बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती
बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी म्हणजे फक्त 333 इतकी झाली आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, दर महिन्याला जवळपास 50 बस सेवेतून बाद केल्या जात असल्याने, या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस बेस्टकडे स्वतःच्या एकही बस उरणार नाही, अशी शक्यता आहे. बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत बेस्ट […]
रश्मिकाचा ‘द गर्लफ्रेंड’ लवकरच
5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. गीता आर्ट्स याप्रॉडक्शन हाउसने हा चित्रपट 5 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. 7 नोव्हेंबर रोजी ‘द गर्लफ्रेंड’ हा चित्रपट रश्मिकाच्या चाहत्यांना चित्रपटगृहात जात पाहता येणार आहे. तेलगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळी भाषेत [...]
बिबट्यांचे मनुष्यांवर हल्ले रोखण्यासाठी 125 बिबट्यांना एकाच ठिकाणी ठेवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच बिबट्यांचे निर्बीजीकरण केले जाईल असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. अजित पवार म्हणाले की, मानव-बिबट्या संघर्षाबाबत एक बैठक घेण्यात आली. प्रभावित लोकांना 31 ऑक्टोबरपर्यंत मदत पुरविण्यात येईल. बिबट्यांचे निर्बीजकरण (स्टेरिलायझेशन) केले जाईल. सुमारे 125 बिबट्यांना एका ठिकाणी […]
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
बीडमधीस पाली येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू असतानाच भरधाव वेगाने येणारा पिकअप अंत्यविधी कार्यक्रमात घुसला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर असून सात ते आठ जण जखमी झाले आहे. जखमींवर बीड शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पाली परिसरातील स्मशान भूमी मध्ये आज सायंकाळी स्वर्गीय आसराबाई किसनराव नवले यांच्यावर अंत्यविधी सुरू होता. […]
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनसारख्या इतर पद्धती स्वीकारण्याबाबत सरकारने घेतलेल्या विरोधी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायालयाने म्हटले की सरकार काळानुरूप बदल स्वीकारण्यास तयार नाही. हा मुद्दा एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान समोर आला, ज्यामध्ये फाशीची शिक्षा प्राणघातक इंजेक्शन किंवा इतर आधुनिक पद्धतींनी बदलण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने सरकारला विचारले की […]
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय आणि राज्याच्या मुखअय निवडणूक आधिकाऱ्यांची मंगळवारी आणि बुधवारी भेट घेत निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील घोळ याबाबत चर्चा केली. या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी X वर एक पोस्ट करत निवडणूक आयोगाशी काय चर्चा झाली, याबाबत सविस्तर मुद्दे सांगितले आहेत. X वर पोस्ट राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे निवडणूक आयोग […]
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धविराम, एअरस्ट्राईकमध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून (पाकिस्तान वेळेनुसार) 48 तासांसाठी तात्पुरता युद्धविराम लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. हा निर्णय सीमारेषेवर झालेल्या ताज्या चकमकीनंतर घेण्यात आला असून, त्यामुळे दोन्ही शेजारी देशांमधील तणाव वाढला होता. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या या युद्धविरामाचा उद्देश सीमावरील वाढत्या संघर्षानंतर शत्रुत्व कमी करणे आणि संवादाचा मार्ग मोकळा करणे […]
बीडचे वादग्रस्त जेलर पेट्रस गायकवाड यांची बदली
बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड हे काही दिवसांपासून कैद्याच्या धर्मांतरण प्रकरणात वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या बाबतीत तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या. वरिष्ठांनी या तक्रारीची दखल घेत त्यांची आज बुधवारी उचलबांगडी केली आहे. पेट्रास गायकवाड यांची नागपूरला बदली करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपूर्वी बीडला पेट्रस जोसेफ गायकवाड नावाचे कारागृह अधीक्षक आले होते. त्यांनी कैद्यांचे धर्मांतरण […]
नुकतेच मराठवाड्यात झालेल्या भीषण पावसामुळे मराठवाडा कोलमडला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक मातीमोल झाले. केवळ पीकच नाही तर, जमिनच खरडून वाहून गेली. त्यामुळे मराठवाडा अतिवृष्टीच्या सावटाखाली आहे. पुरामुळे शेतातील माती वाहून गेल्याने इथला शेतकरी आता हताश आणि निराशेच्या गर्तेत आहे. यातच पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढे सरसावली आहे. शिवसेना नेते […]
Ranji Trophy 2025-26 मध्ये महाराष्ट्र विरुद्ध केरळ सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची नादखुळा फलंदाजी पाहायला मिळाली. केरळच्या गोलंदाजांनी फलंदाजीसाठी उतरलेल्या महाराष्ट्राची भंबेरी उडवल्याने संघ 100 धावांपर्यंत मजल मारणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. कराण 0 वर 4 आणि 18 धावसंख्येवर महाराष्ट्राचा अर्धा संघ तंबुत परतला होता. परंतु या परिस्थिती ऋतुराज गायकवाडने संघाचा डाव सावरला […]
देशातील लाखो शिक्षक टीईटी प्रश्नासंदर्भात दिल्लीत धडकणार
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या ऑनलाईन सभेमध्ये देशभारतील विविध राज्याच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये टीईटी सर्वोच्च न्यायालय निर्णय व जुनी पेन्शन या दोन विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती या दोन्ही प्रश्नांसाठी 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी […]
निवडणूक आयोग भाजपची बटीक झालेली आहे, मतदार यादीवरून संजय राऊत यांची टीका
घोळ घालण्यासाठी भाजपने पॅनल पद्धत आणली, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच निवडणूक आयोग भाजपची बटीक झालेली आहे, टीकाही संजय राऊत यांनी केली. मुंबईत पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आता माझ्या बाजूला दिव्याचे रोहिदास मुंडे आहेत. ते कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातली यादी घेऊन आले. दिव्यातलेच फक्त […]
रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या मालिकेचा तपास पोलीसांना अद्याप लागलेला नसतानाच, चोरट्यांनी पुन्हा एकदा ग्रामीण भागातील बंद घरांकडे मोर्चा वळवला आहे. नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार धनगरवाडी आणि कुंभवडे हरचेलीवाडी येथे सोमवारी (१३ ऑक्टोबर) रात्री ते मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सकाळपर्यंत पाच घरे फोडण्यात आली. या घरफोड्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम […]
अवकाळी पावसाने चिपळूणला झोडपले, बाजारपेठ आणि शेती दोन्ही संकटात
दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाच बुधवारी सायंकाळी चिपळूणमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चारच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणांतच मुसळधार पावसाने शहरात धुमाकूळ घातला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील बाजारपेठ सजली होती. फटाके, आकाशकंदील, पणत्या, फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तूंचे स्टॉल्स उभे राहिले होते. मात्र या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांची […]
Ranji Trophy 2025-26 चा हंगाम आजपासून (15 ऑक्टोबर 2025) सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी केएस भरतने शतक ठोकून सर्वच संघांना आपल्या फलंदाजीची एक झलक दाखवून दिली आहे. आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्यामध्ये पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात 32 वर्षीय केएस भरतने संयमी फलंदाजी करत 142 धावांची खेळी केली […]
सुशासन बाबू दुशासन-दुर्योधनाच्या मांडीवर जाऊन बसले, काँग्रेसची नितीश कुमार यांच्यावर टीका
सुशासन बाबू दुशासन आणि दुर्योधन यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर केली. बिहारमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. यावेळी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, “तिथे नितीश कुमार त्यांच्या (भाजप) पापाचे भागीदार होत आहेत. जेव्हा नितीश कुमार एकटे होते, आमच्यासोबत […]
दोन मित्रांमध्ये 1200 रुपयांवरुन झाला वाद, दुसऱ्याने केले भयंकर कृत्य
उत्तराखंडच्या बहादराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मित्रांमध्ये 1200 रुपयांवरुन वाद झाला. वाद विकोपास जाऊन मित्रानेच मित्राची हत्या केली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे. न्यायालयात उभे केले असता त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. बहादराबाद येथील रोहीत आणि सौरभ अशी मित्रांची नावे आहेत. सौरभसोबत रोहीत बाईकने दारुच्या गुत्त्यावर गेला होता. तिथे दोघांमध्ये […]
मुंबई एसटी बँकेत संचालकांमध्ये राडा, मिंधे गट आणि सदावर्तेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. या बैठकीत मिंधे गट आणि सदावर्ते गट यांच्यात तुफान हाणामारी झाली आहे. हा हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बैठकीत बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्याने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात […]
Devendra Fadanvis |सोलापुरात येत्या तीन वर्षात आयटी पार्क उभारणार : मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
सोलापूरच्या विकासासाठी कोट्यवधींची घोषणा, सोलापूर : सोलापुरात फंक्शनल विमानतळ सुरू झाल्याने येथे आयटी पार्क उभारण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. या पार्कसाठी जागेची निश्चिती होत असून येत्या तीन वर्षात हे पार्क उभारून स्थानिकांना येथेच रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र [...]
