Ratnagiri News –टीडब्ल्यूजे कंपनीच्या नार्वेकर दाम्पत्याला पोलीस कोठडी
गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर तसेच संचालक नेहा नार्वेकर या दांम्पत्याला शनिवारी रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. दोघांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, नार्वेकर दाम्पत्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती गुंतवणूकदाराना समजताच त्यांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. यावेळी कायदा […]
रसगुल्ला घशात अडकल्याने 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, लग्नाकार्यात दुर्दैवी घटना
जमशेदपूर येथील बेलाजुडी पंचायत अंतर्गत येणाऱ्या मलियंता गावात शुक्रवारी रात्री एका लग्नसोहळ्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. लग्नाच्या पंगतीत जेवण करत असताना रसगुल्ला घशात अडकल्याने 41 वर्षीय ललित सिंह यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडले असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ललित सिंह रात्री उशिरा एका विवाह समारंभासाठी गेले होते, जिथे जेवताना हा […]
पाडव्याला आंब्याचा मुहूर्त हुकणार; बाजारात हापूसचा तुटवडा, उत्पादनात 60 ते 70 टक्क्यांनी घट
तापमानात अचानक चढ-उतार, दमट वातावरण आणि थ्रिप्स तसेच तुडतुड्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा कोकणासह राज्यातील आंबा बागांमध्ये मोहोर टिकला नाही. यंदा मोठ्या प्रमाणावर मोहोर असूनही प्रत्यक्षात फळधारणा कमी झाल्याने उत्पादन सुमारे साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत घटल्याचा अंदाज शेतकरी, व्यापारी वर्तवत आहेत. परिणामी सध्या बाजारात हापूस आंब्याचा तुटवडा जाणवू लागला असून दरही गगनाला भिडले आहेत. गुढीपाडवा […]
Israel Iran War –युद्धाच्या सोने-चांदीलाही झळा; आठवड्यात झाली मोठी घसरण
अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध 28 फेब्रुवारीला सुरू झाले. त्यानंतर 2 मार्चला सोने-चांदीच्या दराने मोठी झेप घेतली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्यात मोठी घसरण झाली आणि ते मूळच्याच किमतीवर स्थिरावले. जागतिक अशांतता किंवा युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण सोन्याकडे वळतात. मात्र, यावेळी तसे झालेले नाही. त्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार […]
सोशल मीडियावर सध्या एका 22 सेकंदांच्या हृदयद्रावक व्हिडिओने सर्वांना हेलावून सोडले आहे. गाझियाबादचे रहिवासी हरीश राणा हे गेल्या 13 वर्षांपासून ‘व्हेजिटेटिव्ह स्टेट’मध्ये (नॉन-रिस्पॉन्सिव्ह) अंथरुणाला खिळलेले आहेत. रविवारी सकाळी त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात नेण्यापूर्वी कुटुंबाने त्यांचा निरोप घेतला. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला हरीश यांच्या डोक्यावरून हात फिरवत, “सगळ्यांना माफ कर आणि सर्वांची माफी मागून आता […]
Israel Iran War –इराणने अमेरिकेला जेरीस आणले; ट्रम्प यांच्याकडून चीन, जपान, ब्रिटनची विनवणी
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा 16 वा दिवस आहे. इराणचे युद्ध फार काळ लांबणार नाही, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनानंतर इराण शरणागची पत्करेल, अशी अमेरिका आणि इस्रायलची अपेक्षा होती. मात्र, इराणने या दोन्ही देशांना जशासतसे उत्तर दिले आहे. इस्रायलमध्येही इराणच्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने विध्वंस केला आहे. तसेच 16 दिवस सुरू असलेल्या या युद्धाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही […]
शरण पाटील यांची ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ समितीच्या सह-अध्यक्षपदी निवड
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय धाराशिव /प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आता उमरगा-लोहारा मतदारसंघात अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघनिहाय समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विशेष समिती गठीत केली असून, धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांची उमरगा–लोहारा मतदारसंघासाठी सह-अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. शरण पाटील यांनी यापूर्वीही मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या व्यथा ओळखून ‘शरण पाटील फाउंडेशन’च्या माध्यमातून स्वतःच्या खर्चातून पाणंद रस्त्यांचे मोठे जाळे उभे केले आहे. पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी होणारी शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर करून त्यांनी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या या लोकहिताच्या कार्याची आणि प्रदीर्घ अनुभवाची दखल घेत, तसेच उमरगा–लोहारा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांचा यशस्वी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्याच्या उद्देशाने त्यांची या सह-अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी आणि शेतमाल बाजारपेठेपर्यंत विनासायास नेण्यासाठी हे पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या समितीच्या माध्यमातून आता शासकीय स्तरावर अधिक गतिमान आणि प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उमरगा–लोहारा मतदारसंघस्तरीय समितीत शरण पाटील यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून पुढील सामाजिक कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवले - आमदार कैलास पाटील
धाराशिव : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने 134 कोटी रुपये शेतकऱ्यांना पिक विम्या पोटी वितरीत करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी मात्र ही रक्कम कोणतीही स्थगिती नसताना अडवली आहे. ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांना वितरीत करण्यात यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, 2020 च्या पिकविम्या साठी शेतकरी यांनी न्यायालयीन लढा दिला होता पहिल्यांदा उच्च न्यायालय त्यानंतर सर्वोच्च न्यायालय यामध्ये लढा देऊन हा पिक विमा मिळवण्यात शेतकऱ्यांना मोठं यश आलं होतं. 33 हजार 412 शेतकऱ्यांना 18 हजार प्रमाणे 512 कोटी पिक विमा मिळणार होता. त्यानुसार कंपनीने 288 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले होते उर्वरित 225 कोटी रुपये राज्य सरकारचा हप्ता असून त्यातील 134 कोटी 11 फेब्रुवारी 2026 रोजी मंजूर करून जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केले होते. जिल्हाधिकारी यांनी ही रक्कम जिल्हा कृषी अधीक्षक यांना देणे गरजेचे होते मात्र जिल्हाधिकारी यांनी ही रक्कम वितरित करण्याअगोदर सर्वोच्च न्यायालय येथील सरकारी वकील यांच्याशी पत्रव्यवहार केला. यामध्ये त्यांनी ही रक्कम वितरित करावी का अशी विचारणा केली. सर्वोच्च न्यायालयामध्ये कंपनी एका प्रकरणी गेली असल्याने सरकारी वकिलांनी ही रक्कम वितरित करू नये, असा सल्ला जिल्हाधिकारी यांना दिला. सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या कंपनीला कोणत्याही प्रकरणांमध्ये स्थगिती मिळालेली नाही असे असताना जिल्हाधिकारी यांनी सरकारी वकिलांचे म्हणणं ऐकून ही रक्कम अडकवून ठेवण्याचा उद्देश लक्षात येत नाही. सरकारी वकिलांना भविष्यवाणी कळत असल्यासारखे पुढे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी स्थगिती देणार आहे हे माहिती आहे का असा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत कृषीमंत्री यांना विचारला. 2020 पासून 26 पर्यंत शेतकरी या रकमेची वाट पाहत आहे त्यासाठी न्यायालयीन लढा देत आहे हे सगळं माहीत असून देखील जिल्हाधिकारी यांनी अशाप्रकारे रक्कम अडवून शेतकऱ्यांच्या लढ्याला एक प्रकारे खोडा घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व सरकारी वकील यांची याप्रकरणी चौकशी व्हावी व आलेली रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे.
