आरक्षण वर्गीकरणाबाबतचा प्रश्न विचारताच अजित पवारांची भंबेरी, घोषणांमुळे सभेत गोंधळ
कुठलीही व्यापारपेठ पाडायला अक्कल लागत नाही, तर ती उभी करायला अक्कल लागते, अशा शब्दांत विरोधकांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. विशेष म्हणजे ह्या सभेत असलेल्या जनसमुदायातील माधव अशोक गायकवाड याने आरक्षण वर्गीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करा, अशा घोषणा देत व प्रश्न करून अजित पवारांची भंबेरी उडविली. यामुळे काही वेळ सभेत गोंधळ उडाला. कंधार व लोहा […]
हिंदुस्थानच्या लेकींची कमाल, सलग दुसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक
हिंदुस्थानच्या लेकींनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली आहे. हिंदुस्थानच्या महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या महिला कबड्डी संघाने चायनीज तैपेईला ३५-२८ अशा फरकाने पराभूत केले. हिंदुस्थानच्या मजबूत संघासमोर चायनीज तैपेईने एक मोठे आव्हान उभं केलं होतं. परंतु हिंदुस्थानी कर्णधार रितू नेगी आणि उपकर्णधार पुष्पा राणा यांच्या […]
PHOTO –मतदार यादीतील गोंधळ तातडीने दूर करा, आदित्य ठाकरे यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट
मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदारयादीत झालेला गोंधळ तातडीने दूर व्हावा आणि संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष व्हावी, यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते ॲड. अनिल परब, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे, मनसे […]
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद, आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
बॉलीवूडचे ही मॅनने म्हणून ओळखले जाणारे आणि आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात कायमचं खास स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. X […]
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सबका साथ, सबका विकास उद्दिष्ट दिले आहे.नळदुर्ग शहराचा कायापालट करण्याचे आपले जे प्रयत्न चालू आहेत ते साध्य करण्यासाठी आपल्याला सबका विश्वास,सबका विश्वास आवश्यक आहे. त्यासाठीच आपण नळदुर्ग पालिकेसाठी समाजाच्या प्रत्येक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आजच्या प्रचार शुभारंभ रॅलीत मोठ्या संख्येने सगळ्या जाती धर्मातील नागरिकांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग हिच आपली खरी ताकद असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. नळदुर्ग पालिका निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भव्य पदयात्रा तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहर विकासाची सध्या सुरु असलेली घोडदौड पुन्हा कायम सुरु ठेवण्यासाठी नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला मोठया मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जाहीर सभेत बोलतांना केले. या सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे शहरातील वातावरण भाजमय झाल्याचे दिसुन आले. प्रारंभी बस्थानकासमोरील संविधान चौक ते किल्लागेट पर्यंत आमदार राणाजगजितसिंह यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये निवडणुकीतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराज धरणे, यांच्यासह सर्व २० नगरसेवकपदांचे उमेदवार, भाजपचे सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांची संख्याही मोठी होती. या रॅलीला अभुतपुर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रॅली संविधान चौकापासुन निघाल्यानंतर वाजत, गाजत लोकमान्य वाचनालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, शास्त्री चौक, भवानी चौक, चावडी चौक, क्रांती चौक मार्गे किल्ला गेट येथील जाहीर सभेच्या ठिकाणी आल्यानंतर रॅलीचे विसर्जन करण्यात आले. यानंतर जाहीर सभा पार पडली. रॅली सरु असतांना रस्त्यावरील मंदिर व दर्गाहमध्ये जाऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह बसवराज धरणे व सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी दर्शन घेतले. आता नळदुर्गला दररोज मुबलक.पाणीपुरवठा नळदुर्ग शहरात ४८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही काम पूर्ण होईल. त्यानंतर शहरवासियांना दररोज नियमित स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे. १५० कोटीपेक्षा अधिक निधी खर्चून शहरात रस्ते, गटारी, पथदिवे, व इतर मुलभूत सुविधा उभारल्या जात आहेत. स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेने आपण पाऊल टाकले आहे. अप्पर तहसिल कार्यालयही सुरु करण्यात आले आहे त्यामुळे शासकीय आणि प्रशासकीय सुविधा आता थेट जनतेच्या दारापर्यंत पोहचणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. नळदुर्ग शहरात महावितरणचे नविन उपविभागीय कार्यालय मंजुर झाले आहे. लवकरच ते कार्यान्वित होणार आहे. नळदुर्गच्या विकासाचा खरा प्रवास आता सुरु झाला आहे. तो कधीच थांबु नये यासाठी नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला विजयी करावे असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. आपण केलेली विकास कामे घेऊन मतदारांसमोर जात आहोत असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी नितीन काळे,विनायक अहंकारी, दत्तात्रय दासकर, बसवराज धरणे, रीजवान काझी, ज्ञानेश्वर घोडके,शिवाजी गायकवाड यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक अहंकारी यांनी केले. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन डुकरे यांनी आपल्या समर्थकांसह आमदार पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणुन तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य नितीन काळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, ॲड. दीपक आलुरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
एनव्हीपी शुगरच्या वतीने 1 लाख जागरी पावडर पोत्यांचे पूजन
धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि.च्या वतीने सन 2025- 2026 च्या द्वितीय गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 1 लाख जागरी पावडर पोत्यांचे पूजन तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याच्या माजी चेअरमन श्रीमती आनंदीदेवी पवन राजेनिंबाळकर व कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते दि.24 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. तसेच 24 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झालेल्या या कारखान्याच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जागजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील, विकास पाटील, सुनिल लोमटे, प्रविण पाटील, इ.इंजिनिअर प्रविण यादव, सुरक्षा अधिकारी मेजर चंद्रकांत पवार, परचेस अधिकारी रवि जोगदंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, दत्तात्रय टेकाळे, गोडाऊन किपर सुरेंद्र गिरी, राजाभाऊ केवळराम, बालाजी गुळवे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. एनव्हीपी शुगर प्रा.लि. या जागरी पावडर निर्मिती कारखान्याने सन 2025-2026 च्या द्वितीय गळीत हंगामात 25 हजार मेट्रिक उसाचे गाळप करून 1 लाख जागरी पावडर पोत्यांचे उत्पादन केलेले अतिवृष्टीसारख्या कठीण परिस्थितीत सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब व्यंकटराव पाटील यांनी दिली. एनव्हीपी शुगरला यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे गळीत हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऑक्टोंबर महिन्यात संत-महंतांसह सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु अतिवृष्टीमुळे ऊसफडात वाहने घेवून जाणे आणि तोडणी करताना अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली. या सर्व अडचणींवर चेअरमन नानासाहेब पाटील यांनी कुशल नियोजन करून गाळप हंगामाला सुरूवात केली. गळीत हंगामात कारखान्याच्या व्यवस्थापनातील प्रत्येकाने अहोरात्र परिश्रम करून 25 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. या हंगामात 1 लाख जागरी पावडर पोत्यांचे उत्पादन केले आहे. गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल चेअरमन नानासाहेब पाटील यांनी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक, सभासद, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार, तोडणी यंत्र ठेकेदार, तोडणी मजूर आणि सर्व सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
IND Vs SA 2nd Test –मार्को यान्सनचा भेदक मारा अन् 15 वर्षांनी घडला नवा विक्रम; टीम इंडिया बॅकफुटवर
गुवाहटी कसोटीवर दक्षिण आफ्रिकेने आपला दबदबा निर्माण केला आहे. दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून बिनबाद 26 धावा करत 314 धावांची आघाडी घेतली आहे. मार्को यान्सनच्या अचूक माऱ्यापुढे टीम इंडियाच्या फलंदजांचा निभाव लागला नाही. त्याने विकेट्सचा षटकार मारत विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव फक्त 201 धावांमध्ये संपुष्टात आला. […]
उत्तम आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोणते पाणी प्यायला हवे, वाचा
सकाळी उठून कोमट पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे आपल्या शरीरातील टाॅक्सीन बाहेर निघून जाण्यास मदत होते. तसेच त्याबरोबरीने आपल्या चेहऱ्यावरही ग्लो येतो. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने चयापचय वाढण्यास मदत होते. लिंबूमधील व्हिटॅमिन सी शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत करते. ते पचन सुधारते आणि चयापचय सक्रिय करते, ज्यामुळे हळूहळू वजन नियंत्रित करण्यास […]
प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. हा गोंधळ आहे की, गुन्हा आहे, मला विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील गोधळावरून राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याद्यांमध्ये बदल न झाल्यास […]
Solapur : सोलापूरकरांची मागणी अखेर पूर्ण; ‘हायकोर्ट स्पेशल’ सोलापूर–कोल्हापूर बससेवा सुरू
सोलापूर–कोल्हापूर हायकोर्ट स्पेशल बसला उत्साहात शुभारंभ सोलापूर : सोलापूरकरांची मागील अनेक महिन्यांपासूनची अत्यंत महत्वपूर्ण मागणी प्रत्यक्षात उतरली आहे. कोल्हापूर येथे हायकोटचि खंडपीठ सुरू झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील नागरिक, वकील, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकारांना पहाटेच कोल्हापूरला जाण्यासाठी मोठी गैरसोय होत [...]
