तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं, मालिका देखील जिंकली
विशाखापट्टनम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत मालिका खिशात घातली. या मालिकेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 2-1 अशा फरकाने मात करत केली. यशस्वी जैस्वालचे शतक, रोहीत शर्माच्या 75 आणि विराट कोहलीच्या 65 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 271 धावांचे लक्ष्य पार केले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याचा ओव्हरमध्ये […]
Ratnagiri News –राजापुरात देवीहसोळ गावात बिबट्याच्या संशयास्पद मृत्युने खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील देवीहसोळ गावामध्ये नदीकिनाऱ्यालगत एका स्थानिक ग्रामस्थाच्या मालकीच्या माडाच्या बागायतीमध्ये फासकीमध्ये अडकलेल्या बिबटयाच संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली असून या मृत बिबट्याची शिकार करून त्या मृत बिबट्याला नदीमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या बिबट्याचा मृतदेह आता सडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून एवढे होऊनही याबाबत कुणीच माहिती न दिल्याने या […]
मनमानी दर लावणाऱ्या विमान कंपन्यांना सरकारचा दणका, घेतला मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी इंडिगोच्या सेवेचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. इंडिगोची गेल्या दोन दिवसात दोन हजाराच्या आसपास उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान इंडिगोची सेवा कोलमडल्यामळे इतर विमान कंपन्यांनी त्यांचे दर अव्वाच्या सवा वाढवले होते. पाच ते सहा हजाराच्या तिकीटासाठी विमान कंपन्यांनी 60 ते 90 हजार रुपयांपर्यंत […]
जमिनीच्या वादातून निलंग्यात थरार! धारदार शस्त्राने तरुणाचा गळा चिरला
प्लॉटच्या वादातून निलंगा शहरात एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे निलंगा शहरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील हाडगा नाका परिसरात ही घटना घडली आहे. जगदीश लोभे असे ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांचे नाव असून त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने गंभीर वार केले आहेत. […]
रोहित शर्माचा नवा रेकॉर्ड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण
टीम इंडियाचा माजी कर्णधार व सलामीचा फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. हा रेकॉर्ड करणारा तो हिंदु्स्थानातील चौथा फलंदाज ठरला आहे. सध्या विशाखापट्टनम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने हा टप्पा गाठला. आता पर्यंत हिंदुस्थानच्या सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि आता रोहित शर्मा या खेळाडूंनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 […]
महापरिनिर्वाण दिनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 72 रक्तदात्यांनी रक्तदान करून अभिवादन केले. शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने मागील 17 वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी शनिवार 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे ,मैनुद्दीन पठाण, युवक शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.उज्ज्वला गवळी,नेहा संदीप बनसोडे ,गणेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात दिवसभरात 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीने चहा, फळे व नाष्टा देण्यात आला. यावेळी जिल्हा रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण कर्मचारी दिवसभर उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी सामाजिक नेते निखिल बनसोडे, अमोल बनसोडे,शाहू धावारे,दादासाहेब मोटे, प्रसाद माने, प्रजोत बनसोडे, स्वप्नील बनसोडे, सुमित क्षीरसागर,नागराज साबळे ,शैलेंद्र शिंगाडे,प्रसाद बनसोडे, रुपेश बनसोडे,क्षमीनल सरवदे,महेश डावरे, कुमार ओहळ,रिया गायकवाड,रेणुका बनसोडे,लक्ष्मी ढाले, आदींनी परिश्रम घेतले.
इंडिगोमध्ये जे काही घडलं त्याचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणी केंद्र सरकारने संसदेत अधिकृत निवेदन दिले पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली. कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत, कुणाच्या कुटुंबात नातलगाचे निधन झाले आहे तर कुणाला लग्नासाठी जयाचं असेल, आपण पाहतोय गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांचे हाल […]
नेतर्डे –खोलबागवाडीत तरुणीची आत्महत्या
प्रतिनिधी बांदा नेतर्डे-खोलबागवाडी येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत मयुरी आनंद परब (वय १८) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी घरच्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना व पोलिसांना दिली.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस कर्मचारी [...]
धुरंदरने धुरळा उडवला …रेकॉर्डब्रेक सुरुवात झाल्यानंतर थिएटर मालकांनी मध्यरात्रीही ठेवले शो
रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन आणि अर्जुन रामपाल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या धुरंदर या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशीच बॉक्सऑफिसवर धुरळा उडवला. धुरंदर पहिल्या दिवशी 15 ते 18 कोटी कमावेल अशी चित्रपट समिक्षकांनी शक्यता वर्तवली होती. मात्र हे सगळे आकडे फोल ठरवत धुरंदरने पहिल्या दिवशी 27 कोटींचा गल्ला जमवला. धुरंदरचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून […]
न.प. हद्दीतील शेतकऱ्यांना एमआरईजीएस योजनांचा लाभ मिळावा-खासदार ओमराजे निंबाळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनांचा माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समान हक्काने लाभ मिळावा, अशी ठाम मागणी आज लोकसभेच्या शून्य प्रहरामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केली. खासदार निंबाळकर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, या नगरपालिका हद्दीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या हजारो कुटुंबांची उपजीविका शेतीवर अवलंबून असूनही, त्यांना केवळ नगर पालीका क्षेत्रात वास्तव्यास असल्यामुळे अनेक योजनेच्या पात्रतेतून वगळल जाते. त्यामुळे शेतकरी विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतो. खासदार निंबाळकर यांनी सभागृहात नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतरस्ते, गाय-गोठा, वैयक्तिक विहीर, फळबाग लागवड, तुती लागवड यांसारख्या योजनांचा त्वरित लाभ द्यावा. ग्रामीण भागातील शेतकरी आणि नगरपालिका क्षेत्रातील शेतकरी यांच्यात असा भेदभाव होऊ नये. त्यांनी पुढे सांगितले की, शासनाच्या कृषी अनुदान, पायाभूत सुविधा आणि पशुपालन योजनांचा विस्तार या भागात केला तर शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढेल, पाणी व सिंचन व्यवस्थेत सुधारणा होईल, फळबाग आणि तुती लागवड प्रोत्साहनामुळे टिकाऊ शेती उभी राहील, पशुपालनावर आधारित आर्थिक स्वावलंबन तयार होईल.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय राज्य घटनेने शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धाराशिव येथे बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धंनजय शिंगाडे, माजी नगराध्यक्ष खलीफा कुरेशी, मसुद शेख , इरफान कुरेशी, बाबा मुजावर, जीवन देशमुख, जालिंदर पांचाळ, खलील पठाण, विशाल शिंगाडे, असद पठाण, समय्योदुन मशयाक, पठाण सोहेब , शरनम शिंगाडे, पद्नात ओव्हाळ, सुगत सोनवणे, अविनाश शिंगाडे, नुरखा पठाण, मिलीद पेठे, जितेंद्र बनसोडे, इफ्तेकार मुजावर, शारिफुत शिंगाडे, ताहेर शेख, उद्धव कांबळे, सतिश बनसोडे, कलीम कुरेशी, रोहन शिंगाडे, धमपाल बनसू, चंद्रमणी बनसोडे, रावसाहेब शिंगाडे, आबा सुर्यवंशी, अँड परवेज काझी यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव प्रशालेत ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली
धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजवादी नेते साथी पन्नालाल सुराणा यांना धाराशिव प्रशालेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शनिवारी (दि. 6) धाराशिव प्रशालेच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, छत्रपती शिवाजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एम. डी. देशमुख, जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समितीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, सचिव दिलीप गणेश, ॲड. सुग्रीव नेरे, ॲड. चित्राव गोरे, ॲड. निलेश बारखेडे, राष्ट्र सेवा दलाचे अजय वाघाळे, डीसीसी बँकेचे माजी कार्यकारी संचालक हणमंत भुसारे, सिद्धेश्वर बेलुरे, विलास वकील, गुंडू पवार, बालाजी जाधव, बिभीषण कुदळे, मुख्याध्यापक पंडित जाधव, उषा माने, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अब्दुल लतिफ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी साथी पन्नालाल सुराणा यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समितीचे सचिव दिलीप गणेश यांनी धाराशिव प्रशाला उभारणीच्या कामात साथी पन्नालाल सुराणा यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेळके यांनी साथी पन्नालाल सुराणा यांच्या कार्याचा आदर्श घेऊन देहदानाचा संकल्प केला. प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय वाघाळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक रमण जाधव यांनी केले. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