भरधाव बोलेरोचा तिहेरी अपघात; एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर
तुळजापूर : धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटोदा–करजखेडा परिसरात रविवारी दुपारी भीषण तिहेरी अपघात घडला. लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या बोलेरो वाहनाने प्रथम वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या एम.एच -४५- ए. झेड.५४४९ या नंबच्या बोलेरोने कटडा तोडून तुळजापूरकडे येत असलेल्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात होंडा सिटी कारमधील एकजनाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो गाडी लातूरच्या दिशेने सुसाट वेगाने जात होती. यावेळी मद्यपान केलेल्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरोने पुढे असलेल्या वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर बोलेरो वाहन आणखी वेगाने पुढे जाऊन कटडा तोडून समोरून लातूरच्या दिशेने येणाऱ्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडकली. या समोरासमोर झालेल्या धडकेत होंडा सिटी कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात होंडा सिटी कारमधील जीवन वसंत पाटील (वय ७०) यांचा मृत्यू झाला. तर नित्यानंद मोहन बुके (वय ३५), मोहन बुके (वय ५५), अर्जुन पटुळे (वय ५५) व आणखी एक अनोळखी पुरुष (अंदाजे वय ४०) असे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे हलविण्यात आले आहे.अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही काळ घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे पाठविण्याची व्यवस्था केली. दरम्यान, अपघातामुळे काही काळ तुळजापूर–लातूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पाटोदा–करजखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
IPL 2026 चा थरार 28 मार्चपासून सुरू होत आहे. हा थरार सुरू होण्यापूर्वी पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघ रचनेबाबत चर्चांना उधाण आले आहे. हिंदुस्थानचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने मुंबईच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर आपले मत मांडले असून, सलामीच्या जोडीबाबत संघ व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. हरभजनच्या मते, दक्षिण आफ्रिकेचे दोन स्फोटक फलंदाज रायन […]
धाराशिव / प्रतिनिधी देशभरात घरगुती गॅसची भीषण टंचाई निर्माण तर झालीच परंतु महाराष्ट्रात तर सरकारच्या जनहितविरोधी धोरणामुळे व नाकर्तेपणामुळे प्रचंड गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलेंडर अभावी त्रस्त महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा लॉकडाऊन असल्यासारखी भीती वाटत असल्याची टीका समाजवादी नेते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे. केंद्र सरकारने अमेरिकेसमोर गुडघे टेकल्यामुळे इराणकडून होणारा कच्च्या तेलाचा व गॅसचा पुरवठा खंडित झाला असून याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. एलपीजी गॅसच्या दरात 60 रुपयांनी वाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईच्या गरतेत लोटले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही टंचाई निर्माण झाली असून सरकार युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करत आहे .देशातील कोट्यवधी कुटुंबाच्या घरात स्वयंपाकासाठी गॅसची टंचाई केवळ केंद्र सरकारच्या नियोजनशून्य धोरणामुळे झाली आहे .एकीकडे महाराष्ट्रात तर मुख्यमंत्र्यासह सर्वच मंत्री राणा भीमदेवी थाटात गॅसची टंचाई निर्माण झाली नसल्याच्या थापा मारत आहेत तर दुसरीकडे गॅस एजन्सी बाहेर नोटाबंदीप्रमाणे लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे .स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात तर दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. इंधन व एलपीजीची साठेबाजी होत असल्यामुळे गरीब आणि वंचित घटकांच्या स्वयंपाक घरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असताना महाराष्ट्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे पूर्णपणे धिंडवडे निघाले असून मुख्यमंत्र्यांचे कोणावरही नियंत्रण राहिलेले नाही, त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा न झाल्यास सर्वसामान्य व गोरगरीब जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादनही ॲड भोसले यांनी केले आहे.
इंधन साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई - जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव / प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एलपीजी गॅस,पेट्रोल व डिझेलचा पुरवठा अखंड व सुरळीत राहावा यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आज १४ मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.या बैठकीत अत्यावश्यक सेवांशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी तसेच तेल-गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना इंधनाचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे निर्देश दिले.इंधन साठा,वाहतूक व वितरण व्यवस्थेचा आढावा घेऊन संभाव्य अडचणी वेळेत दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल व एलपीजी पुरवठ्याबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या जिल्ह्यात १४९ पेट्रोल पंप कार्यरत असून विविध कंपन्यांच्या २७ गॅस एजन्सी कार्यरत आहेत.घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी नियमित तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. बैठकीत पेट्रोल पंप व गॅस एजन्सीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.जर अशा ठिकाणी गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित पोलिस निरीक्षकांशी समन्वय साधून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी,असेही सांगण्यात आले.आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. घरगुती गॅसची साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधित पोलिस निरीक्षकांनी त्या ठिकाणी धाड टाकून साठा जप्त करून नियमांनुसार कडक कारवाई करावी,असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.प्रत्येक तालुक्यात घरगुती गॅस वितरणाबाबत तसेच शिल्लक साठ्याबाबत नियमित आढावा घेण्याचेही ठरविण्यात आले. औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसच्या मागणीची नोंद संबंधित जिल्हा गॅस एजन्सी समन्वय अधिकारी यांच्याकडे करावी,असे बैठकीत सांगण्यात आले. यासाठी शासनाच्या edlpg@bharatpetroleum.in, indanecareho@indianoil.in आणि lpg.sbu.head@hpcl.in या ई-मेल आयडीवर मागणी नोंदवता येणार असल्याची माहिती देण्यात आली. आगामी काळात तुळजापूर व येरमाळा येथे होणाऱ्या यात्रांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व व्यावसायिकांना लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने संबंधित तहसीलदारांनी तालुक्यातील मागणीचा आढावा घेऊन ती जिल्हा गॅस एजन्सी समन्वय अधिकाऱ्यांकडे नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या.बैठकीत सर्व निरीक्षण अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तालुक्यातील घरगुती गॅस वितरण व्यवस्था,उपलब्ध साठा तसेच केलेल्या तपासणी कारवाईचा आढावा घेण्यात आला.तसेच पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना गॅस वितरणाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस पोलीस अधीक्षक रितु खोखर, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,समाज कल्याण अधिकारी एस.ए.लमकाने,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे,शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी पी.एम.पांडे,निमा अध्यक्ष डॉ.पंकज शिनगारे,एमएएनजीए वे.अ.अध्यक्ष डॉ.एस.बी.बलकंडे, FOGSI धाराशिवचे सेक्रेटरी डॉ.आय.के.मुल्ला,आयएमए धाराशिवचे डॉ.सचिन देशमुख,जिल्हा गॅस एजन्सी समन्वयक रिझवान पटेल,इंडियन ऑईलचे सेल्स ऑफिसर प्रकाश राठोड तसेच एचपीसीएल ऑईलचे सेल्स ऑफिसर लिखित रेड्डी आदी उपस्थित होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक यांची तेरला भेट
तेर / प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी धाराशिव तालुक्यातील तेर येथील दूरक्षेत्रला भेट देऊन कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयातील पुरातन वस्तूची पहाणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,ढोकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे , पोलीस पाटील फातेमा मनियार,गोरख माळी, राहुल गायकवाड,नरहरी बडवे पूजा चव्हाण, मज्जित मनियार आदी उपस्थित होते.
धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्षास सुरुवात होत असून 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2027 या वर्षांमध्ये महात्मा फुले यांची जयंती वर्षभर शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. वर्षभरासाठी एकच समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा माजी *नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत* यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष *रविकांत गोरे ,* स्वागताध्यक्ष: *दत्ता गोरे माळी* कोषाध्यक्ष: *सौदागर गोरे माळी* सचिव: *अमर माळी* कार्याध्यक्ष: *बळीराम माळी* मिरवणूक प्रमुख: *स्वराज जानराव प्रवीण वाघमारे सचिन दिलपाक* यांची देखील निवड करण्यात आली तसेच मार्गदर्शक व सल्लागार समितीमध्ये *महादेव माळी, संजय माळी, गोविंद गोरे राजाभाऊ माळी, चंद्रशेखर सुरवसे, चंद्रकांत गोरे, पांडुरंग माळी* , मान्यवरांची निवड करण्यात आली. या समितीमार्फत सबंध वर्षभर विविध कार्यक्रमांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणे हा मूळ हेतू असून यामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट देखील वर्षभर दाखवण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्यावर आधारित पुस्तकांचे देखील वाटप करण्यात येणार आहे. पारंपारीक वाद्याच्या सह डॉलबिमुक्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना या महत्वपूर्ण योजनेची शिबिरे आयोजित करून जिल्ह्यातील गोरगरीब लोकांचे प्रमाणपत्र मोफत काढून दिले जाणार आहे. विविध क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे या अशा भरगच्च कार्यक्रमाने वर्षभर महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमांचे आठवण म्हणून व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे महात्मा फुले यांच्यावर लिखित लेख असलेला *क्रांतीसुर्य* हा विशेष अंक प्रकाशित करण्यात येणार आहे क्रांती सूर्याची *द्विशताब्दी* जयंती ऐतिहासिक बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे सर्वानुमते ठरले. जिल्ह्यातील सर्व समाजबांधवानी या जयंती महोत्सवात सहभागी होऊन आणि अनमोल असे योगदान देऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष *पृथ्वीराज चिलवंत* यांनी केले आहे.
धाराशिव - तालुक्यातील वरवंटी येथे मंगळवार, 24 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत वरवंटी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांची सेवा होणार आहे. सप्ताह कालावधीत दररोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायणी, गाथा भजन, महिला हरिभजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सप्ताहाचे यंदा 33 वे वर्ष आहे. गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आयोजित या सप्ताहात 24 मार्च रोजी सकाळी टाळ, मृदंग, वीणा, ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा पूजन जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल. या दिवशी विनोदाचार्य विठ्ठल भुतेकर (आळंदी देवाची) यांची कीर्तनसेवा होणार आहे. दि. 25 मार्च रोजी भागवताचार्य रमाकांत महाराज शास्त्री (आळंदी देवाची) तर दि. 26 रोजी राम नवमीदिवशी सकाळी हभप अभिमन्यू महाराज घाडगे, खुनेश्वर तर रात्री कृष्णकृपांकित अंकिताताई घुले महाराज यांची कीर्तनसेवा होईल. दि. 27 रोजी झी टॉकीज फेम हभप शुभम महाराज वसंतगडकर, दि. 28 रोजी हभप अॅड.पांडुरंग नरहरी लोमटे महाराज यांची कीर्तनसेवा तर रात्री 10 वाजता संदिप मोहिते व अतुल हातेकर यांची भारूडाची जुगलबंदी होणार आहे. दि. 29 रोजी हभप गायनाचार्य शंकर महाराज गवळी (आळंदी देवाची), दि. 30 रोजी हभप शिवदास महाराज जंगले शास्त्री (मोटीवाडी) यांची कीर्तनसेवा होणार आहे. दि. 31 मार्च रोजी हभप रामेश्वर महाराज मते (शहाजानपूर, लोणी) यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर साहेबराव देशमुख यांच्या वतीने महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताह सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वरवंटी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
मातीतल्या माणसांना मोठे करणारे नेतृत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण - डॉ अरविंद हंगरगेकर
परंडा , येथील ग्लोबल हायस्कूल येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई जिल्हा केंद्र धाराशिव यांच्या वतीने ग्लोबल हायस्कूल परंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी वरील प्रतिपादन केले ,यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व या विषयाला अनुसरून पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना यशवंतरावांच्या जीवनाविषयीचा यथोचित वृत्तांत कथन केला. यशवंतरावांचे बालपण,शिक्षण, कौटुंबिक परिस्थिती त्याचबरोबर यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध आयाम समाजाऊन सांगताना ते उत्तम साहित्यिक, अभिजात रसिक, उत्तम राजकारणी, मातृभक्त, माणूस वेल्हाळ व्यक्तिमत्व कसे होते या अनुषंगाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर यशवंतरावांच्या कार्याचा विविधांगी आढावाही त्यांनी समर्पक पद्धतीने आपल्या व्याख्यानातून घेतला. अत्यंत भावनिक शब्दांमध्ये यशवंतरावांचा आणि वेणूताईंचा नाते संबंध त्यांनी उलगडुन दाखविला. सुरुवातीला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे यथोचित स्वागत आणि सत्कार ग्लोबल हायस्कूलच्या वतीने करण्यात आले. नंतर या संस्थेच्या प्राचार्या सौ अशाताई मोरोजकर यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून संस्थेची ध्येयधोरणे स्पष्ट केली. संस्थेच्या सामाजिक कार्याची रूपरेषा सांगितली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जिल्हा केंद्र धाराशिवचे सचिव प्राचार्य डॉ. रमेश दापके यांनी केले. प्रास्ताविकातून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची ओळख करून देतानाच प्रतिष्ठांच्या जिल्हा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. अध्यक्षीय समारोप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र धाराशिवचे अध्यक्ष, जेष्ठ नेते जीवनराव गोरे यांनी केला. अध्यक्षीय समारोपातून त्यांनी यशवंतरावांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगावरती प्रकाश टाकला. त्याचबरोबर जिल्हा केंद्राचा हेतू आणि उद्दिष्टे त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श समोर ठेवून जीवनात वाटचाल करावी असा मूलमंत्रही दिला. कार्यक्रमाचे आभार दिलीप शेरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
बारामतीत पोटनिवडणूक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं; रोहित पवारांचे भावूक पोस्ट
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे. आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचा समावेश आहे. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस […]
वृंदावनी यादव यांचा विधिमंडळामध्ये प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
भुम / प्रतिनिधी तालुक्यातील वालवड येथील महिला शेतकरी श्रीमती वृंदावनी अनिल यादव यांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्त बुधवार दिनांक 11 रोजी महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळ दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीमती यादव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य हजर होते. राज्याच्या कृषी विभागातून पाच कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये धाराशिव लातूर परभणी हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्याच्या लातूर विभागातून भूम तालुक्यातील वालवड येथील महिला शेतकरी वृंदावनी यादव यांची त्यांच्या जिद्द व अपार कष्टाच्या बळावर निवड झालेली आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मदतीने डाळ मिल प्रकल्पाची उभारणी केली असून तो प्रकल्प अध्याप ही सुरळीत कार्यान्वित आहे. त्यांनी महिलांचे संघटन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वृंदावनी यादव यांचे लग्न झाल्यानंतर आठ वर्षातच त्यांच्या पतीचे दुःखद निधन झाले माहेरी व सासरी 18 विश्व दारिद्र्य असताना त्यांच्यावर हा मोठा आघात झाला. त्यांनी तीन लहान मुलांचं पोषण करत स्वतःला सावरत संसाराचा गाडा एकटीने हाकला. सुरुवातीच्या काळात त्यांनी शेतमजुरी केली काही दिवसांनी दहा महिलांना एकत्र करून बचत गट तयार केला. त्या गटाद्वारे लहान लहान कर्ज घेऊन गटाची वाटचाल सुरू केली व त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालू झाला. 2019 मध्ये त्यांनी वाल्मीकेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. त्यामध्ये त्यांनी सोबतीला त्या भागातील विधवा व परित्यक्त्या महिलांना सहभागी करून घेतले. प्रत्येक सभासद महिलेचे हजार रुपये सभासद फी घेऊन त्यांनी एक डाळ मिल चालू करण्याकडे वाटचाल केली. तीन वर्ष कंपनी तोट्यामध्ये चालल्यानंतर देखील त्यांनी धीर न सोडता सोयाबीन खरेदी विक्री, डाळ मिल, भाजीपाला व्यापारात दिमागदार कामगिरी केली. त्यांच्या कंपनीमध्ये सध्या पाच महिला काम करत आहेत. भविष्यात त्यांना 200 महिलांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. आजवर त्यांना अहिल्याबाई होळकर, स्वर्गीय सुषमा स्वराज स्मृती पुरस्कार आणि कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे यासाठी त्यांना लातूरचे कृषी सहसंचालक महेश तीर्थकर, जिल्हा अधीक्षक श्री मोरे, भूम तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे यांचे सहकार्य लाभले. विधिमंडळातील सत्कार दरम्यान उप कृषी अधिकारी कैलास चोरमले, वाल्मिक किशोर ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे सचिव महादेव मोहिते, महिला सभासद सोनिया मोहिते, दादा काटे हे हजर होते.
