जिल्ह परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून रत्नागिरी जिल्हा परिषदेची इमारत उभी राहिली असा दावा केला होता. त्यांच्या या थापेबाजीचा शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी खरपूस समाचार घेतला. इमारतीच्या भूमिपूजनाचे जुने व्हिडिओ दाखवत हा निधी अजित पवारांना दिला असे सांगितले व सामंत यांच्या थापाबाजीचा […]
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत एकेरीत दर्जा सेमेनिस्तजा, माई यामागूची, लिओलिया जीनजीन, मननचया सवांगींकवे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली. मुंबई येथील एमएसएलटीएच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत चुरशीच्या लढतीत काल […]
World Cancer Day ‘विश्वास’एनजीओतर्फे डॉक्टर्स, केअरटेकर्स आणि समाजसेवकांचा गौरव
मुंबईतील विश्वास या एनजीओतर्फे जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर कॅन्सर जनजागृती आणि रुग्णसेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे डॉक्टर्स, केअरगिव्हर्स (caregivers), समाजसेवक आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला. या एनजीओ तर्फे आयोजित ‘सिम्फनी ऑफ होप’ (Symphony of Hope) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरेश अग्रवाल यांनी स्थापन केलेली ‘विश्वास’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या […]
मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने अफगाणिस्तानचा 7 विकेटने धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियाला जिंकण्यासाठी 311 धावांचे मोठे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी तोडफोड फटकेबाजी करत गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. अॅरॉन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी आणि आयूष म्हात्रे या तिघांनीच अफगाणिस्तानला चोपून काढलं आणि सामनाही जिंकला. […]
राजपाल यादववर तुरुंगात जाण्याची वेळ! चेक बाऊन्स प्रकरण भोवलं, कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, सुमारे 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘चेक बाऊन्स’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत तुरुंग अधीक्षकांसमोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत. राजपाल यादवने 2010 साली इंदूर येथील सुरेंद्र सिंह यांच्याकडून ‘मुरली प्रोजेक्ट्स प्रायवेट लिमिटेड’ अंतर्गत 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले […]
T20 World Cup –संजू सॅमसनला तंबूत बसूनच मॅच पहावी लागणार! सराव सामन्यात नवीन सलामीवीराची एन्ट्री
हिंदुस्थानने आजपासून (04 फेब्रुवारी 2026) आपल्या टी20 वर्ल्डकपच्या अभियानाला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा सराव सामना खेळला जात आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये कोणते खेळाडू खेळणार आणि कोणाचा पत्ता अव्वल अकरामधून कट होणार, याचं चित्र आजच्या सराव सामन्यात जवळपास निश्चित होणार असल्याच मानलं जात आहे. याच पार्श्वभुमीवर संजू सॅमसनची अव्वल अकरामधून […]
किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक; लष्कराने परिसराला घेरलं
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. जम्मूतील किश्तवाड जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली. लष्कराने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या २ ते ३ दहशतवाद्यांना एका भागात घेरलं असून संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाड जिल्ह्यातील छत्रू भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या […]
Ratnagiri News –मातोश्रीला मानणारा शिवसैनिक पेटला; निवडणूकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त दोनच दिवस उरले आहेत. आपली नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत मातोश्रीच्या कट्टर शिवसैनिकांनी केळशी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या साथीने निवडणूक प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. केळशी जिल्हा परिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी आमखोल येथील गुणाजी महादेव गावणुक तर जुईकर मोहल्ला […]
युमनाम खेमचंद यांनी घेतली मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
भाजप नेते युमनाम खेमचंद यांनी बुधवारी मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिली असून ते मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत नागा पिपल्स फ्रंटचे आमदार लोधी दिखो व कुकी समुदायाचे नेमचा किपगेन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या वर्षभरापासून राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या मणिपूरमध्ये वर्षभरानंतर पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. 3 […]
पॉश सोसायटीतील तीन बहिणींनी मृत्यूला का कवटाळलं? काय आहे Korean Love Game? वाचा…
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पॉश सोसायटीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी ऑनलाईन गेमच्या व्यसनावरून पालकांनी रागावल्यामुळे इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. कोविडमध्ये लॉकडाऊन दरम्यान या मुलींना ऑनलाईन गेमचे व्यसन लागले. त्या तिघी टास्कवर आधारित एका कोरियन ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्या होत्या. काय आहे हा कोरियन लव्ह गेम? हा गेम मनोरंजनासाठी बनवलेला साधा गेम […]
विकासकामांच्या जोरावर विक्रांत जाधव विजयी होतील –शिवसेना नगरसेविका कांचन शिंदे
गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हापरिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी प्रचारात मुसंडी मारली असून गेल्या पाच वर्षांत त्यांनी केलेल्या विकासाकामांमुळे जनता त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे. विक्रांत जाधव यांच्या प्रचारात त्यांच्या मातोश्री सुवर्ण जाधव आणि बहिण नगरसेविका कांचन शिंदे उतरल्या आहेत. त्या माय- लेकी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. शिवसेना […]
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरी वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणखी चार तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 तासांहून अधिक वेळ झाला मात्र, वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेलं नाही. एकीकडे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. तर दुसरीकडे टोलच्या माध्यमातून पैशांची लुटू सुरू आहे. अपघातग्रस्त टँकरमधून ज्वलनशील गॅस दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये भरण्यात आलेला आहे. मात्र, अजूनही […]
Solapur News : सोलापूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक नवा फूट ओव्हर ब्रिज उभारणार
सोलापूर स्थानकात नवा एफओबी सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. सध्या स्थानकावरील दक्षिण दिशेला असलेला जुना फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) गर्दीसाठी अपुरा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने येथे अत्याधुनिक आणि प्रशस्त नवा फूट ओव्हर ब्रिज [...]
पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच ते संसदेत आले नाहीत; राहुल गांधींचा घणाघात
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. बुधवारी (४ फेब्रुवारी २०२६) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार होते. मात्र पंतप्रधानांचे हे संबोधन पुढे ढकलण्यात आले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानांचे भाषण पुढे ढकलण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी X […]
‘संस्कृत ही आपली भाषा आहे हा परिचय गेला तर संस्कृती टिकणार नाही. संस्कृत असेल तरच संस्कृती टिकेल आणि संस्कृती असेल तरच सुसंस्कृत माणूस निर्माण होईल’, अशा शब्दांत स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख डॉ. धनश्री (दीदी) तळवलकर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व प्रतिपादन केले. नाशिकच्या प. सा. नाट्यगृह येथे मंगळवारी (दि.३) ‘संस्कृत भाषा सभा आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यावतीने […]
Solapur News : सोलापूर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय; विशेष गाड्यांना मुदतवाढ
सोलापूर–अजमेर साप्ताहिक विशेष रेल्वेला मुदतवाढ सोलापूर : सोलापूर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रबासी व भाविकांसाठी दिलासादायक निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अजमेर तसेच तिरुपती-पंढरपूर मार्गावरील साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांना फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी, सण-उत्सव [...]
Sangli News : अजितदादांच्या अस्थिंचे हरिपूर संगमात विसर्जन
हरिपूर येथे कृष्णा–वारणा संगमावर अजितदादा पवार यांच्याअस्थींचे विसर्जन सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. सायंकाळी अस्थिंचे विधिवत पूजन करून हरिपूर येथे कृष्णा-वारणा संगमावर विसर्जन केले. [...]
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे 20 तासांपासून जाम, नागरिकांचे हाल पण सरकार ढिम्म; आदित्य ठाकरे यांची टीका
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी एक केमिकल टँकर उलटला होता. त्यानंतर मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या 20 तासांहून अधिक काळ ही स्थिती कायम आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. It’s beyond absurd that […]
Shirala News : बिऊर येथील बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू
नागरिकांचे सहकार्य प्रशंसनीय; बिबट्याचा शोध सुरू शिराळा : बिऊर येथील बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू ही दुर्देवी घटना आहे. वनविभागामार्फत पुणे येथील रेस्कु टीम आणि डॉग स्कॉड दाखल झाले असून बिबट्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती कोल्हापूर विभाग मुख्य बनरक्षक [...]
