इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. याची झळ हिंदुस्थानलाही बसत असून तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणि वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी तोबा गर्दी उसळली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जालना जिल्ह्यातही हिच […]
ग्वाल्हेरच्या विद्यार्थ्याचा स्कॉटलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. संस्कार श्रीवास्तव असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो स्कॉटलंडच्या सेव्हरन्स विद्यापीठात फॉरेन्सिक सायन्समध्ये एमएससीचे शिक्षण घेत होता. 18 दिवस उलटले तरी संस्कारचे आई-वडील आपल्या मुलाच्या मृतदेहाच्या प्रतिक्षेत आहेत. ग्वाल्हेरच्या बहोदापूर परिसरात राहणाऱ्या कुलदीप यांनी आपला मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी बँकेकडून 39 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. संस्कार […]
वेदनादायी जगणे नकोसे, मुंबईत 85 जणांचा इच्छामरणासाठी अर्ज
मरणासन्न जगण्यातून सुटका मिळवलेल्या गाझियाबादच्या हरीश राणानंतर देशभरात इच्छामरणाच्या प्रक्रियेला नवी दिशा मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकालाद्वारे इच्छामरणाचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे इच्छामरणासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतही अनेकजण इच्छामरण पत्करण्यास तयार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आतापर्यंत शहरातील 85 नागरिकांनी इच्छामरणासाठी अर्ज केला आहे. यावरून गंभीर आजार किंवा अपघात झाल्यास लोकांना […]
Iran US Israel War –इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळला, युद्ध थांबवण्यासाठी ठेवल्या 5 अटी
इराणने युद्ध संपवण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आम्ही अमेरिकेच्या नाही तर स्वत:च्या अटींवर हे युद्ध थांबवू असे इराणने म्हटले आहे. 28 फेब्रुवारीपासून मध्यपूर्वेत सुरू असलेले हे युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर पाच अटी ठेवल्या आहेत. यात होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणच्या सार्वभौमत्वाला मान्यता देण्याचाही समावेश आहे. त्यामुळे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या अटींवर काय भूमिका घेतात […]
रत्नागिरी नगरपरिषदेत गोलमाल है भाई गोलमाल है! अॅडव्हान्स केलेली आता पुन्हा मंजुरीसाठी
रत्नागिरी नगरपरिषदेने अॅडव्हान्स केलेली कामे आता अडचणीत सापडली हेत. अॅडव्हान्स केलेल्या कामांना मंजुरी दिल्यानंतर आपण अडचणीत येऊ नये म्हणून दुसऱ्या सभेत स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा 30 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तीच अॅडव्हान्स कामे मंजुरीसाठी विषयपत्रिकेवर घेतली आहेत. ही गंभीर बाब माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून कलम 308 अन्वये […]
इराणचा इराकवर भीषण हवाई हल्ला; ७ सैनिकांचा मृत्यू, १३ जखमी
आखाती देशांमधील तणाव वाढत असतानाच इराणने बुधवारी पश्चिम इराकच्या अनबार प्रांतात मोठा हवाई हल्ला केला. या भीषण हल्ल्यात इराकचे ७ सैनिक जागीच ठार झाले असून, अन्य १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. इराणने अनबार प्रांतातील एका लष्करी वैद्यकीय केंद्र आणि जवळच असलेल्या इंजिनिअरिंग युनिटला […]
Ratnagiri News –बिनविरोध निवडून आलेले सभापती ‘घामाघूम’
रत्नागिरी जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक आज पार पडली. निवडीनंतर दालनात जाताच सभापती घामाघूम झाले. शिक्षण सभापती, कृषी सभापतींच्या दालनातील वातानुकूलित यंत्रणा बंद होती. आज सभापती निवड होणार हे माहित असतानाही जिल्हापरिषद प्रशासनाने देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याचे निदर्शनास आले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. निवडून आल्यानंतर सर्व सभापती […]
वर्ल्डकप संपल्यानंतर क्रीडाप्रेमींनी इंडियन प्रीमियर लीगचे वेध लागले. जगभरातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देणारी ही लीग 28 मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाची विक्रमी डील झाली आहे. राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीचा तब्बल 1.63 अब्ज डॉलर (सुमारे 15,290 कोटी रुपये) इतक्या विक्रमी किमतीत करार झाला आहे. अमेरिकन उद्योजक काल सोमानी यांच्या […]
माझ्या भावाला फोन करण्याची हिंमत कशी झाली? सरन्यायधीश संतापले, नेमकं काय घडलं?
वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशासंदर्भात भावाला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या याचिकाकर्त्यावर सरन्यायाधीश सुर्य कांत चांगलेच संतापले. माझ्या भावाला फोन करण्याची हिम्मत कशी झाली? माझ्याशी अशा प्रकारे वागण्याची हिंमत पुन्हा करू नका, अशा कडक शब्दांत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला खडेबोल सुनावले. मूळचे सामान्य प्रवर्गातील असलेल्या हरियाणातील दोन उमेदवारांनी उत्तर प्रदेशातील सुभारती मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय […]
तेलंगणात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट, अनेक कामगार जखमी
तेलंगणातील पारिगी मंडळातील लक्ष्मीदेवीपल्ली येथील स्टील फॅक्टरीत बुधवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक कामगार जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. स्फोटानंतर परिसरात आगीच्या ज्वाला उसळल्या आणि संपूर्ण परिसरात दाट काळा धूर पसरला. स्फोट इतका शक्तिशाली होता की आसपासच्या गावांमध्येही आवाज ऐकू आला. प्राथमिक अहवालानुसार, या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत. मात्र […]
प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना अजित दादा यांच्या पक्षाचा संपूर्णपणे ताबा घ्यायचा होता, असा आरोप करत रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. या आरोपांना सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. पक्षावर पकड कुणाची यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता अजित पवार गटाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक […]
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या चौकशीवरून सध्या राजकारण तापले आहे. या प्रकरणात कर्नाटक सरकारने झिरो एफआयआर (Zero FIR) दाखल केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपली भूमिका मांडली. “अजितदादांच्या अपघातामागे जर काही घातपात असेल, तर आम्ही आकाश पाताळ एक करू आणि यात कुणाचाही बाप असेल तरी त्याला शोधून काढू,” असे ते म्हणाले. […]
बीड-राज्यभरातील डाक कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीने आज बुधवारी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची झोप उडवली. बीड येथील बशीरगंज-राजुरीवेस येथील मुख्य पोस्ट कार्यालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने पोस्ट ऑफिस रिकामे करून बॉम्ब शोध व नाशक पथकाचे (बीडीडीएस) पीएसआय आहेर व त्यांच्या सहकार्यांनी तपासणी मोहिम हाती घेतली. […]
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाला 28 मार्चपासून सुरू होत आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात सलामीचा सामना खेळवला जाईल. क्रिकेटच्या या महाकुंभाला सुरुवात होण्यापूर्वी दोन मोठ्या डील झाल्या. पहिल्या हंगामाचा विजेता संघ राजस्थान रॉयल्स आणि गतविजेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विक्रमी किंमतीत विक्री झाली. यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडने आरसीबीची 16,660 कोटी रुपयांना विक्री […]
