भ्रष्टाचार, लाचखोरी, वाहतूककोंडी, पाणीटंचाई, बोकाळलेली बेकायदा बांधकामे याविरुद्ध उद्या सोमवारी सर्वसामान्य ठाणेकरांचा जबरदस्त आवाज घुमणार आहे. नागरिकांनो… सामील व्हा आणि आपला संताप व्यक्त करा, असे आवाहन करीत शिवसेना आणि मनसेचा भव्य मोर्चा ठाणे महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. गडकरी रंगायतन येथून दुपारी चार वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भ्रष्टाचार […]
विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील 10 लाख तरुण-तरुणींना लाडका भाऊ योजने अंतर्गत (युवा कार्य प्रशिक्षणार्थी) रोजगार देण्याची घोषणा सरकारने केली खरी. मात्र निवडणुका संपल्यावर त्यांना वाऱयावर सोडले असून हे तरुण आता पुन्हा बेरोजगार झाले आहेत. गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना मानधनाची फुटकी कवडीही मिळाली नसल्याने 36 जिल्हय़ांतील हजारो बेरोजगार तरुणांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यात जोरदार आंदोलन केले. […]
ऑक्टोबर हीटचा मुंबईकरांना ‘ताप’!
मान्सूनने एक्झिट घेतल्यानंतर मुंबईतील ‘ऑक्टोबर हीट’च्या झळा सुरू झाल्या आहेत. कमाल तापमान 35 अंशांच्या जवळपास पोहोचू लागल्याने मुंबईकरांची लाहीलाही होत आहे. अचानक झालेली तापमानवाढ तापासह इतर आजारांना निमंत्रण देत आहे. त्यातच उपनगरांतील प्रदूषण धोक्याची पातळी गाठत आहे. पुढील काही दिवस मुंबईचा पारा 34 ते 35 अंशांच्या आसपास राहील, तसेच दिवाळीत पुन्हा पाऊस पडेल, असा अंदाज […]
अमेरिकेला जशास तसे उत्तर मिळेल! चीनचा इशारा…टॅरिफ वॉर चिघळणार
शंभर टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर चीनने आज अमेरिकेला थेट इशारा देत अमेरिकेला जशास तसे उत्तर मिळेल, असे ठणकावले. त्यामुळे दोन्ही देशांत टॅरिफ वॉर चिघळण्याची चिन्हे आहेत. दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवरील निर्बंध कठोर करण्याचा निर्णय चीनने घेतल्यानंतर ट्रम्प यांनी टॅरिफवाढीचा बॉम्ब टाकल्याने वादाला तोंड फुटले आहे. n दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीसंदर्भात आमचा निर्णय कायदेशीर […]
काबूल हल्ल्याचा सूड घेतला! अफगाणिस्तानचा अर्ध्या रात्री हल्ला; पाकिस्तानचे 23 सैनिक ठार
अफगाणी भूभाग आणि हवाई हद्दीचा वारंवार भंग करणाऱ्या आणि काबूलवर बॉम्बहल्ला करणाऱया पाकिस्तानचा अफगाणिस्तानने शनिवारी रात्री सूड घेतला. अफगाणच्या तालिबानी सैन्याने अर्ध्या रात्री पर्वतीय भागांतील पाकिस्तानी चौक्यांवर जोरदार हल्ला करून त्यांच्या 25 चौक्या उद्ध्वस्त केल्या. यात पाकिस्तानचे 23 सैनिक मारले गेले. त्यामुळे दोन्ही देशांतील टेन्शन वाढले आहे. पाकिस्तान त्यांच्या भूमीवरून आमच्याविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत […]
अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने लोकस्वराज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. आज नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सुरू असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात खासदार अशोकराव चव्हाण यांचे भाषण सुरू होताच प्रचंड घोषणाबाजी केली. ‘आरक्षण वर्गीकरणाबाबत बोला’ असे म्हणत त्यांचे भाषण बंद पाडले. नांदेड जिल्हय़ात अशोक चव्हाण यांना प्रत्येक ठिकाणी […]
सत्तेत आल्यानंतर अदानी, अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण, काँग्रेस नेत्यांचा निर्धार
ईस्ट इंडिया कंपनीची संपत्ती ब्रिटिश सरकारपेक्षा प्रचंड वाढल्याने ब्रिटिश सरकारने ती कंपनीच ताब्यात घेतली होती. लष्कराला तेल देण्यास नकार दिल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय घेतला होता तसेच बँकांचेही राष्ट्रीयीकरणही केले. आता 2029 ला काँग्रेस सत्तेत आल्यानंतर अदानी व अंबानीच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करू, असा दृढनिश्चय काँग्रेस […]
जळगावात वाळूमाफियांचा धुमाकूळ, तलाठ्याला ट्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
जळगाव जिल्ह्य़ातील चोपड्यात वाळूमाफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून बुधगाव येथे वाळूचोरीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठय़ाला टॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तापी नदीच्या बुधगाव ते जळोद दरम्यानच्या पुलाखाली वाळूची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर प्रांत अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार हातेड भागातील मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम […]
सामना अग्रलेख –कबुतरांसाठी धर्मसभा!
कबुतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावर हिंसक होतो हे फक्त मोदी काळातच घडू शकते. फडणवीस सरकारने एक अध्यादेश आता काढावा व जैनांवरील अन्याय दूर करावा. मुंबईतील सर्व लोढा टॉवर्सच्या गच्च्या व सोसायटींची मैदाने, सर्व जैन बिल्डरांच्या संकुलात आणि मरीन लाईन्स समुद्रासमोरील नव्याने उभारलेल्या जैन जिमखान्यावर कबुतरखाने सुरू करीत असल्याची घोषणा करावी. शांतताप्रिय जैन समाजाची ही मागणी […]
दिल्ली डायरी –बिहारमध्ये विजयाची तुतारी कोण फुंकणार?
>>नीलेश कुलकर्णी बिहार विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. त्याची प्रमुख तीन कारणे म्हणजे या निवडणुकीनंतर मोदी सरकार गडगडण्याची एक शक्यता वर्तविली जाते. दुसरे म्हणजे मतदार याद्यांच्या फेरपडताळणीनंतर (एसआयआर) 67 लाखांहून अधिक मतदार गाळल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक. तिसरे, ही निवडणूक ‘सुशासन बाबू’ नितीश कुमारांची कदाचित शेवटची निवडणूक असेल. नितीशबाबूंनंतर बिहारचे प्राक्तन काय असेल? याचाही फैसला […]
विज्ञान रंजन –प्रवाळांचे ‘जग!’
