पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण –शीतल तेजवानीला अटक
मुंढव्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली आहे. #WATCH | Pune, Maharashtra: DCP Pune, Vivek Masal, says, “Today, on 3 December 2025… the accused, Sheetal Tejwani, has been arrested, and further investigation is going on. She has been given complete information about the ground arrest. She has illegally […]
राज्यसभेने अधिवेशनापूर्वी जारी वकेलेल्या बुलेटिनमधून सभागृहात भाषणानंतर वंदे मातरम, जय हिंद अशा घोषणा न देण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारच्या या आदेशावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. MPs of @ShivSenaUBT_ , @priyankac19 ji and @AGSawant ji met the Vice […]
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ७ नक्षलवादी ठार; २ जवानही शहीद
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. यात सात नक्षलवादीही ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरू आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत, तर दोन जवानही शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विजापूरच्या गंगलूर भागात ही चकमक […]
अतिवृष्टीचे 1278 कोटी अनुदान वितरीत- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांसना महायुती सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापोटी 1278 कोटी दिवाळीपासून आजवर शेतकर्यांनच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. अडचणीच्या काळात असलेल्या शेतकर्याींना महायुती सरकारने दिलेल्या अनुदान आणि मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. खरिपातील पिकांना बसलेल्या फटक्यामुळे पीकविमा मिळण्यात येणाऱ्या अडचणीही आता दूर झाल्या आहेत. पीक कापणी प्रयोगातील काही बाबींवर विमा कंपनीने आक्षेप घेतलेला होता. त्यावर सुनावणी सुरू आहे. पीकविमाही लवकरच शेतकऱ् यांच्या थेट खात्यात जमा होण्यास लवकरच सुरुवात होईल, याची खात्री असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांरना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी अनुदान आणि मदत जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. शेतकर्यांना नुकसानीच्या दुःखातून बाहेर काढून त्यांना नव्या उमेदीने उभे करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने अभुतपूर्व मदतीचा हातभार दिला आहे. एकंदरीत अडचणीच्या काळात अत्यंत संवेदनशीलपणे आपल्या महायुती सरकारने शेतकरी बांधवांना दिलासा दिला आहे. खंबीरपणे अडचणीच्या काळात अभुतपूर्व मदत दिल्याबद्दल जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सरकारचे धन्यवाद मानले आहेत. जिल्ह्यात सन 2025 मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतीपीक व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने मंजूर केलेल्या अनुदान वितरण प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही वेळेत लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील एकूण 9,76,825 खात्यांवर तब्बल 1278.6897 कोटींचे अनुदान वितरित झाले आहे. या आर्थिक सहाय्यामध्ये पिकांचे नुकसान, शेतजमिनीची हानी, रब्बी पेरणी व इतर आनुषंगिक बाबींसाठीच्या मदतीचा समावेश आहे. शासनाच्या नवीन निकषांनुसार 3 हेक्टर मर्यादेपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठीही अनुदान उपलब्ध होणार आहे. अनुदान थेट खात्यावर जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असून शेतकऱ्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. तसेच सामाईक क्षेत्रधारक शेतकऱ्यांनी अनुदान ज्यांच्या नावावर घ्यावयाचे आहे त्या व्यक्तीच्या नावाचे संमतीपत्र तयार करून संबंधित तलाठी कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. कागदपत्रांची पूर्तता व ई-केवायसी पूर्ण झालेल्या खात्यांवर अनुदान वितरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या अभूतपूर्व संकटात शेतकऱ्यांना दिलेला शब्द आपल्या महायुती सरकारने पाळला आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी धाराशिव जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. कठीण काळात शेतकऱ्यांना मिळणारे हे आर्थिक बळ अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही समाधानकारक बाब आहे. आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत. पीक विमाही लवकरच मिळणार पीक विमा खरीप 2025 संबंधित प्रक्रिया सुरू असून पिक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा कंपनीने नोंदविलेल्या आक्षेपांवर जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणीची कार्यवाही सुरू आहे. सुनावणी संपल्यानंतर शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरणाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. शासन व प्रशासनासोबत शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
तीन स्थगित जागांसाठी नवा कार्यक्रम जाहीर
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत 2 डिसेंबर रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमुळे तीन जागांवर (प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब) निवडणुका स्थगित झाल्या होत्या. या तिन्ही प्रभागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून 4 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. शहरातील 38 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक पूर्ण झाल्यानंतर आता धाराशिवकरांचे लक्ष स्थगित झालेल्या या तीन जागांकडे लागले आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रम (धाराशिव – 3 जागा) निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख : 4 डिसेंबर 2025, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2025 (दुपारी 3.00 वाजेपर्यंत), निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी : 11 डिसेंबर 2025, आवश्यक असल्यास मतदानाचा दिवस : 20 डिसेंबर 2025 (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30), मतमोजणी व निकाल : 21 डिसेंबर 2025 (सकाळी 10.00 पासून), शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची तारीख : 23 डिसेंबर 2025 नवीन उमेदवारांना उमेदवारीची संधी मिळणार का? 2 डिसेंबरला 38 जागांसाठी झालेल्या मतदानासोबतच 20 डिसेंबरच्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्र केली जाणार आहे. यामुळे सर्वांचे लक्ष या तीन प्रभागांच्या निवडणुकीतील उमेदवारी प्रक्रियेवर केंद्रीत झाले आहे. निवडणूक विभागाच्या माहितीनुसारनवीन कार्यक्रमात नवीन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. जुन्या उमेदवारांचे वैध अर्जच कायम राहणार असून तेच उमेदवार निवडणूक प्रक्रियेत राहतील. मात्र ज्यांना आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे, त्यांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे. 2 डिसेंबर रोजी धाराशिव नगरपालिकेत केवळ 61% मतदान झाले असून, ही टक्केवारी जिल्ह्यातील इतर सात नगरपालिकांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे 21 डिसेंबर रोजी लागणारा अंतिम निकाल कोणत्या दिशेने झुकणार? याकडे नागरिकांचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. धाराशिवप्रमाणेच उमरगा नगरपालिकेतील 3 जागांसाठीदेखील 20 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.
मोदी सरकार जातनिहाय जनगणना ही बहुजनांचा विश्वासघात आहे, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जातनिहाय जनगणनेबाबत संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरानंतर त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी जातनिहाय जनगणनेला विश्वासघात म्हटले. ते म्हणाले आहेत की, सरकारची जातनिहाय जनगणना देशातील बहुजनांचा विश्वासघात आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या उत्तराची परत X वर शेअर करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, “मी संसदेत जातनिहाय […]
एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि.चे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांचा वाढदिवस बुधवारी (दि.3) कारखानास्थळी विविध उपक्रमाने अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. चेअरमन पाटील यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाच्या निमित्ताने कर्मचार्यांना थंडीपासून सुरक्षेसाठी ट्रायसूट, ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर, कपडा तसेच सुशोभिकरणासाठी कारखान्याच्या विविध विभागास वृक्षाच्या कुंड्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशी, चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, सिव्हिल इंजिनिअर विश्वास पाटील, फोरमन विजय वाघे, प्रवीण पाटील, बॉयलर विभाग अजय गाडे, सुधाकर खोत, सुरक्षा अधिकारी मेजर चंद्रकांत पवार, परचेस अधिकारी रवि जोगदंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, दत्तात्रय टेकाळे, गोडाऊन किपर सुरेंद्र गिरी, राजाभाऊ केवळराम, अक्षय माने, प्रज्योत माने, बालाजी गुळवे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
उत्तर सोलापूर तालुक्यात शेतीसाठी अनुदानाची मागणी उत्तर सोलापूर : नान्नज अभयारण्यात वास्तव्याला असलेल्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे नान्नजसह वडाळा, मार्डी, कारंबा, अकोलेकाटी, नरोटेवाडी आणि लगतच्या बाणेगाव, बिबीदारफळ, रानमसले आदी गावांमधील शेतीमधील उभी पिके उद्ध्वस्त होत आहेत. तेव्हा या गावांतील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्याची [...]
