के.आर.शेट्टी मंगाई,एवायसी संघ विजयी
साईराजचषकक्रिकेटस्पर्धा बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात डेपो मास्टर्सने एचएमडी स्पोर्ट्सचा, के. आर. शेट्टी मंगाई स्पोर्ट्सने माऊली स्पोर्ट्स देसूरचा, एवायसीने शक्ती बॅटरीजचा तर के. आर. शेट्टी मंगाई इलेव्हनने साईराज बी. चा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. विशाल गौरगौंडा, संतोष सुळगे पाटील, परशुराम, इंजमाम [...]
मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही आणि ट्रकचा भीषण अपघात, सात प्रवासी जखमी
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात शिवशाही आणि एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार माणगाव नजीक कलमजे जवळ शिवशाही बस आणि सीएनजी ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली असून मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रागा […]
बेळगावच्या 7 फुटबॉलपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : मध्यप्रदेशमधील उंबराय येथे होणाऱ्या एसजीएफआय 14 वर्षाखालील वयोगटाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावातील सेंट पॉल्सचा संघ कर्नाटक संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मध्यप्रदेशला रवाना झाला. या संघात बेळगावच्या सात खेळाडूंचा समावेश आहे. नुकत्याच बेंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगाव विभागीय संघाने विजेतेपद पटकाविले होते. या संघातील सात खेळाडूंनी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक संघात स्थान मिळविले [...]
Ahilyanagar news –काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण, मारहाण करून निर्जनस्थळी सोडलं
काँग्रेसचे अहिल्यागरमधील जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे बुधवारी सकाळी अपहरण करण्यात आले. त्यानंतर मारहाण करून त्यांना निर्जनस्थळी सोडण्यात आले. श्रीरामपूरमध्ये ही घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सातच्या सुमारास सचिन गुजर यांचे अज्ञात व्यक्तींनी चार चाकीतून अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर निर्जनस्थळी सोडून दिले. अपहरण आणि […]
अजयलमाणीमालिकावीर, विराजबी. सामनावीर बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ठळकवाडी संघाने भातकांडे संघाचा 6 गड्यांनी पराभव करून हनुमान चषक पटकाविला. अजय लमाणी मालिकावीर तर वीराज बी. सामनावीर ठरला. प्लॅटिनम ज्युबली मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गजाननराव भातकांडे संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद 103 धावा [...]
कपिलकुमारची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गौंडवाडचा मल्ल कपिलकुमार निलजकरने 45 किलो वजनी गटातील ग्रीक रोमनमध्ये सुवर्णपदक पटकाविल्याने त्याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयनगर होसपेट येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 45 किलो वजनी गटात कपिलकुमारने आपल्या पाचही कुस्त्या एकतर्फी जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत त्याने दावणगिरीच्या मल्लेशी [...]
आयआयटी बॉम्बेच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले. त्याचे मुंबई केले नाही हे चांगलेच झाले. यामुळे मी खूश आहे, असे संतापजनक वक्तव्य केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट लिहिल जितेंद्र सिंह यांच्यासह भाजपवर हल्ला चढवला. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह […]
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक- पालघरमध्ये शिवसेनेची प्रचारात आघाडी; ‘मशाल’च धगधगणार!
पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सर्वच प्रभागातील प्रचार फेरीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘मशाल’ धगधगणार असेच सर्वत्र वातावरण आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम पिंपळे यांना शहरवासीयांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेच्या वतीने प्रभाग १ मधून अरिफ कलाडिया, प्रभाग २ मधून देवेंद्र भोये, […]
वसईत क्लोरिन गळती; एकाचा मृत्यू, 13 जणांना बाधा, दोघांची प्रकृती गंभीर
वसई शहरातील गजबजलेल्या दिवाणमान परिसरात आज पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्वची दुरुस्ती सुरू असताना त्याचा धक्का क्लोरिनच्या टाकीला बसला. त्यातून विषारी वायूची गळती झाल्याने असंख्य नागरिकांचा जीव घुसमटला. या वायूची बाधा १३ जणांना झाली आहे. यातील देव पारडीवाला (५९) यांचा मृत्यू झाला आहे, तर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत. दिवाणमान येथे वसई-विरार महानगरपालिकेची […]
आजी ओरडली, बिबट्या पळाला, संकेत बचावला; कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे नऊ वर्षांचा चिमुरडा वाचला
थंडीचा कडाका असल्याने नऊ वर्षांचा चिमुकला संकेत पहाटे ६ वाजता अंगणात आला आणि शेकोटी पेटवू लागला. त्याला पाहताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुंपणावरून उडी मारून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण इतक्यात संकेतची आजी बाहेर आली. तिने जिवाच्या आकांताने ओरडाओरडा केला. या आकस्मिक आवाजाने बिबट्या भेदरला आणि पळून गेला. त्यामुळे चिमुकल्या संकेत भोयेचे प्राण बचावले […]
रोजच्या वाहतूककोंडीचा डोसक्याला ताप; 18 लाख ठाणेकरांकडे साडेसोळा लाख गाड्या
मुंबईच्या वेशीला लागून असलेल्या ठाणे शहराची ओळख वाहतूककोंडीचे शहर अशी होऊ लागली आहे. या कोंडीला रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि मेट्रोची अर्धवट कामे कारणीभूत असली तरी शहरातील वाढत्या वाहनसंख्येचाही इफेक्ट होऊ लागला आहे. साधारण १८ लाख लोकसंख्येच्या ठाण्यात तब्बल साडेसोळा लाख वाहने असल्याची आकडेवारी वाहतूक शाखेने जारी केली आहे. या कोंडीतून वेळेत इच्छितस्थळी पोहोचायचे असेल तर […]
हे करून पहा! स्टीलची बादली अशी करा चकाचक
अनेक घरांमध्ये पाणी साठविण्यासाठी स्टीलच्या बादल्या वापरतात. कालांतराने या बादल्यांवर काळे डाग, साबणाच्या फेसाळ पाण्याचा थर लागतो. काही घरगुती उपायांनी अशी बादली स्वच्छ होते. बादली पाण्याने धुतल्यानंतर डाग असलेल्या ठिकाणी दोन चमचे बेकिंग सोडा आणि पांढरे व्हिनेगर टाका. साधारणतः 10 मिनिटांनी बादली स्क्रबरने घासून घ्या. त्यानंतर बादली पुन्हा धुवा. लिंबू आणि मिठानेदेखील बादलीवरील डाग जाऊ […]
छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला प्रारंभ
ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याच्या वेढय़ातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही मावळ्यांसह किल्ले विशाळगड गाठला. त्या थरारक रणसंग्रामाचा अनुभव घेण्यासाठी येथील एनसीसी गट मुख्यालय यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आजपासून दि. 25 ते 4 डिसेंबरपर्यंत पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला सुरुवात झाली. महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महानिदेशक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी या मोहिमेस झेंडा […]
माकड पकडा, सहाशे रुपये मिळवा! वन विभागाची नवी योजना
बिबट्या आणि मानव संघर्षानंतर आता मानव माकड संघर्ष ऐरणीवर आला आहे. कोकणासह राज्याच्या विविध भागांत माकडांनी उच्छाद घातला आहे. त्यामुळे आता उपद्रवी माकडे पकडण्यासाठी वन विभागाने योजना आखली असून त्यानुसार माकड पकडणाऱ्याला सहाशे रुपये मिळणार आहेत. दरम्यान माकडांची नसबंदी करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारच्या बासनात अडकून पडला आहे. जंगलावर मानवाने अतिक्रमण […]
सरसकट कर्जमाफीचे आश्वासन हवेत! खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन अद्यापि पूर्ण न झाल्याने ‘यही समय है, सही समय है’ ही टॅगलाईन नेमकी कधी प्रत्यक्षात उतरणार, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. राज्यात वाढत्या शेतकरी, शिक्षक तसेच जलजीवन मिशनच्या कर्मचाऱयांच्या आत्महत्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कराडमध्ये सरकारवर टीका केली. […]
कोल्हे–विखे वाद जाहीर सभेत चव्हाट्यावर
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्येच खरी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून, भाजप आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय तणाव आता सार्वजनिक पातळीवर पोहोचला आहे. आज राष्ट्रवादीच्या प्रचार शुभारंभानंतर भाजपच्या प्रचाराची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्याच सभा मंचावर विवेक कोल्हे आणि विखे यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला. राष्ट्रवादीकडून आमदार आशुतोष काळे यांनी काका […]
महाविनाशकारी वाढवण बंदर लादण्यासाठी सरकारने आता दडपशाही सुरू केली आहे. जमिनी ताब्यात घेण्याकरिता आजपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून अधिकारी पोलीस फौजफाट्यासह डहाणू तालुक्याच्या वरोर गावात घुसले. ही बाब समजताच स्थानिक भूमिपुत्रांनी धाव घेऊन या सर्वेक्षणाला जोरदार विरोध केला. मात्र पोलिसी बळाच्या जोरावर सर्वेक्षण केल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. वरोरवासीयांनी आक्रमक होत […]
ओरी हाजीर हो…ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी
कोट्यवधीच्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी पकडलेल्या सालीम शेख याने बॉलीवूड कलावंतांची नावे घेतल्यानंतर पोलिसांनी आज अभिनेता शक्ती कपूर याचा मुलगा सिद्धांत कपूर याची चौकशी केली. त्यानंतर बुधवारी समाजमाध्यम एन्फ्लुएन्सर ओरी याची चौकशी होणार आहे. अमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने ओरीला 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता घाटकोपर येथील कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे. ओरीच्या चौकशीमध्ये […]
बॅण्ड बाजा बारात जोरात! विवाह सोहळ्यांवर साडेसहा लाख कोटी रुपये खर्च होणार
लग्नसराईचीधूम सुरू झाली आहे. देशभरात बँड, बाजा, बारात जोरात सुरू आहे. लग्न पहावे करून असे उगीच म्हटले जात नाही. लग्नसोहळा संस्मरणीय व्हावा म्हणून प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतो. यंदा 1 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत साडेसहा लाख कोटी रुपये विवाह सोहळ्यावर खर्च होतील, असा अंदाज ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने वर्तविला आहे. वस्तू […]
अनगर नगरपंचायत निवडणुकीचा आज फैसला
सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्ष निवडणुकीबाबत जिल्हा न्यायालयात उद्या (दि. 26) अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यान, मोहोळ नगरपरिषद व मैंदर्गी नगरपरिषदेतील दोन उमेदवारांचे अपिल न्यायालयाने फेटाळले आहे. अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयाने नामंजूर केल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल आहे. यावर दोन दिवस सुनावणी झाली […]
कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये एका राजकीय पक्षाच्या नगराध्यक्षपद व नगरसेवक पदांसाठी दाखल उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल अपीलावर सुनावणी झाली. कोपरगाव न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. डी. डी. आलमाले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांची भूमिका ग्राह्य धरत अपील फेटाळले. या प्रकरणातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सचोटी, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेची […]
रस्त्याच्या संथगती कामामुळे मोतीलाल नगरवासीय हैराण! शिवसेनेने पालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब
मोतीलाल नगर नं. 1 येथील रस्ता क्र. 4 च्या काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. गोरेगाव पश्चिम येथील म्हाडा वसाहतीतील रस्ता क्र. 4 चे काम संथगतीने सुरू आहे. वर्षभरापूर्वी सुरुवात करूनही काम पूर्ण झालेले नाही. हा रस्ता […]
टीईटी पेपरफुटी प्रकरण, मुख्य सूत्रधार भाजप पदाधिकाऱ्याचा भाऊ
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार आरोपी महेश गायकवाड हा भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. आपला भाऊ भाजपचा पदाधिकारी असल्यानेच आरोपी महेशचे धाडस वाढल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. शिक्षक म्हणून नोकरी मिळण्यासाठी, तसेच सेवेत असलेल्या शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असल्याने शॉर्टकट […]
पोलीस डायरी –क्राईम ब्रँचची दगडी इमारत काळाच्या पडद्याआड; दबदबा संपला! आता फक्त आठवणी!!
