जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, सुदैवाने कोणतीही हानी नाही
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी (18 एप्रिल) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के सकाळी सुमारे 8:26 वाजण्याच्या सुमारास जाणवले, ज्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अधिकृत पातळीवर सविस्तर अहवाल अद्याप समोर आलेला नसला, तरी सुरुवातीच्या तपासणीत कोणतीही गंभीर घटना घडलेली नसल्याचे […]
श्रद्धेची आणि जिद्दीची अनोखी यशोगाथा; अहमदपूरमधील भंगार व्यावसायिकाने उभारले साईबाबांचे मंदिर
मनात श्रद्धा आणि कष्टाची तयारी असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते, याचा प्रत्यय अहमदपूर तालुक्यातील सावरगाव (थोट) येथील रहिवासी लक्ष्मण शेंबाळे यांनी दिला आहे. व्यवसायाने भंगार खरेदी-विक्रीचे काम करणाऱ्या शेंबाळे यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून हडोळतीसारख्या ग्रामीण भागात तब्बल 15 लाख रुपये खर्च करून साईबाबांचे एक भव्य मंदिर उभारले आहे. या मंदिराची सध्या परिसरात मोठी चर्चा […]
संगमेश्वर पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत राडा; राजीवलीमध्ये आचारसंहितेचा भंग, 7 जणांवर गुन्हा दाखल
संगमेश्वर तालुक्यातील राजीवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचा एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले असून याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार शंकर भागोजी येडगे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी […]
बँक ऑफ महाराष्ट्रवर दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल दरोडा; 20 लाखांची रोकड आणि 10 किलो सोनं लंपास
मध्य प्रदेशमधील सिंगरोली जिल्ह्यात दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर दरोडा पडला आहे. पाच सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत घुसून अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो रुपयांची रोकड आणि सोने-चांदीच्या दागिन्यांची लूट केली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी बैढन परिसरामध्ये घडली. पाच शस्त्र दरोडेखोर मुखवटे घालून बँकेमध्ये शिरले. आत शिरताच बँकेच्या […]
काँग्रेस खासदार के.सी.वेणुगोपाल यांनी शनिवारी म्हटले की, महिला आरक्षणाला विरोधकांचा ठाम पाठिंबा कायम आहे. मात्र संविधान (131वे दुरुस्ती) विधेयकावर चर्चा करताना केंद्र सरकारने महिला आरक्षणाचा मुद्दा सीमांकनाशी जोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. वेणुगोपाल यांनी विरोधकांची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आमचा मुख्य आक्षेप हा दोन वेगळ्या मुद्द्यांना एकत्र करण्यावर होता. महिला आरक्षण कधीच […]
शिमला, मनालीला जाऊन कंटाळा आला असेल तर, यंदाच्या उन्हाळ्यात या ठिकाणांना भेट द्यायलाच हवी
उन्हाळा सुरू होताच, थंड आणि शांत ठिकाणी जाण्याची इच्छा होते. बहुतेक लोक मनाली आणि शिमलासारख्या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी जातात, पण गर्दी, महागडी हॉटेल्स आणि वाहतूक कोंडीमुळे कंटाळा येतो. अशावेळी बजेट फ्रेंडली ठिकाण आणि दिसायलाही तितकेच सुंदर असेल तर आनंद अधिक वाढेल. अशीच कमी गर्दी असलेली ठिकाणे आपण शोधायला हवीत. जिथे आनंदही लुटता येईल आणि […]
Gold Silver Rate –जागतिक तणाव निवळण्याचे संकेत; सोने-चांदीचे दर मोठी झेप घेणार?
अमेरिका, इस्रायल इराण यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली असून कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी वेगाने हाचलाची सुरू आहेत. आता इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली असून सर्व व्यापारी जहाजांना त्यातून जाण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही दावा केला आहे की इराण होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा कधीही बंद करणार नाही. तसेच इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता चर्चेच्या […]
मालवणात सागरी किल्ले अध्ययन केंद्र स्थापनेला गती
अतुल काळसेकरांचा सातत्याने पाठपुरावा ; संस्थेकडून कृतज्ञतापूर्वक सत्कार मालवण : प्रतिनिधी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे “सागरी किल्ले अध्ययन केंद्र” स्थापन होणार असून महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री मा. आशिषजी शेलार यांनी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत या केंद्राची घोषणा केल्यानंतर महाविद्यालयाने सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासन तसेच [...]
पुढील 25 वर्षांसाठी मतदारसंघ पुनर्रचना पुढे ढकला, मुख्यमंत्री स्टॅलिन यांची मागणी
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी लोकसभेत संविधान (131वे दुरुस्ती) विधेयक अपयशी ठरल्यानंतर याला “काळ्या कायद्याविरोधातील लढ्याचा विजय” असे संबोधले. मतदारसंघ पुनर्रचनेच्या नावाखाली आणलेला हा कायदा फेटाळण्यात आल्याने लोकशाही आणि राज्यांच्या हक्कांचे रक्षण झाले, असे त्यांनी स्पष्ट केले. स्टॅलिन यांनी सांगितले की, या विधेयकाविरोधातील आंदोलन हे अचानक झाले नव्हते, तर त्याची तयारी जवळपास एक वर्षापासून सुरू होती. […]
कलिंगड विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, जाणून घ्या
उन्हाळा आणि कलिंगड यांचं एक अनोखं नातं आहे. उन्हाळ्यात रस्त्यावर कलिंगडाची रास विकण्यासाठी दिसल्यावर आपले पाय आपसुक कलिंगड विकत घेण्यासाठी वळतात. परंतु अनेकदा कलिंगड विकत घेताना तुम्हालाही फसल्यासारखे होते का.. कलिंगड विकत घेताना कधीतरी ते आतून अर्धेअधिक पांढरे निघते. तर कधी आतून पिवळसरही असते. अशावेळी कलिंगड विकत घेताना काही गोष्टी या लक्षात ठेवणे खूप […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री साडे आठ वाजता देशाला करणार संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. संसदेत महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकाला आवश्यक बहुमत न मिळाल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे संबोधन महत्त्वाचे मानले जात आहे. लोकसभेत मांडण्यात आलेल्या संविधान (131वे दुरुस्ती) विधेयकाला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळू शकले नाही. या विधेयकाचा उद्देश संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये […]
जवळगा बेटची प्राची मुकडे दहावी CBSE परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक
मुरुम (प्रतिनिधी)- तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथील जवळगा बेट गावातील प्राची मुकडे हिने दहावीच्या CBSE परीक्षेत 99.20% (496/500) गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे गावकऱ्यांच्या वतीने तिचा व तिच्या वडिलांचा प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.प्राचीच्या यशामागे तिची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध जीवनशैली आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. तसेच तिच्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार व प्रोत्साहनही तिच्या यशाला कारणीभूत ठरले आहे. ग्रामीण भागातून येऊनही तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केल्याने ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. प्राची मुकडे ही माजी सरपंच रामानंद मुकडे यांची सुपुत्री असून, तीच्या यशामुळे लोटस पोदार लर्न स्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचीही प्रचिती आली आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. सत्काराला उत्तर देताना प्राची मुकडे हिने आपण ग्रामीण भागातील असूनही मोठे यश संपादन करता येते, यावर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोणतीही न्यूनगंडाची भावना मनात बाळगता कामा नये, असे ती म्हणाली. जिद्द, चिकाटी, नियमित अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन करता येते, असा प्रेरणादायी संदेश तिने दिला.