शिवसेना उबाठा गट-काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा आरंभ
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आघाडीने आज प्रचाराचा नारळ फोडत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीताताई सोमनाथ गुरव यांच्यासह आघाडीतील सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी नाराजी दूर सारून प्रचार मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रचाराच्या आरंभी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, विश्वास शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, पंकज पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह आघाडीचे सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थिर कारभारासाठी आघाडीच्या उमेदवारांना एकदिलाने निवडून द्या, असे आवाहन यावेळी मान्यवरांच्या वतीने करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.शहराचे दैवत धारासुर मर्दिनी देवी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी रहे.यांच्या दर्गामध्ये मान्यवरांनी फुलांची चादर अर्पण करून आशीर्वाद घेतले. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यामुळे आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. धाराशिवमध्ये शिवसेना उबाठा गट आणि काँग्रेसची आघाडी झाली असून, या आघाडीचा जाहीर प्रचार सुरू झाला आहे. यापूर्वी प्रत्येक उमेदवारांनी थेट मतदारांपर्यंत जाऊन भेटीगाठी सुरू केल्या आहेत. एकंदर उद्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल अशी स्थिती आहे.
Solapur : ऊसाला 4000 चा दर जाहीर करा ; सोलापुरात ऊस आंदोलन पेटले !
शेतकरी संघटनेचे निमजाई कारखान्यात ठिय्या आंदोलन सोलापुर : शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली 20 नोव्हेंबर रोजी ऊसाला पहिली उचल 4000 द्या व दर जाहीर केल्याशिवाय राज्यातील साखर कारखान्यांनी उसाचे गाळप करू नये यासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री व [...]
धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, चाहते भावूक
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी दाखल झाले आहेत. तर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. धर्मेंद्र यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द नेहमी संस्मरणीय राहील. धर्मेंद्र यांनी 300 […]
Solapur : वांगी गावात 24 तासांत दोन युवकांची आत्महत्या; परिसरात हळहळ
वांगीत दोन युवकांच्या आत्महत्यांनी खळबळ अंत्रोळी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात अवघ्या २४ तासांच्या अंतराने दोन युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग दोन घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिली घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी उघडकीस [...]
वाठारमध्ये श्रमदानातून वनराई बंधारा बांधणी; जलसंधारणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
वाठार ग्रामस्थांनी श्रमदानातून मोरे ओढ्यावर बांधला वनराई बंधारा वाठार : उपक्रमशील दृष्टिकोन ठेवून संस्कृतीचा वसा घेऊन समृद्धीकडे गावाने वाटचाल करावी, या उद्देशाने कराड तालुक्यातील वाठार ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री समुद्ध पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून गाव शिवारातील मोरे ओढा येथे वनराई बंधारा बांधला. अभियानात [...]
निवृत्त झाल्यावर माजी सरन्यायाधीश गवई यांनी सोडली ही सरकारी सुविधा, नवा आदर्श केला प्रस्थापित
सोमवारी सूर्यकांत यांनी भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील समारंभात न्यायमूर्ती सूर्यकांत यांना शपथ दिली. त्यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. या दरम्यान माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी निवृत्तीनंतर मिळालेली सरकारी सुविधा त्वरित सोडून एक नवा आदर्श प्रस्थापित केला. माजी प्रधान न्यायाधीश बी. आर. गवई यांनी आपल्या उत्तराधिकारी […]
Satara : राष्ट्रीय महामार्ग विभागाचा रात्री अंधार, दिवसा उजेड!
विद्यानगर–ओगलेवाडी महामार्गावरील स्ट्रीटलाईट बंद कराड : विद्यानगर-ओगलेवाडी महामार्गाच्या दुभाजकात बसवण्यात आलेल्या स्ट्रीटलाईटच्या स्वयंचलित यंत्रणेत बिघाड निर्माण झाल्याने ही यंत्रणा दिवसा सुरू रहात असून रात्रीच्या वेळी बंद राहिल्याने महामार्गावर अंधाराचे साम्राज पसरत आहे. यातील निम्मे एलईडी लॅम्प बंद पडले आहेत. यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याच्या तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांतून [...]
Satara : पाचगणी शहरातील वाहतूक कोलमडली; ट्रक बंद पडल्याने पर्यटकांना अडचण
पर्यटक सिझनमध्ये पाचगणी शहरात वाहतुकीची संकुचित स्थिती भिलार : पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणी शहरात रविवारी वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला. मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अंतर्गत रस्त्यावर वळवण्यात आलेल्या मार्गावर अचानक एक ट्रक बंद पडल्याने संपूर्ण शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. पाचगणी येथील मुख्य रस्त्यावर दुरुस्तीचे [...]
चिपळूणमधील खेर्डी एमआयडीसीतील ‘श्री एम’ पेपर मिलला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
चिपळूण येथील खेर्डी एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘श्री एम’ पेपर मिल या खासगी कंपनीला आज दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप इतके भयंकर होते की, काही क्षणांतच कंपनीच्या आवारात आगीच्या ज्वाळा आणि आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. […]
Satara : वडगाव हवेलीत घुमला ‘चांगभलं’चा गजर
श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी रथयात्रा उत्साहात दुशेरे : वडगाव हवेली (ता. कराड) येथील कुलदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची रथयात्रा उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनी गुलाल-खोबऱ्याची उधळण करत ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’चा एकच गजर केला. श्रींच्या पालखीची डोंगराकडील मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली. प्रथेप्रमाणे यात्रेचा संपूर्ण मान [...]
इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला, हिजबुल्लाहच्या प्रमुख नेत्याचा खात्मा
मिडिल ईस्टमधील तणाव पुन्हा वाढला असून, इस्रायलने लेबनॉनच्या राजधानी बेरूतच्या दक्षिण उपनगरात हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या चीफ ऑफ स्टाफ हैथम तबताबाई याचा खात्मा झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हा हल्ला जूननंतर बेरूतवरील पहिला मोठा हवाई हल्ला असल्याचे सांगितले जाते. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानुसार, या हल्ल्यात पाच जण ठार आणि २५ जण जखमी झाले […]
Karad : कराडचे कृषी प्रदर्शन पालिका निवडणुकांमुळे लांबणीवर !
निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कराड कृषी प्रदर्शन लांबणीवर कराड : कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रतिवर्षी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन, कृषी महोत्सब आयोजित करण्यात येतो. मात्र यावर्षी नगरपालिका [...]
भाजपने प्रामाणिकपणे निवडणूक लढवल्यास त्यांची एकही जागा येणार नाही, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
जिथे हिंदु मुस्लीम चालत नाही तिथे भाजप भाषिक वाद घालतं आणि भाषेचेही वाद नाही चालले तर जातीत विष पेरतं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच भाजपने प्रामाणिकपणे निवडणूक लढवल्यास त्यांची एकही जागा येणार नाही, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते […]
‘एका युगाचा अंत …’ ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
बॉलीवूडच्या ही मॅनने 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांच्या राहत्या घरीच त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. परंतु सोमवारी 24नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही मॅनच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाची […]
ते दिलीपजींना मोठा भाऊ मानत होते…धर्मेंद्र यांच्या निधनावर सायरा बानो यांनी सांगितल्या खास आठवणी
बाॅलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधन झाले. त्यानंतर अभिनेत्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिवंगत अभिनेते दिलीप कुमार धर्मेंद्र यांना त्यांचा धाकटा भाऊ मानत होते. यामुळे धर्मेंद्र सायरा बानो यांना त्यांची वहिनी मानत असे. एनडीटीव्हीशी बोलताना सायरा बानो म्हणाल्या, “धर्मेंद्र यांच्या निधनाचे दुःख विसरणे कठीण आहे. दिलीप साहेब (दिलीप कुमार) त्यांना त्यांचा […]
ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलीवूडचा हिमॅन धर्मेंद्र यांचा वयाच्या 89 व्या वर्षी मृत्यू झाला. धर्मेंद्र यांच्यावर जुहू येथील पवनहंस स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अमिताभ बच्चन, सलमान खान, अजय देवगनसह अनेक दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभुमीत उपस्थित होते. अभिनेत्यांसह राजकीय नेत्यांनी सुद्धा धर्मेंद्र यांना ट्वीटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत […]
INS Mahe नौदलात दाखल! स्वदेशी ‘ASW-SWC’मुळे तटीय संरक्षण मजबूत
स्वदेशी बनावटीची आणि बांधणीची ‘माहे-क्लास’ अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC) प्रकारातील पहिली युद्धनौका आयएनएस ‘माहे’ (INS Mahe) हिंदुस्थानच्या नौदलात समाविष्ट (Commissioned) करण्यात आली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले. सोमवारी, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत INS Mahe नौदलात समाविष्ट करण्यात आली. INS Mahe हे कोचीन शिपयार्ड लिमिटेडने डिझाइन केलेले असून, या […]
Sangli : कुरळप गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; चार ते पाच जण जखमी
कुरळप गावात कुत्र्यांच्या चाव्यामुळे भीतीचे वातावरण कुरळप : (ता. वाळवा) करंजवडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चार ते पाच नागरिकांना चावा घेतला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांच्या बाबतीत फारच धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यानच्या काळात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त [...]
Mumbai News –घाटकोपरच्या पंतनगरमध्ये चाळीत आग, चार मुलांसह सहा जण जखमी
घाटकोपरमध्ये एका चाळीत आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या आगीत चार मुलांसह किमान सहा जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी झालेल्या सर्व सहा जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंत नगरमधील 90 फूट रोडवरील […]
मुंबईत ‘पाताल लोक’तयार करण्याचा प्लान –मुख्यमंत्री फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासावर बोलताना मुंबईत ‘पाताल लोक’ तयार करण्याचा प्लान असल्याची घोषणा केली आहे. ‘पाताल लोक’ (Paatal Lok) ही एका ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय हिंदी थ्रिलर वेब सिरीज आहे. भाजपच्या युथ कनेक्ट कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे जगभरातील लोक मुंबईत येत […]
धाराशिव शहरात महायुती संपुष्टात- सुधीर पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात भारतीय जनता पक्षाच्या जागा वाटपाच्या आडमुठया भूमिकेमुळे व नेत्यांच्या दुराग्रहामुळे धाराशिव शहर नगरपालिकेसाठी होणारी भाजपासोबतची होणारी महायुती आता संपुष्टात आली आहे. निवडणूक रिंगणात शिवसेना आपले 21 उमेदवार नगरसेवक पदासाठी उभा करणार आहे. नगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ नेते ज्या सूचना व निर्देश देतील त्याप्रमाणे निवडणूक रणनिती ठरविण्याता येणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी याबाबत के. टी. पाटील फार्मसी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित शिवसेना उमेदवारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार देखील उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सुधीर पाटील यांनी सांगितले की, मागील काही महिन्यापासून धाराशिव नगरपालिका निवडणुकीबाबत व महायुतीबाबत मुंबई येथे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील व पदाधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठकीनंतर नगरपालिका निवडणुकीत महायुती करण्याचे ठरले होते. परंतु प्रत्यक्ष जागा वाटपाच्या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेला नगण्य चार जागांची ऑफर दिल्याने व जागा वाटपाबाबत शिवसेनेला शेवट पर्यत गाफील ठेवल्याने ही युती संपुष्टात आल्याचे पाटील यांनी सांगितले. वास्तविक धाराशिवची जनता भाजपा व त्यांच्या विरोधातील उबाठा गटाच्या श्रेयवादाच्या व अडवणुकीच्या भूमिकेला कंटाळली आहे. त्यांच्या वैयक्तिक आकांक्षेच्या राजकारणापोटी जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीला व धाराशिव शहरातील रस्ते विकासाच्या निधीला ब्रेक लागला असून धाराशिवकर जनता या दोघांनाही कंटाळली आहे. त्यामुळे शिवसेनेने 21 नगरसेवक पदाच्या उमेदवारासह जनतेला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शहरातील जनता भाजपा व उबाठाच्या राजकारणाला कंटाळली आहे. त्यामुळे शिवसेना हा समर्थ पर्याय या निवडणुकीत जनतेस उपलब्ध झाला आहे. शिवसेना 21 जागांपैकी 15 ते 20 जागेवर आपले नगरसेवक निश्चित निवडून आणेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि नगराध्यक्ष पदाच्या भूमिकेबाबत वरिष्ठ नेते जे सूचना देतील त्या सूचनाचे पालन शिवसैनिक करतील अशी भूमिका त्यांनी मांडली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी शहरातील अकरा जागांची व आपण स्वतः दहा जागांची जबाबदारी घेतली असून या सर्व जागेवर शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी करण्यासाठी आपण आहोरात्र परिश्रम घेत असल्याचे सुधीर पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस नगरसेवक पदाचे उमेदवार प्रेमाताई सुधीर पाटील, अमरसिंह देशमुख, मुंडे यांच्यासह इतर उमेदवार उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला नवचैतन्य मिळणार असल्याचे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या कार्याचा गौरव करून, संघटनेला पक्षाच्या वतीने पुन्हा पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यस्तरावर हा सेल पुन्हा कार्यरत व्हावा यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांपर्यंत संघटनेच्या मागण्या पोहोचविण्यास स्वतः पुढाकार घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार विलास अण्णा सांजेकर, अण्णासाहेब गायकवाड,अक्षय साळुंखे तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चार्टर्ड विमानाच्या पायलटकडून क्रू मेंबर तरुणीवर अत्याचार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
चार्टर्ड विमानाच्या पायलटने क्रू मेंबर तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बेंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने बंगळुरू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पायलटविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित शरण असे आरोपी पायलटचे नाव आहे. पीडित क्रू मेंबर तरुणी आणि दोन पुरुष पायलट 18 नोव्हेंबर रोजी बेगमपेट […]
5 डिसेंबरच्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये प्राथमिक शिक्षक संघ सक्रिय सहभागी होणार- बाळकृष्ण तांबारे
कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षक विद्यार्थी व शाळा यांच्या प्रमुख मागण्यासाठी दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण राज्यामध्ये 2011 पूर्वी सेवेत दाखल शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट देणे (टी ई टी), जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांना 10,20,30 ची आश्वासित योजना लागू करणे, संच मान्यतेतील त्रुटी दूर करणे, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या थांबवलेल्या पदोन्नती त्वरित करणे, शिक्षकांना फक्त अध्यापनाचीच काम देणे यासह विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय लाक्षणिक संप व राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेला आहे. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघ व राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शिक्षक विद्यार्थी व शाळा यांच्या मागण्यासाठी होणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मारणे, शिक्षक संघटना समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर काठोळे, राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, राष्ट्रीय नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राष्ट्रीय महासचिव म. ज. मोरे, राज्य सरचिटणीस कैलास दहातोंडे, कार्याध्यक्ष किसनराव ईदगे, कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले, राज्यचिटणीस भक्तराज दिवाने, धाराशिव जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष आप्पाराव शिंदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष उत्तम वायाळ,राजेश हिवाळे छत्रपती संभाजीनगर, विजयकुमार गुत्ते लातूर, बाबुराव माडगे नांदेड, रामदास कावरखे हिंगोली, भगवान भालके जालना, भगवान पवार बीड,यांच्यासह राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मोहेकर महाविद्यालयातील मुलीं राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी पात्र