>> प्रभाकर पवार, prabhakarpawar100@gmail.com ज्या मुंबई क्राईम ट्रॅचचा आजही जगभरात नावलौकिक आहे, त्या क्राईम ब्रँचची एक शतकापेक्षाही (१९०९) अधिक काळ जुनी असलेली ऐतिहासिक तीन मजली इमारत येत्या काही दिवसांत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. या आयकॉनिक इमारतीचा काही भाग मोडकळीस आल्याने ही हेरिटेज इमारत पाडण्याचा व त्या जागी सर्व सुविधांनी युक्त अशी इमारत बांधण्याचा निर्णय देवेन […]
राज कपूर यांच्या बंगल्याची 100 कोटींना विक्री
कपूर कुटुंबाने नेटफ्लिक्सवरील ‘डायनिंग विथ द कपूर्स’ या विशेष कार्यक्रमाद्वारे चाहत्यांना त्यांच्या आयुष्याची झलक दाखवली. या कार्यक्रमात कुटुंबाने चेंबूरमधील देवनार कॉटेजच्या आठवणींनाही उजाळा दिला. कपूर कुटुंबीयांनी ही देवनार कॉटेज ही वडिलोपार्जित मालमत्ता 2019 मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजला 100 कोटींना विकल्याची माहिती दिली. या शोमध्ये राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांनी ही मालमत्ता विकण्यामागील कारण सांगितले. […]
गायक झुबीन गर्ग यांची हत्याच; आसामच्या मुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती
झुबीनगर्ग यांचा मृत्यू ही कुठलीही दुर्घटना नव्हती. गायक-अभिनेता झुबीन गर्ग यांची हत्या करण्यात आली. मंगळवारी आसामच्या विधानसभेत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हा धक्कादायक खुलासा केला. विरोधी पक्षाने झुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली. त्याचवेळी एक स्थगन प्रस्तावही आणण्यात आला. यानंतर याबाबत उत्तर देताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हे धक्कादायक […]
गुन्हे वृत्त –भाचीची विक्री करणाऱ्या मामा-मामीला अटक
नात्याला काळिमा फासल्याची घटना सांताक्रुझ परिसरात घडली. मामाने चक्क आपल्या भाचीची विक्री केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांना वाकोला पोलिसांनी अटक केली. लतीफ शेख, लॉरेन्स फर्नांडिस, मंगल जाधव, करण सणस आणि वृंदा चव्हाण अशी त्याची नावे आहेत. तक्रारदार महिला या सांताक्रुझ येथे राहतात. त्याची पाच वर्षांची एक मुलगी आहे. 22 नोव्हेंबरला रात्री ती […]
आईने दिली किडनी; 11 वर्षांच्या मुलाला जीवनदान
दिल्लीतील वीएमएमसी आणि सफदरजंग रुग्णालयाने किडनी प्रत्यारोपण क्षेत्रात ऐतिहासिक यश संपादन केले आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी येथे 11 वर्षीय मुलाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. सफदरजंग रुग्णालयातील हे पहिले बालवैद्यकीय किडनी प्रत्यारोपण असून देशातील कोणत्याही पेंद्रीय सरकारी रुग्णालयात झालेला हा पहिलाच पेडियाट्रिक किडनी ट्रान्सप्लांट मानला जात आहे. या मुलाला बायलेटरल हायपो-डिस्प्लास्टिक किडनी नावाचा दुर्मिळ […]
बिबटय़ांच्या उपासमारीला सरकार जबाबदार, वाघवर्धिनी संस्थेचा आरोप
बिबटे जंगल सोडून मानवी वस्त्यांमध्ये घुसण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुरेसे खायला मिळत नसल्याने भुकेने कासावीस होऊन बिबटे भक्ष्याच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडत आहेत. वन्य प्राण्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणे हे सरकारचे काम असते. त्यामुळे बिबटय़ांच्या उपासमारीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप बिबटय़ांच्या संरक्षणासाठी कार्यरत ‘वाघवर्धिनी’ सेवाभावी संस्थेने केला आहे. बिबटय़ांना जंगलातच पुरेशी शिकार मिळाली तर ते जंगलाबाहेर पाय […]
माटुंगा येथील रूपारेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सध्या गैरसुविधांचा सामना करावा लागत आहे. अनियमित व्याख्याने, वर्गखोल्या आणि पायाभूत सुविधांच्या समस्या, अस्वच्छ स्वच्छतागृहे, बंद लिफ्ट-पंखे, पाणी पुरवठय़ाचा अभाव आदी समस्यांमुळे विद्यार्थी हैराण आहेत. याबाबत शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत आज युवासेनेने महाविद्यालयावर धडक देत विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्याची मागणी केली. कॉलेजमध्ये सीएस, […]
गाड्याची क्रॅश टेस्ट आता आणखी कडक; सेफ्टी रेटिंगसाठी नवे नियम लागू होणार
केंद्रसरकारने कारची सुरक्षा मानके वाढवण्यासाठी क्रॅश टेस्ट आणखी कडक करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘भारत एनसीएपी 2.0’ आणण्याची तयारी सुरू केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नव्या नियमांचा मसुदा जारी केला आहे. ऑक्टोबर 2027 पासून हे नवीन आणि अधिक कडक क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल लागू होण्याची शक्यता आहे. नव्या नियमांमुळे आता कारची सेफ्टी रेटिंग काढण्याची पद्धत […]
असं झालं तर…वीज बिलावरील नाव बदलायचे असेल तर…
वीज बिलावरील ग्राहकाचे नाव बदलण्याची प्रक्रिया आता महावितरणने सोपी केली असून सात दिवसांच्या आत नावात बदल करण्यात येतो. काही कारणांमुळे मालमत्तेची मालकी बदलल्यास नावात बदल करावा लागतो. त्यासाठी महावितरणने मोबाइल अॅप आणि वेबसाईटवर सुविधा उपलब्ध केली आहे. अॅप किंवा www.mahadiscom.in या वेबसाईटवर लॉगिन करा. त्यात नमूद केलेल्या कारणाशी संबंधित आधार कार्ड, आधीचे वीज बिल, कराची […]
राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी नगराध्यक्षांसह सदस्यही बिनविरोध निवडून आल्याचे प्रकार घडले आहेत. यावेळी हे प्रकार जास्त प्रमाणात दिसत आहे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण […]
परभणीत भाजपचा शक्तिपात! चार नगर परिषदेत अध्यक्षपदाचा उमेदवारच मिळाला नाही
>> सुरेश जंपनगिरे जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवणाऱ्या भाजपला जिल्हय़ातील महत्त्वाच्या चार नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाचा उमेदवारच मिळाला नाही. जिल्हास्तरीय पदाधिकाऱयांमध्ये असलेली बेदिली, कार्यकर्त्यांवर दाखवलेला अविश्वास यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढण्याअगोदरच भाजपवर मैदानातून पळ काढण्याची नामुष्की ओढवली आहे. परभणी जिल्ह्य़ात पाथरीतून ‘कमळ’ हद्दपार झाले तर मानवत, पूर्णा आणि सोनपेठ या नगर परिषदांमध्ये ‘कमळ’ […]
स्मृती मानधनाच्या वडिलांना डिस्चार्ज
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना मंगळवारी सांगली येथील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची तब्येत आता स्थिर असून कोणताही धोका नाही. डॉक्टरांनी केलेल्या अँजिओग्राफीमध्ये कोणताही ब्लॉकेज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानधना कुटुंबाने मोठा निःश्वास टाकला आहे. दरम्यान, पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाच्या पुढे ढकललेल्या […]
उठाबशांमुळे नाहक बळी गेलेल्या आशिकाच्या मृत्यूची चौकशी, हायकोर्ट रजिस्ट्रारचे पोलिसांना आदेश
शाळेत यायला उशिर झाला म्हणून पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबशा काढायला लावल्याने सहावीत शिकणाऱया आशिका या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी मुख्य न्यायमूर्तीना पत्र लिहून एका वकीलाने केली आहे. याची गंभीर दखल घेत या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, असे निर्देश हायकोर्ट रजिस्ट्रारनी मीरा-भाईंदर तसेच वसई-विरार पोलीस आयुक्त व […]
गॅस सिलिंडर चिन्ह राखीव ठेवण्याची मागणी फेटाळली, वंचितने केली होती हायकोर्टात याचिका
गॅस सिलिंडर चिन्ह निवडणुकीत राखीव ठेवण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे. गॅस सिलिंडर चिन्हाचा मुक्त चिन्हांच्या यादीत समावेश केल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. वंचित बहुजन आघाडीने निवडणुक चिन्हासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी गॅस सिलिंडर या चिन्हा संदर्भात सक्षम […]
क्रिकेटनामा –आफ्रिकेने आपल्याला रखडवलं!