नागरीकांच्या सोयीसाठी ‘नगर परिषद आपल्या दारी’ योजना; सहभागाचे नगराध्यक्ष गंगणे यांचेआवाहन
तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील नागरी सुविधा अधिक सुलभ व लोकाभिमुख करण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेकडून ‘नगर परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी दिली. या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रलंबित नागरी समस्या सोडविण्यासाठी तसेच विकासकामांना गती देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. प्रभागनिहाय समित्या गठीत करून नागरिकांच्या थेट सहभागातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नगर परिषदेकडून विविध शासकीय योजनांचे प्रमाणपत्र, सुविधा व सेवा नागरिकांना त्यांच्या प्रभागातच उपलब्ध करून देण्याचा उद्देश असून, यासाठी नागरिकांनी बैठकीत उपस्थित राहून आपले प्रश्न व सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे तसेच गटनेते औदुंबर कदम यांनीही नागरिकांना सहभागाचे आवाहन केले आहे. प्रभागनिहाय बैठकीचे वेळापत्रक दि. 16 एप्रिल 2026 : प्रभाग क्रमांक 1 ते 4, दि. 17 एप्रिल 2026 : प्रभाग क्रमांक 5 ते 8, दि. 18 एप्रिल 2026 : प्रभाग क्रमांक 9 ते 11, ठिकाण द स्कायलंड हॉटेल या बैठकीत प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे यांसारख्या नागरी मूलभूत सुविधांबरोबरच शहर विकास आराखडा व श्री तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकासाबाबतही नागरिकांकडून सूचना घेतल्या जाणार आहेत. इच्छुक नागरिकांना समितीत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. नागरिकांनाही विकासात सहभाग शहरातील विकासकामे अधिक दर्जेदार व जलद गतीने पूर्ण व्हावीत, यासाठी सामान्य नागरिकांनाही थेट सहभागाची संधी देण्यात येत आहे. प्रभागनिहाय समस्या सोडविण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील ज्येष्ठ नागरिक इंदुबाई दिगंबर इंगळे (वय 85) यांचे शनिवार, दिनांक 18 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने तुळजापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, तीन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंदुबाई इंगळे या तुळजाभवानी मंदिर येथील पुजारी विलास इंगळे यांच्या मातोश्री होत. तसेच त्या श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी संचालक कुमारी इंगळे यांच्या देखील मातोश्री होत्या. तसेच कैलासवासी दिगंबर इंगळे (पती) हे बाळासाहेब ठाकरे व ठाकरे घराण्याचे पारंपरिक पुजारी म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे इंगळे कुटुंबाला धार्मिक क्षेत्रात विशेष मानाचे स्थान आहे. इंदुबाई इंगळे यांच्यावर तुळजापूर येथील घाटशिळ रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पुजारीवृंद, प्रतिष्ठित नागरिक, वकील, पत्रकार तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, धार्मिक परंपरा जपणाऱ्या इंगळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनामुळे तुळजापूर शहरावर शोककळा पसरली असून, त्यांच्या कार्याची व योगदानाची आठवण कायम राहणार आहे.
विरोधक विकासाच्या आड येतात- संयोगिता गाढवे
भूम (प्रतिनिधी)- विरोधकांना जनतेच्या विकासाचे किंवा जनहिताचे काही देणे घेणे नाही. ते जनतेला फसवून जनतेला खोटेनाटे बोलून निवडून येण्यात यशस्वी झाले आहेत. निवडून आल्यानंतरही त्यांचा तोच धंदा जोरात चालू आहे. मात्र मला जनतेने जनसेवेसाठी निवडून दिलेले आहे त्यांच्यासाठी मी विकास कामांना आडवे येणार आमचा कायम विरोधच करणार असे भूमनगरपालिकेच्या नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी म्हटले. त्या नगरपालिका सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. यावेळी माजी गटनेते संजय गाढवे, गटनेते सुरज गाढवे, नगरसेवक अभिजीत शेटे, ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष सुधीर देशमुख, माळी महा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी माळी,अख्तर जमादार, सुनील थोरात हे हजर होते. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष तसेच माजी गटनेते यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात खोटे नाते आरोप केले जात आहेत. त्यांना यावेळी सडेतोड उत्तर नगराध्यक्ष गाढवे यांनी दिले. पुढे त्या म्हणाल्या की, जनशक्तीचे नगरसेवक जनसेवा करत आहोत असे सांगतात मग ती जनसेवा कामे बंद पाडण्याची आहे काय असा परखड सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. सभागृहांमध्ये हे काम बंद करा ते काम बंद करा अशी भूमिका हे नगरसेवक घेतात. आणि तेच सभागृहाच्या बाहेर जाऊन विकास कामे होत नाहीत असा गवगवा करतात. विरोधकांना भूम नगरपालिकेतील सर्व कर्मचारी, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष कायम भ्रष्टाचारी दिसतात. विरोधक फक्त शहराची बदनामी करण्याचे काम करीत आहेत असे संयोगिता गाढवे यांनी सांगितले.
भाविकांच्या सेवेसाठी चिंचपूर ढगे ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम
भूम (प्रतिनिधी)- भूम-परंडा तालुक्यातील श्रीक्षेत्र काळभैरवनाथ सोनारी येथे दरवर्षी मोठ्या श्रद्धा-भावनेने भरत असलेल्या यात्रेसाठी हजारो भाविक पायी, दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांनी दर्शनासाठी येत असतात. यंदा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे यात्रेकरूंना प्रवासादरम्यान मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागत असल्याने चिंचपूर ढगे येथील ग्रामस्थांनी सेवाभावातून पुढाकार घेत भाविकांसाठी दिलासा देणारी व्यवस्था उभारली आहे. पंचायत समितीचे सभापती विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत सोनारीकडे जाणाऱ्या मार्गावर पिण्याचे थंड पाणी, चहा, नाश्ता तसेच काही ठिकाणी जेवण व मठ्ठ्याची व्यवस्था केली आहे. चिंचपूर ढगे हे यात्रेकरूंच्या मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.
