जम्मू आणि कश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी (एजीयूएच) संबंधित एका आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या कारवाईत दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत २,९०० किलोग्रॅम स्फोटके जप्त करण्यात आली आहेत वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने) गेले नऊ दिवस रत्नागिरी शहरातून परिवर्तन पदयात्रा काढून अनेक समस्यांना वाचा फोडली. या पदयात्रेची राजिवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात सांगता झाली. शहरातील खड्डेमय रस्ते, कचऱ्याचे ढिगारे, गटरांची दयनीय अवस्था, अपुरा पाणीपुरवठा, मोकाट गुरे, भटके कुत्रे आणि बंद पथदिप असे अनेक प्रश्न नागरिकांनी मांडल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते,माजी आमदार […]
Pandharpur news –कार्तिकी वारीत श्री विठ्ठल चरणी 5 कोटी 18 लाखांची देणगी
कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान केले. तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी दिली. कार्तिकी शुध्द 01 (दिनांक 22 ऑक्टोंबर) ते कार्तिकी […]
महिला आरक्षण कधी लागू करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायालयाने सांगितले की, सरकारने हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की महिला आरक्षण कायदा लागू करण्याची वेळापत्रक काय आहे. संसदेने हा कायदा मंजूर केल्यानंतरही तो लागू करण्यात उशीर का केला जात आहे? असा सवालही कोर्टाने विचारला […]
डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कार जाहीर
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार वितरण सातारा – वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी दीपक गायकवाड ( पुणे ), प्रा.वृषाली मगदूम ( वाशी- मुंबई ), डॉ. देवकुमार अहिरे (पुणे) यांची निवड करण्यात [...]
वाचन संस्कृती मुळे वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते- नानासाहेब पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- वाचन संस्कृती मुळे वैचारिक प्रगल्भता वाढीस लागत असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी केले. धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने गोल्डन रिडर्स ज्येष्ठांसाठी सुवर्ण वाचन मोहीम प्रारंभ करण्यात आली. पुढे बोलताना नानासाहेब पाटील म्हणाले की, मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती नष्ट होत चालली आहे. पूर्वी ज्यावेळी मोबाईल अस्तित्वात नव्हते किंवा त्याहुनही जुन्या पिढीचे लोक सतत वाचन करत. वृत्तपत्रे, विविध वैचारिक ग्रंथ, संस्कृती सभ्यतेवर आधारित ग्रंथ, चरीत्र ग्रंथ असा वाचनीय खजीना त्यांच्याजवळ असत. ही वाचन केलीली मंडळी वाचनातुन आलेले विचार समाजात मांडत असत. म्हणजे वाचनामुळे वक्तृत्व कौशल्य ही आत्मसात होते. म्हणूनच रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने जेष्ठ नागरीकांसाठी गोल्डन रिडर्स ज्येष्ठांसाठी सुवर्ण वाचन मोहीम सुरू करण्यात येत आहे. जेणेकरून जेष्ठांचा आदर्श घेऊन भावी पिढी मध्ये वाचन संस्कृती समृद्ध होईल, असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सदर प्रसंगी डॉ. टी. एल बारबोले, डॉ मंगेश भोसले, डॉ. अरविंद हंगरगेकर, यांच्या सह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय प्रमुख डॉ मदनसिंग गोलवाल यांनी पुढाकार घेतला.
मतदारसंघात 2 हजार कोटींचा निधी आणला- आमदार तानाजी सावंत
भूम (प्रतिनिधी)- जो महाराष्ट्रातील सत्ता उलटून टाकतो ? उलटू शकतो ? असा सहकारी तुमचा असताना 2024 मध्ये महाराष्ट्रातील 288 पैकी आपल्या मतदारसंघात दोन हजार कोटीचा निधी आणलेला असताना हे जनतेपर्यंत पोहोचू का शकलो नाही. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात संवाद बैठकीत बोलताना केले आहे. यावेळी दत्ता साळुंके, संजय गाढवे, संयोगिता गाढवे,अण्णासाहेब देशमुख, बाळासाहेब पाटील,बालाजी गुंजाळ,विशाल ढगे,युवराज हुंबे ,विशाल ढगे,अर्चना दराडे,प्रवीण देशमुख,निलेश चव्हाण,ज्ञानेश्वर गीते,रामकिसन गव्हाणे,यांच्या सहपदाधिकारी उपस्थित होते. सावंत पुढे बोलताना म्हणाले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना निधी दिला. दोन हजार कोटीचा निधी मंत्री असताना मतदारसंघांमध्ये मंत्रालयातून ताकद वापरून आणला. मी कमी मतांनी निवडून आलो मी नाराज होतो. ज्यांनी गद्दारी केली मी त्यांच्यावर नाराज होतो. शिवसैनिकावर नाराज नाही. आपल्याच लोकांनी गद्दारी केली. जे विरोधक होते त्यांना पक्षात तुम्हीच घेतलं त्यांना निधी दिला त्याच लोकांनी गद्दारी केली. शेतकरी संकटात असताना मी स्वतः मतदारसंघात येऊन सर्वांना कीट साहित्य वाटप केले. सहा कोटी रुपयांची मदत केली. जे आमदार, खासदार येत आहेत त्यांनी फक्त व्हिडिओ शूटिंग काढून लोकांना वाचवले एवढंच केले. मी माझ्या नेत्याला सांगून रेस्क्यू केले. हेलिकॉप्टर बोलावून लोकांचे जीव वाचवले. विरोधकांनी पाच रुपयाची तरी मदत केली का याचे मूल्यमापन झाले पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकच राष्ट्रवादी पक्ष असा आहे सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे वेगवेगळ्या नाहीत असे आमदार तानाजी सावंत यांनी सांगून पार्थ पवार बाबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार कुटुंब काहीच प्रतिक्रिया देत नाहीत असा टोलाही लगावला. यावेळी तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
पालक आठवडाभर ताजा राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जाते. परंतु अनेकदा बाजारातून पालक खरेदी केल्यानंतर, एक किंवा दोन दिवसांत पालक खराब होऊ लागतो. त्यामुळे तो फेकून द्यावा लागतो. पालक आठवडाभर ताजा ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात. पालक घरी आणताच, प्रथम पालकाची पाने नीट निवडून घ्या. खराब झालेले आणि पिवळे पान काढून टाका. पालक […]
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “आविष्कार- 2025“ चे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने महाविद्यालयीन स्तरावर आविष्कार -2025 या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रकल्पांचे परिक्षण महाविद्यालयाचे तज्ञ प्राध्यापक यांनी केले. यावेळी प्राचार्य विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रयोगाचे परिक्षण करताना ते म्हणाले, विद्यार्थांने नेहमीच नवनवीन समाजोयोगी संकल्पना असतात, त्यामुळे देशातील सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक समस्यांवर तोडगा निघतो. फक्त त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे असते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पना पुढे आल्या. हर्बल ड्रग प्रिपरेशन, कोरोना काळात पॅथॉलॉजी लॅबची गरज आणि त्यावर पडलेला अतिरिक्त ताण लक्षात घेता ऑनलाइन पॅथॉलॉजी लॅब ही एक नवीन संकल्पना विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोगातून मांडली.ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांना सामना करावा लागला. त्यादृष्टीने खेड्यातील शिक्षण पद्धतीसाठी ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर करून वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. अविष्कार 2025 मध्ये अंडर ग्रॅज्युएट मधील 12 विद्यार्थ्यांनी यश मिळवले, दीक्षा विकास मस्के, श्वेता व्यंकटेश कुलकर्णी, गायकवाड राजनंदनी राजेंद्र, सरपणे ओमकार विलास, पवन हनुमंत खुणे, ऋतुजा संतोष दराडे, आस्थासिंग पंकज राजपूत, इंगळे अभिषेक अनिल, थोरात आशिष रंगनाथ, फैजान रफिक शेख, सायली भारत साळुंखे, रयान युसुफ मोमीन,तर पोस्ट ग्रॅज्युएट मधील पाच विद्यार्थ्यांना यश मिळाले, अर्चना बाळासाहेब उदाणे, साकरते ऐश्वर्या, पवार अनुराधा, विद्या नंदकुमार शेलार, अंकिता शिंदे. या सर्व विद्यार्थ्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे अंतर्गत झोनल लेवल मध्ये निवड झाली आहे. येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी झोनल लेवल मध्ये अविष्कार 2025 मध्ये भाग घेऊन महाविद्यालयाची महाविद्यालयाचे नेतृत्व करणार आहेत. अविष्कार 2025 चे समन्वयक व डीन आर. एन डी.डॉ. सुशीलकुमार होळंबे, सह समन्वयक प्रा.रवींद्र गुरव, प्रा.डी. बी. ठाकूर, प्रा.डी. बी. भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.ए.के.पिंपळे, प्रा.व्ही. एस. बोंदर, डॉ.आर. बी. ननवरे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथांग परिश्रम घेतले परिश्रम घेतले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तेली समाज प्रतिनिधींची भेट
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेऊन तेली समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या “संत जगनाडे महाराज महामंडळा”ला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व या महामंडळाच्या माध्यमातून तेली समाजातील नवउद्योजक घडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी तेली समाजाचे युवा नेते व भाजप ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब घोडके यांनी केली. या भेटीत दादासाहेब घोडके यांनी तेली समाजासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांमधून अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या प्रसंगी तेली समाजाचे जिल्हा सचिव तथा माजी नगरसेवक ॲड. विशाल नाना साखरे, जिल्हा तेली समाज प्रसिद्धी प्रमुख कपिल नवगिरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यानंतर दादासाहेब घोडके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची देखील भेट घेतली. या भेटीत काटगाव जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून उमेदवारीच्या मागणीसंबंधी चर्चा करण्यात आली. त्यांनी समाजाच्या विश्वासास पात्र ठरवून कार्य केल्याचे सांगत आगामी निवडणुकीसाठी पक्षाकडून योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली. तेली समाजाच्या हक्कांसाठी व विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास दादासाहेब घोडके यांनी व्यक्त केला.