WPL Final 2026 –दोस्तीत कुस्ती! चमचमत्या ट्रॉफीसाठी जीवलग मैत्रीणी एकमेकांना भिडणार
WPL 2026 चा धुरळा आता अंतिम टप्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये विजेतेपदाची अंतीम लढाई होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत स्मृती मानधनाच्या बंगळुरूने थेट फायनलमध्ये धडक मारली होती. तर जेमिमाच्या दिल्ली कॅपिटल्सने क्लालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाची धुळ चारली आणि फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. विशेष म्हणजे या दोन्ही संघांच्या […]
Miraj Crime : मिरजेत सराईत गुन्हेगारांचा कुटुंबावर हल्ला
भाऊराव पाटील चौक परिसरात महिलेसह मारहाण मिरज : शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे एका इमारतीसमोर असलेल्या कॉफीशॉपची पाण्याची टाकी हटविल्याच्या कारणातून सराईत गुन्हेगार पिट्या भोरेसह चौघांनी दहशत माजवित राडा केला. इमारतीत राहणाऱ्या कुटुंबियांना अॅट्रॉसिटीची धमकी देऊन महिलेसह [...]
Kolhapur Crime : इचलकरंजीत युवकावर हल्ला, एकावर गुन्हा
एएससी कॉलेजजवळील बडापाव सेंटरवर हिंसाचार; इचलकरंजी : जोशी परिसर येथील एएससी कॉलेजजवळील पेट्रोल पंप शेजारी असलेल्या एका बडापाव सेंटरवर काम करणाऱ्या तरुणाव एकाने पाठीमागून येत लाकडाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या मनोज विलास [...]
मी कायम कार्यकर्ता, सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजा वैद्य धाराशिव- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे एकीकडे दुःख आहे, कार्यकर्ते यांच्या निवडणुका आहेत. उमेदवार, कार्यकर्ते याचा आग्रह, लाडक्या बहीण भावांना भेटायचं म्हणुन मी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उद्याच्या भविष्याचा फैसला व गावाच्या विकासाच्या या निवडणूका आहेत, लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगर परिषद याला यश दिले त्यांची पुनरावृत्ती होणार असे चित्र मला दिसत आहे. ही निवडणुक कार्यकर्ते यांची आहे, हेच आम्हाला निवडुन देतात व आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात. मी काल, आज व उद्याही कार्यकर्ता म्हणुन काम करणार. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो. पायाला भिंगरी लावुन फिरलो व सामान्य लोकांची कामे केली, बंद पडलेल्या योजना, प्रकल्प सुरु केले असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मुलीने वडिलांना फीस भरता येत नसल्याने ते आत्महत्या करतील या विचारातून स्वतः आत्महत्या केली, मनाला वेदना झाली मी 100 टक्के फीस माफ केली. शेतकरी सन्मान योजना सुरु केली. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकरी यांचा आहे. मी देखील आईची तगमग व पत्नीची धावपळ पाहिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरु केली. अनेक अडथळे आले मात्र ती सुरु ठेवली, 45 हजार कोटी यासाठी लागतात, कोण हिम्मत करीत नव्हते मात्र मी केली. महिला एकत्र आल्या व्यवसाय सुरु केल्याच्या यशोगाथा आहेत. 3 महिन्याचे 4 हजार 500 एकदम जमा होणार आहेत. कोणीही मायका लाल आला तरी योजना बंद होणार नाही. कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमची बैठक झाली. समिती गठीत केली असुन अहवाल आला की निर्णय घेऊन, जे बोललो ते करणार, तो निर्णय सुद्धा घेणार व शेतकऱ्यांना दिलासा देणार असे शिंदे म्हणाले. त्याला हिम्मत लागले, आम्ही देणारे हात आहोत. विरोधक काय बोलणार त्यांचे हात रिकामे आहेत. त्यावेळी सत्ता असताना काही दिले नाही आता तर काही नाही, मग काय देणार, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लागवला. आम्ही देणारे हात आहोत, देण्याची दानत लागते. रोजगार वाढले पाहिजेत त्यासाठी काम करणार असल्याचे शिंदे म्हणाले. लोकांना काय हवे आहे ते द्या असे आमचे धोरण आहे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सामान्य लोकांच्या जीवनात सोनेरी दिवस आणणारे आहोत, सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झाला हे पाहवत नाही, त्यांचा इतका पोटसुळ का? असा सवाल करीत त्यांनी टीका केली. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकासासाठी 1 हजार 800 कोटी दिले. लढाई खुर्चीची नाही लोकांसाठी आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेचे काम करणार, पैसे पेक्षा किती माणसे कमावली हे धोरण आहे. उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री असताना घेतला याचा अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. विरोधक येतील व आश्वासन देतील व खोटं बोलतील, दर महिन्याला लाडक्या बहिणींना ओवाळणी न चुकता बँकेत जमा होईल असे ते म्हणाले. पाणी, शेतीचा, चांगले रस्ते, वीज प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन त्यांनी दिले. उमरगा येथे नवीन पंचायत समिती इमारत, शास्वत पाणी आणू. लोहारा येथे एमआयडीसी करणार, मराठवाडा हा दुष्काळवाडा आहे हा शब्द पुसून काढायचा आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड सुरु करायचे असुन दुष्काळमुक्ती हा आमचा संकल्प आहे असे ते म्हणाले. यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार, नगराध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हा प्रमुख मोहन पनूरे, सुरज साळुंके, नितीन लांडगे, ऍड योगेश केदार, आनंद पाटील उपस्थितीत होते. उमरगा लोहारा येथे भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी महायुती झाली असल्याचे रवींद्र गायकवाड म्हणाले. असे असतानाही भाजपने माकणी येथे भाजपने उमेदवार दिला आहे. त्यांनी गद्दारी केली आहे त्यांना धडा शिकवा असे आवाहन गायकवाड यांनी केले. तिथे नातेवाईक, कार्यकर्ते यांची जास्तीत जास्त मते गोळा करा व भाजपला पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक म्हणाले की, ठाणे मुंबई पासुन इतक्या लांब मला इथला विकासासाठी करण्यासाठी नेमले. करोडो रुपयांची विकास कामे होत असुन येत्या 5 वर्षात अनेक कामे होतील. लाडक्या बहिणींना आर्थिक आधार देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला. धाराशिव जिल्ह्यात महायुतीचा विजय होऊन भगवा फडकेल असे ते म्हणाले. माकणीची जागा ही फक्त आणि फक्त शिवसेनेची आहे, तिथे सगळीकडे शिवसेना दिसली पाहिजेत, दुसऱ्या कुठल्याही बटणाला हात लावला तर शॉक लागेल असे सांगायला सुरुवात करा व मोठ्या मतांनी विजयी करा असे आवाहन पालकमंत्री सरनाईक यांनी केले.
हफ्ते न दिल्यास धमक्या व दबावाचा गंभीर आरोप सातारा : सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी राजेश वाघमारे यांच्या कार्यपद्धतीविरोधात गंभीर आरोप करत त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार मोतलिंग यांनी केली आहे. वाघमारे यांचा [...]
तेर येथे अस्थी कलशाचे दर्शन घेताना डोळे पाणावले
तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे स्व.अजित पवार यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेताना अनेकांचे डोळे पाणावले. तेर येथे माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या निवासस्थानी स्व.अजित पवार यांच्या अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थितांचे अस्थी कलशाचे दर्शन घेताना डोळे पाणावले. अस्थीचे तेरणा नदीच्या पाण्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Photo चाफा आणि तो… प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा गोरेचं लग्न ठरलं, या अभिनेत्यासोबतचे फोटो केले शेअर
‘स्टार प्रवाह’वर सुपरहिट ठरलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे हिचे लग्न ठरले आहे. अपूर्वाने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. या फोटोंसोबत तिने ‘चाफा आणि तो…. मला खुप आवडतात…’ अशी कॅप्शनही शेअर केली आहे. अपूर्वाचा होणारा नवरा हा देखील अभिनेता […]
Satara News : स्वच्छ भारत व जल जीवन मिशन कर्मचाऱ्यांचा मानधन न मिळाल्याने जिल्हा परिषद समोर आंदोलन
चार महिन्यांचे मानधन न मिळाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष सातारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा–२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांचे मानधन अद्याप अदा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या [...]