Solapur News : करमाळ्याच्या मौलाली नगरात दोन गटात तुंबळ हाणामारी
मौलाली नगरमध्ये मतदानादरम्यान दोन गटांमध्ये वाद करमाळा : शहरातील मौलाली नगर येथे मतदानादरम्यान प्रभागात फिरण्यावरून तसेच प्रचार करण्यावरून झालेल्या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये दोन गटात परस्पर गुन्हा दाखल [...]
जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२५ साठी २६ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडा खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे,या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.या वर्षी जिल्ह्यातून पुढीलप्रमाणे चार पुरस्कार देण्यात येणार आहेत १) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (०१), २) गुणवंत खेळाडू – (महिला ०१, पुरुष ०१ व दिव्यांग खेळाडू ०१).या पुरस्काराचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी दिनांक ०१ जुलै ते ३० जून या कालावधीतील मागील पाच वर्षांची कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात किमान १५ वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शकाने सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शन केलेले असावे आणि त्यांचे वय ३५ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे जिल्ह्याच्या मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारातील अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे. क्रीडा मार्गदर्शकांसाठी गेल्या दहा वर्षांत वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते,तसेच कनिष्ठ,शालेय, ग्रामीण आणि महिला (खेलो इंडिया) राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडू घडविलेले असणे आवश्यक आहे.सांघिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील नॅशनल गेम्स,वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेला खेळाडू किंवा राज्य/जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळवणारे किमान तीन खेळाडू तयार केलेल्या मार्गदर्शकांकडून विहित नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तिकरीत्या नियत मुदतीत सादर करण्याची आवश्यकता आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधावा.विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्तावासह अर्ज २६ डिसेंबर २०२५ पर्यंत श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
Pandharpur News : पंढरपूर पोलिसांची देशी दारू कारवाई, सात लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर पोलिसांचे निवडणूक पार्श्वभूमीवर सक्रिय पथक पंढरपूर : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांनी तीन रस्ता, पंढरपूर येथे नाकाबंदी करीत चारचाकीतून देशी दारूचे बॉक्स वाहणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सात लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला [...]
Solapur : चिंचोली येथील सीएनजी पंप अचानक बंद
सोलापुरातील प्रमुख सीएनजी पंप बंद, सोलापूर : एमआयडीसी चिंचोली परिसरात आयएनसी लिमिटेडतर्फे चालवला जाणारा सोलापुरातील प्रमुख सीएनजी पंप मंगळवारपासून अचानक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.कंपनीने सोमवारीच पंप परिसरात नोटीस फलक लावून २ डिसेंबरपासून पंप [...]
समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात,'सुराणा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचा वसा जपला. त्यांनी राजकीय क्षेत्रातही आदर्शवाद जोपासला. शेती, शेतकरी यांच्यासह पर्यावरण रक्षण, जलसंधारण यांच्यासाठी ते अखेरपर्यंत व्रतस्थपणे कार्यरत राहीले. नळदुर्ग येथील 'आपलं घर'बालगृह व शाळेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो अनाथ मुलांच्या आयुष्यात नवसंजीवनी आणली. त्यांची निस्पृह आणि आदर्श अशी जीवनशैली समाजकारण - राजकारणातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांचे निधन महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारण क्षेत्राची हानी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुराणा यांचे कुटुंबीय तसेच कार्यकर्ते यांच्याप्रती संवेदना व्यक्त केली आहे. आपण या सर्वांच्या दुःखात सहभागी असल्याचे नमूद केले आहे.
शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई (प्रतिनिधी)- ज्येष्ठ समाजवादी नेते, दैनिक मराठवाडाचे माजी संपादक पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जुना समाजवादी पक्ष,जनता पक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जन आंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोठा वाटा होता. 'चले जाव'आंदोलनापासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत, त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक,राजकीय स्थित्यंतराचे ते साक्षीदार होते. मराठवाड्यात भूकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या 'आपलं घर'मधून अनेक मुला- मुलींची आयुष्य घडली आहेत. पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची होणार नियुक्ती
एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे. सदानंद दाते हे १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पोलीस महासंचालक पदाची कारकीर्द डिसेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांनी आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलीस, एसपी नवी मुंबई आदी पदावर काम केले […]
Satara News : साताऱ्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळ; लालपरी तीनदा ‘ब्रेकफेल’
साताऱ्यात सलग तीन दिवसांत एसटी बसचा ब्रेकफेल by प्रशांत जगताप सातारा : एसटी नादुरूस्त होणे, ही बाब नित्याचीच, पण एकच गाडी तीन दिवसात सलग तीनवेळा ‘ब्रेकफेल’ झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या तिन्हीवेळी संबंधित एसटीत प्रवासी होते. ब्रेक निकामी झाल्यानंतर [...]
महिलांवर अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कालचा दिवस हा महाराष्ट्रातला काळा दिवस –सुप्रिया सुळे
महाराष्टात परिस्थिती खराब होत आहे. देवेंद्रजी काही तरी करा हो राजकारण होत राहील. महाराष्ट्रामध्ये 50-60 वर्षामधील काळा दिवस कोणता आहे. तर महिलांवर अत्याचाराचा, शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आणि कालचा दिवस हा काळा असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या […]
धाराशिव जिल्ह्यात मतदानामध्ये तुळजापूर अव्वल
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आठ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्याची एकूण मतदानाची सरासरी 68.97 टक्के इतकी असली तरी जिल्ह्यात तुळजापूर शहरवासिय मतदान प्रक्रियेमध्ये अव्वल राहिले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच धाराशिव शहरात मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु मतदान केंद्रामध्ये धिम्या गतीने मतदान सुरू होते. दोन मशीनवरील तिघांना मतदान देणे आवश्यक असल्यामुळे तिन्ही मतदान केल्यानंतरच मशीनचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे मतदारांना वरचे नाव त्याच मशीनवरील खालील उमेदवाराचे नाव व दुसऱ्या मशीनवरील तिसऱ्या उमेदवाराचे नाव पाहण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे धाराशिव शहरात धिम्या गतीने मतदान चालू होते. परंतु जिल्ह्यात तुळजापूर, भूम, परंडा, नळदुर्ग, कळंब या ठिकाणी मतदान गतीने झाल्यामुळे मतदानांची टक्केवारी वाढली आहे. धाराशिव शहरातील खॉजानगर येथील जिल्हा होमगार्ड मतदान केंद्रावर रात्री साडेसात पर्यंत मतदान प्रक्रिया चालू होती. मतदानाची सरासरी 68.97 टक्के धाराशिव जिल्ह्याची मतदानांची सरासरी 68.97 टक्के आहे. जिल्ह्यातील आठ ही नगरपालिकेत एकूण 2 लाख 43 हजार 672 मतदारांपैकी 1 लाख 68 हजार 56 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरूष 87 हजार 735 तर महिला 80 हजार 302 एवढ्या मतदारांचा समावेश होता. नगर परिषद निहाय मतदानाची अंतिम टक्केवारी पाहिल्यास तुळजापूर 80.28 टक्के, भूम 79.21 टक्के, परंडा 78.13 टक्के, नळदुर्ग 73.17 टक्के, कळंब 72.69 टक्के, मुरूम 67.41 टक्के, उमरगा 66.81 टक्के आणि धाराशिव 61.14 टक्के या प्रमाणे टक्केवारी आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले धाराशिव शहरात जिल्ह्यात सगळ्यात कमी मतदान झाले आहे. हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होत आहे.
