इजिप्तमध्ये मिळाले 4500 वर्षे जुने मंदिर
सूर्यदेवाची व्हायची पूजा : नाईल नदीच्या पाण्याने व्हायचा जलाभिषेक हिंदू धर्म केवळ भारतापुरती मर्यादित नसल्याचे पुरावे इजिप्तमध्ये मिळाले आहेत. भारतात अनेक देवीदेवतांची पूजा केली जाते. अशाचप्रकारे बालीमध्sयही अनेक मंदिरे आहेत. आता पिरॅमिड्सचा देश इजिप्तमध्येही संशोधकांनी 4500 वर्षे जुने मंदिर शोधले आहे. इजिप्तच्या कैरोपासुन 14 किलोमीटर अंतरावरील अबू घुरबमध्ये या मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. हे मंदिर [...]
अमिरातीशी करार, पाकिस्तानची कोंडी
अमिरात प्रमुखांच्या धावत्या भारतभेटीत घडामोडी ► वृत्तसंस्था / नवी दिल्ली संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांनी 19 जानेवारीला भारताला धावती भेट दिली आहे. अवघ्या तीन तासांच्या या भेटीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. 19 जानेवारीला ते दुपारी साडेचार वाजता दिल्लीत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत [...]
टोयोटाची पहिली ई-एसयूव्ही अर्बन क्रूझर अबेला लाँच
नवी दिल्ली : जपानी कार उत्पादक टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार ‘अर्बन क्रूझर अबेला’ अनावरण केली आहे. ही एक मध्यम आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, जी मारुती सुझुकीच्या ‘इलेक्ट्रिक विटारा’ (ई विटारा)च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 543 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. भारतात, [...]
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन.. जो जे कर्म करतो त्याला याच जन्मात ते फेडावे लागते. अगदी त्याचप्रकारे हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, संघटित गुन्हेगारी आयुष्यभर चालवित स्वत:ला गुन्हेगारी क्षेत्राचा बेताब बादशहा समजले जाणाऱ्या अनेक गुंडाचा सध्या मुक्काम पोस्ट जेल आहे. परिस्थितीने गुन्हेगार बनविले. परिस्थिती असती तर आज तुमच्यासारखा आयपीएस अधिकारी असतो. हे वाक्य आहे एका कुख्यात [...]
नोएडातील इंजिनियर मृत्यूप्रकरणी बिल्डरला अटक
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील इंजिनियरच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत बिल्डर अभय कुमारला अटक केली आहे. इंजिनियरच्या मृत्यू प्रकरणी बिल्डरची भूमिका समोर आल्यारव ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांचे सांगणे आहे. प्राधिकरणात झालेल्या बैठकीनंतर एसआयटीने तपासाला वेग दिला आहे. बैठक संपताच एसआयटीने घटनास्थळाला भेट दिली आहे. एसआयटीने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली असून मृत्युमुखी [...]
टिळा लावल्याने 8 वर्षीय मुलासोबत भेदभाव
लंडनमध्ये धार्मिक भेदभावाचा ठरला शिकार वृत्तसंस्था/लंडन लंडनच्या एका प्राथमिक शाळेत धार्मिक भेदभावाचे धक्कादायक प्रकरण घडले आहे. केवळ 8 वर्षांच्या हिंदू मुलाला टिळा लावल्याने शाळेतून बाहेर पडावे लागले आहे. इंसाइट युके नावाच्या या संघटनेने या प्रकरणी आवाज उठविला असून याला धर्माच्या आधारावर स्पष्ट भेदभाव संबोधिले आहे. हा मुलगा लंडनच्या विकर्स ग्रीन प्राथमिक शाळेत शिकतो. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी [...]
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनविरोधात (ईव्हीएम) देशभरात प्रचंड संताप आहे. ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ईव्हीएम हटवून जिल्हा परिषदेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी आज मुंबईत उग्र आंदोलन झाले. आंदोलकांनी थेट मंत्रालयासमोरील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरच धडक दिली. या वेळी आंदोलकांनी आयोगाच्या सचिवांवर बांगड्या फेकून निषेध नोंदवला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच झालेल्या या आंदोलनाने […]
झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर आज सुनावणी, 50 टक्क्यांच्या आरक्षणाचा तिढा कसा सुटणार?
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. 27 टक्के ओबीसी आरक्षणामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे निवडणुका न्यायालयाच्या रडारवर आल्या आहेत. आधीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा तिढा कसा सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित […]
शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज सुनावणी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे शिवसेनेचे प्रकरण सूचीबद्ध केले आहे. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या […]
मुंबईचे महापौरपद हे भाजपकडेच राहील. कोणत्याही परिस्थितीत त्याबाबत तडजोड होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने घेतली आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या दबावापुढे न झुकता सत्तास्थापनेच्या तयारीला लागण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नगरसेवकांना हॉटेल मुक्कामी ठेवून दबावाचे राजकारण करणाऱ्या शिंदे गटावर […]
सामना अग्रलेख –बालिशपणाची हद्द!
साऱ्या जगात आपणच भांडणे लावायची आणि वैर व वैरी निर्माण करून असंख्य देशांना शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करायचा हा अमेरिकेचा मूळ धंदा आहे. शिवाय हा देश ताब्यात घे, त्या देशावर हवाई हल्ले कर, हे अमेरिकेचे पारंपरिक उद्योग डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात तर अधिकच वाढले. तरीही ट्रम्प महाशयांना शांततेचा नोबेल पुरस्कार कुठल्याही परिस्थितीत हवा आहे व त्यासाठी त्यांनी […]
‘शिवसेना’ नावाचा चार अक्षरी मंत्र देऊन कोटय़वधी मनात मराठी अस्मितेचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार फुलवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष या 23 जानेवारीपासून सुरू होत आहे. शिवसेनाप्रमुखांचे हे जन्मशताब्दी वर्ष तमाम मराठीजनांसाठी ‘उत्सवी वर्ष’ ठरणार असून याची सुरुवात मुंबईतील भव्य सोहळय़ाने होणार आहे. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृह […]
लेख –शेतकऱ्याला कोणी वाली आहे का?
>>प्रा. सुभाषबागल उत्पन्नाला लागलेली गळती, कर्जबाजारीपणा, त्यातून होणाऱ्या आत्महत्या, युवकांचे दुरावलेपण, व्यवसायकर्त्यांचीच त्यातून बाहेर पडण्याची इच्छा, झाडंझुडपं, घरची, शेतातील माती विकून झाली. आता किडनी विकायची शेतकऱ्यावर आलेली वेळ ही कदचित मंदीची शास्त्रीय लक्षणे नसतीलही, परंतु शेती व्यवसायाची दुरवस्था करण्यासाठी पुरेशी आहेत. बियाणे, खते, मजुरी, मशागतीचा खर्च वेगाने वाढत असताना शेतमालाच्या भावात घट कशी, असा प्रश्न […]
दावोसला जाऊन करार कुणाशी केले…लोढा, रहेजा आणि पंचशीलसोबत, फडणवीस सरकारची अशी ही गंडवागंडवी
स्वित्झर्लंडच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी साडेचौदा लाख कोटींचे गुंतवणूक करार केल्याचा मोठा गाजावाजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्या गुंतवणुकीतून 35 लाख नोकऱ्या मिळतील असा दावाही केला. पण फडणवीस सरकारने अक्षरशः गंडवागंडवी चालवल्याचे समोर आले आहे. हजारो कोस दूर दावोसला जाऊन फडणवीस यांनी करार मात्र मुंबई, महाराष्ट्रातील कंपन्यांबरोबर केले. त्यात […]
ऑस्ट्रेलियाची जपानवर एकतर्फी मात
न्यूझीलंड-बांगलादेश सामना रद्द ;यू-19 विश्वचषक स्पर्धा :सामनावीर विल मालाझुक : 55 चेंडूत 102 धावा वृत्तसंस्था / विंडहॉक (नामिबिया) आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील पुरूषांच्या येथे सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील 16 व्या सामन्यात अ गटात ऑस्ट्रेलियाने जपानचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. तर पावसामुळे न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना रद्द करावा लागल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 [...]
नागपूरमधील 70 वर्षीय महिलेला हार्ट अॅटॅक, उपचारादरम्यान निदर्शनास आले..