परंडा (प्रतिनिधी)- दि. 6 डिसेंबर 2025 शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे त्याच मार्गाने माणसाला माणूस म्हणून जगता येते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून या भारत देशाची घटना लिहिली त्यामुळे आज आपण या भारतीय संविधानामुळे आपण स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील अठरापगड जातीसाठी दीनदलित गोरगरीब वंचित घटकासाठी व शेतकरी महिला यांच्यासाठी अनमोल असे कार्य केले आहे. शैक्षणिक सामाजिक आर्थिक अशा विविध कार्यक्षेत्रात त्यांचे योगदान खूप मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक भारतीयांनी त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करताना केले.शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव हे उपस्थित होते. यावेळी व प्राचार्य डॉ.महेश कुमार माने ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे ,कनिष्ठ विभागाचे परिवेक्षक प्रा. किरण देशमुख शारीरिक शिक्षण प्रमुख डॉ कृष्णा यांची उपस्थिती होती. यावेळी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले . अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला तर प्रा किरण देशमुख यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. याच प्रसंगी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांना श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशाच्या आर्थिक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे- प्रा. डॉ.मारुती लोंढे
धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचा आर्थिक विकास घडवून आणायचा असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील माणूस केंद्रबिंदू माणून त्याच्या आर्थिक कल्याणाचा विचार केला आहे. शेती, उद्योग, मजूर, रुपयाची समस्या अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले आर्थिक विचार मांडलेले आहेत. देशाचा खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर उप परिसर धाराशिव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर उप परिसर धाराशिव येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उप परिसराचे संचालक प्रोफेसर डॉ. प्रशांत दीक्षित हे होते. त्यांनी अध्यक्षीय म्हणून व्यक्त करताना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते, तर ते बहुआयामी व्यक्तिमत्व होते. पत्रकारिता,राजकीय क्षेत्र,अर्थशास्त्र, समाजशास्त्र, विधीतज्ञ अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाद्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विश्वास कांबळे यांनी केले. तर आभार विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. गणेश शिंदे यांनी मानले. याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम विद्यापीठ उप परिसराचे संचालक प्रोफेसर डॉ.प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
परंड्यात 10 लाखांची खंडणी मागितली
परंडा (प्रतिनिधी)- परंडा शहरातील कुर्डवाडी रोड येथे राहणाऱ्या 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडे दोन आरोपींनी 10 लाख रुपयांची खंडणी मागून रक्कम न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक द्वारकाप्रसाद तिवारी (वय 69) यांना आरोपी अमर दयानंद तिवारी व आनंद दयानंद तिवारी (दोघे रा. शिक्षक सोसायटी, परंडा) यांनी वारंवार फोन करून, आम्ही आर्थिक अडचणीत आहोत असे सांगत रु. 10,00,000 इतकी खंडणी मागितली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी फिर्यादीच्या घरातील मुलगा, मुलगी व सुन यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता सर्वे नं. 45, कुर्डवाडी रोड, परंडा येथे घडली. त्यानंतर फिर्यादीने 4 डिसेंबर 2025 रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीसांनी नमूद आरोपींवर भा.दं.वि. कलम 33, 308(2)(4), 351(2)(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास परंडा पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.
बालाजी नगर येथे दत्त जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील बालाजी नगर येथील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात आयोजित दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त गुरुचरित्र ग्रंथ पारायण, भजन प्रवचन कीर्तन महाप्रसाद आधी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धाराशिव शहरातील बालाजी नगर येथील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त दि.28 नोव्हेंबरपासून ते 4 डिसेंबर दरम्यान गुरुचरित्र ग्रंथ पारायण कार्यक्रम पार पडला. दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी सुनील विटकर, विनायक जाधव यांच्या हस्ते यज्ञ पूजा करण्यात आली. याचे पुरोहित राजकुमार स्वामी यांनी केले. स्वामी समर्थ महाराजांची पालखी नगर प्रदक्षिणा आकाश महाराज वारकरी शिक्षण संस्था वाघोली यांच्या बालवारकऱ्यांसोबत काढण्यात आली. हभप पूजाताई कुंभार महाराज बारामती यांचे कीर्तन झाले. त्यानंतर विनायक जाधव यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ यांची भजन सेवा झाली. या दरम्यान दिनेश बंडगर यांच्या हस्ते सायंकाळी आरती करण्यात आली. तर प्रजापती विष्णू प्रभू यांचे प्रवचन झाले. या कार्यक्रमासाठी यशवंत सोनटक्के, संतोष क्षीरसागर, बालाजी भिसे, ओंकार वायकर, राजभाऊ ढवळे, प्राचीताई कोळगे, प्रणिता राठोड, माधुरी गायकवाड, तेजसकुमार नागवसे, नंदकुमार नागवसे, भाऊ घेवारे, नागेश घेवारे, पाटील, कृष्णा पुराणिक, शेरखाने, नागेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि प स्पेशल प्राथमिक शाळा मुरुम येथे महापरिनिर्वाण दिन साजरा
मुरूम (प्रतिनिधी)- जि प स्पेशल प्राथमिक शाळा मुरुम येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त बालसभाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता सहावी विद्यार्थी बालसभेत सहभागी होऊन अध्यक्षपदी विश्वजीत गायकवाड होते. विचारांची देवाणघेवाण करुन आपली मते प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे होते. प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मलकुमार लिमये, रुपचंद ख्याडे, शिवाजी गायकवाड, अंगद थिटे, आशालता शिवकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी निर्मलकुमार लिमये, रुपचंद ख्याडे, प्रमिला तुपेरे मनोगत व्यक्त केले. शिवाजी गायकवाड यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षदा कांबळे सूत्रसंचालन कनिष्का किरात व आभार चैतन्य भालेराव यांनी मानले.
सावंतवाडी पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरीत समाविष्ट करा
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंचे पालकमंत्र्यांना निवेदन सावंतवाडी । प्रतिनिधी नगरपरिषदेतील चतुर्थ श्रेणीतील 17 कामगारांना वारसाहक्क कायद्यानुसार कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्र शासनाला दिलेल्या आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या लाड पागे शिफारशीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरीत समाविष्ट करुन घेण्यात यावे असे निवेदन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी नगरपरिषदेतील [...]
रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने कर्तत्वान दिव्यांगांचा सत्कार सोहळा संपन्न
मुरूम (प्रतिनिधी)- सर्वसामान्य व्यक्ती पेक्षाही चांगलं काम करण्याची जिद्द ज्यांच्या मनामध्ये असते अशा कर्तत्वान दिव्यांगाचा सत्कार रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष प्रा. डॉ.आप्पासाहेब सूर्यवंशी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य कलया स्वामी,प्रा. डॉ. सुधीर पंचगले, रोटरी क्लबचे सचिव कल्लाप्पा पाटील हे होते.दिव्यांगता म्हणजे मर्यादा नाही; प्रत्येक दिव्यांग व्यक्तीत वेगळे कौशल्य, जिद्द आणि जगण्याची प्रेरणा दडलेली असते. त्यांच्या कमकुवतपणाकडे न पाहता त्यांच्या दिव्यशक्तीची दखल घ्यावी त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष प्रा. डॉ आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले .तीन डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग असुन सुध्दा केसाजवळगा येथील सामाजिक काम करणारे पंडित जळकोटे, अंधत्वावर मात करून समाजापुढे आदर्श निर्माण करणारे ज्यांच्याकडे वक्तृत्वही कला आणि सामाजिक भान असणारे बेळंब येथील सहदेव बोडरे, प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथील आदर्श कर्मचारी भीमाशंकर झुरळे , श्री माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजकुमार रोहीकर आणि सेवक म्हणून कार्यरत असणारे भुसणी येथील अशोक सुरवसे यांचा रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर अँडवोकेट डे च्या निमित्ताने मुरूम येथील नामांकित विधीतज्ञ व रोटरी क्लब चे सदस्य अँड उदय वैद्य यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोटरी क्लबचे सचिव कल्लप्पा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील राठोड यांनी परिश्रम घेतले. यावेळी गोविंद पाटील ,डॉ. नितीन डागा, डॉ. विजयानंद बिराजदार,डॉ.महेश स्वामी, शिवकुमार स्वामी,कमलाकर मोटे ,मल्लिकार्जुन बदोले , बाबासाहेब पाटील, प्रकाश रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
परंडा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा
परंडा (प्रतिनिधी)- भिमप्रतिष्ठान च्या वतिने भिमनगर रेवणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महारिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मूतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी भिमप्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नगरसेवक पापा शिंदे,नगरसेवक संजय घाडगे,आप्पासाहेब बनसोडे.शिवाजी शिंदे. हारी डिकुळे,जयर्वधन शिंदे ,तुकाराम चौतमहाल ,भाग्यवंत शिंदे.संजय शिंदे, उमेश बनसोडे,अभिजित शिंदे, सागर वाघचौरे.संदेश शिंदे ,तरूण चौतमहाल,भैय्या बनसोडे, बाळु बनसोडे,शशिकांत साळवे आकाश बनसोडे आदीसह मोठ्या संखेने बोध्द समाज उपस्थित होता.
मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र 16 हजार मेगा वाट वीज निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी 3 टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे आश्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलतांना केले. एका महिन्यात 45 हजार 911 कृषी पंप 'मागेल त्याला सौर कृषीपंप'योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात 45 हजार 911 सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले हे ही यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यास राज्याचे इमाव बहुजन कल्याण व अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे,राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, विधान परिषद सदस्य आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे,आ. प्रशांत बंब,आ. सुरेश धस, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे संचालक प्रवीण परदेशी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवने, सहसचिव (ऊर्जा) नारायण कराड, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचालक सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), योगेश गडकरी (वाणिज्य), राजेंद्र पवार (मानव संसाधन), कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता पवनकुमार कछोट तसेच अभिनेते संदीप पाठक, योगेश शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. पंच कार्ल सॅबेले यांनी केली विक्रमाची घोषणा सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौरकृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण करुन त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी दुरदूष्य प्रणालीने संवाद साधला. त्यानंतर गिनीज बुक विक्रम नोंदचे निरीक्षक पंच कार्ल सॅबेले यांनी विक्रमाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांना प्रदान केले. सौर कृषी पंप योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या बँकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बँकेचे प्रत्युष मिश्रा व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. कार्ल सॅबेले म्हणाले की, विक्रमासाठी 35 हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात 45 हजार 911 पंप स्थापित करण्यात आले, हा एक विश्वविक्रम आहे. या प्रत्येक पंपाच्या उभारणी ते कार्यान्वयन या सर्वटप्प्यांवर पडताळणी करुनच या विक्रमास मान्यता देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र थांबणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार व्यक्त केले. हे जनतेला समर्पित वर्ष होते. सगळ्यांच्या जीवनात मूलभूत परिवर्तनसाठी योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या. महाराष्ट्र थांबणार नाही, असाच पुढे जात राहील, हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ श्री. फडणवीस म्हणाले की, प्रखर दुष्काळाचा सामना करतांना नेहमीच पाण्याची आणि विजेची अडचण होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची उपलब्धता करतांना विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यात अडचण होती. दिवसा वीज मिळावी ही प्रमुख मागणी होती. रात्री अपरात्री शेतावर जाण्यात विषारी जीवजंतू, जनावरांची भीती होती. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे फिडर हे सौर ऊर्जेवर नेण्याचे धोरण निश्चित केले. त्यातून एक लाख सोलर पंप ची योजना आखण्यात आली. ही योजना इतकी चांगली होती की, आपल्या राज्यातील ही योजना ही अन्य राज्यांनी जशीच्या तशी राबवावी,असे पत्र केंद्रांमार्फत इतर राज्यांना पाठविण्यात आले. त्यानुसार ‘कुसूम'ही केंद्राची योजना तयार झाली. याच योजनेअंतर्गत आज देशात सर्वाधिक 7 लाख पंप राज्याने बसविले आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यापासून ते पंप बसविण्याच्या क्षमतेत वाढ कऊन आपण प्रतिक्षा कालावधीत कमी केला. महावितरणचे कर्मचारी अधिकारी. सगळ्या पुरवठादारांचे कर्मचारी, तंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे आज आपण हा विश्वविक्रम करु शकलो. आता हा आपला विक्रम आपणच मोडू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षभरात सौर कृषी पंपांची संख़्या 10 लाख झाली पाहिजे,असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. सौर ऊर्जेद्वारे 16 हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढवून आपण शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र 16 हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु शकतो. शिवाय ही वीज निर्मिती कोणत्याही प्रदुषणाशिवाय असेल. तिचा निर्मिती खर्च कमी असल्याने इतर क्षेत्राला लागणारी वीज मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध होईल. त्यामुळे दरवर्षी 3 टक्क्यांनी आपण विजेचे दर कमी करु, असेही त्यांनी यावेळी घोषीत केले. ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौर ऊर्जा उपकरण निर्मिती कंपन्या, वेंडर्स, कामगार, देखभाल करणारे अशा 1 लाख लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा देणारी ही योजना आहे,असे त्यांनी सांगितले. मराठवाड्याचा वाटा मोठा मराठवाड्याचे कौतुक करतांना श्री. फडणवीस म्हणाले की, या योजनेच्या अंमलबजावणीत मराठवाड्याने आघाडी घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 14 हजार पंप लावण्यात आले. शेतकऱ्यांना नानासाहेब देशमुख कृषी संजिवनी योजनेमार्फत अन्य लाभ, बाजाराची उपलब्धता देऊन शेती शाश्वत कशी होईल, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. नदी जोड सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून वाहून जाणारे पूराचे पाणी मराठवाड्यात , विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात नेऊन दुष्काळ मुक्ती करायची आहे. यासर्व उपाययोजनांमुळे शेती समृद्ध आणि शाश्वत होईल. आमचे सरकार हे शेतकऱ्यांप्रती समर्पित सरकार असून शेती शाश्वत होईपर्यंत आम्ही प्रयत्न करीत राहू, असा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व मंत्री अतुल सावे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधून सौर कृषी पंप योजनेमुळे शेती क्षेत्रात आणि अर्थकारणात मोठे बदल होतील,असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी लावलेल्या सौर ऊर्जा उत्पादनांच्या प्रदर्शनालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली व पाहणी केली. प्रास्ताविक लोकेश चंद्रा यांनी केले. तर निता पानसरे यांनी आभार मानले. नीता पानसरे, आश्विनी दाशरथे, प्रेषित रुद्रावतार यांनी सूत्रसंचालन केले.