सबस्टेशनचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा रस्त्यावर उतरणार - बाळासाहेब खरवडे
भुम / प्रतिनिधी गेल्या सहा वर्षांपासून मंजूर असलेले 30 के ही सब स्टेशनचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा 6 एप्रिल रोजी सोलापूर धुळे राज्य रस्त्यावर उपोषण करणारे येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे यांनी दिली आहे याबाबत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की भूम तालुक्यातील गिरवली येथे गेल्या सहा वर्षांपूर्वी 30 केवी सब स्टेशन मंजूर करण्यात आले आहे परंतु सदर सब स्टेशनचे काम अद्याप पर्यंत सुरू करण्यात आले नाही यामुळे डोकेवाडी गिरवली सोन्नेवाडी अंजन सोडा या परिसरातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत तसेच डोकेवाडी तालुका भूम येथील अनेक वर्षापासून नागरिक मागणी करत असलेल्या शंभर एचपी ची विद्युत रोहीत्र ही अद्याप मंजूर केली नाही तेव्हा सदरची विद्युत रोहीत्र ही त्वरित मंजूर करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा येत्या 6 एप्रिल रोजी धुळे सोलापूर राज्य रस्त्यावर गिरवली फाटा उपोषण करणार असल्याचे निवेदन भूम पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब खरवडे यांनी ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली आहे
Detox Water Benefits –डिटॉक्स वॉटर घेतल्याने शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या…
उन्हाळा सुरू झाला आहे. या ऋतूमध्ये शरीराला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्याची आवश्यकता असते. म्हणूनच, अनेकदा आपण आहारात डिटॉक्स वॉटरचा समावेश करतो. पण तुम्हाला माहित आहे का की डिटॉक्स वॉटर प्राशन केल्याने केवळ विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत तर शरीराला इतर फायदे देखील मिळतात. आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल लोकांमध्ये जागरूकता पूर्वीपेक्षा वाढली आहे. विशेषतः उन्हाळ्यात लोक त्यांचे […]
भूमच्या गोलाई चौकात दोन पुतळ्यांमुळे तणाव; पोलिसांचा कडक बंदोबस्त
भूम शहरातील गोलाई चौक येथे दोन महापुरुषांचे पुतळे उभारणीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री ही घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे भूम शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने हालचाल करत कडक बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौक परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परंडा, अंबी आणि धाराशिव येथूनही अतिरिक्त पोलीस पथके बोलावण्यात आली आहेत. दरम्यान, या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून बैठकींचे सत्र सुरू असून सायंकाळपर्यंत चर्चा सुरू होती. शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पक्षांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या गोलाई चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इन्स्टाग्राममध्ये 8 मे पासून होणार नवा बदल; एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड फिचर होणार गायब
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इन्स्टाग्राममध्ये 8 मे पासून मोठा बदल होणार आहे. मेटाच्या या फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर केली जाणारी खाजगी चॅट्स आता खाजगी राहणार नाहीत. कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, इंस्टाग्रामवरील ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड’ चॅट फीचर 8 मे पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या तारखेनंतर […]
अमेरिकेचा मोठा गेमप्लॅन; युद्धाच्या रणांगणात आता AI चॅटबॉटचा वापर होणार
आखाती देशामंध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युद्धात एक मोठे पाऊल टाकले आहे. अमेरिकन संरक्षण कंत्राटदार ‘पॅलंटिर’ने लष्करी विश्लेषकांसाठी एक विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली विकसित केली आहे. यामुळे आता युद्धभूमीवरील रणनीती आखणे अधिक सोपे होणार आहे. ‘ॲन्थ्रोपिक’ (Anthropic) या AI कंपनीच्या सहकार्याने ‘क्लॉड’ (Claude) हा चॅटबॉट पॅलंटिरच्या संरक्षण प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ही […]
PAK Vs BAN –मैदानात सलमान आगाचा रडीचा डाव, ICC ने ताळ्यावर आणत केली कारवाई
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार 128 धावांनी विजय मिळवला असला, तरी हा सामना पाकिस्तानच्या विजयापेक्षा सलमान आगाच्या ‘रन आउट’ वादामुळे अधिक चर्चेत राहिला. नॉन-स्ट्रायकिंग एंडला असताना बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराजने सलमान आगाला धावबाद केले. सलमान क्रीझच्या बाहेर असल्याने मिराजने चपळाईने चेंडू यष्टीवर मारला. या घटनेनंतर सलमानने बांगलादेशने ‘खेळभावना’ […]
निवडणूक आयोगानेच आपल्या लोकशाहीची चेष्टा करून ठेवली आहे; आदित्य ठाकरे यांचा संताप
केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आसाम, केरळ, पद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ मे-जूनमध्ये संपत आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. तर इतर चार राज्यात एका टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पाचही राज्यांची मतमोजणी 4 मे राजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या […]
कोल्हापुरात दररोज ६५ हजार सिलिंडर उपलब्ध कोल्हापुर – संवर्धन कामातून गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीवर परिणाम होऊ नये म्हणून गाभाऱ्याचा दरवाजा बंद केला. त्यामुळे देवीच्या मुळमूर्तीच शनिवारी दिवसभर दर्शन घडले नाही. आता मंगळवार १७ रोजीपर्यंत संवर्धनाचेअंबाबाई मंदिरातील देवीच्या गाभाऱ्याच्या संवर्धन कामाला शनिवारी सुरुवात केली. गाभाऱ्याचा दरवाजा बंद करुन [...]
हँडब्रेक निसटला अन् ट्रेलर भुयारी पुलाच्या बांधकामात घुसला; नागाव फाट्याजवळ भीषण अपघात
नागाव फाटा येथे ट्रेलरचा भीषण अपघात; पुलाची शिरोली -पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाटा येथील हॉटेल हिंदोळा समोरील अंडरपास भुयारी मार्गाच्या पुलाच्या बांधकामावर मालवाहतूक ट्रेलर शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आदळला. सुदैवाने यात कोणतिही जीवित हानी झाली नाही. पण ट्रेलरचे मोठे नुकसान झाले. शिवाय [...]
Election Commission of India –पाच राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; निवडणूक आयोगाची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आसाम, केरळ, पद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ मे-जूनमध्ये संपत आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. तर इतर चार राज्यात एका टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पाचही राज्यांची मतमोजणी 4 मे राजी होणार आहे. आसाममध्ये ९ एप्रिल […]
तब्बल 39 वर्षांनी न्याय; चाकू हल्ल्याच्या गुन्ह्यात आरोपी पुराव्याअभावी निर्दोष
अंधेरीतील साकीनाका परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यातील आरोपीला तब्बल 39 वर्षांनी सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने आरोपीची सुटका केली. पुरेसे पुरावे आणि साक्षीदार उपलब्ध नसल्यामुळे आरोपींवरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीला दोषी धरणे कायदेशीररित्या शक्य नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. 30 सप्टेंबर 1987 रोजी अंधेरीतील […]
जिल्हा परिषद अध्यक्षपदावर महायुतीचा दावा; आबिटकरांचा विश्वास कोल्हापूर – महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाली त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेतही महायुतीची सत्ता स्थापन होईल. महायुतीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होईल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते शनिवारी ताराराणी बचत गटाच्या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रसार [...]