कृषीपंपांना कॅपॅसिटर बसवा, रोहीत्रे व वीजयंत्रणेची हानी टाळा
धाराशिव (प्रतिनिधी)- रब्बीचा हंगाम सुरू झाला की कृषीपंपाचा वापर वाढत जातो. अनेकदा रोहीत्रांसोबतच पाण्याची मोटर जळाल्याच्या तक्रारी वाढत जातात. विजेचा भार नियंत्रीत करणारे कॅपॅसीटरचा वापर फार कमी शेतकरी करतात त्याचबरोबर ॲटोस्विचचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परिणामी अचानक विजेचा भार वाढल्याने वीज यंत्रणे सोबतच पाण्याची मोटर जळण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीपंपाचा वापर योग्य ते कॅपॅसीटर लावूनच करावा असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने बहूतांश शेतकरी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होणे तसेच पाण्याची मोटर जळन्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान होवू नये तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवावेत. कॅपॅसिटरची गरज का? प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे योग्य दाबाचा वीजपुरवठा होतो, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होते. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी कृषिपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली आहे. त्यामुळे ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत. कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. पुरेशा दाबाने वीज पुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार 30 टक्क्यांने कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येते. योग्य दाबाचा, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळतो. या सर्वांचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे त्यांनी कॅपॅसिटर'चा वापर नचुकता करावा. ऑटोस्विचचा वापर टाळावा राज्यात 45 लाखांहून अधिक कृषिपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना 'ऑटोस्विच'लावले असल्याचे दिसून येते. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाच वेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना 'ऑटोस्विच'लावू नये तसेच इतर शेतकऱ्यांनी ते लावले असल्यास त्वरीत काढून टाकावेत असे आवाहन महावितरणने केले आहे.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दिव्यांगांचा गौरव
मुरुम (प्रतिनिधी)- तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यात आला. दिव्यांगांना सर्वांच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, दिव्यांग मध्ये अधिकाऱ्यांबाबत जागृती व्हावी, दिव्यांगांबाबत शासकीय योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त महाविद्यालयात प्रतिनिधीक स्वरूपात दिव्यांग विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे सायली बिराजदार (बी.ए. द्वितीय वर्ष), अक्षय विजयापुरे (बी.ए. द्वितीय वर्ष), तर नीट परीक्षेची तयारी करणारी राजश्री भोसले (इयत्ता बारावी) या विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयातील आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त ग्रंथालय परिचर भगवान औरादे यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संजय असेल म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे यावेळी त्यांनी कौतुक केले. या सन्मानामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे मनोबल अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, उपप्राचार्य गुंडाजी मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, डॉ. ज्ञानोबा ढोबळे, डॉ. भरत शेळके, प्रा. मुरली जाधव तसेच रजिस्टर राजकुमार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. बी. ढोबळे यांनी केले तर डॉ. भरत शेळके यांनी आभार मानले.
तीर्थक्षेत्र तुळजापूरात मतदानादिनी भाविकांची गर्दी
तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्यभर नगरपरिषद निवडणुकीचे मतदान सुरू असतानाही मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी तीर्थक्षेत्र तुळजापूरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. थंडीचा जोर असतानाही सकाळपासूनच भाविक श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत होते. सलग सुट्यांचा योग आल्यानंतर शनिवारपासूनच तुळजापूरात भाविकांची सततची राळ सुरू झाली होती. शनिवार, रविवार, मंगळवारच्या सुट्ट्या आणि त्यात सोमवारी घेतलेल्या रजेमुळे चार दिवसांचा ब्रेक मिळाल्याने शहरी भागातून मोठा ओघ दिसून आला. आज तर परिस्थिती वेगळीच होती. अनेक शहरी भाविकांनी मतदान केंद्रावर जाण्याऐवजी थेट तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला येण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे मतदानाच्या दिवशीही तुळजापूरात भाविकांची असामान्य गर्दी झाली.
भूममध्ये मतदानासाठी उत्तम प्रतिसाद
भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 2 डिंसेबर रोजी सकाळी 7 :30 वाजल्यापासून मतदानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. युवक, युवती,महिला जेष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी भूम शहरातील 21 मतदान केंद्रावर सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत मतदान केले. आलमप्रभू शहर विकास आघाडी व जनशक्ती शहर विकास आघाडीच्या वतीने सर्व बूथवर कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. दोन्ही आघाडीकडून इतर गावांना असणाऱ्या मतदारांना साद घातल्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे. दोन्ही आघाडीकडून प्रचार जोराचा करण्यात आला होता. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाची निवडणूक चुरशीची झाली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दोन्ही आघाड्याकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पारड्यामध्ये पडते. येणाऱ्या 21 डिसेंबर रोजी दिसून येणार आहे. मात्र नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लाभल्यामुळे कार्यकर्ते ,नेतेमंडळी यांची मात्र पूर्णपणे निराशात झाली असल्याचे पहावयास मिळाले. बाहेर जाऊन आलेले काही कार्यकर्ते मतदार निकालासाठी गावांमध्येच थांबणार होते. मात्र निकाल पुढे ढकलल्यामुळे कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा आली.
82 जणांचे भवितव्य मशीनमध्ये बंद ; 3 जागेसाठीचे 12 जणांची निवडणूक स्थगित
उमरगा (प्रतिनिधी)- नगरपालिका निवडणुकीत शहरातील 37 मतदान केंद्रावर उमरगा नगरपालिका निवडणुकीत 66.81 टक्के मतदान झाले आहे. 21 हजार 239 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 11 हजार 35 पुरुष तर 10 हजार 200 महिलांचा व इतर 4 जणांचा समावेश आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 4 तर 12 प्रभागातील 25 जागेसाठी 90 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी तीन जागेवरील 12 उमेदवारांच्या निवडणुकीला आयोगाने स्थगिती दिली आहे. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेविकांच्या 22 जागेसाठीच्या 78 उमेदवारांच्या अतितटीच्या तिरंगी निवडणुकीत 82 जणांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. उमरगा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर 12 प्रभागातील 25 जागेसाठी 90 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी प्रभाग 4 (ब), 7 (अ) व 11 (अ) या तीन प्रभागातील 12 उमेदवारांचे निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे नगरसेविकांच्या 22 जागेसाठीच्या 78 उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. मंगळवारी (दि.2) शहरातील 31 हजार 791 मतदानापैकी 37 मतदान केंद्रावर 66.81 टक्के मतदान झाले आहे. 21 हजार 239 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 11 हजार 35 पुरुष तर 10 हजार 200 महिलांचा व इतर 4 जणांचा समावेश आहे. प्रचाराच्या काळात शिवसेनेने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची शिवसेना (ठाकरे) कडून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभातून निवडणूकीत वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना आत्मविश्वास आसल्याने स्वतःच्या बळावर कॉर्नर बैठका व गाठीभेटी वर भर देत शेवटच्या दिवशी माजी मंत्री बसवराज पाटील व माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सभेतून निवडणूक प्रचारात रान पेटवले. मंगळवारी सकाळी 7.30 पासुन मतदानाला सुरुवात झाली. अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी वयस्क, अपंग, आजारी मतदारांना घरी जाऊन गाडीत घेऊन येत होते.