कळंब (प्रतिनिधी)- 19 वर्षाखालील मुलींच्या तालुकास्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धा विभागाच्या क्रीडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, कळंब येथे पार पडल्या होत्या. त्यामध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील मुलींच्या संघानी विविध विभागातून आलेल्या मुलींच्या संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची अहिल्यानगर - कोपरगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. त्यामध्ये रूपाली कुरंद, श्रावणी कुरंद, प्रांजली भराटे, साक्षी भराटे, वैष्णवी माळी, श्वेता मगर, संस्कृती गल्हार, दिप्ती शिंदे ,ऋतुजा लोंढे, दिव्या निंबाळकर, रूपाली कुणेकर, अपेक्षा जावळे या स्पर्धकाचा सहभाग होता. त्यांना क्रीडा मार्गदर्शक म्हणून सरस्वती वायभासे तसेच प्रा. निलेश माळी, राजाभाऊ शिंदे, अनिल शिंदे सरगव्हाणे, आदिंचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, उपप्राचार्य प्रा. जयवंत भोसले महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सत्कार केला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तुकाराम गंगावणे यांना जिवणगौरव पुरस्कार प्रधान
परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील जेष्ठ साहित्यिक ,विचारवंत तुकाराम गंगावणे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तर्फे रविवार दि.23 नोव्हेंबर रोजी पुणे येथे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलनात महात्मा फुले जिवणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे. साहित्यिक तुकाराम गंगावणे यांनी आपले आयुष्यभर जिवन साहित्य, समाजसेवा, अविरत कार्य केले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात मोलाचे काम केल्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी 19 वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नामवंत साहित्यिक किशोर टिळेकर, डॉ.चोरडिया, अवर सचिव राऊत, सुर्यकांत नामगुडे,यांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले जिवणगौरव पुरस्कार सहकुटूंब प्रधान करून सन्मानित करण्यात आले.त्याबद्दल तुकाराम गंगावणे यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
महाविस्तार ॲप शेतकऱ्यांच्या हातात डिजिटल कृषि ज्ञानाचे प्रभावी साधन
धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान,कृषि सल्ला आणि विविध योजनांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने विकसित केलेले महाविस्तार ॲप हे शेतकऱ्यांसाठी डिजिटल वरदान ठरत आहे. जिल्ह्यात 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत 5030 शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केले असून ही एक सकारात्मक बाब असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.शासनाने डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्येक गावातील किमान 20 टक्के शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून सक्रिय वापर करावा,असे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ॲपची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता : महाविस्तार ॲप हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित असून,शेतकऱ्यांच्या विशिष्ट ओळख क्रमांकाद्वारे लॉग-इन करून वैयक्तिक आणि शेतकरी केंद्रित सेवा पुरवते. मराठी एआय चैटबॉट शेतीसंबंधी प्रश्नांचे त्वरित निरसन करतो.हवामान अंदाज व बाजारभाव रिअल टाइममध्ये उपलब्ध होत असल्याने पेरणी, कापणी आणि विक्रीचे योग्य नियोजन करता येते.कृषी योजना,अनुदाने, विमा योजना यांची सविस्तर माहिती एका व्यासपीठावर मिळते.पीक व्यवस्थापन,खत नियोजन,कीड-रोग नियंत्रण व आधुनिक शेती पद्धतीवरील मार्गदर्शक मराठी व्हिडिओही उपलब्ध आहेत. उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी विभागाची मोहीम शासनाने निश्चित केलेले 20 टक्के डाउनलोडचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी विभाग सक्रिय झाला आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी सर्व उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुकास्तरावरील यंत्रणेला प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत गावांमध्ये प्रात्यक्षिके व जनजागृती मोहिमा,कृषि सेवा केंद्रे, कृषि सखी आणि कृषिताई यांच्या माध्यमातून गट तयार करणे,ॲपचा सक्रिय वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार,व्हॉट्सॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसार अशा उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की,प्ले स्टोअरवर महाविस्तार ॲप किंवा महाविस्तार ॲप एआय शोधून ते डाउनलोड करावे आणि आपल्या ओळख क्रमांकाद्वारे लॉग-इन करून सेवा व सल्ल्यांचा लाभ घ्यावा. शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी या ध्येयाने प्रेरित होत. महाविस्तार ॲपच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याने डिजिटल क्रांतीचा भाग व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
धाराशिव (प्रतिनिधी)- आरोग्य विभागाच्या विविध समित्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका 20 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आल्या.या सभेत जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, डॉ.सतीश हरिदास जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.धनंजय चाकूरकर जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.मारुती गोरे,सहाय्यक संचालक (कुष्ठरोग), डॉ.अभिजीत बनसोडे,जिल्हा क्षयरोग अधिकारी,डॉ.के.के.मिटकरी,जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, डॉ.सुशील चव्हाण,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमजान शेख,वैद्यकीय अधिकारी श्री.आर.बी.जोशी, प्रशासकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सास्तुर तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय प्रमुख,सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीत मुख्यत्वे खालील समित्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये रुग्ण कल्याण समिती (जिल्हा रुग्णालय धाराशिव),जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी,आपत्कालीन वैद्यकीय सेवा (108), पी.सी.पी.एन. डी.टी.सल्लागार समिती,तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती, आर.के.एस समिती,प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जिल्हास्तरीय लसीकरण टास्क फोर्स,15 वा वित्त आयोग,जन्म-मृत्यू नोंदणी समन्वय समिती, अनधिकृत वैद्यकीय व्यावसाय (बोगस डॉक्टर) शोध समिती व राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमचा आढावा घेण्यात आला. बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रगती,मातृ-मृत्यू व बाल-मृत्यू दर कमी करण्यासाठीचे उपक्रम,कुपोषण निर्मूलन मोहिमेची स्थिती,प्राथमिक व ग्रामीण आरोग्य केंद्रांतील सुविधा,रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सद्यस्थिती, तसेच डेंग्यू,मलेरिया,क्षयरोग,कुष्ठरोग आदी आजारांविरोधातील उपाययोजना या सर्वांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.सुधारणा आवश्यक असलेल्या बाबींवर मार्गदर्शनही करण्यात आले. या सभेमध्ये जिल्ह्यातील आरोग्य संस्था-निहाय टीबीमुक्त भारत अभियानाचा देखील आढावा घेण्यात आला.यात 2 लाख 83 हजार 174 जोखीमग्रस्त लोकसंख्येची निक्षय पोर्टलवर नोंदणी करायची असून 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत एक लाख 15 हजार 444 एवढी नोंदणी पूर्ण झाली आहे.तसेच 44 हजार 613 एक्स-रे झालेल्या व्यक्तींची नोंदणी निक्षय पोर्टलवर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागांमध्ये संशयित क्षयरुग्ण शोधण्याचे काम उद्दिष्टानुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या हस्ते दोन क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यात आले.क्षयरुग्णांच्या पोषणासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले. बैठकीच्या शेवटी,जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या उन्नतीसाठी पुढील कालावधीसाठी सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Sangli : ताकारी सिंचन योजनेतील पंप हाऊसवर कारभार रामभरोसे; कर्मचाऱ्यांची अनुपस्थित
सिंचन योजनेचे आवर्तन १ डिसेंबरला नियोजित देवराष्ट्रे : ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत असून आवर्तन एक डिसेंबरच्या आसपास सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे परंतु ताकारीच्या टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोन येथे पाहणी केली असता येथे एकही [...]