350 कोटी युजर्सचा डेटा धोक्यात! गूगल क्रोमचे ‘झिरो-डे’अलर्ट; तात्काळ करा ‘हे’काम
जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राऊझर्स गूगल क्रोमबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. गूगल क्रोम वेब ब्राउझरला सायबर हल्ल्याचा धोका आहे. यामुळे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) या सरकारी संस्थेने झिरो-डे अलर्ट जारी केला आहे. ब्राउझरमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या असून याचा वापर करून हॅकर्स युजर्सना लक्ष्य करू शकतात. याचा 350 कोटी युजर्सना फटका बसण्याची […]
सेवानिवृत्तीनंतरचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने, नांदेड येथील एमजीएम महाविद्यालयातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने स्वतःला पेटवून घेतले होते. सुनील राधाकृष्ण कुलकर्णी (60) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, मृत्यूशी झुंज देत असताना शनिवारी (14 मार्च) रात्री एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे नांदेड शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त […]
Baramati Bypoll Election –सुनेत्रा पवार बारामतीतून पोटनिवडणूक लढणार
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणारप आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी बारामती मतदारसंघातून अजित पवार निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व त्यांचे पुतणे युगेंद्र […]
. कोल्हापुरात गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही; कोल्हापूर – गेल्या आठवड्यात गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या एजन्सीमध्ये रांगा लागल्या होत्या. मात्र सध्या जिल्हयात गॅस सिलिंडरचा साठा असल्यामुळे शनिवारी एजन्सीमधील गर्दी आणि रांगही कमी झाल्याचे वास्तव दिसून आले. काही एजन्सीमध्ये भावनिक होऊन ग्राहक [...]
मुलीच्या लग्नातील मध्यस्थीवरून वाद; दिघंचीत आई-मुलाला काठीने मारहाण
आटपाडीत काठीने केलेल्या मारहाणीत माय-लेक जखमी आटपाडी -दिघंची येथे काठीने केलेल्या मारहाणीत आई आणि मुलगा जखमी झाले आहेत. याप्रकरणी गावातीलच हणमंत मलाप्पा बंडगर आणि आदेश हणमंत बंडगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत रेखा गंगाराम बंडगर आणि त्यांचा मुलगा सुशांत बंडगर हे जखमी झाले [...]
मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील वाढत्या लष्करी संघर्षामुळे सध्या संपूर्ण जग चिंतेत असतानाच, या युद्धाचे सावट आता जगातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या 98व्या ऑस्कर पुरस्कारावर पसरले आहे. इराण आणि इस्रायलमधील प्रत्येकी दोन चित्रपट या मानाच्या पुरस्कारांसाठी पात्र ठरले असून, एका बाजूला स्फोटांचा थरार सुरू असताना दुसरीकडे कलाकृतींच्या माध्यमातून हा संघर्ष जगासमोर येणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांचे […]
Photo –इंडो-वेस्टर्न स्टाईल सूटमध्ये शहनाज गिलचा किलर लूक, पाहा फोटो
‘बिग बॉस 13’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिल आज केवळ तिच्या निरागसतेसाठीच नाही, तर तिच्या प्रेरणादायी शारीरिक बदलामुळे आणि यशाुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात असताना आपली एक चुलबुली आणि काहीशी भोळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या शहनाजने गेल्या काही वर्षांत स्वतःमध्ये प्रचंड बदल घडवून आणले आहेत. एकेकाळी लोक जिला तिच्या वागण्यावरून कमी लेखायचे, तिनेच आज […]
कष्टकऱ्याचा पोरगा झाला ‘साहेब’! आटपाडीत प्रवीण कोळपेची हत्तीवरून काढली मिरवणूक
प्रवीण कोळपेचा युपीएससी परीक्षेत झेंडा सांगली – सर्वसामान्य कुटुंबातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५८४ व्या रैंकसह ठसा उमटविणाऱ्या मिटकी येथील प्रवीण उत्तम कोळपे याच्या यशाचे अनोखे सेलिब्रेशन आटपाडीमध्ये करण्यात आले. प्रवीण कोळपे यांची हत्तीवरून मिरवणुक काढून आमदार गोपीचंद पडळकर यांनी [...]
LPG च्या टंचाईमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसमोर संकट; अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार
आखाती देशांतील संघर्षामुळे नैसर्गिक वायु आणि इंधन पुरवठ्यावर भीषण पडसाद उमटले आहेत. परिणामी, एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाल्याने देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप केला नाही, तर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढण्याची भीती आहे, असा इशारा ‘असोसिएशन ऑफ इंडियन एन्टरप्रिन्युअर्स’ने (AIE) दिला […]
सांगलीत रमजान ईदची लगबग! खरेदीसाठी बाजारपेठेत मुस्लिम बांधवांची तुडुंब गर्दी
सांगलीच्या शनिवार बाजारात कपडे आणि सुकामेव्याच्या खरेदीसाठी गर्दी सांगली – रमजान ईद यंदा शनिवार २१ रोजी आहे. यानिमित्ताने नमाज पठणचे साहित्य, कपडे आदींची मोठी खरेदी केली जाते. रमजान ईदला आता आठवडा उरला असल्याने, बाजारपेठेत मुस्लीम बांधवांची खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येत आहे. सांगलीच्या शनिवारी आठवडा [...]
सोलापुरातील रंगराज नगरमधील दोन तरुणांचा जागीच अंत सोलापूर : भरधाव कारने कंटेनरला मागून धडक दिल्याने सोलापुरातील विजापूर रोड परिसरात भीषण अपघात झाला. यामध्ये दोघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इमामउद्दीन झियाउल्ला बागवान (वय १९) आणि अमान निसार बागवान (वय २०, दोघे रा. रंगराज [...]
Solapur packaging industry |इराण-अमेरिका युद्धाचा सोलापूरला फटका! पॅकेजिंग उद्योग मोठ्या संकटात
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत कच्च्या मालाचा तुटवडा सोलापूर -इराण-अमेरिका संघर्षाचे पडसाद आता स्थानिक उद्योगांवर उमटू लागले असून सोलापूरमधील पॅकेजिंग उद्योग मोठ्या संकटात सापडला आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या बाटल्या, जार तसेच दूध, तूप, दही, श्रीखंड यांसारख्या डेअरी उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या [...]
पंतप्रधानांच्या मतदारसंघातल्या मंदिरातील अन्नछत्र LPG गॅसअभावी बंद
देशात LPG चा तुटवडा नाही असा दावा जरी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील मंदिरांनाही LPG च्या तुटवड्याची झळ बसू लागली आहे. वाराणसीतील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरातील अन्नछत्र सध्या गॅसअभावी बंद करण्यात आले आहे. वाराणसीतील अन्नपूर्ण देवी मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. गेल्या […]
उत्तर कोरियाने जगाची चिंता वाढवली; अण्वस्त्रवाहक रॉकेट लाँचर्सची केली चाचणी
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाच्या झळांनी जग होरपळत असताना आता उत्तर कोरिया जगाची चिंता वाढवत आहे. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन आणि त्याच्या मुलीच्या उपस्थितीत अण्वस्त्र वाहण्यास सक्षम रॉकेट लाँचर्सची चाचणी केली. या यशस्वी चाचणीमुळे ४२० किमीच्या पल्ल्यातील शत्रू आमच्या मारक क्षमतेत येतील. त्यामुळे आमच्या शत्रूंमध्ये अस्वस्थता पसरली आहे, असे किम जोंग उन म्हणाले. उत्तर कोरियाचे […]
सोलापुरात १७ लाखांचा गंडा घालणाऱ्यावर कारवाई सोलापूर -शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून १७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपक प्रल्हाद मेघाचे (रा. न्यू बुधवार पेठ, सिद्धार्थ चौक, [...]
