SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

25    C
...

टी-20 मालिकेत न्यूझीलंडची विजयी सलामी

झिम्बाब्वेचा 92 धावांनी पराभव, सामनावीर अॅमेलिया केरचे नाबाद शतक, 2 बळी वृत्तसंस्था / हॅमिल्टन ‘सामनावीर’ आणि नाबाद शतकवीर अॅमेलिया केरच्या शानदार कामगिरीच्या जोरावर येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या टी-20 मालिकेतील सामन्यात यजमान न्यूझीलंडने झिम्बाब्वेवर 92 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने शानदार अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन घडविले. कर्णधारपदाची सूत्रे हाती आल्यानंतर पहिल्याच सामन्यात केरने [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:30 am

मानवाधिकारावर राजकारण नव्हे, समग्र दृष्टीकोन आवश्यक

संयुक्त राष्ट्रसंघात विदेशमंत्री जयशंकर यांचे आवाहन वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकारांवरून ‘राजकीय वक्तव्यां’च्या पुढे जात विकास, क्षमतानिर्मिती आणि दहशतवादविरोधी कठोर भूमिका अवलंबिण्याच्या आवश्यकतेवर विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी जोर दिला आहे. मानवाधिकारांचा उद्देश दुर्बल वर्गाच्या लोकांच्या दैनंदिन जीवनात ठोस सुधार घडवून आणणे असावा असे जयशंकर यांनी म्हटले आहे. संघर्ष, ध्रूवीकरण आणि अनिश्चिततेने ग्रस्त जगात भारत संयुक्त आधार [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:28 am

3200 कोटीची फसवणूक, चौधरी विरोधात रेड कॉर्नर नोटीस

वृत्तसंस्था/ भोपाळ मध्यप्रदेशच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) एका मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणाचा मुख्य आरोपी लविश चौधरी (उर्फ नवाब) विरोधात आता इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी करविली आहे. या प्रकरणात अनेक राज्यांच्या गुंतवणुकदारांची 3200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. यापूर्वी एसटीएफने इंटरपोलच्या मदतीने ब्ल्यू कॉर्नर नोटीसद्वारे दुबईतील लविशच्या ठावठिकाण्याचे ठोस पुरावे जमविले होते. आता [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:24 am

बसप आमदाराच्या निवासस्थानातून 10 कोटी रुपये जप्त

वृत्तसंस्था/ लखनौ उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये बसप आमदार उमाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारपासून छाप्याची कारवाई सुरू केली होती. तर प्राप्तिकर विभागाची ही कारवाई गुरुवारी संपुष्टात आली. या कारवाईदरम्यान 10 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उमाशंकर सिंह यांचे कार्यालय आणि अन्य ठिकाणांवरील कारवाई अद्याप जारी आहे. उमाशंकर विरोधात प्राप्तिकर विभागाने लखनौ, [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:22 am

फरार अनिल कुमार रेड्डीचे दुबईतून प्रत्यार्पण

नवी दिल्ली : सीबीआयने इंटरपोलच्या मदतीने दुबईत लपून बसलेला वाँटेड अनिल कुमार रे•ाrला भारतात आणण्यास यश मिळविले आहे. रे•ाr हा आंध्रप्रदेशातील अनेक गंभीर गुन्ह्यांप्रकरणी आरोपी आहे. अनिल कुमार रे•ाrवर फसवणूक, गुन्हेगारी धमकी यासारखे गंभीर गुन्हे आहेत. आंध्रप्रदेश पोलीस त्याचा दीर्घकाळापासून शोध घेत होते. आंध्र पोलिसांच्या विनंतीवर सीबीआयने 5 सप्टेंबर 2022 रोजी त्याच्या विरोधात इंटरपोल रेड [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:21 am

उमर खालिदसोबत राहुल गांधींची तुलना

भाजप कार्यालयाबाहेर झळकली पोस्टर्स : अराजकतेची पद्धत एक असल्याचा दावा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीतील एआय समिटमध्ये काँग्रेस नेत्यांनी घातलेल्या गोंधळाकरता भाजपने पुन्हा एकदा राहुल गांधींना जबाबदार ठरविले आहे. भाजपने राहुल गांधींची तुलना 2020 च्या दंगलीतील आरोपी उमर खालिदसोबत करत पोस्टर्स झळकविली आहेत. या पोस्टरवर ‘अराजकतेची पद्धत एक, केवळ देशविरोधी चेहरे बदलत राहतात’ या आशयाचा मजकूर [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:19 am

अजब चेहऱ्यासह जन्मलेला इसम

26 वेळा करविली शस्त्रक्रिया जगभरात असे अनेक आजार आहेत, ज्याविषयी कळल्यावर धक्का बसत असतो. यातील अनेक आजार अत्यंत दुर्लभ प्रकारचे असतात, ज्यांच्यावर उपचार शक्य नसतो. असाच एक उपचाररहित आजार इंग्लंडच्या बर्मिंघम येथे राहणाऱ्या 36 वर्षीय अमित घोषला आहे. तो अजब चेहऱ्यासोबत जन्माला आला होता. वयाच्या 11 व्या वर्षी त्याचा एक डोळा काढावा लागला. आतापर्यंत त्याने [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:16 am

सिक्कीममध्ये 4 तासांत दोनवेळा भूकंप

गंगटोक सिक्कीममध्ये गुरुवारी भूकंपाचे दोन धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचा पहिला धक्का सकाळी 11.24 वाजता जाणवला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 इतकी होती. दुसरा धक्का दुपारी 12.17 वाजता जाणवला, ज्याची तीव्रता 3.5 इतकी होती. दोन्ही भूकंपांचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते. भूकंपाच्या या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारच्या जीवित [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:14 am

डिएगो गार्सियात एफ-16, इस्रायलमध्ये एफ-22

विदेशमंत्री रुबियोंकडून ‘गँग ऑफ 8’ला ब्रीफिंग : इराणवरील हल्ल्याच्या हालचालींना वेग वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी इराणसोबत जारी तणावावरून अमेरिकेच्या खासदारांना माहिती दिली आहे. मागील काही दिवसांमध्ये अमेरिकेने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांना तैनात केले आहे. अमेरिकेचे एफ-22 लढाऊ विमान इस्रायलमध्ये वायुतळांवर तैनात करण्यात आले आहे. तर एफ-16 लढाऊ विमानांना हिंदी महासागरातील डिएगो गार्सियामध्ये तैनात [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:13 am

भारत-इस्रायल मैत्रीचा नवा अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा इस्रायल दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला आहे. दोन्ही देशांमधील मैत्री या दौऱ्यामुळे अधिक बळकट आणि अधिक फलदायी झाल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही देशांनी या दौऱ्यात विविध क्षेत्रांमध्ये अनेक करार आणि सामंजस्य करार केले असून त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांची भविष्यकालीन दिशा स्पष्ट होत आहे. विशेषत: संरक्षण क्षेत्रात जे करार करण्यात [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:10 am

परमार्थाच्या प्राप्तीकरिता सद्गुरूंचा आश्रय हा मूलाधार असतो

अध्याय चौथा भगवंत अर्जुनाला म्हणाले, श्रद्धावान, इंद्रिय जिंकलेल्या, ज्ञानसाधनेत तत्पर असलेल्या पुरुषाला ज्ञान प्राप्त होते. त्या ज्ञानाने त्याला भगवतप्राप्तीच्या रूपाने परमशांती लाभते. ह्या अर्थाचा श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध । ज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग ।। 39 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. आत्मज्ञान मिळवण्यासाठी माणसाची सद्गुरूंच्या वचनावर नितांत श्रद्धा असणे आवश्यक [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:08 am

जंगलात वसलेला महिलांचा अनोखा देश

पुरुषांच्या सावलीलाही नाही स्थान महिलांचे एक असे जग आहे, जेथे पुरुषाचा कायदा चालत नाही तसेच त्यांच्या उपस्थितीला अनुमती नाही. अमेरिकेच्या ओरेगन प्रांतातील घनदाट जंगल आणि दुर्गम पर्वतांदरम्यान एक असा ‘गुप्त संसार’ आहे, ज्याला ‘वुमेन्स लँड’ म्हटले जाते. 1970 च्या दशकापासून चालत आलेला हा एक असा क्रांतिकारक प्रयोग आहे, जेथे महिलांनी समाजाच्या बेड्या तोडून निसर्गाच्या कुशीत [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:06 am

सीमांचलमधून घुसखोरांना हाकलू : शाह

नेपाळ सीमेवरून मोठी घोषणा वृत्तसंस्था/ अररिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसीय बिहार दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी सीमांचलमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. नेपाळ सीमेला लागून असलेल्या लेटी येथे शाह यांनी सशस्त्र सीमा दलाच्या 52 व्या बटालियन बॉर्डर आउट पोस्ट भवनाचे उद्घाटन केले. तसेच सीमा सुरक्षेशी निगडित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण अन् समीक्षा केली आहे. [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:06 am

बेरोजगारांचा इशारा…सत्ताधाऱ्यांना हादरा?