हिवाळ्यात दररोज कांदा खाण्याचे काय होतील फायदे
कांदा हा आपल्या स्वयंपाकघरात कायमच विराजमान असतो. कांदा फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा कांदा हा तितकाच महत्त्वाचा मानला जातो. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि क्वेर्सेटिनचे प्रमाण चांगले असते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती देतात. हिवाळ्यात आंघोळीपूर्वी शरीराला मोहरीचे तेल का लावावे? कांद्यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीहिस्टामाइन गुणधर्म असतात, […]
Digital Arrest नंतर आता SIR ची भीती, सायबर चोरट्यांकडून युजर्सच्या खात्यांवर डल्ला
सध्या निवडणुकांचे सत्र सुरू असल्याने देशभरात मतदार यादी अपडेट केल्या जात आहेत. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार लोकांकडून पैसे उकळण्यासाठी नवनवीन पद्धती वापरत आहेत. SIR फॉर्म संदर्भात अनेकांना फोन क़ॉल किंवा मेसेज पाठवले जात आहे. आणि सामान्य नागरिक याला सरकारी काम समजून आपली खासगी माहिती (Personal Information) सहजपणे शेअर करत आहेत. मध्य प्रदेश सरकारने SIR […]
गुजरातच्या भाविकांची बस उत्तराखंडमध्ये 70 फूट खोल दरीत कोसळली; 5 ठार, 23 गंभीर जखमी
गुजरातच्या भाविकांच्या बसला उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली बस टिहरी जिल्ह्यातील कुंजपुरीजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये 5 भाविकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिलेले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी जारी करण्यात आलेली नाही. बातमी अपटेड होत आहे…
Ratnagiri News –दहा लाख खर्चूनही राजापूर पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांचे निवासस्थान रिकामेच
राजापूर पंचायत समितीच्या आवारातील गटविकास अधिकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली पंचायत समितीने गेल्या दोन वर्षांत सुमारे १० लाख रुपये खर्च केले आहेत, मात्र सद्यस्थितीत या इमारतीत गटविकास अधिकारी वास्तव्यास नसल्याने लाखो रुपये खर्च करूनही हे निवासस्थान अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेतच आहे. जर अधिकारी येथे राहणार नसतील, तर हा लाखोंचा खर्च नक्की कशासाठी करण्यात आला, असा संतप्त प्रश्न आता […]
देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, भरधाव कार अंडरपासमध्ये कोसळून चार मित्रांचा मृत्यू
देवदर्शनासाठी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार अंडरपासमध्ये कोसळून चार मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघाताची घटना घडली. कर्नाटकातील कोलार येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. अपघातात कारचा चक्काचूर झाला. चारही मित्र केरळहून शबरीमालाला चालले होते. यादरम्यान मालूर तालुक्यातील अबेनहल्ली गावात पहाटे 2.15 ते 2.30 च्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले. कार उड्डाणपुलाच्या […]
हृदयविकाराचा झटका आणि 14 वर्षांचा फुटबॉलर मैदानातच कोसळला, हरहुन्नरी मुलगा गेल्याने कुटुंब हादरलं
मैदानात फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका येऊन एका 12 वर्षीया मुलाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मैदानात खेळत असताना हृदयविकाराचा झटका येऊन अनेक तरुणांचे मृत्यू झाले आहेत. अशातच पुन्हा एकदा एका 14 वर्षीय मुलाचा मैदानातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली असून मुलाच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर […]
Dharmendra –बॉलिवूडच्या ‘ही मॅन’ची हळवी गोष्ट!
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पार्थिवावर मुंबईतील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘ही-मॅन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या रिल लाईफबद्दल अनेकदा लिहिले गेले, मात्र त्यांच्या आयुष्यातील चढ-उताराबाबत अनेकांनी माहिती नाही. धर्मेंद्र रुग्णालयात एडमिट झाले होते […]
ईश्वर बुला रहा है…. मोठ्या मुलीच्या मृत्यूमुळे मानसिक तणावात, संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन
मोठ्या मुलीच्या मृत्यूनंतर मानसिक तणावात असलेल्या कुटुंबाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील हैदराबाद येथे ही घटना घडली. मृतांमध्ये आई, वडिल आणि लहान बहिणीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हैदराबादमधील अंबरपेट येथील मल्लिकार्जुन नगर येथे श्रीनिवास हे पत्नी आणि दोन […]
आठवणीतला ठेवा! धडकी भरवणारा बॉलिवूडचा सर्वात मोठा खलनायक जेव्हा धर्मेंद्र यांच्या पाया पडला होता
कालिया, गुंडा, कोई मिल गया, सूर्यवंशम, लोफर, इंडियन, दम सारख्या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भुमिका पार पडत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या मुकेश ऋषी यांनी 90 चं दशक गाजवलं. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या मातब्बर अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं. मात्र, धर्मेंद्र यांच्यासोबतची त्यांची एक आठवण त्यांनी आपल्या आयुष्याच्या डायरीत जपून ठेवली आहे. 2024 साली एका […]
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या चित्रपटाने इतिहास रचला होता. जय (धर्मेंद्र), वीरू (अमिताभ बच्चन) आणि ठाकूर ही लोकप्रिय पात्रे, गब्बरसिंह सारखा खलनायक, हेमा मालिनीसारखी हिरोईन, जबरदस्त अॅक्शन, मनमोहक गाणी आणि लक्षवेधक संवाद यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना अभिनेते धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चक्क खऱ्याखुऱ्या गोळ्या झाडल्या होत्या. ‘कौन बनेगा […]
तमिळनाडूमध्ये दोन बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
तमिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात सोमवारी दोन खाजगी बसांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 28 जण जखमी झाले. या रस्ते अपघाताबाबत पोलिसांनी माहिती दिली. मदुराईहून सेनकोट्टईकडे जाणाऱ्या एका खाजगी बसची आणि तेनकासीहून कोविलपट्टीकडे जाणाऱ्या दुसऱ्या बसची टक्कर झाली. धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले, त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू […]
‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाॅलीवूडमध्ये त्यांना हिमॅन या नावाने ओळखले जात असे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. पवनहंस जुहू येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ….तेव्हा रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर झाडलेल्या खऱ्या गोळ्या, ‘शोले’च्या सेटवर नक्की काय घडलेलं? धर्मेंद्र […]
Sangli : सांगलीत जिल्हा बँकेच्या निर्णयामुळे ग्राहकांचे व्यवहार ठप्प ; सहा लाख ग्राहक अडचणीत
सांगलीत ग्राहकांचा संताप; बँकेच्या खात्यांवर अचानक ब्लॉकिंगमुळे वादावादी सांगली : कोणाला पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर आपले एटीएम कार्ड ब्लॉक असल्याचे लक्षात आले. कोणाला बाजारात खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी एटीएमचा वापर करता आला नाही. दवाखाना, अचानक आलेली अडचण सोडवण्यासाठी अनेकांना आर्थिक नाकेबंदीला तोंड द्यावे लागले. [...]