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास मंडळ म्हणजे टेंडर मॅनेज करणारी यंत्रणा- आमदार कैलास पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ हे फक्त टेंडर मॅनेज करणारी यंत्रणा असल्याचा खळबळजनक दावा आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केला. यातील अधिकारी म्हणजे कलेक्शनची यंत्रणा असल्याचं त्यांच्या कामावरून दिसतं असाही आरोप आमदार पाटील यांनी विधानसभेत बोलताना केला. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 8 हजार अभियंते असताना पुन्हा नव्याने महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास मंडळ स्थापन करण्याच नेमकं कारण काय हे आजवर न उघडलेलं कोड आहे. मनुष्यबळ कमी तर कामे जास्त अशी अवस्था मंडळाची आहे. सध्या मंडळाकडून 37 हजार कोटीची काम सुरू आहेत. हे कमी की काय त्यांनी ऊसतोड मजूर यांच्या वसतिगृह बांधकामाची कामे घेतली आहेत. एवढेच नाही तर काही मेडिकल कॉलेजच्या बांधकामाचीही कामे त्यांनी घेतल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या यंत्रणेकडून ही कामे केली जातात तरीही या मंडळाकडे ही कामे सोपवण्याची आवश्यकता सरकारला का वाटली? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. मुंबई स्थित एक कार्यालय तिथं बोटावर मोजण्याइतके मनुष्यबळ तर प्रत्येक विभागाला एक किंवा दोन कार्यकारी अभियंता अशी तोकडी यंत्रणा असतानाही त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे देण्याचा घाट सरकार का घालत आहे? केलेल्या कामाची पाहणी करणे देखील यंत्रणेला शक्य नाही तरीसुद्धा हे सरकार मंडळावर मेहरबान का आहे अशी विचारणा आमदार कैलास पाटील यांनी केली. यांनी कामाच्या ज्या निविदा काढल्या आहेत त्यामध्ये एकही काम निविदा रक्कम पेक्षा कमी नाही. निविदा प्रक्रियेमध्येच नियम करण्यात आलेला आहे की, जर निविदा कमी दराने आल्यास साडेसात टक्के इतकी बँक गॅरंटी त्या एजन्सी कडून घेतली जाणार आहे. अशी अट सरकारने या कामांसाठी का लावली. शिवाय राष्ट्रीय महामार्गाची जी कामे होतात ती सुद्धा 40 ते 45 टक्क्यापर्यंत निविदा रक्कमेपेक्षा कमी असतात. केंद्र सरकारचे मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा या पद्धतीने रस्त्याची कामे करत असताना आपल्या सरकारला निविदा रक्कमेपेक्षा कमी दराने कामे करता येणार नाहीत का याचे उत्तर सरकारने द्यावे. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली. या ठिकाणी असलेले अधिकारी हे फक्त कलेक्शन अधिकारी असल्यासारखे वाटतात. त्यांची कोणतीही भूमिका कामाप्रती दिसत नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा आहे. त्यामुळे सुशासन म्हणणाऱ्या मुख्यमंत्री यांनी याबाबतीत खुलासा करणे आवश्यक आहे. असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.
शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम अनिवार्य नाही, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गाण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेमार्फत केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान देण्यात आले होते. ही मार्गदर्शक तत्त्वे केवळ सल्ला स्वरूपाची असून ती बंधनकारक नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट करत ही याचिका धुडकावून लावली. सरन्यायाधीश सुर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल […]
इराण विरुद्ध सुरू असलेले युद्ध 5 दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर व इंधन साठ्यांवर 5 दिवस कसलेही हल्ले केले जाणार नाहीत, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले असले तरी इराण काही माघार घ्यायला तयार नाही. अशातच इराणच्या सैन्याने बुधवारी मोठा दावा केला. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ला लक्ष्य […]
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 28 विद्यार्थ्यांना टाटा मोटर्समध्ये नोकरी
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने टाटा मोटर्स कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर परिसर मुलाखतीसाठी 154 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. त्यामध्ये 31 विद्यार्थी मुलाखतीसाठी हजर होते. यापैकी 28 विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड करण्यात आल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ. मारुती लोंढे यांनी दिली. सदर मुलाखतीसाठी टाटा मोटर्स कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सोमेश्वर सोनवणे आणि एच आर एक्झिक्यूटिव्ह प्रकाश हाळवे हे उपस्थित होते. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना कंपनी विषयी माहिती देण्यात आली व त्यानंतर त्यांच्या मुलाखती घेऊन निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी केले, सूत्रसंचालन कवी प्रा. डॉ. अरविंद हंगरेकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. कुणाल वणंजे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रो .डॉ. छाया दापके या होत्या.तर प्रमुख उपस्थितीत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.मंगेश भोसले हे होते. सदर कार्यक्रमासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर निवडीबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी यशस्वी उमेदवारांचे व प्लेसमेंट विभागाचे अभिनंदन केले आहे.
इस्कॉन आयोजित शालेय प्रज्ञाशोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओटवणे प्रतिनिधी आतंरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या सावंतवाडी शाखेच्यावतीने भगवद्गीता आधारित आयोजित करण्यात आलेल्या शालेय प्रज्ञाशोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी १० वी अशा दोन गटात घेतलेल्या या परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातील २२ शाळां मधील एकूण २७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सावंतवाडी [...]
देशात निर्माण झालेल्या एलपीजी आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. “जनतेमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांना कोविड काळ आवडतो की काय?” असा खोचक सवाल करत, केंद्र सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच नागरिक रस्त्यावर उतरल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, […]
परंडा तालुक्यात 150 विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप
भूम (प्रतिनिधी)- दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत तसेच सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. 25 मार्च) रोजी साळुंके मंगल कार्यालय, परंडा येथे तालुक्यातील 36 शाळांतील 150 गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास परंडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सूर्यभानजी हाके, सेवा सहयोग फाउंडेशनचे सोशल मीडिया प्रमुख अनिकेत गमरे, धाराशिव जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परंडा तालुकाध्यक्ष ॲड. अशोक जाधव, सामाजिक कार्यकर्ते विशाल काशिद, तसेच फाउंडेशनचे प्रतिनिधी श्रीराम केसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविकात जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे यांनी सेवा सहयोग फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत, दुरच्या वस्तीवरून शाळेत पायी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींचा सायकलीमुळे वेळ वाचणार आहे. या वेळेचा उपयोग विद्यार्थिनींनी अभ्यासासाठी व आपल्या गुणवत्तावाढीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. गट शिक्षणाधिकारी सूर्यभान हाके यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व शाळांच्या सुविधा सुधारण्यासाठी पुढील उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सायकली मिळाल्याने विद्यार्थिनी व पालकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. गेल्या वर्षीही या संस्थांच्या माध्यमातून परंडा तालुक्यात 150 सायकलींचे वाटप करण्यात आले होते. यंदा भूम तालुक्यात 125, कळंब येथे 125 व परंडा तालुक्यात 150 अशा 400 सायकलींचे वाटप करण्यात आले असून, मुलींच्या शिक्षणाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक शंकर पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाळसाहेब घोगरे यांनी मानले.