नागपूरमधील सावनेर येथील एका ७० वर्षीय महिलेला उजव्या बाजूला हृदय असल्याचे आढळून आले. यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. परंतु डॉक्टरांच्या मते, हा एक दुर्मिळ प्रकार आहे आणि तो डेक्स्ट्रोकार्डिया नावाच्या आजारामुळे होतो, जो जन्मजात आजार आहे. ही केस हृदयविकाराच्या झटक्यानंतर नोंदवण्यात आली होती. सावनेर येथील एका ७० वर्षीय महिलेला छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत […]
कारल्याची भाजी का खायला हवी, जाणून घ्या
कारलं म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. परंतु आपल्या आहारात कारल्याची भाजी समाविष्ट करण्याचे खूप फायदे आहेत. कारलेचा उल्लेख केल्यावरच अनेकांचे तोंड कडू होते. कारल्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीराला अ, ब आणि क जीवनसत्त्वे मिळतात. आयुर्वेदात कारल्याला “करवेलक” असे म्हणतात, ज्यामध्ये अशुद्धता, उच्च रक्तातील साखर आणि अगदी जंत देखील शुद्ध करण्याची क्षमता असते. कारल्याची भाजी खाण्याचे […]
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले.रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून खालगाव गटात विनोद शितप यांनी उमेदवारी अर्ज भरला.नाचणे जिल्हा परिषद गटातून शशिकांत बारगोडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर कर्ला जिल्हा परिषद गटातून […]
लिंबाची साल आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, जाणून घ्या
लिंबाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. लिंबू आपल्याला अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. संशोधनानुसार, लिंबाच्या साली देखील खूप फायदेशीर आहेत. आपल्या सर्वांना लिंबाच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल माहिती आहे. जेव्हा जेव्हा आपण लिंबू पिळतो तेव्हा आपण त्याची साल फेकून देतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हेच लिंबाचे साल सुद्धा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीच्या पानावर जेवण्याचे […]
गुहागर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यात आले. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी गुहागरमध्ये भगवे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी असगोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी […]
नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडत आहे. अशातच मुंबईत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी करण्यात आली. यानंतर आंदोलन करणाऱ्या चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विधानसभा, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकतही भाजपला […]
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडून आलेले तीन नगरसेवक हे विरोधी बाकावर बसून निर्भीडपणे जनतेची आणि शिवसेनेची बाजू मांडतील असा विश्वास शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. विनायक राऊत यांच्या हस्ते शिवसेनेच्या नवनिर्वाचित तीन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, […]
ग्रीनलँड आता अमेरिकेचाच एक भाग? डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला वादग्रस्त नकाशा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलॅंडवर हक्क सांगितला आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मंगळवारी अमेरिकेचा एक नवीन नकाशा शेअर केला. ज्यामध्ये ग्रीनलँडसह कॅनडा आणि व्हेनेझुएला या देशांना अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यांच्या या कृतीमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक […]
IIT कानपूरमध्ये विद्यार्थ्याने उचललं टोकाच पाऊल, 22 दिवसांतील दुसरी घटना
IIT कानपूरमध्ये पुन्हा एकदा एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मागील 22 दिवसांत दुसऱ्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळल्याने सर्वजण हादरून गेले आहेत. मृत विद्यार्थी रामस्वरुप इशराम PHD करत होता. पत्नी आणि बारक्या मुलीसह तो IIT कॅम्पसमध्येच वास्तव्याला होता. अचानक रामस्वरुपने टोकाचं पाऊल उचलल्याने पत्नी आणि लहान मुलगी पोरकी झाली आहे. या प्रकारामुळे IIT कॅम्पसमध्ये […]
केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा
आपल्या देशाच्या विविध भागात केळीच्या पानावर जेवणाची प्रथा आहे. केळीच्या पानावर जेवणं हे आपल्या आरोग्यासाठी फार हितावह मानले जाते. केळीच्या पानांमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे ग्रीन टी आणि काही फळांमध्ये देखील आढळतात. जेव्हा पानावर गरम अन्न दिले जाते तेव्हा हे घटक अन्नात विरघळू शकतात. यामुळे शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते आणि […]
भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मनेका गांधींना सुनावले खडे बोल
भटक्या कुत्र्यांसंदर्भात (२० जानेवारी ) एका खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना फटकारले. न्यायालयाने म्हटले आहे की, गांधी यांनी न्यायालयाबद्दल केलेली टिप्पणी न्यायालयाचा अवमान आहे. तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना न्यायालयाने त्यांना विचारले की, केंद्रीय मंत्री असताना त्यांनी कुत्र्यांच्या कल्याणासाठी किती बजेटची तरतूद केली होती. आजच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप […]
शिक्षण, कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीचा समतोल आवश्यक - डॉ. नारनवरे
धाराशिव (प्रतिनिधी) - वेगाने बदलणाऱ्या आजच्या काळात शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे. कोणत्याही पदवी समारंभात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आदर्श व्यक्ती व रोल मॉडेल्सचा उल्लेख केला जातो. मात्र सध्याच्या काळात जागतिक पातळीवर आदर्शांची कमतरता जाणवत आहे. अनेक अभ्यासक व मानसशास्त्रज्ञांच्या मते, आजची पिढी पूर्वीच्या पिढ्यांनी भोगलेल्या संघर्षांचा अनुभव घेतलेली नसल्याने कष्टांचे महत्त्व कमी होत चालले असल्याचे प्रतिपादन राज्यपाल महाराष्ट्र यांचे सचिव सनदी अधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दि.२० जानेवारी रोजी केले. तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या १९ व्या पदवीदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कुलपती प्रा. डी पी सिंग, कुलपती प्रा बद्री नारायण तिवारी, कुलसचिव नरेंद्र मिश्रा, तुळजापूर निदेशक प्रा. बाळ नागोराव राक्षसे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ नारनवरे म्हणाले की पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध ठिकाणी जावे लागे, मोबाईलपासून दूर राहून शिस्तबद्ध जीवन जगावे लागे. आज ही परिस्थिती सर्वांसाठी तशी नसली तरी प्रत्येक पिढीवर सामूहिक जबाबदारी असते. जग पूर्णपणे समान नसले तरी एकत्रित प्रयत्नांतूनच प्रगती साधता येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज संपूर्ण जगात तरुण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही लोकसंख्या योग्य दिशेने वळवली गेली तर ती देशासाठी मोठी संपत्ती ठरू शकते. केवळ पदव्या पुरेशा नसून कौशल्यांना अधिक महत्त्व आहे. शिक्षणातून ज्ञान मिळते. मात्र त्या ज्ञानाचा प्रभावी वापर कौशल्यांवर अवलंबून असतो असे त्यांनी नमूद केले. तर सध्या अनेक विद्यार्थी कृषी, अभियांत्रिकी, नर्सिंग अशा विविध क्षेत्रांत शिक्षण घेत आहेत. तरीही रोजगाराची मोठी दरी कायम आहे. शाळेतील १०० विद्यार्थ्यांपैकी केवळ २८ विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पात्र ठरतात. तर उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाची कमतरता दिसून येत असल्यामुळे शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे केवळ वर्गातील व्याख्यानांपुरते शिक्षण न ठेवता प्रत्यक्ष अनुभव, उदाहरणे, चित्रे आणि जिज्ञासा निर्माण करणारी शिकवण अधिक परिणामकारक ठरू शकते. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि नवकल्पनांची वृत्ती विकसित होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी १६ हजार गटांमधून ५८ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली. आज या कंपन्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यावरून सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाची जाणीव करून देणे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते. कोणीही जन्मतः परिपूर्ण नसतो. मात्र समस्या ओळखून त्यावर उपाय शोधणे हीच खरी जबाबदारी आहे. इनक्युबेशन सेंटर, स्टार्टअप्स आणि नव्या कल्पनांमधून अनेक संधी निर्माण होऊ शकतात. स्टार्टअप्ससाठी मागवलेल्या कल्पनांपैकी निवडक कल्पनांना निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने संधी सर्वांसाठी खुल्या असल्याचे दिसून येते. आजचा विद्यार्थी केवळ स्वतःच्या भविष्यासाठी नव्हे, तर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या भविष्यासाठीही जबाबदार आहे. कोणालाही दुर्लक्षित समजू नये. वर्गात मागे बसलेला विद्यार्थीही उद्या मोठा उद्योजक, नेता किंवा समाजसेवक होऊ शकतो. कोणतीही व्यक्ती कितीही हुशार असली, तरी संघभावना महत्त्वाची असते. कधी नेतृत्व करावे लागते, तर कधी संघातील सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते. शेवटी, भारतातील प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे. त्या सर्व आवाजांना ऐकून, समजून घेऊन देशाच्या प्रगतीसाठी काम करणे, हीच खरी शैक्षणिक आणि सामाजिक यशाची पावती असल्याचे डॉ प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