>> संजय कऱ्हाडे कोलकाता कसोटी लाजिरवाण्या पद्धतीने हरल्यानंतर गुवाहाटीची खेळपट्टी चित्रपटाची नायिका झाली होती! चर्चा फक्त तिचीच झाली. अन् तीसुद्धा सामन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत तशीच ठाकली. चिरतरुण! हिंदुस्थानी फलंदाजांसमोर मात्र तिने आपले नखरे दाखवले, नापं मुरडली. आपले फलंदाज काही तिला पटवू शकले नाहीत! ना पहिल्या डावात, ना दुसऱया डावात. दुसऱया डावात आतापर्यंत दोनच गडी बाद झालेत, […]
अयोध्येत डौलाने फडकला धर्मध्वज
राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामध्वजारोहण : सरसंघचालकांचीही मुख्य उपस्थिती वृत्तसंस्था/ अयोध्या अयोध्येतील जगप्रसिद्ध राम मंदिराच्या प्रांगणात मंगळवारचा दिवस इतिहासात कोरला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्मध्वज फडकविण्यात आला. हा धर्मध्वज मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रतीक मानले [...]
दक्षिण आफ्रिकेची ऐतिहासिक मालिका विजयाकडे वाटचाल! हिंदुस्थानवर क्लीन स्वीपच्या पराभवाचे संकट
दक्षिण आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानमध्ये कसोटी मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. अद्यापही 522 धावांची प्रचंड आघाडी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात विजयासाठी केवळ 8 फलंदाज बाद करायचे आहेत. दुसरीकडे क्लीन स्वीपच्या पराभवाचे संकट ओढावलेल्या यजमान हिंदुस्थानी संघावर उद्या दिवसभर फलंदाजी करण्याचे अवघड आव्हान असेल. दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या […]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस कामात चुका टाळा आरोग्य – कामामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नये आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे रखडण्याची शक्यता आहे कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म […]
भारतासमोर सामना वाचवण्याचे आव्हान
जिंकण्यासाठी 549 धावांचे भलेमोठे टार्गेट : चौथ्या दिवशी 2 बाद 27 धावा : आफ्रिकन संघ मालिकाविजयाच्या उंबरठ्यावर वृत्तसंस्था/ गुवाहाटी दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकन संघाने दिलेल्या 549 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दुसऱ्या डावात दोन्ही सलामीवीराच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 गडी गमावत 27 धावा [...]
तिसऱ्या सत्रात शेअरबाजाराचा बिघडला मूड
सेन्सेक्स 313 अंकांनी घसरला: आयटी निर्देशांक दबावात वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या सत्रात घसरणीसोबत बंद झाला. सेन्सेक्स 313 अंकांनी घसरत बंद झाला. मेटल, फार्मा यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले. मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 313 अंकांनी घसरत 84587 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 74 [...]
केंद्र, राज्यांना ‘सर्वोच्च’ कानपिचक्या
पोलीस स्थानकांमधील निकामी सीसीटीव्ही कॅमेरे वृत्तसंस्था/ नवी दिल्ली प्रत्येक पोलिस स्थानकामध्ये आणि त्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, या सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि अनेक राज्यसरकारे यांची कानउघाडणी केली आहे. आमचा आदेश केंद्र सरकार आणि इतर सरकारांना महत्वाचा वाटत नाही काय, अशी पृच्छाही न्यायलयाने [...]
वृत्तसंस्था / बेंगळूर 19 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या तिरंगी वनडे मालिकेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात वेदांत त्रिवेदीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारत ब ने अफगाणचा 2 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील भारत ब चा हा पहिला विजय आहे. या स्पर्धेत भारत ब संघाला यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांमध्ये अफगाण आणि भारत अ संघाकडून पराभव पत्करावा [...]
दीप्ती, क्रांती, श्रीचरणी यांना मोठे करार मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली गुऊवारी येथे होणाऱ्या महिला प्रीमियर लीग लिलावात लॉरा वोल्वार्ड आणि भारताची विश्वचषक नायिका दीप्ती शर्मा यांच्यासह आघाडीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या वाट्याला मोठे करार चालून येण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय खेळाडू क्रांती गौड आणि श्रीचरणी यांना खेचण्यासाठीही बोली युद्ध होण्याची शक्यता आहे. एकूण 277 खेळाडू, 194 भारतीय आणि 83 परदेशी, पहिल्याच मेगा लिलावात झळकतील. [...]
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणप्रकरणी येत्या शुक्रवारी पुन्हा सुनावणी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल यांनी या प्रकरणात वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य [...]
बद्रीनाथ धामचे दरवाजे हिवाळी ऋतूमुळे बंद
वृत्तसंस्था/ देहराडून उत्तराखंडच्या चमोली येथे अप्पर गढवाल भागात असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे मंगळवारी दुपारी 2:56 वाजता हिवाळी ऋतूमुळे बंद करण्यात आले. या प्रक्रियेमुळे यावर्षीच्या चारधाम यात्रेचा औपचारिक समारोप झाला. यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी अन्नकुटाच्या उत्सवादरम्यान गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केदारनाथ आणि यमुनोत्रीचे दरवाजे बंद करण्यात आले होते. यावर्षी भारत [...]
मीनाक्षी, काजोल, साक्षी यांना सुवर्ण
वृत्तसंस्था / जयपूर येथे सुरू झालेल्या 2025 च्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत गुरूनानक देव विद्यापीठाची महिला सायकलपटू मीनाक्षी रोहिलाने मंगळवारी पहिले सुवर्णपदक सायकलिंगमध्ये पटकाविले. महिलांच्या वैयक्तिक टाईम ट्रायल प्रकारात तिने हे सुवर्णपदक घेतले आहे. साक्षी पाडेकरने नेमबाजीत तर शिवाजी विद्यापीठाच्या काजोल सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकाविले. त्याचप्रमाणे या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या काजोल सरगरने महिलांच्या 48 [...]
रिलायन्सचा समभाग 16 महिन्यांच्या उच्चांकावर
मुंबई : शेअर बाजारातील भांडवलाच्या बाबतीत आघाडीवरची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाच्या भावाने सोळा महिन्यांच्या उच्चांकावर झेप घेतली आहे. एक महिन्यामध्ये समभाग 8 टक्के इतका वाढला आहे. कंपनीचा समभाग बीएसईवर एकावेळी 1560 रुपयांवर पोहोचला होता. 19 जुलै 2024 नंतर रिलायन्सचा समभाग सध्याला उच्चांकावर कार्यरत आहे. 8 जुलै 2024 रोजी कंपनीचा समभाग 1608 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला [...]