Satara News : साताऱ्यात शेकडो नागरिकांनी अजितदादांचे दर्शन घेऊन श्रद्धांजली केली अर्पण
अजितदादा पवार यांचे अस्थि दर्शन राष्ट्रवादी कार्यालयात सातारा : सातारा जिल्ह्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या अजितदादा पवार यांच्या अस्थि मंगळवारी साताऱ्यात दाखल झाल्या. पोवईनाका येथील दूध संघाशेजारील राष्ट्रवादी कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी दादांच्या या अस्थिंचे दर्शन घेतले. दादांचा हा अस्थिकलश पाहून सातारकरांचे डोळे पाणावले. [...]
सातारा शहरात हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा वाढवणार सातारा : सातारा शहर आणि उपनगरांतील वाढत्या चोऱ्या, चेन स्नॅचिंग आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शहराला पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी सातारा पोलीस आणि नगरपालिकेने संयुक्तपणे ‘तिसऱ्या डोळ्या’चे पाळत ठेवण्याचा [...]
Satara News : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पोलीस रूट मार्च
सातारा पोलिसांचे निवडणूक काळातील विशेष सुरक्षा उपक्रम सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी सातारा पोलिसांच्या वतीने प्रतापसिंहनगर व खेड परिसरात भव्य रूट मार्च काढण्यात [...]
Kolhapur News : महापालिकेत तयारी युद्धपातळीवर; महापौर दालनासह सभागृह सज्ज
महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण कोल्हापूर : महानगरपालिकेत महापौर, उपमहापौर निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होताच महापालिकेत महापौर दालनासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनांसाठी तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी ६ रोजी महापौर, उपमहापौर निवड होणार आहे. त्यासाठी सभागृहाच्या नूतनीकरणाचे कामही युद्धपातळीवर [...]
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या बेल्टची किंमत 82 हजार रुपये? नेटकरीही चक्रावले
भाजप नेते व खासदार अनुराग ठाकूर यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा लोकसभेतील एका चर्चेदरम्यानचा आहे. या व्हिडीओत ठाकूर यांनी घातलेल्या कंबरेच्या बेल्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभेत अमित शहा बोलत असताना विरोधकांनी गोंधळ केल्यानंतर अनुराग ठाकूर शहांच्या समर्थनार्थ उभे राहिले. त्याच काही सेकंदांचा त्यांचा […]
कर्मवीर मामासाहेबांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवा सुरू केली
वाशी:(प्रतिनिधी)- कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची १२३ वी जयंती येथील कर्मवीर महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे वाशी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक शंकरराव शिंदे,श्रीकांत थोबडे (माजी जनरल मॅनेजर महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई),महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मच्छिंद्र तात्या कवडे, भाई भगवानराव उंदरे(माजी सरपंच वाशी),प्राचार्य डॉ.अशोक कदम,पत्रकार प्रा.शहाजी चेडे,प्रा.श्रीराम ढेपे व प्रा.विश्वास चौधरी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते मामांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना भाई भगवानराव उंदरे म्हणाले कि, वाशी सारख्या ग्रामीण भागामध्ये कर्मवीर डॉ.जगदाळे मामांनी हायस्कूल आणि महाविद्यालय काढल्यामुळे गोर गरीब कष्टकऱ्यांची व शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करत आहेत. मच्छिंद्र तात्या कवडे म्हणाले कि, हे महाविद्यालय सुरु करत असताना खूप अडचणी आल्या पण गावकऱ्यांच्या मदतीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे महाविद्यालय सुरु केले गेले व आज ते नावारूपाला आले आहे असे त्यांनी सांगितले. ओश्रीकांत थोबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि,मामांच्या संस्थेतील विद्यार्थांना शिक्षण आणि उच्च संस्कार मिळाले त्या आधारे त्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले असे ते म्हणाले. पोलिस निरीक्षक शंकरराव शिंदे म्हणाले की,या संस्थेने विविध शाखा चालवत असताना पैशाचा विचार न करता विद्यार्थांना शिक्षण दिले तसेच ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांच्या आरोग्याविषयी अडचणी सोडवल्या असे ते म्हणाले. प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम यांनी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक कार्याविषयी आणि महाविद्यालयातील विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ दैवशाला रसाळ यांनी केले तर आभार प्रा.अजित तिकटे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.
Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेत महायुतीचे स्पष्ट बहुमत; नगरसेवक सहलीवर रवाना
कोल्हापुरात महायुतीचे नगरसेवक निघाले सहलीला कोल्हापुर : कोल्हापुर महापालिका निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळाल्या आहेत. तर कॉग्रसला ३५ जागा मिळाल्या आहेत. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असुन महापौर,उपमहापौर पदाचे उमेदवार महायुतीने जाहीर केले असुन ६ फेब्रुवारी रोजी महापौर उपमहापौर पदाची निवडणुक होणार आहे. या पार्श्वभुमीवर महायुतीच्या [...]
सरमळेतील शतायुषी सावित्री डोईफोडे यांचे निधन
ओटवणे : प्रतिनिधी कष्टकरी जीवनाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या सरमळे येथील शतायुषी सावित्री भैरू डोईफोडे (१०५) यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या या आजी चार पिढ्यांचा चालता बोलता इतिहास म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत डोईफोडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.कष्टकरी आणि संघर्षाच्या [...]
Ratnagiri News : प्रकाश भिवंदे यांची प्रचारात जोरदार आघाडी
घरोघरी प्रचार करत मतदारांच्या थेट संपर्कात प्रकाश भिवंदे राजापूर : राजापूर तालुक्यातील जुवाठी पंचायत समिती गणामध्ये अपक्ष उमेदवार प्रकाश भिवंदे घरोघरीजाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत असून त्यांना मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद लाभत आहे. गेली 25 वर्षे आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात [...]
मुंबई-पुणे महामार्ग गेल्या 22 तासांहून अधिक वेळ बंद आहे. ओडोशी बोगद्यावर प्रोपेलिस गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. काल रात्रीपासून वाहने घाटामध्ये अडकून आहेत. अजून वाहतूककोंडी सुरू आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईला […]
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘मिया’ (बंगाली भाषिक मुस्लिम) समुदायाबाबत केलेल्या विधानाचा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम समाजाला लक्ष्य करून विधान केले आहे, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. हे मुख्यमंत्री नेहमीच ध्रुवीकरणाच्या गोष्टी करतात आणि मुस्लिमांच्या विरोधात बोलतात, अशी टीका खरगे यांनी बुधवारी राज्यसभेत केली. ते […]
प्रसन्न जीवन जगण्यास योग, ध्यान व प्राणायाम अवलंब करणे आवश्यक- स्वामी ब्रह्मचैतन्य
धाराशिव (प्रतिनिधी)- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात आर्ट ऑफ लिव्हिंग व्याख्याते स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी शारीरिक व मानसिक आरोग्यया विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षस्थान भुषविले. मत्सर सोडा, प्रगती साधा स्वामीजींनी आपल्या मार्गदर्शनात मानवी स्वभावावर मार्मिक भाष्य केले. ते म्हणाले की, आज काही माणसांना दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. दुसऱ्याच्या प्रगतीत अडथळे आणण्याची वृत्ती ही विघातक आहे. प्रसन्न जीवन जगण्यासाठी आपल्या भावना शुद्ध असणे आवश्यक आहे. आपण जितके विचार उच्च ठेवू, तेवढीच आपली प्रगती होण्याची दाट शक्यता असते. बुद्धी विशाल आहे, तिचा वापर सकारात्मकतेसाठी करा. यशाचा राजमार्ग यशस्वी लोकांच्या जीवनशैलीचा दाखला देत स्वामी ब्रह्मचैतन्य म्हणाले की, जगातील सर्व यशस्वी लोक प्राणायाम आणि ध्यानाचा आधार घेतात. सुदर्शन क्रियेमुळे आत्मविश्वास तर वाढतोच, शिवाय सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो. प्राणायामामुळे मनातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ध्यानामुळे मन स्थिर होते आणि माणसाला एकांतातही आनंदी राहण्याची कला अवगत होते. कष्ट आणि सुखाची व्याख्या कष्ट शरीराला होतात आणि दुःख आत्म्याला. जीवनात जेवढे जास्त कष्ट उपसाल, तेवढ्याच उंचावर तुम्ही जाल. याउलट, जीवनात जेव्हा प्रमाणाबाहेर सुख येते, तेव्हा माणूस 'बेहोशी'मध्ये जातो. अशा वेळी साधनाच माणसाला खरा जीवनमार्ग दाखवते. तप केल्याने व्यक्तित्व निखरते,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी गौतम बुद्धांची एक प्रेरणादायी कथा सांगितली. राजवाड्यातील सुखसंपन्न जीवन जगत असताना माणूस म्हातारा होतो, आजारी पडतो आणि मृत्यू अटळ आहे, याची जाणीव बुद्धांना नव्हती. परंतु जेव्हा त्यांनी वृद्ध, आजारी व मृत व्यक्ती पाहिल्या, तेव्हा जीवनाचे खरे सत्य त्यांच्या लक्षात आले आणि त्यातूनच ध्यान, साधना व आत्मज्ञानाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. माणसाने सतत सकारात्मक विचार करत राहिले पाहिजे, कारण सकारात्मकतेमुळे नकारात्मकता आपल्या जवळ येत नाही. नियमित व्यायाम, योग, प्राणायाम व ध्यान केल्यास मानसिक व शारीरिक विकास होण्यास मोठी मदत होते. अशा साधनेमुळे मन प्रसन्न राहते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवन अधिक संतुलित व आनंदी बनते, असे त्यांनी सांगितले. यावेळी स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की या जगात कोणीही कोणावाचून राहत नाही, माणूस गेल्यानंतर काही दिवसांत सर्व काही पूर्ववत होते, त्यामुळे जीवनात अनावश्यक ताण घेऊ नये. नियमित व्यायाम, योग व प्राणायाम केल्यास माणूस अधिक काळ निरोगी व सुदृढ राहू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या तणाव, अभ्यासातील एकाग्रता, भीती व संभ्रम यावर उपाय सांगताना त्यांनी सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची असल्याचे नमूद केले. व्याख्यानानंतर स्वामीजींनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे विशेष 'भस्त्रीका व ध्यान सत्र'घेण्यात आला तसेच सुमारे १८ मिनिटांचे ध्यान सत्र घेण्यात आले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना मानसिक शांतता, आत्मविश्वास व ऊर्जाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघश्याम पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षीय समारोप केला व तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. जितेंद्र शिंदे यांनी आभार मानले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास हजर होते.