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीमहाविकास आघाडीत उमेदवार निश्चीतीला वेग !
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीची शिगेला पोहोचलेली तयारी आता महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांत जोर धरत आहे. दोन्हीकडील पक्षांनी उमेदवार निश्चीती, जागा वाटप आणि आर्थिक नियोजनावर गुप्त चर्चांचा वेग वाढवला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या तिन्ही पक्षांनी तुळजापूरमध्ये प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. बैठकीत जागा वाटप, उमेदवार निवड, प्रचार निधी आणि स्थानिक पातळीवरील समन्वय या मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय झाल्याचे सूत्रांकडून समजते. दुसरीकडे भाजपनेही आपली उमेदवार निश्चिती आणि आर्थिक तयारीला वेग दिला असून, महायुतीच्या एकूण रणनितीवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले जाते. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना त्यांच्या होमग्राउंडवर अडवण्यासाठी रणनीती आखत आहे. यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी सक्षम, स्थानिक उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी आघाडीत एकजूट राखण्यासाठी दोन पावले मागे घेण्याची तयारी दाखवली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसने राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेनेसोबत प्राथमिक बैठक पार पाडून संभाव्य उमेदवार व खर्च तयारीचा आढावा घेतला आहे. मात्र या बैठकीत नेमके काय ठरले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते प्रथम पक्षांतर्गत चर्चा पूर्ण करूनच अंतिम बैठकीस बसणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय अंतिम बैठक लवकरच होणार असून जागा वाटप जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, तुळजापूर नगरपरिषद क्षेत्रातील काही प्रमुख प्रभागावर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) इच्छुक आहेत. त्यामुळे आघाडीतील जागावाटप निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, भाजपनेही गुरुवारी झालेल्या बैठकीत आपली रणनीती आखून प्रचार मोहिमेची दिशा ठरवली आहे. दोन्ही आघाड्यांतील हालचालींमुळे तुळजापूर नगरपरिषद निवडणूक चुरशीची आणि अत्यंत रोचक होण्याची चिन्हे आहेत.
नळदुर्गमध्ये परत एकदा कोट्यावधीची सोन्याची चोरी
नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेतून शाखेतीलच कर्मचाऱ्याने कट रचून सुमारे दोन कोटी 63 लाख 63 हजार 272 रुपयेचे तारण ठेवलेले सोने चोरुन नेल्याची घटना दि. 7/11/2025 च्या सांयकाळी सहा वाजले पासून ते दि. 8/11/2025 च्या रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटने मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची फिर्याद शाखाधिकारी उमेश भानुदास जाधव यांनी पोलिस ठाण्यात दिल्याने पतसंस्थेचे कर्मचारी राहूल राजेंद्र जाधव यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नळदुर्ग च्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी असून यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या बाबत पोलिस सुत्रा कडून समजलेली माहीती अशी की, दिशा नागरी सहकारी पतसंस्थेतील लिपीक पदावर काम करीत असलेला कर्मचारी राहूल राजेंद्र जाधव याने संगनमत करुन त्याच्या पदाचा दुरुपयोग करुन त्याचा मित्र सुशील राठोड यासह इतर दोघे जण आपसात कट रचून दि. 7 नोव्हेंबर च्या सायंकाळी सहाच्या ते दि. 8 नोव्हेंबर च्या रात्री दोन वाजे पर्यंत शाखेच्या मुख्य शटरचे लॉक चावीने उघडून आत प्रवेश करुन आत मधील तिजोरीतील एकूण दोन त्रेसष्ठ कर्जदाराचे दोन कोटी 61 लाख 42 हजार सत्तावीस रुपयेचे कर्ज रक्कमेसाठी तारण ठेवलेले चार किलो 762 ग्रॅम 679 मिली वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख 23 हजार 737 रुपये पैकी दोन लाख 21 हजार 245 रुपये असे एकूण दोन कोटी त्रेसष्ठ लाख त्रेसष्ठ हजार 272 रुपयेचा मुददेमाल चोरुन नेला आहे. दरम्यान उमेश जाधव यांच्या फिर्यादीवरुन राहूल राजेंद्र जाधव, सुशील राठोड व इतर दोन अनोळखी असे चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक रितू खोखर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक इज्जपवार पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे जिल्हा पोलिस अधिक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळंखे, आनंद कांगुने, पोलिस उपनिरीक्षक संतोष गिते, ईश्वर नांगरे यांनी घटना स्थळी भेट देवून पहाणी केली.
धाराशिव जिल्हा शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनिल नागणे, सचिव संतोष कदम
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनिल नागणे (तुळजापूर) तर सचिवपदी संतोष दत्ता कदम (कळंब) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सोपानराव शेजवळ यांनी निवडीचे पत्र नूतन अध्यक्ष नागणे व कदम यांना दिले आहे. शस्त्रांग मार्शल आर्ट खेळाचा प्रचार प्रसार करणे, शासनाच्या माध्यमातून जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणे, मुलींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आयोजित करणे असा मानस नवनियुक्त अध्यक्ष सुनिल नागणे यांनी व्यक्त केला. तसेच संघटनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून उत्कृष्ट खेळाडू घडविणार असल्याचेही नूतन जिल्हाध्यक्ष नागणे यांनी सांगितले. या निवडीचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे यांनी तसेच तुळजापूर, कळंब तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.
अल्पसंख्यांक शाळांसाठी शासन अनुदान, जिल्ह्यातील संस्थांकडून 14 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले
धाराशिव (प्रतिनिधी)- अल्पसंख्यांक विकास विभागाकडून राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित,विना अनुदानित,कायम विना अनुदानित शाळा,कनिष्ठ महाविद्यालये,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नगरपालिका/ नगरपरिषद शाळा तसेच दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शाळांची शासनास अनुदानाकरिता शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 7 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयानुसार विहीत निकषांप्रमाणे ही योजना सन 2025-26 या वर्षासाठी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने,या योजनेंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळांनी 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांचेकडे विहीत नमुन्यातील प्रस्ताव सादर करावेत. सद्यस्थितीत या योजनेंतर्गत अल्पसंख्यांक शाळांना प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.त्यानुसार,खाली नमूद केलेल्या दिनांकांपूर्वी शाळांनी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे सादर करावेत. सन 2025-2026 या आर्थिक वर्षासाठीचा कालबद्ध कार्यक्रम इच्छुक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2025 आहे. वरीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या सर्व अल्पसंख्यांक शाळांनी त्यांचे प्रस्ताव विहीत मुदतीतच सादर करावेत.विहीत मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत,याची नोंद घ्यावी.