Sangli : सांगली बालाजी मिल रोडवर भीषण हिट-एंड-रन; चार वाहनांचे नुकसान, सात जखमी
वेगाने आलेल्या चारचाकी वाहनामुळे सांगलीत अपघात सांगली : सांगली शहरातील बालाजी मिल रोड परिसरात रविवारी रात्री भीषण हिट अँड रनचा अपघात घडला. या अपघातात चार वाहनांचे मोठे नुकसान झाले तसेच सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, [...]
व्हिटॅमिन सीचे भांडार आहे हे फळ, त्वचा आणि केसांसाठी सुद्धा लाभदायक, जाणून घ्या
व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे कारण ते कोलेजन तयार करण्यास मदत करते. म्हणूनच व्हिटॅमिन सी चा विचार केला जातो तेव्हा संत्री आणि लिंबू ही फळे लक्षात येतात. व्हिटॅमिन सीच्या बाबतीत आवळा हा भांडार मानला जातो. आवळ्यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे, आवळा खाणे हे खूप आवश्यक मानले जाते. एका लहान आवळ्यात किमान चार […]
Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली; विवाह सोहळा ढकलला पुढे
स्मृती मानधनाच्या लग्नात अनपेक्षित वळण सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिच्या विवाह सोहळ्यात आज अनपेक्षित वळण आले. लग्नाच्या तयारीदरम्यान स्मृती मानधनाचे वडील अचानक अस्वस्थ झाले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे रविवारी सायंकाळी साडेचार वाजता होणारा विवाह सोहळा तातडीने [...]
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. टीम इंडियाचे फलंदाज आल्या पावली तंबूत परतत असताना यशस्वी जयस्वालने सलामीला येत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला आणि 58 धावांची अर्धशतकीये खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था सध्या बिकट आहे. दरम्यान, यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीतले 13 वे अर्धशतक […]
Kolhapur : पंचगंगा स्मशानभूमीतील शेणी–लाकूड साठ्याची प्रशासकांकडून तपासणी
घाटावरील आकांक्षी शौचालयाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या कामांची तसेच शेणी व लाकडाच्या साठ्याची तपासणी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज दुपारी केली. स्मशानभूमीतील शेणी व लाकडाबाबत प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान त्यांनी दानस्वरूपात आलेली [...]
रविवारी सायंकाळी दिल्लीतील इंडिया गेटजवळ वायू प्रदूषणाविरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी कुख्यात नक्षली हिडमा माडवी याचे पोस्टर झळकावत त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत 23 जणाना अटक केली असून त्यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाणार आहे. बातमी अपडेट होत […]
Kolhapur Crime : अंधश्रद्धेच्या नावाने फसवणूक करणारा ‘चुटकीबाबा’ सनी भोसले ठाण्यातून जेरबंद
४५ हजारांची फसवणूक करणारा मांत्रिक सनी भोसले अटक कोल्हापूर : कोल्हापूर गुप्तधन, भूतबाधा दूर करणे, लग्न जुळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणारा चुटकीबाबा सनी रमेश भोसले (वय ३० रा. टिंबर मार्केट, गवत मंडई) याला करवीर पोलिसांनी जेरबंद केले. [...]
‘कामसूत्र –ख्रिसमस उत्सव कथा’ कार्यक्रमावर बंदी
विविध संस्थांकडून तक्रारी दाखल : पोलिसांनीदखलघेऊनकेलीकारवाई पणजी : गोव्यात ‘कामसूत्र आणि ख्रिसमस उत्सव कथा’ या चार दिवसांच्या कार्यक्रमाच्या प्रचारात्मक जाहिरातीवर जोरदार टीका झाली आणि रविवारी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. हा कार्यक्रम 25 ते 28 डिसेंबर दरम्यान होणार होता, परंतु स्थानिक गटांनी हा विषय अयोग्य असल्याचे सांगत तीव्र आक्षेप घेतला. गोव्यातील विविध स्वयंसेवी संस्थांनी या कार्यक्रमाबाबत [...]
कोणा एकट्यामुळे सत्ता आलेली नाही!
पालकमंत्रीसतीशजारकीहोळीयांचाटोला बेळगाव : कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी अनेक नेते, कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले आहे. केवळ एकट्या-दुकट्यामुळेच सत्ता आली आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. ते आपण मान्य करणार नाही, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, अनेक नेते, आमदार, कार्यकर्ते आदींनी एकत्र येऊन काम केल्यामुळेच कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली आहे. असे असताना [...]
काबूलहून येणारे विमान चुकून टेक-ऑफ रनवेवर उतरले, दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
काबूलहून येणारे अफगाणिस्तान एरियाना एअरलाइन्सचे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चुकून टेक-ऑफसाठी असलेल्या धावपट्टीवर उतरले. सुदैवाने त्यावेळी त्या धावपट्टीवर प्रस्थानासाठी दुसरे विमान नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रविवारी दुपारी 12.06 वाजता काबूलहून येणाऱ्या एरियाना अफगाण एअरलाइन्सचे FG 311 या विमानाला रनवे 29 डाव्या (29L) वर उतरण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र वैमानिकाने चुकून रनवे […]
लष्करी वर्दीसाठी बेळगावात गर्दी
बेळगाव : प्रादेशिक सेनेच्यावतीने (टेरीटोरियल आर्मी) बेळगावमध्ये लष्कर भरती प्रक्रिया सुरू आहे. रविवार दि. 23 रोजी बेळगावसह 9 जिल्ह्यांतील उमेदवारांना भरतीमध्ये संधी देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय मिलिटरी मैदानावर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. शनिवारी रात्रीच परजिल्ह्यातील उमेदवार शहरात दाखल झाले. रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, सीपीएड मैदान व शरकत मैदानावर उमेदवारांची गर्दी दिसून आली. रविवारी बेळगाव [...]
जिल्हाधिकाऱ्यांची राजहंसगडाला भेट
स्थानिकांनीमांडलेल्यासमस्यासोडविण्याचेआश्वासन बेळगाव : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ऐतिहासिक राजहंसगडाला भेट देऊन गडाची पाहणी केली. शनिवारी सहकुटुंब ते गडावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व गडाची तटबंदी पाहिली. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच ते गडावर आले होते. त्यामुळे स्थानिक तरुणांनी त्यांचे स्वागत केले. गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात देवदर्शन घेऊन भव्य शिवपुतळ्याचेही त्यांनी दर्शन घेतले. [...]
महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे भगतसिंग उद्यानातील अभ्यासिकेची दुर्दशा इचलकरंजी : धुळींनी माखलेली बाकडे, गुटखा थुंकून लाल भडक केलेली खांबे, कचऱ्याचा ढीग आणि लगतच असलेल्या शौचालयाची प्रचंड दुर्गंधी…. ही अवस्था आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या भगतसिंग उद्यानातील लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या अभ्यासिकेची. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घरामध्ये अभ्यासाची सोय नसल्यामुळे ज्या जागेचा आधार [...]
अधिवेशनाची चाहूल अन् स्वतंत्र राज्याची हूल
स्वतंत्रराज्याच्यामागणीचेआमदारकागेंचेपत्र: आंदोलनउभारण्याचाइशारा बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाआधीच स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याच्या चर्चेने वेग धरला आहे. सत्ताधारी काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दक्षिणेच्या तुलनेने उत्तर कर्नाटकाचा विकास झाला नाही. त्यामुळे स्वतंत्र राज्याची घोषणा करा, अशी मागणी केली होती. आता उत्तर कर्नाटक विकास मंचचे अध्यक्ष अशोक [...]
सर्व्हर समस्येमुळे रेशनकार्डधारक हैराण
बेळगाव : नोव्हेंबर महिन्यातील रेशन वितरणाला शनिवार दि. 22 पासून सुरुवात झाली आहे. मात्र उशिराने रेशन वितरण सुरू झाल्याने अनेक ठिकाणी सर्व्हर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी रेशन कार्डधारकांना दुकानाबाहेर तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. याचा नाहक त्रास रेशनदुकानदारांनाही सहन करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रतिमाणसी 5 किलो तर राज्य सरकारकडून 5 [...]
कॅनडामध्ये आपल्या नातीला भेटायला गेलेल्या एका 51 वर्षी हिंदुस्थानी व्यक्तीने शाळकरी मुलींची छेड काढली आहे. या प्रकरणी कॅनडा प्रशासनाने या व्यक्तीला परत हिंदुस्थानात पाठवले आहे. जगजीत सिंग, जो आपल्या नवजात नातवाला भेटण्यासाठी जुलै महिन्यात ऑन्टारियो, कॅनडा येथे गेला होता, त्याला आता देशाबाहेर हाकलण्यात येणार असून कॅनडात परत येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.पोलिसांनी सांगितले की आगमनानंतर […]
हिवाळ्यात आंघोळीपूर्वी शरीराला मोहरीचे तेल का लावावे?
हिवाळ्यात तेल मालिशमुळे उष्णता मिळते आणि हाडे आणि स्नायू मजबूत होतात. तेल मालिश रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची चमक वाढवते. म्हणूनच बहुतेक लोक आंघोळीनंतर त्यांच्या शरीरावर मोहरीच्या तेलाची मालिश करतात. केसगळतीवर ही माती वरदानापेक्षा कमी नाही, वाचा आंघोळीपूर्वी किंवा नंतर शरीरावर मोहरीचे तेल कधी लावावे? आंघोळीपूर्वी तेल लावण्याच्या प्रक्रियेला ‘अभ्यंग’ किंवा ‘मालिश’ म्हणतात. हिवाळ्यात गरम पाण्याने […]
Ashes 2025 –ऑस्ट्रेलियाला वेगवान माऱ्याची कमतरता जाणवणार! दुसऱ्या कसोटीतून घातक गोलंदाज बाहेर
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये अॅशेज मालिकेतील दुसरा कसोटी सामना 4 डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबामध्ये खेळला जाणार आहे. पहिला सामना जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या सामन्यातही त्याच जोशात मैदानात उतरेल, तर इंग्लंडचा संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा धाक पाहायला मिळाला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही दोन्ही संघांना वेगवान गोलंदाजांकडून अपेक्षा असणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा […]
अतिथी प्राध्यापकांना स्वत:ची पात्रता सिद्ध करणे बंधनकारक
महाविद्यालय शिक्षण खात्याची सूचना; बोगस प्रमाणपत्रधारकांना बसणार चाप बेंगळूर : सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालयांमध्ये सेवा बजावत असलेले अतिथी प्राध्यापक बोगस प्रमाणपत्रे दाखल करीत असल्याच्या तक्रारी महाविद्यालय शिक्षण खात्याकडे येत आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी प्राध्यापकांची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे संबंधित विद्यापीठाकडून एकवेळ मिळवून सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रमाणपत्रे खात्याच्याइएमआयएस सॉफ्टवेअरमध्ये संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी समाविष्ट [...]
हिवाळी अधिवेशनाची तयारी जोमाने
8 डिसेंबरला अधिवेशनाला सुरुवात : स्थापन केलेल्या समित्या लागल्या कामाला बेळगाव : सुवर्णसौधमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तयारीला जेर आला आहे. 8 डिसेंबरला अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अद्याप 15 दिवस असले तरी आपली जबाबदारी चोखपणे पार पडावी या विचाराने अधिवेशनच्या निमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या समित्या कामाला लागल्या आहे. मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, [...]
बसथांब्यांवर छप्पर नसल्याने गैरसोय
संबंधितविभागानेलक्षदेऊनयोग्यआसनव्यवस्थाकरण्याचीमागणी बेळगाव : राणी चन्नम्मा सर्कल परिसर हा सततच्या वर्दळीचा भाग आहे. या परिसरात रुग्णांसह, प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. दरम्यान बिम्सच्या नूतन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसमोर असलेल्या जुन्या बसथांब्याचे छप्पर काढण्यात आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना उन्हात बसावे लागत आहे. सदर परिस्थिती शहर परिसरात विविध ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन जुन्या बसथांब्यांना [...]
सीपीएड ग्राऊंडजवळील खड्डा बुजवण्याची मागणी
बेळगाव : क्लब रोड हा रहदारीसाठी असलेल्या मार्गांपैकी एक आहे. यामुळे या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होत असते. दरम्यान या मार्गावरील सीपीएड ग्राऊंडजवळ मोठा खड्डा पडला असून, वाहनधारकांना वाहतुकीदरम्यान धोका निर्माण होत आहे. जरी हा खड्डा रस्त्याशेजारी असला तरी धोकादायक ठरू शकतो. अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खड्डा बुजवण्याची मागणी होत [...]
इंद्रायणी भाताला 3000 रुपये दर मिळाल्याशिवाय विक्री करू नका
स्वाभिमानीशेतकरीसंघटनेतर्फेकडोलीतकाढलीजागृतीरॅली वार्ताहर/कडोली इंद्रायणी भाताला योग्य दर मिळाल्याशिवाय भात विक्री करू नको अशा प्रकारचीजागृती करणारी रॅली येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवारी रात्री काढण्यात आली. रॅलीला शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडोली परिसरातील दर्जेदार समजला जाणारा आणि मोठ्या प्रमाणात मागणी असणारा इंद्रायणी भाताचा दर अचानक घसरल्याने येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी तातडीची बैठक घेऊन भात व्यापाऱ्यांना इंद्रायणी भाताला [...]
टेंगिनकेरा गल्लीतील ‘त्या’ बाकड्याचा अखेर शोध
बेळगाव : टेंगिनकेरा गल्ली क्रॉस येथील होळी कामाण्णा मंदिराच्या आवारातून बाकड्याची चोरी झाल्याप्रकरणी शनिवार दि. 22 रोजीच्या अंकात ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बाकड्याचा शोध घेऊन तो पुन्हा मंदिर आवारात ठेवला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. खडेबाजार रोडवरील टेंगिनकेरा गल्ली क्रॉसवरील होळी कामाण्णा [...]
