आरोंदा येथील अमित निवजेकर ३ जिल्ह्यांतून तडीपार
वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कारवाई सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या कारवाईनुसार सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१, रा. आरोंदा) यास कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश मंजूर करण्यात आला आहे.सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर दोन पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली त्यास गोवा [...]
सोलापुरात पोक्सो प्रकरणात न्यायालयाचा कडक निर्णय सोलापूर -अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास विशेष न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी २० वर्षे सक्त कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.राजकुमार सायबु खेत्री (वय २३, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव [...]
‘बॉक्सवेल’कामामुळे इन्सुली परिसर बनला अपघातांचे केंद्र
कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली ; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी बांदा मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे सुरू असलेल्या ‘बॉक्सवेल’च्या कामामुळे हा परिसर सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. संबंधित कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महामार्ग विभाग अजून किती बळींची वाट पाहत [...]
पंढरपूर ड्रीम प्रोजेक्टबाबत प्रशासन ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत पंढरपूर -गेल्या चार वर्षांपासून कॉरिडॉरचे वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसरातील स्थानिकांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याचाचत नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या सल्ल्यानुसारच कॉरिडॉर करू, अशी भूमिका घेतली आहे. [...]
तो अभिनेता म्हणून उत्तम, परंतु भूमिकेसाठी अयोग्य; ‘शक्तिमान’ने मारली रणवीर सिंगच्या नावावर फुली
नव्वदीच्या दशकात छोट्या पडद्यावरील शक्तिमान हा सुपरहिरो अनेकांच्या मनपसंतीस उतरला होता. एक काळ होता जिथे अनेकांचे बालपण शक्तिमानच्या कथा पाहण्यात गेले होते. याच सुपरहिरो शक्तिमानवर चित्रपट बनवण्यात येणार होता. गेल्या दोन वर्षांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. परंतु शक्तिमानच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड मात्र झाली नव्हती. आता मात्र यासंदर्भात एक रंजक माहिती समोर येत आहे. या […]
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघात झालेला सामना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या लढतीत हैदराबादचा नवखा गोलंदाज साकिब हुसैन याच्या गोलंदाजीवर शिवम दुबे बोल्ड झाला. दुबे बाद होण्यापूर्वी एका चाहत्याने मैदानावर लिंबू फिरवला होता असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे विजयासाठी […]
सौर कृषीपंपाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- सौरकृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुशंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरणने सोमवार ( दि.20 एप्रिल ते 22 एप्रिल) पासून उपविभागीय कार्यालय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन केले आहे. नवीन सौर कृषीपंपासाठी कसा अर्ज करायचा यासाठी तसेच सौर कृषीपंपाबाबत तक्रार असलेल्या लाभार्थ्यांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. धाराशिव शहर व ग्रामीण उप विभागांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी तसेच कळंब उपविभागातील लाभार्थ्यांसाठी सोमवारी (दि.20 एप्रिल) उपविभागीय कार्यालयात सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. त्याचबरोबर तेर, वाशी, भूम व परंडा उप विभागातील लाभार्थ्यांसाठी मंगळवारी (दि.21 एप्रिल) आयोजन करण्यात आले आहे. तसेच तूळजापूर विभागांतर्गत येणाऱ्या तूळजापूर, लोहारा, उमरगा व नळदुर्ग उपविभागातील लाभार्थ्यांसाठी बुधवारी (दि. 22 एप्रिल) उपविभागीय कार्यालयात तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. दिनांक 20 ते 22 एप्रिल दरम्यान आयोजीत तक्रार निवारण मेळाव्यास लाभार्थी सौकृषीपंप धारक शेतकऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे. सौकृषीपंपाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, शाखा प्रमुख व सौरकृषीपंप एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शक्य तेवढ्या तक्रारिंचे निवारण जागेवरच होणार असल्याने वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीरशैव जंगम मठ ट्रस्ट अध्यक्षपदी गिरीश पाळणे तर उपाध्यक्षपदी शिवयोगी चपने
धाराशिव (प्रतिनिधी)- वीरशैव जंगम मठ ट्रस्टच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीत ट्रस्टच्या नव्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी गिरीश पाळणे तर उपाध्यक्षपदी ॲड शिवयोगी चपने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मठाचे विद्यमान अध्यक्ष शिवानंद रामहरी कथले यांनी प्रकृती व वैयक्तिक कारणास्तव अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी कार्यकारिणीने एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली. निवडीनंतर उपस्थित समाज बांधवांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष गिरीश पाळणे यांनी आपले धोरण स्पष्ट करताना सांगितले की, “मठाचे कार्य पूर्णपणे पारदर्शक, सर्वसमावेशक व समाजाभिमुख ठेवण्यात येईल. कोणत्याही प्रकारची गटबाजी किंवा भेदभाव न करता सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन कार्य केले जाईल.” तसेच त्यांनी पुढे नमूद केले की, “धाराशिव येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी नियोजनबद्ध उपक्रम राबवले जातील. समाजातील युवकांना प्रोत्साहन देऊन समाजातील एकजूट अधिक बळकट करण्यावर विशेष भर दिला जाईल.” उपाध्यक्ष ॲड. शिवयोगी चपने यांनीही सर्वांच्या सहकार्याने मठाचे कार्य अधिक गतिमान, प्रभावी व सर्वसमावेशक करण्याचा निर्धार व्यक्त केला. यानंतर सचिव श्रीकांत गणपतप्पा साखरे, कोषाध्यक्ष वैजिनाथ शिवप्पा गुळवे, तसेच डॉ. अनंत राजमाने व इतर सदस्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच समाजातील सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
हार-फेट्यांऐवजी शालेय साहित्य भेट; बदलत्या परंपरेला प्रतिसाद
तुळजापूर (प्रतिनिधी)- परंपरागत सत्कार पद्धतीला छेद देत “सत्कार शिक्षणासाठी” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार, अपसिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता हार-फुले न देता वही, पेन, दप्तर यांसारखे शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ औपचारिकता नसून “शिक्षणाला दिलेली मोलाची साथ” असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. परंपरेप्रमाणे हार, फेटे, बुके आणि महागड्या शाली देण्याऐवजी शालेय साहित्य देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. सत्कारासाठी होणाऱ्या खर्चातून जमा होणारे साहित्य जिल्हा परिषद व नगर परिषद शिक्षण विभागामार्फत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. असून जिल्हाभरातील सत्कार सोहळे आता “ज्ञानयज्ञ” ठरू लागले आहेत.
