शेख हसीना यांना 10 वर्षांचा कारावास, सरकारी भूखंड लाटल्याचा ठपका
हिंदुस्थानच्या आश्रयाला असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी साधनसंपत्तीचा दुरुपयोग व भूखंड वाटपातील घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने हा निकाल दिला. ढाक्याजवळच्या पूर्बाचल येथील राजूक न्यू टाऊन प्रकल्पात शेख हसीना यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पदाचा गैरवापर करून व अधिकाऱ्यांशी संगनमत करून हसीना यांनी आपल्याच कुटुंबातील अनेकांना […]
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी उद्या दि.३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत येत आहेत.साळवी स्टॉप येथील शासकीय जलतरण तलावाजवळील मैदानात एकनाथ शिंदे यांची जाहिर सभा होणार आहे.यासभेला गर्दी करण्यासाठी महिला बचत गटांतील पाच सदस्यांना येण्याचे बंधन घातले गेले आहे.तसा संदेश व्हॉटसॲपवरून पाठवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी महिला बचत गटांना […]
नाशिकमध्ये आज डॉ. वि.म. गोगटे स्मृतिदिन सोहळा; संस्कृत भाषा प्रसारिणी सभा, ठाणे संस्थेला पुरस्कार
संस्कृत भाषा सभा आणि सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. डॉ. वि.म. गोगटे यांचा ३९ वा स्मृतिदिन, पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळा मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख मा. डॉ. धनश्री दीदी (जयश्री आठवले-तळवलकर) प्रमुख पाहुण्या […]
UAE मध्ये सत्ताबदलाचे संकेत, राष्ट्राध्यक्षांनी मुलाकडे सोपवली २६० अब्ज डॉलरची संपत्ती
यूएईमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांनी आपले सुपुत्र आणि क्राउन प्रिन्स शेख खालिद यांच्याकडे तब्बल २६० अब्ज डॉलरची (सुमारे २१ लाख कोटी रुपये) संपत्ती सोपवली आहे. या निर्णयामुळे यूएईमध्ये लवकरच अधिकृतपणे सत्तांतर होऊन शेख खालिद देशाची धुरा सांभाळतील, अशी चर्चा जागतिक स्तरावर रंगली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या […]
बारामतीला जाताना ‘ती’फाईल अजित पवारांकडेच होती आणि…संजय राऊत यांचे संसदेत तडाखेबंद भाषण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी संसदेत तडाखेबंद भाषण करत सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्युवर देखील संशय व्यक्त केला. ”राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर जी चर्चा सुरू आहे. भाषण जर आपण वाचलं, ऐकलं तर आपल्याला वाटेल की देशाची परिस्थिती ठीक नाही. पण आपल्यासमोर जे महान देशभक्त मंडळी बसले […]
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत एकेरीत गतउपविजेत्या थायलंडच्या मननचया सवांगींकवे, फ्रान्सच्या लिओलिया जीनजीन यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मुंबई येथील एमएसएलटीएच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत जपानच्या माई […]
विक्रमवीर जोस बटलर; अशी धमाकेदार कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये T20 World Cup 2026 च्या पार्श्वभुमीवर तीन सामन्याची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने आपल्या नावावर केला आणि रविवारी (01 फेब्रुवारी 2026) झालेला दुसरा सामना सुद्ध DLS नियमांनुसार 6 विकेटने जिंकला. या विजयासह इंग्लंडने मालिका सुद्धा 2-0 अशा फरकाने खिशात घातली आहे. हा सामना इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जोस […]
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांच्या विरोधात जोरदार लढा देत आहेत. खालगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार विनोद शितप, पंचायत समिती गण खालगाव मधील उमेदवार स्वाती गावडे, करबुडे मधील सुरेश कारकर यांना प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. खालगाव जिल्हापरिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या […]
उद्या काय होईल…; विलीनीकरणाबाबत छगन भुजबळ यांचे महत्त्वाचे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राजकारणात उद्या काय होईल, हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे काही काळ जाऊ द्या, त्यानंतर चर्चा करा, असे ते म्हणाले आहेत. तसेच याआधी विलीनीकरणाबाबत झालेल्या चर्चेबाबत आपल्याला माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणाबाबत आता प्रत्येकजण आपापल्या परीने माहिती […]
Solapur News : टेंभुर्णी येथे लोखंडी पाईपने पिता-पुत्रास मारहाण
परितवाडी येथे लोखंडी पाईपने वडील-मुलावर मारहाण टेंभुर्णी : माढा तालुक्यातील परितवाडी येथे शुल्लक कारणावरून एकास लोखंडी पाईपने मारहाण करुन वडील व मुलगा जखमी झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश साहेबराव कदम [...]
निवडणूक आयोग हा भाजपचा आयटी सेल, एक दिवस त्यांना जावेच लागेल! ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन जारी केले. त्या म्हणाल्या की, निवडणूक आयोग हा भाजपचा आयटी सेल आहे. मी इतका अहंकारी आणि कपटी निवडणूक आयुक्त कधीच पाहिला नाही. मी तुमच्या पदाचा आदर […]
Solapur News : सोलापूरकरांचा प्रवास होणार आता वेगवान !
सोलापूर-पुणे आणि सोलापूर-हैदराबाद प्रवास आता २–५ तासांत शक्य सोलापूर : सोलापूर शहराच्या विकासाला गती देणारी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी (दि.१) फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे. मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद (सोलापूरमार्गे) हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. यामुळे सोलापूरहून पुण्याला [...]
Satara News : साताऱ्यात पुठ्याचे बॉक्स व्यवसाय फसवणूक प्रकरण, २८ लाख ४३ हजार रुपये गंडा
नवीन एमआयडीसीमध्ये व्यापाऱ्याला चार जणांनी घातला मोठा गंडा सातारा : सातारा शहरालगत असलेल्या नवीन एमआयडीसीत पुठ्याचे बॉक्स तयार करण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला चार जणांनी २८ लाख ४३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात [...]