स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव,दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह विमानतळ रोड आळणी येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवदत्त गिरी यांनी भूषविले. तसेच सचिदानंद बांगर (वै.सा.का.,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव),डॉ.निखील नवले (न्यूरोलॉजिस्ट),सरकारी वकील ऍड. गुंड, ॲड.गोरख कस्पटे, स्वामी समर्थ मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक ऍड. गाडे, शकील शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मतिमंदतेचे जनक म्हणून ओळखले जाणारे जीन मार्क इटार्ड यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर बालगृहातील मुलींनी मंगल स्वागतगीत सादर केले आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. गेल्या सहासात वर्षांपासून बालगृहातील मुलींना विनामूल्य वैद्यकीय सेवा देणारे डॉ.निखील नवले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळजाई प्रतिष्ठानचे सचिव शहाजी चव्हाण यांनी केले. यानंतर सचिव भाग्यश्री पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मोफत टोल फ्री क्रमांक 15100,बौद्धिक व मानसिक विकलांगांसाठीचा 14446,तसेच बालकांसाठीची मदतवाणी 1098 या महत्वाच्या सेवांची माहिती देत दिव्यांगांच्या हक्क व कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रूपाली कांबळे यांनी केले. तर आभार निकिता माने यांनी मानले.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजूरी- नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे
धाराशि (प्रतिनिधी)- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजूरी देणारा शासन निर्णय महसूल व वन विभागामार्फत 4 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आला आहे.सुधारित आकृतीबंधानुसार विभागातील मंजूर पदांची संख्या 3 हजार 952 इतकी झाली असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली. अपर मुख्य सचिव (महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी) यांच्या प्रयत्नांतून, सध्या मंजूर 3 हजार 94 पदांपैकी 107 पदे निरसित करण्यात आली असून 965 नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे.महसूल व वन विभागाच्या 4 डिसेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार एकूण 3 हजार 952 पदांच्या सुधारित आकृतीबंधास अंतिम मान्यता देण्यात आली आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा महसूल विभाग आहे.विभागाचा नव्या आकृतीबंधाचा प्रस्ताव सन 2016 पासून प्रलंबित होता. नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांची निर्मिती,वाढती दस्त संख्या आणि वाढते कामकाज लक्षात घेता या निर्णयामुळे विभाग अधिक सक्षम व बळकट होणार आहे.पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने शासनाकडून दरवर्षी ठरविलेल्या इष्टांकांच्या पूर्तीत मदत होईल,शासन महसूलात वाढ होईल आणि नागरिकांना अधिक वेगवान व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा व विभागाचा मानस सफल होण्यास ही मंजूरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 'महापरिनिर्वाण'दिन संपन्न
कळंब (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजी नगर सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त 6 डिसेंबर 2025 रोजी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन रासेयो विभाग प्रमुख प्रा.मनिषा कळसकर व आयक्युएसी विभाग प्रमुख डॉ.अनिल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी डॉ.उद्धव गंभिरे प्रा.पंडित शिंदे,डॉ.अनंत नरवडे,डॉ.रघुनाथ घाडगे, डॉ.हंडीबाग,प्रा.राजाभाऊ चोरघडे, प्रा.सोमनाथ कसबे, प्रा. अमोल शिंगटे,डॉ.विद्युलता पवार, प्रा.सुनिता चोंदे, श्री.विठ्ठल फावडे, श्री. संजय शेंडगे,सुंदर कदम,दत्तात्रय गायकवाड,दत्ता कांबळे, मुरलीधर चोंदे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य केले.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी अश्लेष मोरे कायम
उमरगा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या निलंबनाबाबतचे एक पत्र सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जात आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्यावतीने कोणतेही अधिकृत पत्र प्रसिध्दीस दिले नाही किंवा सोशल मिडियावर कोणतीही घोषणा केली नाही असे असताना सोशल मिडिया व इतरत्र एका बनावट पत्राद्वारे निलंबन केल्याचे सांगितले जात आहे. सदर पत्र बनावट असून संबधितांविरूध्द कारवाई करणार असल्याची माहिती उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. बनावट किंवा विकृत माहितीचा जाणीवपूर्वक प्रसार, संघटनात्मक व्यत्यय आणण्याचा कोणताही प्रयत्न किंवा युवक काँग्रेसची संस्थात्मक अखंडता आणि सार्वजनिक विश्वासार्हता नष्ट करण्याच्या उद्देशाने केलेली कोणतीही कृती ही संघटनेविरुद्ध गंभीर उल्लंघन मानली जाईल. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यासाठी, अशी दिशाभूल करणारी सामग्री तयार करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी जबाबदार असलेल्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली जाईल. समितीच्या निष्कर्षांवर आधारित, कठोर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल. भविष्यात असे कोणतेही गैरवर्तन झाल्यास अशाच उपाययोजना लागू केल्या जातील असे सांगण्यांत आले. या पञकार परिषदेला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे, विजय वाघमारे, एम ओ पाटील, दादासाहेब गायकवाड, रेखाताई सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, ॲड . पोतदार, ॲड. सगर, मधुकर यादव, विजय दगडे, बाबा मस्के, विशाल काणेकर, सोहेल इनामदार यांची प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धाराशिव येथे रक्तदान शिबिर
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज धाराशिव येथे सामाजिक समरसता मंच, केसरीया प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात अनेक महिला, पुरुषांनी तसेच युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. सोलापूर इथल्या डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात धाराशिव शहरातील जवळपास 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केसरीया प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर हर्षल डंबळ,सामाजिक सद्भाव विभागाचे एडवोकेट सचिन सूर्यवंशी, सामाजिक समरसता मंचाचे तुकाराम डोलारे,शंकर शेटे,राजेंद्र कापसे, यशवंत शहापालक, श्रीबल कांबळे, सचिन केंगार,कृष्णा मसलेकर, शशांक ढेंबरे, निखिल शेंडगे, अर्जुन बारंगुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सिद्धीविनायक सोसायटीतर्फे खामसवाडी येथे माती-पाणी परीक्षण केंद्राचे उद्घाटन
धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक मृदा दिनानिमित्त श्री सिद्धीविनायक सोसायटी धाराशिव यांच्या वतीने खामसवाडी येथे माती व पाणी परीक्षण संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य तपासणीसाठी अत्यावश्यक आणि वैज्ञानिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या केंद्रात मातीतील पोषकतत्त्वांचे विश्लेषण, पाण्याची गुणवत्ता तपासणी, संतुलित खत व्यवस्थापन, तसेच पिकउत्पादन वाढीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन अशा सेवा अल्प दरात देण्यात येणार आहेत. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी वैज्ञानिक विश्लेषण गरजेचे असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रयोगशाळा प्रमुख चंद्रशेखर गाडेकर यांनी माती परीक्षणाचे फायदे सांगितले. कार्यक्रमास श्री सिद्धीविनायक परिवारातील गजानन पाटील, प्रयोगशाळा प्रमुख चंद्रशेखर गाडेकर, बलराम कुलकर्णी, तसेच गावातील शेतकरी अनिल शेळके, नाना भुतेकर, विश्वास कोकणे, श्रीनिवास झोरी, विजयकुमार झोरी, राजेश गरड, सादिक सय्यद, श्रीमंत शेळके, सतिश वैदय, निशिकांत महाजन, सुशीलकुमार पारील, दत्तात्रय शेळके, महेश शेळके, श्रीमंत पाटील, प्रशांत सुरवसे, सुशिल यादव, कुलदीप सावंत, विकासकुमार झोरी, उध्दव शेळके, दत्ता जोशी यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
फोंडाघाट दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या
अवघ्या 5 दिवसांत लावला छडा प्रतिनिधी कणकवली कणकवली पोलीस ठाण्यात 30 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तृप्ती लिंग्रस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार अज्ञात इसमानी लिंग्रस यांच्या घरात दरोड्याच्या उद्देशाने बळजबरीने घुसले. लिंग्रस यांच्या मानेला पकडून तिला बेडवर पाडून तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका चोरट्याने तृप्ती हिची आई ओरडू नये म्हणून तिचे [...]
Grok चा धोका! युजर्सची वैयक्तिक माहिती होतेय लीक, सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
जगभरात एआयचा वापर झपाट्याने वाढत असला तरी त्याचे धोकेही आता समोर येऊ लागले आहेत. एलन मस्क यांच्या एआय कंपनी xAI चा चॅटबॉट ग्रोक पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यापूर्वी ग्रोक एआयने काही यूजर्ससोबत चुकीची भाषा वापरली असल्याचे समोर आले होते. यानंतर एलन मस्क यांनी माफी मागितली होती. दरम्यान आता हा चॅटबॉट सामान्य लोकांच्या घराचे पत्ते, […]
शाकाहारी लोकांमध्ये B12 ची कमतरता; 47 टक्के हिंदुस्थानींना जाणवतो थकवा, जाणून घ्या कारण…
अलिकडे बदलत्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे, शरीरात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता सामान्य होत चालली आहे. विशेषतः व्हिटॅमिन बी १२, हा एक घटक आहे जो आपले डीएनए बनवण्यास आणि आपल्या पेशींसाठी ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो. शरीरात या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा आणि अशक्तपणा येतो. ही कमतरता विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये अधिक दिसून येते. व्हिटॅमिन बी १२ […]
सिगारेट, तंबाखू सहज उपलब्धता रोखण्यास हवी प्रतिबंधक व्यवस्था
खासदारसदानंदतानावडेयांचीराज्यसभेतमागणी पणजी : सिगारेट, तंबाखू यासारखी हानिकारण उत्पादने सहज उपलब्ध होऊ नयेत, यासाठी मजबूत प्रतिबंधक व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. जीएसटी भरपाई उपकर संपल्यानंतर तंबाखू उत्पादने स्वस्त होऊ नयेत, यासाठी ‘केंद्रीय उत्पादन शुल्क दुरुस्ती विधेयक 2025’ हे विधेयक आवश्यक आहे, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. ‘केंद्रीय उत्पादन शुल्क दुरुस्ती विधेयक 2025’ यावरील भाषणात [...]