भूम शहरात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
भूम (प्रतिनिधी)- भूम येथील मन्मथ स्वामी मंदिरात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम पार पडला. समतानायक, क्रांतीसूर्य, विश्वगुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसवेश्वरांच्या विचारांची आठवण यावेळी उपस्थितांनी जागवली. कार्यक्रमाची सुरुवात उद्योजक महादेव मंनगिरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी बसवेश्वरांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांचे कार्य स्मरले. या प्रसंगी अशोक तोडकर, डॉ. शिवशंकर खोले, प्रभाकर शेटे, मधुकर शेटे, ओम स्वामी, महादेव मंनगिरे, सिद्धेश्वर मनगिरे, अमित होळकर, पत्रकार धनंजय शेटे, बाजीराव बळे, उमेश मनगिरे, पंकज उंबरे, दत्ता शेद्रे, ऋषिकेश गवळी, भैया चौरे, गणेश रेवडवर, संजय होळकर, विजयकुमार सोलापूरे, श्रीकांत नकाते, राजेंद्र गाढवे वाशीकर यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बसवेश्वरांच्या विचारांचा समाजावर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित करण्यात आला. समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या शिकवणीचे आजही महत्त्व असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी बसवेश्वरांच्या विचारांचे आचरण करण्याचा संकल्प केला.
दिल्ली उच्च न्यायालयात आप नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी सकाळी 10:30 वाजता पुन्हा हजर राहणार आहेत. ही सुनावणी सीबीआयच्या प्रतिज्ञापत्र आणि त्यावरील केजरीवाल यांच्या उत्तराशी संबंधित आहे. यापूर्वीच त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, त्यामध्ये न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्याशी संबंधित हितसंबंधांच्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. केजरीवाल यांनी असा दावा केला आहे […]
156 कोटींच्या रस्ते कामांवर संशयाचे सावट; ‘नगरोत्थान’ निधी खाजगी प्लॉटिंगकडे वळवला?
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीतील नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर 156 कोटी रुपयांच्या रस्ते कामांवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे हे काम सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. शहरात वर्षभर कोट्यवधी भाविक येत असताना मंदिर परिसरातील रस्ते निकृष्ट व अतिक्रमणग्रस्त, दाट लोकवस्तीतील रस्ते दुरवस्थेत अशा स्थितीत खाजगी विकासकांच्या प्लॉटिंग भागात रस्ते कामे करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “मंदिर परिसर जुने तुळजापूर भकास, बाहेरचे रस्ते झकास” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, नगरोत्थान निधीचा वापर लोकवस्तीऐवजी निर्जन भागात केला जात आहे. खाजगी प्लॉटिंगमध्ये रस्ते बांधणे हे नियमबाह्य आहे. विकासकांनी स्वतः करायची कामे शासकीय निधीतून केली जात आहेत. यामुळे शासकीय निधीचा गैरवात वापर होतो असा आरोप केला जात आहे. नियम काय सांगतो तर नगर विकास विभागाच्या नियमानुसार खाजगी प्लॉटिंगमधील रस्ते, पायाभूत सुविधा विकासकाने स्वतः करणे बंधनकारक शासकीय निधीचा वापर सार्वजनिक वस्ती आणि गरज असलेल्या भागात करणे अपेक्षित मात्र प्रत्यक्षात याच्या उलट कामे होत असल्याचा आरोप आहे. या विकासकामांमुळे खाजगी प्लॉटिंगला मोठा फायदा होत असुन 1 हजार रुपये दर हजारवर जावुन प्लॉटचे दर गगनाला भिडल्याची चर्चा आहे. यामुळे ही कामे भाविकांसाठी की विकासकांसाठी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी मागणी केली आहे. संबंधित कामांची सखोल चौकशी व्हावी, आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी. हार-फेट्यांऐवजी शालेय साहित्य भेट; बदलत्या परंपरेला प्रतिसाद तुळजापूर (प्रतिनिधी)- परंपरागत सत्कार पद्धतीला छेद देत “सत्कार शिक्षणासाठी” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार, अपसिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता हार-फुले न देता वही, पेन, दप्तर यांसारखे शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ औपचारिकता नसून “शिक्षणाला दिलेली मोलाची साथ” असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. परंपरेप्रमाणे हार, फेटे, बुके आणि महागड्या शाली देण्याऐवजी शालेय साहित्य देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. सत्कारासाठी होणाऱ्या खर्चातून जमा होणारे साहित्य जिल्हा परिषद व नगर परिषद शिक्षण विभागामार्फत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. असून जिल्हाभरातील सत्कार सोहळे आता “ज्ञानयज्ञ” ठरू लागले आहेत.
भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आंभी येथील श्रीमती शिवगंगा कल्याणराव गटकळ वय 95 वर्ष यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे उपचारादरम्यान दि. 18 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या पुणे शिक्षण विभाग आयुक्त कार्यालयातील सेवानिवृत्त अधीक्षक किसन गटकळ व बळीराम गटकळ यांच्या मातोश्री होत. त्यांचेवर त्यांचे मूळ गावी आंभी ता. भूम येथे रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे, पतरुंडे असा परिवार आहे.
भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील शेतकरी अभिमान ढगे (वय 60) यांच्यावर गावातील तिघांनी मिळून भीषण खुनी हल्ला केल्याची घटना 8 एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. शेतातून घरी परतत असताना त्यांना अडवून हा हल्ला करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिमान ढगे हे शेतातून घरी येत असताना आरोपींनी त्यांना अडवून गज व दगडांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अभिमान ढगे यांना मुलगा नसल्याने त्यांनी तिंघा आरोपींना जमिन न विकल्याने ती जमिन भूम येथील एका व्यक्तिला विकल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, हल्ल्यावेळी ढगे यांच्या पत्नी वृदावंनी ढगे यांनी प्रसंगावधान राखत पतीच्या अंगावर झेप घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या हल्ल्यात अभिमान ढगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते चार दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. घटनेनंतर जखमी ढगे यांना प्रथम वालवड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना दाखल करून घेण्यात आले नसल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी भूम येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले परंतु जबर मारहाणीमुळे बेशुद्ध असल्यामुळे त्यांना जगदाळे मामा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल
