएने बिहारची मते 5.5 रुपये प्रतिदिन दराने विकत घेतल्याचा दावा केला. ते चंपारणमधील भितिहरवा येथे माध्यमांशी बोलत होते. बातमी अपडेट होत आहे… #WATCH | Bhitiharwa, West […]

सामना 21 Nov 2025 2:10 pm

Sangli Crime : सांगलीत सराईत गुन्हेगारांची पोलीस अधीक्षकाकडून झाडाझडती

दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईतांवर पोलिसांची धडक कारवाई सांगली : पोलीस ठाण्यामध्ये मागील पाच वर्षात दोन किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत ३०६ गुन्हेगारांची बुधवारी झाडाझडती घेण्यात आली. पुन्हा कोणत्या गुन्ह्यात आढळला तर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही पोलीस अधीक्षक [...]

तरुण भारत 21 Nov 2025 2:08 pm

त्वचेला नवा तजेला देण्यासाठी काॅफीचा कसा वापर कराल, जाणून घ्या

हिवाळ्यात अनेकांना कॉफी प्यायला खूप आवडते. परंतु काॅफी केवळ आपला थकवा घालवणारी नाही तर, काॅफीमुळे आपल्याला सुंदरही दिसता येते.कॉफीचा स्क्रब म्हणून वापर केल्याने त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. कॉफी त्वचेची खोलवर स्वच्छता करते, त्यामुळेत्वचा स्वच्छ, चमकदार आणि मऊ होते आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील कमी होते. केसांसाठी भीमसेनी कापूर वरदानापेक्षा कमी नाही, वाचा काॅफीच्या […]

सामना 21 Nov 2025 1:55 pm

Miraj Crime : मिरजेत व्यापाऱ्याला 90 लाखांचा गंडा; गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

मिरजेत मोठी आर्थिक फसवणूक; ९० लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर डल्ला मिरज : कंपनीमध्ये भागभांडवल गुंतवणूक करण्यास सांगून येथील व्यापाऱ्याला एक कोटी, ४० लाख, ७० हजार रुपये गुंतविण्यास सांगून तब्बल ९० लाख, ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे [...]

तरुण भारत 21 Nov 2025 1:53 pm

सुंदर दिसण्याकरता लिंबाचा वापर कसा करावा, वाचा

ताजा लिंबाचा रस हा आपल्या त्वचेसाठी खूप गरजेचा आहे. लिंबाच्या वापराने आपल्या सौंदर्यालाही चार चांद लागतात. खासकरून त्वचेसाठी लिंबू हा फार महत्त्वाचा मानला जातो.लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असते, जे त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते. तसेच, ते त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते. याशिवाय लिंबूमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात, जे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि पिगमेंटेशन […]

सामना 21 Nov 2025 1:22 pm

Sangli News : सांगलीत शोकसागर ; दिल्लीतील छळामुळे विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य

राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनवरून उडी मारून दहावीच्या विद्यार्थ्याचा अंत सांगली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील प्राचार्या आणि शिक्षिकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या ढवळेश्वर गावातील दहावीतील विद्यार्थी शौर्य पाटील याने आत्महत्या केली आहे. शौर्यने दीड पानांच्या सुसाइड नोटमध्ये “स्कूलवालों ने इतना बोला कि [...]

तरुण भारत 21 Nov 2025 1:22 pm

DPBI चे अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त व्यक्तीची 22 लाखांची ऑनलाईन फसवणूक, देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अज्ञात सायबर भामट्यांनी ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’चे अधिकारी असल्याचे भासवून एका ७१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीची २२ लाख २० हजार रुपयांची आँनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात सायबर गुन्हेगारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरूख पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, जनार्दन काशीनाथ अणेराव (वय – ७१, रा. ठाणे, मूळ रा. आंगवली, ता. संगमेश्वर) यांना १५ […]

सामना 21 Nov 2025 1:18 pm

Mumbai News –चारित्र्याच्या संशयातून मध्यरात्री डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या, आरोपी पतीला पोलिसांकडून अटक

चारित्र्याच्या संशयातून मध्यरात्री डोक्यात दगड घालून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सिराज नाईक असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सिराज नाईक पत्नी मुमताजसह मालाडमधील मालवणी परिसरात राहत […]

