आकाश नेक्स्ट जनरेशन मिसाइल डिफेन्स सिस्टीमची यशस्वी चाचणी, ८० किमी पर्यंतचे लक्ष्य करू शकते नष्ट
हिंदुस्थानच्या आकाश नेक्स्ट जनरेशन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. डीआरडीओने ही चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. चाचणी दरम्यान, आकाश-एनजी क्षेपणास्त्रांनी सीमेजवळ, कमी उंचीवर तसेच लांब पल्ल्यावर प्रभावीपणे लक्ष्यांवर मारा केला. आकाश-एनजी ही पूर्णपणे स्वदेशी विकसित प्रणाली आहे, ज्यात देशी रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) सीकर, ड्युअल-पल्स सॉलिड रॉकेट मोटर आणि स्वदेशी रडार तसेच कमांड […]
उन्नाव पीडितेने घेतली राहुल गांधींची भेट, केल्या तीन महत्त्वाच्या मागण्या
उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील बलात्कार पीडितेने बुधवारी संध्याकाळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उन्नाव पीडितेने तिची आपबिती सांगितल्यानंतर राहुल गांधी व सोनिया गांधी हे भावूक झाले होते. या भेटीत पीडितेने राहुल गांधी यांच्याकडे तीन मागण्या केल्या आहेत. ”मला सर्वोच्च न्यायालयात माझी केस लढायला […]
” पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना मी मला भेटायचे आहे असे आवाहन केले होते. मात्र ते मला भेटले नाहीत”, अशी खंत उन्नाव बलात्कार पीडितेने व्यक्त केली आहे. पीडितेने राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ही खंत व्यक्त केली. मैंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अमित शाह से मिलने की गुहार लगाई, […]
मॅरिज ब्युरोच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 मॅनेजरसह 20 तरुणींना अटक
ग्वाल्हेरमध्ये दोन हाय प्रोफाईल फेक मॅरिज कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मायपार्टनर आणि यूनिक रिश्ते या दोन संकेतस्थळांवर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळक्याचा भांडाफोड केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2 मॅनेजरसह 20 तरुणींना अटक केली आहे. ही टोळी mypartnerindia.com और uniquerishtey.co या नावाने संकेतस्थळ चालवत होती. ज्यावेळी कोणी इंटरनेट यूजर वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचा, […]
इंडिगोच्या एकाधिकारशाहीला लागणार ब्रेक, दोन नवीन विमान कंपन्यांना केंद्राने दिली मंजुरी
अलीकडेच जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था कोलमडली, तेव्हा हजारो प्रवाशांना विमानतळांवर तासनतास वाट पाहावी लागली आणि अनेकांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचता आले नाही. देशाच्या विमान वाहतूक क्षेत्र इंडिगोच्या एकाधिकारशाहीमुळे ही परिस्थिती उद्भवली, असं बोललं जातं. यातच आता हिंदुस्थानी विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना मंजुरी दिली आहे. नागरी […]
निर्लज्जपणा! यूपीतील मंत्र्याने बलात्कार पीडितेची उडवली टिंगल
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर या प्रकरणातील पीडिता दिल्लीतील इंडिया गेटजवळ आंदोलनाला बसली होती. तिला पोलिसांनी तेथून हटवले आहे. याबाबत पत्रकारांनी योगी सरकारचे मंत्री ओपी राजभर यांना विचारले असता त्यांनी हसत हसत पीडितेची टिंगल केली. या टिंगल टवाळीचा व्हिडीओ व्हायरल […]
Vijay Hazare Trophy –बिहारची आग ओकणारी फलंदाजी! गोलंदाजांची रेकॉर्डब्रेक धुलाई करत इतिहास रचला
विजय हजारे ट्रॉफीमध्ये आजचा (24 डिसेंबर 2025) सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्यात येणार आहे. एकीकडे विराट कोहली, रोहित शर्मा, इशान किशन या फलंदाजांनी धुवाँधार फटकेबाजी केली. तर दुसरीकडे बिहारच्या संघाने 50 षटकांमध्ये विश्व विक्रमी 574 धावा चोपून काढल्या. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात बिहारचा संघ सर्वाधिक 574 धावा करणारा एकमेव संघ ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही संघाला […]
संगमेश्वर हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण असतानाही, संगमेश्वर चौकात वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र रोज पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या अनियमित कारभारामुळे येथे दररोज भीषण वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालक व प्रवाशांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. संगमेश्वर चौकात चारही दिशांना अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच […]
शुद्ध हवा देऊ शकत नसाल तर एअर प्युरिफायर स्वस्त करा, दिल्लीतील प्रदूषणावरून हायकोर्टाने सुनावले
राजधानीतील प्रदूषण काहीही केल्या कमी होत नसून दिल्लीतील हवेने धोकादायक पातळी ओलांडली आहे. अशातच एकमात्र पर्याय असलेल्या एअर प्युरिफायरच्या किंमती आणि त्यावरील जीएसटी सामान्य माणसाला न परवडणाऱ्या आहेत. आता याप्रकरणी वकील कपिल मदन यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर आता दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला एअर प्युरिफायरवर जीएसटीत सवलत देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. प्युरीफायरवरील […]
Solapur News : सोलापूर निवडणुकीत सोशल मीडियाचा जोरदार वापर!
सोलापूरमध्ये निवडणूकपूर्वी उमेदवारांचे डिजिटल युद्ध सोलापूर : सोलापूर भाजप, शिंदेसेनेचे उमेदवार, त्यांचे नेते सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. प्रभागात कोणताही उपक्रम केला की तो क्षणार्धात समाजमाध्यमांद्वारे सगळ्या फॉलोअर्सना पाठवला जात आहे. केवळ इच्छुक उमेदवारच नव्हे तर त्या पक्षांचे [...]
Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी रेल्वे गेटजवळ पाणी संघर्ष समितीचे आंदोलन
तिलाटी रेल्वे गेट परिसरात पाणी संघर्ष समितीचे आंदोलन सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी रेल्वे गेट क्रमांक ६१ परिसरात पाणी संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे प्रशासन व राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११.३५ वाजता पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष [...]
“तुमची ठेव,तुमचा अधिकार“ - जिल्ह्यात दावा न केलेल्या ठेवींच्या वितरणासाठी मेळावा
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा अग्रणी बँक,धाराशिवने विविध बँकाच्या माध्यमातून बँकेत दावा न केलेल्या 31 कोटी ठेवी 1 लाख 31 हजार खातेदारांना परत मिळवण्याकरता जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सोमवार दि.29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मेळावा आयोजित केला आहे.हा मेळावा केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या देशव्यापी “आपली पूँजी,आपला अधिकार Your Money, Your Right उपक्रमाचा एक भाग आहे. या मेळाव्यास मैनाक घोष,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, धाराशिव तसेच विद्याचरण कडवकर, निवासी उपजिल्हाधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.भारतीय रिझर्व बँकेचे अधिकारी,तसेच जिल्ह्यातील सर्व बँकेचे जिल्हा समन्वयक व एलआयसी अधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेचा उद्देश 10 वर्षांहून अधिक काळ व्यवहार न झालेल्या बँक खाती,मुदत ठेवी आणि इतर आर्थिक मालमत्तांबद्दल (उदा.शेअर्स, विमा) लोकांना माहिती देणे आणि कायदेशीर वारसांना/दावेदारांना ती रक्कम परत मिळवण्यासाठी सहाय्य करणे हा आहे. भारत सरकार व भारतीय रिझर्व बँक यांच्या माध्यमातून देशभरात एक ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कलावधीत मागील 10 वर्षांमध्ये ज्या खात्यांमध्ये व्यवहार झालेले नाहीत, आशा खात्यातील ठेवी भारतीय रिझर्व बँकेच्या नियमांनुसार ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधीमध्ये (डीईएएफ) हस्तांतरित केल्या जातात.बरेच लोक माहितीच्या अभावी अथवा मृत असल्याने या ठेवी परत मिळवण्यासाठी पाठपुरवठा करत नाहीत.पर्यायाने या ठेवी डीईएएफमध्ये हस्तांतरित होतात. अशा सर्व ठेवी योग्य ती कागदपत्रे बँकेत जमा करून ठेवींची रक्कम खातेदाराला अथवा वारसदाराला मिळू शकते. बँक शाखांमध्ये ही विशेष मोहीम 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहील. दावा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नागरिकांनी आपली ओळखपत्रे (आधार/ पॅन), बँक खात्याचे तपशील,मुदत ठेव प्रमाणपत्रे (असल्यास),आणि वारस असल्यास मृत्यू प्रमाणपत्र व वारस प्रमाणपत्र यासारखी संबंधित कागदपत्रे शिबिरांमध्ये सोबत आणावीत.पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली रक्कम परत मिळवावी,असे आवाहन श्री.कुमुद पंडा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक,धाराशिव यांनी केले आहे.