बिहार विधानसभा निवडणुका आणि आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबत अंमलबजावणी संस्थांना कडक सूचना जारी केल्या आहेत. निवडणुकीत पैसेवाटप मोफत वस्तूंचे वाटप, अमली पदार्थ आणि दारु याचा गैरवापर रोखणे हे आयोगाचे वैशिष्ट्य आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुका 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार असून त्याचे निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. निवडणूक आयोगाने पैसे, दारू, अमली पदार्थ […]
Ratnagiri News –संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना वादळी पावसाने झोडपले, भात कापणीवर परिणाम
आठ दिवस पावसाने पाठ फिरवली आणि तेवढीच संधी साधून शेतकऱ्यांनी कापणीच्या कामाला जोमाने सुरूवात केली. या सात आठ दिवसातल्या रखरखत्या उन्हात शेतकरी राबताना दिसत होते. अंगातून घामाच्या धारा वहात होत्या पण चेहऱ्यावर समाधानाचं स्मीत होते. दहा ते बारा तास शेतात मेहनत करणारे शेतकरी आपल्या मेहनतीचे पिवळे सोने पाहून हरखून गेले होते. पण अचानक आलेल्या वादळी […]
Solapur Crime : सोलापूरमध्ये पत्नीचा चारित्र्यावर संशय; चाकूने निर्घृण खून
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती पोलिसात हजर सोलापूर : चारित्र्याचा सशय घत झालेल्या भांडणात पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील न्यू बुधवार पेठ, आंबेडकर नगर येथे घडली. खुनानंतर पती स्वतःहून जोडभावी पेठ [...]
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची ५१ मुद्दयांवर लावण्यात आलेल्या चौकशी समितीचे प्राधिकृत अधिकारी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगता यांची नियुक्ती रद्द करण्याबाबत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनीदेखील शासनाला पत्र पाठवले होते. पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून […]
गाझामध्ये हमासची पुन्हा एकदा क्रूरता, भरचौकात 8 जणांवर झाडल्या गोळ्या
गाझा पट्टीवर नियंत्रण राखण्यासाठी हमासने आता क्रूर कदम उचलले आहे. आठ लोकांना भरचौकात फाशी दिली आहे. अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला युद्धबंदीचा इशारा दिला आहे. मात्र हमासने आठ जणांना इस्त्रायलचे सहकारी सांगून गोळी मारली. डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला युद्धबंदीचा इशारा देऊनही ही कारवाई करण्यात आली आहे. इस्त्रायली सैनीक बाजूला झाल्यावर हमासने गाझामध्ये आपली पकड […]
मुक्त विद्यापीठाच्या पोस्टर पेंटिंग स्पर्धेत मधुसूदन खांबल प्रथम
दोडामार्ग – वार्ताहर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठातून घेण्यात आलेल्या स्पर्धेतून सर्वेश मधुसूदन खांबल पोस्टर पेंटिंगमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. नाशिक येथे झालेल्या ८ विभागाच्या स्पर्धा मधून रावसाहेब गोकाटे कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीमती सरस्वती बाई गणशेट वाळके कॉलेज ऑफ आर्ट्स संचलित दोडामार्ग अभ्यास केंद्रांचा विद्यार्थी प्रथम क्रमांक घेऊन यशश्वी झाला आहे. [...]
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमधील राघोपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तेजस्वी यादव म्हणाले, “राघोपूरच्या लोकांनी सलग दोनदा आमच्यावर विश्वास ठेवला आहे. जनताच मालक आहे. राघोपूरमधून आम्ही तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम्हाला खात्री आहे की, राघोपूरचे लोक पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवतील. […]
kolhapur : वृत्तपत्रदिनी ‘तरुण भारत संवाद’सोबत विद्यार्थ्यांनी गिरवला स्वावलंबनाचा धडा!
‘तरुण भारत संवाद’तर्फे विविध शाळांमध्ये ‘ चला गिरवूया स्वावलंबनाचा धडा ‘ उपक्रम कोल्हापूर : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने साजरा केला जातो . या दोन्ही निमित्तांचा सुंदर संगम साधत दै. ‘तरुण भारत संवाद’तर्फे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ‘ चला गिरवूया स्वावलंबनाचा [...]
पालकमंत्री प्रताप सरनाईक कुटुंबियांसह श्री तुळजाभवानीच्या अभिषेक पूजेत सहभागी
धाराशिव (प्रतिनिधी)- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.सकाळी त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवींची विधीवत अभिषेक पूजा केली. अभिषेक पूजेनंतर त्यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या होणाऱ्या नित्य आरतीमध्ये सहभागी होऊन देवीजींच्या दर्शनाचा लाभ घेतला. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी श्री तुळजाभवानी देवीसमोर राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वागत केले.यावेळी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पीक नुकसानीचे पंचनामेही पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठविला आहे. बाधित 34 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची 9 हजार हेक्टर शेत जमीन खरडून गेली आहे. या बाधित शेतकऱ्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी खरडून गेलेल्या जमिनीवर अन्य प्रकारची शेती करता यावी यासाठी कृषी तज्ञांकडून एक महिन्याच्या आत अहवाल मागवा. असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आयोजित सभेत घेताना सरनाईक बोलत होते. सभेला मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार विक्रम काळे,आमदार कैलास घाडगे पाटील,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, सहाय्यक जिल्हाधिकारी रैवैयाह डोंगरे व निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सरनाईक पुढे म्हणाले की,खरडून गेलेल्या जमिनीवर हायड्रोफोनिक शेती कशी करता येईल याचा दूरदृष्टीने अभ्यास करण्यात यावा. पंचनामे करताना मयत जनावरांच्या पशुपालकांना तातडीने मदत करावी. पुरामुळे ज्या विहिरींचे नुकसान झाले आहे. परंतु त्या विहिरींची नोंद सातबारावर नाही अशा शेतकऱ्यांना देखील मदत करण्यात यावी. विहिरीचे नोंद सातबारावर नाही त्यांची नोंद तातडीने घेण्याची कार्यवाही करण्यात यावी असे ते म्हणाले. आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील यांनी पुरग्रस्त गावातील प्रश्न मांडले. जिल्हाधिकारी पुजार माहिती देताना म्हणाले की,अतिवृष्टी व पुरामुळे झालेला नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे. 5 लक्ष 39 हजार 355 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. 9 व्यक्तींचा मृत्यू झाला असून प्रत्येकी 4 लक्ष याप्रमाणे 36 लक्ष रुपये त्यांच्या वारसांना मदत करण्यात आली असल्याचे पुजार यावेळी म्हणाले. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,सर्व तालुका कृषी अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.
आ. केसरकरांचे पीए शिवसेना सोडण्याच्या मार्गावर ?
सावंतवाडी | प्रतिनिधी आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक तथा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर हे शिवसेना पक्ष सोडण्याच्या मार्गावरआहेत. स्वीय सहाय्यक पदावरून मुक्त करावे या दृष्टीने ते विचार करत आहेत. आमदार दीपक केसरकर सावंतवाडीत आल्यानंतर नाटेकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. श्री नाटेकर हे गेली तीस वर्षाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत.आगामी [...]
अंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत समीर पानगावकर याचे यश
वाशी (प्रतिनिधी)- बीड येथे अंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये कर्मवीर महाविद्यालय ,वाशी येथील विद्यार्थी समीर आनंद पानगावकर यांनी उज्वल यश संपादन केले आहे. विद्यापीठ संघामध्ये त्याची निवड झाली आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये समीरच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम, वरिष्ठ विभागाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.रवि चव्हाण,समीरचे पालक आनंद पानगावकर, कार्यालयीन अधीक्षक मोहन डोलारे, ग्रंथपाल प्राध्यापक राहुल कुलकर्णी, मुख्यालिपीक शिवाजी साळुंखे,स्वप्निल शेळकांदे व दत्ता फुले उपस्थित होते. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम यांच्या शुभहस्ते समीरचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की समीरच्या रूपाने महाविद्यालयाच्या शिरपेच्या मध्ये एक मानाचा तुरा रोवलेला आहे. समीरला मार्गदर्शन करणारे प्रा.कृष्णा थोरात व प्रा. डॉ.रवी चव्हाण यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. महाविद्यालयामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांचा अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा अशी माझी नेहमीच भूमिका राहिलेली आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच क्रीडा विभागाच्या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन यापुढेही महाविद्यालय देत राहील. समीरला माझ्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. सत्काराला उत्तर देताना समीर म्हणाला लहानपणापासूनच मला टेबल टेनिस या खेळाची आवड होती व इथे प्रवेश घेतल्यानंतर तसेच बार्शीला असताना प्रा. कृष्णा थोरात व प्रा.डॉ. रवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे व महाविद्यालयाच्या सहकार्यामुळे मला हे यश मिळाले यापुढेही मी महाविद्यालयाचे नाव उंचावण्याचा माझ्या परीने प्रयत्न करीन. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवी चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन प्रा. एम डी. उंदरे यांनी तर आभार ग्रंथपाल प्राध्यापक राहुल कुलकर्णी यांनी मानले.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
वाशी (प्रतिनिधी)येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम,ग्रंथपाल प्रा.राहुल कुलकर्णी, ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा.डॉ.रवी चव्हाण,प्रा.महादेव उंद्रे,कार्यालय अधीक्षक मोहन डोलारे,मुख्य लिपिक शिवाजी साळुंखे उपस्थित होते. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम यांच्या शुभहस्ते डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की,माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून तसेच जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरी करत असतो. डॉ.कलाम यांचे व्यक्तिमत्व म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असे होते. संशोधन साहित्य या विभागामध्ये त्यांचे कार्य मोठे आहे.त्यांना मानाचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतरही त्याचे त्यांना विशेष वाटले नाही यावरूनच ते किती साधे होते हे आपणास दिसून येते.भारत देशाला महासत्ता बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची प्रचंड आवड असल्यामुळेच अखेरच्या श्वासापर्यंत ते काम करत राहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्राध्यापक राहुल कुलकर्णी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एम. डी. उंद्रे यांनी तर आभार क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.रवी चव्हाण यांनी मानले. यावेळी सूर्यकांत धोत्रे,तुषार कवडे,कुमारी रवीना जगदाळे, दत्ता फुले व ग्रंथालय परिचर प्रविण बारगजे उपस्थित होते.
के. टी. पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, धाराशिव येथे वाचन प्रेरणा दिन साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, के. टी. पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, धाराशिव येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपती व डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा “ वाचन प्रेरणा दिन ” उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार मांडले. तसेच विविध प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करून त्यावर चर्चा केली. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार करणे व डॉ. कलाम यांच्या विचारांचे अनुकरण करणे हे होते. तर प्राचार्य डॉ अजित मसलेकर यांनी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा.शुभम पाटील, प्रा.राघवेंद्र मुंढे डॉ. पटेल मॅडम , प्रा. भदे(पवार) मॅडम, प्रा. वराळे मॅडम,प्रा कापसे मॅडम व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
Solapur : बनावट अॅपद्वारे अविवाहित मुलींची फसवणूक; तोतया पीएसआयला अटक !
‘जीवनसाथी’ अॅपवर फसवणुकीचा जाळं; तोतया PSI अटकेत सोलापूर : बनावट जीवनसाथी अॅप तयार करून त्याच्या माध्यमातून अविवाहित मुलींना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास शहर सायबरच्या पोलिसांनी मुंबई येथे अटक केली आहे. वैभव दीपक नारकर (वय-३१, रा. मूळ गोविंद तालुका लांजा [...]
ज्ञान मिळविण्यासाठी वाचन महत्त्वाचे - डॉ शहाजी चंदनशिवे.
परंडा (प्रतिनिधी)- ज्ञान मिळविण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे वाचन केल्याशिवाय या जगातील कोणतीही माहिती घेणे शक्य नाही.देशातील महापुरुषांचे विचार आत्मसात करण्यासाठी त्यांचे कार्य माहित करून घेण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. परंतु अनेक लोक वाचनापासून दूर आहेत.समाजात होत असणाऱ्या विविध घटना अंधश्रद्धा अन्याय अत्याचार कायद्याची माहिती या सर्व गोष्टी माहिती करून घेण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. श्रीभवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा धाराशिव येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने यांच्या हस्ते डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे गणित विभाग प्रमुख डॉ.विद्याधर नलवडे ,कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे, ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख ,वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ.संतोष काळे प्रा.तानाजी फरतडे ,प्रा.वरपे, शिक्षकेतर कर्मचारी अनिल जानराव, वसंत राऊत, भागवत दडमल ,विशाल नलवडे ,रामराजे जाधव, दत्ता आतकर यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ वरीष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याबाबत गुरूवारी (दि.16) मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ढोकी येथील बस स्थानकासाठी शिवसेनेचे (शिंदे) राज्य आंदोलन समन्वयक अॅड. तुकाराम शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने ही बैठक घेण्यात येत असल्याची माहिती अॅड.शिंदे यांनी दिली. या बैठकीस धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे व्हीसीद्वारे सहभागी होणार आहेत. तर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक, राज्य आंदोलन समन्वयक अॅड. तुकाराम शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांचे विशेष कार्य अधिकारी दिनेश कुर्हाडे बैठकीच्या अनुषंगाने पत्राद्वारे संबंधितांना कळविले आहे. ढोकी येथील गायरान किंवा कृषी विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण होत असल्याने तात्काळ बैठक घेवून या जागेवर अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याकरिता बैठक घेण्यात यावी अशी मागणी अॅड. तुकाराम शिंदे यांनी केली होती. ढोकी येथे मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील 25 गावांचा दैनंदिन संपर्क या गावाशी आहे. म्हणून गट क्रमांक 35 मधील गायरान जमिनीची मागणी करून सार्वजनिक उपयोगाकरिता ही जागा मिळाणे गरजेचे असल्याचे त्यांनी परिवहन मंत्र्यांना निवेदनाद्वारे कळविले होते. त्याअनुषंगाने ही बैठक होत असल्यामुळे ढोकी येथील अत्याधुनिक बस स्थानकाचा प्रश्न बैठकीत मार्गी लागेल असा विश्वासही अॅड. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
देशाला आण्विक क्षेत्रात मजबूत करण्यात डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाटा- प्रा. ए. झेड. पटेल
धाराशिव (प्रतिनिधी)- शास्त्रज्ञ म्हणून डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा नावलौकिक होताच, पण त्यांची सगळ्यात मौलिक कामगिरी म्हणजे शास्त्रज्ञ म्हणून देशाला आण्विक क्षेत्रात मजबूत करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. ए. झेड. पटेल यांनी केले. भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. ए. झेड. पटेल, डॉ. उषा वडणे, प्रा. सुनीता गुंजाळ, डॉ. राजश्री यादव, प्रा. वर्षा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात यावेळी वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी प्रेरित केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथालयात भरवलेल्या पुस्तक प्रदर्शन आणि वाचन प्रेरणा दिनासाठी ग्रंथालय कर्मचारी सहाय्यक ग्रंथपाल बी. जी. सिरसट, डी. आर. जाधव, सविता नलावडे, सूक्ष्ममा टेकाळे, संभाजी धात्तुरे, हनुमंत सुरवसे आणि इंदुबाई कांबळे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजश्री यादव यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. वर्षा पाटील यांनी मानले.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने वाय.बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. ”महाराष्ट्रातले सर्व विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयुक्तांना भेटले व निवेदन दिले. त्या निवेदनातून महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमधील अनंत चुका दाखवल्या. केंद्रीय निवडणूक आयुक्तांना सर्व काही […]
सौ. शमिका नाईक यांच्या “सुरभी”काव्यसंग्रहाचे प्रकाशन
काव्यसंग्रहात सामाजिक, कौटुंबिक, नैसर्गिक जीवनावरील कवितांचा समावेश ओटवणे | प्रतिनिधी पूर्वाश्रमीच्या इन्सुली येथील आणि सध्या चराठा येथील सौ शमिका समीर नाईक यांच्या “सुरभी” या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. माजगाव पंचक्रोशी मन विकास ग्रंथालय मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे औचित्य साधून हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.यावेळी सावंतवाडीच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत [...]