श्री संत भगवान बाबा यांची 61 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी
भूम (प्रतिनिधी)- येथे श्री संत भगवान बाबा यांची 61 वी पुण्यतिथी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रविवार दिनांक एक रोजी भूम शहरामध्ये तालुक्यातील वंजारी समाज बांधवांच्या वतीने श्री संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी विजयनगर येथे श्री संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे समाजातील ज्यष्ठ नागरिकांच्या व महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर भूम ते अहिल्यानगर रोड, गोलाई चौक, ओंकार चौक, नगरपालिका, गांधी चौक, बागवान गल्ली , बाजारतळ या शहरातील प्रमुख मार्गावरून श्री संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत साधेपणाने काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी लेझीम पथक, तसेच टाळ मृदंगाच्या पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी महिलांनी व पुरुष आणि महिलांनी खेळलेल्या फुगडीने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या मिरवणुकीची सांगता विजयनगर येथे करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर महाआरती झाली. या महाआरतीनंतर समाज बांधवांसह सर्व उपस्थित त्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पुण्यतिथी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूम तालुक्यातील समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या झंझावाती प्रचाराने नाईचाकुरमध्ये रणशिंग
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर नाईचाकुर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस (आय) महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विरोधकांचा समाचार घेतला आणि विकासाच्या मुद्द्यावर आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले. उमेदवारांच्या विजयासाठी एकजूट कवठा जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री. महेश माणिकराव देशमुख आणि नाईचाकुर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. सुगलाबाई वामन मदने यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही उमेदवारांच्या कार्याचा गौरव करत, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित आणि जनसंपर्क असलेल्या नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. महत्त्वाचे मुद्दे आणि मार्गदर्शन: सभेला संबोधित करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खालील विषयांवर भाष्य केले शेतीमालाला हमीभाव, सिंचन व्यवस्था आणि ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य महिला सक्षमीकरण: महिलांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष जनतेच्या विश्वासावर ठाम असून, न्याय आणि लोकहितासाठी आमची लढाई सातत्याने सुरू राहील. उमेदवारांची ग्वाही यावेळी उमेदवार महेश देशमुख व सुगलाबाई मदने यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले की, “आम्ही केवळ सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी निवडणूक लढवत आहोत. पारदर्शक कारभार आणि प्रामाणिक सेवा हीच आमची ओळख असेल.“या सभेला नाईचाकुर परिसरातील शिवसैनिक, काँग्रेसचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मशाल आणि हाताच्या चिन्हाचा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सभेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कळंब येथे भुई चिवड्याचा मोठा बाजार; हजारो रुपयाची उलाढाल....
कळंब (प्रतिनिधी)- प्रत्येक गावाची एक ओळख असते,ती ओळख सर्व दूर पसरलेली असते.त्या मुळे त्या गावाचा नाव लौकिक ही वाढतो.कळंब हे खवय्या चे गाव म्हणून परिचित आहे.इतर बाजार पेठे प्रमाणेच इथे स्वादिष्ट पदार्थांना मोठी मागणी असते.कळंब च्या बाहेर असणारे लोक, गावाकडे आल्या नंतर येथील पदार्थ तर खातातच ,पण जाताना घेऊन पण जातात.कळंब मध्ये बाजार दिवशी , भुई चिवडा ची मोठी उलाढाल होते.खमंग चिवडा व इतर पदार्थ खाण्या साठी खवय्ये आवर्जून येतात.जिल्ह्यात कुठे ही बाजार असला की ही मंडळी तिथे जाऊन गरम चिवडा, व इतर पदार्थ आवडीने खातात. पिढ्या न पिढ्या चालत असलेल्या अनेक व्यवसायाने कळंब ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.मराठवाड्यात, भुईचिवडा चा कळंब येथील बाजार सर्वात मोठा असतो.येथील भुई समाज व इतर समाजाचे लोक होलसेल व किरकोळ चिवडा, जिलबी, भजे, बालू शाई, नुकती आदी गरमागरम ,रुचकर पदार्थ बनवतात. दर सोमवारी कळंब येथे मोठी उलाढाल होते. बाजारा साठी आलेल्या प्रत्येक जणांना, हा चिवडा घरी नेल्या शिवाय राहवत नाही.तर काही जण फक्त चिवडा व गरम जिलबी, भजे खाण्या साठी बाजारात येत असतो.असा हा कळंब मधील शेव चिवडा. तर कळंब मध्ये नाना ची पुरी भाजी ,बाबू चे पेढे, ऋषभ मधील फरसाण ,अनिल मधील दही धपाटे , खव्याची पोळी, इलाइ ची भेळ,शिवगण चा वडापाव , असो.....की समर्थ गाड्यावरची इडली सांबर,उडीद वडे असो, की कडाक,गरमागरम बालाजी खारमुरे, फुटाणे आदी ठिकाणी खवय्ये लोक गर्दी करतात.कमी पैशात खमंग खाण्या साठी थांबावे लागते. एकदा याल तर परत परत खाल........ या प्रमाणे या लहान व्यापाऱ्यांनी खमंग पना जपला आहे. त्यामुळे सर्वगुण संपन्न आमचे कळंब मध्ये कपडा,सोने, किराणा , शूज मार्केट या प्रमाणे आता खमंग पदार्थाचा सुगंध ही सर्व दूर पसरला आहे.येथील भुई चिवडा,प्रसिद्ध असून,मोठ्या ऑर्डर ही स्वीकारल्या जातात. ग्राहक समोरच मिरची,बटाटा ,पालक भज्जी काढण्यात येते.येथे खव्व्ये मस्त बसून याचा स्वाद घेतात. कळंब येथे शहर व ग्रामीण भागातील खव्व्ये मोठ्या प्रमाणावर येत असतात, त्या मुळे नगर परिषदेने खाऊ गल्लीसाठी जागा द्यावी अशी मागणी होत आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ईटकूर जिल्हा परिषद गटातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अनंत नानासाहेब लंगडे तसेच पंचायत समिती गणातील महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई धनंजय वरपे यांच्या प्रचारार्थ अंदोरा, ता. कळंब येथे जाहीर सभा मल्हार पाटील यांची संपन्न झाली. सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महायुतीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांचा लाभ गावागावात पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काचे, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी असलेले आणि विकासासाठी कटिबद्ध उमेदवार निवडून देणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर अधिकाधिक विकास निधी उपलब्ध होऊन अंदोरा व परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळू शकते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेने विकास, स्थैर्य व विश्वासाला मत देत महायुतीचे अनंत नानासाहेब लंगडे व सौ. राजश्रीताई धनंजय वरपे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेस शिवाजी कापसे, अजित पिंगळे, शिवाजी गिड्डे, रामराजे जाधव, अशोक तांबारे, पी. जी. नाना तांबारे, लक्ष्मण हुलजुते, अनंत वाघमारे, सुरेश कवडे यांच्यासह अंदोरा व परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- तेर येथील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व पंचायत समितीचे माजी सदस्य बाबूराव नाईकवाडी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे तेर परिसरात भाजप व महायुतीची ताकद अधिक भक्कम झाली असून, विकासाभिमुख राजकारणाला बळ मिळाले आहे. यावेळी बाबूराव यांचे भाजपात मनःपूर्वक स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रवेशप्रसंगी इतिष चौगुले, उबाठा शिवसेना विभागप्रमुख अमोल थोडसरे, तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बापूराव नाईकवाडी व सोसायटीचे व्हा. चेअरमन रतन नाईकवाडी यांनीही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. विविध पक्षांतील अनुभवी व कार्यक्षम कार्यकर्त्यांचा होत असलेला प्रवेश हा भाजपच्या संघटनात्मक मजबुतीचा व लोकविश्वासाचा स्पष्ट दाखला आहे. तेर परिसराचा सर्वांगीण विकास महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र व राज्यातील भाजप नेतृत्वाच्या सक्षम व विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जि.प. गटातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील तसेच पंचायत समितीच्या उमेदवार सौ. जया नवनाथ नाईकवाडी यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी एकदिलाने, जोमाने व पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी सोडला. पक्षप्रवेशाच्या संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे व विजयाचा आत्मविश्वास निर्माण करणारे वातावरण होते. यावेळी महायुतीच्या जि.प. गटातील उमेदवार अर्चना पाटील यांच्यासह शिवाजीराव नाईकवाडी, पद्माकर फंड, नवनाथ नाईकवाडी, प्रशांत वाघ, राजाभाऊ सोनटक्के, सुधाकर अबदारे, बालाजी मुळे, तेर येथील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने द्वितीय गळीत हंगाम 2025 - 26 मधील सातव्या पंधरवाड्यात 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल 2700/- प्रमाणे दि.02 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे. एनव्हीपी शुगरच्या वतीने चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा सुरू केली आहे. द्वितीय गळीत हंगामात देखील ही परंपरा कायम आहे. कारखान्यास ऊस गाळपासाठी दिलेल्या ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस गाळपासाठी देऊन सहकार्य करावे असे आवाहनही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
कळंबमध्ये संत गुरु रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी
कळंब (प्रतिनिधी)- समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे महान समाजसुधारक संत गुरु रविदास महाराज यांची जयंती दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी कळंब शहरातील १०१ नगर, विद्यानगरी परिसरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गुरु रविदास महाराज मंदिरात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मूर्तीचे विधिवत पूजन करून झाली. त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या जयंती सोहळ्याचे उद्घाटन कळंब–धाराशिव विधानसभेचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी रंगनाथ कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे, शिवसेना उपनेत्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे, शंकर पाखरे, सुरेखाताई घोडके, मुस्ताकभाई कुरेशी, इम्रान मुल्ला, मुसद्दिक काझी, सफुरा काझी, सुधीर भवर, अरुण राऊत, गणपतराव चौधरी , मुबिन मणियार, महमद चाऊस तसेच संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आशा राऊत, तालुकाध्यक्ष अशोक लाड, युवकाध्यक्ष सतीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय उपाध्यक्ष जालिंदर लोहकरे यांनी केले. संत रविदास महाराजांचे समतेचे तत्त्वज्ञान, कर्मप्रधान जीवनशैली आणि संघटनात्मक विचार आजच्या समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. उद्घाटनप्रसंगी आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की, तत्कालीन प्रभारी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली असून मराठवाडा युवकाध्यक्ष विकास कदम यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या सहकार्याने भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. भविष्यात मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास आणि सुशोभीकरण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे यांनी चर्मकार समाजाच्या विकासासाठी नगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहील, असे सांगितले. तर संगीताताई ठोंबरे यांनी संत रविदास महाराजांचे विचार आत्मसात करून समाजाने प्रगतीचा मार्ग स्वीकारल्याबद्दल गौरव व्यक्त केला. जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करावी, यासाठी मान्यवरांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राचार्य काकासाहेब मुंढे आणि बाबासाहेब कांबळे यांनी केले. शेवटी मराठवाडा युवकाध्यक्ष विकास कदम यांनी उपस्थित मान्यवर, समाजबांधव, महिला भगिनी, युवक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती समिती आणि समाजातील सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
Karad News : शिवडे येथे कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारा मालट्रक जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान
पहाटे उंब्रजच्या ढाब्यावर आग उंब्रज : आशियाई महामार्गावर शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत असलेल्या श्री गणेशा ढाब्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मालट्रकला अचानक आग लागून तो जळून खाक झाला. ही घटना रविवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या [...]
Satara News : शाळेतील मुलांनी जेसीबी व बुलेटवर धोकादायक मिरवणूक, पालकांसह चालकावर गुन्हा
सातारा शहरात स्टंटबाजी मुलांची, गुन्हा पालकांवर सातारा: सातारा शहरातील एका शाळेतल्या मुलानी वर्गणी कानून जेसीबी आजून शाहेथ्या समोरच्या सरचाबर जेसीबीतून मिरवणूक काढण्याचा प्रकार दि. ३१ रोजी पहला होता या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मधारी [...]
Ratnagiri News : लोकआग्रहास्तव जुवाठी गणातून प्रकाश भिवंदे निवडणूक रिंगणात
प्रकाश भिवंदे जुवाठी पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार राजापूर : गेली २५ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात काम करताना जनतेला बरोबर घेऊन पंचायत समिती गणात अनेक विकास कामे मार्गी लावणारे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश भिवंदे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जुवाठी पंचायत [...]
Miraj Crime : महात्मा गांधी चौकात नशेखोरांची लोखंडी कड्याने मारहाण
विकी वाघमारे यांना चहा पिताना अनाहूत मारहाण; मिरज : शहरातील महात्मा गांधी चौक येथे एका चहाच्या टपरीवरतिघा नशेखोरांना धुमाकूळ घातला. चहा पित थांबलेल्या विकी राहूल वाघमारे (रा. म्हाडा कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, मिरज) यांना धमकावून लोखंडी कड्याने मारहाण करुन जखमी केले. याबाबत वाघमारे [...]
मनरेगा ही गरिबांची जीवनरेखा, सरकारने ती हिरावून घेतली –मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील कोट्यवधी गरिबांसाठी मनरेगा योजना ही जीवनरेखा होती, मात्र केंद्र सरकारने ती गरिबांकडून हिरावून घेतली आहे, असा गंभीर आरोप खरगे यांनी केला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) अलीकडील बदल आणि सरकारच्या धोरणांवर टीका करताना ते असं म्हणाले आहेत. सोशल […]
Kolhapur News : स्वामी समर्थ नामजपाने दुमदुमूला पंचगंगा नदी घाट
पंचगंगा घाटावर ५ हजार भक्तांबरोबर श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळा कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ हा दीड तास अखंडीत सुरु राहिलेल्या नामजपाने रविवारी सायंकाळी पंचगंगा नदी घाट अक्षरशः दुमदुमून गेला. तिन्ही सांजेच्या वेळी झालेल्यां या नामस्मरण सोहळ्यात तब्बल पाच हजारावर महिला व पुरुष भक्त [...]
निराशाजनक अर्थसंकल्पानंतर बाजार सावरला; गुंतवणूकदारांना दिलासा
केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर करण्यात आला. त्यात शेअर बाजारावरील व्यवहारांवरील STT करात वाढ करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा होताच शेअर बाजाराने नकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये सुमारे एक हजार अंकांची घसरण झाली होती. सोमवारी बाजार सुरू होताच याचा दबाबव बाजारावर दिसून आला. त्यामुळे सोमवारी दिवसभर शेअर बाजारात चढ-उतार झाले. मात्र, बाजार […]
Sangli Crime : आटपाडीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचार वाहनावर दगडफेक
आटपाडीत निवडणूक प्रचाराला हिंसक वळण आटपाडी : आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार अॅड. विद्याताई मोटे प्रचार वाहनावर विभुतवाडी येथे हल्ला करून दगडफेक करण्यात आली. आमच्या प्रचार सभेलगतच जाणिवपुर्वक स्पिकर लावल्याचा आरोप करत वाहनावर दगडफेक केली. या [...]