समता वारी ही समाजपरिवर्तनाची चळवळ - सचिन पाटील
तेर (प्रतिनिधी)- “समता वारी हा केवळ धार्मिक प्रवास नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. हा विचार दूरगामी समाजहिताचा असून तरुणांनी या वारीत सहभागी होत समतादूत बनावे,” असे प्रतिपादन समता वारीचे निमंत्रक, संत चोखामेळा चरित्र अभ्यासक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक सचिन पाटील यांनी केले. तेर येथे चोखोबा वाणी दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना त्संयांनी ही माहिती दिली. चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा शुभारंभ रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथे, संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित अभिवादन सभेतून झाला. या सभेत सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संत विचारांचा जागर करण्यात आला. भागवत धर्म व वारकरी परंपरेतील संतांनी सांगितलेल्या समता, मानवता व बंधुभाव या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. यंदा या वारीचे आठवे वर्ष असून, ही वारी महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांतून सुमारे १७५० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ही वारी मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, उमरगा, माकणी, औसा, तुळजापूर, धाराशिव, तेर, कसबे तडवळे, येरमाळा, भूम–पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, पैठण, जालना, सिंदखेडराजा, मेहुणाराजा, देऊळगाव राजा, संभाजीनगर, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे व आळंदी या मार्गे येऊन देहूगाव येथे समाप्त होणार आहे. वारीदरम्यान संतांनी मांडलेल्या समता, बंधुता व मानवतेच्या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार असून, संत चोखामेळा महाराजांची उत्सवमूर्ती विशेष सजविलेल्या रथात विराजमान असणार आहे. शाळा, महाविद्यालये, वाड्या-वस्त्या, गावे व शहरे येथे जाऊन समाजप्रबोधन करण्यात येणार आहे. आज समाजात वाढत चाललेली जातीय व धार्मिक दरी कमी व्हावी, माणसा-माणसातील नाते दृढ व्हावे आणि ‘जात, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व भारतीय आहोत’ हा विचार रुजावा, या उद्देशाने समता वारीचे आयोजन करण्यात येते. एकसंघ समाज हेच राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे, असा संदेश ही वारी देत आहे. यावेळी सचिन पाटील यांच्यासह अविनाश अभंगराव, महादेव ढेंबरे, डॉ. लक्ष्मण हेंबाडे, तात्यासाहेब येरमाळकर ,आशिष यादव, ॲड. रोहित मुंडे, कालिदास सदगर आदी समता वारी प्रतिनिधी उपस्थित होते. चोखोबावाणी दिनदर्शिकाचे तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात प्रकाशन करण्यात आले . यावेळी तेर येथील राहुल गायकवाड, सुनिल गायकवाड, नरहरी बडवे आदी उपस्थित होते.
Ratnagiri News –पाली-दळवटणे रामवाडी परिसरात भीषण वणवा, फळबागा आगीच्या भक्षस्थानी
चिपळूण तालुक्यातील पालीकडून दळवटणे येथील रामवाडी परिसरात आज (04 फेब्रुवारी 2026) दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास भीषण वणवा लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केल्याने परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरले होते. या वणव्यामुळे परिसरातील आंबा कलमे तसेच इतर फळबागा आगीच्या भक्षस्थानी सापडल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. […]
Solapur News : सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूरमध्ये भव्य रथ मिरवणूक
सोलापूरमध्ये सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची रथ यात्रा सोलापूर :‘सद् गुरू नाथांचा जयजयकार जयजयकार….’, ‘जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रम्ह सद् गुरू’ च्या अखंड जयघोषात हजारो भाविकांनी रथ ओढत भक्तिमय वातावरणात उत्साहात रथ मिरवणूक काढली. निमित्त होते श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांच्या [...]
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. अमेरिकेने हिंदुस्थानकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. पण मला एक ते दोन गोष्टींची चिंता वाटते. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचे चित्र आणखी एक दोन दिवसांत स्पष्ट होईल. यानंतर सविस्तर भाष्य करणं योग्य ठरेल, असे […]
उधमपूर चकमक; सुरक्षा दलांना मोठं यश, जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी सुरू झालेली ही चकमक बुधवारीही सुरू होती. उधमपूरच्या बनसंतगड भागात ही कारवाई करण्यात आली असून हिंदुस्थानी लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे हे अभियान […]
विरोधी पक्षनेते आणि राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू दिले जात नव्हते. यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात गोंधळ घालत त्यांना प्रश्न विचारला. या प्रकरणी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला. “जेव्हा जेव्हा सरकारला संसदेत गोंधळ घालायचा असतो, तेव्हा ते निशिकांत दुबे यांना पुढे करते,” असा थेट आरोप त्यांनी केला. […]
धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातून गूढ आवाजांचे जोरदार धक्के
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात आज बुधवार दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सकाळी ठीक 9.26 वाजता आणि त्यानंतर 9.36 वाजता कळंब, धाराशिव, तुळजापूर तसेच परिसरातील इतर भागांमध्ये भूगर्भातून आलेल्या गूढ व जोरदार आवाजांचे धक्के नागरिकांना जाणवले. या धक्क्यांची तीव्रता इतकी होती की, अनेक घरांच्या भिंती जोरात हलल्या, तर खिडक्या व दारे थरथरली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर आले. काही वेळासाठी गावोगावी आणि शहरातील वसाहतींमध्ये लोक एकमेकांकडे धाव घेत चौकशी करू लागले. काही नागरिकांनी हा अनुभव भूकंपासारखा असल्याचे सांगितले, तर काहींनी जमिनीखालून मोठा स्फोट झाल्यासारखा प्रचंड आवाज ऐकू आल्याचे नमूद केले. काही सेकंदांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या आवाजांमागे भूगर्भातील हालचाल, नैसर्गिक दाबातील अचानक बदल, किंवा इतर तांत्रिक कारणे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध स्तरांवरून या घटनेचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.सोशल मीडियावर मात्र या घटनेनंतर भूकंप झाल्याचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अधिकृत यंत्रणांकडून अद्याप भूकंपाबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.10 ते 10.00 मिनिट या सुमारास कळंब - ढोकी जिल्हा धाराशिव परिसरात भूगर्भातून गुढ आवाज होऊन भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. सबब माहितीची जिल्हा प्रशासनाने त्वरित नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली असता त्यांचेकडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार,या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की,नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये. जिल्हाधिकारी धाराशिव.