पंडित कांबळे यांच्या खुटकंदील या कथासंपादनास पुरस्कार प्रदान
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान, आसू ता. फलटण जिल्हा सातारा व स्वदेशी भारत बचत गट सकुंडे मळा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या कार्यक्रमात पंडित कांबळे यांनी संपादित केलेल्या “खुटकंदील योगीराज वाघमारे यांच्या अभ्यासक्रमीय कथा“ या कथासंपादनास स्वदेशी भारत साहित्य सन्मान पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आला. श्री काळेश्वर मंदिर आसू येथे हुतात्मा राजू भाई दीक्षित यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त 'स्वदेशी दिनी'म्हणजेच 30 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलनात महानुभाव पंथाचे नरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते व फलटणचे जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, अभ्यासक्रमातील कवी हनुमंत चांदगुडे, जीवन इंगळे व कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश सकुंडे गुरुजी यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, वृक्षाची रोप व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. पंडित कांबळे यांचे यापूर्वी “संदर्भ“, “चरथ भिक्खवे“, “पेटलेल्या शहराच्या कल्लोळात“, हे कविता संग्रह, नाचा रे नाचा, गाणी माझ्या गावची, विहार गाणी हे बालकविता संग्रह प्रकाशित आहेत. साहित्यिक प्रवृत्ती : मूल्ये आणि जाणीव हे योगीराज वाघमारे यांच्या प्रस्तावनाचे संपादन. उजेडाचा वारस: यु.डी. गायकवाड गौरव ग्रंथ, उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकरवादी साहित्यिक, दतांकुर यांच्या निवडक कविता, खुटकंदील योगीराज वाघमारे यांच्या अभ्यासक्रमीय कथा ही संपादित पुस्तके प्रकाशित आहेत. तर डॉक्टर बाबुराव गायकवाड यांचे साहित्य आशय आणि विश्लेषण हे समीक्षेची पुस्तक प्रकाशित आहे. पंडित कांबळे यांच्या अनेक कविता व लेख संपादित पुस्तकात प्रकाशित आहेत. काही कवितांचा हिंदी अनुवादही प्रकाशित झालेला आहे. त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पंडित कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल वंदना साळुंखे, अपर्णा कुचेकर, सुषमा वाकडे, सुप्रिया नरवडे, बालाजी कानडे, सुरेश गायकवाड, वर्षा जाधवर, जयंती इंदापूरकर, श्रीकांत माळोदे,अतुल कनोजवार,रत्नमाला मस्के, अरविंद जाधव, स्वाती माने, दिपाली खारे, प्रेमलता जांभळे,पिरजादे मॅडम यांनी व सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
अवैध मद्यावर जिल्ह्यात धडक मोहीम
धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषदांसाठीआचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकउून धडक मोहिम राबवली जात आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत विविध ठिकाणी छापे टाकून 222 गुन्हे दाखल केले आहेत. 223 आरोपींना अटकही केली. शिवाय कारवाईत 57 लाख 36 हजार 675 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेत 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी लागू केलेल्या आचारसंहितेच्या वेळीही हॉटेल्स आणि धाब्यांवरही सर्रास मद्यविक्री सुरू होती. पथकाने तपासणी मोहिमेत 46 गुन्हे नोंदवून 56 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये एका वाहनासह 9 लाख 04 हजार 855 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने कारवाई करून 10 गुन्हे नोंदवले आहेत. 8 आरोपींना अटक करून 3 लाख 71 हजार 300 रूपये किंमतीची 8 हजार 340 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय उपआयुक्त व धाराशिव उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून 10 गुन्हे दाखल करून 10 आरोपीस अटक केली आहे. 34 हजार 25 रूपयांची अवैध दारू पकडली आहे.
Satara News : पाटण तहसील परिसरात आता ‘नो पार्किंग’फलक
पाटण तहसील कार्यालयात पार्किंगची नवीन व्यवस्था नवारस्ता : पाटण तहसील कार्यालय परिसरात वाहनांच्या पार्किंग असुविधेबाबत माध्यमांनी उठविलेल्या आवाजाची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने आवारातील अस्ताव्यस्त लावण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पट्टे मारून एका रेषेत पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाटण तहसील [...]
विरोधकांच्या जोरदार मागणीनंतर अखेर सरकारची माघार! ‘संचार साथी’ॲप प्री-इंस्टॉलेशनचा निर्णय घेतला मागे
देशात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) या सायबर सुरक्षा ॲपच्या प्री-इंस्टॉलेशनचा अनिवार्य करणारा आदेश केंद्र सरकारने बुधवारी दुपारी मागे घेतला आहे. सरकारकडून हेरगिरीचा कट रचला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर अखेर सरकारने माघार घेतली आहे. विरोधकांनी ‘संचार साथी’च्या वरून आवाज उठवल्यानंतर सरकारची चांगलीच अडचण झाली. अखेर त्यांनी सारवासारव […]
देशात आणिबाणीचे वातावरण’, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची केंद्रावर जोरदार टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मालदा जिल्ह्यातील गाझोल येथे झालेल्या एसआयआर विरोधी मेळाव्यात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राज्याला मिळायला हवा असलेला निधी केंद्र देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जीएसटीनंतर आता सिगारेटवरील करही केंद्राकडे ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी सध्याची परिस्थिती ‘आणिबाणीतल्या काळासारखी’ असल्याचे म्हटले. गाझोलमधील सभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या, येथे रेल्वेची लाईन […]
राज ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, तब्येतीची केली विचारपूस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांची त्यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच विविध विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा केली. संजय राऊत हे आजारपणामुळे गेल्या महिन्याभरापासून सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत […]
Satara News : आधुनिक यंत्र वापरून मसूर कापणीस सुरुवात ; शेतकऱ्यांना दिलासा
कोपर्डे हवेलीमध्ये इंद्रायणी भाताची कापणी जोमात मसूर : कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसर सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध भात उत्पादक पट्टा मानला जातो. सध्या परिसरात भातकापणी हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपरिक मजुरांऐवजी आधुनिक हार्वेस्टर यंत्राने कापणी सुरू केली आहे. भागात [...]
Photo –नवी मुंबईत मिंध्यांना धक्का! सहसंपर्कप्रमुखासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
नवी मुंबईत मिंध्यांना धक्का बसला आहे. सहसंपर्कप्रमुख शिरीष काशिनाथ पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर आणि संदिप साळवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते राजन विचारे, विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि इतर पदाधिकारी व […]
Karad News : महिलेशी गैरवर्तन करणारा ‘तो’डॉक्टर बोगस !
कराडमध्ये बोगस डॉक्टरवर लैंगिक छळाचा संशय कराड : कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या लैंगिक छळ प्रकरणाच्या तपासादरम्यान विमानतळाजवळील मुंढे परिसरातील शाहिन क्लिनिक चालवणारा डॉक्टर बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. डॉक्टर असल्याची कोणतीही कागदपत्रे संशयित अल्ताफ नदाफ याच्याकडे आढळली नसून याबाबत पोलिसांकडून कायदेशीर [...]
सिस्टीममध्ये बिघाड: देशभरातील विमानसेवा विस्कळीत, चेक-इनवर परिणाम; हैदराबाद विमानतळावर गोंधळ
देशातील अनेक विमानतळांवर बुधवारी सकाळी सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे चेक-इन प्रणाली विस्कळीत झाली, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. या तांत्रिक अडचणींमुळे काही विमानांना विलंब झाला आहे, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले. वाराणसी विमानतळावर एका सूचना फलकाद्वारे प्रवाशांना कळवण्यात आले की, ‘जगभरात मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या प्रमुख सेवा खंडित झाल्या आहेत. त्यामुळे विमानतळांवरील आयटी सेवा/चेक-इन यंत्रणेवर परिणाम झाला आहे’. […]
Sangli News :कवठेमहांकाळमध्ये दुचाकी-टेम्पो अपघात, दोघेजण गंभीर जखमी
कवठेमहांकाळमध्ये दुचाकी अपघात, कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे उड्डाणपुलावर मंगळवारी सायंकाळी दुचाकीची पिकअप टेम्पोला पाठीमागून झालेल्या धडकेत दोघे युवक गंभीर जखमी झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल श्रीमंत तुपे व सुमित संतोष येवले (दोघेही रा. [...]