यंत्रणांनी विविध प्रकल्प व विकास कामे विहित मुदतीत पूर्ण करावी- पालक सचिव अंशू सिन्हा
धाराशिव(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. दरडोई उत्पन्न देखील वाढले पाहिजे. आकांक्षित जिल्ह्याची ओळख मिटवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील विविध प्रकल्प आणि विविध विकासकामे यंत्रणांनी मुदतीत पूर्ण करावी.असे निर्देश वस्त्रोद्योग, सहकार व पणन विभागाच्या प्रधान सचिव तथा पालक सचिव श्रीमती.अंशू सिन्हा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 7 नोव्हेंबर रोजी विविध यंत्रणांचा आढावा घेताना श्रीमती सिन्हा बोलत होत्या. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश काळे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती सिन्हा म्हणाल्या की,जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांचे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे. कोणताही बाधित हा मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. संबंधितांच्या बँक खात्यात शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वेळेत जमा करण्यात यावी.शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दयावे.जिल्ह्यातील शेतकरी हा मोठ्या प्रमाणात रेशीम शेतीकडे वळला पाहिजे, यासाठी चालना देण्यात यावी.तसेच मागील वर्षी पडलेल्या अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या अनुदानाची मदत वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेत जमा करावी. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे प्रलंबित असल्यामुळे मदत करता आलेली नाही,त्या शेतकऱ्यांची पोर्टलवरील प्रलंबित ई-केवायसी त्वरित पूर्ण करावी,असे श्रीमती.सिन्हा म्हणाल्या. जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी ज्या गावातील शेतकऱ्यांचे भूसंपादन करावयाचे आहे,त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना भूसंपादनासाठी प्रोत्साहित करावे,असे सांगून श्रीमती सिन्हा म्हणाल्या की,त्यामुळे राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.श्री जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रलंबित असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी.जिल्ह्यातील कोणताही शेतकरी हा ॲग्रीस्टेक नोंदणीपासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे.भविष्यात सर्व कृषी योजनांचा लाभ ॲग्रीस्टेक क्रमांकाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी जिल्ह्यात सप्टेंबर-2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीची मदत वाटपाची माहिती दिली. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमा, अतिवृष्टीमुळे 2109 विहिरींचे नुकसान झाले असून 1397 विहिरी ह्या पूर्णतः खचून अथवा वाहून गेलेल्या आहेत व 712 विहिरींचे अंशतः नुकसान झाले असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या आणि विविध विकासकामांच्या सद्यस्थितीबाबतची माहिती श्री.पुजार यांनी यावेळी दिली. या बैठकीत उपस्थित विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्प व विकासकामांच्या प्रगतीबाबतची माहिती यावेळी दिली.
बिहारमध्ये इतिहास घडणार! जनता बदल घडवणार; तेजस्वी यादव यांचा विश्वास
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी राजद नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एनडीए सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी भाजप आणि बिहारमधील सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले. तेजस्वी यादव म्हणाले की, या सरकारच्या २० वर्षात बिहारमध्ये गरिबी, बेरोजगारी आणि स्थलांतर सर्वाधिक वाढले आहे. एकही कारखाने उभारले गेले नाहीत, उद्योग सुरू झाले नाहीत आणि […]
डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडी बद्दल सत्कार
धाराशिव(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) धाराशिव जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांनी शनिवार 8 नोव्हेंबर रोजीत्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन सत्कार केला. डॉ. शहापूरकर म्हणाल्या की, “डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून सार्थ निवड झाली आहे.ही निवड समविचारी पक्षांना बळकट करणारी आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”या वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक काळात प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - 2025 कार्यक्रम जाहीर केला आहे.नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात 4 नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक काळात विविध प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. आज 8 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने आयोजित कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या बैठकीत श्री.पूजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोखर,सहाय्यक जिल्हाधिकारी रवैयाह डोंगरे व नगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक्त श्री.ढेंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पूजार पुढे म्हणाले की,निवडणूक काळात परवाना असलेली शस्त्रे जमा करून घ्यावी.निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.सुरक्षाविषयक बाबींचा आढावा नियमित घेण्यात यावा.मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसराची आखणी करण्यात यावी.या परिसरात आवश्यक तो प्रतिबंध करण्यात यावा.मतदान केंद्राच्या 200 मीटर बाहेर उमेदवारांचे बुथ असले पाहिजे,याची दक्षता घ्यावी.संयुक्त भेटी देऊन कुठेही उणीव राहणार नाही याबाबत जबाबदारी घ्यावी.मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे,त्या स्ट्राँग रूमला व परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा.तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे.मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर कोणाला प्रवेश राहणार आहे,याची माहिती स्थानिक पातळीवर द्यावी.त्यामुळे संभ्रम राहणार नाही असे ते म्हणाले. खोखर म्हणाल्या,निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहावी.निवडणुकीच्या संदर्भाने तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.दारू व पैशाचा वापर या काळात होणार नाही, याची दक्षता घ्यावी.गावठी पिस्तूल व तलवारीचा निवडणूक काळात कोणाकडूनही वापर होणार नाही,यासाठी धाडसत्र राबवून ते जप्ती कारवाई करण्यात यावी.निवडणुकीसाठी लागणाऱ्या पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक पोलीस मनुष्यबळाची मागणी करावी.सर्व पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक ते शस्त्रास्त्रे व साहित्य उपलब्ध करून घ्यावे,ही निवडणूक निर्भय व शांत वातावरणात पार पाडावी,असे त्या म्हणाल्या. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार,नगरपरिषदा व नगरपंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते.यावेळी संबधित अधिकाऱ्यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.
महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून काँग्रेसचे आंदोलन, वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न
फलटणमध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केली होती. या महिलेने हातावर एका पोलीस अधिकाऱ्याचे आणि माजी खासदाराचाही उल्लेख केला होता. या प्रकरणी महिलेला न्याय मिळावा म्हणून काँग्रेसने मुंबईत आंदोलन केले आहे. युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. नरिमन पॉईंटवर […]
तुम्हीही या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का?
रेफ्रिजरेटर हा आजच्या लाईफस्टाईलमध्ये खूप गरजेचा भाग झालेला आहे. असे असले तरी काही भाज्या या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने, नुकसान होऊ शकते. त्यामुळेच अशा भाज्या या रेफ्रिजरेटरबाहेर ठेवणे अधिक उत्तम. कोणत्या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत ते जाणून घ्या. बटाटे थंड तापमानात ठेवल्याने त्यांचा स्टार्च साखरेत बदलतो, ज्यामुळे त्यांची चव बदलते आणि शिजवल्यावर ते गोड होतात. बटाटे जास्त […]
Sangli Crime : रसिका कदम खून प्रकरणात आणखी दोघांना अटक
ईश्वरपूरमध्ये हत्येचे थरारक प्रकार ईश्वरपूर : बहे नाका परिसरातील रसिका मल्लेश कदम (३५ मुळ रा. उटगी ता. जत) या महिलेचा तिचा प्रियकर तुकाराम शंकर वाटेगावकर (३८ रा. बोरगाव) याने एकट्यानेच गळा आवळून खून केला. त्यानंतर अन्य दोन साथीदारांच्या मदतीने मृतदेह व ज्युपिटर गाडी [...]
पुरावे असतील तर, पोलिसांकडे द्यावे
पूजानाईकलामुख्यमंत्र्यांचेआवाहन: कारवाईहोईलच: नव्यानेएफआयआरनोंदवण्याचेनिर्देश पेडणे : पूजा नाईक हिने नोकरभरतीप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी आरोप करण्यापूर्वी थेट पोलिस यंत्रणेकडे जाऊन त्यांची नावे द्यावीत. जे कोणी या प्रकरणात सामील असतील ते मग मंत्री, अधिकारीही असेना, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यासाठी पूजाने पुरावे द्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेले आहे. नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी पत्रकारांनी पेडणे येथे एका [...]
