पुनाचा-इसोरा जोडी ऑस्ट्रेलियन ओपनमधून पहिल्याच फेरीत पराभूत
वृत्तसंस्था / मेलबर्न भारताचा निक्की पुनाचा आणि त्याचा थाई जोडीदार प्रुचिया इसारो यांना ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरूष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पेड्रो मार्टिनेझ आणि जॉम मुनार यांच्याकडून अटितटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. भारत-थायलंडच्या वाईल्ड कार्ड जोडीला 1 तास आणि 51 मिनिटांत स्पॅनिश जोडीकडून 6-7 (3), 5-7 असा पराभव पत्करावा लागला. दोन्ही जोड्यांमध्ये फारसा [...]
सुझलॉन 2.0; विस्तार करण्याच्या तयारीत
एआय देखील फायदेशीर ठरण्याचे संकेत नवी दिल्ली : सुझलॉनने आपला प्रवास सुरू केला तेव्हा पवन ऊर्जा हा एक व्यवहार्य पर्याय मानला जात नव्हता. आज परिस्थिती पूर्णपणे उलट आहे आणि भारताच्या सुमारे 50 टक्के ऊर्जेच्या गरजा अक्षय स्रोतांमधून पूर्ण केल्या जात आहेत. त्यांनी सांगितले की, देश 2070 पर्यंत 100 टक्के कार्बन न्यूट्रल होण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत [...]
मनुष्य देहावर प्रेम करत असल्यामुळे त्याला आत्मज्ञानाचा विसर पडतो
अध्याय चौथा भगवंत अर्जुनाला म्हणाले, मागील अध्यायात तुला सांगितलेला कर्मयोग हा जुनाच आहे. ह्या अविनाशी कर्मयोगाची परंपरा तुला थोडक्यात सांगतो. हा कर्मयोग सृष्टीच्या आरंभी मी सूर्याला सांगितला, सूर्याने तो मनूला सांगितला आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला. परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षीनी जाणला परंतु काळ जसजसा पुढे सरकला तसतसे कर्मयोगाचे महात्म्य कमी होऊन [...]
डेटवर जाण्यासाठी पैसे देते सरकार
रेस्टॉरंट-सिनेमाला जाणे फ्री : विवाह निश्चित होताच मिळतात 25 लाख सध्या दक्षिण कोरिया अजब स्थितीला सामोरा जातोय. देशाचा विकास होत असला तरीही लोक स्वत:च्या कामात इतके व्यग्र झाले आहेत की त्यांच्याकडे वैयक्तिक नातेसंबंधांसाठी वेळच नाही. सकाळी उठल्यावर लोक थेट ऑफिसला जातात, यानंतर दिवसभराचे काम आणि मग संध्याकाळी आराम. कुठलीच डेटिंग लाइफ नाही आणि कुणी याच्या [...]
आयएनएस सुदर्शिनी जागतिक प्रवासाला रवाना
13 देशांमधील 18 बंदरांना भेट देणार ► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय नौदलाचे प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शिनीने 10 महिन्यांच्या सागरी प्रवासाला सुरुवात केली आहे. 22,000 नॉटिकल मैलांचा प्रवास करत 13 देशांमधील 18 बंदरांना भेट दिली आहे. दक्षिण नौदल कमांडचे (एसएनसी)फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल समीर सक्सेना यांनी मंगळवारी कोची नौदल तळावरून आयएनएस सुदर्शिनीला हिरवा झेंडा दाखवला. [...]
गुन्हे नोंदणीची नवी व्यवस्था लागू करणार तेलंगणा पोलीस
पीडितांचा जबाब घरीच नोंद होणार वृत्तसंस्था/ हैदराबाद तेलंगणात कायदा-सुव्यवस्थेला सुलभ आणि नागरिकांसाठी सोपे करण्यासाठी नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे. यात गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी नागरिक केंद्रीत व्यवस्था सुरू केली जाणार आहे. काही खास प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये एफआयआर नोंद करून पीडितांचा जबाब त्याच्या घरी किंवा पसंतीच्या ठिकाणी नोंद करण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेच्या अंतर्गत अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण [...]
शहरापर्यंत जाण्यासाठी नाही निर्मिला रस्ता एंडीज पर्वतरांगेच्या दुर्गम उंचीवर सेवेल नावाचे शहर वसलेले असून ते इंजिनियरिंगचे उदाहरण आहे. परंतु हे शहर आता पूर्णपणे निर्जन आहे. पण याच्या शांत भिंती त्या काळातील साक्षीदार आहेत, जेव्हा येथे लोकांची वस्ती असायची. लोकांचा गजबजाट असायचा आणि कुठल्याही वाहन किंवा रस्त्याशिवाय हे शहर जगाला तांबे पुरवत होते. चिलीच्या माचाली भागात [...]
चिंबलवासियांच्या लढ्यात सरकारचे अन् गोव्याचे हित
तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावात उभारण्यात येणाऱ्या ‘युनिटी मॉल’ व ‘प्रशासन स्तंभ’ या दोन प्रकल्पांना तेथील ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. जेव्हा या प्रस्तावित प्रकल्पांची घोषणा करण्यात आली तेव्हापासूनचा हा विरोध असून सध्या कदंब पठारावर भूमिपुत्र गोविंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले चिंबलवासियांचे उपोषण हे आज सलग 26 दिवसांचे झाले आहे. हे दोन्ही प्रकल्प सरकारी आहेत. मात्र [...]
लक्ष्य सेन, श्रीकांत, सिंधूची आगेकूच
वृत्तसंस्था/ जकार्ता (इंडोनेशिया), भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि पीव्ही सिंधू यांनी इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.किदाम्बी श्रीकांत आणि कोकी वातानाबे यांच्यातील सामन्यात, भारतीय बॅडमिंटन स्टारने एक तास 12 मिनिटांच्या लढतीत 21-15, 21-23, 24-22 असा विजय मिळविला. लक्ष्य सेननेही तैवानच्या वांग त्झू-वेईला तीन गेममध्ये हरवून आगेकूच केली. सेनने पहिला सेट 21-13 [...]
न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल नंबर 1!
विराट कोहलीने गमावले अव्वलस्थान,रोहितचीही घसरण : टॉप 10 मध्ये भारताचे पाच फलंदाज वृत्तसंस्था/ मुंबई टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला अवघ्या एका आठवडाभरात आयसीसी वनडे क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत दमदार फलंदाजी करत कोहलीने नंबर वनची खुर्ची पटकावली होती. मात्र, आता न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिशेलने इतिहास रचत थेट अव्वल स्थानावर [...]
आजचे भविष्य गुरुवार दि. 22 जानेवारी 2026
मेष: द्वेषपूर्ण दोष काढून टाकून समरसून जाणारी मैत्री अंगी बाणा वृषभ: वर्तमानस्थितीत राहिल्याने बऱ्याच समस्या सुटू शकतात मिथुन: मानसिक स्थितीला धक्का देऊ नका. कुटुंबियांशी संवाद साधा कर्क: योग्य बचत करण्यात यश, कामाच्या ठिकाणी बदल होईल सिंह: ज्या नात्याला महत्व देता ते आपल्याला सांभाळावे लागेल कन्या: कुटुंब आपल्याकडून जरूरीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवेल तुळ: करमणुकीवर खर्च कराल, [...]