सामना 21 Nov 2025 1:15 pm

इफ्फीत गुंजला ‘वंदे मातरम्’चा हुंकार

कोरियनसंसदसदस्यानेसगळ्यांनाटाकलेभारावून पणजी : इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात कोरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय संसदेच्या सदस्य जेवॉन किम यांनी केलेल्या ‘वंदे मातरम्’च्या भावपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांमधून उत्स्फूर्त दाद मिळाली. भारतात ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना किम यांची ही मनमोहक प्रस्तुती सर्वाना हर्षोल्हासित करुन गेली. या भावपूर्ण सादरीकरणाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले. किम यांनी मनापासून सादर केलेल्या या सादरीकरणाने [...]

तरुण भारत 21 Nov 2025 1:12 pm

पाडलोस रवळनाथ पंचायतनचा 26 रोजी जत्रोत्सव

न्हावेली /वार्ताहर पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनाचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार 26 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांसाठी दिवसभर विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जत्रोत्सवानिमित्त सकाळी देवतांवर महाआभिषेक, समाराधना, ओटी भरणे, केळी ठेवणे तसेच नवस बोलणे व फेडणे या धार्मिक सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री [...]

तरुण भारत 21 Nov 2025 1:10 pm

Kagal Crime : जमिनीच्या वादातून 81वर्षीय वृद्धास कागल ग्रामीण रुग्णालयात वृद्धास मारहाण

कागलमध्ये जमिनीच्या वादात हाणामारी कागल : शेत जमिनीच्या वादातून ८१ वर्षाच्या वृद्धास कागल येथील ग्रामीण रुग्णालय आवारात मारहाण करण्यात आली. तर याच प्रकरणात मौजे सांगाव येथे महिलेचा विनयभंग करून मारहाण करण्यात आली. याबाबत शंकर गणपती निर्मळे (वय ८१) व विजया निवृत्ती [...]

तरुण भारत 21 Nov 2025 1:10 pm

गोकाकमधील घरफोडी प्रकरणाचा छडा

हुबळीच्यातिघांनाअटक: सोन्या-चांदीचेदागिनेजप्त: काहीदागिनेगहाणठेवल्याचेउघडकीस बेळगाव : गेल्या 20 दिवसांपूर्वी गोकाक येथे झालेल्या एका घरफोडी प्रकरणाचा गोकाक पोलिसांनी छडा लावला आहे. केशवापूर, हुबळी येथील तिघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी हुबळी येथील सोने तारणावर कर्ज देणाऱ्या एका कंपनीत 39 ग्रॅम दागिने गहाण ठेवल्याचे उघडकीस आले आहे. 31 ऑक्टोबर 2025 च्या सायंकाळी [...]

तरुण भारत 21 Nov 2025 1:08 pm

शेती सोडून मुंबई-पुण्याच्या मागे धावू नका, हिंमत हरलेला योद्धा युद्ध जिंकत नाही; कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचा कानमंत्र

कोकणातील तरुणांनी आता मुंबई-पुण्यातील नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या गावातील शेतीत लक्ष घालण्याची गरज आहे. हिंमत हरलेला योद्धा कधीच युद्ध जिंकू शकत नाही, त्यामुळे जिद्दीने शेती करा आणि सहकाराच्या माध्यमातून गावाचा विकास साधा, असे प्रतिपादन कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले. चिपळूण येथे 72 व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त आयोजित सहकार मेळाव्यात डॉ. तानाजीराव अध्यक्षस्थानावरून बोलत […]

सामना 21 Nov 2025 1:04 pm

केंद्राच्या ‘सिटीज-2.0’ मध्ये बेळगाव शहराची निवड

ओला-सुकाकचराविल्हेवारीच्यासमस्येवरतोडगाकाढणार: कचरापुनर्रवापरातूनउत्पन्नमिळविण्याचेउद्दिष्ट बेळगाव : केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नावीन्य,एकात्मता आणि शाश्वतता, गुंतवणूक (सिटीज-2.0) योजनेसाठी बेळगाव शहराची निवड करण्यात आली आहे. शहरातील ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या विल्हेवारीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि कचऱ्याचा पुनर्रवापर करून उत्पन्न मिळविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. नगरविकास खात्याने केंद्र सरकारला 135 कोटी रुपयांच्या खर्चाचा अहवाल सादर केला [...]