कडक उन्हात विद्यार्थ्यांना दिलासा; भूम बसस्थानकात थंड पाण्याच्या पाणपोईचे उद्घाटन
भूम (प्रतिनिधी)- सध्या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मोठा दिलासा देणारा उपक्रम भूम बसस्थानकात राबविण्यात आला आहे. पत्रकार अरविंद शिंदे, धनंजय शेटे व तानाजी सुपेकर यांच्या संकल्पनेतून तसेच भूम तालुक्यातील शिक्षकांच्या पुढाकाराने बसस्थानक परिसरात थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोई उभारण्यात आली असून तिचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. भूम बसस्थानकात एसटी महामंडळाकडून पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना कडक उन्हात पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः सात ते आठ शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी बसची प्रतीक्षा करताना उष्णतेचा सामना करत होते. तसेच खेडेगावातून ये जा करणाऱ्या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो म्हणून ही गरज ओळखून पत्रकारांनी पुढाकार घेतला व शिक्षकांनी सहकार्य करत पाणपोईची व्यवस्था उभी केली. या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांसह नागरिक व प्रवाशांना थंड पाणी सहज उपलब्ध होत असून उन्हाच्या तीव्रतेत मोठा दिलासा मिळत आहे. सध्याच्या उष्ण वातावरणात अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी पत्रकार व शिक्षकांचे मनसोक्त आभार मानत उपक्रमाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उद्घाटन प्रसंगी सोमनाथ टकले, संजीवन तांबे, दत्ता गुंजाळ, आबासाहेब ढगे, औदुंबर कोल्हे, दत्ता घोडके, अंगद मिसाळ यांच्यासह विद्यार्थी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील कृषि महाविद्यालयात दिनांक 17 एप्रिल रोजी आयडियल ऍग्री सर्च प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीचा कॅम्पस इंटरव्ह्यू कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या निवड प्रक्रियेत अंतिम सत्रातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी 13 विद्यार्थ्यांची अंतिम निवड कंपनीच्या निवड समितीने केली. आयडियल ऍग्री सर्च प्रा. लि. ही कंपनी पिकांच्या आरोग्य व उत्पादनवाढीसाठी जैविक खते, सूक्ष्मअन्नद्रव्ये, वनस्पती वाढ नियंत्रक तसेच पाण्यात विद्रव्य खते यांसारख्या विविध कृषी निविष्ठा उपलब्ध करून देणारी अग्रगण्य कंपनी आहे. खत निर्मिती क्षेत्रातही कंपनीने मोलाची कामगिरी बजावली आहे. सदर कॅम्पस मुलाखती कंपनीचे डेव्हलपमेंट हेड वैभवकुमार एस. जाधव व रिजनल हेड प्रवीण महिंद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. निवड प्रक्रियेत सांगुळे संकेत, माळी ज्ञानेश्वर, मदने सौरभ, अनुभूले अभिषेक, घेवारे अजय, घुगे अभिजित, शेंडगे अनिकेत, साखरे प्रतिक्षा, जाधव दिप्ती, पाठक राजश्री, गंजे सरिता, मस्के प्रतीक्षा आणि भक्ती चौधरी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कंपनीच्या कार्यक्षेत्रात कृषी संलग्न काम करण्याची संधी मिळणार आहे. सध्याच्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेला हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात अधिकाधिक कृषी औद्योगिक कंपन्यांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी आमंत्रित करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या कॅम्पस प्लेसमेंटच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. शेख मोहसीन, डॉ. गांधले अमित, डॉ. इंगळे रोहित, डॉ. खोसे प्रताप, प्रा. सुमिथा पाटील, प्रा. दळवे सतेश, प्रा. डोके आकाश, प्रा. माळी प्रवीण, प्रा. शेटे देवानंद, प्रा. भालेकर सुनील, प्रा. शिंदे अक्षय, प्रा. मुंडे नवनाथ, प्रा. गोटे प्रिया, प्रा. मगर प्रगती, प्रा. नागरगोजे विजय, प्रा.सुतार रामचंद्र, मुजावर गुलाब, .गिरी ओंकार यांनी मोलाची भूमिका बजावली.
आदर्श शिंदेंच्या पहाडी सुरांनी धाराशिव भीममय
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव नगरीत क्रांतीच्या सुरांचा अभूतपूर्व सोहळा रंगला. महाराष्ट्राचा लाडका गायक आदर्श शिंदे यांच्या बुलंद आणि थरारक आवाजाने संपूर्ण जिल्हा परिषद मैदान दणाणून गेले. निमित्त होते, आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या प्रेरणेतून मल्हार पाटील आणि साक्षी मल्हार पाटील यांनी आयोजित केलेल्या भीम महोत्सवाचे. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. आदर्श शिंदे यांनी आपल्या पहाडी आवाजात भीमगीते सादर करताच, हजारोंच्या संख्येने उपस्थित भीम अनुयायांनी जय भीमचा जयघोष केला. प्रत्येक गीतातून मिळणारी प्रेरणा आणि समतेच्या विचारांनी उपस्थितांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. हा केवळ संगीताचा कार्यक्रम न ठरता, समाज परिवर्तनाचा एक जिवंत जागर ठरला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भाजप युवा नेते मल्हार पाटील यांचा सक्रिय सहभाग. लेडीज क्लबच्या माध्यमातून आजवर अनेक कार्यक्रम झाले, मात्र मल्हार व डॉ. साक्षी पाटील यांच्या पुढाकारातून प्रथमच एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नाला धाराशिवकरांनी उदंड प्रतिसाद देत हा सोहळा यशस्वी केला. कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांच्या गर्दीने मैदान फुलून गेले होते. “प्रत्येक शब्दात अभिमान आणि प्रत्येक ठेक्यात क्रांती“ असा अनुभव घेत तरुणाईने या गीतांवर ताल धरला. जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासात हा कार्यक्रम एक मैलाचा दगड ठरला असून, बाबासाहेबांच्या विचारांचे नवचैतन्य या माध्यमातून घराघरात पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
धाराशिव माविमची राज्यात ऐतिहासिक झेप - आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचा कणा असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) धाराशिव जिल्हा कार्यालयाने 2025-26 या वर्षात राज्यात दुसरा क्रमांक पटकावून नवा इतिहास रचला आहे. सन मागील 29 वर्षांत पहिल्यांदा सांघिक कामगिरीच्या जोरावर माविमने ही मोठी झेप घेतली आहे. यामुळे जिल्ह्याचा महिला. सक्षमीकरणाचा नवा पॅटर्न आता राज्यासमोर आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. बचतगटांना आर्थिक बळ देण्यासाठी माविमने यंदा 37 कोटी 21 लक्ष रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 10 कोटींनी अधिक कर्जवाटप झाले आहे. याशिवाय व्हल्नरेबल सपोर्ट फंडच्या माध्यमातून विधवा, परित्यक्ता, दिव्यांग व अल्पभूधारक अशा 512 गरजू महिलांना 76 लक्ष 80 हजार रुपयांची थेट आर्थिक मदत देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणले आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन, दाल मिल आणि हळद प्रक्रियेसारख्या उपप्रकल्पांमध्ये जिल्ह्याने 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यात नव्याने तीन महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ‘लाडकी बहिण’ महिला सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून महिला आता केवळ बचत न करता उद्योजक बनण्याकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.केवळ आर्थिकच नव्हे, तर आरोग्य क्षेत्रातही माविमने ठसा उमटवला आहे. जिल्ह्यातील 64 गावांतील 4,960 महिलांची हिमोग्लोबिन, रक्तदाब व मधुमेह तपासणी. आणि 3,000 हून अधिक महिलांना बियाणे वाटप करून पोषण आहार चळवळ राबविण्यात आली आहे. माविम मित्र मंडळ स्थापन करून 60 गावांतील पुरुषांना स्त्री-पुरुष समानता व महिलांच्या मालमत्ता हक्काबाबत प्रशिक्षित करण्यात आले.