महापौर पदासाठी आज सोडत! ओबीसी, एससी, एसटी, महिला की सर्वसाधारण…उत्सुकता आणि धाकधूक
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता आपल्या शहराचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरारसह राज्यातल्या 29 महापालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवार, 22 जानेवारी रोजी सोडत काढली जाणार आहे. ओबीसी, एससी, एसटी, महिला की सर्वसाधरण गटाचे आरक्षण जाहीर होणार याच्या उत्सुकतेबरोबर महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या नगरसेवकांची धाकधूक […]
शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर, कोकण विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी
शिवसेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगरपालिका शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर पेडणेकर यांनी कोकण भवन येथे शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तांकडे अधिकृत शिवसेना पक्षाच्या गटाची नोंदणी केली. मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत निवडून आलेल्या प्रत्येक पक्षाला आपल्या […]
शिवसेना, धनुष्यबाण सुनावणी पुन्हा पुढे ढकलली
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ सुरूच असून आज पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कोर्टानेच दोन दिवसांची तारीख, पाच तासांचा वेळ आणि त्या वेळेचे पक्षकारांसाठी विभाजन असे सुनावणीचे शेडय़ुल निश्चित केले होते. मात्र आज शिवसेनेचे प्रकरण तातडीने सुनावणीसाठी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. वकिलांनी आग्रही विनंती करताच न्यायालयाने चार आठवड्यांनंतर […]
सामना अग्रलेख – ‘विकास’ जन्मायचा आहे!
जर्मनीलाही मागे टाकून भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी बढाई केंद्रीय सरकार मारत असते. मोदी राजवटीत देशाचा कसा विकास झाला, याचे ढोल या सरकारचे स्तुतीपाठक कायम बडवत असतात. मात्र उत्तराखंडातील एका शहीद जवानाच्या गावाने विकासाचा हा ढोल किती फाटका आहे, हे जगासमोर आणले. शहीद गजेंद्रसिंह यांच्या गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांचे पार्थिव घरापर्यंत […]
लेख –कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबर भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची
>> विजय पांढरीपांडे आजच्या जगात या नव्याने आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेला इमोशनल इंटेलिजन्सची साथ अत्यावश्यक आहे. हा एकत्र प्रवास अधिक सुखदायी ठरण्याची शक्यता आहे. यावर बरेच काम चालू आहे.अशा नव्या संकल्पना सुरुवातीला नवी आव्हाने घेऊनच सामोऱया येतात. त्यांचा स्वीकार करण्याआधी सर्वांगाने विचार करणे ही आपली नैतिक विवेकी जबाबदारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारताना स्वतःची बुद्धमत्ता गहाण ठेवणे, […]
आभाळमाया –ग्रहांची ‘वाकुडी’ चाल?
>> वैश्विक आमच्या खगोल कार्यक्रमांमध्ये कधीकधी गंमतीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. एका अशाच चर्चासत्रात कोणीतरी प्रश्न केला की, ग्रह वक्री होतात म्हणजे काय? योग्य उत्तर दिले जात असतानाच एकाने म्हटले की, ‘आम्ही तर समजत होतो की ग्रह वक्री झाला म्हणजे तो उलट दिशेने चालू लागला आणि आकाशात दिसतंही तसंच, नाहीतर आधी सिंह राशीत असणारा ग्रह […]
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण मर्यादेचा पेच कायम राहिला आहे. 27 टक्के ओबीसी आरक्षणामुळे 20 जिल्हा परिषदा आणि 200 हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. या आरक्षण मर्यादा उल्लंघनाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेऊन स्पष्ट निर्देश देईल आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा होती. मात्र […]
जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांची प्रकृती बिघडली असून, त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. बुधवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता. दुसरीकडे प्रशासनाने उपोषण बेदखल केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. ईव्हीएमच्या विरोधात कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]
इंधन वाहून नेणाऱया टँकर्सचे वाढते अपघात व गॅसगळतीच्या घटनांमुळे चेंबूरमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील बहुतेक अपघातांना बी. डी. पाटील मार्गालगत रेल्वेच्या जागेत होणारी अवजड वाहनांची पार्किंग कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे ही पार्किंग त्वरित येथून हटवण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. बुधवारी एका एलपीजी टँकरला झालेल्या अपघातामुळे व गॅस गळतीच्या घटनेमुळे […]
हवाई दलाच्या विमानाचे तलावात इमर्जन्सी लँडिंग
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये हवाई दलाच्या एका विमानाचे तलावात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू असताना हा प्रकार घडला. या विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात दिले आहेत. हिंदुस्थानी हवाई दलाने यासंदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. ’अपघातग्रस्त विमानाने दुपारी सवाबाराच्या सुमारास हवाई दलाच्या बामरौली तळावरून सरावासाठी नियमित उड्डाण भरले. अचानक […]
मुंबईतील राहणीमान आणि भाडे परवडत नसल्याने हैदराबाद येथे स्थलांतरित होण्याची परवानगी मागणाऱया कवी वरवरा राव यांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला. तपास यंत्रणेच्या विरोधानंतर न्यायालयाने वरवरा राव यांची हैदराबाद येथे स्थलांतरित होण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली. भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषदप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले वरवरा राव मुंबईत राहतात. याच प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा […]
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक उपक्रम
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त शिवसेनेसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने राज्यभरात रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खार येथे रक्तदान शिबीर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्र. 94 च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. […]
इननोवर्टन टेक्नॉलॉजीजने Classview.AI केलं लॉन्च
इननोवर्टन टेक्नॉलॉजीजने Classview.AI या एआय आधारित क्लासरूम इंटेलिजन्स इंजिनच्या लॉन्चची घोषणा केली आहे. शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची आणि दीर्घकाळापासूनची समस्या म्हणजे वर्गखोल्यांमध्ये प्रत्यक्षात काय घडते याबाबत मर्यादित आणि अविश्वसनीय माहिती मिळवणं आहे. Classview.AI या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो, अशी माहिती कंपनीने दिली आहे. शाळांनी शिक्षक प्रशिक्षण, मूल्यमापन आणि बाह्य ऑडिट्स यावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक […]
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्यातील काँग्रेस पक्षामध्ये मोठा स्फोट झाला आहे. तिकीट वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज दुपारी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या फुलंब्री येथील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली असून निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची मोठी नामुष्की झाली आहे. […]
लोकशाहीचे रुपांतर हळूहळू हुकूमशाहीत होतंय, भास्कर जाधव यांची सरकारवर टीका
