ओला उबर चालकांचा संप, प्रवाशांचे हाल; रिक्षा-टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची लूट
ॲप-आधारित कॅब आणि ऑटो-रिक्षा चालकांच्या देशव्यापी एकदिवसीय संपामुळे शनिवारी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः लांब अंतराच्या प्रवासासाठी आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहन मिळण्यात अडचणी आल्या. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्यांची लूट केली. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. शहरात नियमित मीटर रिक्षा उपलब्ध असल्या तरी ॲप-आधारित सेवांची कमतरता […]
संघाच्या शाखेत यापुढे मुस्लिमांचे स्वागत करणार का? संजय राऊत यांचा मोहन भागवत यांना सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शनिवारी झालेल्या ‘मुंबई व्याख्यानमाला’ या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता सलमान खानने हजेरी लावली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संघावर हल्लाबोल केला. कालच्या संघाच्या कार्यक्रमात सलमानला दिलेलं आमंत्रण हे गर्दी जमवण्यासाठी होतं की यापुढे आता संघात यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का?” असा सवाल त्यांनी केला. संजय राऊत यांनी […]
पुरुषाने बुरखा घालून महिलांच्या डब्यातून केला प्रवास, पोलिसांकडून गुन्हा दाखल
मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बुरखा घालून प्रवास करणाऱ्या एका पुरुषाविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपी सध्या फरार आहे. शुक्रवारी दुपारी सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या महिलांना बुरखा घातलेल्या एका प्रवाशाबद्दल संशय आला. त्यांनी त्याला विचारपूस केली […]
दिंडोशी येथील रत्नागिरी हॉटेलसमोरील भागात कल्व्हर्टस् बनविण्यात येत आहे. शिवसेनेच्या वतीने या कामाची पाहणी करण्यात आली तसेच पावसाळय़ापूर्वी कल्व्हर्टचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळय़ात दिंडोशीतील रत्नागिरी हॉटेलसमोर पाणी साचल्यामुळे नागरी निवारा म्हाडा संकल्प येथील लोकांना त्रास होत होता. याबाबत विभागप्रमुख- आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. 40 चे नगरसेवक तुळशीराम शिंदे व […]
कॉल सेंटरमधील 50 टक्के नोकऱ्या ‘एआय’ खाणार, आयबीएमच्या सीईओ यांनी व्यक्त केली भीती
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयमुळे नोकऱया धोक्यात आल्या आहेत, अशी भीती सर्वच क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. अनेक सेक्टरमध्येही एआयने आपले वर्चस्व निर्माण केल्याचेही दिसत आहे. एआयमुळे अनेक कामे ऑटोमेटिक होत आहेत. हजारो कर्मचाऱयांना नोकरी गमवण्याची भीती असताना आयबीएम या प्रसिद्ध आयटी कंपनीचे सीईओ अरविंद कृष्णा यांनी एआयचा धोका सांगितला आहे. एआयमुळे कॉल सेंटरमधील 50 टक्के […]
शत्रूंचे लांब पल्ल्याचे टार्गेट हिंदुस्थानच्या आवाक्यात! ‘अग्नी-3’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
हिंदुस्थानने ‘अग्नी-3’ मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी ओडिशातील एकात्मिक चाचणी केंद्र (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज), चांदीपूर येथे करण्यात आली. रणनीतिक दल कमांड (स्ट्रटेजिक फोर्सेस कमांड – एसएफसी) च्या जवानांनी मोबाईल लाँचरद्वारे हे प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण नियमित प्रशिक्षण सरावाचा एक भाग होते. अग्नी-3 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी करण्यात आल्याने आता शत्रूंचे लांब पल्ल्याचे […]
जगातील टॉप हॉस्पिटलच्या यादीत ‘एम्स’ सहाव्या स्थानी
जगातील टॉप हॉस्पिटलची यादी ब्रांड फायनान्सने जारी केली आहे. या यादीत एकूण 250 हॉस्पिटलचा समावेश असून यात हिंदुस्थानच्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट आफ मेडिकल सायन्स (एम्स) ला सहावे स्थान मिळाले आहे. 2026 मधील या हॉस्पिटलमध्ये अव्वल स्थान हे जॉन्स हापकिन्स मेडिसिनला मिळाले आहे. दुसरे स्थान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाऊंडेशन ट्रस्ट आणि तिसरे स्थान स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी […]
चंद्रावर वाजणार आयफोनची रिंगटोन! फोन घेऊन जाण्यास ‘नासा’कडून परवानगी
जगातील कोणत्याही व्यक्तीने कधी विचारही केला नसेल की, चंद्रावर गेलेला अंतराळवीर आपल्या कुटुंबातील व्यक्तीला थेट व्हाट्सअॅप मेसेज करेल किंवा इन्स्टाग्राम रील शेअर करेल, परंतु आता हे चित्र लवकरच खरोखर दिसणार आहे. अमेरिकी अंतराळ एजन्सी ‘नासा’ने आपला दशकभरापूर्वीचा जुना नियम बदलला आहे. अंतराळात जाणाऱया अंतराळवीरांना सोबत आयफोन घेऊन जाण्यास नासाने अखेर परवानगी दिली आहे. नासाच्या अॅडमिनिस्ट्रेटर […]
स्वित्झर्लंड नव्हे, कश्मीर आहे!