Israel Iran War –इराणविरोधातील युद्ध वर्षभर लांबू शकते; मोसादने नेतान्याहूंना दिला होता इशारा
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्ध अधिक तीव्र होत आहे. तसेच अमेरिका आणि इराण यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे संभ्रम अधिक वाढत आहे. इराणचे सध्याचे नेतृत्व नष्ट झाल्यानंतर तेथील राजवट लवकर कोसळेल असे मानले जात होते. मात्र, तसे झाले नाही आणि इराणने अधिक आक्रमक होत इस्रायलसह आखाती देशात विनाशाला सुरूवात केली. त्यातच आता मोसदच्या इशाऱ्याची चर्चा होत आहे. काही वृत्तांनुसार […]
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर, नेमकं प्रकरण काय?
उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य स्वामी कुंदानंद गिरी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला. कथित लैंगिक छळ आणि पोक्सो कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायमूर्ती जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या एकल खंडपीठाने हा निकाल दिला. 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर […]
माढ्यात रक्ताचे नाते विसरले! पाण्याच्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने वार
सामाईक पाईपलाईनच्या वादातून भावाचा भावावर जीवघेणा हल्ला र्टभुणी – माढा तालुक्यातील वेणेगाव येथे पाण्याच्या वादातून सख्ख्या भावाने कोयत्याने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुनील लक्ष्मण जठार (वय ३६, रा. जठार बस्ती, [...]
हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण कोलमडले असून सरकार खासगी धोरणे राबवत आहे –तेजस्वी यादव
“देशाचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे कोलमडले असून, एनडीए सरकार राष्ट्रीय हिताऐवजी केवळ काही खासगी घटकांच्या हितासाठी धोरणे राबवत आहे,” असा घणाघाती आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. पश्चिम आशियातील संकट आणि देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत. तेजस्वी यादव […]
Solapur News |सावळेश्वर टोल नाक्यावर ‘धुमस’! कर्नाटकच्या ट्रक चालकांकडून तोडफोड; महामार्गावर तणाव
सावळेश्वर राड्याने टोल प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर पाटकूल – मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर टोल नाक्यावर कर्नाटक राज्याची नोंदणीकृत असणाऱ्या ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांकडून टोल देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली. यावेळी सावळेश्वर टोल नाका येथे टोल घेण्यावरून कर्नाटक राज्यातील ट्रकचालक आणि टोलकर्मचाऱ्यांमध्ये जोरदार झटापटी झाली. येथे टोल घेताना अज्ञात [...]
लैंगिक शोषण विरोधी कायदा देशभरात लागू होणं गरजेचं, आदित्य ठाकरे यांची मागणी
विधानसभेत शक्ती सुधारणा विधेयकावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या कायदा देशभरात लागू होणं गरजेचं आहे, तसे होणार का असा सवाल केला आहे. लैंगिक शोषण विरोधी कायदा किंवा कारवाई आहे ती निरपेक्ष असली पाहिजे. आणि जसा हा कायदा राज्यासाठी पारित केलेला आहे तसाच हा कायदा देशभरात लागू होणं गरजेचं […]
सध्या PNG जोडणीला प्राधान्य, देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही –पेट्रोलियम मंत्रालय
एकीकडे आखाती देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट गडद होत असताना, केंद्र सरकार मात्र देशात सर्व काही आलबेल असल्याचा दावा करत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने “देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही” असे स्पष्ट केले असले, तरी प्रत्यक्षात अनेक राज्यांतील पेट्रोल पंपांवर लागलेल्या लांबच लांब रांगा आणि जनतेमधील घबराट सरकारचे नियोजन कोलमडल्याचे संकेत देत आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना […]
अशोक खरात प्रकरणाचे पडसाद बुधवारी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उमटवले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेवेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनसनाटी दावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीवरून हटवण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अशोक खरातकडे जाऊन पूजाविधी केले. यावेळी अशोक खरात यानेही थोडे दिवस द्या, फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दिसणार नाही, असे आश्वासन दिले होते, […]
Satara News |साताऱ्यात इंडेन गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा; वितरणात दिरंगाईमुळे संताप
साताऱ्यात इंडेन गॅस वितरणात दिरंगाई; नागरिकांमध्ये संताप सातारा– आखाती देशांतील युद्धाच्या झळा संपायच नाव घेत नाही.युद्धाच्या परिणामांची झळ आता थेट सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे. सातारा शहरात इंडेन म्हावशे गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडर वितरणात मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील [...]
जिल्हा परिषद पेठ प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद पेठ प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर कोळपे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिक्षा शिंदे, सचिन देवकते, अजित कदम, संगिता झिंजे,लखन आदटराव, गोपाळ लकडे, तानाजी बंडे, विजय पडुळकर, हनुमंत थोरात उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुलभा पवार यांनी केले.पहीलीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांंचे साखरेचा हार, गुलाबपुष्प,सचित्र बालमित्र पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.देशपांडे यांनी केले तर आभार ही.व्ही.गिरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. एस.एम.पवार,एस.एस.दराडे,ही.व्ही.गिरी ,व्हील.बी.धालगडे,व्हील.एस.मते,यु.बी.नाईक,जी.ऐ.लोभे,व्हील.व्ही.उंदरे,एस.एस.जगताप,के.एस.भिसे यांनी परीश्रम घेतले.
येडशी येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन, परदेशातून विद्वान येणार अभ्यास करण्यासाठी
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे २९ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. भीष्म फाउंडेशन स्कूल ऑफ इंडियन नाॅलेज सिस्ऊ,पुणे विश्व मंदिर परिषद , भीष्म १०८ सोमयाग यज्ञ प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण विश्वाचे कल्याण, दैवी ऊर्जेची अनुभूती,त्रुतू चक्रांचे संतुलन,पंच महाभूतांचे संतुलन, पर्यावरण आणि वायुमंडलाचे शुद्धीकरण, वैयक्तिक आरोग्य प्राप्ती,आभा(आॅरा),पंचकोशीय शुद्धी,भूमी-जल पोषण सुधार आणि शुद्धीकरण यासाठी अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. येडशी येथील श्री रामेश्वर मंदिर देवस्थान येथे आयोजित अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञांचा मानवावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी परदेशातून विद्वान येणार आहेत अशी माहिती वेदमूर्ती धनेश जोशी यांनी दिली.
