सामना अग्रलेख – झिरवळांची धमाल, नार्वेकरांची कमाल!
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची एक तऱ्हा तर विधानसभा अध्यक्ष राहुल‘भाई’ नार्वेकरांची दुसरी तऱ्हा. ‘भाई’ नार्वेकर यांनी तर कमाल केली! संविधानिक जबाबदाऱ्या व किमान शिष्टाचाराची ऐशी की तैशी करून नार्वेकर हे एका शेतकऱ्याच्या जागेत घुसले व सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन त्या जागेची मोजणी करू लागले. तेव्हा ते शेतकरी कुटुंब चवताळून समोर आले व महाराष्ट्र […]
लेख –चांदीच्या किमतीचा जागतिक भडका
>> सतीश पोतदार अमेरिकेकडे सध्या सुमारे चेपन्न कोटी औंस चांदीचा साठा असल्याचे सांगितले जाते, जो त्यांच्या नेहमीच्या साठ्यापेक्षा तिप्पट आहे. चीननेदेखील चांदीच्या निर्यातीवर कडक निर्बंध लादले आहेत. जगातील हे दोन मोठे देश जेव्हा चांदीची साठेबाजी करतात आणि निर्यातीवर बंदी घालतात, तेव्हा लंडन आणि न्यूयॉर्कच्या बाजारपेठेत चांदीचा तुटवडा जाणवू लागतो. या कमतरतेमुळे जागतिक स्तरावर चांदीच्या किमतीत […]
>> मोक्षदा घाणेकर गेल्या काही महिन्यांत मुंबईतून मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मुला-मुलींचे बेपत्ता होण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जातात. यापैकी एक म्हणजे मुला-मुलींचे अपहरण होणे आणि दुसरे म्हणजे कौटुंबिक कारणामुळे किंवा निराशेमुळे मुलांनी घर सोडून निघून जाणे. जून 2025 पासून मुलांच्या अपहरणाच्या प्रकरणांची मुंबई पोलिसांत नोंद होण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. अपहरण […]
वृत्तसंस्था / नवी दिल्ली तुर्कीच्या दौऱ्यावर गेलेल्या 17 वर्षांखालील वयोगटातील भारताच्या पुरूष युवा संघाने तुर्कीत आयोजिलेल्या तिसऱ्या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात रशियाच्या स्पार्टेक मॉस्को संघाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. तुर्कीच्या दौऱ्यातील भारतीय युवा फुटबॉल संघाचा हा पहिला विजय आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यात भारतीय युवा फुटबॉल संघाला मित्रत्वाचे दोन सामने गमवावे लागले. तुर्कीच्या 17 वर्षांखालील [...]
यज्ञ करून योगी त्याच्या शुद्ध स्वरूपात विरघळून जातो
अध्याय चौथा ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मी कर्ता आहे हे विसरणे फार महत्वाचे आहे. तो विसर पडला की, आत्मबुद्धी उदय पावते. हे घडून येण्यासाठी योगी इंद्रियांना त्यांच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. माणसाची इंद्रिये त्याच्या मनात येणाऱ्या आवडीच्या गोष्टींचे त्याला प्रलोभन दाखवत असतात. सामान्य माणसाला त्या प्रलोभनांचा मोह पडतो आणि त्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी तो प्रयत्न करू लागतो. गीता, [...]
रत्नागिरी तालुक्यातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांबाबतची याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने गंभीर दखल घेत रत्नागिरी जिल्हाधिकारी, रत्नागिरी नगर परिषद, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस काढून तीन आठवड्यांच्या आत आपले म्हणणे मांडण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ॲड.असीम सरोदे यांनी दिली. सामाजिक […]
सत्ताधाऱ्यांना नागरी भान येण्यासाठी काउन्सिलिंगची गरज; मुंबईतील होर्डिंग्सवरून आदित्य ठाकरेंची टीका
मुंबईत परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्स आणि होर्डिंग्सवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “कोणतेही सुज्ञ आणि प्रगत सरकार जागतिक दर्जाच्या शहराचे अशा प्रकारे विद्रुपीकरण करत नाही. सरकारमधील लोकांना नागरी भान (Civic Sense) आणि शहराचे सौंदर्य जपण्यासाठी आता खरोखरच काउन्सिलिंगची गरज आहे,” […]
मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड
मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. पालिकेतील प्रदीर्घ अनुभव आणि जनसामान्यांशी असलेली नाळ लक्षात घेऊन पक्षाच्या वतीने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर म्हणून काम करताना किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनावर आपली पकड निर्माण केली होती. आता विरोधी पक्षनेते […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून सत्ताधाऱ्यांवर आणि तपास यंत्रणांवर गंभीर निशाणा साधला आहे. “मी वर्तवलेली शक्यता आता खरी होताना दिसत आहे,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणातील ‘ब्लॅक बॉक्स’ खराब झाल्याच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट […]
‘केदारनाथ’चे दरवाजे २२ एप्रिलला उघडणार देहराडून : उत्तराखंडमधील गढवाल हिमालयीन प्रदेशात असलेल्या प्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यात जवळजवळ सहा महिने बंद राहिल्यानंतर २२ एप्रिल रोजी भाविकांसाठी पुन्हा उघडतील. मंदिर समितीने रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. महाशिवरात्रीच्या शुभ [...]
विवाहापूर्वी शारीरिक संबंध योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालयाने केली महत्त्वपूर्ण टिप्पणी
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. एका जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, जर एखादी महिला विवाहाबाबत खरोखरच गंभीर होती, तर तिने लग्नापूर्वी आरोपीसोबत जायला नको होते. लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती नागरत्ना यांनी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान म्हटले की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्या […]
Satara News |दहिवडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १५ जणांवर गुन्हा
म्हसळा येथील कार्वेकर कॉलनीत जुगार अड्डा उद्ध्वस्त सातारा – दहिवडी पोलिसांनी १३ रोजी सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास म्हसळा येथील कार्वेकर कॉलनीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करून १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून साडेचार लाख ४४ [...]
Wathar Leopard Attack |वाठारमध्ये बिबट्याचा हल्ला; पाळीव श्वान गंभीर जखमी
म्हसोबा मंदिर परिसरात पहाटे बिबट्याची धडक वाठार – वाठार (ता. कराड) येथील म्हसोबा मंदिर परिसरात शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरासमोरील पाळीव श्वानावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण [...]
Satara News |सातारा जिल्ह्यात सहा जण बेपत्ता; पोलिसांत नोंदी दाखल
सातारा जिल्ह्यात बेपत्ता घटनांची वाढती संख्या सातारा : जिल्ह्यात विविध ठिकाणाहून सहा जण बेपत्ता झाले आहेत. यात दोन महिला, दोन युवती, एक युवक तसेच एका लहान मुलीचा समावेश आहे. या घटनांची संबंधित पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. भाडळे येथून दोघी बेपत्ताकोरेगाव [...]
Sangli News : सांगली राजवाडा येथे खोकी हटविण्यावरून महापालिका व व्यापाऱ्यांत वाद
‘ सांगलीतील खासगी जागा आणि अतिक्रमण कारवाईचा वाद सांगली – सांगलीच्या राजवाडा येथील गणपती पंचायतन संस्थानच्या खासगी जागेतील खोकी हटविण्यावरून शनिवारी महापालिका अतिक्रमण निर्मुलन पथक आणि खोकीधारक यांच्यात जोरदार वादावादी झाली. ही खोकी पंचायतनच्या खासगी जागेत असल्याचे लक्षात येताच पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. यामुळे [...]
शिवजयंती निमित्त परंडयात विविध कार्यक्रम
परंडा (प्रतिनिधी)- विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून जिजाऊ ब्रिगेड च्या संकल्पनेतून महिलांसाठी विशेष कार्यक्रम वैचारीक मनोरंजनातुन जिंका पैठणी या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी दि.१८रोजी करण्यात आले आहे.तसेच दिपोत्सव व गुरुवारी दि.१९ रोजी भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.सायंकाळी दिपोत्सव कार्यक्रमानंतर सहभागी स्पर्धकांची बौद्धीक चाचणी घेऊन यामधून १५ स्पर्थकांची निवड केली जाणार आहे . राजमाता जिजाऊ माँसाहेब , छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई व महाराणी ताराबाई यांच्या जीवन कार्यावर या स्पर्धेत प्रश्न विचारले जाणार आहेत . प्रथम बक्षिस ५ नग मिक्सर व पर्स ,द्वितीय बक्षिस ५ नग कुकर व तृतीय बक्षिस ५ नग स्टीलचा टब असे बक्षीस ठेवण्यात आले आहे . या स्पर्धेत महिलांनी मोठयासंख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने करण्यात आले आहे .