>> विनायक दसरा झाला. आता तरी पाऊस ‘सीमोल्लंघन’ करून परतीच्या प्रवासाला लागला असावा. तसे त्याचे हिमालय ओलांडून तिबेटपर्यंतचे सीमोल्लंघन पहिल्यांदाच झालंय. तरीही अनेक नैसर्गिक कारणांमुळे तो हिंदुस्थानी द्वीपकल्पात रेंगाळतोय. आता मात्र शेतकऱ्यांची दया येऊन त्याने काढता पाय घ्यावा आणि पुढच्या वर्षी वेळेवर आगमन करावे. दिवाळी उंबरठ्यावर असताना सणासुदीच्या दिवसात त्यावर ‘पाणी’ पडायला नको. सणासुदीवरून आठवण […]
फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर विंडीजची झुंज, तरीही कसोटीवर हिंदुस्थानचा दबदबा कायम
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी तिसऱ्या दिवशी ‘फॉलोऑन’ हा शब्द जणू पुन्हा जिवंत झाला. तोही विंडीजच्या नामुष्कीने! पहिल्या डावात माती खालेल्या विंडीजने दुसऱ्या डावात थोडाफार आत्मसन्मान वाचवत 2 बाद 173 अशी धावसंख्या गाठली आणि खेळ संपता संपता हिंदुस्थानी गोलंदाजांची थोडी झोपमोड केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जॉन कॅम्पबेल (88) आणि […]
क्रिकेटनामा –विंडीजने रणशिंग फुंकलंय?
>> काल शुभमन आणि गौतमने एकूण मामला अंमळ हलक्यातच घेतला. गंभीरपणे घेतला नाही असंही म्हणायला जागा आहे! विंडीजला फॉलोऑन देण्याऐवजी आपण फलंदाजीचा सराव करून घेतला असता तर बरं झालं असतं. उपाहारानंतर खेळपट्टी सुस्तावली, अधिक संथ झाली होती. एकशे पस्तीसच्या वेगाने सुटलेले चेंडूसुद्धा जुरेल त्याच्या बुटाजवळ आणि अधूनमधून उसळी घेणारा चेंडू फार तर […]
आमच्या गोलंदाजांची एवढी धुलाई करू नकोस!
हिंदुस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झंझावाती खेळी करताना पाहुण्या संघाची पळता भुई थोडी केली. त्याने 22 चौकारांच्या मदतीने 175 धावांची खेळी केली. युवा यशस्वीच्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले, त्यात वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा याचेही नाव जोडले गेले. ‘आमच्या गोलंदाजांची एवढी धुलाई करू नकोस,’ अशी मिश्कील टिप्पणी करत लारा याने जैसवालचे […]
सलग पराभवांमुळे हिंदुस्थानचे उपांत्य फेरीतील स्थान संकटात
हिंदुस्थानी महिला संघाला 330 धावा केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाकडून पराभवाची झळ सोसावी लागली. सलग दोन पराभवांमुळे हिंदुस्थानी महिला संघाचे विश्वचषकातील उपांत्य फेरीमधील स्थान संकटात आले आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीच्या 142 धावांच्या धडाकेबाज खेळीने हिंदुस्थानचे 331 धावांचे आव्हान सहा चेंडू आणि तीन विकेट राखून सहज पार पाडले. हा महिला क्रिकेटमधील सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग ठरला आहे. […]
नामिबियाचा दक्षिण आफ्रिकेला दणका, अखेरच्या चेंडूवर पराभव करत नामिबियाने रचला इतिहास
क्रिकेटच्या मैदानावर शनिवारी एक धक्कादायक निकाल लागला. आयसीसी पूर्ण सदस्य असलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाला नामिबियाने अखेरच्या चेंडूवर चार विकेट राखून पराभूत करत इतिहास रचला. हा विजय नामिबियाच्या क्रिकेट इतिहासातील पहिला मोठा विजय ठरला. आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणाऱ्या नामीबियाने आफ्रिकेच्या बलाढ्य संघाला 8 बाद 134 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात झुंजार खेळ करत नामीबियाने […]
कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत विश्वविजेत्या दिवेची आगेकूच
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित मलबेरी कॉटेज, महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत जळगावच्या संदीप दिवेने पुण्याच्या रहीम खानचा 19-16, 25-8 असा सहज फडशा पाडून पाचव्या फेरीत प्रवेश केला, तर रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणने मुंबई उपनगरच्या जितेश कदमला 25-1, 25-7 असे पराभूत केले. पुरुष एकेरी चौथ्या फेरीचे इतर निकाल गिरीश तांबे (मुंबई) वि. वि. […]
मुंबई टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून
साखळी आणि बाद पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या मुंबई टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होईल. श्री कोकण क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेत आठ संघांना प्रवेश देण्यात येणार असून साखळी आणि बाद पद्धतीचे सामने दोनदिवसीय आणि अंतिम सामना तीन दिवसाचा खेळवण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येईल. दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन […]
शिवाजी पार्क जिमखान्याचा पराभव करत इस्लाम जिमखान्याचा विजय
सलामीवीर प्रणय कपाडियाच्या नाबाद 157 धावांच्या फटकेबाज खेळीच्या जोरावर इस्लाम जिमखान्याने शिवाजी पार्क जिमखान्याचा 196 धावांनी दणदणीत पराभव करत 78 व्या पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गट साखळी सामन्यात शानदार विजय मिळवला. इस्लाम जिमखान्याने प्रथम फलंदाजी करत 70 षटकांत 9 बाद 293 धावा उभारल्या. कपाडियाने 199 चेंडूंत 15 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 157 धावा […]
सरकारी दिरंगाईमुळे गावखेड्यांतील वस्त्यांच्या नावांमधून ‘जात’ जाईना, नामांतराचे हजारो प्रस्ताव रखडले
देश स्वतंत्र होऊन सात दशके उलटली तरी आजही गावखेड्यांमधील अनेक वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे जातीवरूनच आहेत. ती जातिवाचक नावे बदलून तिथे महापुरुषांची नावे दिली जावीत असे सरकारी आदेश आहेत. मात्र सरकारी दिरंगाईमुळेच गावखेड्यांतील वस्त्या आणि रस्त्यांच्या नावातून ‘जात’ जाईना झाली आहे. त्यांच्या नामांतरासाठी ग्रामपंचायतींनी दिलेले हजारो प्रस्ताव अजूनही रखडले असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील अनेक […]
पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना हिसका, सहा महिन्यांत 97 कोटींहून अधिक दंड वसूल
उपनगरीय रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने सहा महिन्यांत तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबवली आणि 97 कोटींहून अधिक दंड वसूल केला. एसी लोकलमधून वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांनाही कारवाईचा झटका देण्यात आला. एसी लोकलमधील घुसखोर, फुकट्या प्रवाशांकडून 1.59 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तिकीटधारक प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल […]
‘विप्रो’ नामांकित ट्रेडमार्क, हायकोर्टाचा कंपनीला दिलासा
शिवम उद्योग विप्रो वायर मेष या चिन्हाच्या नोंदणीमुळे ट्रेडमार्कचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या विप्रो कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. विप्रो नामांकित ट्रेडमार्क असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी विप्रो कंपनीचा युक्तिवाद ग्राह्य धरला आहे. विप्रो एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड 1977 पासून अखंडपणे या चिन्हाचा वापर करत असून कंपनीने […]
सौदी तयार करणार 1 लाख एआय योद्धे
आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) तथा कृत्रिम बुद्धिमत्तेने जग पूर्णपणे बदलून टाकले आहे. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वच क्षेत्रातील कंपन्या एआयचा वेगाने अवलंब करत आहेत. सौदी अरेबियानेही यात आघाडी घेतली आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तब्बल 1 लाख योद्धे तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सौदीने आखली आहे. सौदीच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक लाख नागरिकांना एआय आणि डेटा […]