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस राजाश्रय धाराशिवमध्ये उभे राहणार भव्य स्मारक!”
धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी,या उदात्त हेतूने धाराशिव शहरात भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या स्मारकासाठी मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते. या निर्णयानुसार धाराशिव नगरपालिकेला सर्व्हे क्रमांक 426 येथील आवश्यक 1 एकर जमीन भोगाधिकार विनामूल्य, मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने उपलब्ध करून देण्यास कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या स्वप्नाला अधिकृत आणि ठोस स्वरूप प्राप्त झाले आहे.जमीन नगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पुतळा उभारणीसाठी आवश्यक सर्व परवानग्या देण्यात येणार असून प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाने 2 कोटीं रुपयांचा निधी मंजूर केला असून,या निधीतून स्मारक भव्य, दर्जेदार व प्रेरणादायी स्वरूपात साकारले जाणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते,तर ते शोषित,वंचित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज होते.त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हे स्मारक उभे राहत असून,ते सामाजिक न्याय,समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक ठरेल.” धाराशिवच्या भूमीत उभे राहणारे हे स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे,परिवर्तनाची जाणीव करून देणारे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तेज सदैव उजळवत ठेवणारे ठरेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
2 जानेवारी रोजी तुळजापूरमध्ये प्रथमच भव्य ड्रोन शोचे आयोजन; शाकंभरी नवरात्रोत्सवातील विशेष आकर्षण
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सव 2025 हा 22 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला होता. या महोत्सवाच्या दरम्यान 29 सप्टेंबर रोजी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्या काळात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव हा ड्रोन शो स्थगित करण्यात आला होता. दरम्यान, 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. या शाकंभरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून, यापूर्वी स्थगित करण्यात आलेला ड्रोन शो आता 2 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य ड्रोन शो शुक्रवारी, 2 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे. या ड्रोन शोमध्ये तब्बल 300 ड्रोनच्या सहाय्याने आकाशात तुळजाभवानी मंदिर, श्री तुळजाभवानी देवी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध आकर्षक प्रतिकृती साकारण्यात येणार असून, त्यामध्ये श्री तुळजाभवानी देवींची भव्य प्रतिकृती हे मुख्य आकर्षण असणार आहे. यासोबतच धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक स्वरूपाच्या अन्य प्रतिकृतीही आकाशात झळकणार आहेत. अत्याधुनिक प्रकाशयोजना व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकार होणारा हा ड्रोन शो भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचा ड्रोन शो धाराशिव जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात येत असून, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तसेच भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली आहे. देवीच्या दर्शनासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. या भव्य ड्रोन शोचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी तसेच धाराशिव जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या धार्मिक वातावरणात हा ड्रोन शो भक्ती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम ठरेल.
गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतले सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन मंत्री पंकज भोयर यांचा सहकुटुंब यथोचित सन्मान केला. तत्पूर्वी विश्वस्त तथा नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे स्वागत केले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, नागेश शितोळे, सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर, सुजय मेश्राम, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, श्रीकांत पवार तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
धाराशिवमध्ये आता लोकशाहीर अण्णाभाऊंचे भव्य स्मारक- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता सुकर झाला आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरात भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे दोन कोटी रुपये वाचणार आहेत. आता लवकरच धाराशिवमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारले जाणार असल्याची माहिती 'मित्र'चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यांनी दिली आहे. धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच आपण 1.50 कोटी निधी मंजूर करवून घेतलेला आहे. पालिका निवडणुकीच्या अगोदर शहरात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अभिवचनही वचननाम्याच्या माध्यमातून आपण शहरवासीयांना दिले होते. तत्कालीन महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑगस्ट महिण्यात जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यासाठी नगरपालिकेला शासनाकडे जागेच्या बदल्यात बाजारभावाप्रमाणे 2 कोटी 8 लाख भरणे आवश्यक होते, पालिकेकडे निधी नसल्याने हा विषय प्रलंबित होता. मात्र शासनाने विशेष बाब म्हणून सदर रक्कम माफ करावी यासाठी आपले प्रयत्न सुरू होते. त्याला आज यश आले असून त्यावर आपल्या महायुती सरकारने विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्याच्या महत्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शहरातील हे स्मारक भव्य, दर्जेदार व प्रेरणादायी स्वरूपात साकारले जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्मारकासाठीच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. त्यानुसार धाराशिव नगरपालिकेला सर्व्हे क्रमांक 426 येथील स्मारकासाठी आवश्यक असलेली 1 एकर जमीन भोगाधिकार विनामूल्य, मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता सुकर झाला आहे. स्मारक उभारणीच्या प्रयत्नांना आता अधिकृत आणि ठोस स्वरूप प्राप्त झाले आहे. जमीन नगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पुतळा उभारणीसाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया राबवून सर्व परवानग्या देण्यात येणार आहेत. उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया वेगाने आणि वेळेत पूर्ण पार पाडण्यासाठी आपण अखेरपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तात्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवादही मानले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी लोकसहभागाचे आवाहन धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून पूर्णाकृती पुतळ्यासह आकर्षक उद्यान व अभ्यासिकेचाही त्यात समावेश असेल. स्मारकासाठी लोकसहभागातून निधी उभारण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतः रु. 1 लाख जाहीर केले असून, लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या नागरिकांनी आपआपल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या स्मारकाच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची, साहित्याची व सामाजिक लढ्यांची स्मृती जिवंत ठेवण्यात येणार असून, पुढील पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
लोकशाही बळकटीसाठी SIR विधेयक व निवडणूक सुधारणांवर सविस्तर बैठक
धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाही अधिक मजबूत व पारदर्शक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून नवीन SIR (Special Intensive Revision) विधेयक व निवडणूक सुधारणा (Election Reforms) यासंदर्भात भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय, धाराशिव येथे सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत मतदारयादीत पात्र नागरिकांचे नाव समाविष्ट करणे, मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे वगळणे तसेच घुसखोर/अपात्र नागरिकांचे मतदान अधिकार रद्द करून त्यांची नावे मतदारयादीतून काढून टाकणे या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक व विश्वासार्ह कशी करता येईल, यावर मार्गदर्शन करताना मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांची योग्य नोंदणी करणे आणि अपात्र मतदारांना यादीतून वगळणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची पडताळणी करण्यात येते. यासाठी नागरिकांना ऑनलाईन (ECINET App) तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असून, कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क नाकारला जाऊ नये आणि मतदार यादीत कोणतीही अपात्र व्यक्ती राहू नये, याबाबत उपस्थित कार्यकर्त्यांना सविस्तर व योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस मल्हार पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,नूतन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे, शहराध्यक्ष अमित शिंदे, नेताजी आबा पाटील, सुनील काकडे, राहुल काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, दत्ता बंडगर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाकंभरी नवरात्र व नाताळ सुट्टीत तुळजाभवानी दर्शनासाठी विशेष व्यवस्था
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव तसेच नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी दर्शन व्यवस्थेत विशेष बदल जाहीर केले आहेत. ते पुढील प्रमाणे पहाटे 1 वाजता चरणतीर्थ, त्यानंतर दर्शन मंदिर संस्थानच्या निर्णयानुसार बुधवार दि. 24 डिसेंबर 2025 ते शनिवार दि. 4 जानेवारी 2026 या कालावधीत रोज पहाटे 1.00 वाजता चरणतीर्थ होऊन लगेचच धर्मदर्शनास प्रारंभ केला जाणार आहे. भाविकांनी या वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दि. 28 डिसेंबर 2025 पासून श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. या काळात दररोज हजारो भाविक तुळजापुरात दाखल होतात. यंदा नाताळ सुट्ट्यांची जोड लागल्याने गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दि. 24 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत सकाळच्या पूजांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. या काळात चरणतीर्थ पहाटे 1:00 वाजता, सकाळची अभिषेक पूजा (घाट) सकाळी 6:00 वाजता असे वेळापत्रक राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन माया माने, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी केले आहे. शाकंभरी नवरात्र आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानकडून दर्शन, रांग व्यवस्था, सुरक्षा आणि सुविधा याबाबत विशेष तयारी करण्यात येत असून भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.