धाराशिव (प्रतिनिधी)- नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करून काँग्रेस आणि उबाठा गटाने महिलांच्या हक्कांवर गदा आणली आहे. संसदेत या ऐतिहासिक विधेयकाच्या विरोधात मतदान करून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्यातील महिलांना राजकीय सशक्तीकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचा हा अपमान जनता कधीच माफ करणार नाही, असा घणाघाती आरोप भाजप महिला मोर्चा अध्यक्षा प्रीती कदम व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना निर्णय प्रक्रियेत 33 टक्के आरक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले होते. मात्र, काँग्रेस आणि उबाठा गटाने पुन्हा एकदा केवळ राजकारणाला प्राधान्य दिले. हे विधेयक केवळ कायदा नव्हता, तर खरी समानता प्रस्थापित करण्याचा एक क्रांतिकारी टप्पा होता. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. यामुळे स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवर महिलांना मिळणारी नेतृत्वाची संधी हुकली असून, वर्षानुवर्षे चालत आलेली असमानता कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहात विधेयक मंजूर न झाल्याने विरोधकांनी जो जल्लोष केला, तो देशातील तमाम माता-भगिनींचा अपमान आहे, अशी टीकाही कदम यांनी केली. शिवसेना पक्षाच्यावतीने निषेध धाराशिवमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी धाराशिव येथे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या विधेयकाच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांचा सन्मान म्हणजेच महिलांना अधिकार या भूमिकेतून अनेक योजना आणल्या आहेत. यावेळी तुळजापूर जिल्हाप्रमुख मीनाताई सोमाजी, जिल्हा संघटक किरण ताई निंबाळकर, जिल्हा समन्वयक संगीताताई काळे, तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, रूपाली घाडगे, लता हरवलकर, विजया पवार, श्रावणी पवार, सुषमा शिंदे, सुवर्णा सलगर, ज्योती लोखंडे, पल्लवी माने सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक कायापालटासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी आर्थिक वर्षात जिल्ह्यात 108 नवयुगीन उद्योजक घडवण्याचा संकल्प करण्यात आला असून, या उपक्रमाला जिल्हभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धाराशिवच्या आर्थिक विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनाल प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल 591 इच्छुकांची नावनोंदणी केली आहे. या सर्व इच्छुकांकडून एक प्रश्नावली भरून घेण्यात येणार असून यातून छाननी करून 108 निवडण्यात येणार असून 1 मे रोजी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे, या उद्देशाने ही अभिनव संकल्पना मांडत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भाजपाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल 591 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. अजूनही नोंदणी सुरू आहे.या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात उद्योगांचे जाळे विणले जाणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे निवडक उमेदवारांना केवळ कागदोपत्री मार्गदर्शन न देता, प्रत्यक्षात उद्योग उभारणी पूर्ण होईपर्यंत सहकार्य केले जाणार आहे. यात प्रामुख्याने उद्योगासाठी आवश्यक तांत्रिक प्रकल्प अहवाल () तयार करणे, बँकांकडून सुलभ कर्जपुरवठा आणि शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती अर्जांची छाननी करून उद्योगाची व्यवहार्यता तपासेल. पात्र उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आणि प्रकल्पाच्या यशस्वीतेवर आधारित असेल. या मोहिमेत पारंपरिक उद्योगांऐवजी आधुनिक आणि मागणी असलेल्या व्यवसायांवर भर देण्यात आला आहे. हायड्रोपोनिक शेती,नारळ शेंड्याचे (कोयर) पावडर,प्लास्टिक कचऱ्यापासून ग्रॅन्युल्स निर्मिती,व्हॅनिला शेती,केशर शेती,शेवग्याची (मोरिंगा) पावडर,कांदा पावडर,सोलर ड्रायर (सौर वाळवणी),मोती निर्मिती,पेपर बॅग निर्मिती,सोया उत्पादने,पर्यावरणपूरक म्हणून प्लास्टिक रिसायकलिंग, बायोमास हरित इंधन, फुलांपासून अगरबत्ती. आणि भविष्यवेधी तंत्रज्ञानावर आधारित म्हणून ई-वेस्ट, सोलर पॅनल स्क्रॅप आणि लिथियम बॅटरी रिसायकलिंग आदी उद्योगांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. महाराष्ट्रदिनी मेळाव्यातून होणार दिशा निश्चिती या मोहिमेचा पुढील टप्पा 1 मे रोजी पार पडणार आहे. धाराशिव येथे त्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत पहिल्या टप्प्यात निवडक उमेदवारांना उद्योग उभारणीची पुढील दिशा आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. या उपक्रमातून 108 सक्षम उद्योजक तयार होतील, ज्यातून हजारो कुटुंबांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.दुसऱ्या टप्प्यात उर्वरित उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू
धाराशिव (प्रतिनिधी)- एप्रिल महिन्यात जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव,स्पर्धा,सभा, बैठका तसेच धरणे- आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली आहे. दि.12 ते 22 एप्रिल दरम्यान संत गोरोबा काका यात्रा (तेर) तसेच दि.14 ते 30 एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,दि.19 एप्रिल रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (पारंपारिक), महात्मा बसवेश्वर जयंती,परशुराम जयंती असे विविध यात्रा व उत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारणे तसेच बौद्ध समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याच्या कारणावरून दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याशिवाय विविध संघटना व राजकीय पक्षांकडून विविध मागण्यांसाठी शासकीय कार्यालयांसमोर धरणे,मोर्चे, आंदोलन,उपोषण,आत्मदहन,बंद, निदर्शने,तालाठोको व रास्तारोको यांसारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3) अन्वये दि.16 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते दि.30 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मात्र,हा आदेश कामावर असलेल्या पोलीस अधिकारी,शासकीय कर्मचारी,विवाह समारंभ, अंत्ययात्रा,धार्मिक कार्यक्रम,यात्रा तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नसल्याचेही अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी कळविले आहे.
मान्सूनपूर्व जलस्रोतांची कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार
धाराशिव (प्रतिनिधी)- जल जीवन मिशन अंतर्गत सर्व जलतारे,शोषखड्डे व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण करून हर घर जल योजनेचे उद्दिष्ट वेळेत साध्य करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत हर घर जल योजना,जल सेवा अभियान आणि जल जीवन योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि.17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. प्रियंवदा महाडदळकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस.कटकधोंड,कनिष्ठ भूवैज्ञानिक एम.आर.डोंगरे आदी उपस्थित होते. बैठकीत जल जीवन मिशनअंतर्गत उद्भव विहिरी शेजारी जलतारा अंतर्गत शोषखड्डे करणे,जलताराची कामे 25 एप्रिलपासून सुरू करून मान्सूनपूर्व सर्व जलतारे व शोषखड्डे तांत्रिक बाबींसह पूर्ण करणे, केलेल्या कामांचे जिओ-टॅग फोटो अपलोड करणे,तसेच सर्व जल जीवन मिशन योजनेच्या उद्भवाशेजारी कामे करणे यावर भर देण्यात आला. तसेच,गावांतर्गत पाण्याची क्षमता जास्त असलेले हातपंप व विंधन विहिरी शेजारी जलतारा अंतर्गत शोषखड्डे करणे,पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभांची स्वच्छता मोहीम राबविणे,जैविक व रासायनिक तपासणी मान्सूनपूर्व करणे,गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करणे आणि रिचार्ज शाफ्ट केलेल्या कामांची स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. यावेळी उमरगा, धाराशिव,भूम, तुळजापूर,परंडा,वाशी येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व संबंधित कनिष्ठ अभियंते व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
वाचन मंदिरेच सुजाण व सुसंस्कृत समाज घडवीत असतात
अभिनेते नंदकुमार पाटील यांचे प्रतिपादन ; श्रीराम वाचन मंदिराचा वर्धापन दिन संपन्न सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर हे पावणे दोनशे वर्षे सातत्याने वाचकांची भूक भागविणारे आणि सुजाण नागरिक घडविणारे ज्ञान मंदिर आहे .ज्यांच्या नावानेच हे वाचन मंदिर संस्थान काळात सुरू झाले त्यांच्या वंशज या नगरीच्या नगराध्यक्ष झाल्याने वाचन मंदिरालाही उच्च दर्जा प्राप्त होईल [...]