जम्मू-कश्मीरमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर ट्रफिक जाम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे नुकतीच सुरू करण्यात आलेली ‘वंदे भारत’ एक्सप्रेस बर्फातून वेगाने धावत आहे. रेल्वे स्टेशनपासून जवळपासच्या सर्व परिसरात जणू बर्फाची चादर अंथरली आहे. या पांढऱ्या शुभ्र बर्फातून ‘वंदे भारत’ सुस्साट वेगाने धावत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर हे स्वित्झर्लँड […]
स्टेटससाठी आता व्हाट्सअॅप आणणार नवे फिचर
व्हाट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी स्टेटस फिचरला आणखी स्मार्ट आणि पर्सनल बनवण्याची तयारी केली आहे. सध्या स्टेटस शेअर करण्यासाठी यूजर्सकडे तीन ऑप्शन आहेत. यातील पहिला पर्याय आहे माय कॉन्टॅक्ट्स, माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट आणि ओन्ली शेअर विथ असे हे तीन पर्याय दिसतात. परंतु व्हाट्सअॅप लवकरच नवीन अपडेटमध्ये कस्टम्स लिस्टचे फिचर आणणार आहे. या नव्या फिचरमुळे यूजर्सला प्रत्येक स्टेटससाठी […]
कोयना तिचे गाव…हिरकणी तिचे नाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आली तिसरी वाघीण
जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असणाऱया पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चंदा, तारा नंतर आता तिसरी वाघीण दाखल झाली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडून आणलेल्या या वाघिणीस आज कोयना अभयारण्यातील घनदाट जंगलात मुक्त करण्यात आले. सह्याद्रुमीधील गाईड मंडळींनी या वाघिणीला ‘हिरकणी’ हे नाव दिले. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून या […]
रितू तावडे मुळच्या काँग्रेसच्याच! दुसऱ्या टर्ममध्ये सर्वोच्च पदावर
पालिकेच्या 78 व्या महापौर ठरलेल्या रितू तावडे मूळच्या काँग्रेसच्याच कार्यकर्त्या आहेत. 2012 पर्यंत त्या काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत होत्या. मात्र 2012 मध्ये त्या भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा नगसेविका म्हणून निवडून आल्या. पालिकेच्या शिक्षण समितीसह अनेक पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले आहे. महापौर रितू तावडे प्रभाग क्र. 127 मधून निवडणूक लढून त्या जिंकून आल्या आहे. त्यांनी मुंबई […]
हिजबुल्लाह संघटनेत फेरबदल, वफीकला हटवले
लेबनानची संघटना हिजबुल्लाहने संघटनेत फेरबदल केले असून वरिष्ठ सुरक्षा अधिकारी वफीक सफाला पदावरून हटवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सफाने स्वतः पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर नेतृत्वाने सफाचा राजीनामा स्वीकारला. सफा हा अनेक दशकापासून संघटनेत संपर्क आणि समन्वयकचा प्रमुख होता. तसेच लेबनानच्या सुरक्षा एजन्सीसोबत काम पाहत होता. वफीक सफाच्या जागी आता हुसैन अब्दुल्लाहकडे […]
वेस्ट इंडिजचा स्कॉटलंडवर दणदणीत विजय, हेटमायरचे अर्धशतक, शेफर्डचे हॅट्ट्रिकसह पाच बळी
शिमरोन हेटमायरच्या तुफानी फलंदाजीने आणि रोमारिओ शेफर्डच्या विध्वंसक गोलंदाजीने वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषकाच्या ‘ग्रुप सी’ मधील सामन्यात स्कॉटलंडचा 35 धावांनी पराभव करत विजयी सलामी ठोकली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 बाद 182 धावांचा डोंगर उभारला. शिमरोन हेटमायरने अवघ्या 22 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत स्कॉटलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 36 चेंडूंत दोन चौकार आणि […]
पाकिस्तानी कारागृहात हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू
पाकिस्तानातील कराची कारागृहात बंद असलेल्या एका हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. भागाभाई बामनिया असे या मृत्यू झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे. ते गुजरातमधील गिर सोमनाथ जिह्यातील चिखली गावाचे रहिवासी होते. मच्छीमार भागा भाई बामनिया अचानक आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पाकिस्तानातील रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी कारागृह हिंदुस्थानी मच्छीमारांसाठी मृत्यूचा सापळा बनले […]
आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा पर्दाफाश
मुंबईजवळील समुद्रात भारतीयतटरक्षक दलाची कारवाई :तीन जहाजे ताब्यात प्रतिनिधी/ वास्को भारतीय तटरक्षक दलाने मुंबईच्या पश्चिमेस सुमारे शंभर सागरी मैल अंतरावर केलेल्या धडक कारवाईत आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा पर्दाफाश केला. या तेल तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेटस् गुंतलेले असल्याचे उघडकीस आले आहे. तटरक्षक दलाने या भर समुद्रातील कारवाईत तीन जहाजे ताब्यात घेतली आहेत. तटरक्षक दलाने गुरुवारी व शुक्रवारी असे [...]
बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारीपासून
21 हजार विद्यार्थी देणार परीक्षा प्रतिनिधी/ बेळगाव बारावीची मुख्य परीक्षा 28 फेब्रुवारी ते 17 मार्च 2026 या दरम्यान होणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी अवघे 20 दिवस शिल्लक राहिल्याने विद्यार्थी उजळणी करण्याकडे भर देत आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 21 हजार 131 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून परीक्षेसाठी जय्यत तयारी केली जात आहे.बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील [...]
बांगलादेशात निपाह व्हायरसने महिलेचा मृत्यू
बांगलादेशात निपाह व्हायरसमुळे महिलेचा मृत्यू झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. बांगलादेशातील या महिलेला 21 जानेवारीला निपाह व्हायरसची लक्षणे आढळली होती. ताप, डोकेदुखी, तोंडातून लाळ येणे अशी लक्षणे दिसत होती. आठवडाभराच्या उपचारानंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला अन्य कोणत्याही देशात गेली नव्हती. या घटनेमुळे आशियातील विमानतळावर स्क्रिनिंग वाढवण्यात आली आहे. दोन […]
नीरव मोदीला ब्रिटनच्या हायकोर्टाचा झटका
कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनच्या हायकोर्टाने जोरदार झटका दिला आहे. कोर्टाने बँक ऑफ इंडिया संबंधित कर्जफेडीप्रकरणात करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. नीरव मोदीने प्रकृती ठीक नसणे, दृष्टी कमी होणे आणि जेलच्या परिस्थिती सांगून सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. परंतु, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. या […]
सौदी अरबमध्ये आता उंटाला मिळणार पासपोर्ट
सौदी अरब सरकारने सर्वांना आश्चर्यात टाकणारा निर्णय घेतला आहे. सौदीत आता उंटांना पासपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे उंटांची खरेदी-विक्री, ओळख आता आणखी सोपी होणार आहे. सौदीत उंटांचा वापर हा परिवहन, व्यापार आणि वाळवंटात सर्वात जास्त केला जातो. उंटाला पासपोर्ट दिल्याने सौदीत पर्यावरण, जल आणि कृषी मंत्रालय या सेक्टरचे महत्त्व वाढेल, असे सरकारला वाटते. […]
अभिनेता सलमान खान याने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘मुंबई व्याख्यानमाला’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. संघाच्या कार्यक्रमातील सलमानच्या उपस्थितीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून त्याच्या ‘संघ दक्ष’ भूमिकेची सोशल मीडियात चर्चा रंगली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सलमान खानने हजेरी लावली.
सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात एआयचा जोरदार बोलबाला सुरू आहे. इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून दोन महिने, चार महिने, सहा महिने, एका वर्षाच्या बाळाचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एआयच्या मदतीने हे व्हिडीओ तयार केले जात आहे. छोटय़ा बाळाचा एखादा पह्टो घेऊन त्याला व्हिडीओमध्ये रूपांतरित केले जात आहे. या व्हिडीओत छोटय़ा बाळाच्या तोंडून ‘गोली मार देगा मेरे […]
शीव प्रतीक्षानगर येथील संक्रमण शिबिरातील वास्तव्यास चार धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या ठिकाणी प्रस्तावित विक्री घटकासाठी मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱया काही इमारतींचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव रद्द करून त्या ठिकाणी संक्रमण सदनिकांची इमारत बांधण्याचे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. प्रतीक्षानगर येथील संक्रमण इमारत क्र. 36, 37, 53 व 54 […]
हिंडलगा कारागृहात पुन्हा दोन मोबाईल-एक सीमकार्ड जप्त
अधिकाऱ्यांकडून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल प्रतिनिधी/ बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील दोन बराकीमध्ये दोन मोबाईल आणि एक एअरटेल कंपनीचे सीम आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणी कारागृह अधिकारी बसवराज वाय. बजंत्री यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे. हिंडलगा कारागृह नेहमी या-ना त्या कारणावरून चर्चेत असते. अलिकडेच कारागृहात मोबाईल आणि गांजा फेकणाऱ्या [...]