भाजप उमेदवाराचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या भावावर हल्ला
गडचांदूर शहरात भाजप उमेदवार सुरज पांडे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांच्या भावाला विट फेकून मारल्याची धक्कादायक घटना मतदानानंतर घडली आहे. या हल्ल्यात प्रकाश निमजे गंभीर जखमी झालेयत. या घटनेमुळे गडचांदूर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. भाजपचे प्रभाग नऊचे उमेदवार सुरज पांडे याने हा हल्ला केला. यात निमजे यांच्या डाव्या […]
सायन फ्लायओव्हरचे काम 31 मेपर्यंत पूर्ण करणार, मुंबई महानगरपालिकेचे लक्ष्य
बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सायन फ्लायओव्हरच्या पुनर्निर्माण कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले असून, हे संपूर्ण काम पुढील वर्षी 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या आढाव्यात त्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देत विलंब टाळण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, सध्या कामाला अपेक्षित गती मिळत असून, रोजच्या प्रगतीवर स्वतः लक्ष ठेवले […]
आम्ही युरोपशी युद्धासाठी तयार, त्यांचा पराभव निश्चित आहे; पुतिन यांचा इशारा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी युरोपीय देशांना कडक इशारा दिला की, “जर युरोपने रशियाविरुद्ध युद्ध सुरू केले तर रशिया सर्व प्रकारे प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.” ते म्हणाले आहेत की, “रशियाला युरोपसोबत युद्ध नको आहे, पण जर युरोपने युद्ध सुरू केले तर प्रकरण इतक्या लवकर संपेल की शांतता कराराच्या चर्चेसाठीही कोणीही उरणार नाही.” व्लादिमीर पुतिन […]
येत्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते जाहीर केलेच पाहिजेत, भास्कर जाधव यांची मागणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत गंभीर आक्षेप घेतले. पत्रकारांशी संवाद साधताना जाधव म्हणाले की, विरोधी पक्षनेता हे पद संविधानिक असून लोकशाहीच्या परंपरा, प्रथा आणि घटनात्मक नियमांनुसार ते अस्तित्वात असणे अत्यावश्यक आहे. “उपमुख्यमंत्री पद हे कुठेही संविधानात नाही, ही केवळ राजकीय सोय आहे. मात्र विरोधी पक्षनेता हा घटना, […]
Sangli News : सांगलीत पोलिस कॅन्टीन घोटाळा: व्यवस्थापकाला पाच दिवसांची कोठडी
‘संस्कृती सबसिडी कॅन्टीन’मध्ये ७४ लाखांचा अपहार उघड सांगली : जिल्ह्यातील पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता यावी, यासाठी सुरू केलेल्या ‘संस्कृती सबसिडीजर कॅन्टीन’ मध्ये ७४ लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत कॅन्टीन व्यवस्थापक हवालदार भुपेश भीमराव चांदणे (वय ४२, रा. [...]
Sindhudurga News- आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा 9 फेब्रुवारीला होणार
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. बुधवारी सकाळी धार्मिक प्रथा परंपरा जोपासत आंगणे ग्रामस्थांनी देवीला कौल लावून यात्रेची निश्चित केली. यामुळे यात्रेच्या तारखेबाबत भाविकांमध्ये असलेली उत्सुकता संपली असून यात्रेला येण्यासाठी भाविकांनी प्रवास तिकीट बुकिंग करण्याबरोबरच नियोजन सुरु केले आहे. […]
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर राहाणार अत्याधुनिक कॅमेऱ्यांची नजर; प्राण्यांच्या हालचाली टिपणार
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांचे नेटवर्क उभारण्यात येत आहे. व्याघ्र प्रकल्पावर ड्रोनद्वारे डिजिटल नजर ठेवली जाणार आहे. त्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाचव्या वाघाला शोधणे सोपे होणार आहे. वन्यजीव संघर्ष वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन आणि आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवासंदर्भातील सामंजस्य करार झाला […]
गद्दारांचा बुडबुडा फुटलेला असून मिंधे गटात अक्षरशः मारामारी, उद्धव ठाकरे यांची टीका
ठाण्यातील शिवसेनेतून बाहेर पडून मिंधे गटात सामील झालेले अनेक कार्यकर्ते आता परत येत आहेत येत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. “आजही काही जण तिकडे गेले होते, पण तेही परत आलेले आहेत. थोडक्यात, गद्दारांचा बुडबुडा फुटलेला आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, मिंधे गटामध्ये अक्षरशः मारामारी, बाचाबाची सुरू झाली […]
Sangli News : कवठेमहांकाळ येथे उद्या श्री विरभद्र यात्रा
श्री विरभद्र देवस्थानी उद्या महापूजा कवठेमहांकाळ : सालाबादप्रमाणे कवठेमहांकाळ येथील लिंगायत, कोष्टी समाजाचे आराध्य दैवत श्री. विरभद्र देवस्थानची यात्रा उद्या संपन्न होत आहे. यात्रेनिमित्त सकाळी ५.३० वाजता ‘श्रीं’ची महापूजा व श्रींच्या मूर्तीस भाविकांकडून अभिषेक होणार आहे. दुपारी श्रींची आरती होणार असून [...]
Sangli News : उदगिरी परिसरात वाघाचे दर्शन; स्थानिकांमध्ये भीती, पर्यटकांत उत्साह
उदगिरी वाघदर्शनाने भीतीचे वातावरण; वारणावती: दोन तीन दिवस उदगिरीजवळ वाघाचेदर्शन झाल्याचे उदगिरी परिसरातील व्हिडीओ व्हायलर होत आहे तर उखळू अंबाई वाडा येथे काही नागरिकांना तसेच पर्यटकांनी वाघ दिसल्याचे सांगत आहेत तर काही ठिकाणी वाघाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे [...]
Hupari Election |हुपरी नगरपरिषदेसाठी निवडणुकीत वादावादीमुळे गालबोट; लाठीमार
विक्रमी ८०.५५ टक्के मतदान; २१ डिसेंबर रोजी मतमोजणी हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील नगरपरिषदेसाठी निवडणुकीत सर्व प्रभागात सरासरी ८०.५५ टक्के विक्रमी मतदान झाले. एकूण नगरपरिषेदेत २०,०५३ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला. काही प्रभागात शांततापूर्ण मतदान झाले तर प्रभाग क्र. ३, ४, ५, ७, ९ [...]
चॉकलेटचे आमिष दाखवून गैरवर्तन करणारा ६० वर्षीय नराधम अटकेत इचलकरंजी : इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या एका गावामध्ये गेल्या सहा महिन्यापासून अल्पवयीन मुलीला चॉकलेट बिस्किट गोळ्याचे आमिष दाखवून गैरवर्तन करणाऱ्या वृद्धास महिलांनी बेदम चोप देऊन शहापूर पोलिसांच्या हवाली केले. दशरथ भाऊ सोनटक्के (वय ६० रा. [...]
विवादित जागेत महिलेचा संशयास्पद मृत्यू
कारापूर-डिचोली येथील घटनेने खळबळ : नातेवाईकांसह अनेकांना घातपाताचा संशय,10 डिसेंबरला होती न्यायालयात सुनावणी डिचोली : कोळशाकातर कारापूर डिचोली एका विवादित व न्यायप्रविष्ट असलेल्या मालमत्तेत लहानशा घरात राहणाऱ्या वासंती सालेलकर या अविवाहित महिलेचा त्याच घरात विजेच्या झटक्मयाने मृत्यू होण्याची घटना काल मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. वासंतीची बहीण घरात आल्यावर हा प्रकार उघडकीस [...]
Kolhapur Crime : सिद्धूचा खून पैशांसाठी, खिशातील रक्कम, दुचाकी गायब
कोल्हापुरात सिद्धू बनवीचा गळा आवळून खून कोल्हापूर : हॉकी स्टेडियम येथील विश्वपंढरी समोर सिद्धू शंकर बनवी (वय २०) याचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मनिष राउत याला अटक केले [...]
जुने गोवेत आज सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त
तिसवाडी : संत फ्रान्सिस झेवियर यांचे वार्षिक फेस्त बुधवार दि. 3 डिसेंबर रोजी साजरे होणार आहे. दरवषीप्रमाणे यंदाही देश-विदेशातील लाखो भाविक बाँ जिझस बासिलिका चर्चमध्ये हजेरी लावणार आहेत.बासिलिका ऑफ बाँ जिझस येथे पहाटे 3.45 वाजल्यापासून प्रार्थना सुरू होतील. सायंकाळी 6.15 पर्यंत विविध भाषांमध्ये प्रार्थना चालू राहतील. मुख्य प्रार्थना सकाळी 10:30 वाजता होईल. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद [...]
तपासातसापडलेनाहीतकोणतेहीपुरावेपोलिसअधीक्षकराहूलगुप्तायांचीमाहिती राहूलगुप्ताम्हणाले… मंत्री, अधिकाऱ्यांविरुद्धनाहीपुरावा पूजानाईकवरतीनआरोपपत्रदाखल ‘ती’ डायरीअन्तन्वीचाहीनाहीपत्ता ‘त्या’ फ्लॅटमध्येराहतातविद्यार्थी मगोसंदर्भातीलदाव्यालाहीनाहीपुरावा पुजाच्याफोनमध्येमुलींचाअभ्यासक्रम परतकेलेलाफोनविकलाउत्तरप्रदेशात पूजाच्याखात्यात8 कोटींचाव्यवहार तीनमहिनेहोती‘फाईवस्टार’मध्ये फसलेल्यांनीपोलिसांशीसंपर्कसाधावा पणजी : ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने सरकारी अधिकारी आणि एका मंत्र्यावर केलेले आरोप तथ्यहिन असून तिने पेलेल्या आरोपासंदर्भात गुन्हा शाखेने सखोल तपासणी केली असता कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. तपासाअंती पूजाने केलेले आरोप खोटे [...]