Miraj Crime : मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याला लाचखोरीचे ग्रहण; सहा लाखांची लाच घेताना एपीआय अटकेत
मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातील भ्रष्टाचाराने खळबळ मिरज : मिरज तालुक्याच्या पूर्वभागातील २५ ते २७ गावांचा डोलारा सांभाळणाऱ्या मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याला सध्या लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. गंभीर प्रकरणातील बड्या गुन्हेगारांना सहीसलामत सोडण्यासाठी पोलिसांनी जणू रेटकार्डच बनविले आहे. खुद्द [...]
दिल्लीतील संसद भवनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील मजकुराचा संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोप केले. “हे माझे शब्द नाहीत, तर माजी लष्करप्रमुखांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेले आहे,” असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी म्हणाले की, नरवणे यांचे पुस्तक अद्याप प्रकाशित होऊ दिले जात नाही […]
Sangli News : भक्तीमय वातावरणात ‘कृष्णामाई’यात्रोत्सवाची सांगता
कृष्णामाई यात्रोत्सवात हजारो भाविकांचा सहभाग सांगली : सांगलीत २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीच्या दरम्यान भक्ती, संस्कृती व पर्यावरण जागृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. शहराची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णामाई नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘आपली आई कृष्णामाई’ या संकल्पनेतून भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले [...]
राहुल गांधी सैन्याची बदनामी करत नव्हते, ते माजी लष्करप्रमुखांचेच लिखाण वाचत होते : प्रियांका गांधी
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वढेरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राहुल गांधी सैन्याची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न करत नव्हते. “राहुल गांधी हे माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील उतारा वाचत होते. ते स्वतः काही आरोप करत नव्हते,” असे प्रियांका गांधी यांनी […]
उत्पन्न वाढीचे पोकळ आश्वासन- आमदार कैलास पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट गेल्या 12 वर्षांत पूर्ण झालेले नाही. उलट शेतीवरील उत्पादन खर्च दुप्पट ते तिप्पट झाला आहे. आताही या अर्थसंकल्पात उत्पादन वाढीच पोकळ आश्वासन दिले आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. कोणत्याही शेतमालाला योग्य दर मिळत नाही यावर शासन कोणतीही ठोस योजना राबवित नसल्याचे दिसत आहे. पीकविमा धोरण देखील कंपनी धार्जिन केल्याने त्यामध्ये बदल करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. डब्बल इंजिनच्या नावाने गळा काढणारे अश्या निर्णयामध्ये समन्ववयाने जनहित का साधत नाहीत. देशाच्या उत्पन्नातील 58 टक्के पैसा हा फक्त दहा टक्के लोकांकडे असून राहिलेल्या लोकांकडं केवळ 15 टक्के उत्पन्न आहे. यामुळे देशात विषमतेची दर गेल्या काही वर्षात कशी वाढत आहे हे आकडेवारीवरून दिसत आहे. देशाच्या एकूण संपत्तीपैकी सुमारे 40 टक्के संपत्ती 1 टक्का लोकांकडे असल्याच चित्र हेच मोदी सरकारच खरं रूप आहे. अशी टिका आमदार पाटील यांनी केली आहे.
धाराशिव शहरात रस्ता सुरक्षानिमित्त रिक्षा व मोटारसायकल रॅली
धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहर वाहतूक शाखेच्यावतीने धाराशिव शहरात रिक्षा व मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या रॅलीस अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखविण्यात आला. पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहरातून रिक्षा व मोटारसायकल रॅली धाराशिव शहरातील वाहतूक शाखा कार्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, मध्यवर्ती शासकीय इमारत मार्गे वाहतूक शाखेत विसर्जित करण्यात आली. तर यावेळी रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच हेल्मेट वाटप रिक्षा रॅली तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले. याबरोबरच शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालये मार्गदर्शन करण्यात आले.
Shirala News : बिऊर येथील बिबट्या हल्ल्यामुळे शिराळा परिसरात संतप्त वातावरण
शिराळा तालुक्यात बिबट्याचा हल्ला By प्रितम निकम शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील राजवीर पाटील या बालकावर हल्ला करून त्यास ठार मारणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून बिबट्याला पकडण्यासाठी [...]
वजन काट्यात चिप, 60 लाखांची फसवणुक; परंडा पोलिसांत गुन्हा दाखल
परंडा (प्रतिनिधी)- बाणगंगा सहकारी साखर कारखाना येथे वजनकाट्यात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून स्क्रॅपच्या वजनात फेरफार करत तब्बल 60 ते 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकादम समीर अब्दुल खादेर शेख, संदीपान गीरमकर, सुर्यप्रकाश, सुनिल व इतर पाच इसमांनी 12 डिसेंबर 25 ते 10 जानेवारी 26 या कालावधीत कारखान्यातील वजनकाट्यात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून फेरफार केल्याचा आरोप आहे. संबंधित आरोपींनी डीव्हाईसच्या सहाय्याने काटा दूर अंतरावरून ऑपरेट करून वाहनातील स्क्रॅपचे वजन कमी दाखवले. आरोपींनी बनावट वजनाच्या प्रिंट स्लिप्स तयार करून वजन योग्य असल्याचे भासवले. या पद्धतीने अयान मल्टिट्रेड एल.एल.पी. संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्यातील अंदाजे 150 ते 175 मेट्रिक टन स्क्रॅप कमी वजन दाखवून बाहेर नेण्यात आला. हा स्क्रॅप विनमिन मेटल्स, चेंगाल्लट (जि. कांचीपूरम, तामिळनाडू) येथील मालक सुर्यप्रकाश व त्याच्या चार साथीदारांनी मिळून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रईस लेक कंपनीच्या सर्व्हिस इंजिनिअरच्या मदतीने वजन काट्यात चिप बसवण्यात आल्याचा संशय असून, या संपूर्ण प्रकारातून कारखान्याची सुमारे 60 ते 70 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याप्रकरणी फिर्यादी संतोष तुळशीराम तोंडले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करीत आहेत.