Photo –सोनम कपूरने काळ्या रंगाच्या साडीत फ्लॉन्ट केले बेबी बम्प, फोटो होत आहेत व्हायरल
बॉलीवूड अॅक्ट्रेस सोनम कपूरने नुकतेच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिचे बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. सोनम कपूर तिचे सुंदर-सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने पुन्हा एकदा […]
दाबोळी, मोपा विमानतळांवर अडकले शेकडो प्रवासी
इंडिगोचीगोव्यातील31 विमानउड्डाणेरद्दझाल्यानेसंताप वास्को : दाबोळी विमानतळावर काल दुसऱ्या दिवशीही इंडिगो एअरलाईन्सचे शेकडो प्रवासी अडकून पडले. इंडिगोची गोव्यातील 31 विमान उड्डाणे काल दिवसभरात रद्द करण्यात आली. केवळ 7 विमानांनी उड्डाणे केली. विमानतळावर अडकून पडलेल्या हवाई प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचारी कमतरतेमुळे निर्माण झालेली समस्या सुटू न शकल्याने दाबोळी विमानतळावर काल शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही [...]
नाशिकच्या तपोवनमधील झाडांची कत्तल करण्याचं फर्मान सरकारने काढलं आहे. कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभं करायचं आहे आणि त्यासाठी झाडांचा खून करण्यासाठी सरकराने सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहे. सरकारच्या या दडपशाहीविरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमी, पत्रकार, कलाकार सर्वच एकवटले आहेत. सरकारच्या या जुलमी निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे. आम्हाला साधुग्राम हवा आहे, तपोवनही आम्हाला हवा आहे, पण भाजपच्या बिल्डर […]
युतीचा निर्णय घेण्यास काँग्रेसकडून टाळाटाळ
आरजीचेआमदारवीरेशबोरकरयांचीटीका पणजी : काँग्रेस पक्ष आज -उद्या करीत युतीचा निर्णय घेण्यास उशीर करत असल्याची टीका आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी केली आहे. युतीसाठी थांबून आम्ही मागे पडलो. अजून वेळ वाया नको म्हणून पक्षाने उमेदवार जाहीर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युतीबाबत आरजीपी लवकरच काय ते कळवेल, असा खुलासाही बोरकर यांनी केला आहे. युतीची वाट पाहून आम्ही [...]
पुण्यातील भाजप आणि अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीमध्ये गडबड घोटाळा सुद्धा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांमध्ये मारामारी सुरू आहे. आता बुथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा उद्योग सुरू आहे, असा घणाघात उद्धव […]
डिचोली पोलिसस्थानक देशात पाचव्या क्रमांकावर
सर्व निकषांमध्ये केली अव्वल कामगीरी : 17532 स्थानकांमधूनझालीनिवड डिचोली : केंद्र सरकारच्या गृह कल्याण मंत्रालयातर्फे देशभरातील उत्कृष्ट पोलिसस्थानक निवडण्यासाठी देशपातळीवर केलेल्या सर्वेक्षणात डिचोली पोलिसस्थानक पाचव्या क्रमांकावर आले आहे. हे सर्वेक्षण देशभरातील 17532 पोलिस्थानकांमधून करण्यात आले होते. या राष्ट्र पातळीवरील कामगिरीबद्दल डिचोली पोलिसस्थानकाचे तसेच निरीक्षक विजय राणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत [...]
घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा केला प्रयत्न, तिघांना अटक
फोंडाघाट येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या त्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने भिवंडी, ठाणे, नेरूळ आदी भागांतून अटक केली. तीन आरोपींना अटक करून एलसीबी शचे पथक शनिवारी सकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले. जगदीश श्रीराम यादव (25, भिवंडी), चनाप्पा साईबाणा कांबळे (50, ठाणे), […]
Pune Accident –लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ टेम्पो आणि कारची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू
गेल्या काही दिवसांमध्ये नवले पुलांवर झालेल्या भीषण अपघातांमुळे पुण्याचं नावं अपघातांच्या बाबतीत सध्या चर्चेत आहे. अशातच पुन्हा एकदा पुण्यातील लोणावळ्यात टेम्पो आणि एका कारचा धडकी भरवणारा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ शनिवारी (06 डिसेंबर 2025) सकाळी हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टेम्पो आणि कार […]
नेहरूंचे योगदान पुसण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे, सोनिया गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांवर टीका केली होती. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती की ‘बाबरी मशिदी’ची उभारणी सार्वजनिक निधीतून व्हावी. मात्र, सरदार पटेल यांनी तसे होऊ दिले नाही, असे विधान करून वाद ओढवला. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेस संतप्त झाली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी […]
Photo –महामानवाला उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, आमदार सुनिल शिंदे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, विभागसंघटक माजी महापौर श्रध्दा […]
इंडिगो प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहटले आहे. या संकटाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. याचिकाकर्त्यांकडून यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलाला त्यांच्या घरी बोलावले. उड्डाण रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय आणि मानवतावादी संकटाचा दावा करण्यात आला होता. […]
झोल मोमो ते बदामी हलवा…पुतिन यांच्यासाठी खास मेजवानी, राष्ट्रपती भवनात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हिंदुस्थान दौऱ्यावर आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा आहे. या दौऱ्यात पुतिन सुमारे 30 तास हिंदुस्थानात होते. यामुळे व्लादिमीर पुतिन यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदी यांनी एका खाजगी मेजवानीचं आयोजन केले. या मेजवानीचे मेन्यू कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रपती भवनात शुक्रवारी पुतिन त्यांच्या सन्मानार्थ […]
दुसऱ्या दिवशीही बेळगावची विमानसेवा कोलमडली
दिल्लीसहसायंकाळचीबेंगळूरफेरीरद्द बेळगाव : इंडिगो कंपनीच्या देशभरातील विमान सेवेवर परिणाम जाणवत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बेळगावच्या विमानसेवेलाही फटका बसला. शुक्रवारी दिल्ली-बेळगाव व सायंकाळची बेंगळूर-बेळगाव विमानफेरी रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. सलग दुसऱ्या दिवशी ही परिस्थिती जाणवल्याने विमान प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या इंडिगोची सेवा गुरुवारी पुरती कोलमडली. देशांतर्गत व [...]
सुळगा-हिंडलगा येथे शॉर्टसर्किटने घराला आग
संसारोपयोगीसाहित्यआगीच्याभक्ष्यस्थानी बेळगाव : शॉर्टसर्किटमुळे सुळगा-हिंडलगा येथील एका घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली. एचईआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र, यामध्ये संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुळगा-हिंडलगा येथील मनोहर पाटील यांच्या मालकीच्या घरात संजय बबन जाधव [...]
तर कर्नाटकातील मंत्री, आमदारांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही
शिवसेना(उद्धवठाकरे) पक्षाचाइशारा: कोल्हापूरच्याजिल्हाधिकाऱ्यांनानिवेदन बेळगाव : बेळगावमधील मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन भरविले जात आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून म. ए. समितीकडून दरवर्षी महामेळावा घेतला जातो. या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी जाऊ नये यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जाते. अशाच प्रकारची बंदी जर यावर्षी लादली तर कर्नाटकातील एकाही मंत्री अथवा आमदारांना महाराष्ट्रात फिरकू [...]
शेट्टी गल्ली स्क्रॅप अड्ड्यातील चार मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी
बेळगाव : शेट्टी गल्ली येथील स्क्रॅप अड्ड्याला अचानक आग लागल्याने या दुर्घटनेत चार मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. शुक्रवार दि. 5 रोजी दुपारी दीडच्या दरम्यान ही घटना घडली असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. शेट्टी गल्लीत असलेल्या स्क्रॅप अड्ड्याला दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली. त्यामुळे [...]
चन्नम्मा चौक रस्ता रुंदीकरणाचा आराखडा तयार
महापालिका अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सर्कलला भेट देऊन केली पाहणी बेळगाव : राणी चन्नम्मा चौकातील आयलँड व लोखंडी अँगल हटवून रस्ता रुंदीकरण करण्यासंदर्भात मेजरमेंट तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांना केली होती. त्यानुसार शुक्रवारी महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चन्नम्मा सर्कलला भेट देऊन रुंदीकरणासंदर्भात मेजरमेंट [...]
हेडा प्लायवुड्सच्या नूतन शोरुमचे उद्घाटन
ग्राहकांनाजागतिकस्तरावरीलट्रेंडस्थानिकपातळीवरउपलब्धकरूनदेणेआपलेध्येय बेळगाव : प्लायवूड, लॅमिनेशन व इंटिरियर डेकोर सोल्युशन्समधील विश्वासार्ह नाव असणाऱ्या हेडा प्लायवुड्सच्या तिसऱ्या रेल्वेगेटनजीकच्या (हॉटेल नेटिव्हच्या बाजूला) नूतन शोरुमचे उद्घाटन शुक्रवारी थाटात करण्यात आले. केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, शरद पै, विजयकुमार हेडा, श्रीनारायण हेडा, आनंद हेडा, [...]