व्दितीय गळीत हंगामात एनव्हीपी शुगरचा 1 लाख मे. टन गाळपाचा टप्पा पूर्ण- चेअरमन नानासाहेब पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगर प्रा.लि या कारखान्याने व्दितीय गळीत हंगामात आजवर 1 लाख मे.टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून ऊसबिलही वेळेत शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. अतिवृष्टी, पूर अशा नैसर्गिक संकटावर मात करून गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे. यावर्षीच्या गळीत हंगामातील आठव्या पंधरवाड्यात 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत आलेल्या ऊसाचे बिल सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली. एनव्हीपी शुगरला यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे गळीत हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अतिवृष्टीमुळे ऊसफडात वाहने घेवून जाणे आणि तोडणी करताना अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली. या सर्व अडचणींवर मात करत कुशल नियोजन करून गाळप हंगामाला सुरूवात केली. यावर्षीच्या हंगामात आजपर्यंत 1 लाख मे.टन गाळपाचा टप्पा कारखान्याच्या व्यवस्थापनातील प्रत्येकाने अहोरात्र परिश्रम करून यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक, सभासद, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार, तोडणी यंत्र ठेकेदार, तोडणी मजूर आणि सर्व सहकार्यांचे आभार व्यक्त केले. आठव्या पंधरवाड्यात 01 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीतीत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकर्यांचे ऊसाचे बिल 2700 रुपयाप्रमाणे दि.16 फेब्रुवारी रोजी संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. ज्या शेतकर्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकर्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. व ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकर्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच जास्तीत जास्त शेतकर्यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहनही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या अंतरिम व्यापार करारावरून (India-US Interim Trade Deal) राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांनी या करारावरून केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. “हा देश आत्मनिर्भर होत आहे की अमेरिका-निर्भर?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, […]
सनई चौघडे वाजणार…रश्मिका आणि विजय अडकणार विवाहबंधनात; उदयपूरमध्ये रंगणार शाही सोहळा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी जोडी, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या 26 फेब्रुवारी 2026 रोजी या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे कपल राजस्थानमधील उदयपूर येथे भव्य ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करणार असून लग्नानंतर 3 मार्च रोजी हैदराबादमध्ये चित्रपटसृष्टीतील मित्रमंडळी आणि नातेवाईकांसाठी एका खास रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचे […]
Sangli Crime : सांगलीत वृद्ध महिलेकडून सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी
बँकेमध्ये पैसे काढण्याच्या बहाण्याने वृद्धेची फसवणूक सांगली : संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या माधवनगर येथून एक वृध्दा घरी जात होती. तिच्याजवळ एकजण येवून त्यांने सोन्याचे दागिने काढुन आत ठेवा असे सांगितले. ती वृध्दा दागिने काढत असतानाच हिसडा मारून पळवून नेणाऱ्यास स्थानिक गुन्हा [...]
बदनाम करण्याच्या कार्यक्रम थांबवा
धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीमध्ये अर्चना पाटील यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून कमी मते पडली. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने भूम, परंडा, वाशी मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्या विरोधातील उमेदवारांना रसद पुरविली. असे असताना परत नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना व त्यांच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील करत आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना शिवसेना नेत्यांचे फोटो वापरण्यास सक्त मनाई केली होती. त्यामुळे आमचा घराणेशाहीला विरोध आहे. आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचा अध्यक्ष होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आल्याची माहिती शिंदे शिवसनेचे जि. प. चे माजी सभापती दत्ता साळुंखे व युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अविनाश खापे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेस महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख भारती गायकवाड, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख निखील घोडके, मनोज मोटे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दत्ता साळुंखे यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या नावावर काढलेल्या पत्रकारात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासह शिवसेनेला बदनाम करण्याचे कटकारस्थान चालू आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीत विरोधात वातावरण असल्यामुळे अर्चना पाटील यांना कमी मतदान मिळाले. भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अर्चना पाटील यांना मोठ्या प्रमाणात अल्य मते मिळाली. यांचा अर्थ त्यांनी पण विरोधात प्रचार केलेला का असा होतो. असे असताना केवळ भूम, परंडा, वाशी मधून कमी मतदान मिळाले म्हणून टार्गेट करणे आम्हाला बरोबर नाही. घराणेशाहीला विरोध यावेळी पत्रकारांशी बोलताना अविनाश खापे यांनी आमचा भाजला विरोध नाही. घराणेशाहीला विरोध आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे नेहमीच खच्चीकरण करत आहेत. आमच्यातील काही गद्दार लोक भाजप सोबत असल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडील महिलाही इच्छुक आहेत. आमचे 28 जि. प. सदस्य संख्याबळ असून, शिवसेनेचा अध्यक्ष होईल असे सांगितले.
धाराशिव (प्रतिनिधी)- बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या बोधिसत्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रवीण सूर्यवंशी तर कार्याध्यक्षपदी सुधीर रामेश्वर पवार यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या कार्यालयात समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.15) झालेल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड जाहीर करण्यात आली. यावर्षीची मिरवणूक 27 एप्रिल रोजी काढण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. समितीच्या वतीने धाराशिव येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा मागील 31 वर्षांपासून कायम आहे. यामध्ये सर्व जाती-धर्मातील व्यक्तींचा समावेश असून दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने विशेषतः पारंपारिक वाद्यांच्या गजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप, वृक्ष लागवड, दिव्यांगांना मोफत सायकल यासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील विविध राज्यातील पारंपारिक वाद्य समूहांना आमंत्रित करण्यात आल्यामुळे ही मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी बैठकीत घोषीत केले. यावेळी राजाभाऊ बागल, आबा खोत, मुकुंद घुले, सतीश कदम, लक्ष्मण माने, रवी कोरे, पांडुरंग भोसले, सुभाष पवार, नंदकुमार शेटे, इलियास मुजावर, रावसाहेब शिंगाडे, विशाल शिंगाडे, सुरेश गवळी, रिजवान शेख, राजाभाऊ कळसकर यांचेसह सर्वधर्मीय समाज बांधव उपस्थित होते.
सुहास सोन्ने यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड
भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील सोनेवाडी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील सुहास सतीश सोन्ने हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यातून 70 वा क्रमांक घेऊन यशस्वी झाला असून त्याने तालुका कृषी अधिकारी या पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाबद्दल सोनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. सुहास सोन्ने यांचा जन्म सोनेवाडी सारख्या लहानशा गावात सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडिलांचा मुख्य व्यवसाय शेती त्याने शेतीमध्ये करावे लागणारे कष्ट या मुलाने जवळून पाहिल्याने त्याने शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचे या ध्येयाने प्रेरित होऊन प्राथमिक माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर लातूर येथील कृषी महाविद्यालयातून कृषी क्षेत्रातून पदवी घेतली. यानंतर एमपीएससीच्या तयारीसाठी पुणे शहर गाठले. अत्यंत जिद्दीन अभ्यास केला आई-वडिलांनी ही शेती करून मुलाला एमपीएससी सारख्या परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत केली. त्याचबरोबर त्यांना असणारी मुलगी स्नेहल तिचेही बीडीएसचे शिक्षण पूर्ण केले. अशा या ध्येय वेड्या सोने कुटुंबाचा सत्कार सोनेवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने वाशी येथील प्राध्यापक शामराव डोके यांच्या हस्ते व सरपंच सतीश सोन्ने यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच यावेळी गावातील युवक संजय सोन्ने याची एचडीएफसी बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट पदी निवड झाल्याबद्दल त्याचाही सत्कार यावेळी करण्यात आला. सोनेवाडी सारख्या ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घवघवी त यश मिळवल्याने सोनेवाडी ग्रामस्थांच्यावतीने फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून गावातील मुख्य रस्त्यावरून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढुन ग्रामपंचायतच्या समोर सुहास सोन्ने, संजय सोन्ने यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच सतीश सोन्ने यांनी तर आभार प्रा. भिमराव शिंदे यांनी व्यक्त केले. आपल्या गावातील दोन यशस्वी तरुणांचा सत्कार करण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Kolhapur Breaking : कोल्हापूर भोगावती साखर कारखान्यात जोरदार हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
कोल्हापूर करवीर तालुक्यातील हिंसाचार प्रकरण चर्चेत कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भोगावती साखर कारखाना येथे आज दुपारी जोरदार हाणामारीची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या मारामारीत एक व्यक्ती इतक्या जोरात मारण्यात आला की तो [...]
Sangli Crime : कुर्डुवाडी शाळकरी मुलींवर रोडरोमिओंचा वाढता त्रास
रोडरोमिओंवर तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी कुर्डुवाडी – शहरातील मध्यवर्ती बसस्टँड, पोस्ट चौक, चेकनाका, माढा रोड, स्टेशन चौक, पटेल चौक, टेंभुर्णी रोड व परंडा रोड या प्रमुख मार्गावरून शाळकरी मुलींना रोज प्रवास करावा लागतो. शाळा सीमा मोरे यांची पोलीस कारवाईची मागणीमानसिक [...]