साप्ताहिक राशिभविष्य –रविवार 08 फेब्रुवारी 2026 ते शनिवार 14 फेब्रुवारी 2026
>> नीलिमा प्रधान मेष – वर्चस्व सिद्ध कराल मेषेच्या एकादशात सूर्य, चंद्र, बुध लाभयोग. कोणताही किचकट प्रश्न सोडवू शकाल. तुमचे वर्चस्व सिद्ध कराल. नोकरीधंद्यात वसुली होईल. नवे काम मिळेल. तुमच्या क्षेत्रात अग्रेसर राहाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धेत यश मिळेल. शुभ दि. 8, 9 वृषभ – जिद्दीने यश मिळवाल वृषभेच्या दशमेषात सूर्य, चंद्र, मंगळ लाभयोग. मानसिक […]
हनुमाननगरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले
भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ : एपीएमसी पोलिसात घटनेची नोंद प्रतिनिधी/ बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे 3 लाख रु. किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेऊन पलायन केले आहे. शुक्रवार दि. 6 रोजी दुपारी 4.35 च्या सुमारास हनुमाननगर सर्कल येथील ट्रयो कॅफेनजीक ही घटना घडली आहे. या प्रकरणी जयश्री [...]
यजमान भारताच्या मोहीमेला विजयाने प्रारंभ
अमेरिकेचा 29 धावांनी पराभव, सूर्यकुमार यादव ‘सामनावीर’ वृत्तसंस्था / मुंबई 2026 च्या आयसीसी पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मोहीमेला यजमान भारताने विजयी सलामीने प्रारंभ केला. मात्र हा विजय मिळविताना नवोदित अमेरिका संघाने कडवा प्रतिकार दर्शविला. ‘सामनावीर’ आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 84 धावांच्या कप्तानी खेळीच्या जोरावर भारताला हा सामना जिंकणे शक्य झाले. गोलंदाजीत मोहम्मद सिराज, [...]
मलेशियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत
पंतप्रधान इब्राहिम यांच्यासोबत कारमधून प्रवास : भारतीय वंशाच्या लोकांना केले संबोधित वृत्तसंस्था/ क्वालांलपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मलेशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर क्वालांलपूर येथे पोहोचले. या दौऱ्यादरम्यान मलेशियन पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी वैयक्तिक स्वरुपात विमानतळावर त्यांचे स्वागत केले, यातून दोन्ही नेत्यांदरम्यानचे दृढ वैयक्तिक संबंध दिसून येतात. विमानतळावर सांस्कृतिक स्वागतही करण्यात आले, ज्यात भारत आणि मलेशियाच्या संयुक्त [...]
भारतावर अठरा टक्के कराची घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, वॉशिंग्टन डीसी अमेरिकेने भारतावरील व्यापार शुल्क 50 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आणल्याची अधिकृत घोषणा केली आहे. नवा 18 टक्के कर भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांपासून लागू करण्यात आला आहे. तसेच दोन्ही देशांनी एक व्यापक व्यापारी करार करण्याचा निर्णय घेतला असून या करारासंबंधात दोन्ही देशांचे संयुक्त निवेदनही शनिवारी प्रसिद्ध करण्यात [...]
जुनैद खानसोबत जमणार जोडी आमिर खानचा पुत्र जुनैद खानचा नवा चित्रपट ‘एक दिन’चे फर्स्ट लुक पोस्टर सादर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये साई पल्लवी आणि जुनैदची झलक दिसून येत आहे. निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत आहे. पोस्टरमध्ये जुनैद आणि साई हे हिमवृष्टीत कडाक्याच्या थंडीत आईस्क्रीम [...]
‘धुरंधर’च्या यशानंतर सौम्याला मिळाली मोठी संधी
बॉलिवूड चित्रपटात झाली एंट्री सौम्या टंडन ही अभिनेत्री यापूर्वी ‘भाभी जी घर पर हैं’मुळे लोकप्रिय झाली होती. परंतु तिला जगभरात प्रसिद्धी मिळवून देण्याचे श्रेय धुरंधर या चित्रपटाचे आहे. या चित्रपटात तिची भूमिका छोटी परंतु दमदार होती. चित्रपटात रहमान डकैतला थप्पड लगावतानाच्या दृश्यामुळे सौम्या ही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लोकांनी तिच्या भूमिकेचे कौतुक केले आणि [...]
तिसऱ्यांदा केरळ निवडणूक जिंकणार एलडीएफ
भाकप नेत्याचा दावा : निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केरळ सचिव बिनॉय विश्वम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एलडीएफ (डाव्यांची आघाडी) विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. एलडीएफ तिसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन करणार असून निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला जाईल. या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये एलडीएफचे नेतृत्व डावी विचारसरणी करणार [...]
वृत्तसंस्था / तियानजीन (चीन) येथे सुरू असलेल्या 12 व्या आशियाइं इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा अॅथलिट आदर्श रामज्योती शंकरने पुरूषांच्या उंचउडी प्रकारात कांस्यपदक पटकाविले. पुरूषांच्या उंचउडी प्रकारात आदर्श शंकरने 2.19 मी.चे अंतर नोंदवित तिसऱ्या स्थानावर कांस्यपदक घेतले. या स्पर्धेत भारताच्या प्रवीण चित्रावेलला तिहेरी उडी प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरूषांच्या तिहेरी उडीत तसेच महिलांच्या [...]
टी 20 वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक :रोमारियो शेफर्डचे हॅट्ट्रिकसह 5 बळी वृत्तसंस्था/ कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या टी 20 वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडला 35 धावांनी नमवत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 5 गडी गमावत 182 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव 147 धावांत आटोपला. विंडीजने हा सामना 35 धावांनी [...]
‘गृहलक्ष्मी’साठी जीवित प्रमाणपत्र सक्तीचे
कार्यवाहीबाबत पावले उचलण्याची मुख्यमंत्र्यांची मुख्य सचिवांना सूचना प्रतिनिधी/ बेंगळूर राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ योजनेतील अनुदानाचा गैरवापर रोखण्यासाठी नवी नियमावली लागू करण्याचा विचार चालविला आहे. मृत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ नयेत, यासाठी जीवित प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट) सादर करणे अनिवार्य करण्याचा सरकारने गांभीर्याने विचार चालविला आहे. या संदर्भात पडताळणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी [...]
कैची धाम हे उत्तराखंडमधील ठिकाण असून ते भारतातील एक प्रमुख धार्मिकस्थळ आहे. हे स्थान हिमालयाच्या पर्वतरांगेत स्थित असून येथे अनेक तीर्थस्थळं आहेत. कैची धाममध्ये दरवर्षी जगभरातून मोठ्या संख्येत अध्यात्मिक पर्यटक दाखल होत असतात. प्रसिद्ध संत नीम करोली बाबा यांनी येथे आश्रम स्थापन केला होता, जो आता लोकांसाठी शांतता अन् अध्यात्मिक केंद्र ठरला आहे. अंतर्गत शांततेसाठी [...]
सूडानमध्ये आरएसएफच्या हल्ल्यात 24 ठार
खार्तूम : सूडानमध्ये मागील 3 वर्षांपासून जारी गृहयुद्धामुळे देशात मानवीय संकट तीव्र होत चालले आहे. सैन्य आणि रॅपिड सपोर्ट फोर्सदरम्यान (आरएसएफ) जारी संघर्षाने देश घायाळ झाला आहे. याचदरम्यान आरसीएफने नॉर्थ कोर्डोफान प्रांतात शनिवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 24 जण मारले गेले असून यात 8 मुलांचा समावेश आहे. दुबेकिर भागातून विस्थापित झालेले लोक वाहनातून जात असताना हा [...]