रविंद्र हायस्कूल, भूमच्या विद्यार्थ्यांनी ओलंपियाड परीक्षेत मिळविले घवघवीत यश
भुम (प्रतिनिधी)- International English Olympiad परीक्षेत 14 विद्यार्थ्यांनी मिळविले गोल्ड मेडल तर 3 विद्यार्थी second level साठी पात्र. हाडुळे अनुज (second level eligible), सय्यद तनाज, गुंड यश,वाघमारे कीर्ती, तळेकर माही, कांबळे समृद्धी, शिंदे युगंधरा, शेटे प्रणव, गेडाम किन्शुक, काटे श्रावणी, चौरे स्नेहा (second level eligible), रेपाळ अपूर्वा second level eligible, गोफने अपेक्षा, बोराडे पार्थ. तर *नॅशनल सायन्स ओलंपियाड परीक्षेत 11 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर 3 विद्यार्थी सेकंड लेवल साठी पात्र शहाणे श्रीनिवास (second level eligible), ओव्हाळ गौरंग, डोके प्रणव, वैष्णवी जानकर, बळे संजना (second level eligible), शिंदे युगंधरा, गायकवाड श्रीजा, वराळे गौरी, कवडे वेदांत (second level eligible), चौरे स्नेहा, रेपाळ अपूर्वा. इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ओलंपियाड परीक्षेत 16 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर 5 विद्यार्थी सेकंड लेव्हल साठी पात्र.* हाडुळे अनुज, होनराव गौरीश, शिंदे अस्मित (second level eligible), बोराडे राजलक्ष्मी (second level eligible), सिद्धी मोटे, शरयू साठे, डोके अनुष्का (second level eligible), बळे संजना, दुधाळ, ज्ञानेश्वरी, डोके सौरभ, फरताडे अथर्व, फारणे शिवम, (second level eligible), चौरे स्नेहा, शिंदे किस्तिजा, कांबळे उत्कर्ष, नागरगोजे बालाजी (second level eligible) तर *रविंद्र प्राथमिकच्या 3 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले.* समृद्धी धनवटे, प्रसेनजीत गडदे, माधुरी तेली या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शन शिक्षक विलास सलगर सर शिवाजी मद्देवाड सर, अमित भालेकर सर, सचिन कलमे सर यांचा केंद्रप्रमुख संजीवनी खांडेकर साहेब, थिटे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव आर. डी. सुळ साहेब, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे सर, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे सर तसेच धनंजय पवार सर, भागवत लोकरे सर, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.
चांदीने इतिहास घडवून प्रतिकिलो ३ लाख रुपये ओलांडले कोल्हापुर : मोडिटी मार्केटमध्ये सोमवार, १९ रोजी चांदीच्या किमतीने इतिहास रचून प्रथमच ३ लाख रुपये प्रतिकिलोची पातळी ओलांडली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधील व्यवहारादरम्यान सकाळच्या सत्रातच चांदी १३,५५३ रुपये किंवा ४.७१ टक्क्यांनी वाढून [...]
ऐन चाळीशीत डोक्याला ताप! अनुभव ठरतोय घातक,नोकरीवर कुऱ्हाड कोसळण्याचा धोका
एकेकाळी वयाची 40 वर्षे म्हणजे करिअरचे सुवर्णकाळ मानले जायचे. या टप्प्यावर प्रोफेशनल्सकडे अनुभवाची शिदोरी आणि नेतृत्व करण्याची क्षमता असते, असे मानले जात असे. मात्र, सध्याच्या कॉर्पोरेट जगतात चित्र बदलताना दिसत आहे. ज्या वयात करिअरची नवी शिखरे सर करायची असतात, तिथेच अनेक अनुभवी व्यक्तींसाठी संधीचे दरवाजे बंद होऊ लागले आहेत.अनुभवाला महत्त्व देण्याऐवजी त्याला एक प्रकारचा ‘अडथळा’ […]
हॉटेल व लॉजवर धाड टाकत दोन पिडित मुलींची सुटका
भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉज येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून वाशी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत हॉटेल मालकासह हॉटेलचा एक नोकर व इतर चार ग्राहकांच्या विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई दि. 19 जानेवारी रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजता करण्यात आली. छापा कारवाईत नंतर दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉज या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती वाशी पोलिसांना मिळाल्यावरून वाशी पोलिसांनी दि. 19 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक धाड टाकली. यावेळी सदरील हॉटेलच्या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने दोन महिला व इतर चार ग्राहक आढळून आले. यावेळी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पीडित दोन महिन्यांची सुटका केली व हॉटेलचा मालक श्रीपती उत्तमराव घुले, हॉटेलमधील नोकर महादेव विष्णू काळे दोघे राहणार पारगाव तालुका वाशी व ग्राहक म्हणून आलेले विशाल महादेव जुळे रा. भंडारवाडी ता. जि. बीड, भरत नवनाथ सुरवसे रा. वाकवड ता. भूम जि. धाराशिव, संदीप आबासाहेब गायकवाड रा. गिरवली ता. भूम जि. धाराशिव व अक्षय महादेव सालगुडे रा. नेकनूर ता. जि. बीड यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे, अंमलदार बळीराम यादव, विठ्ठल मलंगनेर, नसीर सय्यद, गोपीनाथ पवार, शिवा कोरडे तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती बहीरवाल यांच्या पथकाने कारवाई केली.
वजन कमी होण्यासाठी आहारात भाकरीचा समावेश गरजेचा, जाणून घ्या
आहारामध्ये भाकरी समाविष्ट करण्याचे खूप सारे फायदे आहेत. आपल्या आहारात भाकरीचा समावेश करणे म्हणजे अनेक रोगांवर मात करणे. भाकरी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टीक मानली जाते. भोपळ्याच्या बिया खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या वजन कमी कमी करण्यासाठी खूप प्रकारची विविध डाएट करण्यापेक्षा योग्य आहार घेणे हे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी काहीच न खाण्यापेक्षा जे खातोय […]
कळंबच्या विकासासाठी एकत्र येवू- सुनंदा कापसे
कळंब (प्रतिनिधी)- कळंब च्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊ,सर्वजण मला साथ देतील असा मला विश्वास आहे. व आदर्श गाव करण्यासाठी शहरातील जनतेने ही नगर परिषदला सहकार्य करावे, असे आवाहन नूतन नगराध्यक्षा सुनंदाताई शिवाजी कापसे यांनी केले. कळंब येथील देशमुख प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगर अध्यक्ष यशवंत दशरथ हे होते.तर व्यासपीठावर अँड.दिलीप सिंह देशमुख, महादेव महाराज अडसूळ,पांडुरंग गुरव, सतीश टोणगे,दीपक हरकर,सौ.धनश्री ताई कवडे, उपस्थित होते.या वेळी शहराच्या विकासाठी आम्ही आपल्या सोबत असून,जनतेचे मूलभूत प्रश्न अग्रक्रमाने सोडवावेत असे अँड.दिलीप सिंह देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी देशमुख प्रतिष्ठान च्या वतीने नूतन नगराध्यक्षा व नगर सेवकांचा शाल, बुके, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी नूतन नगरसेवक उपाध्यक्ष लखन गायकवाड, बाबू चाऊस, रोहन पारख, हर्षद आंबुरे,भूषण करंजकर, शितल चोंदे, शीला पवार, आशाताई भवर, हरकर, योजना वाघमारे, रुकसाना बागवान, अर्चनाताई मोरे, आदि उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्र संचलन व आभार प्रतिष्ठानचे सचिव ॲड.पृथ्वीराज देशमुख यांनी मानले.
Kolhapur News : केंद्राच्या क्षयरोग निर्देशांकामध्ये राज्यात कोल्हापूर प्रथम
कोल्हापूर जिल्हा टीबी प्रतिबंधात राज्यात प्रथम कोल्हापूर : हे यश संपादन करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रशांत वाडीकर आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. [...]