स्वित्झर्लंडमध्ये सोमवारी सकाळी एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली. दक्षिण स्वित्झर्लंडमधील गोपेनस्टीन (Goppenstein) गावाजवळ हिमस्खलनामुळे (Avalanche) ८० प्रवाशांना घेऊन जाणारी एक प्रवासी ट्रेन रुळावरून घसरली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली. ही ट्रेन सकाळी ६:१२ वाजता स्पीझ (Spiez) येथून सुटली होती […]
Solapur News : करमाळ्यातील विजेच्या प्रश्नावर आ. पाटलांनी उठवला आवाज
रावगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी अखंडित बीजपुरवठा हवा करमाळा : सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. बैठकीत आ. नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतली. बैठकीत रावगाव येथील ३३/११ केव्हीए क्षमतेचे सबस्टेशन व सध्या [...]
Solapur Crime : सोलापूरमध्ये नवऱ्याशी का बोलते म्हणून एका महिलेकडून दुसरीला मारहाण
सोलापूरमध्ये महिलांवर काठीने मारहाण सोलापूर : माझ्या नवऱ्याशी का बोलते असे म्हणून एका महिलेने दुसऱ्या महिलेस मारहाण करून जखमी केले. अर्चना नागनाथ मुकूटकर (वय ३५, रा. बाघोली, ता. मोहोळ) असे जखमी महिलेचे नाव आहे. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास [...]
परभणीत शिवसेनेचा महापौर, सय्यद इकबाल यांनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार
परभणी महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदाचा, तर काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख यांनी उपमहापौरपदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सय्यद इकबाल सय्यद खाजा म्हणाले की, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीने शिवसेना नेहमीच सर्व धर्मीय, सर्व जाती-जमातींना एकत्र आणून समाजहित, राष्ट्रहिताचे कार्य करत […]
‘आकांक्षित जिल्हा’ ही ओळख पुसण्याचा संकल्प करूया- जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव (प्रतिनिधी)- संपूर्णता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा अर्थात संपूर्णता अभियान 2.0 चा शुभारंभ आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते साईन बोर्डचे अनावरण व दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या अभियानाचा कालावधी 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026 असा राहणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, अनंत कुंभार आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार म्हणाले की,संपूर्णता अभियान 2.0 अंतर्गत सहा निर्देशांक शंभर टक्के संतृप्त करून यावेळी सुवर्ण पदक मिळविण्याचा निर्धार आहे.‘आकांक्षित जिल्हा’ ही धाराशिवची ओळख या अभियानाच्या माध्यमातून पुसून टाकायची असून त्यासाठी वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी ते तळागाळातील घटकांपर्यंत सर्वांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.जिल्ह्यातील 440 ग्रामपंचायती टी.बी.मुक्त घोषित करण्यात आल्या असून संपूर्ण जिल्हा टी.बी.मुक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. निती आयोगाद्वारे जानेवारी 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला ‘आकांक्षित जिल्हा कार्यक्रम’ हा देशातील 112 मागास जिल्ह्यांच्या जलद विकासासाठी राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास रौप्य पदक तर तालुका कार्यक्रमांतर्गत परंडा तालुक्याला कांस्य पदक मिळाले.या यशात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व चषक देऊन जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी,कृषी अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,मदतनीस व ग्रामसखी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेर येथे जिजाऊ पुरस्काराचे वितरण
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील प्रेरणा सामाजिक संस्था संचलित लिटल फ्लावर्स स्कूल यांच्या वतीने तालुकास्तरीय जिजाऊ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अर्चना रवींद्र अंबुरे, संध्या बाळकृष्ण शिंदे, अनिता बालाजी घोडके, उज्वला मोहन शिंदे, सविता सचिन कन्हेरे यांना मानपत्र व जिजाऊंची प्रतिमा ,शाल श्रीफळ देऊन पुरस्कार वितरण करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद ,विस्तार अधिकारी बापू शिंदे उपस्थित होते. प्रस्ताविक बाळासाहेब घेवारे यांनी केले. तर तर आभार तानाजी पिंपळे यांनी मानले.
Solapur News |मोठे तीर्थक्षेत्र नसूनही शहरात वाढले भिक्षेकरी
सोलापूर स्मार्ट सिटीत भिक्षेकऱ्यांचा वाढता उपद्रव सोलापूर ( अमोल व्यवहारे ) – सोलापूर स्मार्ट सिटीत सुशोभीकरण आणि स्वच्छता करण्यावर कोट्यवधी रूपये खर्च केले केलेत. रस्ते प्रशस्त करण्यासाठी पदपथांवरील अतिक्रमणे हटविली. स्मार्ट सिटीत रस्ते रुंद करूनही ते अरूंद झाल्यासारखेच आहेत. उस्से करूनही स्मार्ट [...]
महिला नगराध्यक्ष असतानाही स्वच्छतागृहासाठी महिलांची फरफट!
धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेच्या घोषणा देत सत्तेत आलेल्या धाराशिव नगर परिषद मध्येच महिलांना मूलभूत स्वच्छतागृहासाठी धावपळ करावी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगर परिषदेत तब्बल 41 नगरसेवक असून सत्ताधारी भारतीय जनता पक्षचे बहुमत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या 11 महिला नगरसेविका विजयी झालेल्या असून नगराध्यक्षपदी देखील महिला आहेत. तरीही नगर परिषद इमारतीत महिलांसाठी सुलभ,आणि स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. दररोज विविध कामांसाठी शेकडो महिला नगर परिषदेत येतात. परंतु वॉशरूमची गरज भासल्यास त्यांना सुविधा उपलब्ध होत नाही. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार स्वच्छता समितीच्या कार्यालया शेजारील एका कोपऱ्यातील खोलीत स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. मात्र ते ठिकाण आडवळणाला असून कोणतेही दिशादर्शक फलक नाहीत. परिणामी, बाहेरून येणाऱ्या महिलांना ती जागा शोधणे कठीण जाते. दरम्यान, नगर परिषदेत इतर विभागांमध्ये हस्तक्षेप करणारे आणि नगराध्यक्ष / अधिकाऱ्यांच्या कानात कुजबुज करून वातावरण तापविणारे म्हणून ओळखले जाणारे ‘कानफुके रील स्टार’ सभापती चौथ्या स्तंभावर आक्षेप घेण्यात पुढे असल्याची चर्चा आहे. मात्र महिलांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही, अशी टीका महिला वर्गातून होत आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या घोषणा केवळ व्यासपीठापुरत्याच मर्यादित राहणार का? बहुमताची सत्ता असतानाही महिलांसाठी मूलभूत सुविधा का उपलब्ध करून दिल्या जात नाहीत? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नगर परिषद प्रशासनाने तातडीने स्पष्ट दिशादर्शक फलक लावून स्वच्छतागृह सर्वसामान्य महिलांसाठी खुले करावे, तसेच केवळ कर्मचारी वर्गापुरते मर्यादित न ठेवता बाहेरील महिलांनाही सुविधा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. महिला प्रतिनिधित्वाचा अभिमान मिरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता घोषणांपेक्षा कृतीतून संवेदनशीलता दाखविण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढायला पाहिजे- गजानन गाडेकर
धाराशिव (प्रतिनिधी)- आपणाला सर्व प्रकारचे ज्ञान मिळण्याचे ग्रंथ व साहित्य हे मुख्य साधन आहेत. ग्रामीण भाग हा वाचनाच्या चळवळीत पहिल्यापासूनच सक्रिय आहे.त्यांची सक्रियता अधिक तीव्र करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ जोमाने वाढायला पाहिजे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर यांनी आज 14 फेब्रुवारी रोजी केले. वाशी शहरात आयोजित धाराशिव ग्रंथोत्सव 2025 अंतर्गत बाल वारकऱ्यांची ग्रंथ दिंडी काढण्यात आली.या दिंडीत विठ्ठल -रुक्मिणी, संत तुकाराम,संत मिराबाई यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,महात्मा गांधी,महात्मा ज्योतिबा फुले,माता सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदी महापुरुषांच्या वेशभूषेत साकारलेली मिरवणूक हे ग्रंथोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव व तालुका ग्रंथालय संघ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. गजानन कोटेवार,वाशी नगर पंचायतच्या नगराध्यक्ष विद्याताई गायकवाड,छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे,मराठवाडा विभागाचे प्रमुख कार्यवाहक राम मेकले,पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विनोद गायकवाड, अजिंक्य विद्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष एस.एल.पवार,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे, निरीक्षक शिवशंकर कटाळे, सुधाकर बुकन आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना अशोक गाडेकर म्हणाले की,सोशल मीडियामुळे तरुण पिढीचा वाचनाकडे कल कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुकास्तरावर ग्रंथोत्सव साजरे करून सर्व प्रकारची पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचे आणि वाढविण्याचे काम समाजाच्या हितासाठी व्हावे,असे त्यांनी आवाहन केले. अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी यांनी ग्रंथालयांमध्ये सर्व प्रकारची पुस्तके,विशेषतः स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.वाचक चोखंदळ असावा आणि वाचकसंख्या वाढावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,असे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी सोशल मीडियाचे दुष्परिणाम तरुण पिढीसमोर मांडण्याची गरज व्यक्त केली. वाचनाच्या माध्यमातून पिढी घडते, तर सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती लोप पावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रा.डॉ.गजानन कोटेवार म्हणाले की, मी महात्मा गांधी यांना प्रत्यक्ष पाहिले नाही;मात्र ग्रंथांच्या माध्यमातून त्यांना आत्मसात केले.तरुणांना वाचनाच्या प्रवाहात आणण्यासाठी गावोगावी ग्रंथालय चळवळ जोमाने उभी राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच शासनाच्या अभ्यासिकांप्रमाणे वाचनालयांमध्येही अभ्यासिका सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी वाशी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून बाल वारकरी विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला.ढोल,हलगी,मृदुंग व टाळांच्या गजरात आणि जनजागृतीपर गीतांच्या निनादात ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक,पारा चौक मार्गे कार्यक्रम स्थळी दाखल झाली.विद्यार्थ्यांनी लेझीम,टिपऱ्या, अभंग व इतर सादरीकरणातून वातावरणात चैतन्य निर्माण केले. ग्रंथोत्सव स्थळी दीपप्रज्वलन करून महामानवांना पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि धाराशिव ग्रंथोत्सव 2025 चे थाटात उद्घाटन झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी केले.सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार लक्ष्मीकांत पवार यांनी मानले.कार्यक्रमास ग्रंथालय चळवळीतील पदाधिकारी,कार्यकर्ते, विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. प्रमोद शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. प्रमोद शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 09:00 वा.करण्यात आले आहे. प्रा.प्रमोद शहा हे ज्येष्ठ अर्थतज्ञ असून सुप्रसिद्ध लेखक आहेत.त्यांनी विविध महाविद्यालयात व प्रसार माध्यमावर व्याख्याने दिलेली आहेत. विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर प्रभावीपणे कार्य केले आहे.अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. याबरोबरच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील केलेले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या ज्वलंत विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख हे असणार आहेत.