मला त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा नाही; पोप लिओ यांचे ट्रम्प यांना सणसणीत प्रत्युत्तर
अमेरिका, इस्रायल -इराण युद्ध आणि जागतिक परिस्थितीवर केलेल्या वक्तव्यांवरून पोप लिओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील सुरू असलेल्या वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मला त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा नाही, असे स्पष्ट करत पोप लिओ यांनी वादाला पूर्णविराम दिला आहे. आपल्याला ट्रम्प यांच्याशी कोणताही वादविवाद किंवा संघर्ष करायची नको आहे, असे ते म्हणाले. तसेच […]
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना विधेयक कळालं सुद्धा नाही, तेजस्वी यादव यांचा टोला
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकावरून बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी भाजप महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली प्रत्यक्षात मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. रविवारी पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना या विधेयकाचा गाभा समजलेलाच […]
अभिनेत्री तब्बूने मुंबईत खरेदी केले १० कोटींचे आलिशान घर
बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना प्रभावित करणाऱ्या अभिनेत्री तब्बूने, मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. तब्बूने तिच्या कारकिर्दीत अभिनय कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत आणि स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही, ती आजही चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच तब्बूने अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या ‘भूत […]
IPL 2026 –चेन्नईवरील थरारक विजय हैदराबादसाठी टर्निंग पॉईंट ठरणार; दिग्गज खेळाडूचं विधान
इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या लढतीत हैदराबादने चेन्नईचा 10 धावांनी पराभव केला. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डेल स्टेन याने मोठे विधान केले. चेन्नईविरुद्ध मिळवलेला विजय हैदारबादसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असे स्टेन स्टार स्पोर्टवर बोलताना म्हणाला. ‘पीटीआय‘ने याबाबत वृत्त […]
तिरुप्पूर येथे एका निवडणूक प्रचारसभेत संबोधित करताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सावध केले आहे. एनडीएच्या पारड्यात टाकलेले प्रत्येक मत राज्याच्या विकासकामांना आणि प्रगतीला खीळ घालणारे ठरेल, असे विधान स्टॅलिन यांनी मतदारांना उद्देशून केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी द्रमुक (डीएमके) सरकारवर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, जेव्हा जेव्हा […]
IAS समीर बिश्नोई यांच्या अडचणीत वाढ; आर्थिक गुन्हे शाखेकडून 4 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त
छत्तीगडमधीलकोळसा घोटाळ्यातील आरोपी आणि निलंबित आयएएस अधिकारी समीर बिश्नोई यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बिश्नोई यांच्यावर कारवाई करत त्यांची सुमारे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. समीर बिश्नोई यांच्यावरील आरोपांची गांभीर्याने दखल घेत रायपूरच्या विशेष न्यायालयाने मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जुलै […]
गुरुग्राममध्ये बनावट ‘मौंजारो’ इंजेक्शनचा भंडाफोड, 56 लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक
हरियाणातील गुरुग्राममध्ये उशिरा रात्री अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत बनावट ‘मौंजारो क्विकपेन’ इंजेक्शनचे रॅकेट उघडकीस आणला. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 56.15 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. गुरुग्राम-1 चे औषध नियंत्रण अधिकारी अमनदीप चौहान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हुडा […]
मळेवाड येथे १ मे रोजी खुली रांगोळी स्पर्धा
सावंतवाडी – महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि सिंधुदुर्ग निर्मिती दिनाचे औचित्य साधून मळेवाड येथील श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ, मळेवाडकडून १ मे रोजी भव्य खुली रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. ५००० व सन्मानचिन्ह, द्वितीय रु. ३००० व सन्मानचिन्ह, तृतीय रु. २००० व सन्मानचिन्ह व [...]
भ्रष्टाचाराच्या ऑडिओ क्लिप चौकाचौकात लावल्या जातील
बाबी जोगींचा महेश कांदळगावकर यांना इशारा मालवण : प्रतिनिधी भ्रष्टाचार विरहित काम करण्याची भूमिका मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली होती. परंतु काही कालावधीतच बालोद्यान मध्ये खेळाचे साहित्य बसविण्याच्या टेंडरच्या बिलात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे स्टिंग ऑपरेशन बाहेर आहे. त्याबाबत महेश कांदळगावकर यांच्या मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिप देखील उपलब्ध आहेत. त्या ऑडिओ क्लिप कशा काय [...]
आखाती युद्धाची मोठी किंमत जगाने मोजली; 50 दिवसात 50 अब्ज डॉलर्सचे तेल झाले स्वाहा
इराणवरील अमेरिका-इस्रायल युद्ध केवळ लष्करी संघर्षापुरते मर्यादित राहिले नाही. त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अंदाजे ५० दिवसांत ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे कच्चे तेल वाया गेले आहे. त्याचा परिणाम येत्या काही महिन्यांपर्यंत आणि वर्षांपर्यंत जाणवेल, असे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. विश्लेषकांच्या मते, फेब्रुवारीच्या अखेरीस संघर्ष सुरू झाल्यापासून अंदाजे ५० कोटी बॅरल […]
Pandharpur |पंढरपुरात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्यांचा गोडवा; कोकणच्या हापूसला वाढती मागणी
पंढरपुरात अक्षय्य तृतीयेला आंब्यांचा बाजार फुलला पंढरपूर -शहरात साडे तीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर कोकण तसेच इतर भागातून मोठ्या प्रमाणात हापूस आंबा व इतर रसाचे आंबे दाखल झाले आहेत. यंदा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने कोकणात मोठ्या प्रमाणात मोहोर गळून गेला असल्याने हापूस आंब्याच्या [...]
इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धात पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका निभावत आहे. दोन्ही उभय देशांमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे शांतता चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर सध्या जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चेची दुसरी फेरी इस्लामाबाद येथे होण्याची शक्यता असतानाच अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने एक खळबळजनक अहवाल […]
सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सोलापूर – सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात राबविलेल्या ऑपरेशन ऑ ल आऊटमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दरोड्यांसह सहा घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक केली. घुल्या ऊर्फ गुलाब ऊर्फ प्रितिज्ञान झिंगझिंग पवार (रा. कलकर्जाळ, ता. अक्कलकोट) असे अटक [...]
सातारा सिव्हिल रुग्णालयात लाचखोरीचा पर्दाफाश सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने नव्याने वळण घेतले असून, शिपाई आनंदा बाळवेकर यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर आरोग्य विभागातील कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भ्रष्टाचारात शे-पाचशेचे धनी असलेल्या वाळवेकरांची नोकरी अबधी दोन वर्षे राहिली [...]
Karad News |प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर कराड पोलीस ॲक्शन मोडमध्ये; शहरात डंपर आणि ट्रकना प्रवेशबंदी
कराडमध्ये जड वाहनांना चाप! कराड: काही दिवसांपूर्वी वर्दळीच्याठिकाणी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कराड वाहतूक पोलीस प्रशासनाने गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर व ट्रकांवर वर्दळीच्या वेळेत शहरात प्रवेशबंदी लागू [...]
कोल्हापुरात पाणीटंचाईचा धोका; कोल्हापूर -जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दरवर्षी संभाव्य पाणी टंचाई लक्षत घेऊन आराखडा तयार केला जातो. पावसाळा संपला की दिवाळी पूर्वी या कामाला सुरुवात होते. प्रत्येक तालुक्याकडून टंचाईग्रस्त गावांची माहिती मागितली जाते. ही माहिती संकलित झल्यानंतर [...]