लोकशाहीचे रुपांतर हळूहळू हुकूमशाहीत होतंय, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर केली आहे. निवडून आलेल्या उमेदवाराला विकत घेण्याची प्रथा सुरू झाली आहे, असंही ते म्हणाले आहेत. चिपळूणमध्ये जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यापूर्वी भास्कर जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भास्कर जाधव म्हणाले आहेत की, […]
निरोगी यकृतासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा, जाणून घ्या
यकृत हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यकृत आपले आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यकृत तीन मुख्य कार्ये करते – रक्त स्वच्छ करते, ऊर्जा साठवते आणि शरीराचे संसर्गापासून संरक्षण करते. यकृताची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे कारण त्याच्या आरोग्याचा आपल्या एकूण आरोग्यावर थेट परिणाम होतो. योग्य फळे खाणे यकृत निरोगी ठेवण्यात मोठी भूमिका […]
मेथीदाणे केसांच्या पोषणासाठी कशाप्रकारे उपयुक्त ठरतात, जाणून घ्या
हिवाळ्यामध्ये आपली त्वचा रुक्ष झाल्याने, कोंडा वाढण्यास सुरुवात होते. हिवाळ्यामध्ये केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण खूप वाढते. केसात होणारा कोंडा ही समस्या आता साधी राहिली नाही. केसात कोंडा झाल्यामुळे, आपले केस गळण्यास सुरुवात होते. कोंड्यामुळे केसांचा पोतही बिघडतो. आपल्यापैकी प्रत्येकीला काळेभोर केस हवे असतात. परंतु काळ्याभोर लांबसडक केसांसाठी आपल्या डोक्याला नियमितपणे मालिश करणे खूप गरजेचे आहे. […]
Photo –अभ्यास तोपची…नाशिकच्या देवळालीत धडाडल्या आर्टिलरी गन्स
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 21 जानेवारी रोजी नाशिकमधील देवळाली येथील संयुक्त अग्नि शक्ति अभ्यास स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये अग्नि शक्ति प्रदर्शनाचा ‘अभ्यास तोपची’ हा वार्षिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाला वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे कमांडंर लेफ्टनंट जनरल मनीष एरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या […]
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येतो. मात्र अनेकवेळा बंदोबस्तांवरील पोलीस अंमलदार जागेवर उपस्थित नसतात. अशा टंगळमंगळ करणाऱ्या अंमलदारांवर आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ए ‘आय’ वरून नजर राहणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बंदोबस्त ॲप तयार केले आहे. या ॲपवरून बंदोबस्त लावला जाणार आहे.बंदोबस्ताच्या ठिकाणावरून पोलीस […]
काही तासांत पाकिस्तानला उद्ध्वस्त करू आणि …’, हवाई दल प्रमुखांचा इशारा
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाला शौर्य आणि सामर्थ्यांचे दर्शन घडवण्यासाठी सुरू असलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. हिंदुस्थानी सेना, नौदल आणि हवाई दलाची जय्यत तयारी सुरू असताना हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी बुधवारी सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या नवीन स्वरूपाबद्दल भाष्य केले. हवाई दलाच्या वाढत्या ताकदीचा आणि हिंदुस्थानला मिळालेल्या यशाचा उल्लेख करत त्यांनी […]
राजस्थानमध्ये SIR वरून वाद; BLOवर नावे काढून टाकण्यासाठी भाजपचा दबाव, काँग्रेसचा आरोप
राजस्थानमध्ये एसआयआर प्रक्रियेवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत की, भाजप बीएलओवर (Booth Level Officer) दबाव टाकून काँग्रेस समर्थक मतदारांचे नाव मतदार यादीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांनी जयपुर येथे पत्रकार परिषदेत हे आरोप केले. त्यांनी सांगितले […]
Solapur News : उत्तर माढा अंबाडमध्ये रात्रीचा भीषण अपघात, १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
टेभूर्णी-कुहुवाडी रोडवर अपघात उत्तर माढा : उत्तर माढा तालुक्यातील अंबाड येथे १९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडलेल्या अपघातात प्रदेशातील अलापूर फुलई, मल्लावा तालुका, हरदोई जिल्ह्यातील १६ वर्षीय अजय आत्मज गुल्ला याचा मृत्यू झाला. पिंपळनेरशिवारात टेभूर्णी-कुहुवाडी रोडवर आरोडी हॉटेलजवळ [...]
Solapur News : सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु
सोलापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनाची दुरुस्ती युध्दपातळीवर सोलापूर : मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यानंतर जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य सभापती यांची निवड होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पदाधिकारी यांच्यासाठी राखीव असलेल्या दालनांची दुरुस्ती [...]
Solapur Politics : कार्यकर्त्यांसाठी झेडपी निवडणूक काँग्रेस लढविणार : खा. प्रणिती शिंदे
काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी सोलापूर : महापालिका निवडणुकीत भाजपला यश आले. या निवडणुकीत सत्तेचा व बळाचा वापर भाजपने केला. मात्र ग्रामीण भागात सत्ताधारी यांच्याविरोधात रोष आहे. कार्यकर्त्यांची ही निवडणूक असल्याने काँग्रेस जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती खा. [...]
दहशत, दमबाजी, पैश्याचा गैरवापर त्यामुळे निवडणुकीचे स्वरूप बदलले- बाळासाहेब थोरात
धाराशिव (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणुकीमध्ये 70 जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकीचे स्वरूप बदलले आहे. दमबाजी, दहशत, पैश्याचा गैरवापर यामुळे निवडणुका निकोप वातावरणात होत नाहीत. अशा वातावरणामध्ये काँग्रेस पक्षाने मिळविलेले यश हे विचारावर निरोगीपणे मिळविल्याचे मत माजी महसूलमंत्री व काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता बुधवार, दि. 21 जानेवारी रोजी सकाळी त्यांनी हॉटेल किंग्ज गार्डन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी धाराशिव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, नगर परिषदेचे माजी गटनेते खलील सय्यद, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहर काँग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर विलास शाळू, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, अभिषेक बागल, अक्षय जोगदंड, जयसिंग पवार, मन्सुर सय्यद, सरफराज काझी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पहिल्या काळात ज्याप्रमाणे काँग्रेसने निरोगी वातावरणात निवडणुका घेतल्या त्याच वातावरणात विरोधीपक्षही निरोगी पध्दतीनेच वागला. मागील अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची मोठी घसरण दिसून आली. याला इव्हीएम मशीनवरील मतदान हेच कारण आहे. त्यामुळे आता जनतेतही संभ्रम निर्माण झाला आहे. तांदुळवाडी येथे काही तरूणांनी इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागणीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली असल्याचे सांगून काँग्रेस पक्षाची विचारधारा ही लोकशाहीला पूरक आहे. पण जाती-पातीचे राजकारण करून सत्ताधारी पक्ष लोकशाहीला बाधक असे राजकारण करत असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबिल याबाबत केंद्र व राज्यातील सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. शेतकरी आणि सर्वसामान्य व्यावसायिक, जनतेच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विचारधारेला मानणाऱ्या समविचारी पक्षांना सोबत घेवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Solapur News : माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा उद्या पंढरपूर दौरा
माजी पंतप्रधान देवेगौडा उद्या पंढरपुरात सोलापूर : देशाचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे गुरुवार २२ जानेवारी रोजी पंढरपुरात येत आहेत. या दिवशी ते भीमा नदीत स्नान करुन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. गुरुवारी सकाळी साठेआठ वाजता बेंगलूर विमानतळावरुन [...]