काशी विश्वनाथ मंदिरात महाशिवरात्र महोत्सव उत्साहात साजरा
वाशी (प्रतिनिधी)- येथील काशी विश्वनाथ मंदिरात महाशिवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दररोज सकाळी पूजा,शिवलीलामृत,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी भजन,रात्री कीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी(दि.15) पहाटे पासूनच भाविकांनी दर्शन,अभिषेक करण्यास सुरूवात केली. दिवसभर शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतले.यात महिलांची संख्या मोठी होती.दर्शनानंतर शिवरात्र वात लावण्यासाठी महिलांची मोठी संख्या दिसून आली.
ग्रंथांच्या वाचनाने अनेक पिढ्या घडल्या- सहाय्यक ग्रंथालय संचालक
वाशी (प्रतिनिधी)- सोशल मीडियाच्या आहारी जाऊन व्यक्ती आळशी आणि व्यसनाधीन होत आहे परंतु ग्रंथाच्या वाचनामुळे अनेक पिढ्या घडल्याची उदाहरणे असून आजच्या डिजिटल युगामध्ये चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाचनाचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. असे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक यांनी वाशी येथील ग्रंथोत्सव प्रसंगी प्रतिपादन केले. वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये धाराशिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व वाशी तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन (14 व 15 फेब्रुवारी )दिवसीय धाराशिव ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील हुसे होते. याप्रसंगी मंचावर ग्रंथालय संचालनालय,मुंबईचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, यांनी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक राम मेकले, नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड व अजिंक्य विद्या मंदिर शाळेचे संस्थापक एस. एल. पवार,सुहास सरवदे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलाने करण्यात आली. याप्रसंगी गजानन कोटेवार, सुनील हुसे, अशोक गाडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज सकाळी विठ्ठल- रुक्मिणी मंदिरापासून “पुस्तक ग्रंथ दिंडी“ची मिरवणूक ह.भ. प. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या संयोजनाखाली पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमंत ढाकणे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भैरवनाथ कानडे यांनी केले.
उजनी धरणावर नगराध्यक्षांचा पाणी पुरवठा सभापती विना पाहणी दौरा
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरण येथे नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी उपाध्यक्ष, काही नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांसह भेट देत शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. मात्र या दौऱ्यानंतर धाराशिव नगर परिषद सत्ताधारी भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे तसेच गटनेते अमित शिंदे यांना या दौऱ्याबाबत माहिती न देताच पाहणी केली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शहराचा पाणीपुरवठा ज्यांच्या नेतृत्वाखाली चालतो. त्या सभापतींना वगळून दौरा करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याशिवाय पाणीपुरवठा अभियंत्याऐवजी स्वच्छता निरीक्षकांना सोबत नेण्यात आल्यानेही विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नगरपरिषदेत बहुमताने सत्ता स्थापन केल्यानंतरही स्वच्छता, दुर्गंधी, लाईट व्यवस्था आणि आता पाणीपुरवठा अशा विविध प्रश्नांवरून प्रशासन व सत्ताधारी गट वारंवार चर्चेत येत आहे. दरम्यान, या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून भाजपमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना राजकीय गटबाजीची किनार लागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
खुन - मित्रांनी दारू पाजुन केली मारहाण
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्राचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाकाली कला केंद्रावर तमाशा पहायला गेलेल्या एका तरुणाचा त्याच्याच मित्रानी खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे, या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात 5 जणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वडील भागवत मुंडे यांनी तक्रार दिली. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील 37 वर्षीय सतीश मुंडे असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी तो आपल्या काही मित्रांसह धाराशिव जिल्ह्यातील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेला होता. मित्रांनी दारू पाजून बारी पाहण्यासाठी नेले आणि तमाशा पाहून परत जाताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आरोपीनी लाथा बुक्क्यांनी सतीश मुंडे याच्या पोटावर आणि छातीवर मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. शेख आजमुद्दीन, शेख रौफ, संजय गीते, मधुकर इंगळे आणि दत्ता तोंडे अशी आरोपींची नावे आहेत, पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे तपास करीत आहेत. धाराशिव जिल्यातील तुळजाई, पिंजरा, साई, गौरी व कालिका या 5 केंद्रचे परवाने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहेत. त्यातील काही जणाच्या आदेशाला विभागीय आयुक्त यांनी स्थगिती दिली आहे. कागदोपत्री बंद असलेल्या काही कलाकेंद्र पैकी काही छुप्या मार्गाने सुरु आहेत. महाकाली हे एकमेव केंद्र सुरु आहे या केंद्रचा परवाना रद्द करण्याचा पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे मात्र निर्णय झालेला नाही. महाकाली केंद्र बाबत प्रकरण उच्च न्यायालयात सुरु असुन तिथे तारीख पे तारीख सुरु आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हवामान केंद्राची उभारणी
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड अरविंद नगर केशेगाव एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे महाराष्ट्र राज्य साखर संघ मुंबई आणि आकाशवाणी केंद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कारखाना सहकारी क्षेत्रात अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतावर सोईल मोस्चर व हवामान केंद्र उभारणी केली असून, ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करावयाचे शेतकऱ्यांना दाखवण्यात आले चालू असलेल्या मोबाईल ॲप वरती पाठवलेली माहिती कशी पहायची व त्यावर आलेल्या अडीअडचणीचे चर्चासत्र घेण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक किशोर पवार कार्यक्रम प्रसारण अधिकारी आकाशवाणी केंद्र धाराशिव यांनी केले. कार्यक्रमाच्याद्देश पर प्रस्तावना ॲड. चित्राव गोरे चेअरमन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट यांनी केले. उद्घाटन पर मनोगत निवासी उपजिल्हाधिकारी श्रीचरण कडावकर याने करून आपल्या जिल्ह्यामध्ये हा प्रयोग कारखान्याच्या वतीने पुढाकार घेऊन राबविल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी नेहमीच या कारखान्याने आधुनिकतेचा वारसा पुढे चालवल्याबद्दल विशेष कौतुक केले. अध्यक्ष मनोगत मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा. अरविंद दादा गोरे साहेब यांनी कारखान्याने अडीअडचणीवर मात करून काटकसर करून कारखाना ज्या पद्धतीने चालवला त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्याने आपले एकरी उत्पादन वाढविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. प्रमुख मार्गदर्शन वैज्ञानिक अधिकारी व्ही. एस. आय. पुणे माननीय श्री. डॉक्टर समाधान सुरवसे तसेच प्रकल्प समन्वयक कृत्रिम बुद्धिमत्ता अग्रिकल्चर ट्रस्ट बारामती मा. श्री.तुषार जाधव साहेब यांनी चांगल्या पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्या शेतामध्ये जाऊन स्वतः चेअरमन यांनी केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात हा कारखाना सहकार क्षेत्रातला एकमेव सहकारी साखर कारखाना ठरल्याचे आवर्जून गौरव उद्गार काढले. आभार प्रदर्शना मध्ये संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी देशांमध्ये सहकार क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने एक मेगावॅट सोलर प्रकल्प राबवला आणि नावलौकिक मिळविला त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रात एक नंबर ला सहकारी क्षेत्रात अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतावर ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबवून नावलौकिक मिळविला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे मोठे योगदान असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमात सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद, हितचिंतक उपस्थित होते. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी, त्यांचा सर्व स्टाफ महिला कर्मचारी शेतकी मदतनीस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष लगाडे आकाशवाणी केंद्र धाराशिव यांनी केले. शेवटीअल्पो आहार चहापाणी झाले तसेच शेतकऱ्याला येणाऱ्या अडीअडचणीवर प्रश्नावर चर्चासत्र झाले आणि कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीपणे होण्यासाठी सर्वांचे सहकार्या लाभल्याबद्दल कारखान्याच्या वतीने संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातला पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस शेतीमध्ये वापर करणारा आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना ठरला.