सावजी रसराज भोजनालय आजपासून सुरू
बेळगाव : बेळगावच्या रसिक खवय्यांच्या सेवेसाठी छत्रपती शिवाजी रोडवरील बेलचिक चिकनच्या शेजारी सावजी रसराज भोजनालय रुजू झाले आहे. गेल्या 23 वर्षांपासून खवय्यांची दाद मिळविलेल्या या भोजनालयाची वाटचाल गुणवत्ता आणि चविष्टपणा यामुळे वृद्धींगत होत राहिली आहे. विश्वनाथ झाड यांनी या नव्या वास्तूमधून हे भोजनालय सुरू केले असून त्यांना अमृत आणि प्रसाद या त्यांच्या मुलांचे सहकार्य लाभत [...]
लोककल्प फाऊंडेशनतर्फे कुसमळी-देवाचीहट्टीत चष्म्यांचे वितरण
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनतर्फे कुसमळी व देवाचीहट्टी या खानापूर तालुक्यातील गावांमध्ये चष्म्यांचे मोफत वितरण करण्यात आले. येथील ग्रामस्थांची नेत्रतपासणी केली असता त्यांच्या दृष्टीमध्ये दोष आढळून आल्याने हे चष्मे देण्यात आले. या मदतीबद्दल ग्रामस्थांनी लोककल्पला धन्यवाद दिले.
जीएसएस कॉलेज-अरिहंत हॉस्पिटलमध्ये एमओयु करार
बेळगाव : जीएसएस कॉलेजच्या पीजी मायक्रोबायोलॉजी विभाग आणि अरिहंत हॉस्पिटल, दीक्षित हेल्थकेअर प्रा. लि. यांच्यात प्रशिक्षण, अध्यापन व संशोधनासाठी महत्त्वपूर्ण अशा सामंजस्य करारावर (श्दळ) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी हृदयरोगतज्ञ व अरिहंत हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महादेव डी. दीक्षित होते. कार्यक्रमास एसकेईचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू, मायक्रोबायोलॉजी व इम्युनोलॉजी क्षेत्रातील तज्ञ किशोर भट, संस्थेचे व्यवस्थापन [...]
IndiGo ची उड्डाणे रद्द! सेलिब्रिटींनाही बसला फटका, सोनू सूदने व्यक्त केला संताप
‘नागरी विमान वाहतूक संचालनालयाने’ (डीजीसीए) सुरक्षेसंदर्भात लागू केलेल्या नव्या नियमांमुळे इंडिगो एअर लाइन्सच्या स्टाफने संप पुकारला. त्यामुळे ‘इंडिगो’ ची सेवा कोलमडली आणि विमान कंपनीसह प्रवाशांनाही मोठा फटका बसला आहे. सामान्य नागरिपांसून ते सेलिब्रिटींसह प्रत्येक जण सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहे. अभिनेता सोनू सूद, जय भानुशाली, राहुल वैद्य आणि अली गोनी यांसारख्या कलाकारांनी IndiGo […]
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात स्नोहभोजनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांना आमंत्रित करण्यात आले होते. शशी थरुर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावरून शशी थरुर काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत अनेक देशांना माहिती देण्यासाठी पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळात थरुर यांचा समावेश […]
पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंगोरी येथील इला हॅबिटॅट सेंटरमध्ये तीन दिवस ‘उलूक’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे विवेक खांडेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. विविध कलाकृतींसह व्याख्यान, कीर्तन, प्रवचन, कविता, चित्रप्रदर्शन, रांगोळी अशा कार्यक्रमातून घुबडांबद्दलचे पैलू आणि इतिहास उलगडण्यात आला.या महोत्सवात अनेकांनी आपल्या चेहऱयावर तसेच हातावर […]
अकोले तालुक्यात बालविवाहाचे भीषण वास्तव, तीन मुली गर्भवती; दोघींनी दिला बाळाला जन्म
तालुक्यात बालविवाह, लैंगिक अत्याचार आणि सामाजिक असुरक्षिततेचे गंभीर चित्र समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार तीन अल्पवयीन मुली गर्भवती असून, दोन कुमारी मातांनी बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील साकीरवाडी, पाचपट्टा, तिरडे आणि माळेगाव परिसरातील ही प्रकरणे असून, बालविवाह आणि लैंगिक अत्याचाराची वाढती उदाहरणे चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले […]
सिव्हिल हॉस्पिटल आवारातून मोटारसायकलची चोरी
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातून एका मोटारसायकलची चोरी झाली आहे. दि. 17 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.22 च्या दरम्यान ही घटना घडली असून चोरट्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मोटारसायकल मालक सतीश मल्लाप्पा मुतगेकर रा. श्रीराम गल्ली, कंग्राळी खुर्द हे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टोलवाटोलवी चालविली [...]
वडाप रिक्षाचालकांची रिक्षा बंद; पिरनवाडी येथे आंदोलन
पोलिसांनीतोडगाकाढूनमोर्चानकाढण्याचीविनंती वार्ताहर/मजगाव पिरनवाडी येथे वडाप रिक्षाचालकांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकांत रिक्षा बंद आंदोलन छेडण्यात आले. शुक्रवार दि. 5 रोजी सायंकाळी ग्रामीण भागातील रिक्षाचालकांनी अचानक रिक्षा बंद ठेवून खानापूर रोड महामार्गावरील छ. शिवाजी महाराज चौकात बहुसंख्येने एकत्र येवून शहरी रिक्षाचालक यांच्या विरोधात मोर्चा काढणार होते. सुमारे सायंकाळी 5 ते 6 दरम्यान ग्रामीणचे एएसआय माळगी व लक्कण्णावर [...]
दोन बैल लम्पी रोगामुळे खानापूर तालुक्यात मृत्युमुखी
नंदगड : खानापूर तालुक्याच्या गावोगावात लम्पी रोगाने थैमान मांडले आहे.त्यामुळे अनेक जनावरे आजारी असून आतापर्यंत दोन बैल मृत्युमुखी पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी भुरूणकी येथील शेतकऱ्यांच्या बैलाचा मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी कुणकीकोप गावातील परशराम रुद्राप्पा धबाले यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन्ही बैलांच्या मालकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खानापूर तालुक्यात दोन [...]
आज कारिवडे कालिका पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे | प्रतिनिधी कारिवडे ग्रामदैवत श्री देवी कालिका अर्थात काळकाई रवळनाथ पावणाई पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ६ डिसेंबरला होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कालिका देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. यानिमित्त [...]
शनिशिंगणापूर देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्याना अटक; बनावट ऍप, व्हीआयपी दर्शनातून भक्तांची फसवणूक
देशभर गाजलेल्या तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील बनावट ऍपद्वारे ऑनलाइन व्हीआयपी दर्शन, पूजा-अभिषेक व तेल चढावा यातून शनिभक्तांची फसवणूक झाल्याप्रकरणी पाच बनावट ऍपवर दाखल गुह्यात तब्बल पाच महिन्यानंतर देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्याना गुरुवारी (दि.4) रात्री सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या खात्यात एक कोटी रुपये चौकशीत आढळून आल्याप्रकरणी सायबर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. सचिन शेटे (रा. शनिशिंगणापूर), संजय पवार […]
ठाणे पालिकेने जाहीर केलेल्या मतदार यादीवर हरकती आणि सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. या प्रारूप मतदार यादीवर तब्बल अडीच हजार ठाणेकरांच्या हरकती, सूचना आल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक आक्षेप दिव्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान, ही दुबार नावे शोधण्यासाठी पालिकेचे कर्मचारी स्पॉटवर जाणार आहेत. आगामी महापालिकांच्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेच्या वतीने प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध […]
मालवण समुद्र किनारी ”अमूर ससाण्याला”जीवदान
युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेने केले रेस्क्यू मालवण | प्रतिनिधी मालवण येथील युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या सदस्यांनी मत्स्य लिलावाच्या ठिकाणी कावळ्यांच्या तावडीत सापडलेल्या अमूर ससाण्याची सुटका करत जीवदान दिले. मत्स्य लिलावाच्या ठिकाणी उमेश खांबोळकर यांना अमूर ससाण्याला कावळे बोचत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रमोद खवणेकर ,जगदीश तोडणकर ,भार्गव खराडे आणि अक्षय रेवंडकर यांनी अमूर [...]