भाजपाच्या राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून बाळासाहेब क्षिरसागर यांची निवड
भूम (प्रतिनिधी)- भुम येथील भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब क्षिरसागर यांची यावर्षी भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाली. या निवडी झाल्याबद्दल भूम शहर भाजपाच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर तसेच नगरसेवक आबासाहेब मस्कर, सिद्धार्थ जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तंबाखू थुंकण्यासाठी फलाटाच्या कडेला गेला, वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू
तंबाखू थुंकण्यासाठी फलाटाच्या कडेला गेलेल्या एका व्यक्तीचा वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दानापूर विभागांतर्गत येणाऱ्या बारह रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली. पटना-हावडा वंदे भारत एक्सप्रेसची धडक बसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दानापूर आरपीएफचे कमांडंट उदय सिंग पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलाट क्रमांक 2 वर ही घटना […]
केंद्रीय कृषिमंत्र्यांचे विधान निराधार किंवा कोणालातरी खुश करण्यासाठी; अंबादास दानवेंनी घेतला समाचार
शेती उत्पादन आणि उत्पादकता वाढल्यामुळे काही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने नव्हे तर आठपटीने वाढल्याचा दावा कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत केला होता. चौहान यांच्या दाव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी चांगलाच समाचार घेत शेतकऱ्यांचे वास्तव मांडले आहे. याबाबत एक्सवर दानवे यांनी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शिवराजसिंह चौहान जी […]
सनोज मिश्रा याने मला अनेकदा…, महाकुंभ गर्ल मोनालिसाचे दिग्दर्शकावर आरोप
प्रयागराज महाकुंभमध्ये चर्चेत आलेली मोनालिसा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आता तिने ‘द डायरी ऑफ मणिपूर’चे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर पत्रकार परिषद घेत, गंभीर आरोप केले आहेत. मोनालिसाच्या म्हणण्यानुसार, सनोज मिश्रा यांनी तिला अनेक वेळा अयोग्यरित्या स्पर्श केला आहे. तिने तिच्या कुटुंबावरही आरोप केला आहे की त्यांनी तिला मदत केली नाही. मोनालिसाने नुकतेच केरळमध्ये राहणाऱ्या […]
Sangli News |कवठेमहांकाळजवळ भीषण अपघात! कोल्हापूरच्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
कवठेमहांकाळवर भीषण अपघात, दांपत्य जागीच ठार कवठेमहांकाळ -रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गवर शिरढोणजवळ रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला व्हॅगेनार कारने जोराची धडक दिल्याने कारमधील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील पती-पत्नीचा मरण पावलेल्यामध्ये समावेश आहे. मयत [...]
Jammu Kashmir –सांबा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला अटक, बीएसएफकडून तपास सुरू
जम्मू आणि कश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बुधवारी बीएसएफने एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. रामगढ सेक्टरमधील भल्लर सीमा चौकीजवळ ही घटना घडली. घुसखोराची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर सीमावर्ती भागात दक्षता वाढवण्यात आली असून अशा घटनांवर कडक नजर ठेवली जात आहे. घटनास्थळी बीएसएफचे पथक तैनात असून, स्थानिक सुरक्षा दलदेखील सीमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. […]
स्वत:च्या देशामध्ये इंधनाचा ठणठणाट असताना आणि अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात मध्यस्थी करायला निघालेल्या पाकिस्तानला इराणने लायकी दाखवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी विना परवानगी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानली जहाजाला रोखत इराणने माघारी पाठवले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या शारजा बंदरातून कराचीच्या दिशेने जाणाऱ्या सेलेन हे जहाज इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स सैनिकांनी होर्मुझच्या वेशीवरूनच परत […]
शिक्षण आणि आरोग्य सेवा! कोल्हापुरात नीम करोली बाबा ट्रस्टचा यशस्वी उपक्रम कोल्हापूर – समाजसेवेचा वसा हाती घेतलेल्या नीम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट (कोल्हापूर) आणि छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (CPR) यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत काल, २४ मार्च रोजी शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात एका भव्य ‘मोफत आरोग्य तपासणी आणि [...]
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंगच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. उत्तर प्रदेश सरकारने रिंकू सिंगची ‘प्रादेशिक क्रीडा अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी ही घोषणा केली. लखनौ येथील लोकभवन येथे बुधवारी आयोजित एका विशेष सोहळ्यात रिंकू सिंहला हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ […]
धक्कादायक! भोंदूबाबा अशोक खरात राजकारण्यांना अल्पवयीन मुली पुरवायचा
भोंदूगिरी, जादूटोणा आणि महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला अशोक खरात याच्याबाबत दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक राजकारण्यांसोबत संबंध असलेला हा भोंदूबाबा त्यांना अल्पवयीन मुली पुरवत होता असा खळबळजनक आरोप माहिती अधिकार अभियानाचे नेते विजय कुंभार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबईतक या वाहिनीशी बोलताना विजय […]
जागरूक ग्राहकच फसवणुकीपासून सुरक्षित- अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- ग्राहक म्हणून वस्तू खरेदी करताना त्यावरील किंमत,दर्जा आणि एक्सपायरी तारीख तपासणे आवश्यक असून, ग्राहक जागरूक असेल तर त्याची फसवणूक होणार नाही,असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी केले. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य नितीन अग्रवाल व श्रीमती वैशाली बोराडे,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य शरद वडगावकर,अजित बागडे,आशिष बाबर,अनिल पाटील तसेच वीज तक्रार निवारण मंचच्या सदस्या मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी सांगितले की, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावेळी मेधा कुलकर्णी, पुनम तापडिया आणि पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान सभागृहाबाहेर विविध विभागांचे स्टॉल लावून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली. याचवेळी मान्यवरांच्या हस्ते संगीता गायकवाड, अंबर देशमाने, सय्यद गिलानी, नारायण कांबळे, बालाजी शेलार, संगीता, चांद अब्दुल शेख, शेरीपा नवाब शेख, काझी शमशाद आणि छाया चौधरी यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साखळे यांनी केले.