तरुण भारत 21 Nov 2025 1:02 pm

Kolhapur Politics : मंडलिकांच्या टीकेला मंत्री मुश्रीफांचे प्रत्युत्तर; युतीविषयी दिलं स्पष्टीकरण

कागल नगरपरिषदेतील उमेदवारीवरून मुश्रीफांचा मंडलिकांना सवाल कोल्हापूर : माजी खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ व शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या युतीवरून टीका केली होती. तसेच विविध राजकीय आरोप केले होते. या टिकेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. २००९ मधील लोकसभा [...]

तरुण भारत 21 Nov 2025 1:00 pm

तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण : गुरुवार रात्रीपासून वाहनांचा सुसाट प्रवास बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अखेर गुरुवारी पूर्ण झाले. त्यामुळे रात्री हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 13 दिवसांनी रस्ता खुला झाल्याने दुसरे रेल्वेगेट परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:59 pm

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक’ दोन खटल्यांमध्ये साक्ष नोंद

बेळगाव : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक प्रकरणातील खटला क्रमांक 122/15 आणि 126/15 या दाव्यात बुधवार दि. 19 रोजी झालेल्या सुनावणीवेळी तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. त्याचबरोबर खटला क्रमांक 296/15 मध्ये तपास अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने अधिकाऱ्यांना वॉरंट बजावण्याचा आदेश दिला. येळ्ळूर गावच्या वेशीतील फलक जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटविल्याने मोठा जनक्षोभ उसळला होता. [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:56 pm

वाहतूक नियम मोडलेल्यांसाठी दंडाच्या रकमेत 50 टक्क्यांची सवलत

21 नोव्हेंबरते12 डिसेंबरपर्यंतमुदत बेळगाव : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची दंडाची रक्कम सरकारने पुन्हा निम्म्यावर आणली आहे. 50 टक्के सवलतीत दंड भरण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. सरकारने दिलेल्या मुदतीत दंड भरल्यास 50 टक्के सूट असणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी ही माहिती दिली आहे. वाहतूक पोलिसांकडून ई-चलन अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:54 pm

आरोस बाजार रस्त्यावर धोकादायक खड्डे

न्हावेली /वार्ताहर कोंडुरा ते आरोस बाजार मार्गावरील आरोस हायस्कूल ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी निर्माण झालेल्या खोल आणि अनियमित खड्ड्यांमुळे नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालक यांचे हाल होत आहेत. मागील काही दिवसांत या ठिकाणी अनेक किरकोळ अपघातही घडले असून काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते. प्रशासनाने दखल घेत खड्डे बुजविण्याची [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:53 pm

Delhi Blast Update –दहशतवादी भाषणे आणि बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग! डॉ. मुजम्मिलच्या मोबाईलमध्ये सापडले शेकडो पुरावे

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. आतापर्यंत या घटनेत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. संपूर्ण प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे नवीन अपडेट समोर येत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. यापूर्वी आरोपी उमरच्या […]

सामना 21 Nov 2025 12:47 pm

अळणावरच्या मोटारसायकल चोरट्याकडून पावणे तीन लाखांच्या चार दुचाकी जप्त

बेळगाव : एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याजवळून 2 लाख 70 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. हिरेबागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अजय ऊर्फ अजित बसवराज बजंत्री (वय 19) राहणार अळणावर असे त्याचे नाव आहे. गुरुवारी चोरीच्या मोटारसायकलवरून जाताना संशयावरून पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरल्याची कबुली [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:47 pm

IND vs SA –शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर; उपचारांसाठी मुंबई गाठणार, गुवाहाटीत पंतच्या हाती टीम इंडियाची कमान

पहिल्या कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानचा कर्मधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे गुवाहाटी कसोटीला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये यष्टीरक्षक बॅटर ऋषभ पंत हिंदुस्थानचे नेतृत्व करताना दिसेल. बीसीसीआयने ‘एक्स’वरून याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीत शुभमन गिल याच्या मानेला दुखापत झाली होती. […]