भाजपकडून गुलाम मीर यांना राज्यसभेचे तिकीट
जम्मू-कश्मीरमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या चार जागांपैकी तीन जागांवर भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. कश्मीरमधून गुलाम मोहम्मद मीर यांना, तर जम्मूतून सत्पाल शर्मा आणि राकेश महाजन यांना तिकीट देण्यात आले आहे. येत्या 24 ऑक्टोबरला चार जागांसाठी ही निवडणूक होत आहे. चौथ्या जागेसाठी चुरशीची लढत होणार आहे. या जागेसाठी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आघाडीकडे 24 मते आहेत, तर […]
असं झालं तर…ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू खराब आल्यास…
1. आपण ऑनलाईन माध्यमातून शॉपिंग करतो. ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू खराब आल्यास कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन ‘रिटर्न’ किंवा ‘एक्स्चेंज’ हा पर्याय निवडा. 2. वस्तू खराब का आहे, याचे कारण निवडा. जसे की, तुटलेली आहे, काम करत नाही किंवा ऑर्डर केलेल्या वस्तूच्या वेगळी आहे. तुमचे जे कारण आहे ते द्या. 3. ऑनस्क्रीन दिलेल्या सूचनांचे पालन […]
टपाल कर्मचाऱ्यांसाठी नेत्रचिकित्सा शिबीर
लायन क्लब ऑफ मिडटाऊनच्या वतीने जागतिक टपाल दिन आणि जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने दादर येथील मुख्य टपाल कार्यालयात पोस्टमन व इतर टपाल कर्मचाऱयांसाठी नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित केले होते. लायन इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3232 ए1 लायन सेवा सप्ताह साजरा करताना अर्पण सेवा महोत्सवांतर्गत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फिरोज कात्रक, शिराज कात्रक, […]
नेलपेंट सुकले असेल…हे करून पहा
आपल्या घरी नेलपेंटच्या बाटल्या असतात. मात्र त्यातील नेलपेंट काही वेळेला सुकलेली दिसते. अशा वेळी सोपे उपाय करता येतील. नेलपेंटची बाटली गरम पाण्याच्या वाटीत तीन मिनिटे बुडवून ठेवा. नंतर बाटली तळहातांमध्ये हलक्या हाताने फिरवा. थिनरचे 2-3 थेंब थेट बाटलीत टाका, बाटली घट्ट बंद करा आणि हलक्या हाताने फिरवा. आवश्यकतेनुसार ही प्रक्रिया पुन्हा करा. एसीटोनचे काही थेंब […]
मैं तुम्हारे लिए चाँद-तारे तोड ला सकता हू… हा डायलॉग आपण सिनेमांमध्ये ऐकलेला असतो. पण हे सगळं प्रतीकात्मक असतं, प्रत्यक्षात कोणी चंद्र-तारे तोडून आणू शकत नाही हे सर्वांनाच माहीत असतं. मात्र, काही नाती अशी असतात की ती त्या चंद्रालाही पकडण्याचा प्रयत्न करतात. उत्तर हिंदुस्थानात साजऱ्या केल्या जाणाऱ्या ’करवा चौथ’च्या सणाच्या दिवशीचा असाच एक व्हिडिओ सध्या […]
पश्चिम बंगालमधील बर्धमान रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, अनेक प्रवासी जखमी; तिघांची प्रकृती चिंताजनक
पश्चिम बंगालमधील बर्धमान रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म 4 जवळ ही घटना घडली. रेल्वे सुरक्षा दल (RPF), रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानकात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, बर्धमान […]
भारतात मुक्त आणि वैज्ञानिकदृष्ट्या विचार करणाऱ्या पद्धतीवरच हल्ला, राहुल गांधी यांची टीका
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपप्रणीत केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, “भारतात मुक्त आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या कल्पनेवर प्रचंड हल्ला होत आहे असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे..”चिली विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. जेव्हा राहुल गांधींना विचारण्यात आले की काँग्रेस पक्ष शिक्षण व्यवस्थेत […]
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून आठ माओवाद्यांना अटक, स्फोटके आणि प्रचार साहित्य जप्त
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत आठ सक्रिय माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून स्फोटके आणि प्रचार साहित्यही जप्त करण्यात आले आहे. जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), बासगुडा पोलीस स्टेशन आणि केंद्रीय राखीव पोलीस फोर्स (सीआरपीएफ) च्या 168 व्या बटालियनने रविवारी संयुक्त कारवाई केली. बसगुडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुटकेल ते पोलमपल्ली या मार्गावर पोलमपल्लीजवळ ही […]
अमेरिकेत दक्षिण कॅरोलिनातील बारमध्ये गोळीबार, 4 जणांचा मृत्यू; 20 जण जखमी
अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील बारमध्ये रविवारी गोळबाराची घटना घडली. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून किमान 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेंट हेलेना बेटावरील विलीज बार अँड ग्रिलमधील एका ठिकाणी ही गोळीबाराची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव […]
भंडाऱ्यात प्रेशर कुकरचा स्फोट, 14 जण जखमी
बाल उत्सव शारदा मंडळाच्या वतीने महाप्रसाद बनवत असताना 40 लिटरच्या प्रेशर कुकर मध्ये महाप्रसाद बनविला जात होता. तेव्हा प्रेशर कुकर खोलताना जोरदार स्फोट झाला. त्यात 6 जण गंभीर तर 14 जण जखमी झाल्याची घटना भंडारा शहरातील बाबा मस्तान शहा वार्ड परिसरात घडली. जखमींमध्ये परवेज शेख, आशिष गणवीर, भावेश खंगार, रितेश साठवणे, विकी गणवीर,साधना गणवीर,गीता अंबुलकर,ज्योती […]
जळगावात वाळूमाफियांचा धुमाकूळ; तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
राज्यातील मतचोर सरकार वाळूमाफियांच्या टोळ्या पोसत असल्याने कारवाई करणार्या अधिकार्यांचा जीव धोक्यात आला आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात वाळूमाफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून, बुधगाव येथे वाळूचोरीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळूमाफियाने जीवघेणा हल्ला करीत टॅ्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तापी नदीच्या बुधगाव ते जळोद दरम्यानच्या पुलाखाली वाळूची चोरी होत असल्याची […]
RTI Act –मोदी सरकारने माहिती अधिकार कायदा कमकुवत केला, काँग्रेसचा आरोप
मोदी सरकारने २०१९ मध्ये माहितीचा अधिकार कायद्यात सुधारणा करून या कायद्याच्या मूळ भावनेला कमकुवत केले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. माहितीचा अधिकार कायदा लागू होऊन आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. हा कायदा २००५ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने आणला होता. या निमित्ताने आज काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते […]
20 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणीत संयुक्त प्रगत आघाडी सरकारने माहितीचा अधिकार (RTI) कायदा 2005 लागू करून पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या नव्या युगाची सुरुवात केली होती. असे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले आहे. मात्र गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारने RTI कायद्यात पद्धतशीरपणे छेडछाड करून लोकशाही धोक्यात आणली […]
IndiGo ला डीजीसीएने ठोठावला ४० लाख रुपयांचा दंड, काय आहे कारण?
वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी अयोग्य फ्लाइट सिम्युलेटर वापरल्याबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगो एअरलाइन्सला ४० लाखांचा दंड ठोठावला आहे. कालिकत, लेह आणि काठमांडू सारख्या क श्रेणी असलेल्या विमानतळांवर नियमांनुसार विहित केलेल्या सिम्युलेटरवर सुमारे १,७०० वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आले नसल्याचे तपासात आढळून आले. डीजीसीएने ११ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशिक्षण संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. इंडिगोने २२ […]
बिहारमध्ये NDA ची जागावाटपाची घोषणा केली, भाजप-जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढवणार
पुढील महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणीत एनडीएने जागावाटपाची घोषणा केली आहे. युतीतील कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवेल याचे चित्र स्पष्ट झाले. भाजप १०१ जागांवर, जेडीयू १०१ जागांवर, चिराग पासवान यांचा एलजेपी (आर) २९ जागांवर, उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आरएलएम ६ जागांवर आणि जीतन राम मांझी यांचा पक्ष एचएएम ६ जागांवर निवडणूक लढवेल. बिहारमधील […]
रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच : आ. राजेश क्षीरसागर
फेरीवाल्यांना शिस्त पाळण्याच्या अधिकाऱ्यांना अन्यायकारक कारवाई टाळण्याच्या सूचना कोल्हापूर . : गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत असून, रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासह खवय्यांचीही गर्दी होत आहे. या परिसरातील फेरीवाले याच उदरनिर्वाहावर [...]
आरक्षण वर्गीकरणाबाबत बोला, भर कार्यक्रमात मातंग समाज बांधवांची अशोक चव्हाण यांच्यासमोर घोषणाबाजी
अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने लोकस्वराज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरु आहे. आज आंदोलकांनी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सुरु असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर प्रचंड घोषणाबाजी करुन आरक्षण वर्गीकरणाबाबत बोला, असा सवाल करुन मातंग समाज बांधवांनी आंदोलन केले. नांदेड जिल्ह्यात […]
Mumbai News –पैशाच्या वादातून हातगाडी चालकाचे अपहरण आणि हत्या, तीन मित्रांना अटक
पैशाच्या वादातून एका हातगाडी चालकाचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन मित्रांना अटक केली आहे. अंधेरीतील साकीनाका परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एहसान अली अन्सारी (47) हत्या झालेल्या हातगाडी चालकाचे नाव आहे. अन्सारी भावासोबत साकीनाका येथील खैरानी रोडवरील अल्विन डिसोझा कंपाउंडमध्ये राहत होता. तो स्थानिक कंत्राटाखाली हातगाडी चालवत होता. 7 सप्टेंबर रोजी अन्सारी […]
आरक्षण वर्गीकरणाबाबत बोला, भर कार्यक्रमात बंजारा समाज बांधवांची अशोक चव्हाण यांच्यासमोर घोषणाबाजी
अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरु आहे. आज आंदोलकांनी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सुरु असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर प्रचंड घोषणाबाजी करुन आरक्षण वर्गीकरणाबाबत बोला, असा सवाल करुन बंजारा समाज बांधवांची आंदोलन केले. नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी माजी […]
ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बेरोजगार तरुणांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्याविरोधात बेरोजगार तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. निवडणुकीच्या काळात राज्यातील १० लाख तरुण तरुणींना लाडका भाऊ योजनेंतर्गत (युवा कार्य प्रशिक्षणार्थी) रोजगार देण्याची घोषणा देत ३६ जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांमध्ये स्टायपेंड देत कामाला ठेवले, निवडणुका संपल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडले. हे तरुण आता पुन्हा बेरोजगार झाले असून ४ महिन्यापासून त्यांना मानधनाची […]
मळगाव येथे इनोव्हा कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी
न्हावेली /वार्ताहर मळगाव येथे सायंकाळी सुमारे ४:४५ वाजताच्या सुमारास इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सुरज परब (रा. तळवडे) जखमी झाले .मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव येथून आपल्या तळवडे येथील घरी जात असलेल्या दुचाकीस्वाराला कारने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि दुचाकीवरील परब जखमी [...]
एसटी कामगारांचे उद्यापासून आझाद मैदानात आंदोलन; संयुक्त कृती समिती आक्रमक
एसटी कामगारांनी प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रलंबित थकीत 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी, यासाठी एसटीतील विविध 18 संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीतर्फे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. हे आंदोलन सोमवारपासून आझाद मैदानावर सुरू होणार आहे. आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र एसटी […]
Akole News –शॉर्ट सर्किटमुळे किराणा दुकान जळून खाक
शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील तांभोळ येथील बाळासाहेब नवले यांच्या हॉटेल व किराणा दुकानाला ही आग लागली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बाळासाहेब नवले व त्यांची पत्नी नंदा नवले हे तांभोळ गावातील चौकात किराणा व हॉटेल व्यवसाय करत असतात. […]
Abhimanyu Pawar News : दिवाळीपूर्वी 1200 कुटुंबांना सव्वा कोटींची मदत : आमदार अभिमन्यू पवार
विचार माणुसकीचा, एक हात मदतीचा’ या भावनेतून साकारलेला ‘औसा पॅटर्न’ आज समाजसेवेच्या आघाडीवर लातूर : लातूर औसा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामस्थांवर मोठे संकट ओढावले असताना, दिवाळीच्या उंबरठ्यावर त्यांच्या आशेचा एक नवा दीप उजळून निघाला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने क्रीएटीव्ह फाउंडेशन व अभय भुतडा फाउंडेशनच्या [...]
चालकाला फिट आल्यानं चुकून एक्सीलेटर पाय पडला, बस अनियंत्रित झाली अन् 9 वाहनांना धडकली
बस चालवत असतानाच चालकाला फिट आली. यामुळे चुकून त्याचा पाय एस्कीलेटरवर पडला आणि बस अनियंत्रित होऊन नऊ वाहनांना धडकली. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी करत आहेत. बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ रविवारी हा […]
वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद कोदे
सावंतवाडी । प्रतिनिधी वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद कोदे, सचिव पदी अण्णा म्हापसेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वैश्यवाडा येथील श्री काडसिद्धेश्वर महाराज मठात दिनांक 12 ऑक्टोबर रोजी वैश्यवाड्यातील नागरिकांच्या बैठकीत दोन वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली.या बैठकीत बोलताना मावळते अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांनी दोन वर्षाच्या काळात सर्वांचे सहकार्य मिळाल्याने चांगले काम करू [...]
Satara : शिवाजीनगरचा 21 दिवसांचा गणपती अव्वल !
उंब्रज विभागात प्रथम क्रमांकाच्या गणराया अवॉर्डने सन्मान उंब्रज : सातारा जिल्हा पोलीस अंतर्गत पोलीस उपविभाग कराड यांनी आयोजित केलेल्या श्री गणराया अवॉर्डस्मध्ये कराड तालुक्यातील उंब्रज विभागात शिवाजीनगर मांगवाडी येथील हनुमान भजनी गणेश मंडळ अब्बल ठरले. या मंडळाला प्रथम क्रमांकाचे गणराया अवॉर्ड देऊन पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कहूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी [...]
मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीकडून 15 गुन्हे उघड, अहिल्यानगर गुन्हे शाखेची कारवाई; 15 गुन्हे उघडकीस
अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. गुन्हे शाखेने या टोळीकडून मंदिर चोरीचे 15 गुन्हे उघडकीस आणले असून, या कारवाईत 4 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार सुरेश माळी, गणेश लोंढे, विष्णू भागवत, फुरकान शेख, राहुल डोके, […]
समाजाच्या शेवटच्या घटकाला कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळेत न्याय मिळेल तेव्हाच बाबासाहेबांचे आर्थिक आणि सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालूक्यात दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत. […]
Satara : पत्नीच्या खुनप्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा ; शिरवळ पोलिसांची तपासात यशस्वी कामगिरी
शिरवळ खून प्रकरण: पाचाळ यास जन्मठेप व दंडाची शिक्षा शिरवळ : १९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२.५३ वाजता शिरवळ हद्दीत झालेल्या खुनप्रकरणी आरोपी अशोक रामचंद्र पाचाळ (रा. शिरवळ) यास जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप [...]
लग्नात अडथळा ठरणाऱ्या वहिनीला जिवंत जाळले, दीरानेही स्व:ताला संपविले
उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नात वहिनीचा अडथळा नको म्हणून दिराने तिला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्याने स्वत:वर पेट्रोल ओतून आग लावली यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. रसूलकर गावातील नरेद्र, प्रवीण सहीत तीन भावंडे आहेत. तीघांची वेगवेगळी घरे आहेत.नरेंद्र याचे […]
28 ऑक्टोबरला नोकरी महोत्सव- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- पाचवी ते पदवीधर पर्यंत शैक्षणिक पात्रता असणाऱ्या युवक, युवतींसाठी 28 ऑक्टोबरला धाराशिव येथील पुष्पक मंगल कार्यालयात नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, सतीश दंडनाईक, प्राचार्य माने, अमित शिंदे, विकास बारकूल, अण्णा पवार, शांतून पायाळ व तस्मीय शेख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील यांनी संभाजीनगर येथे टोयाटो कंपनीने 50 एकर जागा घेतली असून, या जागेत कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याप्रमाणे मराठवाड्याती आठही जिल्ह्यात आयटीआय व पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये याच पध्दतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जे युवक, युवती बाहेरच्या जिल्ह्यात जावून काम करण्यास इच्छुक आहेत अशा युवक, युवतींने 28 ऑक्टोबरच्या मेळाव्यात नावनोंदणी करावी. अंतीम टप्प्यात तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. रेल्वेच्या विविध कोर्स संदर्भात बोलताना आमदार पाटील यांनी लातूर येथील रेल्वे कोच तयार करायचा कारखान्यातील प्रोसेस म्हणावी तशी गतीमान नाही. त्यामुळे पुढील एक-दोन महिन्यात रेल्वेचे विविध कोर्सेस आयटीआयमध्ये सुरू करण्यात येथील असे आमदार पाटील यांनी सांगितले.
सावंतवाडीत साडे अकरा लाखाची अवैध दारू ताब्यात
दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई प्रतिनिधी बांदा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवार सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीची अवैध दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली आलिशान कार असा एकूण ११ लाख ६७ हजार ४००/- (अकरा लाख सदूसष्ठ हजार चारशे रुपये) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला [...]
Satara : भिलारमध्ये स्ट्रॉबेरी हंगामाची गोड सुरुवात !
पहिल्याच ट्रेला तब्बल ६०० रुपयांचा दर; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लाली by इम्तियाज मुजावर भिलार (ता. महाबळेश्वर) – पुस्तकांचं गाव आणि स्ट्रॉबेरीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार गावात यंदाच्या स्ट्रॉबेरी हंगामाची गोड आणि उत्साहवर्धक सुरुवात झाली आहे. डीएसबी ग्रुप अँड कंपनीचे संस्थापक दिनेश भिलारे यांनी पहिल्याच ट्रेला तब्बल ६०० रुपयांचा दर [...]
किराणा मालाचे किट व ब्लँकेट वाटप
भूम (प्रतिनिधी)- नितीन दादा जाधव मित्र मंडळ पुणे तर्फे आष्टा तालुका भूम येथील पूरग्रस्त शेतमजूर व बाधित शेतकऱ्यांना किराणा मालाचे किट व ब्लँकेट वाटप करण्यात आले. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली शेती पिक वाहून गेले, जनावरे दगावली.तसेच घराची पडझड झाली, संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्या अशावेळी आपल्या शेतकरी बांधवांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. आम्ही एक सामाजिक जाणिवेतून पूरग्रस्त शेतकरी बांधवांना आधार देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. भूम तालुक्यात अनेक शेतकरी अल्पभूधारक तसेच भूमिहीन आहेत तर अनेक शेतमजूर कुटुंब आहेत. आशा बाधित अल्पभूधारक शेतमजुरांना आष्टा येथील संत बाळूमामा मंदिर येथे किराणा मालाचे किट व ब्लँकेटचे वाटप करून माणुसकी जोपासली असल्याचे मत सदर वाटप प्रसंगी नितीन जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी पुणे येथील सहकारी गुरुनाथ शेठ हडदरे व आष्टा येथील बाधित शेतकरी बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कळंब नगरपालिकेतील मतदार यादी बोगस !
कळंब (प्रतिनिधी)- कळंब नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदार याद्यांवरून प्रचंड वादंग उभा राहिला आहे. माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी थेट प्रशासनावरच निवडणूक प्रक्रियेत फेरफार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. “एका विशिष्ट राजकीय पक्षाला जिंकवण्यासाठी बाह्य आणि बोगस मतदारांची पद्धतशीर नोंदणी करण्यात आली आहे, असा गंभीर दावा करत त्यांनी संपूर्ण यंत्रणेच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सांगितले की, नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये 200 हून अधिक मतदारांची नावे बदलून इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत. हे नेमके कोणाच्या दबावाखाली करण्यात आले? प्रशासन लोकशाहीची थट्टा करत आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्या तयार करताना निवडणूक आयोगाच्या नावाखाली मनमानी सुरू असून, प्रशासन विशिष्ट ‘यंत्रणे'च्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा थेट आरोप मुंदडा यांनी केला. यावेळी नदकिशोर हौसलमल, गोविंद चौधरी, शंकर वाघमारे आदी उपस्थित होते. कळंबच्या राजकारणात आता निवडणुकीपेक्षा मतदारयादीचाच गाजावाजा सुरू आहे. मुंदडांच्या या आरोपांमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर प्रशासनाने मौन बाळगल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. हरकतींवर दुर्लक्ष, नियमांची पायमल्ली मतदार याद्यांवर हरकती व आक्षेप नोंदवण्यासाठी दोन नियम आहेत. स्वतः मतदाराचा अर्ज आणि इतरांनी केलेला आक्षेप. पण मुख्याधिकारी मंजुषा गुरमे आणि निवडणूक विभागातील काकडे यांनी दुसरा नियम पायदळी तुडवत स्वतः या आणि हरकती नोंदवा असा अजब नियम राबवला आहे. अशी तिखट टीका मुंदडा यांनी केली. बोगस नावे काढली नाहीत तर थेट न्यायालयात मुंदडा म्हणाले, जर बोगस नावे आणि फेरफार केलेले मतदार तातडीने वगळले नाहीत, तर आम्ही थेट न्यायालयात दाद मागणार आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी हा संघर्ष आम्ही शेवटपर्यंत लढवू.” लोकशाहीवर थेट हल्ला प्रभागात फेरफार झालेल्या मतदार याद्यांमुळे खरे मतदार मतदानापासून वंचित राहतील, असा गंभीर इशारा मुंदडा यांनी दिला. “प्रशासनाने मतदारांचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर तो लोकशाहीवर थेट हल्ला ठरेल. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या बनावट मतदार यादी विरोधात लढा दिला पाहिजे,” असे ते म्हणाले.
