पश्चिम बंगालमधील जंगलराज संपवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींची गर्जना : ममता सरकारविरोधात पुन्हा एकदा आवाज बुलंद : आसाम, प. बंगालचा दौरा यशस्वी वृत्तसंस्था/ सिंगूर, काझिरंगा गेल्या दोन दिवसांपासून पूर्व भारताच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींवर थेट हल्लाबोल केला. आसाम दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी रविवारी पुन्हा पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. कोलकाता येथे पोहोचल्यानंतर त्यांनी हुगळी जिह्यातील सिंगूर [...]
न्यूझीलंडचा ऐतिहासिक मालिकाविजय
घरच्या मैदानावर भारताने वनडे मालिका गमावली :किवीज संघाने भारतात प्रथमच जिंकली वनडे मालिका वृत्तसंस्था/ इंदोर येथील होळकर स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या व निर्णायक वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारताला 41 धावांनी पराभूत केले. या विजयासह किवीज संघाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली. विशेष म्हणजे, न्यूझीलंडने इतिहासात प्रथमच भारतात वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. 1989 किवीज [...]
साबालेंका, व्हेरेव्ह, अल्कारेझ, स्विटोलिना दुसऱ्या फेरीत
ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम टेनिस : कोस्ट्युक, कोबोली, व्हीनस, बुस्का पराभूत : व्होंड्रोसोव्हाची माघार वृत्तसंस्था/ मेलबर्न रविवारपासून येथे सुरु झालेल्या 2026 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत बेलारुसची टॉप सिडेड आर्यना साबालेंका, इलिना स्विटोलिना, मारिया सॅकेरी, जस्मिन पाओलिनी यांनी महिला एकेरीत विजयी सलामी दिली. दरम्यान व्होंड्रोसोव्हाने खांदा दुखापतीमुळे स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतली. पुरुषांच्या [...]
‘आरसीबी’चे गुजरातविरुद्ध विजयी मालिका कायम ठेवण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ बडोदा विजयी घोडदौड करणारा स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघ आज सोमवारी येथे महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सविऊद्ध खेळताना आपली विजयाची मालिका पुढे वाढवण्याचा प्रयत्न करेल. अजिंक्य असलेला आरसीबी या स्पर्धेतील सर्वांत बलाढ्या संघ असून त्यांनी शनिवारी सलग चौथा विजय नोंदवला. दुसरीकडे, गुजरातने चांगली सुऊवात केली होती, पण पहिले दोन सामने जिंकल्यानंतर त्यांनी [...]
अडीच वर्षे महापौरपदाची शिंदेंची मागणी?
मुंबई महापौरपदासाठी हॉटेल पॉलिटिक्स : शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्याने तर्कवितर्कांना उधाण प्रतिनिधी/ मुंबई राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाची दमदार कामगिरी राहिली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचे 89 आणि शिवसेना शिंदे गटाचे 29 उमेदवार निवडून आले. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट मिळून मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करतील. मात्र, त्यापूर्वी मोठ्या घडामोडी घडत आहेत. महापौर भाजपाच होणार असल्याचा [...]
कितीही बदला, परंतु परंपरा विसरू नका!
एनएसए अजित डोवाल यांचा नव्या पिढीला सल्ला वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी स्वत:च्या आईवडिलांकडून मिळालेली शिकवण आठवत कितीही बदला, परंतु स्वत:च्या परंपरा कधीच विसरू नका असा सल्ला नवी दिल्लीत आयोजित रैबार-7 कार्यक्रमाला संबोधित करताना दिला आहे. या कार्यक्रमात सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्यासोबत अनेक महनीय उपस्थित होते. विकासासोबत सांस्कृतिक ओळखीला संरक्षित [...]
युएईचे अध्यक्ष आज भारतात येणार
भारतासोबत मोठा करार होण्याची शक्यता ►वृत्तसंस्था/नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावर संयुक्त अरब अमिरातचे (युएई) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे सोमवारी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत. संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष म्हणून त्यांचा हा तिसरा अधिकृत भारत दौरा असेल. तर मागील एक दशकात त्यांचा हा पाचवा भारत दौरा ठरणार आहे. भारतीय विदेश मंत्रालयाने [...]
लैंगिक गुन्हेगारांनी भरलेले गाव
शिक्षा भोगून झाल्यावर शांतपणे जगत आहेत आयुष्य अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात एक अनोखे गाव असून याचे नाव ‘मिरेकल व्हिलेज’ म्हणजेच ‘चमत्कारी गाव’ आहे. या गावाचे वैशिष्ट्या म्हणजे येथे राहणाऱ्या 200 लोकांपैकी जवळपास निम्मे लोक लैंगिक गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले होते आणि अलिकडेच तुरुंगातून मुक्त झालेले आहेत. अमेरिकेत लैंगिक गुन्हेगारांसाठी अत्यंत कठोर कायदे आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांना [...]
गुकेशची सिंदारोव्हशी बरोबरी वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी (नेदरलँड्स) येथे सुरू झालेल्या टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अव्वल मानांकित अर्जुन एरिगेसीने आपला देशबांधव आर। प्रज्ञानंदवर एक निर्णायक विजय मिळवला, तर विश्वविजेता डी. गुकेशने उझबेकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या जावोखिर सिंदारोव्हविऊद्ध एका चुरसपूर्ण सामन्यात बरोबरी साधली. पर्यावरण कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे झालेल्या विलंबानंतर जगातील ही सर्वांत जुनी सुपर स्पर्धा अखेरीस [...]
शस्त्रास्त्र पुरवठ्यासह खंडणी मॉड्यूलचा पर्दाफाश : गोल्डी ब्रारच्या सहकाऱ्यालाही अटक वृत्तसंस्था/ चंदीगड पंजाब आणि शेजारच्या राज्यातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांना फोन कॉलद्वारे धमकी देत खंडणी मागणाऱ्या गोल्डी ब्रार टोळीविरुद्ध आयुक्तालय पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गोल्डी ब्रार टोळीतील 10 संशयितांना अटक केली आहे. चार आठवड्यांच्या अंतर्गत चौकशीनंतर संशयितांचा माग काढत त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून [...]
श्रीलंका युवा संघ अ गटात आघाडीवर
वृत्तसंस्था/ विंडहॉक (नामिबीया) येथे सुरु असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील पुरुषांच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका युवा संघाने अ गटातून आघाडीचे स्थान मिळविताना जपानवर विक्रमी विजय मिळविला. जपान आणि लंका यांच्यातील झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंका युवा संघाने 50 षटकात 4 बाद 378 धावा जमविल्या. त्यानंतर जपानला 50 षटकात 8 बाद 184 धावांपर्यंत [...]
सोनम वांगचूक विरोधातील आरोप निराधार
पत्नी गीतांजली यांचा केंद्र सरकारवर मोठा आरोप :एनएसए प्रकरणात नाही दम वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हवामान कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित सोनम वांगचूक यांच्या एनएसए अंतर्गत अटकेवरून त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी कुठलाच ठोस आधार नाही, याचमुळे सरकार न्यायालयात तारखांवर तारखा मागत असल्याचा दावा गीतांजली यांनी केला आहे. [...]
नवे राजदूत चमत्कार घडवतील काय?