‘इफ्फी’ स्पर्धा विभागात 15 चित्रपट
गोल्डनपिकॉकसहतब्बल1 कोटीचीबक्षिसे पणजी : राजधानी पणजीत होणाऱ्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपट यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात एकूण 15 चित्रपट असून 12 आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तर 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट म्हणजे उत्कृष्ट कलाकृती असून जागतिक स्तरावरील विविध समस्यांचे प्रतिनिधित्व त्यातून समोर येणार आहे. या महोत्सवातील विविध स्पर्धा, [...]
हिरव्या मिरच्या महिनाभर टिकवण्यासाठी या सोप्या टिप्स अमलात आणायलाच हव्यात, वाचा
स्वयंपाकघरात हिरव्या मिरच्या जवळजवळ दररोज वापरल्या जातात. भाज्यांमध्ये मसाले कमी प्रमाणात हवे असल्यास, हिरव्या मिरचीचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. हिरव्या मिरच्या या आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहेत. अनेकदा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतरही, हिरव्या मिरच्या लवकर खराब होतात किंवा सुकतात. हिरव्या मिरच्या अधिक काळ टिकण्यासाठी काही टिप्स अमलात आणायला हव्यात. अंडी अधिक काळ टिकावी म्हणून काय करायला […]
Miraj Crime : मिरजेतून चालणाऱ्या हनी ट्रॅपमध्ये अडकले सांगली, कोल्हापूरचे तरुण
तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याचा संशय, शहर पोलिसात तक्रार दाखल मिरज : सोशल मिडीया अकौंटवरुन तरुणांना जाळ्यात ओढत मिरजेतील एका भामट्या महिलेने हनीट्रॅपद्वारे लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधीत भामट्या महिलेच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील एका तरुणाने मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधीत महिलेच्या सोशलमिडीया अकाऊंटच्या प्रोफाईलवरुन गुन्हा दाखल केला आहे. [...]
वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे याबाबतचा चौकशी अहवाल आला असून पोलीस महासंचालकांना हा चौकशी अहवाल पाठवला जाणार आहे. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री गस्तीवर असताना राकेश जाधव यांनी चिमूर येथील हजारे पेट्रोलपंपासमोर वाळू […]
आलेमाव कुटुंबाच्या गुंडाराजला भाजपचा पाठिंबा
आमदारव्हेंझीव्हिएगशयांचाआरोप: वाळूचेढिगारेहटवूनरस्ताकरण्याच्याकामाचापर्दाफाश मडगाव : बाणावलीतील आपचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी झालोर-फात्राडे सीमेवर वॉरन आलेमाव यांच्या मालकीच्या जेसीबीद्वारे बेकायदेशीररित्या नैसर्गिक वाळूचे ढिगारे हटवून रस्ता करण्याच्या कामाचा पर्दाफाश केला आहे. सदर काम कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय सुरु होते. याची माहिती मिळताच जेव्हा आप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना बोलावले. त्यावेळी आलेमाव कुटुंबाशी संबंधित गुंडांनी [...]
बाणावली आमदारांकडून सुसंवादाऐवजी गुंडगिरीला प्रोत्साहन
मडगाव : बाणावली मतदारसंघातील आमदारांना वार्का आणि फात्राडेच्या लोकांनी उघडे पाडले असून वार्कामध्ये जे घडत आहे ती लोकशाही नाही, ते दिवसाढवळ्या गुंडाराज आहे. प्रामाणिक, कष्टाळू गोमंतकीयांना फक्त त्यांच्या पायावर उभे राहिल्याबद्दल धमकावले जात आहे, त्यांच्यावर हल्ला केला जात आहे आणि दहशत निर्माण केली जात आहे. जेव्हा एक निवडून आलेला प्रतिनिधी, स्वयंघोषित ‘सोशल मीडिया आमदार’ व्हेंझी [...]
पणजीत भाज्यांच्या दरात चढउतार,घरगुती बजेटवर ताण
पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात सातत्याने चढउतार सुरु आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांचे घरगुती बजेट कोलमडले आहे. कांदा, बटाटा, टोमॅटो यांसारख्या दैनंदिन वापराच्या भाज्यांच्या किंमतीत वारंवार होणाऱ्या बदलामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात फरक पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिकिलो 50 रुपये असलेले [...]
अंडी अधिक काळ टिकावी म्हणून काय करायला हवं?
अंडी ही प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. हिवाळ्याच्या दिवसात अंडी खाण्याचे प्रमाण वाढते. परंतु अंडी योग्यरित्या साठवली गेली नाही तर ती लवकर खराब होतात. उष्ण किंवा दमट हवामानात अंड्यांचा ताजेपणा राखणे विशेष महत्वाचे आहे. अंडी नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायला हवी. रेफ्रिजरेटरमध्ये अंडी ठेवताना कायम काळजी घ्यायला हवी. रिफ्रेजरेटरमधील दारावर अंडी कधीही ठेवू नयते. कारण तिथल्या तापमानाता […]
Miraj : कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसतोडणीला वेग; मात्र दराची संभ्रमावस्था
कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसतोडणी सुरू कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसतोडणी जोरात सुरू असून दररोज शेकडो टनांची ऊस वाहतूक सुरू आहे मात्र ऊस दराबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून ऊस दराकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे. टेंभू आणि म्हैसाळ योजनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. विशेषतः म्हैसाळ [...]
दिल्लीत खळबळ! जंतर- मंतरवर आंदोलकाने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं; पोलिसांकडून तपास सुरू
राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. दिल्लीच्या जंतर मंतरवर सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने स्वत:लाच गोळी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती एक आंदोलक असून तो येताना सोबत पिस्तूल घेऊन आला होता. हा व्यक्ती जंतर-मंतरवर […]
Sangali News:महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखाची फसवणूक
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक सांगली: महापालिकेत कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाची ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनायक मुरलीधर शिंदे (वय ४१, रा. पेठभाग, गवळी गल्ली, सरकारी तालीमजवळ, सांगली) यांनी [...]
आपल्याला अपेक्षित निकाल न दिल्यास न्यायाधीशांवर निंदनीय (Scandalous) आरोप करण्याची वाढती प्रवृत्ती अत्यंत खेदजनक आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सोमवारी आपली नाराजी व्यक्त केली. २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश एन. पेड्डी राजू प्रकरणात न्यायालयीन अवमान (Contempt of Court) युक्तिवादावर सुनावणी करत होते. या प्रकरणात राजू यांनी तेलंगणा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मौशमी […]
Miraj : पालकांचा सांभाळ न करणाऱ्यांना संपत्तीचा हक्क नाही ; मिरज प्रांताधिकाऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय
सांभाळ न करणाऱ्या मुलीला दिलेलं घर परत आईच्या नावे सांगली : हरिपूर (ता. मिरज) गावातील वयोवृद्ध सुरेखा सुहास रामचंद्रे यांनी आयुष्यभर मुलांच्या प्रेमात स्वतःला झोकून दिलं. पतीच्या निधनानंतर २०१६ साली त्यांनी आपल्या मुलींपैकी एकीवर विश्वास ठेवत राहते घर आणि मालमत्ता बक्षीसपत्राने तिच्या नावावर केली. “माझी [...]
Prakash Abitkar : भीती…धाकधुक…आणि जल्लोष !
पॅराग्लायडिंगचा जिल्ह्यात भुदरगडमध्ये पहिल्यांदाच उपक्रम byअनिल कामीरकर गारगोटी : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पॅराग्लायडिंगचा उपक्रम भुदरगड किल्ल्यावर वन विभागाच्यावतीने सुरू करण्यात आला, काहीशी भीती तर मनात थाकधुक अशा वातावरणात कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून आकाशात झेप घेऊन किल्ले भुदरगडचा फेरफटका मारला, मात्र भीतीने धास्तावलेल्या कार्यकर्ते आणि पर्यटकांनी पालकमंत्री आबीटकर जमिनीवर स्थिरावताच त्यांना गराडा [...]