IPL 2026 आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने साथ सोडली
आयपील 2026 चा यंदाचा सिझन 28 मार्चला सुरू होणार आहे. सर्व संघ सध्या सरावात व्यस्त आहेत. हे सुरू व्हायला अवघे बारा दिवस शिल्लक असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. Once a Dilliwala, always a Dilliwala. Thank you for all the love & roars, KP ❤️ pic.twitter.com/ItiuXWD19Y — Delhi Capitals (@DelhiCapitals) March 15, 2026 केविन […]
Maharashtra weather alert : राज्यात अवकाळीचा जोर! पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’
राज्यात अवकाळी पावसाचा इशारा पुणे – पुणे सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटासह तुरळक ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा यलो अलर्ट राज्यातील काही जिल्ठ्यांसाठी रविवारी देण्यात आला असून, यात सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ठ्यांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी अकोल्यात सर्वाधिक [...]
कॅबिनेट सचिवालयाच्या मंत्रालयांना महत्त्वाच्या सूचना; वाचा सविस्तर…
कॅबिनेट सचिवालयाने मंत्रालयांना प्रमुख प्रस्तावित सुधारणांवर त्यांच्या सूचना, निरीक्षणे आणि टिपणे सादर करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ‘पीटीआय’ला (PTI) दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, पुढील दशकासाठी त्यांच्या सुधारणांच्या प्रमुख तीन प्राथमिकतांमध्ये निरंतर संरचनात्मक सुधारणा, नाविन्याचा (Innovation) सखोल विस्तार आणि प्रशासनाचे अधिक सुलभीकरण यांचा समावेश असेल. आता कॅबिनेट सचिवालयाने मंत्रालयांना प्रमुख प्रस्तावित […]
Iran Israel War –दुबई आणि कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले, तेल विहिरींना लक्ष्य केल्याने आखातात खळबळ
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने 16 व्या दिवशी अत्यंत भीषण वळण घेतले आहे. इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कुवेतच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवत युद्धाची व्याप्ती वाढवली आहे. आज इराणने दुबईतील प्रसिद्ध मरीना आणि अल सिफौल परिसरात शक्तिशाली स्फोट घडवून आणले. या हल्ल्यानंतर आखाती देशांमधील महत्त्वाच्या फुजैराह तेल टर्मिनलवरील कामकाज पूर्णपणे बंद करण्यात […]
उपाध्यक्ष पदाचे उमेदवार महेश देशमुख यांनी विजयी उमेदवार यांचा केला सत्कार धाराशिव उमरगा – राज्यभरात जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक संपन्न होत आहेत. काल धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक निकाल लागले.निवडणूक काळात राज्यात पक्ष आणि अनेक उमेदवार आमनेसामने ठाकले होते.प्रचारात हा संघर्ष वाढला होता.आरोप-प्रत्यारोप होत [...]
आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्रभर बाईकचे इंजिन सुरू ठेवणे एका कुटुंबाच्या जीवावर बेतले आहे. बाईकच्या धुरामुळे घरामध्ये कार्बन मोनोऑक्साइड वायू पसरल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये आजोबांसह दोन नाती आणि एका नातवाचा समावेश आहे. पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुंगानूर शहरातील त्यागराज स्ट्रीटवर मुरली […]
शाळेत यायला दोन मिनिटे उशीर झाला, पहिलीच्या विद्यार्थ्याला दोन तास उन्हात उभं केलं
शाळेत यायला केवळ दोन मिनिटे उशीर झाला म्हणून पहिलीच्या विद्यार्थ्याला दोन तास कडक उन्हात उभं केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बंगळुरूतील येलहंका येथील एका खासगी शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी बंगळुरू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. येलहंका अटूर लेआउट येथील एका शाळेत माणुसकीला कळीमा फासणारा हा […]
NCMC smart card ST bus |उमरगा आगारात ज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्डसाठी गर्दी
उमरगा आगारात एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची गर्दी धाराशिव उमरगा – राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) स्मार्ट कार्ड सेवा सुरू केली आहे. त्यामुळे उमरगा आगारात गेल्या काही दिवसांपासून या कार्डची नोंदणी प्रकिया सुरू आहे. दररोज २०० ते २५० प्रवासी [...]
Ramzan Eid market prices |रमजान ईदपूर्वी शिरखुर्मा साहित्य महाग; दरात 20 टक्क्यांची वाढ
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ड्रायफूट्स खजूर शेवया सह इतर वस्तूही महागल्या उमरगा धाराशिव : रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शीरखुर्मासाठी लागणाऱ्या तसेच इतर वस्तूंच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशभरात मोठ्या संख्येने साजरा होणारा सण म्हणजे मुस्लिम समाजाचा रमजान ईद. मुस्लिम समाजातील नागरिक या काळात महिन्याभराचा उपवास करतात. रमजान [...]
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस वाढत चालले आहे. इराणकडून आखाती देशांध्ये सातत्यांने क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक विधाने केली. आता पुन्हा एकदा इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनींबाबत मोठा दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, मुज्तबा सध्या जिवंत आहेत की नाही, याची कोणालाच खात्री नाही. ते बऱ्याच काळापासून सार्वजनिकरित्या […]
Israel Iran War – इराणचा होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठा निर्णय; तेल व्यापारासाठी घातली मोठी अट
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील वाढत्या युद्धामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग असलेला होर्मुझची सामुद्रधुनी सध्या अतिशय संवेदनशील बनला आहे. इराणने या मार्गावर लष्करी नाकेबंदी केल्यामुळे हजारो तेलवाहू टँकर्स आणि मालवाहू जहाजे समुद्रात अडकून पडली आहेत. त्यातच आता ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’तून तेल टँकरच्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इराण एका नवीन धोरणाचा विचार करत आहे. इराण या मार्गावरून मर्यादित […]
लग्न मोडल्याच्या रागातून तरुणीला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचले; हैदराबादमधील धक्कादायक घटना
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्याच नातेवाईक असलेल्या तरुणीला जबरदस्तीने एचआयव्ही (HIV) संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले आहे. या अघोरी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी […]
Meta करणार मोठी कर्मचारी कपात! AI मधील गुंतवणूक वाढल्याने १५,००० हून अधिक जणांच्या नोकऱ्या धोक्यात
फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची पॅरेंच कंपनी Meta पुन्हा एका मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. जवळपास १५ हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मार्क झकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील ‘मेटा’ कंपनी आपल्या सर्वात मोठ्या कर्मचारी कपातीची तयारी करत आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या सुमारे २०% कर्मचाऱ्यांवर ही टांगती तलवार आहे. सध्या मेटाकडे सुमारे ७९,००० कर्मचारी […]
देशाला संबोधित करणाऱ्या व्हिडीओत नेतान्याहूंचा AI अवतार? कुछ तो गडबड है!!!