भारतातील अमेरिकन राजवटांची एक मोठी परंपरा आहे. आता भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून रुजू झालेले सर्जियो गोर हे या परंपरेचे पालन करून काही नवा चमत्कार घडवतील काय असा प्रश्न उभा केला जात आहे. खरे तर सर्जियो गोर यांचे भारतातील पदार्पण हे त्यांचा पायगुण किती चांगला आहे हे दाखवीत आहेत. त्यांच्या रुजू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताकडे [...]
बलात्कार पीडितेच्या मृत्यूने मणिपूरमध्ये हळहळ
तीन वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार : 2023 च्या हिंसाचारादरम्यान अपहरणानंतर घृणास्पद कृत्य वृत्तसंस्था/ इंफाळ मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी वांशिक हिंसाचार सुरू झाल्यानंतर लगेचच सामूहिक बलात्कार झालेल्या 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सामूहिक बलात्काराच्या वेळी ती फक्त 18 वर्षांची होती. जवळजवळ तीन वर्षांपूर्वी झालेल्या अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या धक्क्यातून ती महिला अद्याप सावरलेली नव्हती. गंभीर [...]
चिनी हस्तकांच्या विरोधात तैवानचे अभियान
गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी पत्रकाराला अटक वृत्तसंस्था/ तैपेई चीनसोबतच्या तणावादरम्यान तैवानच्या सरकारने देशात चीनच्या हस्तकांविरोधात अभियान हाती घेतले आहे. याच अंतर्गत तैवानमध्ये एका पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले आहे. या पत्रकाराने सैन्याच्या अधिकाऱ्यांना चीनसाठी हेरगिरी करण्यासाठी प्रलोभने दाखवत लाच दिल्याचा आरोप आहे.तैवानमधील न्यायालयाने एक टीव्ही पत्रकार आणि 5 सैन्याधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचा आदेश दिला आहे. या पत्रकाराचे नाव [...]
‘डेमोन कॉलनी 3’चा फर्स्ट लुक सादर
तमिळ चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित हॉरर-थ्रिलर फ्रेंचाइजी ‘डेमोन कॉलनी’ स्वत:च्या नव्या भागासह प्रेक्षकांना घाबरविण्यास तयार आहे. डेमोन कॉलनी 3 चा फर्स्ट लुक समोर येताच चित्रपटवरून लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पोस्टरमध्ये भय, रहस्य आणि अंधाराची झलक दिसून येते, यावेळी कहाणी पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक वळण घेणार असल्याचे यातून स्पष्ट होते. या चित्रपटासोबत पुन्हा एकदा अरुल्निथी स्वत:च्या लोकप्रिय व्यक्तिरेखेत [...]
मुख्यमंत्री ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’साठी दावोस दौऱ्यावर
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अधिक बळकट करण्याचा निर्धार प्रतिनिधी/ मुंबई महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम2026’ मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ [...]
कराचीत शॉपिंग मॉलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग
तिघांचा होरपळून मृत्यू : 7 जण जखमी वृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकिस्तानातील कराची येथील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य सात जण जखमी झाले. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून आले आहे. आग एका दुकानातून लागल्यानंतर संपूर्ण मॉलमध्ये पसरली. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अग्निशमन [...]
प्रयागराजच्या माघ मेळय़ात राडा; शंकराचार्य अविमुत्तेश्वरानंद यांना रोखले, पोलिसांची साधूंना मारहाण
प्रयागराज येथील माघ मेळ्यात रविवारी मोठा राडा झाला. ज्योतीष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद यांचा रथ पोलिसांनी रोखल्याने वादाला तोंड फुटले. शंकराचार्यांचे शिष्य आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट व धक्काबुक्की झाली. काही साधूसंतांना मारहाणही झाली. पोलिसांच्या या दंडेलीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मौनी अमावास्येचा मुहूर्त साधून अविमुत्तेश्वरानंद संगमावर स्नान करण्यास निघाले होते. त्यांचा रथ पोलिसांनी रोखला. […]
प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे सुखदु:खच्या असंख्य मानवी भावभावना असतात. ज्या आपल्याला कधीच दिसत नाहीत आणि सोबत मुखवट्यामागे दडलेली अनेक रहस्यं असतात. या मुखवट्यामागचा खरा चेहरा समोर आला की आपणही चक्रावून जातो. अशीच एक चक्रावून टाकणारी कथा आगामी ‘केस नं. 73’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ना चेहरा, ना निमित्त, चार [...]
हिंदू कार्यकर्त्यांना पाकिस्तानमध्ये धमक्या
धर्मांतराला विरोध केल्याबद्दल फतवाही जारी वृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हक्कांसाठी काम करणारे हिंदू कार्यकर्ते शिवा कच्छी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करत एका इस्लामिक संघटनेकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे सांगितले. हिंदू मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरुद्ध बोलल्याबद्दल त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा [...]
अरविंद केजरीवालांच्या कार्यक्रमाची अनुमती रद्द
आप’कडुन गुजरात सरकारवर आरोप वृत्तसंस्था/ अहमदाबाद गुजरातमध्ये आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. आम आदमी पक्षाने गुजरात सरकारवर गंभीर आरोप करत अरविंद केजरीवालांच्या अहमदाबाद येथीलकार्यकर्ते संमेलनाची अनुमती जाणूनबुजून रद्द करविण्यात आल्याचा दावा केला आहे. केजरीवाल यांचा रविवारी कार्यकर्त्यांसोबत संवाद कार्यक्रम आयोजित होणार होता, पक्षाने याकरता यापूर्वीच एक खासगी स्थळ भाडेतत्वावर [...]
आजचे भविष्य सोमवार दि. 19 जानेवारी 2026
मेष: स्वकियांबद्दलचे गैरसमज दूर होतील. नव्या संकल्पना सुचतील वृषभ: साठवलेले धन खर्च झाल्याबद्दल हुरहूर नको मिथुन: आपल्या नकळत आज अकौंटला पैसे जमा होतील. कर्क: पूर्वी गुंतवलेल्या धनाचा आज लाभ उठवाल सिंह: कोर्टकचेरीत निकाल आपल्या बाजूने लागेल. कन्या: घरगुती कामामध्ये मुलांचे सहकार्य मिळेल. तुळ: सकारात्मक विचार करा. प्रलंबित येणी मिळतील वृश्चिक: सकारात्मक विचारसरणीच आपल्याला आनंदी बनवेल [...]