अभाविपचे बसच्या विविध समस्येला घेऊन निवेदन
धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना बसच्या संदर्भात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. जे विद्यार्थी धाराशिव शहरातून किंवा इतर गावातून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकण्यासाठी येतात त्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 09:00 वाजता ज्या बसेस त्या महाविद्यालयासमोरुन जातात त्या बसेस तिथे थांब्याव्यात. तसेच सायंकाळी 05:00 च्या नंतर तुळजापूर वरून येणाऱ्या बस ही थांबवण्यात याव्यात. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाविद्यालयासमोर बस थांबा द्यावा व त्या ठिकाणी बस थांबाव्या. बस थांबा असुन पण ज्या ठिकाणी बस चालक बस थांबवत नाहीत त्या बस चालकावर कार्यवाही करण्यात यावी. अशा मागण्यासह निवेदन देण्यात आले. या मागण्या पाच दिवसात सोडविण्यात याव्यात. अन्यथा विद्यार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. यावेळी शहर मंत्री कु. साक्षी पाटील, सहमंत्री गजानन माळी, परमेश्वर सुर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
टेकऑफनंतर हवेत गोल गोल फिरलं; मग झाडांवर आदळून हेलिकॉप्टर बीचवर कोसळलं, 5 जण जखमी
कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. टेकऑफनंतर हेलिकॉप्टर हवेत गोल गोल फिरलं आणि झाडांवर आदळून बीचवर कोसळलं. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. कॅलिफोर्नियातील हंटिंग्टन बीचवर शनिवारी दुपारी हा अपघात झाला. पॅसिफिक कोस्ट हायवेजवळील अनेक पाम वृक्षांवर हेलिकॉप्टर कोसळले. दुर्घटनेची माहिती मिळताच हंटिंग्टन बीच पोलीस आणि अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य […]
Bihar Election 2025 : बिहारमधून १४ नोव्हेंबरनंतर बेरोजगारी दूर होईल –तेजस्वी यादव
बिहारमधून १४ नोव्हेंबरनंतर बेरोजगारी दूर होईल, असं वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव म्हणाले आहेत. आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि बिहार तेजस्वी यादव दिल्लीला रवाना झाले आहेत. राऊस अव्हेन्यू कोर्टात सोमवारी लँड फॉर जॉब प्रकरणी सुनावणी होणार आहे. दिल्लीला रवाना रवाना होण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. तेजस्वी यादव […]
Solapur News : सोलापूर शहरातील अवंतीनगर, निराळे वस्ती परिसरातील नाल्यावरील अतिक्रमण हटविले
नाल्यावरील अतिक्रमणामुळे सोलापूर शहरातील घरांमध्ये शिरले पाणी सोलापूर : सोलापूर शहरातील अवंती नगर आणि निराळे वस्ती परिसरातील नाल्यावरील अतिक्रमण शुक्रवारी काढण्यात आले. या परिसरातील नाल्यावर असलेले ११ खोके जेसीबीच्या साह्याने निष्कासित करण्यात आले तसेच साहित्य जप्त करण्यात आले. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. सोलापूर शहरात नुकत्याच झालेल्या [...]
Video – : अनंत तरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन, उद्धव ठाकरे यांचे दणदणीत भाषण
अनंत तरेंचं तेव्हाच ऐकलं असतं तर अमित शहांच्या चरणी लोटांगण घालून वाचवा वाचवा म्हणणारे दिसले नसते – उद्धव ठाकरे
Satara Crime : साताऱ्यात अल्पवयीन मुलीचा अत्याचाराच्या प्रयत्नातून निर्घृण खून ! !
आर्या चव्हाण खूनप्रकरणी गावात संताप; आरोपीला पोलिसांकडून अटक सातारा : सातारा तालुक्यातील सारापडे येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या आर्या सागर चव्हाण या शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणी पोलिसांनी राहुल यावन (बय २६) याला अटक केली. त्याने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत डोक्यात बरबंटा घातल्याची कबुली राहुल यादव याने पोलीस तपासात दिली [...]
Jamkhed News –जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
बँकेतुन काढलेले तीन लाख रुपये स्कुटीच्या डिक्कीत ठेवले होते. त्यावेळी त्यातील तीन लाख रुपये काढून चोरटा लंपास झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार दि 10 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अभय अशोक शिंगवी, (47), […]
Bhandara News –सुट्ट्या पैशांवरून वाद, महिला कंडक्टरची प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
सुट्ट्या पैशांसाठी महिला कंडाक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी बस स्थानकावर घडली. प्रवाशाला लाथा बुक्क्याने मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुट्ट्या पैशांसाठी महिला कंडाक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी बस स्थानकावर घडली. pic.twitter.com/wWbf9gesBO — Saamana Online (@SaamanaOnline) October […]
Video –आता न्याय मिळाल्याशिवाय शांत बसायचे नाही –उद्धव ठाकरे
निष्क्रिय सरकारविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चला संबोधित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारची सालटीच काढली.
भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड वाशी तांदळवाडी बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम संपन्न
वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील तांदुळवाडी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड संचलित शिवशक्ती सहकारी साखर कारखाना,वाशी,तालुका वाशी या कारखान्याचा गळीत हंगाम 2025_2026 चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा शनिवारी (दि.11 ऑक्टोबर 2025) भैरवनाथ शुगर वर्क्स चे नवनिर्वाचित चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम उर्फ केशव सावंत यांच्या शुभहस्ते व शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड वाशीचे माजी संचालक अण्णासाहेब देशमुख,शिवाजीराव धुमाळ,बाबुराव घुले,विष्णू मुरकुटे तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सत्यवान गपाट शिवसेना तालुकाप्रमुख वाशी यांनी केले. भैरवनाथ शुगरचे नूतन चेअरमन अनिल सावंत यांनी बोलताना सांगितले की, तानाजीराव सावंत साहेब,महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा आमदार भूम परंडा वाशी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 11 वर्षापासून सतत या कारखान्याचे विक्रमी गाळप सुरू असून,प्रत्येक सभासदाच्या उसाला योग्य तो दर देऊन शेतकऱ्याचे समाधान गेली अकरा वर्ष सतत करीत आहोत.यावर्षी तीन लाख मे.टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट समोर आहे. ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडणार आहे.भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासदांना जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा निश्चय व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर यावर्षी नरसिंह सहकारी साखर कारखाना इंदापूर,तालुका वाशी हा देखील गाळपासाठी सज्ज केलेला आहे.तरी सर्व शेतकऱ्यांनी भैरवनाथ शुगर वर्क्स ला आपला ऊस गळपासाठी देऊन सहकार्य करावे असे आवाहन भैरवनाथ शुगरचे नूतन चेअरमन अनिल सावंत यांनी केले. याप्रसंगी परिसरातील सभासद शेतकरी,तोडणी ठेकेदार,तसेच वाशी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते,कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख कर्मचारी,कामगार,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मांगले युवा सेना जिल्हाप्रमुख धाराशिव यांनी केले व उपस्थितांचे आभार व्हा.चेअरमन विक्रम उर्फ केशव सावंत यांनी केले.