“टीबी मुक्त भारतासाठी 100 दिवसीय मोहिमेला धाराशिवमध्ये प्रारंभ
धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक क्षयरोग दिनानिमित्त धाराशिव येथे टीबी मुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेचे उद्घाटन समारंभ जिल्हा परिषद स्थायी समिती सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास ,सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.मारोती कोरे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनय कुलकर्णी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमजान अली तसेच तालुका आरोग्य अधिकारी,विविध कार्यकर्ते,आरोग्य कर्मचारी व जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 24 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या 100 दिवसीय मोहिमेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील क्षयरुग्णांची संख्या कमी करणे हा आहे. या अभियानाअंतर्गत जोखीमग्रस्त गावांतील 14 वर्षांवरील नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात येणार आहे.यासाठी जिल्ह्यातील एकूण 185 जोखीमग्रस्त गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये भूम 7,धाराशिव 36, कळंब 25, लोहारा 14,उमरगा 31, परांडा 18,तुळजापूर 44 व वाशी 10 गावांचा समावेश आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे यांनी केली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष तसेच अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय परिचारिका महाविद्यालय आणि जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त वतीने जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी टीबीमुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रॉबर्ट कोच यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान होते,उपाध्यक्ष म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर उपस्थित होते.प्रमुख उपस्थितीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ यांच्यासह डॉ.विनय कुलकर्णी (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ.डुमणे (मेडिसिन विभाग प्रमुख), डॉ.अभिजीत बनसोडे (जिल्हा क्षयरोग अधिकारी), डॉ. रमजान अली (वैद्यकीय अधिकारी), डॉ.शेख खाजा (जिल्हा कार्यक्रम समन्वयक) तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जागतिक क्षयरोग दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना सांगण्यात आले की,1882 साली रॉबर्ट कोच यांनी याच दिवशी क्षयरोगाच्या जिवाणूचा शोध लावला होता.हा दिवस क्षयरोगाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी समर्पित आहे.क्षयरोग हा गंभीर संसर्गजन्य आजार असून तो मुख्यत्वे फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि योग्य वेळी उपचार न घेतल्यास जीवघेणा ठरू शकतो.टीबी मुक्त पंचायत कार्यक्रम सन 2023 पासून राबविण्यात येत असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सन 2023 मध्ये 71 ग्रामपंचायती ब्रॉन्झ श्रेणीसाठी पात्र ठरल्या होत्या. सन 2024 मध्ये 50 सिल्वर व 330 ब्रॉन्झ अशा एकूण 280 ग्रामपंचायती पात्र ठरल्या.तर सन 2025 मध्ये 42 गोल्ड,247 सिल्वर व 143 ब्रॉन्झ अशा एकूण 432 ग्रामपंचायती टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. तालुकानिहाय पाहता भूम 55, धाराशिव 73, कळंब 58, लोहारा 39, उमरगा 72,परांडा 35, तुळजापूर 76 आणि वाशी 24 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये शाळांमध्ये विविध उपक्रम, रॅली, पथनाट्य, गटसभा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा यांचा समावेश होता. तसेच सर्व आरोग्य केंद्रांमध्ये व ग्रामपंचायतींतर्गत क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले, आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आणि टीबी चॅम्पियन तसेच निक्षय मित्रांचा सन्मान करण्यात आला. यावर्षीचे घोषवाक्य “होय! आपण क्षयरोगाचा (टीबीचा) अंत करू शकतो, भारताच्या नेतृत्वाखाली, जनभागीदारीच्या बळावर” असे असून, या घोषवाक्याच्या माध्यमातून समाजाच्या सक्रिय सहभागातून टीबी निर्मूलनाचा संदेश देण्यात आला.
प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा संपाचा इशारा
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य (जिल्हा शाखा धाराशिव) यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात येत्या 21 एप्रिल 2026 पासून राज्यभर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेच्या निवेदनानुसार, राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी व शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहेत. यामध्ये धरणे, सत्याग्रह, “बँक ऑफ” आंदोलन, राज्यव्यापी निदर्शने तसेच उपोषण यांसारख्या मार्गांचा अवलंब करण्यात आला. तरीदेखील शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीचे आंदोलने 6 मार्च 2025 रोजी राज्यभर धरणे सत्याग्रह करण्यात आला. 20 मे 2025 रोजी दोन तासांचे “बँक ऑफ” आंदोलन करण्यात आले. 9 जून 2025 रोजी राज्यव्यापी निदर्शने झाली. 11 नोव्हेंबर 2025 रोजी एक तासाचे उपोषण करण्यात आले. 5 डिसेंबर 2025 रोजी शिक्षक-कर्मचाऱ्यांनी शाळा बंद आंदोलन केले. 9 ते 11 डिसेंबर 2025 दरम्यान नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी साखळी उपोषण करण्यात आले. 12 फेब्रुवारी 2026 रोजी “राज्यस्तरीय धरणे सत्याग्रह” पुन्हा करण्यात आला. याशिवाय, जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न, निवृत्ती वेतन, सेवा अटीतील विसंगती, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
गुढी पाडवा-प्रवेश वाढवा तालुकास्तरीय महोत्सव चुंबळी येथे उत्साहात
भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व गटशिक्षण कार्यालय भूम यांच्यावतीने गुढीपाडवा प्रवेश वाढवा कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय महोत्सव प्राथमिक शाळा चुंबळी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुंबळी येथे इयत्ता पहिली वर्गात प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व भव्य मिरवणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना टोपी, फुलांचा हार, घाटीचा हार, फुगे, चेंडू देऊन सत्कार करण्यात आला व गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसाठी भव्य सजावट व रोशनी करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन भूमचे गट शिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांनी केले. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी यांनी चुंबळी शाळेच्या विविध उपक्रमातील सहभागाबाबत गौरवोद्गार काढले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ टकले तसेच पांढरेवाडीचे मुख्याध्यापक योगेश चाळक, गावचे सरपंच कानिफनाथ गिराम, गटनेते अण्णासाहेब तांबे, शालेय बचत गट अध्यक्ष सिकंदर सय्यद तसेच शिक्षण प्रेमी नागरिक रमेश मोरे, महादेव कांबळे, कल्याण गिराम, सुलेमान शेख, केशव देशमाने, बालाजी वरळे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बाचेवाड, राजेंद्र बागडे, मारुती साबळे, मनीषा खर्पे व गंगाबाई खंडागळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजीवन तांबे यांनी केले. तर आभार राजेंद्र बागडे यांनी मानले.
राज्यातील पासपोर्टसह टपालकार्यालय आरडीएक्स बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या ई-मेलने एकच खळबळ माजली. टपाल कार्यालयाने पोलीसांना ही माहिती कळवताच तत्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथकासह पोलीसांनी कार्यालयातील कर्मचार्यांना बाहेर काढून कार्यालयाची कसून तपासणी केली. तपासणीअंती हा ई-मेल अफवा असल्याचे स्पष्ट झाले. शहरातील जुना बाजार भागात असलेल्या मुख्य टपाल कार्यालयास आज बुधवारी सकाळी 11.30 वाजता ई-मेल प्राप्त […]
युद्धाचे कारण सांगून केळीच्या दरात घसरण; शेतकऱ्यांची आर्थिक लूट- राहुल मोटे
भूम (प्रतिनिधी)- इराणमधील युद्धस्थितीचा आधार घेत देशांतर्गत बाजारात केळीच्या दरात कृत्रिम घसरण करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी केला आहे. या प्रकारामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याची तक्रार त्यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात मोटे यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, पुणे तसेच धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. विशेषतः भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील डोंजा व तेरखेडा परिसर हा केळी उत्पादनासाठी ओळखला जातो. दरवर्षी रमजान महिन्यात केळीला चांगली मागणी व दर मिळण्याची अपेक्षा असते. मात्र यावर्षी काही व्यापाऱ्यांनी जाणूनबुजून दर पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पूर्वी प्रति किलो सुमारे 25 रुपये दर असलेली केळी सध्या थेट 6 ते 10 रुपयांपर्यंत खाली आली आहे. या दरकपातीमुळे केळी उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडले असून, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे केळी उत्पादक राज्य असले तरी एकूण उत्पादनापैकी केवळ एक टक्का केळी निर्यात होते. त्यामुळे स्थानिक बाजारातील दरावर शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न अवलंबून आहे. अशा परिस्थितीत युद्धाचे कारण पुढे करून दर घसरवणे हा अन्यायकारक प्रकार असल्याचे मोटे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषी व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.