Republic Day 2026 –ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची दाणादाण उडवणारी ‘ही’घातक शस्त्रे दिसणार परेडमध्ये
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाला शौर्य, शिस्त आणि सामर्थ्याचे दर्शन घडवण्यासाठी जय्य्त तयारी सुरू आहे. यावर्षीची 77 व्या प्रजासत्ताक दिनाची परेड अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. ‘वंदे मातरम’चे 150 वे वर्ष आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित ही परेड असणार आहे. कश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हिंदूस्थानने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतरची ही पहिली भव्य परेड असणार आहे. या […]
Kolhapur News : दुचाकी चोरी करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला करवीर पोलिसांकडून अटक, ११ दुचाकी जप्त
पोलिसांच्या सापळ्यात चोरट्यांचा फसवटा उघडकीस कोल्हापूर : निवडणूक आणि जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये पुंगळ्या काढून फिरविण्यासाठी यामाहा आणि सुझुकीच्या दुचाकी चोरुन त्या भाड्याने देणाऱ्या तरुणास करवीर पोलिसांनी अटक केली. अभिषेक सुधीर कुरणे (वय २३. रा. शिये, ता. करवीर) असे त्याचे नांव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी [...]
पळसप येथील पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- पळसप येथील उबाठा शिवसेना पक्षाचे उपसरपंच राम लाकाळ, माजी सरपंच दगडू लाकाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य मंगेश माळी, मोतीचंद फुटाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर, भाजपा महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर आणि कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. तसेच सामाजिक समता, संघटनात्मक बळकटीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांनी प्रेरित होऊन लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा संघटक सर्जेराव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे यांच्यासह बालाजी कांबळे, गोरोबा ताटे, रवी लोंढे, ओंकार पेठे व सुनील शिंदे यांनीही भाजपात प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेला पाठिंबा दिला. या सर्वांचे भाजप परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे पळसप व परिसरात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत होत असून, तळागाळातील कार्यकर्त्यांचा भाजपा महायुती सरकारच्या विकासाच्या राजकारणावर वाढता विश्वास अधोरेखित होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्याने पक्षात आलेले कार्यकर्ते प्रभावीपणे योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या प्रवेशप्रसंगी नितीन काळे, संपतराव डोके, विजय हाऊळ, प्रवीण माळी, प्रदीप शिंदे,अशोक वीर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आहारात या पदार्थांचा समावेश केल्याने प्रजनन समस्या टाळू शकाल, वाचा
आजच्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनशैलीत, वंध्यत्वाची समस्या झपाट्याने वाढत आहे. ही समस्या आता महिलांपुरती मर्यादित नाही; मोठ्या संख्येने पुरुष देखील कमी शुक्राणूंची संख्या आणि यासंबंधी येणाऱ्या समस्यांशी झुंज देत आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्याच्या सवयी आणि झोपेचा अभाव ही प्रमुख कारणे मानली जातात. बरेचजण शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी विविध पद्धती वापरतात, परंतु ते अनेकदा अपयशी ठरतात. […]
Satara News : सातारा नाट्य कलाकारांची राज्यस्तरीय महोत्सवात घवघवीत कामगिरी
साताऱ्याच्या पोकळ घिस्सा नाटकाला महोत्सवात मान्यता सातारा : पुण्याशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट सातारा यांनी नवनाट्य कलामंच संरथा, आजरा यांनी आयोजित केलेल्या कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव २०२६ (आजरा महोत्सव) येथे सादर केलेल्या जगदीश पवार लिखित आणि शरद लिमये दिग्दर्शित खानदानी या नाटकाने द्वितीय क्रमांक [...]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मर्यादीत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एफ, एम आणि जे व्हिसा श्रेणींमध्ये अर्ज करणाऱ्या सर्वांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सार्वजनिक करावे, असे अनेक नियम लागू केले. त्यामुळे परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाली. आकडेवारीनुसार, अमेरिकन […]
Satara News : लोणंद शाळेत ‘बालबाजार’ उपक्रम ; ५० हजार रुपयांपर्यंत उलाढाल
लोणंदला मुलींच्या शाळेचा बालबाजार उत्साहात लोणंद : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद (मुली) येथे विद्यार्थ्यांमधील उद्योजकता, व्यवहारज्ञान व आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने बालबाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला पालक, नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद [...]
काँग्रेसचे जेष्ठ नेते मुकूंद डोंगरे यांचा कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाचे तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते तसेच जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे यांनी मंगरूळ जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह तुळजापूर येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम प्रशासनावर, महायुती सरकारच्या लोकाभिमुख व विकासाभिमुख धोरणांवर तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या जिल्ह्यातील सातत्यपूर्ण विकासकामांवर प्रभावित होऊन हा प्रवेश करण्यात आला. या सामूहिक प्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीची संघटना अधिक मजबूत होत असून, काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपच्या विकासाच्या राजकारणावर वाढता विश्वास अधोरेखित होत आहे. या सर्व मान्यवरांचे भाजप परिवारात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रवेशप्रसंगी दत्ता कुलकर्णी, सुनील चव्हाण, विनोद गंगणे, किशोर गंगणे, विक्रमसिंह देशमुख, विजय शिंगाडे, अमोल राजेनिंबाळकर, आबासाहेब सरडे, मनोज माडजे, राहुल साठे, प्रणेश देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केशेगाव व तेर जिल्हा परिषद गटातून अर्चनाताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानी व संत गोरोबाकाका यांच्या आशीर्वादाने तेर व केशेगाव जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण महिला प्रवर्गात भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. तळागाळातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास, पारदर्शकता व लोकहित या मुद्द्यांवर ही निवडणुक आपण लढवणार असून, भाजपा महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना अधिक बळ देण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त केला. आदरणीय डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दाखवलेल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या मार्गाला पूर्णत्व देण्यासाठी ही उमेदवारी निश्चितच महत्त्वाची ठरणार असून, यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व लाभणार आहे. जनतेच्या विश्वासावर व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ही निवडणूक लढवून मतदारांच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेत ठाम व प्रभावी आवाज उठवला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त केला. यावेळी रेवणसिद्ध लामतुरे, लिंबराज टिकले, सुरेश देशमुख यांच्यासह तेर व केशेगाव गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठ उपपरीसर येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अंतर्गत कार्यक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह-2026 अंतर्गत यशस्वीरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सुरक्षितते विषयी माहिती देण्यात आली. स्वयंपाक घर, रस्ते तसेच देशाची सुरक्षा याविषयी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यत्वे “रस्ता सुरक्षा” अंतर्गत वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. राहुल खोब्रागडे, विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, अध्यक्ष डॉ. मनिषा असोरे विभागप्रमुख शिक्षण शास्त्र विभाग, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. जितेंद्र शिंदे, कार्यक्रमा धिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती. डॉ. मेघश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह उद्देश त्यांनी स्पष्ट केला. रस्ता सुरक्षा नियम पाळल्यास अपघात टाळता येतील असे ते म्हणाले. तसेच इतर प्रकारच्या सुरक्षितेवरही त्यांनी प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी डॉ. राहुल खोब्रागडे यांनी रस्ता अपघाताची आकडेवारी मांडत त्याच्या परिणाम कुटुंबातील इतर घटकावर काय होतो हे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण शास्त्र विभागातील विभागप्रमुख डॉ. मनीषा असोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.जितेंद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
काँग्रेसचे प्रकाश चव्हाण, अशोक पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोक पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यातील जळकोट जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे प्रकाश चव्हाण व अशोक पाटील यांच्या या प्रवेशामुळे जळकोट जिल्हा परिषद मतदार संघात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा नेते सुनील चव्हाण, मल्हार दादा पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, संताजी काका चालूक्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आलियाबाद ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच ज्योतीताई चव्हाण, रामतीर्थ ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा लक्ष्मण राठोड, सेवानिवृत्त नायब तहसिलदार माणिक चव्हाण यासह आजी - माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे आलियाबाद ग्रामपंचायतीवर आजवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र प्रकाश चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या भागात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. पक्ष प्रवेशावेळी बोलताना आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांनी भाजपाची विकासाची भूमिका, केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा उल्लेख करत नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एकत्र काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला निश्चितच बळ मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
कळंबच्या भूमीपुत्राची सहाय्यक विक्रीकर आयुक्तपदी निवड
कळंब (प्रतिनिधी)- जिथे कष्ट, श्रम व मनोभावनेने जिद्द बाळगून परिश्रम केले जाते. त्यालाच त्याचे फळ मिळते ते म्हणजे कळंबचे भूमिपुत्र गोकुळ आशा विष्णुदास भराडिया (वय 32) यांनी आपल्या जीवनप्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे. कोणताही शासकीय वारसा, राजकीय शिफारस किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ सेल्फ स्टडी,कठोर परिश्रम,जिद्द आणि चिकाटी या भांडवलावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्यांदाच प्रयत्नात 26 वी रँक मिळवत घवघवीत यश मिळवत सहाय्यक विक्रीकर आयुक्त (जी.एस.टी. विभाग),श्रेणी1 हे प्रतिष्ठेचे पद पटकावले आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या गोकुळ भराडिया यांचा प्रवास सोपा नव्हता. वडील कळंब येथे आडत दुकान चालवत होते. मात्र तोट्यात गेल्याने ते बंद पडले. तरीही परिस्थितीपुढे हार न मानता गोकुळ यांनी शिक्षणालाच आपले अस्त्र बनवले. अभ्यासासाठी कोणतीही कोचिंग क्लासेसची मदत न घेता शहरातीलच सावित्रीबाई फुले विद्यालयात पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर राजश्री शाहू महाविद्यालयात अकरावी, बारावी शिक्षण घेतले. यानंतर पुणे येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे येथून बी.टेक (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) ही पदवी संपादन केली. नंतर त्यांनी 2020 साली एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 22 वी रँक मिळवून नायब तहसीलदार पदाची नियुक्ती मिळवली. नायब तहसीलदार म्हणून सोलापूर येथे सेवा बजावल्यानंतर कळंब तहसील कार्यालय (जि. धाराशिव) येथे कार्यरत होते. प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळत असतानाच, मर्यादित वेळेत त्यांनी पुन्हा एकदा एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. शिस्तबद्ध वेळापत्रक आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा एमपीएससीमध्ये यश संपादन करत सहाय्यक आयुक्तपदापर्यंत मजल मारली. प्रशासकीय सेवेत असूनही समाजाभिमूख कार्याची तळमळ त्यांच्या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येते. गोकुळ भराडिया यांची यशोगाथा ग्रामीण भागातील असंख्य युवकांसाठी आशेचा किरण आणि प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी होणार उमेदवारांची लगीनघाई !