मेलडी स्टार्सची साल नया गीत पुराणे मैफिल संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शहारातील मेघ मल्हार सभागृहात कलाविष्कार अकादमी धाराशिव द्वारा पर्व 11 वे साल नया गीत पुराणे या अविट गीतांची मैफिल मेलडी स्टार्सच्या हौशी छंदी गायकांची उत्साहात संपन्न झाली. प्रथम दिप प्रज्वलन संगीत विशारद आनंद समुद्रे, कलारसिक डॉ.अभय शहापुरकर, शंकरराव नळे, महारुद्र मोरे, मुख्यप्रवर्तक युवराज नळे, समन्वयक मुकुंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर 20 गायकांनी बहारदार गीतांचे गायन केले.गणेश वंदना रवींद्र कुलकर्णी, समन्वय मुकुंद पाटील आदींनी सुश्राव्य गायन केले. संगीत मैफिलीचे बहारदार सुत्र संचलन युवराज नळे यांनी केले. तर आभार शेषनाथ वाघ यांनी मानले. प्रतिवर्षी मैफिलीची मेजवानीचा अस्वाद धाराशिवकर रसिक मंडळी घेतला, तसेच याहीवर्षी संगीतप्रेमी रसिक श्रोत्यांची व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. रसिकांची सांगितिक सांस्कृतिक व साहित्यिक भूक भागवण्यासाठी व जिल्ह्यातील विविध प्रकारातील कलावंतांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी कलाविष्कार समूहाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
प्राचीण माणकेश्वर मंदिरात महाशिवरात्र साजरी
भूम (प्रतिनिधी)- तालूक्यातील माणकेश्वर येथील प्राचीन हेमाडपंथी वास्तुशिल्प कलेचा उत्तम नमुना आसलेले सुर्यमुखी महादेव आहे. मंदीराच्या गाभा-यात महादेवाची मोठी पींड आहे महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तानी या ठीकाणी दर्शना साठी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्री महोत्सव श्रीक्षेत्र माणकेश्वर येथील महादेव मंदिर येथे दिनांक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत महाशिवरात्री महोत्सव संपन्न होणार आहे. त्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात कीर्तने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी शालेय विद्यार्थी, तरुण, शिवभक्त व ग्रामस्थांसाठी हरिनाम सप्ताहात शिवकालीन शस्त्राचे भव्य प्रदर्शन तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान भूम व ग्रामस्थ माणकेश्वर यांच्या वतीने करण्यात आले होते. त्याचा देखील लाभ भाविकांनी घेतला. तसेच दैनंदिन कार्यक्रमात दररोज संध्याकाळी किर्तन पहिला दिवस ह.भ.प सतीश महाराज कदम, दुसरा दिवस ह.भ.प संस्कार महाराज खंडागळे, तिसरा दिवस ह.भ.प बालाजी महाराज बोराडे, चौथा दिवस ह.भ.प सुदाम महाराज पालवे, चौथा दिवस ह.भ.प गणेश महाराज अंधारे, पाचवा दिवस ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पाटील असे सर्व कीर्तने संपन्न होतील तसेच दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी कीर्तन होईल तसेच संध्याकाळी ठीक सात वाजता नयनरम्य असा “दीपोत्सव“ संपन्न होईल व दुसऱ्या दिवशी काला झाल्यानंतर महोत्सवाची समाप्ती होईल तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिरावर होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आसे अवाहन हभप गणेश महाराज यांनी केले आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ रखडला
कळंब (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र शासनच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ तालुक्यातील अनेक महिलांना अद्याप मिळालेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहणे, तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांतील त्रुटी यामुळे हजारो लाभार्थी गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला मोठ्या संख्येने प्रस्ताव मंजूर होऊन महिलांच्या खात्यात दरमहा आर्थिक सहाय्य जमा होत होते. मात्र पडताळणीसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आल्यानंतर अनेकांची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही. परिणामी नोव्हेंबर 25 पासून हप्ते थांबल्याची तक्रार लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना सेवा केंद्रांवर वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. ‘सर्व्हर डाऊन’, वीजपुरवठ्यातील अडथळे तसेच तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया रखडत असल्याने महिलांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे. काही महिलांनी आवश्यक कागदपत्रे आधीच जमा करूनही अंतिम प्रक्रिया पूर्ण न झाल्याने लाभ बंद झाल्याचे सांगितले. माहिती भरताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिल्याची चर्चा असून, या कालावधीत ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
भाविकांना उन्हापासून संरक्षणासाठी मंदिर परिसरात पडदे
तुळजापूर (प्रतिनिधी)- हिवाळ्याची थंडी ओसरून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दिवसेंदिवस सूर्याची तीव्रता वाढत असून दुपारच्या वेळेत उष्णतेचा अधिकच त्रास जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मंदिर परिसरात प्रवेश मार्ग तसेच भाविकांच्या वावराच्या ठिकाणी ग्रीन नेट बसविण्यात आले आहेत. या ग्रीन नेटमुळे थेट सूर्यकिरणांचा परिणाम कमी होऊन परिसरात सावली निर्माण होत आहे. त्यामुळे दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना उन्हाच्या कडाक्यापासून मोठा दिलासा मिळत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत व गर्दीच्या दिवसांत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने उन्हामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन मंदिर संस्थानने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेणे हे मंदिर संस्थानचे कर्तव्य मानून अशा सुविधा वेळोवेळी राबविण्यात येत आहेत. ग्रीन नेटच्या माध्यमातून केवळ उन्हापासून संरक्षणच नव्हे तर मंदिर परिसर अधिक शीतल व आरामदायी ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. यामुळे भाविक शांततेत व समाधानाने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊ शकत आहेत. श्री तुळजाभवानी देवींच्या भाविकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान कटिबद्ध आहे.