Karad News : गिटार माशाची धिंड काढणे आले अंगलट ; दोघांविरोधात गुन्हा दाखल
संरक्षित बो-माऊथ गिटार मासा टेम्पोवर फिरवला सातारा : सातारा शहरात एका टेम्पोमधून बो-माऊब ‘गिटार’ मासा उघड्यावर फिरवण्यात आला. उपहुंचावर फिरवलेला मासा आता जनतेच्या ताटात? या मथळ्याखाली ‘तरुण भारत मध्ये आतमी थी वन विभागाने कारवाई करत कराह व सातारा [...]
ओटवणे:प्रतिनिधी माडखोल धवडकी येथील रहिवाशी सुशिला गंगाराम चिले (८४) यांचे मंगळवारी २० जानेवारी रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत चिले कुटुंबीयांचे सांत्वन केले. बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे निवृत्त वाहन चालक [...]
दररोज मेकअप करणे आपल्या त्वचेसाठी कसे धोकादायक ठरते, वाचा
आजकाल, मेकअप अनेकांच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनला आहे. विशेषतः महिलांना मेकअपचे खूप वेड लागले आहे. चांगला मेकअप केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच वाढवत नाही तर, सुंदर लूक देखील देतो. दररोज मेकअप करणे हे अजिबात सोपे काम नाही. झोपण्यापूर्वी मेकअप योग्यरित्या काढणे आवश्यक आहे. हिवाळ्यात चेहऱ्यासाठी कोणते मास्क गरजेचे आहेत, जाणून घ्या मेकअप उत्पादनांमध्ये अशी रसायने असतात […]
Satara Weather |कृष्णाकाठ थंडीमुळे पुन्हा गारठला
कराड शहरात थंडीमुळे जीम आणि क्रीडांगण रिकामे कार्वे : अलिकडे धकाधकीच्या काळात व्यायामाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे व्यायामाकडे सर्वांचाच कल वाढत चालला आहे. शहरी भागात मॉर्निंग वॉकबरोबरच, व्यायामशाळेत व्यायाम करणारांची संख्या मोठी दिसते. मात्र सध्या कराड शहरासह ग्रामीण परिसरातही गारठा फारच वाढल्याने अनेकांनी व्यायामाकडे [...]
Satara News : महाबळेश्वर-सातारा रस्त्यावर क्रेटा कार पलटी; प्रवासी किरकोळ जखमी
महाबळेश्वर-केळघर रस्ता अपघातासाठी धोकादायक केळघर : महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील आसनी गावच्या हद्दीत रामजीबुवा पुलाचे नव्याने काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे कार पलटी झाली. यामध्ये प्रवासी किरकोळ जखमी झाले.आसनी हद्दीतील जुना रामजीबुवा पूल नुकताच पाडण्यात आला [...]
Karad News : ‘या’कारणामुळे कराड पालिकेच्या ३५ कर्मचाऱ्यांना नोटीस
कराड शहरात पालिकेसह अधिकारी-राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू कराड : येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसवेकपदाच्या निवडीवेळी माजी मंत्र्यांची भेट घेऊन माजी उपाध्यक्षांना स्वीकृत नगरसवेकपद द्यावे, अशी शिफारस पालिकेतील कर्मचाऱ्यांनी केली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्यानंतर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना [...]
महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एमआयएम, गद्दारांना कोणतीही मदत होईल, अशी भूमिका घेणार नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना संजय राऊत असं म्हणाले आहेत. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “आमची […]
Satara News : कोरेगाव वगळता सातारा जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसले
भाजपचे उमेदवार सातारा तालुक्यातील पंचायत समितीत अर्ज दाखल सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघ वगळता भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सातारा तालुक्यातील भाजपच्या उमेदवारांचा उमेदवारी [...]
Sangli News : सांगलीतील औद्योगिक वसाहतीत पाण्याच्या टाकीवरून पडून गुन्हेगाराचा मृत्यू
सांगलीमध्ये पाण्याच्या टाकीवरून पडून तरुणाचा मृत्यू सांगली : सांगली येथील औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या टाकीवरून पडल्याने सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला. राज द्रयाप्पा यादव (वय २५, मूळ रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. चिंतामणनगर झोपडपट्टी) असे त्याचे नाव आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद [...]
हिवाळ्यातील खोकल्यावर लिंबू आहे रामबाण उपाय, जाणून घ्या
हिवाळ्यात आपल्याला खोकल्याचा त्रास सुरु होतो. अशावेळी सतत घसा खवखवणे किंवा जुनाट खोकला येत असेल, तर घरी बनवलेले भाजलेला लिंबू हे एक प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय आहेत. हलका भाजलेला लिंबू, हळद, काळी मिरी आणि मध मिसळून, घशाची जळजळ कमी करतात आणि कफ कमी होतो. तसेच दररोज अशा पद्धतीने लिंबाचे सेवन केल्याने, घशातील त्रास हळूहळू […]
Sangli Politics : सांगलीत भाजपाविरोधात सर्व विरोधक एकत्र, महाविकास आघाडीचा निर्णय
सांगली जिल्ह्यात भाजपाविरोधात एकास एक लढत निश्चित सांंगली : भाजपाविरोधात सर्व विरोधकांनी एकत्रित देण्याचा निर्णय जिल्ह्यात घेतला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रबादी शरत पवार पक्ष, राष्ट्रबादी अजितदादा पवार पश्न आणि पुरोगामी समविचारी पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकत्रित येवून निवडणूक लढविण्याचा [...]
Sangli News : ‘राष्ट्रप्रथम’सांगलीत मानवी साखळीने जिंकली पालकांची मने
मकरसंक्रांतीनिमित्त आप्पासाहेब बिरनाळे शाळेत ‘राष्ट्रप्रथम’ मानवी रचना सांगली: सांगली प्रतिनिधी आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल येथे मकर संक्राती निमित्त मानवी रचना उपक्रम राबवला जातो. यंदा ‘राष्ट्रप्रथम’ असा संदेश मानवी रचनेच्या माध्यमातून देण्यात आला ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, एकात्मतेची भावना व समर्पण भावना जागुत [...]
प्रमोद गावडेंच्या अपक्ष अर्जाने तळवडे मतदारसंघात पक्षनेतृत्वाला आव्हान
न्हावेली /वार्ताहर सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन तथा निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे यांनी आज जिल्हा परिषद तळवडे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षनेतृत्वाला उघड आव्हान दिले आहे.पक्षाने स्थानिक उमेदवाराला डावलून बाहेरचा उमेदवार लादल्याचा आरोप करत गावडे यांनी बंडाचे निशाण फडकवले असून यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तळवडे [...]