महापौर कोणाचा, सस्पेन्स वाढला! फडणवीस दावोसला गेले…मुंबईत पडद्यामागे हालचालींना वेग
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस झाले तरी मुंबईत महापौर कोणाचा होणार हे स्पष्ट झालेले नसून, याबाबत सस्पेन्स वाढत चालला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दावोस दौऱयावर गेले आहेत. त्याचवेळी मुंबईत हालचालींना वेग आला असून पडद्यामागे बरंच काही घडत आहे. भाजप आणि शिंदे गटाने मुंबईत युतीत निवडणुका लढवल्या. त्यात भाजपला 89, तर शिंदे गटाला 29 […]
मुंबईत उभारणार बिहार भवन! महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत भाजप-जेडीयू सरकारचा निर्णय
मुंबईत लवकरच 30 मजली ‘बिहार भवन’ उभे राहणार आहे. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बिहारमधील भाजप-जेडीयू सरकारने या भवनासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. नितीश कुमार सरकारने यासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बिहारमध्ये सध्या भाजप व नितीश कुमार यांच्या जेडीयूची सत्ता आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच झाली. त्यात मुंबईतील […]
शिवसेना आणि धनुष्यबाणाची बुधवारपासून अंतिम सुनावणी
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे. न्यायालयाने नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी तसे स्पष्ट केले होते. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा याचा निकाल न्यायालय लवकरच जाहीर करण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपमधील ग्रीनलँड हा देश ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. विरोध करणाऱ्या 8 युरोपियन देशांवर ट्रम्प यांनी टॅरिफ लावले. अमेरिकेच्या या दादागिरीविरोधात ग्रीनलँडमध्ये आंदोलनाचा वणवा पेटला आहे. हजारो नागरिक रस्त्यांवर उतरले असून, आमचा देश विकायला काढलेला नाही असा आवाज देत तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. ग्रीनलँडमधील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे […]
मोदी म्हणजे गझनीचे मेहमूद, काँग्रेसचा निशाणा
काशीतील प्राचीन मंदिरे आणि मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मोदी म्हणजे हिंदूंची मंदिरे पाडणारे गझनीचे मेहमूद आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी काशीतील प्राचीन मंदिरे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मनकर्णिका घाट पाडल्यावरून भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा […]
धर्म हाच सर्वांचा ड्रायव्हर! मोहन भागवत यांचे विधान
‘धर्म हाच संपूर्ण सृष्टीचा ड्रायव्हर आहे. आपल्या सर्वांना चालवणारी धर्म हीच एकमेव शक्ती आहे. मला आणि नरेंद्र मोदी यांनाही धर्मच चालवतो. धर्माच्या गाडीत बसणाऱयांचा अपघात कधीच होणार नाही,’ असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केले. देश धर्मनिरपेक्ष असू शकतो, मात्र मनुष्य किंवा सृष्टीतील कुठलीही वस्तू धर्माशिवाय चालत नाही. प्रत्येकाचा एक धर्म […]
सामना अग्रलेख – हे म्हणे सुशासन आणणार?
शिवसेना-मनसेला बहुसंख्य मराठी जनतेने मतदान केले. भाजप व जयचंदाला मतदान करणाऱ्यांनी मुंबईच्या ‘डेथ वॉरंट’वर शिक्के मारले. महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांत या सगळ्यांची गणना होईल. पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘एनडीए’च्या जनहितकारी, सुशासनाच्या धोरणाला जनतेने आशीर्वाद दिले. सर्व गुंड-भ्रष्टाचारी, व्यभिचाऱ्यांना एकत्र करून सरकार व पक्ष बनवणारे सुशासनावर बोलतात तेव्हा काय बोलायचे? मुंबई महापालिकेचा कारभार याच ‘सुशासन’ पॅटर्नने चालवला गेला तर […]
विज्ञान रंजन –नववर्षातील कृत्रिम ऊर्जा!
>> विनायक नववर्षाची सुरुवात होऊन आठवडा उलटला आणि ‘विज्ञानरंजन’ लिहिताना गतवर्षी विज्ञानाने काय चांगलं प्राप्त केलं, असा प्रश्न पडला. कारण विज्ञानाचाच आधार घेऊन बनवलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी जग युद्धाच्या खाईकडे कसं लोटलं जातंय आणि जागतिक राजकारणाच्या जंजाळात कसं गुरफटतंय याची चाहूल वर्षारंभीच लागली आहे. कोणी म्हणतं याची परिणती तिसऱया महायुद्धात होईल. तसं झालं तर मात्र तो […]
भिवंडीत दगडफेक; भाजप आमदाराच्या समर्थकांनी केला माजी महापौरांच्या घरावर हल्ला, पोलिसांचा लाठीमार
भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता हाणामारी सुरू केली आहे. भाजप चे स्थानिक आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित यांचा पराभव झाल्याने संतप्त समर्थकांनी आज रात्री उशिरा कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर तुफान हल्ला केला. पाटील यांच्या घरावर दगडफेक करीत त्यांच्या कारच्या काचा देखील फोडल्या. या हल्ल्यात माजी […]
आपण करत असलेल्या कर्माचे फळ भगवंतांना अर्पण करण्यातच आपले कसे भले आहे हे आपण समजून घेतले. पुढे भगवंत म्हणतात, प्रत्येकाला पूर्वकर्मानुसार ह्या जन्मीचा स्वभाव प्राप्त झालेला असतो. शिकलेला मनुष्यही त्याच्या स्वभावानुसार वागत असतो. त्यामुळे शिक्षणाच्या बळावर त्याने त्याच्या इंद्रियांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला तर ती बळजबरी केल्यासारखे होते. ह्याचा उलटा परिणाम होऊन कोंडून ठेवलेली [...]
प्रमुख गोलंदाज आणि फलंदाजांच्या अनुपस्थितीमध्ये खेळणाऱ्या पाहुण्या न्यूझीलंडने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याचा कारनामा केला. रविवारी इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानावर झालेल्या निर्णायक लढतील न्यूझीलंडने हिंदुस्थानचा 41 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशी जिंकली. हिंदुस्थानकडून विराट कोहली याने शतकी (124 धावा) खेळी करत एकाकी झुंज दिली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 338 धावांचा […]
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं निधन
मराठी सिनेसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे आज ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले. नेरूळ येथील डी वाय पाटील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार घेत असताना रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. नितीन बोरकर हे मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून सक्रिय होते. त्यांनी ‘दगडाबाईची चाळ’, ‘मी वसंतराव’ सारख्या प्रसिद्ध मराठी […]
महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पोहोचले आहेत. यावेळी परदेशात विमानतळावर फडणवीस यांचं पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणे स्वागत झालं. यावरच भाष्य करताना X वर पोस्ट करत […]
गुजरातमध्ये २०२७ च्या निवडणुकीत सत्तापालट होणार, आप बदल घडवून आणेल –अरविंद केजरीवाल
आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज अहमदाबादमध्ये एका जनसभेला संबोधित करताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, २०२७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता बदल होणार असून, आम आदमी पक्ष हा बदल घडवून आणेल. केजरीवाल म्हणाले, “गुजरातमध्ये गेल्या ३० वर्षांपासून भाजपचे शासन आहे. या काळात राज्याला […]
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, भाजप पदाधिकाऱ्यांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार मंगेश कदम असे संशयिताचे नाव आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, धमकी देऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेऊन गर्भवती केले. पीडित मुलीने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला […]
Tata Mumbai Marathon 2026 –मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियाच्या खेळाडूंचे वर्चस्व