मूकबधिरास पाच जणांची बेदम मारहाण
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील मलबा हॉस्पिटल समोरील जगदाळे पार्किंग येथे मूकबधिर तरुणास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध तुळजापूर पूर्ण ठाण्यात गुन्हा करण्यात आलेला आहे सदरील घटना सोमवार दिनांक 22 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. याबाबतीत कांताबाई अभिमान चौगुले वय 35 वर्षे व्यवसाय घरकाम रा. घाटशिळ रोड, पाण्याच्या टाकीजवळ तुळजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मला आत्याचा मुलगा विजय श्रीमंत पवार यांनी फोनवरून कळविले की, मी तुळजापूर च्या बाहेर असून माझा मोठा भाऊ राजेश यास जगदाळे कॉम्पलेक्स पार्किंग मलबा हाँस्पिटल समोर येथे काही लोक मारहान करीत आहेत. अशी माहिती मिळाली आहे. तरी तुम्ही तेथे तात्काळ जावा असे कळविल्याने मी माझे सोबत राजेशची पत्नी नंदिनी, आई काशीबाई, मावशी लक्ष्मी असे जगदाळे कॉम्पलेक्स पार्किंग मलबा हाँस्पिटल समोर तुळजापूर येथे गेलो असता माझ्या आत्याचा मुलगा राजेश श्रीमंत पवार यास तु आमच्या भागात का आलास म्हणून तेथील काही लोक मारहान करीत होते. राजेशचे दोन्ही हात बांधलेले होते. व त्यास डोक्याला, पाटीवर, तोंडावरे, बरगडीवर व गुप्त भागावर मारहान करीत असलेले दिसत होते. आम्ही त्यांना सोडवण्यास गेलो असता त्यांनी मला व माझ्या सोबत असलेल्या सर्वांना शिवीगाळ करून, धक्काबुक्की केली. व पुन्हा जर आमच्या भागात हा दिसला तर त्याला जिवेच मारू अशी धमकी दिली. माझा आत मुकबधीर मुलगा राजेश श्रीमंत पवार वय 32 वर्षे रा. घाटशिळ रोड पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर यास मारहान करून, जखमी करणारे लोकांचे नावाची खात्री केली असता 1) सुरज हरिश्चंद्र जगदाळे 2) प्रतिक जगदाळे 3) गणेश जगदाळे 4) राजाभाऊ देशमाने 5) शंतनू नरवडे व इतर सर्व राहणार तुळजापूर खुर्द असे असल्याचे खात्रीशिर समजले. त्यानंतर आम्ही आत्याचा मुलगा राजेश यास पाहिले असता त्याचे डोक्यात पाटीवर, तोंडावर, बरगडीवर, गुप्त भागावर व शरीरावर इतर ठिकाणी काठीने मारहान झाल्यामुळे पुर्ण शरीरावर काळे निळे वळ दिसत होते. आम्ही त्यास घेवून पोलीस स्टेशन तुळजापूर येथे आलो असता तेथे आत्याचा मुलगा राजेश यास जास्तच त्रास होवू लागल्याने पोलीसांनी उपचारासाठी मेडीकल यादी देवून उपचारासाठी सरकारी दवाखाना तुळजापूर येथे पाठविले असून सध्या त्याचेवर दवाखान्यात उपचार चालू आहेत. या हाणामारी प्रकरणी पाच जनावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुळजापूरात पहाटेच्या शांततेत जशोदाबेन यांचे देवीदर्शन
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी मंगळवारी दि. 23 डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास जशोदाबेन यांनी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने सकाळपर्यंत याची कुणालाही चाहूल लागली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, जशोदाबेन मंगळवारी रात्री साधारण बारा वाजता थेट श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर मंदिर प्रशासनाच्या समन्वयाने त्यांना मंदिरात नेण्यात आले. पहाटे चरणतीर्थ झाल्यानंतर त्यांनी देवीची विधिवत पूजा करून मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईक उपस्थित होते. कोणताही गाजावाजा न करता, अत्यंत साधेपणाने हा धार्मिक सोहळा पार पडला. दर्शनानंतर त्या तात्काळ परतल्या, त्यामुळे भाविकांनाही त्यांच्या उपस्थितीची फारशी कल्पना आली नाही. महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी व सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाकडून पूर्ण गुप्तता पाळण्यात आल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे पहाटेच्या शांत वातावरणात घडलेल्या या दौऱ्याची चर्चा मात्र दिवसभर तुळजापूरात रंगली होती.
Solapur News : गोपाळपूर विष्णुपद येथे भाविकांची गर्दी; वनभोजनाचा लुटला आनंद
टेंभुर्णी परिसरातील भाविकांची गोपाळपूरला श्रद्धेची वाटचाल टेंभुर्णी : मार्गशीर्ष महिन्यात अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या गोपाळपूर (पंढरपूर) येथील विष्णुपद अकोले-खुर्द येथील ५०० भाविकांची यात्रा घडविण्यात आली. यावेळी भाविकांनी विष्णुपद येथील भगवंताचे दर्शन घेऊन बन भोजनाचा आनंद लुटला. विठ्ठलराव शिंदे [...]
गुजरातमध्ये बंगालपेक्षा दुप्पट दुबार मतदार, SIR मध्ये कोणत्या राज्यात किती मतदारांना वगळण्यात आले?
निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्याचे आकडे समोर आले आहेत. यातच सर्वाधिक नावे तामिळनाडूमध्ये कापली गेली आहेत. येथे ९७ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. या आकडेवाडीनुसार, गुजरातमध्ये बंगालपेक्षा जास्त दुबार मतदार आढळले आहेत. गुजरातमध्ये ३.८१ लाख दुबार मतदार […]
Solapur News : पंतप्रधानांच्या पत्नीने घेतले भवानीचे दर्शन
तुळजाभवानी देवीसमोर मोदी कुटुंबीयांची कुलाचार महापूजा तुळजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी आणि त्यांचे बंधू यांनी मंगळवार, २३ डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी देवीची कुलधर्म कुलाचार पूजाअर्चा करून दर्शन घेतले. सुरक्षितेच्या दृष्टीने अत्यंत गुप्तता पाळण्यात आली [...]
बांगलादेशातील हिंदू धर्मीय तरुणाच्या हत्येप्रकरणी मालवणात निषेध
मालवण (प्रतिनिधी) बांगलादेश मध्ये हिंदू धर्मीय तरुणाला जिवंत जाळल्याप्रकरणी आणि तेथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे मालवणात भरड नाका येथे हिंदू बांधव भगिनींनी एकत्र येत बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. बांगलादेश मुर्दाबाद… भारत माता की जय… वंदे मातरम… घराघरातून करा पुकार… हिंदुत्वाचा जयजयकार अशा घोषणा यावेळी देतानाच बांगलादेशचा [...]
Satara : रहिमतपूरमध्ये ‘चिमुकल्यांची खाऊ गल्ली व बाल बाजार’ उपक्रम उत्साहात
रहिमतपूरमध्ये चार शाळांचा संयुक्त ‘खाऊ गल्ली’ उपक्रम वाठार किरोली : रहिमतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रहिमतपूर क्रमांक १ यांच्या मैदानावर दि २० डिसेंबर रोजी ‘चिमुकल्यांची खाऊ गल्ली व बाल बाजार हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. [...]