Kolhapur News |गंगावेशात ‘रात्रीचा खेळ’रंगला! पैलवान आणि खाद्यविक्रेत्यात फ्री-स्टाईलने हाणामारी
कोल्हापुरात किरकोळ कारणावरून मारामारी कोल्हापूर -गंगावेश येथील रेगे तिकटी येथे शनिवारी रात्री खाद्यपदार्थाच्या गाडीजवळ अचानक कुत्रे आल्याच्या कारणावरुन पैलवान आणि खाद्यपदार्थ विक्रेता यांच्यात मारामारीचा प्रकार घडला. मारामारीच्या प्रकारात एका मोपेडचीमोडतोड करण्यात आली आहे. रेगे तिकटी येथे गाडीद्वारे एक विक्रेता खाद्यपदार्थांची विक्री करण्याचा व्यवसाय करतो [...]
Kurunwad News |बुलेटची मोटरसायकलला जोराची धडक; शिवनाकवाडीतील महिलेचा जागीच मृत्यू
शिवनाकवाडीत भीषण अपघात कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता.शिरोळ) येथे मोटरसायकललाबुलेटस्वाराने मागून जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरमागे बसलेल्या महिलेचारस्त्यावर रक्तबंबळ अवस्थेतस्वाती गावडे पडून जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.मृत महिलेचे स्वाती कुमार गावडे (बय३६, शिवनाकवाडी) असे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,स्वाती गावडे या आपले पती [...]
महिला आरक्षणाच्या षड्यंत्राआडून अंदाधुंद मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला होता. मात्र विरोधकांच्या एकजुटीमुळे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळले गेले आणि हे विधेयक लोकसभेत कोसळले. घटनादुरुस्तीसाठी आवश्यक दोनतृतीयांश बहुमत गाठता न आल्याने महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. यानंतर भाजपने विरोधकांना टार्गेट करणे सुरू केले. विरोधक महिला विरोधी असल्याची टिमकी सत्ताधारी वाजवू लागले. मुख्यमंत्री […]
नोएडा हिंसाचारातील मुख्य आरोपीला तामिळनाडूमध्ये अटक; गुन्ह्याची दिली कबुली
नोएडातील कामगार आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ज्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस होते, त्या आदित्य आनंद उर्फ रास्तीने पोलीस चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने या कटातील आपली भूमिका मान्य केली आहे. त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून संपूर्ण नेटवर्क आणि कटाच्या इतर […]
नोएडा हिंसाचारातील मुख्य आरोपी आदित्यला तामिळनाडूमध्ये अटक; गुन्ह्याची दिली कबुली
नोएडातील कामगार आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ज्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस होते, त्या आदित्य आनंद उर्फ रास्तीने पोलीस चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने या कटातील आपली भूमिका मान्य केली आहे. त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून संपूर्ण नेटवर्क आणि कटाच्या इतर […]
World Liver Day 2026 –लिव्हरचे आजार झपाट्याने का वाढत आहेत? जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स
यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे यकृताच्या आरोग्याविषयी आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. यकृत अन्न पचन करणे, विषारी द्रव्ये काढून टाकणे, ऊर्जा प्रदान करणे आणि शरीराची दुरुस्ती करणे यासह अनेक कार्ये करते. असे असूनही, यकृताशी संबंधित समस्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा लक्षात येत […]
गुरुद्वारातून बाहेर पडणाऱ्या दोन शिखांची गोळ्या घालून हत्या, इटलीतील संतापजनक घटना
इटलीतील बर्गामो प्रांतातील कोवो येथे एका गुरुद्वारात बैसाखीचा सण साजरा करून बाहेर पडणाऱ्या दोन शिखांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे इटलीतील हिंदुस्थानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोवो येथील औद्योगिक भागात असलेल्या गुरुद्वारा माता साहिब कौर जी येथे बैसाखीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]
देवभूमीत चारधाम यात्रेचा शुभारंभ; भाविकांचा उत्साह शिगेला
दरवर्षी सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झाला. रविवारी श्री यमुनोत्री धाम आणि श्री गंगोत्री धामचे यांचे दरवाजे मुहूर्ताच्या क्षणी उघडल्यानंतर, भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला. यात्रेदरम्यान प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. प्रार्थना आणि विधींनंतर, देवी गंगेची पालखी मुखबा गावातील तिच्या हिवाळी निवासस्थानाहून निघाली. या पालखीसोबत स्थानिक आणि यात्रेकरू दोघांमधील […]
येरळा नदीकाठच्या गावांचा पाटबंधारे विभागाला इशारा सातारा – नेर धरणातील पाणी तात्काळ सोडा… अन्यथा २२ एप्रिलनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.खटावसह येरळा नदीकाठच्या गावांनी पाटबंधारे विभागाला थेट इशारा दिला असून, वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले [...]
मुंबई उपनगरी रेल्वेतील मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. ठाणे ते डोंबिवली दरम्यान स्थानकांवरील प्लॅटफॉर्म वाढीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आल्याने, लोकल रेल्वेसेवेचा खोळंबा झाला आहे. या ब्लॉकदरम्यान कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर गाड्या थांबत नसल्यामुळे, प्रवाशांना पर्याय नसल्याने थेट रेल्वे रुळांवरून चालत आपल्या गंतव्यस्थानी जाण्याचा धोका पत्करावा लागला. याचे काही व्हिडिओ आणि […]
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला नको असलेल्या युद्धात ओढले आहे, असे हॅरिस म्हणाल्या. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणविरुद्धच्या लष्करी संघर्षात ट्रम्प यांना जाणीवपूर्वक ओढले असून, यामुळे अमेरिकन सैनिकांचा जीव धोक्यात आला असल्याचा आरोप हॅरिस यांनी […]
रजनीकांतचा चित्रपट ‘जेलर २’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आलेला आहे. नुकतेच, या चित्रपटाने कोट्यवधींच्या ओटीटी करारासह एक मोठा टप्पा गाठला आहे. यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर, त्याच्या सिक्वेलकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. एबीपी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, निर्माते २०२६ च्या उत्तरार्धात भव्य प्रदर्शनाची तयारी करत आहेत. असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट […]
युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय, 12,980 कोटींचा सागरी विमा पूल मंजूर
युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक निर्बंध आणि वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर बाह्य व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 12,980 कोटींच्या सार्वभौम हमी (sovereign guarantee) असलेल्या सागरी विमा पूलला मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. हा विमा पूल सुरुवातीला 10 वर्षांसाठी कार्यरत राहणार असून, आवश्यकतेनुसार आणखी 5 […]
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यामुळे निराश झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री साडे आठ वाजता लाईव्ह येत विरोधकांवर आगपाखड केली. विरोधक कसे महिला विरोधी आहेत याची टीमकी त्यांनी वाजवली. याचा आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या शैलीत समाचार घेतला. मोदींना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडला आहे, अशी […]
ड्रायव्हर-क्लिनरचा ‘रिल्स’चा नाद चिमुकलीच्या जिवावर; समृद्धी महामार्गावर खासगी बस उलटून भीषण अपघात
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनचालकाच्या टोकाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप चिमुकलीला आपला प्राण गमवावा लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर टोलनाक्याजवळ एका खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, बसचा चालक आणि क्लिनर चालत्या बसमध्ये मोबाईलवर ‘रिल्स’ बनवण्यात मग्न असताना हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत एका दीड वर्षीय चिमुकलीचा […]
काश्मीर पर्यटनाला डिजिटल सुरक्षा कवच; आता एका ‘क्लिक’वर समोर येणार व्यावसायिकाचा बायोडाटा!