Sangli News : सांगलीत भव्य कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शांतिनिकेतन येथे सहा दिवस चालले ज्ञानवर्धक कृषी प्रदर्शन सांगली : येथील शांतिनिकेतन परिसरात दिनांक १६ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सहा दिवस चाललेल्या या प्रदर्शनास जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून आलेल्या लाखो शेतकयांनी भेट देत [...]
अमेरिकेचा साम्राज्यवादी इतिहास! 200 वर्षांत 8 देशांवर ताबा, आता ग्रीनलँडवर हपापलेली नजर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नजर सध्या ग्रीनलॅंडवर आहे. मंगळवारीच त्यांनी ‘ट्रूथ सोशल’ या अकाऊंटवर अमेरिकेचा नवा नकाशा शेअर केला. त्यात ग्रीनलँडसह व्हेनेझुएला व कॅनडाला अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. कोणत्याही भागावर आपला दावा सांगणे हा अमेरिकेचा 200 वर्षे पूर्वीपासूनचा इतिहास आहे. मग ती जमीन विकत घेऊन असो वा त्यावर मालकी हक्क सांगणे असो. […]
दिल्ली-मुंबई नव्हे तर बंगळुरू आहे महिलांसाठी सुरक्षित शहर
महिलांच्या सुरक्षेबाबत हिंदुस्थानातील सर्वात सुरक्षित शहर कोणते याबाबत नवीन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात दिल्ली-मुंबईला मागे टाकत दक्षिण हिंदुस्थानातील बंगळुरूने महिलांच्या सुरक्षेत अव्वल स्थान पटकावला आहे. वर्कप्लेस कल्चर कंसल्टिंग फर्म अवतार ग्रुपच्या महिलांसाठी सुरक्षित टॉप सिटीज चौथ्या अहवालात बंगळुरू नंबर वन ठरले आहे. बंगळुरू महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात अनुकूल शहर ठरले आहे. […]
ICC ODI rankings –विराट कोहलीला धक्का, इंदूरमध्ये शतक ठोकूनही नंबर-1 चा ताज गमावला
टीम इंडियाचा सुपरस्टार खेळाडू विराट कोहली याला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या एक दिवसीय क्रमवारीमध्ये न्यूझीलंडचा आक्रमक बॅटर डॅरेल मिचेल याने विराटला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या एक दिवसीय मालिकेमध्ये न्यूझीलंडने 2-1 असा विजय मिळवला होता. न्यूझीलंडने पहिल्यांदाच हिंदुस्थानमध्येमध्ये एक दिवसीय मालिका जिंकण्याचा कारनामा […]
भाजपकडून स्वबळाची राजकीय खेळी तर शिवसेना शिंदे गटात धाराशिवमध्ये शांतता
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने धाराशिव तहसील कार्यालय परिसरात सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते आणि इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत युती-आघाडीबाबत स्पष्टता नसल्याने अनेक उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ असल्यामुळे बहुतांश पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली होती. युती व आघाडीच्या चर्चा अखेरपर्यंत सुरू असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी खबरदारी म्हणून एक अर्ज अपक्ष म्हणून, तर दुसरा अर्ज पक्षाकडून दाखल केला. भारतीय जनता पार्टीकडून सर्व इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. भाजपने शेवटपर्यंत अधिकृत उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता. अखेर दुपारी अडीच वाजता मल्हार पाटील हे पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाले. मात्र नेमका कोणत्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाला, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. काँग्रेस व ठाकरे शिवसेनेचे एबी फॉर्म जमा काँग्रेस पक्षाकडूनही इच्छुक उमेदवारांना एक अपक्ष व एक पक्षाचा अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारी सुमारे दोन वाजून पन्नास मिनिटांनी काँग्रेसचा पक्षनेता एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मात्र एबी फॉर्म वाटपात फारसा गोंधळ न करता उमेदवारांना वेळेत फॉर्म देण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी महायुतीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे धाराशिवकडे दुर्लक्ष सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असतानाच धाराशिव तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून मात्र एकही प्रमुख नेता किंवा कार्यकर्ता उमेदवारी अर्ज दाखल करताना सक्रिय दिसून आला नाही. यासंदर्भात शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी यांच्याशी संपर्क साधाला असता मी लोहारा- उमरगा येथे आहे. तेथील उमेदवारांचे फार्म भरणे चालू असल्याचे सांगितले. धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 12 गटांपैकी आणि पंचायत समितीच्या 24 गणांपैकी शिवसेना पक्षाकडून आतापर्यंत केवळ 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. अखेरच्या दिवशीही शिवसेनेकडून अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अत्यल्प राहिल्याने तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपची राजकीय खेळी दुसरीकडे भाजपकडून सर्व जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याची राजकीय खेळी दिसून येत आहे. त्यामुळे भाजपने एका गटातून व गणातून 4 ते 5 जणांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे धाराशिव तालुक्यात भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोनच पक्ष सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत आहेत. कालपर्यंत, म्हणजे 20 जानेवारीपर्यंत धाराशिव तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी 67 तर पंचायत समितीसाठी 52 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र आज अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे काही कार्यकर्ते आणि उमेदवार वेळ संपल्यानंतर गेटवरच अडकल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रेरणादायी मरणोत्तर देहदान; धाराशिवमधील आठवे देहदान
धाराशिव (प्रतिनिधी)- समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आठवे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे पार पडले.ईटकूर, ता. कळंब येथील 65 वर्षीय कै. आशाबाई गोविंद गंभीरे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या जिवंतपणी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार व पूर्वी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धाराशिव येथे करण्यात आले. कै.आशाबाई गंभीरे व त्यांचे पती गोविंद गंभीरे या वृद्ध दाम्पत्याने जिवंतपणीच देहदानाचा संकल्प केला होता. पत्नीच्या निधनानंतर पती गोविंद गंभीरे यांनी हा संकल्प प्रत्यक्षात उतरवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मोलाची मदत होणार आहे. या देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचना अभ्यास व संशोधनासाठी उपयुक्त संधी मिळणार असून, भविष्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. शरीररचनाशास्त्र विभागाच्या नियोजनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या कार्यात डॉ.स्वाती पांढरे (प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरीररचनाशास्त्र विभाग), डॉ. विश्वजीत पवार (प्राध्यापक व विभाग प्रमुख,न्यायवैद्यकशास्त्र विभाग), डॉ.सुवर्णा आनंदवाडीकर (सहयोगी प्राध्यापक), डॉ.नितीन भोसले (प्रभारी वैद्यकीय अधीक्षक), डॉ. विवेक कोळगे (सहाय्यक प्राध्यापक, शरीरविकृतीशास्त्र विभाग तथा प्रभारी प्रशासकीय अधिकारी), डॉ.अरबाज ढवळीकर (निवासी वैद्यकीय अधिकारी), अधिसेविका सुमित्रा गोरे, प्रशांत बनसोडे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ),वरिष्ठ लिपिक जीवन गंभीरे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. संपूर्ण प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी देहदान करणाऱ्या गंभीरे कुटुंबीयांचे विशेष आभार मानून,हे कार्य वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे नमूद केले. गंभीरे कुटुंबीयांनी घेतलेल्या या संवेदनशील व समाजहिताच्या निर्णयामुळे सर्वत्र सकारात्मक भावना व्यक्त होत असून, समाजात देहदानाविषयी जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.