Israel Iran War –आता तुम्ही स्वतःशीच वाटाघाटी करत आहात; इराणकडून ट्रम्प यांची खिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धविरामाचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, इराणी सैन्याने ट्रम्प यांची खिल्ली उडवत म्हटले आहे की, तुमच्यासारख्या माणसाशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. बुधवारी युद्धाचा २६ वा दिवस असून ट्रम्प यांनी आता आखातात आपले सैन्य तैनात करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या प्रस्तावाची इराणी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झुल्फिकारी […]
ते ड्रिफ्टिंग नव्हे तांत्रिक बिघाड, बंगळुरू लॅम्बोर्गिनी स्टंट प्रकरणी रिकी रायच्या वकिलांचा दावा
बंगळुरुतील अनिल कुंबळे सर्कलजवळ शनिवारी पहाटे लॅम्बोर्गिनी कारने केलेल्या कथित ड्रिफ्टिंग स्टंट प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. माजी अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय याचा मुलगा रिकी रायच्या वकिलांनी स्टंटचा दावा फेटाळून लावत ती घटना ब्रेक लावल्यामुळे झालेली घसरण असल्याचे म्हटले आहे. रिकी रायला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. या घटनेचा चुकीचा […]
वंदे भारतमध्ये देण्यात आलेल्या जेवणात किडे सापडल्याने प्रवासी संतप्त, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांना त्यांच्या जेवणाच्या ताटात किडे आढळले आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या ताटाने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. देशातील सर्वात हाय-टेक ट्रेनमध्ये प्रवाशांना जेवण दिले जात असताना, वाटाणे, पनीर आणि दह्यासोबत काही किडे हे वळवळताना दिसले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्यासारखा फिरत आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रवासी त्याच्या दह्याच्या कपात आणि […]
संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे आता अधिकृतपणे समोर आले आहे. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या २८ विविध मुद्द्यांबाबत संगमेश्वर पंचायत समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत हा भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले असून गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामुळे धामणी ग्रामपंचायत प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. कागदावरच […]
सातार्डा –जाधववाडीला जोडणारा नवीन पूल उभारणार
जि.प. सदस्य सुदन कवठणकर यांची माहिती सातार्डा – सातार्डा – जाधववाडीला जोडणाऱ्या पुलाची पाहणी जि.प सदस्य सुदन कवठणकर व पं .समिती सदस्य उदय पारिपत्ये यांनी केली.पुलाची दयनीय अवस्था झाली आहे.नवीन पूल बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जि. प.सदस्य सुदन कवठणकर यांनी सांगितले. यावेळी योगेश गोवेकर,बाळा मांजरेकर,सुरज राऊळ,शैलेश आरोलकर, भिकाजी राऊळ, विलास टेमकर उपस्थित होते.जाधववाडीला जोडणाऱ्या पुलाला [...]
देशातील एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संसदेच्या आवारात इंडिया आघाडीच्या खासदारांनी एकत्र येत केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला. मध्य पूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या […]
Kolhapur News |खडू आणि फळा ही जिल्हा परिषद शाळाहे चित्र बदलतय…!
किणी – कन्या विद्यामंदिर शाळेत रोबोटिक लॅब आणि ई-लर्निंग सुरू किणी (शांतीनाथ पाटील ) : घुणकी. दि. 23. ख डू आणि फळा… जिल्हा परिषद ची शाळा ही ओळख व चित्र आता झपाट्याने बदलताना चे आशादायी चित्र दिसत आहे. किणी (ता. हातकणंगले ) येथील कन्या विद्यामंदिर या मुलींच्या शाळेत [...]
Ajara |आजरा-महागाव बससेवा बंद ?
आजरा महागाव मार्गावर एस.टी. सेवा चार महिन्यांपासून बंद आजरा – आजरा हलकर्णी रस्त्याच्या कामाला चार महिन्या पासून सुरवात केली असून, आजरा महागाव रस्ता खुदाई केल्याने, प्रवाशाना धुरळ्याने श्वासोश्वास घेण्याचे अवघड झाले आहे, तर गाडी खाचखळग्यातून चालवणे वाहनधारकाना जिकरीचे झाले असल्याने, एस टी महामंडळाने आजरा महागाव गाडी बंद [...]
मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात रांगा वाढल्या सांगली -केंद्र सरकारने कोविड काळाप्रमाणे आगामी काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करूया, असे आवाहन केल्याचा परिणाम जिल्हाभर पेट्रोल पंपावर जाणवला. पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण होणार या अफवेने ग्रासलेल्या मंडळींनी गाडीची टाकी फुल्ल करण्याच्या नादात जिल्हयात हाहाकार उडवला. रात्रीच महामार्गावर अनेक पंपांवर [...]
Sangameshwar News –बेपत्ता तरुणाचा मृतदेह बावनदीच्या पात्रात आढळला
संगमेश्वर नजीकच्या उक्षी-भेळी चिंचपार येथील बेपत्ता असलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या पात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. दीपक शांताराम गोणबरे असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक गोणबरे हा घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. या प्रकरणी बेपत्ता तरुणाची पत्नी […]
१,२ एप्रिलला धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मालवण | प्रतिनिधी मालवण कांदळगाव कातवड येथील पांडव कालीन तळी येथील श्री हनुमान मंदिरात १ ते २ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त १ एप्रिल रोजी जागर उत्सवा होणार असून या निमित्त रात्रौ ९ वाजता श्री देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ कारीवडे [...]
48 वर्षांनंतर जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे दरवाजे पुन्हा उघडले, RBI चे अधिकारी उपस्थित
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे रहस्य आता काही दिवसांमध्ये उलगडणार आहे. या खजिन्यातील सोने, चांदी, हिरे आणि मौल्यवान रत्नांबद्दल नेहमीच उत्सुकता राहिली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून खजिन्याची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुभ मुहूर्त दुपारी १२:०९ ते १:४० दरम्यान होता. मंदिराच्या परंपरेनुसार, या वेळेत रत्नांची मोजणी सुरू झाली आहे. यापूर्वीची मोजणी […]
सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन, चुंगथांगमध्ये 200 पर्यटक अडकले
सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, यामुळे चुंगथांगमध्ये सुमारे 200 पर्यटक अडकल्याचे जिल्हाधिकारी अनंत जैन यांनी सांगितले. गंगटोकला लाचेनशी आणि चुंगथांगला लाचेनशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर भूस्खलन झाल्यामुळे लाचेनला जाणारे पर्यटक चुंगथांगमध्ये अडकून पडले आहेत. भूस्खलनामुळे अडकलेल्या पर्यटकांची आयटीबीपी कॅम्प आणि गुरुद्वारात राहण्याची सोय करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद […]
प्रकरणाची व्याप्ती, गांभीर्यामुळे पोलिसांचा निर्णय: सोहम नाईकची वैद्यकीय तपासणी पूर्ण : अनेकांच्या जबान्या नोंद, निष्पक्ष तपासाची ग्वाही कुडचडे : कुडचडे परिसरात खळबळ माजविलेल्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सोहम नाईक याची उर्वरित वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती कुडचडे पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास आता गुन्हा अन्वेषण विभागाकडे [...]
सावळेश्वर टोल नाका रणमैदान बनले पाटकुल (सुहास परदेशी) :-मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर टोल नाक्यावर कर्नाटक राज्याची नोंदणीकृत असणाऱ्या ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांकडून टोल देण्याच्या झालेल्या वादात टोल नाक्याची जोरदार तोडफोड करण्यात आली. यावेळी सावळेश्वर टोल नाका येथे टोल [...]