‘एसआयआर’विरोधात तृणमूलचे आंदोलन
भाजपसह निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जींचा हल्लाबोल : पक्षपातीपणाचा आरोप वृत्तसंस्था/ कोलकाता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. बोनगाव येथील एका एसआयआरविरोधी रॅलीत त्यांनी निवडणूक आयोग एक निष्पक्ष संस्था राहणे सोडून ‘भाजप आयोग’ बनल्याचा आरोप केला. एसआयआर प्रक्रियेवर नाराज असलेल्या ममतांनी भाजपला उघड [...]
थोडक्यात –द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचा जयंती सोहळा
विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गजांना घडवणारे व हिंदुस्थानचा गौरव वाढवणारे ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्या जयंती निमित्त 3 डिसेंबर रोजी विशेष सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या गेट क्र. 5 येथील आचरेकर स्मारकाजवळ सायंकाळी 5 वाजता हा सोहळा होईल. क्रिकेट जगतातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहून सरांना आदरांजली […]
वृत्तसंस्था / टोकियो डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात भारतीय नेमबाजांनी दर्जेदार कामगिरी करताना 16 पदकांची कमाई केली. तर मंगळवारी या क्रीडा प्रकारातील झालेल्या पुरूषांच्या 25 मी. रॅपीड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताच्या चेतन सपकाळला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात भारतीय नेमबाजांनी एकूण 39 पैकी 16 पदके काबीज [...]
नीलेश दगडे, लवीना ‘नवकिरण श्री’
अंधेरी चार बंगला येथील नवकिरण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी शरीरसौष्ठव स्पर्धेत पुरुष गटात नीलेश दगडे आणि महिला गटात लवीना नरोना ‘नवकिरण श्री’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन सदडेकर यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी प्रमोद कृपाळ, शशिकांत सावंत, […]
वृत्तसंस्था / चेंगडू ऑस्ट्रेलियन खुल्या आशिया पॅसिपीक वाईल्ड कार्ड प्ले ऑफ स्पर्धेच्या लढतीत भारताचा टॉपसिडेड टेनिसपटू सुमित नागलने चीनच्या मिंगहुई झेंगचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.मंगळवारी झालेल्या सामन्यात सहाव्या मानांकीत सुमित नागलने झेंगचा 2-6, 6-0, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. चेंगडूमधील ही स्पर्धा 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेतील पुरूष आणि महिला एकेरीच्या [...]
धारवाडसह राज्यात लोकायुक्त छापे
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी कारवाई : 10 अधिकाऱ्यांना दणका प्रतिनिधी/ बेंगळूर राज्यातील बेंगळूर, धारवाड, मंड्या, शिमोगा, म्हैसूर, बिदर, दावणगेरे आणि हावेरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या कारवाईत 10 भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. छाप्यात कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर स्थावर मालमत्ता, सोने आणि रोख रक्कम आढळली आहे. बेंगळूरमधील आरटीओ अधीक्षक कुमारस्वामी, मंड्या महानगरपालिकेचे सीएओ [...]
अॅपलचे सीईओ टीम कुक पुढील वर्षी निवृत्त होणार?
फोल्डेबल फोन शेवटचे उत्पादन असू शकते : वयाच्या 28 व्या वर्षी अॅपलमध्ये झाले होते सामील वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक हे पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये निवृत्ती घेणार असल्याची माहिती आहे. यावर त्यांच्या नेतृत्वाखाली टेक जायंट अॅपल 2026 मध्ये फोल्डेबल आयफोन लाँच करणार असून हे शेवटचे उत्पादन असू शकते अशी शक्यता आहे. 1998 [...]
19 वर्षांखालील एकदिवसीय तिरंगी क्रिकेट मालिका –हिंदुस्थान ‘ब’ संघाचा अफगाणवर विजय
वेदांत त्रिवेदीच्या 83 धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर हिंदुस्थान ‘ब’ संघाने मंगळवारी तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत अफगाणिस्तानवर 2 गडी राखून विजय मिळविला. या स्पर्धेत हिंदुस्थान ‘ब’ संघाचा हा पहिला विजय ठरला. याआधी या संघाने अफगाणिस्तान आणि हिंदुस्थान ‘अ’ संघाविरुद्ध तिन्ही सामने गमावले होते. अफगाणिस्तानकडून मिळालेले 203 धावांचे लक्ष्य हिंदुस्थान ‘ब’ संघाने 48.1 षटकांत 8 बाद 206 […]
इथिओपियन ज्वालामुखीची भारतालाही झळ
राखेचे ढग दिल्ली-मुंबईपर्यंत पोहोचले : विमान वाहतुकीवर परिणाम वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इथिओपिया देशाच्या हेली गुब्बी प्रदेशात दोन दिवसांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. जवळजवळ 10,000 वर्षांत पहिल्यांदाच इथिओपियामध्ये अशी घटना घडली. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राख आणि सल्फर डायऑक्साइडचा मोठा लोट आकाशात पसरला आहे. हीच राख आता भारतातील दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचल्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भारताच्या [...]
विश्वचषक : वेई यी –सिंदारोव्ह लढत टायब्रेकरमध्ये
वृत्तसंस्था/ पणजी फिडे बुद्धिबळ विश्वचषकात रशियाचा ग्रँडमास्टर आंद्रे एसिपेंकोने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबबोएव्हवर सलग दुसरा विजय मिळविला. दुसरीकडे, विश्वचषकाचा विजेता टायब्रेकरमधून ठरणार असून चीनचा वेई यी आज बुधवारी होणाऱ्या टायब्रेकरमध्ये उझबेकिस्तानचा दुसरा खेळाडू जावोखिर सिंदारोव्हविऊद्ध लढेल. या स्पर्धेत ‘फिडे’ ध्वजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एसिपेंकोने उपांत्य फेरीत वेई यीचा अडथळा पार न करता आल्यानंतर आपली [...]
निळ्या डोळ्यांच्या अपत्यासाठी…
आपण छान दिसावे, म्हणून बरेच प्रयत्न करत असतो, ही वस्तुस्थिती आहे. विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने, तेले, तर तो उपयोगात आणतोच. पण स्वत:वर शस्त्रक्रियाही करुन घेतल्या जातात. काही साधनांचा उपयोग करुन डोळ्यांचे रंग परिवतर्तीत पेले जातात. जे आपल्याला जन्मत: मिळालेले नाही, ते अशाप्रकारे कृत्रिमरित्या मिळविण्याचा आणि मिरविण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. तथापि, आपल्याला सुंदर मुले व्हावीत, यासाठी मातेने [...]