Sangli : आ. सत्यजित देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा !
आ. देशमुख यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव शिराळा : आ.सत्यजित देशमुख यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मतदार संघात गावनिहाय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप, शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप, असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. देशमुख यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील [...]
महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट; सरकारचा जमिनी, कंपन्या विकण्याचा घाट! –सुप्रिया सुळे
महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट असून कॅबिनेट मंत्री निधी कपात केला जात असल्याची आणि निधी वळवला जात असल्याचे म्हणत आहे. फिस्कल मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत महाराष्ट्राची परिस्थिती भीषण आहे. सरकारचा सातत्याने जमिनी, कंपन्या विकण्याचा घाट दिसतोय, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला. वर्ल्ड बँक डेटा सांगतो की […]
तरुणाला मीम शेअर करणं पडलं महागात, पंचायतीने दिली भयानक शिक्षा
मध्य प्रदेशच्या जमोह येथे संतापजनक घटना घडली आहे. सोशल मीडियावर एक मिम शेअर करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. गावच्या पंचायतने त्या तरुणाला दुसऱ्या तरुणाचे पाय धुऊन तेच पाणी प्यायला भाग पाडले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर काँग्रेसने ही घटना संविधान विरोधी असून सरकारव प्रश्न उपस्थित केले आहेक. ही घटना जनपद […]
शेतकऱ्यांना विनाकपात प्रतिटन ५० रुपये देण्याचा निर्णय शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्यास सन २०२४–२५ मध्ये गळपास ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी विनाकपात प्रतिटन ५० रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व [...]
रेडी यशवंतगडावर व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा शुभारंभ
मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन ओटवणे | प्रतिनिधी रेडी येथील किल्ले यशवंतगडावर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व गट विकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्तीचे सूचना फलक उभारून ‘ व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा’ शुभारंभ करण्यात आला. यावेळी नशाबंदी मंडळाचे मासिक कल्याणयात्रा- व्यसनमुक्तीच्या गाथा चे प्रकाशन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी [...]
महाविद्यालयीन स्तरावर चांगले कुस्ती पटू तयार होत आहेत- मधुकरराव चव्हाण
नळदुर्ग (प्रतिनिधी)- तांबड्या मातीत रांगडे खेळाडू तयार करणारा खेळ म्हणून कुस्ती या खेळाकडे पाहिले जाते. कालांतराने महाविद्यालय स्तरावर बदल होऊन मातीतील कुस्तीची जागा मॅटने घेतल्यामुळे महाविद्यालयीन स्तरावर देखील चांगले कुस्ती पटू तयार होत आहेत. असे मत बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले. नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 ते 13 ऑक्टोबर 2025 दरम्यान नळदुर्ग येथील महाविद्यालयात मुलांमुलींच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागाच्या पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ विभागाचे क्रिडा संचालक डॉ. सचिन देशमुख, महाराष्ट्र राज्य ऑलंपिक संघटना उपाध्यक्ष डॉ चंद्रजित जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेती कु गौरी शिंदे, डॉ. सचिन सलामपुरे, प्राचार्य डॉ रामदास ढोकळे, प्राचार्य डॉ संजय कोरेकर, प्राचार्य डॉ मोहन बाबरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व प्रतिमा पुंजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील, डॉ अशोक कदम, डॉ. शिवाजी घोडके, डॉ. हंसराज जाधव यांनी केले. या कार्यक्रमास बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, डॉ.अभय शहापूरकर, बाबुराव चव्हाण, अँड.प्रदिप मंटगे, शहबाज काझी, लिंबराज कोरेकर, पटू महादेवप्पा आलुरे, मैनोद्दीन शेख, विनायक अहंकारी, नवाज काजी, सुधीर हजारे, इमाम शेख, अझहर जहागिरदार, सुभद्राताई मुळे, कल्पना गायकवाड, यांच्यासह गावातील व परिसरातील नागरीक व महाविद्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
अनुसूचित जमातीमधील घुसखोरीविरोधात आदिवासी पारधी महासंघाचे नाशिक येथे आंदोलन
धाराशिव (प्रतिनिधी)- अनुसूचित जमातीमध्ये काहीजण घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला विरोध करण्यासाठी आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने नाशिक येथे 13 ऑक्टोंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त आदिवासी पारधी समाजाबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात आधीच 45 आदिवासी जमातींचा समावेश असताना काहीजण आणखी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का पोहचू नये याकरिता सर्व जमाती एकवटल्या आहेत. याकरिता नांदेड येथे नुकतेच आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता नाशिक येथे 13 ऑक्टोंबर रोजी मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाजाची एकजूट दाखविण्यासाठी जास्तीत जास्त आदिवासी पारधी समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काळे यांनी म्हटले आहे.
दिपावली व नाताळ सुट्ट्यांतील गर्दी लक्षात घेऊन दर्शन वेळेत बदल
तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी दिपावली व नाताळ सुट्टीच्या काळात वाढणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करून, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने विशेष दर्शन व्यवस्था जाहीर केली आहे. 14 ऑक्टोबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमा या दिवशी मंदिर पहाटे 1.00 वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनार्थ खुले राहतील. असे प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी कळविले आहे. गर्दी दिनी चरणतीर्थ पूजा रात्री 1.00 वाजता होणार असून, त्यानंतर तात्काळ धर्मदर्शनास प्रारंभ होईल. सकाळच्या अभिषेक व पूजा घाट सकाळी 6.00 वाजता पार पडेल. अभिषेकाची वेळ सकाळी: 6.00 ते 10.00 सायंकाळी: 7.00 ते 9.00 अशी असणार आहे. अभिषेकाच्या कालावधीत देणगीदर्शन बंद राहील, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भाविकांची सोय, सुरक्षेची काळजी आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.
Photo –दिवाळी खरेदीसाठी मुंबईच्या बाजारपेठा सज्ज!