खरात प्रकरणी योग्य कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील –हर्षवर्धन सपकाळ.
भोंदूबाबा अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी अत्यंत जवळकीचे संबंध आहेत, अशी माहिती मिळत आहे. अशोक खरात प्रकरणात सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील, […]
छायापत्रकार सतिश कुंकळकर यांचे निधन
कुंभारजुवे : गावांतवाडा-कुंभारजुवे येथील रहिवासी आणि दैनिक तरुण भारतचे माजी छायापत्रकार सतिश गोविंद कुंकळकर (52 वर्षे) यांचे काल मंगळवारी दुपारी निधन झाले. अंत्यसंस्कार संध्याकाळी गावांतवाडा येथील स्मशानभूमीत करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट, गोवा छायापत्रकार संघटना, तसेच तिसवाडी पत्रकार संघाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त [...]
संसदेसाठी ड्रेस कोड हवा, भाजप नेत्याची मागणी; राहुल गांधींच्या कपड्यांवर घेतला आक्षेप
संसदेसारख्या संस्थेचा असलेला मान-सन्मान लक्षात घेता, संसदेत विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास परवानगी दिली जाऊ नये. संसदेचे पावित्र्य आणि त्याचे महत्त्व कायम राहील, अशा प्रकारे सर्व सदस्यांनी कपडे घालणे गरजेचे आहे. तसेच सदस्यांसाठी काही कपड्यांवर बंदी घालण्याची मागणी भाजप नेते जयवीर शेरगिल यांनी केली आहे. याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझी अशी […]
नाईक, भाटीकर यांचे उमेदवारी अर्ज ग्राह्या
आपच्या गितेश नाईक यांच्या अर्जाला आक्षेप : प्रतिज्ञापत्रात काही माहिती लपवल्याचा आरोप फोंडा : फोंडा मतदारसंघासाठी 9 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी काल मंगळवार दि. 24 रोजी होऊन भाजपाचे उमेदवार रितेश रवी नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांचे अर्ज ग्राह्या धरण्यात आले. मात्र आम आदमी पक्षाचे उमेदवार गितेश नाईक यांनी [...]
इराण, इस्रायल आणि अमेरिकेत मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. आखातातील युद्धामुळे तेल आणि गॅस टंचाई निर्माण झाली असून याची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. याच पार्श्वभूमीवर फिलिपिन्सने राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी लागू केली आहे. ऊर्जा आणीबाणी करणारा फिलिपिन्स पहिला देश ठरला असून जगात इंधन पुरवठ्याचे संकटही गंभीर असल्याचेही फिलिपिन्सने मान्य […]
Ichalkaranji Crime News |इचलकरंजीत कोयत्याने वार! किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
इचलकरंजीत कोयत्याने हल्ला; युवक गंभीर जखमी इचलकरंजी : किरकोळ कारणावरूनझालेल्या वादातून चौघांनी एकत्रितपणे हल्ला चढवत कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात नितीन बबन कांबळे (वय ३१, रा. नवीन कोल्हापूर नाका) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी साबीतअली [...]
फोंडा पोटनिवडणूक प्रकरणी सुनावणी 30 मार्चला
पोटनिवडणुकीला विरोध करणाऱ्या दोन याचिका : निवडणूक आयोगाचे वकील युक्तीवाद करणार पणजी : फोंडा पोटनिवडणुकीला विरोध करणाऱ्या दोन याचिकांवर भारतीय निवडणूक आयोगाची बाजू समजून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पुढील सुनावणी सोमवार 30 मार्चपर्यंत तहकूब केली आहे.न्या. वाल्मिकी मिनेझिस व न्या. अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर काल मंगळवारी सुनावणी झाली. या प्रकरणी प्रितम हरमलकर आणि [...]
OnePlus इंडियामध्ये नवीन घडामोडी, मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन लियू यांचा राजीनामा
OnePlus इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन लियू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, अशी कंपनीने अधिकृत माहिती दिली आहे. चीनमधील स्मार्टफोन कंपनीच्या जागतिक व्यवसायात सुरू असलेल्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. रॉबिन लियू यांनी 2018 मध्ये OnePlus मध्ये प्रवेश केला होता. कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,OnePlus इंडिया साठी रॉबिन यांच्या योगदानाबद्दल आम्ही […]
सांगाव येथील ३० वर्षीय पल्लवी पाटील यांचा जागीच अंत कागल -अज्ञात वाहनाने स्कूटरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मौजे सांगाव येथील ३० वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. पल्लवी राहूल पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. रेल्वे भरती परीक्षा देऊन परत येत असताना हा दुर्दैवी प्रकार [...]
चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याची तयारी
पणजी : निवृत्तीस आलेल्या राज्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सरकार एका वर्षाची मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहे. यामुळे खळबळ माजली आहे. प्राप्त माहितीनुसार या संदर्भातील आदेश येत्या दोन-तीन दिवसात जारी केला जाईल. काही अधिकारी हे येत्या 31 मार्च रोजी निवृत्त होत असून त्यांना आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे. यातील दोघेजण हे संचालक असून एक महामंडळाचा [...]
‘धुरंधर 2’च्या सेटवर जखमी अर्जुन रामपालवर उपचार करायला आले अन् डॉक्टर बनले थेट अभिनेते!