मणिपूरमध्ये शोधमोहीमेत शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त
वृत्तसंस्था/ इंफाळ मणिपूर पोलिसांनी गेल्या दोन दिवसात सीमा आणि संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली. सुरक्षा दलांनी चुराचंदपूर जिह्यातील बोल्नियो भागातून सात प्रक्षेपक लाँचर, 11 पंपी प्रक्षेपक एचई बॉम्ब, सात देशी बनावटीच्या रायफल, दोन पिस्तूल, मॅगझिन, जिवंत राउंड, बाओफेंग हँडसेट आणि नऊ बुलेटप्रूफ जॅकेटसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 25 [...]
महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘शक्ती’ वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तो दहा वर्षांचा होता. या वाघाला अपस्माराचे झटके आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज उद्यान प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला असला तरी मृत्यूची माहिती आठ दिवस जाहीर केली नसल्यामुळे उद्यान व्यवस्थापनाकडून देखभालीत हेळसांड झाल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत […]
संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील…तेही हातात तलवार घेऊन! उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची भांडुप येथील मैत्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत यांना तूर्त काही दिवस विश्रांती घेण्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार ते सध्या घरीच विश्रांती घेत आहेत. आज दुपारी दोनच्या […]
मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असूनही त्यावर हरकती नोंदवण्यास मुदतवाढ देण्यास निवडणूक आयोगाने एक पाऊलही पुढे टाकलेले नाही. हरकतींसाठी मुदतवाढ दिली नाही तर भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने निवडणुका फिक्स केल्या हे स्पष्ट होईल, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुंबईच्या प्रारूप मतदार यादीतील घोळावरून आदित्य […]
आयआयटी बॉम्बेच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले. त्याचे मुंबई केले नाही हे चांगलेच झाले. यामुळे मी खूश आहे, असे संतापजनक वक्तव्य केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे. आयआयटी मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात क्वाण्टम-तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड आदी विषयांवर भाष्य करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केले. आयआयटीच्या नावात तुम्ही बॉम्बे […]
माझ्याशी पंगा घ्याल तर तुमची पाळेमुळे उखडून फेकेन, ममतांचा भाजपला इशारा
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कमळीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. बोंगाव येथे सभेला जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर बुक केले होते, मात्र ऐनवेळी ते रद्द झाल्याचे ममतांना कळविण्यात आले. हा प्रकार म्हणजे राजकीय घातपात असून माझ्याशी पंगा घ्याल तर देशभरात तुमची पाळेमुळे हादरवून सोडेन, तुम्हाला उखडून फेकेन, असा इशारा ममता बॅनर्जी […]
मुंबईच्या यादीत एकाच मतदाराचे 103 वेळा नाव, 4 लाख 33 हजार मतदारांची नावे एकापेक्षा जास्त वेळा
मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत एकाच व्यक्तीचे तब्बल 103 वेळा नाव आढळले आहे. तर 4 लाख 33 हजार मतदारांची नावे एकापेक्षा जास्त वेळा असल्याचेही समोर आल्याने मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईत एकूण एक कोटी तीन लाख मतदार आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने निवडणूक मतदान प्रक्रियेसंदर्भात […]
महायुती सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद पडणार?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देण्याऐवजी महायुती सरकार त्या बंद करण्याच्या मागे लागले आहे. शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या सुमारे 600 शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसे झाल्यास 25 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा […]
चंद्रकांतदादा म्हणाले, तिजोरीची चावी नाही, तिजोरीचा मालक आमच्याकडे
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू असून, महायुतीच्या सत्ताधाऱ्यांमध्येच मतांसाठी निधीवरून जुंपल्याचे जाहीर प्रचारात पाहायला मिळत आहे. ‘तुमच्या हातात मत द्यायचे आहे, तर निधी द्यायचे माझ्या हातात आहे’, असा दम उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मतदारांना दिला होता. यानंतर कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याचा पुनरुच्चार केला. त्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य […]
लेख –भेसळखोर गुन्हेगारांना लगाम
>> सूर्यकांत पाठक अलीकडच्या काळात अनुचित खाद्य पदार्थाची प्रसिद्धी आणि लेबलिंग यांसारख्या गोष्टी वाढताना दिसत आहेत. चुकीचे ब्रॅडिंग, लेबलिंग या दोन्ही गोष्टी ग्राहकांच्या आरोग्याला हानीकारक आहेतच, पण व्यवसायाची प्रतिष्ठा आणि खाद्य उद्योगांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. अलीकडेच एफएसएसएआयने महत्त्वाचे पाऊल टाकत ‘ओआरएस’ या शब्दाचा गैरवापर होऊ नये यासाठी काही नियम निश्चित केले आहेत. सध्या भेसळयुक्त […]
मुद्दा –उत्पादन वृद्धी जोमात, पण…
>> अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात तसेच कमी वेळेत भरपूर उत्पादन होत असल्याची सध्या सर्वदूर चर्चा आहे, पण त्याचे परिणाम काय असतील? अशा उत्पादनातून रोजगार निर्मिती कमीत कमी होईल. म्हणजे हे जे ज्यादा आणि वेगाने झालेले उत्पादन आहे त्याला ग्राहकच मिळणार नाही. कारण रोजगार निर्मिती नाही […]
भुयारी मेट्रो मार्गिकेवरील सिद्धिविनायक स्थानकात मंगळवारी सकाळी एका ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ऐन गर्दीच्या वेळेस कफ परेडच्या दिशेकडील सेवा ठप्प झाली. जवळपास दहा मिनिटे गाडी स्थानकातच उभी राहिल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बिघाड दुरुस्त केल्यानंतर ट्रेन मार्गस्थ झाली. मात्र मागील सर्व ट्रेनचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. गेल्या महिन्यात सांताक्रुझजवळ मेट्रो ट्रेनमध्ये शॉर्टसर्किट झाले होते. […]
एसटीच्या प्रवासी थांब्यांवर झळकले ‘जय महाराष्ट्र’, महामंडळाच्या लोगोमध्ये तातडीने केली सुधारणा
एसटी महामंडळाच्या मुंबईतील प्रवासी थांब्यांवर अखेर ‘जय महाराष्ट्र’ झळकले आहे. जाहिरातदारांसाठी बसथांबे आंदण देताना महामंडळाने आपल्या लोगोमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख वगळला होता. त्यासंदर्भात दै. ‘सामना’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच एसटी महामंडळ ताळय़ावर आले आणि 24 तास उलटण्याआधी शहरातील बस थांब्यांवरील लोगोमध्ये सुधारणा करून ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख करण्यात आला. आठ वर्षांपूर्वी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी […]