सामना 21 Nov 2025 12:46 pm

शिवप्रेमींकडून किल्ले भगवंतगडावर स्वच्छता मोहीम

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा अभिनव उपक्रम आचरा | प्रतिनिधी जागतिक वारसा सप्ताह दरवर्षी १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे सदस्य व शिवप्रेमींनी चिंदर येथील किल्ले भगवंतगडावर आज स्वच्छता मोहीम राबवत एक अभिनव उपक्रम राबवला. लोकांना सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे महत्त्व समजणे त्यांचे संरक्षण करणे [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:46 pm

मेक्सिकोची फातिमा बोश ठरली मिस युनिव्हर्स 2025

थायलंडच्या बँकॉकमध्ये पार पडलेल्या 74 व्या मिस युनिव्हर्स 2025 या स्पर्धेत मेक्सिकोच्या फातिमा बोश हिने यंदा बाजी मारली आहे. फातिमा ही यंदाची मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती ठरली आहे. फातिमाने मिस थायलंड व मिस वेनेझुएलाला मागे टाकत हे विजेतेपद पटकावले. View this post on Instagram A post shared by Miss Universe (@missuniverse) जगभरातील […]

सामना 21 Nov 2025 12:45 pm

Kolhapur : पुलाची शिरोलीत ऐडक्यांनी हल्ला करणाऱ्या चौघांची धिंड; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पुलाची शिरोलीत दुसऱ्यांदा आरोपींची धिंड पुलाची शिरोली : पुलाची शिरोलीत ऐडक्यांनी हल्ला करत दहशत निर्माण केलेल्या चौघांची गुरुवारी सायंकाळी धिंड काढण्यात आली.या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. हि कारवाई सपोनी सुनील गायकवाड यांच्या [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:29 pm

कृषी खात्याकडून पीक विमा परिपत्रकाचे अनावरण

बेळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे. शेतकरी पेरणीच्या कामात गुंतले असून पेरणी लवकरात लवकर आटोपण्यासाठी लगबग करीत आहेत. रब्बी हंगामातील पेरणी नैसर्गिक आपत्तीमुळे वाया जाऊ नये व शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने कृषी खात्याकडून पंतप्रधान पीक विमा भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या दृष्टीने गुरुवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:27 pm

मराठी कागदपत्रे मोर्चा खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सन 2017 मध्ये मराठी कागदपत्रांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ‘रहेंगे तो महाराष्ट्र में’, त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याने दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. गुरुवारच्या सुनावणीवेळी चार्जफ्रेम केली जाणार [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:26 pm

गोवा-हैदराबाद महामार्गाबाबत खा.शेट्टर यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

बेळगाव : गोवा-हैदराबाद महामार्गाच्या बाजूने सेवा रस्ता तयार करणे व रामदुर्ग तालुक्यातील तोरणगट्टी गावानजीक 5 मीटर उंचीचा सेतू बांधण्याबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी बागलकोट विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे योजना संचालक पवन गुरव यांच्याशी नुकतीच चर्चा केली. गोवा-हैदराबाद नूतन महामार्ग बैलहोंगल तालुक्यातील लक्कुंडी, भावीहाळ, जे. के. कोप्प, मुर्कीभावी, इंचल या गावाजवळून जाणार आहे. तेथील शेतकऱ्यांना शेतवडीकडे [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:24 pm

पश्चिम रेल्वेची सेवा आज रात्री विस्कळीत होणार; वसई ते वैतरणादरम्यान सहा तासांचा ब्लॉक

वसई ते वैतरणा स्थानकांदरम्यान आज मध्यरात्री सहा तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची लोकलसेवा रात्री विस्कळीत होण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळ, सिग्नल प्रणाली तसेच ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप जलद मार्गावर 23.55 ते 2.55 पर्यंत तर डाऊन जलद मार्गावर 1.30 ते 4.30 […]

सामना 21 Nov 2025 12:22 pm

उत्तम आरोग्यासाठी नाश्ता करण्याचे फायदे, वाचा

सकाळी लवकर घरातून बाहेर पडताना काहीतरी खाणे हे खूप गरजेचे आहे. नाश्ता करुन बाहेर पडायलाच हवे हे आपल्याला जुनी जाणती माणसं कायम सांगत आलेली आहेत.अनेकदा काही लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता वगळतात. परंतु असे केल्याने शरीरातील चयापचय मंदावते आणि ऊर्जा कमी होते, त्यामुळे दिवसभर एनर्जी वाटत नाही. रात्रीच्या जेवणानंतर, आपल्या शरीराला सकाळी काम करण्यासाठी भरपूर […]