दिवाळी सण जेमतेम आठवडाभरावर आला असून या सणाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. रांगोळ्या, लायटिंगचे तोरण, पारंपरिक आकाशकंदील, खमंग फराळ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी दादर, लालबाग, बोरिवली, घाटकोपरसह शहरातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड उडाली आहे. सर्व फोटो – रुपेश जाधव
चालत्या ट्रँवल्स आग, आत प्रवासी नसल्याने जीवीत हानी टळली
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर सोलापूर रस्त्यावर माळुंब्रा गावाजवळील हाँटल देवराज समोर शनिवारी (दि.11 ऑक्टोबर) दुपारी लातुरहुन तुळजापूरमार्ग सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्स (एमएच-26 सीएच-1830) या प्रवासी बसला अचानक आग लागली. सुदैवाने यात प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. सदरील घटना स्थळी तामलवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी ठाकुर यांनी घटनास्थळी येवुन अग्नीशमन वाहन मदतीने आग विझवली यावेळी तात्काळ महामार्ग वरील वाहतुक सुरुळीत केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. देवराज हॉटेलसमोर जात असताना बसच्या ब्रेक लाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इंजिन व टायरमधून अचानक धूर निघून आग लागली. चालक परमेश्वर शहाजी केंद्रे (रा. वागदरवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) व क्लीनर रामेश्वर केशव तुपेकर रा फुलवळ जिल्हा नांदेड हे बाहेर आल्याने ते सुखरुप आहेत. दरम्यान, बसमधून येणाऱ्या फटफट आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाची गाडीने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर करून आग विझवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ब्रेक लाइनर जाम झाल्याने टायर घासून गरम झाले आणि त्यातूनच आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी तुळजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तसेच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे कळंब आगारा समोर घंटानाद आंदोलन
कळंब (प्रतिनिधी)- येथील बस आगारातील कर्मचारी व संयुक्त कृती समितीतील पदाधिकारी यांच्या समवेत 13 तारखेच्या आंदोलनाविषयी बस आगारा समोर घंटा नाद आंदोलन करून कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सहआपल्या हक्काच्या विविध मागणी करीता महाराष्ट्र कामगार संघटना, महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना व कास्ट्राइब संघटनाचे पदाधिकारी तसेच संयुक्त कृती समितीचे सर्व पदाधिकाऱ्या मार्फत घोषणा देऊन 13 तारखेच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला व आगारप्रमुख एस. डी. खताळ यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कळंब आगारातील उमाकांत गायकवाड,महेश थोरबोले, महादेव देटे, आर. जी. भिसे, ए.जे.शेख, रत्नाकर जोशी, सुभाष बारकुल ,मनोज मुळीक, चेतन गोसावी, रतन लोहार, सायस खराटे, बाबा धावारे, सुबोध रणदिवे, गणेश गोरे, डिसले सह सर्व संघटनाचे प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अव्वल येण्याचा वेत्ये ग्रामपंचायतचा निर्धार
न्हावेली/वार्ताहर वेत्ये येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा श्री कलेश्वर पूर्वी देवी मंदिरात उत्साहात संपन्न झाली.यावेळी सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण,तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे,मंडल कृषी अधिकारी मनोज देऊलकर,पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समितीचे अविनाश सावंत,समिल नाईक,मंडल अधिकारी सुधीर मालवणकर,पंचायत राज संस्था आणि समूह ग्रामसंघ व प्रभाग संघाच्या बीआरपी [...]
Solapur News : पंढरपुरातील भारत विकास परिषदेमार्फत महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणिसर्वसामान्य जनता त्रस्त पंढरपूर : पंढरपूर सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच भरीव योगदान असलेल्या भारत विकास परिषद पंढरपूर संस्थेच्यावतीने मोहोळ आणि माढा तालुक्यात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तु पुरविण्यात आल्या. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतकरी, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून शेतजमिनी, गुरे–ढोरे, पिके, खते, धन–धान्यासाहित विद्यार्थ्यांच्या वह्या–पुस्तकापर्यंत वस्तू [...]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांचा खरपूर समाचार घेतला आहे. संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवे यांनी भुमरेंची फिरकी घेत त्यांना संभाजीनगरचे ‘शशी थरूर’ असे म्हटले. रविवारी दुपारी दानवे यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. अंबादास दानवे यांनी एक्स पोस्टवर म्हटले की, सर्वप्रथम पैठण तालुक्यातील पाचोड गावचे […]
Photo –दिवाळी खरेदीसाठी पुणेकरांचा ‘वीकेण्ड’चा मुहूर्त; बाजारपेठा गजबजल्या
दिवाळीचा सण अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा उजळल्या आहेत. पुणेकरांनी दिवाळीच्या खरेदीसाठी ‘वीकेण्ड’चा मुहुर्त साधल्याने लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, कुमठेकर रोड, रविवार पेठे गर्दीने फुलून गेला. कपडे, दागिने, गृहसजावटीच्या वस्तू, विद्युतमाळा, आकाशकंदील खरेदी करण्यात नागरिक व्यस्त होते. सर्व फोटो – चंद्रकांत पालकर
Uddhav Thackeray – Raj Thackeray राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर आले आहेत.
Sangli : पलूस-कडेगाव आमसभा 10 तास रंगली; ग्रामप्रश्नांवर ठोस चर्चा !
दोन्ही तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी : उर्वरित कामे लवकरच निकाली : आ. विश्वजीत कदम कडेगाव : पलूस–कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमसभेचे कामकाज तब्बल १० तासापेक्षा जास्त वेळ चालले. यामध्ये दोन्ही तालुक्यातील गावातील अनेक प्रश्रांची सोडवणूक करण्यात आली. काही प्रश्र येत्या काही दिवसांत निकाली काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी [...]
Solapur News : पंढरपूरात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाची निदर्शने
सीना व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना पुराचा फटका पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी तहसील कार्यालय पंढरपूर येथे निवेदन देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठ व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना वारंवार पुराचा फटका बसला आहे. [...]
Sangli Crime : माडगुळेत कौटुंबिक वादाचे हाणामारीत रूपांतर; तिघे जखमी, चौघांवर गुन्हा
माडगुळेत दोन कुटुंबात हाणामारी आटपाडी : माडगुळे येथे दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून झालेल्या वादंगाचे पर्यवसन हाणामारीत झाले. काठी, दगडाने झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले. परस्परविरोधी फिर्यादीवरून चौघांबर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. माडगुळे येथील शिवाजी आनंद लिंगडे यांच्या फिर्यादीवरून कांताबाई हरी लिंगडे, [...]
Sangli News : दिवाळीच्या तोंडावर सांगलीत महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम
वाहतूक विस्कळीत करणाऱ्या मंडपांवर महापालिकेची कारवाई सांगली : दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीला विचारात घेऊन व्यापाऱ्यांनी दारात घातलेले पत्राचे मांडव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी रात्री अकराच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने तोडून टाकले. मारुती रोडवरील जवळपास सर्वच दुकानदार दिवाळीच्या निमित्ताने रस्त्यावर छोटे मंडप घालतात. गतवर्षी काही व्यापाऱ्यांनी घातलेले मंडप तीन–चार महिने काढलेच नव्हते. त्यानंतर [...]
Kolhapur : शिवाजी विद्यापीठात डॉ. गोसावींची प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती !
शिवाजी विद्यापीठात नेतृत्वाची नवी सुरूवात ; डॉ. गोसावी कार्यरत कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठासाठी नव्याने नियुक्त झालेले प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शनिवारी कार्यभार स्विकारला. कार्यभार स्विाकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केली. सुसंवाद, विश्वास आणि पारदर्शकता या मूल्यांवर आधारित कार्य करून शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू या, [...]