राज्यातील न्यायालयांची अवस्था बघा, हायकोर्टाने सार्वजनिक बांधकाम विभागाला सुनावले
राज्यातील कनिष्ठ न्यायालयांच्या इमारतींची दुरवस्था झाली असून 100 वर्षे जुन्या इमारतींना हेरिटेज वास्तूचा दर्जा देण्यास दिरंगाई करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने आज फैलावर घेतले. न्यायालयाने 2017 साली याबाबत आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही, न्यायालयीन आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास खपवून घेणार नाही, राज्यातील न्यायालयांची जरा अवस्था बघा, असे फटकारत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने सरकारला […]
बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लक्षवेधी धरणे आंदोलनामुळे प्रशासन अखेर ‘अॅक्शन मोड’वर आले. सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या ग्रॅच्युईटीसह इतर थकीत देणी लवकरात लवकर देण्यात येतील, आवश्यक निधी मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका आयुक्तांसोबत आठवडाभरात बैठक घेतली जाईल, असे आश्वासन बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी मंगळवारी सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या शिष्टमंडळाला दिले. तसे लेखी पत्र मिळाल्यानंतर लक्षवेधी धरणे आंदोलन मागे […]
सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची 19 हजार कोटी थकबाकी
राज्याच्या तिजोरीत सध्या निधीची चणचण असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची बिले थकल्याने कंत्राटदार हवालदिल झाले आहेत. सरकारने आतापर्यंत 20 हजार कोटी रुपयांची बिले दिली आहेत. पण तरीही 19 हजार कोटी रुपयांची कंत्राटदारांची थकबाकी आहे. उर्वरित रक्कम देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे. विधानसभा […]
सोसायटीची नोंदणी करताना सविस्तर कारण नमूद हवे
गृहनिर्माण सोसायटीची नोंदणी करताना निबंधकाने त्याचे सविस्तर कारण नमूद करायलाच हवे, असे उच्च न्यायालयाने बजावले आहे. सोसायटी नोंदणीसाठी अर्ज आल्यानंतर निबंधकाने सर्व कागदपत्रांची पडताळणी करायला हवी. हा अर्ज मंजूर करताना किंवा नाकारताना त्याचे विस्तृत कारण द्यायला हवे. केवळ नोंदणीचे प्रमाणपत्र देऊ नये, असे न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले. सोसायटी नोंदणीला परवानगी देताना […]
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हिंदुस्थान आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्खेच 2026 दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्डकपमध्ये एकूण 20 संघ विजेतेपदासाठी झुंजताना दिसतील. या चार संघाची चार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. 7 फेब्रुवारी रोजी पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँडमध्ये सकाळी 11 वाजता […]
रत्नागिरीत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज 25 नोव्हेंबर रोजी आपला वचननामा पत्रकार परिषदेत जाहीर केला.रत्नागिरीत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारून आरोग्य विषयक सुविधा निर्माण करणार,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विद्यार्थी सहाय्यता योजना राबवणार, नगरपरिषद मालकीच्या इमारतीत सौर ऊर्जेचा वापर करणार,नगरपरिषदेची स्मार्ट शाळा उभारणार,विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना,माहितीच्या अधिकारासाठी ऑनलाइन प्रणाली,नागरिकांच्या तक्रारींचे 72 तासात निवारण करणार,युवकांसाठी रोजगार अशा विविध संकल्पना महाविकास आघाडीच्या […]
पंडित-क्षीरसागरांत वादाची ठिणगी, पवारांच्या भेटीने घड्याची टिकटिक मंदावली
बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये क्षीरसागर घराणे आणि पंडित घराण्याचा राजकीय वाद सर्वश्रूत आहे. त्यातच पंडितांनी बीडच्या राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरूवात केल्याने राजकीय समिकरणे बदलली. आणि त्याचा वचपा काढण्यासाठी जयदत्त क्षीरसागरांनी गेवराईत पंडितांच्या विरोधात आपले फासे फेकायचे सुरूवात केली. कालच त्यांनी भाजपाच्या बाळराजे पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या नव्या राजकीय समिकरणामुळे गेवराईत अजित पवार गटाला मोठा […]
गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले संकेत
सर्वसामान्य जनता आणि कर्जदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नव्याने कर्ज घेणाऱ्या किंवा घर, वाहन खरेदी करणाऱ्या किंवा वैयक्तिक कर्जाचे हप्ते (EMI) सुरू असलेल्या सामान्य नागरिकांचे ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक (RBI) या वर्षाच्या अखेरीस रेपो रेटमध्ये आणखी एक कपात करण्याची शक्यता आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेटबाबत संकेत दिले आहेत. पुढील […]
अजित पवार म्हणाले रामकृष्ण हरी, लोक म्हणाले वाजवा तुतारी…लक्षात आल्यावर दादांकडून सारवासारव
आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अजित पवारांचे आणखी एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत सारवासारव केल्याचे दिसून आले. नगरपरिषद निवडणुकांसाठी सोमवारी सभांचा धडाका लावलेला दिसून आला. आधी अंबाजोगाई आणि त्यानंतर बीडमध्ये सभा घेतली मात्र या सभेत बोलतांना ‘राम कृष्ण हरी’ असे म्हटल्याने समोरून वाजवा तुतारी असा प्रतिसाद मिळाला. मात्र ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित […]
भाजपला मुंबई विषयी असलेला सुप्त राग आणि द्वेष पुन्हा एकदा आला समोर आलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबईबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात जितेंद्र सिंग म्हणाले आहेत की, “आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई केले नाही, यासाठी मी देवाचे आभार मानतो.” जितेंद्र सिंग यांच्या या वक्तव्याने एक नवा वाद निर्माण […]
भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व - सोमनाथ गुरव
धाराशिव (प्रतिनिधी)- भुलथापा मारणे, हवेतल्या गप्पा करून जनतेला फसवणे एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व असल्याच शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे. यांचा 'विकास'हा फक्त कागदावरचा असून प्रत्यक्षात होणाऱ्या विकासाला आडकाटी आणणे ही राणा पाटील यांची ओळख आहे. यावेळी गुरव म्हणाले की, राणा पाटील यांनी त्यांच्या भविष्यातील शहर विकासाचे पाच ठळक मुद्दे मांडले. यामध्ये नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प सोडला पण ते कस देणार हे आपण सांगणार नसल्याच ते म्हणाले. म्हणजे पहिलाच मुद्दा हवेत गप्पा मारल्यासारखा झाला. दुसरा मुद्दा रस्त्याच्या जवळपास दीडशे कोटीच्या निधी बाबत व अन्य निधी आणण्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यावर गुरव म्हणाले मर्जीतल्या गुत्तेदारास रस्त्याचं काम मिळावं यासाठी वीस महिने प्रक्रिया याच राणा पाटलांनी राबवू दिली नाही.