कूनोमध्ये आशा चित्त्याने दिला 5 बछड्यांना जन्म
श्योपूर मध्यप्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कमध्ये नामीबियन चित्ता आशाने 5 बछड्यांना जन्म दिला आहे. यामुळे भारतात जन्मलेल्या जिवंत बछड्यांची संख्या वाढून 24 झाली आहे. याचबरोबर देशात चित्त्यांची एकूण संख्या आता 35 वर पोहोचली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी याची घोषणा करत याला प्रोजेक्ट चित्तासाठी अपार गर्व आणि आनंदाचा क्षण संबोधिले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही [...]
सूरजकुंड मेळ्यात झूला तुटल्याने अपघात
एका भाविकाचा मृत्यू, 7 जखमी, वेगाने बचावकार्य वृत्तसंस्था / नवी दिल्ली हरियाणातील सूरजकुंड येथे होत असलेल्या जगप्रसिद्ध मेळ्यातील एक झूला तुटल्याने मोठा अपघात झाला आहे. शनिवारी संध्याकाळी हा झूला तुटल्याने मेळ्याला उपस्थित त्यावरील काही खाली पाण्यात पडले. जखमी भाविकांची संख्या 7 ते 8 असल्याची माहिती देण्यात आली. जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सेतू तुटला तेव्हा [...]
आसाममध्ये 14 कोटीचे अमली पदार्थ जप्त
आसाम आसामच्या कछार जिल्ह्यात पोलीस आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त कारवाईत 14 कोटी मूल्याचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका इसमालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कछार जिल्ह्याच्या तोलेंग्राम क्षेत्रात करण्यात आली असून जप्त सामग्रीत 154 पाकिटांमध्ये भरलेले हेरॉइन आणि 10 हजार याबा टॅबलेट सामील असल्याची माहिती मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी दिली [...]
अमेरिकेने दिला पाकिस्तानला झटका
संपूर्ण काश्मीर-अक्साई चीन भारताच्या नकाशात वृत्तसंस्था / नवी दिल्ली अमेरिकेने पाकिस्तानला चांगलाच झटका दिला आहे. भारत आणि अमेरिका यांनी शनिवारी दोन्ही देशांतील अतंरिम व्यापार करारासंबंधी रुपरेषा प्रसिद्ध करणारे संयुक्त निवेदन प्रसारित केले आहे. या रुपरेषेच्या कागदपत्रात अमेरिकेने पाकव्याप्त काश्मीसह पूर्ण काश्मीर आणि चीनने बळकाविलेला ‘अक्साई चीन’ हा प्रदेश भारताच्या नकाशात दाखविला आहे. अमेरिकेने अशी कृती [...]
केसांसाठी नवस केले जाणारे मंदिर
केस उगविण्यासाठी येतात लोक जपानच्या सांस्कृतिक वारशात अनेक अनोखी मंदिरे आहेत, परंतु कीओतोचे मिकामी श्राइन खरोखरच वेगळे आहे. हे मंदिर पूर्णपणे केसांना समर्पित आहे. या मंदिरात लोक केस उगविणे, केस गळण्यापासून वाचविणे, केसांच आरोग्य आणि हेयरड्रेसर्सची परीक्षा पास करविण्याची प्रार्थना घेऊन येतात. अराशियामाच्या प्रसिद्ध बांबू फॉरेस्टपासून केवळ काही अंतरावरील हे मंदिर सोशल मीडियावर व्हायरल होत [...]
अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा सरळ राष्ट्रद्रोह आहे. 15 आागस्ट 1947 च्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंडित नेहरू यांनी भारतवर्षाला सार्वभौम व सुखी ठेवणारा ‘नियतीशी करार’ केला. मोदी यांनी हा करार मोडून भारताला अमेरिकेचे गुलाम केले! पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 आागस्ट 1947 ला भारताच्या संविधान सभेत स्वातंत्र्याच्या प्रसंगी ऐतिहासिक आणि भावनिक भाषण केले. […]
मुनीर यांनी दिला होता ‘गजवा-ए-हिंद’चा नारा
जैशच्या दहशतवाद्याकडून कबुली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाक सैन्यप्रमुखाचे कृत्य वृत्तसंस्था/ रावळकोट जैश-ए-मोहम्मदच्या एका म्होरक्याने ऑपरेशन सिंदूरवरून मोठी कबुली दिली आहे. पाकिस्तानी सैन्यप्रमुख आसिम मुनीर यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यानचा संघर्ष म्हणजे गजवा-ए-हिंद असल्याचे दहशतवाद्यांना सांगितले होते, असा खुलासा दहशतवादी इलियास काश्मिरीने केला आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या रावळकोटमध्ये जैशचा टॉप कमांडर इलियासने जैशच्या दहशतवाद्यांदरम्यान हा खुलासा केला आहे. [...]
विजेत्या भारतीय युवा संघाला 7.5 कोटींचे बक्षीस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील झिम्बाब्वेमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा संघाला भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) 7.5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित साकीया यांनी भारतीय युवा संघाचे खास अभिनंदन केले आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय युवा संघाने एकही सामना न गमविताना [...]
जय शहा यांच्या संघांना शुभेच्छा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली 2026 च्या आयसीसी पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. सदर स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्यात संयुक्त यजमानपदाने भरविली जात आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 55 सामने खेळविले जात असून 20 संघांचा यामध्ये समावेश आहे. हे संघ चार गटात विभागण्यात आले आहेत. यजमान भारताचा पहिला सामना मुंबईत अमेरिकेबरोबर झाला आहे. या [...]
भारत कधीच मुस्लीमबहुल होणार नाही : ओवैसी
हिंदूंपेक्षा कधीच लोकसंख्या अधिक नसणार वृत्तसंस्था/ निजामाबाद भारतात मुस्लिमांची लोकसंख्या कधीच हिंदूंपेक्षा अधिक होणार नाही असे वक्तव्य एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तेलंगणातील पालिका निवडणुकीपूर्वी निजामाबाद येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना केले आहे. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या भाषणात पूर्ण जगाची लोकसंख्या वृद्ध होत असताना भारताची लोकसंख्या युवा असल्याचे म्हटले होते असा उल्लेख ओवैसी [...]
नागरिकत्वाबद्दल आरोप राजकीय कट
न्यायालयासमोर सोनिया गांधी यांच्या वतीने दावा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 1983 साली भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याच्या तीन वर्षांपूर्वी मतदार यादीत नाव सामील करण्यात आल्याचा आरोप करणारी तक्रार राजकीय उद्देशाने करण्यात आली होती असा दावा काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या वकिलाने शनिवारी दिल्लीतील एका न्यायालयात केला आहे. हा जबाब विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांच्या समोर सादर करण्यात आला. [...]
आजचे भविष्य रविवार दि. 8 फेब्रुवारी 2026
मेष: मुलांच्या बक्षीस समारंभात आपलाही सहभाग वृषभ: लांबचा प्रवास टाळावा, आरोग्य कमकुवत बनवेल. मिथुन: अध्यात्मिक लाभासाठी ध्यान व योगाचा अवलंब कराल कर्क: निसर्गरम्य ठिकाणी काढलेली एखादी सहल आनंदमयी ठरेल. सिंह: प्रवासामुळे थकवा वाटेल, ताण येईल. कन्या: तब्येत ठणठणीत असेल, कुटुंबाला प्राधान्य द्या तुळ: मनावरील ताण दूर सारा, प्रगतीत अडथळा बनेल वृश्चिक: उच्च आत्माविश्वास चांगल्या कामासाठी [...]