अनुसूचित जाती योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा; निधी खर्चात दिरंगाईवर आयोग सदस्यांची नाराजी
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) ॲड. गोरक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्यातील विविध नगर परिषदांमधील अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या अनुषंगाने धाराशिव येथे कार्यालयात नगर परिषद परंडा, भूम, वाशी, कळंब व धाराशिव तसेच सहायक आयुक्त,समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा मागील पाच वर्षांचा आढावा,आर्थिक दुर्बल घटकांवर करण्यात आलेल्या खर्चाची तपासणी,अनुसूचित जातीकरिता प्राप्त निधीचा वापर,कामांची अंमलबजावणी, तसेच लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्यांची स्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.याशिवाय लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सुधार योजना, रमाई घरकुल योजना, अनुकंपा तत्वावरील प्रकरणे व इतर संबंधित बाबींचाही आढावा घेण्यात आला. ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सुधार योजना व रमाई घरकुल योजनेसाठी उपलब्ध निधी असूनही अपेक्षित प्रमाणात खर्च न झाल्याबाबत संबंधित नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.तसेच या योजनांच्या कामांबाबत दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून देत, निधी तातडीने खर्च करून लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीसाठी नगर परिषद परंडा, भूम, वाशी, कळंब व धाराशिव येथील मुख्याधिकारी उपस्थित होते.तसेच सचिन कवले,सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि आयुब शेख,वरिष्ठ सहायक यांचीही उपस्थिती होती. या आढावा बैठकीतून अनुसूचित जाती घटकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टांना गती देण्याच्या सूचना लोखंडे यांनी दिल्या.
वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीच्या निमित्ताने श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या विविध स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये कुमारी ईश्वरी सुधाकर डोरले हिने प्रथम क्रमांक मिळवला तसेच गीत गायन स्पर्धेमध्ये संतोष चेडे, सुजित कवडे आणि रोहन उंदरे यांच्या समूह गायनाला द्वितीय क्रमांक मिळाला.याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या सर्व विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे डॉ. नेताजी देसाई, डॉ. पार्थराज क्षीरसागर, डॉ. चेतना जगताप मॅडम, प्रा. प्रेरणा पाटील मॅडम व महाविद्यालयातील त्यांना मदत करणारे सर्व प्राध्यापक यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक कदम तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
मदुराई एलआयसी आग प्रकरण –महिला अधिकाऱ्याचा मृत्यू नव्हे तर तो होता नियोजित कट, आरोपीला अटक
तामिळनाडूच्या मदुराई येथील एलआयसी कार्यालयात डिसेंबर 2025 मध्ये लागलेली आग हा अपघात नसून एक भीषण हत्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आपल्या कामातील भ्रष्टाचार आणि अनियमितता उघड होऊ नये या भीतीने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी टी. राम याने महिला अधिकारी कल्याणी नंबी (54) यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळले. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा बनाव […]
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सामाजिक माध्यमांवरील निवेदनातून सत्ताधारी व्यवस्थेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सामान्य नागरिकांचे आयुष्य असह्य झाले असून संपूर्ण व्यवस्था सत्तेच्या अधीन गेल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी यंत्रणा परस्परांची पाठ थोपटत एकत्र येऊन जनतेचे हक्क पायदळी तुडवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीतल्या एका निवासी भागात घराघरांत गटाराचे पाणी शिरले आहे. त्यासंदर्भात एक […]
Kolhapur News : शीतल फराकटे यांची बंडखोरी; राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का
उमेदवारी डावलल्याने शीतल फराकटे अपक्ष निवडणूक लढवणार सरवडे : कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षा शीतल रोहित फराकटे यांनी बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. परंतु पक्षाने त्यांची उमेदवारी डावलल्याने अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी अपक्ष उमेदवारी [...]
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेतेपदी माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 199 मधून शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव करून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. शिवसेना भवनात बुधवारी झालेल्या बैठकीत किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) […]
देशी तूप हे आपल्या चेहऱ्यासाठी कसे फायदेशीर ठरते, जाणून घ्या
देशी तूप हे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही, तर त्याचे अनेक सौंदर्य फायदे देखील आहेत. तूप हे आपल्या आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच ते आपल्या चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर आहे. तूप हे त्वचेला मॉइश्चरायझ करते. त्वचा कोरडी आणि निर्जीव असेल तर देसी तूपाने मालिश करणे हे उत्तम समजले जाते. देशी तुपाने त्वचेला मालिश केल्याने, त्वचेवर चमक देखील […]
अलिबागचा हापूस मुंबईच्या बाजारात, एपीएमसी मार्केटमध्ये पहिली पेटी दाखल
कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी ओळखला जाणारा अलिबागचा हापूस अखेर मुंबईच्या बाजारात आला आहे. अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील आंबा उत्पादक गौरव पाटील यांच्या बागेतील हापूसच्या दोन पेट्या नवी मुंबई एपीएमसीत दाखल झाल्या. अलिबागचा आंबा स्थानिक ग्राहकांबरोबरच पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. वाशी एपीएमसीमार्फत हापूस देश-विदेशातही पोहोचतो. अलिबाग तालुक्यातील आंब्याला मोठी मागणी असते. भातशेतीसोबत आंबा लागवडीकडे […]
करिअर सुरु होण्याआधीच ते उद्ध्वस्त झालेय! ”टीस’च्या विद्यार्थ्यांची कोर्टाकडून कानउघाडणी
माओवाद्यांशी संबंध असल्यामुळे तुरुंगवास भोगलेल्या दिल्लीतील दिवंगत प्राध्यापक जी. एन. साईबाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ‘टीस’च्या विद्यार्थ्यांची मुंबई सत्र न्यायालयाने कठोर शब्दांत कानउघाडणी केली. तुम्ही करिअरच्या सुरुवातीलाच घोडचूक केली आहे. करिअर सुरु होण्याआधीच तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले आहे. तुमचे नाव गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. केवळ इथल्याच पोलिसांकडे नव्हे, तर संपूर्ण देशभरातील पोलिसांकडे तुमची गुन्हेगार […]
kolhapur News : भरधाव दुचाकीची काँक्रिट बॅरिकेटला धडक
पुलाची शिरोलीत भरधाव दुचाकी काँक्रिट बॅरिकेटवर आदळली पुलाची शिरोली : भरधाव दुचाकी कॉक्रिट बॅरिकेटला धडकली. दैव बलवत्तर आणि डोक्यावर हेल्मेट असल्याने दुचाकीस्वाराचा जीव वाचला पण कॉक्रिट बेरिकेटवर लटकलेली दुचाकी बष्यांची प्रचंड गर्दी झाली होती ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुलाची शिरोली येथील [...]
अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर अनेक कलाकार एका ठराविक काळानंतर वेगवेगळे व्यवसाय सुरू करतात. कुणी हॉटेल चालवतं, तर कुणी चित्रपट निर्मिती करतं, कुणी फॅशन इंडस्ट्रीत पाऊल ठेवतं. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिमी सेनने देखील चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्यानंतर दुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आपले नशीब आजमावले. सध्या रिमी ही या मार्केटमधली एक प्रसिद्ध एजंट आहे. हंगामा, गोलमाल, धूम, फिर […]
Kolhapur Politics |महायुतीची जोड फेव्हिकॉलसारखी घट्ट, महापौर महायुतीचाच –धनंजय महाडीक
महापौर आरक्षण सोडतीकडे कोल्हापूरकरांचे लक्ष कोल्हापुर : गेले दोन दिवस महायुती फुटणार, शिवसेनेला मागील दारातून पाठिंबा देणार असल्याच्या बक्तव्यापासून अफवा पसरवल्या जात आहेत. पण महायुतीत शिवसेना आणि भाजपसह अन्य पक्षांचा जोड हा फेव्हिकॉलसारखा आहे. तो तुटणार नाही. कोल्हापुरात महापौर महायुतीचाच होणार, असे [...]
पुन्हा ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या प्रकरणातसर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’चे सत्र सुरुच राहिले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे बुधवारी शिवसेनेचे प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले होते. मात्र प्रकरण 37 व्या क्रमांकावर होते. त्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे गृहीत धरुन वकिलांनी न्यायालयाला पुढील तारखेबाबत विनंती केली. न्यायालयाने ती विनंती ऐकण्यास नकार देत काही […]
काखेतील काळेपणा कोणत्या कारणांमुळे वाढतो, जाणून घ्या
अंडरआर्म्समधील पिग्मेंटेशन ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे. या समस्येमुळे अनेक महिला स्लीव्हलेस ड्रेस घालू शकत नाहीत. अंडरआर्म्समधील पिग्मेंटेशनची अनेक कारणे असू शकतात. बरेचजण काखेतला काळेपणा कमी करण्यासाठी रेझर वापरतात. परंतु सतत रेझर वापरल्याने, त्वचा काळवंडते. अनेक महिला या सलूनमध्ये जाण्याचा त्रास टाळण्यासाठी, महिला घरी हेअर रिमूव्हल क्रीम वापरून केस काढतात. क्रीम्स केस सहजपणे काढून […]
Jammu Kashmir news –केरण सेक्टरमध्ये तणाव; पाकड्यांचा गोळीबार, हिंदुस्थानी लष्कराचे चोख प्रत्युत्तर
जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरण सेक्टरमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे सैन्य समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला आहे. केरण सेक्टरमध्ये 20 आणि 21 जानेवारीच्या दरम्यान रात्री गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ब्लाइंड स्पॉट्स नष्ट करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराचे जवान अत्याधुनिक कॅमेरे लावत असताना पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. याला हिंदुस्थानी जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. […]
अदानी समूह झारखंड आणि महाराष्ट्रात करणार सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, दावोसला झाला करार
अदानी समूहाने विमानवाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात रुपया 6 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचा आराखडा जाहीर केला आहे. ही गुंतवणूक हिंदुस्थानच्या विकास प्राधान्यांशी सुसंगत अशा मोठ्या प्रमाणावरील खासगी भांडवली गुंतवणुकीच्या नव्या टप्प्याचे संकेत देणारी असल्याचे समूहाने स्पष्ट केले आहे. हिंदूने याबाबत वृत्त दिले आहे. दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक […]
सहनशीलतेचा अंत पाहिला जातोय; शिवसेनेच्या प्रकरणाबाबत असीम सरोदे यांची सडेतोड प्रतिक्रिया
>> शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा निकाल अद्याप जाहीर होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.महाराष्ट्रातील साधारणतः साडेबारा कोटी जनता, संपूर्ण जगभरात राहत असलेले मराठी लोक तसेच संविधानाची जाण असलेले आणि लोकशाहीवर प्रेम […]
हिवाळ्यात चेहऱ्यासाठी कोणते मास्क गरजेचे आहेत, जाणून घ्या
आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी काही मास्क हे खूप गरजेचे आहेत. चेहरा सुंदर दिसण्यासाठी, आपण अनेक घरगुती उपायदेखील करु शकतो. खासकरुन चेहऱ्यासाठी लावण्यात येणारे मास्क हे आपण घरच्या घरी अगदी कमी खर्चात करु शकतो. चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यासाठी, हिवाळ्यात काही मास्क हे लावणे खूप गरजेचे आहेत. त्वचेवर ग्लो यावा म्हणून आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत, […]
दिशादर्शक फलकाअभावी मुंबई–गोवा महामार्गावर अपघात; कंटेनरचा पुढील भाग पुलावर तुटून पडला
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळील जाखमाता मंदिरासमोर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने दिशादर्शक फलक लावला नाही. परिणामी कंटेनर चालकाला मार्गाचा अंदाज न आल्याने गंभीर अपघात झाला. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास कंटेनर थेट पुलावर चढला आणि पुढील भाग तुटून पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या मुंबई–गोवा राष्ट्रीय […]
त्वचेवर ग्लो यावा म्हणून आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत, वाचा
ऋतू कोणताही असो, त्वचेची काळजी घेणे हे फार गरजेचे आहे. निरोगी चमकदार त्वचा राहण्यासाठी काही पदार्थ हे आपल्या आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहेत. फळे ही आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी फार महत्त्वाची मानली जातात. कारल्याची भाजी का खायला हवी, जाणून घ्या गोड आणि आंबट फळे – गोड लिंबू, संत्री, लिंबू, द्राक्ष, किवी, मनुका, आवळा आणि बेरी […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत ‘एअर फोर्स वन’ विमानाला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे जॉईंट बेस अँड्रूसवर परतावे लागले. विमानातील विद्युत प्रणालीमध्ये अचानक बिघाड जाणवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी रात्री व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला. ही परिस्थिती गंभीर आपत्कालीन नसली तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानाचे लँडिंग […]
Bigg Boss Marathi 6 राखी सावंत करणार Wild Card एन्ट्री?