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. याच पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.पहलगामच्या डोंगराळ भागात काम करणारे टॅक्सी ड्रायव्हर, खेचर मालक आणि हमाल यांच्यासाठी आता ओळखपत्रांऐवजी क्यूआर कोड (QR Code) प्रणाली लागू करण्यात आली आहे. संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने या […]
पंतप्रधान मोदींचे भाषण वादात; CPI खासदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार, कारवाईची मागणी
दोन तृतीयांश बहुमताअभावी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यामुळे मोदी सरकार तोंडावर आपटले आहे. या पराभवामुळे निराश झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री साडे आठ वाजता लाईव्ह येत विरोधकांवर आगपाखड केली. मोदींचे हेच भाषण आता वादात सापडले आहे. मोदींनी आपल्या भाषणातून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केरळमधील राज्यसभा खासदार पी. संदोष […]
मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले, महिला मतदारांना भडकवले; काँग्रेस नेते अशोक गहलोत यांचा आरोप
माजी राजस्थान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्राला संबोधित करताना मोदी यांनी द्रविड मुनेत्र कळघम आणि तृणमूल काँग्रेसचा उल्लेख करून महिला मतदारांना भडकवण्याचा प्रयत्न केला, असे गहलोत यांनी म्हटले. सध्या आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये […]
दीपिका-रणवीर सिंग पुन्हा आई बाबा होणार, दुआसोबत फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
रणवीर सिंग सध्या ‘धुरंधर’च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. असे असताना रणवीरने आणि दीपिकाने पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या दुसऱ्या बाळाची अपेक्षा करत आहेत. या जोडप्याने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची पहिली भेट २०१३ मध्ये ‘गोलियों […]
देशात नरेंद्र मोदी फेल, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फेल; संजय राऊत यांचा हल्लाबोल
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फेल ठरले आहेत. त्यांच्याकडून फार अपेक्षा करू नका, असा जबरदस्त हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला. खरात फाईल्स, नराधम एरंडे, टीसीएसमधील छळवणूक प्रकरण याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. संजय राऊत म्हणाले की, आपण धर्मांतर विरोधी […]
पसरणी गावात उभं राहिलं ‘मिनी काश्मीर’ पाचगणी( इम्तियाज मुजावर ) – सफरचंद म्हटलं की सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते थंड हवामान असलेले हिमाचल प्रदेश किंवा जम्मू-काश्मीरमधील डोंगराळ प्रदेश. मात्र आता सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावातही सफरचंदाची बाग फुलली असून, या भागातच ‘मिनी काश्मीर’ [...]
कानपूरच्या नौबस्तामध्ये रविवारी पहाटे दोन जुळ्या मुलींचे गळे चिरून हत्या केली गेली. रविवारी पहाटे (19 एप्रिल) ही घटना घडली असून, ११ वर्षांच्या जुळ्या मुलींची हत्या करण्यात आलेली आहे. वडिलांनी त्यांच्या फ्लॅटमध्येच मुलींचे गळे चिरले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. आरोपी वडिलांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती देताना, डीसीपी दीपेंद्र नाथ चौधरी यांनी […]
‘Idea of India’ वाचवण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पराभूत केले – राहुल गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत संसदेत मांडण्यात आलेल्या नव्या विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) लपवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. शनिवारी चेन्नई दौऱ्यावर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, “काल संसदेत भाजपने नवीन विधेयक आणले आणि ते महिला विधेयक असल्याचे सांगितले. पण महिला आरक्षणाचे […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलबाबतच्या आपल्या भूमिकेत अवघ्या 24 तासांत मोठा बदल केला आहे. एक दिवसापूर्वी ट्रम्प यांनी लेबनॉनवरील हल्ले तात्काळ थांबवण्याचे कडक आदेश दिले होते. कालपर्यंत आक्रमक भूमिकेत असलेले ट्रम्प आज काहीसे मवाळ झाल्याचे चित्र आहे. ट्रम्प यांनी आता सोशल मीडियावर इस्रायलचे तोंडभरून कौतुक केले आहे. इस्रायल हा अमेरिकेचा एक महान आणि सामर्थ्यवान […]
लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजेच 18 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसासोबतच जिल्ह्यामध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने […]
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदीच्या घोषणेनंतर अवघ्या 24 तासांत इराणने आपला निर्णय बदलल्याने आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने आधी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा केली होती, मात्र अमेरिकेवर नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत त्यांनी हा महत्त्वाचा सागरी मार्ग पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आर्थिक दहशतवाद असून त्याच्या झळा हिंदुस्थानालाही बसला आहे. […]
जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिंदुस्थानची घसरण आता सहाव्या क्रमांकावर झाली असून युके आणि जपानने हिंदुस्थानला मागे टाकले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जेव्हा अर्थव्यवस्था वधारेल असा अंदाज येतो तेव्हा वाहवा करून घेणारे सरकार, आता घसरण झाल्यावर गप्प का? […]
मध्य प्रदेशात बँक ऑफ महाराष्ट्रात 17 कोटी लुटले
मध्य प्रदेशातील सिंगरौली येथील बँक ऑफ महाराष्ट्रात दिवसाढवळय़ा बँकेत दरोडा टाकण्यात आला. दुपारच्या वेळी पाच सशस्त्र दरोडेखोर बँकेत घुसले. या दरोडेखोरांनी गोळीबार करून 10 किलो सोने आणि 20 लाख रोख रक्कम असे जवळपास 17 कोटी रुपये लुटले आणि ते मोटरसायकलवरून पसार झाले. लुटलेले सोने ग्राहकांचे होते, जे बँकेने गहाण ठेवून कर्ज दिले होते. सोने […]
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर टीका करत ते पूर्णपणे राजकीय असल्याचा आरोप केला आहे. संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळल्यानंतर शनिवारी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते. मात्र, या भाषणात देशाच्या प्रश्नांऐवजी विरोधकांवर टीका आणि चिखलफेक करण्यात आली, असा दावा खरगे यांनी केला. खरगे यांनी ‘X’वर पोस्ट करत म्हटले […]
मुंबईकरिता टेन्शन तलावात 46 टक्के पाणी उरले
राज्याच्या विविध भागात एकीकडे उष्णतेची लाट पसरली असताना दुसरीकडे राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा झपाटय़ाने खालावत चालला आहे. सध्याच्या घडीला राज्यातल्या सुमारे तीन हजार लहान मोठय़ा आणि मध्यम आकाराच्या धरणांमध्ये मिळून 46. 28 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये केवळ 39.32 टक्के इतक्या पाणीसाठा होता. राज्याच्या जलसंपदा विभागाने राज्यातील धरणांमधील पाणीसाठय़ासंदर्भातील आकडेवारी जाहीर […]