Kolhapur News : कोल्हापुरात सोलर पॅनेल बसवताना विद्युत धक्क्याने व्यक्तीचा मृत्यू
कोल्हापूरात सोलर बसविताना भीषण अपघात कोल्हापूर : सोलर पॅनेलचे साहित्य टेरेसवर नेत असताना मुख्य विद्युत वाहिनीस पाईपचा स्पर्श होवून विजेचा शॉ क लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. रवींद्र रंगराव जाधव (वय ५२, रा. [...]
हिंदुस्थानी रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी ९० हून अधिक खालच्या पातळीवर घसरल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषतः अर्थमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. बुधवारी रुपयाची झालेली ऐतिहासिक घसरण आणि त्या तुलनेत काही इतर जागतिक चलनांसमोर त्याची झालेली अधिक वाईट कामगिरी याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे: […]
तुयेत भरदिवसा घर फोडून 4 लाखांचा ऐवज लंपास
पेडणे : तुये-पार्से या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनिल श्रीधर सावंत यांच्या घरात काल मंगळवारी भर दिवसा चोरी झाली असून चोरट्यांनी तीन सोनसाखळ्या, सोन्याचे पान, मिलेरमधील रोख रक्कम सुमारे 15 हजार तसेच तिजोरीत असलेले 35 हजार ऊपये असा सुमारे चार लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. घरात कोणी नसल्याचा चोरट्याने फायदा उठवत ही चोरी सकाळी साडेदहाच्या [...]
जिल्हा पंचायतीसाठी भाजपचे आणखी 10 उमेदवार जाहीर
आतापर्यंत एकूण 29 उमेदवार घोषित : 50 मतदारसंघांसाठी 20 रोजी निवडणूक होणार पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काल मंगळवारी दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी 6 आणि दक्षिण गोव्यासाठी 4 मिळून एकूण 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राज्यात दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी मिळून 50 [...]
भूभाडे वसुली ठेकेदाराच्या मनमानीवर संताप
मनपा सर्वसाधारण सभेत आमदार आसिफ सेठ संतापले : ठेकेदाराकडून भाजी-फळ विक्रेत्यांना त्रास : दिव्यांगाकडूनही पैसे वसूल बेळगाव : भूभाडे वसुलीच्या नावाखाली ठेकेदार मनमानी पद्धतीने भाजी व फळ विव्रेत्यांकडून वसुली करत आहेत. दिव्यांगांकडून भूभाडे वसूल करू नये, असा नियम घालून देण्यात आला असला तरी ठेकेदार पैसे वसूल करत आहेत. संबंधित ठेकेदारांविरोधात अनेकवेळा तक्रारी करूनदेखील त्यावर कारवाई [...]
हिवाळी अधिवेशनाची सर्व तयारी पूर्ण
जिल्हाधिकारीमोहम्मदरोशनयांचीमाहिती: कामाचाघेतलाआढावा बेळगाव : हिवाळी अधिवेशनाची सर्व तयारी करण्यात आली असून गेल्यावर्षीपेक्षा यंदा अधिक चांगल्यारितीने अधिवेशन पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यंदाच्या अधिवेशनकाळात आंदोलने कमी होतील, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून विविध संघ-संस्थांशी चर्चा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आगामी अधिवेशनात सुवर्णसौध आवारात सभाध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकाविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी [...]
बाईक व्हिलिंग प्रकरणी पिरनवाडीचा तरुण ताब्यात
बेळगाव : धूमस्टाईलने मोटारसायकल चालवित व्हिलिंग करणाऱ्या एकाला दक्षिण रहदारी पोलिसांनी ताब्यात घेण्यासह मोटारसायकलदेखील जप्त केली आहे. कार्तिक संजू मास्तमर्डी (वय 24) रा. अन्सार गल्ली पिरनवाडी असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात बीएनएस कायदा 2023 आणि मोटार वाहन व्हिलिंग कायदा 1988 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी काँग्रेस रोडवरील सेकंड गेटजवळ एफझेड मोटारसायकलवरून [...]
जिल्हाधिकारी कार्यालय नूतनीकरणाचे काम जलदगतीने
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाचा विकास वेगाने सुरू आहे. यादृष्टीने विविध कामे कंत्राटदारांकडून हाती घेण्यात आली आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील पेव्हर्स काढण्याचे काम करण्यात येत होते. त्याचबरोबर पार्किंगसाठीही सुसज्ज जागा करण्यात येत असून जेसीबीच्या साहाय्याने माती काढण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. एकंदरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम जलदगतीने सुरू असून लवकरच सुसज्ज इमारतीचा शुभारंभ करण्यात [...]
आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहणे महत्त्वाचे
मीरापूरगल्लीशहापूरयेथीलसागरहंजीकंबरेचेदुखणेत्रासदायकअसूनहीदिव्यांगावरकरतोयमात बेळगाव : आज 3 डिसेंबर असून या दिवशी दरवर्षी जगतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. आपण सुदृढ निरोगी असावे असे प्रत्येकालाच वाटते. परंतु वेगवेगळ्या कारणास्तव कधी कधी दुर्दैवाने कोणाला दिव्यांगत्वही येऊ शकते. परंतु त्याचा बाऊ करून सतत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा त्याचा स्वीकार करून आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहणे महत्त्वाचे. कारण जगायचेच असेल तर आनंदाने आणि वास्तवाला सामोरे [...]
नगरसेवकांकडून नूतन मनपा आयुक्तांचे स्वागत
बेळगाव : महापालिका नूतन आयुक्त म्हणून रुजू झालेल्या कार्तिक एम. यांचे विरोधी गटातील नगरसेवकांच्यावतीने मंगळवार दि. 2 रोजी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मावळत्या मनपा आयुक्त शुभा बी. यांची बदली होऊन त्यांच्या जागी नूतन मनपा आयुक्त म्हणून कार्तिक एम. यांची वर्णी लागताच त्यांनी तातडीने बेळगाव महानगरपालिकेत रुजू होऊन [...]
लोककल्पतर्फे आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशन व सेंट्रा केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प येथील लोकमान्य सोसायटीच्या शाखेमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. 60 हून अधिकजणांनी याचा लाभ घेतला. सेंट्रा केअरच्या डॉ. अनिता ताशीलदार, नर्स अनुस कुरी, प्रज्योत हिरेमठ, पीआरओ विनायक ताम्हणकर, लोकमान्यचे शाखा व्यवस्थापक रोहन मेंहदळे, लोकमान्य सीएसआर विभागाचे निशांत जाधव व आरएमएम परास पाटील यावेळी [...]
बीपीएल कार्डांवर पुन्हा येणार गंडांतर?
आधारक्रमांकाद्वारेहोणारअपात्रलाभार्थांचीओळख: संबंधितविभागाकडूनप्रक्रियासुरू बेळगाव : राज्य सरकारने राज्यभरात सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण केले. हा सर्वेक्षण मागासवर्गीय आयोगामार्फत करण्यात आले. सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारे आता बीपीएलकार्डे रद्द करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून त्यांचे एपीएलमध्ये रुपांतर करण्यात येत आहे. यापूर्वीच राज्यभरात अनधिकृत बीपीएलकार्डे रद्द करण्याचे काम संबंधित विभागाकडून केले जात आहे. आता सर्वेक्षणाच्या अहवालाच्या माहितीनुसार बीपीएल रद्दची प्रक्रिया [...]