तुळजापुरात भक्तीचा महापूर; श्री मुद्ग्लेश्वर मंदिरात 21 हजार लाडू व 11 हजार किलो शाबूचा महाप्रसाद
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री मुद्ग्लेश्वर महादेव सेवा समिती तुळजापूर यांच्या वतीने श्री मुद्ग्लेश्वर मंदिर येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल 11 हजार किलो शाबू, 21 हजार राजगिरा लाडू तसेच विविध फळांचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. सकाळी 7 वाजल्यापासून महाप्रसाद वितरणास सुरुवात झाली असून, दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुळजापूर व परिसरातील हजारो भाविकांनी श्री मुद्ग्लेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन उपवास, व्रत-वैकल्य करून श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला. “हर हर महादेव”च्या जयघोषात मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भारून गेला होता. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भाविकांनी अभिषेक, पूजा-अर्चा करून भगवान शंकराच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत सुख-समृद्धीची प्रार्थना केली. सेवा समितीच्या वतीने नियोजनबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महिला, वृद्ध, लहान मुले तसेच दूरवरून आलेल्या भाविकांसाठी स्वतंत्र रांगा व मदत कक्ष उभारण्यात आले होते. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध व सेवाभावी वृत्तीने काम पाहिल्याने कोणताही गोंधळ न होता महाप्रसाद वितरण सुरळीत पार पडले. श्री मुद्ग्लेश्वर महादेव सेवा समिती तसेच मुद्ग्लेश्वर युवा प्रतिष्ठान तुळजापूर यांच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहिमा, गरजूंसाठी मदतकार्य, धार्मिक उत्सवांचे आयोजन अशा उपक्रमांमुळे संस्थेची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने झालेल्या या भव्य महाप्रसाद उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत असून, “सेवा हीच शिवसेवा” या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम तुळजापूरच्या धार्मिक व सामाजिक जीवनात एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या काक्रंबा (सिंदफळ) गट-गणामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले असून भाजपने या मतदारसंघात ऐतिहासिक आणि निर्णायक विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद गटात भाजपचे दयानंद शिंदे यांनी तब्बल 2684 मतांनी दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचा गड सर केला. तर पंचायत समिती गणात भाजपचे किसन देडे यांनी 2942 मतांनी मोठा विजय संपादन केला. याशिवाय सलगरा दिवटी गणात भाजपचे वैभव मर्डे यांनी 703 मतांनी विजय मिळवत भाजपची ताकद अधोरेखित केली. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दुसऱ्या क्रमांकावर राहिली. काक्रंबा गट-गण हा काँग्रेसचा मजबूत किल्ला मानला जात होता. मात्र यंदा भाजपने प्रथमच येथे यश मिळवून इतिहास घडवला आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचा उमेदवार बाहेरील असतानाही काँग्रेसचा उमेदवार स्थानिक होता, तरीही काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर घसरल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उमेदवारीबाबत शेवटच्या क्षणी बदल होणार असल्याची चर्चा होती. काही ठिकाणी अदला बदलपर्यंत चर्चा पोहोचल्याचे बोलले जात होते. मात्र अखेर दयानंद शिंदे यांची उमेदवारी कायम राहिली. दयानंद शिंदे हे संघ परिवाराशी संबंधित असून त्यांच्या उमेदवारीला अखेरच्या टप्प्यात निश्चिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. या गटात भाजपचे दुसरे इच्छुक उमेदवार दत्ता मस्के यांनी मोठी राजकीय “फिल्डींग ” लावल्याचे बोलले जात असून त्याचा थेट फायदा भाजपचे विजयी उमेदवार दयानंद शिंदे यांना झाल्याची चर्चा आहे. तसेच दयानंद शिंदे यांना विजयी करण्यासाठी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे. काक्रंबा गावात मतांची विभागणी; भाजपला मोठा लाभ काक्रंबा गट हा तुळजापूरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असून या गटातील सर्वाधिक मतदार काक्रंबा गावातच आहेत. मात्र याच काक्रंबा गावात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना गटात मतांची विभागणी झाल्याने भाजपला त्याचा मोठा फायदा मिळाला आणि भाजपने मताधिक्य मिळवत गटावर कब्जा केला. या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण विजयी झाले होते. त्यामुळे हा गट काँग्रेसचा सुरक्षित बालेकिल्ला मानला जात होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असता तर भाजपला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला असता, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांत सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि उमेदवारीतील बेबनावाचा फटका थेट आघाडीलाच बसला आणि त्याचा फायदा भाजपने उचलला. सलगरा दिवटी गणात भाजपचे काम निर्णायक ठरले. या मतदारसंघात गट-गणात काँग्रेसचे वर्चस्व मानले जात असले तरी सलगरा दिवटी गणात भाजपचे संघटनात्मक काम मजबूत असल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात होते. त्याचाच प्रत्यय निकालातून आला. सदर जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असतानाही निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती. भाजपकडे उमेदवारीची मागणीही झाली होती शहापूर गटातील शिवसेना शिंदे गटाचे विजयी उमेदवार सुनील बनसोडे यांनी काक्रंबा गटातून भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती, अशी माहितीही समोर आली आहे. राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पहिल्यांदाच झालेला विजय हा केवळ निवडणूक निकाल नसून, तुळजापूर तालुक्यातील आगामी राजकारणाचा नवा अध्याय ठरणार असल्याचे चित्र आहे. सिंदफळ-काक्रंबा गटात भाजपने मिळवलेले यश हे काँग्रेससाठी मोठा धक्का असून भाजपसाठी मोठा आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहे. काक्रंबा गटातील हा विजय भाजपसाठी “गेम चेंजर” ठरण्याची शक्यता असून पुढील निवडणुकांमध्ये याचा परिणाम तालुकाभर दिसून येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Sambhaji Bhide |शक्तिपीठाच्या समर्थनासाठी संभाजी भिडे उतरले मैदानात
सांगलीत शक्तीपीठ समर्थनार्थ शेतकऱ्यांचा भव्य मेळावा सांगली : शक्तीपीठाच्या विरोधानंतर आता सांगली जिल्ह्यात शक्तीपीठाच्या समर्थनात शेतकरी उतरले आहेत.मूळ रेखांकन प्रमाणेच सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ व्हावा, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातले शक्तिपीठ बाधित शेतकरी आता एकवटले असून समर्थनातल्या आंदोलनात शिवप्रतिष्ठानचे [...]
Solapur News : सोलापूरमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
सोलापूरमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा भव्य मोर्चा सोलापूर :अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, तो निर्णय होईपर्यंत दरमहा किमान ३० हजार रुपये मानधन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर योजनाबाह्य कामांचा बोजा टाकू नये, एफआरएस प्रणालीअंतर्गत सुरू असलेले जाचक काम बंद करावे, [...]
Solapur Crime : जाखलेत शेतीच्या बांधाच्या कारणावरून भावानेच घेतला भावाचा जीव
माढा तालुक्यातील अत्यंत धक्कादायक कुटुंबीय हिंसा टेंभुर्णी (प्रतिनिधी ): माढा तालुक्यातील जाखले येथील वस्तीवर शेतीच्या बांधाच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाचा लोखंडी घन व दगडाने मारहाण करून निर्दयीपणे खुन केल्याची धक्कादायक घटना १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली [...]
खारेपाटणमध्ये उलगडला बाराव्या शतकातील नौकायुद्धाचा थरार!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथे तब्बल बाराव्या शतकातील सागरी युद्धाचा जिवंत पुरावा सापडल्याने कोकणच्या इतिहासाला नवे दालन खुलले आहे. कपिलेश्वर व कालभैरव मंदिर परिसरात आढळलेल्या एका वीरगळावर कोरलेले नौकायुद्धाचे दृश्य इतिहास संशोधकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्थानिक अभ्यासक मुरारी भालेकर आणि ऋषिकेश जाधव यांनी इतिहास संशोधक डॉ. अंजय धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सखोल अभ्यासात या वीरगळावर […]
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असून राजपाल यादव यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने राजपाल यादवला एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेची हमी सादर करण्याच्या अटीवर ही सवलत दिली आहे. पुढील सुनावणी 18 मार्चला […]
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर कथित द्वेषयुक्त भाषणाप्रकरणी (Hate Speech) गुन्हा दाखल करण्याची आणि ‘एसआयटी’ (SIT) चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. ‘निवडणुकीच्या तोंडावर थेट सर्वोच्च न्यायालयात येण्याची प्रवृत्ती वाढली आहे’, अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना समज दिली. राजकीय पक्षांना संयमाचा सल्ला प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना […]
अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवणार, सूत्रांची माहिती
28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील विमानाचा ब्लॅक बॉक्स त्यातील डेटा रिकव्हर करण्यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीला नेण्यात आला होता. पण आता हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. टीव्ही 9 मराठीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. याबाबत लवकरच निर्णय […]
लुधियानामध्ये माणुसकीला काळिमा; पोटच्या पाचव्या मुलीला दोन लाखात विकले, आठ जणांना अटक
पंजाबमधील लुधियाना शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलीचा सौदा करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आईसह आठ जणांना अटक केली आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून, यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना लुधियानातील सीएमसी चौकाजवळ घडली. येथे एक […]
हरयाणाच्या गावात 15 दिवसात 12 जणांचा मृत्यू, आरोग्य विभागाने घेतले पाण्याचे नमुने
हरयाणातील पालवाल जिल्ह्यातील चायनसा गावात गेल्या 15 दिवसात पाच विद्यार्थ्यांसह 12 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने हे मृत्यू दुषित पाण्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली आहे. चायनसा गावात पंधरा दिवसांपूर्वी पासून अनेक जण थंडी ताप, सर्दी, अंगदुखी व उलट्यांच्या त्रासाने त्रस्त आहेत. यातील काहींची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वी एकाच […]
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दुपारी अडीच वाजता सुरू होणारे कामकाज महापौरांच्या प्रतीक्षेत रेंगाळल्याने विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. महापौर रितू तावडे सभेला वेळेत उपस्थित न राहिल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. महापौरच शिस्त पाळणार नसतील तर सभागृहाला आणि नवनिर्वाचित नगरसेवकांना शिस्त कशी लागणार? असा जळजळीत सवाल विरोधकांनी उपस्थित केला. आजच्या कामकाजात सभागृह नेता, विरोधी […]
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथे एका निवृत्त सैनिकाने त्याची पत्नी आणि मुलाची बंदूकीने गोळी झाडून हत्या केली. यानंतर त्या सैनिकाने कथोगर-इमलीपूर रेल्वे अंडरपासजवळील रुळावरून येणाऱ्या मालगाडीसमोर झोपून आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतराम पासवान असे त्या निवृत्त सैनिकाचे नाव असून सुनीता वर्मा (पत्नी) […]
Ichalkaranji Cricket Celebration |भारताचा विजयानंतर इचलकरंजीत जल्लोष
भारताच्या विजयाने इचलकरंजीत उत्साहाची लाट इचलकरंजी : आयसीसी टी-२० चषक स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवताच इचलकरंजी शहरात उत्साहाचा अक्षरशः स्फोट झाला. सामना संपताच शहरातील शंभूतीर्थ चौक तसेच प्रमुख रस्त्यांवर क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने जमा झाले. फटाक्यांची [...]