Eknath Shinde |एकनाथ शिंदे लेना बँक नाही, देना बँक आहे ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना डिवचलं
सातारा जिल्ह्यात लवकरच शिवसेनेचा वटवृक्ष उभा राहील : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा : “सातारा जिल्ह्यात लवकरच शिवसेनेचा वटवृक्ष उभा राहील,” असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. साताऱ्यातील शिवसैनिकांच्या प्रचंड उत्साहाने भारावून जाऊन ते म्हणाले “माझ्या शिवसैनिकांवर आणि माझ्या भारत देशातील सैनिकांवर मला सार्थ अभिमान [...]
जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ताधाऱ्यांकडून पक्षप्रवेश : वैभव नाईक
पोईप गावात ठाकरे शिवसेनेची बैठक मालवण । प्रतिनिधी वेगवेगळ्या आमिषांना भुलून काहीजण सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. मात्र निष्ठावंत शिवसैनिक अजूनही आमच्या पाठीशी आहेत हे आजच्या उपस्थिती वरून दिसून येते. सध्याच्या आमदार, खासदारांनी आपले मॅनेजर नेमले असून त्या मॅनेजरांकडून लोकांना खोटी आश्वासने,आमिषे देऊन प्रवेश घेतले जात आहेत. आमदार, खासदार मात्र जनतेच्या समस्या जाणून घेताना कोठेही [...]
आपत्तीच्या छायेतून नव्या उजाडीकडे वाटचाल - पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव (प्रतिनिधी)- “आपत्तीने भूमी हादरली, पण माणसाचा आत्मविश्वास डगमगला नाही” या वाक्यात साडेसांगवीकरांच्या जिद्दीचं सार दडलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुराच्या तडाख्यात सापडलेल्या या भूमीत आज पुन्हा आशेचे दिवे पेटले आहेत. आपत्तीच्या छायेतून नव्या उजाडीकडे वाटचाल चालू आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी रात्री भूम तालुक्यातील पूरग्रस्त साडेसांगवी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील हनुमान मंदिरासमोर दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगा,सून व नातू ,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, सहायक जिल्हाधिकारी रैवैयाह डोंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की,“मी तुमच्या दु:खात सहभागी आहे आणि साडेसांगवी पुन्हा फुलवणं ही आमची जबाबदारी आहे.”साडेसांगवी हे केवळ एक गाव नाही,तर शेतकऱ्यांच्या श्रमाची आणि जनतेच्या आत्मविश्वासाची भूमी आहे. तब्बल 173 हेक्टरवरील पिकं वाहून गेली, 281 शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग, उडीद, द्राक्ष आणि केळी पिकं नष्ट झाली. काहींची जमीनच खरडून गेली. तरीही त्यांनी आशेचा दिवा विझू दिला नाही असे सरनाईक म्हणाले. यावेळी पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. पुराच्या पाण्याने घरात घुसून कपडे,भांडी, वस्तू वाहून गेल्या.शासनाने या 42 कुटुंबांना तातडीने मदत म्हणून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. सहा घरांची पडझड झाली.दत्तात्रय डोंबाळे यांच्या एका जनावराच्या मृत्यूमुळे या शेतकऱ्याचे नुकसान झाले.शासनाने त्यांना 20 हजार रुपयांचे सहाय्य देऊन मदत केली. कार्यक्रमानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी गावाजवळील नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व साडेसांगवी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभाविप उमरगा पुनर्निर्वाचित शहरमंत्री म्हणून अमृता मुगळे यांची निवड व उर्वरित कार्यकारणी घोषित
उमरगा (प्रतिनिधी)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उमरगा शाखेच्या वतीने छात्रसत्ता विद्यार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अभाविप उमरगा शहर मंत्री म्हणून अमृता मुगळे यांची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे उपस्थित होते. निर्वाचन अधिकारी गणेश कटके यांनी शहर मंत्री यांची घोषणा केली व उर्वरित कार्यकारणी शहर मंत्री यांनी घोषित केली. तालुका संयोजक यांनी प्रास्ताविक मांडले. प्रदेश सहमंत्री यांनी अभाविप मांडणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शहर मंत्री यांनी मंत्री प्रतिवेदन केले व आगामी दिशा सांगितली. शहर सहमंत्री ऋषी चिंचोळे, ऋतुजा शिंदे, समर्थ कुंभार,शहर कार्यालय मंत्री कु.माधुरी आगडे,सोशल मीडिया संयोजक संकेत हळीखेडकर, स्टुडन्ट फॉर डेव्हलपमेंट संयोजक प्रणित जांभळे व सह संयोजक सृष्टी कस्तुरे,स्टुडन्ट फॉर सेवा संयोजक शेखर सूर्यवंशी व सह संयोजक चैतन्य जाधव,फार्माव्हिजन संयोजक सृष्टी ख्याडे व सह संयोजक रुपाली पवार,राष्ट्रीय कलामंच संयोजक सागर देडे व सह संयोजक श्रध्दा साखरे,खेलो भारत संयोजक प्रतीक्षा राठोड ,मिशन साहसी संयोजक गौरवी कटके,कोष प्रमुख ओमकार चव्हाण यांची निवड करण्यात आली.
बावी जवळ भाविकाचा वाहनातील 2 लाखाचा ऐवज लंपास
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर-धाराशिव रस्त्यावर असणाऱ्या बावी आश्रम शाळेजवळ श्रीतुळजाभवानी दर्शनासाठी जाणारी गाडी थांबली असता तीन व्यक्ती ने आतील 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असे एकुण 2 लाख 5 हजार रुपयाचा मुदेमाल चोरुन नेल्याची घटना सोमवार दि 12 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.00 वाजता घडली. या बाबतीत अधिक माहीती अशी कि, अशोक अर्जुन खरात, वय 51 वर्षे, रा. विजयपुर (विजापूर) ता. जि. विजापूर ह.मु. गुलबर्गा हे टाटा नेक्सॉन गाडी क्र केए 28 एमए 2006 मध्ये देवदर्शनासाठी तुळजापूरकडे जात असताना दि. 13.10.2025 रोजी 02.00 वाजण्याच्या सुमारास बावी आश्रम शाळेच्या ब्रिजच्या पुढे रोडचे बाजूला बावी पाटी येथे गाडीतुन खाली उतरुन गाडीचा दरवाजी उघड ठेवून नैसर्गिक विधीसाठी गेले असता तीन अज्ञात व्यक्तीने गाडीतुन 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 10 हजार रूपये व मोबाईल फोन असा एकुण 2 लाख 5 हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. अशी फिर्यादी अशोक खरात यांनी दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी दिल्यावरुन धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
प्रा.डॉ.मनोज डोलारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनोज डोलारे यांना त्यांच्या पर्यावरणीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशन, पुणे कडून महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. इकॉनॉमिक्स टाईमचे संपादक डॉ.अविनाश सकुंडे, बालगंधर्व कला मंच पुणेचे अध्यक्ष पै.निलेंद्र यादव, मराठी सिनेअभिनेत्री फाल्गुनी झेंडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रा.डॉ.मनोज डोलारे यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथील शिवाजीनगरमधील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्यास आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे राकेश पावरा, मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कनखरे व आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशनचे संस्थापक गणेश विटकर, उद्योजक, समाजसेवक, कलावंत आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.डॉ.डोलारे मागील 15 वर्षापासून मराठी अध्यापनाचे कार्य करत आहेत. विद्यादानासोबतच पर्यावरणीय तसेच सामाजिक क्षेत्रात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक, जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य, बी.एन.एच.एस.चे जिल्हा समन्वयक अशा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील विविध पदांवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पक्षीसंवर्धनातील त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक तसेच वन्यजीव छायाचित्रकार म्हणून ते जनमानसात परिचित आहेत. वृक्षारोपण व संवर्धन, पक्षांसाठी कृत्रिम घरटे बनवणे, त्यांना दाण्यापाण्याची सोय करणे, पक्षी गणना करून त्यांचा अभ्यास करणे, विद्यार्थ्यांमध्ये, जनमानसात पर्यावरण तसेच पक्षांचे महत्त्व बिंबवणे यासाठी कार्यशाळा घेणे. विद्यार्थ्यांना रानफुले, फुलपाखरे, पक्षी, वन्यजीव, वनस्पती यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणातून निसर्गाच्या जवळ नेण्यासाठी नेचर वॉक, ट्रेकिंग, अभ्यास भ्रमंती यांचे सतत आयोजन ते करत असतात. तसेच त्यांच्या एक्स-ट्रीम फिटनेस क्लब या व्यायाम शाळेच्या माध्यमातून युवकांची शरीरे घडावीत, आहार व व्यायाम याबाबतीत जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सामाजिक बांधिलकी जपत असतानाच महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू व ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिरे, युवकांसाठी विविध विषयावर मार्गदर्शन वर्ग, विधवा तसेच गरजू महिलांसाठी शिलाई मशिन, शेळी वाटप, रक्तदान शिबिरे, व्याख्यानमाला असे विविध उपक्रम ते आयोजित करत आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, ठेवा यांच्याबद्दल जाणीव जागृती व्हावी म्हणून दरवर्षी ऐतिहासिक वास्तूंना विद्यार्थ्यांसह ते भेटी देतात. या सर्व पर्यावरणीय, सामाजिक तसेच शैक्षणिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशनने त्यांची निवड करुन त्यांना सन्मानित केले. प्रा.डोलारे यांना मिळालेल्या पुरस्काराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धाराशिव महिला सेना जिल्हाप्रमुखपदी मिनाताई सोमाजी यांची नियुक्ती
तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे श्रीतुळजाभवानी मंदीरात पालक तथा परिवहन मंञी प्रताप सरनाईक यांचा हस्ते बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी देण्यात आले. नियुक्ती पञात म्हटल आहे कि, हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. यावेळी जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहर संघटक प्रशांत उर्फ नितीन मस्के, उप शहरप्रमुख रमेश चिवचवे, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, अंकुश रुपनर, गणेश पाटील, संजय लोंढे सर्व पदाधिकारी शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकीच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पुरग्रस्ताना
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचालित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत देण्यात आली. या उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये आपले एक दिवसाचे वेतन रुपये सत्यान्नव हजार एकशे त्रेसष्ट रकमेचा धनादेश मा. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार सुपूर्द करण्यात आले. या वेळी माया माने तहसीलदार तथा व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, प्राचार्य डॉ.ओमप्रकाश राजनकर, तसेच प्रा. डॉ. गणेश मोटे उपस्थित होते.