दरवर्षी लाखो तरुण आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीचे स्वप्न पाहात असतात. नोकरी लागली नाही तर लग्न ठरत नाही. सतत प्रयत्न करूनही सरकारी नोकरी मिळत नाही. म्हणून एखाद्या खासगी कंपनीत मिळेल ती नोकरी पत्करली जाते. तरुणांच्या शिक्षणाच्या मानाने त्यांना योग्य नोकरी मिळत नाही, अशी ओरड आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारे रखवालदाराचे काम करीत आहेत. [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:04 am

एआय मानव-नवी दिशा

भारतामध्ये चौथी आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद दिल्ली येथे पार पडली. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वच क्षेत्रात आपला प्रभाव दाखवीत असून त्यातून बेरोजगारीच्या प्रश्नाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त होऊ शकते, हा जगभरचा अंदाज आहे. भारतही त्याला अपवाद नाही. तथापि याच्या वापराबद्दल आणि त्यात सातत्याने होणाऱ्या सुधारणा व नवे उत्पादन या क्षेत्रात भारत कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो याचे अत्यंत [...]

तरुण भारत 27 Feb 2026 6:00 am

आज मराठीचा जागर! स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा भव्य सोहळा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी गौरव दिन म्हणून मोठय़ा उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनेही दरवर्षी मराठी भाषा दिनी मराठीचा जागर केला जातो. ती परंपरा कायम ठेवत यंदा मरीन लाइन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन महासंघाने केले आहे. या सोहळ्याला शिवसेना […]

सामना 27 Feb 2026 5:30 am

मराठी भाषा भवन चार वर्षांनंतरही कागदावरच, महायुती सरकारची उदासीनता

महायुती सरकारची मराठी भाषेबद्दलची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. मराठी भाषा दिनानिमित्त सरकारकडून उत्सव साजरा केला जात असताना मुंबईतील प्रस्तावित मराठी भाषा भवनाकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा अभिमानबिंदू ठरू शकणारे हे भवन चार वर्षे उलटल्यानंतरही कागदावर आहे. या भवनाची साधी पायाभरणीदेखील होऊ शकलेली नाही. मराठी भाषेचे संवर्धन व विकासासाठी मराठी भाषा भवन […]

सामना 27 Feb 2026 5:25 am

हिंदुस्थानी धुरंधरांची एकजुटीची फटकेबाजी, आता विंडीजविरुद्धच्या लढतीला उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप

कधी इशान खेळत होता तर कधी सूर्याची बॅट तळपत होती. तर कधी मधल्या फळीत हार्दिक पंडय़ा बरसत होता, पण आज हिंदुस्थानवर स्पर्धेबाहेर पडण्याचे संकट ओढावताच फलंदाजीतले धुरंधर प्रथमच एकजुटीने खेळले. या वर्ल्ड कपमध्ये ‘शून्याचा बादशहा’ ठरलेल्या अभिषेकच्या बॅटला षटकाराचे रक्त लागले. संजू सॅमसनने अपयशी सलामीची परंपरा मोडली. इशान आणि सूर्यकुमार यादवनेही मीसुद्धा असल्याचे दाखवून दिले […]

सामना 27 Feb 2026 5:19 am

झिम्बाब्वेची धूळधाण उडवत चेन्नई जिंकली, उपांत्य फेरी एक पाऊल दूर

‘करो या मरो’चे संकट समोर उभे ठाकताच हिंदुस्थानी संघ अंगार बनला. उपांत्य फेरीचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हिंदुस्थानच्या एक नव्हे तर आघाडीच्या सर्वच धुरंधरांनी आपल्या बॅटची कमाल दाखवत झिम्बाब्वेविरुद्ध 256 धावांचा अक्षरशः एव्हरेस्ट उभारला आणि तो पाहूनच प्रतिस्पर्ध्यांची मान झुकली. धावांचा हा महापर्वत चढण्याऐवजी झिम्बाब्वेने केवळ 20 षटके फलंदाजी करण्यातच धन्यता मानली. आजच्या विजयामुळे रविवारी विंडीजविरुद्ध […]

सामना 27 Feb 2026 5:15 am

सामना अग्रलेख –मतदान सक्ती, भ्रष्ट व्यवस्थेचे काय?

निवडणूक आयोगाची खालावलेली विश्वासार्हता, मतदार याद्यांमधील घोळ, मतदानाचे आकडे आणि टक्केवारी यांतील हेराफेरी, मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळे यात आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता हरवली आहे आणि लोकशाहीचा श्वासही गुदमरला आहे. मतदानाची सक्ती करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार गैर नाही, परंतु दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या निवडणुका हुकूमशाही आणि भ्रष्ट व्यवस्थेच्या जबड्यात अडकल्या आहेत, त्याचे काय? निवडणुकांना त्यातून बाहेर काढल्याशिवाय […]

सामना 27 Feb 2026 5:10 am

लेख –मराठी ज्ञानभाषा कधी होणार?

>> दिलीप देशपांडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला तरी ती ज्ञानभाषा कशी होईल आणि टिकून राहील याचा विचार महत्त्वाचा आहे आणि ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. कारण वाचण्यातून, लिहिण्यातून, बोलण्यातून आणि दैनंदिन व्यवहारातून हे शक्य आहे.नुसत्याच गप्पा करून आणि संमेलनातून शक्य नाही. संमेलन होत राहतील, पुस्तक महोत्सव होत राहतील. त्यातून सगळेच साध्य होत […]

सामना 27 Feb 2026 5:05 am

जाऊ शब्दांच्या गावा –दिस येतील…

>> साधना गोरे आज मराठी भाषा दिन, सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या निमित्ताने आज आपण ‘दिन’, ‘दिवस’ या शब्दाची माहिती घेणार आहोत. दिन, दिवस हे दोन्ही शब्द संस्कृतमधील ‘दिव्’ धातूपासून (मूळ शब्दापासून) आल्याचे शब्दकोशकार सांगतात. हा ‘दिव्’ शब्द आणि भारोपीय म्हणजे भारतीय-युरोपीय भाषा […]

सामना 27 Feb 2026 5:00 am

अपराजित द. आफ्रिकेचा विजयी षटकार, वेस्ट इंडीजचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक

जगज्जेतेपदावर डोळा ठेवून उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने मोदी स्टेडियमवर अशी तुफानी आतषबाजी केली की वेस्ट इंडीजचा प्रतिकार अक्षरशा धुरासारखा हवेत विरला. आधी वेगवान गोलंदाजांचा अचूक मारा आणि नंतर फलंदाजांची झंझावाती खेळी. या दुहेरी प्रहाराने दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीचे दार अक्षरशः लाथाडून उघडले. आता नंबर वन गटातून दुसऱया स्थानाचा फैसला 1 मार्चला हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील […]

सामना 27 Feb 2026 4:45 am

पराभवानंतर शनाकाची जाहीर माफी

‘जिंका नाही तर बॅगा भरा’ च्या लढतीत न्यूझीलंडकडून 61 धावांनी पराभूत होत सुपर-8 मधून बाहेर पडलेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दासुन शनाकाने देशवासीयांची जाहीर माफी मागितली. इंग्लंडकडून 51 धावांनी पराभव झाल्यानंतरही संधी होती, पण न्यूझीलंडविरुद्धचा एकतर्फी हार श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपवणारी ठरली.

सामना 27 Feb 2026 4:42 am

जीत-ए-जश्नच्या उंबरठ्यावर जम्मू-कश्मीर

जम्मू-कश्मीरचा संघ आता अक्षरशः जीत-ए-जश्नच्या उंबरठय़ावर उभा आहे. रणजीच्या रनमंचावर नवा इतिहास लिहिण्याची वेळ समोर येऊन ठेपली आहे. औकिब नबीच्या भेदक आणि धारदार माऱयाने कर्नाटकचा वरचा फलंदाजीक्रम चिरडून टाकत तिसऱया दिवसअखेर 5 बाद 220 अशी स्थिती केल्यामुळे पाहुण्या संघाने आपल्या पहिल्यावहिल्या रणजी जेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे. कर्नाटक 364 धावांनी मागे असून एका धावेची पिछाडीही […]

सामना 27 Feb 2026 4:37 am

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा –महाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीत धडाकेबाज एंट्री

येथील सागा बंदिस्त क्रीडा संकुलात महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंचा अक्षरशः झंझावाती खेळ अनुभवायाला मिळाला. 72 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपउपांत्य फेरीत धडक मारताना महाराष्ट्राने पुद्दुचेरीचा 69-21 असा दणदणीत पराभव केला. आता पुढची गाठ हिमाचल प्रदेशशी असली तरी त्यांना नमवत उपांत्य फेरी गाठण्याचे एकमेव ध्येय महाराष्ट्राने डोळय़ासमोर ठेवले आहे. सामन्याच्या पहिल्याच चढाईपासून महाराष्ट्र आक्रमणाच्या मोडमध्ये […]

सामना 27 Feb 2026 4:35 am

IND Vs ZIM –बनेट हिंदुस्थानलाही नडला अन् शेवटपर्यंत लढला! अखेर सूर्याच्या सेनेने मैदान मारलं, 72 धावांनी झिम्बाब्वे पराभूत