‘जर त्यांनी थोडीही चूक केली, तर…’, वाटाघाटीआधी इराण सतर्क; अमेरिकेला दिला कडक शब्दात इशारा
इराण आणि अमेरिकेतील चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे होणार आहे. एकीकडे याची तयारी सुरू असताना दुसरीकडे इराण सतर्क आहे. इराण मुत्सद्देगिरीसाठी तयार असला तरी लष्करीदृष्ट्या पूर्णपणे सतर्क आहे, असे विधान करत इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिकेला कडक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. दीड महिन्यांच्या संघर्षानंतर इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. […]
मेटा आठ हजार कर्मचार्यांना काढणार
जगप्रसिद्ध मेटा कंपनी पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात करणार आहे. ही कर्मचारी कपात येत्या 20 मेपासून सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. मेटा कंपनी जगभरातून कमीत कमी 20 टक्के कर्मचारी कपात करणार आहे. त्यामुळे कंपनीतील आठ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल, हे स्पष्ट झाले आहे. ही कर्मचारी कपात पहिल्या टप्प्यातील आहे. दुसऱ्या टप्प्यातही कर्मचारी कपात कंपनी करणार […]
शेवटची ट्रिप मारून येतो ! तुटलेली काच मानेत घुसून रिक्षाचालक ठार
मित्रांनो शेवटची ट्रिप मारून येतो.. असे अन्य रिक्षाचालकांना सांगून गेलेला विकास पुन्हा आलाच नाही. ही दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. प्रवाशाला सोडून घरी परतत असलेल्या विकास गाडे याच्या रिक्षाचा 90 फीट रोडवर भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला मागून जोरात धडक दिल्याने रिक्षाच्या फुटलेल्या काचा मानेत घुसल्याने रक्तस्त्राव होऊन विकासचा मृत्यू झाला. विकास […]
IPL 2026 –हैदराबादचा ‘यलो आर्मी’ला दे धक्का; शेवटच्या षटकात चेन्नईवर थरारक विजय
इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात कमकुवत गोलंदाजीचे लेबल लागलेल्या सनरायझर्स हैदराबादने शनिवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आपली ताकद दाखवून दिली. घरच्या मैदानावर सीएसके… सीएसके…. अशा गगनभेदी गर्जना घुमत असतानाही हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी थरारक पराभव केला. हैदराबादने 195 धावांचा बचाव करताना चेन्नईला 184 धावांत रोखले आणि यंदाच्या हंगामातील तिसऱ्या […]
होर्मुझ सामुद्रधुनीत हिंदुस्थानचा ध्वज असलेल्या जहाजांवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने रविवारी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्थानातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी दोन्ही देशांतील मजबूत संबंध अधोरेखित करत शांततेचे आवाहन केले. डॉ. इलाही म्हणाले की, “इराण आणि हिंदुस्थान यांच्यातील संबंध अत्यंत मजबूत आहेत. आपण उल्लेख केलेल्या घटनेबाबत मला ठोस […]
मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शीतल तेजवानीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दोन प्रकरणांत दिलासा मिळाला आहे. पिंपरी आणि बावधन पोलीस ठाण्यांतील दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला केलेली अटक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत दोन्ही प्रकरणांमध्ये तिच्या सुटकेचे आदेश दिले. तर, खडक पोलीस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी शीतल तेजवानीची अटक कायम ठेवत बेकायदेशीर अटक केल्याचा दावा करणारी […]
Pune crime news –प्रेमसंबंधाच्या संशयातून सेक्रेटरी महिलेचा खून; आरोपी अॅड. सावंत भाजपचा पदाधिकारी
चंदननगर परिसरातील वकिलाच्या कार्यालयात काम करणाऱ्या ३२ वर्षीय सेक्रेटरी महिलेच्या निघृण हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अॅड. संजय सावंत हा भारतीय जनता पक्षाच्या कायदा आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्यामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सावंत आणि त्याची पत्नी स्वाती सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रेमसंबंधाच्या संशयातून हा खून […]
भोंदू बाबा राजेंद्र गडगेला अखेर बेड्या ठोकल्या! अनेकांची केली फसवणूक; लाखोंना लुबाडले
नाशिकपाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भोंदू बाबाचे प्रकरण उघड झाले आहे. ‘कर्करोगासारखे गंभीर आजार एका मंत्राने बरे करतो, तंत्रमंत्राच्या साहाय्याने महिलांना मूल होण्याची खात्री देतो, घरातील संकटे चुटकीसरशी दूर करतो…’ अशा खोट्या दाव्यांनी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू बाबा राजेंद्र गडगे याला आज पहाटे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, त्याला न्यायालयात […]
IPL 2026 –दिल्लीचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय; स्टब्ज, मिलरची मोक्याच्या वेळी फटकेबाजी
यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७५ धावसंख्येचा बचाव करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, ट्रिस्टन स्टब्ज व डेव्हिड मिलर यांनी मोक्याच्या वेळी फटकेबाजी करीत दिल्ली कॅपिटल्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना मिलरने दोन षटकार व एक चौकार ठोकून एक चेंडू शिल्लक असतानाच सामना संपविला. ६० धावांची खेळी करणारा स्टब्ज या सामन्याचा मानकरी […]
मुंबईचा पाणीपुरवठा सुधारा, आरोग्य यंत्रणा सक्षम करा! सभागृहात शिवसेना आक्रमक
मुंबईतील अनेक भागांत रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णालयांमध्येही औषधे उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधे आणण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा सुधारा, आरोग्य यंत्रणा सक्षम करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी पालिका सभागृहात अर्थसंकल्पीय भाषणात केली. अंकित प्रभू यांनी तब्बल तीन तास केलेल्या प्रदीर्घ भाषणात प्रशासनाच्या नाकर्तेपणावर […]
मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षक सेनेच्या गेल्या 18 वर्षांपासूनच्या अथक पाठपुराव्यामुळे अखेर पालिकेच्या माध्यमिक शिक्षकांना अंशदान निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस) लागू होणार आहे. हजारो शिक्षकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. पालिका माध्यमिक विभागात कार्यरत शिक्षकांना डीसीपीएस योजना लागू करण्यात आली नव्हती. त्यामुळे हजारो शिक्षकांचे भवितव्य अंधकारमय झाले होते. हा प्रश्न विचारात घेऊन मुंबई महानगरपालिका शिक्षक […]
डोंबिवलीत फेरीवाल्यांचा केडीएमसी अधिकाऱ्यावर बांबूने जोरदार हल्ला
अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर एका सँडविचवाल्याने हल्ला केल्याचा प्रकार के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या परिसरात घडला आहे. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात केडीएमसीचे अतिक्रमणविरोधी पथक प्रमुख सुरेश कामराज हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे […]
हे करून पहा –दूध आणि मखाणा देईल भरपूर ऊर्जा