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या संघर्षाला यश, फरक बिलाची अंमलबजावणी सुरू
वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या फरक बिलाच्या प्रश्नावर पंचायत समितीकडून अखेर निर्णय घेण्यात आला असून, फरक रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे कॉ. पंकज चव्हाण यांनी वाशी पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्या समोर ठाम व मुद्देसूद मांडणी करत प्रभावी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांना यश येताच पंचायत समिती प्रशासनाने फरक बिलाच्या अंमलबजावणीस मान्यता देत तातडीने कार्यवाही सुरू केली. महासंघाने या मागणीसाठी यापूर्वी निवेदन दिले होते. मात्र ठराविक कालावधीत रक्कम जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली होती. अखेर झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत फरक बिलाचा प्रश्न मार्गी लावला. संघर्षाला यश, कर्मचाऱ्यांत उत्साह फरक बिलाच्या अंमलबजावणीमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघटनेतर्फे कॉ. पंकज चव्हाण यांचे नेतृत्व आणि प्रभावी भूमिका याबद्दल कौतुक करण्यात आले. त्यांच्या पुढाकारामुळे कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागणीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती या आंदोलनाला वाशी उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य भास्कर शिंदे, अहमद भाई काझी, पत्रकार शाहजी चेडे, सामाजिक कार्यकर्ते गवारे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. उपोषण सोडविण्याच्या प्रसंगी गटविकास अधिकारी ओकार गायकवाड, सुरेश कवडे, कॉ. पंकज चव्हाण, तसेच पंचायत विस्तार अधिकारी विलास माचवे उपस्थित होते. तालुका कार्यकारिणीची निवड यावेळी तालुका कार्यकारिणीची निवड ही पार पडली. जिल्हा सचिव चंद्रशेखर काशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत खालील पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष बिभीषण लोकरे, उपाध्यक्ष मनोज लाखे, सचिव किरण शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी राहुल डोके, ज्ञानेश्वर फरताडे, श्रीकांत जगताप, रामेश्वर पंडित, धनंजय वाघमारे, दिनकर जोगदंड यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त “ कायदेविषयक जनजागृती शिबीर व पूरग्रस्तांना मदत
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव आणि तालुका विधी सेवा समित्या यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाण ठेवत मौजे कौडगाव (ता. परांडा) येथे नुकतेच पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप तसेच कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनात सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या पुढाकाराने व जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात कौडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “राष्ट्रीय बालिका दिन” निमित्त आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा,बालस्नेही योजना तसेच राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या योजना या विषयांवर माहिती देण्यात आली. परांडा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी जिल्हाभरातील न्यायाधीशांच्या वतीने संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी श्री.एफ.ए.एम.ख्वाजा, जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश,परांडा,श्रीमती भाग्यश्री पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,धाराशिव, ए.ए.शेख,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर, परांडा,श्री.सूर्यभान हाके, गटशिक्षणाधिकारी,परांडा,शाळेचे मुख्याध्यापक श्री.सरोदे,सरपंच श्री.हजारे, विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयास वैद्यकीय साहित्य वितरण व रूग्णांना फळवाटप
भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य वेंगुर्ले (वार्ताहर)- भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रूग्णालय वेंगुर्ले येथे वैद्यकीय साहित्य संच तसेच उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला व पुरुष रुग्णांना फळेवाटप कार्यक्रम भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी उपस्थित मान्यवरांत भाजपाचे प्रदेश सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष [...]
पंचनाम्यात चूक असेल तर दुरुस्ती केली जाणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे जाहीर ग्रामसभेत जाहीर वाचन केले जाणार आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची व्याप्ती चुकीची नोंदविली गेली असेल तर त्यात वेळीच दुरुस्ती करता येणार आहे. पंचनामा म्हणजे पुरावा आहे. शासनाकडून मदत मिळताना हा पंचनामा सर्वात महत्वाचा मानला जातो. त्यामुळे आपण सर्वांनी ग्रामसभेत जाहीर वाचन होत असताना प्रत्येक कुटुंबाच्या नुकसानीची आकडेवारी लक्षपूर्वक पाहून घ्या. क्षेत्र योग्य लागले आहे काय, जमीन खरवडून गेल्याची नोंद आहे काय? ड्रीप, पंपसेटचा उल्लेख करण्यात आला आहे काय? हे पाहून चुकीची माहिती तातडीने दुरुस्त करून घ्या जेणेकरून आपल्याला भरीव मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य होईल. असे आवाहन मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे भाजपाचे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आणि मदत वाटप करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुती सरकार ठामपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. अडचण मोठी आहे. नुकसानही मोठे झाले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असा निसर्गाचा प्रकोप आपल्याला नेहमीच सहन करावा लागत आहे. तरीदेखील खचून न जाता आपण प्रत्येकवेळी उभारी घेतली आहेच. यावेळीही पुन्हा एकदा या संकटावर मात करून आपण ताठ मानेने उभे राहणार आहोत. अशावेळी आम्ही सगळे आणि आपले महायुती सरकार आपल्यासोबत आहे. तुम्ही एकटे नाहीत हाच विश्वास आणि दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दरेकर याठिकाणी आले असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, विकास कुलकर्णी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विमा न भरलेल्यांनाही मदत प्रशासनाकडून सध्या पीक कापणी प्रयोग व्यवस्थित सुरू आहेत. त्यावर आपले जातीने लक्ष आहे. वेळोवेळी त्याची इत्यंभूत माहिती आपण घेत आहोत. पिकविम्याच्या माध्यमातून हेक्टरी 30 हजार रुपयांपर्यंत मदत मिळावी असे आपले प्रयत्न सुरू आहे. ज्यांनी पीकविमा भरलेला नाही त्यांनाही मदत मिळणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले.
अमरावती येथील आमदार प्रवीण पोटे पाटील यांची पुरग्रस्तांना मदत
धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.13 ऑक्टोबर रोजी अमरावती येथून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या 'पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप'तर्फे अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या 3 ट्रक्सला झेंडा दाखवून रवाना केले होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. अतिवृष्टीग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन आलेल्या त्या 3 ट्रक्सचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होताच भाजपाकडून स्वागत करण्यात आले. या वस्तूंमध्ये दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंचाही समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेसमोर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मदतीचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत भाजपा नेते माजी मंत्री तथा अमरावतीचे आमदार प्रविण पोटे पाटील आणि त्यांचे सुपुत्र श्रेयशदादा पोटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या 'पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप'तर्फे मदतीचा मोठा हात पुढे करत अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यासाठी 3 ट्रक भरलेले अन्नधान्य, कपडे आणि घरगुती आवश्यक साधनसामग्री पाठवले आहे. सदरील साधन सामुग्री जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत थेट गरजूंना वितरित करण्यात येणार आहे. या ट्रक्सचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होताच प्रमुख अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, माजी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, मकरंद पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Satara : उंब्रजमध्ये मद्यधुंद परप्रांतीयाच्या दुचाकीने दहावीचा विद्यार्थी गंभीर जखमी
मद्यधुंद परप्रांतीय दुचाकीस्वाराकडून धडक ; दहावीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी उंब्रज : उंब्रज ता.कराड येथील कॉलेज रोडवर दहावीच्या विद्यार्थ्यांला मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या परप्रांतीय दुचाकी स्वाराने जोराची धडक दिली. या अपघात इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर उंब्रज येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवार दि.१४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या ही [...]