चेन्नई येथे खेळल्या गेल्या टीम इंडियाविरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात टीम इंडियाने बाजी मारत 72 धावांनी मोठा विजय साजरा केला आहे. या विजयामुळे टीम इंडियाचे सेमीफायनलच्या शर्यतीत आपलं स्थान अधिक भक्कम केलं आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 258 धावांचे तगडे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करतान ब्रायन बनेटने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवून दिला आणि नाबाद 97 […]

सामना 26 Feb 2026 11:04 pm

दाढी असलेल्या लोकांना पाहून मी घाबरतो…माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड माध्यमांसमोर फारसे आले नव्हते. परंतु माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते त्यांचे स्वागत करणाऱ्या व्यक्तीला म्हणत आहेत की, दाढी असलेल्या लोकांना पाहूनच भीती वाटते. हे ऐकताच त्यांच्या आजूबाजूचे लोक हसायला लागतात. […]

सामना 26 Feb 2026 10:46 pm

महानगर गॅस लिमिटेडकडून ग्राहकांना बनावट संदेश, फसवणूक करणाऱ्या लिंक्स आणि एपीके डाउनलोड्सपासून सावध राहण्याचे आवाहन

महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) आपल्या ग्राहकांना गॅस बिलाचे अपडेट्स किंवा गॅस पुरवठा तत्काळ खंडित करणे याच्याशी संबंधित असल्याचा दावा करणारे, एसएमएस आणि व्हॉट्सअॅप यांद्वारे प्रसारित केले जाणारे फसवणुकीचे संदेश व कॉल्स, घोटाळ्याच्या लिंक्स, घातक एपीके डाउनलोड्स आणि तोतयागिरीच्या प्रयत्नांपासून सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे. अलीकडच्या काळामध्ये, अशा अनेक घटनांची नोंद करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना […]

सामना 26 Feb 2026 9:33 pm

Ratnagiri News –धुपप्रतिबंधक बंधारा समुद्रात नाही तर आमचा सातबारा असलेल्या जमिनीवर बांधला, मिऱ्या ग्रामस्थांचा खळबळजनक आरोप

मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधारा चक्क ग्रामस्थांच्या जमिनीवर बांधला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पतन विभागात आज आयोजित केलेल्या बैठकीत आमच्या जमिनीवर,ज्याचा सातबारा आमच्या जमिनीवर आहे त्या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारा कसा बांधला गेला असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. गेली अनेक वर्ष मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रखडले असून ते वादग्रस्त ठरत आहे.आज यासंदर्भात पतन विभागाच्या कार्यालयात एक बैठक […]

सामना 26 Feb 2026 9:10 pm

काहीही झाले तरी दोषींना मात्र सोडणार नाही, पूर्ण ताकदीनिशी हा लढा लढू –रोहित पवार

अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी राजकीय घडामोडींना वेग आला असून आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणातील सर्व माहिती आणि उपलब्ध पुरावे आज सीआयडीकडे सुपूर्द केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सामाजिक माध्यमावर पोस्ट करत याबाबत भूमिका स्पष्ट केली. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्वर्गीय दादांच्या अपघाताशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक […]

सामना 26 Feb 2026 8:14 pm

Photo –गीता-गोविंदम! रश्मिका-विजयच्या लग्न सोहळ्याची क्षणचित्रे

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडपे रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी अखेर त्यांच्या लग्नाची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. रश्मिकाने इंस्टाग्रामवर विजयसोबतचे काही गोंडस आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत आणि त्याला “पती” म्हटले आहे. या फोटोंसोबत, तिने चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे.

सामना 26 Feb 2026 7:59 pm

लग्नानंतर रश्मिकाने विजयसाठी लिहीली एक खास भावपूर्ण पोस्ट..

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडपे रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी अखेर त्यांच्या लग्नाची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. रश्मिकाने इंस्टाग्रामवर विजयसोबतचे काही गोंडस आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत आणि त्याला “पती” म्हटले आहे. या फोटोंसोबत, तिने चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. रश्मिका आणि विजय यांनी चाहत्यांना एकमेकांना पती-पत्नी […]

सामना 26 Feb 2026 7:39 pm

कंत्राटदारांच्या फायद्यासाठी पालिकेच्या ठेवी मोडल्या, आदित्य ठाकरे यांची टीका

महाराष्ट्राला जागतिक पातळीवर पुढे नेण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. तसेचकंत्राटदारांच्या फायद्यासाठी पालिकेच्या ठेवी मोडल्या अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. आज विधीमंडळ परिसरात आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले की,निवडणुकांनंतर राज्यात सकारात्मक आणि […]

सामना 26 Feb 2026 7:32 pm

‘हेरा फेरी 3’चित्रपट अडकला कायद्याच्या कचाट्यात, दिग्दर्शक प्रियदर्शन म्हणाले…

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या आगामी ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. परंतु आता मात्र या चित्रपटातील राजू, श्याम आणि बाबुराव या तिघांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षकांना मात्र वाट पाहावी लागणार आहे. ‘हेरा फेरी ३’ चे शूटिंग या वर्षी सुरू होणार नाही. परिणामी, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि […]

सामना 26 Feb 2026 6:59 pm

Ratnagiri News –हाय अल्टीट्युड बलुनचे भाट्ये किनारी लाँचींग; हवामानाच्या दृष्टीने फोटोग्राफी होणार

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमधील 50 विद्यार्थी नासा व इस्त्रो येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जाऊन आले. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळावा, या उद्देशाने अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत आज भाट्ये किनारी हाय अल्टीट्युड बलून प्रक्षेपित करण्यात आला. अशा उपक्रमांमधून ज्ञान घेऊन, विद्यार्थी-विद्यार्थिनींमधून […]

सामना 26 Feb 2026 6:47 pm

एपस्टिन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ बोर्गे ब्रेंडे यांनी गुरुवारी राजीनामा दिला. अमेरिकन लैंगिक शोषण गुन्हेगार जेफ्री एपस्टिनशी संबंधित फाइल्समध्ये त्यांचे नाव आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. एपस्टिनच्या फाइल्समुळे जगभरातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. ब्रेंडे २०१७ मध्ये WEF चे सीईओ बनले. त्यांच्यावर एपस्टाईनसोबत तीन बिझनेस डिनरमध्ये सहभागी झाल्याचा आणि ईमेल आणि मेसेजद्वारे त्यांच्याशी संवाद […]

सामना 26 Feb 2026 6:29 pm

SA Vs WI –दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ सुसाट! झिम्बाब्वेला लोळवणाऱ्या वेस्ट इंडिजचा सुपडा साफ, सेमीमध्ये एन्ट्री

टीम इंडियाला पराभवाची धुळ चारल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा सुपडा साफ केला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय साजरा करणाऱ्या वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी पराभव करत सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि सेमी फायनलमध्ये एन्ट्री मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळळ्या गेलेल्या या सामन्यात प्रथम दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकल्या. 83 […]

सामना 26 Feb 2026 6:27 pm

Latur Crime News –अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेलं; आरोपी एका तासांत पोलिसांच्या ताब्यात

लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न तिघांनी केला. त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी आपल्या तत्परतेने उधळून लावला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासांत साफळा रचून पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाचा जीव भांड्यात पडला असून पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी […]

सामना 26 Feb 2026 6:04 pm

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दणका, मणिपूर हिंसाचार चौकशी समितीला मोबदला न दिल्याने प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे आदेश

मणिपूरमध्ये २०२३ मध्ये झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनास आली आहे. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला माहिती देण्यात आली की, मणिपूर हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आणि मदत कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीला २०२३ पासून कोणतेही पैसे मिळालेले नाहीत. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या […]

सामना 26 Feb 2026 6:01 pm

11 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन 1 मार्च ऐवजी 29 मार्चला होणार

धाराशिव (प्रतिनिधी)- 11 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन 1 मार्च ऐवजी 29 मार्चला पळसप तालुका धाराशिव येथे होणार आहे अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी दिली. मराठवाड्याचे सुपुत्र शिक्षण महर्षी वसंतराव काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी एकदिवशीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन घेण्यात येते. परंतु 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे हे संमेलन 1 मार्च 2026 रोजी घेण्याचे ठरले होते. साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी संयोजन समितीने पूर्ण केलेली होती. परंतु आ.विक्रम काळे यांच्या काकीचे निधन झाल्याने हे साहित्य संमेलन 29 मार्च 2026 रोजी रविवारी घेण्यात येणार आहे. या बदलाची मराठवाड्यातील सर्व साहित्यिक, रसिक तसेच काळे परिवारावर प्रेम करणाऱ्या मराठवाड्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 5:43 pm

भूम तालुक्यातील 20 शाळांतील 125 मुलींना सायकलचे वाटप

भूम (प्रतिनिधी)- दी क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत व सेवा सेवक फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने भूम तालुक्यातील 125 मुलींना सायकलिंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल भट्टी गटशिक्षणाधिकारी भूम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप शाळू अध्यक्ष अलंप्रभु देवस्थान कमिटी, रमेश मस्कर संचालक अलंप्रभु देवस्थान कमिटी, सूर्यकांत साळुंखे विस्ताराधिकारी पंचायत समिती भूम, प्रमुख उपस्थिती विनोद सुरवसे जिल्हा समन्वयक सेवा सहयोग फाउंडेशन तथा श्रीराम केसकर जिल्हा प्रतिनिधी सेवा सहयोग फाउंडेशन हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष तोडकरी यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ तर आभार प्रदर्शन विजय माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप मोरे, अशोक बनसोडे, बालाजी गुंजाळ, बालाजी गिलबिले, फैजान काझी यांचे विशेष सहकार्य लाभले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 5:43 pm

सावंतवाडीत उद्यापासून मालवणी करंडक महोत्सव

पालकमंत्री नितेश राणेंसह मान्यवरांची उपस्थिती सावंतवाडी । प्रतिनिधी ओंकार कलामंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून उद्या सावंतवाडी जगन्नाथराव भोसले उद्यान येथे सायंकाळी ६ वाजता रंगणाऱ्या मालवणी करंडक महोत्सवासाठी पालकमंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना नेते तथा आमदार निलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्या हस्ते [...]