जगभरातील धावपटूंना आकर्षण असलेली ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ रविवार पार पडली. पहाटेच्या गार वाऱ्यात आणि उत्साहपूर्ण वातावरणात या मॅरेथॉनला सुरुवात झाली. या स्पर्धेतइथिओपियाच्या ताडू अबाते डेमे आणि येशी कलायू चेकोले यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 21व्या आवृत्तीमध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एलिट गटाचे विजेतेपद पटकावले. दोन्ही गटातील पहिल्या तीन विजेत्यांनी अनुक्रमे 50,000 अमेरिकन डॉलर्स, 25,000 अमेरिकन डॉलर्स […]
चांदीची सुसाट घोडदौड; वर्षभरात सोन्यापेक्षा जास्त परतावा, 3 लाखांचा टप्पा गाठणार
जागतिक अस्थिरतेच्या काळात आता सोन्या-चांदीची मागणी वाढत असल्याने त्यांचे दरही वाढत आहेत. त्यात आता चीनने चांदी निर्यातीवर निर्बंध लादल्याने जगभरात चांदीची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे चांदीने आधीचे सर्व उच्चांक मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आता लवकरच चांदी 3 लाखांचा टप्पा पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. चांदीने 9 महिन्यात तब्बल 200 टक्क्यांचा […]
आदर्श परिवाराचे मकर संक्रांत महोत्सवानिमित्त होम मिनीस्टर स्पर्धा दिमाखात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आदर्श परिवाराच्या वतीने मकर संक्रांती महोत्सवा अंतर्गत हळदी कुंकू सोहळ्याचे औचित्य साधत भव्य होम मिनीस्टर स्पर्धेचे आयोजन संस्थेचे सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. मंजुळाताई आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या भव्य मैदानावर आदर्श गाव निर्मित नगरीत संपन्न झाली. प्रसिद्ध निवेदक तथा सादरीकरण करणारे बळवंत जोशी यांच्या जबरदस्त अशा आगळ्यावेगळ्या शैलीत या स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील पहिले बक्षीस पैठणी ही वर्षा प्रविण मुळे विजेते यांना प्राप्त झाले. तर दुसरे बक्षीस प्रज्ञा चंदनशिवे कुकींग सेट हा यांना मिळाला. तर तिसरे बक्षीस मिक्सर हे वैष्णवी योगेश सोनसाळे यांना मिळाले. तर एकूण 18 आकर्षक बक्षीस भेट वस्तू मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत आदर्श माता पुरस्कार 2026 अंतर्गत शालन सत्यवान दारफळकर, सुनिता सूर्यकांत पाटील, सोनाली नितीन पडवळ यांना संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच या स्पर्धेत 125 माहिलांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे पारंपारिक गाव देखाव्याची रचना केली होती. हजारो महिलांनी या कार्यक्रमाला हजेरीसह छायाचित्र घेण्याचा आनंद लुटला. या सर्व महिलांना आदर्श परिवाराच्या वतीने सन 2026 ची दिनदर्शिका व गूळ पावडरचे पॅकेट भेट म्हणून देण्यात आले. तर शेकडो महिलांनी होम मिनीस्टर स्पर्धेत उत्स्फूर्त भाग नोंदविला. तर त्यांनी बक्षीस पटकावली. कार्यक्रमात बहारदार गीताचे गायन संगीतशिक्षक महेश पाटील यांनी सादर केले तर सुत्रसंचलन डॉ. दत्तात्रय जाधव यांनी केले . कार्यक्रम यशस्वतीते साठी यांची पर्यवेक्षिका भारती गुंड, शिक्षिका अर्चना देशमुख,संगिता शिंदे व सर्व माहिला शिक्षिकावृंद कलाशिक्षक शिवाजी भोसले, कलाध्यापक शेषनाथ वाघ, सुरज सपाटे, स्वप्निल पाटील, सेवक नायक सुहास काटे, सेवक उमेश पाटील, आबा घोडके सर्व सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.
रत्नागिरी पोलीस दलाने एआयचा वापर करून तयार केलेल्या रेडस ॲपला पहिले यश मिळाले आहे.रेडस ॲपच्या सहाय्याने हरवलेल्या मुलीचा शोध लागला आहे. 12 जानेवारी रोजी एक मुलगी हरवल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.त्यानंतर पोलिसांनी रेडस ॲपमध्ये मिसिंग पोर्टलला त्या मुलीचे छायाचित्र अपलोड केला.तिच्या वेगवेगळ्या वेशभूषेतील 108 छायाचित्रे तयार करण्यात आली.आणि तपास अधिक प्रभावी […]
दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्षपदी संतोष चोडणकर
सावंतवाडी:प्रतिनिधी दैवज्ञ गणपती मंदिर येथे शुक्रवार 9 जानेवारी 2026 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्षपदी श्री संतोष वसंत चोडणकर , उपाध्यक्षपदी शिवशंकर नेरुरकर, सचिवपदी गौरव कारेकर, खजिनदारपदी सुहास चिंदरकर यांची निवड करण्यात आली. या सभेमध्ये नवीन वर्षांमध्ये साजरे होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच मागील आणि नव्या वर्षांमध्ये [...]
Video –ठाकरे बंधूंची युती ही आकडेवारी आणि जागांसाठी झाली नव्हती –राज ठाकरे
मोदी हे गझनी आहेत, मनकर्णिका घाट, प्राचीन मंदिरं पाडली; हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर निशाणा
काशीतील प्राचीन मंदिरं आणि मनकर्णिका घाटाच्या पाडकामावरून मोदी सरकारवर टीका होत आहे. भाजपला देशातील प्राचीन मंदिरं तोडायची असून त्यांना देशाची इतिहास, ओळख पुसायची असून स्वतःचाच इतिहास रचायचा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला काशीतील मणिकर्णिका घाट […]
Photo –नवी मुंबईतील विजयी शिलेदारांचे उद्धव ठाकरे यांनी केले अभिनंदन
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिलेदारांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. त्यांनी विजयी उमेदवारांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. ठाण्यातील प्रभाग क्र. १३ मधून विजयी झालेले शिवसेनेचे नगरसेवक शहाजी ऊर्फ गणेश संपत खुस्पे […]
तहसीलदारांच्या हस्ते श्री बालाजी मंदिरात सपत्नीक महाअभिषेक
कळंब (प्रतिनिधी)- येथील श्री बालाजी मंदिरात कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले व ॲड माधवी ढोकले यांच्या हस्ते भगवान श्री व्यंकटेश यांचा शुक्रवार महाअभिषेक संपन्न झाला. निमित्त होते वाढदिवसाचे विशेष म्हणजे तहसीलदार पती-पत्नीचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. पहाटे पाच वाजता श्री गणेश पूजा ,विश्वसेन आराधना आणि नवग्रह पूजा करून दूध दही, लोणी,साखर, मध ,तूप आदी पंचामृत ने श्री बालाजी भगवान यांचा अभिषेक विधी मंदिराचे पुजारी श्री राम प्रपन्नाचार्य महाराज यांच्या मंत्रोच्चारात करण्यात आला. नुकतेच श्री बालाजी मंदिरात झालेल्या वैकुंठ एकादशी आणि कल्याण उत्सव यांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहून तहसीलदारांना मंदिरास भेट देण्याची इच्छा झाली आणि श्री वेंकटेशाच्या भक्तीने वाढदिवस साजरा करण्याचा योग घडून आला. दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर बांधकाम , तिरुपती येथील खुद्द बालाजी देवस्थानाची मूर्ती आणि नित्य नियमित होत असलेले पूजा उपचार याने ते भारावून गेले. जन्मदिवस ,लग्नाच्या वाढदिवस किंवा अन्य औचित्य साधून मंदिरामध्ये दररोज भक्तांमार्फत आरती आणि प्रसादाचे आयोजन केले जाते . याप्रमाणे सर्वच बालाजी भक्तांना अभिषेक, आरती प्रसादाची संधी दिली जाते ,याचे कौतुक तहसीलदारांनी केले. यावेळी मा.तहसीलदारांचा शाल,श्रीफळ देऊन या यथोचित सन्मान करण्यात आला. समाजसेवे सोबत आध्यात्मिक जोड असलेले तहसीलदार कळंबला लाभले ,यासाठी बालाजी भक्तांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
दारू उधार न दिल्याच्या कारणावरून बिअर बार मालकाला मारहाण
परंडा (प्रतिनिधी)- दारू उधार का दिली नाही असे म्हणून बिअर बार मालक व व्यवस्थापकाला लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शहरातील एका बिअर बारमधे घडली. या प्रकरणी बिअर बार मालकाच्या फिर्यादीवरून चार लोकांवर परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.14 जानेवारी रोजी सायंकाळी काशीमबाग येथील एका बिअर बारमधे रोहित भानवसे, बापू भानवसे, महेश भानवसे, अशोक भानवसे यांनी व्यवस्थापक जनार्दन चंदर भोळे यांच्याशी वाद घालून दारू उधार का दिली नाही या कारणावरून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच बिअर बार मालक बत्तीनी गौड हॉटेलमधे आले. त्यांनाही सदरील आरोपींनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.या घटनेत मालक आणि व्यवस्थापक दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा घडलेला प्रकार बिअर बारच्या हॉटेल च्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. या प्रकरणी बिअर बार मालकाच्या फिर्यादीवरून चार लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास परंडा पोलीस करित आहे.
मोहेकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; वसुंधरा गुरव व साक्षी वटाणे प्रथम
कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित संस्थामाता कै. सुमनबाई (वहिनी) मोहेकर जिल्हास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. बीडचे कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप मडके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर होते. या स्पर्धेत शालेय (42) आणि महाविद्यालयीन (16) अशा एकूण 58 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. “विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत,“ असे प्रतिपादन यावेळी रामराजे चांदणे यांनी केले. स्पर्धेचा निकाल शालेय गट- प्रथम: वसुंधरा संजय गुरव (धाराशिव), द्वितीय: राशी हनुमंत खोत (तेरखेडा), तृतीय: वीरेन गणपती आडसूळ (घारगाव), (उत्तेजनार्थ: रिया आडसूळ, ज्ञानेश्वरी धावडे, अमृता शिंदे, सुषमा मोरे, ईश्वरी बारस्कर) महाविद्यालय गट- प्रथम: साक्षी बाळासाहेब वटाणे (मोहेकर महाविद्यालय), द्वितीय: प्रतीक्षा शिवाजी लिमकर (परंडा), तृतीय: समर्थ लक्ष्मण लोंढे (नळदुर्ग), (उत्तेजनार्थ: ऋषिकेश वाघे, अश्विनी गिरी, आकाश बारस्कर, आदित्य चव्हाण, सिद्धी पाटील) परीक्षक म्हणून प्राचार्य महादेव गपाट, हरिश्चंद्र ओताडे, डॉ. गणेश पाटील, प्रा. सुनील भिसे, व्ही. एच. चेवले, सोपान पवार व मुस्तान मिर्झा यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. दीपक सूर्यवंशी , पारितोषिक वाचन डॉ. दादाराव गुंडरे यांनी केले, तर आभार श्री. अरविंद शिंदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी किरण बारकुल , सारुख शेख, अक्षय खंडागाळे, संतोष मोरे, डॉ.जयवंत ढोले,डॉ.नामानंद साठे , डॉ. ज्ञानेश चिंते ,संदीप सूर्यवंशी , आदित्य मडके , उमेश साळुंके व महाविद्यालयातील विविध समित्यांनी परिश्रम घेतले.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ज्ञानशिदोरी उपक्रम उत्साहात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे विवेकानंद सप्ताहतंर्गत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्ञानशिदोरी हा अभिनव उपक्रम महाविद्यालयाच्या ग्रंथालयामार्फत यशस्वीपणे राबविण्यात आला. या अभिनव उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वाचनीय ग्रंथ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा सह विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख तसेच प्रभारी प्राचार्य डॉ संदीप देशमुख व ग्रंथपाल डॉ मदनसिंह गोलवाल यांच्या हस्ते भेट स्वरुपात देण्यात आले. तर यावेळी मा.प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच विवेकानंद सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना आणि एन सी सी तसेच जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी एकुण 25 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.सदर प्रसंगी डॉ दत्तात्रय साखरे, डॉ केशव क्षीरसागर,प्रा माधव उगिले,प्रा बबन सुर्यवंशी, डॉ बालाजी गुंड,प्रा सचिन चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी समरजितसिंह ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल परंडा येथे त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. ते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुत्र असून जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. या प्रसंगी रुपामाता उद्योग समूहाचे चेअरमन व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड तसेच जिल्हा परिषद, धाराशिवचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरुजी) यांनी समरजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पहार अर्पण करत अभिनंदन केले. त्यांच्या भावी राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद व्यक्त करण्यात आले. यावेळी अँड.गुंड यांनी उपनगराध्यक्षपदाच्या माध्यमातून परंडा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कळंब (प्रतिनिधी)- जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यात 312 कुटुंबांचा विधिवत हिंदू धर्मात पुनर्प्रवेश सोहळा पार पडला. धरमपूर तालुक्यातील हनुमंतमाळ येथे झालेल्या या भव्य आणि भावनिक सोहळ्यात सनातन हिंदू परंपरेनुसार धार्मिक विधी पार पाडण्यात आले. विविध आमिषे, फसवणूक व भुलथापांमुळे पूर्वी अन्य धर्मात गेलेली ही कुटुंबे आत्मपरीक्षण करून पुन्हा आपल्या मूळ सनातन हिंदू धर्मात परतली. या सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या महाअभियानांतर्गत आतापर्यंत 1,53,343 कुटुंबांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला असल्याची माहिती देण्यात आली. गरिबी, अज्ञान व परिस्थितीचा गैरफायदा घेत नियोजनबद्ध पद्धतीने धर्मांतरण केलेल्या हिंदू बांधवांना पुन्हा आपल्या धर्मात सन्मानाने सामावून घेण्याचे हे कार्य सातत्याने सुरू आहे. या पुनर्प्रवेश सोहळ्यात गोमाता पूजन, होम-हवन आदी धार्मिक विधी तीन तास चालले. यानंतर सर्व उपस्थित कुटुंबांना जगद्गुरुंच्या हस्ते शपथ देण्यात आली. “मी यापुढे हिंदू धर्माची उपासना, रीतिरिवाज, प्रथा व परंपरांचे तंतोतंत पालन करेन. कोणत्याही परिस्थितीत अन्य धर्म स्वीकारणार नाही. मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच जीवन व्यतीत करीन.”शपथविधीनंतर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.“मिशनऱ्यांकडून विविध आमिषे दाखवून विशेषतः आदिवासी बांधवांचे धर्मांतरण केले जाते. धर्म बदलूनही त्यांची मूळ नावे, जात आणि कागदोपत्री धर्म बदलला जात नाही, जेणेकरून शासकीय सवलती मिळत राहतील. हिंदू धर्मातील उपासना पद्धती बदलल्याने अपराधी वाटणारी अनेक मंडळी आमच्याकडे आली, म्हणून त्यांना पुन्हा पूर्वीची उपासना पद्धती स्वीकारण्याचा मार्ग आम्ही खुला करून दिला. या कार्यक्रमास धरमपूरचे आमदार अरविंदभाई पटेल, अहवा-डांगचे आमदार विजयभाई पटेल, उमरगामचे आमदार रमणभाई पाटकर, जिल्हा महामंत्री महेंद्र चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सनातन हिंदू संस्कृतीचे जतन, संरक्षण व जागृतीसाठी सुरू असलेले हे कार्य समाजात नवचैतन्य निर्माण करणारे ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंद यांचे चरित्र वाचावे आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ.विनोदकुमार वायचळ यांनी केले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या महाविद्यालयांमध्ये विवेकानंद सप्ताह अंतर्गत ते “स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक” यावर बोलत होते. पुढे डॉ. वायचळ म्हणाले की, स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्ये सकारात्मकता, सहजता, जाणवते. त्यांच्या जन्मापासून ते जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्यांचे कार्य वेद अभ्यास, अध्यात्म, हिंदू धर्मातील सकारात्मकता यांचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील युवक या विषयावर बोलताना त्यांनी स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असणारा भारतीय युवक या विषयी सांगताना त्यांनी श्रीमद् भगवद्गीता, वेद, उपनिषदे, त्यातील अध्याय श्लोक यासह उदाहरणे देऊन त्यांनी सांगितले. की कोणत्याही मार्गाने कोणत्याही धर्मातील देवांची भक्ती, सेवा केली तरी शेवटी प्राप्त होणारा परमात्मा हा एकच असतो. प्रमुख उपस्थिती म्हणून मसला खुर्द येथील युवा उद्योजक रामेश्वर खराडे, डॉ. श्रीराम नरवडे यांचेही मार्गदर्शन झाले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.जीवन पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून जीवनात आत्मविश्वास, शिस्त व सामाजिक बांधिलकी जोपासावी. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे आजच्या तरुण पिढीसाठी असलेले महत्त्व विशद केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल नवात्रे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी जगताप यांनी मानले. सदर कार्यक्रमास विवेकानंद सप्ताहाचे संयोजक आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंत्री आडे, डॉ. बापुराव पवार, डॉ. नेताजी काळे, प्रा. बालाजी कऱ्हाडे, प्रा. स्वाती बैनवाड, ग्रंथपाल डॉ. दीपक निकाळजे, प्रा. गोकुळ बाविस्कर, प्रा. निलेश एकदंते, प्रा. सुदर्शन गुरव, प्रा. बाळू कुकडे, प्रा. राणुबाई कोरे, डॉ. तांबोळी मॅडम प्रा. सतीश वागतकर, प्रा. अनिल नवात्रे, प्रा. शिवाजी जगताप, तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलसंधारण आणि पडीक जमीनीच्या शाश्वत विकासासाठी युवकांचा सहभाग आवश्यक- डॉ. नितीन पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जलसंधारण आणि पडीक जमीनीच्या शाश्वत विकासासाठी युवकांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन जल व मृदा व्यवस्थापन विभाग प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव डॉ. नितीन पाटील यांनी केले. काजळा येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, जलसंधारण म्हणजे पावसाचे पाणी अडवणे, साठवणे, जमिनीत मुरवणे आणि त्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करणे. आज अनेक भागांत भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घटली असून विहिरी, बोअरवेल कोरड्या पडत आहेत. यावर जलसंधारण हाच प्रभावी उपाय मानला जातो. पावसाचे पाणी साठवण, नाला बंडिंग, चेकडॅम, शेततळे, समतल चर, परकोलेशन टँक, तसेच ठिबक व तुषार सिंचन यांसारख्या उपायांमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर शक्य होतो. या उपायांमुळे शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेले स्रोत टिकवून ठेवता येतात. पाण्याच्या अभावामुळे, मृदा धूप, क्षारयुक्त जमीन, अति चराई, जंगलतोड आणि चुकीच्या शेती पद्धतींमुळे मोठ्या प्रमाणावर जमीन पडीक होत आहे. पडीक जमीन म्हणजे जिथे शेती होत नाही किंवा उत्पादन क्षमता अत्यल्प आहे अशी जमीन. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते, बेरोजगारी वाढते आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण होतो. पडीक जमिनीचा शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला हानी न पोहोचवता, दीर्घकाळ उपयोगी पडेल अशा पद्धतीने त्या जमिनीचा विकास करणे. यामध्ये जलसंधारण, मृदासंधारण, वृक्षारोपण, चारागाह विकास, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि बहुविध पीक पद्धती यांचा समावेश होतो. तर अध्यक्षीय समारोप करताना प्र प्राचार्य डॉ. संदीप देशमुख म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मातिशी नाते अतूट राहीले पाहिजे. कारण माती मधुन अन्न निर्माण तर होतेच पण श्रमाचे मूल्य देखील मातीतूनच कळते. यावेळी रत्नाकर मस्के, गावचे प्रथम नागरिक प्रविण बाबुराव पाटील, किशोर लिंगे, विष्णुदास आहेर, मुख्याध्यापक शिवाजी वागतकर, कार्यक्रमाधिकारी डॉ दत्तात्रय साखरे, डॉ अवधूत नवले,प्रा मोहन राठोड, डॉ स्वाती जाधव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिभाऊ घोगरे हायस्कूल, उपळे (मा.) येथे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांना अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील उपळे (मा.) येथील हरिभाऊ घोगरे हायस्कूलमध्ये 17 जानेवारी रोजी ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात प्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून केले.यावेळी व्यासपीठावर प्रशाळेचे मुख्याध्यापक .टी.डी.कांबळे,शिक्षक ए.बी. क्षीरसागर,श्रीमती घोगरे व श्रीमती वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक सचिन कांबळे यांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. वैराग्य, धैर्य, धर्मसंरक्षण तसेच धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले महान बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अतुलनीय त्यागामुळेच भारतीय समाजात मानवतावादी मूल्ये,सहिष्णुता व राष्ट्रनिष्ठेचा संदेश दृढ झाला, असे मत त्यांनी व्यक्त केले. या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक सलोखा आणि मानवतेची जाणीव निर्माण झाली.उपस्थित सर्वांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार ए.बी.क्षीरसागर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम श्रद्धा, शिस्तबद्धता व प्रेरणादायी वातावरणात उत्साहपूर्वक पार पडला.
Video –एकनाथ शिंदेंच्या दारात मशाल धगधगली, शहाजी खुस्पे ठरले जायंट किलर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेची मशाल धगधगली. या प्रभागात शिवसेनेचे उमेदवार शहाजी (गणेश) खुस्पे यांनी इतिहास घडवला. ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांच्या 30 वर्षांच्या मक्तेदारीला खुस्पे यांनी सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे खुस्पे हे जायंट किलर ठरले.