क्लब सुरू करण्यासाठी 40 हजार लाचेची मागणी; पोलीस हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
धाराशिव (प्रतिनिधी)- क्लब सुरू करण्यासाठी 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेश महादेवराव शेळके हे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदारास शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्लब सुरू करायचा असून त्यासाठी पोलीस हवालदार शेळके यांनी स्वतःसाठी व इतर लोकसेवकांसाठी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 8 डिसेंबर 25 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान पोलीस स्टेशन शिराढोण येथे झालेल्या भेटीत शेळके यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पहिला हप्ता म्हणून 5 हजार रुपये ‘साहेबांना विचारून सांगतो’ असे म्हणत स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत उघड झाले. एसीबीने 15 व 19 डिसेंबर 25 रोजी सापळा कारवाईचे प्रयत्न केले. मात्र, संबंधित पोलीस हवालदार रजेवर असल्याने तसेच मोबाईल स्विच ऑफ असल्याने सापळा यशस्वी होऊ शकला नाही. तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने पुढील संपर्क टाळला जात असल्याचे तक्रारदाराने एसीबीला कळवले. या पार्श्वभूमीवर 3 फेब्रुवारी 26 रोजी पोलीस हवालदार राजेश शेळके यांच्याविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 7 व 7(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपीच्या अंगझडतीत काहीही आढळले नसून घरझडतीची कारवाई सुरू आहे. अटक अद्याप झालेली नाही. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश भालचंद्र वेळापुरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक विजय वगरे करीत आहेत. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांनी केले.
सोलापूर (प्रतिनिधी)- यातील हकिकत - यातील आरोपी प्रल्हाद विठ्ठल मोरे (कनिष्ठ सहाय्यक वर्ग -1) व मारुती बापू ठोकळे (कनिष्ठ सहाय्यक व भांडारपाल वर्ग -3) उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पंढरपूर या कार्यालयात कार्यरत होते. मूळ तक्रारदार उत्तमराव जोंधळे, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पंढरपूर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन, रजा रोखीकरणातील फरकाची रक्कम, वेतनातील फरकाची रक्कम तसेच सुधारित निवृत्तीवेतनाप्रमाणे वेतन विक्रीचा फरक अशी बिले मिळालेली नव्हती, म्हणून ती बिले मिळण्यासाठी तक्रारदार जोंधळे यांनी उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पंढरपूर या कार्यालयात दि.11/09/2009 रोजी विनंती अर्ज दिला होता. सदर अर्जानुसार वेतननिश्चिती आदेश प्राप्त झाल्यानंतर देयके अदा केली जातील, असे त्यांना लेखी कळविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी सदर कार्यालयातील प्रल्हाद मोरे, कनिष्ठ सहाय्यक यांची भेट घेऊन वरील नमूद बिले मंजुरीस पाठवण्यास सांगितले असता, त्यांनी सदर बिलाचे काम करण्यासाठी रक्कम रु. 5,000/- च्या लाचेची मागणी केली. त्यानंतर दि. 20/11/2009 रोजी तक्रारदार जोंधळे यांनी एमबी रजिस्टर व वाहनगणती मस्टर व रोजगार हमी योजना मस्टर तात्काळ जमा करावे व कार्यालयाकडून येणे- देणे नसल्याबाबतचा दाखला आणल्याशिवाय वेतन निश्चिती केली जाणार नाही, असे पत्राव्दारे कळविण्यात आले होते. त्यावेळी मारुती ठोकळे, भांडारपाल यांनी रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यासाठी जोंधळे यांच्याकडे रक्कम रु. 2,500/- ची मागणी केली. सदर लाच मागणीसंदर्भात जोंधळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे आरोपी प्रल्हाद मोरे व आरोपी मारुती ठोकळे यांच्या विरोधात दि. 17/08/2010 रोजी तक्रार दिलेली होती. सदर लाच मागणीबाबतची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात येऊन आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुढील सापळा रचण्यात आला, सदर सापळा कारवाईत आरोपी मारुती ठोकळे यांना स्वतःसाठी म्हणून लाच रक्कम रु. 2,500/- व आरोपी प्रल्हाद मोरे यांच्यासाठीची म्हणून लाच रक्कम रु. 5,000/- असे एकूण रक्कम रु. 7,500/- तक्रारदार जोंधळेकडून स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक करून दोन्ही आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलमान्वये पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध पंढरपूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार व कागदपत्रांच्या आधारे दोन्ही आरोपी प्रल्हाद मोरे व मारुती ठोकळे यांनी लाचेची मागणी केल्यासंदर्भातील कोणताही ठोस व सबळ पुरावा आलेला नसून साक्षीदारांच्या जवाब अनेक महत्त्वपूर्ण विसंगती व त्रुटी असल्याचे, तसेच आरोपीस तक्रारदाराचे कोणतेही काम आरोपींकडे प्रलंबित नसताना केवळ कार्यालयामार्फत जोंधळे यांच्याविरुद्ध केले जाणाऱ्या कारवाईस बगल देणेसाठी तक्रारदाराने दोन्ही आरोपी प्रल्हाद मोरे व मारुती ठोकळे यांना खोटेपणाने गुंतविण्यात आल्याचे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सदर प्रकरणात दोन्ही आरोपी प्रल्हाद मोरे व मारुती ठोकळे यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही लोकसेवक आरोपींची लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचे कलम 7, 12, 13(1)(ड), सह 13(2) मधून पंढरपूर येथील मे. श्री. एस. जी. नंदीमठ, विशेष न्यायाधीश, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे. तत्कालीन सक्षम प्राधिकारी श्री. वीरेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर यांनी प्रस्तुत प्रकरणात मंजुरी देताना कार्यालयीन कागदपत्राची शहानिशा न करता सारासार विवेक बुद्धीचा वापर केला नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेले आहे. सदर प्रकरणात दोन्ही आरोपींच्यावतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. शिल्पा कुलकर्णी (भारत सरकार नोटरी), ॲड. प्रभाकर गायकवाड व ॲड. कुमार बाबर, पंढरपूर व ॲड. राणी गाजूल यांनी काम पाहिले.
प्रा. श्रीराम मुळीक यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार
कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील सुपुत्र प्रा. श्रीराम मुळीक यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत चित्रपट युनियनतर्फे प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या भव्य समारंभात प्रसिद्ध फाईट मास्टर श्री. जावेद हैदर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. श्रीराम मुळीक यांनी आजवर अनेक गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत शिक्षणाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवली आहे. शिक्षणापुरतेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तीन अनाथ मुलींच्या विवाहासाठी आर्थिक व मानसिक आधार दिला. तसेच दोन भिकाऱ्यांना व्यवसाय उभा करून देत स्वावलंबनाचा मार्ग दाखवला, ज्यामुळे ते सन्मानाने उदरनिर्वाह करत आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, चित्रपट अभिनेते सुनील गोडबोले, अजित मामुनकर यांच्यासह मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. या सन्मानामुळे कळंब व वाशी तालुक्याचा नावलौकिक राज्यपातळीवर उंचावला असून, प्रा. श्रीराम मुळीक यांच्यावर मित्रपरिवार, विद्यार्थी व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांचा शहरी विद्यार्थ्यांशी होणारा अन्यायकारक फरक दूर केला जाईल
धाराशिव (प्रतिनिधी)- शेती, शेतकरी, ग्रामीण युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवून आणणारा ठोस विकासाचा आराखडा हाच आमचा अजेंडा असून, केवळ घोषणा नव्हे तर परिणामकारक अंमलबजावणी हेच आमचे धोरण आहे. शेतीसाठी सिंचन व पाणलोट विकासाच्या कामांना गती देत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवणे, दुष्काळ व अवकाळी संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि शेतमालाला योग्य व हमीभाव मिळवून देणे हा आमचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था अधिक दर्जेदार, आधुनिक व सुविधा-संपन्न करणे हे आमचे प्राधान्य असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळा, डिजिटल शिक्षण, क्रीडा व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचा शहरी विद्यार्थ्यांशी होणारा अन्यायकारक फरक दूर केला जाईल. अशी माहिती खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते. आरोग्याच्या बाबतीत गावपातळीवर वेळेवर, सक्षम आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट केली जातील. असे आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.