ऑरगॅनीक शेती:ट्रायकोडरमा जैविक बुरशीचा बिजोपचारासाठीचे शेतीमध्ये प्रात्यक्षिक
नळदुर्ग (प्रतिनिधी)- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. उध्दव भाले यानी मराठवाडयातील काळ्या मातीमधून ट्रायकोडरमा नावाच्या जैविक व मैत्र बुरशीचे वाण वेगळे करून प्रयोगशाळेत विकशीत केलेले आहे. ट्रायकोडरमा शेतीसाठी अतिशय उपयुक्त सूक्ष्मजैविक आहे. हे जैव-खतआणि जैव-कीटकनाशक दोन्ही म्हणून काम करते. ट्रायकोडरमा हे मातीतील रोगांवर नियंत्रण करते.ट्रायकोडरमा जमिनीत असलेल्या हानिकारक बुरशीवर (जसे Fusarium, Rhizoctonia,Pythium, Sclerotium,Macrophomina ) आदी परजीवीसारखे वाढते आणि त्यांना नष्ट करते. त्यामुळे मुळकुज, खोडकुज कोंबकुज आदी सारख्या रोगांवर नियंत्रण ठेवते.ट्रायकोडरमाच्या वापराने मुळांची वाढ वाढवते आणि मुळांच्या आसपास वाढून ती मातीतील पोषक द्रव्ये अधिक कार्यक्षमतेने शोषतात.त्यामुळे पिकाची वाढ, हिरवळ आणि उत्पादन क्षमता वाढते.जैव-खत म्हणूनही ट्रायकोडरमा मातीतील फॉस्फरस आणि इतर सूक्ष्म घटक पिकाला उपलब्ध करून देते.जमिनीतील जैविक क्रियाशीलता वाढवते. तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करते:जैविक नियंत्रणामुळे रासायनिक औषधांचा वापर कमी होतो, पर्यावरण पूरक शेतीस मदत होते. बीजोपचारासाठी म्हणजे बियाणे पेरण्यापूर्वी ट्रायकोडरमा च्या मित्रणाने/ जिवंत पावडरने बियाणे वाळवून लावल्यास बियाण्याची उगवण क्षमता चांगली होते आणि रोगांपासून संरक्षण मिळते. खरीप रब्बी व उन्हाळी जसे की भात, गहू, कडधान्ये, अन्नधाने, सोयाबीन, कापूस, अद्रक, हळद ऊस, भाजीपाला, फळबाग इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त. त्या अनुशंगाने आज बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक मा प्रदीपकुमार शरणप्पा मंटगे यांच्या जळकोट, जळकोटवाडी शेतामध्ये प्रत्यक्षपणे हरभरा व ज्वारीच्या बियाणावर ट्रायकोडरमा हरजीयाना या जैविक बुरशीच्या वाणाचा वापर कसा करावा तशा अनुसंघाचे बियाणा ट्रीटमेंट देण्याचे प्रात्यक्षिके करून दाखवले.आणि ते बियाणे तयार झालेल्या शेतीमध्ये लागवड करण्यात आली. हा प्रयोग वनस्पतीशास्त्र विभागामार्फत “एक्सटेंशन ऍक्टिव्हिटी इन फार्मर्स फिल्ड“ च्या अंतर्गत करण्यात आली त्यामध्ये जवळजवळ 15 शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकांचा लाभ घेतला भविष्यामध्ये अशा प्रकारचे ऑरगॅनिक शेती तंत्रज्ञान विकसीत करून आधुनिक शेती करण्याचा मानस निर्माण केला.अशाप्रकारे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोलाचे अशा प्रकारचे संशोधन करून ते संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे.हा एक्सटेंशन या कार्यक्रमांमध्ये बसवेश्वर फार्मसी महाविद्यालय लातूर आणि बालाघाट शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांच्यात सामंजस करारानुसार शेतकऱ्यांच्या अनुषंगाने तेथील एम फार्मसी चे दोन विद्यार्थी त्यामध्ये श्री ओमकार रणखांब आणि घनश्याम निरगुडे या दोन विद्यार्थ्यांनी या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवून नळदुर्ग महाविद्यालयाने फार्मसी महाविद्यालयातील सामंजस्य करारातील कार्यप्रणाली यशस्वीपणे पार पाडली.प्रात्यक्षिकामध्ये संशोधक विद्यार्थी किरण हंताळकर निकिता कांबळे जळकोट जळकोटवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.अशा ह्या कार्यप्रणालीवर बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक मा प्रदीपकुमार मंटगे फार समाधानी आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेल्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासाठी आभारीही मानले आहेत.
Sangali News : सांगलीत वडाप रिक्षांना हाकलले….
भाजप नेते पृथ्वीराज पवार वडाप वाल्यांची केली घेराबंदी सांगली : पोलिस, एसटी, वाहतूक नियंत्रक, आरटीओ या सर्व विभागांना झुगारून, आरेरावी करत एसटी स्थानकासमोरून वडाप वाहतूक करणाऱ्या रिक्षावाल्यांना आज हाकलून काढण्यात आले. भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी त्यांची घेराबंदी केली. ते या प्रश्नी रस्त्यावर उतरल्याने एसटीचे अधिकारी, पोलिस कर्मचारी, आरटीओ अधिकारीही [...]
Photo –सर्वपक्षीय शिष्टमंडळ पुन्हा निवडणूक आयुक्तांना भेटले
महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्यातील निवडणूक याद्या आणि प्रक्रीयेत असलेल्या घोळाबाबत आक्षेप मांडले. या शिष्टमंडळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, युवासेनाप्रमुख, शिवसेना […]
Kolhapur : दारुसाठी पैसे देत नसल्याने मुलाकडूनच आईचा डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून
कोल्हापुरातील साळुंखे पार्क परिसरात आज पहाटे घडली घटना कोल्हापूर : .कोल्हापूरातून आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे..दारूसाठी पैसे देत नसल्याने नराधम मुलग्यानेचं आपल्या सावत्र आईच्या डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. कोल्हापुरातील साळुंखे पार्क परिसरात आज पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.. सावित्रीबाई [...]
दररोज आवळा आणि काळी मिरी एकत्र खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
बदलत्या ऋतूंमध्ये आहारात बदल करण्यासोबत काही पदार्थांचा देखील समावेश केला पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, आवळा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आवळा हे एक हंगामी फळ आहे, म्हणून ते फायदेशीर आहे. म्हणूनच हे हिवाळ्यात देखील खाल्ले जाऊ शकते. काळी मिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा उबदारपणाचा प्रभाव असतो आणि हिवाळ्यात चहामध्ये ते अनेकदा खाल्ले जाते. आवळा […]
Satara : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक अरुणराव गोडबोले काळाच्या पडद्याआड !
ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक अरुणराव गोडबोले यांचे निधन सातारा: येथील ज्येष्ठ कर सल्लागार, साहित्यिक, चित्रपट निर्माते आणि सातारा शहरातील ज्येष्ठ सामाजिक नेते अरुणराव रामकृष्ण गोडबोले (वय ८२) यांचे मंगळवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास दु:खद निधन झाले. त्यांच्या मागे बंधू अशोक व डॉ. अच्युत, पत्नी अनुपमा,मुलगा उदयन, [...]