धाराशिवसाठी विकासाची नवी दिशा देणारा अर्थसंकल्प - दत्ताभाऊ कुलकर्णी
धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प 2026-27 हा सर्वसामान्य, शेतकरी, युवक आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया भाजप धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणि लघुउद्योगांना दिलेले प्राधान्य धाराशिव जिल्ह्यासाठी कायापालट करणारा आहे. उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले. कौडगाव व वडगाव एमआयडीसी परिसरात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला स्थानिक स्तरावर मूल्यवर्धन मिळणार आहे, याचा थेट फायदा शेतकरी व युवकांना होणार आहे. आरोग्य क्षेत्रात कर्करोगावरील औषधांवर दिलेली सवलत ही ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे. तसेच तुळजापूर टेम्पल टाउन संकल्पना, तेरचा सांस्कृतिक वारसा आणि नळदुर्ग किल्ला यांना पर्यटन धोरणातून नवी ओळख मिळणार असून, पर्यटनवाढीमुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. सोलर, बायोगॅस व स्वच्छ ऊर्जेला दिलेले प्रोत्साहन शेतकरी व ग्रामीण भागाचा इंधनखर्च कमी करणारे ठरेल. शेती, उद्योग आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय साधणारा हा अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया घालणारा आहे, असा विश्वास दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
सास्तूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या रणधुमाळीत सास्तूर (ता. लोहारा) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार श्री. प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मतदारांशी थेट संवाद साधून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या सभेद्वारे उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला: सास्तूर जिल्हा परिषद गट: सावळकर सागरबाई अशोक, सास्तूर पंचायत समिती गण: स्वाती समाधान मोरे तावशीगड पंचायत समिती गण: रुचिता रोहण गायकवाड सभेला मार्गदर्शन करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ठाम भूमिका मांडली. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांच्या समस्या, महिला सक्षमीकरण आणि तरुणांच्या हाताला काम या मूलभूत प्रश्नांवर पक्ष कशा प्रकारे काम करणार आहे, याची सविस्तर दिशा त्यांनी स्पष्ट केली. “हा पक्ष जनतेच्या विश्वासावर उभा असून, विकास आणि न्यायासाठी आमचा लढा निरंतर सुरू राहील,“ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.आमदार प्रवीण स्वामी यांनी स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर भर देत, पारदर्शक कारभारासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
दिल्लीत स्फोट झाल्यावर पोलीस काय करतात? बंग भवनाबाहेर बंदोबस्त पाहून ममता बॅनर्जी संतापल्या
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रविवारी रात्री SIR मधील विसंगती आणि अन्याय नोंदीप्रकरणी पीडित कुटुंबांसह दिल्लीत पोहोचल्या. दिल्ली पोलीस बंगालमधील लोकांना त्रास देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सोमवारी सकाळी त्यांनी चाणक्यपुरी आणि हेली रोड येथील बंग भवनला भेट दिली. सध्या पीडित कुटुंबे तिथे राहत आहेत. ममता बॅनर्जी यांनी दिल्ली पोलिस बंगालमधील लोकांना धमकावण्याचा प्रयत्न […]
Sangli News : सांगलीत ‘हिट ॲण्ड रन’चा थरार; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
टिळक चौकात जमावाने अडकवला बेधुंद कार चालक सांगली : नशेत धुंद कार चालकाने बेदरकार वाहन चालवत चार पोलिसांसह अकरा जणांना उडवले. पटेल चौक ते गणपती मंदिर आणि टिळक चौक या टप्प्यात दहा ते बारा मिनिटांत असंख्य वाहनांना थडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. [...]
मैत्री झाली आणि प्रेम केलं, 9 वर्ष प्रेमसंबंध राहिले; लग्नानंतर दोनच महिन्यात पत्नीने पतीला संपवलं
मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 9 वर्ष प्रेमसंबंधात राहिल्यानंतर दोघांनी मिळून लग्न केलं. लग्न होऊन दोन महिने झाले आणि दोनच महिन्यात कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीने पतीला संपवलं. उत्तर प्रदेशालीत बरेली जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झालं आहे. 33 वर्षीय जितेंद्र कुमार यादव गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये त्याच्याच घरामध्ये आढळून आला. बरेली जिल्ह्यातील इज्जतनगर भागामध्ये जितेंद्र कुमार […]
Ratnagiri : पडवे जि. प. गटात सचिन बाईत यांचा प्रचार झंझावात, प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद
पडवे जि. प. गटात सचिन बाईत यांची प्रचारात आघाडी गुहागर : गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात काम करताना जनतेला बरोबर घेऊन पडवे जिल्हा परिषद गटात अनेक कामे मार्गी लावणारे महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेना उमेदवार सचिन बाईत यांनी पडवे [...]
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत माजी सैन्यप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा दाखला दिला. पण यावर भाजपने आक्षेप नोंदवत गोंधळ घातला. जेव्हा चीनचे रणगाडे हिंदुस्थानच्या दिशेने येत होते तेव्हा पंतप्रधान मोदींनी तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या असे आदेश दिले, असे नरवणे यांच्या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर मोदींबाबत […]
Ratnagiri : असगोली जि. प. गटात संतोष जैतापकर यांचा प्रचार झंझावात
असगोलीत परिवर्तनासाठी संतोष जैतापकर यांची हाक गुहागर : कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केवळ वैद्यकीय सेवेतून सर्वसामान्यांपासून सर्वच स्तरातील जनतेसाठी वैद्यकीय सेवेचे दूत ठरलेले युतीमधील शिवसेनेचे असगोली जि. प. गटाचे उमेदवार संतोष जैतापकर यांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. मतदारांनीही आपल्याला परिवर्तन आवश्यक [...]
Kolhapur Crime : वडणगे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, २ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास
वडणगे परिसरात घरफोडी कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील सासने मळा, शिव पार्वती कॉलनी, तसेच विजय हौसिंगी सोसायटी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दोन ठिकाणी चोरी करून चोरट्यांनी २ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत अधिक माहिती [...]
Ratnagiri News –पालगड पंचायत समिती गणात शिवसेना उमेदवार जनार्दन हळंदे यांची प्रचारात आघाडी
दापोलीतील पालगड पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार जनार्दन हळदे यांना पंचायत समिती निर्वाचन गणातील गावा गावातील वाड्या वस्त्यांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र आहे. दापोली तालुक्यातील पालगड जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्टया अतिशय महत्वाचा असा गट मानला जातो . अशा या जिल्हा परिषद गटात […]
केंद्रीय अर्थसंकल्पाचा गोव्याला विशेष लाभ नाही
नारळ, काजूउत्पादनवाढीसाठीविशेषयोजना पणजी : गोवा राज्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून विशेष असा कोणताही लाभ मिळाला नसल्याचे समोर आले आहे. गोवा राज्यासाठी कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात नाही. तथापि किनारी भागातील नारळ, काजू उत्पादन वाढण्यासाठी विशेष योजना आखण्यात येणार असून त्याचा फायदा मात्र गोव्याला होऊ शकतो असे दिसून आले आहे. राज्यात तिसरा कुशावती जिल्हा स्थापन करण्यात आला असून त्याकरिता रु. [...]
कतारमध्ये आर्थिक प्रकरणात अडकलेले भारतीय नौदलाचे एकमेव माजी अधिकारी कमांडर पूर्णेंदू तिवारी यांचा जामीन अर्ज दोहा येथील सर्वोच्च न्यायालय (कॅसेशन कोर्ट) ने फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ‘फर्स्टपोस्ट’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पूर्णेंदू तिवारी यांच्या भगिनी […]
जनताभिमुख, लोकप्रधान अर्थसंकल्प : डॉ. प्रमोद सावंत
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. विकसित भारतासाठी तो पोषक असून सुधारणेवर आधारित जनताभिमुख व लोकप्रधान असा अर्थसंकल्प आहे. भारताची एकंदरित प्रगती, विकास वेगवान करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भांडवली खर्चात वाढ करण्यात आली असून नारळ, काजू उत्पादन वाढीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाचे उत्पादन वाढणार [...]