नांदेडहून मुंबई, गोव्यासाठीची विमानसेवा पुन्हा एकदा लांबणीवर, श्रेय घेणार्यांचे झाले हसे
>> विजय जोशी, नांदेड मध्यंतरीच्या काळात विमानतळ दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आल्यानंतर ऐन मोसमात नांदेडहून सुटणार्या चार विमानसेवा बंद पडल्या. आता 15 नोव्हेंबरपासून नांदेड-मुंबई, नांदेड-गोवा अशा विमानसेवा सुरू होणार असे उर बडवून सांगणार्या भाजपच्या नेत्यांचे हसे झाले असून, अनिश्चित काळासाठी ही विमानसेवा आता लांबणीवर पडणार आहे. नांदेडचे विमानतळ सध्या औद्योगिक विकास महामंडळाने रिलायन्सकडून ताब्यात घेतले […]
चंदगडमध्ये दौलत कारखान्यावर सर्वपक्षीय बैठक चंदगड : दौलत कारखाना शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या घामातून उभा राहिला आहे. हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, कामगारांच्याच मालकीचा राहील. चंदगड तालुक्यात कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. कितीही बाउन्सर आणले आणि कितीही बाहेरचे कामगार आणले तरी दौलत सहकारात राहीलच. [...]
युवकांना, महिलांना सहकारक्षेत्रात प्रोत्साहन द्यावे
मुख्यमंत्रीडॉ. प्रमोदसावंतयांचेआवाहन, पेडणेयेथेसहकारभारतीचेआठवेअधिवेशनउत्साहात पेडणे : नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत आणि विकसित गोवा 2037 स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी सहकार भारतीने सहकाराच्या माध्यमातून प्रयत्न करावे. त्यासाठी गोव्याच्या सहकार क्षेत्रात युवक आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश करावा, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले पेडणे येथे आयोजित केलेल्या सहकार भारती गोवाचे आठव्या अधिवेशनाचे उद्घाटन [...]
एक मिनिटाच्या उशिराने 50 हून अधिक जणांची परीक्षा हुकली, रोहित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विविध पदांसाठी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत. यामध्ये पुण्यातील रामवाडी येथील TCS ION केंद्रांवर एक मिनाटाचा उशीर झाल्याने परीक्षार्थिंना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्ट टॅग करत विनंती केली आहे. आपल्या पोस्टमध्ये […]
Kolhapur : राजापूर परिसरात उसाला आग; 12 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
राजापूर शिवारात उसाच्या शेतात भीषण आग कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील राजापूर परिसरात उसाला लागणाऱ्या आगीचे सत्र सुरूच असून, पुन्हा एकदा आगीच्या तांडवाने सुमारे १२ एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना राजापूरवाडी रस्त्यालागत गट क्र. ४१८ ते २४३ या शिवारात घडली. दुपारी एकच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना अचानक आग लागली. [...]
कुर्टी पंचायतीच्या नवीन इमारतीला स्व.रवी नाईक यांचे नाव द्यावे
कुर्टीखांडेपारग्रामसभेतठरावसंमत: विविधप्रश्नांवरचर्चा फोंडा : कुर्टी – खांडेपार पंचायतीच्या हाऊसिंग बोर्ड येथे होणाऱ्या नवीन प्रशासकीय इमारत प्रकल्पाला फोंड्याचे दिवंगत आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला. सरपंच नावेद तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत अकरापैकी दहा पंचसदस्य उपस्थित होते. सभेत केवळ चारच लेखी प्रश्न आले व [...]
जागतिक मराठी संमेलनाची पणजीत सभा
पणजी : जागतिक मराठी अकादमी मुंबईतर्फे 21 वे जागतिक मराठी संमेलन 2026 पणजीच्या कला अकादमी सभागृहात जानेवारी च्या 9, 10 व 11 असे तीन दिवस भरवले जाणार आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेसाठी हे संमेलन भरवले जाणार आहे. या संमेलनाच्या आयोजन समितीची सभा शनिवार 8 रोजी इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाच्या सभागृहात समितीचे कार्याध्यक्ष दशरथ परब यांच्या [...]
हजारो पालीवासीयांचे आरोग्य धोक्यात
बेशिस्त नागरिकांमुळे तीर्थक्षेत्र पाली शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. घंटागाड्यांची सुविधा असूनही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असल्याने रस्त्यांना डम्पिंगचे स्वरूप आले आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले असून तेथे घूस, डास व भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पावसामुळे रस्त्यावरील कचरा कुजला असून शहरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालीतील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी […]
इफ्फीत प्रदर्शित होणार कोकणी चित्रपट ‘क्लावडिया’
मडगाव : 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यात होणार आहे. या महोत्सवात राजेंद्र तालक यांनी लिहिलेला, निर्मित आणि दिग्दर्शित केलेला कोकणी चित्रपट ‘क्लावडिया’ भारतीय पॅनोरामा-विशेष सादरीकरण विभागांतर्गत प्रदर्शित केला जाणार आहे. राजेंद्र तालक यांचा हा आठवा कोकणी चित्रपट आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्यांचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट भारतीय पॅनोरामामध्येप्रदर्शितझालेआहेतकिंवाआंतरराष्ट्रीयचित्रपटमहोत्सवात(इफ्फी) प्रीमियरझालेआहेत. [...]
रायगड जिल्ह्यातील धरणांची कामे रखडली; धो-धो पाऊस पडूनही पाणीटंचाई भेडसावणार
रायगड जिल्ह्यातील किनेश्वरवाडी, लोहारखोडा, कोतवाल तसेच कोंढवी हे धरण प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून लटकले आहेत. विशेष म्हणजे या सर्व धरणांवर शेकडो कोटींचा चुराडा करूनही उर्वरित निधी न मिळाल्याने त्यांची रखडपट्टी झाली आहे. या सर्व प्रकल्पांची बांधकामे ठप्प असल्याने दरवर्षी दक्षिण रायगड जिल्ह्यातील अनेक गावांतील हजारो नागरिकांना जानेवारी महिना उजाडताच हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सरकारच्या […]
डिचोलीत पाण्याविना लोकांची गैरसोय
तीनदिवसलोकांचेहाल, दुरूस्तकेलेलीजलवाहिनीदोनवेळाफुटली, आमदारशेट्योंकडूनपाहणी डिचोली : नाईकनगर बोर्डे डिचोली येथे मोठी जलवाहिनी दुसऱ्या जागी हलविण्याचे काम चालू असून काम पूर्ण केल्यानंतर तीनवेळा दुऊस्त केलेली जलवाहिनी फुटली. त्यामुळे डिचोली शहराबरोबरच आजूबाजूच्या परिसरामध्ये गेले तीन दिवस पाणीपुरवठा ठप्पच आहे. त्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. तरीही पाणीपुरवठा विभागातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने किही प्रमाणात लोकांना दिलासा मिळाला आहे. [...]
तीनदिवसांचीन्यायालयीनकोठडी पणजी : समुद्र किनारी आणि इतर पर्यटक स्थळावर पर्यटकाना विविध सुविधांचे आमीष दाखवून लुटणे तसेच पर्यटकांची छळवणूक करणाऱ्या दलालांवर कळंगुट पोलिसांनी कडक कारवाई करणे सुऊ केले आहे. कळंगूट समुद्र किनारी गस्त घालून 13 दलालांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. सर्वंना न्याय दांधिकाऱ्यांसमोर हजर केले असता तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती [...]