सामना 21 Nov 2025 12:19 pm

मोबाईल टॉवर्सना त्वरित वीज जोडणी करा

जांबोटी-कणकुंबीविभागातीलनागरिकांचीमागणी: दुर्गमभागातीलदूरध्वनीटॉवरअद्यापसोलारयंत्रणेवरच वार्ताहर/जांबोटी दुर्गम भागात वसलेल्या गावांना दूरध्वनी सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने केंद्र सरकारच्यावतीने खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये भारत दूरसंचार निगम (बीएसएनएल) च्यावतीने मोबाईल टॉवर उभारुन दुर्गम भागातील नागरिकांना दूरध्वनी सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठी गैरसोय दूर झाली आहे. मात्र सदर दूरध्वनी टॉवर्सना अद्याप वीज जोडणी करण्यात आली नसल्यामुळे सध्या ही सेवा [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:18 pm

उचगाव भागातील युवापिढी चरस-गांजाच्या आहारी

विक्रीचीमोठीउलाढाल: पोलीसखात्याचेदुर्लक्ष: संबंधितांनागजाआडकरण्याचीमागणी वार्ताहर/उचगाव उचगाव, तुरमुरी, कोणेवाडी, बसुर्ते, शिनोळी या परिसरात सध्या गांजा या नशेली पदार्थांच्या आहारी युवा पिढी गेल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. या भागात नशेली पदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठ्या प्रमाणात मावा विक्रीची उलाढाल होत असून, पोलीस खाते याबाबत अद्याप निक्रिय आहे. बेळगाव शहरांमध्ये जशी पोलीस खात्याने मोहीम हाती घेतली [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:13 pm

Kolhapur : अंबपमध्ये शेतात बिबट्याचे दर्शन; गावात भीतीचे वातावरण

अंबप येथे बिबट्यामुळे सावधगिरीचा इशारा by किशोर जासूद अंबप : अंबप ता हातकणंगले येथे अंबपवाडी रस्त्यालगत असणाऱ्या बावडेकरांच्या शेतात आज गुरुवारी दुपारी मका पिकास पाणी पाजत असताना शेतमजुराला बिबट्या निदर्शनास आला. बिबट्याला पाहतात शेतकऱ्यांनी धूम ठोकली. जवळच कुत्र्याची शिकार करून त्याचे अवशेष पडल्याचे [...]

तरुण भारत 21 Nov 2025 12:10 pm

स्मशानभूमी उजळल्या, कल्याण-डोंबिवलीत 24 तास हायब्रीड सोलर

कल्याण, डोंबिवलीतील काही स्मशानभूमीत यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वाहनांच्या हेडलाईट्सचा आधार घेऊन अंत्यविधी पार पाडण्याची वेळ नातेवाईकांवर यायची. मात्र हा त्रास आता कायमचा दूर झाला आहे. स्मशानभूमीमध्ये हायब्रीड सोलर लाईट्स बसवल्यामुळे 24 तास त्या उजळून निघत आहेत. 14 ऑक्टोबर रोजी महावितरणचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सापर्डे स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी निर्माण झालेल्या अडचणीबद्दल समाजमाध्यमांसह नागरिकांकडून […]

सामना 21 Nov 2025 12:03 pm

मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती, तत्पूर्वीच काळाचा घाला; घराला लागलेल्या आगीत अख्खं कुटुंबच संपलं

घरी मोठ्या मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती. सर्व आनंदात होते. मात्र त्याआधीच काळाने घाला घातला अन् लग्नघर शोकसागरात बुडालं. घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. घरातून धूर निघताना पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलीस आणि अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गुजरातमधील गोधरा येथे शुक्रवारी […]

सामना 21 Nov 2025 11:47 am

तारापूरमध्ये जलवाहिनी फुटल्याने फटका, बाराशे कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प

तारापूर औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जल वाहिनी गुरुवारी दुपारी अचानक फुटली. त्यामुळे सुमारे 1200 कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे. एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून तारापूर औद्योगिक क्षेत्राकडे 1000 मिमीच्या मुख्य जलवाहिनीद्वारे दररोज […]