मलेरिया होऊन गेल्यानंतर आहारात काय बदल करणे गरजेचे आहे, वाचा
मलेरिया ताप हा सहसा संक्रमित मादी डासाच्या चाव्यामुळे होतो आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळतात. तो टाळण्यासाठी, तुमच्या सभोवतालची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. ऑक्टोबरमध्ये डास देखील मुबलक प्रमाणात असतात, म्हणून या काळात संरक्षण देखील आवश्यक आहे. या काळात हवामान देखील बदलत असते, त्यामुळे लोक अनेकदा याला साधा विषाणूजन्य ताप समजतात. मलेरिया तापानंतर शरीर बरे होण्यासाठी […]
मतदार यादीतील घोळ सुधारत नाहीत, तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये; उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका
राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय आणि राज्याच्या मुखअय निवडणूक आधिकाऱ्यांची मंगळवारी आणि बुधवारी भेट घेत निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील घोळ याबाबत चर्चा केली. या भेटीनंतर सर्वपक्षीयांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणूक निःष्पक्षपातीपणे झाली पाहिजे, अन्यथा इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे […]
मतदार याद्यांमधील घोळ आणि लपवाछपवीविरुद्ध सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम व राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सर्वपक्षीयांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. तसेच मतदार याद्यांमध्ये कशाप्रकारे घोळ आहेत ते उदाहरणासहित दाखवून दिले. ”काल आम्ही […]
Sangameshwar News –मद्यधुंद मुलाने आईच्या डोक्यात लाकूड मारून केले गंभीर जखमी
दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाने पत्नीला शिवीगाळ करण्यावरून हटकणाऱ्या आई-वडिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिपळूण तालुक्यातील देवखेरकी, तळ्याचीवाडी येथे 12 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8 वाजता ही घटना घडली. इतकेच नव्हे, तर भांडणात सोडवा-सोडव करण्यासाठी आलेल्या आईच्या डोक्यात चुलीतील लाकूड मारून तिला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी फिर्यादी राजेंद्र गुणाजी हळदे (53) यांनी […]
Sangali Protest News : सरसकट कर्जमाफीशिवाय स्वस्थ बसणार नाही : संजयकाका पाटील
शेतकऱ्यावर अस्मानी संकट आले असून शेतकरी कर्जबाजारी झाला तासगाव : अतिवृष्टीने बागायत, जिरायत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यावर अस्मानी संकट आले असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कर्जमुक्ती सरकारची जबाबदारी आहे. बळीराजाच्या, जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज आज क्षीण झाला आहे, असे स्पष्ट करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी होणे आवश्यक असून [...]
काय आहेत सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे, जाणून घ्या
वेगवान जीवनशैली, वाढता ताण आणि चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींमुळे, जगभरात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दरवर्षी अंदाजे १.८ कोटी लोक हृदयाशी संबंधित आजारांमुळे मरतात. त्यापैकी अंदाजे एक तृतीयांश हृदयविकार असतात. तज्ज्ञांच्या मते सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे स्पष्ट लक्षणांशिवाय होणारे हृदयविकार. रुग्णाला सामान्य हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणे तीव्र वेदना किंवा अस्वस्थता जाणवत नाही म्हणून […]
Sangli |महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन सांगली होणार : पै. चंद्रहार पाटील
9 नोव्हेंबरला सांगलीत राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत अधिवेशन सांगली : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन सांगली जिल्ह्यात रविवारी ९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या अधिवेशनाचे आयोजन सांगली जिल्हा शिवसेना आणि डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने केले आहे. अधिवेशनाला शिवसेना पक्षाचे मुख्य। नेते व राज्याचे [...]
छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेचा दीपोत्सव, उद्धव ठाकरे करणार उद्घाटन
छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेचा दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या दीपोत्सवाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मनसेकडून साजरा होणार दीपोत्सव हा गेल्या काही वर्षांपासून आकर्षणाचा विषय ठरत आहे. या दीपोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज परिसरात नेत्रदीपक रोषणाई केली जाते. […]
Sangli : कोल्हापूर रोडवरील अधिकृत खोक्यांच्या पुनर्वसनासाठी उपोषण
सांगलीत खोकीधारकांचे बेमुदत उपोषण सुरू; पुनर्वसनाची मागणी सांगली: कोल्हापूर रोडच्या रस्ता रुंदीकरणामध्ये महापालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहीम राबवून काढलेल्या अधिकृत खोक्यांचे पालिका प्रशासनाने पुनर्वसन करावे या मागणीसाठी खोकीधारक संघटनेच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पालिकेच्या नवीन इमारती समोर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.. आयुक्तांच्या दालनात कोल्हापूर रोड येथील अधिकृत खोकीधारकांच्या चर्चे [...]
महाभारतातील ‘कर्ण’काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन
मनोरंजनसृष्टीसाठी एक वाईट बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. बुधवारी साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले असून कारण स्पष्ट झालेले नाही.
निरोगी राहण्यासाठी ‘हे’सोपे नियम पाळायलाच हवेत, वाचा
आपण प्रत्येकजण कधी ना कधी काही ना कारणाने आजारी पडतो. आपल्या प्रत्येकाला निरोगी राहायचे असते. परंतु अनेकदा चुकीच्या सवयींमुळे मात्र आपण आजारी पडतो. निरोगी राहण्यासाठी कठोर आहाराचे पालन करणे किंवा जास्त व्यायाम करणे आवश्यक नाही. साध्या सवयींचा अवलंब करून चांगले आरोग्य राखण्यास मदत होते. निरोगी राहण्यासाठी आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी येथे काही सोपे नियम आहेत. […]
Photo –चेटकिणीच्या लूकमधील ‘या’अभिनेत्रीला ओळखले का?
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे या लवकरच आपल्याला चेटकिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाहच्या काजळमाया या मालिकेतून कनकदत्ताची भूमिका साकारणार आहेत. विलक्षण सुंदर आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका असून या मालिकेत पर्णिकाच्या आईच्या भूमिकेत प्रिया बेर्डे दिसणार आहेत.
Kolhapur : अन्यथा दूध उत्पादक जनवारांसह गोकुळवर भव्य मोर्चा !
गोकुळच्या डिबेंचर कपातीविरोधात दूध उत्पादकांचा उद्या मोर्चा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळने दूध संस्थांकडुन कपात केलेली डिसेंबरची रक्कम तत्काळ परत करावी, अन्यथा उद्या १६ रोजी गाय, म्हैस जनावरांसह शासकीय विश्रामगृह येथून गोकुळवर दूध उत्पादक भव्य मोर्चा [...]
म्हापसा दोराडा : दोन बांगलादेशींना अटक
बंगलूर येथे बांगलादेशींच्या वस्तीतून आवळल्या मुसक्या : त्यांच्याचघरातचारबांगलादेशींनीमिळूनशिजवलाकट म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथे 7 ऑक्टोबर रोजी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोघा दरोडेखोरांना पकडण्यात अखेर राज्य पोलिसांना काल मंगळवारी यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या या दोघांच्या घरात म्हापशातील दरोड्याचे नियोजन करण्यात आले होते. हे दोघेही मुख्य संशयित नसून अन्य चारजण मुख्य संशयित असून त्यांनीच [...]
ईडीकडून 1.25 कोटीचे ‘क्रिप्टो’ चलन जप्त
हणजूणकोमुनिदादचीजमीनविक्रीप्रकरण: नोंदणीआणिडिजिटलरेकॉर्डजप्त पणजी : राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार शोध मोहीम राबवून सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये किमतीचे क्रिप्टो करन्सी चलन जप्त केले आहे. ‘मेसर्स थिंकिंग ऑफ यू’चे भागीदार उमर झहूर शाह आणि नीरज शर्मा आणि मेसर्स [...]
Kolhapur : बनावट नोटा प्रकरणी गाधीनगर मधून एकास अटक
बनावट नोटा प्रकरणात मास्टरमाइंड अभिजीत पवार अटकेत कोल्हापूर : एक कोटी रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करुन विक्री प्रकरणी गांधीनगर येथून आणखी एकास अटक केली. बनावट नोटांचे डिझाईन तयार करुन देणाऱ्या अभिजीत राजेंद्र पवार (बय ४०, रा. शांतीनगर, [...]
शनिवार13 डिसेंबररोजीमतदान,अधिसूचनाजारी पणजी : येत्या शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी गोव्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतची अधिसूचना पंचायत खात्यातर्फे काढण्यात आली आहे. एकंदरीत निवडणुकीचा कार्यक्रम कालांतराने जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता पुढील दीड-दोन महिनाभर जि. पं. निवडणुकीची रणधुमाळी माजणार आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यामुळे मंगळवारी दैनिक तरुण भारतने प्रसिद्ध केलेले वृत्त खरे [...]