बड्या कंपन्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात का येत नाही? रोहित पवार यांचा सवाल
अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणुकीसाठी दावोसच्या दौऱ्यावर जात आहेत. तरीही राज्यात बड्या कंपन्या गुंतवणुकीसाठी का येत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवाजमा घेऊन दावोसला जात आहे. गेल्यावेळी ते दावोसला गेल्यावर मोठी गुंतवणूक आणि अनेक कंपन्या राज्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. […]
Video –लालबाग,परळ, काळाचौकीमध्ये गद्दारांना स्थान नाही- किरण तावडे
लालबाग- परळचा बालेकिल्ला शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिलेदाराने गाजवला; विजयानंतर किरण तावडे यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबईत सरोगसी रॅकेट, बँकॉकहून परतणाऱ्या दोन महिलांना अटक
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अवैध सरोगेसी आणि एग डोनेशनशी संबंधित आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बँकॉकहून मुंबईत आलेल्या दोन महिला प्रवाशांच्या यांच्या संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला. 16 जानेवारी 2026 रोजी बँकॉकहून इंडिगोच्या 6E-1052 या विमानाने मुंबईत आलेल्या दोन महिलांची इमिग्रेशन काउंटरवर नियमित चौकशी करण्यात आली. मात्र परदेश प्रवासाच्या उद्देशाबाबत […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या उपस्थित केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला. तपास यंत्रणांकडून जाणीवपूर्वत लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी लोकशाही, न्यायव्यवस्था आणि संविधान वाचवण्याचे आवाहन केले. त्या जळपाईगुडी येथे कोलकाता उच्च न्यायालयाच्या नवीन सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी सरन्यायाधीश सूर्य कांत आणि […]
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात असलेल्या भागीरथपुरा भागात दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 15 वर पोहोचली असून 338 नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. या भीषण घटनेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. देशाला स्मार्ट सिटी बनवण्याचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप करत त्यांनी […]
“पप्पा, मी अडकलोय..”, नाल्यात कार कोसळून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू, वडिलांनी सांगितला थरार
ग्रेअट नोएडातील सेक्टर 150 मध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. युवराज मेहता असे मृताचे नाव आहे. युवराजची भरधाव कार रस्त्यावरील नाल्याची भिंत तोडून निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याने भरलेल्या बेसमेंटमध्ये कोसळली. त्याला वेळीच बाहेर पडता आले नाही आणि कुणाची मदतही मिळाली नाही, यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त […]
मळेवाड येथे २२ रोजी माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
न्हावेली /वार्ताहर गणपती मंदिर मळेवाड जकातनाका येथील श्री गणेश मित्रमंडळ आयोजित माघी गणेश जयंती निमित्त २२ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.सकाळी ७ वाजता गणेशयाग प्रारंभ,दुपारी १ वाजता महाप्रसाद,सायंकाळी ६.३० वाजता माऊली भजन मंडळ,साटेली ( बुवा -सत्यनारायण कळंगुटकर ) यांचे भजन सायंकाळी ७ वाजता लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी पटवारी बुवा पुणे यांचे किर्तन [...]
याचा अर्थ मुंबईकरांनी भाजपला नाकारलं आहे, आप नेते अरविंद केजरीवाल यांची टीका
मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक असलेल्या केजरीवाल यांनी म्हटले की, भाजपला बहुमताचा आकडा गाठता न येणे हेच लोक भाजपच्या विरोधात असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. अहमदाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “इतक्या गोंधळ, गैरप्रकार आणि यंत्रणेचा वापर करूनही भाजप बहुमतापर्यंत […]
Jammu Kashmir –किश्तवाडमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; लष्कराचा परिसराला घेराव
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंगपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला असून त्या भागात जैश ए मोहम्मदचे दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सिंहपोरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती […]
दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. विमान हजारो फुटांवर असताना वॉशरुममध्ये सापडलेल्या चिठ्ठीमध्ये विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिलेले होते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विमान तातडीने लखनौकडे वळवण्यात आले आणि तिथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. रविवारी सकाळी हा प्रकार घडल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. STORY | Bomb […]
Solapur news –अक्कलकोटला जाताना अनर्थ घडला, पनवेलच्या भाविकांवर काळाची झडप; भीषण अपघातात 5 जण ठार
नवी मुंबईतील पनवेल येथून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने झडप घातली. पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर मोहोळमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील भाविक एरटिका गाडीने (गाडी क्र. एमएच 46, झेड 4536) अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या […]
१० वर्षे रखडलेल्या टर्मिनसमुळे कोकणी माणसाची फसवणूक
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’चा ज्वलंत प्रश्न नीलेश परब/ न्हावेली कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे स्वप्न १० वर्षांनंतरही अपूर्णच आहे. २७ जून २०१५ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात झालेल्या भूमिपूजनाचा दगड आज केवळ आश्वासनांचे प्रतीक बनून राहिला आहे. या रखडलेल्या प्रकल्पामुळे [...]
ट्रम्प यांच्या 10 टक्के टॅरिफला युरोपियनचे प्रत्युत्तर; व्यापार करार थांबवला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही परिस्थितीत ग्रीनलँडवर ताबा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या या मनसुब्यांना युरोपियन युनियममधील देशांनी तीव्र विरोध केला आहे. या संघर्षात ट्रम्प यांनी डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डम, नेदरलँड्स आणि फिनलंड या आठ युरोपीय देशांवर १०% टॅरिफ लादला आहे, तो १ फेब्रुवारीपासून लागू होईल. तसेच ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, […]
वेत्ये येथे ३१ जानेवारीला जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा
न्हावेली/वार्ताहर श्री कलेश्वर नाट्यमंडळ,वेत्ये वरची गावकरवाडी आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा शनिवार ३१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.त्यानिमित्त सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता आरती १ वाजता महाप्रसाद, आणि संध्याकाळी ५.३० वाजता भजन स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. पुढीलप्रमाणे या स्पर्धेतील सहभागी संघ — सायंकाळी ७ ते ७.४० वाजता गोठण प्रासादिक भजन,वजराट ( [...]
प्रयागराजच्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या पवित्र पर्वणीला गालबोट लागल्याची घटना उघड झाली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीचा निषेध करत संगम स्नान न करण्याचा निर्णय घेतला आणि आपली पालखी अर्ध्यातूनच आखाड्याकडे परत नेली. उत्तर प्रदेश सरकारचे गृहसचिव मोहित गुप्ता आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या शिष्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा गंभीर आरोप […]
महायुतीच्या जागावाटपासह जि. प अध्यक्षाचा फॉर्म्युला निश्चित !
जिल्हा परिषदेच्या 31 जागा भाजप तर शिवसेना 19 जागा लढणार ; जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजप तीन वर्ष आणि शिवसेना दोन वर्ष भूषविणार. कणकवली / प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती निश्चित झाल्यानंतर जागा वाटप निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजपा 31 तर शिवसेना 19 [...]
आज पारपोली श्री घाडवस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे प्रतिनिधी पारपोली येथील जागृत देवस्थान श्री घाडवस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज रविवारी १८ जानेवारी रोजी होत आहे. नवसाला पावणारा आणि माहेरवाशिणीचा पाठीराखा अशी घाडवस देवाची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री घाडवसला भरजरी वस्त्र व आकर्षक फुलांनी सजवीण्यात आले. आहे. त्यानंतर घाडवसच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची [...]
सद्गुरू राजाराम महाराज पुण्यतिथी २० जानेवारीला
प्रतिनिधी बांदा इन्सुली गावठणवाडी येथील श्री सद्गुरू राजाराम महाराज मठ येथे महाराजांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पालखी सोहळा, भजनांचे कार्यक्रम आणि मालवणी नाटकाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.उत्सवाची सुरुवात २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता होईल. श्री सद्गुरू राजाराम महाराजांच्या स्मारकाकडून त्यांच्या निवासस्थानापर्यंत नामघोषात पालखी [...]
इन्सुलीत २१ जानेवारीपासून माघी गणेश जयंतीचा उत्साह
प्रतिनिधी बांदा इन्सुली खामदेव नाका येथील गणेश मंदिर, इन्सुली येथे ‘नवदूर्गा कला क्रीडा मंडळ’ आणि समस्त कुडवटेंब ग्रामस्थ यांच्या वतीने यंदाचा ‘माघी गणेश जयंती’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दि. २१ जानेवारी आणि गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल [...]
मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणूक निकालातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 2017 मध्ये जिंकलेल्या मतदारसंघांपैकी बहुसंख्य वॉर्डवर आपला ताबा कायम ठेवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला त्या पारंपरिक आधारात तुलनेने मर्यादित यश मिळाले आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. 2017 मध्ये अविभाजित शिवसेनेने जिंकलेल्या 84 वॉर्डपैकी […]
मुंबईत उभारणार ‘बिहार भवन’, 30 मजली इमारतीसाठी होणार 314 कोटी खर्च
राज्यात नुकतीच 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. महायुती आणि शिवशक्तीमध्ये बहुमताचा 114 हा जादुई आकडा गाठण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. मराठी माणूस ठामपणे ठाकरे बंधूंसोबत राहिला. त्याच वेळी अमराठीबहुल भागातून भाजप आणि मिध्यांना बळ मिळाले, त्यामुळे 118 जागांसह महायुतीने काठावरचे बहुमत मिळवले. अशातच बिहारमध्ये भाजपच्या […]
मुंबई महापालिका निवडणुकीत 89 जागा जिंकूनही भाजपच्या राज्य नेतृत्वात नाराजी असल्याचे पक्षातील सूत्रांकडून समोर आले आहे. 2002 नंतर कोणत्याही एका पक्षाने स्वतंत्रपणे मिळवलेला हा सर्वाधिक आकडा असला, तरी तो अपेक्षेपेक्षा कमी ठरल्याची भावना पक्षात आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. भाजपने सुरुवातीला किमान 110 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते, मात्र निकाल त्यापेक्षा बऱ्याच खाली […]
आकडेवारीत फक्त चारचा फरक असल्याने पडद्यामागे अनेक हालचाली होत आहेत; संजय राऊत यांचे सूचक विधान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील महापौर आणि याबाबतचे राजकारण यावर महत्त्वाचे भाष्य केले.मुंबईचा महापौर ठाकरे बंधूचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये, ही सगळ्यांची भावना आहे, असे परखड मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच आपल्याच राज्यात आपलेच नगरसेवक फुटण्याची भीती वाटणे, ही राज्याच्या राजकारणातील हास्यजत्रा आहे, असा […]
गोव्यात दोन रशियन महिलांची हत्या, आरोपीने केले धक्कादायक खुलासे
गोव्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दोन रशियन महिलांची हत्या करण्यात आली असून एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या लिव्ह इन पार्टनरला अटक करण्यात आली आहे. एलेक्सी लियोनोव असे आरोपीचे नाव असून त्याने अनेक हत्या केल्याचे कबूल केले आहे. एलेक्सी लियोनोव हा त्याच्या प्रेयसीसोबत गोव्यात लिव्ह इनमध्ये राहायचा. शुक्रवारी त्याची प्रेयसी एलेना कस्थनोवा […]
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि लेखक डॉ. रामचंद्र श्रीराम मोरवंचिकर यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता प्रतापनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. रामचंद्र मोरवंचिकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी रात्री 11 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]
मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल मध्ये यावेळी जोरदार कमबॅक करत पाच जागांवर दणदणीत विजय मिळवला. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनाही भरपूर मते मिळाली आहेत. समोर सत्ताधारी भाजपची धनशक्ती असताना शिवसेनेच्या १६ उमेदवारांना चार ते पाच हजार इतकी मते मिळाली आहेत. त्यामुळे निसटता विजय झालेल्या भाजप उमेदवारांना अक्षरशः घाम फुटला […]
ठाण्यात महाविकास आघाडीची तगडी झुंज, अत्यंत कमी फरकाने विजय हुकला
महापालिका निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी महायुतीविरोधात तगडी झुंज दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकावरील २० उमेदवारांचा कमी फरकाने विजय हुकला आहे. प्रभाग क्रमांक ३, ९, ११, १२, १३, २०, २४, २६, ३१ व प्रभाग क्रमांक ३३ मधील महाविकास आघाडीतील उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडला. त्यामुळे या […]
शिंदे गटाच्या विजयी उमेदवाराचा उन्माद; पराभूत महिला उमेदवाराच्या दारात ठेवले शिलाई मशीन
नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ऐरोलीत शिंदे गटाचे मनोज हळदणकर यांनी दादागिरी सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार आणि माजी नगरसेविका नंदा काटे यांच्या घरासमोर हळदणकर यांनी शिलाई मशीन आणून ठेवली. निवडणुकीत पराभव झाला, आता कार्यालय बंद करा आणि शिलाई मशीन चालवा, अशी अरेरावीची भाषा यावेळी […]
सत्तेवर डोळा ठेवून शिंदे गटाने शिवसेनेतून फोडलेल्या अनेक नगरसेवकांचा यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी टांगा पलटी करून त्यांना घरी बसवले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिलेदारांनी या निवडणुकीत जोरदार लढत दिली. त्याचा मोठा फटका शिंदे गटाला बसला. अनेक ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा जनाधार मिळाल्यामुळे शिंदे गट आणि भाजपवाले […]
नवी मुंबईकरांनी केला गद्दारांचा सुपडा साफ; कुटुंबकबिल्याला दाखवला घरचा रस्ता
राजकीय स्वार्थ डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेतून शिंदे गट आणि भाजपमध्ये गेलेल्या गद्दारांचा नवी मुंबईकरांनी महापालिका निवडणुकीत पुरता सुपडा साफ केला. ऐरोलीतील एम. के. मढवी, सानपाड्यातील सोमनाथ वास्कर, कोपरीमधील विलास भोईर यांच्या कुटुंबकबिल्याला घरचा रस्ता दाखवला. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या सुमारे २० माजी नगरसेवकांना मतदारांनी पराभवाची धूळ चारली. त्यामुळे या गद्दारांची अवस्था ना घर का ना घाट […]
ग्रीनलँडची राजधानी नुउकमध्ये शेकडो लोक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन वाणिज्य दूतावासावर मोर्चा काढण्यात आला. डेन्मार्क आणि युरोपने नाटोची उपस्थिती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ग्रीनलँडवर ताबा घेण्याच्या अमेरिकेच्या विधानांमुळे मोठ्या प्रमाणात जनक्षोभ निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा घेण्याच्या विधानांविरुद्ध ग्रीनलँडमध्ये मोठा निषेध व्यक्त करण्यात […]
ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदेंना चेपले; ठाणे, कल्याण वगळता 6 महापालिकांत शिंदेंचा शक्तीपात
ठाणे जिल्हा हा आमचाच बालेकिल्ला आहे अशा वल्गना करणाऱ्या शिंदे गटाला भाजपने पद्धतशीरपणे चेपले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली वगळता मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, वसई-विरार आणि पनवेलमध्ये शिंदे गटाची ताकद कमी करत भाजपने त्यांचा शक्तीपात केला आहे. शिंदेंकडे नगरविकास खाते असल्याने एमएमआरडीए त्यांच्या ताब्यात असले तरी एमएमआर क्षेत्रावर शिंदेंचा नव्हे तर आमचाच ताबा राहील हे भाजपने महापालिका […]
हिंदुस्थानला 114 राफेल जेट्स मिळणार, फ्रान्ससोबतच्या कराराला संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी
हिंदुस्थानला अतिरिक्त 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण खरेदी मंडळ (डीपीबी) ने फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीकडून 114 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता 114 राफेल जेट्स खरेदीसाठी एक टप्पा पार केला आहे. आता पुढचा टप्पा म्हणजे हा प्रस्ताव आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ […]
देशात 9 अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या धावणार, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा
देशात लवकरच नवीन 9 अमृत भारत एक्स्प्रेस गाडय़ा सुरू केल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. या नवीन गाडय़ांमुळे, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू येथील सामान्य प्रवाशांना फायदा होईल, असे ते म्हणाले. या गाडय़ांमध्ये आधुनिक डिझाइन, सुधारित शॉक अॅब्झॉर्बर आणि प्रगत […]

21 C