कळंब शहर व्यसनाच्या विळख्यात; 12 ते 30 वयोगटातील तरुण सुलोचनच्या आहारी
कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहर सध्या व्यसनांच्या विळख्यात अडकत चालले असून, विशेषतः 12 ते 30 वयोगटातील तरुण पिढी सुलोचन ओढण्याच्या आहारी गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम व्यसन सुरू असताना कळंब पोलीस प्रशासनाचे संशयास्पद दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. व्यसनाच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरात हाणामाऱ्या, वादविवाद, दहशतीचे प्रकार आणि किरकोळ गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे शांत शहराची ओळख पुसली जात असून, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. जर वेळीच ठोस कारवाई झाली नाही, तर ही व्यसनाची लाट तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करेल, असा गंभीर इशारा जाणकार व्यक्त करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून शहरात विशेष मोहीम राबवावी, व्यसन विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि तरुण पिढीला या दलदलीतून बाहेर काढावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रा. युसुफ मुल्ला यांचा राज्यस्तरीय आय.टी. एक्सलंस अवार्ड देऊन गौरव
उमरगा (प्रतिनिधी)- मायक्रोकॉम कंम्प्युटर एज्युकेशनचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला यांना पुणे येथील ग्लोबल इलाईट मेडीया अँड टेकच्यावतीने दिला जाणारा संगणक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आय.टी. एक्सलंस महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार 2026 देण्यात आला. हा पुरस्कार प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते रविवारी दि. 1 फेब्रुवारी रोजी हिंजवडी (पुणे) येथे देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला उद्योजक तथा संचालक महेश व्यवहारे आणि कार्तिकेश बोरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. मायक्रोकॉम ही संगणक संस्था गेल्या 26 वर्षापासुन कार्यरत असुन या संस्थेस यापुर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले आहे. या संस्थेच्या माध्यमातुन जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यात आले. अनेक बेरोजगार युवकांना संगणक कोर्सच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल आमदार प्रविण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नगरसेवक विजय दळगडे, प्राचार्य दिलीप गरुड, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे, अध्यक्ष धनंजय मेनकुदळे, सचिव राजु जोशी, प्रा. शौकत पटेल आदींनी अभिनंदन केले आहे. या पुरस्काराबद्दल मायक्रोकॉम संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमासाठी सचिन नाईक, सुप्रीया नाईक यांनी पुढाकार घेतला. गणेश मोडवे यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना 7 फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाही व्यवस्थेत 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाचा मतदान करणे हा मूलभूत हक्क आहे.लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील तरतुदीनुसार मतदानाच्या दिवशी सर्वसामान्य मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी रजा देणे किंवा कामाच्या तासात योग्य ती सवलत देणे आवश्यक आहे. मात्र,काही निवडणुकांमध्ये काही संस्था व आस्थापना त्यांच्या कामगारांना अशी रजा किंवा सवलत देत नसल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतात. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 7 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यात जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुक होणार आहेत. या निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी व कर्मचारी हे कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी रजा देण्यात यावी.तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना,कारखाने,दुकाने व इतर आस्थापना (खाजगी कंपन्यांमधील आस्थापना,सर्व दुकाने,निवासी व अनिवासी हॉटेल्स,खाद्यगृहे,नाट्यगृहे, व्यापार,औद्योगिक उपक्रम तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या,शॉपिंग सेंटर्स,मॉल्स, रिटेलर्स इत्यादी) यांना हे आदेश बंधनकारक राहतील. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असलेल्या धोरणात्मक किंवा लोकोपयोगी सेवा देणाऱ्या आस्थापनांच्या संदर्भात,संबंधित अधिकारी,कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवसाची रजा देणे शक्य नसल्यास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक आहे.ही सवलत देण्याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे बंधनकारक आहे. उद्योग,ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना,कारखाने व दुकाने यांचे मालक व व्यवस्थापन यांनी वरील सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे शासनाने निर्देश दिले आहे. मतदारांकडून मतदानासाठी आवश्यक रजा किंवा सवलत न मिळाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही शासनाने दिला आहे.या आदेशामुळे येत्या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला निर्भयपणे व निर्बंधांशिवाय आपला मतदानाचा हक्क बजावता येणार असून लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
पदापेक्षा माणुसकी मोठी असते... जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्श
धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 2 फेब्रुवारी रोजी एक प्रसंग पाहायला व अनुभवायला मिळाला,जो पद,अधिकार आणि प्रशासनाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचे खरे दर्शन घडवणारा ठरला.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील,आपुलकीच्या आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा आली. सेवेची तब्बल 35 वर्षे पूर्ण करून जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय कुलकर्णी 2 फेब्रुवारी रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. प्रशासनात कार्यरत असताना त्यांनी प्रामाणिकपणे,निष्ठेने व समर्पित भावनेने आपली जबाबदारी पार पाडली.अशा निष्ठावान कर्मचाऱ्याचा सन्मान हा केवळ औपचारिक न राहता,मनापासूनचा असावा,याचे जिवंत उदाहरण 2 फेब्रुवारी रोजी पाहायला मिळाले.सेवापूर्ती कार्यक्रमानंतर सायंकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी पुजार यांनी एक अत्यंत भावस्पर्शी निर्णय घेतला. स्वतःच्या शासकीय वाहनात कुलकर्णी यांना स्वतःच्या जागेवर बसवून, स्वतः मात्र समोर सुरक्षा रक्षकाच्या जागेवर बसून त्यांना घरी सुखरूप पोहोचवले आणि त्यानंतरच आपल्या शासकीय निवासस्थानी परतले. हा केवळ एक प्रसंग नव्हता,तर अधिकारी, कर्मचारी नात्यातील जिव्हाळा, प्रामाणिकपणाला मिळालेली माणुसकीची पावती आणि नेतृत्व म्हणजे काय याचा आदर्श ठरलेला क्षण होता. अधिकारी असूनही कर्मचाऱ्यांवर कुटुंबातील सदस्यासारखे प्रेम करणारे, त्यांच्या कार्याचा आदर करणारे आणि माणुसकी जपणारे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार अनेकांच्या मनात आदराने घर करून गेले. अशा संवेदनशील, माणुसकीने भरलेल्या नेतृत्वाला मनापासून वंदन.
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन
देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या टेरेसवरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण आयआयटी परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नमन अग्रवाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो राजस्थानमधील पिलानी येथील रहिवासी होता. […]
20 तासांनंतरही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी, गाड्यांच्या रांगा असतानाही टोल वसूली
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे तसेच जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, गेल्या 20 तासांहून अधिक काळ ही स्थिती कायम आहे. खालापूर टोल नाक्यापासूनच वाहतूक संथ गतीने सुरू असून खोपोली ते लोणावळा घाट सड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काल संध्याकाळी एक केमिकल टँकर उलटल्याने या वाहतूक कोंडीला सुरुवात झाली होती. […]
गोवेरी-म्हारसेवाडीत गव्यांचा उच्छाद
वार्ताहर/कुडाळ कुडाळ तालुक्यातील गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गव्यांचा वावर वाढला असून बुधवारी सकाळी या परिसरातील ग्रामस्थ प्रथमेश तेंडोलकर यांना सात-आठ गव्यांचा कळप निदर्शनास आला.त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सध्या या भागात गवारेड्याचा कळप बिनधास्तपणे वावरत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची, शेंगदाणा, कुळीथ, भाजीपाला लागवड केली आहे. त्यामुळे [...]
Photo –आदित्य ठाकरेंनी माळी कुटुंबीयांना दिला धीर
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी बारामती येथील विमान अपघातात मृत्यू पावलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी शिवसेना तुमच्या सोबत आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी माळी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर उपस्थित होते.