Vijay Hazare Trophy- किंग कोहली अन् हिटमॅनची दादा’गिरी’; दोघांनीही शतके ठोकून धुरळा उडवला
विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीने धुरळा उडवून दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मातब्बर गोलंदाजांना चोपून काढनाऱ्या या ‘धुरंधर’ खेळाडूंची बऱ्याच दिवसांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दादा’गिरी’ पाहायला मिळाली. रोहित शर्मा मुंबईकडून आणि विराट कोहली दिल्लीकडून मैदानात उतरले आणि दोघांनीही खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये धावांची लयलूट केली. मुंबईविरुद्ध सिक्कीम या सामन्यात रोहित शर्माची तळपती फलंदाजी उपस्थित चाहत्यांना […]
किल्लीचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील एका गावात किचनचा धाक दाखवून 29 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने अखेर 23 डिसेंबर रोजी तक्रार दिल्यानंतर संबंधित तरुणाच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास एका गावातील तरुणाने तिला गाडीवर बसवून आडरानात नेले. तेथे आरोपीने मोटरसायकल गाडीच्या किचनचा धाक दाखवत महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर भीती व मानसिक धक्क्यामुळे पीडिता काही दिवस शांत राहिली होती. त्यानंतर दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रथम खबरी अहवाल दाखल केला. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेतील कलम 64(1), 351(2) व 351(3) अन्वये तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपणार असून, गाव खेड्यातील पुढाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 428 ग्रामपंचायतीसाठी जानेवारी 2021 मध्ये पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या होत्या. त्याची मुदत एक महिन्यांनी म्हणजे जानेवारी 2026 मध्ये संपणार आहे. परंतु नगरपालिकेची मतमोजणी लांबल्यामुळे तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे ग्रामपंचायत निवडणुका घेण्यास सध्या पुरेसा वेळ नाही. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 428 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार ते पाच महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या या निवडणुका आता थेट एप्रिल मे 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीवर लक्ष ठेवून बसलेल्या गाव पुढाऱ्यांची निराशा झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका 2026 मध्ये पार पडणार असल्यामुळे प्रशासनाने चार महिन्यापूर्वी ग्रामपंचायतींची सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर केली आहे. त्यानंतर गाव पातळीवर गाव पुढाऱ्यांकडून निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात येईल या अपेक्षेने गाव पुढाऱ्यांनी तयारी सुरू केली होती. मात्र, नगरपालिका निवडणुकांची लांबलेली मतमोजणी, आगामी काळात महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुका यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा हा कार्यक्रम आता जानेवारी ऐवजी थेट एप्रिल मे महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जानेवारीनंतर जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकराज येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. जानेवारी 2021 मध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यांची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्याच कालावधीत नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करण्यात आलेली नाही. पुढील पंधरा दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढील दीड महिन्यात पार पडतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 31 जानेवारी 2026 च्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे 31 जानेवारी पूर्वी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून प्राधान्याने घेतल्या जातील. सध्या संपूर्ण प्रशासन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याच्या कामात व्यस्त आहे. 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण प्रशासन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामांमध्ये व्यस्त राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम तयार करण्यास सध्या प्रशासनाकडे वेळ नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाला साधारण दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका पार पडल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम तयार होऊ शकतो आणि त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात या निवडणुका होऊ शकतात. यावर्षी ऐन उन्हाळ्यातच गाव खेड्यातील राजकारण ग्रामपंचायतच्या निवडणुकांमुळे तापणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नेमले जाणार आहेत. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकांच्या पूर्वीदेखील तीन ते चार महिने याच 428 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले होते. तालुकानिहाय निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या तालुका ग्रामपंचायत संख्या धाराशिव 66 तुळजापुर 53 उमरगा 49 लोहारा 26 कळंब 59 वाशी 34 भूम 71 परंडा 70 एकूण 428
औद्योगिक विकासासोबत महिला, कृषी, सहकार क्षेत्रात भरवी योगदान देणार- ॲड. गुंड
धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता उद्योग समूह, धाराशिव यांच्या नूतन वर्ष 2026 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन समूहाचे संस्थापक तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड-पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या प्रसंगी औद्योगिक विकासासोबतच महिला सक्षमीकरण, कृषी व सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा समूहाचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. रुपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून सुशिक्षित युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात असून, बँकिंग क्षेत्राद्वारे महिला सक्षमीकरण तसेच सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. यासोबतच शिक्षण संस्थांसह शेतकऱ्यांसाठी अल्प दरात वेअरहाऊस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, रुपामाता डेअरीच्या माध्यमातून दुग्धव्यवसायास चालना देत जोडधंद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. या दिनदर्शिका प्रकाशन समारंभास रुपामाता समूहाचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड, रुपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, रुपामाता अर्बनचे मुख्य प्रशासकीय अधिकारी विशाल गुंड, श्री. अजय नाईक, चिफ अकाउंटंट विकास मंडाळे, नितीन मुदगल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याची आर्थिकदृष्ट्या मागास जिल्हा अशी ओळख आहे. जिल्ह्याची ही ओळख बदलण्यासाठी या भागाच्या आर्थिक विकासासाठी सेरेंटीका कंपनी काम करत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. सेरेंटीका कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील 40 दिव्यांगाना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सेरेंटीका रिन्यूएबल्सचे व्हाईस प्रेसीडेंट सुरजीत नारायण, कर्नल विक्रम अय्यंगार, अमित चक्रोबोर्ती आदीची उपस्थिती होती. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की, सेरेंटीका कंपनी जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींना व्हिलचेअरचे वाटप करत आहे. तसेच जिल्ह्यातील दिव्यांगाना मदत करण्याची कंपनीची इच्छा आहे, ही मोठी गोष्ट आहे. जिल्ह्यातील विविध घटकांसाठी सेरेंटीका कंपनी काम करत आहे. युवक - युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम कंपनीच्या वतीने करण्यात येत असून हे कौशल्य प्रशिक्षण पुर्ण झालेल्या काही युवकांना नौकरी देण्याचे कामही कंपनीने केले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनीही रोजगारक्षम व्हावे यासाठी कौशल्य प्रशिक्षण कंपनीच्या वतीने देण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सेरेंटिका कंपनीच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध समाजपयोगी कामाची दखल घेवून कंपनीच्या वतीने करण्यात येणाऱ्या या समाजपयोगी कामाचे कौतूकही जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यावेळी केले. सेरेंटीका कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांचे पवनचक्की संबंधित समस्या सोडविण्यासाठी एक मोफत हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 1800 202 8735 हा कंपनीचा हेल्पलाईन नंबर असून याद्वारे शेतकऱ्यांना कंपनीच्या प्रतिनिधीशी थेट संवाद साधता येणार आहे.
पारगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ; शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचा संकल्प
वाशी (प्रतिनिधी)- नाफेड व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अंतर्गत शनेश्वर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, पारगाव यांच्या वतीने पारगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव (विक्रम) सावंत यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी सोयाबीन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केशव सावंत यांनी भविष्यात गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन व हरभरा बियाणे मोफत वाटप करण्याचा संकल्प जाहीर केला. कार्यक्रमास वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास तळेकर, शिवसेना वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट, युवा सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, वाशी नगरपंचायत गटनेते नागनाथ नाईकवाडी, बाजार समितीचे सचिव वाघ साहेब, पोलीस उपनिरीक्षक घोडके, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सचिन इंगोले, नगरसेवक शिवहार स्वामी, प्रवीण गायकवाड यांच्यासह उद्धव साळवी, अशोक लाखे, विलास खवले, दिनकर शिंदे, राहुल आडुमटे, राजाभाऊ जोगदंड, सतीश गव्हाणे, तुकाराम गव्हाणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Satara News : पाचगणी–महाबळेश्वर मार्गावर नर्सरी अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी
भिलारमध्ये रस्त्यावर कुंड्यांचा पसारा भिलार : पाचगणी – महाबळेश्वर रस्त्यालगत काही नर्सरी व्यावसायिकांनी झाडांच्या कुंड्या रस्त्यावरच मांडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुंड्यांमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत असून बांधकाम विभाग याकडे [...]