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूं यांनी 12 मार्च रोजी एका व्हिडीओद्वारे देशाला संबोधित केले होते. त्यांच्या या संबोधनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातील एक गोष्ट नेटकऱ्यांना खटकली आहे. त्यामुळे नेटकरी सध्या ‘कुछ तो गडबड है!” असं म्हणत आहेत. त्यातच नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याच्या देखील वावड्या उठत आहेत. नेमके प्रकरण काय? 12 मार्च रोजी […]
Assam Assembly Election 2026 –आसाम विधानसभा निवडणूक, ‘आप’कडून 14 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
आसामसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून रविवारी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. आसाममध्ये 126 जागांसाठी अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. ‘आप’ने आसाम निवडणुकीसाठी आपली 14 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अप्पर, सेंट्रल आणि लोअर आसाममधील मतदारसंघांचा समावेश आहे. ‘आप’चे आसाम राज्य प्रभारी राजेश शर्मा यांनी ही […]
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. इराण माघार घेण्यास तयार नसून अनेक वर्षे युद्ध लढण्याची आमची क्षमता असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. मात्र, आता इराण चर्चेसाठी तयार आहे. त्याला आता खूप उशीर झाला आहे. त्यांनी बिनशर्त शरणागती पत्करावी, तरच हे युद्ध थांबेल. आम्ही इराणच्या कोणत्याही अटी मान्य करणार नाही, त्यामुळे शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही, […]
अरे भावा, शेजारील देशांवर हल्ले थांबवा! ‘हमास’ची इराणला विनंती
मध्यपूर्वेतील इराणवर अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराण चवताळला आहे. अमेरिकेला मदत करणाऱ्या, अमेरिकेला लष्करी तळासाठी जागा देणाऱ्या शेजारील राष्ट्रांवर इराणने हल्ले चढवले. अर्थात हे हल्ले अमेरिकी तळांवर असले तरी त्यामुळे मध्यपूर्वेतील देशांमधील जनजीवनावर प्रचंड मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. त्याच बरोबर पॅलेस्टाइनच्या ‘हमास’ संघटनेला मदत करणाऱ्या देशांमधील तळांवर देखील इराणने हल्ले केल्यानंतर हमासला मिळणारी मदत देखील प्रभावित […]
नेत्यानाहू जिवंत असतील तर.. शोधून काढू, ठार मारू! इराणचा इस्रायलला थेट इशारा
”जर तो लहान मुलांना मारणारा जिवंत असेल तर त्याला शोधून ठार मारू”, अशी धमकी इराणने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना दिली आहे. शनिवारी नेत्यानाहू यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यानंतर इस्रायलने नेत्यानाहू यांच्याबाबत पसरत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. त्यानंतर इराणने ही धमकी दिली आहे. ”जर तो लहान मुलांना मारमाणारा जिवंत […]
धडाम.. बूम.. मुळे व्रूमSs व्रूमSss बंद! आखातातील युद्धामुळे F1 रेस रद्द
आखाती देशांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याचा परिणाम तिथल्या देशांमधील जनजीवन विस्कळीत होण्यावर झाला आहे. आता तर जगप्रसिद्ध F1 कार रेस देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धामुळे जागतिक क्रीडा विश्वावरही त्याचे गडद सावट पसरले आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या फॉर्म्युला वनच्या बहरीन ग्रँड प्रिक्स आणि […]
अमेरिकेबरोबर हिंदुस्थाननेने केलेला व्यापार करार हीच देशाची बदनामी, संजय राऊत यांची टीका
काँग्रेस देशाची बदनामी करतेय, या भाजपच्या आरोपावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”सर्वात आधी नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवावं. प्रेसिडन्ट ट्रम्प यांच्या दबावाखाली अमेरिकेबरोबर हिंदुस्थाने केलेला व्यापार करार ही देशाची बदनामी. ट्रम्प आपल्याला सांगतायत की तेल कुणाकडून खरेदी करायचे, याला सन्मान म्हणायचा की […]
भारती आचरेकर पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर, ‘या’मालिकेत साकारणार मुख्य भूमिका
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर भूमिका साकारणार आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर 16 मार्चपासून संध्याकाळी 7 वाजता ‘मी जिंकून घेईन सारं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत भारती आचरेकर ‘बाई आजी’ या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कधी कधी जोडलेली नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात. याच […]
दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाची हजेरी; उष्णतेपासून नागरिकांना मिळाला दिलासा
डोंगराळ भागात सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभामुळे राजधानी दिल्लीसह संपूर्ण एनसीआरच्या हवामानात सलग दुसऱ्या दिवशी मोठा बदल पाहायला मिळाला. रविवारी सकाळी दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यापूर्वीच पावसाचा इशारा देत ‘यल्लो अलर्ट’ जारी केला होता. रविवारी सकाळपासूनच राजधानीत […]
Satara political news |साताऱ्यात भाजप आक्रमक! राहुल गांधींविरोधात शिवतीर्थावर जोरदार घोषणाबाजी
साताऱ्यात शिवतीर्थ येथे भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन सातारा – सातारा शहरातील शिवतीर्थ येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी Rahul Gandhi यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत “राहुल गांधी यांचा निषेध असो”, “काँग्रेसचा निषेध असो” अशा घोषणा देत परिसर दणाणून [...]
दुचाकी कॅबला किंचीत धडकली अन् संतप्त चालकाने केली हत्या; मालाडमधील धक्कादायक घटना
मुंबईतील मालाड परिसरात रस्ते अपघाताच्या किरकोळ वादातून एका 25 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड येथील इनॉर्बिट मॉलजवळील लिंक रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी कॅब चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या एका प्रवाशाला अटक केली आहे. शारिक अन्सारी असे मृत तरुणाचे नाव असून तो मालवणी येथील रहिवासी होता आणि […]
Satara news |साताऱ्यात ‘बहुरूप्या’ची वाहतूक पोलिसांची हजेरी; शिवतीर्थ परिसरात रंगली चर्चा
साताऱ्यात शिवतीर्थ चौकात बहुरूप्याने घेतली वाहतूक पोलिसांची ‘हजेरी’ सातारा : शिवतीर्थ येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. सातारा शहरातील नेहमी गजबजलेल्या या चौकात ड्युटीवर उभ्या असलेल्या वाहतूक शाखेच्या जवानांची हजेरी एका ‘बहुरूप्या’ने घेतल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या [...]
देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज (ता. १५, रविवार) दुपारी ४ वाजता तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा करणार आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या या पत्रकार परिषदेनंतर संबंधित राज्यांमध्ये तात्काळ ‘आदर्श आचारसंहिता’ लागू होईल. निवडणूक आयोगाची जय्यत तयारी मुख्य […]
46 टक्के हिंदुस्थानींची झोप अपुरी
जलद जीवनशैली, रात्री उशिरापर्यंत मोबाईल-लॅपटॉपची स्क्रीन पाहणे आणि वाढत्या मानसिक तणावामुळे अनेक जणांना पुरेशी झोप मिळत नाही. ऑनलाइन सर्वेक्षण प्लॅटफॉर्म लोकल सर्कल्सच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, 46 टक्के हिंदुस्थानींनी सांगितले की, गेल्या 12 महिन्यांत त्यांना दररोज 6 तासांपेक्षा कमी अखंड झोप मिळाली. झोप ही आजच्या काळातील एक मोठी, पण सर्वात दुर्लक्षित आरोग्य गरज बनली आहे. लवकर झोपणे-लवकर […]
व्होडाफोन-आयडियाचा हिस्सेदार व्हायला दिग्गज कंपन्या इच्छुक
दोन मोठय़ा कंपन्या व्होडाफोन आयडियामधील भागीदारी खरेदी करण्यास इच्छुक आहेत. सिंगापूरची कंपनी एसटी टेलिमीडिया आणि जेएसडब्ल्यू ग्रुप या कंपन्या टेलिकॉम कंपनीचा काही हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. केंद्र सरकारकडे सध्या व्होडाफोन आयडियाचा सर्वाधिक हिस्सा आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या आर्थिक दिलाशानंतर गुंतवणूकदारांचा व्होडाफोन आयडियामधील रस वाढला आहे. व्होडाफोन आयडीया कंपनीची 16 आणि 17 मार्च रोजी सिंगापूर […]
साताऱ्यात महिला पोलिसांचा जोगवा नृत्याविष्कार सातारा – सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या RESILIENCE 2026 या सांस्कृतिक कार्यक्रमात दहिवडी उपविभागातील महिला पोलिसांनी पारंपरिक जोगवा नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात म्हसवड पोलीस ठाण्यासह दहिवडी व वडूज [...]
गॅस टंचाईचा कुस्ती आखाड्यांवर परिणाम सातारा ( फिरोज मुलाणी) – सातारा शहरातील गोलबाग ते देवी चौक या राजपथावरील सुरू होणाऱ्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून नागरिक व व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी [...]