‘बंद दाराआड न्याय रडतोय!’; SIR वरून ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक
‘आज न्याय बंद दाराआड रडत आहे’, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर (ECI) कडाडून हल्ला चढवला. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) प्रक्रियेला आव्हान देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आज थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कक्षात प्रवेश केला आणि आपली बाजू मांडली. निवडणूक आयोगाकडून मतदार यादी सुधारण्यासाठी (SIR) जी […]
महापालिकेच्या निवडणुकीनंतर नांदेड पोलीस अलर्ट मोडवर आले असून, मंगळवारी (03 फेब्रुवारी 2026) जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणार्यांविरुध्द तसेच अवैध जुगार व अवैध जनावरे वाहतूक करणर्या इसमावर कारवाई करुन २३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप […]
बिलासपूरमध्ये प्रेयसीकडून प्रियकराची चाकू भोसकून हत्या, कारण जाणून धक्का बसेल
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रियकराने आपला मोबाईल नंबर आणि मेसेज ब्लॉक केल्यामुळे संतप्त झालेल्या एका 22 वर्षीय तरुणीने प्रियकराची चाकू भोसकून हत्या केली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिलासपूर येथील गौरी गणेश कॉलनीमध्ये घडली. रोशनी सूर्यवंशी […]
देवरुख शहराला २४ तास व सातही दिवस अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी आमदारांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत बावनदी पात्रात उभारण्यात येत असलेल्या धरणाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी केला आहे. सुमारे ६ कोटी रुपयांची ही योजना असून काम पूर्ण होईपर्यंत खर्च […]
Ratnagiri News : जनतेच्या पाठिंब्यामुळे आपला विजय निश्चित ; दिनेश जैतापकर जैतापकर यांंचा विश्वास
जुवाठी गटातील रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्धार राजापूर : गेली अनेक वर्षे राजकारणात कार्यरत असतानाही मी निव्वळ समाजोपयोगी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजसेवा हा छंद समजून मी आजवर कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात शक्य तेवढे योगदान [...]
Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत महिला उमेदवारांची जोरदार रस्सीखेच
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची? कोल्हापुर : निम्मापेक्षा अधिक जागेवर जिल्हा परिषद मतदार संघातुन महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद यावेळी महिलांसाठीच आहे . त्यामुळे या पदावर कोणत्याही जातीतील उमेदवार दावेदार होऊ शकतात. त्यामुळे [...]
संसदेत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पुस्तकावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “लोकसभा अध्यक्ष म्हणतात की हे पुस्तक अस्तित्वात नाही. सरकार म्हणते ते अस्तित्वात नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही हे पुस्तक नाही असे सांगतात. पण देशातील प्रत्येक तरुणाला माहीत आहे की हे पुस्तक अस्तित्वात आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मोदींची संसदेत […]
Ratnagiri News : धोपेश्वर गणातील जनता माझ्या कामाची पोचपावती देईल! ; अभिजीत गुरव यांचा विश्वास
पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात अभिजित गुरव राजापूर : मी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिलेला आहे. त्यामुळे गेली १५ वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य जनतेसाठी आपण जे योगदान दिले आहे, त्याची जाणीव ठेऊन माझ्या धोपेश्वर गणातील जनता मला [...]
मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच धाडसी घटना समोर आली आहे. मडवडा पंचायतीतील एका अंगणवाडी केंद्रात मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यापासून 20 मुलांचे प्राण वाचवताना एका अंगणवाडी सेविकेने आपल्या प्राणांची आहुती दिली. कांचनबाई मेघवाल, असे या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी केंद्राच्या आवारात मुले नेहमीप्रमाणे खेळत होती. अचानक मधमाशांच्या एका मोठ्या थव्याने […]
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात जाहीर झालेल्या नव्या व्यापार करारावर देशभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा करार नेमका कशासाठी, कोणत्या अटींवर आणि कुणाच्या हितासाठी करण्यात आला, याबाबत हिंदुस्थान सरकारकडून अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. उलट या कराराची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील अधिकारी सातत्याने देत आहेत, यामुळे सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित […]
बिग बॉस मराठी सिझन 6 : बिग बॉसच्या घरात वादाचा भडका! राकेश आणि रुचिता भिडले!
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राकेश आणि रुचिता यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसत आहे. या भांडणामुळे घराचे वातावरण पूर्णपणे तापले असून, इतर स्पर्धकांनाही मध्यस्थी करणे कठीण झाले आहे. नेमकं काय घडलं? प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे, एका टास्कदरम्यान किंवा चर्चेदरम्यान राकेश आणि रुचिता यांच्यात शाब्दिक चकमक सुरू […]
मांडवीकिनारी आजपासून ज्ञानसागर!
गोवा पुस्तक महोत्सवाचे आज उद्घाटन : पाच दिवस गोवा होऊन जाणार पुस्तकमय पणजी : देशभरातीलवाचक, लेखक, प्रकाशकआणिविचारवंतांनाएकत्रआणणारा, ‘अॅनओशनऑफ स्टोरीज‘ या संकल्पनेवर आधारित गोवा पुस्तक महोत्सव आजपासून पणजीत प्रारंभ होत असून पुढील पाच दिवस गोवा पुस्तकमय होणार आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पणजी येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर आज दि. 4 [...]
अर्थसंकल्पाचा अभ्यास करून प्रतिक्रिया द्यावी
कॉंग्रेसच्याटीकेवरदामूनाईकयांचेप्रत्युत्तर पणजी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात गोव्याला काय काय दिले आहे, त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांचा अभ्यास करावा व त्यानंतरच बोलावे. उगीच ‘उचलली जीभ …’ करू नये, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काँग्रेसचे आरोप आणि टीकेला उत्तर दिले आहे. मंगळवारी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी [...]
तिरुमल्ला तिरुपती क्रेडिट सोसायटीची परवानगी रद्द
आर्थिकव्यवहारकरतानाखबरदारीघेण्याचासल्ला पणजी : सहकारी संस्थांच्या निबंधक कार्यालयाने तिऊमल्ला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडला 31 जुलै 2014 आणि 28 जून 2018 च्या पत्रांद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आणि गोवा राज्यात 13 शाखा उघडण्यासाठी दिलेली परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) गोवा सरकारने तात्काळ रद्द केले असल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांनी 24 मे 2013 [...]
कंग्राळी खुर्द येथील जवान जगदीश शिंदे हुतात्मा
पंजाबमधील भटिंडा येथे देशसेवा बजावताना वीरमरण : गावासह परिसरावर शोककळा,कंग्राळी खुर्द येथील स्मशानभूमीमध्ये आज होणार अंत्यसंस्कार वार्ताहर/कंग्राळीबुद्रुक कंग्राळी खुर्द येथील ज्योतीनगरमधील नागनाथ गल्लीतील रहिवासी जगदीश मनोहर शिंदे (वय 41) हे देशसेवा बजावत असताना शहीद झाले आहेत. त्यांना पंजाब भटिंडा येथे सोमवार दि. 2 रोजी वीरमरण प्राप्त झाले आहे. या घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली [...]
अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील तिघे ठार
अथणी-गोकाकरोडवरीलरेहमानधाब्यानजीकघटना बेळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील तीन तरुण ठार झाल्याची घटना सोमवार दि. 2 रोजी रात्री 9.50 च्या दरम्यान अथणी-गोकाक रोडवरील रेहमान धाब्यानजीक घडली आहे. गजानन महादेव वडेयर (वय 22) रा. मोरब, ता. रायबाग, महादेव मल्लाप्पा गोलभावी (वय 22), माळाप्पा मल्लाप्पा गोलभावी (वय 26) दोघेही राहणार मुगळखोड. ता. रायबाग अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची नावे [...]
अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा चाकूने हल्ला करून खून
सौंदत्ती-रामदुर्गरस्त्यावरीलघटना: आरोपीहीझटापटीतजखमी बेळगाव : आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलाने एकाचा चाकूने हल्ला करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवार दि. 2 रोजी सायंकाळी होलकट्टी गावातील सौंदत्ती-रामदुर्ग रस्त्यावर घडली आहे. बसवराज पराप्पा होसमनी (वय 49) रा. बसीडोणी असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी इरय्या संगय्या मठपती (वय 32) रा. बसीडोणी याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला [...]