मिलिंद आळणे, प्रा. डॉ. श्रीराम मुळीक यांना 23 वा आदर्श समाजभूषण, शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान
कळंब (प्रतिनिधी)- कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्था ट्रस्ट, बेळगाव महाराष्ट्र- कर्नाटक-गोवा यां तीन राज्याचा वतीने आयोजित राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार 2025 हा भव्य आणि प्रेरणादायी पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. समाजसेवा, सामाजिक बांधिलकी, शिक्षण व वैचारिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा . डॉ. अमर कांबळे (अध्यक्ष, नालंदा विद्यापीठ, कोल्हापूर) हे होते. तर दीपप्रज्वलन मिस इंडिया शुभांगी शित्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात मिलिंद आळणे, कळंब चे सुपुत्र प्रा.डॉ. श्रीराम मुळीक यांना त्यांच्या समाजोपयोगी, प्रेरणादायी व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन आदर्श समाजभूषण, शिक्षण गौरव पुरस्कार (राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार 2025) प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून अनेक युवकांना प्रेरणा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रकाश कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून समाजसेवेचे महत्त्व विशद केले. हा गौरव सोहळा कोल्हापूर येथे संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजापूरमध्ये अपहरणाच्या धमकीने खळबळ!
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर शहरात गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अपहरणाची धमकी देत वाईन शॉप चालकाकडून जबरदस्तीने माल उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमर श्रीराम नाईक (वय 52), रा. पंढरपूरकर गल्ली, तुळजापूर हे चेतन वाईन शॉप (जुने बसस्थानक परिसर) येथे असताना प्रशांत कांबळे, बालाजी जाधव व बाबा शेख (रा. तुळजापूर) या तिघांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. आरोपींनी नाईक व त्यांच्या मुलास शिवीगाळ करत “तुझ्या मुलाला किडनॅप करू” अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी दुकानातून 3,100 रुपयांचा माल जबर नेला. तसेच दरमहा 10,000 रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. या प्रकरणी अमर नाईक यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यशाळा संपन्न
कळंब (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णलाय कळंब येथे पीसीपीएनडीटी (लिंग निवडीस प्रति बंध कायदा1994 व सुधारित 2003) नुसार तालुका स्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. मुलगी वाचली तरच मानवता टिकते हा संदेश देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा लागेल.या घोषवाक्याने कार्यशाळेस प्रारंभ झाला . कळंब च्या उपजिल्हा रुग्णालय येथे दि .23 रोजी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदशनाखाली पीसीपीएनडीटी तालुका स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.सदरील कार्यशाळेस कळंब तालुक्यातील सर्व पीसीपीएनडीटी सामूचीत प्राधिकारी /नोंदणीकृत सोनोग्राफी/एमटीपी/सामाजिक संघटना/आशा स्वयंसेविका/खाजगी डॉक्टर्स/ एआरटी सरोगसी केंद्र धारक/यांचे तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. वैद्यकिय अधीक्षक डॉ . नागनाथ धर्माधिकारी यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करत असताना “एका बाजूस स्त्री विषयक सर्व सुधारणा व बदल घडत असताना दुस-या बाजूस मात्र समाजातील बुरसटलेल्या पुरूष सत्ताक मनोवृत्तीने विज्ञान युगातील तंत्रज्ञानाचा गैरवापर करून स्त्रियांना संपविण्याचे कट कारस्थान सुरू केले आहे. हे थांबवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तसेच खबरी योजना ही कायद्याअंतर्गत (गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान कायदा) बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करणाऱ्या केंद्रांची माहिती देणाऱ्या नागरिकांसाठी आहे, जिथे माहिती देणाऱ्याला एक लाख पर्यंत बक्षीस मिळू शकते, हेतू स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे आणि मुलींचा जन्मदर वाढवणे आहे, ज्यात माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कार्यशाळेस डॉ. सत्यप्रेम वारे यांनी गर्भलिंगनिदानाविरोधात लेक लाडकी अभियान विविध पातळीवर कार्यरत आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी अतिशय निकडीची आहे. कायद्याचा अर्थ आणि ताकद नीट समजून घेऊन समुचित प्राधिकारी व संबंधित यंत्रणेने त्याची चोख अंमलबजावणी केली तर गुन्हेगारांना पकडण्यात आणि लिंगनिदानाला प्रतिबंध करण्यात निश्चितच यश येऊ शकेल. याच उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे मत मांडले. तसेच डॉ. मंजूराणी शेळके यांनी उपस्थित असलेल्या सर्व आशा, पी. एच. सी. वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणीवर कशी मात करता येईल याचे सकल असे विश्लेषण करून समजावून सांगितले. ॲड. रेणुका शेटे यांनी देखील कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या कार्यशाळेला जिल्हा समन्वयक कार्यक्रम श्रीमती सुनीता सांळुके, आय . एम. ए. डॉ. कुंकूलोळ, डॉ. सायस केंद्रे, डॉ. चंद्रकांत लामतुरे, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. वाकुरे, व जिल्हा समन्वयक श्री. अमर सपकाळ, तसेच तालुक्यातील सर्व सोनोग्राफी केंद्र धारक व एमटीपी/ सर्व समुदाय आरोग्य अधिकारी,ए.एन.एम,आशा स्वयंसेविका उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुदेशक तानाजी कदम यांनी केले. तर कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. ही कार्यशाळा पार पाडण्यासाठी अधिपरिसेविका, अधिसेविका, दत्तप्रसाद हेड्डा, लक्ष्मीकांत मुंडे , मुंजाजी शिकारे, शिवशंकर वीर यांनी सहकार्य केले.
Satara News : तीन वर्षांनंतर कराड नगरपालिकेत हालचाल; नगराध्यक्ष दालनाचे नूतनीकरण सुरू
प्रशासकीय राजवट संपल्यानंतर कराड पालिकेत नवचैतन्य कराड : येथील नगरपालिकेत २०२२ पासून प्रशासक राग आहे. गेल्या जनरत बाँडीची मुदत संपल्यानंतर गेली तीन वर्षे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच समासद हॉल बंद होते. आता नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर पालिकेत नूतन नगराध्यक्ष आणि [...]
मराठी माणसाचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. आज संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. यानंतर X वर पोस्ट करत राज ठाकरे असं म्हणाले आहेत. […]
उन्नाव बलात्कार प्रकरण –गुन्हेगाराला जामीन मिळणे लज्जास्पद आणि निराशाजनक; राहुल गांधी संतापले
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. त्यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. एखाद्या गुन्हेगाराला जामीन मिळणे लज्जास्पद आणि निराशाजनक असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणावर एक्सच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर […]
पालकमंत्री नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
कुडाळ – राज्याचे मत्स्य ,बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए.कुलकर्णी यांनी बुधवारी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले.अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी केलेला विनंती अर्ज न्यायालयाने नाकारला.संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रविण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले [...]
Satara News : उंब्रजमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार; एकास अटक
उंब्रज येथील घटनेत आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी उंब्रज : उंब्रज (ता. कराड) येथे एका तरुणाने विवाहित महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन घरात घुसून तिव्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची [...]
निरवडेत २५ डिसेंबरला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
न्हावेली/वार्ताहर श्री कुलदेवता कला क्रिडा मंडळ आयोजित निरवडे झरबाजार येथे जिल्हास्तरीय वयोमर्यादित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10,000 रुपये द्वितीय पारितोषिक 6,000 रुपये तर आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.त्यानंतर रात्री ९.३० वाजता श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ आयोजित व नितीन आसयेकर प्रस्तुत ” नागेश्वर लिंग स्थापना ” हा [...]
निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांबाबत गटविकास अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचा पुढाकार ओटवणे|प्रतिनिधी निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनने निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्न व मागण्यांबाबत बुधवारी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बीएम नाईक यांची भेट घेत चर्चा केली. तसेच निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित मागण्या व प्रश्न सोडविण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी केली.यावेळी गटविकास अधिकारी व्हीएम नाईक यांनी 30 जून ची वेतन वाढ फरक [...]