दिल्लीतील कमल मृत्यूप्रकरणी उप-कंत्राटदाराला अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीत जल बोर्डाकडून खणलेल्या खड्डयाध्ये कोसळून गुरुवारी रात्री उशिरा कमल चंदानी याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता उप-कंत्राटदार राजेश प्रजापति याला अटक करण्यात आली आहे. जनकपुरी व्ही-ब्लॉकमध्ये 20 फूट खोल खड्डयात रात्री कोसळलेल्या युवकाचा मदत न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाला होता. तर शनिवारी सकाळी दिल्ली सरकारचे मंत्री आशीष सूद यांनी घटनास्थळी जात [...]
प्रयोगानुभव- कला इतिहासातील अनोखा प्रयोग
>> विक्रम मराठे img.vikram@gmail.com ‘इंजिनस नेटिव्हः कथा एका मुरक्क्याची’ या डॉक्युड्रामाचा नववा प्रयोग नुकताच मुंबईत सादर झाला. काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये डॉक्युड्रामा विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगाची निर्मिती गवाक्ष, पुणेतर्फे करण्यात आली असून चित्रकार डॉ. नितीन हडप आणि अॅनिमेटर मकरंद सप्रे यांनी संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा डॉक्युड्रामा ते दोघे सादर करतात […]
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी दिनचर्या आणि रात्रीचर्या संपूर्णत उलगडून सांगणे कठीण असते. यात आपल्याला प्रकृती, ऋतू आणि परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. या लेखातून आपल्याला मार्गदर्शन सूत्र मिळाले तरी नक्कीच सर्वांचा फायदा होईल. आधीच्या लेखात आपण दिनचर्या थोडक्यात जाणून घेतली. त्याचा पुढचा भाग म्हणून रात्रीचर्या कशी अवलंब करावी ते आपण पाहू. आयुर्वेदानुसार संध्याकाळ हा वाताचा काळ […]
न्यू हॉलीवूड –हिंसेचे नवीन व्याकरण
>> अक्षय शेलार shelar.abs@gmail.com वेस्टर्नपटांचे अंतगीत आणि न्यू हॉलीवूडच्या आरंभाची नांदी ठरणारा ‘द वाइल्ड बंच’ सिनेमाने हिंसेला सौंदर्य आणि भय या दोन्ही छटांत दाखवत सिनेमाच्या भाषेला कायमचे बदलून टाकले. हिंसेच्या दृश्यभाषेत खरी क्रांती घडवण्याचे श्रेय या सिनेमाला जाते. सॅम पेकिन्पाचा ‘द वाइल्ड बंच’ हा चित्रपट 1969मध्ये प्रदर्शित झाला आणि तक्षणी अमेरिकन वेस्टर्नपटांचा चेहरामोहरा कायमचा बदलून […]
नेतृत्व हरपले की बेतालपणा, मनमानी या गुणांना आपसूक संधी मिळते
एण क्रीडति शूकरश्च खनति द्वीपी च गर्वायते। क्रोष्टा कन्दति वल्गते च शशको वेगाद्रुरुर्धावति। निशंकैः करिपोतकैगिरितटश्चोत्पाट्यते लीलया। हंहो सिंह विना त्वया हि विपिने कीदृग्दशा वर्तते।। अर्थ: हरिण मोकळेपणाने खेळतो आहे, डुक्कर जमिन उकरतो आहे, बिबट्या बिनधास्त गायींची शिकार करतो आहे; कोल्हा गर्वाने कोल्हेकुई करतो आहे, ससा वेगाने धावत आहे; अगदी हत्तीची पिल्लेसुद्धा डोंगर-झाडांना धक्के देत उन्मत्त […]
मुद्रा – खाद्यसंस्कृतीतून रुजणारी वाचनसंस्कृती
>> पराग पोतदार हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना साहित्याची रुची अनुभवता येणारे भीमाबाई जोंधळे यांचे रिलॅक्स कॉर्नर हे हॉटेल. आजींच्या या हॉटेलमधून मेन्यूसह पुस्तकांचा खजिनाही अनुभवता येतो. मेनूकार्डसोबत टेबलवर पुस्तक आपसूकच हातात घेतले जाते अन् वाचनापासून दूर गेलेला प्रत्येकजण पुन्हा पुस्तकांपाशी ओजातो. नाशिकच्या ओझरजवळ असलेल्या दहावा मैल येथे 75 वर्षीय आजी भीमाबाई जोंधळे […]
साहित्य विशेष –जयवंत दळवी यांच्या साहित्याचा जागर
>> प्रशांत गौतम `जयवंत दळवी : साहित्य अनुवाद आणि प्रकारांतर’ या विषयावर अखिल भारतीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र दि. 31 जाने 26 ते 1 फेब्रुवारी 26 या काळात संपन्न झाले. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला मराठीचा जागर ही मराठी भाषकांसाठी वैचारिक मेजवानीच ठरली. हैदराबाद येथील 103 वर्षांची वैचारिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या […]
साय-फाय- इराणमधील इंटरनेट बंदी
>> प्रसाद ताम्हनकर इंटरनेट आणि मोबाईलवरील बंदीमुळे इराणचे नाव जगभरात खराब झालेले आहे. जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर इराण सरकारने घाला घातल्याची भावना सर्वत्र वर्तवली जात आहे. इराणने लादलेल्या प्रतिबंधांचा धुरळा खाली बसत नाही, तोवर आता पाकिस्तान सरकारदेखील इराणच्या मार्गावरून चालत असल्याचा आरोप अनेक पाकिस्तानी नागरिक आणि काही माजी ज्येष्ठ अधिकारी करू लागले आहेत. इंटरनेटवर सोशल मीडियाच्या […]
वेधक – पापड उद्योगाची यशस्वी उभारणी
>>अभय मिरजकर पापड, मसाले उद्योग म्हटले की, हा महिलांचा व्यवसाय आहे असे समजले जाते, परंतु मुंबईसारख्या मोठ्या शहरात एमबीएचे शिक्षण घेऊन लातूर येथे यशस्वी पापड उद्योगाची उभारणी करण्याचे धाडसाचे काम धिरज भनगिरे यांनी केले आहे. धिरज भनगिरे यांनी मुंबई विद्यापीठातून MBA (Marketing) ची पदवी घेतली. ‘ओम लॉजिस्टिक’ या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये 2016 मध्ये नोकरी करण्यास सुरुवात […]
>> दिव्या सौदागर कन्फ्युजन किंवा मनातला गोंधळ हे खूपदा इतरांच्या खिल्लीचे कारण ठरते, पण त्याचा मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर ही समस्या समुपदेशनाने वेळीच दूर सारणे आवश्यक आहे. नताशा (नाव बदलले आहे) तशी स्मार्ट होती. मात्र जे तिला जवळून ओळखायचे त्यांना तिचा स्मार्टनेस हा ओढून ताणून आणलेला आहे हे कळत होतं. कारण स्वतला सिद्ध […]
पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे
दाभाडे घराण्यात जन्मलेले खंडेराव दाभाडे यांच्याशी उमाबाईंचा विवाह झाला. पुण्यानजीक तळेगाव हे दाभाडे घराण्याचे वतनाचे गाव होते. खंडेराव हे मराठा साम्राज्याचे सरदार होते, त्यांच्या अनेक अतुलनीय कामगिरीनंतर त्यांना शाहू राजांकडून सेनापती घोषित केले गेले. पुढे परिस्थितीमुळे घराणे व वतन दोन्ही वाऱयावर आले. अशावेळी उमाबाई दाभाडे या मराठ्यांच्या पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. उमाबाईंच्या या निर्णयाला सगळ्यांचेच […]
मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी शिंदे गटाचे संजय घाडी यांचीदेखील बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची औपचारिक घोषणा 11 फेब्रुवारी रोजी पालिका सभागृहात करण्यात येणार आहे. महानगरपालिकेची निवडणूक महायुतीत लढल्यानंतर भाजपचे 89 तर शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून महापौर […]
विश्वचषकाचे समालोचन आता मराठी भाषेतून, मनसेच्या मागणीला यश