इराण, अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आखातामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. इराणने पूर्व भागातील हवाई क्षेत्राचा काही भाग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने शनिवारी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर इरामधील 6 विमानतळांवरील कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. असे असले तरी विमान कंपन्या अद्याप खबरदारी म्हणून […]
बचतगटांच्या बळावर महिलांची झेप ; माविम धाराशिव राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
धाराशिव (प्रतिनिधी)- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय धाराशिवने वर्ष 2025-26 मधील उत्कृष्ट आणि सर्वांगीण कामगिरीच्या जोरावर राज्यात दुसरा क्रमांक पटकावून एक नवा इतिहास घडविला आहे.सन 1995 पासून कार्यरत असलेल्या या कार्यालयाने यापूर्वी कधीही पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले नव्हते. मात्र यंदा सर्व कर्मचाऱ्यांच्या एकजुटीने, नियोजनबद्ध कामकाजातून आणि तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांच्या प्रभावी सहकार्यामुळे हे यश संपादन करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा मुख्य आधार ठरलेल्या बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक,सामाजिक आणि आरोग्यविषयक परिवर्तन घडवून आणण्यात माविमने मोठी भूमिका बजावली आहे.कुक्कुटपालन शेळीपालन,दाल मिल,हळद लागवड व प्रक्रिया यांसारख्या समान व्यवसायांच्या उपप्रकल्पांमध्ये 100 टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली.तसेच जिल्ह्यातील प्रत्येक लोकसंचालीत साधन केंद्राअंतर्गत किमान तीन उपप्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आले. बचतगटांना आर्थिक बळ देण्यासाठी यंदा विक्रमी 37 कोटी 21 लक्ष रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले,जे मागील वर्षाच्या तुलनेत 10 कोटींनी अधिक आहे.याचबरोबर व्हल्नरेबल सपोर्ट फंड अंतर्गत विधवा,परित्यक्ता,दिव्यांग, घटस्फोटीत,निराधार,वंचित,भूमिहीन आणि अल्पभूधारक अशा 512 महिलांना प्रत्येकी 15 हजार रुपयांप्रमाणे एकूण 76 लक्ष 80 हजार रुपयांची मदत देण्यात आली. आरोग्य आणि पोषण क्षेत्रातही उल्लेखनीय काम करत 64 गावांतील सुमारे 4960 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यात हिमोग्लोबिन, रक्तदाब,मधुमेह थायरॉईड आणि बीएमआय तपासण्या करण्यात आल्या. तसेच 3000 पेक्षा अधिक महिलांना परसबाग लागवडीसाठी बियाणे वाटप करण्यात आले. समाजात लिंगसमानतेची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘माविम मित्र मंडळ’ स्थापन करून 60 गावांतील पुरुषांना विविध सामाजिक विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये स्त्री-पुरुष समानता, महिलांचे संपत्ती हक्क,संयुक्त मालकी हक्क,बालविवाह प्रतिबंधक कायदा आदी विषयांचा समावेश होता.तसेच वातावरणीय बदल या विषयावरही माविम कर्मचारी,माविम मित्र आणि समुदाय साधन व्यक्ती यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सहा ठिकाणी महिला मेळावे आणि सर्वसाधारण सभा घेऊन शासकीय योजनांची माहिती 800 ते 1000 महिलांपर्यंत पोहोचविण्यात आली.तसेच 238 नवीन बचतगट स्थापन करून 92 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले.महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनातून सुमारे 8 लक्ष 29 रुपयांची विक्री झाली. वर्ष 2025-26 मध्ये जिल्ह्यात तीन महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ‘लाडकी बहिण’ महिला सहकारी पतसंस्था स्थापन करून सुरू करण्यात आल्या,ज्यामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवे बळ मिळाले आहे.गेल्या 29 वर्षांत बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे दरडोई उत्पन्न वाढले असून बचत गटातील काही महिलांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन कृषी अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, पीएसआय,इंजिनिअर,वकील,डॉक्टर, शिक्षक,पोलीस व सैन्य अशा विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले आहे. याचबरोबर बालविवाह निर्मूलन,हुंडाबंदी, दारूबंदी,कुपोषण निर्मूलन,वृक्षारोपण आणि महिला ग्रामसभा यांसारखे सामाजिक उपक्रमही प्रभावीपणे राबवले जात आहेत.महिला आर्थिक विकास महामंडळ हे महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असून गेल्या 51 वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.उमरगा,तुळजापूर,धाराशिव, कळंब व परंडा तालुक्यातील गरजू महिलांनी माविमच्या विविध योजनांचा लाभ घेऊन बचतगट स्थापन करून स्वतःची प्रगती साधावी,असे आवाहन माविमच्या जिल्हा कार्यालयाने केले आहे.
Kolhapur News :कोल्हापुरात स्थापन होणार टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन
जाणकार क्रिकेटपटूंनी घेतला पुढाकार : मे महिन्यात असोसिएशन स्थापनेवर अंतिम मोहोर कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील लेवरबॉल क्रिकेटप्रमाणेच टेनिसबॉल क्रिकेटचेही वेगळे विश्व आहेत. परंतू लेबरबॉल क्रिकेटला जशी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनही मवरसंस्था आहे, तशी मदरसंस्था टेनिसबॉल क्रिकेटला नाही. त्यामुळे मोठी परंपरा असलेले टेनिसबॉल क्रिकेटमध्ये विस्कळीतपणा आला आहे. तो [...]
पंचायती, पालिकांच्या निवडणुका राज्य आयोगाच्या कार्यकक्षेत
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, अध्यादेशाला मान्यता : आरक्षण, प्रभाग फेररचनेसाठी वेळ लागणार पणजी : यापुढे राज्यातील ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगातर्फे घेण्यात येणार आहेत. हे अधिकार निवडणूक आयोगाला देण्यासंबंधी राज्य मंत्रिमंडळाच्या काल शुक्रवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या [...]
सांगोल्डा, तिसवाडीत ऑनलाईन सट्टेबाजीवर छापेमारी
16 जणांना अटक : लाखो रुपयांचे साहित्य जप्त पणजी : सायबर गुन्हे विरोधी विभागाने तिसवाडी तालुक्यातील दोन ठिकाणांसह सांगोल्डा येथे कारवाई करून ऑनलाईन आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. सांगोल्डा येथे ऑनलाईन सट्टेबाजी करताना सहाजणांना रंगेहात अटक केली आहे, तर तिसवाडीतील दोन्ही ठिकाणांवरुन मिळून दहा जणांना अटक करण्यात आली आहे.सांगोल्डा येथे सट्टेबाजांकडून 31 हजार रोख [...]
केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता 2 % ने वाढणार; मंत्रिमंडळाची मंजुरी
जागतिक संकटामुळे महागाईचा धोका वाढत आहे. या संकटाच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) २% वाढीस मंजुरी दिली आहे. महागाई भत्ता हा महागाईशी निगडित असतो आणि वर्षातून दोनदा, साधारणपणे जानेवारी आणि जुलैमध्ये, त्यात सुधारणा केली जाते. याची गणना औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक […]
पणजी : उत्तर गोव्यातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबच्या अग्निकांड प्रकरणातील 25 मृत झालेल्या पीडितांसंबंधी दोषी मानले गेलेल्यांपैकी शेवटचे राजीव मोडक आणि बिजय कुमार सिंग या दोन व्यवस्थापकांनाही काल शुक्रवारी सशर्त जामीन मिळाला. यामुळे फरारी म्हणून जाहीर करण्यात आलेले मूळ मालक सुरिंदर कुमार खोसला यांना वगळता अन्य सर्व 13 आरोपी सध्या जामिनावर सुटले [...]
पंतप्रधान मोदी संसदेत आत्मविश्वासाने उभे राहू शकले नाहीत, राहुल गांधी यांची टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत केंद्र सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कालच्या संसदीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी दावा केला की, पंतप्रधान आत्मविश्वासाने उभे राहू शकले नाहीत आणि विरोधकांना सामोरे जाणे टाळले, कारण ते अमेरिकेच्या दबावाखाली आहेत. राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने केलेल्या काही करारांमुळे […]
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असून, इराणने होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याचा दावा केला आहे. जोपर्यंत अमेरिकेकडून लादण्यात आलेली नाकेबंदी पूर्णपणे हटवली जात नाही, तोपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग सर्वांसाठी खुला केला जाणार नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे. शुक्रवारी इराणने हा मार्ग खुला करण्याचे संकेत दिले होते आणि युद्धबंदीच्या […]
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी लोकसभेतील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली. विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकारचा डाव उधळून लावला असून हा लोकशाहीचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले. पत्रकारांशी बोलताना रेड्डी म्हणाले की, संसदेत विरोधकांनी एकजुटीने उभे राहत सत्ताधाऱ्यांचा खरा हेतू देशासमोर आणला. “आता भाजप आमच्यावर महिला आरक्षणाच्या विरोधाचा आरोप करत आहे, पण […]
प्रसिद्ध गावठी वैद्य रामा गावडे यांचे निधन
न्हावेली : सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील रहिवासी प्रसिद्ध गावठी वैद्य तथा सर्पमित्र रामा लक्ष्मण गावडे (85) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते गावठी वैद्य म्हणून विविध आजारावर औषधे देत असत, महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातून त्याच्याकडे औषधासाठी रुग्ण येत असत. सर्पमित्र म्हणूनही त्याची विशेष ओळख होती. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सर्प पकडून त्यांना जीवनदान [...]