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते. याशिवाय थकवा देखील जाणवतो. त्यामुळे ऊर्जा मिळविणे आणि थकवा घालवण्यासाठी दूध आणि मखाण्याची जोडी फार उपयुक्त ठरू शकते. दूध आणि मखाण्यात कॅल्शियम भरपूर असते. मात्र, थकवा तसेच अशक्तपणावर दुधात मखाणे टाकून किंवा त्याची पावडर टाकून घेतल्यास फायदा होतो. हाडांसोबत मांसपेशींची वाढ चांगली होते, तसेच ते मजबूत होतात. एक पेला दूध […]
छातीत, डोळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसून हत्या; आरोपीला अटक
प्रेयसीवर वाईट नजर ठेवतो या संशयातून टेम्पोचालकाच्या छातीत व डोळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना काशिमीरा येथील डचकूलपाडा येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काशिमीरा परिसरातील काशीगावातील डचकूल पाडा परिसरात प्रकाश वाळुंज हा टेम्पोचालक राहतो. काशीगावातील नीलकमल नाक्यावर त्याचा टेम्पोचा व्यवसाय होता. वाळुंज याची आरोपी सागर साळुंखेशी चांगली ओळख होती. वाळुंज याने […]
‘मुव्ही ट्रॅप’चा डासांच्या मुळावरच घाव! पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेचा अभिनव उपक्रम
पावसाळ्यात डासांच्या उपद्रवामुळे होणारे डेंग्यू, मलेरिया, झिका, चिकनगुनियासारखे आजार रोखण्यासाठी या वर्षीपासून पालिका ‘मुव्ही ट्रप’ हा अभिवन उपक्रम राबवणार आहे. ‘मुव्ही ट्रप’ या सापळ्यामध्ये यंत्राच्या ठेवण्यात आलेल्या पाण्याकडे अंडी घालणारी मादी आकृष्ट होऊन त्यातील पाण्यात अंडी घालणार आहे. मात्र पाण्यातील वैशिष्टय़पूर्ण कीटकनाशकांमुळे ही अंडी ताबडतोब नष्ट होणार आहेत. त्यामुळे कीटकांच्या निर्मितीच्या मुळावरच घाव घातला जाणार […]
महाराष्ट्राची कबड्डी हीच आयपीएल! खासदार संजय राऊत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
महाराष्ट्राचा खरा खेळ कबड्डी आहे, महाराष्ट्राची कबड्डी हीच आयपीएल आहे. शिवसेना नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी असते आणि पाठीशी सदैव राहणार, असा ठाम विश्वास देत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज कबड्डीपटूंचे धैर्य वाढवले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या वतीने विक्रोळीत आयोजित कबड्डी स्पर्धेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते […]
खारेगाव टोलनाक्याजवळ अपघातात दाम्पत्याचा मृत्यू, भरधाव डंपरने चिरडले
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ कंटेनर आणि दुचाकीमध्ये आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कंटेनर चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला चिरडले असून या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. या दाम्पत्याचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. कल्पेश रेवाळे (30) आणि त्यांची पत्नी मीनाक्षी रेवाळे (31) हे दोघेजण एका खासगी बँकेत कामाला होते. कल्पेश हा एचडीएफसी बँकेच्या अंधेरी […]
मराठा समाज पुढारलेला असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा फोल असून राज्यातील मराठा समाजात आजही मागासलेपण कायम आहे. या समाजाकडे तुच्छतेने पाहिले जाते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी आज हायकोर्टात केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब केली. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय […]
पाच हजार उरणवासीयांची कोंडी फुटली, गव्हाण फाटा ते चिरनेर रेल्वे फ्लायओव्हर ब्रीजचे उद्घाटन
चिरनेर ते गव्हाण फाटा मार्गावर मध्य रेल्वेच्या वतीने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे पाच हजार उरणवासीयांची वाहतूककोंडी फुटली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. मात्र पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उरण पूर्व […]
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाहाचा बार उडवणाऱ्यांची वरात थेट पोलीस ठाण्यात काढण्यात येणार आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेत बालविवाह रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालय, रिसॉर्टवर पोलिसांना कडक वॉच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त पाहून मुला-मुलींचे हात पिवळे करणाऱ्या यजमान्यांच्या हातात बेड्या पडणार आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या […]
आंबा सौख्य भरे ! अक्षय्य तृतीयेसाठी एपीएमसीत आल्या 94 हजार पेट्या
पाडव्याच्या सणाला सर्वसामान्यांना आंब्याची गोडी चाखता आली नसली तरी आता अक्षय्य तृतीयेला मात्र आमरस पुरीवर मनसोक्त ताव मारता येणार आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये अक्षय्य तृतीयेसाठी आंब्याच्या 94 हजार पेट्यांची आज आवक झाली. त्यामध्ये कोकणातील हापूसच्या सुमारे 59 हजार पेट्यांचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर 1 हजार 500 ते 4 हजार रुपये पेटीदरम्यान आले […]
अक्षय्य तृतीयेचा गोडवा वाढवण्यासाठी गुजरात, आंध्राचा आंबा बाजारात
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया साजरा करण्यासाठी धुळ्यासह खानदेशात मोठी तयारी झाली आहे. अक्षय्य तृतीया पूजन करताना आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा असल्याने यंदा बाजारात कोकणासह, गुजरात, आंध्र प्रदेशातील आंबे दाखल झाले आहेत. या आंबे खरेदीतून धुळ्यात लाखोंची उलाढाल होते. अक्षय्य तृतीयेला नाविन्याचा शुभारंभ केला जातो. पूजा करताना देवता आणि पूर्वजांना आमरस आणि […]
प्रसंगी गोंधळ करणाऱ्या धोंडगणावरही कारवाई करा
जत्रोत्सवात कोणतीही हयगय खपवून घेणार नाही. : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्ट आवाहन डिचोली. प्रतिनिधी शिरगाव येथील श्रीदेवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी प्रशासकीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्व तयारीची तालीम म्हणजेच मॉकड्रील घेण्यासाठी उपस्थित राहिलेल्या अधिक्रायांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अचानकपणे भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी एकत्रित या जत्रोत्सवासाठी काम करताना मस्ती करून गोंधळ घालणाऱ्या [...]
कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिक नितीन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दिवंगत माजी महापौर कल्याणी पाटील यांचे पती व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांचे ते भाऊ होत. कबड्डीपटू असलेल्या नितीन पाटील यांनी सुरुवातीस कोळसेवाडीमध्ये उपशाखाप्रमुख म्हणून कार्य करत. नंतर त्यांनी […]
टपाल कार्यालयात 10 लाख ऊपयांची अफरातफर
पोस्टल तिकीट विक्री केलेल्या पैशांचा घोटाळा त. भा. प्रतिनिधी पणजी : येथील मुख्य टपाल कार्यालयात 10 लाख 98 हजार 785 ऊपयांची अफरातफर झाल्याची घटना घडली आहे. याबाबत उप पोस्टमास्टर मनीषा झागडे यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयिताच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 316(5) अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला समन्स बजावण्यात आला [...]

30 C