मध्यवर्तीम. ए. समितीच्याबैठकीतठराव: सीमासमन्वयमंत्र्यांनादेणारनिमंत्रण बेळगाव : भाषावार प्रांतरचनेनंतर मराठी भाषिक भूभाग कर्नाटकाला जोडण्यात आला. याच्या निषेधार्थ दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी मूकफेरी काढून केंद्र सरकार विरुद्धचा आपला रोष मराठी भाषिक व्यक्त करतात. या मूकफेरीच्या परवानगीसाठी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. परवानगी मिळो न मिळो तसेच कोणीही आव्हान दिले तरी काळ्यादिनादिवशी मूकसायकल फेरी काढण्याचा ठराव मध्यवर्ती [...]
बनावट सोने तारण ठेवून 50 लाखांची फसवणूक
व्यावसायिकालाघातलागंडा बेळगाव : बनावट सोने तारण ठेवून एका व्यावसायिकाची तब्बल 50 लाख 20 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विक्रम विनयकुमार रेवणकर (वय 35) रा. वझे गल्ली वडगाव यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रताप आगरवाल रा. नाझर कॅम्प, वडगाव, अभिषेक कलघटगी रा. शास्त्रीनगर शहापूर, अनिकेत [...]
Kolhapur : गुंडांकडून पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण
रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास विरोध केल्याने पोलिसाला मारहाण कोल्हापूर : लक्षतीर्थ बसाहत येथे रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यापासून रोखल्याने तिघा सराईत गुंडांनी पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत मारहाण केली. कॉलर पकडून शिवीगाळ केली. सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लक्षतीर्थ बसाहत येथील शाहू चौकात ही [...]
हलगा-मच्छे बायपासची अंतिम सुनावणी १६ रोजी
शेतकऱ्यांच्याबाजूनेवकिलांचाजोरदारयुक्तिवाद, न्यायालयानेशेतकऱ्यांचीबाजूधरलीउचलून बेळगाव : झिरो पॉईंट निश्चित होत नाही तोपर्यंत हलगा-मच्छे बायपासच्या रस्त्याचा वापर करण्यात येऊ नये, शेतकऱ्यांनी यापूर्वीचे सर्व दावे न्यायालयात ज्ंिाकले आहेत. जमिनीचे व्यवस्थितरित्या भूसंपादन करण्यात आलेले नाही. त्यामुळे बायपाससाठीचा अध्यादेश येथील जमिनीला लागू पडत नाही, असा जोरदार युक्तिवाद शेतकऱ्यांच्या बाजूने अॅड. रविकुमार गोकाककर यांनी मंगळवारी तिसरे अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी [...]
अबकारी खात्याकडून 65 प्रकरणांतील अमलीपदार्थ नष्ट
बेळगाव : अबकारी खात्यातर्फे बेळगाव दक्षिण जिल्हा, धारवाड, विजापूर, बागलकोट या ठिकाणी जप्त करण्यात आलेले एकूण 34 प्रकरणांतील अमलीपदार्थ मंगळवार दि. 14 रोजी एस. व्ही. पी. केमिकल्स प्रा. लिमिटेड जांबोटी रोड, नावगे क्रॉस येथे नष्ट करण्यात आले. अबकारी खात्याच्यावतीने वर्षभरात गांजा, गांजाची झाडे, तंबाखू, हेरॉईन, हाशिश आदी प्रकारचे अमलीपदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते. [...]
वैद्यकीय क्षेत्रात डेक्कन मेडिकलची सर्वोत्तम कामगिरी
आरोग्यमंत्रीदिनेशगुंडूराव: डेक्कनमेडिकलसेंटरचारौप्यमहोत्सवीसोहळा: मान्यवरांकडूनहॉस्पिटललाशुभेच्छा बेळगाव : वैद्यकीय पेशा ही सेवा म्हणून ओळखली जाते. परंतु सध्या काही डॉक्टर व हॉस्पिटल या पेशाचा व्यवसाय करीत आहेत. वारेमाप वैद्यकीय बिल लावून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे, असे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे डॉ. दोड्डण्णवर यांच्यासारखे डॉक्टर तळागाळातील रुग्णांना उत्तम सेवा देऊन त्यांचे आरोग्य सुधारत आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश [...]
काही मतदारसंघांतून निवडणूक लढविणे अनिवार्य : पालकमंत्री
बेळगाव : बीडीसीसी बँक निवडणुकीच्या निमित्ताने काही मतदारसंघांत हातमिळवणी झाली तर काही मतदारसंघांतून निवडणूक लढविणे अनिवार्य असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. शहरात मंगळवारी (दि. 14) माध्यमांशी ते बोलत होते. निवडणूक म्हटले की पराभवाची भीती प्रत्येक उमेदवारात असतेच व भीती असलीच पाहिजे. मतदारांत ज्या उमेदवाराबद्दल आदर व आपुलकी असते तोच [...]
पृथ्वीला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया
द्वारकानाथप्रभू: आरपीडीकॉलेजच्यावतीनेव्याख्यानाचेआयोजन बेळगाव : ई-वेस्ट रोखण्यासाठी अनेक संधी असून याबाबत जागृती करणे आवश्यक बनले आहे. त्याचबरोबर उत्पादनांची योग्य निवड करणे व त्यांचा पुनर्वापर होणे आवश्यक आहे. याबाबत जागरुक राहून उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपण सर्वांनीपृथ्वीला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असे आवाहन द्वारकानाथ प्रभू यांनी केले. आरपीडी कॉलेजच्यावतीने तरुण भारत ट्रस्टच्या सहयोगाने ‘डॉ. वाय. के. प्रभू [...]
Govind Pansare Murder Case : पानसरे खून प्रकरणी तिघांना जामीन मंजूर !
गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तीन प्रमुख आरोपींना जामीन कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना मंगळवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जामीन मंजूर करण्यात आला. डॉ. वीरेंद्र तावडे, शरद भाऊसाहेब कळसकर आणि अमोल अरविंद काळे या तिघांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर [...]
हृद्याचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ही फळे आहेत सर्वात बेस्ट, वाचा
आपल्याकडे फळांचं आणि भाज्यांचं योग्य प्रकारे सेवन करणे हे फार गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी फळांचे आणि भाज्यांचे सेवन करणे हे हितावह मानले जाते. फळांमध्ये फोलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. फोलेट स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते आणि ही फळे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. जिरे आणि ओवा यांना स्वयंपाकघरातील डाॅक्टर […]
हंदिगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव 14 एप्रिलपासून
नवीनशस्त्रांचीवाद्यासहमिरवणूक: एकूणसातगावांचासहभागअसणार बेळगाव : हंदिगनूर (ता. बेळगाव) येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 14 एप्रिल 2026 पासून 22 एप्रिल 2026 पर्यंत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. ही यात्रा हंदिगनूरसह म्हाळेनट्टी, बोडकेनट्टी, कट्टणभावी, कुरीहाळ खुर्द, कुरीहाळ ब्रुद्रुक व होसोळी अशा एकूण सात गावांचा सहभाग असणार आहे. यात्रेची घोषणा केल्यापासून ग्रामस्थ व भक्तांमध्ये यात्रेची आतुरता वाढली असून [...]
विदेशात नोकरीच्या आमिषाने 12 बेरोजगारांना 10 लाखांचा गंडा
बेळगाव : विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने 12 बेरोजगारांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल 9 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सीईएन पोलीस स्थानकात अराफत महम्मद अन्सार (वय 22) रा. अझमनगर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी शालू शर्मा रा. गोविंदपुरी-दिल्ली आणि साजिद अली रा. गोविंदपुरी-दिल्ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाआहे. फिर्यादी अराफत याने 26 जून [...]
मालवण, देवगड तालुक्याची जबाबदारी अरविंद मोंडकरांकडे
काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून निवड मालवण/प्रतिनिधी आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणूकीसाठी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्याजवळ मालवण आणि देवगड तालुक्याची जबाबदारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख यांनी सोपविली आहे.शेख यांनी पाठविलेल्या नियुक्ती पत्रमध्ये असे म्हटले आहे की, आपली मालवण व देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच मालवण नगरपरिषदेसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात [...]
सोशल मीडियावरील पोस्टमुळे शुभम शेळके यांच्यावर गुन्हा
बेळगाव : म. ए. युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी कन्नड संघटनेच्या एका म्होरक्याच्या विरोधात सोशल मीडियावर विधान केल्याने त्यांच्या विरोधात मार्केट पोलीस स्थानकात मंगळवार दि. 14 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीष रुद्राप्पा शिग्गीहळ्ळी रा. अशोकनगर याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत शेळके यांना ताब्यात घेतले होते. सायंकाळी पोलीस स्थानकातच [...]