मुहूर्त टळला तर हुकणार संधी ; जि. प आणि पंचायत समिती निवडणूक सावंतवाडी । प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुधवार 21 जानेवारी आहे. या दिवशी उमेदवारी भरण्यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची आणि अपक्षांची लगीनघाई होणार आहे. उमेदवारी अर्ज बुधवारी तीन वाजेपर्यंत भरता येणार आह. तीन वाजण्याचा मुहूर्त टळला तर [...]
राजकारणावर मात करत ‘सोन्या किंग’ने जिंकली मने
भूम (प्रतिनिधी)- शहरातील पशुपालक वस्ताद अमोल वीर यांच्या ‘सोन्या किंग’ या रेड्याने महाराष्ट्र केसरी पशू पद पटकावून केवळ एक मानाचा किताब मिळवला नाही, तर माणुसकीचा विजयही शहरासमोर उभा केला आहे. धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज व हजरत ख्वाजा शमशोदिन उरुसानिमित्त दरवर्षी भरणाऱ्या भव्य रेड्यांच्या प्रदर्शनात यंदा चुरशीचा सामना पाहायला मिळाला. लातूर येथील अर्जुन या नामांकित रेड्याशी झालेल्या प्रदर्शनात सोन्या किंगने ताकद, डौल आणि दमदार कामगिरीच्या जोरावर बाजी मारली. या प्रदर्शनानंतर आयोजक व पशुपालकांच्या वतीने सोन्या किंगला ‘महाराष्ट्र केसरी पशू’ हा बहुमान देण्यात आला. या यशामुळे भूम शहरात आनंदाचे वातावरण पसरले असून सोन्या किंग या रेड्याला प्रदर्शनात दमदार कामगिरी करण्यासाठी तयार केल्याने विविध भागात पशुप्रेमींकडून अमोल वीर यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीतील राजकीय कटुता या क्षणी बाजूला राहिली. प्रदर्शनाच्या ठिकाणी परस्पर विरोधी गटातील कार्यकर्तेही भूम शहराची शान असलेल्या सोन्या किंगचे प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होते. यात सोन्या किंग विजयी होताच शहरातील पशु प्रेमी भावुक झाले. व एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त करताना दिसले. हे दृश्य शहरासाठी प्रेरणादायी ठरले. राजकारणापेक्षा माणुसकी मोठी असते, हे सोन्या किंगने बाजी मारल्याने भूम शहराला पाहण्यास मिळाले आहे. यावेळी अमोल वीर,मधुकर लोंढे,अमर जमादार, अक्षय गाढवे, अभी सावंत, सूरज स्वामी, उमेश वीर, राम वीर, अविनाश वीर, अतुल वीर, अवधूत गाढवे यांच्या सह पशु प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाडोळी (आ.) गटातून ॲड. अजित गुंड यांची भाजपकडे जिल्हा परिषद उमेदवारीसाठी मागणी
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी 2026 जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाडोळी (आ.), ता. धाराशिव गटातून भारतीय जनता पक्षाकडे ॲड. अजित व्यंकटराव गुंड यांनी जिल्हा परिषद सदस्यपदासाठी अधिकृत इच्छापत्र सादर केले आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजिसिंह ठाकूर, माजी आमदार बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितिन काळे, संताजी चालुक्य-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा विकासाचा अजेंडा प्रभावीपणे राबवून पाडोळी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे ॲड. अजित गुंड यांनी स्पष्ट केले आहे. ॲड. अजित गुंड हे रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक असून शेती, सहकार, उद्योग, बँकिंग व शिक्षण या क्षेत्रांचा समन्वय साधत त्यांनी ग्रामीण भागात सर्वसमावेशक विकासाचे कार्य उभे केले आहे. दूध प्रक्रिया, ऊस उत्पादन व अन्न प्रक्रिया उद्योगांमुळे शेतकरी, दूध व ऊस उत्पादक तसेच लघुउद्योजकांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला बचत गट व उद्योजकांना अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येत असून समूहाच्या उपक्रमांमुळे धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत रोजगारनिर्मितीस चालना मिळाली आहे. तसेच पाडोळी, लासोना व धाराशिव येथे सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. ॲड. अजित गुंड यांना भक्कम सामाजिक व राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे चुलते सुधाकर गुंड गुरुजी हे जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष राहिले असून वडील ॲड. व्यंकटराव गुंड हे रुपामाता उद्योग समूहाचे चेअरमन व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद सदस्य असून आजोबांपासून संपूर्ण कुटुंब जनसंघ-भाजप परिवाराशी निष्ठेने कार्यरत आहे.
परंडा येथे महाराणा प्रताप यांना अभिवादन
परंडा (प्रतिनिधी)- दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी शहरातील राजापुरा गल्ली व महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. राजापुरा गल्ली येथील बालवीर गणेश उत्सव मैदान येथे श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला परंडा नगरपरिषदचे उपनगरअध्यक्ष समरजितसिंह ठाकूर व नगरसेवक मदनसिंह सद्धीवाल यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच महाराणा प्रतापसिंह चौकात प्रतिमेचे पूजन माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल यांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष समरजीत सिंह ठाकुर नगरसेवक मदनसिंह सद्धीवाल ,उद्योजक धीरजसिंह ठाकूर, ॲड पृथ्वीराजसिंह सद्धीवाल, उद्योजक राहुलसिंह सद्धीवाल, हॉटेल मैत्री पार्कचे मालक पैलवान अतुल औसरे, युवा नेते संकेतसिंह ठाकूर, व्यंकटेश दीक्षित,अमरसिंह ठाकूर, स्वरूपसिंह सद्धीवाल, अमितसिंह सद्धीवाल,अनुराग ठाकूर, सुरजसिंह ठाकूर, राज वळसंगकर ,ओमकार काशीद कुणाल जाधव,यश परदेशी, आयुषसिंह सद्धीवाल आकाश मदने, ओमकार तबेलदार, योगेश मस्के, आप्णा लोकरे ,आशिषसिंह ठाकूर, संतोष गवंडी,राणा सद्धीवाल,रोहन सुरवसे,आनंद मोहिते, मयुर लोखंडे, कार्तीक दीक्षित, बल्ली ठाकूर, सुभाष देशमाने, आर्यन देशमाने,विश्वजीत ठाकूर ,रुषीकेश आगरकर, हारीओम दीक्षित, ओम दीक्षित,आदिंची उपस्थिती होती.