टी-20 विश्वचषक क्रिकेट सामन्यांचा आनंद आता माय मराठीत घेता येणार आहे. ‘जिओ हॉटस्टार’वर मराठी भाषेत समालोचनाचा पर्याय क्रिकेटप्रेमींना उपलब्ध झाला आहे. क्रिकेट सामन्यांचे समालोचन मराठी भाषेत व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठपुरावा केला होता. अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मुंबईतील हॉटस्टारच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. क्रिकेट सामन्यांचे समालोचन हिंदी, तामीळ, तेलगू, बंगाली भाषेत […]
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱया 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी 52 टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान ईव्हीएम बंद पडल्यामुळे काही ठिकाणी गोंधळ उडाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे आठ वर्षांच्या मुलाला घेऊन मतदान केंद्रात घुसले. अकलुजमध्ये एका उमेदवाराच्या लहान मुलाने चक्क ईव्हीएमचे बटन दाबून मतदान केले. पुणे […]
शैलगृहांच्या विश्वात –पितळखोरा येथील निसर्गरम्य शैलगृहे
>> डॉ. मंजिरी भालेराव manjirib24@gmail.com निसर्गसौंदर्याबरोबरच शिल्प आणि स्थापत्य यांचेही सौष्ठव जिथे उल्लेखनीय असते अशा ठिकाणांमध्ये पितळखोरा या स्थळाचे नाव प्रथम घेतले पाहिजे. गवताळा अभयारण्याच्या परिसरात असलेले हे ठिकाण म्हणजे धबधब्याच्या शेजारील खडकात दोन्ही बाजूला कोरलेल्या लेणी होत. शैलगृह म्हणजे डोंगरातील घर. सर्वसाधारणपणे डोंगरातील घर म्हटल्यावर आपण डोंगर चढून तिथे जायचे आहे असा विचार करतो, […]
तटरक्षक दलाची तेल तस्करांवर धडक कारवाई, तीन जहाजे पकडली, मुंबईजवळ भरसमुद्रात थरार
मुंबईजवळील समुद्रात आंतरराष्ट्रीय तेल तस्करी करणाऱया जहाजांवर भारतीय तटरक्षक दलाने धडक कारवाई करून जहाजे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या या तिन्ही जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल साठा होता. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा पर्दाफाशच झाला आहे. समुद्रात सुमारे 100 नॉटिकल मैलांवर पश्चिम दिशेला आलेल्या या अवाढव्य जहाजांबाबत संशय आल्याने केलेल्या चौकशीतून हा धक्कादायक प्रकार समोर […]
महाराष्ट्रात तीनवर्षांत साडेपाचशे सरकारी शाळा
>> संदेश सावंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा खटाटोप सुरू असतानाच महाराष्ट्रात मोठय़ा संख्येने सरकारी शाळा बंद पडत असल्याचे चित्र आहे. राज्यात महायुती सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षांत जवळपास साडेपाचशे सरकारी शाळांना टाळे लागल्याची माहिती युडायसच्या अहवालातून पुढे आली आहे. त्याचवेळी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात खासगी शाळांच्या संख्येत वाहोताना दिसत असून वर्षभरात शंभरपेक्षा जास्त शाळा […]
डिजिटल फसवणूक झाल्यास 25 हजारांची भरपाई, आरबीआयचा निर्णय
देशात डिजिटल व्यवहारांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत, मात्र छोटय़ा रकमेच्या डिजिटल फसवणुकीत झालेल्या नुकसानीसाठी ग्राहकांना 25 हजार रुपयांपर्यंत आरबीआयकडून भरपाई दिली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी तसे स्पष्ट केले असून फसवणूक झालेल्या ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. प्रस्तावित नुकसानभरपाई ही फक्त एकवेळ दिली जाणारी मदत […]
ईडीने नोंदवले 5158 गुन्हे, फक्त 43 प्रकरणे निकाली
मागील काही वर्षांत कमालीच्या सक्रिय झालेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सहा वर्षांत तब्बल 5158 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, आतापर्यंत त्यातील केवळ 43 प्रकरणे निकाली निघाली आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ईडीच्या कासवछाप कारभाराची कबुली दिली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला […]
लेख –बलुच संघर्षाचा निर्णायक अंक
>> प्रा. सतीश कुमार पाकिस्तान सध्या बलुच लिबरेशन आर्मीने पुकारलेल्या ‘ऑपरेशन हेरोफ 2.0’मुळे प्रचंड दबावाखाली आहे. भारतासाठी या घडामोडी चिंताजनक आहेत याचे कारण पाकिस्तान जेव्हा आदेशांतर्गत संकटात सापडतो, तेव्हा तो भारताकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतो. जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यानंतर काही आठवड्यातच पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. सध्या कश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे परिस्थिती कठीण असताना पाकिस्तान समर्थित दहशतवादी घुसखोरी […]
परीक्षण –आकांक्षेचे तेजस्वी प्रतीक
>> तृप्ती कुलकर्णी इतिहास आपल्याला खऱया अर्थाने फार कमी वेळा उमगतो हेच खरं. अनेकदा विशिष्ट घटना, काही निवडक व्यक्ती आणि त्यांच्या पराक्रमांचीच उजळणी होत राहते. मात्र त्या झगमगाटामागे आपले आयुष्य होरपळून गेलेले, न बोलता लढलेले आणि काळाच्या प्रवाहात गडप झालेले असंख्य चेहरे अंधारातच राहतात. 1857 च्या स्वातंत्र्यसमरातील कानपूरच्या तवायफ अजीजुनबाईच्या जीवनावर आधारित मिहाना प्रकाशनाची ऐतिहासिक […]
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षासाठी २०० जागा जिंकण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. शनिवारी डीएमके युथ विंगच्या परिषदेत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना या ध्येयासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री स्टालिन म्हणाले की, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण सर्व ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य […]
खेडमध्ये ईव्हीएम तांत्रिक बिघाड; मतदान प्रक्रियेत व्यत्यय
खेड तालुक्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात होताच ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. खेड तालुक्यातील निगडे येथील आदर्श मतदान केंद्र क्रमांक 15/10 येथे सकाळी मतदान सुरू होताच ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे तब्बल एक ते दीड तास मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबली. सकाळच्या वेळेत मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांचा यामुळे मोठा […]
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५५ टक्के मतदान, आता मतमोजणीची प्रतीक्षा