नगरसेवकांना 10 दिवसांत माहिती पुरवा
महापौरमंगेशपवारयांचीसर्वसाधारणसभेतअधिकाऱ्यांनासूचना बेळगाव : एखाद्या विषयावर सभेत बोलायचे असल्यास सर्वप्रथम त्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. मात्र माहिती देण्यासंदर्भात अर्ज करूनदेखील अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जात नाही. 10 दिवसांत माहिती देण्यात यावी, असा ठराव यापूर्वीच पारित करण्यात आला आहे. पण त्याचे पालन होत नाही, असा आरोप नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी केला. त्यामुळे एखाद्या नगरसेवकाने माहिती मागितल्यास दहा दिवसांत [...]
मुतगे येथे दोन भाताच्या गंज्या आगीच्या भक्ष्यस्थानी
वार्ताहर/सांबरा मुतगे (ता. बेळगाव) येथे दोन भाताच्या गंज्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना मंगळवार दि. 2 रोजी सकाळी उघडकीस आली. मुतगे येथील शेतकरी यल्लाप्पा गुंडू केदार यांच्या मालकीच्या दोन भाताच्या गंज्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी विजयालक्ष्मी यांना [...]
भीमगड अभयारण्यातील गावांच्या स्थलांतरास विरोध
कायदेशीरतसेचरस्त्यावरीललढाईलढण्याचाएकमुखीनिर्णय: हेम्माडगायेथेस्थलांतरविरोधीमेळावा खानापूर : जल, जमीन आणि जंगल यावर तेथील रहिवाशांचा हक्क आहे. आणि तो हक्क संविधानाने अबाधित ठेवलेला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दुर्गम भागातील आणि अभयारण्यातील रहिवाशांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे या जंगलातील नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्याचे सरकारचे कर्तव्य आहे. या रहिवाशांचे येथील भूमीशी आणि निसर्गाशी भावनिक आणि जिव्हाळ्याचे तसेच पारंपरिक [...]
यात्राकाळात व्यत्यय न येता वीजपुरवठा करा
तारिहाळमध्येहोणाऱ्याश्रीमहालक्ष्मीयात्रेच्यापार्श्वभूमीवरहेस्कॉमअधिकाऱ्यांचीबैठक वार्ताहर/सांबरा तारिहाळ येथे एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात आली व बैठकीत गावातील विद्युत समस्यांचे यात्रेपूर्वी निवारण करण्याची मागणी करण्यात आली. येथील यात्रा दि. 21-4-2026 ते 29-4-2026 पर्यंत होणार आहे त्यानिमित देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रमोद सूर्याजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हेस्कॉम अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.यात्राकाळात वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ [...]
महामेळाव्यात सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
जांबोटीतखानापूरतालुकाम. ए. समितीच्यावतीनेपत्रकेवाटूनजागृती वार्ताहर/जाबोटी कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमाभागावर आपला हक्क सांगण्यासाठी हलगा येथे सुवर्ण विधानसौध बांधून बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन, या ठिकाणी दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येते. यावर्षी कर्नाटक सरकारचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी व अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी बेळगावमध्ये अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. [...]
अखेर बाळेकुंद्री खुर्द-पंत बाळेकुंद्री राज्य महामार्गाच्या डागडुजी कामास प्रारंभ
वाहनचालकांतूनसमाधान: ‘तरुणभारत’ वृत्ताचीदखल सांबरा : अखेर बाळेकुंद्री खुर्द ते पंत बाळेकुंद्री दरम्यानच्या बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव-बागलकोट राज्यमार्गाची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. रस्ता पूर्णपणे उखडून अक्षरश: चाळण झाली होती. मुतगे, बाळेकुंद्री, पंत बाळेकुंद्री, मोदगा आदि ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनचालकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत [...]
जनतेच्या पैशातून नेहरूंना ‘बाबरीची’उभारणी करायची होती, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे विधान
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात वादग्रस्त विधानं केली आहेत. यावेळी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांवर टीका केली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती की ‘बाबरी मशिदी’ची उभारणी सार्वजनिक निधीतून व्हावी, मात्र सरदार पटेल यांनी तसे होऊ दिले नाही, असे विधान […]
तपोवन परिसरातील सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोपचारातून तोडगा काढण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, विकासकामे सुरू असताना स्थानिकांच्या भावना व पर्यावरणीय परिणाम यांचा गांभीर्याने विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अजित पवार यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या भुमिकेला पाठिंबा जाहीर केला आहे. अजित पवार यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेल्या […]
ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन, मृत्यूपश्चात देहदानाचा निर्णय
ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा (93) यांचे नळदुर्ग येथील आपल्या निवासस्थानी निधन झाले. शुक्रवारी रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांनी देहदान केले आहे. पन्नालाल सुराणा मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी होते. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत ते सक्रिय होते.समाजवादी पक्ष आणि […]
जर्मनीच्या बीएमझेड शिष्टमंडळाकडून केएसआरटीसीच्या उपक्रमांची प्रशंसा
बेंगळूर : जर्मन सरकारच्या फेडरल सचिवालयातील इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट (बीएमझेड)च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) कार्यालयाला भेट दिली. सदर शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आले आहे. दौऱ्याचा एक भाग म्हणून त्यांनी केएसआरटीसीच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. दृष्टीदोष असणाऱ्या प्रवाशांकडून सार्वजनिक परिवहनचा वापर वाढावा, या उद्देशाने उपयुक्त साऊंड नेव्हिगेशन यंत्रणा असलेल्या ‘ध्वनी स्पंदन-ऑनबोर्ड’ [...]
स्थानिक संस्थांच्या बळकटीसाठी प्रयत्न
आमदारचन्नराजहट्टीहोळी: मास्तमर्डीतग्रा. पं. इमारतीचेउद्घाटन बेळगाव : ग्राम पंचायतींना नवीन इमारतीसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन स्थानिक संस्थांच्या बळकटीसाठी काही उपक्रम हाती घेण्यात आले असल्याचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मास्तमर्डी येथे ग्राम पंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 2) करण्यात आले. तत्पूर्वी प्रतिमा पूजन केले. [...]
सांबरा शिवारातील बळळारी नाल्यावरील दोन विद्युत मोटारींची चोरी
वार्ताहर/सांबरा सांबरा येथील शिवारातील बळळारी नाल्यावरील दोन विद्युत मोटारी चोरीस गेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील शेतकरी काशिनाथ धर्मोजी व महादेव कोकितकर यांच्या मालकीच्या बळळारी नाल्यावरील दोन विद्युत मोटारी चोरट्यांनी लांबविल्या आहेत. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेताला गेले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर मारिहाळ [...]
इलेक्ट्रॉल बॉण्ड बंद झाल्यानंतरही BJP ला सर्वाधिक देणग्या, 83 टक्के निधी एकट्या भाजपकडे
टाटा ग्रुप नियंत्रित प्रोग्रेसिव्ह एलेक्टोरल ट्रस्ट (PET) द्वारे 2024-25 मध्ये दिलेल्या एकूण 915 कोटी रुपयांच्या राजकीय देणग्यांपैकी जवळपास 83 टक्के रक्कम भाजपकडे गेली तर, काँग्रेसला फक्त 8.4 टक्के भाग मिळाला. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेल्या विविध एलेक्टोरल ट्रस्ट्स च्या योगदान अहवालानुसार, सुप्रीम कोर्टने फेब्रुवारी 2024 मध्ये इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले, तरी भाजपच्या निधीत मोठ्या प्रमाणात […]
नागेश चोरलेकर जय भारत क्लासिकचा मानकरी
खानापूरचा सिद्धार्थ गावडे उत्कृष्ट पोझर बेळगाव : जय भारत फौंडेशन आयोजित जय भारत क्लासिक बेळगाव जिल्हा ग्रामीण मर्यादित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत खानापूरच्या नागेश चोरलेकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर जय भारत क्लासिक किताब पटकाविला. तर सिद्धार्थ गावडेने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला. रामनाथ मंगलकार्यालय येथे घेण्यात आलेल्या जय भारत क्लासिक बेळगाव जिल्हा ग्रामीण विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेत जवळपास [...]