सदाशिवनगर स्मशानभूमीत बसविणार आठ शवदाहिन्या
महानगरपालिका बांधकाम स्थायी समिती बैठकीत निर्णय : स्मशानभूमीत 15 लाखाच्या निधीतून विकासकामे राबविली जाणार बेळगाव : सदाशिवनगर स्मशानभूमीत शहरातील विविध भागातील नागरिक अंत्यविधी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे स्मशानभूमी आवारात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पत्र्याच्या शेडखाली अंत्यसंस्कार करण्याऐवजी खुल्या शवदाहिनीवर अंत्यसंस्कार केले जावेत यासाठी नवीन आठ शवदाहिन्या बसविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात [...]
अवजड वाहतूक रोखण्यासाठी कॅम्प येथे पुन्हा लोखंडी कमान
बेळगाव : शहरातील कॅम्प येथील अवजड वाहतूक रोखण्यासाठी हिंडलगा रोड येथील गांधी स्मारकाजवळ पुन्हा नव्याने कमान उभारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अपघातामुळे या कमानीचे नुकसान झाले होते. कमान नसल्यामुळे या मार्गावरून पुन्हा अवजड वाहतूक सुरू झाली होती. त्यामुळे नव्याने कमान उभारण्यात येत आहे. ग्लोब थिएटरपासूनच्या इंडिपेंडंट रोडवर अनेक शाळा आहेत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी कॅम्प [...]
जिल्ह्यातील सर्व यात्रांमध्ये शुद्ध भंडारा वापरा
जिल्हाधिकारीमोहम्मदरोशनयांच्याकडूनआदेशजारी: उल्लंघनकरणाऱ्यांवरकारवाई बेळगाव : जिल्ह्यातील विविध ठिकाणी यात्रा-जत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. विशेषत: सौंदत्ती यल्लम्मा देवी, चिंचली मायाक्का देवी, कक्केरी बिष्टम्मा देवी, कोकटनूर यल्लम्मा देवीच्या यात्रेसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा-जत्रा होतात. यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यानुसार भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यात्रांमध्ये भेसळ भंडारा न वापरता शुद्ध भंडाऱ्याचा वापर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद [...]
बडाल अंकलगीजवळील हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल?
वन अधिकाऱ्यांकडे तक्रार : दोषींवर कारवाईची मागणी बेळगाव : बडाल अंकलगीजवळील (ता. बेळगाव) कौरीगुडा रेणुकादेवी देवस्थान परिसरातील झाडांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थानी वन अधिकाऱ्यांकडे केली आहे. सोलार प्रकल्पाच्या नाव़ाखाली बडाल अंकलगी नजिकच्या कौरीगुडा रेणुका देवस्थानपरिसरातील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याची माहिती भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ माजी अध्यक्ष [...]
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला होता. त्यानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेसाठी मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या 18 तासांपासून एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली असून वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. हा […]
हर्षिता ठाकुर यांच्यासह पाच जणांना सशर्त जामीन मंजूर
बेळगाव : मच्छे येथे आयोजित हिंदू सभेवेळी पिरनवाडी दर्ग्याजवळ बाण सोडल्याचा हावभाव केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत हर्षिता ठाकुर यांच्यासह पाच जणांवर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील हर्षिता ठाकुर, सुर्पित शिंपी, श्रीकांत कांबळे, बिटाप्पा तारिहाळ, गंगाराम तारिहाळ यांना मंगळवार दि. 3 रोजी जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. [...]
वेळीच निदान झाल्यास कर्करोगावर मात शक्य
बेळगाव : कॅन्सर किंवा कर्करोग म्हटले की, व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबीयांना हादरा बसत असे. ज्याला कर्करोग झाला आहे, त्याच्यापासून हे सत्य लपवून ठेवण्याकडेच कल असायचा. मात्र, हळुहळु परिस्थिती बदलत आहे. वेळीच निदान झाल्यास कर्करोगावर उपचार करून मात करता येते. अशी अनेक उदाहरणे समोर आल्याने आता कर्करोगाची भीती कमी झाली आहे. कर्करोगाविषयीची भीती कमी करणे, प्रतिबंधात्मक [...]
बेलकॉन 2026 गृहनिर्माण प्रदर्शन उद्यापासून
अभिनेत्रीसोनालीकुलकर्णीयांचीउपस्थिती बेळगाव : क्रिडाई बेळगावच्या बेलकॉन 2026 या भव्य बांधकाम आणि गृहनिर्माण प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि. 5 रोजी होणार आहे. सायंकाळी 4 वा. क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर हे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. बेंगळूरनंतर बेळगावमध्ये असे भव्य प्रदर्शन वातानुकूलित शामियान्यामध्ये होणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कर्नाटक क्रिडाईचे [...]
अनगोळ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ
माऊलींचीमिरवणूकउत्साहात: पारायणसोहळापाचदिवसचालणार बेळगाव : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाथ पै नगर येथे ज्ञानेश्वरी पारायण मंडळ यांच्यावतीने आयोजित ज्ञानेश्वरी पारायणाचा उद्घाटन सोहळा व माऊली मिरवणूक मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली. टाळ मृदंगाची साथ आणि ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर व अभंग, डोईवर तुळस, डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी, खांद्यावर भगवी पताका तसेच आकर्षक सजावट केलेल्या [...]
भावेश्वरी यात्रेत ‘चांगभलं’चा गजर
मोदगेयेथेभक्तिमयवातावरण: लाखोभाविकांनीघेतलेदर्शन वार्ताहर/दड्डी ‘चांगभलं’च्या गजरात भावकाई देवीच्या यात्रा महोत्सवाला भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सुमारे 6 हजार भाविकांनी शस्त्र इंगळीचा लाभ घेतला. सोमवारी सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी सुमारे 2 लाख भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. बेळगाव, कोकण महाराष्ट्र व गोवा, येथून भाविक मोदगा गावात दाखल होत आहेत. गावानजीकची [...]
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी अपघाताच्या घटनेवरून काही प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबीय राजकीय क्षेत्रात लगेचच सक्रीय झाले असले तरी मनातील जखमा कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे रोज X वर पोस्ट […]
बेळगाव तालुक्यातील 54 ग्रा. पं.वर प्रशासकराज
जिल्हाधिकारीमोहम्मदरोशनयांचाआदेश: निवडणूकहोईपर्यंतप्रशासकांचीनियुक्ती: लवकरचपदभारस्वीकारणार बेळगाव : ग्रामविकासात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. बेळगाव तालुक्मयातील एकूण 54 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज कायदा, 1993 मधील कलम 8(ग्ग्ग्) चा वापर करून आदेश देण्यात आला आहे. संविधानाच्या कलम 243-ई उपनियम तसेच [...]
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही, शरद पवार यांचे विधान
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती असेही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांनी आपल्याला सांगितलं असतं असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले […]
चिंचली मायाक्का यात्रेत मद्य विक्रीवर बंदी घाला
प्रादेशिकआयुक्तांकडेनिवेदनाद्वारेमागणी बेळगाव : चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्कादेवी यात्रेच्या निमित्ताने मद्य विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रयत संघ-हरित सेनेने केली आहे. सदस्यांनी मंगळवार दि. 3 रोजी प्रादेशिक आयुक्त यांच्या कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. चिंचली येथे मायाक्कादेवी यात्रेला रविवार दि. 1 पासून सुऊवात झाली असून ही यात्रा 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या भागातील ही प्रसिद्ध [...]
12 फेब्रुवारीच्या संपाला विविध संघटनांचा पाठिंबा
सीआयटीयूचेजी. एम. जैनेखानयांचीमाहिती: जिल्ह्यातीलकामगारहोणारसहभागी बेळगाव : केंद्रातील भाजप सरकार गेल्या 12 वर्षांपासून सत्तेत असले तरी 2014 मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. आजही देशातील कष्टकरी कामगारांना निर्धारित किमान वेतन दिले जात नसून कामगारविरोधी नवे कायदे जारी करण्यात आले आहेत. हे कायदे मागे घेण्यासह आपल्या मागण्यांसाठी विविध संघटनांनी गुरुवार दि. 12 फेब्रुवारी संप [...]

29 C