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी आणि ९ पंचायत समित्यांच्या १११ जागांसाठी आज शांततेत मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी १५० उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या १११ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत.एक जागा बिनविरोध झाली आहे. निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी आज कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १६२१ पोलीस अधिकारी आणि अमंलदार, १८५३ होमगार्ड,एसआरपीएफच्या दोन […]
एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्यावर देश विकला; संजय सिंह यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. अमेरिकेतील कुप्रसिद्ध एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर पंतप्रधानांनी आपला बचाव करण्यासाठी देशाला विकले, असा दावा संजय सिंह यांनी शनिवारी केला. X वर एक व्हिडीओ शेअर करत ते असं म्हणाले आहेत. संजय सिंह यांनी असा दावा केला की, […]
राजापुरात मतदान प्रक्रिया सुरळीत; सरासरी 50% मतदान
राजापूर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीच्या निवडणुकीला सरासरी ५० ते ५५ टक्के मतदान झाले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या तेरा आणि पंचायत समितीच्या ३२ अशा ४५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हिएम मशीन मध्ये बंदिस्त झाले. आता सोमवारी मतमोजणी होत असून त्यामध्ये कोण बाजी मारणार त्याची जोरदार उत्सुकता तालुकावासियांना लागून राहिली आहे. राजापूर तालुक्यात शनिवारी सकाळी 7.30 […]
देवगड तालुक्यात 57.12 % मतदान! 30353 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
देवगड तालुक्यातील ३ जिल्हा परिषद गट आणि ९ पंचायत समिती गणातील मतदानाला शनिवारी सकाळी ७.३० वाजता शांततेत सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण ५७.१२ % एवढे मतदान झाले .यात पुरुष मतदार १५६९७ व स्त्रिया मतदार १४६५५ व इतर १ एकूण ३०३५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. पहिल्या दोन तासात मतदानाची टक्केवारी ११.५३ %एवढी होती. त्यानंतरच्या पुढील […]
लग्न मंडपातून थेट मतदान केंद्रात; नववधूचा घातला मतदानाचा आदर्श
संगमेश्वर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परचुरी गावात लोकशाहीप्रती जागरूकतेचे प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. परचुरी येथील प्रियंका भार्गव वेल्ये हिचा विवाह रुपेश खाडे यांच्याशी संपन्न झाला. विवाह सोहळा झाल्यानंतर नववधू प्रियंका वेल्ये हिने थेट मतदान केंद्र गाठत आपला मतदानाचा हक्क बजावला. परचुरी शाळा क्रमांक ३ येथील मतदान केंद्रावर जाऊन तिने मतदान केले. लग्नाच्या […]
वयाची नव्वदी पार करूनही जिद्दीने केले मतदान! लक्ष्मण पंडू मुदगल यांचे कौतुक
संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गावातील ९२ वर्षीय लक्ष्मण पंडू मुदगल यांचा चेहरा शांत, पण डोळ्यांत आत्मविश्वास भरलेला होता. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या जेष्ठ नागरिकांना चालण्यात गंभीर अडचणी आहेत; आधाराशिवाय उभे राहणेही कठीण. तरीही, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दिवशी त्यांनी ठरवले की, आपला मतदान हक्क बजावणे सोडणार नाही. व्हीलचेअरवर बसून, नातेवाईक आणि मतदान केंद्रातील सहाय्यक […]
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर विरोधकांनी तीव्र हल्ला चढवला आहे. या कराराबाबत माहिती देण्याची मागणी जोर धरू लागल्यावर केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मात्र, रशियाकडून तेल खरेदी बंद करणार का? असा सवाल विचारल्यावर त्यांनी चेंडू परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे टोलवला आहे. त्यावर एस. जयशंकर यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे सांगितले. […]
जिल्ह्यात 65 टक्के मतदान होण्याच्या प्राथमिक अंदाज
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीपासूनच या निवडणुकीत मतदारांचा अपेक्षेइतका उत्साह दिसून आला नाही. मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसून आले. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 50 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाला वेग येवून 65 ते 70 टक्क्यापर्यंत मतदान होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुकानिहाय मतदानाची स्थिती पाहता, भूम तालुक्यात एकूण 55331 मतदारांनी मतदान केले असून तेथील मतदानाची टक्केवारी 54.18 इतकी आहे. वाशी तालुक्यात दुपारी दीड वाजेपर्यंत 34326 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 51.53 नोंदवली गेली आहे. कळंब तालुक्यात 82763 मतदारांनी मतदान केले असून तेथील मतदानाची टक्केवारी 50.77 इतकी आहे. धाराशिव तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले असून एकूण 118463 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. मात्र, मतदारसंख्या मोठी असल्याने तेथील मतदानाची टक्केवारी 47.41 इतकीच राहिली आहे. परंडा तालुक्यात 56665 मतदान झाले असून टक्केवारी 52.83 इतकी नोंदवली गेली आहे. तुळजापूर तालुक्यात सकाळपासूनच मतदानाचा उत्साह तुलनेने अधिक दिसून आला. येथे एकूण 99863 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 51.24 इतकी आहे. लोहारा तालुक्यात 41753 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 46.71 आहे. उमरगा तालुक्यात 84563 इतके मतदान झाले असून तेथील टक्केवारी 48.97 इतकी नोंदवली गेली आहे. जिल्हा पातळीवर एकूण 5 लाख 73 हजार 727 मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये 2 लाख 96 हजार 84 पुरुष मतदारांचा तर 2 लाख 77 हजार 41 महिला मतदारांचा समावेश आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 50 टक्के इतकी आहे. दरम्यान, मतदानासाठी अखेरचे दोन तास शिल्लक असून या वेळेत मतदानाला गती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. आता अंतिम दोन तासांत मतदारांचा प्रतिसाद किती वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दिनांक 07.02.2026 रोजी जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोकर, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी मेघना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे यांनी धाराशिव तालुक्यातील मौजे शेकापूर येथील हरीत धाराशिव, पिकं बुथ या संकल्पनेतून साकारलेल्या आदर्श मतदान केंद्रास व मौजे सांजा येथील महिला मतदान केंद्रास भेट देऊन निरीक्षण केले व मतदाराशी संवाद साधला.