कर्नाटकात बर्ड फ्लूचा रुग्ण आढळला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कर्नाटकात बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागांना सतर्क करण्यात आले आहे. बंगळूरुच्या बाहेरील हेसरघट्टाजवळील मुथूर गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूची लागण झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. १४ एप्रिल रोजी प्राथमिक चाचणीत संसर्गाची लक्षणे आढळल्यानंतर तात्काळ कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या असून, आजूबाजूच्या परिसरात […]
पुणे विमानतळाची धावपट्टी पुन्हा सुरू, हवाई दलाच्या विमानाच्या हार्ड लँडिंगमुळे झाले होते बंद
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर इथली धावपट्टी बंद करण्याता आली होती. आता शनिवारी सकाळपासून पुन्हा नियमित उड्डाणांसाठी सुरू करण्यात आली. भारतीय हवामान दलाच्या विमानाने लोहगाव हवाई तळावर रात्रीच्या सराव उड्डाणादरम्यान हार्ड लँडिंग केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे 10:25 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित […]
IPL 2026 –मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव; ‘हार्दिककडे उत्तरं नाहीत,’अश्विनने सांगितले कारण
आयपीएल 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, सलग चौथ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर आणि संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पराभवानंतर हताश झालेल्या हार्दिकने आपल्याकडे बोलण्यासारखे काहीही उरले नसल्याची कबुली दिली. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्याचा समालोचक रविचंद्रन अश्विन याने मुंबई इंडियन्सच्या पराभवामागचे कारण सांगितले आहे. […]
Latur News –निलंगा तालुक्यात अवैध पशुंची वाहतुक करणाऱ्या पीकअपने दोघांना उडवले
निलंगा तालुक्यातील मौजे हंगरगा सिरसी पाटीजवळ एका अवैध पशुंची वाहतुक करत असलेल्या कर्नाटक पासिंग असलेल्या पिकअप वाहनाने मोटरसायकलवरील दोघांना उडवले. हा अपघात सकाळी ७ वाजता भरघाव वेगात असल्याने पिकअपमुळे झाला आहे. या अपघातात मोटारसायकलस्वारासोबतचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. निलंगा तालुक्यातील मौजे शेळगी, ता.निलंगा येथील राजकुमार मरळे आणि गोविंद शिंदे हे दोघे निलंगाकडे जात असताना […]
दुसऱ्या महायुद्धाला संपून 80 वर्षे उलटली असली तरी त्याचे भीषण अवशेष आजही जगाला चक्रावून टाकत आहेत. जर्मनीच्या बाल्टिक समुद्रात पडलेल्या तब्बल 16 लाख टन जुन्या दारूगोळ्यावर आता एका नव्या जीवसृष्टीने आपला संसार थाटला आहे. ज्या ठिकाणी केवळ मृत्यू आणि विषारी रसायनांचे साम्राज्य असेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता, तिथे आता मासे, खेकडे आणि स्टारफिश आनंदाने वावरताना […]
आक्रमक पवित्र्यानंतर गॅस कंपनीकडून दुरुस्तीच्या कामास प्रारंभ
सावंतवाडी : प्रतिनिधी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून तीन महिने होऊन देखील रस्ते सुस्थितीत न केल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद पाडले होते. आधी रस्ते सुस्थितीत आणा, नंतरच पुढचं काम करा असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर आज सकाळपासून गॅस कंपनीकडून या दुरूस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.पावसाळा जवळ येत असल्याने खोदाकामामुळे [...]
बायपासचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद
न्यायप्रविष्ट जागेत काम हाती घेतल्याने शेतकरी संतप्त : ठेकेदाराला धरले धारेवर, शेतकऱ्यांतून तीव्र विरोध सुरूच बेळगाव : न्यायप्रविष्ट जागेतून रस्ता काम सुरू करण्यात आल्याने शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी अनगोळ आणि शहापूर शिवारातील हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा एकदा बंद पाडले. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत न्यायप्रविष्ट जागेत कोणत्याही प्रकारचे काम करण्यात येऊ नये, असे शेतकरी नेते [...]
चित्ररथ मिरवणूक मार्गाची पाहणी
महापौर-उपमहापौरांकडून समस्या तातडीने दूर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना बेळगाव : पारंपरिक शिवजयंतीनिमित्त मंगळवार दि. 21 रोजी शहरात चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक परंपरा लाभलेली चित्ररथ मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडावी या दृष्टीकोनातून शुक्रवारी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाली यांच्यासह महापालिका अधिकारी, नगरसेवक व शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. मिरवणूक [...]
हिंडलगा कारागृहात महानिरीक्षकांकडून महानिरीक्षण
अलोककुमार यांची अचानक भेट : दोन तासांहून अधिक काळ तपासणी, श्वानपथकाचीही मदत बेळगाव : कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक अलोककुमार यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट देऊन दोन तासांहून अधिक काळ तपासणी केली. या तपासणीत मोबाईल, गांजा सापडले नसले तरी सिगारेटची पाकिटे व डंबेल्स आढळून आले. गुरुवारी रात्री विमानाने अलोककुमार यांचे बेळगावला आगमन झाले. ते बेळगावात [...]
आम्ही लोकशाहीचं रक्षण केलं, मोदी सरकारने रचलेला कट हाणून पाडला; प्रियंका गांधी यांचा घणाघात
महिला आरक्षणाच्या षड्यंत्राआडून अंदाधुंद मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला होता. मात्र विरोधकांच्या एकजुटीमुळे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळले गेले आणि हे विधेयक लोकसभेत कोसळले. घटनादुरुस्तीसाठी आवश्यक दोनतृतीयांश बहुमत गाठता न आल्याने महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधक महिला विरोधी असल्याची टिमकी वाजवण्यास सुरुवात केली. याचा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेल्या कथित कराराबाबत मोठ्या घोषणा केल्या असल्या, तरी इराणने मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट शेअर करत म्हटले की, इराणने जगासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) मार्ग यापुढे कधीही बंद न करण्याचे मान्य केले आहे. या मार्गाचा शस्त्रासारखा वापर केला […]
ग्रा.पं. कर्मचार्यांचे जि.पं. समोर आंदोलन
सरकारकडून मागण्यांची पूर्तता न झाल्याने तीव्र नाराजी : मागण्या मान्य करण्याबाबत सीईओंना निवेदन बेळगाव : ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून राज्यभरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. 20 डिसेंबर 2025 पासून बेंगळूर येथील फ्रिडम पार्क येथे ठिय्या आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे [...]
दड्डीचे राजीव मेत्री यांना इंग्लंडमध्ये संसदीय निवडणुकीची उमेदवारी
बेळगाव : दड्डी (जि. बेळगाव) गावचे सुपुत्र राजीव कृष्णा मेत्री यांना इंग्लंडच्या वेल्स प्रदेशात लेबर पक्षाकडून संसदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. ही बाब दड्डीसह बेळगाव जिह्याला भूषणावह आहे. राजीव मेत्री यांनी 10 मे 2001 मध्ये केवळ 60 पाऊंडसह लंडनच्या हीथ्रो विमानतळावर पाऊल ठेवले. राजकारणात त्यांनी 2019 मध्ये लेबर पक्षात प्रवेश केला. आता त्यांना या पक्षाकडून [...]
म्हणून आजही महाराष्ट्र बेळगावसाठी लढतोय
भाजप खासदार निशिकांत दुबे यांची लोकसभेत माहिती बेळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिसीमन (डी लिमिटेशन) आयोगाच्या शिफारशीनुसारच 1956 साली राज्य पुनर्रचना आयोग अंमलात आला. परंतु यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये सीमावादावरून संघर्ष सुरू झाले. आजही महाराष्ट्र बेळगावसाठी लढत असल्याने याला सर्वस्वी परिसीमन आयोग जबाबदार असल्याचे भाष्य झारखंडचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी लोकसभेत केले. लोकसभा मतदारसंघांची [...]