तरुण भारत 26 Feb 2026 5:26 pm

IND Vs ZIM –करो या मरोची लढत! संजू सॅमसन सलामीला उतरणार? संघात दोन बदल होण्याची शक्यता

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये T20 World Cup 2026 मधील सुपर 8 ची महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना सेमी फायनलच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून झिम्बाब्वेचा फडशा पाडण्यासाठी संघ मैदानात उतरेल. परंतू झिम्बाब्वेने बलाढ्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभवाची धूळ चारल्यामुळे त्यांना नमवन टीम इंडियासाठी तितकं सोप नसणार, हे नक्की. त्यामुळे चेन्नईमध्ये चाहत्यांना एक रंगतदार […]

सामना 26 Feb 2026 5:21 pm

DGCA चा हवाई प्रवाशांना दिलासा, ४८ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास एकही रुपया कापला जाणार नाही

डीजीसीएने लाखो हवाई प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. ४८ तासांच्या आत तुमचे विमान तिकीट रद्द केले तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. प्रवाशांच्या हितासाठी अधिक पारदर्शक होण्यासाठी डिझाइन केलेल्या नवीन नियमांनुसार नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ही सुविधा प्रदान करत आहे. प्रवाशांच्या तक्रारी आणि तिकिटांच्या परतफेडीत विलंब झाल्यामुळे डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. […]

सामना 26 Feb 2026 5:20 pm

Kolhapur News |इचलकरंजीच्या विपुल पोद्दार यांची सूक्ष्म शिल्पकला ठरतेय लक्षवेधी;पेन्सिलच्या टोकावर उमटली कलात्मक झेप

२४ वर्षीय विपुल पोद्दार यांची सूक्ष्म शिल्पकला ठरली लक्षवेधी सोलापूर – शहरातील वाहतुकीची कोंडी होतं असून आणि बाजारपेठेत शिरत आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज ‘अॅक्शन मोड’ मध्ये येत लक्ष्मी मार्केट (मंडई) परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावर बसून [...]

तरुण भारत 26 Feb 2026 5:20 pm

Vashi Fraud Case |वाशीतील तरुणांची नोकरीचे आमिष दाखवून ६ जणांची १५ लाखांची फसवणूक

वाशीतील तरुणांची सरकारी नोकरीचा फसवणूक प्रकरण समोर वाशी -सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून व त्यांना विश्वासात घेऊन सहा तरुणांची पंधरा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा वाशी पोलिसांत नोंद झाला आहे. पोलीस यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथील रहिवासी रईसोदिन (नबाब) हमीद काझी, संदीप चंद्रकांत चांदीएकर [...]

तरुण भारत 26 Feb 2026 5:01 pm

महिनाभर दररोज गुळाचा चहा प्यायल्यास आपल्याला कोणते फायदे मिळतील

चहाचा फक्त उल्लेख केला की, चहा प्रेमींचा चेहरा खुलतो. हिंदुस्थानात चहाप्रेमींची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळेच सकाळपासून ते अगदी रात्री झोपायच्या आधीही चहा पिणारे इथे पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का, साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा पिणे केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. गुळात अनेक पोषक घटक असतात. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक […]

सामना 26 Feb 2026 4:56 pm

Solapur News |सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापतींची निवड २० मार्च पूर्वी होणार

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव सोलापूर -जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर निवडून आलेले सदस्य अजूनही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभागृहाबाहेरच आहेत. राज्य शासनाने २० मार्च पूर्वी जि. प. अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांची [...]

तरुण भारत 26 Feb 2026 4:42 pm

Maharashtra Budget Session 2026 –शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा धुळफेक!

विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. हे सरकार सत्तेत येऊन एक वर्षाच्या वर काळ लोटून गेला. पण अद्याप शेतकरी कर्जमाफी झालेली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शेतकरी कर्जमाफीबाबत विधान केलं आहे. कर्जमाफीचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पण ही योग्य वेळ कधी येणार? हा प्रश्न […]

सामना 26 Feb 2026 4:38 pm

Satara District Hospital |सातारा जिल्हा रुग्णालयात व्हीलचेअर सुविधेसाठी रुग्ण नातेवाईकांवर अवलंबून

काही मदतनीस कर्मचारी उपकाराची भाषा वापरत असल्याची तक्रार सातारा -सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मूलभूत सुविधांसाठीही नातेवाईकांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णांना विविध विभागांमध्ये नेण्यासाठी व्हीलचेअरची सोय उपलब्ध असली तरी प्रत्यक्षात ती ढकलण्यासाठी कर्मचारी पुढे येत नसल्याची [...]

तरुण भारत 26 Feb 2026 4:33 pm

उमरगा-लोहारा मतदारसंघातील विविध प्रलंबित मागण्यांकडेही आमदार स्वामी यांनी वेधले सभागृहाचे लक्ष

धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रपुरुषांचा होणारा वारंवार अपमान यावर सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केले. मुंबई येथे विधानसभेत गुरूवारी (दि.26) राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघातील विविध प्रलंबित मागण्यांकडेही सभागृहाचे लक्ष वेधले. 2024-25 च्या हंगामातील अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे, अशी मागणी करत कुंभमेळ्याला सरकार 25000 कोटी रुपये उपलब्ध करू शकते तर शेतकऱ्यांसाठी भरीव निधी का नाही? अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतामधील माती, बंधारे, शेतरस्ते, पूल, जनावरे वाहून गेली. यावर उपाययोजना कधी करणार? असा सवालही त्यांनी केला. बेरोजगारी रोखण्याकरिता सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या? आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील अनेक सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट बँक सहकारी बँका, चिटफंड योजनांमार्फत झालेल्या फसवणुकीबाबत सरकार कारवाई करणार का? अशी फसवणूक होऊ नये म्हणून काय उपाययोजना राबविणार? मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणातील योजना राज्यातला विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखलेली योजना होती काय? त्यांच्या अकरा महिन्याच्या कालावधीनंतर युवा प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर सोडले. युवा प्रशिक्षणार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्याचे अभिवचन सरकारने दिले होते, ते केव्हा पूर्ण करणार? ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे मानधन दहा हजारावरून सतरा हजार करून ते नियमितपणे द्यावे. महिला परिचारिकांना मानधनाचा प्रसुती रजेचा पूर्ण लाभ द्यावा, या मागण्यांकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सप्टेंबर 1993 मध्ये लातूर-धाराशिव जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये अनेक गावे उध्वस्त झाली. त्या गावांचे पुनर्वसन होऊन जवळपास 32 वर्षे पूर्ण झाली. त्या गावांची नव्याने पुनर्बांधणी करावी. त्या गावांचा पुनर्वसन आराखडा मंजूर करून सुविधा द्याव्यात. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे. त्यांची नव्याने पुनर्बांधणी व्हावी. अनेक शाळा चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी बांधलेल्या असून त्या मोडकळीस आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी धोकादायक स्थितीत या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शालांत परीक्षेनंतर राज्य सरकारमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा दोन वेळा घेतली जाते, त्या धर्तीवर केंद्र सरकारच्या वतीने मार्फत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देखील दोन वेळा घेण्याची शिफारस राज्याने केंद्राकडे करावी. 2019-20 मध्ये कोविडमुळे ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष मयत झाला आहे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सरकारच्या वतीने शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत करावे. राज्य सरकारने महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा प्राप्त मंदिरे आणि स्मारकांसाठी भरून निधीची तरतूद केली आहे. त्याच धर्तीवर उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात असलेल्या अनेक हेमाडपंथी महादेव मंदिरे आणि बारवांच्या देखभाल दुरुस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा. स्पर्धेच्या युगात गावामधला विद्यार्थी मानसिकतेने ग्रस्त आहे. यावर डॉ.हेमलता बागला समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा व संरक्षण मानसिक कल्याण धोरण 2025 स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना स्पर्धा तर कधी पालकांच्या अवास्तव अपेक्षा कारणीभूत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचे देखील समुपदेशन करण्यासाठी विशेष धोरण आखण्यात यावे. राज्यातील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 20 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या पत्रकानुसार उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी केवळ पन्नास पसंतीक्रम नोंदविता येतात. ही अट अतिशय जाचक आहे. मात्र पसंतीक्रमांच्या मर्यादेमुळे सर्व जिल्ह्यात या उमेदवारांना संधी उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी उमेदवार कायमस्वरूपी स्पर्धेबाहेर फेकला जाऊ शकतो. याकरता मर्यादित पसंतीक्रमाची अट रद्द करुन अमर्याद पसंतीक्रम देण्याची मुभा असावी, अशी मागणीही त्यांनी विधानसभेत लावून धरली.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:33 pm

शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष हीच यशाची गुरुकिल्ली- अमोल जगदाळे

भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलने आठवी वर्गाच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत संपादन केले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत 15 विद्यार्थ्यां उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केला होता. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला महापुरुषांच्या चरित्राचे पुस्तक भेट देण्यात आले. पालकांच्या सहमतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षा पालक आयशा शेख तर प्रमुख अतिथी म्हणून पालक अमोल जगदाळे यांची निवड करण्यात आली होती. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये गुणानुक्रमे प्रथम चंदन अमोल जगदाळे. द्वितीय अदिती अर्जुन मदने, तृतीय निरंजन महादेव माळी व अदिती अंगद गुंजाळ, वैष्णवी विनोद शेळके, साठे प्राजक्ता नितीन, कुणाल वैभव सानप, कल्याणी सुनील मोरे, आदर्श बाजीराव खबुत्रे, युवराज त्रिंबक कांबळे, कुणाल नामदेव कांबळे, नगीना रहीम सय्यद ,आदित्य शिवाजी चोरमले, इबादुर रहेमान सरफराज शेख, स्वराज शिवाजी गुंजाळ, साबळे प्रगती रेवण यांनी यश संपादन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक तसेच शाळेतील मुख्याध्यापक तात्या कांबळे, काकासाहेब पवार, दयानंद पाटील, उत्रेश्वर पायघन, अविनाश जोशी, राजेंद्र गाडे , दत्तात्रय गुंजाळ, प्रतिभा मुकटे, सुनील जाधवर, नितीन पवार, कैलास शिंदे, हरीश साठे, सागर आकोस्कर अनंता झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले. तर आभार अविनाश जोशी यांनी मानले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:33 pm

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई (प्रतिनिधी)- राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‌‘लालपरी‌’च्या सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला. हा केवळ आर्थिक दिलासा नसून, तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे 65 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणे अशक्य झाले आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत 210 कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी 100 कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचेही यावेळी मंत्री सरनाईक यांनी सांगितिले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:32 pm

प्रिन्स फायर वर्क्स तेरखेडा येथे आपत्ती व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण संपन्न

वाशी (प्रतिनिधी)- बुधवारी(दि.25) रोजी मौ. तेरखेडा येथील प्रिन्स फायर वर्क्स या कारखान्याच्या परिसरात NDRF team Pune व SDRF team धुळे यांच्यडूनअनेक वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती चे व्यवस्थापन कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष तहसीलदार प्रकाश म्हेत्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून NDRF टीम पुणे चे प्रमुख कमांडर राहुलकुमार रघुवंश व SDRF टीम धुळेचे प्रमुख PSI शंकर उकंडे व येरमाळा पोलीस स्टेशनचे झख भालेराव हे होते. यामध्ये अगदी रक्तप्रवाह कसा रोखून ठेवायचा इथपासून ते जखमी पेशंट ला कसे पकडायचे आणि आहे त्या परिस्थिती मध्ये स्टेचर कसे तयार करायचे हेही प्रात्यक्षिक द्वारे दाखवण्यात आले.. तसेच गॅस आग विझवणे, अटॅक आल्यावर CPR कसा दयावा याचेही प्रशिक्षण देण्यात आहे.तसेच स्वतः ला भाजल्यावर स्वतः जमिनीवर झोपून कशा प्रकारे आग विझवण्याचा प्रयत्न करायचा हेही प्रात्यक्षिक दाखवले. या प्रशिक्षणास कारखाना संघटनेचे अध्यक्ष फरीद पठाण सर यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. तसेच संपूर्ण NDRF टीम व SDRF टीम यांनीही खूप सोप्या व उत्कृष्ट पद्धतीने प्रशिक्षण दिले.यावेळी तेरखेडा व आजूबाजूच्या परिसरातील अंदाजे 200 ते 250 कारखानदार व मजूर कामगार उपस्थित होते.तसेच हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडण्यासाठी तेरखेडा मंडळातील ग्राम महसूल अधिकारी पालके,गायकवाड, सावंत,मस्के, सुप्रिया भोसले आणि अनुराधा देशमुख आणि मंडळाधिकारी तेरखेडा ढवारे तसेच महसूल सेवक खोत, आलम सय्यद व बळवंत यांनी महत्वाचे कार्य पार पाडले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:31 pm

दाऊतपुर येथे जल जीवन मिशन योजनेचे लोकार्पण : ग्रामस्थांच्या सहभागातूनपाणी व्यवस्थापनाचा नवा आदर्श

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील मौजे दाऊदपूर येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत “जल अर्पण” दिवस मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम भालके,धाराशिवचे गट विकास अधिकारी कांबळे,कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) जि.प. धाराशिव, सुनील काटकर, कार्यकारी अभियंता (म.जि.प.) हेमंत नागदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व उपअभियंते तसेच कनिष्ठ अभियंते, जिल्ह्यातील सर्व शाखांचे अभियंते व टाटा अभियंते तसेच दास्तपूर गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामविकास अधिकारी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात योजनेच्या पायाभूत विहिरीजवळ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन करून करण्यात आली. त्यानंतर जि.प.प्रशालेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींसह मुख्य रस्त्यावरून अभंगाचे गीत गात प्रभातफेरी काढण्यात आली.पुढे ही फेरी जि.प.आरोग्य केंद्राच्या प्रांगणात पोहोचली व कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. योजनेची प्रस्तावना व उद्दिष्टे कनिष्ठ अभियंता श्रीमती.अश्विनी साळवे यांनी स्पष्ट केली.या योजनेअंतर्गत 8 मीटर व्यासाची पायाभूत विहीर,आयव्ही विहीर,पंपिंग मशिनरी,क्लोरीन यंत्रणा, 795 मीटर उर्ध्ववाहिनी नलिका,3130 मीटर वितरण नलिका,125 घरगुती नळजोडण्या तसेच योजनेची माहिती दर्शविणारा नामफलक उभारण्यात आला आहे.योजनेची सर्व उपांगे पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेऊन योजना कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.तसेच गावातील पाणी व स्वच्छता समितीतील 5 महिलांना पाणी गुणवत्ता तपासणीबाबत किटचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. कटकधोंड (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा) यांनी योजनेबाबत मार्गदर्शन करताना योजना हस्तांतरणानंतर तिची देखभाल ही सर्व ग्रामस्थांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. पाण्याचा योग्य वापर करून संसाधन जपण्याचे आवाहन त्यांनी केले.गट विकास अधिकारी यांनीही योजना पूर्ण झाल्यामुळे गावकऱ्यांची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली असून पाण्याचा जपून वापर करावा,असे मार्गदर्शन केले. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संपूर्ण ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच उपअभियंता श्री.स्वप्नील सुंदे आणि संबंधित कनिष्ठ अभियंता यांचे योजना गुणवत्तापूर्ण पूर्ण केल्याबद्दल आभार मानले.कार्यक्रमाच्या शेवटी गावच्या सरपंचांनी योजनेची माहिती देत भविष्यात योजनेची योग्य देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल,असे आश्वासन दिले.योजना हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे जाहीर करून उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:31 pm

आफुच्या झाडाची लागवड करणाऱ्यावर गुन्हा दाखल

धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील वाघोली येथे आफुच्या झाडाची लागवड केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण 12 लाख 77 हजार 625 रूपये किंमतीचा माल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक मोरे पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वाघोली शिवारातील शेत गट नं 149/1 मध्ये इसम नामे अजित जोतीराम सुरवसे, वय 36 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव यानी त्याचे शेतात आफुच्या झाडाची लागवड केलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन बातमीच्या ठिकाणी हजर रहा असे सांगीतले. स्टाफ सह सदर ठिकाणी जाउन नमूद इसमास अफुच्या झाडाची लागवडी बाबत चौकशी केली असता त्यांने सदर शेतात आफुच्या झाडाची लागवड केल्याचे सागिंतले. सदर शेतातील 85 किलो 175 ग्रॅम वजनाचा अफु एकुण 12 लाख 77 हजार 625 रूपये किंमतीचा माल मिळून आल्याने सदर माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन जप्त करुन ताब्यात घेउन आफुची लागवड करणारे अजित सुरवसे यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हाके, पोलीस हावलदार भिमराव ढगे, पोलीस अमंलदार आरसेवाड, चालक पोलीस अमंलदार बनाळे, महिला पोलीस अंमलदार जाधव यांचे पथकाने केली आहे.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:30 pm

महालंगी येथे ‌‘जल जीवन मिशन‌’ अंतर्गत पूर्ण झालेल्या योजनेचा जल अर्पण दिवस उत्साहात साजरा