बिग बॉस मराठीचे सहावे सिझन सुरू होताच घरात जोरदार राडे व्हायला सुरुवात झाली आहे. तन्वी कोलते, रुतुजा जामदार, करण सोनावणे, दिपाली सय्यद यांनी गेला आठवडा त्यांच्या भांडणांनी गाजवला. इतकं असूनही अद्याप प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीला हवा तसा प्रतिसाद दिलेला नसल्याचे समजते. त्यामुळे आता टीआरपी वाढवण्यासाठी निर्माते बिग बॉस क्विन राखी सावंत हिला शो मध्ये आणणार […]
कानून के हाथ लंबे होते हैं… असे म्हणतात ते काही खोटे नसल्याचा प्रत्यय दिल्लीतील एका घटनेवरून आला आहे. दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग 48 वर जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या एका 21 वर्षीय माथेफिरूला बेड्या ठोकल्या आहेत. जीटी करनाल महामार्गावर हा माथेफिरू जीवघेणा स्टंट करत होता. विशेष म्हणजे स्कॉर्पिओच्या पाठीमागे ठळक अक्षरांमध्ये ‘दाऊद’ असे लिहिलेले होते. दिल्ली पोलिसांनी […]
घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना पक्षांतरबंदी कायदा, निवडणूक चिन्हांचा वाद, घटनात्मक संस्था, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, राज्यपाल, सभापती यांची भूमिका तसेच सध्याच्या राजकीय स्थितीवर सविस्तर आणि परखड भाष्य केले. आज सर्वोच्च न्यायालयात पक्षांतरबंदी कायदा आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील चर्चा अपेक्षित असल्याने, त्या निमित्ताने राज्यघटनेतील तरतुदी स्पष्ट करण्यासाठी आपण बोलत असल्याचे बापट यांनी सांगितले. […]
‘तडजोड करणारे कधी पराभूत होत नाहीत’; NDA मध्ये पुनरागमन करणाऱ्या नेत्याचे विधान चर्चेत
देशातील राजकीय वातावरणावरून टीका होत असताना आता केंद्रातील सत्ताधारी NDA मध्ये पुनर्प्रवेश करणाऱ्या पक्षाच्या नेत्याचे विधान चर्चेत आले आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम’ (AMMK) चे प्रमुख टीटीव्ही दिनकरन यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. […]
प्रयागराजमध्ये लष्कराचे ट्रेनी विमान दुर्घटनाग्रस्त, बचावकार्य सुरू
प्रयागराजमध्ये लष्कराचे प्रशिक्षणार्थी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. प्रशिक्षणादरम्यान विद्यावाहिनी शाळेजवळील तलावात विमान कोसळले. दुर्घटना कशामुळे घडली याबाबत माहिती मिळू शकली नाही. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. विमानातील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
गोवा भाजपकडून नबीन यांचे अभिनंदन
पणजी : भाजपचे बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिल्लीत भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या कारकिर्दीत भाजपची संघटना अधिक बळकट होईल आणि ताकद वाढेल, अशा सदिच्छा डॉ. सावंत व नाईक यांनी दिल्या. [...]
बोरी पुलाच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांचे हाल
कामावर, शाळेत, विविधठिकाणीपोहोचलेउशिरा मडगाव : बोरी पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे सध्या प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तसेच वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काल मंगळवारी सकाळी बोरी पुलावर काम सुरू असल्याने दोन्ही बाजूनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारी सकाळी कोणतीही पूर्व कल्पना न देता बोरी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू [...]
सीझेडएमपी मसुदा, नकाशे अद्याप सार्वजनिक नाहीत
पर्यावरणसंचालकसचिनदेसाईयांचीमाहिती पणजी : तमाम नागरिक आणि पर्यावरण गटांनी उपस्थित केलेल्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर 2019चा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याचा (सीझेडएमपी)मसुदा आणि त्याचे नकाशे अद्याप सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत, असे पर्यावरण संचालक सचिन देसाई यांनी स्पष्ट केले आहे. मसुदा उपलब्धतेच्या मुदतीसंबंधी काही गैरसमज निर्माण झाले होते. ते आता दूर करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. पत्रकारांशी [...]
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मार्टिन्स यांचा इशारा : आयोजकांना रात्री 10 नंतर संगीत बंद करावेच लागेल,तक्रारींसाठी भ्रमणध्वनी 8956487938 केला जाहीर पणजी : अमर्याद ध्वनी प्रदूषण झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. तक्रारीसाठी मंडळाने 8956487938 हा मोबाईल नंबर जाहीर केला असून तेथे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष लेविन्सन [...]
पणजीत 4 फेब्रुवारीपासून ‘राष्ट्रीय पुस्तक महोत्सव’
मांडवीतीरीपाचदिवसांचाज्ञानसागर: 250 पुस्तकदालनांसहखाद्यपदार्थांचेस्टॉल्स; लेखक, वाचक, प्रकाशक, विक्रेत्यांचीमहापर्वणी पणजी : गोव्यात नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया (एनबीटी) लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या सहकार्याने येत्या दि. 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान भाऊसाहेब बांदोडकर मैदान, कांपाल पणजी येथे राष्ट्रीय स्तरावरील भव्य पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामुळे गोमंतकीयांना बौद्धिक मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती लोकमान्य मल्टिपर्पजको-ऑप. सोसायटीचे चेअरमन तसेच [...]
सीमाप्रश्नाच्या दाव्यावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी
त्रिसदस्यीयखंडपीठासमोरदावा: सीमावासियांचेलागलेलक्ष बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या दाव्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी बुधवार दि. 21 रोजी होणार आहे. आठ वर्षांनंतर सुनावणी होणार असल्याने महाराष्ट्र सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी दाव्याबाबत जलदगतीने सुनावणी व्हावी यासाठी परिश्रम घेतले आहेत. मध्यवर्ती म. ए. समितीने सीमाप्रश्नाच्या दाव्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. वरिष्ठ विधीतज्ञ सी. [...]
दुकानालायेणाऱ्याग्राहकांशीफोनवरबोलल्याचासंशय वार्ताहर/नंदगड कापोली के. जी. (ता. खानापूर) येथे पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या घटनेत किरण अविनाश बाळेकुंद्री (वय 30) हिचा मृत्यू झाला आहे. आपल्या मुलीचा जावयाने मारहाण करून जीव घेतल्याची तक्रार मृत महिलेची आई रंजना जळगेकर (रा. करंबळ) यांनी नंदगड पोलिसात दाखल केली आहे. करंबळ येथील किरण हिचा विवाह कापोली [...]
युट्यूबवर पाहून बारीक होण्यासाठी केमिकल घेतले, काही तासातच होत्याचं नव्हतं झालं
बदलती जीवनशैली, फास्टफूडचे अतिसेवन अशा विविध कारणांमुळे हल्ली तरुणांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. या समस्येवर उपाय करण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाची मदत घेतात. मात्र सोशल मीडियावर सुचवलेले हे उपाय कधी कधी जीवावर बेततात. अशीच एक घटना तामिळनाडूतील मदुराईत समोर आली आहे. युट्यूबवर व्हिडिओ पाहून वजन कमी करण्यासाठी केमिकलचे सेवन केल्याने काही तासांतच 19 वर्षीय तरुणीचा […]

24 C