दुसऱ्या गेटपासूनच्या संरक्षक भिंतीने घेतला मोकळा श्वास
बेळगाव : जिल्हा प्रशासनाकडून अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात येत असून, शहर परिसरात विविध कामे करण्यात येत आहेत. स्वच्छतेसह विविध ठिकाणी रंगरंगोटीही करण्यात येत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या रेल्वे गेटनजीक असलेल्या फुटपाथ रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक भींतीवरची झाडेझुडपे काढण्यात येत आहेत. मात्र सदर काढण्यात आलेली झाडेझुडपे तशीच फुटपाथवर टाकण्यात आली असून यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा [...]
कामतगानजीक राष्ट्रीय मार्गावर कार अपघातात चौघे जखमी
वार्ताहर/गुंजी राष्ट्रीय महामार्गावरील कामतगानजीक असलेल्या पुलावर सदोष रस्ता कामामुळे कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक किरकोळ तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली. सध्या बेळगाव-पणजी महामार्गाचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी अर्धवट कामे आहेत. त्यामध्ये कामतगा व जोमतळा गावांच्या मधोमध असलेल्या महामार्गावरील पुलावर गतिरोधकाप्रमाणे उंचवटे असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनचालकांना [...]
पाकिस्तानच्या सैनिक मुख्यालयावर आत्मघातकी दहशतवादी हल्ला, तीन जणांचा मृत्यू
सोमवारी सकाळी पाकिस्तानच्या पेशावर येथे फ्रंटियर कॉन्स्टॅब्युलेरी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात तीन कमांडो आणि तीन हल्लेखोरांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा हल्ला पॅरामिलिटरी इमारतीच्या मुख्य गेटवर दोन स्फोटांनी सुरू झाला, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर सशस्त्र हल्लेखोरांनी परिसरात घुसून सुरक्षा दलांशी चकमक केली. हा हल्ला […]
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 489 धावांची भक्कम धावसंख्या उभी केली आहे. मुथुसामीने केलेल्या 109 धावांच्या शतकीये खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 400 हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावात 36 षटकांचा […]
अमेरिकेने व्हिसा नाकारला, मानसिक तणावातून महिला डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल
सूरतमधील 28 वर्षीय डॉक्टरने कॅफेच्या नवव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आता आंध्र प्रदेशात आणखी एका डॉक्टरने मृत्यूला कवटाळले आहे. अमेरिकेने व्हिसा नाकरल्याने मानसिक तणावातून एमबीबीएस डॉक्टरने राहत्या घरात जीवन संपवले. रोहिणी असे मयत डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी चिलकलगुडा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस सखोल तपास करत आहेत. रोहिणीने 2005 […]
स्थानिक संस्था निवडणूक –रायगड जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी 575 तर नगराध्यक्षपदासाठी 34 उमेदवार रिंगणात
रायगड जिल्ह्यातील १० नगर परिषदांची २ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. ६०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ५७५ तर थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ३४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, कर्जत, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण नगर परिषदेसाठी मुदतीत नगराध्यक्षपदाच्या ९ तर नगरसेवकपदाच्या ९८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. स्वराज्य निवडणूक होत […]
उचगाव फाटा-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील झाडांच्या फांद्या त्वरित हटवाव्यात
फांद्यारस्त्याच्यामधोमधआल्यानेवाहतुकीलाअडथळा: वनखात्यानेदखलघेण्याचीमागणी वार्ताहर/उचगाव बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील उचगाव फाटा ते बाचीजवळील कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या पट्ट्यामध्ये झाडांच्या फांद्या रस्त्याच्या मधोमध आल्याने वाहतुकीला अडचण होत आहे. त्यामुळे सदर फांद्या तातडीने काढण्यात याव्यात, अशी मागणी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांतून केली आहे. उचगाव ते बाची या तीन किलोमीटर अंतराच्या भागांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठमोठे वृक्ष आहेत. या वृक्षांच्या फांद्या [...]
डहाणूत शिवसेनेच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
डहाणू नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आणि तालुकाप्रमुख संजय पाटील आणि कल्पिता तुंबडे यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे कार्यकर्ते जोरदार परिश्रम घेत आहेत. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारफेरीत आमदार कॉ. विनोद निकोले यांनी सहभाग […]
गणेबैल टोलनाक्याबाबत उच्च न्यायालयात 22 जानेवारीला होणार सुनावणी
खानापूर : बेळगाव-पणजी महामार्गावरील (एन एच 748) गणेबैल येथे जुलै 2023 पासून टोलवसुली आकारण्यात येत आहे. मात्र महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने हा टोलनाका तात्काळ बंद करावा, यासाठी बेंगळूर उच्च न्यायालयात शिवसेनेचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी नुकतीच झाली असून आता पुढील सुनावणी 22 जानेवारीला होणार [...]
उचगाव-कोनेवाडी संपर्क रस्त्यावरील धोकादायक पूल
संरक्षककठडेनसल्यानेवाहनधारकांनाधोका: पुलाच्यादुतर्फात्वरितकठडेबांधण्याचीमागणी वार्ताहर/उचगाव उचगाव-कोनेवाडी या संपर्क रस्त्यावरती उचगाव हद्दीत नाल्यावरती असलेल्या पुलाला दुतर्फा संरक्षक कठडे नसल्याने सदर पूल धोकादायक असून या पुलावरून रोज कोनेवाडीमधील माध्यमिक विभागासाठी उचगावला येणाऱ्या विद्यार्थ्यांची सातत्याने ये-जा असते. सदर विद्यार्थी सायकलवरून प्रवास करत असतात. यामुळे हा पूल म्हणजे धोकादायक झाला आहे. यासाठी तातडीने या पुलाच्या दुतर्फा कठडे बांधण्यात यावे, अशी मागणी [...]
अमित ठाकरेंनी नेरुळ पोलीस ठाण्यात जाऊन स्वीकारली नोटीस; शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरणप्रकरणी गुन्हा
नेरुळ येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज नेरुळ पोलीस ठाण्यात जाऊन स्वीकारली. त्यापूर्वी त्यांनी सेक्टर १ मधील चौकात शुक्रवारी गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण झालेल्या या पुतळ्याचे दर्शन घेतले. याच पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांनी गेल्या रविवारी केले होते. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने […]
पनवेल, शहापूरमध्ये दोन अपघातांत चार तरुण ठार; पाचजण जखमी
शहापुरात आणि पनवेलमध्ये झालेल्या दोन भीषण अपघातांत चार तरुण ठार झाले असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. हे अपघात इतके भयंकर होते की यात दोन्ही कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातवारने मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील आटगावजवळील एका मोरीच्या कठड्याला कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. […]
आईच्या दुधात सापडलं युरेनियम, चिंतेचे कारण नाही असे शास्त्रज्ञ का म्हणाले?
आईच्या दुधात युरेनियम आढळले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सदस्य आणि वरिष्ठ वैज्ञानिक यांनी म्हटले आहे की या अभ्यासातील निष्कर्षांमुळे कोणतीही सार्वजनिक आरोग्याची भीती नाही आणि बिहारमधील नमुन्यांमध्ये आढळलेले युरेनियमचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अनुमत मर्यादेपेक्षा खूप कमी आहे. NDMA चे सदस्य आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालक, अणुवैज्ञानिक […]
मराठा स्पोर्ट्स, कांतारा बॉईज विजयी
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात मुरगन स्पोर्ट्स क्लब खानापूरने बालाजी स्पोर्ट्सचा, मराठा स्पोर्ट्सने दक्ष स्पोर्ट्स,निलजीचा कांतारा बॉईजने युवराज स्पोर्ट्सचा तर मराठा स्पोर्ट्सने मुरगन बॉईजचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश मिळविला. दत्ता बुवा,अर्जुन भोसले, रवी कोप्पद, जगन रेड्डी यांना सामनावीर पुरस्कार [...]

30 C