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील मौजे महाळंगी येथे ‌‘जल जीवन मिशन‌’ अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेनिमित्त जल अर्पण दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.तुकाराम भालके,गट विकास अधिकारी श्री.कांबळे,कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) श्री.सुनील कटकधोंड ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व वाप्कोस उपअभियंते व शाखा अभियंते,जिल्ह्यातील सर्व संबंधित अभियंते,तसेच महालंगी गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांच्या हस्ते कलश पूजनाने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या सहभागातून गावातील मुख्य रस्त्यावर प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी ‌‘जल जीवन मिशन‌’चे महत्त्व,“हर घर नल से जल” या घोषवाक्याचा प्रसार करण्यात आला. शाळेच्या प्रांगणातील कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून योजनेची माहिती सादर करण्यात आली.कनिष्ठ अभियंता श्रीमती श्रीमती.पवार यांनी योजनेचे उद्दिष्ट व कामांचा आढावा मांडला.योजनेअंतर्गत 8 मीटर व्यासाची पाझर विहीर,विंधन विहीर,पंपिंग यंत्रणा, 2742 मीटर उचल नळिका,35 हजार लिटर क्षमतेची उंच जलकुंभ टाकी,2568 मीटर वितरण नलिका व 92 घरगुती नळजोडण्या पूर्ण करण्यात आल्या.तसेच योजनेची माहिती दर्शविणारे नामफलक व सर्व उपांगांची कामे पूर्ण करून चाचणी घेतल्यानंतर योजना कार्यान्वित करण्यात आली.गावातील पाणी व स्वच्छता समितीतील पाच महिलांना पाणी गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी एफटीके किटचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांनी योजनेचे हस्तांतरण ग्रामस्थांकडे करताना, योजनेची देखभाल ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.सन 2053 सालापर्यंतचा लोकसंख्येचा विचार करून योजना राबविण्यात आली असून पाण्याची शाश्वतता टिकवण्यासाठी जलसंवर्धनावर भर देण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.तसेच गट विकास अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल संबंधित अधिकारी व ग्रामस्थांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी सरपंचांनी योजनेची योग्य देखभाल व दुरुस्तीचे आश्वासन देत उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:30 pm

पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी

भुम (प्रतिनिधी)- दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दांपत्याच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे वाहनावरील पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरी फाटा येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाशी येथील रहिवासी समाधान भगवान पुणेकर वय 45 वर्षे हे त्यांची पत्नी मनीषा समाधान पुणेकर यांचे सह त्यांची दुचाकी क्रमांक एम एच 25 जे 6651 वरून धाराशिव येथून वाशी येथे येत असताना रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरी फाटा येथून वाशीकडे वळत असताना समोरून वाहने येत असल्यामुळे ते रोडच्या बाजूला थांबले होते. याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील मनीषा समाधान पुणेकर वय 40 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाता वेळी मालवाहू ट्रकने मनीषा पुणेकर यांना जवळपास 50 फूट अंतरापर्यंत फरपटत नेले. तर यावेळी समाधान पुणेकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. उपचारासाठी त्यांना वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचेंवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:29 pm

राज्यस्तरीय मूल्यांकन समितीची भाटशिरपुरा प्राथमिक शाळेला भेट

कळंब (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री ‌‘माझी शाळा सुंदर शाळा‌’ अभियानांतर्गत लातूर शिक्षण विभागातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा येथे राज्यस्तरीय मूल्यांकन समितीने भेट देऊन सखोल पाहणी केली. निकषानुसार शाळेच्या सर्व बाबींचे परीक्षण करण्यात आले. राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रमुख तथा मूल्यांकन समितीचे प्रमुख शरद गोसावी (प्राथमिक शिक्षण संचालक, पुणे) यांच्या नेतृत्वाखाली समितीने शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची क्षमताधिष्ठित प्रगती यांचा आढावा घेतला. समितीत विभागीय उपसंचालक डॉ. गणपत मोरे (पुणे), जिल्हा परिषद अकोला येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंह पवार, सदस्य सचिव (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला) वरिष्ठ अधिव्याख्याता अंकुश ससाने तसेच नगरपरिषद वाशिमचे प्रशासन अधिकारी नंदकिशोर मिटकरी यांचा समावेश होता. यावेळी धाराशिवचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळामाते, शिक्षण विस्तार अधिकारी किशोरी जोशी, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते. समितीने प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली. शाळेतील अद्ययावत सुविधा, स्वच्छ व सुबक परिसर, शैक्षणिक साहित्य, डिजिटल साधने आणि उपक्रमशील वातावरण पाहून समितीने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख शरद गोसावी म्हणाले, “भाटशिरपुरा शाळा गेल्या तीन वर्षांपासून विभागात प्रथम क्रमांक मिळवत आहे. ”शाळेच्या गुणवत्तावृद्धीसाठी श्रीकांत तांबारे, सचिन तामाने, अमोल बाभळे, नागेंद्र होसाळे, कालींदा मुंडे, लिंबराज सुरवसे, राजभाऊ शिंदे, श्रीमती राजकन्या तोडकर, परमेश्वर वाघमोडे, गणपत तपिसे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. इयत्ता सातवीतील समृद्धी गायकवाड व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा गोविंदपुर केंद्रप्रमुख बाळकृष्ण तांबारे यांनी केले. सूत्रसंचालन आनम शेख, संध्या जाधव व प्रणाली खाते यांनी केले. तर आभार समृद्धी गायकवाड हिने मानले. शेवटी सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:29 pm

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करा- डॉ.प्रतापसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीच्या टप्प्यात असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा तसेच कांदा व विविध फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतात काढून वाळत टाकलेला हरभरा पाण्यात भिजला आहे. त्यामुळे दाण्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता निर्माण झाली असून बाजारभावावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. ज्वारीच्या कणसात पाणी शिरल्याने ती काळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर गव्हाच्या उभ्या पिकालाही फटका बसला आहे. कांद्याच्या काढणीदरम्यान शेतात पाणी साचल्याने उत्पादनाचे नुकसान झाले आहे. सध्या जिल्ह्यात रबी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिके जोपासली होती. मात्र अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तलाठी व कृषी विभागामार्फत पंचनामे करावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित व योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत जाहीर करून आर्थिक आधार द्यावा, अन्यथा शेतकरी मोठ्या अडचणीत सापडेल, असेही त्यांनी नमूद केले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:28 pm

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोट्यावधीची उलाढाल? अनेक जण कर्जबाजारी !

तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा आता खाली बसला असला, तरी या निवडणुकांनी अनेक उमेदवारांच्या आयुष्यात मोठे आर्थिक वादळ निर्माण केल्याचे चित्र आहे. काहींनी विजयाचा गुलाल उडविला, तर काहींना पराभवाची धूळ चाखावी लागली. मात्र दोन्ही बाजूंच्या उमेदवारांपुढे आज एकच समान संकट उभे ठाकले आहे निवडणुकीसाठी घेतलेले कर्ज आणि झालेला प्रचंड खर्च. तालुक्यातील अनेक उमेदवारांनी “आम्ही कमी नाही” हे दाखवण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनविली. प्रचारात पाण्यासारखा पैसा खर्च करत अनेकांनी खासगी सावकार, पतसंस्था, मित्रपरिवाराकडून लाखो ते कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याची चर्चा आहे. राजकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, गेल्या दोन महिन्यांत तुळजापूर तालुक्यातील निवडणुकांमुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असून, यातील मोठा हिस्सा कर्जाच्या माध्यमातून बाजारात उतरल्याचेही मत व्यक्त होत आहे. परिणामी अनेक उमेदवारांना आता “नको रे बाबा त्या निवडणुका!” असे म्हणण्याची वेळ आली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी खर्चाचा महापूर निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांनी कोणतीही कसर सोडली नाही. कार्यकर्त्यांची मोठी फौज, आलिशान वाहनांचा ताफा, सोशल मीडियावरील हायटेक जाहिराती, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले ‌‘विशेष नियोजन‌’ यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. या प्रतिष्ठेच्या लढाईत अनेकांनी आयुष्यभराची पुंजी खर्च केली, तर काहींनी कर्जाचा डोंगर डोक्यावर घेतला आहे. विजयी उमेदवाराकडून काही प्रमाणात खर्च वसूल होण्याची शक्यता असली, तरी पराभूत उमेदवारांसमोर आता कर्ज फेडायचे कसे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाहीसाठी धोक्याची घंटा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची टीका जोर धरू लागली आहे. “निवडणूक म्हणजे सेवा नसून ती गुंतवणूक झाली आहे,” असे जाणकारांचे मत आहे. जर निवडणुका अशाच खर्चिक राहिल्या, तर भविष्यात प्रामाणिक व कष्टाळू कार्यकर्त्याला निवडणूक लढवणे स्वप्नवत ठरेल. परिणामी फक्त श्रीमंत लोकच राजकारणात टिकतील, ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचेही मत व्यक्त होत आहे. याला मोठ्या प्रमाणात मतदारांची भूमिका जबाबदार असल्याचीही चर्चा आहे. बिनविरोध निवडणुकांकडे कल वाढणार? या खर्चिक विळख्यामुळे आगामी काळात अनेक इच्छुक उमेदवार मागे हटण्याची शक्यता आहे. कर्जाच्या भीतीपोटी किंवा आर्थिक ताकद नसल्यामुळे अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध होण्याकडे कल वाढू शकतो. उमेदवार वाटतोय, मतदार घेतोय! पूर्वी उमेदवार मतदारांच्या भेटीला जाताना विकासाची आश्वासने देत असत. मात्र आता मतदारच उमेदवारांकडे “आमचे काय?” अशी विचारणा करू लागले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत रात्रीच्या वेळी पाकिटांचे वाटप हा जणू अनिवार्य सोहळाच बनला आहे. विशेष म्हणजे मतदार केवळ एका पक्षाचे नाहीत, तर घरासमोर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडून पैसे स्वीकारत असल्याचे वास्तव आहे. “जो जास्त देईल त्याला मत देऊ” किंवा “सगळ्यांचे घेऊ आणि मनात असेल त्याला देऊ” अशा दुटप्पी भूमिकेमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या निवडणुकांमध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असण्याची शक्यता आहे. मतदारांना केवळ रोख रक्कमच नव्हे, तर तीर्थयात्रा, पार्टी, भेटवस्तू तसेच घरगुती वापराच्या वस्तूंचेही वाटप झाल्याची माहिती समोर येत आहे.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:28 pm