खळबळजनक खुलासा; जेफ्री एपस्टीन होता इस्रायलचा गुप्तहेर? FBI च्या कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनबाबत (Jeffrey Epstein) पुन्हा एकदा जगभरात खळबळ माजली आहे. नुकत्याच सार्वजनिक झालेल्या २०२० च्या एका ‘एफबीआय’ (FBI) कागदपत्रातून असा दावा करण्यात आला आहे की, एपस्टीनचे इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’शी (Mossad) जवळचे संबंध होते आणि त्याला खास हेरगिरीसाठी तयार करण्यात आले होते. एफबीआयच्या अहवालानुसार, एका गुप्त स्रोताने माहिती दिली होती की, एपस्टीन […]
Mega Block News –मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; अनेक फेऱ्या रद्द
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर पायाभूत सुविधांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (८ फेब्रुवारी २०२६) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या ब्लॉकच्या काळात काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी योची दखल घेत प्रवासाचे नियोजन करावे, […]
ईव्हीएम मशीन फोडली, एकावर गुन्हा नोंद
भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील विजोरा येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असताना सकाळी सुमारे 7:40 वाजता टेबलवरील मतदान मशीन खाली आपटून मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा आणून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तालुक्यातील विजोरा येथे एका जणांच्या विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मतदान केंद्रावर दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान मशीनचे प्रात्यक्षिक ठरलेल्या वेळेप्रमाणे घेऊन सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यावेळी विजोरा येथील महादेव कोंडीबा जाधव हे सकाळी 7:40 वाजता मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता त्यांनी मला मतदान मशीनचे प्रात्यक्षिक पुन्हा दाखवा माझा मतदान मशीनवर विश्वास नाही असे म्हणत प्रात्यक्षिक पुन्हा दाखवण्याची मागणी केली. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष नेताजी शिंदे यांनी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवता येणार नाही. तुम्ही मतदान करून जाऊ शकता असे सांगितले. यावेळी महादेव जाधव यांनी चिडून मतदान मशीन टेबलवरून खाली जोरात आपटली. यामुळे मतदान प्रक्रियेत बाधा येऊन शासकीय कामात अडथळा आणला असल्याची तक्रार मतदान केंद्राध्यक्ष नेताजी नेताजी शिंदे यांनी वाशी पोलिसांना दिल्यावरुन महादेव जाधव यांचे विरोधात मतदान प्रक्रियेत अडथळा आणणे व शासकीय कामात अडथळा आणणे या कलमाखाली गुन्हा नोंद केला असून पोहेका बाळासाहेब औताडे हे पुढील तपास करत आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान काही मतदारांनी मतदान केंद्रात मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध केलेला आहे. त्यानुसार आज वाशी पोलिसांच्या पथकाने 90 मोबाईल जप्त केलेले आहेत. सदरील मोबाईल हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत अशी माहिती वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी दिली आहे.
नरेंद्र मोदींनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले; हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावरून काँग्रेसची कडाडून टीका
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले असून, हा करार म्हणजे हिंदुस्थानच्या आत्मसन्मानाशी केलेली तडजोड आहे,” अशी टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते असे म्हणाले आहेत. पवन खेरा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, “नरेंद्र मोदींनी हिंदुस्थानची अर्थव्यवस्था, शेती आणि आपले राष्ट्रीय हित एका ताटात वाढून […]
Sangli News : बलगवडे गावाचा मतदानावर बहिष्कार; मतदान न करण्याचा ठाम निर्णय, नेमकं घडलं काय?
बलगवडे ग्रामस्थांचा मतदान बहिष्कार सांगली : तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे २० हजार झाडांची तोड करून २१ एकर क्षेत्रावर आवादा कंपनीचा सोलर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पास संपूर्ण ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून, [...]
शून्य मोठा की १८? हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावर अखिलेश यादवांची मोदी सरकारवर टीका
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या व्यापार कराराच्या (Trade Deal) मुद्द्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या करारावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हा करार पूर्णपणे एकतर्फी असून हिंदुस्थानने अमेरिकेसमोर आपल्या हितांची शरणागती पत्करल्याचा गंभीर आरोप यादव यांनी केला आहे. विशेषतः आयात-निर्यात शुल्कामध्ये (टॅरिफ) असलेल्या तफावतीवरून त्यांनी भाजप […]
सलग दुसऱ्या आठवड्यात फटाका उद्योगात स्फोट
भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील तेरखेडा हे गाव फटाका उद्योगासाठी गाजलेले असून या ठिकाणी तेरखेडा गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये फटाके बनवण्याचे कारखाने उभारलेले असून सध्या ते जोमात सुरू असून या कारखान्यात अधून मधून स्पोट होत आहेत. या स्फोटामुळे अनेकांना आपले जीवन गमवावे लागले आहेत तर अनेकांना गंभीर जखमा होऊन अपंगत्व आलेले आहे असे असतानाही संबंधित फटाका बनवणाऱ्या कारखाना मालकाकडून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात नसल्याने सतत होणाऱ्या स्फोटातून दिसून येत आहे. दि. 31 जानेवारी रोजी तेरखेडा बावी रस्त्यावरील खामकरवाडी शिवारातील फटाका कारखान्यात प्रचंड मोठा स्पोट झाला होता. त्याचा अहवाल अद्याप पर्यंत आलेला नसताच आज दि. 6 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील गोजवाडा शिवाराततील फटाका कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट झालेला आहे. यामध्ये फटाका कारखान्याचे शेड पूर्णपणे उध्वस्त झालेले असून यामध्ये कसलीही जीवित हानी झालेली नसल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. तालुक्यातील बोरी फाटा ते गोजवडा रोडवरील गोजवाडा शिवारातील गट क्रमांक 561 मध्ये सुरू असलेल्या बालाजी उकरंडे रा. तेरखेडा यांचे बालाजी फायर वर्क या कारखान्यात दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास कच्चा माल ठेवलेल्या ठिकाणी स्फोट झाला. या ठिकाणी 40 किलोपेक्षा जास्त मिक्स केलेली स्फोटकाची दारू आढळून आलेली असून स्पोट झालेल्या कारखान्यात कोणीही जखमी अथवा मयत झाले नसल्याचा जबाब परवानाधारक यांच्या वडिलांनी दिला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप तरी समजू शकले नाही. तथापि उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांचे पथक घटनास्थळी येत असून ते अधिक सविस्तर चौकशी करणार आहेत. दरम्यान 31 जानेवारी रोजी झालेल्या स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसून धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी वाशीचे तहसीलदार यांना स्फोट नेमका कशामुळे झाला याची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास कळविण्याचे आदेश दिलेले आहेत. याबाबत वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांना विचारणा केली असता उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांचे पथक घटनास्थळी जाऊन चौकशी करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयास देणार असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदरील अहवाल जिल्हाधिकारी यांना देणार असल्याचे सांगितले. सतत होत असलेल्या स्फोटामुळे फटाका कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे जीवितास धोका निर्माण होत असून फटाक्या कारखान्याकडून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे यावरून दिसून येत आहे औद्योगिक सुरक्षा संचलनालयाकडून सदरील कारखान्यांना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची गरज असल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.
९० वर्षांच्या आजींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क
कोथळीतील 91 वर्षीय सुमनबाई आजीने दाखवली मतदानाची प्रेरणा धाराशिव उमरगा : उमरगा तालुक्यातील कोथळी येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान लोकशाहीचा खरा उत्साह पाहायला मिळाला. वाढत्या वयाची तमा न बाळगता, कोथळी येथील ९१ वर्षीय आजी सुमनबाई नेमीनाथ गुरव [...]
104 वर्षीय सयदाबी बाबन पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क; उमरग्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरग्यात 104 वर्षांच्या सयदाबीने दाखवली मतदानाची प्रेरणा धाराशिव उमरगा : नऊ वर्षांनंतर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होत असून, उमरगा तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. उमरगा तालुक्यातील तुरोरी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या दाबका मतदान केंद्रावर [...]
Satara News : आधी मतदान, मगच लग्न”; फलटणच्या सोनवडीतील नववधूने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
फलटणच्या सोनवडीतील मतदानातील नववधूचा आदर्श फलटण : आज ऋतुजा क्षीरसागर या नववधूचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असतानाच, लोकशाहीप्रती तिच्या कर्तव्यभावनेचे प्रेरणादायी दर्शन घडले. विवाह मंडपात जाण्यापूर्वी ऋतुजा हिने फलटण तालुक्यातील सोनवडी येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून [...]

30 C