Kolhapur News |आटपाडी खटकाळे मळा परिसरात भरधाव कारची धडक ; एकाचा जागीच मृत्यू
आटपाडीमध्ये भरधाव कारच्या धडकेत शहाजी देशमुख यांचा मृत्यू आटपाडी – आटपाडी मध्ये भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने शहाजी शिवाजी देशमुख (६०) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालक कृष्णा अण्णा बेहेरे (रा. चिंचोली ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा [...]
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. नानपूर गावात एका महिलेने भाजपच्या माजी मंडल अध्यक्षाच्या घरासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. संबंधित नेत्याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले आणि मंदिरात विवाह करूनही आता पत्नीचा दर्जा देण्यास नकार दिला आहे, असा गंभीर आरोप या महिलेने केला […]
Gadhhinglaj Crime |गडहिंग्लज-महागाव: अनैतिक संबंधातून महिलेचा गळा दाबून खून
पैशाच्या वादातून झालेल्या घटनेचा तपास उघडकीस गडहिंग्लज– महागाव येथे सापडलेल्या शिर नसलेला महिलेचा अनैतिक संबंधातून गळा दाबून खून केल्याची घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी संशयित प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी (वय ३४, रा. भडगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले [...]
मुरगूडमध्ये महाशिवरात्रोत्सव उत्साहात साजरा मुरगूड : येथे आज महाशिवरात्रोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. पाटील कॉलनीतील प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाने अप्रतिम देखावा सादर केला होता. या मध्ये नऊ फुट उंचीचे भव्य शिवलिंग विविध प्रकारच्या फुलांच्या माळांनी अच्छादीत केले होते. या [...]
Mahashivratri Festival |मुरगूडमध्ये महाशिवरात्रोत्सव जल्लोषात साजरी
मुरगूड शहरात धार्मिक उत्साहाची लाट कुरुंदवाड ( रवींद्र केसरकर ) – “हर हर महादेव… जय भोलेनाथ!”च्या अखंड जयघोषात खिद्रापूर येथे महाशिवरात्री उत्सवाला भक्तिभावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ऐतिहासिक [...]
पहलगाममध्ये एप्रिलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महायुती सरकारने जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पहलगाम हल्ल्याला दहा महिने होऊनही अद्याप आसावरी यांना नोकरी देण्यात आलेली नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. […]
वैभव सूर्यवंशी 10 वीची परीक्षा देणार नाही, टी20 लीगमध्ये खेळण्याचा निर्णय
बिहारच्या समस्तीपूरचा ‘वंडर किड’ म्हणून ओळखला जाणारा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने यावर्षी 10 वीची बोर्ड परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे. वैभव सध्या सीबीएसई (CBSE) बोर्डाचा विद्यार्थी असून त्याने यावर्षी अभ्यासाऐवजी पूर्णपणे आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या (IPL) सामन्यांसाठी सज्ज होण्यासाठी त्याने हा धाडसी पाऊल उचलले […]
पुढील पाच वर्षात आयटी, बीपीओ क्षेत्र पूर्णपणे नष्ट होईल; अब्जाधीश उद्योजक विनोद खोसला यांचे भाकीत
जगभरात आयटी क्षेत्रात कोट्यवधी लोक काम करतात. मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी क्षेत्रावर संकट कोसळणार असल्याची चर्चा उद्योगविश्वात सुरू आहे. याबाबत आता हिंदुस्थानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक आणि सन मायक्रोसिस्टम्सचे संस्थापक विनोद खोसला यांनी खळबळ उडवणारे भाकीत वर्तवले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पुढील पाच वर्षांत माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ सेवा पूर्णपणे कालबाह्य होतील, असे ते म्हणाले. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने […]
खगोलप्रेमींसाठी २०२६ सालातील सुरुवातीचा काळ अत्यंत खास ठरणार आहे. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे कोणतेही सामान्य ग्रहण नसून ते एक ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ (Annular Solar Eclipse) असेल, ज्याला जगभरात ‘रिंग ऑफ फायर’ म्हणून ओळखले जाते. काय आहे ‘रिंग ऑफ फायर’? कंकणाकृती सूर्यग्रहणादरम्यान चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, परंतु तो सूर्याला […]
चेक बाऊंस प्रकरण : अभिनेता राजपाल यादवच्या जामिनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात फैसला
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव सध्या एका जुन्या चेक बाऊंस प्रकरणामुळे तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत आता सर्वांचे लक्ष दिल्ली उच्च न्यायालयाकडे लागले आहे. राजपाल यादवने आपल्या भाचीच्या लग्नासाठी जामिनाची याचिका दाखल केली असून, त्यावर आज दिल्ली न्यायालय आपला निर्णय देणार आहे. राजपाल यादवच्या भाचीचे लग्न 19 […]
स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी अनेक जण आरोग्य विमा काढतात. जेणेकरून भविष्यात आजारपणासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. असचं लखनऊमधील एका व्यक्तीने आपल्या आईच्या आजारपणासाठी वर्षाला 50 हजार रुपये भरून हेल्थ विमा काढला होता. मात्र जेव्हा त्याचे पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्या विमा कंपनीने ते देण्यास नकार दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर […]
शशी थरूर यांना परराष्ट्र मंत्री व्हायची स्वप्ने पडत आहेत, मणिशंकर अय्यर यांची बोचरी टीका
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी स्वपक्षीयांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मणिशंकर अय्यर यांनी शशी थरूर, पवन खेडा आणि जयराम रमेश यांच्यावर टीका केली आहे. शशी थरूर यांना पुढील परराष्ट्र मंत्री व्हायची स्वप्ने पडत आहेत, असा हल्लाबोल करत मणिशंकर यांनी काँग्रेस केरळमध्ये कधीही निवडणूक जिंकू शकणार नाही, असे भाकीतही वर्तवले. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर […]
राजस्थानच्या भिवाडीत केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; 6 ते 7 मजुरांचा होरपळून मृत्यू
राजस्थानमधील भिवाडी येथे एका केमिकल फॅक्टरीमध्ये आज भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक माहितीनुसार या आगीत 6 ते 7 मजुरांचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अनेक मजुरांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत अजूनही काही […]
अजित पवार यांचा गेल्या महिन्यात 28 तारखेला बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. खंडवा जिल्ह्यातील पंधाना येथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर टेकऑफ दरम्यान अचानक हवेतच गटांगळ्या खाऊ लागले. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये हेलिकॉप्टर जमिनीवरून वर उडताच आधी […]
उत्तर प्रदेशमध्ये धावत्या कारवर पेट्रोल पंपचा पोल पडला, सपा नेत्याचा मृत्यू
उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे पेट्रोल पंपचा 40 क्विंटल वजानाचा पोल एका कारवर कोसळला. या दुर्घटनेत कारचा चक्काचूर झाला असून त्यात बसलेल्या समाजवादी पार्टीच्या नेत्याचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लाल बहादूर यादव असे त्या नेत्याचे नाव असून ते बाबुगंज येथे एका कामानिमित्त गेले होते. रविवारी संध्याकाळी […]
खानापूर तालुक्यात शिवनामाचा जयजयकार
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी : भक्तिभावाने शिवाचे पूजन : दिवसभर विविध कार्यक्रम : आज-उद्या महाप्रसाद खानापूर : खानापूर तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त शिवालयातून शिवनामाचा जयजयकार करत भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने शिवाचे पूजन केले. तालुक्यातील सर्व शिवालयात पहाटेपासूनच अभिषेक, पूजा करण्यात आली. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी शिव मंदिरात गर्दी केली होती. तालुक्यातीलअसोगा रामलिंगेश्वर मंदिर परिसरात, मलप्रभा नदीघाट तसेच स्वयंभू [...]
हब्बनहट्टी स्वयंभू मारुती क्षेत्रावर हजारो भाविकांची उपस्थिती
वार्ताहर/जांबोटी हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीनिमित्त रविवारी हजारो भक्तांनी स्वयंभू मारुती रायाचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी मलप्रभा नदीत पवित्र स्नानाची पर्वणी साधली. हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र हे बेळगाव, गोवा, चंदगड तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवस महायात्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा रविवार व [...]