Satara News : सातारा दहिवड बस स्टॉपजवळ दुचाकी अपघात, वृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू
सातारा-पाठेघर रस्त्यावर भीषण दुचाकी अपघात सातारा : सातारा तालुक्यातील दहिवड बस स्टॉपनजीक सातारा-पाठेघर रस्त्यावर अत्पवयीन दुचाकी चालक युवतीमुळे झालेल्या भीषण अपघातात बयोवृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १३ रोजी दुपारी १२ बाजण्याच्या सुमारास घडली आहे. तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरगहवाही (ता. जि. [...]
तुळजापूर येथे मानसशास्त्रीय कलचाचणी व समुपदेशन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- दहावी व बारावीनंतर योग्य करिअरची निवड कशी करावी, मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे भविष्यातील करिअरविषयक निर्णय कसे घ्यावेत. या उद्देशाने श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर येथे 16 जानेवारी 2026 रोजी मानसशास्त्रीय कलचाचणी व करिअर समुपदेशन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांची जागतिकस्तरावर वापरली जाणारी इंटरेस्ट प्रोफाईलर ही मानसशास्त्रीय कलचाचणी घेण्यात आली. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतातील एकूण 52 प्रमुख करिअर क्षेत्रांमधील उपलब्ध असलेल्या शेकडो जॉब रोल्सपैकी आपल्या आवडीनिवडी,क्षमता व कौशल्यांशी सुसंगत जॉब रोल निवडण्यास मदत होणार आहे.ही चाचणी जागतिक स्तरावर कार्यस्थळावरील मूल्ये (वर्किंग व्हॅल्यूज) ओळखण्यासाठी वापरली जाते.या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू,कार्यमूल्ये तसेच त्यानुसार योग्य करिअर पथ निवडण्याबाबत स्पष्टता मिळाली. या मानसशास्त्रीय कलचाचणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-ओळख निर्माण होऊन भविष्यातील करिअरविषयक निर्णय वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेण्यास मदत झाली. श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे 89 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रम व रोजगार मंत्रालयाचे समुपदेशक दत्तात्रय सुभाष कांबळे,मॉडेल करिअर सेंटर,लातूर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त विद्या शितोळे, सहाय्यक आयुक्त संजय गुरव तसेच दत्ता चव्हाण (परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी सहाय्यक आयुक्त,धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या उपक्रमासाठी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके,शिक्षकवृंद व कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालय, धाराशिव येथील बाबासाहेब शेटे व विद्या नाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शाळा, टोल नाका व महामार्गावर विविध उपक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय,धाराशिव येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी बहीर यांनी शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नियम, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, वेग मर्यादेचे पालन, मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच विविध रस्ता चिन्हांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा विषयक प्रश्नमंजुषा घेण्यात येऊन पारितोषिकांचे वितरण करण्यात आले आणि माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत धाराशिवसोलापूर महामार्गावरील तामलवाडी टोल नाका येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे, सहायक पोलिस निरीक्षक गोकूळ ठाकूर, वाहतूक पोलीस कर्मचारी, चे सावंत,तामलवाडी टोलनाक्यावरील सर्व कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते. सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभाग,महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस व तामलवाडी टोल नाका प्रशासनाच्या वतीने अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) पाहणी करण्यात आली. यावेळी सुरतगाव,वडगावकाटी, सांगवीकाटी, मुक्तीनगर, गोंधळवाडी पाटी, कदमवाडी या ‘डेंजर झोन’ ठिकाणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत टोल नाका प्रशासनाला निर्देश देण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे यांनी सांगवी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून सभेमध्ये रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील 12 हजार 575 अर्जांना पुन्हा संधी
धाराशिव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात एकूण 12 हजार 575 पीक विमा अर्ज विमा कंपनीमार्फत विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले होते, तर 13 हजार 539 विमा अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी ऑनलाईन सेवा केंद्रांकडे परत करण्यात आले होते. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक 22 डिसेंबर 2025 रोजी पार पडली.या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी रद्द झालेल्या 12 हजार 575 विमा अर्जदारांना योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विमा कंपनीने अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी ऑनलाईन सेवा केंद्रांकडे परत करण्याचे निर्देश दिले.यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन सेवा केंद्रामार्फत आवश्यक त्रुटी दुरुस्त करून योजनेतील सहभाग कायम ठेवता येणार आहे. त्याअनुषंगाने विमा कंपनीने खरीप हंगामात रद्द करण्यात आलेले 12 हजार 575 विमा अर्ज 16 जानेवारी 2026 रोजी ऑनलाईन सेवा केंद्रांकडे परत केले असून, त्या विमा अर्जांच्या तालुकानिहाय याद्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विमा अर्जांच्या त्रुटी पूर्ततेसाठी केवळ सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज रद्द झालेले आहेत, त्यांनी ज्या ऑनलाईन सेवा केंद्रामार्फत पीक विमा अर्ज भरलेला आहे,त्या ऑनलाईन सेवा केंद्राशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह 23 जानेवारी 2026 पूर्वी आपल्या विमा अर्जाची त्रुटी पूर्तता करून घ्यावी,अन्यथा संबंधित विमा अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित संबंधित ऑनलाईन सेवा केंद्राशी संपर्क साधून आपल्या पीक विमा अर्जातील त्रुटी आवश्यक कागदपत्रांसह दुरुस्त करून घ्याव्यात,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी हे उपाय करुन बघा
आजकाल लहान वयातही अनेकांचे केस पांढरे होताना दिसतात. पांढरे झालेल्या केसांवर नैसर्गिकरित्या अनेक मार्गांनी उपाय करता येतात. पांढरे केस काळे करण्यासाठी काय करावे हा एक मोठा प्रश्न आहे, कारण प्रत्येकजण नैसर्गिक उपाय शोधत आहेत. हिवाळ्यात पेडीक्योर करण्याचे काय फायदे होतात, वाचा प्राचीन काळापासून मोहरीचे तेल हे केसांसाठी एक उत्तम तेल मानले जाते. ते केसांची मुळे […]
उंब्रजमध्ये रुग्णवाहिका मार्गमोकळी न मिळाल्यामुळे गोंधळ उंब्रज : उंब्रज (ता. कराड) येथे सोमवारी १९ रोजी सायंकाळी ५.५४ वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून पडली. सुमारे १५ मिनिटे रुग्णवाहिकेचा सायरन सुरू होता. मात्र चारही बाजूने वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने रुग्णवाहिकेला रस्ता मिळाला नाही. इतर वाहनधारकही सततच्या [...]
नाद केला अन् वाया गेला! बिअर पिण्याची स्पर्धा जीवावर बेतली, 2 सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू
तळीरामांसाठी दारू म्हणजे अमृतासमान. दारू पिण्यासाठी वाटेत ते करण्याची त्यांची तयारी असते. अशीच तयारी 2 सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या तरुणांनी केली आणि दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये बिअर पिण्याच्या शर्यतीत दोन्ही तरुणांनी भाग घेतला होता. बिअरच अती सेवन केल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना […]
जिल्हा परिषदसाठी कुडाळ तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज
कुडाळ । प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातून भानुदास सूर्यकांत रावराणे यांनी (२८ )पावशी जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष म्हणून आपला पहिला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे सादर केला आहे. तर सखाराम उर्फ पांडू चंद्रकांत खोचरे यांनी (32 )घावनळे जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आपला उमेदवारी अर्ज सादर केला.मंगळवार 20 जानेवारी [...]
Satara News : साताऱ्यात विकासाच्या नावाखाली अतिक्रमणांचा महापूर
साताऱ्यात वाढलेल्या टपऱ्या आणि अतिक्रमणांमुळे नागरिक संतप्त सातारा ( प्रशांत जगताप) : सातारा शहरात सध्या राबविल्या जात असलेल्या तथाकथित ‘विकास मॉडल मुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बसस्थानक परिसर तसेच पादचारी मार्गावर वाढलेल्या टपऱ्या, हातगाड्या आणि अनधिकृत गाळ्यांमुळे वाहतूक [...]