मुरुड-जंजिरा समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले, गुलाबी थंडीत ताज्या मासळीवर ताव
परतीचा पाऊस संपला आणि थंडीची चाहूल लागली आहे. शनिवार, रविवार सुट्टीदिवशी पर्यटकांनी मुरुड-जंजिरा येथे गर्दी केली होती. समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले होते. जंजिरा व पद्मदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. पर्यटकांनी गुलाबी थंडीत समुद्रकिनाऱ्यांवर मौजमजा करण्याबरोबरच ताज्या मासळीवर ताव मारला. मुरुड समुद्रकिनारी असलेली सर्व हॉटेल रंगरंगोटी आणि रोषणाईने सजली आहेत. चविष्ट पदार्थांचे स्टॉल, घोडेसवारी, वॉटर बाईक […]
जल जीवन मिशन योजनेत घोटाळा, शेकडो अधिकाऱ्यांवर कारवाई
मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन या योजनेंतर्गत आर्थिक अनियमितता उघड झाल्यानंतर 15 राज्यांतील 596 अधिकारी, 822 कंत्राटदार आणि 152 थर्ड पार्टी इन्स्पेक्शन एजन्सी (TPIA) यांच्यावर चौकशी सुरू आहे. स्रोतांच्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये सीबीआय, लोकायुक्त आणि इतर भ्रष्टाचारविरोधी संस्था देखील तपास करत आहेत. या 15 राज्यांमध्ये जल जीवन मिशन संदर्भात 16,634 तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, […]
नेरळ स्थानकात सरकता जिना, शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी खुला
माथेरानची सैर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी नेरळ स्थानकात सरकता जिना सुरू करण्यात आला आहे. फलाट क्रमांक एकवर हा स्वयंचलित जिना बसवण्यात आला असून शुक्रवारपासून तो प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात आला आहे. या जिन्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांची फरफट थांबणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानला जाण्यासाठी मध्य रेल्वेचा शेवटचा स्टॉप म्हणजे नेरळ स्टेशन. त्यामुळे या स्टेशनवर […]
Kolhapur : मावळत्या सूर्याची किरणे अंबाबाईच्या कानापर्यंत!
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात किरणोत्सवास प्रारंभ कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला प्रारंभ झाला असून रविवारी किरणाच्या मध्ये ढगाचा अडथळा नसलेने अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सव सोहळा पार पडला. सोनेरी किरणाने ०५:०५ मिनिटांनी मंदिर द्वारातून प्रवेश करून ०५:४७मिनिटांनी देवीच्या डाव्या कानापर्यंत पोहोचून हळूहळू लुप्त [...]
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा
धर्मवीरसंभाजीचौकातआयोजन: मध्यवर्तीम. ए. समितीच्याबैठकीतनिर्णय: उपस्थितराहण्याचेआवाहन बेळगाव : कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरला हलगा येथीलसुवर्ण विधानसौधमध्ये होऊ घातले आहे. या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी त्याचदिवशी म्हणजेच 8 डिसेंबरला धर्मवीर संभाजी चौकात मराठी भाषिकांचामेळावा भरविला जाईल. त्यामुळे मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले. रविवार [...]
राज्यात वेगवेगळ्या अपघातात सहा ठार
बेंगळूर : राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने जाणारी कार भद्रा कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना चन्नगिरी तालुक्यातील होसूर गावात घडली. मल्लिकार्जुन (वय 29) आणि सिद्धेश (वय 38) अशी मृतांची नावे आहेत.या घटनेची नोंद संतेबेन्नूर पोलिसांत झाली आहेत. दोन कार समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा बळी गेला. तर [...]
कारागृह अन् शिक्षा : भय इथले वाटत नाही!
पैसे द्या सुखसोयी मिळवा : न्यायालयाच्या आदेशानंतरही गब्बर कैद्यांची बडदास्त ठेवणे सुरूच : कारागृह विभागाचा कारभार चव्हाट्यावर बेळगाव : बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात विकृत उमेश रेड्डीसह अनेक गुन्हेगारांना सुखसोयी पुरविल्यासंबंधीचे व्हिडिओ खासगी वाहिन्यांमध्ये प्रसारित करण्यात आले आहेत. त्यामुळे कारागृह विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. सध्या ठळक चर्चेत असलेला उमेश रेड्डी दोन वर्षांपूर्वीच हिंडलगा मध्यवर्ती [...]
अलिबाग नगर परिषद निवडणूक, शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढणार
2 डिसेंबरला होणाऱ्या अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची ग्वाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी दिली. अलिबागच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून येथील जनता शिवसेना महाविकास आघाडीलाच कौल देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अलिबागसह रायगड जिल्ह्यातील […]
‘आरोग्य कवच’ सेवा आता सरकार चालविणार
खासगीसंस्थेचेकामसमाधानकारकनसल्यानेसरकारचानिर्णय: चालकम्हणूनस्थानिककर्मचाऱ्यांनानेमण्यातयेणार बेळगाव : आजाराने जर्जर झालेल्या रुग्णांना अर्थात सिरियस रुग्णांना ऊग्णालयात त्वरित दाखल करून उपचार मिळवून देण्यासाठी 108 वाहनाची (आरोग्य कवच) सोय करण्यात आली आहे. मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या सेवेत काही त्रुटी आढळून येत असल्याने खासगी संस्थेकडे असलेली ही सेवा आता सरकार आपल्या ताब्यात घेणार आहे. सरकारने नव्याने कमांड आणि कंट्रोल केंद्र [...]
परतीच्या पावसाने शेती पाण्यातच, रायगडात गावरान कडधान्य महागणार
ओल्या दुष्काळामुळे खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे शेतकरी संकटात आहे. आता रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती असून गावरान कडधान्य महागणार आहेत. परतीचा पाऊस लांबल्यामुळे शेत शिवारांमध्ये पाणी तुंबले आहे. परिणामी जमिनीची मशागत करण्यात अडचणी येत असून कडधान्य लागवड खोळंबली आहे. याचा रायगड जिल्ह्यातील 12 ते 15 हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास […]
Kolhapur Crime : बनावट सोने तारण ठेवून बँकेची 83 लाखांची फसवणूक
बँकेच्या अधिकृत सोनारासह सात खातेदारांवर गुन्हा कोल्हापूर : बँकेच्या सोनारानेच बँकेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बँकेची ८३ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी बँकेचा सोनार आणि कर्जदार अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सोनाराने [...]
इंग्रजी नामफलक असलेल्या कॅम्प येथील स्वीट मार्टवर कन्नडिगांकडून दगडफेक
कन्नडभाषेतीलफलकलावण्यासाठीदांडगाई: व्यावसायिकांतूनसंताप बेळगाव : एकीकडे महानगरपालिकेकडून व्यापारी आस्थापनांबाहेरील मराठी व इंग्रजी भाषेतील अक्षरांवर ब्रश फिरविण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे कायदा हातात घेत कन्नड संघटनांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी दुपारी कॅम्प येथील एका नामांकित स्वीट मार्टवरील इंग्रजी भाषेत लिहिण्यात आलेला नामफलक हटविण्यासाठी दादागिरी करण्यात आली. इतकेच नव्हे तर पोलिसांच्या समक्षच कन्नडिगांनी दगडफेक करून [...]
राष्ट्रवादीची औलाद अशी आहे की, ती सत्तेशिवाय राहूच शकत नाही, असे बेताल वक्तव्य आज वाचाळपणासाठी प्रसिद्ध असलेले माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केले. या भयंकर वक्तव्यामुळे स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत लाथाळ्या होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्राला भिकारी करेन पण मी भिकारी होणार नाही. खेकड्याने धरण फोडले तसेच महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका घेतल्याचे सांगणारे […]
मध्यवर्ती बसस्थानकात नव्या बसेसचा ताफा दाखल
बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस बसस्थानकातून उपनगरासह ग्रामीण भागात धावणार आहेत. जुन्या झालेल्या बसेस स्क्रॅपमध्ये घालून नव्या बसेस दाखल करून घेण्यात आल्या आहेत. याचा प्रवाशांना लाभ होणार असून, अत्याधुनिक सुविधेचाही अनुभव घेता येणार आहे. या बसेस राज्यनगर वाहतूक निधीतून तयार करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अपुऱ्या बससेवेचा नागरिकांसह [...]