नितीन आसयेकर यांना ”कोकण गौरव ”पुरस्कार प्रदान
न्हावेली /वार्ताहर सावंतवाडी तालुक्यातील मळगावचे सुपुत्र आणि दशावतार नाट्यकलेतील अभ्यासू ,संवेदनशील व्यक्तिमत्त्व नितीन आसयेकर यांना ठाणे येथील कोकण आधार प्रतिष्ठापन तर्फे मानाचा ” कोकण गौरव पुरस्कार ” प्रदान करण्यात आला.रायगड,रत्नागिरी,व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या सामाजिक व शैक्षणिक संस्थेने आसयेकर यांच्या सांस्कृतिक योगदानाची दखल घेतल्याने संपूर्ण कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोककलेचा निष्ठावंत [...]
Video –मराठी माणसांनो आता फुटाल तर, पूर्णपणे संपून जाल –उद्धव ठाकरे
विकास कुलकर्णी यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार
श्री. कुलकर्णी यांचे दोडामार्ग तालुक्यात सामाजिक, आरोग्य क्षेत्रात आहे अतुलनीय योगदान दोडामार्ग – वार्ताहर गोवा राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विकास कुलकर्णी यांची टॅलेंट कट्टा ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सह्याद्रीरत्न पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे.हा मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार रविवार, दिनांक 25 जानेवारी [...]
Video –शिवसेना-मनसे युतीची घोषणा
हिवाळ्यात आठवड्यातून एकदा केसांना दही का लावावे, वाचा
केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर, दही हा एक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या घडीला केसगळतीच्या समस्येने पुरुष आणि स्त्रिया दोघेही त्रस्त आहेत. अशावेळी अगदी साधे सोपे घरगुती उपाय खिशालाही परवडणारे असतात आणि केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हितावह असतात. महिलांच्या सौंदर्यामध्ये केसांचे स्थान हे महत्त्वाचे आहे. अनेकदा धुळीमुळे, प्रदुषणामुळे केस गळणे, कोरडे पडण्यास सुरुवात होता. केसांचे आरोग्य हे […]
केस गुडघ्यापर्यंत वाढण्यासाठी आवळ्याचा असा उपयोग करा, वाचा
आवळा हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. लोणचे, मुरब्बा, कँडी, रस आणि च्यवनप्राशच्या स्वरूपात आपण आवळ्याचे सेवन करु शकतो. आवळा त्याच्या अँटी-ऑक्सिडंट, कर्करोग-विरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी देखील ओळखला जातो. हे सर्वात शक्तिशाली फळांपैकी एक मानले जाते. रोग बरा करण्यासाठी पूर्वापार आवळा वापरला जात आहे. हिंदुस्थानात बिर्याणी नंबर 1, दर मिनिटाला 194 […]
कात्रज–कोंढवा परिसरात विजेच्या तारा तुटल्याने आज पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे. तब्बल दहा तासांहून अधिक काळ वीज नसल्याने परिसरातील अनेक सोसायट्यांतील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती कामकाज, पाणीपुरवठा, लिफ्ट सेवा तसेच ऑनलाइन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. काही सोसायट्यांमध्ये जनरेटरची व्यवस्था अपुरी असल्याने […]
Kalyan news –शरद पाटील यांची प्रभारी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कल्याण लोकसभेसाठी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून शरद पाटील (विधानसभा-अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
भाजपच्या नवनिर्वाचित झेडपींना मार्गदर्शन
आगामीनिवडणुकांसंदर्भातकार्यक्रमांचीआखणी पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने घवघवीत यश प्राप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपने विविध राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक घेऊन मंत्री, आमदार, पदाधिकारी यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘सागर मंथन’ सारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासह अनेक निर्णय घेण्यात आले. आगामी निवडणुकीच्यादृष्टीने रणनीती म्हणून मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर आता लवकरच काही पालिका आणि मनपाचीही [...]
राज्यात आजपासून राज्यात आजपासून नाताळ उत्सवाची पर्वणी
पणजी : आज सायंकाळपासून गोव्यात नाताळची धूम सुरू होत आहे. राजधानी पणजीसह गोव्याच्या किनारी भागात तसेच दक्षिण गोव्यात सालसेतमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांनी नाताळनिमित्त सजावट केली असून नाताळच्या स्वागतासाठी ख्रिश्चन मंडळी सज्ज झाली आहे. आज बुधवारी मध्यरात्री नाताळनिमित्त गोव्यातील विविध चर्चमध्ये प्रार्थना होतील. मध्यरात्री 12 नंतर चर्चमधील फादर्स, येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्याचे जाहीर करतील. राज्यात [...]
मध्यवर्ती बसस्थानकावर महिलेच्या बॅगेतील 7 लाखाचे दागिने लंपास
बेळगाव : बैलहोंगलकडे जाणाऱ्या केएसआरटीसीच्या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत एका प्रवासी महिलेच्या व्हॅनिटी बॅगमधील सुमारे 7 लाख रुपये किमतीचे 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हातोहात पळविले आहेत. या प्रकरणी भारती रामलिंग नांगनूर रा. हुदली यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे. फिर्यादी भारती या हुदली [...]
हिंदुस्थानात बिर्याणी नंबर 1, दर मिनिटाला 194 ऑर्डर, वाचा स्विगीचा ‘खुसखुशीत’अहवाल
स्वयंपाक करण्याचा कंटाळा आल्यानंतर एकमेव पर्याय म्हणजे बाहेरून पदार्थ ऑर्डर करणे हा असतो. यामुळे आपला वेळ तर वाचतोच पण आपले आवडते अन्न देखील खायला मिळते. सध्याच्या घडीला ऑनलाइन ऑर्डरिंगमुळे आपला वेळ खूप वाचला आहे. ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी कंपनी स्विगीने नुकताच एक विशेष अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात, स्विगीने 2025 मध्ये कोणत्या पदार्थांना सर्वाधिक […]
घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावे
महापौर-उपमहापौरांचीसूचना: दुसऱ्यादिवशीहीशहरपरिसरातफेरफटका बेळगाव : शहर व उपनगरात उघड्यावर कचरा टाकू नये, यासंदर्भात नागरिकांना सूचना करण्यासाठी महापौर,उपमहापौर व अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुसऱ्या दिवशीदेखील पहाटे 5.30 वा. अंजनेयनगर, शाहूनगर, बसव कॉलनी परिसरात फेरफटका मारला. नागरिकांमध्ये जागृती करण्यासह कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचना आरोग्य निरीक्षकांना करण्यात आली. त्याचबरोबर घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करणाऱ्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने [...]
कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांची धुळदाण
प्रवाशांचीगैरसोय, दुरुस्तीगरजेची बेळगाव : शहरातील कॅन्टोन्मेंट एरियातील रस्त्यांची धुळदाण झाली आहे. धोबीघाट कॉर्नर ते चंदगड बसस्टॉपपर्यंतच्या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असल्याने नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले आहे. रात्रीच्यावेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत असून कॅन्टोन्मेंट प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडे नवीन रस्ते करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याचे कारण यापूर्वीच्या [...]
शहरातील पोलीस उपनिरीक्षक वर्षानुवर्षे एकाच ठाण्यात
पाचवर्षेसेवाबजावूनहीबदलीनाही: पोलीसआयुक्तांनीलक्षदेण्याचीआवश्यकता बेळगाव : पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील काही पोलीस स्थानकांमध्ये पोलीस उपनिरीक्षक गेल्या पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. खरेतर दोन वर्षांतून एकदा उपनिरीक्षकांची बदली होणे आवश्यक आहे, असे कायदा सांगतो. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्याचा विसर पडला असल्याने वर्षानुवर्षे एकाच ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक कार्यरत आहेत. खुर्चीला चिकटून बसलेल्या उपनिरीक्षकांची पोलीस आयुक्तांनी [...]
भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही…
कविता-बासरीवादनानेबेळगावकरभारावले: उत्स्फूर्तप्रतिसाद बेळगाव मनतुझंजलतरंग, लहरीतुझासाज, दरवेळीपरकीवाटते, ओळखीचीगाज. चालतुझीफसवीजरी, गाणंदगाबाजनाही, भरतीचामाजनाही, ओहोटीचीलाजनाही….. कवी वैभव जोशी यांच्या या कवितेने मागील काही दिवसात सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या सुंदर कवितेसोबत इतर नवीन कविता ऐकण्यासोबतच तितक्याच ताकदीच्या बासरी वादनाने बेळगावकरांची संध्याकाळ संस्मरणीय ठरली. लोकमान्य रंगमंदिर येथील सभागृह या काव्य आणि धून मैफलीने भारावून गेले होते. गुलाबी थंडीतही [...]
स्काऊट अॅण्ड गाईड्सच्या परिषदस्थळाला राहुल शिंदे यांची भेट
बेळगाव : तालुक्यातील होनगा येथील फिनिक्स पब्लिक रेसिडेन्शियल शाळेत 27 डिसेंबरपासून स्काऊट अॅण्ड गाईड्सची परिषद होणार आहे. याच्या पूर्वतयारीची जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी पाहणी केली. परिषदेदरम्यान मुख्य व्यासपीठ निर्माण करण्यात येणार असून निवास व्यवस्था, स्वच्छता, जेवणाची व्यवस्था, पार्कींग व इतर सुविधांची राहुल शिंदे यांनी पाहणी केली. वन विभाग, फलोत्पादन विभाग, ग्रामपंचायत व इतर [...]
अभिनेते सचिन पिळगावकर आज बेळगावात
बी. के. मॉडेलहायस्कूलच्याशताब्दीसोहळ्यालाउपस्थिती बेळगाव : कॅम्प येथील बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त बुधवार दि. 24 रोजी भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5.30 वा. शाळेच्या पटांगणावर हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमामध्ये अभिनेते सचिन पिळगावकर विद्यार्थी व उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. विशेषत: चित्रपट दिग्दर्शन, सिनेसृष्टीतील करिअरच्या [...]
लोटे एमआयडीसी येथील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज़ लिमिटेड या कंपनीवरून पर्यावरणासह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी कंपनी प्रशासनासोबत बैठक घेतली. लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने सर्व कायद्याचे, पर्यावरणीय नियमाचे आणि सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करावे अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कंपनीचे प्रकल्प प्रमुख दिपक […]
रायपाटण येथे भीषण अपघात; दुचाकीवरून खाली पडून महिलेच्या डोक्यावरून गेले चाक, जागीच मृत्यू
राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवार सकाळी १० च्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पार्वती तानू तरळ (रा. शिवणे बुद्रुक) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. दुचाकी आणि कारच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या […]
Sangli News : कारंदवाडीत उसात आढळली बिबट्याची तीन पिल्ली
सांगली वनविभाग घटनास्थळी दाखल आष्टा : आष्टा कारंदवाडी ता. बाळबा येथील तोडकर मळ्याकडे जाणाऱ्या रोडवर सदाशिव दळवी यांच्या शेतात उभ्या उसात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली.तुंग येथील शेतकरी बांधवांनी सांगली येथील वन विभाग कार्यालय संपर्क साधला. त्यानंतर [...]
Kolhapur News : कसबा बावड्यात भरदिवसा कोल्ह्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोल्ह्याचा रेडक्यावर हल्ला कोल्हापूर : कसबा बावडा येथील वाडकर गल्ली परिसरात मंगळवारी दुपारी साधरणतः तीनच्या सुमारास कोल्डा फिरताना काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा कोल्हा हनुमान तलाव मार्गे पिंजार [...]
Sangli News : आटपाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला; पोलिसांकडून फिर्याद नोंदवण्यात दिरंगाई
आटपाडीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आटपाडी : निंबवडे येथील सुमित मारूती मेटकरी (२५) या तरूणाची चारचाकी गाडी अडवुन गंभीर मारहाणीची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. या घटनेनंतर दोन दिवस तांत्रिक कारण सांगत पोलीसांनी [...]
Sangli Politics : सांगली महापालिका निवडणूक; महायुती–आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम
सांगली मनपासाठी राजकीय गणित बिघडले सांगली : महापालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली मात्री महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटपात घोडं अडलेलेच आहे. सर्व पक्षांकडून जादाच्या जागांची मागणी केली जात असल्याने [...]
मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार! –राज ठाकरे
महाराष्ट्र आणि मराठी माणसाला प्रतीक्षा असलेला ऐतिहासिक क्षण अखेर आला आणि शिवसेना-मनसे युतीची बुधवारी घोषणा झाली. मुंबईतील हॉटेल ब्ल्यू सी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची अधिकृत घोषणा केली. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच […]
मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन उद्धव ठाकरे –राज ठाकरे एकत्र आले आहेत –संजय राऊत
महाराष्ट्र आणि मराठी माणूस वाट पाहात असलेला क्षण अखेर समोर आला. मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दोन्ही एकत्रितपणे लढवणार असल्याची घोषणा झाली. या ऐतिहासिक क्षणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल […]
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे दोन वाघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार हे निश्चित झालेच होते, फक्त आता अधिकृत घोषणा बाकी होती. घोषणा ऐकण्यासाठी मराठीजनांने कान आसुसलेले होते. अखेर ती वेळ आलीच. 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार […]
Kolhapur News : कोडोलीत नाताळची जय्यत तयारी ; विविध कार्यक्रमाचे आयोजन
कोडोली चर्चमध्ये पाच दिवसांचा भव्य नाताळ उत्सव by दिलीप पाटील वारणानगर : कोडोली ता.पन्हाळा येथे शतकोत्तर परंपरा असलेला नाताळ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाची जयत तयारी सुरू आहे. उत्सव निमित्त चर्चमध्ये विविध [...]
Kolhapur News : कोडोलीत भरदिवसा घरफोडी; साडे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास
कोडोली पोलिसांकडून पंचनामा वारणानगर : कोडोली ता. पन्हाळा येथील गावचावडी समोरील मुख्य रस्त्याला लागुन असलेले जावेद अब्दुल आंबी यांचे घरी चोरी झाली. चोरट्याने भरदिवसा फोडून कपाटातील साडे सात तोळे सोन्याचे दागिन्यांवर डल्ला मारला. मंगळवार दि.२३ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही [...]
अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी एकजण ताब्यात
सावंतवाडी एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार सावंतवाडी शहरात घडला. या घटनेची माहिती मुलीने आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुनील उर्फ सनी बाळू पाटील (वय .38 रा. सावंतवाडी याच्या विरोधात विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. रात्रौ त्याला पोलिसांनी अटक केली.अल्पवयीन [...]
Kolhapur News : मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालय बाबत आरोग्य उपसंचालकांनी दिली भेट
मलकापूर उपजिल्हा रुग्णालय प्रक्रियेला गती शाहूवाडी : मलकापूर पंचक्रोशीला आवश्यक असलेले मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालय तात्काळ व्हावे .यासाठी आमदार विनय कोरे यांनी नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता . याची गंभीर दखल घेत आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश [...]
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांचा गट एकत्र लढणार का? यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आले. आमचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न आहे की महाविकास आघाडी आणि कोणतेही समविचारी पक्ष पुण्याच्या विकासासाठी एकत्र येत असतील त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. […]
भेंडवडे गावाचा पाणी प्रश्न ऐरणीवर नरंदे : नरंदे (ता.हातकणगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याकडून सोडण्यात येणाऱ्या मळीमिश्रित वारणा नदितील पाण्यामुळे भेंडवडे गावातील पिण्याच्या पाण्याचे व शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज तीव्र आंदोलन छेडले. [...]
अवैध दारू वाहतूकप्रकरणी बांद्यात एकजण ताब्यात
राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली पथकाची कारवाई प्रतिनिधी । बांदा गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर मुंबई गोवा महामार्गावरील बांदा सटमटवाडी येथे हॉटेल विवा क्लासिकच्या समोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने मंगळवारी रात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत चारचाकी वाहनासह 11 लाख 68 हजार ६००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दारूची अवैध [...]