जिल्हा परिषद शाळेस सीईओ डॉ. मैनाक घोष यांची भेट

तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेस धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भेट देत शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या तसेच शैक्षणिक वातावरणाची पाहणी करून शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. सीईओ डॉ. घोष यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, स्वच्छता, तसेच शाळेची एकूण प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. शाळेच्या गुणवत्तापूर्ण कामकाजाचे कौतुक करत भविष्यातही शाळेने अधिक प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून सदिच्छा दिल्या. या भेटीदरम्यान धाराशिव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी पिकवने, तुळजापूर गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, पंचायत समिती सदस्य संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, काटी केंद्राचे केंद्रप्रमुख हनुमंत कदम, उपसरपंच धर्मराज शिंदे, ग्रामविकास अधिकारी भिमराव झाडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:27 pm

भोसले हायस्कूलमध्ये 108 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील इ.5 वी 6वी 7वी च्या नुकत्याच घेण्यात आलेल्या घटक चाचणी परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या तब्बल 108 विद्यार्थ्यांचा स्कुल बॅग, पॅड, पेन पुष्प प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गोरे, इ.7वी पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, इ.5 वी 6वी पर्यवेक्षक बालाजी गोरे, कलाध्यापक शेषनाथ वाघ, विज्ञान शिक्षक संजय वाघमारे, भारत गवळी यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर त्यांना अध्यापन करणारे शिक्षक, शिक्षिका संगिता शिंदे, एस.डी. गायकवाड, बीरगड, पी.पी. मैत्रे, दिपक केंगार, भरत नाडे, अमोल कस्तुरे आदि शिक्षक, शिक्षिकावृंद यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल संस्थाध्यक्ष सुधीर पाटील , सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील सीईओ आदित्य पाटील, एओ साहेबराव देशमुख यांनी अभिनंदन केले. बक्षीस वितरण समारंभ यशस्वीतेसाठी सहशिक्षक कृष्णा माळी , क्रीडाशिक्षक सुनिल मोहिते सेवक महादेव काळे, प्रशांत जाधव यांनी परिश्रम घेतले तर सुत्रसंचलन संगीतशिक्षक महेश पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:26 pm

धाराशिव कळंबचे लोकप्रिय आमदार कैलास पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

धाराशिव (प्रतिनिधी)- आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्राम दैवत धारासूर मर्दीनी देवी मंदिर येथे महाआरती करण्यात आली. तसेच हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे. दर्गाह याठिकाणी चादर चढवण्यात आली आणि अन्नपूर्णा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान हे उपक्रम करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदिप साळुंके, युवासेना जिल्हाप्रमुख रवि वाघमारे, विधासभाअध्यक्ष शौकत शेख, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक नाना घाडगे, पंकज पाटील, अमित उंबरे, राज निकम, अक्षय जोगदंड, सिध्देश्वर कोळी, युवासेना जिल्हा संघटक राणा बनसोडे, संभाजी सलगर, राम साळुंखे, उपशहर प्रमुख बंडु आदरकर, सुरेश गवळी, विजय ढोणे, वाहतुक सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल वाघ, राजाभाऊ पवार, युवासेना तालुका प्रमुख राकेश सुर्यवंशी, युवासेना शहरप्रमुख अभिराज कदम, अल्पसंख्याक शहर प्रमुख मुजीब काझी, सतीश लोंढे, अजिंक्य राजेनिंबाळकर, अमित लाटे, मनोज पडवळ, बाळासाहेब वरुडकर, शहाजी पवार, पंकज पडवळ, विनोद केजकर, महेंद्र शिंदे, कालिदास शेरकर, बापू काकडे, कैफ तांबोळी, पंकज स्वामी, महेश उपासे, भैरु शेरकर, किशोर पवार, पिंटु आंबेकर, संदिप शिंदे, वैभव उंबरे, प्रविण केसकर, राकेश कचरे, सुनिल गायकवाड, महेश पोतदार, चेतन वाठवडे, सत्यजित पडवळ, संकेत माळाळे, रोहित कदम, सिद्धार्थ माळाळे, साबेर सय्यद, कलीम कुरेशी, बड्डू शेख आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 26 Feb 2026 4:26 pm

अजित पवार यांच्या अपघातातील उर्वरित पुरावेही गोळा करणार, सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती

अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी आज पुण्यात सीआयडीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी तपासाच्या व्याप्तीबाबत सविस्तर माहिती दिली. सदर अकस्मित मृत्यूच्या तपासात तीन प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामानंद म्हणाले, “रॅश आणि निग्लिजंट अ‍ॅक्ट झाला का, हा तपासाचा एक भाग आहे. त्याचबरोबर कोणते गुन्हेगारी कृत्य घडले […]

सामना 26 Feb 2026 4:20 pm

माता न तू वैरिणी, सततच्या रडण्याला कंटाळून दोन महिन्यांच्या बाळाला आईने चुलीत टाकले

हैदराबादमध्ये मातृत्वाला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. बाळाच्या सतत रडण्याने संतापलेल्या मातेने दोन महिन्यांच्या मुलाला चुलीत टाकले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी निर्दयी मातेविरोधात गुन्हा दाखल करत तिला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ रडू नये म्हणून महिलेने त्याच्या तोंडात कापड कोंबले होते आणि डोळ्यांना पट्टी बांधली होती. मुलाचे वडील नाईट […]

सामना 26 Feb 2026 4:20 pm

शैलेश तांबे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाचे आठ तालुकास्तरीय पुरस्कारही जाहीर ओटवणे प्रतिनिधी “मराठी भाषा गौरव दिनाचे” औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने जिल्ह्यातील मराठी अध्यापकांना देण्यात येणारे उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षीचा जिल्हा स्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार केळुस येथील स का पाटील विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक शैलेश शांताराम तांबे यांना जाहीर [...]

तरुण भारत 26 Feb 2026 4:14 pm

मळगाव वाचन मंदिरात उद्या मराठी भाषा गौरव दिन

न्हावेली /वार्ताहर कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव मध्ये शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.हा कार्यक्रम संध्याकाळी ३:३०वाजता आयोजित केला आहे ,या कार्यक्रमात काही वाचक, बालवाचक आपले सादरीकरण करणार आहेत.प्रमुख अतिथी मा. सौ.स्मिता नाईक(माजी मुख्याध्यापिका ,लेखिका)यांच्या उपस्थितीत आणि [...]

तरुण भारत 26 Feb 2026 4:07 pm

मोहन गावडे यांचे निधन

न्हावेली : प्रतिनिधी निरवडे येथील रहिवासी मोहन लक्ष्मण गावडे वय ( ६८ ) यांचे बुधवार २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुलगे ,सूना ,नातवंडे असा परिवार आहे.सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा सातत्याने सक्रिय सहभाग होता.त्यांच्या निधनाने निरवडे गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरुण भारत 26 Feb 2026 3:58 pm

पालीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथचा आजपासून शिमगोत्सव, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी तालुक्यातील पालीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान,पाली – पाथरटचा वार्षिक शिमगोत्सव शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. त्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये केले जाते. यामध्ये पालखी सजविणे, देवाला रूपे लावणे, होळी आणणे, पौर्णिमेचा होम, नवस बोलणे-फेडणे यांसारखे धार्मिक कार्यक्रम आणि नमन आयोजित करण्यात आले आहे. पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानची शिमगोत्सव […]

सामना 26 Feb 2026 3:56 pm

Ratnagiri News –कोकणात काजू बोंडे प्रक्रिया उद्योगाअभावी वाया

रत्नागिरी जिल्ह्यात काजू उद्योग कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलढाल करीत आहे. मात्र काजूवर प्रक्रिया होत असली तरी बोंडे प्रक्रियेअभावी वाया जात आहे. दरवर्षी प्रक्रिया उद्योगाच्या थापा मारल्या जातात. पण प्रक्रिया उद्योगासाठी पुढाकार घेणाऱ्यांना मात्र सहकार्य मिळत नाही.या हंगामात काजू बी ला 150 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे, काजू प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल आहे. […]