Sangli News : मालगावमध्ये भाड्याच्या घरात लाईट दिल्याने दोन गटात राडा
मिरज मालगावमध्ये भाड्याच्या खोलीत लाईट कनेक्शनवर राडा मिरज : मिरज तालुक्यातील मालगाव येथे भाड्याच्या खोलीत लाईट कनेक्शन दिल्याच्या कारणातून एकाच भावकीतील दोन गटात राडा झाला. या मारामारीत दोन्ही गटाकडील सातजण जखमी झाले आहेत. याबाबत लक्ष्मी महेश आवटी (वय ३०) आणि सुरेश आण्णाप्पा आवटी (वय ५२) यांनी मिरज [...]
साडी नेसताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात
सणावारासाठी साडी हा स्त्रियांसाठी सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. परंतु अनेकदा साडी नेसताना चुका करतो. साडी नेसणे म्हणजे ती शरीराभोवती गुंडाळणे नाही हे सर्वात आधी लक्षात घ्यायला हवे. साडी नेसण्याची कला आत्मसात करणे थोडे अवघड असू शकते, परंतु अशक्य नाही. अनेकजणी फक्त ५ ते १० मिनिटांमध्ये साडी नेसण्याचे काम उत्तम करतात. सांधेदुखीसाठी मोहरीचे तेल कसे […]
Sangli News : गोटखिंडीत जमिनीच्या वादातून महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर जबर मारहाण
गोटखिंडी येथील जमिनीच्या वादातून हिंसाचाराची घटना उघडकीस वाळवा : वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील धनगर मळा परिसरात जमिनीच्या कारणावरून झालेल्या बादात एका महिलेसह तिच्या मुलाला आणि सुनेला लाकडी काठी व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला [...]
भोपळ्याच्या बिया खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
भोपळ्याच्या बिया या पौष्टिकतेचा खजिना आहेत. या लहान बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. महिनाभर दररोज त्यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. महिनाभर दररोज भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य लक्षणीयरीत्या सुधारू शकते. तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू इच्छित असाल, वजन कमी करू इच्छित असाल तर भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात कांद्याची […]
$@91! डॉलरपुढे रुपयाचे लोटांगण, 91 रुपयांपर्यंत घसरण, अर्थतज्ज्ञांची चिंता वाढली
डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात रुपया 90 चा टप्पा गाठला होता. आता त्यांची 91 पर्यंत घसरण झाली आहे. २०२५ मध्ये भारतीय रुपया सुमारे 3.5 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे तो आशियातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक बनला. रुपयाच्या कमकुवतपणाचा हा ट्रेंड २०२६ मध्येही सुरू आहे आणि तो सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९० च्या पुढे […]
Sangli News : सांगली महापालिकेत महापौरपदासाठी खंडीभर इच्छुक
सांगली महापालिकेत महापौरपदासाठी दोन डझनापेक्षा जास्त इच्छुक सांगली : सांगली मिरज कुपवाडसह राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. भाजपला बहुमताची फारशी अडचण नाही. केवळ एका जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बरोबर घेवून [...]
इमारतीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसेल तर ओसी मिळणार नाही; हायकोर्टाची कठोर भूमिका
महापालिकांच्या हद्दीतील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. विकासक जोपर्यंत बांधकाम परवान्यांचे पूर्णपणे पालन करत नाहीत तसेच उंच इमारत बांधकामाच्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधत नाही, तोपर्यंत संबंधित इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देऊ नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व पालिका प्रशासनांना दिले. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या […]
कंपनी विकत घेऊन कामावरून काढून टाकेन! एलन मस्कचा एअरलाईनच्या CEO ला इशारा
एलन मस्क मालक असलेल्या ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तांत्रिक बिघाड झाल्याने युजर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे युजर्सकडून रोज तक्रारी येत आहेत. याच कारणावरून आर्यलँडमधील विमान कंपनी रायनएअरने देखील तक्रार नोंदवली. त्यांनी एअरलाइनच्या अधिकृत अकाऊंटवरू मस्कवर टीका केली. “कदाचित तुम्हाला elonmusk वाय-फायची आवश्यकता आहे?” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. यामुळे Elon Musk आणि […]
Solapur : वैराग शेळगाव हॉटेलमध्ये चोरी; 1,86 लाखांचा मुद्देमाल लंपास
शेळगाव हॉटेलमध्ये चोरी; वैराग : शेळगाव येथील बिअर बार अॅड परमिट रूम हॉटेलमध्ये चोरट्यांनी खिडकीचे गज तोडून हॉटेलमधील दारू, बिअर व वाईनची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात १ लाख ८४ हजार ११३ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद हॉटेल मालक [...]
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन तब्बल 20 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत. विशेषत: चर्चगेटला जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असल्यामुळे नोकरदारांना मोठा फटका बसला आहे. मालाड आणि कांदिवली स्थानकांदरम्यान देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी 102 लोकल […]
Solapur News : सांगोल्यात डस्टर कार ओढ्यात पडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू
डस्टर कारचा अपघात सांगोला : भरधाव वेगातील नियंत्रण सुटलेली डस्टर कार बेट ओढ्यात पडल्याने झालेल्या अपघातात कारमधील पुढील सीटवरील दोघांचा सीट बेल्ट न निघल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर मागील सीटवरील तिघेजण मात्र दैव बलवत्तर [...]
शेअर बाजाराची धूळधाण; गुंतवणूकदारांची दाणादाण, सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 400 अंकांनी कोसळला
शेअर बाजारात या आठवड्याची सुरुवात मंदीनेच झाली आहे. वाढत्या जागतिक अस्थिरतेमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी समोवारी बाजारात मोठी घसरण दिसून आली. बाजारात मंगळवारीही घसरणीचे सत्र सुरूच राहिले असून शेअर बाजाराची धूळधाण झाली आहे. या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांची दाणादाण उडाली आहे. याघसरणीत गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराची निर्देशांक सेन्सेक्स व्यवहार बंद होताना 1185 […]
Solapur News : सोलापूरकरांसाठी श्री महाकालेश्वर दर्शनाचा प्रवास आता होणार सोपा
सोलापूर-इंदोर नवीन विमानसेवा सुरू सोलापूर : सोलापूर-गोवा आणि सोलापूर-मुंबई विमानसेवेनंतर आता सोलापूरकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोलापूर-इंदोर ही नवीन विमानसेवा येत्या बुधवार, (दि. २१) जानेवारीपासून सुरू होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामुळे [...]
हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू सायन नेहवाल हिने स्पर्धात्मक खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे. वाढते वय आणि दुखापतींमुळे शरीर साथ देत नसल्याचे म्हणत तिने बॅडमिंटनला रामराम करण्याचा निर्णय घेतला. लंडन ऑलिम्पिकमध्ये (वय – 2012) ब्रांझपदक जिंकत इतिहास घडला होता. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे सामनाच्या कारकिर्दीला ब्रेक लागला होता. त्यानंतर […]
Solapur News : भंडारकवठेत कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने घेतला गळफास
भंडारकवठेत आर्थिक तणावातून व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या सोलापूर :दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे एका ४१ वर्षीय व्यक्तीने आर्थिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १९ जानेवारी २०२६) दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत [...]
Solapur News : सोलापुरात प्रथमच ‘जलपरी शो’ची रंगत
सोलापूर गड्डा यात्रेत पहिल्यांदा जलपरी शोचे आगमन सोलापूर : सोलापूर शहरातील पारंपरिक आणि भाविकांचे आकर्षण असलेल्या गड्डा यात्रेत यंदा एक नवा आणि अनोखा प्रयोग पाहायला मिळत आहे. सोलापुरात प्रथमच ‘जलपरी शो’चे आयोजन करण्यात आले असून, या आगळ्या-वेगळ्या शोने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे [...]
दैवज्ञ गणपती मंदिरात उद्यापासून धार्मिक कार्यक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी उभाबाजार येथील श्री देव दैवज्ञ गणपती मंदिरात 36 व्या वर्धापन दिनानिमित्त गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच सालाबाद प्रमाणे माघी गणेश जयंती, नारायण स्वामी पुण्यतिथी व बालाजी उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता गणपती मूर्ती श्रीची पूजाअर्चा, वाढदिवस, गणपती अथर्वशीर्षसहस्त्रा वर्तने,जप व हवन [...]