देश विदेश –आंध्र प्रदेशातील तरुण आफ्रिकेतून बेपत्ता
आंध्र प्रदेशातील 26 वर्षीय तरुण आफ्रिकेतून बेपत्ता झाला आहे. रामचंद्रन असे या तरुणाचे नाव असून तो श्री सत्या साई जिह्यातील तालापुला मंडलचा रहिवासी आहे. गेल्या वर्षभरापासून तो आफ्रिकेत बोरवेल ऑपरेटरचे काम करत होता, परंतु 23 नोव्हेंबरपासून त्याचा संपर्क होऊ शकला नाही. रामचंद्रनचे अपहरण करून त्याला माली देशात नेण्यात आले आहे, अशी भीती त्याच्या कुटुंबीयाने व्यक्त […]
इंडिगो संकटात ट्रेन ऑन अॅकशन मोड; 37 गाड्यांमध्ये 116 डबे वाढवले, विशेष फेऱ्यांची सोय करणार
इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाल्यामुळे रेल्वेसेवा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेत विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. तसेच अनेक मार्गांवर गाड्यांमध्ये 116 अतिरिक्त कोच जोडण्याची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेने साबरमती आणि दिल्ली जंक्शन दरम्यान सुपरफास्ट विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार साबरमती-दिल्ली जंक्शन सुपरफास्ट विशेष […]
तपोवनातील एकाही झाडाला आम्ही हात लावू देणार नाही, अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनात असलेली 10 वर्षांच्या आतील झाडे तोडली जातील, जुनी झाडे ठेवली जातील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा पर्यावरणप्रेमी व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी साताऱ्यात खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे म्हणजे ‘पोरांना मारायचे अन् आई बापांना ठेवायचे,’ असे आहे. मात्र, आपले आई-बाप असलेल्या नाशिकच्या तपोवनातील […]
विरार इमारत दुर्घटनेत 17 बळी, वसई पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना अटक
विरार येथील विजयनगरमधील अनधिकृत इमारत कोसळून 17 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याप्रकरणी गुन्हे शाखेने वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्वीस यांना गुरुवारी मध्यरात्री अटक केली. ही इमारत कोसळल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी घडली होती. इमारत धोकादायक असल्याचे माहीत असूनही गोन्साल्वीस यांनी ती रिकामी केली नाही. त्यामुळे निष्पाप नागरिकांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागल्याने त्यांच्यावर अटकेची […]
विकासकामांच्या नावाखाली वृक्षवल्लीची कत्तल होणार, मनोरुग्णालयातील 724 झाडांवर कुऱ्हाड
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा वाद सर्वत्र गाजत असतानाच आता ठाण्याच्या ब्रिटिशकालीन मनोरुग्णालयाच्या आवारात असलेल्या 724 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. विकासकामांच्या नावाखाली वृक्षवल्लीची कत्तल होणार असल्याने शहरातील वृक्षप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली असून मनोरुग्णालयाच्या आवारातील हिरवाई नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाण्यातील मनोरुग्णालय हे अतिशय जुने असून तेथे […]
कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाच्या जवानांनी दिले 146 पशुपक्ष्यांना जीवदान
ऊन, वारा, पाऊस आदींची तमा न बाळगता सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अग्निशमन विभाग हा 24 तास तत्पर असतो. कधी आग लागल्याची तक्रार तर कधी घरात कोणी अडकलेय यासाठी फोन खणखणतो तेव्हा लगबगीने या विभागाचे जवान घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करतात. या विभागाने केवळ माणसांच्या तक्रारी नव्हे तर पशुपक्ष्यांवरदेखील दया केली आहे. गेल्या 11 महिन्यात कल्याण-डोंबिवली शहरातील 146 […]
बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याची गळचेपी थांबवा
मराठी भाषिक चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक हिवाळी अधिवेशन घेत आहे. याविरोधात लोकशाही मार्गाने महामेळावा घेऊन आपले अस्तित्व जपणाऱया मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय केला जात आहे. आताही दि. 8 डिसेंबरपासून बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होत आहे. नेहमीप्रमाणे मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली जात आहे. शिवाय महाराष्ट्रातील नेत्यांनाही बंदी केली जाऊ लागली आहे. […]
WBBL –आश्चर्यकारक! खेळपट्टीने गिळला चेंडू अन् सामना झाला रद्द; क्रिकेटच्या इतिहासातील विचित्र घटना…
Women’s Big Bash League चा थरार सुरू आहे. शुक्रवारी (5 डिसेंबर 2025) या स्पर्धेत एक अशी घटना घडली की ज्यामुळे सामना रद्द करावा लागला. एडिलेड स्ट्राइकर्सविरुद्ध होबार्ट हरिकेन्स यांच्यामध्ये सामना सुरू होता. एडिलेड स्ट्राइकर्सने प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या मोबदल्यात 167 धावा केल्या. मात्र, याच दरम्यान खेळपट्टीवर रोलर फिरवत असताना रोलरच्या खाली चेंडू आल्याने सामना […]
सुपरस्पेशालिटी रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा
भाजपच्याराज्यउपाध्यक्षरुपालीनाईकयांचीमागणी कारवार : येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात पहिल्यांदा तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा, एमआरआय आणि इतर अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करा आणि त्यानंतर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी या, असे आवाहन कारवार-अंकोलाच्या माजी आमदार आणि भाजपच्या राज्य उपाध्यक्ष रुपाली नाईक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केले आहे. त्या येथे पत्रकारांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, 22 [...]
राजा टाईल्स-करंबळ क्रॉस रस्त्याचे काम आराखड्यानुसारच
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते संजय गस्ती यांची माहिती : रस्त्याच्या कामाबाबत शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन खानापूर : शहरांतर्गत असलेल्या राजा टाईल्स ते करंबळ क्रॉस या रस्त्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजूर केलेल्या आराखड्यानुसारच होत आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. आराखड्याची प्रत मोर्चाच्या वेळी प्रमुख नेत्यांना देण्यात आली आहे. त्या आराखड्यात तरतूद [...]
पंचहमी योजना महिला सबलीकरणाचा पाया
अधिकाऱ्यांकडूनमाहिती: गुंजीतपंचहमीशिबिरासमहिलांचाउत्स्फूर्तप्रतिसाद वार्ताहर/गुंजी भारतीय संस्कृतीत महिलांना लक्ष्मीचे स्थान असल्याने महिलांना कर्नाटक सरकारने राबविलेल्या पंचहमी योजना महिला सबलीकरणाचा पाया असून महिलांनी त्याचा सदुपयोग करावा, असे उद्गार पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी काढले. शुक्रवारी गुंजी ग्रा. पं.हॉलमध्ये घेण्यात आलेल्या पंचहमी योजनेच्या परिशिलन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजी ग्रा. पं. अध्यक्षा स्वाती गुरव होत्या. स्वागतगीतानंतर [...]
नंदगड येथे हत्तींचा शेतीमध्ये धुमाकूळ सुरूच
पिकांची नासधूस : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वार्ताहर/हलशी नंदगड येथे हत्तींच्या कळपांनी गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, खानापूर तालुक्यात हत्तींनी हैदोस घातला आहे. हत्तींनी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या घरात भीतीचे वातावरण असून विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या हत्तींनी नंदगड परिसरातील भातपीक उद्ध्वस्त केले [...]
सूचना फलकांअभावी गतिरोधक बनताहेत वाहनचालकांसाठी मृत्यूचे सापळे
प्रवासी-नागरिकांतूनसंताप: अनेकवाहनधारकपडूनजखमीझाल्याच्याघटना वार्ताहर/उचगाव उचगाव-कोवाड या मार्गावर उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉस या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी घातलेले गतिरोधक व या ठिकाणी गतिरोधकचे कोणतेही फलक अथवा पांढरे पट्टे नसल्याने हेच गतिरोधक वाहनचालकांच्या मृत्यूचे सापळे बनल्याने प्रवासी व नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या गतिरोधकबाबतची अधिक माहिती अशी की, उचगाव फाटा ते बसुर्ते [...]