त्यामुळं शहरवासियांना झालेल्या त्रासाला फक्त तुम्ही जबाबदार आहात. निवडणुकीच्या तोंडावर अजून निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. शिवाय जे 140 कोटी निधी आणला म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेत आहेत आतापर्यंत हे रस्ते फक्त तुमच्या कमिशन साठी थांबवले असा याचा अर्थ निघतो. ज्या शहरात भुयारी गटार योजना राबवली जाते तिथं रस्त्यासाठी 500 कोटींचा निधी मिळत असतो. मात्र यांच्याकडून फक्त 140 कोटी एवढाच निधी शहरास मिळाला. म्हणजे शहराच्या हक्काच्या 360 कोटींचा निधी यांना आणता आला नाही हे यांचं कर्तृत्व असल्याच गुरव म्हणाले. तिसरा मुद्दा त्यांनी सफाई व कचरा डेपो च्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असं सांगितलं. त्यावर गुरव यांनी राणा पाटील यांना प्रतिप्रश्न केला 4 वर्ष प्रशासकाचा काळ असो की 2019 पर्यंत तुम्हीच इथं आमदार असो त्या अगोदरही सत्ता तुमचीच होती. मग तेवढ्या काळात तुम्हाला हा प्रश्न का सोडवता आला नाही शिवाय तुमचेच बगलबच्चे यांच्याकडे या कामाचं टेंडर होते. तुम्ही पुन्हा तेच करण्यासाठी सत्ता मागत आहात का? असा प्रश्न गुरव यांनी राणा पाटलांना विचारला. चौथा मुद्दा त्यांनी उद्यान निर्मितीसाठी पाच वर्षात 25 कोटींचा निधी आणतो म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्यामुळे यांनी तीन बगीचासाठी सात कोटी व आठवडी बाजारासाठी दहा कोटी असा बारा कोटीचा निधी मंजूर केला होता. महायुतीचे सरकारने सत्तेवर येताच या कामाना स्थगिती दिली. 2022 पासून आतापर्यंत तुम्हाला ही काम करणं का झालं नाही याचेही उत्तर राणा पाटील यांनी द्यावं असं आव्हान गुरव यांनी दिले आहे. पाचवा मुद्दा पारदर्शक प्रशासन आणणार ते जनतेनं जिल्हा परिषद व 2016 पर्यंत तुमच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेचा कारभार पाहिलेला त्यामुळं त्यावर तर आपण न बोललं बरं होईल असाही टोला सोमनाथ गुरव यांनी लगावला. डिसेंबर 2021 पासून पालिकेवर प्रशासक आहेत. महाविकास आघाडी सरकार जुलै 2022 पर्यंत होत. त्यानंतर पुन्हा राणा पाटील यांचीच सत्ता आहे. 2014- 2019 तेच धाराशिवचे आमदार होते. डिसेंबर 2016 ला पालिका निवडणूक झाली तेव्हापासून ऑक्टोबर 2019 पर्यंत तुम्हीच आमदार होतात. मग त्याकाळात आपण काय केलं? निवडणुकीच्या तोंडावर नुसत्या थापा मारायच्या व हवेत बोलायचं एवढंच तुमच कर्तृत्व असून विकासाची तुम्हाला किती तळमळ आहे हे जनतेला चांगल माहिती आहे.
सुजात आंबेडकर यांची धाराशिव येथे प्रचार सभा
धाराशिव (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी पक्षाचे युवानेते आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारां करिता प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. ही प्रचार सभा बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता क्रांती चौक भीम नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार सभेस या जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे. धाराशिव नगर पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेखा नामदेव वाघमारे , प्रभाग क्रमांक 6 मधून नामदेव बाबुराव वाघमारे , प्रभाग 8 मधून जयदीप जीवनराव दळवे, सोनल हुंकार बनसोडे, प्रभाग 14 मधून विजयाबाई प्रल्हाद नागटिळे, शितल दादाराव चव्हाण, प्रभाग 15 मधून महादेव एडके , क्षमा सिरसाठ निवडणुकीसाठी उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते सुजात आंबेडकर हे धाराशिव येथे येणार आहेत. ही सभा बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता क्रांती चौक भिम नगर येथे होणार आहे.या प्रचार सभेस या जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रातून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा- प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे
धाराशिव (प्रतिनिधी)- यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. ते एक स्वतंत्र्यसैनिक, राजकारणी, लेखक आणि उत्तम वक्ते होते. आपणाला यशवंतराव चव्हाण हे समजून घ्यावयाचे असतील तर त्यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र अभ्यासणे गरजेचे आहे.यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कृष्णाकाठ हे त्यांनी 1913 ते 1946 या कालावधीतील त्यांच्या आयुष्यावर आधारित लिहिलेले आहे.या ग्रंथाची पहिली आवृत्ती 7 फेब्रुवारी 1984 रोजी प्रकाशित झालेली आहे. हे आत्मचरित्र वाचून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा असे प्रतिपादन रामकृष्ण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मारुती लोंढे यांनी धाराशिव येथे बिल गेट्स महाविद्यालयात केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा धाराशिव यांच्यावतीने धाराशिव येथील बिल गेट्स महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा धाराशिव चे सचिव डॉ . रमेश दाबके हे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना. यशवंतराव चव्हाण यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाण यांच्यावर आईने केलेल्या संस्काराचा प्रभाव होता आणि म्हणून ते उत्तम राजकारणी होऊ शकले असे प्रतिपादन डॉ.रमेश दापके यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी शाखा धाराशिव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. जयसिंगराव देशमुख, सुरेखा जगदाळे , डॉ. तबसूब ॲड. विश्वजीत शिंदे, डॉ.तांबारे ,आदित्य गोरे आदीसह बिल गेट्स महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बिल गेट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरशद रझवी यांनी केले. तर आभार प्रा.ज्ञानेश्वर गिरी यांनी मानले.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या आठवणी उजाळ्यात by विद्याधर पिंपळे कोल्हापूर : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण देश भावूक झाला आहे. त्यांच्या कोल्हापूरशी जोडल्या गेलेल्या अनेक आठवणी आता [...]
धर्मेंद्र यांना अक्कलकोटला येण्याची होती इच्छा सोलापूर : बॉलीवूडचे प्रख्यात अभिनेता धर्मेंद्र हे अक्कलकोट येथे स्वामीसमर्थांच्या दर्शनासाठी येणार होते, मात्र सोमवारी त्यांच्या निधनाने त्यांच्या श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाची इच्छा अधुरी राहिली आहे. एकेकाळी बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्यांपैकी [...]
आईने दिली किडनी, किचकट शस्त्रक्रियेतून सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मुलाला दिले जीवदान
दिल्लीतील वीएमएमसी आणि सफदरजंग रुग्णालयाने किडनी प्रत्यारोपण क्षेत्रात ऐतिहासिक यश संपादन केले आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी येथे 11 वर्षीय मुलाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. सफदरजंग रुग्णालयातील हे पहिले बालवैद्यकीय किडनी प्रत्यारोपण असून, देशातील कोणत्याही केंद्रीय सरकारी रुग्णालयात झालेला हा पहिलाच पेडियाट्रिक किडनी ट्रान्सप्लांट मानला जात आहे. या मुलाला बायलेटरल हायपो-डिस्प्लास्टिक किडनी नावाचा दुर्मीळ […]

27 C