वेल्डिंग वर्कशॉपमध्ये नशेच्या इंजेक्शनची विक्री, मालकाला अटक
अलिबाग तालुक्याच्या आक्षीसाखर या गावातील वेल्डिंगच्या वर्कशॉपमध्ये नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी या वर्कशॉपवर छापा मारून मालकाला अटक केली. तसेच नशेच्या इंजेक्शनचा साठादेखील जप्त केला आहे. आक्षी साखर येथील सुरज राणे याने आपल्या वेल्डिंग वर्कशॉपमधून मेपेंटरमीन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री सुरू केली होती. पोलिसांनी सापळा रचून […]
चुकीला माफी नाही! काँग्रेसच्या शिबीरात राहुल गांधींना ’10 पुश अप्स’ची शिक्षा, कारण जाणून घ्या…
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमधील पचमढी येथे आयोजित काँग्रेसच्या शिबीराला हजेरी लावली. या शिबीराला उशीरा पोहोचल्याने त्यांना शिक्षा देण्यात आली. राहुल गांधी यांना 10 पुश अप्स मारण्यास सांगण्यात आले आणि त्यांनीही ही शिक्षा हसत स्वीकारली. बातमी अपडेट होत आहे…
निखळलेले दगड.. गंजलेल्या सळया.. पाया खचला, मोहिली पुलावर ‘सावित्री’चा धोका
मोहिली चोची गावांना जोडणाऱ्या उल्हास नदीवर बांधलेल्या पुलाची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे. निखळलेले दगड.. गंजलेल्या सळया.. खचलेला पाया यामुळे लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असून ‘सावित्री’ होण्याचा धोका आहे. ‘सावित्री’ सारखी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी लवकरात लवकर कळवले आहे, अशी पुलाची दुरुस्ती करावी, अशी […]
तुर्थ्यात हलगी कडाडली; रस्ते, पाण्यासाठी मोर्चा, महापालिकेविरोधात शिवसेना रस्त्यावर
नवी मुंबई पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे तुर्भे एमआयडीसीतील इंदिरानगरसह अन्य भागांची अवस्था दयनिय झाली आहे. रस्ते, पाणी, मलनिस्सारण वाहिनी आदी सुविधा येथील नागरिकांना व्यवस्थित मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महापालिका प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज हलगी मोर्चा काढण्यात आला. हलगी वाजवा, अधिकारी जागवा अशी जोरदार घोषणाबाजी […]
बापट गल्ली भजनी मंडळातर्फे विविध कार्यक्रम
बेळगाव : यावर्षीही बापट गल्ली भजनी मंडळाच्यावतीने काकड आरती, दीपोत्सव, दहीकाला,पालखी सोहळा व अवळी भोजन कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला. कोजागरी पौर्णिमेपासून सुरुवात झालेल्या काकड आरती कार्यक्रमात परिसरातील भक्त सकाळी पाच वाजता सहभागी होऊन भक्तिमय वातावरणात आनंद घेत होते. बापट गल्ली भजनी मंडळाचे कार्यकर्ते भक्तांना प्रसाद मिळावा यासाठी कार्यरत होते. वीणेकरी पुणेकर दादा आणि अध्यक्ष [...]
नार्वेकर गल्ली ज्योतिर्लिंग देवस्थानात कार्तिकोत्सव-महाप्रसाद
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानमध्ये रविवार दि. 9 रोजी कार्तिकोत्सव साजरा करण्यात आला. कार्तिकोत्सवाचे यंदाचे 66 वे वर्ष असून रात्री 8 वाजता भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्तिकोत्सवानिमित्त सकाळी 8 वाजता होमहवन, 9 वाजता लघु रुद्राभिषेक, 11 वाजता सत्यनारायण पूजा, 12 वाजता महाआरती करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता कार्तिकोत्सव पार पडला. रात्री 8 [...]
इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल, रोहित पवार यांची टीका
देवेंद्र फडणवीस सरकार घोटाळ्यांनी बरबटलेले असून यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि जनता यांची कोणतीही भीती या निगरगट्ट सरकारला राहिलेली नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल असेही रोहित पवार म्हणाले. एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकार घोटाळ्यांनी […]
गुंजीत हत्तीकडून भातपिकाचे प्रचंड नुकसान
शेतकऱ्यांतभीतीचेवातावरण: वनखात्याकडूनपीकनुकसानीचीपाहणी: हत्तींच्याबंदोबस्ताचीमागणी वार्ताहर/गुंजी शनिवारी रात्री कापोली डिगेगाळी भागातून आलेल्या एका टस्कर हत्तीने गुंजी परिसरातील तेरेरांग शिवारात शिरून भात पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. येथील शेतकरी धाकलू चौंडी यांच्या कापणीला आलेल्या भात पिकामध्ये घुसून खाऊन, तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. भात राखणीसाठी शेतातील झोपडीमध्ये झोपलेल्या धाकलू चौंडी यांना मध्यरात्री हत्तीची [...]
लोखंडी गेट कोसळून जवानाचा मृत्यू
कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्पातील घटना कारवार : कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्पस्थळी लोखंडी गेटचे तुकडे कोसळून केंद्रीय औद्योगिक सुरक्षितता दलाचा जवान मृत्यू पावल्याची घटना शनिवारी घडली. मृत सी.आय.एस.एफ. जवानाचे नाव शेखर भीमराव जगदाळे (वय 48, मूळचे महिमानगड, महाराष्ट्र) असे आहे. या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, कारवार जिल्ह्यातील कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्पातील न्युक्लियर वेस्ट घटक स्थळी [...]
जळगावात गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी, लाडू गँगचा हात?
जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील कांचननगर भागात रविवारी रात्री सुमारे १२ वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद झाला. या वादात झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली असून पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. काही […]
आता बाजारातील महागड्या टोनरना करा बाय बाय, घरीच बनवा नैसर्गिक टोनर, जाणून घ्या
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी, आपण विविध फेस वॉश, क्रीम, सीरम आणि टोनर वापरतो. परंतु कधीकधी, या उत्पादनांचा अतिरेक झाल्याने, त्वचेला नुकसान पोहोचते. या सर्व समस्या टाळण्यासाठी आपण घरच्या घरी टोनर करणे हितावह आहे. दररोज एक चमचा तूप खा; जेवणाची चव वाढेल आणि आरोग्यासाठी देखील उत्तम घरगुती तांदळाचा टोनर तांदळाचा टोनर बनवणे खूप सोपे आणि […]
ChatGPT लोकांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडत आहे, वाचा नेमकं काय घडलं?
देशभरात एआयचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वापरकर्त्यांना एआयच्या मदतीने प्रत्येक लहान मोठ्या अडचणींवर योग्य ते उपाय मिळत आहे. मात्र जगभरात ख्याती असलेला हा ओपनएआयचा लोकप्रिय एआय चॅटबॉट ChatGPT आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून, कॅलिफोर्नियामध्ये त्याच्याविरुद्ध अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. चॅटजीपीटीवर “आत्महत्या प्रशिक्षक” (Self Harm) म्हणून काम करण्याचा आरोप आहे. […]
ईव्हीएममधून मतचोरी करणारे नामर्दाची औलाद, बच्चू कडू यांचा घणाघात
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपरिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ, मतचोरी या विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी होत असल्याचा आरोप केला जात असतानाच आता प्रहारचे नेते बच्चू कडू यांनीही […]
मलप्रभा बंधाऱ्याजवळील पात्राची खोली वाढवा
बंधाऱ्याची उंचीही वाढवणे आवश्यक : लोकप्रतिनिधीकडून पाठपुराव्याची गरज; पाणी अडवण्यापूर्वीच खोली वाढवणे अत्यंत महत्त्वाचे खानापूर : खानापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जुना बंधारा काढून त्या ठिकाणी ब्रिजकम बंधारा बांधण्यात आला. मात्र योग्य नियोजन न केल्याने बंधाऱ्याच्या वरील बाजूस मोठ्या प्रमाणात वाळू आणि गाळ साचत असल्याने बंधाऱ्यांत पाणीसाठा कमी होत असल्याने बंधारा कुचकामी ठरला आहे. या बंधाऱ्याच्या [...]