इंडियन आर्मीतील लेफ्टनंट सई जाधव by संजय खूळ कोल्हापूर : तिने जिद्द ठेवली होती आपणही लष्कर सेवेतून देश सेवा करायची. त्यासाठी खडतर परिश्रम करावे लागतात याची तिला जाणीव होती. त्यामुळेच ती एका [...]
बँकांनी ग्राहकांना सुलभपणे सेवा द्यावी
खासदारजगदीशशेट्टरयांचीबँकअधिकाऱ्यांनासूचना: बँकअधिकाऱ्यांचीजिल्हास्तरीयबैठक बेळगाव : सहकारी संघांच्या बँकांमध्ये अनेकांच्या ठेवी असतात. या ठेवी काही दिवसांनी मिळविण्यासाठी ग्राहक बँकेकडे गेल्यास ती देण्यास बँकांच्या अधिकाऱ्यांकडून चालढकल करण्यात येते. ग्राहकांच्या हितासाठी रिझर्व्ह बँकेने काही मार्गसूची दिलेली असल्यास त्याची अंमलबजावणी योग्यरितीने करावी. ग्राहकांना सुलभपणे सेवा द्यावी, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना केली. येथील जिल्हा पंचायतीच्या सभागृहात [...]
कागवाड-मोळवाड रस्त्याच्या सीमेचा सर्व्हे करण्याची मागणी
बेळगाव : कागवाड-मोळवाड रस्त्यावर अतिक्रमण झाले असून यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाणे, उसाच्या वाहनांना अडथळा येत असून सरकारकडून मंजूर झालेल्या कामांना खो घातला जात आहे. नगरपंचायत व ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना सदर रस्त्याच्या नकाशाची जुनी प्रत दिली जाईल. यासाठी अतिक्रमण झालेल्या रस्त्याच्या सीमेचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी [...]
राष्ट्रीय कृषी दिनाचे औचित्य साधून बायपास रद्द करण्याची मागणी
बेळगाव : बेकायदेशीररित्या केला जात असलेला हलगा-मच्छे बायपास रस्ता रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवार दि. 23 रोजी हलगा-मच्छे बायपासवर राष्ट्रीय कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी ‘रद्द करा रद्द करा बायपास रद्द करा’ ‘जय जवान जय किसान’, ‘भारत माता की जय’ अशाप्रकारच्या घोषणा देत हिरवे टॉवेल फिरवून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रोष [...]
सौंदत्ती यल्लम्मा मंदिर समिती पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखोंवर भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच सढळ हाताने दानधर्म करत असतात. मात्र सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान समितीचे पदाधिकारी भाविकांची लूट करत असून अनेकवेळा महिला भाविकांचाही अपमान केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच मंदिराच्या उत्पन्नाचा गैरवापर करण्यात येत असून याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी [...]
‘गरिबांना वाचवा’ थीमनुसार नाताळ साजरा करणार
बिशपडेरेकफर्नांडिसयांचीमाहिती बेळगाव : शहरात नाताळ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 24 रोजी मध्यरात्री 2 तास प्रार्थना करण्यात येणार असून 25 पासून 1 तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘गरिबांना वाचवा’ अशी थिम ठेवण्यात आली असून बेळगावसह 5 जिल्ह्यातून 3 ते 4 हजार ख्रिस्त बांधव नाताळ साजरा करण्यासाठी शहरात येणार आहेत, अशी महिती बिशप [...]
एपीएमसीतील संडे मार्केट बंद करण्याची मागणी
बेळगाव : एपीएमसीमध्ये जय किसान भाजीमार्केटकडून चालविण्यात येणारे संडे मार्केट बंद करण्यात यावे. या मार्केटमुळे एपीएमसीमध्ये आपला भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना समस्या निर्माण होत आहे. तसेच एपीएमसीत एजंट शेतकऱ्यांकडून कमिशन वसूल करत असून हे एपीएमसी कायद्यानुसार बंद करण्यात यावे. एपीएमसीमध्ये शेतकऱ्यांना मुक्त व्यापार करता यावे, अशाप्रकारचे वातावरण निर्माण करण्यात यावे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्या होऊ [...]
बसवन कुडचीतील ‘त्या’ तालमीचा कब्जा घ्या
ग्रामस्थांचीमहापौर-मनपाआयुक्तांकडेमागणी बेळगाव : बसवन कुडची गावातील महानगरपालिकेच्या मालकीची तालीम काही जणांनी बळकावली आहे. त्यामुळे याकडे महानगरपालिकेने लक्ष घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच तालमीचा कब्जा घेऊन ती सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन सोमवार दि. 22 रोजी ग्रामस्थांनी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली महापौर व मनपा आयुक्तांना दिले आहे. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत तातडीने [...]
Shiv Sena-MNS Alliance –शिवसेना-मनसे युतीची घोषणा!
महाराष्ट्र आणि मराठी माणसाला प्रतीक्षा असलेला ऐतिहासिक क्षण अखेर आला आहे. तमाम मराठी माणसाच्या मनासारखं घडत आहे. शिवसेना आणि मनसे युतीचा निर्णय झाला आहे. मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. वाचा पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे […]
Shiv Sena-MNS Alliance Live –थोड्याच वेळात उद्धव ठाकरे-राज ठाकरे करणार शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा
महाराष्ट्र आणि मराठी माणसाला प्रतीक्षा असलेला ऐतिहासिक क्षण अखेर आला आहे. तमाम मराठी माणसाच्या मनासारखं घडत आहे. शिवसेना आणि मनसे युतीचा निर्णय झाला आहे. मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दुपारी 12 वाजता युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. या […]
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिने बंद
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे भीमाशंकर येथे होणाऱया विकास आराखडय़ाच्या कामांनिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद राहणार आहे. 2027 मध्ये नाशिक त्रंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. कुंभमेळावेळी भीमाशंकर इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीदेखील मोठय़ा प्रमाणात गर्दी होईल हे लक्षात घेऊन भीमाशंकर येथील व्यवस्थापन व येथे येणाऱया भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी नव्याने काही कामे […]
‘पुष्पा 2’नंतर अल्लू अर्जुन साकारणार ही भूमिका, चित्रपटाचे बजेट ऐकून व्हाल थक्क, वाचा सविस्तर
अल्लू अर्जुन पुष्पा २ या चित्रपटानंतर काय करणार हा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला होता. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. मिळालेल्या बातमीनुसार अल्लू अर्जुन आगामी बिग बजेट चित्रपटामध्ये काम करणार असल्याचे आता समोर आले आहे. अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. हा त्यांचा चौथा चित्रपट एका पौराणिक कथेवर […]
ट्रेंड –हिंदुस्थानातील आयटी अभियंता रशियात मारतो झाडू
अभियंता होण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. अभियंता झाल्यानंतर चांगली नोकरी मिळाल्यानंतरही एका अवलियाने ती सोडून रस्त्यावर झाडू मारायचे काम हाती घेतले आहे. ही गोष्ट आहे रशियात गेलेल्या 17 हिंदुस्थानी कामगारांची. सेंट पीटर्सबर्ग शहरात हे कामगार रस्ते झाडत आहेत. या कामगारांमध्ये मुकेश मंडल या आयटी अभियंत्याचेही नाव आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीमध्ये काम केल्याचे तो सांगतो. पण, रशियामध्ये […]
बेळगाव-वेंगुर्ले मार्ग दुरुस्त होताच वाहनांचा वेग वाढला
अपघातांच्या दुर्घटना : हिंडलगा-बाची पट्ट्यातील रस्त्यावर गतिरोधक घालण्याची मागणी वार्ताहर/उचगाव हिंडलगा-बाची या पट्ट्यातील बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील रस्त्याचे काम सध्या सुरू असून या मार्गावरील काही भाग सध्या डांबरीकरण करून गुळगुळीत करण्यात आल्याने सर्वच वाहनांचे वेग वाढले आहेत. याचाच एक प्रत्यय मंगळवारी उचगाव जवळील मार्कंडेय नदीच्या पुलाजवळ दोन मोटारसायकली यांच्यात झालेल्या अपघातात कल्लेहोळ येथील एका इसमाचा पाय मोडल्याची [...]

26 C