सामना 21 Nov 2025 11:44 am

100 उठाबशा काढल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, वसईतील शिक्षिकेला अटक

100 उठाबशा काढल्याने वसईच्या श्री हनुमंत विद्या मंदिरातील आशिका गौड या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. उठाबशा काढण्याची क्रूर शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. ममता यादव असे या शिक्षिकेचे नाव असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे. शाळेत यायला […]

सामना 21 Nov 2025 11:40 am

हिंदी-मराठीच्या वादातून कल्याणच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, टोळक्याने केलेल्या मारहाणीमुळे नैराश्य

हिंदी-मराठीच्या वादातून एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बळी घेतल्याची घटना कल्याणमधील तिसगाव नाका परिसरात घडली. मुलुंड येथील एका कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेणारा अर्णव खैरे हा नेहमीप्रमाणे लोकलने प्रवास करीत होता. त्यावेळी लोकल मध्ये असलेल्या प्रवाशाला तो हिंदीत पुढे होण्यासाठी बोलला. त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या पाच जणांच्या टोळक्याने तुला मराठी बोलता येत नाही का? मराठी […]

सामना 21 Nov 2025 11:35 am

डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट; निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार !

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागातील पाणीपुरवठा अनियमित आहे. अगदी अलीकडेच पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र झाल्यावर एका दिव्यांग वयोवृद्ध नागरिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 7 नोव्हेंबर रोजी एमआयडीसी कार्यालयावर […]

सामना 21 Nov 2025 11:35 am

कराचीच्या तुरुंगात हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू

पाकिस्तानातील कराचीच्या तुरुंगात एका हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. त्याचे नाव समजू शकले नाही. दोन वर्षांपूर्वीच या मच्छीमाराचा शिक्षेचा कालावधी संपला होता. तरीही त्याची सुटका करण्यात आली नव्हती. पाकिस्तानी सरकारने हिंदुस्थानी मच्छीमारांना तुरुंगात खितपत ठेवल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. पाकिस्तानी तुरुंगात आतापर्यंत 199 हिंदुस्थानी मच्छीमार कैदी असून त्यात महाराष्ट्रातील 19 मच्छीमारांचा समावेश आहे. […]

सामना 21 Nov 2025 11:25 am

‘सुकन्या समृद्धी योजने’मुळे मुलगी झाली समृद्ध

बेळगावपोस्टविभागातयावर्षी4777 मुलींचीनोंद: 15 वर्षेखात्यामध्येपैसेभरणेआवश्यक बेळगाव : मुलींच्या भवितव्यासाठी तसेच पालकांना अल्प बचतीतून शिक्षण, लग्नाचा खर्च करता यावा यासाठी ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरू करण्यात आली होती. सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतानाही मोठ्या प्रमाणात सुकन्या समृद्धी योजनेकडे नागरिकांचा कल आहे. बेळगाव जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात एकूण 4777 मुलींची सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नोंद करण्यात आल्याची माहिती बेळगाव [...]

तरुण भारत 21 Nov 2025 11:23 am

ठाण्यात चार लाख मतदार वाढले, प्रत्येक प्रभागात दहा हजारांहून अधिक मतदार

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत ठाणे पालिका हद्दीत तब्बल 4 लाख मतदार वाढले आहेत. ठाण्यात एकूण 16 लाख 49 हजार 867 मतदार असून प्रत्येक प्रभागात सुमारे दहा हजारांहून अधिक मतदार वाढले आहेत. एकीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जात […]

सामना 21 Nov 2025 11:21 am

ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार : महापौर मंगेश पवार

सार्वजनिकग्रंथालयातर्फेआयोजितराष्ट्रीयग्रंथालयसप्ताहाचासमारोप बेळगाव : ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार आहे. ग्रंथालयाचा मुलांनी योग्यरित्या उपयोग करून घ्यावा. पालक आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणासाठी मेहनत घेत असतात. मुलांनी पालकांचा कायम आदर राखून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी परिश्रम घ्यावेत. मुलांनी पालकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी, असे आवाहन महापौर तथा शहर केंद्र ग्रंथालयाचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी केले. [...]

तरुण भारत 21 Nov 2025 11:20 am