Kolhapur : ग्रामीण राजकारणाचं भयावह वास्तव मांडणारा ‘सुड शकारंभ’ सिनेमा चर्चेत
नव्या पिढीला आकर्षित करणारा अॅक्शन-ड्रामा ‘सुड शकारंभ’ कोल्हापूर- सत्तेच्या संघर्षातून जन्माला आलेली आणि सूडाच्या आगीत आकार घेतलेली कहाणी आता प्रेक्षकांसमोर अखेर उलगडली आहे. ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी अॅक्शन-ड्रामा-थ्रिलर ‘सुड शकारंभ’ हा सिनेमा १६ जानेवारी [...]
तुम्ही ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य कसे? प्रयागराज माघ मेळा प्रशासनाची अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस
प्रयागराजच्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी अविमुक्तेश्वरानंद यांचे शिष्य आणि उत्तर प्रदेश सरकारचे गृहसचिव मोहित गुप्ता आणि न्यायाधिशांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांवर हल्ला केल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर, अविमुक्तेश्वरानंद यांनी स्नान करण्यास नकार दिला. तेव्हापासून ते त्यांच्या छावणीबाहेर निषेध करत आहेत. आता, न्यायाधिकरणाने त्यांना नोटीस पाठवली आहे. प्रयागराजच्या माघ मेळा प्रशासनाने अविमुक्तेश्वरानंद […]
त्वचेवर सुरकुत्या पडू नयेत म्हणून ही काळजी घ्यायलाच हवी, वाचा
आपल्या शरीराला प्रामुख्याने पाण्याची गरज ही खूप असते. पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असल्यामुळे, शरीर हायड्रेट राहते आणि अनेक आजार दूर होतात. त्वचेच्या सौंदर्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करतो, ज्यामध्ये फेस मास्क आणि महागड्या उत्पादनांचा समावेश असतो, परंतु शरीराला हायड्रेट ठेवल्याशिवाय, चेहऱ्यावर अपेक्षित चमक मिळवता येत नाही याकडे आपण दुर्लक्ष करतो. लिपस्टिक लावताना कोणती काळजी घ्यायला […]
Kagal News : मुरगुड नगरपालिकेमध्ये एमबी रजिस्टर प्रकरणी नगर अभियंत्याला 40 हजारांची लाच घेताना अटक
नगर अभियंता प्रदीप देसाई लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात मुरगुड : मुरगुड नगरपालिकेमध्ये सध्या सेवेत असणारा (स्थापत्य) नगर अभियंता वर्ग २चा अधिकारी प्रदिप पांडुरंग देसाई (वय – ३२ वर्षे), मूळ रा. मिणचे खुर्द, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर याला तो हुपरीमध्ये नगरपालिकेत सेवेत असतानाच्या रस्त्या कामाच्या [...]
लिपस्टिक लावताना कोणती काळजी घ्यायला हवी, वाचा
सीझन कुठलाही असो महिलांना नटणे थटणे हे खूप आवडते. दररोजच्या मेकअपमध्ये लिपस्टिकचा वापर हा फार मोठ्या प्रमाणात होतो. लिपस्टिक वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक अनोखा ग्लो येतो. सध्याच्या घडीला मॅट लिपस्टिकची चलती ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. मॅट लिपस्टिकला सर्व वयोगटातील महिलांची पसंती ही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. मॅट लिपस्टिक ही एखाद्या लग्नसोहळ्यापासून ते अगदी कार्यालयात […]
Kolhapur News : रंकाळा तलावावर सकाळी योग, व्यायाम आणि सुरेल संगीताचा संगम
रंकाळा प्रेमींनी दिली निसर्गाला सुरांची किनार कोल्हापुर ( सुधाकर काशिद ) : रंकाळा तलावावर योगा, व्यायाम, भरभर चालणे, रोज सकाळी त्यानिमित्ताने मित्रांची भेट आणि दिवसाची सुरुवात अगदी फ्रेश असे वातावरण आहे . आणि या वातावरणाला काही रंकाळा प्रेमींनी सुर संगीताची [...]
हिवाळ्यात पेडीक्योर करण्याचे काय फायदे होतात, वाचा
हिवाळ्यामध्ये आपली त्वचा ही खूप रुक्ष बनते. अशावेळी हिवाळ्यामध्ये आपल्या सौंदर्याची आणि त्याचबरोबर आपल्या त्वचेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. हिवाळ्यात हातासोबत आपल्या पायांचीही काळजी घेणे क्रमप्राप्त असते. सौदर्यांची व्याख्या ही आपल्या शरीराच्या कुठल्याही एका भागासाठी महत्त्वाची नाही. तर आपल्याला शरीराच्या प्रत्येक भागाच्या सौंदर्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण फेशियल, वॅक्सिंग महिन्याला जाऊन करतो. परंतु […]
‘मुंबई महाराष्ट्राची नाही’ही राजकीय वावटळ ; आली तशीच निघूनही गेली
सौ. मंगल नाईक-जोशी सावंतवाडी महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी गोडवा गायलेली ‘मराठी’ ही या मुंबईची राजभाषा आहे. त्यामुळेच रोजगाराच्या प्रतीक्षेत असणारा गावाकडील माणुस आजही हक्काने मुंबईची वाट धरतो. ग्रामीण भागात राहणारी आमच्यासारखी माणसे भलेही मुंबईत वास्तव्यास नसली तरी मुंबई आपली आहे, ही भावना आपोआप मनात रुजलेली आहे. बालपणीच्या कोऱ्या पाटीवर ते कुणी मुद्दामहून कोरलेले [...]
राधानगरीत वीज खंडिततेमुळे उमेदवारी अर्ज प्रक्रियेला अडथळा राधानगरी ( महेश तिरवडे ) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी वर्दळ होत आहे. राधानगरी तालुक्यातील विविध गावांतून स्थानिक नेते, पदाधिकारी व [...]
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या आणि दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर करणार्या शिक्षकांविरुध्द प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी गंभीर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत विविध तालुक्यातील शिक्षकांना सेवेतून निलंबित केले आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणी दरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. काही शिक्षकांचे प्रमाणपत्र संबंधित […]
शास्त्रीय संशोधन समाजापर्यंत पोहोचविणे काळाची गरज!
‘सागरमहोत्सव’सारख्याउपक्रमांमुळेनागरिकसजगबनतात: माजीकुलगुरुडॉ. संजयदेशमुख रत्नागिरी : आजचा सर्वात मोठा पर्यावरणीय धोका म्हणजे अज्ञान नव्हे, तर निसर्गाशी मानवाचे तुटलेले नाते आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील संवाद कमी होत चालला आहे. ‘सागर महोत्सवा’सारखे कार्यक्रम हा संवाद पुन्हा जोडतात. शास्त्राrय संशोधन केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न ठेवता ते समाजापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमधून गुंतागुंतीचे वैज्ञानिक विषय सहज, [...]
महासागर आपले कवच, पण त्यालाही मर्यादा आहेत!
महासागर आपले कवच, पण त्यालाही मर्यादा आहेत!‘सागर महोत्सव’ भविष्यासाठी दिलेली नैतिक साद : समारोप प्र्रसंगी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांचे प्रतिपादन रत्नागिरी : महासागर टिकतील. कारण ते आपल्यापेक्षा जुने आणि अधिक विशाल आहेत. खरा प्रश्न इतकाच आहे की, महासागरांनी आजवर जसे आपल्याला वाचवले तसे आपण स्वत:ला शहाणपणाने वाचवू शकतो का. खोल समुद्र [...]
मोदी सरकारवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; खासगी विद्यापीठांच्या नियमनाबाबत नव्याने प्रतिज्ञापत्र मागवले
खासगी विद्यापीठांच्या नियमनाशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरुन केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल करणे बंधनकारक आहे. असे असतानाही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांमार्फत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. सरकारच्या या बेफिकीर कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत न्यायालयाने खासगी विद्यापीठांच्या नियमनाबाबत नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे […]
चिंबलवासियांचानिर्धार, आंदोलनाचे23 दिवस: बुधवारीपणजीयेथेघेणारमुख्यमंत्र्यांचीभेट तिसवाडी : चिंबलवासियांनी केंद्र सरकारचा प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ आणि राज्य सरकारचा ‘प्रशासन स्तंभ’ हे दोन्ही प्रकल्प त्वरित रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा तीव्र केली आहे. बुधवारी 21 जानेवारी रोजी ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या आल्तीनो येथील निवासस्थानी भेट घेणार असून, या भेटीत दोन्ही प्रकल्प रद्द करण्यावर ठाम भूमिका मांडणार [...]

23 C