Iran US War –होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली? परराष्ट्र मंत्री आणि IRGC मध्ये विरोधाभास
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि इराणचे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) यांच्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून विरोधाभास निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अराघची यांनी युद्धविरामाच्या उर्वरित कालावधीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी “पूर्णपणे खुली” राहील अशी महत्त्वाची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात रिव्होल्यूशनरी गार्ड्सने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर नवीन निर्बंध आणि अटी लादल्या आहेत. X वरील एका […]
पुढच्या आठवड्यात सीईटी असल्याने तयारी करण्यासाठी योग्य वेळ : विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. सीईटीच्या निकालानुसार विद्यार्थी आपली पुढील शैक्षणिक दिशा ठरवतात. त्यामुळे सीईटीला कसे सामोरे जावे, याबाबत विद्यार्थ्यांना जर मार्गदर्शन मिळाले तर त्याचा निश्चित फायदा होतो. पुढच्याच आठवड्यात सीईटी असल्याने त्याची तयारी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पीयूसी [...]
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे सुळगे-येळ्ळूर येथे जागृती फलक बेळगाव : कडक उन्हामुळे जमिनीतील पाणीसाठा आटत असून याची झळ खेड्यांमध्ये अधिक जाणवते आहे. पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत असताना पाणी वाचवण्याची नितांत गरज आहे. या हेतूने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे सुळगे आणि येळ्ळूर येथे जागृती फलक लावण्यात आले. जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या पुढाकाराने या [...]
मंगळवारी भव्य चित्ररथ मिरवणूक : शिवजयंती महामंडळाचे आवाहन बेळगाव : बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने वैशाख शुद्ध द्वितीयेला शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी रविवार दि. 19 रोजी शिवजयंती साजरी केली जाणार असून मंगळवार दि. 21 रोजी बेळगाव शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जत्तीमठ येथे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या [...]
कोरे गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाचा अमृतमहोत्सव
विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबविणार : शिवचरित्रावर आधारित देखावे सादर करणे मंडळाचे वैशिष्ट्या बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग सजीव पद्धतीने सादर करणे हे बेळगावच्या पारंपरिक शिवजयंतीचे एक वैशिष्ट्या आहे. कोरे गल्ली शिवजयंती मंडळानेही हाच धागा पकडत मागील 75 वर्षांत एकाहून एक सरस असे देखावे सादर केले आहेत. विशेष म्हणजे युवकांचा झुंझार लेझीम मेळा आजूबाजूच्या [...]
युवा समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : समाज एकत्र यावा, या हेतूने सुरू झालेल्या शिवजयंतीला बेळगावमध्ये शतकोत्तर वर्षांची परंपरा आहे. शहरासोबतच आसपासच्या उपनगरांमध्येही त्याकाळी हळूहळू शिवजयंती सुरू झाली. मराठमोळ्या असलेल्या शहापूरच्या कोरे गल्ली येथे सार्वजनिक उत्सव मंडळाची 1951 मध्ये तत्कालिन पंचमंडळाने स्थापना केली. सीमाप्रश्न तसेच शिवचरित्रावर आधारित देखावे सादर करणे हे या मंडळाचे वैशिष्ट्या आहे. यावर्षी हे मंडळ 75 वर्षे [...]
नेस्को कन्सर्ट ड्रग्स प्रकरण, फरार आरोपी पोलादपूरमध्ये अटक
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर झालेल्या म्युझिक कन्सर्टदरम्यान ड्रग्सच्या अतिसेवनामुळे दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यातील फरार आरोपी आयुष विकी साहित्य (वय 24, रा. उल्हासनगर) हा मुंबई-गोवा महामार्गाने गोव्याकडे पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने […]
अभिनेत्यांच्या हाती देश सोपवू शकत नाही; प्रकाश राज यांची थलपती विजयवर नाव न घेता टीका
तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता थलपती विजय याचा तमिळगा वेत्री कळघम हा पक्षही या निवडणुकीमध्ये उतरला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून थलपती विजय आपल्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ करत आहे. यावरून अभिनेते प्रकाश राज यांनी त्याच्यावर टीका केली आहे. अभिनेत्यांच्या हाती देश सोपवू शकत नाही, असे म्हणत प्रकाश राज यांनी अप्रत्यक्षपणे विजयवर निशाणा […]
कायदा पालनात कर्नाटक पोलीस आघाडीवर
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे प्रशंसोद्गार, पोलीस वसतिगृह प्रकल्पाचे उद्घाटन बेळगाव : कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्याबरोबरच कायद्याचे पालन व न्याय व्यवस्थेत कर्नाटक पोलीस आघाडीवर आहेत. राज्यात शांतता नांदण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांचे कुटुंबीय सुरक्षित व समाधानाने रहावेत यासाठी वसतिगृहांची उभारणी करून पायाभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. [...]
बेळगाव-हैदराबाद प्रवास आता अधिक आरामदायी
वायव्य परिवहन मंडळाची राजरथ स्लीपर बससेवा सुरू बेळगाव : बेळगाव ते हैदराबाद हा प्रवास अधिक आरामदायी होण्यासाठी वायव्य परिवहन मंडळाने आता या मार्गावर नवी राजरथ एसी स्लीपर बस सुरू केली आहे. बेळगावमधील अनेक तरुण हैदराबाद येथील आयटी कंपन्या त्याचबरोबर व्यवसायानिमित्त ये-जा करीत असल्याने त्यांच्यासाठी ही आरामदायी बससेवा महत्त्वाची ठरणार आहे. दि. 16 एप्रिलपासून ही नवीन [...]
हजारहून अधिक पोलीस ठाणी जनस्नेही बनविणार
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे प्रतिपादन : बेळगाव येथे दिली माहिती बेळगाव : राज्यातील 1 हजारहून अधिक पोलीस ठाणी जनस्नेही बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कर्नाटकातील कविताळ पोलीस ठाणे संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. पोलिसांनीही जनस्नेही कामे करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना [...]
दोन दिवस आयपीएलचे सामने पाहण्याची संधी बेळगाव : 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील शनिवार व रविवारी होणारे सामने युनियन जिमखाना मैदानावरती फॅनपार्कच्या माध्यमातून बेळगावच्या क्रिकेट रसिकांना मोठ्या स्क्रिनवरती पहावयास मिळणार आहेत व या सामन्यांची स्टेडियमप्रकारे मौजमजा बेळगावच्या क्रिकेट रसिकांना लुटता येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे अल्वीन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. कन्नड साहित्य भवन येथे [...]
‘पीने वालो को पीने का बहाना चाहिए’ असे म्हटले जाते. त्यामुळे मद्य उत्पादन शुल्कात कितीही वाढ झाली तरी मद्य पिणाऱ्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. पर्यटननगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षात तब्बल 4 कोटी 14 लाख 14 हजार 611 लिटर दारू तळीरामांनी रिचवली आहे. यामध्ये बिअरची […]
जलतरण स्पर्धेत अमन सुणगारचे यश
बेळगाव : मलेशिया येथे झालेल्या 68 व्या खुल्या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या अमन सुणगारने एक रौप्य व कांस्य पदक पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे. मलेशिया येथे राष्ट्रीय अॅक्वेटिक सेंटर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना अमन सुणगारने 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक तर 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकाविले. त्यांने केलेल्या खडतर मेहनतीमुळे या आंतरराष्ट्रीय [...]