Ratnagiri : पडवे जि. प. गटात सचिन बाईत प्रचारात आघाडीवर
घराघरात पोहोचत सचिन बाईत यांचा जोरदार गुहागर : गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात काम करताना जनतेला बरोबर घेऊन पडवे जिल्हा परिषद गटात अनेक कामे मार्गी लावणारे महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेना उमेदवार सचिन बाईत यांनी पडवे जिल्हा [...]
राहुल गांधी यांनी डोकलामचा मुद्दा उपस्थित करताच सरकारची भंबेरी; लोसकभेत गदारोळ
लोकभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलत असताना संसदेत गादारोळ झाला आहे. भाषणात राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, नरवणे यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की डोकलाममध्ये आणि हिंदुस्थानी सीमेमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. राहुल गांधी यांनी नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करताच लोकसभेत गोंधळला सुरुवात […]
दिशाहिन अर्थसंकल्प : अमित पाटकर यांची प्रतिक्रिया
पणजी : गोव्यासारख्या छोट्या राज्याकडे या अर्थसंकल्पातून पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. तो पूर्णपणे दिशाहिन असून सामान्य जनतेसाठी त्यात काहीच नाही. बेकारी निर्मूलन व नोकऱ्यांची वाढ यासाठी अर्थसंकल्पातून काहीच साध्य होणार नसल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, वाढती महागाई रोखण्यासाठी आणि त्यातून जनतेला [...]
भावेश्वरीदेवी यात्रोत्सव आजपासून
विविधकार्यक्रमाचेआयोजन: उद्यायात्रेचामुख्यदिवस वार्ताहर/दड्डी कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भावेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला सोमवार दि. 2 पासून सुरुवात होणार आहे. भाविकांनी शांततेत देवदर्शन घ्यावे, असे आवाहन श्री भावेश्वरी देवी पाटील ट्रस्ट कमिटी यांनी केले आहे. सोमवार दि. 2 रोजी सायंकाळी 6 ते मंगळवार 3 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शस्त्र इंगळ्याचा कार्यक्रम होणार आहे. [...]
‘खाकी’तील हेकेखोर की दरोडेखोर?
भ्रष्टाचारामुळेखात्यालाबट्टा: अश्लीलचाळे, सोनेचोरीतसहभाग, पोलीसठाणीबनलेतरियलइस्टेटचालकांचेअड्डे रमेश हिरेमठ/बेळगाव मुख्यमंत्री सिद्धरामय्या व गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला कारभार पोलीस दलात चालतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेळगावात पोलीस ठाणे रियल इस्टेटचे अड्डे बनले आहेत. काही अधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे. शहर व उपनगरात मटका, जुगार व अमलीपदार्थांच्या व्यवसायाने उचल खाल्ली आहे. पोलीस केवळ गांजा [...]
विलीनीकरणाबाबत किती बैठाका झाल्या, हे सगळं दुखवटा संपल्यानंतर सांगणार –अनिल देशमुख
बारामतीत विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्ची राजकारणात सुरू आहेत. यावर दोन्ही राष्ट्रवादीकडून अनेक दावे- प्रतिदावे केले जात असताना यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. विलीनीकरणाबाबत दुखवटा झाल्यावर सविस्तर बोलू, असं अनिल देशमुख […]
कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांचे भाग्य उजळणार
कॅम्पमधीलरस्त्यांच्याडांबरीकरणकामाचाशुभारंभ बेळगाव : कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने मागील अनेक दिवसांपासून दुरुस्तीची मागणी केली जात होती. अखेर रविवारी कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांच्या डांबरीकरणाचा मुहूर्त मिळाला. महानगरपालिकेच्या निधीमधून कॅन्टोन्मेंटमधील महत्त्वाचे रस्ते केले जाणार आहेत. या कामांचा शुभारंभ आमदार असिफ सेठ यांच्या हस्ते झाला. कॅम्प येथील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण उखडले आहे. त्यामुळे वाहने चालविणेही अवघड झाले आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे [...]
अगसगे येथे शेतवाडीतील 30 निलगिरी झाडांची चोरी
वार्ताहर/अगसगे येथील बुधाजी परशुराम मेणसे यांच्या शेतवाडीतील सुमारे 30 निलगिरी झाडे काही अज्ञात चोरांनी कापून नेली आहेत. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे गावात एकच खळबळ माजली. याची माहिती कळताच काकती पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. बुधाजी परशराम मेणसे यांचे गावच्या पश्चिमेकडील गुड्डादेवी मंदिराकडे यांचे शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी निलगिरी झाडांची लागवड केली होती. [...]
जयनगरहिंडलगायेथीलप्रकार बेळगाव : सरकारी काम राबविताना कोणताही पुढचा मागचा विचार न करता ते पूर्ण पेले जाते आणि त्यानंतर होणारा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. याची प्रचिती सध्या जयनगर हिंडलगा येथील नागरिकांना येत आहे. चक्क नाल्यामधूनच पिण्याच्या पाण्याची पाईप घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाणी पुरवठा मंडळाच्या गलथान कारभाराचा आणखीन एक नमुना समोर आला [...]
कोकणातील शिमगा उत्सवातील पारंपारिक व पौराणिक लोकनृत्य पात्र संकासूर याला क्रूर व अंधश्रद्धा पसरवणारा म्हणून दाखविण्यात आल्याच्या आरोपावरून झी ५ या मराठी ओटीटीवर प्रसारित होत असलेल्या ‘देवखेळ’ या वेबसीरिजवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना […]
Ambabai Temple : चौथ्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यात
किरणोत्सवाची आज होणार सांगता कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी (रविवार) सूर्यकिरणे अंबाबाई मंदिरात दाखल होऊन ती देवीच्या गाभाऱ्यातही गेली होती. परंतू गाभाऱ्यातील संगमरवरी पायरीवर सूर्यकिरणे गेली असताना त्यांच्या आड [...]
Kolhapur Crime : संभाजीनगरात दहशत; पूर्ववैमनस्यातून तलवार, एडका नाचवत माजविली दहशत
कोल्हापुरात तरुणाच्या घरावर तलवार–एडक्याने हल्ला कोल्हापूर : तरुणास केलेल्या मारहाणीनंतर त्याला उपचारासाठी नेल्याचा राग मनात धरून ५ जणांच्या टोळक्याने संभाजीनगर येथील नारायणराव सासनेनगर परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास बिअरच्या बाटल्या दारात फोडून, तलवार आणि एडका नाचवत [...]
Oracle layoffs – AI विस्तारासाठी निधीची चणचण; ३०,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?
जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकल (Oracle) आपल्या कर्मचारी संख्येत मोठी कपात करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. ‘एआय’ (AI) डेटा सेंटर विस्तारासाठी लागणारा अवाढव्य खर्च आणि कर्जाच्या वाढत्या दरांमुळे कंपनी २०,००० ते ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता आहे. तसेच, परिस्थिती हाताबाहेर गेल्यास ओरॅकल आपली आरोग्य सेवा सॉफ्टवेअर युनिट ‘सर्नेर’ (Cerner) विकण्याचा विचारही करत आहे. गुंतवणूक बँक […]
Crime News –रेल्वे स्टेशन परिसरात दुर्गंधी पसरली, नागरिक हैराण; सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
रविवारी (01 फेब्रुवारी 2026) सकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात एका सुटकेसमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुटकेस तपासली असता बॅगमध्ये एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढलून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. बिहारमधील रोहतास जिल्ह्यामधील सासाराम रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण […]
बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच एक वेगळे चित्र दिसले. ‘राष्ट्रीय जनता दल’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना व्हीलचेअरवरून विधानमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये नेण्यात आले. याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. तेजस्वी यादव यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना आरजेडीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत […]
पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अॅण्ड रन प्रकरणात दोन निष्पाप इंजिनीअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुराव्यांशी छेडछाड आणि रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप असलेल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने 18 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या आशिष सतीश मित्तल, आदित्य अविनाश सूद आणि अमर संतोष गायकवाड यांच्या […]
Gold Silver Rate –आधी किमती गगनाला भिडल्या, आता भूईसपाट झाल्या, सोन्या-चांदीतील घसरण सुरुच
सोने-चांदीच्या किमतीत होत असलेली घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. अर्थसंकल्पाने शेअर बाजाराची निराशा केल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. तसेच शुक्रवारी संध्याकाळपासून सोन्या- चांदीतील घसरणीचे सत्र अजूनही सुरुच आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशीही सोन्या-चांदीत मोठी घसरण दिसून आली होती. त्यानंतर आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पुन्हा सोने-चांदीची पुन्हा मोठी घसरण झाली आहे. सोमवारी बाजाराची […]
सीमावासियांना मराठी भाषेमुळे लढण्याचे बळ
संमेलनाध्यक्ष प्रा. राजेंद्र कुंभार यांचे प्रतिपादन : 21 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात : रसिक श्रोत्यांची उपस्थिती बेळगाव : सीमावासियांना मराठी भाषेने लढण्याचे बळ दिले आहे. जो आपली भाषा विसरतो, हरवतो त्याला भावनिक अपंगत्व येते. ज्यांना भाषेचा अभिमान नाही, ते दुय्यम प्रतीचे जीवन जगतात. इंग्रजीशिवाय पर्याय नाही असे मानल्याने मराठी भाषेचा मोहोर झडत [...]
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून रचला गेला कट, वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या संस्कृतीनुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून हा कट शिजला, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. […]
पत्रकार मनीषा सुभेदार यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान
केएलईचेडॉ. अभिजितश्रीकांतगोगटेयांनीस्वीकारलासामाजिकपुरस्कार बेळगाव : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘तरुण भारत’च्या पत्रकार मनीषा सुभेदार यांना कै. कृष्णा मुचंडी पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर कै. मारुती पाटील सामाजिक पुरस्कार केएलईचे डॉ. अभिजित श्रीकांत गोगटे यांना देण्यात आला. मनीषा सुभेदार यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ज्या ‘वार्ता’ दैनिकामधून पत्रकारितेला सुरुवात झाली, त्या दैनिकाचे [...]
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया
बेळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा न करता लहान उद्योगांना बळकटी आणण्यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. आयकरामध्येही कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे, अशा प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या. तर काहींनी मात्र भरीव तरतुदी नसल्याने निराशा झाल्याचे सांगितले. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबत [...]
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे बेळगाव महानगर भाजपकडून स्वागत
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प विविध क्षेत्रांसाठी लाभदायक आहे. पायाभूत सुविधा आणि दळणवळणाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. 2027 पर्यंत केंद्र सरकारने विकसित भारत हे ध्येय ठेवले आहे, असे संचालक आणि भाजप माजी राज्य प्रवक्ते अॅड. एम. बी. जिरली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्र सरकारने [...]
Balochistan Militants Attacks: बलुचिस्तानमधील हल्ल्यामागे दोन महिलांचा हात; BLA कडून फोटो जाहीर
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या भीषण हिंसाचाराची परिस्थिती हाताबाहेर गेली असून ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने बलुचिस्तान प्रांतातील अनेक शहरांमध्ये एकाच वेळी मोठे आत्मघातकी हल्ले केले.या हल्ल्यांमध्ये सुमारे सुरक्षा दलाचे 17 जवान आणि 31 सामान्य नागरिकांसह एकूण 50 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यांनंतर, बीएलएने दोन हल्लेखोरांचे फोटो जाहीर केले […]
स्टेशन रोडवर उभारलेल्या महिलांच्या प्रतिकृतींचे उद्घाटन
बेळगाव : इंदूरच्या धर्तीवर शहरातील स्टेशन रोडवरील नाल्यावर उभारण्यात आलेल्या महिलांच्या प्रतिकृतींचे रविवारी स्थानिक नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कचरा खुल्या ठिकाणी किंवा नाल्यात टाकण्याऐवजी तो घंटागाडीकडे देण्यात यावा, असा संदेश या माध्यमातून जनतेला देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी नगरसेवक आणि आरोग्य विभागातील अधिकारी इंदूर दौऱ्यावर गेले होते. त्या ठिकाणी [...]
अनगोळ स्मशानभूमीत स्वखर्चातून बसविले श्रीदत्त आरती, अग्निमंत्र फलक
बेळगाव : अनगोळ स्मशानभूमी आवारात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वखर्चातून श्री दत्त आरती आणि अग्निमंत्र असलेले दोन फलक बसविले आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना सहजरित्या आरती व अग्निमंत्र म्हणता यावेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. अनगोळ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईक व नागरिकांना सोयीस्कर व्हावे यासाठी [...]
देशमुख रोड आरपीडी क्रॉस रस्ता दुरुस्तीची आवश्यकता
बेळगाव : देशमुख रोड आरपीडी क्रॉसवर 15 दिवसांपूर्वी महापालिकेकडून ड्रेनेजच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले होते. काम आटोपल्यानंतर सदर खड्डा बुजविण्यासाठी मुरुम टाकण्यात आले होते. यामुळे रस्ता खचखळगा झाल्याने वाहने स्लीप होण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पादचाऱ्यांनाही या रस्त्याची समस्या होत असून वाहतुकीदरम्यान अडचणी निर्माण होत आहे. यासाठी संबंधित विभागाने [...]