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित 14 वर्षांखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंद क्रिकेट अकादमीने श्री दुर्गा स्पोर्ट्स हुबळी संघाचा 143 धावांनी पराभव करुन विजेतेपद पटकाविले. 95 धावा काढणाऱ्या अंश देसूरकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.केएससीए हुबळी मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात आनंद क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी [...]
विमानतळ, मॉलना बॉम्बस्फोटाची धमकी
बेंगळूरपोलीसआयुक्तांनाई-मेल: भीतीपसरवण्यासाठीसंदेश: गस्त, तपासणी, सुरक्षाव्यवस्थेतवाढ बेंगळूर : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकीचा ई-मेल पाठविण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बेंगळूरमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि शहरातील अनेक शॉपिंग मॉलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा संदेश बेंगळूर शहर पोलीस आयुक्तांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात आला आहे. यासंबंधी पोलिसांनी एफआयआर नोंदवून धमका देणाऱ्याचा शोध [...]
दिल्ली महानगरपालिका (MCD) च्या १२ वॉर्डांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाने (BJP) ४ जागा आणि आम आदमी पार्टी (AAP) यांनी २ जागा जिंकल्या आहेत. यासोबतच, काँग्रेसनेही संगम विहार-ए जागा जिंकून दिल्लीमध्ये आपले खाते उघडले आहे. तर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (AIFB) ने देखील एक जागा जिंकली आहे. ३० नोव्हेंबर […]
राज्यपाल निवासस्थानाचे आता होणार ‘लोकभवन’
बेंगळूर : केंद्रीय गृहखात्याच्या निर्देशानुसार कर्नाटकातील राजभवनाचे भविष्यात ‘लोकभवन’ असे नामकरण केले जाणार आहे. यापूर्वीच पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरातसह 8 राज्यांनी राजभवनाचे नाव बदलून लोकभवन असे केले आहे. आता कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत लवकरच राजभवनाचे नाव बदलून लोकभवन असे करण्याबाबतचा अधिकृत आदेश जारी करतील. राजभवन हे राज्यपालांच्या अखत्यारित येत असल्याने नाव [...]
आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांना कुमारस्वामींचे आश्वासन
बेंगळूर : विविध मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी मंड्या येथे आंदोलन छेडलेल्या अंगणवाडी सेविकांशी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नवी दिल्लीतून फोनवर संवाद साधला. तसेच त्यांना चर्चेसाठी नवी दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. जिल्हाधिकारी कुमार यांच्यामार्फत राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी श्रीकुमारी यांच्याशी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, तुम्ही थंडीत आंदोलनाला बसू नये. तुमच्या संघटनेच्या दहा प्रमुख [...]
सरकारी शाळांतील एलकेजी, युकेजीसाठी दूध, अंडी, केळी
शालेयशिक्षण-साक्षरताखात्याचाआदेश बेंगळूर : राज्यातील सरकारी शाळांमध्ये विविध योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांमधील (एलकेजी, युकेजी) विद्यार्थ्यांनाही मध्यान्ह आहार, क्षीरभाग्य योजनेंतर्गत दूध, पोषण आहार योजनेंतर्गत अंडी, केळी वितरित करण्याचा आदेश शालेय शिक्षण-साक्षरता खात्याने दिला आहे. मागील आठवड्यात सरकारने हा निर्णय घेतला होता. कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये (केपीएस) सुरू करण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांमध्ये शिकणाऱ्या मुलांना महिला [...]
मासिक पाळीच्या रजेबाबत अधिकृत आदेश
अर्थखात्याच्यासचिवांकडूनआदेशपत्रकजारी बेंगळूर : राज्यातील सर्व उद्योग व संस्थांमध्ये काम करणाऱ्या 18 ते 52 वयोगटातील सर्व कायमस्वरूपी,कंत्राटी आणि बाह्याकंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात दरमहा एक दिवस याप्रमाणे वर्षाला 12 दिवस पगारी रजा देण्याची सुविधा देणारा अधिकृत आदेश सरकारने जारी केला आहे. अर्थखात्याच्या सचिवांनी या संदर्भात आदेश जारी केला आहे.महिला सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल सुधारण्याच्या उद्देशाने हा [...]
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) साठी हेरगिरी करून माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या गुरुग्रामच्या वकिलाचे दोन बँक खाते होते आणि तो पैसे गोळा करण्यासाठी सात वेळा अमृतसरला गेला होता, अशी माहिती त्याचे वकील मित्र मुशर्रफ उर्फ परवेझ यांनी पोलिसांना दिली आहे. मुशर्रफला यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. मुशर्रफने पोलिसांना सांगितले की, २०२० मध्ये सोहना […]
घणसोलीतील अडीच हजार बेकायदा घरांना नोटिसा, नवी मुंबईत सिडकोचा बुलडोझर सुसाट
पावसाळा संपल्यानंतर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी विभागाचा बुलडोझर सुसाट निघाला आहे. तोडफोड कारवाई गतिमान करण्यासाठी सिडकोने नवी मुंबई, पनवेल आणि उरणमधील साडेतीन हजार बेकायदा घरांना नोटिसा पाठवल्या असून त्यामध्ये एकट्या घणसोलीतील अडीच हजार घरांचा समावेश आहे. नवी मुंबईत दिघापाठोपाठ घणसोली हे अनधिकृत बांधकामांचे नवीन हब तयार झाले आहे. येथील अनधिकृत इमले हटवण्यासाठी सिडकोने आता विशेष पुढाकार घेतला […]
ठाण्यात ठाकरे ब्रँडच मोठा भाऊ; राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षांची ग्वाही
विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी महाविकास आघाडीची एकजूट भक्कम असून ठाण्यात ठाकरे ब्रँडच मोठा भाऊ असेल, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले. ठाणे महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ द्या, ती समर्थपणे लढवू आणि जिंकू अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, लोकमान्यनगर प्रभाग क्रमांक १४ येथे शिवसेना […]
अविवाहितांसाठी हनुमान तर दोनदा लग्न झालेल्या … CM रेवंथ रेड्डींचे हिंदू देवतांबाबत वादग्रस्त विधान
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी हिंदू धर्मातील देवी-देवतांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त टिप्पणीमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. हिंदू धर्मात प्रत्येकाचा वेगळा देव…, जर देवतांवर एकमत होऊ शकत नाही, तर राजकीय नेते आणि डीसीसी अध्यक्षांवर एकमत कसे होईल, असे ते म्हणाले. रेड्डी यांनी हिंदू देवी देवतांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप इतर राजकीय पक्षातून केला जात […]
तळगडावर सापडला गुप्त दरवाजा, दुर्गरत्न प्रतिष्ठानची मोहीम
तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली. अभ्यासकांकडून गडाची माहिती, नकाशा घेतला आणि शिवभक्तांनी फावडे, टिकाव, पहारी हाती घेऊन गुप्त दरवाजा शोधून काढला. हा दरवाजा शोधण्यासाठी दोन मोहिमा राबवण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर […]
दहा वर्षांपासून ठप्प पडलेली उल्हासनगर पालिकेची परिवहन सेवा पुन्हा एकदा धावू लागली आहे. मात्र कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभाराची काही महिन्यातच पोलखोल झाली आहे. परिवहनच्या बसेस साफसफाई न करताच चालवल्या जात असून अनेक गाड्या नामफलकाविनाच चालविल्या जात आहेत. तसेच अग्निशमन यंत्रणादेखील बंद आहेत. अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी आज स्वतः काही बसेसमधून प्रवास करत झाडाझडती केली. […]
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे फाडफाड इंग्लिश, नवघरमध्ये ‘बँक ऑफ वर्ड उपक्रम
नवघर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आता इंग्रजीचे धडे गिरवत आहेत. इंग्रजीची भीती मनातून घालवण्यासाठी शाळेच्या शिक्षिकेने ‘बँक ऑफ वर्ड’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शब्द संपदेत वाढ झाली आहे. तसेच स्पेलिंग, पाठांतर, संवाद कौशल्य यामध्ये सुधारणा झाली असून ते आता फाडफाड इंग्रजी बोलू लागले आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फाडफाड इंग्रजी […]

30 C