डी. बी. पाटील चषक क्रिकेट स्पर्धा : चॅलेंजर्स निपाणी, अर्जुन क्रिकेट क्लब पराभूत बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित डी. बी. पाटील चषक 13 वर्षाखालील निमंत्रितांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत फिनिक्स संघाने चॅलेंजर्स निपाणीचा तर नीना स्पोर्ट्सने अर्जुन क्रिकेट क्लबचा तसेच बेळगाव स्पोर्ट्स क्लबने निपाणी चॅलेंजर्सचा 12 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सिद्धार्थ चौगुले, [...]
रेणुका फुटबॉल क्लबचा एकतर्फी विजय
बेळगाव : बेंगळूर येथे सुरु असलेल्या केएसएफए ए डिव्हिजन महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत रेणुका फुटबॉल क्लब संघाने रेड्स युनायटेड एफसी संघाचा 3-0 असा पराभव करून 3 गुण मिळविले आहेत. या स्पर्धेत रेणुका फुटबॉल क्लबने 4 सामन्यात 3 विजय व 1 सामना गमविला आहे. केएसएफए बेंगळूरच्या मैदानावर झालेल्या चौथ्या सामन्यात रेणुका संघाने पहिल्या मिनिटापासून आक्रमक चढाया सुरु [...]
आपटा गावाजवळील दांड-आपटा रोडवरील अवघड वळणावर दुचाकी घसरल्याने भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळले. मात्र त्यावेळी आलेल्या टेम्पोने अजय कातकरी या तरुणाला तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर राजेश कातकरी याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कातकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उरणच्या […]
साडेतीन कोटींची शाळा एक रुपया भाड्याने व्यापाऱ्याला दिली आंदण, रोहा पालिका प्रशासनाचा कारनामा
रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेच्या कारभाराचा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली आणि सुमारे साडेतीन कोटी रुपये बाजारमूल्य असलेली सौ. विमलबाई कन्याशाळेची इमारत एका धनदांडग्या व्यापाऱ्याला अवघ्या एक रुपया महिन्याच्या भाड्याने आंदण देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने केलेल्या या कारनाम्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. 30 नोव्हेंबर 1993 रोजी कुमुद […]
महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यात 272 बालके कुपोषित
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात कुपोषणाचे संकट कायम आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कुपोषित बालकांची संख्या वाढली असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. कुपोषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही कुपोषण आटोक्यात आलेले नाही. महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात 272 कुपोषित बालके आढळली असून, यामधील 44 बालके तीव्र कुपोषित तर 228 बालके […]
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून भाजप आणि शिंदे गटात सुरू असलेला वाद आता नवी मुंबईकरांच्या मुळावर उठू लागला आहे. या वादाचा जोरदार फटका शहरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला बसणार आहे. झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी महापालिकेकडे जागा हस्तांतरित करा, अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली आहे. तर झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरएऐवजी क्लस्टर लागू करा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय […]
IRCTC तात्काळ तिकीट बुकिंग सेवेत तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे प्रचंड हाल, सोशल मीडियावर संताप
भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग ॲपवर (IRCTC) तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेतर्फे ‘तत्काळ तिकीट’ सेवा सुरू करण्यात आली आहे. या तिकिटांचे आरक्षण प्रवासाच्या एक दिवस आधी सुरू होते आणि ते ‘आधी येणाऱ्यास प्राधान्य’ (First Come, First Served) या […]
कल्याण-मुरबाड मार्गावरील मृत्यूच्या तांडवानंतर आरटीओला अखेर जाग आली आहे. इको टॅक्सीमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी लावण्यात आलेल्या जादा सीट्स उखडल्या असून नियमांचे पालन न करणाऱ्या 22 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. फक्त पैसे कमवण्यासाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या टॅक्सीचालकांकडून आरटीओने तीन दिवस कारवाई करून 1 लाख 80 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढेही कठोर कारवाई सुरूच […]
इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला आणि दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा झाली. पहिली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता सोमवारी दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. मधल्या काळात अमेरिकेने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करत असल्याचे म्हटले आणि आखातातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसू लागली. मात्र अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा […]
आता ‘हेरा फेरी ३’हा चित्रपट होणार नाही, अक्षय कुमारने स्पष्टच सांगितले
‘हेरी फेरी’ या चित्रपटातील परेश रावल यांचे बाबू भैय्या हे पात्र चांगलेच गाजले. पहिल्या दोन भागांमधील इतर कलाकारांपेक्षा बाबू भैय्या या पात्राने चांगलाच भाव खाल्ला होता. दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा २००० सालचा चित्रपट ‘हेरा फेरी’ आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या विनोदी चित्रपटाने अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले. निर्मात्यांनी चित्रपटातील मूळ कलाकारांसह—अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल […]
हा 16 नंबर 16 महिन्यांत पंतप्रधान मोदींना घरी पाठवणार, संजय राऊत यांचे सूचक विधान
जसं आपण म्हणतो सोळावं वरीस धोक्याचं, तंस भविष्यातलं राजकारणाचं 16 आकडा धोक्याचा आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच हा 16 नंबर 16 महिन्यांत पंतप्रधान मोदींना घरी पाठवणार असे सूचक विधानही संजय राऊत यांनी केले. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, जसं आपण म्हणतो सोळावं […]
पक्षांतर्गत सुरू असलेला नरेंद्र मोदी वि.अमित शहा संघर्ष संसदेच्या पटलावर दिसला, संजय राऊत यांची टीका
मोदी है तो मुमकीन है, ही आता दंतकथा झाली आहे. फार फार तर आता नमकीन है, नमकीन नमकीन भाषणं करतात, आणि त्यांचीच लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच कालच्या विधेयकामुळे पक्षांतर्गत सुरू असलेला नरेंद्र मोदी वि. अमित शहा संघर्ष संसदेच्या पटलावर दिसला अशी […]
दिल्लीतील बदलत्या हवामानामुळे इंडिगोच्या विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. इंडिगोने प्रवाशांना विलंब आणि वेळापत्रकातील बदलांविषयी, प्रवाशांसाठी सूचना जारी केली आहे. इंडिगोने ही माहिती त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली आहे. इंडिगोने पोस्टमध्ये लिहिले आहे की, दिल्लीतील खराब हवामानामुळे अनेक विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे आणि गैरसोय कमी करण्यासाठी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. […]
होर्मुझची सामुद्रधुनी आता व्यापारासाठी पूर्णपणे खुली झाली असून तेहरान समुद्ध युरेनियम अमेरिकेच्या हवाली करणार असल्याचे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यामुळे मध्य पूर्वेतील युद्ध आता थांबले असे वाटले होते. मात्र ट्रम्प यांचा हा दावा इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी असत्य असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली […]
Meta देणार 8 हजार कर्मचाऱ्यांना नारळ, रेकॉर्ड ब्रेक कमाई होऊनही नोकर कपातीचा निर्णय
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटा, पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याची योजना आखत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही कर्मचारी कपात अशा वेळी होत आहे, जेव्हा कंपनीने गेल्या वर्षी २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल आणि अंदाजे ६० अब्ज डॉलर्सचा प्रचंड नफा कमावला होता. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, एवढा प्रचंड नफा असूनही मार्क झुकरबर्गची कंपनी आता मानवांपेक्षा […]
अर्थनंतर आता भाजपचा सहकारवर डोळा, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रवीण दरेकरांना शुभेच्छा!