लुधियाना येथील सरकारी आरोग्य सुविधेत कार्यरत असणारे डॉ. सनी अशोक यांच्यासाठी 8 जुलै 2025 हा दिवस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता अर्जुन रामपालच्या डोक्याला दुखापत झाली आणि तातडीची मदत म्हणून डॉ. अशोक यांना सेटवर बोलावण्यात आले. रेल्वे ट्रॅकवर एका पाठलागाच्या दृश्याचे चित्रीकरण सुरू असताना ही दुर्घटना घडली होती. डॉक्टर जखमी […]
सिगारेटच्या पैशावरून विक्रेत्याला कारने तब्बल 100 मीटरपर्यंत फरफटत नेल्याची खळबळजनक घटना मुंबईतील ओशिवरा परिसरात घडली. ओशिवरा येथील लक्की बिर्याणी कॉर्नरजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. एका सफेद रंगाच्या व्हॅगनआर कारमधून आलेल्या चार जणांनी 870 […]
दफन केलेला मृतदेह बाहेर काढला आणि तरुणाचे अनैतिक संबंध झाले उघड…धक्कादायक माहिती आली समोर
वडिलांच्या दबावानंतर, गीताचा दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. या दुसऱ्या अहवालात गीताचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आणि हत्येचे गुपित उघड झाले
Israel Iran War –ट्रम्प यांच्यासाठी युद्ध हा गेम; जगाला गुंतवून ठेवत करताहेत कमाई
अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध समाप्तीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. सध्या सत्य आणि असत्य यांच्यातील रेषा धूसर होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असा दावा करत आहेत की इराणसोबत फलदायी चर्चा झाली आहे आणि युद्ध लवकरच संपू शकते. तर इराणकडून याचा स्पष्ट शब्दांत इन्कार करण्यात आला आहे. यामुळेच हे युद्धात आता नॅरेटिव्हचाही समावेश झाला आहे. दोन्ही बाजूकडून […]
सोशल मिडीया वापरासाठी कर्नाटकचा मोठा निर्णय; 16 वर्षांखालील मुलांसाठी स्क्रीन टाईम निश्चित
कर्नाटक सरकारने 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना डिजिटल व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. या नवीन धोरणानुसार, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाव्यतिरिक्त मनोरंजनाचा स्क्रीन टाइम दररोज केवळ एक तासापर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी सायंकाळी 7 वाजेनंतर इंटरनेट वापर बंद करावा आणि झोपण्यापूर्वी […]
भाजप व शिंदे गटात सुरू असलेल्या या गँगवॉरने महाराष्ट्राला बदनाम केले, विजय वडेट्टीवार यांची टीका
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीच्यावेळी भाजप व मिंधे गटात राडा झाला होता. यावेळी जिल्हा परिषदेत पोलिसांनी मंत्री शंभूराज देसाई यांना मारहाण केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर विधानभवनातही त्याचे पडसाद पाहायला मिळाले. या घटनेवर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप व मिंधे गटावर टीका केली आहे. ”पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव टाकून महाराष्ट्रात […]
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचे धागेदोरे पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पसरले असून पोलिसांनी एकूण 10 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान आरोपींकडून 21 अत्याधुनिक विदेशी बनावटीची शस्त्रे आणि 200 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये विशेष दलाद्वारे वापरल्या जाणाऱ्या ‘PX-5.7’ या घातक पिस्तुलसह झेक प्रजासत्ताक, […]
Iran Israel War –…तर अमेरिका अधिकच भीषण संकटात सापडेल, अमेरिकन सुरक्षा तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्वदेशातूनच टीकेची झोड उठू लागली आहे. अमेरिकेचे ज्येष्ठ सुरक्षा तज्ज्ञ आणि व्हाईट हाऊसचे माजी सल्लागार रॉबर्ट पेप यांनी ट्रम्प यांच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, ट्रम्प सध्या एका मोठ्या राजकीय आणि लष्करी सापळ्यात अडकले आहेत. त्यांनी इराणमध्ये प्रत्यक्ष सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला तर, […]
हिंदुस्थानातील कोणते शहर आइस्क्रीम कॅपिटल म्हणून ओळखले जाते, जाणून घ्या
हिंदुस्थानात सध्याच्या घडीला बहुतांश राज्यामध्ये उन्हाचा कहर दिसून येत आहे. देशात उष्णतेची लाट असताना, आइस्क्रीमची विक्रीही मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते. त्यामुळेच उन्हाळा आल्यावर विविध फ्लेवर्सची आइस्क्रीम बाजारामध्ये आपल्याला दिसू लागतात. खास उन्हाळा नजरेसमोर ठेवून आइस्क्रीम कंपन्या नानाविध रंग आणि फ्लेवर्सचे आइस्क्रीम बाजारात घेऊन येत आहेत. सध्याच्या घडीला आइसक्रीमची आवड मोठ्या प्रमाणात वाढत असून, मंगळुरू या […]
पोलीस स्वतःला राजे समजतात का? सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
चार वर्षाच्या लहान मुलीवर झालेल्या लैंगिक शोषणाचे प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळणाऱ्या गुरुग्राम पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले. पोलीस पीडित मुलीच्या घरी का जाऊ शकले नाहीत? पोलीस स्वतःला राजे समजतात का? दंडाधिकाऱ्यांनी आरोपीच्या उपस्थितीत पीडित मुलीची चौकशी कशी काय केली? असा प्रश्नांचा भडीमार करीत न्यायालयाने पोलीस खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढले. पोलीस चार वर्षांच्या चिमुरडीच्या निरागसतेवर विश्वास […]
गणपतीपुळे देवस्थानचा मोठा निर्णय! भाविकांसाठी महाप्रसादाची वेळ वाढवली
गॅस टंचाईत भाविकांच्या भोजनासाठी गणपतीपुळे संस्थान सरसावले रत्नागिरी -पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र व्यावसायिक गॅसच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खिचडी प्रसाद भोजनाची वेळ एक तासाने वाढवली आहे. देवस्थानने भाविकांच्या सोयीसाठी [...]
Jotiba Yatra |‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा डोंगर दुमदुमला; केदारनाथ प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न
‘चांगभलं’च्या गजराने दुमदुमला जोतिबा डोंगर परिसर जोतिबा डोंगर -महाराष्ट्राचे आराध्य दैवत, दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे केदारनाथ प्रकट दिन सोहळा चैत्र शुद्ध षष्टी युक्त सप्तमीस असंख्य भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात, भक्तिमय व मंगलमय वातावरणात पार पडला. चांगभलं… च्या गजराने जोतिबा डोंगर व परिसर दुमदुमला. [...]
Bank Fraud – IDFC First नंतर आता कोटक महिंद्रा बँकेत 160 कोटींचा FD घोटाळा
चंदीगडमध्ये IDFC First बँकेत 590 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याच्या घटनेला महिना उलटत नाही तोच कोटक महिंद्र बँकेत एफडी घोटाळा समोर आला आहे. हरियाणातील पंचकुला महानगरपालिकेच्या मुदत ठेव पावत्यांमध्ये (FDRs) विसंगती असल्याचे उघडकीस आले आहे. कोटक महिंद्रा बँकेतील महानगरपालिकेचे सुमारे 160 कोटी रुपये गायब झाले आहेत. महानगरपालिकेने 58 कोटी रुपयांच्या एका FD ची मुदत संपल्यानंतर […]
बँकिंग क्षेत्रात रणकंदन! महाराष्ट्रातील ३० हजार बँक कर्मचारी संपाच्या पवित्र्यात
UFBU च्या आवाहनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद कोल्हापूर – महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्रात आजपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलनाला सुरुवात झाली असून ३०,००० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व अधिकृत WhatsApp ग्रुपमधून बाहेर पडत संघटित शक्तीचे दर्शन घडवले आहे. UFBU च्या आवाहनानुसार हा आंदोलनाचा भाग असून राज्यभरात याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. [...]
Iran War –मध्य पूर्वेतील तणाव अधिक चिघळणार; आता सौदी अरेबियाचाही युद्धात सहभाग, ट्रम्प यांचे संकेत
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या संभाव्य सहभागाचे संकेत दिले आहेत. त्यांनी सौदी युवराज मोहम्मेद बिन सलमान यांचे कौतुक करत त्यांना योद्धा असे संबोधले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष आता अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धात नवीन देशांचा सहभाग […]
घाबरू नका…जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती : पेट्रोल, डिझेल, एलपीजी टंचाई नाही : जनतेसह वाहनधारकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये बेळगाव : जिल्ह्यात महिनाभराचा पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा मुबलक साठा असून सरकारतर्फे त्याचा निरंतर पुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून निष्कारण संभ्रमात पडू नये, असे सांगत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे. सोमवारी [...]

30 C