जी-5 या मैदानाचे नामकरण तीन वर्षांपूर्वी ‘आई एकविरा देवी मैदान’ असे करण्यात आले होते. तसा ठरावही प्रभाग समितीने केला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येदेखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले, पण अधिकृत ठराव झुगारून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या मैदानाचे नाव ‘आनंदनगर खेळाचे मैदान’ असे केल्याचे उघडकीस आले आहे. मैदानाचे नाव बदलल्यामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून हे नाव पूर्वीप्रमाणेच […]
‘ओहोटी’वेळी किल्ले सिंधुदुर्ग होडीसेवेवर परिणाम
बंदरजेटी, किल्ले सिंधुदुर्ग येथील गाळ उपसाची मागणी: ओहोटीवेळी किल्ले होडीसेवा ठेवावी लागतेय बंद: पर्यटनाला बसतोय फटका मनोज चव्हाण । मालवण मालवण बंदरजेटी येथे किल्ले होडी सेवेसाठी असलेल्या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिल्याने ओहोटीवेळी होडी सेवा बंद ठेवावी लागत आहे. पर्यटकांना बंदरजेटीवरून होडीमध्ये चढण्यासाठी आणि होडी पाण्यात राहण्यासाठी आवश्यक असलेली पाण्याची खोली गाळामुळे मिळत [...]
लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या शेतकऱ्यांना धोकादायक
काकतीशिवारातीलप्रकार: तातडीनेदुरुस्तीकरण्याचीमागणी बेळगाव : शिवारांमधील वीजवाहिन्या लोंबकळत असून विद्युतखांब कलंडले असल्याचे चित्र बेळगाव तालुक्यात सर्रास नजरेत पडत आहेत. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे शिवारांमध्ये वीजेचा धक्का लागून अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्याच्या दिवसात दुरूस्ती करणे अशक्य असते. परंतु किमान सध्या तरी दुरूस्ती करून जीवघेणे वीजखांब दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. काकती शिवारात अनेक ठिकाणी वीज [...]
मुंबई–गोवा महामार्गासाठी कोकणात पुन्हा जनआक्रोश; राज्यव्यापी आंदोलन सुरू
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जनआक्रोश समितीने पुन्हा एकदा व्यापक जनआंदोलन उभे केले आहे. ६ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार असून सुरुवात लोणेरे (ता. माणगाव, रायगड) येथून होईल. आंदोलनाची सांगता ११ जानेवारी रोजी संगमेश्वर (रत्नागिरी) येथे होणाऱ्या मोठ्या रास्ता रोको आंदोलनाने होणार आहे. गेल्या १७ वर्षांपासून महामार्गाचे काम रखडले […]
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयातून कार्य करावे
जि. पं. सीईओराहुलशिंदे: अधिवेशनासाठीनियुक्तकेलेल्याअधिकाऱ्यांचीबैठक बेळगाव : सोमवार 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. मागील अधिवेशन कोणत्याही समस्यांविना यशस्वीरित्या पार पडले. यंदाचे अधिवेशनही कोणत्याही त्रुटींशिवाय यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे आपले काम करावे. अधिवेशनासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयातून कार्य करावे. ज्या अधिकाऱ्यांना जी जबाबदारी दिली आहे, ती त्यांनी योग्यरित्या पार पाडावी. कोणत्याही चुका [...]
मनपातील आरोग्याधिकारी पद रद्द करू नये
माजीनगरसेवकविनायकगुंजटकरयांचीमागणी बेळगाव : कर्नाटक सरकारने महानगरपालिका तसेच नगरपालिकांमधील आरोग्याधिकारी पद रद्द केले आहे. तसेच महानगरपालिकेकडून चालविले जाणारे दवाखानेही बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न अधिकच तीव्र होणार आहेत. खासगी हॉस्पिटलवरील लोकांचा विश्वास उडाला असून राज्य सरकारने आरोग्याधिकारी हे पद रद्द करू नये, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे [...]
कोळगाव थडी घरफोडीप्रकरणी पाचजणांची टोळी गजाआड
कोळगाव थडी (ता. कोपरगाव) येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणातील पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल पाच लाख 20 हजार किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. मुख्य आरोपी कपिले राजू पिंपळे (वय 26) याच्यासह त्याचे साथीदार रोहित विशाल जगबंसी (ठाकुर), योगेश रवींद्र उदावंत, गडय़ा ऊर्फ सोनू दशरथ शिंदे, नंदू राजू पिंपळे अशी […]
आंध्रमधील 480 एकर जमीन अदानींना बहाल, चंद्राबाबूंची खैरात
उद्योगपती गौतम अदानींवर मोदी सरकार जमिनींची खैरात करत सुटले आहेत. प्रोजेक्टच्या नावाखाली मोठमोठे भूखंड अदानींना दिले जात आहे. या विरोधात तीव्र नाराजी आहे. अशातच आता चंद्राबाबू नायडू यांनीही अदानींवर मेहेरनजर दाखवत त्यांच्या कंपनीला 480 एकर जमीन मंजूर केली आहे. या जमिनीवर अदानी यांची पंपनी आणि रेडेन इन्पह्टेक पंपनी एकत्रितपणे मोठा डेटा सेंटर उभारणार आहेत. आंध्र […]
राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय परिसर पुन्हा गजबजला
बेळगाव : भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय परिसर पुन्हा गजबजू लागला आहे. शाळांच्या सहली, वनभोजन तसेच पर्यटकांकडून प्राणीसंग्रहालयाला पसंती दिली जात असल्याने हा परिसर गर्दीने फुलला आहे. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना पुन्हा एकदा प्राणी व पक्ष्यांचे विश्व जवळून पाहता येत आहे. प्राणीसंग्रहालयात वाघ, सिंह, अस्वल, मगर, हरिण, कोल्हे,विविध प्रकारचे पक्षी असल्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला [...]
गायमुख ते फाऊंटनदरम्यान मास्टिक अस्फाल्टचे काम, घोडबंदर रोड उद्या वाहतुकीसाठी बंद
घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटनदरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रविवार 7 डिसेंबर रोजी ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम करण्यात येणार आहे. त्याकरिता घोडबंदर रोड अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी तुकासाठी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवार मध्यरात्री 12 ते रविवार मध्यरात्री 12 या कालावधीत संपूर्ण रस्ता बंद राहणार आहे. यावेळी प्रवाशांची वाहतूककोंडी होऊ नये […]
कृषी उत्पन्न बाजार समिती ‘सेस’विरोधात कोल्हापुरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी सरकारच्या धोरणाचा व्यापाऱ्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला. ‘रद्द करा, रद्द करा… मार्केट सेस रद्द करा’, तसेच ‘जीएसटी कायदा सुटसुटीत करा’ असे फलक हातात घेऊन व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तहसीलदार (गृह शाखा) (जिल्हाधिकारी कार्यालय) स्वप्नील पवार यांना व्यापाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक […]
इनरव्हील क्लब बेळगावच्यावतीने वॉकेथॉन
बेळगाव : हिंसा होत असताना ती पाहणे म्हणजे हिंसेचाच एक घटक होणे, हिंसेचे चक्र मोडून काढत, तिचे इनरव्हील क्लब ऑफ बेळगावने शुक्रवारी सकाळी वॉकेथॉनचे संरक्षण करा, तिला सन्मान द्या. बदल आपल्यापासून करा, हिंसेला नाही म्हणा असे हिंसाविरोधी फलक हातात घेऊन इनरव्हील क्लब ऑफ बेळगावने शुक्रवारी सकाळी धर्मवीर संभाजी चौक ते राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत रॅली काढली. [...]
भाजपतर्फे 9 रोजी सुवर्णविधानसौधला घेराव
बेळगाव : सोमवार दि. 8 पासून कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावात सुरू होणार आहे. मात्र, सदर अधिवेशन म्हणजे गोव्याला पिकनिकसाठी आल्यासारखे होऊ नये, लोकांच्या मनात अशा प्रकारची भावना निर्माण होऊ लागली आहे. सरकारने उत्तर कर्नाटकावर अन्याय न करता इकडची विकासकामे कशा पद्धतीने राबवता येतील, याकडे लक्ष देऊन काम करावे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडेही दुर्लक्ष केले जात [...]
लंडनमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे!’
शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने लंडनच्या लीसेस्टर स्क्वायरमध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण शाहरुख आणि काजोल यांच्या हस्ते करण्यात आले. लीसेस्टर स्क्वायरमध्ये जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांची स्मारके उभारण्यात आलेली आहेत. त्यात आता शाहरुख-काजोल यांच्या पुतळ्याची भर पडली आहे. ‘दिलवाले दुल्हनिया…’ हा चित्रपट 20 ऑक्टोबर […]

27 C