राज्यातील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अर्थ खाते भाजपने खेचून घेतल्यानंतर आता सहकार खात्यावरही डोळा असल्याचे स्पष्ट झाले. ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज राज्य सहकारी संघाच्या कार्यक्रमात प्रवीण दरेकर हे कॅबिनेट मंत्री होतील. सहकार विभाग हा त्यांच्याकडेच जाईल अशा शुभेच्छा देताना ते सहकार मंत्री होण्याचे सूतोवाच केले. राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र गृहनिर्माण […]
नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या ११ बळींना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे देऊनही अंमलबजावणी न केल्याबद्दल – मुंबई उच्च न्यायालयाच्या – छत्रपती संभाजीनगर येथील आदेश त्याची खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती सरकारला ही शेवटची संधी नीरज पी. धोटे यांनी राज्य असल्याचे सांगत, ४ मे २०२६ पर्यंत देय रक्कम न दिल्यास संबंधित […]
दुर्दैवाने जागतिक दर्जाचा वारसा जपण्यात आणि पर्यटकांना सुविधा देण्यात सरकार अपयशी –अंबादास दानवे
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी जागतिक वारसास्थळांच्या सद्यस्थितीवर भाष्य करत सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. अजिंठा आणि वेरूळ ही लेणी केवळ वास्तू नसून हिंदुस्थानी कलेला जागतिक क्षितिजावर नेणारी लेणी नसून आपल्या समृद्ध संस्कृतीचे जिवंत पुरावे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 1983 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या […]
‘अण्णा’चे नवे रूप पाहून बीडकर दचकले! केस पिकले, दाढी वाढली, खांदे वाकले…आजारपणामुळे रुग्णालयात दाखल
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना फोनचे आकर्षण असते. काही फोनची आतुरतेने वाट पाहिली जाते. काही फोन वेदना घेऊन येतात. पण एक फोन असा होता की तो कधीच येऊ नये असे बीडकरांना वाटत होते! त्या फोनची दहशतच अशी होती! वाल्मीक कराडचा फोन ! पण आता ही दहशत, दरारा पार लयाला गेला आहे. म्लान चेहरा, पिकलेले केस आणि वाकलेले […]
तमिळनाडूमध्ये पर्यटकांच्या वाहनाचा भीषण अपघात; 8 महिलांसह 9 जण ठार, 5 गंभीर जखमी
तमिळनाडूतील कोइंबतूर जिल्ह्यात एका पर्यटकांच्या व्हॅनला भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 5 गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 8 महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींना तातडीने पोल्लाची येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र शोक […]
शेख हसीना प्रत्यार्पण प्रकरणावर हिंदुस्थानचा विचार सुरू, कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय होणार
बांगलादेश सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी केलेली मागणी सध्या न्यायालयीन आणि अंतर्गत कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत तपासली जात आहे, असे हिंदुस्थान सरकराने स्पष्ट केले. तसेच या प्रकरणात सर्व संबंधित घटकांशी रचनात्मक संवाद सुरू ठेवण्याची भूमिका हिंदुस्थानने व्यक्त केली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “ही मागणी सध्या न्यायालयीन आणि कायदेशीर […]
स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरला अचानक आग, महिला थोडक्यात बचावली; वरोरा शहरातील घटना
घरी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील साई नगर परिसरात रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत रेखा जयंतराव दातारकर यांच्या पायाला किरकोळ इजा झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. रेखा दातारकर या नेहमीप्रमाणे घरात स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घरात घबराट […]
अक्षय्य तृतीयेला सोने कडाडणार! युद्धविरामानंतर किमतीत वाढ, पावणेदोन लाखांचा टप्पा गाठणार?
अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र मागील काही दिवसांपासून सोन्याचे वाढते दर पाहता ते ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी 99,500 रुपये प्रति तोळा असलेल्या सोन्याच्या किमतीत आज थोडी कपात होऊन भाव 1,53,000 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता […]
कमाल आहे! मे महिन्यात कमी उकडणार
सध्या तापमानात वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यभरात उष्म्याचा त्रास होतोय. हा तर एप्रिल महिना आहे, मे महिन्यात काय होईल, ही भीती आहे. अशातच मार्च-एप्रिलच्या तुलनेत मे महिना थोडा दिलासा देणारा ठरू शकेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. उष्णतेच्या लाटा, आरोग्य आणि हवामान वार्तांकन या विषयावर भारतीय हवामान विभाग, ‘असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायजर्स’ आणि […]
दंगली भडकण्याची अल्पसंख्याक आयोगाला भीती, नवनीत राणांवर पोक्सोअंतर्गत कारवाईची मागणी
अमरावतीतील परतवाडा आणि अचलपूर भागातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार तसेच ब्लॅकमेलिंगच्या कथित रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आरोपी यांचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्या नवनीत राणा यांचा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी खरपूस समाचार घेतला आहे. नवनीत राणांना दंगली घडवायच्या आहेत. त्यामुळे त्या या सगळ्या करत आहेत. नवनीत राणांवर पोक्सोअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी […]
गंभीर आजारावरील उपचारासाठी दरमहा आर्थिक मदत, निवृत्त सेवकांसाठी राज्य सहकारी बँकेचा निर्णय
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मानवी दृष्टीकोनातून सर्व माजी सेवकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी संवेदनशील निर्णय घेतला आहे. बँकेमधील निवृत्त सेवकांना वृध्दापकाळात उद्भवणाऱया गंभीर आजारावरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य बँक माजी सेवक आधार योजना लागू करण्यास प्रशासकीय सभेत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गंभीर आजार असलेल्या माजी सेवकांना सेवक कल्याण निधीतून दरमहा 5 हजार रुपये […]
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण, आग्र्याहून 15 व्या आरोपीला अटक
बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आग्र्याहून आणखी एका आरोपीला पकडले. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या 15 इतकी झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी रोहित शेट्टी यांच्या जुहूतील घरावर बेछूट गोळीबार झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली होती. ते सर्व […]
मुंबईला अमली पदार्थांचा विळखा, गृह विभागाला आली जाग; सोमवारी सरकारने बोलावली बैठक
मुंबईला अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज सेवनानंतर अमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अमली पदार्थ पदार्थांच्या विक्रेत्यांचा शोध घेऊन कडक कारवाई व ‘झीरो टॉलरन्स’ भूमिका घेण्याच्या दृष्टीने 20 एप्रिलला राज्य सरकारने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात 4 वाजता बैठक आयोजित केली आहे. गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनाने दोन […]
डोंबिवलीकरांना महावितरणचा ‘शॉक’, अतिरिक्त सुरक्षा ठेव बिलांमुळे नागरिक हैराण
वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असताना दुसरीकडे महावितरणने अतिरिक्त सुरक्षा अनामत ठेव बिले पाठवून डोंबिवलीकरांना ‘शॉक’ दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांना किमान १०० रुपयांपासून ते तब्बल ५ हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याची नोटीस पाठवण्यात आल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजी आहे. एमआयडीसी परिसरातील अनेक ग्राहकांना वीज बिलासोबत सुरक्षा ठेव बिले पाठवण्यात आल्याने नागरिक अधिकच त्रस्त […]
नेस्को ड्रग प्रकरणात आणखी एकाला अटक
नेस्को प्रदर्शन ड्रग पार्टीप्रकरणी आणखी एकाला वनराई पोलिसांनी अटक केली. शुभ अग्रवाल असे त्याचे नाव आहे. या गुह्यात एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शुभच्या अटकेने अटक आरोपीची संख्या आठ झाली आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या आठवडय़ात नेस्को प्रदर्शन पेंद्रात झालेल्या पार्टीत […]
वसईतील नऊ वर्षीय चिमुरडी वीरा चौधरी हिने लिहिलेल्या ‘वीराच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाले. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन वेलवेट पब्लिकेशन आणि झेप या सामाजिक संस्था माध्यमातून करण्यात आले. याच कार्यक्रमात ४४ लेखकांची ५० पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करून संस्थेने अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित आला असून या उपक्रमाची […]

31 C