धनगर-गवळी समाजाचे तहसीलदारांना निवेदन
जिल्हाधिकाऱ्यांनीआश्वासनाचीपूर्ततानकेल्यानेधनगर-गवळीसमाजाचामोर्चा खानापूर : तालुक्यातील धनगर-गवळी समाजातर्फे समस्या सोडवण्याबाबत खानापूर तहसीलदार दुंडाप्पा कोम्मार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यापूर्वी विधान परिषद सदस्य शांताराम सिद्धी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी खानापर येथे समाजाची बैठक घेऊन समस्या सोडवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र बैठक न घेतल्याने धनगर-गवळी समाजाने मोर्चा काढून रस्ता, [...]
खानापूर नगरपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक
अध्यक्ष, उपाध्यक्षांच्याकार्यकाळाचीमुदतसंपल्यानेसरकारचाआदेश, नव्याआरक्षणाकडेलक्ष खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाचीमुदत दि. 5 नोव्हेंबर रोजी संपली असल्याने राज्य पालांच्या आदेशानुसार नगरविकास विभागाचे सचिव टी. मंजुनाथ यांच्या आदेशानुसार खानापूर नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून खानापूर तहसीलदाराची नेमणूक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे नगरपंचायतीवर पुन्हा प्रशासकीय कारभार सुरू होणार आहे. खानापूर नगरपंचायतीची निवडणूक 2018 साली घेण्यात आली. [...]
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आता फक्त 5 रुपये खर्च करा, वाचा
चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपलं स्वयंपाकघर हा एक खजिना आहे. आपल्या स्वयंपाकघरात आढळणारे लिंबू, मध आणि इतर अनेक घटक प्रभावी ठरू शकतात. चेहऱ्यावर लिंबू लावल्याने त्वचा स्वच्छ होतेच असे नाही तर ती नैसर्गिकरित्या उजळते. लिंबात व्हिटॅमिन सी, सायट्रिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. दररोज एक चमचा तूप खा; जेवणाची चव वाढेल आणि […]
धामणे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गीतगायन स्पर्धेत यश
वार्ताहर/धामणे धामणे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कन्नड व हिंदी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला आहे. दि. 7 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथील आरएलएसपी कॉलेजमध्ये माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 45 माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे या स्पर्धा चुरशीने पार पडल्या. या चुरशीच्या स्पर्धेमध्ये धामणे माध्यमिक विद्यार्थ्यांनी गीतगायन (कन्नड व [...]
नंदगड कन्या विद्यालयात वंदे मातरम् कार्यक्रम
संतकनकदासजयंतीहीसाजरी: संगीतअन्कीर्तनातस्थानिकभाषेच्यावापरामुळेमहत्त्व वार्ताहर/हलशी द. म. शिक्षण मंडळ संचलित कन्या विद्यालय नंदगड येथे 2025 मध्ये वंदे मातरम्ला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शनिवार दि. 8 रोजी कार्यक्रम झाला. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आपले राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ हे 1875 मध्ये 7 नोव्हेंबर रोजी अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर लिहिले होते. वंदे मातरम् हे त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग [...]
मुंबईहून कोलकात्यासाठी निघालेल्या स्पाईसजेट विमानात तांत्रिक बिघाड, करावे लागले इमरजन्सी लँडिंग
मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या स्पाइसजेट फ्लाइट SG 670 ला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करावी लागली. पायलटने त्वरित नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली आणि खबरदारीचा उपाय म्हणून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. 9 नोव्हेंबर 2025 (रविवार) च्या रात्री ही फ्लाइट मुंबईहून कोलकात्याकडे निघाली होती. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार उड्डाणादरम्यान विमानाचे एक इंजिन हवेतच बंद पडला, त्यामुळे आपत्कालीन लँडिंग […]
परप्पन कारागृहावर अधिकाऱ्यांचा छापा
कैद्यांना पुन्हा दिलेल्या शाही बडदास्तच्या व्हायरल व्हिडिओवरून कारवाई : कारागृह कर्मचाऱ्यांसह 100 हून अधिक बॅरेकची केली तपासणी बेंगळूर : नराधम उमेश रेड्डी, सोने तस्करी प्रकरणातील आरोपी तरुण राज याच्यासह लष्कर-ए तोयबा या संघटनेच्या दहशतवाद्यांना अॅन्ड्रॉईड मोबाईल, टीव्ही व इतर सुविधा पुरविण्यात येत असल्याचे उघडकीस येताच परप्पन अग्रहार कारागृहातील बॅरेकच्या कारागृह अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला आणि [...]
केवळ 100 रु. दरवाढ केल्याने कुमारस्वामी असमाधानी
बेंगळूर : राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाच्या दरात केवळ 100 रुपयांची वाढ केल्याबद्दल केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच उसासाठी प्रतिटन 3,550 रुपये एफआरपी दर निश्चित केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी किमान 3,500 रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी केली होती. परंतु राज्य सरकारने केवळ [...]
अखेर सरगुरु येथील नरभक्षक वाघ जेरबंद
बेंगळूर : सरगुरु तालुक्मयात वारंवार नागरिकांसह जनावरांवर हल्ला करून त्यांचा जीव घेणाऱ्या नर वाघाला जेरबंद करण्यात आले आहे, अशी माहिती वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिली. मागील 15 दिवसांत बंडिपूर आणि नागरहोळे अभयारण्यात वाघाच्या हल्ल्यात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. मृतांचे शवविच्छेदन अहवाल आणि वाघाचे डी. एन. ए. तपासून पकडलेला वाघ तोच आहे का?, याची पुष्टी [...]
तो चांगला नवरा नाही…गोविंदाच्या बायकोने केली पोलखोल, सांगितली आतली गोष्ट
अभिनेता गोविंदा अलिकडे त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा त्याच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. त्यावर दोघांनी विराम लावला आहे. अशातच सुनिता आहुजा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वैवाहीक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. गोविंदा एक चांगला पती नसून पुढच्या जन्मी असा नवराच नको असे त्या मुलाखतीत म्हटले आहे. सुनीता […]
काँग्रेसला हटविल्याशिवाय राज्याचा विकास अशक्य : भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र
बेंगळूर : जोपर्यंत काँग्रेस सरकार हटवले जात नाही तोपर्यंत राज्यात विकास होणार नाही. तसेच नागरिकांसाठी सुरक्षितता नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला. रविवारी त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. असुरक्षित कर्नाटकात सभ्य नागरिक आणि निष्पाप लोक राहू शकणार नाहीत असे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसला हटवा, कर्नाटकला वाचवा, असा नाराही [...]
तुमकूर येथील डिनर पार्टी दिल्लीला शिफ्ट
खासदारराजशेखरहिटनाळयांच्यानिवासस्थानीआयोजन बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर चर्चा रंगली असतानाच माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी शुक्रवारी मंत्री आणि काही आमदारांसाठी भोजनावळीचे (डिनर पार्टी) आयोजन केले होते. मात्र, सदर डिनर पार्टी राजण्णा यांच्या घरातून खासदार राजशेखर हिटनाळ यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हलविण्यात आले आहे. याद्वारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बिहारचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दिल्लीत राजकीय [...]
जागतिक शांततेसाठी जैन ऋषींचे मार्गदर्शन आवश्यक
उपराष्ट्रपतीसी. पी. राधाकृष्णनयांचेप्रतिपादन बेंगळूर : जगभरात संघर्षाच्या परिस्थिती निर्माण झाल्या असून मानवताच धोक्मयात आली आहे.अशा परिस्थितीत जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी जैन ऋषींचे मार्गदर्शन आवश्यक आहे. जैन धर्म संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देतो. श्र्रवणबेळगोळ येथील बाहुबलीची मूर्ती केवळ जैन धर्म आणि परंपरेचे प्रतीक नाही तर जागतिक शांतीचा संदेश पसरवण्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती [...]
चेंबुरच्या कॉर्पोरेट पार्कात भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबईच्या चेंबूर परिसरातील दोन मजली कॉर्पोरेट पार्कमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सियन-ट्रॉम्बे रोडवरील कॉर्पोरेट पार्कच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या थॉमस कुक कार्यालयात ही आग लागली. ही आग पहाटे साधारणपणे 1.30 वाजता अग्निशमन दलाला कळवण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीची माहिती मिळताच आठ […]

32 C