पिंगुळीत कारच्या धडकेत महिला जागीच ठार
मुंबई -गोवा महामार्गावरील घटना कुडाळ – मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी- मोरजकरवाडी येथे सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारची जोराची धडक बसून पादचारी श्रीमती आशा सोनू धुरी ( 65, रा. पिंगुळी- धुरीटेंबनगर ) या जागीच ठार झाली.ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली.त्या घाट जात असताना ही घटना घडली.श्रीमती धुरी या आज सकाळी 9.30 वाजण्याच्या [...]
जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनला एक ‘आर्थिक महासत्ता’ बनवण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे. चीनच्या ‘युआन’ या चलनाला जागतिक स्तरावर ‘रिझर्व्ह करन्सी’ (राखीव चलन) म्हणून प्रस्थापित करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक व परकीय चलन बाजारात त्याचा वापर वाढवणे, हे चीनचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट […]
अजित पवारांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीत, तपासाला वेग
28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. आता VT-SSK या विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीला पोहोचला असून, त्याचे डिकोडिंग एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB)कडून केले जाणार आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणाशी संबंधित महत्त्वाचा डेटा आणि कॉकपिटमधील […]
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करा
डॉ. उमाकुलकर्णीयांचेप्रतिपादन: 20 वेबेळगुंदीमराठीसाहित्यसंमेलनउत्साहात वार्ताहर/किणये अलीकडे वाचनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मोबाईलचा अतिरेक वाढला आहे. वाचकांना दर्जेदार साहित्य देण्यासाठी साहित्यिकांनी वाचन, लेखन समृद्ध केले पाहिजे. साहित्यामुळे जीवनाचा अर्थ कळतो. वाचकांची गरज ओळखून आपण वाचकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून लेखन केले पाहिजे. सध्याच्या काळात टिकून राहायचे असेल तर लेखकांनी गुणवत्ता वाढविली पाहिजे. समाजात परिवर्तन हे वाचन आणि [...]
लोककल्पतर्फे गोल्याळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे अरिहंत हॉस्पिटलच्या साहाय्याने खानापूर तालुक्यातील गोल्याळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजिण्यात आले. सुमारे 50 हून अधिक ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली. दर्जेदार आरोग्य सुविधांची पूर्तता करून निदान करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. अरिहंत हॉस्पिटलच्या तेजस्विनी पी., डॉ. चिन्मय दीक्षित आणि परिचारिका लक्ष्मी पाटील [...]
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा शहरात सुरळीत
बेळगाव : केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणारी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी बेळगाव शहरातील केंद्रांवर पार पडली. सरकारीसह अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील आठवीचे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामुळे सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची धावपळ दिसून आली. गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा होते. रविवार दि. 1 रोजी सकाळी [...]
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’ येथे अमेरिका आणि इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी नेत्यांची एक महत्त्वाची गुप्त बैठक पार पडली. इराणसोबतचा संघर्ष विकोपाला गेलेला असतानाच या दोन मित्रराष्ट्रांनी लष्करी रणनीतीवर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे. या बैठकीत अमेरिकेचे ‘चेअरमन ऑफ द जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ’ जनरल डॅन केन आणि इस्रायलच्या सशस्त्र दलाचे […]
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांनी गेल्या 4 महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होती आणि 12 तारखेला निर्णय जाहीर करायचा होता, असा दावा केला होता. हा दावा सुनील तटकरे यांनी फेटाळून लावला होता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना भाजपला सांगितल्याशिवाय अजितदादा अशी चर्चा करतील का, […]
वयाच्या ९० व्या वर्षी दलाई लामांना पहिला ‘ग्रॅमी’पुरस्कार; ‘बेस्ट ऑडिओ बुक’श्रेणीत मारली बाजी
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या जागतिक सन्मानांच्या यादीत आता एका आगळ्यावेगळ्या पुरस्काराची भर पडली आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांना पहिला ‘ग्रॅमी पुरस्कार’ (Grammy Award) जाहीर झाला आहे. ‘बेस्ट ऑडिओ बुक, नॅरेशन आणि स्टोरीटेलिंग रेकॉर्डिंग’ या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. दलाई लामा यांच्या ‘मेडिटेशन्स: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा’ (Meditations: […]
बारामती येथे 28 जानेवारी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या अपघातानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात असून अजित पवार यांच्या पक्षाचे नेतेच या अपघातावर शंका उपस्थित करत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचे रहस्य वाढले आहे. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. 15 जानेवारीला […]
Budget 2026 ‘अन्यायकारक’अर्थसंकल्प! म्हणत हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी केले लक्ष्य
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘या अर्थसंकल्पाने पहाडी राज्यांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, नैसर्गिक आपत्तीने होरपळलेल्या हिमाचल प्रदेशला कोणतीही विशेष मदत दिली नाही’, अशा शब्दांत त्यांनी केंद्रावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाला ‘अन्यायकारक’ आणि ‘उपेक्षेचे चक्रव्यूह’ असे संबोधले. हा अर्थसंकल्प गरीब आणि […]
तंत्रज्ञान आणि नवोपक्रम हे ‘विकसित भारताचे’ सर्वात मोठे इंजिन असल्याचे वर्णन निर्मला सीतारामन यांनी केले. भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणार नाही तर त्याचे नेतृत्व करेल असे त्या म्हणाल्या.हिंदुस्थानातील ऑनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) क्षेत्र झपाटय़ाने वाढत आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी 15 हजार शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेट क्रिएटर प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली. यासाठी […]
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘मिया’ (बंगाली भाषिक मुस्लिम) समुदायाबाबत पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘जोपर्यंत मी सत्तेत आहे, तोपर्यंत या लोकांना अडचणींचा सामना करावाच लागेल; आपण त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू, तेव्हाच ते राज्य सोडून जातील’, असे विधान सरमा यांनी केले आहे. एका शासकीय कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले […]
देशात महिला मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सत्तेची चावी महिलांच्या हाती राहणार आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी काही घोषणा केल्या आहेत. ‘शी–मार्ट’ निर्मला सीतारामन यांनी ‘शी-मार्ट’ या संकल्पनेची घोषणा केली आहे. या माध्यमातून स्वयंसहायता गट, ग्रामीण महिला उद्योजक आणि स्टार्टअपशी संबंधित महिलांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. ही […]
आकड्यांची भेळ आणि सामान्यांच्या स्वप्नांचा खेळ, जयंत पाटील यांची अर्थसंकल्पावर टीका
केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘आकड्यांची भेळ आणि सामान्यांच्या स्वप्नांचा खेळ’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ‘युवाशक्ती-ड्रिव्हन’ असे सरकारने या अर्थसंकल्पाला म्हटले असले तरी हा अर्थसंकल्प म्हणजे आभासी स्वप्नांचा डोलारा आहे, असे पाटील म्हणाले. राष्ट्रीय आयुष मिशनच्या निधीत कपात आणि आयुष्मान भारत योजनेतील तरतूद न वाढवणे म्हणजे जनतेच्या आरोग्याशी क्रूर थट्टा […]

26 C