आखाती देशांतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर गंभीर परिणाम झाले आहेत. अनेक देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्याने किंवा निर्बंध लादल्याने हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीच्या विमानतळ प्राधिकरणाने (यूएई) जारी केलेल्या नव्या सूचनांनंतर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या उड्डाणांवरही मोठा परिणाम झाला आहे. एअरलाईन्सला 15 मार्च 2026 रोजी नियोजित अनेक […]
Iran Israel War –केवळ मजेसाठी इराणच्या बेटाला पुन्हा एकदा लक्ष्य करू शकतो –डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी कोणते विधान करतील याचा भरवसा नाही. आखाती देशांमधील संघर्षाने आता अत्यंत भीषण वळण घेतले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ताज्या वक्तव्याने युद्धाची ठिणगी अधिकच पेटली आहे. अमेरिकेने केलेल्या एका मोठ्या लष्करी कारवाईत इराणच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खार्ग बेटाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प […]
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा मृत्यू? PMO कार्यालयाने दिली महत्त्वाची माहिती
अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या युद्ध कधी थांबेल ते सांगता येत नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. यातच आता इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा देखील मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्यांचे नेत्यानाहू यांच्या […]
शहीद बाळकृष्ण निकम अमर रहे! पिंपळोशीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पाटण तालुक्यातील पिंपळोशी येथील शहीद जवान बाळकृष्ण विलासराव निकम (वय 41) यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी पिंपळोशी गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दल व पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले, तर हजारो उपस्थितांचा कंठही दाटून आला. यावेळी ‘शहीद बाळकृष्ण निकम अमर रहे’च्या घोषणांनी सारा […]
‘एक्स’वर डिजिटल पेमेंटही होणार, एलॉन मस्क घेऊन येताहेत ग्लोबल सुपर ऍप
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हे संपूर्ण जगासाठी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ‘ग्लोबल सुपर ऍप’ बनवण्याच्या तयारीत आहेत. ‘एक्स’वर येत्या काळात मेसेजिंग, सोशल मीडिया, शॉपिंग, पेमेंट आणि व्हिडीओ कॉलिंग आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी मस्क प्रयत्नशील आहेत. यासाठी ‘एक्स मनी’ची मोठी तयारी सुरू असून, पुढील महिन्यापासून याचे बीटा व्हर्जन लॉन्च केले […]
Receipe –चारशे वर्ष जुनी शिवकालीन भत्कम पुरणपोळी
भत्कम पुरणपोळी म्हणजे तांदळाच्या पीठापासून बनवलेली पारंपारिक पुरणपोळी. या पुरणपोळीचा उल्लेख शिवकालीन काळात झाला आहे. साहित्य – तांदूळ, मीठ, तूप, गूळ, तांदळाचं पीठ, जायफळ कृती – तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतले. तांदूळ वाळल्यानंतर तुपात भाजून घ्या व नंतर मिक्सरमधून त्याची भरडी करा. त्यानंतर कढईत तूप घालून ती भरड टाका, त्यात गरम पाणी व किसलेला गूळ […]
पत्नी काळी जादू करत असल्याच्या संशयातून भंगार विक्रेत्या पतीने तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील धारावी परिसरात उघडकीस आली आहे. सूरजबेन अमृत सोलंकी असे मयत पत्नीचे तर अमृत मेघा सोलंकी असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने मुलाला व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी धारावी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला […]
गुढीपाडव्याला अयोध्येत श्रीराम यंत्राची स्थापना
प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी पुन्हा एकदा सुवर्ण क्षणांची साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या 19 मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राममंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या गर्भगृहात श्रीराम यंत्राची विधीवत स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी नऊ दिवसीय अनुष्ठान सुरू झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. श्रीराम यंत्र गेली दोन वर्षे मंदिर परिसरात सुरक्षित […]
एपीएमसीत सडतोय रोज 130 गाड्या भाजीपाला; गॅसचा तुटवडा, पालिकेची फेरीवाल्यांवर कारवाई
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक गॅसचा निर्माण झालेला तुटवडा आणि महापालिकांनी फेरीवाल्यांवर सुरू केलेल्या कारवाईचा मोठा फटका एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटला बसला आहे. या मार्केटमध्ये दररोज भाजीपाल्याच्या सुमारे 130 गाड्या शिल्लक राहत असून उकाडा वाढल्यामुळे हा भाजीपाला सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मालाला उठाव नसल्याने भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. […]
शिपिंग कंपन्यांच्या लुटमारीमुळे निर्यातदार त्रस्त
अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जेएनपीए बंदरात मागील १३ दिवसांत केळी, द्राक्ष, डाळिंब, कांद्याचे १ हजार २०० कंटेनर अडकून पडल्यानंतर शिपिंग कंपन्यांनी निर्यातदारांची लुटमार सुरू केली आहे. पूर्वी एक कंटेनर हाताळण्यासाठी ८०० डॉलर्स घेतले जायचे. मात्र आता हा खर्च थेट आठ हजार डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आला आहे. युद्ध परिस्थितीमुळे जेएनपीए बंदरातून आखातातील निर्यात पुरती ठप्प […]
देशात डेटा सेंटर्सची विजेची मागणी 800 टक्के वाढेल; 2031-32 पर्यंत 13.56 गिगावॉटची गरज
देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि डिजिटल सेवांच्या वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्सची विजेची मागणी वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. 2031-32 पर्यंत डेटा सेंटर्सकडून विजेची मागणी 13.56 गिगावॉटपर्यंत पोहोचू शकते. सध्या देशात डेटा सेंटरची क्षमता वेगाने वाढत आहे. ही 2020 मध्ये 375 मेगावॉट होती, जी 2025 पर्यंत वाढून सुमारे 1,500 मेगावॉट झाली आहे. पुढील सुमारे 7 वर्षांत विजेची […]
पालघरमध्ये तीन मित्रांना मालगाडीने चिरडले, संशयास्पद मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
रेल्वे ट्रॅक ओलांडताना तीन मित्रांना मालगाडीने चिरडल्याची हृदयद्रावक घटना पालघरमध्ये घडली आहे. हे तीनही युवक पालघर पूर्वेकडील विरेंद्रनगर परिसरात राहणारे होते. मात्र या मुलांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्वप्नील पालांडे (23), कुणाल दुबळा (23) व अफरोझ शेख (28) अशी मृतांची नावे असून ते पालघर पूर्वेतील […]
तारापूर एमआयडीसीतील कारखाने बंद पडण्याची भीती, युद्धामुळे क्रूड ऑइल, सॉल्व्हेंट्सला दरवाढीचा फटका
इस्त्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता औद्योगिक क्षेत्रालाही बसू लागला आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर एमएसएमई स्वरूपातील केमिकल उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रूड ऑइलचा पुरवठा इराणमधून होतो. युद्धामुळे हा पुरवठा बंद झाल्याने क्रूड ऑइल आणि सॉल्व्हेंट्सच्या दरात सुमारे 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कारखाने अडचणीत […]
तीन हजारांना विकलं जातंय ‘धुरंधर 2’ चे तिकीट
रणवीर सिंह आणि आदित्य धर यांचा बहुप्रतिक्षित ऍक्शन चित्रपट ‘धुरंधर 2ः द रिव्हेंज’ सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची ऍडव्हान्स बुकींग सुरू झाली आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये तिकिटांचे दर गगनाला भिडले आहे. बुक माय शोवरून असे दिसून आलेय की, मुंबईतील काही थिएटर्समध्ये एका तिकिटाची किंमत 3100 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीतही […]
राष्ट्रीय महामार्गावरून वारंवार प्रवास करणाऱ्या आणि वार्षिक टोल पास वापरणाऱ्या प्रवाशांच्या खिशावरचा भार वाढणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गावर मिळणारा वार्षिक टोल पास महाग होणार आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) वार्षिक टोल पासच्या किमतीत वाढ केली आहे. आता 1 एप्रिलपासून वाहनधारकांना या पाससाठी 3,000 रुपयांऐवजी 3,075 रुपये मोजावे लागणार आहेत. टोल […]

27 C