कडोलीत महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला प्रारंभ
वार्ताहर/कडोली येथील जागृत देवस्थान श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठात बेळगाव नागनूर मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यात्रा महोत्सवाला उपस्थिती दर्शविली. सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठात यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दुरदुंडेश्वर संस्थान [...]
पंचहमी योजनेतून तालुक्याला आतापर्यंत पाचशे कोटीचा निधी
माजीआमदारअंजलीनिंबाळकरयांचीमाहिती खानापूर : काँग्रेसने कर्नाटकात सत्तेत येण्यापूर्वी पंचहमी योजना जाहीर केली होती. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकारने पंचहमी योजना लागू केली. एक हजार दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसने विविध उपक्रम राबवून पंचहमी योजनेत प्रत्येक तालुक्यात किती निधीचा वापर केला गेला. हे जाहीर केले आहे. यात खानापूर तालुक्यात पंचहमी [...]
लाल किल्ला स्फोटामागे ‘व्हाईट कॉलर’दहशतवादी मॉड्यूलचे मोठे षडयंत्र; ‘अंसार अंतरिम’चा पर्दाफाश
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा स्फोट म्हणजे एका मोठ्या देशव्यापी षडयंत्राचा भाग असून, त्यामागे ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला असून सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या तपासातून समोर आले […]
कारवार जिल्ह्यात महाशिवरात्री उत्साहात
मुर्डेश्वर, सज्जेश्वर, धारेश्वरअन्गुणवंतेश्वरयेथेभाविकांचीदर्शनासाठीगर्दी कारवार : दक्षिण भारतातील काशी, भुकैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुराण प्रसिद्ध श्रीक्षेत्र गोकर्णसह जिल्ह्यातील अनेक शिवालयांमध्ये महाशिवरात्री पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गोकर्ण येथील श्री महाबळेश्वर देवालयातील आत्मलिंगच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रींच्या दर्शनासाठी, अभिषेकसाठी गोकर्णमध्ये दाखल झालेल्या भाविकांमध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील भाविकांचा समावेश होता. गोकर्ण [...]
पश्चिम बंगालमधील ७ अधिकारी तडकाफडकी निलंबित; निवडणूक आयोगाची कारवाई, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
पश्चिम बंगालमधील विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत गंभीर गैरवर्तन, कर्तव्यात कसूर आणि वैधानिक अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सात सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना (AEROs) तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार, लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या कलम १३ सीसी (Section 13CC of the RP Act 1950) अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर […]
शुभम शिदनाळेने मारले पिरनवाडी कुस्ती मैदान
वार्ताहर/किणये हलगी रणवाद्यांचा गजर व शेकडो कुस्तीप्रेमी शौकिनांच्या उपस्थितीत महाराष्ट्र येथील हिंदू गर्जना केसरी शुभम शिदनाळे याने रुस्तम ए केसरी मुसा पंजाबला एकलांगी डावावर चितपट करत पिरनवाडी कुस्तीमैदान जिंकले. पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संघटना यांच्यावतीने हजरत शहा सदरोद्यिन अन्सारी उर्फ जंगली पीर उरुसनिमित्त रविवारी सायंकाळी जनता प्लॉट, पट्टण पंचायतीच्या बाजूला असलेल्या आमराईत कुस्ती [...]
हे करून पहा –सकाळी झोपून उठल्यावर प्या कोमट पाणी
हिंदुस्थानात सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याची पद्धत जुनीच आहे. आयुर्वेदात कोमट पाणी पिणे हा अनेक व्याधींवरील उपाय मानला जातो. मात्र, कोमट पाणी जास्त प्रमाणात प्यायला नको. सकाळी उपाशी कोमट पाणी प्यायल्याने जठराग्नी सक्रिय होतो. रात्री झोपेमध्ये आपले पचन तंत्र आराम करत असते. ते सक्रिय होते. कोमट पाणी प्यायल्यामुळे आतडय़ातील विविध क्रिया कार्यान्वित होतात, शरीरातील विषारी […]
जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात
बेळगाव : बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व साई स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा मराठा मंडळ खानापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ साई स्पोर्ट्स अकादमीचे प्रसाद जाधव व राजलक्ष्मी जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे स्केटर आणि त्यांचे पालक मोठया प्रमाणात [...]
असं झालं तर…तुमची ट्रेन सुटली तर परतावा कसा मिळेल?
अनेकदा वाहतूककोंडी किंवा इतर कारणांमुळे लोकांची ट्रेन सुटते. काही जणांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागतो. अशा वेळी प्रवाशांना काही प्रमाणात पैसे परत मिळू शकतात. त्यासाठी ‘टीडीआर’ फाईल करावा लागेल. ऑनलाइन तिकीट बुक करणाऱयांसाठी ही प्रक्रिया आहे. ज्यांनी काउंटरवरून तिकीट घेतले आहे, ते काउंटरवरूनच पैसे परत मिळतील. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अॅपवर लॉगिन करून ‘माय ट्रान्झॅक्शन्स’मध्ये […]
इंडिगो 1,000 हून अधिक पायलटची भरती करणार, ट्रेनीपासून कॅप्टनपर्यंतच्या पदांवर भरती
इंडिगो एअरलाईन्स मोठय़ा प्रमाणावर पायलटची भरती करणार आहे. तब्बल एक हजारांहून अधिक पायलटची नियुक्ती केली जाणार आहे. देशातील विमान वाहतूक क्षेत्रातील कोणत्याही एअरलाइनने केलेल्या सर्वात मोठ्या भरती मोहिमांकैकी ही एक आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंडिगोच्या सर्विसमध्ये मोठा गोंधळ झाला होता. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अवघ्या 7 दिवसांत 5,000 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर […]
मुरगेंद्रगौडा चषक क्रिकेट स्पर्धा : चॉईस, कांतारा बॉईज, डिंगडाँग, नील बॉईज, भावकेश्वरी विजयी
बेळगाव : मुरगेंद्रगौडा पाटील स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित पहिल्या मुरगेंद्रगौडा निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या रविवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात चॉईस इलेव्हनने एस. जी. स्पोर्ट्सचा, कांतारा बॉईजने भिम्सचा, डिंगडाँगने राणी चन्नम्मा कित्तूरचा, नील बॉईज हिंडलगाने फोर्टी प्लस लेजंटसचा, भावकेश्वरी स्पोर्ट्सने सुभाष पाटील इलेव्हनचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. मुजित एन, तुषार देसाई, संकेत रेवणकर, [...]
प्रथमेश-प्रवीणयांच्यातप्रमुखलढत बेळगाव : महाशिवरात्रनिमित्त श्री कलमेश्वर फार्मर्स प्रोसेसिंग सोसायटी, बिजगर्णी व मोनाप्पा भाष्कळ पुरस्कृत भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी 4 वाजता कलमेश्वर मंदिर येथे करण्यात आले आहे. या मैदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. या मैदानातील प्रमुख कुस्ती बेळगावचा उगवता तारा प्रथमेश हट्टीकर, कंग्राळी व महाराष्ट्र केसरी, रौप्यपदक विजेता कुडीगेचा प्रवीण पाटील [...]
तीर्थकुंडेत उद्या कुस्ती मैदान
रोहित– शुभमयांच्यातप्रमुखलढत बेळगाव : तीर्थकुंडे येथे श्री रामलिंगेश्वर देवस्थान कमिटी तीर्थकुंडे आयोजित महाशिवरात्री निमित्त जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन मंगळवार दि. 17 रोजी होणार आहे.सदर मैदानात प्रमुख कुस्ती भारत केसरी रोहित लाडपूर- लल्लू आखाडा वि.शिवगर्जना केसरी शुभम शिदनाळे यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती हरीश कुमार हरियाणा वि. पुण्याचा समीर देसाई यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती उगवता [...]
ठाणे, नवी मुंबईतील भ्रष्टाचार, अरेरावीविरुद्ध मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात रान उठवले आहे. यावरून शाब्दिक चकमक सुरू असताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांना थेट आपल्याविरोधात निवडणूक लढण्याचे आव्हानही दिले होते. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून गणेश नाईक यांना स्वगृही येण्याचे आवाहन केले. दिल्लीत माध्यमांशी बोलताना […]
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे भविष्यात ‘वन-पर्सन’ (एकाच व्यक्तीची) अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी राहील, असा दावा अनेक तज्ज्ञ करत असले तरी OpenAI चे API इंजिनिअरिंग प्रमुख शेरविन वू यांनी मात्र या कल्पनेला छेद दिला आहे. ‘माझ्या सारख्या एकाच व्यक्तीने चालवलेली अब्ज डॉलर्सची स्टार्टअप कंपनीची कल्पना करणे माझ्यासाठी कठीण आहे’, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. […]

25 C