सामना 26 Feb 2026 3:54 pm

Sangli News |सांगली जिल्हा परिषद शाळा बिलांवरील लाचलुचपत; कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला

सांगली जिल्ह्यातील शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघड सांगली – जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांच्या बांधकाम व दुरुस्ती बिलांच्या मंजुरीसाठी ८८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग पंचायत समिती जत येथील कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) संजय भगवान सुतार (वय [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:52 pm

Kupwad Crime News |कुपवाडतील दत्तनगर परिसरात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

पूर्वीच्या भांडणाच्या रागातून चौघांनी तिघांवर प्राणघातक हल्ला कुपवाड – पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून बामणोली हद्दीतील दत्तनगर परिसरात मंगळवारी रात्री चौघांनी मिळून तिघांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:47 pm

धक्कादायक! शाळेच्या मैदानात खेळताना 9 वर्षीय विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अलिकडच्या काळात लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढताना दिसत असून, राजस्थानमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील गोटन गावातील कस्बे येथे एका खासगी शाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा खेळताना अचानक मृत्यू झाला. दिव्या राजेंद्र असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या […]

सामना 26 Feb 2026 3:41 pm

सौदी अरेबियाने 40 देशांतील चिकन अंड्यांवर का घातली बंदी, नेमकं काय घडलं?

सौदी अरेबियाने हिंदुस्थानसह 40 देशांमधून चिकन आणि अंडी यासह पोल्ट्री उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली. सौदी फूड अँड ड्रग अथॉरिटी (SFDA) ने याबाबत एक आदेश जारी केला आहे. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी आणि देशाच्या बाजारपेठेत अन्न सुरक्षा मानके मजबूत करण्यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे कळते. अहवालानुसार, जागतिक आरोग्य परिस्थितीनुसार ही यादी वेळोवेळी बदलली जाऊ शकते, […]

सामना 26 Feb 2026 3:40 pm

Satara News |सातारा नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक

स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि हरित उपक्रमामुळे साताऱ्याची वेगळी ओळख सातारा – पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सातारा नगरपालिकेने राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात पुणे विभागातून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल पालिकेला तब्बल ६ कोटी [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:35 pm

चुकीला माफी नाही…. दोषींची नावे सांगा, आम्ही कारवाई करतो! सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारवर कडाडले

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एनसीईआरटीच्या आठवीच्या पुस्तकाच्या पुढील प्रकाशनावर तसेच छपाई किंवा डिजिटल प्रसार करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आणि केंद्र सरकारला मोठा झटका दिला. आठवीच्या पुस्तकात ‘न्यायपालिकेतील भ्रष्टाचार’ या विषयावरील प्रकरण समाविष्ट केले आहे. त्यावरून मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. सरन्यायाधीश सुर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर […]

सामना 26 Feb 2026 3:22 pm

Satara News : सातारा जिल्हा परिषद आवारातील कारंज्यातून पाण्याचा अपव्यय; योग्य नियोजनाची मागणी

‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ मोहिमेतच पाण्याचा अपव्यय उघड सातारा– ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचे सावट गडद होत असताना सातारा जिल्हा परिषदेच्या आवारातील कारंज्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याची बाब समोर आली आहे. कारंज्यातील पाणी सतत वाहून जात असल्याने पाणी संवर्धनाबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:16 pm

Satara Crime News |सातारा मेढा रस्त्यावर गॅरेज मालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; एकास अटक

सातारा-मेढा रस्त्यावर करंजे नाक्यावर तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला सातारा– सातारा-मेढा रस्त्यावर करंजे नाका येथे बुधवारी सायंकाळी एका तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षय रामदास गाडे (रा. सातारा) याच्यावर अज्ञात कारणावरून कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही [...]

तरुण भारत 26 Feb 2026 3:09 pm

केरळ उच्च न्यायालयाकडून ‘द केरळ स्टोरी २’च्या प्रदर्शनाला स्थगिती

केरळ स्टोरी २ चा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु केरळ उच्च न्यायालयाने त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. केरळ उच्च न्यायालयाने वादग्रस्त चित्रपट ‘केरळ स्टोरी २’ च्या प्रदर्शनावर १५ दिवसांची अंतरिम स्थगिती जारी केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राला आव्हान देणारी […]

सामना 26 Feb 2026 3:08 pm

व्हीएसआर कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, रोहित पवार यांची मागणी

दोन दिवसांपूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या अहवालाचा आधार घेत आम्ही एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 रोजी पदाधिकारी आणि समर्थकांसह ते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, काहींनी “मुंबईत एफआयआर दाखल करता येणार नाही” अशी हरकत घेतल्याने तक्रार स्वीकारली […]

सामना 26 Feb 2026 3:07 pm

हर्षद मेहताला आदर्श मानत आयडीएफसी फर्स्ट बँकेत झाला ५९० कोटी रुपयांचा घोटाळा, चार आरोपींना अटक

चंदिगड येथील आयडीएफसी फर्स्ट बँकेतील घोटाळ्याप्रकरणी आता संबंधितांना अटक करण्यात आली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेतील सरकारी खात्यांमध्ये ५९० कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार आरोपींना अटक केली. सरकारी खात्यांशी संबंधित ५९० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, ऋषभ ऋषी, अभय, स्वाती आणि अभिषेक यांना अटक केली आहे. हे सर्व पैसे सरकारी खात्यात परत […]

सामना 26 Feb 2026 2:53 pm

Bombay High Court Nagpur Bench |आता निवडणुका नाहीत, सरपंचच प्रशासक; मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठचा निर्णय;

विद्यमान सरपंचांकडे प्रशासकीय सूत्रे ( विजय जाधव – गोडोली ) नागपूर –महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तात्काळ न घेता प्रशासक नियुक्ती करण्यास मान्यता देणारा महत्त्वपूर्ण आदेश [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:50 pm

Pratapgad News|आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला; परिसरात खळबळ

प्रतापगड जवळील घाटात संशयास्पद मृत्यू प्रतापगड :आंबेनळी घाट परिसरात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली व चिरेखिंडच्या वरती असलेल्या मुख्य रस्त्यालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मोरीत कोंबून ठेवलेला आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:42 pm

Konkan Mango Season |कोकणमध्ये मोहर गळला; गुढीपाडव्याला आंब्याची टंचाई

कर्नाटकातील आंब्याची आवक सुरू कोल्हापूर -कोकण भागात यावर्षी आंब्याच्या बागांवर चांगला मोहर बहरला होता. मात्र थंडीमुळे गेल्या आठवड्यात मोहर गळून पडला आहे. यामुळे यंदा गुढीपाडव्याला आंब्याची टंचाई भासणार आहे. गुढी पाडवाडी यावेळी दोन आठवडा आधीच आहे. त्यातच मोहरसुध्दा गळून पडला आहे. [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:31 pm

महापौरांच्या हातात 1 कोटीचं घड्याळ? व्हायरल फोटोने चर्चेला उधाण

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत रितू तावडे यांच्या हातातल्या घडाळ्यावर फोकस करण्यात आले आहे. त्या घडाळ्याची किंमत तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. रितू तावडे यांच्या हातातील घड्याळ हे रोलेक्स कंपनीचे आहे. यल्लो गोल्ड रोलेक्स डेटोन लाईट डायल असे त्या घडाळ्याचे नाव […]

सामना 26 Feb 2026 2:26 pm

​Ajra Taluka |आजरा हे ‘कोकणाचे प्रवेशद्वार’राहणार का? रस्ता रुंदीकरणात १३ वटवृक्षांचे अस्तित्व धोक्यात; वृक्षप्रेमींचा लढा तीव्र

आजरा तालुक्यात रस्ता रुंदीकरणामुळे १३ पुरातन वटवृक्ष धोक्यात आजरा – निसर्गसंपन्न आजरा तालुक्याची ओळख ‘कोकणाचे प्रवेशद्वार’ अशी आहे, मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ही ओळखच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. हलकर्णी, वाटंगी, चितळे धनगरवाडा या रस्ता रुंदीकरणाच्या कामात वाटंगी फाटा ते महागाव दरम्यान असलेले १३ [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:25 pm

Gokul Milk Union Election |‘गोकुळ’निवडणुकीची प्रक्रिया सुरू

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीची अधिकृत घोषणा कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या आगामी निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाली आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगात आणल्या आहेत. ८ मे २०२६ पर्यंत सभासद म्हणून पात्र असलेल्या [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:17 pm

Kolhapur News |कोल्हापूर येथे संरक्षित ‘पाकड’ माशाची विक्री ; वन विभागाची धडक कारवाई

फुलेवाडीतील फ्रेंडशिप फिश कंपनीवर छापा; दुर्मीळ मासा जप्त कोल्हापूर -करवीर वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, वनक्षेत्रपाल, करवीर यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने कोल्हापूर-फुलेवाडी रिंग रोडवरील ‘फ्रेंडशिप फिश कंपनी” येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान, या ठिकाणी डा संरक्षित मासा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. या [...]

तरुण भारत 26 Feb 2026 2:01 pm